Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पुजारी हटाओ संघर्ष समितीकडून दोन हजार पानांचे पुरावे सादर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील सध्याच्या पुजाऱ्यांना हटवून तेथे सरकारी पुजारी नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवारी झालेल्या पहिल्या सुनावणीत श्री अंबाबाई पुजारी हटाओ संघर्ष समितीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दोन हजार पानांचे पुरावे सादर केले. यात ऐतिहासिक दाखल्यांसह पुजाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत गाभाऱ्यात केलेल्या चुकांचे पुरावे असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेवरून ही सुनावणी घेण्यात येत आहे.

अंबाबाईला घागरा चोलीची पूजा बांधल्यावरून सुरू झालेल्या वादात मंदिरातील पुजाऱ्यांना हटवून पंढरपूरप्रमाणे सरकारी पुजारी नेमावेत, अशी मागणी सुरू झाली. यावर तोडगा काढण्यासाठी २२ जूनला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविलेल्या बैठकीत पुजारी अजित ठाणेकर यांना मारहाण झाली होती. त्या बैठकीतच पालकमंत्री पाटील यांनी सरकारी पुजारी नेमण्यासंदर्भात विचार करण्यासाठी जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेऊन दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात, असे आदेश दिले. तीन महिन्यांत या संदर्भातील अहवाल विधी व न्याय विभागाला पाठविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पहिली सुनावणी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाजवळील शिवाजी सभागृहात झाली.

सुनावणीला श्री अंबाबाई पुजारी हटाओ संघर्ष समितीचे सर्व पंधरा सदस्य उपस्थित होते. सुनावणीनंतर समितीचे प्रवक्ते संजय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सुनावणीमध्ये सदस्यांपैकी अनेकांनी ऐतिहासिक मुद्दे कागदपत्रे आणि ठोस पुराव्यांसह मांडले आहेत. अन्य ठिकाणी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सरकारने मानधनावर पुजारी नेमले आहेत त्याचप्रमाणे अंबाबाई मंदिरातही निर्णय व्हावा, अशी समितीची एकमुखी मागणी आहे. सदस्यांनी आंदोलनाची ही ठिणगी पडली आहे, वणवा पेटू देऊ नका, असा इशारा दिला आहे.’

पुढील सुनावणी २० जुलैला

समितीचे सदस्य आणखी काही पुरावे गोळा करत आहेत. त्यासाठी थोडा अवधी हवा असल्याने समितीकडूनच जिल्हाधिकाऱ्यांकडे पंधरा दिवसांची मुदत मागण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या २० जुलैला सकाळी साडेदहा वाजता पुढील सुनावणीची वेळ निश्चित केली आहे.

तोपर्यंत देणगी सरकार जमा

मंदिरात जे दानधर्म होते, देणगी येते ती सरकार जमा करावी, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे. मंदिरात पुजारी नेमण्याबाबत तीन महिन्यांत अहवाल विधी व न्याय विभागाकडे द्यायचा आहे. तोपर्यंत मंदिरात येणाऱ्या देणगीचे काय?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर यासंदर्भात निर्णय होईपर्यंत सर्व देणगी सरकार जमा करावी आणि निर्णय झाल्यानंतरच त्या निधीविषयी अंतिम निर्णय घ्यावा, असे म्हणणे समितीने मांडले.

लाडू प्रसाद बंद करा

आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानप्रमाणे कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात लाडूच्या प्रसादाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याला पुजारी हटाओ संघर्ष समितीने बैठकीत विरोध दर्शविला. अंबाबाई मंदिरात फुटाणे आणि खडीसाखर हा पारंपरिक प्रसाद आहे. तिरुपतीप्रमाणे सुरू झालेली अंबाबाई मंदिरातील ही पद्धत उद्यापासूनच (५ जुलै) बंद करावी, अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुधवार ठरला आंदोलनवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोर्चे, धरणे आंदोलन, निदर्शने आणि घोषणाबाजींनी नेहमी गजबजणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा आजचा बुधवार सर्वाधिक बिझी ठरला. अंबाबाई मंदिरातील पुजारी हटविण्या संदर्भातील महत्त्वपूर्व सुनावणी दरम्यानच एकापाठोपाठ आलेले मोर्चे, निदर्शने यांमुळे आजचा बुधवार आंदोलनवार झाल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होती.

सकाळी साडेअकराच्या सुमारास राष्ट्र विकास सेना पार्टी या संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर बसून भाजी भाकरी आंदोलन सुरू केले. कार्यालयातील बंदोबस्तास असणारे पोलिस आणि कर्मचाऱ्यांना अशा आंदोलनाची कल्पना येण्यापूर्वीच आंदोलन सुरू झाले. त्यावेळी अंबाबाई मंदिरातील पुजारी हटविण्यासंदर्भातील सुनावणी सुरू झाली होती. जयसिंगपुरातील तात्यासाहेब कोरे नगरातील ४० कुटुंबांना जबरदस्तीने हटविल्याचा मुद्दा घेऊन संघटना जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासाठी आली होती. यूर्वी तीन जुलै रोजी याविषयावर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. घरे पाडण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची खोटी सही करून आदेश दिल्याचा आरोप संघटनेने निवेदनाद्वारे केला आहे. नगरपालिकेने पाणीपुरवठा, वीज कनेक्शन दिलेली असताना पोलिस बंदोबस्तात ४० घरे पाडण्याचा तातडीने निर्णय का घेतला, असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या संघटनेने काल (मंगळवार) आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिस आणि जिल्हा प्रशासनास दिली होती. पण, आज पूर्व कल्पनेशिवाय अचानक आंदोलन केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू होती. जवळपास दीड तासांनंतर पोलिसांनी आंदोलकांना शांतपणे हाताळून तेथून बाहेर काढले.

काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येण्यापूर्वी ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने सरपंच पदाची सातवी पासची अट रद्द करावी, शेतकऱ्यांना विना अट सरसकट कर्जमाफी द्यावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने सुरू केली होती. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी इतर आंदोलकांची निवेदने स्वीकारली. पण, आम्हाला वेळ दिला नाही, असा आरोप करत ब्लॅक पँथरच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर निवेदनांचे तोरण बांधून निषेध व्यक्त केला.

दरम्यान, विनाअनुदानीत शाळांमधील शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. विनाअनुदानित शाळांना पात्रता निकषांनुसार टप्प्या टप्प्याने अनुदान मिळावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. गेले तीन दिवस हत्ती महाल रोडवरील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर गेले तीन दिवस शिक्षकांचे आंदोलन सुरू होते. त्यातील पुढील टप्पा म्हणून बुधवारी मोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमा टॉकीज चौकात एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उमा टॉकीज चौकाने बुधवारी संध्याकाळी पुन्हा एका अपघाताचा थरार अनुभवला. हुपरीहून रंकाळा स्टँडकडे जाणाऱ्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटीवरील नियंत्रण सुटले. चालकाने प्रसंगावधान राखून उमा टॉकीजच्या संरक्षक भिंतीसमोर बस थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही, मात्र या घटनेने प्रवाशांसह वाहनधारकांची भीतीने गाळण उडाली.

बुधवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास संभाजीनगर आगाराची हुपरी-रंकाळा ही एसटी (एम. एच. ४० एन ९५३४) रंकाळ्याकडे निघाली होती. बागल चौकाकडून आलेली एसटी उमा टॉकीज चौकातील सिग्नलला थांबली होती. सिग्नल सुटताच बस चौकातून सुभाष रोडकडे वळताना स्टेअरिंगचा रॉड तुटला. चालक कृष्णात केरबा डवरी (वय ४२, रा. संभाजीनगर) यांना रॉड तुटल्याचे लक्षात आले, मात्र एसटीवर नियंत्रण मिळवता येत नव्हते. डवरी यांनी एसटी थेट उमा टॉकीजच्या संरक्षक भिंतीसमोर थांबवली. एसटीसमोर दोन दुचाकीस्वार होते. सुदैवाने दुचाकीस्वार बचावले. शिवाय संरक्षक भिंतीला लागून असलेल्या ट्रॅफिक सिग्नलजवळ जाहिरात फलक लावणारा एक तरुणही बचावला. अचानक घडलेल्या या प्रकाराने एसटीतील बारा प्रवाशांची तारांबळ उडाली. एसटी थांबताच वाहक एस. बी. डोरले आणि प्रवाशी खाली उतरले. चौकात आडवीच बस थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

वाहतूक पोलिसांनी तातडीने उमा टॉकीज चौकात धाव घेऊन वाहतूक वळवली. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानकातील मॅनेजर सुनील जाधव, संभाजीनगर आगारातील अधिकारी आर. बी. पाटील हे मेकॅनिकलसह उमा टॉकीज चौकात दाखल झाले. मेकॅनिकल रमेश कांबळे आणि अरुण चौगुले यांनी पंधरा ते वीस मिनिटांत स्टेअरिंगचा रॉड दुरुस्त करून एसटी आगाराकडे पाठवली. अर्ध्या तासाने वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले, मात्र तोपर्यंत उमा टॉकीज चौकात एसटीचा पुन्हा ब्रेकफेल झाल्याची अफवा शहरात पसरली होती.

शिक्षक बचावले

पट्टणकोडोली येथील दीपक तोडकर हे दुचाकीवरून कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. उमा टॉकीज चौकात सिग्नलला थांबल्यानंतर त्यांच्या मागेच एसटी येऊन थांबली. सिग्नल सुटताच तोडकर फोर्ड कॉर्नरच्या दिशेने पुढे निघाले. मात्र पाठीमागून अचानक एसटीचा मोठा आवाज आल्याने ते दचकले. त्यांनी गतीने दुचाकी कॉमर्स कॉलेज रोडच्या दिशेने पुढे नेली, त्यामुळे ते बचावले.

पुन्हा तेच ठिकाण

२४ मे रोजी उमा टॉकीज चौकात एसटीच्या चालकाला भोवळ आल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता, तर चारहून अधिक जखमी झाले होते. त्या दिवशीही बुधवार होता. या अपघातात संभाजीनगर आगारातील बस होती. बुधवारी (ता. ५) पुन्हा उमा टॉकीज चौकातच संभाजीनगर आगाराच्या एसटीला अपघात झाल्याने उमा टॉकीज चौक आणि संभाजीनगर आगारातील बस अपघातांच्या योगायोगाची चर्चा शहरात सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीची यंत्रणा अप टू डेट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अर्ज कसा भरावा, आरक्षण, सवलत सुविधा घेण्यासाठी निकषपूर्ती, सांकेतिक क्रमांकांची नोंद, महत्त्वाची कागदपत्रे, दाखले कसे जमा करावेत याविषयीची परिपूर्ण माहिती अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांना अर्ज संकलन केंद्रांवर मिळत असल्यामुळे प्रवेश केंद्र ही मार्गदर्शन कक्ष बनली आहेत. बुधवारी संकलन केंद्रांचा आढावा घेतला असता शाखानिहाय माहिती देणाऱ्या केंद्र समन्वयकांकडून मिळणाऱ्या माहिती व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांसाठी मिशन अॅडमिशन ही मोहीम अधिक सुलभ झाली आहे.

३ जुलैपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत जवळपास १३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरून दिले आहेत. ८ ​जुलैपर्यंत अर्ज संकलन सुरू राहणार आहे. महाराष्ट्र हायस्कूल, पद्माराजे हायस्कूल, गोखले कॉलेज, शहाजी कॉलेज, शाहू कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल, केएमसी कॉलेज याठिकाणी अर्जस्वीकृती केंद्रावर विद्यार्थी गर्दी करत आहेत. अर्ज कुठेही विकत घेऊन तो कोणत्याही स्वीकृती केंद्रावर भरण्याची सोय असल्यामुळे चांगली सोय झाली आहे.

समुपदेशन कक्षामुळे ताण हलका

केंद्रीय पद्धतीने राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत अर्ज भरताना विद्यार्थी व पालकांच्या शंका दूर करण्यासाठी महाराष्ट्र हायस्कूल, पद्माराजे हायस्कूल, केएमसी कॉलेज येथे विशेष समुपदेशन कक्ष स्थापन केला आहे. एखादी शाखा निवडण्यासंदर्भात असलेली संभ्रमावस्था विद्यार्थ्यांच्या मनात असेल आणि पालकांकडून दबाव येत असेल तर अशा विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची सुविधाही पद्माराजे हायस्कूलमधील समुपदेशन केंद्र येथे सुरू आहे. यामुळे अर्ज भरण्याच्या क्लिष्ट पद्धतीमुळे येणारा ताण आणि प्रवेश प्रकियेतील अंतिम मुदतीकडे लागलेले लक्ष यामुळे होणारा गोंधळ यावर समुपदेशन केंद्र चांगला उपाय ठरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत क्रिकेटचे मुख्यालय बनतंय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘देशात दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमुळे (आयपीएल) देशातील क्रिकेटचा माहोल बदलत आहे. दरवर्षी आयपीएलच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. त्यामुळे क्रिकेट खेळाडूंसह इतर सर्व देश-विदेशातील घटकांना या स्पर्धेची आतुरता लागलेली असते. स्पर्धेमुळे काही चुकीच्या गोष्टी घडत असल्या तरी यामुळे क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल होत आहे. या बदलातून भारत हे क्रिकेटचे मुख्यालय बनत आहे’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभय आपटे यांनी काढले. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित जीवनगौरव व विशेष पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते.

केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या समारंभात एस. आर. पाटील यांच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर यांना जाहीर झालेला मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांचे चिरंजीव नेताजी निंबाळकर यांनी स्वीकारला. यावेळी विशेष पुरस्काराने पांडुरंग साळगावकर व अमृता शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

एमसीएचे अध्यक्ष आपटे म्हणाले, ‘लोढा समितीच्या शिफारसी स्वीकारायच्या किंवा नाही, याबाबत कोर्टात १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लोढा समितीतील काही शिफारसी चांगल्या असल्याने क्रिकेटचा विस्तार सर्वत्र होईल. भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) पूर्णतः व्यावसायिक मंडळ आहे. बीसीसीआयमधील काही वादांमुळे नुकसान होत असले, तरी बोर्डाच्या प्रोफेशनल व्यवहारांना अन्य देशांतील बोर्ड फॉलो करीत आहे. त्यामुळे त्यातील अनिश्चितता लवकरच संपुष्टात येईल. क्रिकेटच्या विकास केवळ राज्यातील प्रमुख ठिकाणांपुरता मर्यादित न ठेवता सर्वत्र पोहोचवण्यासाठी नियोजन गरजेचे आहे. यासाठी असोसिएशनमध्ये आजी-माजी क्रिकेट खेळाडूंचा समावेश करण्याची आवश्यकता आहे. एमसीएच्या धर्तीवर कोल्हापूर व नाशिक क्रिकेट असोसिएशनचे काम उत्कृष्ट आहे.’

अध्यक्षस्थानावरुन बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘क्रिकेटची मुहूर्तमेढ इंग्लंडमध्ये रोवली असली, तरी त्याचा प्रसार भारतात जास्त होत आहे. अशा स्थितीत कोल्हापूर जिल्हा क्रीकेट असोसिएशन सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे, ही गौरवाची बाब आहे. कोल्हापुरातील क्रिकेटपटूंची उज्ज्वल परंपरा पुढे चालवण्यासाठी अद्ययावत स्टेडियमची आवश्यकता आहे. ही मागणी एमसीए नक्कीच पूर्ण करेल.’

केडीसीएचे अध्यक्ष आर. ए. पाटणकर प्रास्ताविकात म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती, फुटबॉलप्रमाणेच क्रिकेटलाही प्रोत्साहन दिले. केडीसीए सुवर्णमहोत्सव साजरा करत असले तरी १९१६ मध्ये कोल्हापुरात पहिल्या संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे शहराला शतकोत्तर क्रिकेटची परंपरा लाभली आहे. क्रिकेटच्या विकासासाठी पुढील वर्षी कृती कार्यक्रम हाती घेणार आहे.’

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केडीसीएच्या संकेस्थळाचे उद‍्घाटन केले. सुवर्णमहोत्सवाचा आढावा घेताना डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. कार्यक्रमात माजी रणजी खेळाडू निकोलस सालढाणा, मिलिंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास केडीसीएचे उपाध्यक्ष चेतन चौगुले, सेक्रेटरी रमेश कदम, ऋतुराज इंगळे, रमेश हजारे, विजय भोसले, संजय शेटे, दीपक शेळके, डॉ. संजय पाटील आदींसह संचालक, क्रिडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दिग्गजांचा विशेष सत्कार

कार्यक्रमात रणजित महागावकर, जवाहरलाल वसा, आण्णासाहेब हेरवाडे, मिलिंद कुलकर्णी, रमेश हजारे, अनुजा पाटील, चंदाराणी कांबळे, आदिती गायकवाड, स्नेहा जामसांडेकर, संकेता देशपांडे, शिवाली शिंदे, संग्राम चव्हाण, शैलेश भोसले, विशांत मोरे, संग्राम अतितकर, विनित इंदूलकर, धनंजयपाटील, सचिन उपाध्ये, सतीश शिंदे, अतुल गायकवाड, उमेश गोठखिंडीकर, ध्रुव केळवकर, रमेश कदम, अजित इंदूलकर, विजय धनवडे, विनित वाडकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायली महापालिकेत, रेरा कागदावर

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com
Tweet:@gurubalmaliMT

कोल्हापूर : अधिकाऱ्यांच्या सहीसाठी महापालिकेत अडकलेल्या फायली, अद्याप कागदावरच असलेली पर्यावरण समिती यामुळे कोल्हापुरात ‘रेरा’ कायद्यातंर्गत नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात चारशेवर व्यावसायिक असूनही दोन महिन्यांत केवळ चारच बांधकाम व्यावसायिकांनी रस दाखवल्याने नोंदणीची टक्केवारी दोनच्या पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. जुने प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची घाई लागलेल्या व्यावसायिकांना ‘नोटबंदी’, ‘रेरा’पाठोपोठ जीएसटीने ‘ब्रेक’लागला आहे.

बांधकाम व्यवसायाला शिस्त लावण्यासाठी देशभर ‘रेरा’ कायदा लागू करण्यात आला. त्याच्या नोंदणीसाठी तीन महिन्यांची मुदत असली तरी त्यातील दोन महिने संपले आहेत. कोल्हापुरात ‘रेरा’ अंतर्गत केवळ चारच व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. या कायद्याच्या कचाट्यात अडकू नयेत म्हणून सुरू असलेले प्रकल्प जुलैअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा बांधकाम व्यावसायिकांचा प्रयत्न आहे. एक ऑगस्टपासून ‘रेरा’ कायद्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी होणार आहे.

एक मेपासून कायदा लागू झाला असला तरी नोंदणीसाठी तीन महिने मुदत देण्यात आली आहे. प्रत्येक बांधकाम व्यावसायिकास कायद्यांतर्गत नोंदणी आवश्यक आहे. तीन महिन्यांची मुदत असताना, त्यातील दोन महिने उलटले तरी नोंदणी मात्र फारच कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चारशेपेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यामध्ये कोल्हापूर, कागल, इचलकरंजी व जयसिंगपूर येथे ‘क्रिडाई’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या शाखा आहेत. मात्र सर्वच बांधकाम व्यावसायिक या संघटनेचे सदस्य नाहीत. गेल्या दोन ​महिन्यांत सचिन परांजपे, आदित्य बावडेकर, अतुल पोवार आणि शंतनू लिमये या चार व्यावसायिकांनी आपली नोंदणी केली आहे. नोंदणीची सक्ती आहे. मात्र, मुदत असल्याने त्याबाबत चालढकल सुरू आहे.

फायली अडकल्या महापालिकेत

कोल्हापुरात महापालिकेत बांधकाम व्यावसायाच्या फायलींचा प्रवेश अतिशय संथ असतो. त्यामुळेही ‘रेरा’ नोंदणीवर परिणाम होत आहे. सुधारित परवाना, टीडीआर वापर व नवीन परवान्याच्या बहूतांश फायली महापालिकेत पडून आहेत. परवाना तातडीने घेऊन जुलैअखेर बांधकाम परिपूर्ती परवाना घेण्याचा व्यावसायिकांचा प्रयत्न आहे. ‘रेरा’मधून वाचण्यासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना महापालिकेकडून ‘खो’ बसत आहे. आधी एका उपायुक्तांच्या तावडीत सापडलेल्या फायली सोडवण्यात ‘खर्च’ मोठा होता. नंतर आयुक्त नवीन असल्याने काही फायली अभ्यासात अडकल्या. उपायुक्तांच्या बदलीनंतर काही फायली पुन्हा नगररचना विभागाकडे परत पाठवल्या गेल्या. त्यामुळे नवीन अधिकारी येईपर्यंत फायलीच्या निर्गतींचा मार्ग थांबण्याची चिन्हे आहेत. याचा फटका मात्र ‘रेरा’ नोंदणीला बसणार आहे.


उपायुक्तांची सही ?

तज्ज्ञ म्हणून बांधकाम परवाना फाइलवर नगररचना विभागाच्या सहायक संचालकांची सही झाल्यानंतर अंतिम मंजूरीसाठी ती फाइल आयुक्तांकडे पाठवली जाते. पण, ती पुन्हा उपायुक्तांमार्फत जाते. तेथे प्रत्येक फाइल ‘अर्थ’ प्राप्तीसाठी थांबत असल्याने परवाने लवकर मिळत नाही. उपायुक्तांची सही कशाला? अशी विचारणा अनेकदा महासभेत झाली. पण फायलींच्या प्रवासाचा मार्ग बदलला नाही. आता उपायुक्तपद रिक्त आहे. पण फायलीचा प्रवास आपल्या मार्गाने व्हावा यासाठी काही अधिकारी प्रयत्नशील आहेत. आयुक्तांनी या फायली थेट आपल्याकडे घ्याव्यात अशी मागणी ‘क्रिडाई’ने केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णयाची ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. तरीही ‘अतिरिक्त’ कार्यभार स्वीकारण्याची घाई काहींना लागली आहे. तसे झाल्यास फायलींचा प्रवास लांबणार आहे.

पर्यावरण समिती कधी ?

महापालिकेने पर्यावरण समितीची स्थापना न केल्याने समितीच्या मंजुरीसाठी बांधकाम परवान्याच्या अनेक फायली पडून आहेत. समिती कागदावर तयार आहे. त्याची अधिकृत घोषणा झाली नाही. जोपर्यंत समितीची घोषणा होत नाही, तोपर्यंत फायली पडूनच राहणार आहेत. यामुळे बांधकाम परवाना मिळवण्यासाठी व्यावसायिकांना हेलपाटे मारावेच लागत आहेत.


‘रेरा’च्या पार्श्वभूमीवर सध्या महापालिकेत असलेल्या बांधकाम परवान्याच्या फायली तातडीने निर्गत करण्याची विनंती आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत सर्व फायलींवर आयुक्तांची सही होण्याची शक्यता आहे.

महेश यादव, अध्यक्ष, क्रिडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’च्या चौकशीचे धाडस दाखवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘गोकुळ दूध संघ खरेदी दर तीन काय, चार रुपयेही वाढवू शकतो, अशी गोकुळची आर्थिक क्षमता आहे. सरकारने गोकुळच्या पारदर्शक कारभाराची चौकशी करण्याचे धाडस सरकारने दाखवावे’, असे आव्हान बुधवारी आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारला दिले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दुधाच्या खरेदी दरवाढीवर बोलताना आमदार पाटील म्हणाले, ‘राज्य सरकार दूध खरेदी दरवाढीचे क्रेडिट घेत असेल, तर ग्राहकावर या दरवाढीचा बोजा पडता कामा नये. अन्यथा राज्यातील कोणताही दूध संघ ६० रुपये लिटरने ग्राहकाला विक्री करून ५० रुपये शेतकऱ्यांना खरेदी दर देऊ शकतो. गोकुळच्या अध्यक्षांनी हे गणित आम्हाला सांगू नये. माझे गोकुळच्या अध्यक्षांना आव्हान आहे. त्यांनी त्यांचा स्कॉर्पिओवरील खर्च कमी करावा. टँकरच्या दरांची प्रामाणिकपणे चौकशी करावी. राज्य सरकार आणि सहकार मंत्र्यांनी आम्ही मांडत असलेल्या मुद्द्यांवर समिती, आयोग किंवा आयएएस अधिकारी नेमून गोकुळची चौकशी करावी. तेथे पारदर्शक कारभार झाल्यास गोकुळ खरेदी दरात कितीही वाढ करू शकतो.’

राज्य सरकारमध्ये
दोन गट आहेत का?

‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रीगट असे दोन गट पडले आहेत का, अशी शंका उपस्थित होत आहे,’ अशी टीका आमदार पाटील यांनी केली. ते म्हणाले, ‘राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. महसूलमंत्री सरसकट कर्जमाफी जाहीर करतात आणि मुख्यमंत्री त्यावर निकष लावतात. म्हणजे, मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचे निर्णय मान्य नाहीत का? राज्याचे कृषी मंत्री या संपूर्ण प्रोसेसमध्ये कोठेही दिसत नाहीत. पाच मंत्र्यांचा एक गट आणि दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री अशी दुफळी आहे. दुर्दैवाने राज्यातील शेतकरी यात भरडला जात आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनवा हेल्दी खाऊचा डबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाळा आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबात मुलांना डब्याला काय द्यायचा, असा प्रश्न प्रत्येक गृहिणींना पडतो. नेहमीच्या नाष्ट्या पेक्षा काहीतरी वेगळे दे, असा आग्रह मुलांचा असतो. हा आग्रह पूर्ण करण्यासाठी हेल्दी रेसिपी कार्यशाळा (शेफस् नॉलेज बँक) रविवारी (ता. ९ जुलै) घेण्यात येत आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि हॉटेल के ट्री यांच्यातर्फे कार्यशाळा आयोजित केली आहे.

रविवारी हॉटेल के ट्री येथे दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत कार्यशाळा होईल. शाळा, कॉलेज, खासगी शिकवणी आणि मैदानावरून खेळून आल्यानंतर मुलांना खायला काय द्यायचे, असा प्रश्न अनेकदा गृहिणींना पडतो. या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर या रेसिपी कार्यशाळेत मिळणार आहे. मुलांना चविष्ट आणि पौष्टिक खाद्यांच्या रेसिपी शिकविल्या जाणार आहेत. नाष्ट्यासाठी शिरा, उपीट, कांदापोहे या पदार्थांच्या पलिकडे जाऊन नावीन्यपूर्ण चवीच्या रेसिपी शिकविल्या जाणार आहेत. खास मुलांसाठी विविध प्रकारचे मेनूंची मेजवाणी मिळणार आहे. सहज सोपे आणि कमी वेळात बनविता येणाऱ्या रेसिपीत शुगरकेन ओटस् खिर, नट् अॅड मुरमुरेबार, ओटस् आमलेट वुईथ करी ब्रेड, सॅडवीच प्लॅटर, सोयी टिक्की, सोया स्मूदी, स्प्राऊट टिक्की, पोहा टिक्की बर्गर, छोटे नट्स चाट पदार्थ शिकविले जाणार आहेत. या रेसिपीचा गृहिणींना लाभ होणार आहे.

कार्यशाळा महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब सदस्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे. इतरांसाठी ४०० रूपये शुल्क आकारणी केली जाणार आहे. या शुल्कात कल्चर क्लबचे सदस्यत्व दिले जाणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी मोबाइल क्रमांक ८४४६३६१२१३, ९७६७८९०६२६ आणि हॉटेल के ट्री येथे ०२३१-२५२७९९० वर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सौरभला घ्यायचीय इंजिनीअरिंगमध्ये भरारी

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

हक्काचे घर नाही, घरात फारसे कुणी ​शिकलेले नाही, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ट्रकवर चालक म्हणून काम करणारे वडील, दोन खोल्याच्या भाड्यात घरात कुटुंबांचा गाडा ओढणारी आई, त्यांना हातभार लावण्यासाठी पुस्तक दुकानात काम करणारा मोठा भाऊ, अशा प्रतिकूल परिस्थितीत सौरभ शशिकांत देवडकर या लहानग्या मुलाने शिकण्याचा ध्यास घेतला. आपण शिकलो तरच घरची स्थिती बदलू शकेल, याची जाणीव शालेयजीवनाच त्याला झाली. म्हणून अडचणींचा बाऊ न करता शिक्षणाची एकेक पायरी चढत त्याने दहावीच्या परीक्षेत ९५.६० टक्के गुण मिळवले. सौरभला मेकॅनिकल इंजिनीअरिंग व्हायचे आहे. जिद्दी स्वभावाच्या सौरभला समाजाची साथ लाभली तर ट्रक ड्रायव्हरच्या मुलाचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न साकारणार आहे.

सौरभची गुणवत्ता सातवीमध्ये असतानाच ​सिद्ध झाली होती. सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तो गुणवत्ता यादीत २३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. तो येथील स. म. लोहिया हायस्कूलचा विद्यार्थी आहे. मंगळवार पेठेतील मोरबाळे गल्लीत आईवडील आणि मोठया भावासह भाड्याच्या घरात राहतो.

कुटुंबांची सगळी भिस्त वडील शशिकांत देवडकर यांच्यावरच. शशिकांत हे ट्रक ड्रायव्हर आहेत. दिवसभर काम केले तरच कुटुबांचा उदरनिर्वाह चालणार. कामाच्या निमित्ताने ते नेहमी शहराबाहेरच असतात. आई वैशाली या गृहिणी आहेत. मोठा भाऊ शुभम न्यू कॉलेजमध्ये बीएच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे.

दहावीचे वर्षे म्हणजे करिअरमधील महत्त्वाचा टप्पा. मुलांच्या सुविधेसाठी पालक कसलीच कमतरता ठेवता नाहीत. मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र रुम, स्टडी टेबल अशा सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात हात आखडता घेत नाहीत. सौरभच्या बाबतीत अशा सुविधांची कल्पनाच अशक्य. परिस्थितीचे पुरते भान असलेल्या सौरभच्या मनाला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली, स्टडी टेबलचा विचारही कधी शिवला नाही. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आपण भरपूर अभ्यास करायचा, शिकायचे असा संकल्पच त्यांनी दहावीच्या वर्गात प्रवेश घेतानाच केला होता. पहाटे लवकर उठून अभ्यास, दिवसभर शाळा आणि पुन्हा रात्री उशिरापर्यंत अभ्यास असा त्याने दिनक्रमच ठरवून घेतला होता. दहावीचा निकाल जाहीर झाला आणि मुलाचे यश पाहून आईवडिलांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.

.......................

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अभ्यासासाठी निबंधमाला, गाइड विकत घेणे आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे सर्व भर पाठ्यपुस्तकांवरच होता. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांना माझ्या कौटुंबिक स्थितीची पूर्ण माहिती होती. दहावीत वर्षभर शिक्षकांची मदत मोलाची ठरली. कुणी प्रश्न​पत्रिका संच आणून दिला, कुणी अपेक्षित दिले. वर्गशिक्षकांनी परीक्षेची फी भरली. आता मला मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचे आहे. शिक्षणाचा खर्च आईवडिलांना परवडणारा नाही. आईडिलांनी आत्तापर्यंत खूप कष्ट उपसले. आर्थिक स्थिती नसतानाही शिकवले. मला इंजिनीअरिंगचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. समाजाने बळ दिले तर निश्चितपणे ध्येय गाठेन.

सौरभ देवडकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात पोलिसांचाहॉटेलवर छापा

$
0
0

,जयसिंगपूर

इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जयसिंगपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने येथील नांदणी नाक्याजवळील मनाली हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत हॉटेल मालक तसेच अन्य एका कर्मचाऱ्यासह २८ जणांना ताब्यात घेण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

कोणताही परवाना नसताना मनाली हॉटेलमध्ये दारूविक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास मिळाली होती. यानंतर पोलिस उपअधिक्षक रमेश सरवदे यांमया मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जयसिंगपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत हॉटेल मालक शिवाजी वसंत सावंत यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच १२ हजार ५०० रूपये किंमतीची देशी, विदेशी दारूच्या बाटल्या तसेच दोन हजार ४०० रूपयांची रोकड पथकाने जप्त केली. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या २८ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, यानंतरच दारूबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शुक्रवारी न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एस.ए.निकम यांनी दिली. दरम्यान, छाप्यात २८ जणांना पथकाने ताब्यात घेतल्याने जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वस्त्रोद्योगाला जीएसटीची धास्ती

$
0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

वीज दरात सवलत, व्याजदर अनुदान यांसह विविध मागण्या प्रलंबित असताना तीन वर्षांपासून इचलकरंजीतील वस्त्रोद्योग व्यवसाय मंदीच्या दुष्टचक्रात आहे. हे कमी की काय म्हणून आता जीएसटी करप्रणालीमुळे संपूर्ण वस्त्रोद्योगच ठप्प होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. कर चुकवेगिरीला आळा घालून जीएसटीची सर्वच यंत्रमाग केंद्रांनी अंमलबजावणी केली तरच महाराष्ट्राची मँचेस्टर वस्त्रोद्योगात टिकून राहील. जीएसटीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडेल. परिणामी जुलै महिन्यातील उलाढाल थंडावणार आहे. तर प्रलंबित मागण्या अद्यापही कॅबिनेटसमोर सादर करण्यास मुहूर्त सापडत नसल्याने यंत्रमाग उद्योगाच्या समस्यांचा ससेमिरा आजही कायम आहे.

वस्त्रोद्योगाला लागलेली घरघर दूर होऊन नवसंजीवनी मिळण्यासाठी प्रति युनिट १ रू.६६ पैसे दराने वीज मिळावी, कर्ज व्याजात ५ टक्के सबसिडी मिळावी, सूत दर १५ दिवस स्थिर ठेवावा, सूतावर एमआरपी छापावी, आदी मागण्यांसाठी इचलकरंजीतील विविध यंत्रमागधारक संघटनांच्यावतीने सातत्याने आंदोलने छेडली जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा, बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडलेले नाही. वस्त्रोद्योगासाठी तारक असलेले टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड (टफ) चे अनुदान ३० टक्क्यांवरुन दहा टक्क्यांवर आणल्याने यंत्रमाग उद्योगात प्रचंड निराशा आहे. यंत्रमाग आणि गारमेंट अशी विभागणी करून केंद्र सरकारने गारमेंट उद्योगासाठी टफचे अनुदान१५ टक्क्यावरून २५ टक्के केले आहे. अशाच प्रकारे यंत्रमाग उद्योगालाही वाढ लागू होण्याची गरज असताना अनुदान कपातीमुळे यंत्रमाग उद्योगातील आधुनिकीकरणाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र आणि राज्यात सत्ता बदल झाल्याने वस्त्रोद्योगास अच्छे दिन येतील, अशी कारखानदार, व्यापारी व उद्योजकांची अपेक्षा होती. मात्र, मंदीचे सावट अधिकच गडद झाल्याने वस्त्रोद्योगातील समस्यांच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही. अशातच सरकारने टफ अनुदान, वीजदरात सवलत, व्याज अनुदान बंद केल्याने वस्त्रोद्योगातील सूतगिरण्या, सायझिंग, यंत्रमाग, प्रोसेसिंग, गारमेंट असे सर्वच घटक कमालीचे अडचणीत आले आहेत. वाढते वीजदर, सुट्या भागांच्या दरातील आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे ऑटोलूम, यंत्रमाग, सायझिंग, प्रोसेसिंग अशा सर्वच घटकांतील उत्पादनात घट होत चालली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापडाला दर मिळत नसल्याने कारखानदार हा व्यवसाय नुकसानीत करु शकत नाही. त्यामुळेच वस्त्रनगरीतील यंत्रमागाचा खडखडाट मंदावला असून कामगारांवरही बेकारीची वेळ आली आहे.

नवसंजीवनीच्या प्रतिक्षेत मान टाकत चाललेल्या या वस्त्रोद्योगाला आता जीएसटी करप्रणालीची गुंतागूंतीची प्रक्रिया मारक ठरु पाहत आहे. कॉटन कापडावर ५ टक्के तर पॉलिस्टरवर १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. पण जीएसटी प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने आकारली जात असल्याचे यंत्रमागधारकांचे म्हणणे आहे. जीएसटी आकारणीमध्ये केवळ ‘कापड’ इतकाच उल्लेख असल्याने कॉटन व पॉलिस्टर कापडाची विक्री करणाऱ्या कारखानदारांनी किती जीएसटी भरावा, याबाबत संभ्रम आहे. आजमितीला जीएसटीचा परतावा मिळणार की नाही याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया जोपर्यंत सुटसुटीत होत नाही तोपर्यंत कारखानदारांना मनस्तापासह आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे

जीएसटीमध्ये काहीतरी सवलत मिळेल या आशेमुळे अनेक सूत गिरण्यांनी जीएसटी नंबर काढलेले नाहीत. त्यामुळे दक्षिणेतून येणारी सुताची आवक पूर्णत: थांबली आहे. सूत नसल्याने सायझिंग, यंत्रमाग आणि प्रोसेसिंग या घटकांना कामच उरलेले नाही. सध्या ४० ते ५० टक्के यंत्रमाग आणि जवळपास निम्म्याहून अधिक सायझिंग बंद आहेत. तर प्रोसेसधारकांचा कापडाचा पुरवठा थांबल्यास प्रोसेससुध्दा कोणत्याही क्षणी बंद होणार आहेत. अडत्यांकडून कमी दरात कापडाची मागणी केली जात असल्याने यंत्रमागधारकाला नाहक नुकसान सोसावे लागत आहे. परिणामस्वरुप कापड खरेदी-विक्री थांबली असून कोट्यवधी रुपयांचे कापड पडून आहे. एकूणच जीएसटी करप्रणालीची इत्यंभूत माहिती व सखोल खुलासा होणे गरजेचे असून ही प्रक्रिया होण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे वस्त्रनगरीतील सर्वच व्यवहारावर त्याचा परिणाम जाणवणार हे निश्चित आहे.

००००००


जीएसटी करप्रणालीत अद्यापही अनेक उणीवा आहेत. एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा कोणताही परतावा मिळत नाही. त्यामुळे ‘चुकीला माफी नाही’ यानुसार कारखानदारांना नुकसान सोसावे लागेल. करप्रणालीत आवश्यक त्या सुधारणा करुन ती सुटसुटीत करण्याची गरज आहे. त्याचबरोबर यंत्रमाग व्यवसायाच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. जोपर्यंत प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी व जीएसटीचा कठोर कायदा होत नाही तोपर्यंत यंत्रमाग उद्योग हलाखीतच सुरु राहिल.

विनय महाजन, अध्यक्ष, जागृती यंत्रमागधारक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेदोन लाखांसहएटीएम मशिन लंपास

$
0
0

कागल

केनवडे फाटा (ता.कागल) येथे इंडिया नं. वन कंपनीचे एटीएम मशिन पावणे दोन लाख रुपयांच्या रकमेसह चोरट्यांनी लंपास केले. बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गुरूवारी कागल पोलिसांनी श्वानपथक तसेच फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वानाने एटीएम मशिनपासून केवळ दहा फूट अंतरावरील मोकळ्या जागेपर्यंतच माग काढला.

केनवडे फाट्यावर तळेकर काँप्लेक्स मध्ये इंडिया नं.वन कंपनीचे एटीएम मशिन आहे. सहा महिन्यांपूर्वी हेच एटीएम मशिन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी पहिल्यांदा सीसीटिव्ही कॅमेरे उचकटले. आतील कॅमेऱ्याची दिशा बदलली. एटीएममधील वायरींग उचकटून टाकले आणि मशिनच रोख पावणे दोन लाख रुपयांच्या रकमेसह उचलून नेले. यामध्ये ५०० रुपयांच्या ८७ हजार नोटा म्हणजेच एक लाख ७४ हजार रुपये होते. तर दोन हजाराची एकच नोट शिल्लक होती. या सर्व नोटा त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मशिनमध्ये भरण्यात आल्या होत्या. गुरूवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास परिसरातील इतर सर्व दुकानदार आल्यानंतर ही चोरीची घटना उघडकीस आली. घटनास्थळी चारचाकी गाडीची चाकेही पावसाच्या ओलीमुळे उमटली होती. शिवाय एटीएम मशिन गाळ्यातील एसीही फोडण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद उदय वसंत पाटील (रा.तारळे खुर्द,ता.राधानगरी) यांनी कागल पोलिसात दिली आहे.

सुमारे पाच ते सहा गावांचे केनवडे फाटा हे मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी येऊनच कागल,निपाणी अथवा मुरगूडला नागरीकांना जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणाहून एमआयडीसीला जाणाऱ्या कामगारांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे सर्वच बँकेची कार्ड चालणाऱ्या या एकमेव एटीएम मशिनमध्ये क्षमता कमी असल्याने वारंवार रक्कम भरावी लागते. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दिवसाआड रक्कम भरावी लागते. कारण कामगारांचे पगार येथूनच निघतात. याची संपूर्ण माहीती घेवून सुमारे पाच ते सात चोरट्यांनी हे मशिन रोख रकमेसह उचलून नेल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइनसाठी ११४ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराला शुद्ध आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, यासाठी सुमारे साडेतीनशे किलोमीटर लांबीची नवी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. शिवाय शहराच्या विविध भागांत बारा पाण्याच्या टाक्या प्रस्तावित केल्या आहेत. अमृत योजनेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून मंत्रालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत ११४ कोटी ८१ लाखांच्या विस्तृत प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) राज्य सरकारच्या तांत्रिक कमिटीने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील उच्चस्तरीय कमिटीची येत्या आठवड्यात मुंबईत बैठक होणार असून त्यात अंतिम मान्यतेची औपचारिकता पूर्ण होईल.

नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण झाले. यासाठी महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणने पहिल्या टप्प्यात १२५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. गेल्या आठवड्यात मुंबईतील बैठकीत सुधारणा करण्याच्या सूचना झाल्या होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने हा आराखडा बनविला आहे. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय कमिटीकडून डीपीआरवर मान्यतेची मोहोर उमटल्यानंतर योजनेचे काम सुरु करण्यासाठी महापालिका स्तरावर हालचाली होतील.

पाइपलाइन व इतर कामाच्या सुमारे ११५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकार ५० टक्के निधी उपलब्ध करणार आहे. राज्य सरकार आणि महापालिकेचा प्रत्येकी २५ टक्के वाटा असणार आहे. या कामाची निविदा व वर्कऑर्डरची प्रक्रिया महापालिका राबविणार आहे. संपूर्ण कामावर एमजीपी देखरेख ठेवणार आहे. २०४९ मधील लोकसंख्या गृहीत धरुन ही योजना अंमलात आणली जाईल.


‘मटा’च्या वृत्ताची दखल

महापालिका अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे अमृत योजनेतील पाण्याचा निधी रखडल्याचे वृत्त ‘मटा’ने १९ जूनच्या अंकात प्रसिध्द केले. त्याची दखल घेत तातडीने याबाबत मुंबईत डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. जीवन प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखड्यास मान्यता दिल्याने निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात १५ जुलैपासून हेल्मेटसक्ती

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर ः अपघाती मृत्यू आणि जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर हेल्मेट सक्ती लागू केली होती. या उपक्रमानंतर महामार्गांवर हेल्मेटच्या वापरात वाढ झाल्यानंतर आता शहरांतही हेल्मेटसक्ती लागू करण्याचा निर्णय नांगरे-पाटील यांनी घेतला आहे. १५ जुलैपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे, मात्र बहुतांश दुचाकीधारक याकडे दुर्लक्ष करून विना हेल्मेट प्रवास करतात. विशेषतः महामार्गांवर दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू आणि जखमींचीही संख्या जास्त आहे. याला आळा घालण्यासाठी नांगरे-पाटील यांनी महामार्गांवर हेल्मेट सक्ती लागू केली होती. गेल्या महिन्याभरात महामार्गांवरील अपघातातील जखमींची संख्याही घटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

महामार्गांवर हल्मेट सक्तीचे सकारात्मक परिणाम जाणवल्यानंतर आता शहरातही हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून शहरात याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कोल्हापूरनंतर परिक्षेत्रातील शहरांमध्ये हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. याबाबत सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अंमलबजावणीबाबत शुक्रवारी (ता. ७) परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांची विशेष बैठक आयोजित केली असून, या बैठकीत शहरातील हेल्मेट सक्तीचे नियोजन केले जाणार आहे.


आज बैठक

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांची विशेष बैठक आज (शुक्रवारी) आयजी ऑफिसमध्ये होणार आहे. बैठकीत महामार्गांवरील हेल्मेट सक्तीचा आढावा घेतला जाणार आहे. शहरांमधील हेल्मेट सक्तीबाबतही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जणार असून, अंमलबजावणीचे नियोजनही केले जाणार आहे.


महामार्गांवरील हेल्मेट सक्तीचे चांगले परिणाम जाणवत आहेत. केवळ कारवाईच्या भीतीपोटी नव्हे तर स्वतःच्या सुरक्षेसाठी दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत आहेत. आता शहरातही वाहतूक सुरक्षेसाठी १५ जुलैपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

विश्वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

०००००००००
९ लाख ७० हजार

जिल्ह्यातील दुचाकींची संख्या

महामार्गावर जूनपासून हेल्मेटसक्ती

२४०० पेक्षा जास्त

दुचाकीस्वारांवर कारवाई

५०० रूपये

प्रत्येकी दंड

१२ लाख

एकूण दंडवसुली

०००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत ४०७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली/ इस्लामपूर

ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८या कालावधीत मुदत संपणाऱ्या सांगली जिल्ह्यातील ४०७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. वाळवा तालुक्यातील सर्वाधिक ९० आणि शिराळा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे. या वेळी सरपंच पद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार आहे. वाळवा तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या निवडणुका नोव्हेबरमध्ये होणार आहेत. अपवाद वगळता बहुतांशी ग्रामपंचायतीवर आमदार जयंत पाटील गटाची सत्ता आहे. सलग १५ वर्ष राज्यात सत्ता, मंत्रिपद असल्याने जयंत पाटील गटासाठी या निवडणुका सहज आणि सोप्या होत्या. या वेळी सत्तेची समीकरणे बदलली आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रूपाने तालुक्यात नवे सत्ता केंद्र उभे राहिले आहे. इस्लामपूर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत याचा प्रत्यय आल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या विधानसभेच्या तयारीचा ट्रेलर असेल.
वाळवा तालुक्यातील ९७ पैकी ९० ग्रामपंचायतीची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत आहे. पहिल्या टप्यात सदस्यांच्या आरक्षणाची पहिली फेरी पूर्ण झाली. १८ तारखेपर्यंत हरकती दाखल करायची मुदत आहे. त्यानंतर हे आरक्षण फायनल होणार आहे. वाळवा तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीसाठी ३८२ सदस्य निवडायचे आहेत. या वेळी सरपंच थेट निवडला जाणार असल्याने ही संख्या वाढणार आहे. पूर्वीची सदस्य संख्या आहे, तशी ठेवून सरपंचपद वाढीव देणार का या बाबत अद्याप ही सर्वजण संभ्रमात आहेत. थेट सरपंच निवडीने अनेक दिग्गज नेते या प्रक्रियेतून बाजूला राहण्याची शक्यता आहे. पाच वर्षांसाठी सरपंच निवडला जाणार असल्याने अनेकजण अलिप्त राहने पसंत करतील.

गेल्या अनेक वर्षांपासून काही अपवाद वगळता अनेक ग्रामपंचायतीवर जयंत पाटील समर्थक सत्तेत आहेत. गावागावांत जयंत पाटील समर्थकांचेच दोन-तीन गट एकमेकांच्या विरोधात लढत असतात. या वेळी काही गावात मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाने जयंत पाटील विरोधकांचे एकत्रिकरण झाले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे जाणवले. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पाटील गटाची ३० वर्षांची सत्ता उलथवण्यात विरोधकांना यश आले. त्यामुळे विरोधकांचे मनोधैर्य उंचावले आहे. सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर सत्तेचा वापर करीत जयंत पाटील यांच्या सत्तेला शक्य तितका सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. वाळवा तालुक्यात पक्षापेक्षा जयंत पाटील यांना विरोध म्हणून सर्व विरोधक पक्षभेद, अंतर्गत मतभेद विसरून एकत्र येतात. या सर्वांची मोट बांधणारे खंबीर नेतृत्व विरोधाकांच्याकडे नव्हते. मंत्री खोत यांच्या रूपाने ही उणीव भरून निघाली आहे. त्यामुळे आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, कॉँग्रेसचे नेते सी. बी. पाटील, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव पवार, भाजपचे विक्रम पाटील, कॉँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, गौरव नायकवडी आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील ही सर्व मंडळी या वेळीही जयंत पाटील यांच्या सत्तेचा वारू रोखण्यासाठी एकादिलाने काम करतील अशी अपेक्षा आहे.
मंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत मुलाचा झालेला पराभव पुसून काढण्यासाठी तालुक्यातील महत्वाच्या शिंदे गटाला भगदाड पाडले. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी जयंत पाटील गटाला आव्हान दिले आहे. वाळवा तालुक्यात जयंत पाटील आणि विलासराव शिंदे हे नेते एकत्र असले तरी अनेक गावात अद्याप ही विलासराव शिंदे यांचा एक स्वतंत्र गट अस्तित्वात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या गटाचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या एक हाती सत्तेने जयंत पाटील गट विरोधकांशी न लढता आपसात लढून साहेबांच्या जवळ वजन निर्माण करण्यात गावपातळीवरील नेते धन्यता मानत होते. यावेळी राज्यपातळीवरील महत्वाचे सत्ता केंद्र असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या गटाशी सामना करावा लागणार असल्याने आमदार जयंत पाटील गटाच्या नेत्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवक कदम यांच्या पेट्रोलपंपावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतील ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्या साई एजन्सीच्या पेट्रोल पंपावर ठाणे क्राइम ब्रॅँचच्या पथकाने शुक्रवारी (ता. ७) छापा टाकला. हुपरी रोड, उचगाव हद्दीतील या पेट्रोल पंपावर झालेल्या कारवाईत पेट्रोल आणि डिझेलमध्ये मापात पाप होत असल्याचे आढळल्याने पथकाने पंप सील करून पंपातील पल्सर कार्ड जप्त केले. याबाबत पंपाचे मालक सत्यजित कदम आणि मॅनेजर सुंदर शहापुरे यांची चौकशी सुरू आहे. याशिवाय जिल्ह्यातील ७ ते ८ पेट्रोलपंप ठाणे क्राइम ब्रॅँचच्या रडारवर असल्याने छापेमारी सुरूच राहणार आहे.

ठाणे येथील क्राइम ब्रँचकडे पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची फसवणूक होत असल्याची तक्रार दाखल झाली होती. याचा तपास करताना पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून पेट्रोल कपातीसाठी विशेष इलेक्ट्रॉनिक चिप वापरल्याचे उघडकीस आले. पुणे आणि मुंबईतील काही तंत्रज्ञांनी या चिप तयार करून राज्यातील पेट्रोल पंपमालकांना विकल्या आहेत. ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये कारवाया केल्यानंतर पोलिसांनी कोल्हापुरातील संशयित पेट्रोल पंपावर छापेमारी सुरू केली आहे. शुक्रवारी उचगाव ते मुडशिंगी मार्गावरील साई एजन्सीच्या पंपावर पथकाने छापा टाकला. यावेळी पंपातील दोन मशिनच्या चार नोझलमधून पेट्रोल कपात होत असल्याचे उघडकीस आले. पथकाने मशिनमधील पल्सर कार्ड जप्त केली आहेत. पेट्रोल मशिनमधून प्रति ५ लिटरमागे १४० मिलीलिटर, तर डिझेल मशिनमधून प्रति ५ लिटरमागे ३० मिली लिटरची कपात होत असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांच्या पथकाने पेट्रोलपंप सील केला असून, रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरू होती. याबाबत पेट्रोल पंपाचे मालक नगरसेवक सत्यजित कदम आणि मॅनेजर सुंदर शहापुरे यांची चौकशी होणार आहे. चौकशीनंतर दोषींवर पुढील कारवाई होणार आहे, अशी माहिती ठाणे क्राइम ब्रँचचे निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. उपनिरीक्षक अविनाश महाजन यांच्यासह कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे, झामराव पाटील, सुरेश चव्हाण, वितरण अधिकारी एन. एन. रेवडेकर, पुरवठा निरीक्षक अविनाश लुगडे, वजनमापक अधिकारी अ. का. महाजन, अ.अ. शिंगाडे आदींनी कारवाई केली.

जिल्ह्यात तीन दिवस कारवाई होणार

या पथकाने अटक केलेल्या संशयितांनी राज्यभरातील पेट्रोल पंपमालकांना पेट्रोल कपातीच्या चिप विकल्या आहेत. संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील सात ते आठ पेट्रोलपंपांना चिप पुरवल्या आहेत. या सर्व संशयित पंपांवर छापे टाकण्यात येणार असल्याने पेट्रोल पंपमालकांचे धाबे दणाणले आहेत.

ठाण्यात अटक केलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार साई एजन्सीच्या पंपाची तपासणी केली. यावेळी इंधन कपात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंपावरील दोन्ही मशिनमधील पल्सर कार्ड जप्त केली आहेत. आणखी काही पंपांवर कारवाई होणार आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने ग्राहकांचे फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघकीस आले आहे.

विकास घोडके, पोलिस निरीक्षक, ठाणे क्राइम ब्रँच

०००००००००००

पंपावर काय आढळले?

चिप बसवल्याने इंधन कपात

पेट्रोल मशिनमधून ५ लिटरमागे १४० मिलीलिटर कपात

डिझेल मशिनमधून ५ लिटरमागे ३० मिली लिटर कपात

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री अंबेच्या भक्तांना फुटाणे, खडीसाखर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटक भाविकांना क्षत्रीय मराठा चेंबर आफ कॉमर्सच्या पुढाकाराने शुक्रवारी सकाळच्या आरतीनंतर फुटाणे आणि खडीसाखर प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. अंबाबाईचा मूळ व पारंपरिक खडीसाखर आणि फुटाणे हा प्रसाद भाविकांना वाटावा, अशी मागणी यावेळी भक्तांच्यावतीने करण्यात आली. यावेळी संस्थेच्यावतीने देवस्थान समितीस ७५ किलो फुटाणे आणि ७५ किलो खडीसाखर देण्यात आले.

अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्यावतीने दोन दिवसांपूर्वी लाडूप्रसाद बंद करून पारंपरिक प्रसाद वाटप करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान ही चर्चा झाली होती. मात्र देवस्थानच्या बैठकीत हा विषय मांडल्याशिवाय त्यावर निर्णय घेता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पुजारी हटाओ संघर्ष समिती आणि क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने शुक्रवारी प्रातिनिधीक स्वरूपात पारंपरिक प्रसादाचे वाटप करण्यात आले.

संघटनेचे उपाध्यक्ष जयेश कदम व आर. के. पाटील यांच्याहस्ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला ७५ किलो फुटाणे व ७५ किलो खडीसाखर देण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रशांत गवळी उपस्थित होते.

शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता अ​भिषेक आणि आरती झाल्यानंतर समितीच्यावतीने भक्तांना पारंपरिक प्रसादाचे वाटप केले. तसेच संघर्ष समितीच्या महिला सदस्यांनी सरस्वती मंदिराबाहेर उभे राहून भाविकांना फुटाणे-खडीसाखरेचा प्रसाद दिला.

यावेळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, विजय जाधव, उमेश पोवार, नितीन सासने, सतीश कडुकर, विकास पाटील, पृथ्वीराज पाटील, विजयकुमार पाटील, प्रशांत पाटील, शिवा जाधव, संजय पाटील, बाबा आमते, विजय बहिरशेट, शाहू जाधव, विक्रांत पोवार, सचिन तोडकर, उमेश जाधव, उमेश पोवार, युवराज पाटील, दिलीप इंगळे यांच्यासह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नवीन मंदिर समिती बरखास्त करामुख्यमंत्र्‍यांकडे वारकऱ्यांची एकमुखी मागणी

$
0
0





म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात वारकरी संप्रदायाने जाहीर केल्याप्रमाणे शनिवारपासून आंदोलनास सुरुवात केली. दुपारी महाद्वारात शेकडो महाराज मंडळींनी भजन आंदोलन केले. फडणवीस सरकारच्या समितीत सर्व राजकीय मंडळींचा भरणा असून, यातील काही मद्यपान आणि मांसाहार करीत असल्याचा आक्षेप घेत आता संपूर्ण मंदिर समिती वारकऱ्यांची बनविण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली.
दरम्यान, शेकडो महाराज मंडळी नामदेव पायरीसमोर भजन आंदोलन करीत असताना पोलिसांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपारी तीनच्या सुमारास दिंड्या घेऊन महाराज मंडळी महाद्वारातून नामदेव पायरीजवळ आले. त्यांनी मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी करणारे फलक सोबत घेण्यात आले होते.
मंदिर मुक्तीसाठी वारकरी संप्रदायाने आंदोलन केल्यामुळे मंदिर सरकारच्या ताब्यात आले याची आठवण करून देत राज्यातील इतर मंदिरे सरकारच्या ताब्यात असली तरी आम्ही फक्त विठ्ठल मंदिरावर वारकऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केल्याचे या वेळी वारकरी नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सांगतात आपण विठ्ठलामुळे अपघातातून वाचलो मात्र, जर विठ्ठलाची कायम कृपा हवी असेल तर विठ्ठल मंदिर वारकऱ्यांच्या ताब्यात द्यावे. राजकीय नेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारमध्ये इतर अनेक जागा आहेत. मंदिरात राजकारण आणू नका, असा इशाराही यावेळी महाराज मंडळींनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कशाला पाहिजे बेळगाव?खासदार शरद बनसोडेंचे वादग्रस्त वक्तव्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
‘महाराष्ट्रात उमदीसारख्या गावामध्ये एकही माणूस मराठीत बोलत नाही, मग तुम्हाला बेळगाव कशाला पाहिजे?,’ अशी मुक्ताफळे सोलापूरचे भाजप खासदार शरद बनसोडे यांनी शनिवारी उधळली. विशेष म्हणजे, कर्नाटकच्या मंत्री आणि आमदारासमोर बनसोडे यांनी हा सवाल उपस्थित केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. तसेच, सीमाप्रश्नी आक्रमक राहिलेल्या मित्रपक्ष शिवसेनेलाही बनसोडे यांनी डिवचले.
सोलापुरात आयोजित कन्नड साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना बनसोडे यांनी हे वादग्रस्त विधान केले. या वेळी कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील, आमदार बी. आर. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘मुंबईचे आमचे काही मित्र बेळगाव मागतात. आमच्या सांगलीजवळ जत तालुक्यात २५ हजार लोकवस्तीचे उमदी हे गाव आहे. या गावात एकही माणूस मराठीत बोलत नाही, मग आम्हाला कशाला हवाय बेळगाव? आमच्या मित्राला विचारले की, कधी गेला होतास का उमदीला? तर तो म्हणाला, कधीच नाही. हे सारे असे आहे,’ असे वक्तव्य बनसोडे यांनी केल्यानंतर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
बनसोडे यांनी कानडीत केलेल्या जोशपूर्ण भाषणात सीमाप्रश्न छेडला आणि शिवसेनेचे नाव न घेता बेळगावप्रश्नी सेनेला डिवचले. त्यांच्या या भूमिकेनंतर उपस्थितांमध्ये चलबिचल सुरू झाली. आमदार पाटील यांनी बेळगाव प्रश्नी बोलताना ‘आपण आता फार पुढे गेलोय, तो विषय कधीच मागे पडला आहे,’ असे सांगत सीमाप्रश्नावर पडदा पडल्याचे सूचित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभांगीच्या अपार कष्टाला लाभली यशाची किनार

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

घरात अठरा विश्व दारिद्र्य... ऊसमजुरी हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे पिढ्यान‍्‍पिढ्याचे साधन...घरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जाण्यासाठी सायकल... दहावीचा अभ्यासासाठी शाळा देईल त्यावेळी पुस्तके.... जुन्या पानांच्या वह्या, शाळेशिवाय इतर क्लास नाही की दहावीचे अभ्यासाचे वर्ष म्हणून घरकामातून सुटकाही नाही. अशा बिकट परिस्थितीवर मात करीत शुभांगी सुरेश शेटके या मुलीने दहावीत ९५ टक्के गुण मिळवले. ती म्हाकवे इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे. शिक्षणाची आस, जिद्द, चिकाटीच्या जोरावर तिने हे यश मिळवले. तिचे कुटुंब मूळचे हदनाळ, ता.चिकोडी येथील आहे.

शुभांगीचे वडील ऊसतोडणी मजूर म्हणून तर आई मोलमजुरी करते. दोघांच्या तुटपुंज्या मजुरीतून घरखर्च आणि दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्चाचा ताळमेळ घालताना कुटुंबाची दमछाक होत होती. शुभांगी आणि तिच्या भावाच्या शिक्षणासाठी तिचे अल्पशिक्षीत आईवडील राबराब राबतात. आई मजुरीवर सकाळ-संध्याकाळ दोन टप्प्यात जाते. त्यामुळे शाळेला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतरही शुभांगीला घरकामात मदत करावीच लागते. असे असले तरी त्यातून वेळ काढून शुभांगीने जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला. तिला ५०० पैकी ४७५ गुण मिळाले. गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून शुभांगी सावर्डे बुद्रुक केंद्रात सर्वोत्कृष्ट ठरली आहे.

शुभांगीला म्हाकवे येथे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागे. सकाळी घरकाम करुन चार किलोमीटर अंतर कधी चालत तर कधी मोडक्या सायकलवरुन तिला पार करायला लागायचे. कधी साककल पंक्चर किंवा एखादा पार्ट खराब झाल्यास १० ते १५ दिवस सायकल तशीच पडून राहायची. अशावेळी धावपळ करुन शाळा गाठावी लागत असे. या परिस्थितीतही शाळेतील उपस्थिती आणि अभ्यासाकडे तिने कधीही दुर्लक्ष केले नाही. पाचवीपासून सुरु झालेला शुभांगीचा हा शिरस्ता दहावीच्या वर्षातही तसाच किंबहुना अत्यंत कष्टप्रद राहिला. दहावीच्या वर्षातही शुभांगीला वह्या घेण्यासाठी पैसे नव्हते. जुन्या वह्यांची पाने एकत्र करुन त्या वह्या शिवून तिने अभ्यासासाठी वापरल्या. या यशाने तिच्या कष्टाला आनंदाची झालर लाभली आहे. गणित, इंग्रजी आणि भूमिती या विषयांवर मजबूत पकड असणाऱ्या शुभांगीला प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे. परंतु, व‌डिलांच्या तुटपुंज्या कमाईतून शिक्षण कसे पूर्ण करायचे याची चिंता तिला नेहमी सतावत आहे.


घरची गरीबी आणि ऊसतोड मजुरी हेच साधन असणाऱ्या माझ्या वडिलांनी आणि मोलमजुरी करुन आईने मला बळ दिले. माझ्या परिस्थितीची माहिती असणाऱ्या काही शिक्षक आणि मैत्रिणींनी पुस्तके आणि नोट्स देऊन मदत केली. अडाणी घराणे हा कुटुंबाचा शिक्का मला पुसायचा होता. आता मला उच्चशिक्षीत होऊन प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे. आईव‌डिलांनी खूप कष्ट सोसले. यापुढचे यश मिळवण्यासाठीही आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्टाची माझी तयारी आहे.

शुभांगी शेटके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images