Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जीएसटी शंका निरसनासाठी कक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘करदात्यांचे रद्द करण्यात आलेल्या क्रमांकाचे दोन दिवसांत पुर्ननोंदणी केली जाईल. विक्रीकर भवनात दर सोमवारी सायंकाळी चार ते सहा या वेळेत जीएसटीचे मार्गदर्शन केले जाणार आहे. व्यापाऱ्यांचे परिपूर्ण शंका-समाधान होईपर्यंत मार्गदर्शन कक्ष सुरूच ठेवला जाईल’, अशी ग्वाही विक्रीकर विभागाचे सहआयुक्त विलास इंदलकर यांनी दिली. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज, विक्रीकर विभागातर्फे संलग्न व्यापारी, औद्योगिक संघटना यांच्या सहकार्याने वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) संदर्भात आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात चर्चासत्र झाले.

सहआयुक्त विलास इंदलकर म्हणाले, ‘विभागाने विविध कारणांनी दहा हजार नोंदणी रद्द केल्या आहेत. यापैकी ३०० करदात्यांनी नोंदणी क्रमांकही २४ तासांत फेरनोंदणी केले जातील. एक जुलैपासून जीएसटी ही एकच सोपी आणि सुटसुटीत करप्रणाली लागू होणार आहे. या करप्रणालीमुळे सोळा कायदे संपणार आहेत. व्यापाऱ्यांना मिळणारा परतावा, इन्फोटॅक्स क्रेडिटच्या (आयटीसी) अडचणी दूर होणार आहेत. ही करप्रणाली अत्यंत सुटसुटीत आहे. व्यापाऱ्यांना वैयक्तिक पातळीवर कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली आहे. इन्कमटॅक्स, जीएसटी आणि कस्टम हे तीनच कर राहणार आहेत. विक्रीकराचे विवरण प्रत्येक महिन्याला व्यापारी आणि खरेदीदारांना द्यावे लागणार आहे. काहीवेळा तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन सिस्टीममध्ये बिघाड होऊ शकतो. मात्र महिन्याच्या अखेरीस व्यापाऱ्यांनी विवरणपत्रे भरण्यासाठी गर्दी करू नये. केवळ जीएसटीचा नवीन क्रमांकासाठी धावपळ करू नये. कारण प्रत्येक व्यवहाराची ऑनलाइन नोंद आणि करप्रणाली पारदर्शी राहणार आहे. आतापर्यंत पाच जिल्ह्यांतील करदात्यांचे ८८ टक्के नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया ५० टक्के झाली आहे. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया करदात्यांना तातडीने पूर्ण करावी लागणार आहे. त्याशिवाय त्यांना कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक दिला जाणार नाही.’

केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सी. व्ही. केदार म्हणाले, ‘जीएसटीची कार्यप्रणाली सोपी आणि सुटसुटीत आहे. यामध्ये करदात्यांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. वस्तूंच्या किंमतीवर कर आकारले जाणार आहे. एकच कर प्रणाली सुरू होणार असल्याने करदात्यांना फायदा होणार आहे.’

विक्रीकर विभागाचे सहआयुक्त मुकुंद पन्हाळकर, सहआयुक्त अभिजित पोरे यांनी मार्गदर्शन केले. चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी करदात्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. अध्यक्ष गांधी म्हणाले, ‘सरकारने जीएसटी लागू करण्यासाठी दिलेला वेळ अपुरा आहे. जीएसटी लागू करण्यापूर्वी व्हॅटसंदर्भातील अनेक अडचणी दूर करण्याची गरज आहे. करदात्यांचे जुने नोंदणी क्रमांक रद्द केले आहेत. ऑनलाइन सिस्टीमही काहीवेळा तांत्रिक कारणामुळे बंद पडत आहे. नवीन कर लागू होण्यापूर्वी अन्य सर्व प्रकारचे कर रद्द करून कायदेशीर सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया व्यापाऱ्यांसाठी असावी.’

यावेळी विक्रीकर विभागाचे उपआयुक्त सुनील कानगुडे, नितीन बांगर, चेंबरचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाध‍व, खजिनदार संजय पाटील, मानद सचिव शिवाजीराव पोवार, जयेश ओसवाल आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, कोल्हापूर उद्यम को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत मुळे, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन असोसिएशनचे अध्यक्ष दीपांकर विश्वास यांचा सत्कार झाला. एसटीपी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत हेर्लेकर, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकौटंटचे अध्यक्ष अवधूत चिकोडी यांनी मनोगत व्यक्त केले. चेंबरचे मानद सचिव धनंजय दुग्गे यांनी स्वागत केले. मानद सचिव हरिभाई पटेल यांनी सूत्रसंचालन केले. चेंबरचे उपाध्यक्ष संजय शेटे यांनी आभार मानले.

वेळीच खबरदारी घ्या

‘पाच जिल्ह्यांत ७१ हजार करदाते आहेत. यापैकी जे व्यवसाय करीत नाहीत, त्यांचे नोंदणी क्रमांक रद्द केले आहेत. आतापर्यंत १० हजार नोंदणी रद्द केली आहेत. यापैकी ३०० करदात्यांनी आमचे क्रमांक रद्द करू नयेत, अशी विनंती केली आहे. त्या व्यापाऱ्यांची प्रत्यक्ष पथक पाहणी करेल. जुन्या करदात्यांना जीएसटी क्रमांक देणे अवघड नाही. मात्र, करदात्यांनी जीएसटीची प्रणाली समजून घेण्याची गरज आहे. ही समजून घेतल्यास करदात्यांना त्रास होणार नाही’ असे अधिकारी इंदलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गव्यांच्या हल्ल्यात पत्रकारासह दोघे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

आकुर्डे (ता. भुदरगड) येथे गव्याच्या हल्ल्यात एका पत्रकारासह दोघेजण ठार झाले. शुक्रवारी सकाळी साडआठच्या सुमारास ही घटना घडली. रघुनाथ शिंदे (वय ५२, रा. गारगोटी) व अनिल पांडुरंग पोवार (४४, रा.आकुर्डे) अशी मृतांची नावे आहेत. शिंदे हे स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी होते.

सकाळी आकुर्डे येथील तीन तरुण शेतकरी वैरणीसाठी 'भैरुचा माळ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात गेले होते. उसाचा पाला काढत असताना गव्याच्या कळपातून चुकलेल्या भल्या मोठ्या गव्याने तिघांपैकी अनिल पोवार या तरुणावर हल्ला केला. त्यांच्या पोटात शिंग घुसून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच ठार झाले. ते‌थून जीव वाचवून पळालेल्या दोघांनी ग्रामस्थांना या दुर्घटनेची माहिती दिली.

हे वृत्त समजताच वाहिनीचे प्रतिनिधी शिंदे वार्तांकनासाठी घटनास्थळी गेले. या दरम्यान उपस्थित लोक गव्यांच्या शोधासाठी फिरत होते. सुमारे पन्नास लोकांचा गट एका रस्त्याने गव्यांच्या मागावर असताना एका कुत्र्याने गव्याला बिथरले. गव्याने अचानक लोकांवर हल्ला केला. शिंदे हे शेताच्या बांधावरुन या घटनेचे शूटिंग घेत होते. त्यावेळी गव्याने मागे फिरून शिंदे यांना धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की शिंदे १० ते १२ फूट उंच उडाले. हल्ल्यात शिंदे यांच्याही पोटात शिंग घुसले. दुसरे शिंग त्यांच्या मांडीत घुसले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी शिंदे यांना रवीराज पाटील यांनी मोटारसायकलवरून आणले. त्यांच्यावर गारगोटीच्या ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून तातडीने पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैदानांची उडाली धूळदाण

$
0
0


Satish.ghatage@timesgroup.com

twitter:@satishgMT

कोल्हापूर ः सुट्यांमुळे शहरातील मैदाने फुलून गेल्याचे चित्र दिसत आहे. फुटबॉल, क्रिकेट खेळणारी मुले प्रत्येक मैदानावर दिसू लागली आहेत. पण, मैदानांच्या व्यवस्थापनाकडे अजिबातच लक्ष दिले नसल्याचे दिसते. प्रत्येक मैदानात बिअर व दारूच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लासचा खच पडलेला पहायला मिळतो. नाल्याचे पाणी मैदानात घुसून दुर्गंधी पसरली आहे. रोलरचा वापरच होत नसल्याने मैदानावर खरमातीचे ढीग दिसू लागले आहेत. मुले आणि खेळाडूंना किमान सुविधाही मिळत नाहीत. या मैदानांकडे नगरसेवक, आमदार व खासदारांचे पूर्ण दुर्लक्ष आहे.

शहराची लोकसंख्या साडेपाच लाखांच्या आसपास आहे. त्या मानाने मैदानांची संख्या अपुरी आहे. महापालिकेची, प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी संस्थांची मैदाने व मोकळ्या जागांचा वापर खेळण्यासाठी होतो. शहरात १०० हून अधिक फुटबॉल संघ, क्रिकेट ४०, हॉकीचे ३० संघ आहेत. या संघांना मैदानांची उणीव भासत आहे. महापालिकेकडूनही मैदानांची नीट देखभाल होत नाही. त्यामुळे मैदानांची अवस्था दिवसा खेळ तर रात्री ओपन बार अशी झाली आहे. मैदानाचे सपाटीकरण वर्षांत तीन ते चार वेळा केले जाते. मात्र पाणी मारण्या‌सह कचरा व खडी काढणे अशा देखभालीकडे दुर्लक्ष होते. मैदानावर पिण्याची पाण्याचा पत्ता नाही, स्वच्छतागृहांचाही अभाव आहे. या परिस्थितीतही लहान मुले व खेळाडू सराव करीत असतात.

महापालिकेच्या मैदानाकडे प्रशासनाची पाठ

शहरात महापालिकेच्या मालकीची दुधाळी, गांधी मैदान, मेरी वेदर, कसबा बावडा पॅव्हेलियन, सासने मैदान, दसरा चौक, शास्त्रीनगर, ध्यानचंद हॉकी स्टेडियम, लाइन बाजार ही मैदाने आहेत. दुधाळी मैदानात दारु आणि बिअर बाटल्यांचा खच पडलेला असतो. हुल्लडबाज बाटल्या फोडत असल्याने खेळाडूंना दुखापतीचा मोठा धोका निर्माण होत आहे. मैदानावर रोलिंग होत नसल्याने खरमाती वर आली आहे. हीच परिस्थिती गांधी मैदानात दिसते. मैदानाजवळून जाणाऱ्या नाल्याचे पाणी थेट मैदानात आल्याने तेथे कायम दुर्गंधी असते. अनेक ठिकाणी मुरूम आणि खरमाती बाहेर आल्याने त्याचा खेळाडूंना त्रास होत आहे. खेळाडू जखमी होण्याचे प्रकार होतात. पूर्व दरवाजातून रोलर आणता येत नसल्याने मामा भोसले विद्यालयाजवळील सरंक्षक भिंत फोडून तात्पुरता रस्ता केला आहे. पण महापालिकेकडे रोलरची संख्या कमी असल्याने फक्त ज्यावेळी स्पर्धा असते त्यावेळीच रोलिंग केले जाते.

कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावरही खरमाती वर आली आहे. मेरी वेदर मैदान खेळण्यासाठी बरे असले तरी रात्री या ठिकाणी ओपन बार असतो. हीच स्थिती मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आहे. ध्यानचंद हॉकी स्टेडियम म्हणजे मोठा ओपन बार झाला आहे. सासने मैदानावर सातत्याने होत असल्याने प्रदर्शनांमुळे वर्षभर मैदानावर खड्ड्याचे साम्राज्य असते. त्यामुळे मैदानाकडे खेळाडू फिरकतच नाहीत. दसरा चौक मैदान केएमटी, वडाप आणि अवजड वाहनांनी कायम व्यापलेले असते.

शास्त्रीनगर मैदान टकाटक

महापालिकेचे शास्त्रीनगर मैदान काका पाटील यांनी चांगलेच विकसित केले आहे. मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी १८ टर्फ उपलब्ध आहेत. बंदिस्त नेटची सोयही करण्यात आली आहे. देणगीदारांकडून दोन बोअरिंग मारली असल्याने तेथील पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मैदानावरील हिरवळीकडे लक्ष दिले जाते. हा शास्त्रीनगर पॅटर्न महापालिकेने प्रत्येक मैदानावर अवलंबला तर सर्व मैदाने चकाचक होतील. त्यासाठी काका पाटील यांच्यासारखे वेळ देणारे ​क्रीडा संघटक हवेत. शास्त्रीनगरप्रमाणे लाईन बाजार मैदानही स्थानिक हॉकी खेळाडूंनी व्यवस्थित ठेवले आहे.

अन्य मैदांनांत ‘कही खुशी, कही गम’

शाहूपुरी जिमखाना, शिवाजी विद्यापीठ, पोलिस मैदान, महाविद्यालये व शाळांची मैदाने सुस्थितीत आहेत. शाहूपुरी जिमखाना मैदानावरील टर्फ अत्यंत दर्जेदार आहे. शिवाजी विद्यापीठाने क्रिकेट मैदान विकसित केले असले तरी अॅथलेटिक्स ट्रॅककडे थोडेसे दुर्लक्ष होत आहे. पोलिस मैदानाची योग्य देखभाल होत असल्याने पोलिसांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नागरिक या मैदानाचा लाभ घेतात. रुईकर कॉलनीतील हिंद-को ऑपरेटिव्ह संस्थेचे मैदानही चांगले आहे. शाळा आणि महाविद्यालयांची मैदाने असली तरी त्यांची देखभाल होत नाही. काही शैक्षणिक संस्थांच्या मैदानातून थेट नाले वाहतात. मैदानाच्या सपाटीकरणाकडे व हिरवळ फुलवण्यासाठी शैक्षणिक संस्था कष्ट घेताना दिसत नाहीत. तपोवनसारख्या विशाल मैदानावर नियंत्रण ठेवणे शैक्षणिक संस्थेला अवघड जात असल्याने इथे मैदानावर जागोजागी बाटल्यांचा खच पहायला मिळतात.

शिवाजी स्टेडियमचा बोजवारा

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या ताब्यात असलेल्या शिवाजी स्टेडियमचा बोजवारा उडाला आहे. दक्षिणेकडील सरंक्षक भिंत पडली आहे. क्रिकेट टर्फ नष्ट झाले आहे. फुटबॉल संघांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने शिवाजी स्टेडियमचा बोजवारा उडाला आहे. मोठ्या प्रमाणात निधी असूनही जिल्हा क्रीडा अधिकारी व त्यांचा स्टाफ हाताची घडी घालून गप्प बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळवाचा पुन्हा तडाखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या काही भागासह जिल्ह्याला वळवाने शुक्रवारी पुन्हा तडाखा दिला. संध्याकाळी प्रचंड वादळी वाऱ्यासह आलेल्या वळवाने शहरात दोन ठिकाणी वृक्ष कोसळले. झाडांच्या फांदा वीजवाहिन्यांवर पडल्याने वाहिन्या तुटल्या. त्यामुळे सुमारे चार तास शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला.

दरम्यान, सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यात वडगाव येथे वीज अंगावर पडून दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शंकर कोंडी पाटील (वय ६०), अरविंद राजाराम बिचले (वय ३७) अशी त्यांची नावे आहेत. सांगलीत घरावर झाड कोसळले. दुसऱ्या घटनेत समडोळी-कवठेपिरान रस्त्यावर चालत्या मोटारीवर मोठे झाड कोसळले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

कुंभोज, किणी-घुणकी, हेर्ले, शिरोली, रुकडी, हातकणंगले, हुपरी परिसरातही जोरदार वळीव झाला. अतिग्रेत झाडाखाली बांधलेली राजाराम बाजीराव सुर्यवंशी यांची बैलजोडी वीज कोसळून जागीच दगावली. यात अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले. रुकडीतील बजरंग मुसळे यांच्या घरावरील पत्र्याचे शेड उडून पडले.

शिराळा कोकरूड रस्त्यावर मोठी झाडे उन्मळून पडली. शिराळा कोकरूड रस्त्यावर शिराळा ते बिऊर गावापर्यंतची वाहतूक जवळपास दोन तास विस्कळीत झाली होती. मांगले परिसरातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

दरम्यान, शहरात रात्री उशीरापर्यंत अग्निशमन आणि महावितरणच्या प्रयत्नानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपारंपारिक उर्जेचा वाढला टक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात अपारंपारिक वीजनिर्मिताचा टक्का वाढला आहे. विविध प्रकल्पातून जिल्ह्यात ३७५ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात यश मिळाले आहे. साखर कारखाने, पवन ऊर्जा, लघु जलउद्योगांनी वीजनिर्मितीला हातभार लावला आहे. ही तयार झालेली वीज महावितरणने विकत घेतली आहे. अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी १९ ग्राहकांनी मागणी केली आहे. त्यांच्याकडून दोन मेगावॅट वीजेची निर्मिती करणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी दर महिन्याला ११०० मेगावॅटची मागणी आहे. सहकारी साखर कारखाने, उच्च दाबाची निर्मिती करणारे चार ग्राहक, शाहूवाडी तालुक्यातील पवनचक्की, लघुजल उद्योग प्रकल्पातून ३७५ मेगावॅटची वीज निर्मिती झाली आहे. जिल्ह्यात उच्च दाबाची वीज निर्मिती चार ग्राहकांनी केली आहे. या ग्राहकांनी ५१० वॅटची वीज निर्माण केली आहे. सध्या ४६ घरगुती ग्राहक १ मेगावॅटची वीजनिर्मिती करतात. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी बगॅसच्या माध्यमातून १६ प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पातून ३२४ मेगावॅटची निर्मिती केली आहे. शाहूवाडी तालुक्यात पवनचक्कीतून २१. २५ मेगावॅटची निर्मिती होत आहे. घरगुती ग्राहकांच्यात मात्र अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी फारसा प्रतिसाद नाही. जिल्ह्यातील १३० ग्राहक दीड मेगावॅटची निर्मिती करीत आहेत. अपारंपरिक उर्जचलित उपकरणांत सूर्यचुल, सौर उष्णजल संयत्र, सौर पथदीप, सौर फवारणी संच, सौर सिंचन व्यवस्था, सौर गृह प्रकाश प्रणाली, वीजेरी प्रभारण, पवन चक्की, जैववायू संयत्र, कृषी अवशेषांपासून विद्युत निर्मिती प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

महावितरण कंपनी जयगडमधील जिंदाल, गोदिंया येथील अदानी पॉवर, रतन इंडियाचा नाशिक मधील प्रकल्पात मोठी वीज निर्मिती केली जाते. या मोठ्या वीजनिर्मिती प्रकल्पातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी जयगड आणि कोयना वीज निर्मिती प्रकल्पातून वीजेचा पुरवठा केला जातो. ही वीज तळंगदे वीज उपकेंद्रातून जिल्ह्यासाठी दिली जाते. जिल्ह्यासाठी सरासरी ११०० मेगावॅटची मागणी आहे. या पैकी अपांरपारिक उर्जेचा वापराबाबत जनजागृती झाल्याने या उर्जेचा वीज निर्मितीचा टक्का वाढला आहे.


अपारंपारिक वीज निर्मितीला काही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सहकारी साखर कारखाने आघाडीवर आहेत. घरगुती ग्राहकांनी या उर्जेसाठी पुढाकार घेतल्यास या अपांरपारिक उर्जेचा टक्का आणखी वाढू शकेल. महावितरणकडून वीज ग्राहकांना अखंडितपणे वीज पुरवठा केला जात आहे.

एम. जी. शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण


वीजेला पर्याय म्हणून सौरउर्जेचा वापर केला आहे. अपारंपारिक उर्जेतून२० किलोवॅटची वीज निर्मिती केली आहे. त्यातून महिन्याला सुमारे १५ हजार रूपयांची बचत होत आहे. उर्जेचे योग्य व्यवस्थापन, संयोजन, संवर्धन व नियमन केल्यास ग्राहकांचा चांगला फायदा होऊ शकेल.

नारायण रूईकर, लक्ष्मीपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हर डाउनमुळे खातेदारांना मनःस्ताप

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com
Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : डाक विभागातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘कोअर सिस्टिम इंडिग्रेशन’ (सीएसइ) महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. २९ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयांत नवीन प्रणाली सुरू केली. मात्र, याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणच मिळालेले नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी नवीन प्रणाली सुलभ कामाऐवजी डोकेदुखी बनत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सर्व्हरही डाउन होत असल्याने पोस्टाच्या सेवेचा वेग मंदावला आहे. ग्राहकांना तासन् तास रांगेत उभे राहण्याच्या मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

केंद्र सरकारच्यावतीने पोस्ट कार्यालयाद्वारे बँकिंग प्रणालीचा अवलंब करण्यासाठी सीएसई हा महत्त्वकांक्षी प्रोजेक्टला एक मेपासून सुरुवात झाली. बँकेप्रमाणे पोस्टातील आर्थिक व्यवहार गतीमान करण्यासाठी ही नवी प्रणाली सुरू झाली. नव्या प्रणालीचा वापर सहजगतीने होण्यासाटी २९ एप्रिल रोजी सर्व पोस्टाचे आर्थिक व्यवहारांसह रजिस्टर, स्पीड पोस्ट आदींचे वितरण पूर्णपणे बंद होते. त्याची माहिती डाक विभागाने प्रसिद्धी पत्रक व सर्व पोस्ट कार्यालयासमोर नोटीस लावून दिली होती. एका दिवसांनंतर पोस्टाची सुविधा गतीमान होईल अशी, अपेक्षा ग्राहकांची होती. पण सुविधा गतीमान होण्याऐवजी मंद झाली आहे. नवीन प्रणालीचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नसणे आणि सर्व्हर डाऊनचा परिणाम पोस्टाच्या सर्व्हिसवर झाला आहे.

स्पीड पोस्ट, रजिस्टर याचबरोबर पेन्शनर्स आणि विविध बचत खात्यांमध्ये विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून सर्वच ग्राहक पोस्टाकडे पाहतात. यामध्ये विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचा पोस्टाकडे नेहमीच ओढा राहिला आहे. पोस्टाकडील सर्व गुंतवणुदार एक ते दहा तारखेपर्यंत कार्यालयात आवर्जून उपस्थिती लावतात. त्यामुळे अनेक पोस्ट कार्यालयात या कालावधीत गर्दी असते. पण एक तारखेपासून सुविधाच संथ झाल्याने अनेक गुंतवणुकदारांना कार्यालयात वाट पहात रहावे लागत आहे. काहींना सर्व्हर डाउनमुळे पुन्हा माघारी जावे लागत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या नव्या प्रणालीची फारशी माहिती नाही. मध्येच सर्व्हर सुरू झाल्यास पुन्हा वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचारी दूरध्वनीद्वारे माहितीची विचारणा करतात. त्यामुळे एका-एका खातेदारांचा अर्धा-अर्धा तास काउंटरवरच जात आहे. याबाबत कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरही मिळत नसल्याने ग्राहक थेट नाराजी व्यक्त केली जात आहे.

यापूर्वीही तशीच स्थिती

नवीन प्रणाली सुरू झाल्यापासून पोस्टाच्या शहरातील अनेक कार्यालयातील सर्व्हर डाउन झाले आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना अनेकदा तासन् तास रांगेत वेळ घालवावा लागत आहे. अचानक सर्व्हर सुरू झाल्यास कर्मचाऱ्यांना प्रणालीची माहिती नसल्याने माहिती घेण्यासाठी पुन्हा वेळ जात आहे. यापुर्वीही पोस्ट कार्यालयातील सर्व्हर नेहमीच डाउन होत होता. नवीन प्रणालीमुळेही सर्व्हर डाउन होत असल्याने सेवा गतीमान कधी होणार असाच प्रश्न आहे.

धानदेश स्वीकारण्यास बगल

नव्या प्रणालीद्वारे सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये बँकिंग प्रणाली सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून धानदेशच स्वीकारलेले नाहीत. तर काही कार्यालयात धनादेश स्वीकारले जात आहेत. त्यामुळे नेमकी स्थिती खातेदारांच्या लक्षात येत नाही. नवीन प्रणालीद्वारे धानदेश स्वीकारले जाणार असल्याने कर्मचारी त्याची माहिती घेत असल्याचे डाक विभागांकडून सांगितले जात आहे.


ग्राहकांना गतीमान सुविधा देण्यासाठी सीएसइ नवीन प्रणाली सुरू झाली आहे. धनादेश स्वीकारण्यासाठी स्वंतत्र सिस्टिम तयार केली जात असल्याने काही प्रमाणात दिरंगाई होत असली, तर इतर सेवांवर त्याचा परिणाम झालेला नाही. इतर सेवा सुरळीतपणे सुरू आहेत.

रमेश पाटील, डाक अधीक्षक, कोल्हापूर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्सल्टंटना नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेत कन्सल्टंटकडून हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत असून चौकशीसाठी प्रत्यक्ष कामापेक्षा जादा खर्च झाल्याबद्दल कन्सल्टंट, महापालिका अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. चुकीच्या कामाबाबत कन्सल्टंट, अधिकारी, ठेकेदार साऱ्यांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे. कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मांडली. तसेच आतापर्यंतच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट केले जाणार आहे. त्यातही दोषींची गय केली जाणार नाही, असेही स्पष्ट केले.

पाइपलाइनचे काम निकृष्ट होत असल्याबाबत शिवसेनेने काम बंद पाडले आहे. योजनेच्या सीआयडी चौकशीबरोबर दोषींवर कारवाईसाठी सरकारकडून आदेश होत नाही, तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, असा निर्धार केला होता. या पार्श्वभूमीवर महापौर हसीना फरास यांनी पुढाकार घेऊन शुक्रवारी शिवसेना, आयुक्तांसोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, सध्या आरोप होत असलेल्या कामाबाबत जादा का खर्च झाला याबाबत कन्सल्टंटसह जलअभियंता आणि कामावर देखरेखीची जबाबदारी असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनाही दाखवा नोटिसा देण्यात येणार आहे. कन्सल्टंटकडून कामात हलगर्जीपणा झाल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न आल्यास पुढील कारवाई केली जाईल. येथून पुढे कामासाठी जो प्रत्यक्ष खर्च आला आहे, त्याप्रमाणेच बिल देण्यात येणार आहे.

ते म्हणाले, ‘पूर्ण झालेल्या कामाबाबतही शंका आहेत. त्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. त्यानुसार जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय करणार नाही. शिवसेनेच्यावतीने तसेच लोकप्रतिनिधींनीही आणखी काही मुद्दे समोर आणले तर प्रशासन नक्कीच लक्ष देऊन त्रुटी दूर करेल. पण काम बंद हा पर्याय नाही. दर्जेदार कामासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लस्टरवरून आरोप-प्रत्यारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फाउंड्री अॅण्ड इंजिनीअरिंग क्लस्टरमधून माजी अध्यक्ष प्रसाद मंत्री आणि स्मॅकचे माजी अध्यक्ष डी. डी. पाटील यांच्यासह चार सदस्यांची हकालपट्टी केल्याची चर्चा उद्योग विश्वात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजकांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्यारोप केले आहेत.

काही उद्योजकांनी वर्गणी दिली नसल्याने सभासदत्व कमी करण्याचा ठराव क्लस्टरच्या बैठकीत झाल्याचे क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील सांगतात. पाच वर्षांत एक रुपयाही वर्गणी दिलेले नाही. त्यामुळे सहा जणांची हकालपट्टी केल्याची चर्चा सुरू आहे. सन २०१३ च्या स्मॅक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेल पराभूत झाले. तेथूनच एकमेंकावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. क्लस्टरच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून जिल्ह्याला ४५ कोटी रुपये मंजूर आहेत. यामध्ये राज्य सरकारचा १० टक्के हिस्सा आहे. औद्योगिक संघटनांचा हिस्सा १५ टक्के आहे. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) ने क्लस्टरच्या माध्यमातून १६ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करून घेतला. त्याची १५ टक्के रक्कम दोन कोटी ४० लाख रुपये होते. ही रक्कम केवळ शिरोली औद्योगिक वसाहतीतील फाउंड्री आणि इंजिनीअरिंग उद्योग क्षेत्रातून गोळा करायची आहे. मात्र गेल्या पाच वर्षात वारंवार मागणी करूनही ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे क्लस्टरचे काम पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याची भूमिका क्लस्टरच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या आहेत. या प्रकरणातून सहा जणांची हकालपट्टी केल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, याप्रकरणी क्लस्टरचे माजी अध्यक्ष प्रसाद मंत्री आणि स्मॅकचे माजी अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन फाउंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्यावर आरोप केला. ते म्हणाले, ‘अध्यक्ष पाटील यांचे क्लस्टरसाठी किती योगदान आहे. किती वर्गणी दिली हे जाहीर सांगावे. उद्योजकांत कोणताही वाद नाही. कोणतेही राजकारण नाही. केवळ वर्गणी जमली नाही, म्हणून आरोप केले जात आहेत. फाउंड्री क्लस्टर आम्ही मंजूर केले असून सॅन्ड रिक्लेमेशन प्लॅन्टसाठी जागा आमच्या प्रयत्नामुळेच मिळाली आहे. या क्लस्टरला विद्यमान अध्यक्षांनी स्मॅकमध्ये विरोध केला होता. क्लस्टरचे माजी अध्यक्ष प्रसाद मंत्री म्हणाले, ‘शिरोली एमआयडीसीतील फाउंड्री कागलमध्ये स्थलांतरित केली आहे. त्यासाठी स्मॅककडे २०१४ मध्ये अर्ज केला. वर्गणी गोकुळशिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनकडे वर्ग करा, अशी मागणीही केली. कागलहून शिरोलीला वेस्ट सॅन्ड आणणे शक्य नाही. तसेच स्मॅकमध्ये १ लाख, १० हजार वर्गणी भरली आहे.

सचिन पाटील यांचे फाउंड्री क्लस्टर योजनेत काय योगदान आहे? त्यांनी यासाठी किती निधी दिला हे एकदा जाहीर करावे. क्लस्टर मधील सॅन्ड रिक्लेमेशन प्लॅन्ट मध्ये पैसे भरले आहेत. सध्या एमआयडीसीत मंदी आहे. आमच्याकडे मागणी नाही. जेवढी वेस्ट सॅन्ड बाहेर पडते तेवढेच पैसे आम्ही भरले आहेत.

डी. डी. पाटील, माजी अध्यक्ष, स्मॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमृतमध्ये ‘वाटा’घाटी

$
0
0

Udaysing.patil@timesgroup.com

udaysingpatilMT

टेंडर भरल्यानंतर टेंडरधारकाला ‘गणित’ घातले जाण्याची अलिखित प्रथा आहे. पण महापालिकेमध्ये त्यापुढे जाऊन आधीच टेंडरधारकाला गाठून ‘आमचा वाटा’ धरून टेंडर भरा, असा भयानक प्रकार सुरू झाला आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात ड्रेनेज लाइन व एसटीपीच्या करण्यात येणाऱ्या ५८ कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये काही ‘कारभाऱ्यांनी’ टेंडर भरण्याआधीच अशा प्रकारे काम सुरू केले आहे. यामुळे महापालिकेतील ‘ढपला’ संस्कृतीत नव्या प्रकाराची भर घातली जात असल्याने पारदर्शकपणासाठी राबवण्यात येत असलेल्या ई टेंडरिंग पद्धतीला धाब्यावर बसवले जात आहे.

महापालिकेतील कामामधील ‘वाटा’ पद्धतीचा बोलबाला राज्यभर आहे. एखादे काम मंजूर झाल्यानंतर त्याचे टेंडर भरणाऱ्याला गाठून त्याच्याकडे ‘गणित’ घालण्याच्या प्रकाराने शहराचे नाव चर्चेत आहेच. अनेक प्रकल्पांमधील हा वाटा घेण्यासाठी नाना तऱ्हा झाल्या. अगदी रस्ते प्रकल्पातील वाटा घेण्यासाठी हॉटेलमध्ये रांगेत उभे राहण्याचे प्रकारही कारभारी नगरसेवकांनी केले. ठराव करण्यासाठीही ही वाटा पद्धत रुढ आहे. काही तरी वाटा हातात पडला पाहिजे, खर्च निघाला पाहिजे या भावनेमुळे भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली असून त्याचा नवा कित्ता महापालिकेत गिरवण्यात येऊ लागला आहे.

शहराच्या ड्रेनेज लाइनसाठी व सांडपाणी प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारकडून ‘अमृत’ योजनेची मंजुरी घेण्यात आली. ७२ कोटी रुपयांच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. नवीन सभागृह ​अस्तित्वात आल्यापासून कुठे काही वाटा मिळाला नसल्याने अस्वस्थ असलेल्या ‘सेवकांना’ या टेंडरमधून काही तरी मिळण्याची आशा निर्माण झाली. त्यासाठी तातडीने ‘कारभारी’ कामाला लागले. थेट पाइपलाइन योजनेतील कामात ‘वाटा’ मिळवण्याच्या प्रयत्नात उघड झालेल्या प्रकारामुळे भविष्यात या प्रकाराला कुठे वाव मिळू नये, म्हणून यावेळी दक्षता घेण्यात येत आहे.

त्यासाठी जे कुणी टेंडरची माहिती घेऊन गेले, त्यांच्याशी संपर्क साधून ज्या दराने टेंडर भरायचे ते भरा, पण त्यामध्ये आधीच आमच्या वाट्याची तरतूद करुन दर भरा, असा सूचनावजा इशाराच कारभाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात काढण्यात येणाऱ्या ५८ कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये जादा दरानेच टेंडर भरले जाण्याची शक्यता आहे. यामुळे कामासाठी सरकारचा जादा निधी खर्च होणार हे स्पष्ट आहे. या प्रकारातून कोल्हापूरने नव्या कामाचा इतिहास रचण्यास सुरुवात केली आहे.

लक्ष घालणार की नाही?

शहराच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये पारदर्शीपणा आणण्याबरोबरच भ्रष्टाचार रोखण्याची ग्वाही दिलेल्या विरोधी आघाडीच्या राज्यातील सरकारने योजनेला निधी दिला आहे. त्यामुळे या योजनेचा निधी योग्य प्रकारे खर्च होण्यासाठी या आघाडीकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे या प्रकरणात सभागृहात डोळे उघडे ठेवून ‘वाटा’ संस्कृतीला फाटा देण्याचे काम आघाडीकडून होण्याची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांची सीआयडी चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइनच्या योजनेतील भ्रष्टाचारामध्ये तत्कालिन आयुक्तांपासून इतर अधिकारी एक तर राजकीय दबावाचे बळी अथवा कम‌िशन घेऊन मिंधे आहेत. पुलांबरोबरच जॅकवेलच्या कामामध्येही टेंडरपेक्षा मोठा फरक असल्याने फुटात बारा इंचाचा फरक आहे. यामध्ये व्हाईट कॉलर स्कॅम झाल्याने गळक्या जुन्या शिंगणापूर योजनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. यासाठी महापालिकेच्या तत्कालिन अधिकाऱ्यांसह जबाबदार घटकांची सीआयडी चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे जे चुकले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

दरम्यान, शिवसेनेचा विकासाला पाठिंबा असून काम बंद पाडण्याचा आनंद झालेला नाही, असे सांगत मंगळवारी महापौर, आयुक्तांनी योजनेतील कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी केली.

शिवसेनेने काम बंद पाडल्यानंतर महापौर हसीना फरास यांनी पुढाकार घेऊन शिवसेना, आयुक्त यांची शुक्रवारी एकत्रित बैठक बोलवली. यावेळी शिवसेनेच्या ज्या काही शंका आहेत, त्यांचे निरसन करण्याचे आवाहन महापौर फरास यांनी आयुक्त डॉ. अभिज‌ित चौधरी यांच्याकडे केली. त्यानुसार जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी योजनेतील पूर्वीपासून झालेल्या व येथूनपुढे होणाऱ्या कामाबाबतच्या टेंडरमधील त्रुटी दाखवून दिल्या. त्याबाबत आयुक्तांनीही ​सविस्तर व ठोस भूमिका मांडली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘शिंगणापूर योजना पाहता कोल्हापूरवासियांना वाईट अनुभव आहे. त्याप्रमाणेच जर ही योजनाही दर्जाहीन होणार असेल तर गप्प राहणार नाही. मोठी योजना असल्याने त्याची सातत्याने पाहणी होण्याची आवश्यकता होती. पण पुर्वीच्या आयुक्तांपासून अन्य अधिकाऱ्यांनी या कामामध्ये दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आयुक्तांसह सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे. पाइपलाइनसाठी बेड काँक्रिटचे प्रयोजन टेंडरमध्ये आहे का? टेंडरमध्ये सांगण्यात आलेले जॅकवेलचे काम व प्रत्यक्ष होत असलेल्या कामात प्रचंड तफावत आहे. कन्सल्टंट महापालिकेने नेमला. पण महापालिकेच्या पत्रांना तो जुमानत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या स्टाइलने बघून घेतो,’ असा इशाराही यावेळी दिला.

जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘काम झाल्यानंतर पैसे देण्याआधी ७० ते ८० टक्के अगोदरच देण्याचे नियोजन चुकीचे आहे. इतक्या मोठ्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी चार ते पाच कनिष्ठ अभियंत्यांची गरज आहे. नव्या शिंगणापूर योजनेते ज्या अधिकाऱ्यांवर सदोष काम केल्याचा ठपका असून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे. तेच ​अधिकारी या योजनेत काम करत आहेत. आयुक्तांना काम चांगले करण्याची इच्छा असली तरी आजूबाजूची मंडळींपासून सावध रहावे. माजी नगरसेवक आदिल फरास यांनी शहरासाठी योजनेत सुधारणा करण्याची आवश्यकता असून दर्जाबाबत आपली लढाई सुरूच राहील. भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी ही भावना आहे. पण शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनेचे काम बंद रहायला नको. महापौरांनी याबाबत प्रशासनाला चौकशी करण्याचे पत्र दिल्याचे सांगितले. या बैठकीस उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, शिवसेनेचे शहराध्यक्ष शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, दत्ताजी टिपुगडे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, रिया पाटील आदी उपस्थित होते.

सरकारने ऑडिटर नेमून चौकशी करावी

शिवसेनेच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. कामाची श्वेतपत्रिका काढावी, सरकारने ऑडिटर नियुक्त करुन भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी त्यामध्ये केली आहे. तसेच कन्सल्टंट कंपनीची चौकशी करुन जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच योजनेसाठी सरकारचे पथक नेमण्याची आवश्यकताही व्यक्त केली आहे. योजना पुर्ण करण्यासाठी ठेकेदाराला विशिष्ट कालावधी देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस, वाऱ्याने वीजपुरवठा खंडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहर आणि परिसरात धुळींचे लोट निर्माण झाले. वादळी वाऱ्यांमुळे एस. टी. कॉलनी व लाइन बाजार येथील पद्मा चौकातील दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर लीशां हॉटेल, आंबेडकरनगर व बिरंजे पाणंद येथील झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहिन्या तुटल्याने शहर आणि परिसरातील सुमारे चार तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर अनेक ‌ठिकाणी लावलेले डिजिटल फलकही फाटून गेले. शहराच्याकाळी भागात मात्र पावसाचा केवळ शिडकावा झाल्याने सायंकाळनंतर उष्मा वाढला.

सकाळी दहा वाजल्यापासून उष्मा अधिक जाणवू लागल्याने सांयकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात होती. दुपारी साडेतीननंतर ढगाळ वातावरण झाले. त्याचवेळी सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे पावसाची शक्यताही निर्माण झाली होती. त्याचवेळी जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे धुळीचे लोट तयार झाले. त्यामुळे अनेक वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे एस. टी. कॉलनी आणि लाइन बाजार येथील पद्मा पथक चौकातील वृक्ष उन्मळून पडले. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने वाहिन्या तुटल्या. त्यामुळे शहर आणि परिसरातील सुमारे चार तास वीजवाहिन्या खंडीत झाला.

दुपारी चारनंतर वादळी वाऱ्याला सुरुवात झाल्याने आणि पावसाची शक्यता निर्माण झाल्याने फेरीवाल्यांची चांगलीच पळापळ झाली. महाद्वार रोड, ताराबाई रोड व राजारामपुरी परिसरातील फेरीवाल्यांची सुरक्षित ठिकाणी साहित्य ठेवण्यासाठी धावपळ सुरू होती. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने खबरदारी म्हणून काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत केल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वाऱ्यांमुळे ज्याठिकाणी वीज वाहिन्यांवर फांद्या पडल्या त्या काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. रात्री उशीरार्पंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणच्यावतीने सुरू होते.


कसबा बावड्यात जोरदार पाऊस

दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊण तास जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या, शेतातील पत्र्यांचे शेड, विद्युत पोल उन्मळून पडले. अनेक ठिकाणी लावलेले डिजिटल फलक वादळामुळे पडले. चौगले पाणंद येथील जुने सिमेंटचे पोल पडले. लाईन बझार येथील हनुमान मंदिर जवळील झाड विद्युत पोलवर पडल्याने पोल अर्धवट वाकला. आंबेडकर नगर येथेही रिकाम्या जागेतील झाड पडले. पोवार पार्क येथील ३३ केव्ही लाईनचे गार्डिंग ११ केव्ही वर पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. कसबा बावडा परिसरात दोन तास वीजपुरवठा खंडीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चूक आयआरबीची, तोटा पालिकेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयआरबीने लक्ष्मीपुरीमध्ये दोन ठिकाणी केलेल्या गटारीच्या चुकीच्या कामाची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला तब्बल ४० लाख रुपये मोजावे लागणार आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असताना नाल्यांच्या सफाईकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच ठिकठिकाणी साठणाऱ्या पाण्यामुळे रहिवाशांना व व्यावसायिकांना होणाऱ्या त्रासावरून शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी आयआरबीच्या कामामुळे महापालिकेला खर्च करावा लागणार असल्याची बाब प्रशासनाने निदर्शनास आणून दिली. तसेच शहरात पाणी साठणारी २६ ठिकाणे असल्याचेही सांगितले.

दरम्यान, ई वॉर्डसाठी टाकण्यात आलेली नवीन पाइपलाइन पुढील आठवड्यात कार्यान्वित करण्यात येणार असल्याने ई वॉर्डमधील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

वळवानंतर लवकरच जोराचा पाऊस सुरू होईल, असे वातावरण आहे. परिस्थितीत शहरातील नाल्यांच्या सफाईकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याची बाब निलोफर आजरेकर यांनी बैठकीमध्ये मांडली. यामुळे डास प्रचंड वाढले आहेत. दुसरीकडे डिझेल, पेट्रोल नसल्याने धूर फवारणी होत नसल्याचे सांगत ‘मी पेट्रोल देते पण फवारणी करा,’ असे आजरेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर लक्ष्मीपुरीतील मुख्य रस्त्यावर गटार होऊनही अजूनही पाणी साठते हा प्रकार काय आहे, याची विचारणा केली. त्यावेळी प्रशासनाकडून आयआरबीने केलेल्या गटारीची पातळी योग्य नसल्याने पाणी वाहत नाही. त्यामुळे साठणारे पाणी काढण्यासाठी रिलायन्स मॉलसमोर व धान्य बाजार या ठिकाणी क्रॉसड्रेन करण्याची गरज असून त्यासाठी ४० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले.

घरफाळ्यासाठी मिळकतींचे सर्वेक्षणच्या कामासाठी नेमलेल्या सायबर टेक कंपनीचा करार मे महिन्यात संपत असून आतापर्यंत केवळ १८ हजार मिळकतींचा सर्वे पुर्ण झाला आहे. त्यांचे काम समाधानकारक नसल्याने दररोज एक हजार रुपये दंडाची आकारणी करण्याची नोटीस देण्यात आल्याचे प्रशासनाने सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले. नगरोत्थान योजनेतील फुलेवाडी रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात असून ३१ मे पर्यंत काम पुर्ण न झाल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई केली जाणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहासाठी कोट्यवधी खर्च करून जर तक्रारी येत असल्याचे आशिष ढवळे यांनी मांडले. तर इनर्ट मटेरियलच्या कामासाठी टेंडर भरलेल्या कंपनींपैकी पूजा कन्स्ट्रक्शनने यापूर्वी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केल्याने त्यांना महापा​लिकेचे कोणतेही काम देण्यात येऊ नये, अशा सूचना आयुक्तांनी दिल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन मंडळाची निवडणूक जुलैमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा नियोजन मंडळाच्या ४० जागांसाठी जुलै महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी मतदारांची यादी निश्चित झाली आहे. त्यावर हरकतींची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मतदारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर एक महिन्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान जुलैमध्येच होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका यांची नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर नियोजन मंडळाची निवडणूक होते. यासाठी मतदानही सभागृहातील सदस्यांमधूनच होते. कोल्हापूर जिल्ह्यात मंडळाच्या ४० जागा आहेत. त्यासाठी ही निवडणूक होणार आहे. यातही महिला राखीव, अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव जागा असणार आहेत. मंडळाची २०१३ मध्ये झालेली निवडणूक बिनविरोध झाली होती.

यंदाच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांत लोकप्रतिनिधींच्या सभागृहांमध्ये मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यातील मतदारांना हरकती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता ही यादी अंतिम झाली असून, ती राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारकडून अंतिम मंजुरी आल्यानंतरच उमेदवारी अर्ज भरणे, छाननी, माघार ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे त्यासाठी एकूण दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून प्रत्यक्ष जुलै महिन्यातच मतदान होणार आहे.


अंतिम मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासंदर्भात हरकती मागविल्या होत्या. केवळ एका मतदाराच्या नावातील बदलाला हरकत होती. मतदार यादी सरकारकडे पाठविल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

- सरिता यादव, जिल्हा नियोजन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनीच्या कालव्यातसख्खे भाऊ बुडाले

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील उजनीच्या उजव्या कालव्यात मामासोबत पोहण्यासाठी गेलेली चार शाळकरी मुले वाहून गेली. त्यापैकी दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हे दोघे भाऊ मुंबई येथील रहिवाशी असून, श्रीपूर येथे उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावाला आले होते.

ओम सतीश लोणी (वय १३) व प्रसन्न सतीश लोणी (वय १०) अशी मृत भावांची नावे आहेत. तर विराज संतोष शिवनगी व विकी संतोष शिवनगी या दोघाना बोरगांव येथील रोहित साठे यांनी कालव्यात उडी टाकून वाचवले. बुडालेल्या दोन्ही सख्ख्या भावांच्या मृतदेहाचा अद्याप शोध सुरू आहे. या घटनेने श्रीपूर व बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरमध्ये मालगाडीचे डबे घसरले

$
0
0

सूर्यकांत आसबे । सोलापूर

सोलापूरमधील दुधणी स्थानकादरम्यान ब्रेक फेल झाल्याने इंजिनसहित मालगाडीचे काही डबे घसरले. त्यामुळे दक्षिण भारतातली वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाडीहून होटगीला मालगाडी जात असताना रूळाला तडे गेल्यानं हा अपघात झाला. या अपघतात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ही घटना समजताच रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊ रेल्वेरूळ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे.

रविवारी मध्यरात्री १२:३० वाजता ही घटना घडली. दुधनीनजीक रुळांना तडे गेल्याने मालगाडीच्या इंजिनसह ५ वॅगन घसरले, त्यामुळे दक्षिण भारतात जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून दक्षिण भारताचा संपर्क तुटला आहे. वाडी जंक्शन वरुन होटगी स्थानकाकडे ही मालगाडी येत होती. सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल घेऊन ही मालगाडी येत होती. दरम्यान रुळ दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती उप रेल्वे प्रबंधक राजेंद्र शर्मा यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिष्यवृत्ती घोटाळा: दोन अधिकाऱ्यांना अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

सोलापुरातील समाजकल्याण विभागातील कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी सहाय्यक समाजकल्याण आयुक्त मनीषा फुले आणि निलंबित सहाय्यक समाजकल्याण आयुक्त दीपक घाटे या दोघांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांनाही ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील वर्षी सोलापुरातील समाजकल्याण विभागात रोजंदारीवर काम करणारी सारिका काळे हिला शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. सोलापुरसह अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच्या यादीत बोगस नावे घालून त्यांच्या नावावरील कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाटली होती. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले होते. काळे हिच्या सांगण्यावरून पहिल्या टप्यातील तपासात सुमारे १८ ते २० कोटींचा घोटाळा झाला असल्याचे समोर आले होते. तिच्याकडून अधिक माहिती घेतली असता यामध्ये फुले, घाटे यांच्यासह जवळपास शंभर जणांना आरोपी करण्यात आले. काळे ही सध्या कारागृहात आहे तर काहीजण त्यावेळीच जामिनावर सुटले होते. यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. घाटे सोलापुरातून बदली होऊन गेला होता आणि तो सांगली येथे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त म्हणून कामकाज पाहत होता.

दरम्यान फुले आणि घाटे यांनी यापूर्वी अटकपूर्व जमीन घेतला होता. त्यावेळी त्यांनी या शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु बराच कालावधी उलटून गेला तरीसुध्दा या दोघांकडूनही तापसकामात कोणतेच सहकार्य मिळत नसल्याने अखेर पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळण्याचे ठरविले. त्यानुसार फुले आणि घाटे यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माझे मंत्रिपद धनगर आरक्षणासाठी नाही’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

‘बारामतीमध्ये धनगर समाजाने मते दिली असती, तर मी केंद्रात मंत्री झालो असतो. मला मराठा आणि ब्राह्मण समाजाने अधिक मतदान झाले आहे. धनगरबहुल भागांत मला कमी मते मिळाली. माझ्या पक्षाचा पहिला आमदार मराठा समाजाचा होता. मी धनगरांचा नेता किंवा धनगर आरक्षणासाठी मला मंत्री केलेले नाही,’ असे खळबळजनक वक्तव्य पशू व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. पंढरपूर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

जानकर म्हणाले, ‘माझ्या पक्षात सर्वच जातींची लोक आहेत. बैलगाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला वाटत असते, आपल्यामुळेच बैलगाडी चालत्ये, अशी अवस्था सध्या काहींची झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यातील वाद असो किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील वाद असो, तो संपविण्यासाठी मी सगळ्यांच्या पाया पडण्यास तयार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४७५ लोकांनी एका दिवसात बांधले २१० बंधारे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यातील जनता एकवटली आहे. बिदाल गावात रविवारी २४७५ लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून एका दिवसात २१० दगडी बंधारे बांधले. या श्रमदानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली असून, त्यांनी या श्रमदानाची माहितीही मागविली आहे.
बिदाल गावाने वॉटर कप जिंकण्याबरोबरच पाणीदार गाव करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. ग्रामस्थांनी एका दिवसांत २१० दगडी बंधारे श्रमदानातून बांधून नवा विक्रम केला आहे.

असे केले नियोजन

प्रत्येक बंधाऱ्यासाठी दहा लोक आणि एक दगड जुळणारा एक अनुभवी कारागीर, असे नियोजन केले होते. ठरलेल्या वेळेला ग्रामस्थांबरोबरच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, फलटण येथील आयडीएलच्या संस्थापिका वैशाली शिंदे यांच्या ४५ जणांच्या ग्रुपसह माण मेडिकल डॉक्टर, वाघजाई गणेश मंडळ, वडगाव, खांडेवस्ती येथील ग्रामस्थांनीही उपस्थिती लावली होती. ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने श्रमदान करून २१० दगडी बंधारे बांधले. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास
मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

३२ गावांचा पाणीदार होण्याचा संकल्प

वॉटर कप स्पर्धेअंतर्गत माण तालुक्यातील ३२ गावांमध्ये कामे सुरू असून, या गावांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. बिदाल ग्रामस्थांनी एकी दाखवत पावसाचे पडणारे पाणी मुरवण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी नियोजन केले आहे. ग्रामस्थ दररोज सकाळी सहा वाजल्यापासून श्रमदानासाठी कामाच्या ठिकाणी पायी तसेच वाहनांनी येतात. त्यांच्या पिण्याचे पाणी व सरबताचीही सोय ग्रामस्थांतर्फे केली जाते. गावाला जैन फाउंडेशनने एक, सरकारचे दोन, शेखर गोरेंचे एक जेसीबी मशिन मोफत तर अंकुश गोरे यांनी डिझेलवर एक मशीन पोकलेन दिली. तसेच ग्रामस्थांनी दोन पोकलेन, सहा जेसीबी भाड्याने घेतल्या आहेत. त्यातूनच रविवारच्या श्रमदानातून एका दिवसात २१० दगडी बंधारे बांधण्यात यश आले आहे.

बिदाल ग्रामस्थांच्या एकीमुळे दोन तासांमध्ये केलेले श्रमदान एक कोटी रकमेपेक्षा जास्त मोलाचे आहे. रविवारच्या श्रमदानामुळे अडीच कोटी लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा होऊ शकतो. ही एकजूटच बिदाल ग्रामस्थांना वॉटर कप स्पर्धा जिंकून देईल.
- भगवानराव जगदाळे, जिल्हा नियोजन अधिकारी, सातारा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि पुरंदरे विठ्ठल दर्शनाविनाच परतले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पंढरपूर

इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे याना मंदिर सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे दर्शनाविनाच परतावे लागले. बाबासाहेब पुरंदरे विठुरायाच्या दर्शनासाठी आज दुपारी पंढरपूरला आले. मात्र मंदिर सुरक्षेला असलेल्या पोलिसांकडून त्यांना मंदिरात न सोडण्यात आल्याने महाराष्ट्र भूषण पुरंदरेंना दर्शनाशिवाय परत फिरावे लागले.

बाबासाहेब पुरंदरे येणार असल्याची माहिती मिळताच मंदिराचा एक कर्मचारी त्यांच्यासोबत त्यांना घ्यायला बाहेर आला. मात्र वयोमानानुसार बाबासाहेबांना सारखीच धाप लागू लागल्याने त्यांनी जवळ असलेल्या पश्चिम दरवाजाने मंदिरात जायची इच्छा व्यक्त केली. मंदिराचे कर्मचारी आणि बाबासाहेब यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या स्वीय सहाय्यकाने त्यापद्धतीने तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र या दरवाजातून कोणालाही सोडता येणार नसल्याचे फर्मान येथील पोलिसांनी काढले. बाबासाहेब पुरंदरेंना रुक्मिणी दरवाजापर्यंत चालत जाणे अशक्य बनल्याने त्यांनी अखेर कोणताही बडेजाव न दाखवता दर्शनाविनाच परत जाणं पसंत केलं.

विठ्ठल मंदिराचा गलथान कारभार मात्र यामुळे पुन्हा एकदा समोर आला. कोणत्याही वृद्ध व्यक्तीला दर्शनाची सुलभ व्यवस्था करण्याची जबाबदारी मंदिराची आहे. पण सुरक्षेसाठी असलेले पोलीस महाराष्ट्र भूषण म्हणून गौरवलेले व्यक्तीला अशी वागणूक देतात तर सामन्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याबाबत बाबासाहेबांनी मात्र कोणाच्याही विरोधात तक्रार केलेली नाही. विठ्ठल मंदिराला समितीच नसल्याने येथील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणाचेच बंधन उरलेले नाही. पण मुंबई उच्च न्यायालयाने ३० जूनपूर्वी मंदिर समिती अस्तित्वात आणण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. निदान आता तरी फडणवीस सरकारचे डोळे उघडतील एवढीच विठ्ठल भक्तांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबासाहेब पुरंदरे दर्शनाविनाच परतले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे मंगळवारी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. परंतु, तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना पश्चिम दरवाजाने मंदिरात जाण्याची परवानगी न दिल्याने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरंदरे यांनी दर्शनाविनाच तेथून परतणे पसंत केले.

बाबासाहेब पुरंदरे हे मंगळवारी पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी गेले. ते येणार असल्याची माहिती मिळताच मंदिराचा एक कर्मचारी त्यांना घ्यायला बाहेर आला. परंतु, वयोमानामुळे बाबासाहेबांना सारखी धाप लागल्याने त्यांनी जवळच असलेल्या पश्चिम दरवाजाने मंदिरात जायची इच्छा व्यक्त केली. मंदिराचे कर्मचारी व बाबासाहेबांसोबत असलेल्या त्यांच्या स्वीय सहाय्यकाने तेथील पोलिसांना तशी विनंती केली. मात्र, पश्चिम दरवाजातून कोणालाही मंदिरात प्रवेश देता येणार नसल्याचेच फर्मान पोलिसांनी काढले. बाबासाहेबांना रुक्मिणी दरवाजापर्यंत चालत जाणे शक्य नव्हते व पोलिसांकडून पश्चिम दरवाजातून प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे, बाबासाहेब पुरंदरे अखेर विठूरायाचे दर्शन न घेताच तेथून परतणे पसंत केले.

याबाबत बाबासाहेब पुरंदरे यांनी कोणाविरोधात तक्रार केली नसली, तरी ‘महाराष्ट्र भूषण’ बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीला मंदिरात प्रवेश न दिल्याची चर्चा मंदिर परिसरात होती. सध्या विठ्ठल मंदिर समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे, मुंबई हायकोर्टाने ३० जूनपूर्वी मंदिर समिती अस्तित्वात आणण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>