Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापुरात भव्य मराठा भवन उभारू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात आदर्श मराठा भवन उभारण्यावर रविवारी पहिल्या मराठा आमसभेत एकमत झाले. यासाठी सभेत उत्स्फूर्तपणे ४६ लाखांची निधी उभा राहिला. यात राजकीय नेत्यांनी मोठा वाटा उचलला असून, भवनच्या उभारणीत जागा मिळविण्यात आणि बांधकामात कसलीही कमी पडू देणार नसल्याची ग्वाही जिल्ह्यातील नेतेमंडळींनी यावेळी दिली. मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती.

मराठा आरक्षण, मराठा स्वराज्य भवन आणि मराठा समाज आचारसंहिता या तीन मुद्यांवर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर शाखेने आमसभेचे आयोजन केले होते. त्याला लोकप्रतिनिधींसह पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शिक्षण तज्ज्ञ डी. बी. पाटील, बी. एम. हिर्डेकर, माजी आमदार के. पी. पाटील, सुरेश साळोखे, बजरंग देसाई, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, राहुल देसाई, उद्योगपती चंद्रकांत जाधव, भगवान काटे आदी प्रमुख उपस्थित होते.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रस्ताविक केले. ते म्हणाले, ‘समाजातील मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही आमसभा आयोजित केली आहे. विज्ञाननिष्टपणा येण्यासाठी आचारसंहिता मांडत आहोत. आता यात्रा, जत्रेवरील खर्च कमी करून मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्याची वेळ आली आहे.’ कोल्हापुरात मराठा भवन नाही, ही खेदाची बाब आहे. त्यासाठी सहा एकर जागेची मागणी केली आहे. त्यामुळे आता मराठा भवनसाठी मिशन-२०१७ची घोषणा करून ही आमसभा यशस्वी करण्याचे आवाहन मुळीक यांनी केले.

मराठा भवनसाठी गेल्या वर्षी बैठक झाली. निधी जमा झाला. पण, जागेचा प्रश्न होता. जागेसाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. जागा मिळाली, तर एकही रुपया कमी पडणार नाही याची काळजी घेऊ. मंत्रिमंडळातील वजनदार नेते असल्याने चंद्रकांत पाटील यांनी जागा देण्यासाठी प्रयत्न करावेत. तुम्ही जागा द्या, बांधकामासाठी आम्ही पैसे मागणार नाही.

- सतेज पाटील, आमदार

मराठा भवन केवळ मराठा समाजाचे नव्हे, तर बहुजन समाजाचे असेल. मराठा मोर्चाची पुढची पायरी शिक्षणातून पुढे जाण्याची असेल. कोल्हापूरच्या मराठा भवनात ग्रंथालय आणि विज्ञानकेंद्र उभारण्यासाठी लागेल तेवढे पैसे देण्याची माझी तयारी आहे. या भवनसाठी जागा मिळवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. आता पुढच्यावर्षी भवनच्या उद्‍घाटनसाठीच एकत्र येऊ, असा अजेंडा केला पाहिजे.

- संभाजीराजे छत्रपती, खासदार

समाजातील मुलांचा जन्मदर सुधारण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रत्येक गर्भवतीची पोलिस ठाण्यात नोंद करून महिला कॉन्स्टेबलद्वारे संबंधित महिलेची तिच्या घरी भेट घेतली पाहिजे. ओबीसी आयोग स्थापन होत असून, त्यात मराठा समाजाचा समावेश हवा. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात असला, तरी लोकसभेत हा प्रश्न मांडला आहे.

- धनंजय महाडिक, खासदार

राजधानी दिल्लीत प्रत्येक राज्याचे सदन आहे. त्याच धर्तीवर कोल्हापुरातील मराठा भवन व्हावे. या भवनच्या उभारणीसाठी प्रत्येकाने आपल्या परीने निधी दिला पाहिजे. माझ्या मतदारसंघातून यासाठी जेवढा निधी जमा होईल, त्यावर एक रुपया जादा निधी मी देईन. आचारसंहितेबरोबरच आपल्या समाजातील कोणी पुढे जात असेल, तर त्याला मागे ओढू नका. बोलण्यातही एक प्रकारची आचारसंहिता पाळावी लागेल.

- सुरेश हाळवणकर, आमदार

सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सकारात्मक आहे. समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न कोर्टात असला तरी त्याला इतर समाजांचाही कोणाचाही आक्षेप नाही. कोल्हापुरात मराठा भवन उभारणीसाठी जागेचा अडसर असला, तरी अगदी रेडिरेकनरप्रमाणे जागा खरेदी करण्यातही काही अडचण येईल, असे वाटत नाही. इथे व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांची जबाबदारी आता वाढली आहे.

- चंद्रदीप नरके, आमदार

चांगल्या कामासाठी दोघे एकत्र

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाषणात खासदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांनी चिमटे काढले. ‘मराठा भवनसाठी उत्स्फूर्त निधी जाहीर करायला आम्ही, महाडिक किंवा पाटील नाही’, असे संभाजीराजे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. चांगल्या कामासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘दिल्लीत काम करत असताना खासदार महाडिक आणि मी एकत्र काम करतो. आमच्यातील मतभेद कोल्हापुरात ठेऊन आम्ही दिल्लीत एकत्र असतो.’ यावरही जोरादार टाळ्या वाजवून उपस्थितांनी प्रतिसाद दिला.

यांनी दिला उत्स्फूर्त निधी

पापाभाई बागवान – एक लाख एक हजार

दिनकरराव आदिक – एक लाख

मयूर उद्योग समूह – दोन लाख

तंबाखू संघ कर्मचारी – ७५ हजार

नगरसेवक नाना कदम – एक लाख

खासदार धनंजय महाडिक – १० लाख

महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक – एकूण ११ लाख

आयटी पार्कजवळ जागा

कोल्हापुरात हॉकी स्टेडियम रोडवर आयटी पार्क शेजारी असणारी सहा एकर सरकारी जागा मराठा भवनसाठी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी भाषणात दिली. ते म्हणाले, ‘या जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. कोल्हापुरातील मराठा भवन उभारताना पुढील शंभर वर्षांचा विचार करून ते उभारले पाहजे. त्यासाठी ही जागा अतिशय योग्य आणि सोयीची आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार होईल तेवढे प्रयत्न करत आहे. मराठा समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरू करण्याची घोषणा सरकारने केली आहे. जून महिन्यापासून ही वसतीगृहे सुरू करण्यात येतील. ज्या जिल्ह्यात जागेची अडचण येईल, तेथे भाड्याने जागा घेतली जाईल आणि त्याचे भाडे सरकार भरेल’, अशी घोषणा राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या मराठा आमसेभेत ते बोलत होते. मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक भवनात ही आमसभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे होते.

सभेस खासदार संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे आदी प्रमुख उपस्थित होते. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी या आमसभेचे संयोजन केले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सद्यःस्थितीत मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात अडकला आहे. तो सोडविण्यासाठी सरकारने मोठमोठ्या वकिलांची फळी उभी केली आहे. सरकार समाजासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. मराठा समाजाने आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेनंतर समाजाने चर्चेची तयारी दर्शविली आहे. या चर्चेत सरकारने केलेल्या कमांमधील त्रुटी सांगाव्यात, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. समाजाच्या आचारसंहितेत आणखी बऱ्याच मुद्यांचा समावेश करता येईल. मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलायला हवा. आपल्या समाजातील मुलीही खेळात पुढे येऊन देत. त्यांना नोकरीच्या संधी द्यायला हव्यात. त्यासाठी समाजात प्रबोधनाची गरज आहे.’

कोल्हापुरातील मराठा भवनाबाबत मंत्री पाटील म्हणाले, ‘सरकारी जागा मिळण्यात अनेक अडचणी आहेत. मुंबईतील ‘आदर्श’ गैरव्यवहारानंतर गैरसरकारी कामांसाठी जागा देण्यात अडथळे येत आहेत. महसूलमंत्री म्हणून गेल्या नऊ महिन्यांत मी असा एकही निर्णय घेतलेला नाही. इथे व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांपैकी किमान पाच जणांकडे जादा जागा आहेत. त्यांनी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आपण बाजारभावाने जागा खरेदी करण्याचीही तयारी ठेवली पाहिजे.’

मराठा समाजाचे सर्व
विधि पाच दिवसांत

सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या आजच्या आमसभेत मराठा समाजासाठी एक आाचरसंहिता करण्याचा विषयही मुख्य चर्चेत होता. आचारसंहितेचे काही विषय मराठा महासंघाच्या पत्रकात होते. त्याचा आधार घेत आमदार सुरेश हाळवणकर यांनी, ‘मराठा समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर, पुढील पाच दिवसांत सर्व विधी पूर्ण करावेत’ असा ठराव याच सभेत करावा असा आग्रह धरला. उपस्थितांकडून त्याला उत्स्फूर्त दाद मिळाली आणि आवाजी मताने हा ठराव मंजूरही झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अगोदर कम‌िशन, नंतर रजा

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

कोल्हापूर ः विविध प्रकारच्या परीक्षा, ​प्रशिक्षण आणि मेडिकल सुविधेंतर्गत शिक्षकांना दीर्घकालीन रजा उपलब्ध आहेत. मात्र, या अर्जित रजा मंजुरीचे अधिकार प्राथमिक शिक्षण समितीतील अधिकाऱ्यांना आहेत. अर्जित रजा मंजुरीचे प्रकरण म्हणजे चराऊ कुरण या समजुतीने काही अधिकाऱ्यांनी ‘आधी कमिशन, नंतर रजा मंजुरी’ असा कारभार सुरू आहे. कार्यालयातील दोघा कारभारी लिपिकांच्या माध्यमातून राजरोस खाबुगिरी होत आहे. प्रत्येक कामात डल्ला मारण्याच्या प्रवृत्तीमुळे शेकडो सेवानिवृत्त शिक्षक निवड श्रेणीपासून वंचित राहिले आहेत. सरळमार्गाने काम होईल या अपेक्षेने सातत्याने हेलपाटे मारूनही त्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यालयातील निवड श्रेणीच्या फायली पुढे सरकल्या नाहीत.

सध्या शिक्षण समितीत पदाधिकाऱ्यांचा धाक नाही, महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामकाजाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. यामुळे या विभागात अधिकाऱ्यांचा ‘हम करे सो कायदा’ या प्रवृत्तीने कामकाज सुरू आहे. नोकरीवर रुजू झाल्यानंतर अनेक शिक्षक एमफील, पीचएडीसह विविध प्रकारच्या परीक्षा देतात. शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होतात. यासाठी त्यांना नियमाप्रमाणे दीर्घ रजा (अर्जित रजा) मिळतात. रजा मंजुरीचे अधिकार प्राथमिक शिक्षण ​समितीतील अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, सगळ्याच शिक्षकांच्या रजा मंजूर होत नाहीत. कधी शाळेची अडचण, तर कधी शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येचे कारण पुढे करत रजेच्या अर्जाला कनिष्ठ लिपिकांच्या पातळीवर ब्रेक लावला जातो. त्यानंतर शिक्षकाने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली, व्यवहार ठरला की रजा तत्काळ मंजूर होतात. व्यवहार जमला नाही तर रजेचे अर्ज बाजूला ठेवले जातात, अशी कामकाज पद्धत आहे.

प्राथमिक शिक्षण समितीत २०१० पासून पूर्णवेळ प्रशासनाधिकारी नाही. समितीचा कार्यभार प्रभारीवर आहे. प्रशासन अधिकाऱ्यावर दोन खात्यांचा कार्यभार असल्याने कार्यालयात पूर्णवेळ हजर राहू शकत नाहीत. मुख्य अधिकारीच कार्यालयात नसल्यामुळे कार्यालयातील अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत ऑफिसबाहेरची कामे करत असतात. यामुळे दुपारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची तुरळक संख्या असते. शिक्षक व कर्मचाऱ्यांना ऑफिस कामासाठी कर्मचाऱ्यांची वाट पाहत थांबावे लागते किंवा हेलपाटा मारण्याशिवाय पर्याय उरत नाही, अशा शिक्षकांच्या तक्रारी आहेत.

निवड श्रेणीसाठी हेलपाटे

२४ वर्षे नोकरी केलेल्या व पदोन्नती न मिळालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी दिली जाते. खासगी आणि महापालिका शाळेतून अनेक शिक्षक निवड श्रेणी न घेताच सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर या सगळ्या शिक्षकांनी एकत्र येऊन निवड श्रेणीसाठी यादी तयार करून प्राथमिक शिक्षण समितीकडे सादर केली. मात्र, निवड श्रेणीचा लाभ त्यांना काही मिळाला नाही. सेवानिवृत्त शिक्षक सरळमार्गाने निवड श्रेणीसाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी प्रस्तावात वेगवेगळ्या त्रुटी काढून हेलपाटे मारायला भाग पाडले जात आहे.


काम ऑफिसमधील, तडजोड बाहेर

फंडाच्या रकमेपासून वैद्यकीय बिलापर्यंतच्या विविध कामांसाठी ​शिक्षक, कर्मचारी कार्यालयाकडे पाठपुरावा करत असतात. काही शिक्षक, कर्मचाऱ्यांना तातडीने बिले आवश्यक असतात. त्याची गरज ओळखून फिल्डिंग लावली जाते. ऑफिसमधील कामासाठी संबंधितांशी कार्यालयाबाहेर चर्चा होते. यासाठी कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे. अधिकाऱ्यांच्या मर्जीतील हे कर्मचारी असल्याने त्यांच्याबद्दल कार्यालयात कुणी ‘ब्र’ काढत नाही. शिक्षण समितीतील काही जणांच्या मनमानी कारभारला त्रस्त झालेले शिक्षक व कर्मचारी ‘जगन्नाथा, जगदीशा’ पुरे कर रे ‘बाबा’ असे म्हणत कार्यालयाच्या पायऱ्या उतरताना दिसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुटा’च्या सभेत गोंधळ, समांतर सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सांगली

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा)च्या सांगलीतील वार्षिक सर्वसाधरण सभेत रविवारी मोठा गोंधळ झाला. सभा सुरू होण्यापूर्वी अध्यक्ष आर. एच. पाटील यांनी, संघटनेचे सदस्य नसलेल्यांना बाहेर जाण्याची सूचना केली. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. दोनवेळा सभा तहकुब केल्यानंतर गोंधळ, परस्परांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार सुरुच राहिले. त्यानंतर सभा बेमुदत काळासाठी तहकूब करण्यात आल्याची घोषणा अध्यक्षांनी केली. जेष्ठ सदस्यांच्या मध्यस्थीने मारामारी टळली. त्यानंतर दोन्ही गटांनी समांतर सभा घेऊन एकमेकांवर आगापाखड केली. दरम्यान, सभेतील गोंधळानंतर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी ‘सुटा’च्या वार्षिक सभेत अध्यक्ष पाटील यांनी संघटनेचे सदस्य नसलेल्यांनी बाहेर जावे असे सांगितले. मात्र, याला विरोधी गटाच्या सदस्यांनी आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांची हुकूमशाही असल्याचा आरोप केला. काही ज्येष्ठ सदस्य माहिती घेण्यासाठी आले असताना, त्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ठपका ठेवत सदस्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी सदस्यांच्या दोन गटात वादावादी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. त्यामुळे अध्यक्ष पाटील यांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली. अशी दोन वेळा सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी गटाकडून सांगली-कोल्हापूर असा वाद निर्माण केला गेल्याचा आरोप झाला.

अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘सदस्य नसलेल्यांनी सभागृहात उपस्थित राहणे, हे घटनाविरोधी आहे.’ याला आक्षेप घेत विरोधी गटाने ‘निवडणुकीवेळी मुदत संपल्यानंतर काहींचे अर्ज मागे घेतले जातात. तेव्हा घटना मोडली जात नाही का? असा सवाल केला. त्यानंतर वाद विकोपाला गेला. त्यानंतर सत्तारुढ गटाने सभा बेमुदत तहकूब केली. दरम्यान, सभेत गोंधळ सुरु झाल्यानंतर छायाचित्र टिपण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अटकाव करण्यात आला. कॅमेरामनला ढकलण्याचा, प्रतिनिधींना दमबाजी करुन हाकलण्याचा प्रयत्न झाला. पत्रकारांनी जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर सुटाने माफी मागितली.

दरम्यान, ‘सुटा ही प्राध्यापकांच्या हक्कासाठी लढणारी संघटना असताना, याचा ताबा हुकूमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्यांच्या हाती गेला आहे. ज्येष्ठ मंडळींना सभागृहातून बाहेर काढण्याची दुर्दैवी घटना आहे. जागा खरेदी प्रकरणात काहीजण अडचणीत येऊ शकतात. त्यांना आणि पर्यायाने सदस्यांचे कोट्यवधी रुपये वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ अशी प्रतिक्रीया माजी उपाध्यक्ष मारुतीराव मोहिते यांनी दिली.

दोन्ही गटाच्या समांतर सभा

सभा तहकूब झाल्यानंतर दोन्ही गटांनी समांतर सभा घेतल्या. विरोधी गटाच्या सदस्यांनी प्रा. रघुनाथ ढमकले यांच्या अध्यक्षतेखाली, तर सत्ताधारी गटाने आर. एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. विरोधी गटाने सत्तारुढ गटाच्या मालमत्ता खरेदीचा विषय उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांनी कोल्हापुरात अंबाई डिफेन्स कॉलनीत जागेसाठी कोटी रुपये अॅडव्हान्स दिले आहेत. जागा निवासी वापराची असल्याने संघटनेची गुंतवणूक वादात अडकली आहे. मालमत्तेला संघटनेचे नाव लागलेले नाही. ज्यांच्या स्वाक्षरीने पैसे भरले, त्यांच्याकडून वसुली करावी, अशी आमची मागणी होती. त्यामुळे सभा गुंडाळण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरमध्ये मालगाडीचे डबे घसरले

$
0
0

सूर्यकांत आसबे । सोलापूर

सोलापूरमधील दुधणी स्थानकादरम्यान ब्रेक फेल झाल्याने इंजिनसहित मालगाडीचे काही डबे घसरले. त्यामुळे दक्षिण भारतातली वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाडीहून होटगीला मालगाडी जात असताना रूळाला तडे गेल्यानं हा अपघात झाला. या अपघतात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ही घटना समजताच रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊ रेल्वेरूळ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे.

रविवारी मध्यरात्री १२:३० वाजता ही घटना घडली. दुधनीनजीक रुळांना तडे गेल्याने मालगाडीच्या इंजिनसह ५ वॅगन घसरले, त्यामुळे दक्षिण भारतात जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून दक्षिण भारताचा संपर्क तुटला आहे. वाडी जंक्शन वरुन होटगी स्थानकाकडे ही मालगाडी येत होती. सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल घेऊन ही मालगाडी येत होती. दरम्यान रुळ दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती उप रेल्वे प्रबंधक राजेंद्र शर्मा यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर फडकला तिरंगा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

वाघा बॉर्डरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात ऊंच अशा ३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर आज सकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिरंगा डौलाने फडकवण्यात आला. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यानामध्ये ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभावर ९० फूट लांब व ६० फुट रूंद अशा ५ हजार ४०० चौरस फुटाचा राष्ट्रध्वज आज फडकाविण्यात आला. कोल्हापूर शहराच्या सर्व बाजूंनी हा राष्ट्रध्वज सहज दिसू शकेल, इतका उंच आहे. ध्वजस्तंभ असलेल्या उद्यानात १८५७ ते १९४७ या काळातील भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची मांडणी महालढ्याचं महाकाव्य या रूपात जयगान अंतर्गत भव्य प्रदर्शन साकारण्यात आलं आहे. याबरोबरच बलिदान, शांतता आणि समृध्दी याचं प्रतिक असणाऱ्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगातून भित्तीचित्र साकारण्यात आलं आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून देशासाठी बलिदान केलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमा केशरी रंगामध्ये रेखाटल्या आहेत, तर पांढऱ्या रंगांमध्ये महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध यांच्या शांतीचा संदेश देणाऱ्या प्रतिमा आहेत. तसेच हिरव्या रंगामध्ये समृध्दीने नटलेला भारत रेखाटला आहे. 'आय लव्ह कोल्हापूर' या अक्षरांमधून कोल्हापूरची सर्व वैशिष्ट्ये दर्शविणारा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. तसंच, विविध राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा विनायल प्रिंटींग करून लावल्या आहेत. तर उद्यानातील विविध फुलझाडांनी उद्यान आकर्षक बनविले आहेच; पण त्यातून केलेल्या रंगीबेरंगी रोषणाईने वातावरण अधिकच मोहक बनविलं आहे.
३०३ फूट उंचीचा हा ध्वजस्तंभ हा कोल्हापूरच नव्हे, तर देशातील जनतेचा अभिमान वाढविणारा असून हा देखणा प्रकल्प कोल्हापुरात साकारला याचा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी पालकमंत्र्यांच्या पत्नी अंजली पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील व त्यांच्या पत्नी रुपाली नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, केएसबीपीचे सुजय पित्रे यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सैराट'मधील आर्चीची छेड काढणारा ताब्यात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । अकलूज (सोलापूर)

'सैराट'फेम आर्ची अर्थात, रिंकू राजगुरू हिची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय घरत असं या तरुणाचं नाव असून तो ठाण्याचा रहिवाशी असल्याचं समजतं.

मराठी सिनेसृष्टीत अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या 'सैराट' चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू अल्पावधीतच स्टार झाली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिला भेटण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत. यापूर्वीही अनेकदा तिला धक्काबुक्की झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी एका तरुणानं तिची छेड काढल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी करून दत्ता घरत याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सेना आमदार पाटीलविरोधात पोलिसात तक्रार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘शेतीच्या वादातून पोलिसात दाखल केलेली तक्रार माघार घे, नाहीतर तुला उलट टांगून मारीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात एका शेतकऱ्याने केला आहे. आमदार पाटील यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, असा तक्रार अर्जही शेतकरी रोहिदास राजाराम कांबळे यांनी पोलिस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडे केला आहे. नारायण पाटील करमाळ्याचे आमदार आहेत.

रोहिदास कांबळे यांची करमाळा तालुक्यात मौजे शेटफळ येथे शेतजमीन आहे. या शेतातील पाइपलाइन सचिन नरोटे यांनी फोडली. या विरोधात कांबळे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा माघार घ्यावा म्हणून नरोटे कांबळेंना धमकावत होता. या प्रकरणी शिवसेना आमदार नारायण पाटील यांनीही मोबाइलवरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज शेतकरी कांबळेंनी दाखल केला आहे. आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ दहा एकर तुर जाळून टाकली

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

तुरीचे भाव पडल्यामुळे काढणी, मळणी आणि आडतीचा खर्चही निघत नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांने तुरीच्या दहा एकर उभ्या पिकाला आग लावून तूर जाळून टाकली. ही दुर्दैवी बासलेगाव (ता. अक्कलकोट) येथे रविवारी घडली.

अक्कलकोट तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी काढणी, मळणी, अडतीचा खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळ-मेळ बसत नसल्यामुळे पिकाची काढणी न करता उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. वर्षभर ज्या शेतीची निगा राखली तीच शेती पेटवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली.

शशिकांत बिराजदार सधन शेतकरी आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातल्या बासलेगावच्या पंचक्रोशीत ते प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. दर वर्षी साधारण १५० ते २०० क्विंटल तूर उत्पादन ते घेतात. यंदा ही त्यांनी आपल्या शेतात २६ एकर तूर पेरली होती. त्यापैकी १६ एकराची रास करून उत्पादनही घेतले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी विक्रीला पाठवली. परंतु, अजूनपर्यंत तूर विकली गेली नाही. ३५०० ते ४२००पर्यंत त्यांच्या तुरीला मागणी होती. परंतु सरकारने ५१०० रुपये हमी दराने विकत घ्यायचे धोरण जाहीर केल्यामुळे त्यांनी तुरीची विक्री केली नाही. काढणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत होणारा खर्च याचा कुठेच ताळमेळ लागणार नाही याचा अंदाज आल्याने दहा एकराच्या तूर शेतीला त्यांनी आग लावली. यंदा केलेली तूर शेती त्यांच्या अंगलट आली आहे.

गेल्यावेळी मिळालेला तुरीचा चांगला भाव पाहून त्यांनी तूर लावली. पण हळूहळू तुरीचे दर कोसळत गेले त्यामुळे बिराजदार यांनी किमान पुढील पिकासाठी शेत तरी मोकळे होईल म्हणून उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोट तालुक्‍यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगलेच नुकसान सहन करावे लागले आहे. हमीभाव देण्याच्या आणि तूर विकत घेण्याच्या सरकारी यंत्रणेवर आता शेतकऱ्यांचा विश्‍वास उडाल्याचेच या घटनेतून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी काठावर गाळपेरणी सुरू

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उजनी जलाशयातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जलाशयातील पाण्याने व्यापलेल्या जमिनी आता उघड्या पडल्या असल्याने या जमिनीवर उन्हाळी पिके घेण्याची बळीराजांची लगबग सुरू झाली आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोंढार चिंचोलीसह परिसरात असे चित्र दिसून येत आहे.

उजनी जलाशयामुळे लाखो सजीवांची पाण्याची गरज भागविली जात असतानाच जलाशयातील पाण्याच्या आधारावर हजारो शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. दरम्यान, जलाशयातील पाणी कमी फायद्या शेतकऱ्यांना होते आहे, पाणी घटत असताना उघड्या पडणाऱ्या जमिनीवर शेतकरी उन्हाळी पिकांचे उत्पादन घेतात. यंदाही सद्यस्थितीत उजनी काठावर अशा गाळपेरण्या सुरू आहेत. या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या जमिनींची हलकीशी मशागत करताना शेतकरी दिसून येत असून या भागात आता कडवळ, मका, कांदा, भुईमुग, मुग, बाजरी या पिकांची पेरणी होणार आहे.
कसदार जमिनी ठरतायत फायदेशीर

उन्हाळ्यात जलाशयाच्या पाण्याबाहेर पडणाऱ्या या जमिनीत गाळाचे प्रमाण जास्त असल्याने त्या कसदार असतात. या शिवाय जलाशयाकाठच्या या जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याची गरज नसते. एकदा पेरणी झाली की खत, पाण्याविना पिके बहारदार येतात. एकूणच अल्प कष्ट व खर्चात चांगले उत्पन्न मिळते. कोंढारचिंचोली, पारेवाडी, उमरड, पोमलवाडी, जिंती, टाकळी, कात्रजसह परिसरातील शेतकऱ्यांना असा अनुभव आहे.

वेगाने पाण्यात घट

यंदा उजनी ११० टक्के भरले होते. मात्र, सद्यस्थितीत पाण्याची घट वेगाने होऊ लागली आहे. मुख्यतः धरणातून खाली सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जलाशयातील पाणीसाठा पोटाच्या दिशेने खाली सरकत आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ होत आहे, अशा स्थितीत जलाशयाने व्यापलेला जमिनीचा भाग उघडा पडण्याचा वेग आता वाढणार आहे. जमिनी उघड्या पडल्या की त्या ठिकाणी गाळपेरणी करण्याची लगबगही वाढणार आहे.
उजनीच्या पाण्याच्या नियोजनाची मागणी

उजनी जलाशयाने शंभरी ओलांडली तरी उन्हाळ्यात जलाशयाची पाणीपातळी वजा होऊन पाण्याची अडचण निर्माण होते. शेती पंपांची वीज कपात केली जाते. परिणामी धरणासाठी त्याग करणाऱ्या शेतकऱ्यांना पिके जगविणे अवघड होते, अशी स्थिती दर वर्षी आढळून येते. यंदा पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणेच वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा मंत्री महाजन यांचीप्रतीकात्मक अंत्ययात्रा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी मागील पाच दिवसांपासून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोरड्या उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारी स्तरावर अद्याप आंदोलनाची दखल न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी केला.

मागील सतरा वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात येथील १४ गावांच्या शेतकऱ्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावल्या मात्र, त्यांना मोबादला मिळाला ना पाणी. आजही येथील शेतकरी पाण्यावाचून वंचित आहेत. शेतीला पाणी मिळेल याकडे या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची एक पिढी संपली आहे. सरकार अद्यापही चाल ढकल करीत असल्यामुळे सरकारला जाग अणण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मागील पाच दिवसांपासून ३० फूट खोल खड्यात बेमुदत आंदोलन सुरू आहे. यात आतापर्यंत प्रकृती खालावल्याने पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सरकारी स्तरावर आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शुक्रवारी जलसंपदा मंत्र्यांची यांची प्रेतयात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला. सरकारने आताही दखल न घेतल्यास मंत्री महोदयाना खरोखरच कॅनॉलमध्ये गाढू, असा इशारा या वेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सहाय्यक आयुक्तांच्याकार्यालयाची झाडाझडती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील कर्मचारी संजय होटकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले सहायक आयुक्त अभिजित हराळे यांच्या कार्यालयाची शुक्रवारी दुपारी सोलापूर पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, त्याना कोणतीही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली नाहीत.

संजय होटकर मनपाची वादग्रस्त ठरलेली कचरा टेंडरची फाइल सांभाळत होते. या पूर्वी बेकायदा काम करण्यासाठी दबाव टाकला म्हणून दोन नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून होटकर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच गुरुवारी त्यानी होटगी रस्ता परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिट्टीमध्ये सहायक आयुक्त हराळे यांच्यासह राजू सावंत, ए. के. आराधे यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. संबधितांनी भ्रष्टाचार केला असून, त्याची चौकशी करावी, असेही चिठीत लिहिले होते. त्यानंतर पोलिसांनी हराळे, सावंत आणि आराधे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी होटकर यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेले हराळे तसेच अन्य दोघांची चौकशी करण्यासाठी महापालिका गाठली. हराळे यांच्या कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली मात्र. पोलिसांच्या हाताला काहीही लागले नाही. परंतु आत्महत्येचे नेमके कारण कचरा टेंडरची फाइल होती की, आणखी काय याची चौकशी सदर बाजार पोलिस करीत आहेत. अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब चेसीमुळे८७ बसची नोंदणी रद्दसोलापूर मनपाच्या बसेसवर आरटोओची कारवाई

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू शहरी विकास योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) सोलापूर महानगरपालिकेला अशोक लेलेंड कंपनीमार्फत शंभर बसेसची चेसी पुरविण्यात आल्या होत्या. १०० पैकी तब्बल ८७ बसेसची चेसी खराब असल्याचे पुराव्यानिशी आढळून आले आहे. सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या सर्व ८७ बसेसची नोंदणी रद्द केली आहे. आरटीओ बजरंग खरमाटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या बाबतची माहिती दिली. या कारवाईमुळे अशोक लेलेंड कंपनीला जबरदस्त दणका बसला आहे.

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आपल्या प्रयत्नातून महापालिका परिवहन उपक्रमासाठी २०० बसेसची मागणी केली होती. त्यापैकी १९० बसेस मंजूरही करण्यात आल्या होत्या. त्यासाठी सरकार आणि मनपा यांचा हिस्सा भरण्याचे ठरले होते. त्यानुसार मनपाच्या ताफ्यात पहिल्या टप्यात शंभर बसेस आल्या. त्यांची नोंदणी करून त्या सर्व एसी आणि नॉन एसी बसेस रस्त्यावर धावत होत्या. परंतु २०१५ सालात तत्कालीन विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांनी अशोक लेलेंड कंपनीने पुरविलेल्या या बसेसची चेसी खराब असल्याची तक्रार सोलापूरचे आरटीओ बजरंग खरमाटे यांच्याकडे केली होती. त्यानुसार परिवहन अधिकाऱ्यांनी पहिल्या टप्यात ४७ बसेसची पाहणी आणि नंतर उर्वरित बसेसची पाहणी केली असता या सर्व ८७ बसेसची चेसी खराब असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार आरटीओने महापालिकेला या बसेस बंद ठेवण्यास सांगितले.

दरम्यान, मनपाने बस पुरविणाऱ्या कंपनीला खराब बसेसची चेसी बदलून देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. शिवाय पालकमंत्री विजयकुमार देशमुख, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यासमवेत मुंबईत बैठकही घेण्यात आली होती, तेव्हाही कंपनीने चेसी बदलून देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरटीओने आपली कारवाई सुरू केली. बस पुरविणारी कंपनी कोणत्याच हालचाली करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मनपाने आपल्या वाट्याची सुमारे २४ कोटींची रक्कम अडवून ठेवली आहे. साठ कोटींपैकी ३४ कोटी रक्कम कंपनीला देण्यात आली आहे.

...........

चेसी खराब असल्याचा अहवाल

बसेसची चेसी खराब असल्याबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पुणे आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे यांच्याकडूनही अहवाल आल्यानंतर सोलापूर आरटीओने बसेसची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र तत्काळ मनपा आयुक्तांना पाठवून देण्यात आले. गाड्यांची नोंदणी करताना आरटीओने दिलेले आरसी बुक, योग्यता प्रमाणपत्र, टॅक्स भरलेली कागदपत्रे तातडीने आरटीओ कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आरटीओ खरमाटे यांनी या वेळी बोलताना दिली.

सोमपासाठी मंजूर झालेल्या सुमारे १५६ कोटी खर्चाच्या १९० बसेसपैकी काही बसेस २०१४ सालापासून खरेदी करण्यास सुरुवात झाली. प्रथम सुमारे ६० कोटी रक्कम असलेल्या १०० बसेस खरेदी करण्यात आल्या. त्यामधील एक बस जळाली आहे. उर्वरित ९९ पैकी ८७ बसेसची नोंदणी आरटीओने रद्द केल्यामुळे आता या बसेस रस्त्यावर कधीच धावू शकणार नाहीत. उर्वरित १२ बसेस चांगल्या आहेत, भविष्यात जर त्यामध्येही काही त्रुटी निर्माण झाल्यास त्या बसेसवरही कारवाई करू, असा इशाराही आरटीओ खरमाटे यांनी दिला आहे.

अपिलासाठी ३० दिवसांची मुदत

आमच्या निर्णयाविरोधात मनपा किंवा कंपनीला अपील करायचे असेल तर त्यासाठी तीस दिवसांची मुदत आहे. अपील थेट परिवहन आयुक्तांकडे करावयाचे आहे. चेसी खराब असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याने कंपनी अपील करण्याचे धाडस कितपत दाखवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम ५५ (३) आणि ५५ (५), अन्वये आरटीओने बसेसची नोंदणी रद्द केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सातारा झेडपीचेअध्यक्ष संजीवराजे?

$
0
0



सातारा

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची रंगीत तालिम सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडले. दोन तासांच्या राजकीय खलबतानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले. उपाध्यक्ष निवडीसाठी पाटण तालुक्यातून माजी आमदार विक्रमसिह पाटणकर यांचे समर्थक राजेंद्र पवार व खटाव तालुक्यातून सुरेंद्र गुदगे यांच्या प्रत्येकी सव्वा वर्षे मुदत देण्याच्या चर्चा रंगल्या. या निवडी जवळपास निश्चित असून मंगळवारी प्रत्यक्ष सभेपूर्वी शरद पवार यांच्याकडून निवड जाहीर करणारा दूरध्वनी केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार उदयनराजेंवर मारहाण, खंडणीचा गुन्हा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील संघर्षातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन गटांतील संघर्ष पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे.

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर हे करतात. कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते तसेच त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजे यांचा आरोप होता. त्यामुळे १८ फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतले होते.

सातारा विश्रामगृहात आल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडे असलेला ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे यांचे समर्थक अशोक सावंत, रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल अशा ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अफजलखानाच्या कबरीभोवतीच्या१९ अवैध खोल्या पाडण्याचे आदेश

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

किल्ले प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीभोवती वन खात्याच्या भूमीवर बेकायदा बांधण्यात आलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम काढून टाकण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च रोजी वनखाते आणि सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला आहे.

विधानभवनातील सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात दुपारी तीन वाजता श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. चर्चेनंतर त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा आदेश दिला.

या बैठकीला वन विभागाचे सचिव खारगे, मुख्य वनसंरक्षक पाटील, विभागीय वनअधिकारी अंजनकर, श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि सांगलीचे माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रितिनिधी उपस्थित होते.

अफझलखान कबर परिसरातील वनखात्याच्या भूमीवर केलेले बेकायदा बांधकाम त्वरित हटवण्यात यावे, असा आदेश मुंबई हायकोर्टाने सरकारला दोन वेळा दिला आहे. तरीही सरकारने बांधकामे हटविली नाहीत. या पूर्वीच्या सरकारने या विषयी काहीच कृती केलेली नाही. सरकारने संबधित बांधकामे हटवावीत, अशी मागणी नितीन शिंदे यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यांना अवैध बांधकामांची छायाचित्रेही दाखवली.

मुनगंटीवार म्हणाले, ‘वन खात्याच्या जमिनीवरील बेकायदा १९ खोल्यांचे बांधकाम हटवण्यात येईल; मात्र वनखात्याची जमीन सोडून अन्य ठिकाणी असलेले बांधकाम आम्हाला पाडता येणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर बंदला प्रतिसाद

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

जंगलात चोरून सुरू असलेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावांनी पुकारलेल्या तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांच्या असमाधानकारक तपासाच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तेथेच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले

गोहत्या व धोंडीबा आखाडे यांच्या खुनाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी तहसीलदार रमेश शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली

गोहत्या बंदी असतानाही महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात जंगलात गोहत्या केली जात आहे. तसेच देवळी गावातील वृद्ध शेतकरी धोंडीबा आखाडे यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून या दोन्ही घटनांचा परस्पर संबधित आहेत. मात्र, पोलिस या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासात दिरंगाई करीत आहेत. २५ दिवसांत पोलिस काहीच प्रगती करू शकले नाहीत, त्यामुळे तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांच्या अशा कामगिरीच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावातील जनतेने आज तालुका बंदची हाक दिली होती. या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. महाबळेश्वर बंद ठेवून तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने येथीय छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. तेथे छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मार्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, गणेश उतेकर आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात पाऊस

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अखेर रात्री सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहरासह परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाची चाहूल जाणवू लागली होती. त्यात मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तर उन्हाने अंगाची लाहीलाही होत होती. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर वगळता सर्वत्र पारा ४० अंशावर गेला होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अचानक ढगाळ वातावरण झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने गवत, काडी, लाकुड फाटा झाकून ठेवण्याची धांदल उडाली. रात्री सातच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाने सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. शाहुपुरी अंजली कॉलनी येथे जोरदार वाऱ्याने वडाचे झाड कोसळले. वीजवाहक तारा तुटल्याने शाहुपुरी करंजे सदर बझार बोगदा-पोवई नाका तसेच प्रतापगंज पेठ येथे सुमारे पाऊण तास वीज गायब झाली होती. संध्याकाळच्या वळीवाने वातावरणात काहीकाळ गारवा निर्माण झाला मात्र, पुन्हा अंगाची काहिली सातारकरांना सहन करावी लागली.

औंध परिसरात पावसाचा शिडकावा

शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास औंध परिसरात वादळी वारे, मेघगर्जनेसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

औंधच्या उत्तरेकडील जायगाव येथे सुमारे वीस मिनिटे पाऊस पडला. भोसरे, चौकीचा आंबा, वरूड, औंध व अन्य भागात पावसाचा काही प्रमाणात शिडकावा झाला. आकाश काळवंडून आल्याने जोरदार पाऊस होईल व हवेत गारवा निर्माण होईल, अशी आशा नागरिक, शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे पावसाने हुलकावणी दिली. रात्री उशीरा हवेत पुन्हा कमालीचा उष्मा निर्माण झाला होता, तसेच ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डॉ. अशोक चौसाळकरांनामहर्षी शिंदे पुरस्कार जाहीर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा २१वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना जाहीर झाला आहे. १९८० नंतरच्या काळात मराठी भाषेतील वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका डॉ. चौसाळकर यांनी बजावली आहे. प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते, दलितमित्र संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पुरस्काराचे वितरण रा. ना. चव्हाण यांच्या २४व्या स्मृतिदिनी, दहा एप्रिल रोजी ब्राह्म समाज रविवार पेठ, वाई येथे सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

दलितमित्र रा. ना. चव्हाण यांनी ज्यांच्या प्रेरणेने आपले प्रबोधनपर साहित्य समृद्ध व समर्थ केले त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात व साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दर वर्षी सन्मानपूर्वक दिला जातो. स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादक असलेले प्रा. डॉ. अशोक चौसाळकर राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. एक निष्णात राजकीय, सामाजिक विश्लेषक म्हणून ते सतत सक्रिय राहिले असून, त्यांनी संशोधनाच्या व वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून विपुल, अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे. १९व्या शतकातील सामाजिक आणि धर्मविचार हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर@ अशांवर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वर मुंबईपेक्षा जास्त उष्ण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत महाबळेश्वरमधील तापमान आयएमडीने मुंबईत नोंदवलेल्या तापमानापेक्षा जास्त आहे. मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेने तापमानाची नोंद केली आहे. मुंबईच्या किनारी भागापेक्षा महाबळेश्वरमधील पारा हा सामान्यतः कमी असतो.

महाबळेश्वरमध्ये बुधवारी, बारा एप्रिल रोजी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईत ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी, महाबळेश्वरमध्ये तेरा एप्रिल रोजी ३५.९ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईचा पारा ३४.८ अंश सेल्सिअसवर होता. गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये प्रत्यावर्त (अँटीसायक्लोन) मध्ये असलेल्या ईशान्येकडील उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाबळेश्वरमधील तापमान वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पूर्वेकडील वारे ईशान्ये वाऱ्यात मिसळले आहेत. येत्या आठवड्यात हे वारे पुढे सरकल्यानंतर पुन्हा तापमान खालावेल, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

सौराष्ट्र आणि कच्छमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत तापमान ३५ अंशाच्या आसपास आहे. येत्या काही दिवसांत पारा दोन अंशांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images