Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नियोजन मंडळाची निवडणूक जुलैमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा नियोजन मंडळाच्या ४० जागांसाठी जुलै महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी मतदारांची यादी निश्चित झाली आहे. त्यावर हरकतींची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मतदारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर एक महिन्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान जुलैमध्येच होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका यांची नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर नियोजन मंडळाची निवडणूक होते. यासाठी मतदानही सभागृहातील सदस्यांमधूनच होते. कोल्हापूर जिल्ह्यात मंडळाच्या ४० जागा आहेत. त्यासाठी ही निवडणूक होणार आहे. यातही महिला राखीव, अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव जागा असणार आहेत. मंडळाची २०१३ मध्ये झालेली निवडणूक बिनविरोध झाली होती.

यंदाच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांत लोकप्रतिनिधींच्या सभागृहांमध्ये मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यातील मतदारांना हरकती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता ही यादी अंतिम झाली असून, ती राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारकडून अंतिम मंजुरी आल्यानंतरच उमेदवारी अर्ज भरणे, छाननी, माघार ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे त्यासाठी एकूण दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून प्रत्यक्ष जुलै महिन्यातच मतदान होणार आहे.


अंतिम मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासंदर्भात हरकती मागविल्या होत्या. केवळ एका मतदाराच्या नावातील बदलाला हरकत होती. मतदार यादी सरकारकडे पाठविल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

- सरिता यादव, जिल्हा नियोजन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीबीएसमध्ये चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गेल्या चार दिवसांत दोन महिलांच्या पर्समधील सुमारे चार लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. गर्दीचा फायदा घेऊन हातोहात किमती ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्याच या परिसरात सक्रिय असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह बंदोबस्तावरील पोलिसांनाही गुंगारा देऊन हातसफाई करणाऱ्या चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

सध्या सुट्ट्यांचा काळ सुरू असल्याने मध्यवर्ती बसस्थानकात मोठी गर्दी असते. त्याचा गैरफायदा उठवण्यासाठी चोरटे सक्रिय झाले आहेत. ९ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सुवर्णा सदाशिव निकम (वय ५५, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) बेळगावहून कोल्हापूर बसस्थानकात आल्या. घरी जाण्यासाठी समोरच असलेल्या केएमटीच्या बसस्टॉपवर गेल्या. काही वेळातच गर्दीतून त्यांच्या पर्समधील १४ हजार रुपये रोख आणि साडेचार तोळ्यांचे दागिने ठेवलेली छोटी पर्स गायब झाली. ११ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दया मच्छिंद्र कांबळे (३२, मूळ रा. निगवे खालसा, ता. करवीर, सध्या रा. बोरीवली, मुंबई) निगवे खालसा येथे जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पोहोचल्या. मुरगूड बसमध्ये बसतानाच अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील दागिन्यांचा डबा लांबवला. पर्सला हिसडा बसल्यानंतर कुणीतरी पर्स ओढत असल्याचे त्यांना जाणवले. मात्र, तोपर्यंत पर्समधील दागिन्यांचा डबा चोरट्यांनी पळवला होता. कांबळे यांनी शोधाशोध केली, पण चोरटे सापडले नाहीत.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात विशेषतः सायंकाळी गर्दी वाढते तेव्हा चोरटे सक्रिय होतात. प्रवाशांप्रमाणेच थांबलेले हे चोरटे गर्दीत शिरून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. सावज हेरून हातोहात किमती ऐवज लंपास करतात. काही क्षणात चोरलेला ऐवज बसस्थानकाच्या बाहेरही पोहोचतो. चोरी झाल्याचे प्रवाशांच्या लक्षातही येत नाही, इतक्या बेमालूमपणे चोरी करून चोरटे पसार होतात. विशेष म्हणजे चोरट्यांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही अंदाज घेतला आहे. कॅमेऱ्यांची दिशा ओळखून त्याच्या उलट दिशेला किंवा बसच्या आडाला चोरीच्या घटना घडत आहेत. दोन्ही चोऱ्यांमध्ये चोरटे सीसीटीव्हीत आढळले नाहीत, त्यामुळे पोलिस संभ्रमात आहेत. परिसरातील काही रेकॉर्डवरील चोरट्यांकडेही पोलिसांनी शोध घेतला. मात्र, या घटनांचा उलगडा होऊ शकला नाही. सुट्टीच्या काळात अशा घटना आणखी वाढण्याचा धोका असल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.


पोलिस चौकी रिकामीच

शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकात दिवसभरासाठी दोन पोलिसांची नियुक्ती केली आहे, तर सायंकाळी गर्दीच्या वेळात अन्य चार ते पाच पोलिस तैनात केले जातात. गर्दीच्या तुलनेत पोलिसांची ही संख्या अगदीच तोकडी असल्याने अपवादानेच पोलिस स्थानकातील चौकीत पाहायला मिळतात. चोरटे प्रवाशांप्रमाणेच वावरत असल्याने पोलिसांच्या नजरेस पडत नाहीत. किंबहुना पोलिसांनाही गुंगारा देऊन ते हातसफाई करीत आहेत.

===

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी बिट मार्शल आणि साध्या वेशातही काही पोलिसांची नियुक्ती केली आहे. चोरट्यांमध्ये महिलांचा समावेश असल्याचा संशय आहे. लवकरच चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करू.

प्रवीण चौगुले, पोलिस निरीक्षक, शाहूपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भादोलेत घरफोडी, ४२ तोळ्यांचे दागिने लंपास

0
0

म. टा. वृत्तसेवा,हातकणंगले

भादोले(ता.हातकणंगले)येथे शुक्रवारी मध्यरात्री बंगल्याची कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी तिजोरीमधील साडेअकरा लाखांचे सुमारे ४२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख साठ हजार रक्कम लंपास केली. पेठ वडगाव परिसरामध्ये भुरट्या चोरीचे प्रमाणात वाढले असताना आजच्या या मोठ्या घरफोडीने घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, भादोले येथील वाठार रोडवर विलास पाटील यांचा विठू-अनु निवास हा दोनमजली बंगला आहे. पत्नी, दोन मुले, सुना-नातवंडांसह ते वास्तव्यास आहेत. शुक्रवारी ते पत्नी व मुलगा घरात होते. मुलगा एका खोलीत तर त्यांचे आई-वडील पहिल्या मजल्यावर झोपण्यास गेले व त्यांनी बाहेरुन कुलूप लावले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या समोरील दाराची कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घराच्या दक्षिणेस असलेल्या खोलीतील तिजोरीच्या किल्या घेवून त्यात डब्यात ठेवलेले सोन्याचे गंठन, लक्ष्मी हार, दोन तोडे, जोड, पाटल्या दोन जोड, पिळ्याच्या अंगठ्या पाच,गोफ चेन, कड, कोल्हापुरी साज, तीनपदरी मोहन माळ, लहान मुलाच्या पाच अंगठ्या असे ११ लाख ५० हजारांचे ४२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख साठ हजार रक्कम घेतली यानंतर त्यांनी विलास पाटील यांचा मुलगा चेतन झोपलेल्या खोलीत प्रवेश करून त्याच्या खोलीची तपासणी करत त्याच्या पँटच्या खिशातील पाकिटही चोरून नेले. यामध्ये एटीएम कार्ड, लायसन्स, पैसे लंपास केले. पहाटे पाटील यांच्या पत्नी पहिल्या मजल्यावरुन खाली आल्यानंतर हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पेठ वडगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. ठसेतज्ज्ञांना व श्‍वानपथकास पाचारण करण्यात आले.अधिक तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हे करत आहेत.

पाटील कुटुंबाला धक्का

विलास पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या कष्टाने शेतात केळीचे पीक चांगले केले होते. केळीची विक्री करुन दोन लाख साठ हजार रुपये आले होते. ही रक्कम बँकेत ठेवण्याअगोदरच चोरट्यांनी त्यावर हात मारल्याने पाटील कुंटूबियांना मोठा धक्का बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलतसाठी सेनेचा रास्ता रोको

0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील दौलत संचलित न्युट्रीयन्स् कंपनीने शेतकऱ्यांची गेल्या हंगामातील उसाची बिले व कामगारांचे पगार दिले नसताना त्यांना ले-ऑफ नोटिसीच्या (कामबंदी) निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने आज हलकर्णी फाटा येथे सुमारे दोन तास रास्ता रोको केला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. बेळगाव-वेगुर्ला मार्गावर हलकर्णी फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार आर. टी. झाजरी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको करण्यात आला.

यावेळी देवणे म्हणाले, ‘कारखाना प्रशासनाने २० मे रोजी बिले देण्याचे जाहीर केले आहे. या तारखेला शेतकऱ्यांना बिले न मिळाल्यास २१ मे दांडके हातात घेणार. गोडाऊनमधील साखर ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना देऊ’

संग्राम कुपेकर म्हणाले,‘कामगारांनी जीवाचे रान करुन दौलत कारखाना पुन्हा नव्याने उभा केला आहे. याच कारखान्यातून कामगारांना ले-ऑफ देण्यात येत आहे. ले-ऑफ रद्द न झाल्यास प्रशासनाला मोठ्या आव्हाहनाला सामोरे जावे लागेल.’

प्रभाकर खांडेकर म्हणाले,‘ दौलत उभे करताना चंदगडच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रक्त आटले आहे. कामगारांचे संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. जर कामगारांना सामावून घेतले नाही व शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नाहीत. तर शिवसेना व तालुक्यातील जनता गप्प बसणार नाही.’ यावेळी ॲड. संतोष मळविकर, प्रा. सुनील शिंत्रे, दौलत कारखान्याचे कामगार प्रतिनिधी अर्जुन कुंभार, जे. जी. पाटील यांची भाषणे झाली. तालुका प्रमुख महादेव गावडे, भरमाना गावड़ा,संग्राम अडकूरकर ,संभाजी पाटील, अंकुश भोसले, जिल्हा महिला संघटक शांता जाधव, पिणू पाटील, एन. डी. कांबळे, रामू मोरे, राजू रेडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

फोटो ओळी: हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे शिवसेनेच्यावतीने दौलत संचलित न्युट्रीयन्स् कंपनीने शेतकऱ्यांची बिले व कामगारांचे पगार दिले नसल्याच्या निषेधार्थ बेळगाव-वेगुर्ला मार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकुर्डे परिसरावर भीतीचे सावट

0
0

म. टा. वृत्तसेवा,गारगोटी

भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे गव्यांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर या परिसरात भीतीचे सावट आहे. रविवारी शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळले. गव्यांचा वावर वाढल्याने शेतात जाण्यास येथील शेतकरी घाबरत आहेत. कालच्या घटनेचीच चर्चा गटागटाने होत असून त्यातील काही प्रत्यक्षदर्शी थरारक प्रसंग पुन्हा पुन्हा सांगत होते.

भुदरगड तालुक्यातील आकुर्डेत गव्याने केलेल्या हल्ल्यात शुक्रवारी तरुण शेतकरी आणि पत्रकार ठार झाले होते. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. अनेकांना या घटनेचा धक्का बसला. तर हकनाक बळी गेल्याने अनेकजण भीतीमुळे शेताकडेच गेले नाहीत. मशागतीचा काळ असूनही अनेकांनी घरीच राहणे पसंत केले. शेणगाव स्मशानभूमी जवळच जितेंद्र बाळासाहेब सदलगे व चेतन महावीर सदलगे यांचे अडीच एकर शेत आहे. हे शेत गावातील सामान्य शेतकरी भिकाजी कांबळे अनेक वर्षे करत आहेत. याच उसात सकाळी पावणेसात ते आठ वाजेपर्यंत लहान मोठ्या १६गव्यांनी धुडगूस घालून सुमारे एक ट्रक ऊस खावून, मोडून टाकला. लोकांच्या हुसकावण्याच्या प्रयत्नांत आणखी नुकसान झाले. या शेताच्या बाहेरील बाजूने तारेचे कुंपण असल्याने या वाढलेल्या उसात गव्याने फडातूनच चकरा मारल्या. सव्वा तासानंतर हे गवे बाहेर पडले. त्यामध्ये या उसाचे अतोनात नुकसान झाले. येथून गवे नदी काठाने पूढे सरकत राहिले. १६ गव्यापैकी ११ गव्यांनी नदी पार करून पुष्पनगर गावाच्या बाजूने किल्ले भुदरगड जंगलाच्या दिशेने प्रयाण केले. पाच गव्यात या कळपाचा नायक होता. हे पाचही गवे शेणगावच्या बाजूने नदीकाठाने तसेच पुढे आकुर्डेच्या शिवारात दाखल झाले होते. याच परिसरात दत्तात्रय बळवंत साळोखे यांच्याही दहा गुंठे उसाची गव्यांनी नासधूस केली.

दरम्यान शिवारात ऊसाचा पाला काढत असताना या गव्यांची समोरासमोर अचानक भेट झाल्याने अनिल पोवार यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये अनिल पोवार जागीच मयत झाले. त्यानंतर दुपारी पत्रकार रघुनाथ शिंदे यांच्यावर गव्याने हल्ला केला. यापुर्वी गुरुवारी शेणगाव येथे गव्यासंबंधी हालचालीचे जाणकार शेतकरी पांडुरंग रामचंद्र माने यांच्यावर अचानक उसात बसलेल्या गव्याने समोरून हल्ला केल्यानंतर त्याक्षणी त्यांनी मोठ्या शिताफीने स्वतःला सावरत गव्याचे शिंग पोटात न जाऊ देता ते दंडावर घेतले. त्यावेळी त्यांनी दिलेल्या जोरदार आवाजानंतर गव्याने त्यांना सोडले व तो आपल्या वाटेने मार्गस्थ झाला.

या साऱ्या घटनांची भयानकता पाहून शेतकऱ्यांनी शेतात जाणेच टाळले आहे. गव्यांच्या थरारक हल्ल्याप्रसंगी प्रत्यक्षदर्शी असलेल्या शेतकरी, युवकांच्यात आपल्याला पुनर्जन्म मिळाल्याची भावना आहे. काहींच्या पाच दहा फूट अंतरावरून गवा गेला. काही जण प्रसंगावधान म्हणूनच वाचले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजूंसाठी शैक्षणिक साहित्याचा पुनर्वापर

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काही मुलांना दरवर्षी शाळेचा नवा ड्रेस, वह्या, पुस्तके, पेन्सिल, छत्री, रेनकोट, सायकल आणि रंगही मिळतात, मात्र काही मुलांना या वस्तू मिळत नसल्याने त्यांचे शिक्षण थांबते. वापराविना पडून राहणारे असे साहित्य गरजूंना उपलब्ध झाले तर त्यांचीही शाळा सुरू राहील या हेतूने सावली फाउंडेशनने दुर्गम भागातील मुलांसाठी वापराविना पडून असलेल्या वस्तू देण्याचे आवाहन केले आहे. या वस्तू जिल्ह्यातील खेडोपाडी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना पुरवल्या जणार आहेत.

परीक्षांचे निकाल लागून आता सर्व बच्चेकंपनी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. महिन्याभरात पुन्हा शाळा सरू झाल्यानंतर नवा ड्रेस, नवे दफ्तर, छत्री, रेनकोट, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, रंगीत खडू हे सारे काही बच्चे कंपनीला मिळणार आहे. ज्या पालकांची आर्थिक क्षमता आहे त्यांच्याच मुलांना हे मिळेल, तर खेड्यापाड्यातील मुलांना मात्र या वस्तूंअभावी शिक्षण घेता येणार नाही. ही दरी मिटवण्यासाठी फाउंडेशनने जुन्या वापरण्यायोग्य शैक्षणिक वस्तू फाउंडेशनकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्या शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. लक्ष्मीपुरीतील नाटेकर सर्व्हिसेस, थोरात हॉस्पिलजवळ आणि श्री प्रोसेस वर्क्स, दलाल मार्केट, रिलायन्स मॉलच्या मागे या ठिकाणी इच्छूक मदत करू शकतात. शिवाय ७५०७१६०३०३ या मोबाइल नंबरवर संपर्क साधल्यास प्रत्यक्ष घरी येऊन साहित्य स्वीकारले जणार आहे, अशी माहिती सावली फाउंडेशनचे संस्थापक निखिल कोळी आणि अध्यक्ष निखिल पोतदार यांनी दिली. यावेळी सचिव अभिजित सूर्यवंशी, उपक्रम प्रमुख भूषण लाड, सूरज डांगे, शीतल शेटे, ऐश्वर्या मुनीश्वर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टी-सदाभाऊ संबंधात तणाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मळलेल्या वाटेवर चालणारा मी कार्यकर्ता नाही. मीही नवी वाट निर्माण करु शकतो, असे संकेत देतानाच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बगलबच्चे आणि हुजऱ्यांना लगाम घाला अन्यथा त्यांचा योग्यवेळी बंदोबस्त करु,’ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांना दिला. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात बोलताना सदाभाऊ आत्मक्लेश यात्रेत येणार नाहीत. त्यांचा विषय आमच्यादृष्टीने संपला आहे, असे वक्तव्य केले आहे. या दोघांच्या वक्तव्याने परस्परांतील संबंध ताणले असून, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.


माझीही वाट वेगळी

कोल्हापूर ः सदाभाऊ मळलेला वाटेवर चालणारा कार्यकर्ता नाही. वाट सदाभाऊला घेऊन जात नसते तर सदाभाऊ वाटेला घेऊन जात असतो. त्यामुळे भविष्यात काय होणार आहे, याची चिंता नाही, या शब्दांत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी सोशल मीडियावर माझ्यावर टीका-टिप्पणी करणाऱ्या बगलबच्च्यांना खासदार शेट्टी यांनी आवरावे, अन्यथा त्यांचा योग्यवेळी बंदोबस्त करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही दिला.

आमच्या मिशीला खरकटे लागले नाही. त्यामुळे आम्ही कुणावरही बोलू शकतो, अशी टीका शेट्टींनी केली होती. त्याबाबत विचारले असता खोत म्हणाले, ‘मी राजपुत्राच्या घरी जन्मलेलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लाठ्याकाठ्या खाऊन राजकारणात आलो आहे. आमच्या मिशीला खरकटे लागले आहे असे वाटत असेल तर त्यांनी नाकाला रुमाला लावावा.’

सदाभाऊंचा विषय संपला

पुणे ः दरम्यान, ‘राज्यमंत्री सदाभाऊ खोत आजारी असल्यामुळे ते आत्मक्लेश यात्रेत सहभागी होणार नाहीत. त्यांचा विषय आमच्यासाठी संपला आहे,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी स्पष्ट केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेले विधान निषेधार्ह आहे, अशी टीकाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

सदाभाऊंची तब्येत ठीक नसल्यामुळे ते यात्रेत सहभागी होणार नाहीत. चळवळीत अनेक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे खोत यांचा विषय माझ्यादृष्टीने संपलेला असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने येत्या २२ मे पासून आत्मक्लेश यात्रा काढण्यात येणार आहे. पुण्यात महात्मा फुले स्मारकापासून निघणारी ही यात्रा ३० मे रोजी राजभवनला पोहोचणार आहे. राज्यभरातून कर्जमाफीच्या मागणीसाठी जमा झालेल्या साहेसहा लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना देण्यात येणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

०००००००००

मागण्यांचा पाठपुरावा करणार

‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार काहीच पावले उचलत नाही. कर्जमुक्तीचा विषय निघाला, की मूळ मुद्दा बाजूला ठेवून भलतीच चर्चा सुरू करण्यात येते. अरुंधती भट्टाचार्य, उर्जित पटेल आणि अरविंद सुब्रह्मण्यम अशी मंडळी वेगवेगळी वक्तव्ये करतात. शेती तोट्यात असताना प्राप्तिकर लावण्याची भाषा कशी करता,’ असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यकर्ते गंभीर नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे आत्मक्लेश यात्रेद्वारे शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा साखरेचे जम्बो उत्पादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बाजारपेठेत मागणीमध्ये घट झाल्याने शिल्लक राहिलेली साखर आणि लागवडीखाली वाढलेल्या ऊसाच्या क्षेत्रामुळे कोल्हापूर विभागात आगामी गळीत हंगामात साखरेचा मुबलक साठा तयार होणार आहे. कोल्हापूर विभागात गेल्या हंगामातील एक कोटी ९० लाख क्विंटल शिल्लक आहे. यावर्षी झालेली ऊस पिकाची झालेली लागवड पाहता आगामी गळीत हंगामात सरासरी दोन कोटी क्विंटल साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांचा आहे. मात्र, पुढील चार महिन्यात साखरेचा दर आणि मागणीतील असमोतल कायम राहिलास नेहमीप्रमाणे उसदराचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यापासून दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या उपशावर निर्बंध घालण्यात आले होते. त्याचा परिणाम कोल्हापूर विभागातील सर्वच साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर झाला. उसाच्या लागवडीखालील क्षेत्र घटल्याने पर्यायाने साखर उत्पादनावर परिणाम झाला. तरीही कोल्हापूर विभागात एक कोटी ९० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. आता ३० एप्रिलअखेर यातील फक्त २५ लाख क्विंटल साखरेची विक्री झाली आहे. त्यामुळे सरत्या हंगामातील तब्बल एक कोटी ६५ लाख क्विंटल साखर शिल्लक आहे.

साखरेला जास्त दर मिळावा याची प्रतीक्षा असल्याने सर्वच साखर कारखान्यांनी आपल्याकडील साखर बाजारपेठेत विक्रीस आणलेली नाही. त्याशिवाय केंद्र सरकारने साखर साठ्यावर निर्बंध आणले. बाजारात मागणी असताना थेट कारखान्यांनी साखर विक्री केली. मात्र, नंतर अधिक दर मिळेल या अपेक्षेने कारखान्यांनी साखर रोखून धरली. त्याचवेळी उत्तर प्रदेश येथील साखर मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागल्याने दरावर परिणाम झाला. त्यामुळे साखरेचा दर ४४०० वरून ३८०० रुपयांपर्यंत कमी आला. कोल्हापूर विभागात उत्पादीत झालेली साखर प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल आणि इशान्येकडील राज्यांमध्ये पाठवली जाते. या हक्काच्या बाजारपेठेत उत्तर प्रदेशमधील साखर दाखल झाल्याने कारखान्यांच्या उलाढालीवर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या हंगामातील १ कोटी ९० लाख क्विंटल साखर शिल्लक आहे.

आगामी २०१७-१८ हंगामासाठी कोल्हापूर विभागात २ लाख १० हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. विभागाचा सरासरी उतारा ११.५ ते १२ टक्के गृहीत धरल्यास पुढील हंगामात किमान २ कोटी ७ लाख क्विंटल साखर तयार होण्याची अपेक्षा साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखर साठा मुबकल होणार आहे. साखरेच्या दरात उच्चांकी वाढ झाल्याने एफआरपीपेक्षा अधिक दराची शेतकऱ्यांची मागणी होती. शेतकरी संघटनेनेही साखर दराचा मुद्दा पुढे करत जादा दर मागितला. मात्र सध्या बाजारातील दर घसरल्याने आणि पुन्हा नव्याने साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता असल्याने पुढील हंगामात नेहमीप्रमाणे उसदरावरुन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.


उत्तर प्रदेशमधील साखरेच्या बाजारपेठेतील आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर घसरले आहेत. त्यातच साखर आयातही केली जात आहे. उत्तर प्रदेशमधील साखर संपल्यानंतर पुन्हा मागणीमध्ये वाढ होईल. बाजारातील साखरेची मागणी, पुरवठ्यावर साखरेचे दर ठरावेत. त्यासाठी वेगळी स्टॅटर्जी वापरू नये.

पी. जी. मेढे, मानद सल्लागार, राजाराम कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षसंवर्धनासाठी व्यापक सहभाग हवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पावसळ्यात शास्त्रीय पद्धतीने रानभाज्या, वनौषधी वनस्पतींची लागवड करुन संवर्धन करावे. त्यासाठी लोकसहभागातून ही चळचळ अधिक व्यापक करावी’, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले. निसर्गमित्र संस्थेच्यावतीने साइक्स एक्स्टेंशन येथील दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय परिसरात दोन दिवसीय रानभाज्या, वनौषधी लागवड व संवर्धन कार्यशाळा झाली. २२ एप्रिल रोजी केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण जिल्ह्यात ४ लाख बिया जमा झाल्या. दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये रानभाज्या आणि वनौषधी संवर्धन, लागवडीचे प्रशिक्षण दिल्यानंतर सहभागी झालेल्या ५० हून अधिक लोकांना बियांचे वाटप करण्यात आले.

कार्यशाळेमध्ये बीजारोपण कसे करावे, रोपवाटिका याची शास्त्रीय माहिती, घरगुती कचऱ्यापासून सेंद्रीय व बायोगॅसनिर्मिती, घरगुती सांडपाण्याचा पुर्नवापर, दैनंदिन वापरासाठी आरोग्यदायी अशा मातीच्या उपकरणांची ओळख, घरगुती वापरासाठी सौरकंदील व सौरचूल तयार करणे, तसेच शेतीमाल वाळविण्यासाठी सोपे, सौर वाळवण यंत्रणांची ओळख, वनस्पतीजन्य खाद्यरंग तयार करणे, प्लास्टिक पिशवीला पर्यावरणपूरक पर्यायांची निर्मिती या विषयांवर पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, निसर्गमित्रचे कार्यवाहक अनिल चौगुले यांनी मार्गदर्शन केले.

जमा झालेल्या घेटूळी, वाघाटी, केना, आघाडा, तांदळी, वायवर्णा, चांगेरी, भारंगी, टाकाळा, काटेमाठ, राजगिरा, कुरडू, रानउडीद, घोळ, भोकर, गुळवेल आदी रानभाज्यांची लागवड परसबागेत, टेरेसवर करुन संवर्धन करण्याचे आवाहन निसर्ग मित्रच्या वतीने करण्यात आले. दोन दिवसीय कार्यशाळेत ५० हून अधिक युवक, महिला, शेतकरी, पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतरण तलाव झाले हाउसफुल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला शिकण्यासह मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी शहरातील पाच जलतरण तलावावर तुडुंब गर्दी होऊ लागली. या जलतरण तलावांच्या सर्व बॅचेस हाऊसफुल असून त्यासह रंकाळा तलाव, रंकाळा खणीसह पंचगंगा नदीवरही पोहण्यासाठी गर्दी होत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला शिकवण्यासाठी पूर्वी नदी, विहीरी, तलावावर गर्दी व्हायची. मात्र नंतरच्या काळात जलतरण तलाव विकसित झाले. कोल्हापूर शहरात महानगरपालिकेसह, सरकारी आणि खासगी संस्थांचे जलतरण तलाव उपलब्ध आहेत. महानगरपालिकेचे रंकाळा तलावावर अंबाई, रमणमळा, टाकाळा राजर्षी शाहू जलतरण तलाव, पिराजीराव घाटगे फिजिकल एज्युकेशन ट्रस्टचा भवानी तलाव, शाहू कॉलेजचा सागर पाटील जलतरण तलाव येथे पोहायला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. उन्हाळ्यात सुट्टी असल्याने लहान मुलांना पोहायला शिकवले जाते. त्यासाठी जलतरण तलावात प्रशिक्षक उपलब्ध आहेत. पोहायला शिकणाऱ्यांची तलावावर सुरक्षा रक्षकांकडून काळजी घेतली जाते. पोहताना काही धोका होऊ नये यासाठी नवशिक्या मुलांच्या पाठीवर फायबरचे ड्रम बांधले जातात. तर तलावावर पोहणारी मंडळी रबरी ट्यूब, पॅकबंद पत्र्याचे डबे वापरतात.

सकाळी सहाच्या ठोक्याला जलतरण तलाव सुरू होतात. ४५​ मिनिटांची एक बॅच असते. सकाळी सहा ते ते दहा वाजेपर्यंत तर दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोहण्यासाठी बॅचेस उपलब्ध आहेत. प्रत्येक बॅचसाठी २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत तिकीटे आहेत. महिनाभर नियमित पोहायला येणाऱ्यांसाठी ४०० ते २००० रुपये शुल्क पाससाठी आहे. महिलांसाठी स्वतंत्र बॅच उपलब्ध आहेत. सध्या गर्दी जास्त असल्याने प्रशिक्षक व जीवरक्षकांना लक्ष ठेवावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवानी मंडपात घुसला ट्रक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने एक हातगाडी, मोटारीसह दुचाकीला धडक देत ट्रक (एमएच ५० - ४४३२) चक्क भवानी मंडपातच घुसवला. ऐतिहासिक भवानी मंडपातील कमानीला आदळून ट्रक थांबल्याने अनर्थ टळला. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. रोहिदास रामा बारगजे (रा. नागोबाची वाडी, जामखेड जि. अहमदनगर) असे ट्रकचालकाचे नाव आहे. या चालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनी ट्रक कमानीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकारात तिघे जखमी झाले.

चालक बारगजे हा इंदापूर तालुक्यातील भिवगण येथील ट्रकमधून ज्वारी घेऊन रविवारी सकाळी कोल्हापुरात आला होता. तेथून तो मुंबईला जाणार होता. मात्र, रात्री प्रचंड मद्य प्यायलेला बारगजे हा ट्रक घेऊन व्हीनस कॉर्नरवरून कोंडा ओळ रस्त्यावर आला. तेथे एका हातगाडीला आणि त्यानंतर एका मोटारीला त्या धडक दिली. या प्रकारानंतर संतप्त जमावाने त्याचा पाठलाग केला. त्यानंतर ट्रक भरधाव वेगाने स्वयंभू गणेश मंदिरमार्गे ट्रक शिवाजी चौकात आला. भवानी मंडपात अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. मात्र, बॅरिकेट नसल्याने ट्रकचालकाला याची कल्पनाच नव्हती. त्याने भवानी मंडपाच्या कमानीतून ट्रक आत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमानीला ट्रक धडकला. अपघाताच्या आवाजाने पर्यटकांची धावपळ उडाली. ट्रक अडकल्यानंतर नागरिकांनी त्याला ताब्यात घेऊन चोप दिला. त्यानंतर चालक बारगजे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अपघातात जखमी तिघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकलाकारांना प्रियदर्शनचा कानमंत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर थिएटर्स आणि फिनिक्स क्रिएशन्स यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेत अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेत नाट्य आणि चित्रपट अभिनेता प्रियदर्शन जाधव याने सहभागी बालकलाकारांना अभिनयाचा कानमंत्र दिला. यावेळी कोल्हापुरातील या मुलांसोबत एकांकिका सादर करणार असल्याचा मानसही त्याने व्यक्त केला.

यावेळी ६० बालकलाकार सहभागी झाले आहेत. या शिबिरात ‘टाइमपास टू’ या चित्रपटाला दगडूची भूमिका केलेल्या आणि सध्या ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकेत बोक्याची भूमिका लोकप्रिय करणाऱ्या प्रियदर्शन जाधवने तीन तास नाटक आणि चित्रपटात काम करण्यासाठी कशी तयारी करावी लागते याचे प्रात्यक्षिक शिबिरार्थींकडून करवून घेतले. अभिनयाशी संबंधित खेळ आणि संवादाची जादू तसेच मूकाभिनयाचे महत्व याचे साभिनय सादरीकरण त्याने केले. यावेळी बालकलाकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्याने दिली. कोल्हापूर थिएटर्समार्फत दर सहा महिन्याला अशाप्रकारच्या अभिनय कार्यशाळा व्हाव्यात अशी अपेक्षाही प्रियदर्शनने यावेळी व्यक्त केली.

‘आताची लहान पिढी अतिशय गुणग्राहक आहे, तुम्ही त्यांना जेवढे द्याल, तेवढी ती स्वीकारते, मात्र त्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन दिले पाहिजे’, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कोल्हापूर थिएटर्समार्फत दरवर्षी होणाऱ्या कार्यशाळेत आपण दोन दिवस सहभागी होउन मार्गदर्शन करू असेही जाधव यांनी सांगितले. शिबिरात सहभागी झालेल्या निवडक कलाकारांसोबत एकांकिका बसवून ती राज्यभर सादर करण्याचा मानस यावेळी प्रियदर्शनने व्यक्त केला. नृत्यदिग्दर्शक दीपक बिडकर, संतोष मोहिते, राजश्री खटावकर, स्वप्निल राजशेखर, भरत दैनी, संजय हळदीकर, प्रदीप शिगवण यांनी मार्गदर्शन केले. याचे संयोजन शिल्पा माजगावकर, विजय टिपुगडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्यासाठी एकात्मिक आराखडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील प्रमुख आकर्षण असणाऱ्या ऐतिहासिक रंकाळा तलावाबरोबरच त्या परिसरातील हेरिटेज वास्तू, विविध खणी, पोहण्याचा तलाव, उद्याने यांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. ​अभिजित चौधरी यांनी दिले. आयुक्तांनी रविवारी पाच तास पूर्ण रंकाळा तलावासह परिसराची चालत ​पाहणी केली. जलतरण तलावावर योग्य सुविधा देण्याची सूचना करत आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले.

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. चौधरी यांनी रंकाळा तलावाची प्रथमच पाहणी केली. रंकाळ्याला भेडसावणारा सांडपाण्याचा प्रश्न, त्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, रंकाळा टॉवर, संध्यामठ, धुण्याच्या चावी यांसारख्या हेरिटेज वास्तू, रंकाळ्याच्या सभोवती असलेल्या खणी, पाण्याची स्थिती, अंबाई टँक, पदपथ आणि पद्माराजे उद्यान, पक्षी निरीक्षण केंद्र अशा विविध ठिकाणांची स्थिती पाहून समस्यांची माहिती घेतली.

शहराच्या मध्यवस्तीतील रंकाळा तलाव हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. मात्र, दहा वर्षांपासून तलावाला भेडसावणाऱ्या सांडपाण्याच्या प्रश्नांमुळे तलावाचे सौंदर्य लोप पावले होते. गेल्या काही वर्षांपासून त्याच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. चौधरी यांनी रविवारी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली. ‘तलाव परिसरात विकासकामे करण्यास भरपूर वाव आहे. ही कामे एकमेकांना पूरक ठरू शकतात. त्यामुळे याचा एकात्मिक विकास आराखडा बनवून सादर करण्यात यावा’, असा आदेश डॉ. चौधरी यांनी शहर अभियंता सरनोबत यांना दिला. त्यातील काही कामांचे आराखडे तयार आहेत. काही ठिकाणचे नवीन आराखडे तयार करून ​पुढील विकासकामांची दिशा ठरवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘युनिटी’ ला कारणे दाखवा नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइनचे काम तातडीने व दर्जेदार करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ठोस पावले उचलण्यात येणार असून कामांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील निवृत्त अभियंत्याची नेमणूक केली जाणार आहे. मंगळवारी झालेल्या पाहणीदरम्यान अनुपस्थित राहिल्याबद्दल युनिटी कन्सल्टंटच्या वरिष्ठांना कारणे दाखवा नोटीस काढण्याबरोबरच त्यांच्या प्रमुखांना बैठकीसाठी तातडीने हजर राहण्याचा आदेश आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.
दरम्यान, महापौर हसीना फरास यांनी कंत्राटदार कमी मनुष्यबळ वापरत असल्याने कामाला गती येत नसल्याचे सांगत यापूर्वीच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. तसेच आतापर्यंत चुकीचे काम केले असले तरी सभागृह कुणाचीही गय करणार नाही, असा इशाराही दिला.
पाच ठिकाणच्या गावातील प्रश्नावर तोडगा निघालेला नसल्याने तिथे काम ठप्प आहे. कन्सल्टंटकडून ज्या पद्धतीने देखरेख हवी होती, त्याबाबत दुर्लक्ष झाले असल्याने कामाच्या दर्जाबाबत होत असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर पाहणी केल्यानंतर आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, २४ किलोमीटरची पाइप टाकली आहे. उर्वरित पाइपलाइनसाठी ग्रामस्थांशी चर्चा करण्यात येईल. पाटबंधारेच्या परवानगीचा प्रश्न सोडवण्यासाठी सचिवांशी चर्चा कणार आहे. इतर कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला पत्र देण्यात येणार आहे. कन्सल्टंटकडून देखभाल अपेक्षित आहे. पण महापालिकेच्यावतीनेही कामावर लक्ष ठेवण्यासाठी दर पाच किलोमीटरला एक अशा प्रकारे जीवन प्राधिकरणकडील काही निवृत्त अधिकारी नेमता येतील का याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. काम गतीने होण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ वापरण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात येणार आहेत. पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत ज्या शंका उपस्थित केल्या जात होत्या, ​तसे काही दिसत नाही.

महापौर फरास यांनी मात्र कंत्राटदाराचे मनुष्यबळ कमी असल्याने कामाला गती नाही. पूर्वी झालेल्या कामाच्या दर्जाबाबत साशंकता आहे. ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर चर्चा करण्यात येणार आहे, असे सांगितले.

केवळ दीड महिना काम

या हंगामात १७ मार्चपासून काम सुरु केले आहे. पाटबंधारे विभागाची परवानगी अद्याप नसल्याने सध्या केवळ अडीच किलोमीटरची पाइपलाइन टाकण्याचे काम हाती आहे. कॉपर डॅम बांधून तसेच त्यातील पाण्याचा उपसा सातत्याने करुनही पाणी कमी होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात जॅकवेलच्या कामाच्या ठिकाणी काय परिस्थिती होईल हे सांगता येणार नाही, असे कंत्राटदार कंपनी ‘जीकेसी’ चे प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र माळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणुकीच्या वादातून पाचगाव (ता. करवीर) येथे विक्रम राजाराम शिंदे (वय २८ रा. पाचगाव) या बांधकाम व्यावसायिकावर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कोयत्याने हल्ला केला. शिंदे यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले असून त्यांच्या नातेवाईकांसह समर्थकांनी सीपीआर परिसरात मोठी गर्दी केली होती.

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी रात्री पाचगावात समीर जाधव, शुभम पवार या दोघा कार्यकर्त्यांचा वाढदिवस होता. दोघांच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्यासाठी विक्रम शिंदे सायंकाळी घराबाहेर पडले. सुरवातीला त्यांनी शुभम पवार यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विक्रम शिंदे हे समीर जाधव यांच्या वाढदिवसाला मोटारसायकलवरुन जात असताना विनय पंडीत पाटील याने पाठीमागून विक्रम यांच्यावर कोयत्याने वार केला. त्याचा एक वार डोक्यात बसला तर दुसरा वार हातावर बसला. हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर विनय पाटील पळून गेला. विक्रमला त्याच्या मित्रांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक असून यास विक्रम शिंदे इच्छुक आहे. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला असा शिंदे यांच्या मित्रांनी आरोप केला. पंधरा दिवसापूर्वी विनय पाटील हा दारु पिवून दंगा करत असताना विक्रम शिंदे यांनी त्याला अटकाव केला होता. त्याचा राग मनात धरुन विनय पाटीने हल्ला केला असावा असे शिंदे यांच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. सीपीआर हॉस्पिटलमध्ये शिंदे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. करवीर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घनवट, कांबळेंचा जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणेतील सव्वानऊ कोटी रुपयावर डल्ला मारणाऱ्या गुन्ह्यातील संशयित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि पोलिस नाईक कुलदीप कांबळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस.एम. कोच्चे यांनी फेटाळला. यापूर्वी या गुन्ह्यातील चार पोलिसांचे अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले आहेत.

वारणेतील शिक्षक कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये मार्च २०१६ मध्ये मैनुद्दीन मुल्ला याने सव्वातीन कोटी रुपये चोरले होते. गुन्ह्याचा तपास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केला आहे. तपास करताना सांगली पोलिसांनी फ्लॅटमधील सव्वानऊ कोटी रुपयावर डल्ला मारल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी सव्वानऊ कोटी रुपये चोरल्याप्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन निरीक्षक घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्याविरोधात कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा गुन्हा सीआयडीकडे हस्तांतरित केला आहे.

या गुन्ह्यातील अटक वाचवण्यासाठी संशयित घनवट व कांबळे यांनी जिल्हा कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी दिवसभर सरकारी वकील विवेक शुक्ल व संशयितांच्या वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले. मंगळवारी दुपारी न्यायाधीश कोच्चे यांनी दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. कोर्टाने अर्ज फेटाळताना या गुन्ह्याचा तपास अपुरा असून हे गंभीर प्रकरण असल्याचे म्हटले आहे. चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी चोरीच्या पैशावर डल्ला मारणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. गंभीर गुन्ह्यात पोलिस आरोपी असल्याने त्यांना सहानुभूती दाखवणे योग्य होणार नाही. ते पैसे कुणाचे, कुठून आले, प्राप्तीकर भरला होता की नाही, हे पाहण्याची आता वेळ आली आहे. पोलिसांना गुन्ह्याचा तपास करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. संशयितांनी चोरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून त्यांनी रकमेची गुंतवणूक कुठे केली याचा तपास करुन चोरीला गेलेली रक्कम परत मिळवायला पाहिजे. सध्याची परिस्थिती संशयितांना जामीन देण्यासारखी नाही, असे निकालपत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरचार्जमुळे पेट्रोल दोन रूपयांनी महाग

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कच्च्या तेलाच्या किमतीच्या दरात चढउतार झाल्याने पेट्रोलचे दर कमी झाल्याचा आनंद एका दिवसापुरताच मर्यादित राहिला. कारण राज्य सरकारने पेट्रोलवर दोन रूपये सरचार्ज लावल्याने पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ७५ रूपये ९१ पैसे झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच या दराची अंमलबजावणी करण्यात आली. पेट्रोलवर ११ रूपये सरचार्ज लावण्यात आला आहे.

एका महिन्यापूर्वी सरकारने पेट्रोलवरील सरचार्ज ६ रूपयांवरून ९ रूपये केला होता. यामध्ये २ रूपये वाढल्याने तो ११ रूपये झाला. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. सरकारने सोमवारी पेट्रोल दोन रूपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा केली होती. मात्र अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी मंगळवारी पेट्रोलवर सरचार्ज लावण्याचे नोटिफिकेशन जाहीर केले. त्यामुळे ७३ रूपये ९१ पैसे असलेला प्रति लिटरचा दर ७५ रूपये ९१ पैसे झाला. कच्च्या पेट्रोलची किंमत २१ रुपये, ६७ पैसै आणि प्रक्रिया शुल्क ३ रुपये ५९ पैसे आहे. दोन्ही मिळून २५ रुपये २६ पैसे पेट्रोलची किंमत होते. या किंमतीत राज्य सरकारकडून अनेक प्रकाराचे अधिभार लावले जात आहेत. दुष्काळ कर म्हणून ३ रुपये आणि अधिभार म्हणून ३ रुपये यापूर्वी आकारला जात होता. हा अधिभार सहा रूपयांवरून नऊ रूपये आणि आता एकूण सरचार्ज झाला आहे. पेट्रोलवर केंद्राकडून आकारण्यात येणारे सीमा शुल्क २१ रुपये ४८ पैसे आहे. त्यासह राज्य सरकारकडून १३ रुपये (२५ टक्के) कर आकारला जातो. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत पेट्रोलचे दर आपल्याकडे महागच राहतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’ नसलेली रेशनकार्ड बोगस

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘ज्या कुटुंबातील एकही लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक नसेल, अशा कार्डावर यापुढे रेशनचे धान्य दिले जाणार नाही. १ जूनपासून हा निर्णय अंमलात येणार आहे’ अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात ईपीडीएस या प्रणाली अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपुर्ण संगणीकीकरण झाल्याचे आगवणे यांनी सांगितले.

जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे म्हणाले, ‘ईपीडीएस प्रणालीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. यात सर्व रेशन कार्डधारकांचा तपशील नोंदवला आहे. संपूर्ण आधार लिंक झाले आहे. आता यासंदर्भात अधिसूचना आली आहे. त्यानुसार कुटुंबातील एखाद-दुसऱ्या व्यक्तीचे वृद्ध किंवा लहान मुलांचे लिंकिंग झाले नसेल, तर त्याचा काही परिणाम होणार नाही. पण, एखाद्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचे आधार लिंकिंग झाले नसेल, तर संबंधित रेशनकार्ड हे बोगस ठरविले जाणार आहे. त्यावरील सर्व लाभ बंद होणार आहेत. ’

सध्या आधार कार्डातील ओळख पटविण्यात ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी येत आहेत. अशा कार्डावर धान्य दिले जात असले तरी तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी सॉप्टवेअरमध्ये लवकरच दुरुस्ती केली जाणार असल्याचेही आगवणे यांनी सांगितले.

थेट खात्यातून रक्कम जाणार

पीओएस मशिनमध्ये आणखी सुधारणा होणार असल्याचे आगवणे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘रेशनवरून धान्य घेणाऱ्या कार्डधारकाने एकदा अंगठा दिल्यानंतर धान्य खरेदी होते. त्यानंतर त्याने दुसऱ्यांदा मशीनवर अंगठा दिल्यास, त्याच्या बँक खात्यातून धान्याचे बिल थेट दुकानदाराच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण रेशनिंग व्यवस्था कॅशलेस होण्यास मदत होईल. कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त झाल्यामुळे सुमारे साडेतीन कोटी रुपयांची बचत झाली. त्याचप्रमाणे या कॅशलेस प्रणालीमुळे धान्याचा काळाबाजार थांबणार आहे. त्यातून, सरकारची मोठी बचत होणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिक विकास आराखड्यातील त्रुटींबाबत आर्किटेक्ट असो. आक्रमक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रादेशिक विकास आराखड्यामधील त्रुटी दुरुस्तीचे नकाशे उपलब्ध होत नाहीत. माहिती हेतूपरस्पर लपविली जात आहे. त्रुटी तशाच ठेवून घाईगडबडीने आराखडा मंजूर केला तर तो शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने घातक ठरेल. आराखड्यातील त्रूटी दूर केल्या नाहीत तर लोकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्स असोसिएशनच्या बैठकीत देण्यात आला. विकास आराखड्याला विरोध नाही, पण आराखडा दोषरहित असावा अशी आक्रमक भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली.

कोल्हापूर प्रादेशिक विकास आराखडा संदर्भात असोसिएशनच्या कार्यालयात बैठक झाली. असोसिएशनची संलग्न विविध तालुक्यातील संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. असोसिएशनमार्फत गुरुवारी (ता.१८) पुणे येथील नगररचना विभागाच्या संचालकांसमोर कोल्हापूर प्रादेशिक विकास आराखड्यातील त्रुटी संदर्भात सादरीकरण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आर्किटेक्टस असोसिएशनची मंगळवारी बैठक झाली. प्रादेशिक विकास आराखड्यासंदर्भात सुमारे ५००० हरकती नोंदविल्या आहेत.

आराखड्यातील त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी असोसिएशन प्रयत्नशील असल्याचे नमूद करुन अध्यक्ष राऊत म्हणाले, ‘प्रादेशिक विकास योजना प्रत्यक्षात राबवत असताना शाखा कार्यालय व अभियंत्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. असोसिएशने हरकतीवेळी मांडलेल्या मुद्यावरील शिफारशी व आराखड्यामधील त्रुटी दुरुस्तीचे नकाशे मागूनही मिळत नाहीत. प्रादेशिक विकास योजनेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकात दिसून येत नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘नगर विकास विभाग व नगर रचना संचालकांनी तत्काळ दखल घेत आराखड्यामधील त्रुटीची शहानिशा करावी व जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार व्हावे. त्रुटी दूर करण्यात टाळाटाळ केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

चर्चेत असोसिएशनचे रवी पाटील, प्रादेशिक योजना अभ्यास समितीचे अतुल शिंदे, सचिन चव्हाण, बाजीराव भोसले, शैलेंद्र कावणेकर (गडहिंग्लज) , संदीप उलपे (हुपरी), के. पी. पाटील (इंगळी), अजित मरसुले (इचलकरंजी) यांनी मते मांडली.

…………

सरकारी खात्यात समन्वयाचा अभाव

प्रादेशिक योजना नगररचना उपसंचालक कार्यालय व सहायक संचालक कार्यालयात समन्वय नाही. विकास आराखड्यातील त्रुटीत काय दुरुस्त्या केल्या त्या पाहायला मिळत नाहीत. माहिती अधिकाराखाली अर्ज करुनही माहिती उपलब्ध होत नाही. आराखड्यात दहा टक्के त्रुटी असतील तर ते नागरिकांना पाठपुरावा करुन दुरुस्त करणे शक्य आहे. मात्र ​आराखड्यात ६५ टक्के त्रुटी असल्याने दुरुस्त करणे अवघड आहे. यामुळे आराखड्याला मंजुरी देण्यापूर्वी त्रुटी दूर व्हायला पाहिजेत. प्रादेशिक योजना नगररचना उपसंचालक एम. आर. खान यांच्याकडून योग्य माहिती मिळत नाही, असा सूर बैठकीत उमटला.

............

प्रादेशिक विकास आराखडा संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाशी निगडीत आहे. आराखड्यात अनेक त्रुटी आहेत. नागरिक व लोकप्रतिनिधींनी आराखड्याचे नियो​जन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विकास आराखडा मंजुरीपूर्वी त्रुटी दूर व्हायला पाहिजेत.

आर्किटेक्ट संदीप घाटगे

................

आराखडा म्हणून कव्हरिंग लेटर पाठविण्याचा प्रताप

प्रादेशिक नियामक मंडळाची २८ मार्चला बैठक होऊन आराखडा सरकारकडे सादर करण्यासाठी मंजुरी दिली. आमदार व नागरिकांनी नोंदविलेल्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांनी आराखड्याला मंजुरी देण्यापूर्वी त्या दुरुस्त केली जातील अशी ग्वाही दिली. दोन दिवसांत त्रुटी दुरुस्त करण्याच्या अटीवर आराखड्याला मंजुरी व ३१ मार्चपर्यंत सरकारला सादर करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्यक्षात २४ एप्रिलपर्यत कव्हरिंग लेटर(आराखडा प्रस्ताव कागद) व्यतिरिक्त कोणताही नकाशा, शिफारसी सरकारकडे पोहचल्या नाहीत अशी माहिती सरकारकडून उपलब्ध झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय समितीकडून उणिवांवर बोट

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरेच्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाची दखल घेत मंगळवारी सांगलीत दाखल झालेल्या केंद्रीय कमिटीने सांगली जिल्हा आरोग्य यंत्रणेची आणि जिल्हा प्रशासनाची झाडाझडती सुरू केली आहे. जिल्हा रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत म्हैसाळ प्रकरणाच्या आजवरच्या तपासाचा आढावा समितीसमोर ठेवण्यात आला. परंतु, समिती तपासावर समाधानी नसल्याचे समोर येत आहे. तपासातील नेमक्या उणीवांवरही समितीने बोट ठेवल्याचे समजते. बुधवारी समिती म्हैसाळमध्ये जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील उपायुक्त डॉ. सुषमा दुरेजा यांच्या अध्यक्षतेखाली सहायक आयुक्त डॉ. वीणा धवन, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे आणि डॉ. जिग्नेश ठक्कर यांच्या समितीने पहिली बैठक शासकीय रुग्णालयात घेतली. शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपाताचा अधिकार या विषयीचा जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने आतापर्यंत जिल्ह्यातील किती सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी केली. वर्षात सोनोग्राफी सेंटर्सना परवानगी मागणारे किती अर्ज आले, त्यापैकी कितीजणांना परवानगी दिली, म्हैसाळ प्रकरणाआधी बैठक झाली होती का? अशी माहिती घेतली जात असताना काही जुने रेकॉर्डच उपलब्ध नसल्याची बाब समोर आल्याची चर्चा आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे, डॉ. संजय साळुंखे, पोलिस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे आदी उपस्थित होते. म्हैसाळ प्रकरणात परराज्यातीलही डॉक्टर आहेत. ते इंडीयन मेडीकल असोसिएशनचे सदस्य आहेत. अशा डॉक्टरांचे डॉ. खिद्रापुरेच्या बेकायदेशीर गर्भपातप्रकरणाशी संबंध असतील तर त्यांची कसून चौकशी होणे आवश्यक आहे. स्थानिक डॉक्टरांचा संबंध असेल तर त्यांचीही चौकशी करताना डॉ. खिद्रापुरे आणि संबंधित डॉक्टरांमधील फोन कॉल्ससारखे पुरावे आवश्यक असल्याचे मतही समितीने नोंदविल्याचे समजते. डॉ. खिद्रापुरेला कुरिअरच्या माध्यमातून औषधांचा पुरवठा होत असल्याचेही समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images