Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘समृद्धी’ प्रश्नावर शेट्टी-उद्धव एकत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी, आदिवासींच्या शेतजमिनी गिळंकृत करणारा समृद्धी महामार्ग प्रकल्प होऊ न देण्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेला शिवसेनेचीही साथ मिळणार आहे. बुधवारी ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगत याप्रशी सोबत राहण्याचे आश्वासन दिल्याचे ‘स्वाभिमानी’ चे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. जवळपास दीड तासांच्या या भेटीतील चर्चेमुळे मात्र राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या.

शिवसेना व स्वाभिमानी हे दोन्हीही भाजप सरकारमधील मित्रपक्ष असले तरी दोघांचीही भाजपबाबत अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता वेळोवेळी व्यक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी ठाकरे व शेट्टी यांची मातोश्रीवर तब्बल दीड तास चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, तूर खरेदी या विषयांवरच चर्चा झाली. ‘समृद्धी’ मध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनींचे संपादन होणार असून हा प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार ‘स्वाभिमानी’ ने केला असून या विषयामध्ये लक्ष घालण्याबरोबर साथ देण्याचे आवाहन खासदार शेट्टी यांच्यावतीने करण्यात आले. ठाकरे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनाला नेहमीच पाठिंबा दिला असून या प्रश्नातही सोबत राहण्याचे आश्वासन दिले.

याशिवाय कर्जमाफी, तूरडाळीची खरेदी अशा फक्त शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. राजकारणावर काही चर्चा झाली नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले असले तरी दोघांच्या या भेटीमुळे भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धान्य बाजाराने कोंडी

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com
tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर ः लक्ष्मीपुरीतील धान्य बाजाराचे स्थलांतर करण्याबाबत केवळ चर्चेचे गुऱ्हाळच सुरू आहे. गेली ७० वर्षे हा प्रश्न तसाच आहे. बाजारात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रोज पाच ते सहा तास वाहतूक कोंडी होत असते. महापालिका आणि लक्ष्मीपुरीतील व्यापाऱ्यांत स्थलांतराबाबत एकमत होत नसल्याने हा प्रश्न वर्षानुवर्षे रखडला आहे. बाजार मार्केट यार्डात स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. मात्र तेथे ६० फुटी रस्ता आणि जोड रस्ते बंद करावेत आणि ही जागा बंदिस्त केल्यास काही तासांत स्थलांतराची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शविली आहे. त्याबाबत अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. महापालिका प्रशासन, बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या मागणीच्या घोळात शहरात वाहतूक कोंडी कायम आहे. शिवाय बाजार परिसरात अस्वच्छेचा विळखाही नेहमीचाच आहे.

शंभर वर्षांपूर्वी लक्ष्मीपुरी परिसरात असलेले एसटी स्टॅण्ड, कांदा बटाटा होलसेल मार्केट, भाजी मार्केट, घोंगडी बाजार, चमड्याचा व्यापार, बकरी बाजार मार्केट यार्डात तर काही अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले. स्क्रॅप मार्केटही व्हीनस कॉर्नर येथील गाडीअड्डा परिसरात हलविण्यात आला. मात्र धान्य बाजार अद्याप तसाच आहे. गेली ७० वर्षे धान्य बाजार स्थलांतर करण्याबाबत केवळ चर्चाच सुरू आहे. सध्या धान्य व्यापार हा शाहूपुरी, मार्केट यार्ड, महापालिका येथील शिवाजी मार्केट येथे आहे. लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापार हा दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरात, नागपूर, बार्शी येथून धान्य येते. तर या मार्केटमधून कोकण, गोवा या ठिकाणी धान्य पाठवले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहनांची ये जा सुरू असते.

धान्य बाजार मार्केट यार्डात हलवण्यासाठी धान्य व्यापाऱ्यांना जागाही दिल्या आहेत. या ठिकाणी ड्रेनेज, लाईट, पाण्याची सुविधा काही प्रमाणात केली आहे. मात्र काही ठिकाणी कपाउंड वॉल कोसळली आहे. प्रत्येकाचे १५०० चौरस फुटाचे प्लॉट असूनही बांधकाम केलेले नाही. सुविधांसह नियोजित धान्य व्यापाराच्या जागेतून जाणारा ६० फुटी रस्ता आणि जोडरस्ते बंद करावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांची मागणी आहे. मार्केट यार्ड बंदिस्त झाल्यास चोरीची भीती राहणार नाही. ठोस सुरक्षा मिळाल्यास स्थलांतराची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शविली आहे. मार्केट यार्ड परिसरात २२ एकर इतकी जागा असून धान्य व्यापाऱ्यांसाठी २१३ प्लॉट आहेत. स्थलांतरित जागेत मदिना कॉलनीकडे जाण्यासाठी ६० फूटी रस्ता केला आहे. त्याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. सुरक्षेसाठी बांधलेले कंपाउंडही पडले आहे. मनपाने मार्केट यार्डात ले-आऊटला मंजुरी देऊन रस्ते, गटर्स केली आहेत. उर्वरित सुविधा बाजार समितीने दिल्या आहेत. व्यापाऱ्यांना स्थलांतराबाबत नोटिसा दिल्या आहेत. अंतिम सुनावणी घेऊन त्यांना स्थलांतराचे निर्णयही अद्याप प्रतीक्षेत आहे.

लक्ष्मापुरी मार्केट

शहरातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून लक्ष्मीपुरीची ओळख आहे. धान्य बाजार, कांदा बटाटा मार्केट, भाजीमंडई, किरकोळ व्यापार, कोंडाओळ, इंजिनीअरिंग संदर्भातील उत्पादने, बँका, पतसंस्था, मॉल, सायकल दुकाने, हॉटेल्स या परिसरात आहेत. १९२० च्या असापास लक्ष्मीपुरी येथे सर्वप्रथम धान्य बाजार सुरू झाला. तत्कालीन नगरपालिकेच्या 'फरशीवरील मंडई'तून काही धान्य व्यावसायिकांनी लक्ष्मीपुरीत व्यवसाय सुरू केला. त्यावेळी या व्यावसायिकांनी १९२१ मध्ये कोल्हापूर धान्य व्यापार प्रेरीत बालकल्याण संस्थेची स्थापना केली. १९५८ ला कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशनची स्थापना झाली. या दोन्ही संस्था संलग्न राहून काम करतात. कोल्हापूर ग्रेन मर्चंटस असोसिएशनचे एकूण सदस्य २६७ असून त्यातील सर्वाधिक १५० दुकाने लक्ष्मीपुरीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हीआयपी’ रोडवर स्पीडब्रेकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खानविलकर पेट्रोल पंप ते धैर्यप्रसाद हॉल या मार्गावर अखेर स्पीडब्रेकर बसवण्याचे काम महापालिकेकडून सुरू झाले. बुधवारी आदित्य कॉर्नर चौकातील महाराष्ट्र बँकेसमोर स्पीडब्रेकर तयार करण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणखी तीन स्पीडब्रेकर तयार केले जाणार आहेत. एका अपघातात झालेल्या व्यावसायिकाच्या मृत्यूनंतरच या मार्गावरील स्पीडब्रेकरसाठी महापालिकेला मुहूर्त मिळाला.

शहरातील बहुतांश सरकारी कार्यालयांना जोडणारा मार्ग म्हणून खानविलकर पेट्रोलपंप ते धैर्यप्रसाद हॉल मार्गाची ओळख आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उद्योगभवन, आरटीओ, महावितरण यांसह शासकीय विश्रामगृहाकडे जाण्यासाठी हाच मार्ग उपयोगात येतो. थेट रस्ता आणि कुठेच ट्रॅफिक सिग्नल नसल्याने बाइकर्सची गर्दी या रस्त्यावर असते. महाविद्यालयीन तरुणांची मोठी वर्दळ याच मार्गावरून असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

खानविलकर पेट्रोल पंप ते धैर्यप्रसाद हॉलपर्यंत नऊ ठिकाणी उपरस्ते या मुख्य रस्त्याला जोडले आहेत. छोट्या कॉलनीजमधून येणारे रस्ते मुख्य रस्त्यावरील वाहनधारकांना दिसतही नाहीत, त्यामुळे अपघात होतात. याशिवाय बेपर्वाईने वाहने चालवणाऱ्यांची संख्या कमी नाही. याच बेपर्वाईचा फटका सोमवारी (ता. २४) प्रदीप सोळंकी या कोल्ड्रींक व्यावसायिकाला बसला. दोन तरुणांनी सोळंकी यांच्या दुचाकीला धडक दिल्याने सोळंकी रस्त्यात कोसळून जागीच गतप्राण झाले.

शासकीय विश्रामगृहात उतरणारे मंत्री, आमदार यांच्यासह व्हीआयपी लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयासह अंबाबाई मंदिरापर्यंत तातडीने पोहोचता यावे यासाठी महापालिकेने हा मार्ग व्हीआयपी म्हणून राखीव ठेवला आहे. व्हीआयपी मार्ग असल्याने त्यावर स्पीडब्रेकर तयार केले जात नव्हते. मात्र ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बुधवारच्या अंकात ‘व्हीआयपी मार्गावर बेफिकिरी’ या शीर्षकाखाली वृत्त छापून रस्त्यावरील अपघातांचा धोका दाखवला. याची दखल महापालिकेने घेतली असून बुधवारी स्पीडब्रेकरचे काम सुरू झाले. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणखी तीन स्पीडब्रेकर करण्याचे काम हाती घेतले आहे. यापूर्वीच हे काम होणे गरजेचे होते.


वडणगे (ता. करवीर) येथील मुख्य मार्गावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांचा धोका आहे. शिव पार्वती कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने स्वखर्चातून रस्त्यात १४ ठिकाणी पांढरे पट्टे मारले. सुकेश जाधव, रमण देवणे, विजय साखळकर, सुजित साखळकर, रवि देवणे, संतोष आळवेकर आदींनी हे काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० लाखाच्या पुलासाठी ​अडीच कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
थेट पाइपलाइन योजनेतील पाइप टाकण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या लोखंडी पुलासाठी २० लाखाचा खर्च असताना त्यासाठी २ कोटी ४८ लाखाचे अवाजवी इस्टिमेट करुन जनतेच्या पैशावर संगनमताने दरोडा टाकण्यात येत आहे. योजनेत ४० कोटींच्या पाडलेल्या ढपल्यातील रकमेची कंत्राटदाराला भरपाई करुन देण्यासाठीच २० कोटींचा हा खर्च मंजूर केल्याचा आरोप महापालिकेतील भाजपचे गटनेता विजय सूर्यवंशी व ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. चुकीचे इस्टिमेट करुन त्याला तांत्रिक मंजुरी देणाऱ्यांवर तातडीने फौजदारी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. तसेच योजनेच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही सांगितले.
योजना दर्जेदार होण्याबरोबरच काम लवकर व्हावे, अशा सूचना करुनही सत्तारुढ काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने पाठपुरावा केलेला नाही, असे सांगत सूर्यवंशी व कदम म्हणाले की, योजना सुरु करण्याची तत्कालीन मुख्यमंत्री व स्थानिक मंत्र्यांची गडबड भोवली. त्यामुळेच अनेक त्रुटी राहिल्या. सध्या पाइप टाकण्यासाठी कॅनॉल तसेच नदीवर सहा पूल बांधण्यात येत असून त्यासाठी २० कोटीच्या खर्चाचे इस्टिमेट केले आहे. ७५ फूट लांब व १२ फूट रुंदीच्या लोखंडी पुलाचा खर्च बाजारभाव पाहिल्यास १८ ते २० लाख रुपये येतो. त्यासाठी योजनेत २ कोटी ४८ लाखांचा खर्च दाखवला आहे. यासारख्या अनेक कामांबाबतची माहिती व्हावी यासाठी सातत्याने खास सभा बोलवण्याचा आग्रह केला जात आहे. पण सभाही बोलवली जात नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘चुकीच्या कामाची बिले येत असल्याचे सांगूनही प्रशासनाकडूनही काहीच कारवाई केलेली नाही. यासाठी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. सर्व कामाची चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे. त्याचबरोबर जीवन प्राधिकरणकडेही योजनेच्या तांत्रिक मंजुरीबाबत विचारणा करणार आहे. ज्यांनी मंजुरी दिली, त्यांच्यावर फौजदारीसाठी पाठपुरावा करणार आहे. योजनेतील प्रत्येक कामाच्या बिलाच्या चौकशी केल्याशिवाय ते मंजूर करणार नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योजना पूर्ण करावी असे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आता सांगत आहेत. आम्ही ही योजना निर्दोषपणे पूर्ण करुच. त्याचवेळी पालकमंत्री व आमदार अमल महाडिक यांच्या बिंदू चौकात करण्यात येणाऱ्या सत्कारास त्यांनी जरुर यावे.’
यावेळी विरोधी पक्ष नेते किरण शिराळे, अजित ठाणेकर, राजसिंह शेळके, ईश्वर परमार उपस्थित होते.

अहवाल मागवला आहे

योजनेचा डीपीआर करण्यापासून कामावर देखरेख ठेवण्यापर्यंतचे काम युनिटी कन्सल्टंटकडे आहे. पुलांची लांबी व रुंदी कमी अधिक असल्याने अंदाजित रकमेची तरतूद केली आहे. तरीही या कामाबाबत कन्सल्टंटकडून अहवाल मागितला आहे. अहवाल आल्यानंतर आयुक्तांशी चर्चा करुन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कंत्राटदाराकडून आलेले बिल स्थगित ठेवले आहे. त्यावरही अहवालानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.

सुरेश कुलकर्णी, प्रभारी जलअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कृषी-पणन मंत्र्यांची हकालपट्टी करा'

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘स्वयंघोषित राष्ट्रभक्त समजणारे राज्य आणि केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. छत्तीसगडमधील नक्षलींच्या हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याची आणि तूर खरेदीचे नियोजन चुकल्याची फक्त कबुली देऊन चालणार नाही. कृषी व पणन मंत्र्यांची हकालपट्टी करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे,’ अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा मंगळवारी रात्री सांगलीत पोहोचली. बुधवारी सकाळी संघर्ष यात्रेतील नेत्यांनी सांगलीत वसंतदादा पाटील यांच्या समाधीला अभिवादन केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गटनेते जयंत पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विद्या चव्हाण, रामहरी रुपनवर यांच्यासह दोन्ही पक्षाचे आजी-माजी आमदर, स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधला.
विखे-पाटील म्हणाले, ‘सर्वच पातळीवर अपयशी ठरत असलेल्या सरकारकडून काय अपेक्षा करायची? असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. वसंतदादा पाटील यांच्या सारख्यांनी नेतृत्व करताना सुजलाम, सुफलाम करून ठेवलेल्या महाराष्ट्राची या सरकारने दयनीय अवस्था करून ठेवली आहे. लाखो क्विंटल तूर आज पडून आहे. हमीभाव निश्चित करून तूर खरेदीचे वचन देणाऱ्या सरकारला नियोजन चुकले, २२तारखेपर्यंत नोंद असलेली तूर घेणार असे सांगून जबाबदारी टाळता येणार नाही. कृषी व पणन मंत्र्यांची हकालपट्टी करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. तूर खरेदीतील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून दिली पाहिजे. कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन, राजर्षी शाहूंचे आशिर्वाद घेतल्यानंतर सत्तेवर येताच धनगर समाजाला आरक्षण देण्याची भाषा करणाऱ्या सरकारने अडीच वर्षांनंतरही धनगर समाजाची फसवणूक चालविली असल्याने संत बाळू मामा यांची माफी मागितली. क्रांतिसिहांच्या सांगली जिल्ह्यातून वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांचे अशिर्वाद घेऊन पुन्हा संघर्षाची मशाल पेटवून शेतकरी कर्जमुक्त करायचा, सरकारला धडा शिकवायचा, असा निर्धार केला आहे. अशावेळी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. या घडीला त्यांनी सरकारला सळो की पळो करुन सोडले असते. चांद्यापासून बांद्यापर्यंत कर्जमाफी करीता सुरु असलेल्या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेतून उस्फूर्त पाठींबा मिळत आहे. त्यामुळे कर्जमाफी आम्ही घेणारच आहोत. या करिता सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी आम्ही राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना भेटणार आहोत.’


'तूर खरेदीला तारखेची अट चालणार नाही'

‘खरी गरज असलेल्यांना कर्जमाफी देण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नेमक्या गरजेची व्याखा सांगावी. तुम्ही आधुनिक जमान्यात आहात. मी लक्ष घालतो, माहिती मागविली आहे. समिती नेमली आहे, अहवाल यायचा आहे, हा वेळकाढूपणा बंद करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नाहीतर तुम्ही महाराष्ट्राला मुक्त करा,’ असा इशारा अजित पवार यांनी दिला.
पवार म्हणाले, ‘हे सरकार रोज चुका करीत आहे. त्यातून पावलोपावली सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. नोटांबदीनंतर शेतकऱ्यांच्या तारणहार असलेल्या जिल्हा बँकांची अर्थिक कोंडी करुन ठेवली आहे. आघाडीच्या काळात वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेल्या या राज्यात शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देण्याऐवजी २२०, २९५, ३११ टक्के दरवाढ सुचवता? पुरेशी साखर आणि कारखानदारी अडचणीत असताना कच्ची साखर आयात कोणासाठी केली जात आहे. तूर खरेदीला तारखेची अट अजिबात चालणार नाहीत. जोपर्यंत तूर शिल्लक आहे, तोपर्यंत्त ५ हजार ५०० रुपये या दराने खरेदी होत राहिली पाहिजे. आपले अपयश झाकण्यासाठी वाट्टेल तसे निर्णय घेऊन ते जनतेवर लादण्याची जुलमी राजवट बंद करून डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या, अन्यथा शेतकऱ्यांना एकत्र करून आम्हाला टोकाची भूमिका घेऊन सरकारची कोंडी करावी लागेल. विशेष अधिवेशन घ्यायचेच असेल तर जीएसटी ऐवजी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि वीजदरवाढ या बाबत घेतले पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’


'शेतकऱ्यांविरोधात बोलणाऱ्यांना पंतप्रधान, मुख्यमंत्र्‍यांची फूस'

निती आयोगाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लावण्याची सुचना अहवालात केली आहे. हे म्हणजे अतीच झाले. सरकारांच्या प्रमुखांच्या परवानगीशिवाय एक शब्दही न काढणारे रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला देताय?, असे बोलून टाकतात तर एसबीआय बँकेच्या प्रमुख भट्टाचार्य म्हणतात, कर्जमाफी दिलीतर बँकांची अर्थिक अडचण होईल. त्यामुळे अशी वक्तव्य करण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचीच फूस असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे राज्यातले असो किंवा केंद्रातले भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातच आहे.


शिवसेनेने नौटंकी बंद करावी : विखे-पाटील

सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या मुंबई महापालिकेतील कारभाराचे पितळ उघड पडू नये म्हणून सत्तेला चिकटून बसलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अभिनय ‘चला हवा येऊ द्या,’ मधील नटांच्या अभिनयालाही मागे टाकणारा आहे. त्यांनी नौटंकी बंद करावी. मंत्रिमंडळात त्यांच्या मंत्र्यांनी ढिम्मासारखे बसायचे आणि बाहेर येऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणायचे. संसदेत खासदाराच्या विमान प्रवासासाठी मंत्र्यांच्या अंगावर धावून जायचे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र मूग गिळून गप्प बसायचे. खिशात ठेवलेले राजीनामे बदललेल्या कपड्याबरोबर गेले काय? अशा सेनेने खरचं शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल आणि थोडीफार नैतिकता शिल्लक असेल तर सरकारमधून बाहेर पडून संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे.


‘स्वाभिमानी’ हा शब्द शोभत नाही : विखे-पाटील

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भले करायला निघालेले खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तोंडाला पट्ट्या बांधल्या आहेत. त्यांची कथनी आणि करणी स्वाभिमानी या शब्दाला शोभणारी नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर मंत्रिपदावर विराजमान झालेल्या खोत यांना सरकार प्रमाणेच इव्हेंटची लागण झालेली आहे. कधी बाजार भरविल्याचा तर कधी अन्य कशाचातरी इव्हेंट सुरू असतो. जितक्या गतीने ते मंत्रिपदावर पोहचलेच, तितक्याच गतीने शेतकरी त्यांना खाली आणतील. अशी टीकाही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.


शेतकरी उद्धवस्थ करण्याचे कारस्थान

‘शेतकरी उद्धवस्थ करण्याचे कारस्थान मुंबईत शिजत आहे. ऊस, तूर उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. पोपटासारखे मिठू मिठू बोलून वेळकाढूपणा सुरू आहे. शेतकरी विरोधी बोलणारे भाजपचे सरकारला मस्तवाल झाले आहे. शेतकरी हितापेक्षा उद्योगपतींचे हित साधले जात आहे,’ टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मल्लिकार्जुन देवालयापासून बाजारपेठ-शिवाजी चौक-स्टेट बँक कार्नर-अंबिका मंदिरपासून खुल्या नाट्यगृहापर्यंत राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल युनायटेड, आरपीआय कवाडे गट, समाजवादी पक्ष या प्रमुख विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढली. बैलगाड्यातून नेत्यांनी सभास्थळी येताना शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. खुल्या नाट्यगृहामध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले, भाजपमध्ये सर्वसामान्यांची नाडी ओळखणारे नेतृत्व नाही. त्यामुळे लोकहिताचे निर्णय घेतले जात नाहीत. केवळ उद्योगपतींनी खूष ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हिरे व्यापाऱ्यांसाठी एक लाख कोटी रुपये खर्चून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन केली जाते. मात्र, त्यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यास पैसे नाहीत. लोकशाहीचा खून पाडला जात आहे. हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावण्याची सक्ती असो किंवा राज्यातील आमदारांचे निलंबन. आले मोदींच्या मना, तेथे कोणाचे चालेना, अशी स्थिती झाली आहे.’

सिंचन योजनांना वीजबिल माफी द्या

कर्जमाफी मागणारे विरोधी पक्षांचे आमदार निलंबित केले; आता सर्व विरोधी आमदारांचे निलबंन झाले तरी चालेल मात्र, कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. सध्या राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारकडून फुकटचे श्रेय घेण्याचा धंदा सुरू आहे. क्रांतिसिंहाच्या जिल्ह्यातून क्रांतीची मशाल पेटवा आणि भाजपवाल्यांच्या बुडाखाली जाळ करा. त्याशिवाय सरकार जागे होणार नाही. शेतकऱ्यांना हमी भाव नाही, त्याचे जगणे मुश्किल झाले आहे. या काळात ताकारी, म्हैसाळ, टेंभूसह राज्यातील सर्वच सिंचन योजनांना पाच वर्षांसाठी वीजबिल माफी द्यावी. शेतकऱ्यांकडून वीजबिल आकारू नये, अशी मागणीही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.


आर. आर. आबा असते तर...

संघर्ष यात्रेत आर. आर. आबांची आठवण सर्वच वक्त्यांनी प्रामुख्याने काढली. आबा असते तर सरकारला सळो की पळो करून सोडले असते. सर्वसामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्यांच्या दु:खावर ते पेटून उठत. त्यामुळे आता ते स्वस्थ बसले नसते. भाजपचे वाभाडे काढले असते, त्यांची उणीव संपूर्ण महाराष्ट्राला जाणवत असल्याचे अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. आबांच्या आठवणी त्यांनी जागवल्या. त्याचबरोबर महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजयराव सगरे यांची आठवण अजित पवार यांनी काढली.

गरज कशी भागणार?
तासगावात अजित पवार म्हणाले, ‘हे सरकार माणशी वीस लिटर पाणी देतंय. त्यात पंतप्रधानांनी शौचालये बांधण्याचे आवाहन केले आहे. आघाडी सरकारच्या काळात आम्ही माणसी ४० लिटर पाणी देत होतो. त्याचबरोबर अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटातील दृश्य आठवले आणि दगडांचा उल्लेख झाला की, दगडावर कशी गरज भागविली जात होती, हे कळते. पण आता वीस लिटरमध्ये कोणती आणि कशी गरज भागवायची , एवढेही सरकारला कळत नाही का?’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीआय होणार ऑनलाइन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माहिती अधिकार कायद्यांतर्गत आलेल्या अर्ज आणि अपिल अर्जांची नेमकी स्थिती कळावी म्हणून राज्य सरकारने प्रत्येक खात्यात ऑनलाइन आरटीआय रजिस्ट्रर तयार करावे आणि हा तपशील जनतेच्या माहितीसाठी वेबसाइटवर टाकण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिला आहे.

याप्रकरणी माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी माहिती आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन गायकवाड यांनी १५ जूनपर्यंत आदेशाची अंमलबजावणी करण्यास मुख्य सचिवांना सांगितले आहे. तसेच आदेशावर कितपत कारवाई झाली, त्याचा अहवाल १७ जूनपर्यंत सादर करण्याचा आदेशही त्यांनी सरकारला दिला आहे. माहिती अधिकारी व प्रथम अपिल अधिकारी यांनी किती अर्ज निकाली काढले अथवा प्रलंबित ठेवले याचा तपशील माहिती आयुक्तांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे खातेप्रमुख आणि माहिती आयुक्त यांना माहिती अधिकारी व प्रथम अपिल अधिकारी यांची कामगिरी कळू शकत नाही. त्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर विकसित केल्यास खातेप्रमुखांना व नागरिकांना माहिती अधिकाऱ्यांपुढील प्रकरणांची सद्यस्थिती कळू शकेल. शिवाय गांधी यांनी तपशिलासाठी विशिष्ट तक्ता सुचविला असून त्याचा विचार करण्याचेही गायकवाड यांनी आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​एमआयएमचे तौफिक शेखवरस्थानबद्धतेची कारवाई

$
0
0



सोलापूर

सोलापुरातील एमआयएमचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सोमवारी केली. शेख याची रवानगी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

शेख याच्याविरुद्ध १९८९पासून फेब्रुवारी २०१७पर्यंत सोलापुरातील विविध पोलिस ठाण्यात विविध कालमांतर्गत एकूण २९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यातून तो निर्दोष मुक्त झाला आहे. त्याच्याविरुद्ध दोनवेळा फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई आणि चारवेळा महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून त्याने त्याच्या साथीदारांसह एमआयडीसी, सदर बझार, विजापूर नाका, जेलरोड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्रनिशी फिरून खुनाचा प्रयत्न करणे, हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, अपहरण, गैरमंडळी जमाव जमवून गैरकृत्य करणे, बेकायदा दुकान घरजागा बळकावविणे, लोकांना किरकोळ कारणावरून घातक शास्त्रनिशी मारहाण करून परिसरात दहशत निर्माण करणे आदी गुन्हे दाखल आहेत. या वरून पोलिसांनी तौफिक शेख याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. तौफिक शेख याने मागील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एमआयएमकडून निवडणूक लढविली होती. त्याला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्या निवडणुकीत शेख याने प्रणिती शिंदे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना नामोहरम केले होते. या शिवाय नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत तौफिक याच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे ९ नगरसेवकही निवडून आले आहेत. मनपा निवडणुकीत मतदानावेळी नई जिंदगी परिसरात राष्ट्रवादीचे माजी महापौर हरून सैय्यद याला तौफिक याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून रक्तबंबाळ केले होते, त्यावेळी त्याच्याविरुद्ध आणि त्याचा मुलगा अदनान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवस तौफिक फरार होता. मात्र पोलिस आयुक्त सेनगावकार यांनी अखेर तौफिकवर स्थाबद्धतेची कारवाई केली. तौफिक हा एकेकाळी सुशीलकुमार आणि कन्या आमदार प्रणिती यांचा कट्टर समर्थक होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात काँग्रेस किंगमेकर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आज, मंगळवारी दुपारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून, दोन्ही पदे आणि सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीने ताकद पणाला लावली आहे. भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. भाजपने आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. तर राष्ट्रवादीकडून शितलदेवी आणि स्वरूपराणी मोहिते-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. खासदार विजयसिह मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजितसिह मोहिते-पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. २३ जागा जिंकून राष्ट्रवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाचीच मदत घ्यावी लागणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीने २३, भाजप-शिवसेना आघाडी २२, काँग्रेस ७, स्थानिक आघाडी १०, शेकाप ३ आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. ६८ सदस्य संख्या असलेल्या झेडपीमध्ये सत्ता स्थापन कारण्यासाठी ३५ जागांची जुळवाजुळव करण्यासाठी खासदार विजयसिह मोहिते-पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शेकाप ३ आणि अपक्ष किवा स्थानिक विकास आघाडीतील काहींना बरोबर घेऊन राष्ट्रवादी सत्ता स्थापन करू शकते, असे चित्र असतानाच भाजपने झेडपी ताब्यात घेण्यासाठी संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. मोहिते-पाटील विरोधक आणि विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढाचे समाधान आवताडे यांनीही भाजप पुरस्कृत महाआघाडीचे संजय शिंदे यांना मदत करण्याची तयारी दर्शविली असल्याने यामध्ये त्यांना कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे २३ सदस्य निवडून आले आहेत, त्यामध्ये तब्बल ८ सदस्य एकट्या माळशिरस म्हणजेच मोहिते-पाटील यांच्या तालुक्यातील आहेत. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाचे म्हणजेच काँग्रेसचे सहाजण आणि आणखी एक असे सातजण ज्या पक्षाबरोबर जातात त्या पक्षाची सत्ता झेडपीत येणार आहे. त्यामुळे आमदार म्हेत्रे हे सत्तेचे किंगमेकर ठरू शकतात. आघाडी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. शरद पवार यांनी लक्ष घातल्यास आणि शिंदे यांना बोलल्यास आघाडीचा अध्यक्ष होऊ शकतो, असे चित्र आज दिसून येत आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शिवसेना ४, शेकाप ३ असे ३७ संख्याबळाची जुळवाजुळव राष्ट्रवादी आघाडीने केली आहे. तर भाजप १४, परिचारक गट ६, भीमा परिवार ३, आवताडे गट ४, अपक्ष २, शिवसेना १ अशी ३१ जणांची जुळवाजुळव भाजप आघाडीने केली आहे. सत्तेसाठी जवळपास सहा जागा कमी पडत असतानासुद्धा माढामधील ७ सदस्य यांना गैरहजर ठेऊन भाजप आघाडीने चमत्कार घडविण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच शेकाप आणि काँग्रेस तटस्थ राहिल्यास भाजपाला विजय आणखी सोपा करण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरु असल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. एकूणच सत्तेसाठीचा मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'सैराट'मधील आर्चीची छेड काढणारा ताब्यात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । अकलूज (सोलापूर)

'सैराट'फेम आर्ची अर्थात, रिंकू राजगुरू हिची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय घरत असं या तरुणाचं नाव असून तो ठाण्याचा रहिवाशी असल्याचं समजतं.

मराठी सिनेसृष्टीत अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या 'सैराट' चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू अल्पावधीतच स्टार झाली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिला भेटण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत. यापूर्वीही अनेकदा तिला धक्काबुक्की झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी एका तरुणानं तिची छेड काढल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी करून दत्ता घरत याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सेना आमदार पाटीलविरोधात पोलिसात तक्रार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘शेतीच्या वादातून पोलिसात दाखल केलेली तक्रार माघार घे, नाहीतर तुला उलट टांगून मारीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात एका शेतकऱ्याने केला आहे. आमदार पाटील यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, असा तक्रार अर्जही शेतकरी रोहिदास राजाराम कांबळे यांनी पोलिस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडे केला आहे. नारायण पाटील करमाळ्याचे आमदार आहेत.

रोहिदास कांबळे यांची करमाळा तालुक्यात मौजे शेटफळ येथे शेतजमीन आहे. या शेतातील पाइपलाइन सचिन नरोटे यांनी फोडली. या विरोधात कांबळे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा माघार घ्यावा म्हणून नरोटे कांबळेंना धमकावत होता. या प्रकरणी शिवसेना आमदार नारायण पाटील यांनीही मोबाइलवरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज शेतकरी कांबळेंनी दाखल केला आहे. आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दहा एकर तुर जाळून टाकली

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

तुरीचे भाव पडल्यामुळे काढणी, मळणी आणि आडतीचा खर्चही निघत नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांने तुरीच्या दहा एकर उभ्या पिकाला आग लावून तूर जाळून टाकली. ही दुर्दैवी बासलेगाव (ता. अक्कलकोट) येथे रविवारी घडली.

अक्कलकोट तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी काढणी, मळणी, अडतीचा खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळ-मेळ बसत नसल्यामुळे पिकाची काढणी न करता उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. वर्षभर ज्या शेतीची निगा राखली तीच शेती पेटवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली.

शशिकांत बिराजदार सधन शेतकरी आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातल्या बासलेगावच्या पंचक्रोशीत ते प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. दर वर्षी साधारण १५० ते २०० क्विंटल तूर उत्पादन ते घेतात. यंदा ही त्यांनी आपल्या शेतात २६ एकर तूर पेरली होती. त्यापैकी १६ एकराची रास करून उत्पादनही घेतले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी विक्रीला पाठवली. परंतु, अजूनपर्यंत तूर विकली गेली नाही. ३५०० ते ४२००पर्यंत त्यांच्या तुरीला मागणी होती. परंतु सरकारने ५१०० रुपये हमी दराने विकत घ्यायचे धोरण जाहीर केल्यामुळे त्यांनी तुरीची विक्री केली नाही. काढणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत होणारा खर्च याचा कुठेच ताळमेळ लागणार नाही याचा अंदाज आल्याने दहा एकराच्या तूर शेतीला त्यांनी आग लावली. यंदा केलेली तूर शेती त्यांच्या अंगलट आली आहे.

गेल्यावेळी मिळालेला तुरीचा चांगला भाव पाहून त्यांनी तूर लावली. पण हळूहळू तुरीचे दर कोसळत गेले त्यामुळे बिराजदार यांनी किमान पुढील पिकासाठी शेत तरी मोकळे होईल म्हणून उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोट तालुक्‍यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगलेच नुकसान सहन करावे लागले आहे. हमीभाव देण्याच्या आणि तूर विकत घेण्याच्या सरकारी यंत्रणेवर आता शेतकऱ्यांचा विश्‍वास उडाल्याचेच या घटनेतून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी काठावर गाळपेरणी सुरू

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उजनी जलाशयातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जलाशयातील पाण्याने व्यापलेल्या जमिनी आता उघड्या पडल्या असल्याने या जमिनीवर उन्हाळी पिके घेण्याची बळीराजांची लगबग सुरू झाली आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोंढार चिंचोलीसह परिसरात असे चित्र दिसून येत आहे.

उजनी जलाशयामुळे लाखो सजीवांची पाण्याची गरज भागविली जात असतानाच जलाशयातील पाण्याच्या आधारावर हजारो शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. दरम्यान, जलाशयातील पाणी कमी फायद्या शेतकऱ्यांना होते आहे, पाणी घटत असताना उघड्या पडणाऱ्या जमिनीवर शेतकरी उन्हाळी पिकांचे उत्पादन घेतात. यंदाही सद्यस्थितीत उजनी काठावर अशा गाळपेरण्या सुरू आहेत. या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या जमिनींची हलकीशी मशागत करताना शेतकरी दिसून येत असून या भागात आता कडवळ, मका, कांदा, भुईमुग, मुग, बाजरी या पिकांची पेरणी होणार आहे.
कसदार जमिनी ठरतायत फायदेशीर

उन्हाळ्यात जलाशयाच्या पाण्याबाहेर पडणाऱ्या या जमिनीत गाळाचे प्रमाण जास्त असल्याने त्या कसदार असतात. या शिवाय जलाशयाकाठच्या या जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याची गरज नसते. एकदा पेरणी झाली की खत, पाण्याविना पिके बहारदार येतात. एकूणच अल्प कष्ट व खर्चात चांगले उत्पन्न मिळते. कोंढारचिंचोली, पारेवाडी, उमरड, पोमलवाडी, जिंती, टाकळी, कात्रजसह परिसरातील शेतकऱ्यांना असा अनुभव आहे.

वेगाने पाण्यात घट

यंदा उजनी ११० टक्के भरले होते. मात्र, सद्यस्थितीत पाण्याची घट वेगाने होऊ लागली आहे. मुख्यतः धरणातून खाली सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जलाशयातील पाणीसाठा पोटाच्या दिशेने खाली सरकत आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ होत आहे, अशा स्थितीत जलाशयाने व्यापलेला जमिनीचा भाग उघडा पडण्याचा वेग आता वाढणार आहे. जमिनी उघड्या पडल्या की त्या ठिकाणी गाळपेरणी करण्याची लगबगही वाढणार आहे.
उजनीच्या पाण्याच्या नियोजनाची मागणी

उजनी जलाशयाने शंभरी ओलांडली तरी उन्हाळ्यात जलाशयाची पाणीपातळी वजा होऊन पाण्याची अडचण निर्माण होते. शेती पंपांची वीज कपात केली जाते. परिणामी धरणासाठी त्याग करणाऱ्या शेतकऱ्यांना पिके जगविणे अवघड होते, अशी स्थिती दर वर्षी आढळून येते. यंदा पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणेच वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा मंत्री महाजन यांचीप्रतीकात्मक अंत्ययात्रा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी मागील पाच दिवसांपासून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोरड्या उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारी स्तरावर अद्याप आंदोलनाची दखल न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी केला.

मागील सतरा वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात येथील १४ गावांच्या शेतकऱ्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावल्या मात्र, त्यांना मोबादला मिळाला ना पाणी. आजही येथील शेतकरी पाण्यावाचून वंचित आहेत. शेतीला पाणी मिळेल याकडे या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची एक पिढी संपली आहे. सरकार अद्यापही चाल ढकल करीत असल्यामुळे सरकारला जाग अणण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मागील पाच दिवसांपासून ३० फूट खोल खड्यात बेमुदत आंदोलन सुरू आहे. यात आतापर्यंत प्रकृती खालावल्याने पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सरकारी स्तरावर आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शुक्रवारी जलसंपदा मंत्र्यांची यांची प्रेतयात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला. सरकारने आताही दखल न घेतल्यास मंत्री महोदयाना खरोखरच कॅनॉलमध्ये गाढू, असा इशारा या वेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सहाय्यक आयुक्तांच्याकार्यालयाची झाडाझडती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील कर्मचारी संजय होटकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले सहायक आयुक्त अभिजित हराळे यांच्या कार्यालयाची शुक्रवारी दुपारी सोलापूर पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, त्याना कोणतीही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली नाहीत.

संजय होटकर मनपाची वादग्रस्त ठरलेली कचरा टेंडरची फाइल सांभाळत होते. या पूर्वी बेकायदा काम करण्यासाठी दबाव टाकला म्हणून दोन नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून होटकर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच गुरुवारी त्यानी होटगी रस्ता परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिट्टीमध्ये सहायक आयुक्त हराळे यांच्यासह राजू सावंत, ए. के. आराधे यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. संबधितांनी भ्रष्टाचार केला असून, त्याची चौकशी करावी, असेही चिठीत लिहिले होते. त्यानंतर पोलिसांनी हराळे, सावंत आणि आराधे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी होटकर यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेले हराळे तसेच अन्य दोघांची चौकशी करण्यासाठी महापालिका गाठली. हराळे यांच्या कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली मात्र. पोलिसांच्या हाताला काहीही लागले नाही. परंतु आत्महत्येचे नेमके कारण कचरा टेंडरची फाइल होती की, आणखी काय याची चौकशी सदर बाजार पोलिस करीत आहेत. अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सातारा झेडपीचेअध्यक्ष संजीवराजे?

$
0
0



सातारा

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची रंगीत तालिम सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडले. दोन तासांच्या राजकीय खलबतानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले. उपाध्यक्ष निवडीसाठी पाटण तालुक्यातून माजी आमदार विक्रमसिह पाटणकर यांचे समर्थक राजेंद्र पवार व खटाव तालुक्यातून सुरेंद्र गुदगे यांच्या प्रत्येकी सव्वा वर्षे मुदत देण्याच्या चर्चा रंगल्या. या निवडी जवळपास निश्चित असून मंगळवारी प्रत्यक्ष सभेपूर्वी शरद पवार यांच्याकडून निवड जाहीर करणारा दूरध्वनी केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासदार उदयनराजेंवर मारहाण, खंडणीचा गुन्हा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील संघर्षातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन गटांतील संघर्ष पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे.

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर हे करतात. कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते तसेच त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजे यांचा आरोप होता. त्यामुळे १८ फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतले होते.

सातारा विश्रामगृहात आल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडे असलेला ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे यांचे समर्थक अशोक सावंत, रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल अशा ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफजलखानाच्या कबरीभोवतीच्या१९ अवैध खोल्या पाडण्याचे आदेश

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

किल्ले प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीभोवती वन खात्याच्या भूमीवर बेकायदा बांधण्यात आलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम काढून टाकण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च रोजी वनखाते आणि सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला आहे.

विधानभवनातील सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात दुपारी तीन वाजता श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. चर्चेनंतर त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा आदेश दिला.

या बैठकीला वन विभागाचे सचिव खारगे, मुख्य वनसंरक्षक पाटील, विभागीय वनअधिकारी अंजनकर, श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि सांगलीचे माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रितिनिधी उपस्थित होते.

अफझलखान कबर परिसरातील वनखात्याच्या भूमीवर केलेले बेकायदा बांधकाम त्वरित हटवण्यात यावे, असा आदेश मुंबई हायकोर्टाने सरकारला दोन वेळा दिला आहे. तरीही सरकारने बांधकामे हटविली नाहीत. या पूर्वीच्या सरकारने या विषयी काहीच कृती केलेली नाही. सरकारने संबधित बांधकामे हटवावीत, अशी मागणी नितीन शिंदे यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यांना अवैध बांधकामांची छायाचित्रेही दाखवली.

मुनगंटीवार म्हणाले, ‘वन खात्याच्या जमिनीवरील बेकायदा १९ खोल्यांचे बांधकाम हटवण्यात येईल; मात्र वनखात्याची जमीन सोडून अन्य ठिकाणी असलेले बांधकाम आम्हाला पाडता येणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर बंदला प्रतिसाद

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

जंगलात चोरून सुरू असलेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावांनी पुकारलेल्या तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांच्या असमाधानकारक तपासाच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तेथेच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले

गोहत्या व धोंडीबा आखाडे यांच्या खुनाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी तहसीलदार रमेश शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली

गोहत्या बंदी असतानाही महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात जंगलात गोहत्या केली जात आहे. तसेच देवळी गावातील वृद्ध शेतकरी धोंडीबा आखाडे यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून या दोन्ही घटनांचा परस्पर संबधित आहेत. मात्र, पोलिस या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासात दिरंगाई करीत आहेत. २५ दिवसांत पोलिस काहीच प्रगती करू शकले नाहीत, त्यामुळे तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांच्या अशा कामगिरीच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावातील जनतेने आज तालुका बंदची हाक दिली होती. या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. महाबळेश्वर बंद ठेवून तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने येथीय छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. तेथे छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मार्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, गणेश उतेकर आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात पाऊस

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अखेर रात्री सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहरासह परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाची चाहूल जाणवू लागली होती. त्यात मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तर उन्हाने अंगाची लाहीलाही होत होती. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर वगळता सर्वत्र पारा ४० अंशावर गेला होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अचानक ढगाळ वातावरण झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने गवत, काडी, लाकुड फाटा झाकून ठेवण्याची धांदल उडाली. रात्री सातच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाने सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. शाहुपुरी अंजली कॉलनी येथे जोरदार वाऱ्याने वडाचे झाड कोसळले. वीजवाहक तारा तुटल्याने शाहुपुरी करंजे सदर बझार बोगदा-पोवई नाका तसेच प्रतापगंज पेठ येथे सुमारे पाऊण तास वीज गायब झाली होती. संध्याकाळच्या वळीवाने वातावरणात काहीकाळ गारवा निर्माण झाला मात्र, पुन्हा अंगाची काहिली सातारकरांना सहन करावी लागली.

औंध परिसरात पावसाचा शिडकावा

शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास औंध परिसरात वादळी वारे, मेघगर्जनेसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

औंधच्या उत्तरेकडील जायगाव येथे सुमारे वीस मिनिटे पाऊस पडला. भोसरे, चौकीचा आंबा, वरूड, औंध व अन्य भागात पावसाचा काही प्रमाणात शिडकावा झाला. आकाश काळवंडून आल्याने जोरदार पाऊस होईल व हवेत गारवा निर्माण होईल, अशी आशा नागरिक, शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे पावसाने हुलकावणी दिली. रात्री उशीरा हवेत पुन्हा कमालीचा उष्मा निर्माण झाला होता, तसेच ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डॉ. अशोक चौसाळकरांनामहर्षी शिंदे पुरस्कार जाहीर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा २१वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना जाहीर झाला आहे. १९८० नंतरच्या काळात मराठी भाषेतील वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका डॉ. चौसाळकर यांनी बजावली आहे. प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते, दलितमित्र संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पुरस्काराचे वितरण रा. ना. चव्हाण यांच्या २४व्या स्मृतिदिनी, दहा एप्रिल रोजी ब्राह्म समाज रविवार पेठ, वाई येथे सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

दलितमित्र रा. ना. चव्हाण यांनी ज्यांच्या प्रेरणेने आपले प्रबोधनपर साहित्य समृद्ध व समर्थ केले त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात व साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दर वर्षी सन्मानपूर्वक दिला जातो. स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादक असलेले प्रा. डॉ. अशोक चौसाळकर राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. एक निष्णात राजकीय, सामाजिक विश्लेषक म्हणून ते सतत सक्रिय राहिले असून, त्यांनी संशोधनाच्या व वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून विपुल, अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे. १९व्या शतकातील सामाजिक आणि धर्मविचार हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images