Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंढरपूर यात्रा पालखीतळासाठी ३० वर्षांचे नियोजन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

‘आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या शेकडो पालखी सोहळ्याच्या सुविधांसाठी पालखी तळ आणि रिंगण ठिकाण विकसित करण्यासाठी पुढील ३० वर्षांचे नियोजन करण्यात येत आहे. गरजेनुसार जागेचे अधिग्रहण करण्यास सुरुवात झाली आहे,’ अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकारी भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पालखीतळ आणि रिंगणस्थळांची पाहणी केली. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या प्रमुख पालखी सोहळ्यासह इतर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्याचे पालखी तळ अपुरे पडत असल्याच्या तक्रारी सोहळा प्रमुखांनी सरकारकडे केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
सध्या सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळे आल्यावर नातेपुते, पिराची कुरोली, भंडीशेगाव आणि वाखरी येथील पालखी तळाच्या मोठ्या समस्या असल्याच्या तक्रारी पालखी सोहळा प्रमुखांनी केल्या होत्या. त्यानुसार मानकऱ्यांच्या सूचनेनुसार पर्यायी जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. नातेपुते येथील सध्याची जागा देण्यास खासगी जागामालकांची अडचण असल्याने वारकरी सांप्रदायाने त्या ठिकाणची एका सहकारी कुकुटपालन संस्थेची जागा पसंत केली आहे. ही जागा जिल्हा बँकेत गहाण असून, त्याचा लवकरच लिलाव होणार आहे. बँकेच्या लिलावात उतरून प्रशासन ही जागा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.
तसेच, खुडूस फाटा येथील रिंगणाच्या जागा शेतकरी स्वखुशीने देत असून, आता होणाऱ्या रस्ता रुंदीकरणात मात्र यातील बरीचशी जागा जाणार आहे. ती वाचवण्यासाठी रोडची रचना याठिकाणी बदलण्यात येणार आहे. ठाकूर बुवा रिंगण ठिकाणी दोन शेतकऱ्यांच्या जागा असून, यात थोडी अडचण येत असल्याने त्यांना त्याच गावात शिल्लक असलेली शेती महामंडळाची जमीन दिल्यास याचा वापर रिंगणासाठी करता येईल, अशी मानकऱ्यांची मागणी आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पिराची कुरोली येथे जागेची मोठी समस्या असल्याने येथेही गरजेनुसार अधिग्रहण करून वारकऱ्यांची कायमस्वरुपी सोय करण्यात येणार आहे. भंडी शेगाव आणि वाखरी येथे सर्वच पालख्या एकत्र येण्यास सुरुवात होत असल्याने येथे जागा अपुरी पडत असून, त्या ठिकाणी सोयीच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. यासाठी जमीन अधिग्रहण नवीन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, सध्या पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास प्रकल्प म्हणून घोषित करून मंत्रालयात सर्वच पालखी सोहळ्यासाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याची वारकरी संप्रदायाची मागणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने पालखी तळ विकासासाठी मोठा निधी दिलेला असला, तरी सध्या या विकासापेक्षा जागा अधिग्रहण महत्त्वाचे आहे. हे पैसे त्या जागेसाठी वापरल्यास पालखी सोहळ्यासोबत पायी चालत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना हक्काचे विश्रांती ठिकाण मिळेल, अशी मागणी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मानकरी राजाभाऊ चोपदार यांनी केली.
तर, वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची अजिबात कमतरता नसून जिथे जागा अधिग्रहण शक्य आहे तिथे ती करून आणि जिथे अशक्य आहे तिथे कायदेशीर करार करून जागा ताब्यात घेतली जाणार आहे. आषाढीसाठी येणाऱ्या पालखी सोहळ्यांना कोणतीही असुविधा भासणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्नाटकाला पाणी देण्यास आमदारांचा विरोध

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यास कृष्णा व कोयना नदी काठांच्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई उद्भवणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्ह्यातील आमदारांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

या बाबत सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आमदारांनी आपली पाणी सोडण्याविरोधी भूमिका मांडली.

दरम्यान, आमदारांचा वाढता विरोध लक्षात घेत विजय शिवतारे यांनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास महाबळेश्वर, पाटण, व जावली तालुक्यातील किती गावांमध्ये टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचा अभ्यास करून २४ एप्रिलच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीटंचाई आढाव बैठकीत जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, मोहनराव कदम यांच्यासह जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी कर्नाटकाला कोयना धरणातून देण्यात येत असलेल्या २.६५ टीएमसी पाणी देण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे.

जॅकवेल उघडे पडणार?

मकरंद पाटील यांनी धरणालगत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे जॅकवेल उघडे पडणार आहेत. त्यामुळे तेथील गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात येवू नये, अशी मागणी केली. पाटील यांच्या भूमिकेला शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच आमदारांनी पाठींबा दिला.
सिंचन, वीजनिर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा

कोयनेचे अभियंता ज्ञानेश्वर बागडेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

‘कोयना धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असून, कर्नाटकला दोन टीएमसी पाणी देऊनही जूनपर्यंत सिंचनासह वीजनिर्मितीला पाणी पुरून शिल्लक राहील इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे,’ अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

कर्नाटकसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बागडे म्हणाले, ‘राज्यात भीषण पाणीटंचाई असताना कर्नाटकाला पाणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. आज रोजी धरणात ३९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. वीज निर्मितीला लागणारे पाणी तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागून यंदा पावसाळ्यापर्यंत काही पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा याच दिवशी १३ एप्रिल रोजी धरणात ४ टीएमसी जादा पाणी आहे. धरणातील एकूण पाण्यापैकी वर्षभरात सरासरी ६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. या सर्व बाबींचा विचार करूनच हा निणय घेतला आहे, त्यामुळे येथील जनतेने या बाबत साशंकता बाळगू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीषण अपघातात मिनी बसचा चुराडा; ६ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

मिरज-पंढरपूर रस्त्यार शुक्रवारी पहाटे मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

अपघातग्रस्त मिनी बसमधील प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील माले गावचे असल्याचं समजतं. हे सगळेजण पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना आवळगाव फाटा इथं त्यांची मिनी बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागच्या बाजूने येऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. त्यात सहा लोक जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलं, एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर चालक संदीप यादव फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृतांची नावे:

नंदकुमार जयंत हेगडे (वय ३७)
रेणुका नंदकुमार हेगडे (३५)
आदित्य नंदकुमार हेगडे (१२)
लखन राजू संकाजी (३६)
विनायक मार्तंड लोंढे (४०)
गौरव राजू नरदे (७)

गंभीर जखमी

रेखा राजाराम देवकुळे (४०)
स्नेहल कृष्णात हेगडे (२०)
काजल कृष्णात हेगडे (१९)

जखमी

सावित्री बळवंत आवळे (५५)
शीतल सुनील हेगडे (४२)
सोनल कांबळे (३६)
कोमल हेगडे (२०)
कल्पना बाबर (४०)
अनमोल हेगडे (१२)
गौरी हेगडे (७)
शुभम कांबळे (१०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंक्यतारा किल्ल्यावरून तरुणीची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीनं साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायली पवार असं या तरुणीचं नाव आहे.

रविवारी दुपारपासून सायली घरात नसल्याचं लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. आसपासच्या परिसरात चौकशी केली असता, ती अजिंक्यतारा किल्ल्याच्या दिशेनं गेल्याचं काही जणांनी तिच्या वडिलांना सांगितलं होतं. त्यांनीही लगेचच त्या दिशेला धाव घेतली. पण सायली कुठेच सापडली नव्हती. अखेर, पोलिसांनी साताऱ्यातील सह्याद्री ट्रेकर्स ग्रूपच्या मदतीनं दरीत तिचा शोध घेतला. तेव्हा त्यांना तिचा मृतदेह सापडला. जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल सायलीनं का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणार : शरद पवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

‘रयत शिक्षण संस्थेची शताब्दीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. २०१८ पासून सुरू होणाऱ्या शताब्दी वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सध्या मूलभूत शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासाला महत्त्व आले आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून कौशल्य विकास सर्व स्तरापर्यंत पोचण्यासाठी रयत शिक्षण संस्था प्रयत्न करणार असून, त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी केले.

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५८ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना पहिला डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, डॉ. अनिल पाटील, आमदार पतंगराव कदम, आमदार दिलीप वळसे-पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, सचिव प्रा. गणेश ठाकूर, संस्थेचे सदस्य, कर्मवीर कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस अभिवादन केले. त्यानंतर संस्थेचे सचिव प्राचार्य गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या अहवालाचे वाचन केले. रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

शरद पवार म्हणाले, ‘४ ऑक्टोबर २०१८ पासून रयतच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होणार असून, वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. सध्या परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. बेरोजगारीची समस्या वाढत असल्याने तरुण पिढी नैराश्येत आहे. भारत सरकारचा कल कौशल्य विकासाला प्रोत्साहित करण्याकडे आहे. त्यादृष्टीने कौशल्य विकासासंदर्भात संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्याची सुरुवात जून-जुलैमध्ये होईल अशी अपेक्षा आहे. पुणे शहर परिसरात जागा प्राप्त करून संस्थेकडून कौशल्य विकासाचे ज्ञान देणारे केंद्र सुरू केले जाणार आहे. कौशल्य विकासाचे ज्ञान रयतच्या शाखांपुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील चांगल्या शिक्षणसंस्थांबरोबर हे ज्ञान समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे. गुणवत्तेसंदर्भात रयत हे महत्त्वाचे केंद्र असून, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे. भविष्यातील आव्हान पेलण्याची ताकद नवीन पिढीमध्ये येईल, याकडे संस्था अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.’

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. काकोडकर म्हणाले, ‘कर्मवीरांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून ते सर्व स्तरांपर्यंत पोचवण्याचे महान कार्य केले. गेल्या काही दिवसांपासून रयतशी जवळचा संबंध आला असून, संस्थेच्या कार्याचा आवाका पाहून आनंद द्विगुणित झाला आहे. कर्मवीरांनी सर्व शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली असली, तरी सर्वत्र चांगले शिक्षण उपलब्ध करून देण्याचा पल्ला गाठायचा आहे. ज्ञानयुगात शिक्षणाचे महत्व वाढले असून, तरुण पिढीमध्ये नवीन दिशा, रुंदावलेल्या कक्षा, निर्मितीक्षमता सक्षम होणे आवश्यक आहे. दोन तृतीयांश जनता अजूनही ग्रामीण भागात असून, ग्रामीण आणि शहरी दरी रुंदावत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वेग वाढत आहे. पुढारलेल्या देशापेक्षा पुढे की मागे याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. ज्ञानरचनावादी शिक्षण आले आहे. कौशल्य विकास, सामाजिक विकास, शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योजकता यांची सांगड घालणे आवश्यक असून रयत त्या दृष्टीने पावले टाकत आहे ही स्वागतार्ह बाब आहे.

नवीन सदस्यांबाबत रणनीती

आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षणसंस्था असलेल्या रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य होण्यासाठी अनेकांचे अर्ज येत असतात. त्यांना सदस्यत्व देण्याबाबत पवार म्हणाले, ‘संस्थेत जाणकारांना सहभागी करून घेतले पाहिजे. संस्था उभारणीत योगदान दिलेले, हितचिंतकाची अपेक्षा गैरवाजवी नाही. असे अर्ज आलेल्यांची यादी तयार करून मॅनेजिंग कौन्सिलने निर्णय घ्यावा. जे सदस्य होऊ शकतात त्यांची बारकाईने तपासणी करावी, यादी करून शक्य झाल्यास मला दाखवावी. तसेच, संस्थेनेही काही मान्यवरांना सदस्य होण्याची विनंती करावी. त्यात डॉ. माशेलकर, डॉ. काकोडकर, डॉ. राम ताकवले, अनिल जोग, हणमंतराव गायकवाड आदी मान्यवरांचा समावेश आहे. त्यांच्या समावेशाने संस्था भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास सज्ज होईल. त्यासाठी संस्थेने कात टाकून वेगळया रस्त्याने जाण्याची संस्थेने तयारी ठेवली पाहिजे.’

पवारांची चाणाक्ष नजर आणि समयसूचकता

कार्यक्रमात प्रास्ताविक सुरू असताना व्यासपीठावर बसलेले सर्वजण कार्यक्रमपत्रिका बघण्यात आणि आपसात चर्चा करण्यात मग्न होते. शरद पवार यांच्याशेजारी पालकमंत्री शिवतारे बसले होते. ते पवारांना काहीतरी सांगत होते; परंतु पवारांची नजर समोर होती. त्यानंतर काही वेळातच पवार उठले आणि व्यासपीठाच्या उजव्या बाजूने चालू लागले. जवळच असलेले पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील हे त्यांच्या दिशेने काहीतरी सांगायचे असेल, म्हणून पुढे झाले. मात्र, पवार हे सांगण्यासाठी नाही, तर ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या स्वागतासाठी व्यासपीठाच्या टोकावर आले होते. पवारांनी केलेले स्वागत पाहून व्यासपीठावरील सर्वांसह उपस्थित सर्वजण अवाक् झाले. त्याचप्रमाणे डॉ. काकोडकर यांच्या पत्नीचा सत्कार पुरस्कार देताना राहून गेला. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण जात असताना ही बाब पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माइकचा ताबा घेत अनावधानाने ‘एक सत्कार राहिला असून, तो झाल्याशिवाय कोणीही जाऊ नये,’ असे सांगत डॉ. काकोडकर यांच्या पत्नीचा सत्कार केला. यावरून पवार यांच्या चाणाक्ष नजर व समयसूचकतेचा सर्वांनाच प्रत्यय आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णेत मुलगा वाहून गेला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कृष्णा नदीत बुडणाऱ्या दोन लहान मुलांना वाचवताना वाळू उपशासाठी काढलेल्या सुमारे ८० फूट खड्ड्यात पंधरा वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. प्रथमेश विजय वाडकर (रा. करंजे, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. प्रथमेश उन्हाळ्याच्या सुट्टीला सैदापूर येथील नंदीवाले वस्तीत मामाकडे आला होता. दुपारी तीनच्या सुमारास वाहून गेलेल्या प्रथमेशचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. परंतु, तो सापडला नाही.

सैदापूर येथील धनाजी भिंगारे हे नंदीवाली वस्तीत राहतात. प्रथमेश व त्याची आई हे सुटीसाठी भिंगारे यांच्याकडे आले होते. दुपारी दीडच्या सुमारास प्रथमेश, धनाजी यांचा मुलगा दीपक व त्यांचा पुतण्या ओंकार हे तिघे खेळायला जातो, असे सांगून घराबहेर पडले. त्यांनी थेट अंबक वस्तीजवळील कृष्णा नदीचा काठ गाठला. तेथून ते वाळू उपसासाठी केलेल्या डिगरावर खेळण्यास गेले. त्यावेळी दीपक व ओंकार आंघोळीसाठी त्या ढिगारावरून वाळूतून नदीच्या पात्रात आले. मात्र, तेथे मोठा खड्डा असल्याने त्यांना अंदाज आला नाही. ते बुडू लागल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी प्रथमेश धावला. त्याने दोघांनाही हात दिला. दोघेही बाहेर आले. मात्र, प्रथमेश नदीपात्रात ढकलला गेला. तेथे खोल खड्डा असल्याने प्रथमेश काही क्षणातच दिसेनासा झाला. घाबरलेल्या ओंकार व दीपकने ओरडण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे जनावरे चारण्यासाठी आलेल्या एकाने दीपककडून भिंगारे यांचा मोबाइल नंबर घेऊन फोन केला व घटनेची माहिती दिली. घरातील सर्वजण घटनास्थळी येऊन पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी प्रथमेशचा शोध घेण्यासाठी पोहणाऱ्यांचे पथक तेथे पाठवले. या पथकाने सुमारे ४० फूट खोल जाऊन प्रथमेशला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रथमेशचा शोध लागला नाही. त्यानंतर आपत्कालीन बोटीच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही प्रथमेशचा शोध न लागल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलंगबाबा दर्गाहचा उरूस १२ मे पासून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि बंधुभाव, मानवतेची शिकवण देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कटगुण (ता. खटाव) येथील हजरत पीर सय्यद जलालउद्दीन मोहब्बतशाह उर्फ मलंगबाबा दर्गाहचा ३३ वा उरूस १२ मे पासून उत्साहात सुरू होत आहे. अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीचे स्नेहसंमेलन तसेच कव्वालीच्या शानदार मुकाबल्याचे आयोजन हे उरुसाचे वेगळेपण ठरणार आहे.

समतेचा पुरस्कार करणारे महात्मा जोतिराव फुले यांची जन्मभूमी आणि मलंगबाबा यांचे वास्तव्य ही कटगुणची ओळक आहे. गेल्या ३२ वर्षापासून त्यांच्या दर्गाहचा उरूस साजरा करण्यात येतो. उरूसाचे हे ३३ वर्ष आहे.

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या दर्गाहमध्ये मानवतेचे धडे दिले जात आहेत. १२ मे रोजी मलंगबाबा यांच्या उरूसानिमित्त दर्गाहचे उत्तराधिकारी हजरत रहमान शाह बाबा (बकाअली शाह कादरी) यांच्या नेतृत्वाखाली खटाव येथे रात्री आठ वाजता मिरवणूक (संदल) काढण्यात येणार आहे. रात्री उशिरा ही मिरवणूक दर्गाहपर्यंत पोहोचेल. त्यानंतर पहाटे मलंगबाबा यांच्या समाधीला संदल लावण्यात येऊन धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. १३ मे रोजी दर्गाहचा उरूस साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशी दुपारी अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील मान्यवर व्याख्याते, स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच विविध धर्माचे धर्मगुरू या संमेलनात उपस्थित राहणार आहेत. तसेच, मानवता, एकता या विषयावर आपली मते मांडणार आहेत. या वेळी सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर झेंड्याची आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर कटगुण गावातून मिरवणूक काढली जाणार आहे, अशी माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते सादीक मणेर, युन्नूस मुल्ला यांनी दिली.

उरूसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री दिल्लीतील सुप्रसिद्ध कव्वाल अमीन अफझल साबरी यांच्या कव्वालीचा रंगतदार कार्यक्रम होणार आहे. उरुसानिमित्त मलंगबाबा यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहणार आहेत. उरूसानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी उरूसाच्या विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडपडणारी मुलं करणार दुष्काळाशी सामना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे गावं उजाड आणि टंचाईने ग्रस्त होत आहे. म्हणून या २० आणि २१ मे रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर जवळच्या 'पवार वाडी'या गावात सानेगुरुजींची राष्ट्र सेवा दलातील धडपडणारी मुलं आणि कार्यकर्ते श्रमछावणी भरवून श्रमदान करणार आहेत.

सेवा दलाच्या श्रमसंस्कार चळवळीला अभिनेता आमिर खान यांनी पाणी फाउंडेशन मार्फत "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा"सुरू करून एक प्रकारे साद दिली आहे. त्याच पद्धतीने सेवा दलाचे कार्यकर्ते दोन दिवस पवार वाडीत जलसंधारण आणि दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु असलेल्या गावकऱ्यांच्या या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संतोष पोळविरुद्ध हत्याचे सहा खटले चालणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

क्रूरकर्मा, भोंदू डॉक्टर संतोष पोळने केलेल्या सहा हत्याचे साक्षीदार वेगवेगळे असून पुरावा नसलेल्या प्रकरणात न्यायालयाची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने तसेच संतोषने केलेल्या प्रत्येक हत्येचा हेतू वेगळा असल्याने त्याच्याविरुद्ध सहा हत्येचे सहा खटले चालवण्याचा आदेश आज कोर्टाने दिला.

न्यायाधीश देशपांडे यांच्यासमोर आज या खटल्याची सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. एकत्र खून खटले चालवण्यात यावी ही सरकार पक्षाची मागणी कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे संतोष पोळविरुद्ध सहा खटले चालवण्यात येणार आहे. एकच खटला चालवल्यास बचाव पक्षाला बचाव करताना गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक खूनाचा तपास वेगळा झाला आहे. तसेच प्रत्येक आरोपपत्र वेगवेगळे दाखवले जाणार आहे. २७ एप्रिल रोजी सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी या सर्व खूनांमागे एकच हेतू असून हे सर्व खून खटले एकत्र चालवण्यात यावेत. या सर्वांमध्ये माफीचा साक्षीदार म्हणून ज्योती मांढरे साक्ष देण्यास तयार आहे, असे सांगितले होते.

मुंबई बॉम्बस्फोट खटला, कोल्हापूर येथील बालहत्याकांड या विविध खटल्यांचे दाखले सादर करुन घटना वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या होत्या. परंतु कोर्टाने त्या एकत्र करुन चालवल्या होत्या. असा युक्तीवाद सरकार पक्षाकडून केला होता. यावर आरोपीच्यावतीने म्हणणे मांडताना अॅड. श्रीकांत हुटगीकर यांनी प्रत्येक खूनाचा तपास वेगळा झाला आहे. प्रत्येक आरोपत्र वेगवेगळे आहे. प्रत्येक साक्षीदाराची यादी वेगळी आहे. साक्षीदार वेगवेगळे आहेत. व प्रत्येकाने वेगळी साक्ष दिली आहे. तसेच प्रत्येक खूनाचा हेतू वेगवेगळा आहे. त्यामुळे कायद्याने हे खटले एकत्र चालवता येणे शक्य नाही. आरोपीला बचावाची संधी मिळणार नाही. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार सर्व खटले वेगळे चालवावेत त्यामुळे न्यायालयाची दिशाभूलही होणार नाही. त्यासोबत काही उच्च न्यायालयाचे दाखलेही अॅड. हुटकीगर यांनी न्यायालयासमोर सादर केले होते. याबाबत न्यायालयाने आज सुनावणी करताना सरकार पक्षाचे म्हणणे फेटाळून आवले. व सहाही खून खटले वेगवेगळे चालवण्यात येणार असल्याचे आदेश दिले.

पाच ते सहा वर्षे खून खटला चालणार

प्रत्येक खून खटला वेगळा चालणार आहे. त्यामुळे हे सहा खून खटले संपण्यासाठी पाच ते सहा वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यामधील माफीचा साक्षीदार असणारी ज्योती मांढरे हिलासुद्धा पाच ते सहा वर्षे कारागृहात रहावे लागणार आहे.

कोणता खटला पहिला चालणार

संतोष पोळ व ज्योती मांढरे यांनी मिळून सुरेखा चिकणे, वनीता गायकवाड, जगाबाई पोळ, नथमल भंडारी, सलमा शेख, मंगल जेधे या सहा जणांचे खून केले होते. आता हे सहाही खून खटले वेगवेगळे चालणार आहेत. त्यामुळे पहिला खून खटला कोणाचा सुरु होणार याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनवट, चंदनशिवे हेच सूत्रधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणेत सव्वा नऊ कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन निरीक्षक विश्वनाथ घनवट व सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे हेच प्रमुख सूत्रधार होते, असे सरकारी वकिलांनी सोमवारी कोर्टात सांगितले. प्रकरण मिटवण्यासाठी सांगली पोलिसांनी सहा मध्यस्थांकडून फिर्यादी झुंजार सरनोबत यांच्यावर दबाव आणला होता. चोरीची वाच्यता करु नये यासाठी संशयित मैनुद्दीन मुल्ला याला घनवट यांनी एक कोटीची ऑफर दिली होती. सरनोबत, मध्यस्थ आणि सांगली पोलिसांत प्रकरण मिटवण्यासाठी बैठकाही झाल्या होत्या. पण, पैसे देण्यास टाळाटाळ झाल्याचे लक्षात आल्यावर सरनोबत यांनी सव्वानऊ कोटी पोलिसांनीच चोरल्याची फिर्याद दिली. या सर्व बाबी जिल्हा कोर्टात सुनावणीवेळी स्पष्ट करण्यात आल्या. त्यांच्या समर्थनार्थ सरकारी वकिलांनी पोलिस अहवालातील दाखले दिले. घनवट व पोलिस नाईक कुलदीप कांबळे यांच्यासंदर्भात आज सुनावणी झाली.

सोमवारी सत्र न्यायाधीश एस.एम. कोच्चे यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी व विरोधी वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले. मंगळवारी निर्णय दिला जाणार आहे. सरकारी वकिलांनी पोलिसांच्या चोरीच्या तपासावर प्रकाश टाकला. वारणेतील शिक्षक कॉलनीतील फ्लॅटमध्ये मार्च २०१६ मध्ये मुल्लाने तीन कोटी अकरा लाख चोरले होते. गुन्ह्याचा छडा सांगली पोलिसांनी लावला होता. पण गुन्ह्यातील फिर्यादी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक सरनोबत यांनी सव्वानऊ कोटी सांगली पोलिसांनी चोरल्याची तक्रार एप्रिल २०१७ मध्ये केली. यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक शर्मा यांनी गुन्ह्याचा तपास करून घनवट, कुरळप यांच्यासह हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, नाइक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी प्रविण सावंत, नितीन गोडसे (रा. वडूज, जि. सातारा), सचिन भोसले (रा. आंबेवाडी, ता. करवीर), रितेश साठे, सुनील भोरे (वासू देसांगे, जि. सोलापुर), माजी नगरसेवक रवीकिरण इंगवले यांच्याशी संपर्क साधून मध्यस्थीचे प्रयत्न केले. घनवट, चंदनशिवे यांच्यासह सर्व पोलिसांनी सरनोबत यांना सर्व पैसे परत मिळवून देतो, असे सांगत वर्षभर झुलवत ठेवले. हवालदार दीपक पाटीलने रोख १८ लाख रुपये मध्यस्थ भोसलेला दिले असून पाटील यांची पत्नी सीमा यांच्या नावावर असलेला फ्लॅट सरनोबत यांच्याकडून मध्यस्थ गोडसे यांचा मित्र इम्तियाज बागवान यांच्या नावावर केला आहे. पोलिस व सरनोबत यांच्या तडजोडीच्या बैठका कोल्हापुरातील हॉटेल अयोध्या, कराड येथील हॉटेल संगम, सांगली विश्रामबाग पै प्रकाश हॉटेल येथे झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्रा योजनेचे तीनतेरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने उद्योजकांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. बेरोजगारांसह नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याऐवजी योजनेची माहिती देण्यासह काही बँका टाळाटाळ करीत आहेत. जाचक कागदपत्रांच्या अडवणुकीसह अनेक बँकांच्या व्यवस्थापकांकडून नवउद्योजकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. मुद्रा योजना चांगली असली तरी अंमलबजावणीत मात्र गलथान कारभार दिसत आहे. काही नवउद्योजकांनी मिळालेल्या कर्जातून उद्योगही उभारलेले नाहीत. कर्ज नाही, उद्योग उभारणी नाही असा मुद्रा योजनेचा खेळ कागदावरच सुरू आहे.

मुद्रा कर्ज योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण अशा तीन टप्प्यांत कर्ज दिले जाते. शिशू योजनेंतर्गत छोट्या उद्योजकांना ५० हजार, किशोर योजनेंतर्गत मध्यम उद्योजकांना पाच लाख व तरुण योजनेंतर्गत मोठ्या उद्योजकांना १० लाखांचे कर्ज देण्याची योजना आहे. नवउद्योजकांना बूस्ट देणारी ही योजना आहे. मात्र, कर्जदाराच्या हातात कर्ज मिळेपर्यंत अनेकदा राष्ट्रीयीकृत बँकांकडे हेलपाटे मारावे लागतात. बँकांत या योजनेचे अर्ज उपलब्ध आहेत. मात्र, त्याची माहिती देण्यास बँक अधिकारीच टाळाटाळ करतात. बँकांकडूनच पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने चांगल्या योजनेपासून बेरोजगार अनभिज्ञ आहेत. काही बँकांनी टार्गेट पूर्ण करण्यासाठी जुन्याच खातेदारांच्या नावे कर्जप्रकरणे केल्याचे समजते. विशिष्ट बँकेत विशिष्ट परिसरातील व्यक्तींनाच कर्ज दिले जाईल, अशी अटही बँकांनी घातली आहे. त्याचा फटकाही बेरोजगारांना बसत आहे. राज्य सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जपुरवठा करण्यासाठी युवकांना सहकार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी होत नाही.

नवीन कर्जदार दिलेल्या कर्जाची परतफेड करू शकणार नाही, असे काही बँक व्यवस्थापकांना वाटते. त्यामुळे योजनेतील कर्ज देताना टाळाटाळ केली जात आहे. नवीन कर्जप्रकरण करून वसुलीचा ताप वाचविण्यासाठी काही ठिकाणी व्यापारी खातेदारांचे अर्ज भरून घेतल्याचे समजते. जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या आढावा बैठकीत मात्र योजनेतून दिलेल्या कर्जाबाबतची कागदोपत्री घोडी नाचविली जातात. कमी कागदपत्रे आणि विनाजामीन सुविधा असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेचा फटका या योजनेला बसत आहे.


मुद्रा सर्व वित्तीय संस्थांना बंधनकारक

केंद्र सरकारने मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लि. या नॉन बँकिंग कंपनीची स्थापना केली. त्यांच्यातर्फे सर्व वित्तीय संस्थांना कर्जपुरवठा होतो. यातून सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी, नागरी सहकारी बँका, विदेशी बँकांनी (पीएमएमवाय) योजनेंतर्गत कर्ज देणे बंधनककारक आहे. मात्र, काही बँकाच ही योजना राबवत आहेत. काही बँकांकडून बजेट नाही, शाखेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे अर्जदारांना सांगण्यात येते.


५० हजारांहून अधिक अर्ज

मुद्रा योजनेसाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकाकडे ५० हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. मात्र, संबंधित अर्ज बँकेच्या लॉकरमध्ये पडून आहेत. अर्ज, अर्जांची छाननी, मुदत आणि मंजुरी या टप्प्याची माहिती अर्जदाराला दिली जात नाही. बँकेत खाते आहे का, पूर्वी काढलेल्या कर्जाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दाखला मागितला जात आहे. कर्जदाराची पत पाहूनच कर्ज मंजुरीचा विचार केला जात आहे. त्यामुळे मुद्रा योजनेच्या लोकप्रिय घोषणा, स्थानिक पातळीवरील अंमलबजावणीत कमी पडलेले अधिकारी आणि केवळ आढावा बैठकीचा अहवाल राज्य सरकारला पाठविणे, एवढाच उद्योग या मुद्रा योजनेत सुरू आहे.


मुद्रा लोन संदर्भात एका राष्ट्रीयीकृत बँकेत चौकशी केली. मात्र आमच्या बँकेचा कोटा पूर्ण झाला आहे. त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घ्या, असा निरोप बँकेतील शिपायांकडून देण्यात आला. उद्योगासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याऐवजी अंमलबजावणीच्या पातळीवर कार्यवाही शून्य आहे.

नितीन पाटील, सानेगुरूजी वसाहत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रालयाला घेराओ घालू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘वाढीव वीज दराच्या प्रश्नावर पै-पैसाठी लढावे लागणार आहे. सरकारला मुदत देऊनही त्यांनी प्रतिसाद नाही दिला, तर मंत्रालयाला घेराओ घालून सरकारच्या पोटात धडकी भरेल, असे आंदोलन करू,’ असा इशारा ज्येष्ठ नेते आणि इरीगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला. फेडरेशनच्यावतीने सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी झालेल्या सभेत डॉ. पाटील बोलत होते. मोर्चाला कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष प्रताप होगाडे, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, यांच्यासह माजी आमदार संजय घाटगे, फेडरेशनचे बाबासाहेब पाटील-भुयेकर, अरुण लाड आदी प्रमुख उपस्थित होते. फेडरेशनच्या मागण्यांचे निवेदन महाविरणचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे आणि अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे यांना देण्यात आले.

प्रा. पाटील म्हणाले, ‘वीज कंपनीच्या कामात विस्कळीतपणा आहे. त्यांना गळती थांबवता येत नाही. चोरी रोखता येत नाही. शेतीपंपांची राज्यात १७ हजार कोटी थकबाकी असल्याचे ऊर्जामंत्री सांगतात. पण, पश्चिम महाराष्ट्रात थकबाकी नाही. म्हैसाळ, ताकारीसारख्या योजनांची थकबाकी शेतकऱ्यांनी थकवलेली नाही. राज्यात १७ लाख वीज पंपांना मीटर नाही आणि ते बसवले तर यांचे भांडे फुटणार आहे. त्यामुळे सरकारने वडाची साल पिंपळाला, असा प्रकार करू नये.’

‘कवठेमहंकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यात जिथे पाणीच नाही तेथे विजेची बिले कशी? तेथे वर्षभरात १३०० तास पंप चालत असल्याचे वीज कंपनी सांगत असेल तर ते कसे शक्य आहे?’, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले. अकारण प्रामाणिक शेतकऱ्यांची बदनामी करणार असाल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दिला.

ऊर्जामंत्र्यांवर हक्कभंग आणा

‘ऊर्जामंत्र्यांनी सभागृहात कृषी पंपांची थकबाकी १७ हजार कोटी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज कोणत्याही परिस्थितीत तोडणार नाही, अशी ग्वाही दिली. त्याचवेळी सांगली जिल्ह्यात १५० पंपांची वीज तोडण्यात आली. सभागृहात अशी खोटी माहिती देणाऱ्या ऊर्जामंत्र्यांवर हक्कभंग दाखल करा,’ असा सल्ला प्रा. पाटील यांनी उपस्थित तिन्ही आमदारांना दिला.

कोल्हापुरात १९ मे रोजी बैठक

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत १९ मे रोजी कोल्हापुरात महत्त्वाची बैठक होईल, असे यावेळी जाहीर करण्यात. सभेत उपस्थित खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांच्याशी या विषयावर मोबाइलवरून चर्चा केली. त्यावेळी त्यांनी १९ मे दुपारी तीनची वेळ दिली. शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या या बैठकीस इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या मणक्याला दणके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ः रस्ते प्रकल्पांतर्गत कोल्हापुरातील मुख्य रस्ते झाले असले तरी अंतर्गत रस्ते खराब आहेत. अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. या खड्ड्यांच्या दणक्याने वाहनचालक मात्र मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत. कामानिमित्त वाहनचालकांचा रोज किमान १५ ते २० किमी प्रवास होतो. वाहन चालवताना सतत बसणाऱ्या हादऱ्यांमुळे मणक्याचे दुखणे डोके वर काढू लागली आहे.

शहरातील तसेच उपनगरातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आहे. त्यामुळे वाहनधारकांना मणक्याची झीज होणे, मणक्याच्या बाजूच्या मांसल भागाला सूज येणे, चक्ती सरकणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. अस्थिरोग तज्ज्ञांकडे अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.

याचबरोबर काही रुग्णांमध्ये मणक्याची हाडे झिजून दबल्यामुळे पाठदुखीचा त्रासही जाणवत आहे. मणक्याचा त्रास कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाचीही तितकीच आवश्यकता असते. मणक्याची झीज होत असल्यामुळे अशा रुग्णांमध्ये आहारात कॅल्शियम व व्हिटामीन डी योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. यासाठी आहारामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, केळी, संत्री, नाचणी, सोयाबीन, मासे, मशरुम्स, अंडी, मांस असे पदार्थ घेणे गरजेचे आहे. पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम असते, पण ते तेवढे मोठय़ा प्रमाणात शोषले जात नाही.


लक्षणे

वारंवार कंबरदुखी

पायात मुंग्या येणे किंवा सुन्न होणे

उठताना किंवा बसताना कमरेत कळा येणे

.................

कारणे -

खड्डेमय रस्त्यांमुळे सातत्याने मणक्याला धक्के

शरीरात कॅलशिअमचा अभाव असणे

बी व्हिटामीनचा अभाव असणे

वजन वाढणे

..................

उपाययोजना -

दररोज किमान २ किमी फिरायला जाणे

मणक्याचे व्यायाम, योगा करणे

मणक्याचा त्रास असल्यास महिन्यातून किंवा तीन महिन्यातून तपासणी

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पथ्ये पाळावी

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिजिओथेरपी कोर्स करावा

वाहन चालवताना कमरेचा बेल्ट वापरणे


गाडी बदलण्याची वेळ -

अनेकांना वाहन चालवताना सातत्याने कंबर दुखी, मणक्याचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांकडूनही गिअरची वाहने न चालविण्याचा सल्ला दिला जात आहेत. कोल्हापुरातील अनेकांनी गिअरच्या गाड्या विकून विदाउट गिअरच्या गाड्या खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.



सध्या मणक्याचा त्रास असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले दिसते. यासाठी रस्ते सुधारले पाहिजेत. त्याचबरोबर रुग्णांच्या आहारात डी व बी व्हिटामीन असले पाहिजे. योग्य काळजी घेतल्यास मणक्याच्या आजारापासून थोडा दिलासा मिळू शकतो.

डॉ. अश्विन बाबर, अस्थिरोग तज्ज्ञ, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्विक हिल’सोबत विद्यापीठाचा एमओयू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग आणि अग्रमानांकित अँटीव्हायरस कंपनी क्विक-हिल यांच्या दरम्यान नुकताच पुणे येथे सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारावर विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी तर क्विक-हिलच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश काटकर यांनी स्वाक्षरी केल्या.

या सामंजस्य कराराअंतर्गत विविध तरतुदींची माहिती देताना कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, ‘या करारान्वये कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन सायबर सिक्युरिटीचा अभ्यासक्रम शिकता येणार आहे. तसेच नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्राध्यापकांना अद्ययावत ज्ञान अवगत करण्यासाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित करण्यात येणार असून त्याचे प्रादेशिक केंद्र विद्यापीठाचा संगणकशास्त्र असेल. या केंद्राच्या माध्यमातून संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाचा उद्देश माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करणे हा असेल. माहिती तंत्रज्ञान सुरक्षा उद्योगाच्या मापदंडाप्रमाणे सी, सी++ या प्रोग्रॅमिंग भाषांचे व्यावसायिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येथील.’

संगणकशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. आर. आर. मुधोळकर, डॉ. व्ही. एस. कुंभार, प्रा. के. जी. खराडे, क्विक-हिलचे सीएसआर व्यवस्थापक अजय शिर्के, सीएसआर हेड सुगंधा दाणी उपस्थित होते. सामंजस्य करारासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यांमध्ये गाळ, कचऱ्याचे साम्राज्य

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भरमसाठ वाढलेली झाडेझुडुपे, कचरा टाकण्यासाठी योग्य जागा समजून प्लास्टिकसह सर्व प्रकारचा टाकला जाणारा कचरा, त्यामुळे दोन्ही काठांवर साठलेले कचऱ्याचे ढीग, पूर्वी काढलेला गाळ न हलवल्याने पात्रात पुन्हा पसरत असलेला गाळ अशी शहरातील बहुतांश नाल्यांची दयनीय अवस्था आहे. गाळ, कचऱ्याने नाले चिंचोळे बनले आहेत. तोंडावर आलेल्या पावसाळ्यात त्याचा फटका आजूबाजूच्या नागरी वस्तींना बसणार आहे. महापालिकेच्यावतीने नेमकी कुठे नाले सफाई केली जाते, याचे कोडे नागरिकांना पडले आहे. छोट्या गटारींची दररोज स्वच्छता करुन मोठ्या गटारी, नाल्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार सुरु आहे.

शहराची भौगोलिक रचना पाहिली तर सारे मोठे नाले दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत येत नदीला मिसळतात. त्यातील जयंती व दुधाळी नाल्यामध्ये जुन्या पेठा तसेच शहरातील बहुतांश मध्यवस्तीतील भागाचे सांडपाणी जात असते. ताराराणी चौकापासून पूर्वेकडील भागातील सांडपाणी बापट कॅम्प, कसबा बावडा, लाइन बाजार येथील नाल्यांमधून नदीमध्ये मिसळत असते. यातील जयंती आणि दुधाळी नाल्याच्या दोन्ही काठाचा बहुतांश भाग रिटेनिंग वॉल बांधून बंदिस्त केला आहे. पण, अन्य ठिकाणच्या नाल्यांची अवस्था अजूनही जैसे थे आहे. शहरातील जयंती व दुधाळी वगळून महापालिकेच्या यादीत १२ मोठे नाले आहेत. शिवाय इतर छोट्या, मोठ्या नाल्यांची संख्या शंभरावर आहे. दर पावसाळ्यापूर्वी छोट्या गटारींपासून या मोठ्या नाल्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पण, यंदा ही नाल्याची सफाई कुठे दिसलेलीच नाही.

जयंती व दुधाळीसारख्या शहरातील दोन मोठ्या नाल्यांतील कचरा आणि गाळाची स्थिती जैसे थे आहे. लाइन बाजार, बापट कॅम्प या परिसरातील नाल्यांमध्ये स्वच्छता झाल्याच्या काही निशाणीही दिसत नाहीत. छोट्या गटारींच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी दिसतात. पण मोठ्या गटारी व नाल्यांच्या स्वच्छतेसाठी मशिनरीसह कर्मचाऱ्यांची मोठी यंत्रणा आवश्यक असते. त्यासाठीची मोहीमही कुठे दिसलेली नाही. त्यामुळे नाल्यांची रुंदी कचरा आणि गाळामुळे कमी झाली असून नुकत्याच झालेल्या वळीव पावसाने नाले तुडुंब भरल्याचे चित्र सर्वत्र दिसले. पावसाळ्यात अशा नाल्यांमधील पाणी लवकर बाहेर पडण्याची शक्यता आहे.

कचरा टाकण्याची जागा

शहरातील जयंती नाला हा मोठा नाला आहे. दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीपुरी परिसरात नाल्यातील गाळ काढून खोली वाढवली होती. पण त्यानंतर तो गाळ बाहेर काढला नसल्याने पात्रातच एका बाजूला ठेवला आहे. पावसाळ्यांमध्ये तो पुन्हा पात्रांमध्ये परत जाऊ लागला आहे. नाल्यांच्या दुतर्फा मोठी झाडे वाढत आहेत. तसेच छोट्या छोट्या झुडुंपामुळे नाला अरुंद झाल्याचे दिसत आहे. विल्सन पूल, कोंडा ओळ, ओढ्यावरील गणपती या परिसरात प्लास्टिक तसेच इतर सारा कचरा टाकण्याची जागा म्हणून नाल्याचा उपयोग केला जातो. तेथील कचऱ्याचे साम्राज्य पाहता स्वच्छता कोणत्या साली केली आहे हे शोधावे लागेल.

झाडेझुडुपे तशीच

शिवाजी पेठ, रंकाळा परिसरातील वस्तीचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या दुधाळी नाल्यात दुधाळी पॅ​व्हेलियनसमोरील अवस्था पाहिली तर झाडेझुडुपांचे साम्राज्य आहे. तसेच प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग नाल्यात पहायला मिळत आहेत. दुधाळी पॅव्हेलियनसमोरील भाग सोडल्यास इतर ठिकाणी बंदिस्त असलेल्या नाल्यातील कचरा उठाव केलेला दिसत नाही. पावसाच्या पाण्याच्या दाबामुळे जितकी स्वच्छता होईल, तितकीच स्वच्छता होत असते.

नाले स्वच्छतेअभावी रस्त्यांवर पाणी

शहराच्या राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजेंद्रनगर, सानेगुरुजी, रामानंदनगर, रायगड कॉलनी, विक्रमनगर, फुलेवाडी अशा अनेक भागात मध्यम आकाराचे नाले आहेत. त्या नाल्यांची स्वच्छता जवळपास होतच नाही. कुठे पाणी तुंबण्याच्या तक्रारी येतील त्याचवेळी त्या परिसरात सांडपाणी वाहते करण्याचे काम महापालिका करते. पण नाल्यांमध्ये असलेला दगड, बांधकाम साहित्य, प्लास्टिकचा वर्षानुवर्षे अडकलेला कचरा काढण्याचे काम होत नाही. त्यामुळे सलग दोन ते तीन दिवस जोराचा पाऊस झाल्यास राजारामपुरी, शाहूपुरी परिसरातील नाले ओसंडून वाहतात व रस्त्यावर पाणी तुंबून राहते.

रस्ते प्रकल्पातील गटारी स्वच्छ करा

२००९ सालापासून रस्ते प्रकल्पांतर्गत शहरातील ५० किलोमीटरच्या झालेल्या रस्त्यामधील गटारींची स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे कचरा तसेच बांधकाम साहित्यामुळे गटार तुंबलेल्या आहेत. जयंती नाला पूल, जिल्हाधिकारी कार्यालय, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी अशा ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने गटारीतून रस्त्यावर येत असते. या ठिकाणी गटारींची स्वच्छता करण्याची गरज आहे.
महापालिकेच्यावतीने एक मार्चपासून नालेसफाई सुरू केली आहे. पण अनेक ठिकाणी नागरिक पुन्हा कचरा टाकतात. त्यामुळे काम दिसून येत नाही. आतापर्यंत लहान, मध्यम आकाराचे ३९६ नाल्यांत सफाईचे काम केले आहे. २५ मेपर्यंत सफाई सुरू राहणार आहे.

विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांडपाण्याच्या पुनर्वापराने बारा हजार लिटरची बचत

$
0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

दैनंदिन जीवनात योग्य नियोजन केल्यास वापरातील पाण्याचा पुनर्वापर कसा चांगला करता येतो हे येथील उद्योजक संदीप सुभाष पाटील यांनी दाखवून दिले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरात आणून ते दररोज १२ हजार लिटर पाण्याची बचत करतात. त्यातूनच त्यांनी बाग आणि शेती फुलविली आहे. गेल्या आठ वर्षांपासून पाणी वाचविण्यासाठी हा उपक्रम अखंडीतपणे ते राबवित आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे अनुकरण उद्योजकांसह नागरिकांनी केल्यास शहराला पाणीटंचाईचा त्रास जाणवणार नाही.

इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र. येथे मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय असल्याने पाण्याची गरजही जास्त भासते. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेसिंग व सायझिंग उद्योगात तर पाण्याचा वापर अत्यावश्यक ठरतो. यंत्रमाग कारखान्यात तापमान नियंत्रित ठेवण्यासह उत्पादन वाढीसाठी पाण्याचा फवारा बसवावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन गुरुकन्नननगर परिसरातील उद्योजक संदीप पाटील यांनी बदलत्या काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यातून पाण्याची बचत होईल यावर त्यांनी भर दिला. डीकेटीईमधील टेक्सटाइल टेक्नॉलॉजी या शाखेची पदवी घेऊन संदीप यांनी कागल, बेंगलोर येथे खाजगी संस्थेत नोकरी केली. त्यानंतर एम. टेक.ची पदवी प्राप्त केलेल्या संदीप यांनी घरातही सौरऊर्जेचा वापर सुरू केला. त्यांचे वडील सुभाष रायगोंडा पाटील हे आयको स्पिनिंग मिलमध्ये रिंगफ्रेम विभागात नोकरीत होते. शून्यातून विश्व निर्माण करताना समाजाचे ऋण फेडावे यातूनच पाणी बचतीचा विचार त्यांनी स्वीकारला. पाटील यांनी आपल्या कारखान्यातील जुन्या यंत्रणेत कालांतराने बदल केले आणि आर्द्रता निर्मिती संच (ह्यूमिडीफिकेशन सिस्टिम) बसविण्यात आली. त्यामुळे कारखान्यातील उष्ण तापमानावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. त्यांचे ३० आणि २० अशा यंत्रमागाचे दोन स्वतंत्र युनिट आहेत. तर १६ स्वयंचलित यंत्रमाग आहेत. ३० यंत्रमागासाठी दैनंदिन ८ हजार लिटर तर २० यंत्रमागासाठी ४ हजार लिटर पाण्याची गरज भासते. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने पाटील यांना त्यातूनच पाण्याचा बचतीचा मार्ग सुचला. त्यांच्या प्लान्टसाठी वापरण्यात येणाऱ्या दैनंदिन १२ हजार लिटर पाण्याचा पुनर्वापर (रिसायकलिंग) करण्याचा विचार करून तो अंमलातही आणला.

दैनंदिन १२ हजार लिटर पाण्याची बचत करणारे पाटील कुटुंबिय थोडेही पाणी वाया घालवत नाहीत. यंत्रमागासाठी वापरले जाणारे पाणी वाया न सोडता त्याचा थेंब न् थेंब पुन्हा वापरात आणतात. याच पाण्यातून घराची स्वच्छता, वाहनांची स्वच्छता केली जाते. तर उर्वरीत पाणी हे कारखाना आणि घर परिसरातील वृक्षांसाठी वापरले जाते. वर्षातून एकवेळ त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली जाते. स्वच्छता करताना सोडण्यात येणारे पाणी हे वाया न घालविता त्याचा शेतीसाठी वापर केला जातो.

पाणीटंचाईच्या काळात शहरातील सर्वच उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांनीही पाणी बचतीचा मार्ग अवलंबण्याची गरज आहे. आपल्याकडील पाण्याचा जास्तीत जास्त वापर अचूकपणे कसा करता येईल यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. पाणी वाचले तर आपण वाचू हे लक्षात घ्यायला हवे.

संदीप पाटील, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारमुळे अडले केंद्रीय प्रवेशाचे घोडे

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com
Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कला व वाणिज्य विद्याशाखेची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन राबवण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्याप सॉफ्टवेअर दिले नसल्याने यंदाही केंद्रीय प्रवेश रखडण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने याला मंजुरी दिली असताना केवळ सॉफ्टवेअरअभावी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया गुंडळली जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठाची सॉफ्टवेअर तयार करण्याची तयारी असताना, शिक्षण विभागाने सॉफ्टवेअरची सक्ती केल्याने ऑनलाइन प्रवेशाला ‘खो’ बसण्याची शक्यता आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसीने) २०१५ मध्ये देशातील सर्वच विद्यापीठांना केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी पत्र पाठवले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने यासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये समितीची स्थापना केली. समितीच्या विविध बैठका होऊन सर्व महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होणार असल्याचे पत्र पाठविले. प्रवेशासाठी नियमावली तयार केली. नियमावलीमध्ये विद्यापीठ, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी, शुल्क निश्चिती अशा २० मुद्यांचा समावेश होता. अशी नियमावली विद्यापीठासह शिक्षण विभागाला पाठविण्यात आली.

प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी विद्यापीठाने सॉफ्टवेअर तयार करण्याचाही विचार केला. पण, शिक्षण विभागाने विद्यापीठाचे सॉफ्टवेअर न स्वीकारता, सरकारकडून सॉफ्टवेअर घेण्याची सक्ती केली. सॉफ्टवेअर सक्ती केल्यानंतर विद्यापीठ व समितीने शिक्षण विभागाकडे सॉफ्टवेअर देण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठवला. पण, शिक्षण विभागाकडून याबाबत कोणताही कार्यवाही झालेली नाही. जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर होण्यास केवळ १५ ते २० दिवसांचा अवधी शिल्लक असताना विद्यार्थ्यांचा डेटा बनवणे, महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे याला अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. असे प्रशिक्षण महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना न मिळाल्यास ऑनलाइन प्रवेशामध्ये खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया रखडल्यास याचा मन:स्ताप प्राचार्य, पालक आणि विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे.



अभियांत्रिकी प्रक्रिया झाली ऑनलाइन

गेल्यावर्षीपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लाबवण्यात आली. तीन टप्प्यात झालेल्या प्रवेश प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या. मात्र, यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुरळीत होणार असल्याचे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे यावर्षीपासून महाविद्यालयांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया झाल्यास त्यातील त्रुटी दूर होऊन पुढील अभ्यासक्रमाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चांगली होईल असे त्यांच्याकडून स्पष्ट केले जात आहे.


अॅडमिशनसाठी दबाव

बारावी निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशाला सुरुवात होते. प्रत्येक महाविद्यालयाची गुणवत्ता यादी जाहीर होऊन प्रवेश दिला जातो. पण गुणवत्ता यादीनुसार प्रवेश न मिळाले विद्यार्थी, पालक प्रवेश देण्यासाठी प्राचार्यांवर दबाव टाकतात. अशा दबाव टाकणाऱ्यांमध्ये गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांचाही समावेश असतो. अशा लोकांना तोंड देणे प्राचार्यांना अशक्य होते. अशा मन:स्तापासून सुटका होण्यासाठी सर्वच प्राचार्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे स्वागत केले. मात्र याला पुन्हा ‘खो’ बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्राचार्यांना दबावाला सामोरे जावे लागणार आहे.


शिवाजी विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीने प्रवेश प्रक्रिया तयार करून शिक्षण विभागाकडे पाठवली. प्रवेशाबाबतच्या सूचनाही विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना दिल्या. विद्यापीठाने सॉफ्टवेअर तयारी करण्याची तयारीही दर्शवली. मात्र शिक्षण विभागाकडून सॉफ्टवेअरची घेण्याची सक्ती केल्यानंतर विभागीय शिक्षण मंडळाकडे तसा प्रस्तावही पाठवला. मात्र तीन महिन्यानंतर निर्णय झालेला नाही.

डॉ. एन. व्ही. नलवडे, समिती अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर महापालिकेची ‘पत’ वाढेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मर्यादित उत्पन्न, करवाढीला होणारा विरोध, कर्जाचा बोजा त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी करावी लागणारी कसरत, त्यामुळे विकासकामांवर होत असलेला परिणाम अशा आर्थिक संकटात असलेल्या महानगरपालिकेला ‘पत’ वाढवण्यात यंदाही अपयश आले आहे. केंद्रीय नगरविकास खात्याने नुकत्याच जाहीर केलेल्या पत मानांकन ‘क्रेडिट रेटिंग’ यादीत कोल्हापूर महानगरपालिकेला ‘बीबीबी’ हे मानांकन मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हेच मानांकन कायम आहे.

देशभरातील ज्या शहरांना ‘स्मार्ट सिटी’ व ‘अमृत’ योजनेंतर्गत निधी देण्यात येणार आहे, त्या शहरांना केंद्रीय नगरविकास विभागाने पत मानांकन करून घेण्यास सांगितले होते. या योजनांमधून देण्यात येणाऱ्या निधीतून कामे होतील. पण, त्यांची देखभाल करण्यासाठी आवश्यक तितकी आर्थिक सक्षमता आहे का? कर्ज फेडण्याची किती क्षमता आहे, हे त्या शहराच्या पत मानांकनावरून ठरवता येणार होते. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने ‘क्रिसिल’ संस्थेकडून पत मानांकन करून घेतले आहे. तीन वर्षांपासून हे मानांकन केले जाते. यापूर्वी दोन वर्षे महापालिकेला ‘बीबीबी’ मानांकन मिळाले. यंदाही पुन्हा तेच मानांकनच मिळाले. यातून महापालिकेला ‘पत’ वाढवण्यात अपयश आले आहे, हेच स्पष्ट होते. किमान बीबीबी पेक्षा कमी स्तरावरील मानांकन मिळाले नाही हेच सुदैव असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सध्या नगरोत्थानसाठी ६० कोटी रुपये आणि थेट पाइपलाइन योजनेतील महापालिकेचा वाटा देण्यासाठी ६० कोटी रुपयांच्या कर्जाला महापालिकेने मंजुरी घेतली आहे. बहुमजली कार पार्किंग, व्यापारी संकुले असे अन्य विकास प्रकल्प राबवण्यासाठी महापालिकेने बीओटी ततत्त्वाचा अवलंब करुन पाहिला. पण त्यामध्ये टेंडरला प्रतिसाद मिळालेला नाही. अशा पार्श्वभूमीवर महापालिकेला स्वत‍ः निधी उभा करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. हा निधी उभा करण्यासाठी सक्षम आर्थिक स्थिती नाही. कर संकलनाचे उद्दिष्ट व प्रत्यक्ष जमा यामध्ये तूट येत असून दरवर्षी तुटीचा डोंगर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्ज मिळवण्याबरोबरच ते फेडण्याची क्षमता सिद्ध करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

कर्जरोखे उभारणे शक्य

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून इतर आर्थिक संस्थांकडून कर्ज घेतल्यास त्या कर्जाची परतफेड करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प निधीअभावी पुर्ण करण्यासाठी अडचणी येत आहेत. महापालिकेला मिळालेल्या या मानांकनामुळे कर्जरोख्यांद्वारे बाजारातून निधी उभा करता येणे शक्य आहे. यानुसार १७० कोटी रुपयांपर्यंतचा निधी कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभा करता येऊ शकतात. हे कर्जरोखे करमुक्त असल्याने जास्तीत जास्त गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करू शकतात.


महापालिकेला सलग तिसऱ्या वर्षी बीबीबी पत मानांकन मिळाले आहे. कर्जरोख्यांद्वारे निधी उभा करण्याचा पर्याय असला तरी सध्या तरी महापालिकेने याबाबतचा विचार केलेला नाही. अन्य पर्यायांचा विचार करणे शक्य आहे.

संजय सरनाईक, मुख्य लेखापाल, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस, वाऱ्याने वीजपुरवठा खंडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहर आणि परिसरात धुळींचे लोट निर्माण झाले. वादळी वाऱ्यांमुळे एस. टी. कॉलनी व लाइन बाजार येथील पद्मा चौकातील दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर लीशां हॉटेल, आंबेडकरनगर व बिरंजे पाणंद येथील झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहिन्या तुटल्याने शहर आणि परिसरातील सुमारे चार तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर अनेक ‌ठिकाणी लावलेले डिजिटल फलकही फाटून गेले. शहराच्याकाळी भागात मात्र पावसाचा केवळ शिडकावा झाल्याने सायंकाळनंतर उष्मा वाढला.

सकाळी दहा वाजल्यापासून उष्मा अधिक जाणवू लागल्याने सांयकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात होती. दुपारी साडेतीननंतर ढगाळ वातावरण झाले. त्याचवेळी सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे पावसाची शक्यताही निर्माण झाली होती. त्याचवेळी जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे धुळीचे लोट तयार झाले. त्यामुळे अनेक वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे एस. टी. कॉलनी आणि लाइन बाजार येथील पद्मा पथक चौकातील वृक्ष उन्मळून पडले. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने वाहिन्या तुटल्या. त्यामुळे शहर आणि परिसरातील सुमारे चार तास वीजवाहिन्या खंडीत झाला.

दुपारी चारनंतर वादळी वाऱ्याला सुरुवात झाल्याने आणि पावसाची शक्यता निर्माण झाल्याने फेरीवाल्यांची चांगलीच पळापळ झाली. महाद्वार रोड, ताराबाई रोड व राजारामपुरी परिसरातील फेरीवाल्यांची सुरक्षित ठिकाणी साहित्य ठेवण्यासाठी धावपळ सुरू होती. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने खबरदारी म्हणून काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत केल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वाऱ्यांमुळे ज्याठिकाणी वीज वाहिन्यांवर फांद्या पडल्या त्या काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. रात्री उशीरार्पंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणच्यावतीने सुरू होते.


कसबा बावड्यात जोरदार पाऊस

दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊण तास जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या, शेतातील पत्र्यांचे शेड, विद्युत पोल उन्मळून पडले. अनेक ठिकाणी लावलेले डिजिटल फलक वादळामुळे पडले. चौगले पाणंद येथील जुने सिमेंटचे पोल पडले. लाईन बझार येथील हनुमान मंदिर जवळील झाड विद्युत पोलवर पडल्याने पोल अर्धवट वाकला. आंबेडकर नगर येथेही रिकाम्या जागेतील झाड पडले. पोवार पार्क येथील ३३ केव्ही लाईनचे गार्डिंग ११ केव्ही वर पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. कसबा बावडा परिसरात दोन तास वीजपुरवठा खंडीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चूक आयआरबीची, तोटा पालिकेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयआरबीने लक्ष्मीपुरीमध्ये दोन ठिकाणी केलेल्या गटारीच्या चुकीच्या कामाची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला तब्बल ४० लाख रुपये मोजावे लागणार आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असताना नाल्यांच्या सफाईकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच ठिकठिकाणी साठणाऱ्या पाण्यामुळे रहिवाशांना व व्यावसायिकांना होणाऱ्या त्रासावरून शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी आयआरबीच्या कामामुळे महापालिकेला खर्च करावा लागणार असल्याची बाब प्रशासनाने निदर्शनास आणून दिली. तसेच शहरात पाणी साठणारी २६ ठिकाणे असल्याचेही सांगितले.

दरम्यान, ई वॉर्डसाठी टाकण्यात आलेली नवीन पाइपलाइन पुढील आठवड्यात कार्यान्वित करण्यात येणार असल्याने ई वॉर्डमधील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

वळवानंतर लवकरच जोराचा पाऊस सुरू होईल, असे वातावरण आहे. परिस्थितीत शहरातील नाल्यांच्या सफाईकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याची बाब निलोफर आजरेकर यांनी बैठकीमध्ये मांडली. यामुळे डास प्रचंड वाढले आहेत. दुसरीकडे डिझेल, पेट्रोल नसल्याने धूर फवारणी होत नसल्याचे सांगत ‘मी पेट्रोल देते पण फवारणी करा,’ असे आजरेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर लक्ष्मीपुरीतील मुख्य रस्त्यावर गटार होऊनही अजूनही पाणी साठते हा प्रकार काय आहे, याची विचारणा केली. त्यावेळी प्रशासनाकडून आयआरबीने केलेल्या गटारीची पातळी योग्य नसल्याने पाणी वाहत नाही. त्यामुळे साठणारे पाणी काढण्यासाठी रिलायन्स मॉलसमोर व धान्य बाजार या ठिकाणी क्रॉसड्रेन करण्याची गरज असून त्यासाठी ४० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले.

घरफाळ्यासाठी मिळकतींचे सर्वेक्षणच्या कामासाठी नेमलेल्या सायबर टेक कंपनीचा करार मे महिन्यात संपत असून आतापर्यंत केवळ १८ हजार मिळकतींचा सर्वे पुर्ण झाला आहे. त्यांचे काम समाधानकारक नसल्याने दररोज एक हजार रुपये दंडाची आकारणी करण्याची नोटीस देण्यात आल्याचे प्रशासनाने सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले. नगरोत्थान योजनेतील फुलेवाडी रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात असून ३१ मे पर्यंत काम पुर्ण न झाल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई केली जाणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहासाठी कोट्यवधी खर्च करून जर तक्रारी येत असल्याचे आशिष ढवळे यांनी मांडले. तर इनर्ट मटेरियलच्या कामासाठी टेंडर भरलेल्या कंपनींपैकी पूजा कन्स्ट्रक्शनने यापूर्वी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केल्याने त्यांना महापा​लिकेचे कोणतेही काम देण्यात येऊ नये, अशा सूचना आयुक्तांनी दिल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images