Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कर्नाटकाला पाणी देण्यास आमदारांचा विरोध

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यास कृष्णा व कोयना नदी काठांच्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई उद्भवणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्ह्यातील आमदारांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

या बाबत सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आमदारांनी आपली पाणी सोडण्याविरोधी भूमिका मांडली.

दरम्यान, आमदारांचा वाढता विरोध लक्षात घेत विजय शिवतारे यांनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास महाबळेश्वर, पाटण, व जावली तालुक्यातील किती गावांमध्ये टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचा अभ्यास करून २४ एप्रिलच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीटंचाई आढाव बैठकीत जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, मोहनराव कदम यांच्यासह जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी कर्नाटकाला कोयना धरणातून देण्यात येत असलेल्या २.६५ टीएमसी पाणी देण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे.

जॅकवेल उघडे पडणार?

मकरंद पाटील यांनी धरणालगत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे जॅकवेल उघडे पडणार आहेत. त्यामुळे तेथील गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात येवू नये, अशी मागणी केली. पाटील यांच्या भूमिकेला शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच आमदारांनी पाठींबा दिला.
सिंचन, वीजनिर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा

कोयनेचे अभियंता ज्ञानेश्वर बागडेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

‘कोयना धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असून, कर्नाटकला दोन टीएमसी पाणी देऊनही जूनपर्यंत सिंचनासह वीजनिर्मितीला पाणी पुरून शिल्लक राहील इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे,’ अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

कर्नाटकसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बागडे म्हणाले, ‘राज्यात भीषण पाणीटंचाई असताना कर्नाटकाला पाणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. आज रोजी धरणात ३९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. वीज निर्मितीला लागणारे पाणी तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागून यंदा पावसाळ्यापर्यंत काही पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा याच दिवशी १३ एप्रिल रोजी धरणात ४ टीएमसी जादा पाणी आहे. धरणातील एकूण पाण्यापैकी वर्षभरात सरासरी ६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. या सर्व बाबींचा विचार करूनच हा निणय घेतला आहे, त्यामुळे येथील जनतेने या बाबत साशंकता बाळगू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भीषण अपघातात मिनी बसचा चुराडा; ६ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

मिरज-पंढरपूर रस्त्यार शुक्रवारी पहाटे मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

अपघातग्रस्त मिनी बसमधील प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील माले गावचे असल्याचं समजतं. हे सगळेजण पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना आवळगाव फाटा इथं त्यांची मिनी बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागच्या बाजूने येऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. त्यात सहा लोक जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलं, एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर चालक संदीप यादव फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृतांची नावे:

नंदकुमार जयंत हेगडे (वय ३७)
रेणुका नंदकुमार हेगडे (३५)
आदित्य नंदकुमार हेगडे (१२)
लखन राजू संकाजी (३६)
विनायक मार्तंड लोंढे (४०)
गौरव राजू नरदे (७)

गंभीर जखमी

रेखा राजाराम देवकुळे (४०)
स्नेहल कृष्णात हेगडे (२०)
काजल कृष्णात हेगडे (१९)

जखमी

सावित्री बळवंत आवळे (५५)
शीतल सुनील हेगडे (४२)
सोनल कांबळे (३६)
कोमल हेगडे (२०)
कल्पना बाबर (४०)
अनमोल हेगडे (१२)
गौरी हेगडे (७)
शुभम कांबळे (१०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयित पोलिस अद्याप फरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील १४ कोटी रुपयांच्या लुटीतील संशयित पोलिस अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. संशयितांनी पोलिसात हजर राहावे, यासाठी सीआयडीने संशयितांच्या नातेवाईकांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली असून, त्यांना फरार घोषित करण्यासाठी कोर्टात अर्ज सादर केला आहे. दरम्यान, सीआयडीच्या एका पथकाने मंगळवारी सकाळी मिरज येथून वारणा लुटीच्या संदर्भात महत्त्वाची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत फ्लॅट क्रमांक ३ मध्ये मैनुद्दीन मुल्ला या चोरट्याने साथीदारांसह कोट्यवधी रुपयांची चोरी केली होती. या चोरीची माहिती सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर त्या पोलिसांनी मैनुद्दीन मुल्ला याला अटक करून तपासाच्या नावाखाली वारणेतील रकमेवर डल्ला मारला होता. ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर संशयित पोलिस सांगलीतून बेपत्ता झाले आहेत. पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मैनुद्दीन मुल्ला, प्रवीण भास्कर सावंत यांच्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटले मात्र अद्याप हे संशयित गायब आहेत.

पोलिसांनी संशयित पोलिसांच्या घरांवर निलंबनाच्या नोटिसा लावल्या होत्या. याशिवाय सांगली, मिरज, कौलापूर आणि पुण्यातही छापे टाकून संशयितांचा शोध घेतला, मात्र संशयित हाती लागले नाहीत. सीआयडीच्या पथकाने मंगळवारीदेखील सांगलीत जाऊन संशयितांचा शोध घेतला. संशयितांचे मोबाइल नंबरही स्विचऑफ असल्याने त्यांनी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर व्हावे, यासाठी त्यांच्या नातेवाईकांवर दबाव टाकण्यात येत आहे. काही नातेवाईकांचीही चौकशी करून संशयितांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यास मात्र सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने योग्य दिशेने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले.

संशयितांना फरार घोषित करा

सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह सात पोलिस, चोरटा मैनुद्दीन मुल्ला आणि पोलिसांच्या एका साथीदारावर १६ एप्रिल रोजी कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दहा दिवस उलटूनही संशयित गायब आहेत. या सर्व संशयितांना फरार घोषित करावे, असा अर्ज पोलिसांनी पन्हाळा न्यायालयात सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झहीर खान होणार कोल्हापूरचा जावई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जलदगती गोलंदाज झहीर खान कोल्हापूरचा जावई होणार असून अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी साखरपुडा झाला आहे. त्याने सोमवारी (ता. २४) ट्व‌िट करून साखरपुडा झाल्याची खूशखबर दिली आहे. अभिनेत्री सागरिका ही नागाळा पार्कातील विजयेंद्र घाटगे (ज्युनिअर) यांची मुलगी आहे. विजयें‌द्रही प्रसिद्ध अभिनेते आहेत.

गेल्या काही दिवसांपासून झहीर खान व सागरिका घाटगे यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू होत्या. क्रिकेटपटू युवराज सिंग व अभिनेत्री हेजल यांच्या विवाह समारंभात ते दोघे एकत्र दिसून आले होते. दोघांच्या नात्यांची जोरदार चर्चा सुरू होती. पण त्यांनी नात्याबाबत खुलासा केला नव्हता. सध्या आयपीएल क्रिकेटची धूम सुरू असून झ​हीर खान दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघाचा कर्णधार आहे. आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच झहीर खानने व्टिट करून साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. सहा महिन्यांपूर्वी झहीर व सागरिका यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आहे. दोघांचा साखरपुडा झाला असून लवकरच विवाहाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.

झहीरने आयपीएलमध्ये ९५ सामने खेळला असून ९९ बळी मिळवले आहेत. मुळचा श्रीरामपुरचा (ता. अहमदनगर) असलेल्या डावखुऱ्या झहीरने बडोद्याकडून रणजी सामन्यात पदार्पन केले होते. नंतर तो मुंबईकडून खेळला. भारताकडून ९२ कसोटीत जलदगती गोलंदाजाची धुरा सांभाळताना ३११ बळी मिळवले आहेत. एकदिवसीय सामन्यात २८२ तर प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये ६५३ बळीची नोंद त्याच्या नावावर आहे.

सागरिका ही मुळची कोल्हापुरची असून शाहू विद्यालयात दोन वर्षे शिकत होती. बास्केटबॉलमध्ये तिने प्राविण्य मिळवले होते. कोल्हापुरातील दोन वर्षे वगळता तिचे शिक्षण मुंबईत झाले. हॉकीवर आधारित शाहरूख खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात सागरिकाने उत्कृष्ट अभिनय केला होता. तिने ‘फॉक्स’, ‘रश’, ‘जी भर ले, जी ले’ या चित्रपटात या हिंदी,‘दिलदरिया’ या पंजाबी तर सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटात तिने अतुल कुलकर्णीबरोबर मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांच्या आश्वासनाचा राज्य सरकारला विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘गेल्यावर्षी तुरडाळ महाग झाल्यावर स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावरुन भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना तूरडाळ पिकवण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी पिकवलेली तूरडाळ सरकार खरेदी करेल असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी तूरडाळीचे प्रचंड उत्पादन घेतले. पण राज्य सरकारला पंतप्रधानांच्या तूर खरेदीच्या आश्वासनाचा विसर पडला असून त्यांनी तूरडाळ खरेदीची केंद्रे बंद केली आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर खरेदी करण्याची राज्य सरकारची दानत नाही’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार अजित पवार यांनी केली. तर ‘व्यापाऱ्यांनी तूर खरेदीत महाघोटाळा केला असून हे सरकारचे अपयश आहे’ असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पा​टील केला. राज्य सरकारने तूर खरेदी ताबडतोब सुरू करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई भरुन काढण्यासाठी बोनस द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

कसबा बावडा येथील राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळी शाहूंना अभिवादन करुन शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत संघर्ष यात्रेस प्रारंभ झाला. राज्यातील भाजप सरकार जावे असे साकडे विरोधी पक्षाच्यावतीने करवीरनिवासिनी अंबाबाईला घालण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अजित पवार यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत संघर्ष यात्रेची माहिती दिली.

विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची भाजप सरकारची मानसिकता नाही. त्यांचे गडचिरोलीचे नेते ‘शेतकरी आळशी असल्याने त्यांना कर्जमाफी देऊ नये’ असे वक्तव्य करुन शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींना नोबेल पारितोषिक दिले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर तूर खरेदी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. तूर ​खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या असताना अचानक राज्य सरकारने तूर खरेदीची केंद्रे अचानक बंद करुन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तुरीच्या शेवटच्या तुकडा खरेदीपर्यंत केंद्रे सरू ठेवावी.’ तूर खरेदी बंद पाडण्यासाठी शेतकऱ्यांच्यावर पोलिस बळाचा वापर केल्यास विरोधी पक्ष रस्त्यांवर उतरतील असा इशारा दिला.

अजित पवार म्हणाले, ‘तूर खरेदीचे केंद्र सरकारने वेळेत सुरु न केल्याने शेतकऱ्यांनी सुरवातीला व्यापाऱ्यांना ३५०० रुपये क्विंटलने तूर विकली. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली तूर व्यापाऱ्यांनी सरकारने उघडलेल्या तूर केंद्रावर ५०५० रुपयांना विकली. तुरीला दर मिळाल्यावर शेतकऱ्यांनी सरकारने सुरु केलेल्या तूर केंद्रावर तूर खरेदी करण्यास आणल्यावर सरकारने तूर खरेदी बंद केली. तूर खरेदीच्या नियोजनात आमची चूक झाली असे सरकारमधील मंत्री सांगत आहेत. पण त्याचा फटका तूर पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे.’ राज्य सरकारने तूर खरेदी केंद्र ताबडतोब सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांना बाइक देण्याची हौस नडली, चौघा पालकांवर गुन्हे दाखल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम
हौसेपोटी अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणाऱ्या पालकांना आता दंडाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. पोलिसांनी या नियमांची अंमलबजावणी सुरू केली असून, थेट पालकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. करवीर पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शहर वाहतूक शाखेने अल्पवयीन वाहनधारकांच्या पालकांकडून सुमारे २४ हजार दंडाची वसुली केली आहे. यापुढे नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याने मुलांच्या चुकीचा भुर्दंड पालकांना सोसावा लागणार आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीलाच वाहन चालवण्याचा परवाना मिळतो. विनापरवाना वाहन चालवणे गुन्हा आहे, मात्र हौसेपोटी पालक याकडे दुर्लक्ष करून अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी सोपवतात. अगदी शालेय मुलांनाही दुचाकी मिळत असल्याने ही मुले अपघातांना निमंत्रण देतात. अतिउत्साह आणि परिणामांचे भान नसल्याने मुलांच्या हातून अपघात घडतात. गतीचे वेड आणि काही क्षणांचा बेदरकारपणा आयुष्यभरासाठी अपंगत्व देणारा ठरतो. काहीवेळा तो जिवावरही बेततो. मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी पालक त्यांच्या हातात महागड्या वेगवान दुचाकी देतात, मात्र याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. अशा अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यापासून रोखण्याचे अभियान पोलिसांनी सुरू केले आहे. बेदरकारपणे वाहने चालवणारी मुले दोषी आहेतच, मात्र त्यांच्या हाती दुचाकी देणारे पालक त्याहूनही दोषी आहेत. त्यामुळे पालकांनाही शिक्षेच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत.
पालकांनी मुलांना दुचाकी देऊ नयेत, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले होते. गेली चार महिने याबाबत विविध माध्यमातून नागरिकांचे उद्बोधन केले जात आहे. शाळा-महाविद्यालयात पालक बैठका, सोशल मीडिया यातून तसे संदेशही दिले आहेत. यानंतरही मुलांच्या हाती दुचाकी देण्याचे प्रमाण कमी झाले नसल्याने पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अल्पवयीन मुलांकडे दुचाकी देऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल करवीर पोलिसांनी लीला बंडोपंत बराले (वय ७५, रा. वडणगे, ता. करवीर) आणि समर्थ सुखदेव सुतार (वय २१, रा. माळवाडी, वडणगे, ता. करवीर) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी समज दिली असून, त्यांच्याकडून पुन्हा असा गुन्हा न करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. शहर वाहतूक शाखेनेही गेल्या महिन्याभरात ४८ अल्पवयीन वाहनचालकांना पकडून त्यांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई केली. यातून सुमारे २४ हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला. ही कारवाई यापुढे काटेकोरपणे केली जाणार असल्याचे आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

रोज १० अपघाती मृत्यू
कोल्हापूर परिक्षेत्रात अपघातांमुळे रोज किमान दहाजणांना जीव गमवावा लागतो. घरातून बाहेर पडलेले दहा लोक सुखरूप घरी पोहोचत नाहीत, तेव्हा दहा कुटुंबे उद्धवस्त होतात. शिवाय अपघातातील जखमींना आयुष्यभराचे अपंगत्व येते. हे टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे. अल्पवयीन मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांनाच पुढाकार घ्यावा लागेल. पालकांनी याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीरनगरीत घुमला कर्जमाफीचा आवाज

$
0
0

संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ

कोल्हापूर टाइम्स टीम
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख ‌विरोधी पक्षांसह अन्य पक्षांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा मंगळवारी कोल्हापुरात सुरू झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कोणत्याही परिस्थिती सरकारने शेतक ऱ्यांचा सातबारा कोर केलाच पाहिजे, अशी मागणी यावेही करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील जन्मस्थळाला वंदन तसेच करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन या यात्रेचा प्रारंभ झाला.
संघर्ष यात्रेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील, आमदार सुनील केदार, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार विद्या चव्हाण, प्रकाश गजभिये, माजी खासदार निवेदिता माने, महापौर हसीना फरास, नांदेडचे वसंत चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे प्रविण गायकवाड सहभागी झाले आहेत.

कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळातील शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन संघर्ष यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. शाहू जन्मस्थळापासून आराम बसने संघर्ष यात्रा अंबाबाई मंदिरात आली. यावेळी सर्व नेत्यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन शेतकरी कर्जमाफीसाठी देवीला साकडे घातले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विखे-पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यमान सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. तूर उत्पादकांना लुटण्यासाठी व्यापाऱ्यांना राज्य सरकारने खुला परवाना दिल्याची टीका यावेळी करण्यात आली. राज्य सरकारकडून शेतकऱ्याच्या कर्जमाफीप्रश्नी चालढकल होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अंबाबाईचे दर्शन घेऊन यात्रा मुदाळतिट्टा (ता. भुदरगड) येथे गेली. तेथे जाहीर सभा झाल्यानंतर यात्रा परत कोल्हापुरात आली.

ठाकरे बडे मियाँ, शेट्टी छोटे मियाँ

खासदार राजू शेट्टी सरकारमध्ये राहून सरकारवर टीका करत आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली. सरकारमध्ये राहून टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘बडे मियाँ’ असून खासदार राजू शेट्टी हे ‘छोटे मियाँ’ असल्याची टीका त्यांनी केली. खासदार शेट्टी यांच्याकडे ‘नाफेड’चे अधिकारी व व्यापाऱ्यांचे संगनमत असल्याची माहिती असेल तर त्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत. सत्तेचे सर्व लाभ घेऊन ठाकरे आणि शेट्टी सरकारवर टीका करत आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

सदाभाऊंना इव्हेंट मॅनेजमेंटची लागण

भाजपमधील इव्हेंट मॅनेजमेंटची लागण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना झाली आहे, असा टोला विखे-पाटील यांनी लगावला. सदाभाऊंनी मध्यंतरी आठवडी बाजारात भाजी विकण्याचे नाटक केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या नेत्याला भाजपच्या इव्हेंट मॅनेजमेंटची एवढ्या लवकर लागण होईल, असे वाटत नव्हते, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोल्हापुरातील नेत्यांचे मतभेद दूर कर

अजित पवार अंबाबाईचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांना देवीकडे काय मागितले? असा प्रश्न केला. यावेळी पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची सरकारला बुद्दी दे. कोल्हापुरातील नेत्यांचे मतभेद दूर करुन त्यांना एकत्र कर, असे साकडे घातल्याचे सांगताच उपस्थित राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली. एकीकडे सर्व विरोधी पक्ष एकत्र असताना स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांतील अबोला यावेळी स्पष्ट जाणवत होता.

खासदार साइड ट्रॅकवर

आमदार म़ुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्याकडे संघर्ष यात्रेचे नियोजन आहे. यात्रेत खासदार धनंजय महाडिकही सहभागी झाले. मंदिरात आमदार मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, महापौर हसीना फरास, सर्जेराव पाटील हे एका बाजूला होते तर खासदार धनंजय महाडिक दुसऱ्या बाजूला एकटेच उभे होते. आमदार कुपेकर आल्यावर खासदार महाडिक यांचा एकटेपणा दूर होण्यास काही काळ मदत झाली.


तर पालकमंत्र्यांचा सत्कार करू...

थेट पाइपलाइनप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अडचणी दूर कराव्यात, अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पालकमंत्री पाटील हे खासगीत ‘नेक्स्ट मुख्यमंत्री’ म्हणून सांगत असल्याने त्यांनी थेट पाइपलाइनचे काम वेगाने होण्यासाठी सरकारी दरबारी परवानगी प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला. पालकमंत्र्यांनी थेट पाइपलाइनचा प्रश्न मार्गी लावला तर जाहीर सत्कार करु, असेही चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रमाग कामगाराची आत्महत्या

$
0
0

इचलकरंजी

कबनूर येथील दत्तनगर परिसरातील आभिजीत चव्हाण या यंत्रमाग कामगाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कबनूरमधील दत्तनगर गल्ली नं. ९ मध्ये अभिजित चव्हाण हा कुटुंबासह गेल्या काही वर्षापासून राहतो. अभिजित हा नेहमीप्रमाणे कामाला जाऊन सकाळी आल्यानंतर विश्रांतीसाठी त्याच्या खोलीत गेला. मात्र बराच वेळ झाला तो बाहेर आला नाही म्हणून त्याचा भाऊ त्याला पाहण्यास गेला असता अभिजित याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तत्काळ त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीप घरावर आदळून दोन ठार

$
0
0

शाहूवाडी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील गोगवे (ता.शाहूवाडी) येथे चालकाचा ताबा सुटून कमांडर जीप रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या घरावर आदळून झालेल्या अपघातात दोन जागीच ठार झाले. तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा रंगराव जाधव (जीपचालक, वय ३२), भारती भीमराव जाधव (वय ४५, दोघेही रा. भाडळेपैकी व्हरकटवाडी, ता. शाहूवाडी) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी (ता. २५) दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली . अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भाडळेपैकी व्हरकटवाडी (ता.शाहूवाडी) येथील कृष्णा जाधव या चालकासह अन्य दहाजण मंगळवारी सकाळी जुगाई येळवण (ता.शाहूवाडी) येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून माघारी परतत असताना वाटेत दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील गोगवे येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी ही भरधाव कमांडर जीप रस्त्याच्या उजव्या बाजूला सात फूट खाली उतरून रस्त्यापासून पंचवीस फुटावरील अशोक माने यांच्या रहात्या घरावर जाऊन आदळली. या विचित्र आणि भीषण अपघातात जीपचालक कृष्णा जाधव व भारती जाधव हे गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले. भारती जाधव ही महिला घरावर जीप धडकण्यापूर्वीच हेलकाव्याने जीपच्या चाकाखाली सापडून तर जीपचालक कृष्णा हा जळाऊ लाकडाच्या ढिगाऱ्यातील एक लाकूड उडून ते गळ्यात खोल घुसून गतप्राण झाला. सुदैवाने माने यांच्या घरात व समोरील अंगणात कोणीही उपस्थित नसल्याने अधिक अनर्थ टळला. माने कुटुंबिय देखिल देवदर्शनासाठी सकाळीच घराबाहेर गेले होते, अशी माहिती यावेळी प्रत्यक्षदर्शीनी दिली.

अपघातग्रस्त जुन्या मॉडेलची ही कमांडर जीप मधूनच मोडली तर माने यांच्या रहात्या घराचेही या अपघातात नुकसान झाले आहे. येसाबाई ज्ञानू जाधव, कमल बाजीराव पाटील, शांताबाई बापू जाधव, सुनिता भगवान वाळके, विमल पांडूरंग वाळके, लक्ष्मी राजाराम वाळके, रंजना तुकाराम आरेकर (सर्व रा. भाडळे पैकी व्हरकटवाडी, ता. शाहूवाडी) या नऊ जखमींना उपचारासाठी तातडीने बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैदानाचे आरक्षण रद्द

$
0
0

इचलकरंजी

शहरातील गोसावी समाजाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोपडपट्टीचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जागा आरक्षणात बदल करण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. कन्या शाळा विस्तार व व्यंकटराव हायस्कूलचे खेळाचे मैदान या कारणासाठी ही जागा आरक्षित होती. मात्र मंत्रिमंडळाने शिक्षण आणि खेळावर गदा आणत झोपडपट्टीधारकांना दिलासा दिला आहे. या संदर्भात शहरात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. या निर्णयामुळे मागील ७० वर्षे प्रलंबित असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच गोरगरीब व भटके जीवन जगणाऱ्या गोसावी समाजातील नागरिकांना घरे मिळणार आहेत.

दोन एकर २९ गुंठे जागेवर गोसावी झोपडपट्टी वसविण्यात आली आहे. या जागेवर कन्या शाळा विस्तार व व्यंकटराव हायस्कूलचे खेळाचे मैदान असे आरक्षण होते. झोपडपट्टीचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन होण्यासाठी जागा आरक्षणात फेरफार करून झोपडपट्टी पुनर्वसन असा बदल करणे गरजेचे होते. या संदर्भात १९९८ मध्ये नगरपरिषदेने ही झोपडपट्टी हटविण्याचा ठराव केला होता. त्यानंतर १९९९ मध्ये झोपडपट्टीधारकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केल्यानंतर नगरपरिषदेच्या सभेत नव्याने ठराव करुन झोपडपट्टी तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २००१ मध्ये नगरपरिषदेने नव्याने सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. परंतु २०१० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तो प्रस्ताव नामंजूर केला होता. त्यानंतर पुन्हा २०११ मध्ये प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली होती. भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे मार्च २०१६ मध्ये झालेल्या बैठकीत प्रस्तावाच्या मंजुरीला गती मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेवून प्रस्तावाला चालना मिळून अखेर मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली.

दरम्यान, हा आनंददायी निर्णय कळताच माजी नगरसेवक वसंत माळी यांच्या नेतृत्वाखाली गोसावी झोपडपट्टीतील कार्यकर्त्यांनी साखर व मिठाई वाटप करून आपला आनंद साजरा केला.

याठिकाणी नगरपरिषद व राज्य सरकारच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांसाठी ७०० घरकुले बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करुन १००० हजार घरकुले बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शाळेच्या विस्ताराचा आणि खेळाच्या मैदानाचे आरक्षण रद्द करुन झोपडपट्टीधारकांचे त्याचठिकाणी पुनर्वसन करण्याचा अलिकडच्या काळातील हा पहिलाच निर्णय आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आरक्षण उठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना खुर्ची गमवावी लागली. त्यानंतर असा धाडशी निर्णय कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शाळा विस्तार व खेळाच्या मैदानाला फुली मारत झोपडपट्टीला मोकळीक दिली आहे.

.................

कोट

‘या जागेच्या संदर्भात उच्च न्यायालयात वाद प्रलंबित होता. यावर तोडगा काढताना नगरपरिषदेने पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याच्या अटीवर व्यंकटराव हायस्कूलला न्यायालयातून दावा मागे घेण्यास सांगितले. मात्र जागा देणे दूरच, आहे त्या जागेवरील आरक्षण रद्द करुन आमची फसवणूक केली आहे. नगरपरिषदेने पर्यायी जागा न दिल्यास त्या संदर्भात न्यायालयात दाद मागण्याचा विचार आहे.

-कौशिक मराठे, संचालक, इचलकरंजी एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाडलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी हवीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘राज्य सरकार सरसकट कर्जमाफी देणार नाही’ या राज्य सरकारच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार अजित पवार यांनी ‘हे सरकार वेडे आहे’ असे टीकास्त्र सोडले. ‘जो शेतकरी नाडला आहे, गांजला आहे, आत्महत्येस प्रवृत्त होण्यापर्यंत आला आहेस त्या शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. एक मे रोजी राज्यातील सर्व ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असा ठरावा करावा, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व ग्रामपंचायतींना केले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेतील पत्रकार परिषदेत कर्जमाफीच्या मागणीचा विखे पाटील व पवार यांनी पुनरुच्चार केला. सरसकट कर्जमाफी केली जाणार नाही या वक्तवाचा समाचार घेताना पवार म्हणाले, ‘शेतकरी हा प्रामाणिकपणे कर्ज फेडत असतो. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज फेडले आहेत. पण ज्यांना शेतीत उत्पन्न मिळाले नाही ते कर्जाने नाडले आहेत. कर्ज फिटत नसल्याने ते आत्महत्येसारखे मार्ग पत्करत आहेत. असे अनेक शेतकरी असून त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. केंद्रात, राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको असे सभागृहात भाजपचे आमदार वक्तव्य करत आहेत. कोल्हापूर हा सधन भाग असताना संघर्ष यात्रा कशाला असा प्रश्न सत्ताधारी विचारत आहेत. पण शेतकऱ्यांच्यात भेदभाव करु नये असा चेन्नई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. तामिळनाडूतील शेतकरी दिल्लीत उन्हात उपोषण करत आहेत. त्यांनी मूत्र प्राशन केले आहे. विष्ठा खाण्याची धमकी दिली आहे. पण तरीही केंद्र सरकार लक्ष देत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘शाश्वत शेती’ हा शब्द प्रयोग करत आहेत. राज्यातील सरकार शाश्वत शेती करत नसतील तर मग भरघोस उत्पादन कसे होते? असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कधी शेती केली नसल्याने ते शाश्वत शेती असे शब्द प्रयोग करत आहे, अशी खिल्लीडी त्यांनी उडवली.

‘देशात साखरेचे २४० मेट्रीक टन उत्पादन झाले आहे. पुढच्या वर्षासाठीही ४० लाख मेट्रीक टन साखर शिल्लक राहू शकते. तरीही केंद्र सरकारने साखर आयात करुन साखरेचे दर पाडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे व व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राज्यातील शेतकऱ्यांची ३० लाख ५०० कोटी रुपये कर्जमाफी करण्याची आकडेवारी असताना ते कशाचा अभ्यास करत आहेत. आणखी किती शेतकऱ्यांची आत्महत्या केल्यावर राज्य सरकार कर्जमाफी करणार’ असा प्रश्न पवार यांनी केला.

विखे पाटील म्हणाले, ‘राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी अखेरपर्यंत विरोधी पक्ष संघर्ष करणार आहे. राज्यात शेतकऱ्यांना किती कर्जमाफी द्यावयाची आहे याची माहिती राज्य सरकारकडे असताना अभ्यासाच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा काढत आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब कर्जमाफी करावी.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीसाठी विक्रीकर कार्यालयात स्वतंत्र सेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्याची १ जुलैपासून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विक्रीकर विभागाने विशेष जीएसटी सेल स्थापन केला आहे. मंगळवारपासून (२५ एप्रिल) विक्रीकर विभागाचे अधिकारी ठिकठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत.

विक्रीकर विभाग, केंद्रीय अबकारी विभाग आणि सीमा शुल्क विभाग हे संयुक्तपणे या कायद्याची अंमलबजावणी करणार आहेत. त्यानुसार विक्रीकर कार्यालयाने विशेष जीएसटी सेल स्थापन केला असून त्याचे पर्यवेक्षण उपआयुक्त सचिन जोशी करणार आहेत.
जीएसटीबाबतचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण सहाय्यक विक्रीकर आयुक्त नितीन बांगर देणार असून व्यापारी, उद्योजक व नागरिक यांच्यासाठी जागरुकता शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. संगणीकृत जीएसटी प्रणालीचे प्रशिक्षण १८ एप्रिल ते ५ मे या कालावधीत विक्रीकर कार्यालयात देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी विक्रीकर विभागातील ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणकीय प्रशिक्षण देणार आहेत. त्यासाठी संगणकीय प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या कार्यशाळेत ज्ञानोबा मुके, विकास पवार, अमित हसबनीस, संतोष साळुंखे, विक्रीकर अधिकारी चारुशीला काणे प्रशिक्षण देणार आहेत.

२५ ​एप्रिल रोजी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, २६ ​एप्रिल रोजी रोटरी क्लब इचलकरंजी तसेच चेंबर्स ऑफ कॉमर्स, गडहिंग्लज शिबिर घेण्यात येणार आहे. २७ एप्रिल रोजी शिरोली मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन, एम.आय.डी.सी. शिरोली येथे मार्गदर्शन केले जाणार आहे. यापुढे कोल्हापूर, जयसिंगपूर, शिरोळ, पंचतारांकित एम.आय.डी.सी., गारगोटी व चंदगड या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जी.एस.टी.बाबत काही शंका असल्यास नितीन बांगर, सहाय्यक विक्रीकर आयुक्त आणि महाविकास यांच्याशी ०२३१-२६८९२७४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहआयुक्त विलास इंदलकर यानी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारूविक्रीने नागरिक बेजार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महामार्गाजवळ ५०० मीटर अंतरातील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील १०२९ दुकानांना कुलूप लागले. यात शहरातील १६१ दुकानांचा समावेश आहे. दारूविक्रीची मोजकीच दुकाने आणि बिअर बार सुरू असल्याने या ठिकाणांवर तळीरामांची मोठी गर्दी होत आहे. बिअरबार फुल्ल होत असल्याने तळीरामांकडून खुल्या जागांचा वापर ओपन बार म्हणून होत आहे. काही दुकाने आणि बिअरबार भरवस्तीतही आहेत. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत या दुकानांबाहेर वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. ही अवैध दारू विक्री नागरिकांच्या मुळावर येत आहे.

पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागानेही कारवाया करण्यात हात आखडता घेतल्याने अवैध दारू विक्री आणि ओपन बारचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सुप्रिम कोर्टाने महामार्गावरील ५०० मीटर अंतरातील दारू विक्री बंद करण्याचे आदेश दिले. १ एप्रिलपासून निर्णायांची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयाने तळीरामांची पंचायत झाली. शहरात बिअरबार, वाईन शॉप आणि देशी दारूची विक्री करणारी २१० दुकाने आहेत. यातील १६१ दुकानांना कोर्टाच्या निर्णयाचा दणका बसला. शहरात ४९ दुकाने सुरू आहेत. विशेष म्हणजे शहरातील बहुतांश मोठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील परमिटरूम बार बंद झाले आहेत. महामार्गांलगत मोक्याच्या ठिकाणी असलेली दारू दुकाने बंद असल्याने आडमार्गांवरील दुकानांत तळीरामांच्या रांगा लागत आहेत.

काही दुकाने आणि बिअरबार भरवस्तीतही आहेत. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत या दुकानांबाहेर वाहनांची गर्दी होते. त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. तळीराम अक्षरशः रांगा लावून दारू खरेदी करतात. काही ठिकाणी तर दुकानांच्या आसपासही अवैध विक्री सुरू असते. सर्वच बिअरबार फुल्ल असल्याने तळीरामांनी शहरातील ओपन स्पेस, उद्याने आणि रिंगरोडच्या फूटपाथवरही आक्रमण केले आहे. यामुळे रात्री जेवल्यानंतर पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या ओपन बारच्या धास्तीने परतावे लागते. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही दारूच्या रिकाम्या बाटल्यांमधून वाट काढावी लागते.

दारूबंदीच्या पहिल्या आठवड्यात तर दुकानांसमोर तळीरामांची गर्दी उसळली होती. काही विक्रेत्यांनी छुपी दारूविक्री सुरू केल्याने दुकानांसमोरील गर्दी काहीशी कमी झाली. अजूनही काही विक्रेते दुकानांसमोर वाहने लावून त्यातून विक्री करतात. महामार्गांवरही रात्री काही ठिकाणी वाहनांमधून दारूविक्री सुरू आहे. या अवैध विक्रीचा नागरिकांना त्रास होतो. मात्र तक्रारी करण्यासाठी नागरिक धजावत नाहीत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शाहूपुरीतील एका विक्रेत्याने थेट दुकानाबाहेर स्टॉल मांडून विक्री सुरू ठेवली होती. याबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी विक्रेत्यावर कारवाई केली. मात्र याव्यतिरिक्त जिल्ह्यात एकाही ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई केली नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवायाही जुजबी आहेत.


रिंगरोडवर ओपन बार

शहराभोवती प्रशस्त रिंगरोड आहेत. सकाळी मॉर्निंग वॉक आणि रात्रीच्या वेळी सहकुटुंब फेरफटका मारण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. महामार्गांवरील दारूबंदीनंतर मात्र रिंगरोडचे रुपांतर ओपन बारमध्ये झाले आहे. रस्त्याकडेला वाहने लावून काही टोळकी थेट फूटपाथवर बसतात, तर काही अक्षरशः रस्त्यातच बसतात. शहरातील बावडा ते शिये टोल नाका, मिलिटरी कॅन्टीन ते विद्यापीठ चौक, विद्यापीठ चौक ते सायबर चौक, सायबर चौक ते संभाजीनगर रिंगरोड, फुलेवाडी रिंगरोड हे रिंगरोड अपन बार बनले आहेत. या ठिकाणी एकदाही कारवाई झाली नाही.

एकूण दारूविक्री दुकाने – १६२६

बीअर शॉपी ६५०

परमिट रुम – ६५०

देशी दारू – २८३

वाईन शॉपी – ४३

शहरातील दुकाने – १२०

बंद दुकाने – १६१

चौकट – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाया

कारवाया – ५६

अटक – ५६

जप्त वाहने – ३

जप्त मुद्देमाल – ६ लाख ५८ हजार ६८८ रुपये


महामार्गांवरील दारूबंदीची अंमलबजावणी सुरू असून, अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. अवैध विक्रीवर कारवाया करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांतर्फे पोलिस अधीक्षकांना दिले आहे. शिवाय आमची सात पथके कार्यरत आहेत. गेल्या २३ दिवसांत सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

संजय पाटील – प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

‘दुकानांचे स्थलांतर हा

सुप्रिम कोर्टाचा अवमान’

दरम्यान, महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील दुकाने स्थलांतरित करणे हा सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने (आप) केला आहे. महामार्गांवरील दारूबंदीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक संजय पाटील यांना सोमवारी निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, महामार्गांवरील दारू दुकाने इतरत्र हलवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. हे गैरकृत्य असून, सुप्रिम कोर्टाच्या निर्णायाचा अवमान आहे. अवैध पद्धतीने दारूविक्री सुरू असून, पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणीही या विभागाकडून होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दोनवेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी संपत्तीचे विवरणपत्र सरकारकडे सादर केलेले नाही. अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा आपच्या कार्यकर्त्यानी दिला आहे. नारायण पोवार, संदीप देसाई, जयवंत पोवार, नीलेश रेडेकर, नाथाजी पवार, आप्पासो कोकीतकर, सुरेश पाटील, अभिजित भोसले यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध शक्य

$
0
0

सोलापूर - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरविले आणि विरोधी पक्षाशी सल्लामसलत केल्यास राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक बिनविरोध होऊ शकते,’ असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

विधिमंडळ आणि संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार समारंभासाठी शरद पवार सोमवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. जून महिन्यात राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत आहे आणि त्यासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, ‘मी राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक नाही. ज्या पक्षाची लोकसभा-राज्यसभेतील सदस्य संख्या फक्त १४ आहे, त्या पक्षाने राष्ट्रपतिपदाचे स्वप्न पाहणे उचित नाही. स्वतःचा राष्ट्रपती निवडून आणण्याइतके पुरेसे संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षासमवेत चर्चा करून समन्वय साधल्यास राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रालयाला घेराव घालण्याचा निर्धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग दुष्काळ व भाजप सरकारच्या धोरणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या मुलांनीही आत्महत्येचा मार्ग अवलंबला आहे. महाराष्ट्रासाठी हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे. शेतकऱ्यांना ताठ मानेने उभे करण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे. शाहू महाराजांच्या नगरीतून सुरु झालेल्या संघर्ष यात्रेनंतरही सरकारने कर्जमाफी न दिल्यास शेतकऱ्यांसोबत मंत्रालयाला घेराव घालण्याचा निर्धार संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला. त्याचवेळी तूरडाळ खरेदी बंद केल्याबद्दल विदर्भ, मराठवाड्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्यावतीने संयुक्त आंदोलन करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. कृषीपंपाची वीज दरवाढ मागे घेण्याबरोबरच थकीत वीजबिलाच्या माफीची मागणीही यावेळी करण्यात आली.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय (कवाडे गट), युनायटेड जनता दल, समाजवादी पार्टीच्यावतीने कर्जमाफीसाठी आयोजित संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला मंगळवारी प्रारंभ झाला. दसरा चौकात झालेल्या सभेत संघर्ष यात्रेची पुढील वाटचाल स्पष्ट करण्यात आली.

शेतकरी आत्महत्येचा आकडा नऊ हजारावर गेला आहे. महाराष्ट्राला ही लाजिरवाणी बाब असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पहि​जे, त्यांना पुन्हा कर्ज मिळाले पाहिजे, यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. यंदा चांगल्या पावसामुळे शेतकरी आनंदात होता. पण, पंतप्रधान मोदी यांच्या नोटाबंदीच्या अविचारी निर्णयाने शेतकऱ्याच्या हातातोंडाचा घास हिरावला. ग्राहकांकडे पैसेच नसल्याने शेतमाल मातीमोलाने विकावा लागला. यामुळे शेतकरी दबून गेला. सरकारने डाळ खरेदी करावी म्हणून तूरडाळ उत्पादक दहा-दहा दिवस बाजारात बसून आहेत. मुख्यमंत्री दिल्लीला फेऱ्या मारत आहेत. दरवेळी हात हलवत परत येत आहेत. केंद्र सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडता येत नसल्याने त्यांची ​दुर्बलता दिसून येत आहे. भाजप सरकार कृषी अर्थव्यवस्था मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यातून शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी प्रचंड आंदोलनाशिवाय पर्याय नाही. विरोधकांची एकजूट ही ऐतिहासिक असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र राहिलो तर उन्मत भाजपची सत्ता उलथवण्यास वेळ लागणार नाही.’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ‘पंतप्रधान व मुख्यमंत्री २०१४ च्या निवडणुकीवेळी शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची घोषणा केली होती. मात्र तीन वर्षांत भ्रमनिरास झाला. या सरकारने कांदा उत्पादकांना एक रुपयाचे अनुदान देत शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच केली आहे. मूठभर लोकांची बँकांमधील साडेतीन लाख कोटींची कर्जे माफ केली जातात. पण, ज्या शेतकऱ्यांनी देशाला पोसले, त्यांना कर्जमाफी मिळत नाही. त्यामुळे संघर्षाशिवाय पर्याय नाही. अन्यायाविरोधात संघर्षाची शिकवण देणाऱ्या शाहूंच्या नगरीतून सुरु झालेल्या या यात्रेनंतरही कर्जमाफी न मिळाल्यास शेतकऱ्यांसह मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल.’


भाजप सरकार उन्मत झाले आहे. एखादा शेतकरी मंत्रालयात गेला तर त्याला झोडपून काढून तुरुंगात टाकले जाते. अशावेळी धडा शिकवला नाही तर पुढील पिढी माफ करणार नाही. शेतकऱ्यांची संख्या कमी व ग्राहकांची संख्या जास्त असल्याने ग्राहकांना खूष करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालावर नियंत्रण ठेवले जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

०००००००००

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राज्यातील शेतकऱ्यांची ३० लाख ५०० कोटी रुपये कर्जमाफी करण्याची आकडेवारी असताना ते कशाचा अभ्यास करत आहेत. आणखी किती शेतकऱ्यांची आत्महत्या केल्यावर राज्य सरकार कर्जमाफी करणार?

अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

०००००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हीआयपी’ मार्गाला अपघाताचे ग्रहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी कार्यालयांना जोडणारा आणि शहराच्या मध्यावरून जाणाऱ्या स्टेशन रोडला पर्याय ठरलेला मार्ग म्हणजे धैर्यप्रसाद हॉल ते खानविलकर पेट्रोलपंप मार्ग. अनेकांसाठी सोयीचा ठरणारा हा मार्ग काही वाहनधारकांची बेपर्वाई आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा स्पॉट बनत आहे. शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा हा मार्ग व्हीआयपी असल्याने त्यावर स्पीडब्रेकर करता येत नाहीत, असे सांगून महापालिकाच एकप्रकारे अपघाताला निमंत्रण देत आहे. हा मार्ग ‘व्हीआयपी’ असूनही या मार्गावर दिशादर्शक, सूचनाफलक नाहीत हाही विरोधाभासच आहे. सोमवारी प्रदीप सोळंकी यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुन्हा एकदा हा मार्ग चर्चेत आला आहे.

खानविलकर पेट्रोलपंप ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचे कार्यालय आहे. याच मार्गावरून उद्योगभवन, महावितरण, आरटीओ आणि विवेकानंद कॉलेजकडेही जाता येते. सीपीआर चौक ते कावळा नाका या मार्गाला समांतर असल्याने खानविलकर पेट्रोलपंप ते धैर्यप्रसाद हॉल या मार्गावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या मार्गावर स्पीडब्रेकर तयार करावेत आणि सुसाट वाहनचालकांना लगाम घालावा यासाठी महापालिकेकडे अनेकांनी पत्रव्यवहार केला. मात्र, हा मार्ग व्हीआयपी असल्याने स्पीडब्रेकर करता येत नाही, असे महापालिकेने त्यावेळी कळविले होते. या मार्गावर अनेक कॉलेज तरुण सुसाट गाड्या पळवितात. जिल्हा परिषद आणि नागाळा पार्कातील कमानीतून बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांना दोन्ही बाजुंच्या झाडीमुळे मुख्य मार्गावरील वाहने दिसत नाहीत. या मार्गावर बेशिस्त पार्किंग, स्पीड ब्रेकरचा अभाव असल्याने दिवसेंदिवस हा मार्ग धोकादायक बनला आहे. मुख्य मार्गाला चौकांव्यतिरिक्त सात ठिकाणी आडवे रस्ते जोडले आहेत. जिल्हा परिषद, नागाळा पार्क कमान, आदित्य कॉर्नरकडून विवेकानंद कॉलेजकडे जाणारा मार्ग आणि महावितरणकडे जाणारे मार्ग वर्दळीचे आहेत. खानविलकर पेट्रेलपंप ते धैर्यप्रसाद हॉल या मार्गावर आदित्य कॉर्नर चौकात केवळ एक स्पीड ब्रेकर आहे. इतर ठिकाणी मात्र महापालिकेसह शहर वाहतूक नियंत्रण शाखेचेही दुर्लक्ष आहे. विवेकानंद कॉलेजपासून जवळ असलेल्या या मार्गावर तरुण बाईकर्सची धूम असते. भरधाव वेगाने महागड्या गाड्या उडवणारे तरुण या मार्गावर नेहमीच असतात. स्पीड ब्रेकर नसल्याने सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकीमुळे सोमवारी कोल्ड्रींक्स व्यावसायिक प्रदीप सोळंकी याच्या जिवावर बेतली. सोमवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ते जेवणासाठी घरी निघाले होते. नागाळा पार्क कमानीपासून काही अंतरावर समोरून आलेल्या भरधाव दुचाकीस्वारांनी सोळंकी यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जमिनीवर कोसळलेले सोळंकी यांच्या डोक्यला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला. एकसष्टाव्या वाढदिनीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरील अपघातांचा धोका गडद केला आहे. यापूर्वी तीनवेळा याच मार्गावर गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी मार्गावर स्पीड ब्रेकर तयार करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे पार्किंगही अपघातांना कारणीभूत ठरत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हॉटेलमध्ये उतरणाऱ्या प्रवाशांची वाहने उभी असतात. महावीर गार्डनच्या बाजुला खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर दुचाकींचे पार्किंग वाढले आहे. याशिवाय फूटपाथवरील फळविक्रेत्यांमुळे वाहने वाटेतच थांबतात. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

तीन ठिकाणी हवेत स्पीड ब्रेकर

खानविलकर पेट्रोलपंप ते धैर्यप्रसाद हॉल या मार्गावर किमान तीन ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार करणे गरजेचे आहे. जिल्हापरिषदेकडे जाणारा मार्ग, नागाळा पार्क कमान आणि आदित्य कॉर्नर चौकातून विवेकानंद कॉलेजकडे जाणारा मार्ग ही तिन्ही ठिकाणे धोकादायक आहेत. झाडांच्या फांद्या वाढल्याने रस्त्यावरील वाहने दिसत नाहीत. तरुण वाहनचालकांचे प्रमाण अधिक आहे. रस्ता ओलांडून जाणाऱ्या वाहनांचीही संख्या मोठी असल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे.


खानविलकर पेट्रोलपंप ते धैर्यप्रसाद हॉल हा मार्ग इतर मार्गांच्या तुलनेत अरूंद आहे, त्यामुळे दुभाजक तयार करण्यास मर्यादा आहेत. मुख्य मार्गाला अनेक फाटे असल्याने स्पीड ब्रेकर तयार करणे गरजेचे आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या हालचाली महापालिकेतून सुरू आहेत.

हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता

‘व्हीआयपी’ संस्कृती टिकविण्यात मनपा मग्न

स्पीड ब्रेकर तयार करावेत अशी मागणी महापालिकेकडे केली असता, हा मार्ग व्हीआयपी असल्याचे सांगून महापालिकेने काम टाळले. व्हीआयपी संस्कृती बंद व्हावी यासाठी एकीकडे मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय होत आहे. तर दुसरीकडे जीवावर बेतणारी रस्त्यावरील व्हीआयपी संस्कृती टिकविण्यास महापालिका मग्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजऱ्यात लाच घेताना पीएसआय जाळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

बिअरबार परवाना काढण्यासाठी प्रथम दोन लाख रूपये चेकद्वारे वठवून घेतल्यानंतर पुन्हा अडीच लाख रूपयांची मागणी करून ती रक्कम चेक व रोखीने स्वीकारताना आजरा पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जनार्दन डी. जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. याप्रकरणी तक्रारदाराने २४ एप्रिल रोजी तक्रार नोंदविली होती. एका पोलीस अधिकाऱ्यावरील लाचलुचपत विभागाच्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

तक्रारदाराने तालुक्यात बिअरबार परवाना काढण्यासाठीचा अर्ज आजरा पोलिस ठाण्यात दाखल केला होता. त्यावेळी संबंधित विभागात माझी ओळख असून परवाना मिळविण्यासाठी दोन लाख रूपये द्यावे लागतील असे जाधव याने सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दोन लाख रूपयांचा बॅंक ऑफ महाराष्ट्रचा नाव न टाकता केवळ सही करून चेक दिला. जाधव याने तो चेक वठविला. पण दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा महामार्गापासून ५०० मीटर अंतराबाबतचा निर्णय झाल्याने बिअरबार परवाना नको, असा निर्णय तक्रारदाराने घेतला व दिलेल्या पैशाची मागणी जाधवकडे केली. पण आतापर्यंत दुप्पट पै॒से खर्च झाल्याचे सांगत जाधव याने पुन्हा अडीच लाख रूपयांची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने २४ एप्रिल रोजी लाचचुचपत विभागाकडे तक्रार नोंद केली. मंगळवारी पोलिस ठाण्याच्या आवारात पंचांसमक्ष पडताळणी केली असता या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानुसार सापळा लावण्यात आला. आजरा पंचायत समिती कार्यालयासमोर एका कारमध्ये ४० हजार रूपये रोख व दोन लाख रूपयांचा चेक स्वीकारताना जाधव याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमध्ये पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे, प्रसाद हसबनीस, राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण पाटील, शाम बुचडे, मनोज खोत, मोहन सौंदत्ती, संदीप पावलेकर यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृत योजनेला मिळेना प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नाल्यांमधील सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी ‘नीरी’ ने सुचवलेल्या फायटोरिडसारख्या नव्या पद्धतीच्या समावेशामुळे ७२ कोटी रुपयांच्या ‘अमृत’ योजनेच्या टेंडरला दोनदा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे रंकाळा व पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी शहरात आवश्यक असलेल्या ११२ किलोमीटरची ड्रेनेजलाइन, दोन नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नाला वळवण्याची कामे रखडली आहेत. याबाबत आता सरकारकडेच मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवाद गुरुवारी (ता. २७) सुनावणीवेळी आणखी काय आदेश देते, याकडे महापालिकेचे लक्ष लागले आहे.

रंकाळा प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान ‘नीरी’ सारख्या संस्थेच्या सहकार्याने उपाययोजना राबवण्यास सांगण्यात आल्या. त्यानुसार ‘नीरी’ ने फायटोरिड सारख्या नव्या पद्धतीनुसार रंकाळ्यात तसेच पंचगंगेमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे सुचवले आहे. त्याचा समावेश ‘अमृत’ योजनेतील कामामध्ये करण्यात आला आहे. त्याचे टेंडर काढण्यात आले असून दोन महिन्यांत दोनदा मुदतवाढ देऊन एकाही कंत्राटदाराने टेंडर भरलेले नाही. लवादाने टेंडरची वर्कऑर्डर दिल्याची माहिती गुरुवारी होणाऱ्या सुनावणीवेळी महापालिकेने द्यावी, असे आदेश दिले आहेत. मात्र कोणीही टेंडरच भरलेले नसल्याने महापालिकेची कोंडी झाली आहे.

टेंडरची माहिती घेण्यासाठी दोन कंत्राटदार आले. त्यांना फायटोरिडबाबतची संकल्पना, अंमलबजावणी, देखभालीबाबत शंका आल्याने टेंडर भरले नाही. हे काम वगळून इतर कामे करण्याची त्यांची तयारी आहे. ‘अमृत’ मधील कामांचे एकच टेंडर काढावे असा सरकारचा आदेश असल्याने स्वतंत्र टेंडर काढण्याच्या पर्यायाला मर्यादा आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिक आराखडा सार्वजनिक हिताचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोल्हापूर प्रादेशिक विकास आराखडा हा सार्वजनिक हिताचा आहे. ३८ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्याच्या विकासाला आराखड्याच्या अंमलबजामुळे चालना मिळणार आहे. मात्र, प्रादेशिक विकास आराखडा फसवा असल्याचे सांगत जनतेची दिशाभूल करणाऱ्या असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्सचे अध्यक्ष सुधीर राऊत यांची या व्यवसायातील गुणवत्ता तपासण्याची गरज आहे’ असे वाहतूक अभ्यासक विनायक रेवणकर बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

विनायक रेवणकर म्हणाले, ‘प्रादेशिक नियोजन मंडळामध्ये लोकप्रतिनिधींसह २१ सदस्य आहेत. शिवाय, आठ अभ्यास गट ​समित्या आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हा​धिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी व सुमारे शंभरहून अधिक मान्यवरांनी विकास आराखडा करण्यात योगदान दिले. राऊत यांच्या आरोपाने या मान्यवरांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी प्रादेशिक विकास आराखडा फसवा म्हणून जनतेची दिशाभूल करू नये. प्रादेशिक विकास आराखड्याच्या मंजुरीला ग्रहण लावण्याचा प्रयत्न काही झारीतील शुक्राचार्यांनी सुरू केला आहे. यामागे त्यांचे आर्थिक हितसंबंध दडलेले असावेत.’

रेवणकर म्हणाले, ‘मी वाहतूक दळववळण समितीच्या अभ्यासगटाचा सदस्य आहे. मी वाहतूक, दळणवळणासंदर्भात २२ सूचना केल्या आहेत. अभ्यास गटाकडून शिफारस केलेल्या काही बाबींवर राऊत यांनी माझ्या नावाचा संदर्भ जोडत वक्तव्य केले आहे. रस्ते विकास हा रेवणकर यांच्या वैयक्तिक हिताचा प्रश्न नाही तर तो सार्वजनिक हिताचा मुद्दा आहे. विकास आराखड्यातील वाहतूक, दळणवळण अभ्यास गट समितीचे अध्यक्ष, सदस्यांची कार्यकक्षा आणि त्यांच्या अधिकाराचे ज्ञान राऊत यांना असल्याचे कळत नाही. त्यांचा रस्ते नियोजन व सुरक्षामधील (सेफ्टी मेजर्स) अभ्यास कमी आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्यांना सरकार जबाबदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शेतकरी आर्थिक डबघाईला आले असताना, जीव देत असतानाही बघत बसणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे माजी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत क्रूर होते. तर सध्याच्या भाजप सरकारला शेतीतील काही कळतच नसल्यामुळे ते मागच्या सरकारचीच री ओढत बावळटपणा करत आहे. शेतक‍ऱ्यांच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदर आहे’, असे प्रतिपादन शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अमर हबीब यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी ​​शिंदे अध्यासनाच्यावतीने ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा शेतीविषयक विचार आणि सद्य:स्थिती’ या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील होते. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते. भाषा भवनातील वि. स. खांडेकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.

हबीब म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या सरकारविरोधात आवाज उठवायचा असेल तर शेतकऱ्यांना संघटीतपणाची मोट बांधण्याची गरज निर्माण होणार आहे हा विचार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच मांडला. महर्षींनी शेतकरी परिषदांच्या माध्यमातून जागृती निर्माण केली. चौकटीत राहण्यापेक्षा कार्याचा परीघ ओलांडण्याचा महर्षींचा स्वभाव त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देणारा होता. शेतकरी हा केवळ उत्पादन नसून तो पिकाच्या रूपाने नवनिर्मिती करणारा सर्जक आहे हा विचार मांडणाऱ्या महर्षींनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा इथपासून ते गावगाड्याची पुनर्रचना करावी असा त्यांचा आग्रह होता.’

हबीब म्हणाले, ‘आज जेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पाहतो तेव्हा महर्षींनी मांडलेला विचार किती चिंतनशील होता याची प्र​चिती येते. सध्या शेतीतील तंत्रज्ञान अद्ययावत झाले असले तरी शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटलेले नाहीत. लोकशाहीमध्ये जाती धर्माच्या झुंडी तयार करण्याचे काम राजकारणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. कायद्याच्या अनुषंगाने पाहिल्यास २८४ कायद्यांपैकी अडीचशे कायदे शेतीशी संबंधित आहेत. त्याबाबत गांभीर्य नाही.’

प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ‘भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात महर्षी शिंदे यांचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. उपेक्षित मानकऱ्यांचे धनी ठरलेल्या शिंदे यांनी विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्याचे विस्मरण ही शोकांतिका ठरेल.’

डॉ. अशोक चौसाळकर यांचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. ल. रा. नसिराबादकर, डॉ. जे. एफ. पाटील, सुरेश शिपुरकर, कॉ. दिलीप पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images