Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सदस्यांची नावे गुलदस्त्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ‌कोल्हापूर

जिल्हा परिषद विषय समिती सदस्य निवड सभेत केवळ ८३ पैकी ७३ सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा झाली. एकमत न झाल्याने सदस्यांची नावे लपवण्याची नामुष्की सत्ताधारी भाजप आघाडीवर ओढवली. सत्ताधारी आणि विरोधीमधील कारभारी सदस्यांनी समिती सदस्यांसाठी निवडणूक होऊ नये, यासाठी ही चाल खेळल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात ‌अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली दहा विषय समितीच्या ८३ सदस्य निवडीसाठी सभा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाडिक यांनी काम पाहिले.

अध्यक्षाच्या दालनात अध्यक्षा महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अरूण इंगवले, विजय भोजे तर विरोधी आघाडीचे काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बंडा माने, उमेश आपटे, राष्ट्रवादीचे सतीश पाटील आदींची बैठक झाली. बांधकाम, महिला बालकल्याण, समाज कल्याण, स्थायी समितीमध्ये सदस्य होण्यासाठी सत्ताधारी‌, विरोधांत स्पर्धा लागली. शेवटपर्यंत एकमत झाले नाही. तशाच परिस्थितीत निवडीची सभा तब्बल एक तास ‌उशिरा सुरू झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) चंद्रकांत वाघमारे, अध्यक्षा महाडिक यांनी जिल्हा परिषद अधिनियमानुसार निवड सभेची प्रक्रिया समजावून सांगितली.

दहा समितीच्या ८३ जागेसाठी ७३ जणांनी अर्ज दाखल केले. जागेपेक्षा कमी अर्ज दाखल झाले. निवड बिनविरोध झाल्याचे अध्यक्षा महाडिक यांनी घोषित केले. मात्र त्यांनी निवड झालेल्या ७३ सदस्यांची नावे जाहीर करणे टाळले. यामुळे सदस्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. उर्वरित १० जागेच्या निवडीचा अधिकार अध्यक्षांना राहील, असे जाहीर केले. परिणामी निवडीची सभा केवळ औपचारिकता आणि निवड प्र‌क्रियेचे अधिनियम वाचून दाखवण्यासाठी बोलावण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

………………..

केवळ फॉर्म्युलाच

विरोधी आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या ३० सदस्यांना आणि ७ सभापतींना समिती सदस्य म्हणून संधी मिळेल. उर्वरित ४२ जागेवर ‌सत्ताधारी सदस्यांची वर्णी लागेल. अध्यक्षांच्या अधिकारात निवड असलेल्या १० जागेवरही सत्ताधारी सदस्यांचीच वर्णी लागेल. असा फॉर्म्युला ठरला आहे. पण कोणत्या समितीमध्ये कुणाला संधी द्यायची हे निश्चित झाले नाही.


नवा पायंडा

विषय समिती सदस्य निवडीच्या या पूर्वीच्या सभेत अध्यक्ष निवड झालेल्या सदस्यांची समितीनिहाय नावे वाचून दाखवत होते. या पारदर्शक निवडीमुळे सदस्यांनाही माझी कोणत्या समितीवर नियुक्ती झाली हे कळत होते. त्याला सोयीस्करपणे गुरुवारच्या सभेत बगल दिली. निवडीची सभा झाल्याचे कागदोपत्री दाखवायचे आणि नेत्यांच्या आदेशानुसार बंद खोलीत बसून सोयीनुसार नावे समितीत घुसडण्याची नवी परंपरा आता जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे.

भोजे, इंगवले यांच्यात सवाल प्रतिसवाल

हुपरी नगरपालिका केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अभिनंदनाचा ठराव वियज भोजे मांडत होते. त्यावेळी या सभेत असा ठराव मांडता येतो, का असा सवाल अरुण इंगवले यांनी केला. त्याकडे दुर्लक्ष करीत भोजे यांनी ठराव मांडला. निवडीच्या सभेतील भोजे, इंगवले यांच्यातील कुरघोडी समोर आली.

ओळख परेड

पहिली सभा असल्याने सुरुवातीलाच सर्व पदा‌धिकारी, सदस्य, अधिकारी यांची ओळख परेड झाली. अनेक सदस्यांना ओळखपरेडवेळी टोपणनाव, प्राध्यापक, डॉक्टर आहे, हे जाणीवपूर्वक सांगण्याचा मोह आवरता आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीआयडीकडे अधिकाऱ्यांची वानवा

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com
Tweet : @Uddhavg_MT

कोल्हापूर : गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा सखोल तपास व्हावा आणि दोषींना कडक शिक्षेपर्यंत पोहोचवावे यासाठी सीआयडीकडे (गुन्हे शोध विभाग) तपास सोपवले जातात. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे सीआयडीच्या अधिकाऱ्यांवर तपासाचा अतिरिक्त ताण पडत आहे. सीआयडीच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात केवळ १० अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सध्या १६ गुन्ह्यांचा तपास सोपविण्यात आला आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने गुन्ह्यांची उकल होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

राज्याच्या पोलिस दलातील सीआयडी अर्थात गुन्हे शोध विभाग हा तपासासाठी विश्वासार्ह विभाग मानला जातो. राज्यातील अनेक गंभीर आणि महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करून संशयित आरोपींना गजाआड करण्याचे काम सीआयडीने केले आहे. आजही महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे सोपवण्यासाठी आग्रह धरला जातो. कोल्हापुरात गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला आणि अनेक धक्कादायक खुलाशांनी लोकांची उत्सुकता वाढवलेला वारणा लुटीचा तपासही सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सीआयडीचे कोल्हापुरातील पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी नुकतीच या गुन्ह्याचा तपास स्वीकारला. मात्र कार्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे या लुटीचा तातडीने तपास करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

कोल्हापुरात सीआयडीचे विभागीय कार्यालय आहे. विभागाकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा कार्यभार आहे. कोल्हापुरातील कार्यालयात १ अधीक्षक, १ अतिरिक्त अधीक्षक, २ उपअधीक्षक आणि २ पोलिस निरीक्षक आहेत. कार्यालयीन कामांसाठी केवळ २ लिपिकांची नियुक्ती आहे. शिवाय सांगली आणि सातारा येथे प्रत्येकी २ अधिकारी कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांकडे कामाचा बोजा वाढत आहे, मात्र तुलनेत मनुष्यबळ वाढत नसल्याने तपास अधिकाऱ्यांनाच लिपिकांचीही कामे करावी लागतात. गुन्ह्यांचे स्वरुप आणि आवाकाही मोठा असल्याने तपासासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. यातच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव असल्याने अधिकाऱ्यांची कोंडी होत आहे.

सध्या सीआयडीकडे १६ गुन्हे तपासासाठी आहेत. यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील ३७ वर्षांच्या कागदपत्रांची चौकशी, अहमदनगर येथील विषारी दारू प्राशनातील बळी प्रकरण, रायसोनी गुंतवणूक फसवणूक प्रकरण अशा गंभीर तक्रारींचा यात समावेश आहे.

गेल्या वर्षभरात सीआयडीने पेठ वडगाव येथील सनी पोवार खून प्रकरणी तपासानंतर तीन पोलिसांनी गजाआड केले. साखर कारखान्यांतील साखर विक्री घोटाळ्याचा चौकशी अहवाल तयार केला. अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटळ्याची चौकशी केली. त्याचबरोबर आर्यरूप टूरिझम अँड क्लब रिसॉर्ट प्रकरणाचा तपास करून कोल्हापूरसह सागंली जिल्ह्यात १३ गुन्हे दाखल केले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चौकशीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. या सर्व गुन्ह्यांच्या तपासासाठी अधिकाऱ्यांची संख्या मोजकीच असल्याने नव्याने दाखल झालेल्या वारणा लुटीचा तपास वेळेत पूर्ण होणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

अधिकारीच करतात लिपिकांचे काम

सीआयडीच्या कोल्हापूर कार्यालयात केवळ दोनच लिपिक आहेत. त्यामुळे पोलिस निरीक्षकांनाच लिपिकांची कामे करावी लागतात. तपासासाठी बाहेर पडण्याऐवजी अधिकारीच कार्यालयीन कामात गुंतत असल्याने मूळ कामांवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. अधिकाऱ्यांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी जादा मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पु.लं.’ करताहेत कोल्हापूरची सफर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शाळांना सुटी लागली आहे. पर्यटनाचा मौसम ऐन भरात आहे. कोल्हापुरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी या गर्दीत एक ओळखीचा चेहरा भटकंती करताना दिसला आणि कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावर उत्सुकतेचे कारंजे फुलवून गेला. शहरातील न्यू पॅलेस, रंकाळा, टाउन हॉल, अंबाबाई मंदिर, पंचगंगा नदी घाट अशा खास कोल्हापुरी पर्यटनस्थळांना पुलंनी भेट दिली. अर्थात ‘पुलं’ प्रत्यक्ष नसले तरी त्यांच्या रूपाने कोल्हापूर डोळ्यात साठवले. प्रवासवर्णन आणि ‘पुलं’ हे समीकरण दृढ करण्यासाठी प्रतिकात्मक पुलंनी केलेली कोल्हापूरची भटकंती हा मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.

निमित्त आहे ‘पुलं’ लिखित ‘अपूर्वाई’ आणि ‘जावे त्यांच्या देशा’ या प्रवासवर्णनातील काही निवडक उताऱ्यांवर आधारीत नाट्यप्रयोगाचे. शनिवारी (ता. २२) भालजी पेंढारकर केंद्रातर्फे आयोजित सर्जनशाळा उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी सात वाजता हा प्रयोग होणार आहे. ‘पु. ल. अन् Ltd’ या प्रवास वर्णनांमधील निवडक उताऱ्यांवर आधरलेला नाट्यप्रयोगाला सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल.

‘पु. लं.’ यांच्या खुमासदार लेखणीने हसवणूक करणारे आणि तरीही एखादा मार्मिक चिमटा घेत अंतर्मुखही करणाऱ्या पु.लं.नी साहित्याच्या हरेक प्रकाराला स्पर्श केला. पु.लं.च्या प्रवासवर्णनाची पाने पलटताना तर त्या त्या भागाची आपण सफरच करत असल्याचा अनुभव बहुतांश प्रत्येक वाचकाला आहे. इंग्लंड दौऱ्यातील अनुभवांची खमंग लेखणी असलेल्या अपुर्वाई या प्रवासवर्णनातील पु.लं.च्या मिश्किल शब्दखेळीवर वाचक आजही फिदा आहेत. या भ्रमंतीतील वर्णन पु.लं.नी अपूर्वाई या पुस्तकात केले आहे.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. लेखक, नाटककार, अभिनेता, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक असा अनेक भूमिका त्यांनी वठवल्या. पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले. पुलंनी जवळपास चाळीस वेगवेगळी पुस्तके लिहिली. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती, हे त्यांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनावरूनच प्रकर्षाने जाणवते. त्यांनी अमेरिका, युरोप, आशियातील अनेक देश पाहिले. त्यात त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पद्धतीने लिहिले आहेत. त्यातील ‘अपूर्वाई' आणि ‘जावे त्याच्या देशा' या प्रवासवर्णनांवर आधारित हा नाट्याविष्कार असेल. शंतनु पाटील यांचे दिग्दर्शन असेल. विजय कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी, सनथ पवार यांचे सादरीकरण असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीषण अपघातात मिनी बसचा चुराडा; ६ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

मिरज-पंढरपूर रस्त्यार शुक्रवारी पहाटे मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

अपघातग्रस्त मिनी बसमधील प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील माले गावचे असल्याचं समजतं. हे सगळेजण पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना आवळगाव फाटा इथं त्यांची मिनी बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागच्या बाजूने येऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. त्यात सहा लोक जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलं, एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर चालक संदीप यादव फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृतांची नावे:

नंदकुमार जयंत हेगडे (वय ३७)
रेणुका नंदकुमार हेगडे (३५)
आदित्य नंदकुमार हेगडे (१२)
लखन राजू संकाजी (३६)
विनायक मार्तंड लोंढे (४०)
गौरव राजू नरदे (७)

गंभीर जखमी

रेखा राजाराम देवकुळे (४०)
स्नेहल कृष्णात हेगडे (२०)
काजल कृष्णात हेगडे (१९)

जखमी

सावित्री बळवंत आवळे (५५)
शीतल सुनील हेगडे (४२)
सोनल कांबळे (३६)
कोमल हेगडे (२०)
कल्पना बाबर (४०)
अनमोल हेगडे (१२)
गौरी हेगडे (७)
शुभम कांबळे (१०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची खातेनिहाय चौकशीविश्वास नांगरे-पाटील यांची माहिती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

वारणानगरमधील कोट्यवधी रुपयांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची निलंबनाच्या कारवाईनंतर खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा कोल्हापूर पोलिसांनी सलग सहा महिने अत्यंत बारकाईने तपास केलेला आहे. या पुढील तपासही पारदर्शी आणि विना अडथळा होण्याच्या दृष्टीने हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडे आमच्या तपासाचा अहवाल देण्यात आला असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

कोल्हापूर पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील शुकवारी पोलिस दलातील कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. सांगली एलसीबीच्या तत्कालीन अधिकारी, कर्मचारी यांनी तब्बल सव्वानऊ कोटी रुपयांची रोकड चोरल्याचा गुन्हा कोडोली पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर विचारले असता पाटील म्हणाले, ‘संबधित प्रकरणात माहिती समोर आली आणि त्वरीत गुन्हा दाखल केले, अशी घाई करण्यात आलेली नाही. अप्पर पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी सहा महिने सखोल तपास केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबधित संशयितांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर खात्यांतर्गत त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. दरम्यानच्या काळात आपण शिफारस केल्याप्रमाणे सरकारने या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविलेला आहे. त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन तपासाला गती दिली आहे.’

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांबाबत विचारले असता नांगरे-पाटील म्हणाले, ‘नियमांप्रमाणे त्यांच्या बदल्या केल्या जातील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा मंत्री महाजन यांचीप्रतीकात्मक अंत्ययात्रा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी मागील पाच दिवसांपासून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोरड्या उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारी स्तरावर अद्याप आंदोलनाची दखल न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी केला.

मागील सतरा वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात येथील १४ गावांच्या शेतकऱ्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावल्या मात्र, त्यांना मोबादला मिळाला ना पाणी. आजही येथील शेतकरी पाण्यावाचून वंचित आहेत. शेतीला पाणी मिळेल याकडे या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची एक पिढी संपली आहे. सरकार अद्यापही चाल ढकल करीत असल्यामुळे सरकारला जाग अणण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मागील पाच दिवसांपासून ३० फूट खोल खड्यात बेमुदत आंदोलन सुरू आहे. यात आतापर्यंत प्रकृती खालावल्याने पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सरकारी स्तरावर आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शुक्रवारी जलसंपदा मंत्र्यांची यांची प्रेतयात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला. सरकारने आताही दखल न घेतल्यास मंत्री महोदयाना खरोखरच कॅनॉलमध्ये गाढू, असा इशारा या वेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सहाय्यक आयुक्तांच्याकार्यालयाची झाडाझडती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील कर्मचारी संजय होटकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले सहायक आयुक्त अभिजित हराळे यांच्या कार्यालयाची शुक्रवारी दुपारी सोलापूर पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, त्याना कोणतीही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली नाहीत.

संजय होटकर मनपाची वादग्रस्त ठरलेली कचरा टेंडरची फाइल सांभाळत होते. या पूर्वी बेकायदा काम करण्यासाठी दबाव टाकला म्हणून दोन नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून होटकर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच गुरुवारी त्यानी होटगी रस्ता परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिट्टीमध्ये सहायक आयुक्त हराळे यांच्यासह राजू सावंत, ए. के. आराधे यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. संबधितांनी भ्रष्टाचार केला असून, त्याची चौकशी करावी, असेही चिठीत लिहिले होते. त्यानंतर पोलिसांनी हराळे, सावंत आणि आराधे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी होटकर यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेले हराळे तसेच अन्य दोघांची चौकशी करण्यासाठी महापालिका गाठली. हराळे यांच्या कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली मात्र. पोलिसांच्या हाताला काहीही लागले नाही. परंतु आत्महत्येचे नेमके कारण कचरा टेंडरची फाइल होती की, आणखी काय याची चौकशी सदर बाजार पोलिस करीत आहेत. अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पोट्रॅव्हलर-ट्रक अपघातात सात ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मिरज/कोल्हापूर

देवदर्शन आटोपून गवाकडे परतताना चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव टेम्पो-ट्रॅव्हलर रस्त्याकडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर धडकल्याने झालेल्या अपघातात सात जण ठार झाले, तर दहाजण जखमी झाले. जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी (ता. २१) पहाटे तीनच्या सुमारास सांगली-पंढरपूर मार्गावर आगळगाव फाट्याजवळ (ता. मंगळवेढा) अपघात झाला. सर्व मृत आणि जखमी गांधीनगर (ता. करवीर) येथील आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांवर काळाने घाला घातल्याने गांधीनगरातील कोयना वसाहतीवर शोककळा पसरली आहे.

कोयना वसाहत परिसरातील ३० भाविक सोमवारी (ता. १७) सकाळी देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. या भाविकांनी गांधीनगरातील टाटासुमो आणि माले मुडशिंगी येथील टेम्पोट्रॅव्हलर भाड्याने घेतली होती. सौंदत्ती, चिंचणी, विजापूर, अलमट्टी, कुडलसंगम, तुळजापूर, पंढरपूर येथे देवदर्शन करून हे भाविक गुरूवारी रात्री उशिरा कोल्हापूरच्या दिशेने परत येत होते. पंढरपूर-सांगली मार्गावर आगळगाव फाटा येथे आल्यानंतर ट्रॅव्हलरचा चालक संदीप यादव याच्या डोळ्यावर समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश पडल्याने त्याचे नियंत्रण सुटले. दरम्यान रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकवर भरधाव ट्रॅव्हलर आदळली. ही धडक इतकी भीषण होती, की ट्रॅव्हलरचे हूड उडून पडले. आतील सीटही तुटल्या. या भीषण अपघातात सहा भाविक जागीच ठार झाले, तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांमध्ये सेंट्रिंग काम करणारे नंदकुमार जयवंत हेगडे (वय ४०), त्यांच्या पत्नी रेणुका नंदकुमार हेगडे (३५), मुलगा आदित्य नंदकुमार हेगडे (१४, सर्व रा. म्हसोबा माळ झोपडपट्टी, गांधीनगर) नंदकुमार यांच्या सासू रेखा राजाराम देवकुळे (६०, रा. इंदिरा झोपडपट्टी, गांधीनगर) यांच्यासह विनायक मार्तंड लोंढे (४२), रौनक राजू नरदे (८) आणि लखन राजू संकाजी (२५, सर्व रा. म्हसोबा माळ झोपडपट्टी, गांधीनगर) यांचा मृत्यू झाला. शुभम संजय कांबळे (१०) आणि काजल कृष्णात हेगडे (२१) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याशिवाय सावित्री बळवंत आवळे (५५), शीतल सुनील हेगडे (४२), कल्पना बाबर (४०), सोनल कांबळे (३६), श्वेता कृष्णात आवळे, अनमोल नंदकुमार हेगडे (१२), गौरी हेगडे आणि शुभम कांबळे हे जखमी झाले. ट्रॅव्हलरचा चालक संदीप यादव अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताच्या आवाजाने परिसरातील लोक जमा झाले. काही वेळातच पाठीमागे असलेली टाटासुमो घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्याला सुरुवात झाली. आपलेच नातेवाईक आणि गावातील भाविक ठार झाल्याचे समजताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. जखमींना उपचारासाठी तातडीने मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटमध्ये दाखल केले.

उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी गांधीनगर येथे सर्व मृतांवर सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांवर काळाने घाला घातल्याने गांधीनगरातील कोयना वसाहत परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातग्रस्तांच्या घरांसमोर दिवसभर नागरिकांनी गर्दी केली होती.

गांधीनगरवर शोककळा

गांधीगरातील म्हसोबा माळ झोपडपट्टी आणि इंदिरा झोपडपट्टी एकमेकांना लागूनच आहेत. वर्षातून किमान एकदा देवदर्शन करून येण्याची तीव्र इच्छा असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून या सर्वांचेच नियोजन सुरू होते. वर्षभर कष्ट करून पोटाला चिमटा काढून वाचवलेल्या पैशातून त्यांनी देवदर्शन केले, मात्र सुखरूप घरी पोहोचू शकले नाहीत. अपघाताची माहिती मिळताच म्हसोबा माळ सुन्न झाला होता.

मदतीसाठी सरसावले हात

अपघातग्रस्तांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने परिसरातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधीही मदतीसाठी सरसावले. आमदार अमल महाडिक, महाराष्ट्र पत्रकार संघ, सामाजिक कार्यकर्ते अमोल एकल यांच्यासह परिसरातील नागरिकांनी अंत्यविधीसाठी पैसे जमा केले. याशिवाय गांधीनगरसह आसपासच्या सात गावातील तरुण मंडळांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेली मिरवणूक रद्द करून अंत्यविधीच्या तयारीसाठी हातभार लावला.



देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात

सर्व मृत व जखमी गांधीनगरचे

तिघे जखमी, मृतांमध्ये २ मुले, २ महिलांचा समावेश

मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण

मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मैनुद्दीनच्या साथीदारास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगरातील शिक्षक कॉलनीत झालेल्या कोट्यवधींच्या लुटीतील चोरटा मैनुद्दीन मुल्लाच्या एका साथीदारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संदीप बाबासाहेब तोरस्कर (वय २६, रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. लुटीतील २० लाख रुपये मिळाल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला. तातडीने तपास अहवाल पाठविण्यात आला.

वारणानगरात शिक्षक कॉलनीतील फ्लॅट क्रमांक ३मध्ये कोट्यवधी रुपयांची चोरी करून चोरटा मैनुद्दीन पळाला होता. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनीच चोरीतील ९ कोटी १८ लाख रुपये लाटल्याचे उघड झाले. मैनुद्दीनला जामीन मिळाल्यानंतर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विनायक जाधव (रा. भामटे, ता. करवीर) या मैनुद्दीनच्या मित्राला अटक करून त्याच्याकडील चोरीतील ५५ लाख जप्त केले होते. आता पोलिसांनी बापट कॅम्पमधील संदीप तोरस्करला अटक केली. त्याचाही चोरीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. मैनुद्दीन व विनायक जाधव चोरीसाठी फ्लॅटमध्ये गेल्यानंतर संदीप टेहळणीसाठी बाहेर थांबला होता.

चोरट्यांनी लुटीतील रक्कम घेऊन तवेरामधून (एमएच ०९ सीएम ७३४९) सांगलीकडे पळ काढला होता. संदीपला महामार्गावर सांगली फाट्यावर उतरवून २० लाख दिले. संदीपने चोरीत सहभागाची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून काही रक्कम हस्तगत केले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, उपनिरीक्षक युवराज आठरे, हेडकॉन्स्टेबल प्रकाश संकपाळ, प्रल्हाद देसाई आदींनी कारवाई केली.


तोरस्करच्या अटकेस विलंब का?

पोलिसांनी विनायक जाधव याला ३ जून २०१६ रोजी अटक केली. तेव्हा पोलिसांनी जाधवकडून ५५ लाख जप्त केले होते. जाधवची कार चोरीतील रक्कम घेऊन जाण्यासाठी वापरली याचाही उलगडा पोलिसांनी केला. मात्र त्यावेळी संदीप तोरस्करचा चोरीतील सहभाग पोलिसांना का शोधता आला नाही? दहा महिन्यानंतर पोलिसांना तिसरा साथीदार कसा मिळाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी मागवला तपास अहवाल

वारणा लुटीत थेट पोलिसांनीच हात साफ करून कोट्यवधींची रक्कम हडप केल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. या प्रकाराचे गांभीर्य वाढत असल्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, अहवाल मागवला आहे. तपास अधिकाऱ्यांनी अहवाल मुंबईला पाठवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा प्रादेशिक विकास आराखडा पुण्यात लटकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा ३१ मार्चपर्यंत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला सादर होणे अत्यावश्यक असताना अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे तो अर्ध्यावरच लटकला आहे. अधिकाऱ्यांनी कागदोपत्री घोडे नाचवत अहवालाची एका पानाची प्रत नगरविकासला सादर करून प्रक्रिया पूर्ण करण्याची खेळी केली. मात्र अहवालातील त्रुटी मुदतीत दूर न करता आल्याने पुण्यामध्ये सध्या त्याविषयी काम सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरील ‘चोरी चोरी छुपके छुपके’ काम करण्याच्या वृत्तीचा काहींनी लाभ उठविण्यास सुरुवात केली आहे. स्वतःच्या सोयीनुसार आराखड्यात फेरफार सुचविले जात असल्याचे समजते. हा प्रकार जिल्ह्याच्या विकासासाठी मारक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रादेशिक विकास आराखडा चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा आक्षेप घेत काहीजणांनी कोर्टात धाव घेतली आहे.

त्रुटींमुळे वादग्रस्त ठरलेल्या कोल्हापूर प्रादेशिक विकास आराखड्याचा घोळ अद्याप संपलेला नाही. सदोष आराखडा सरकारला सादर करू नये, मंजूर होऊ नये यासाठी विविध संघटना, नागरिक, लोकप्रतिनिधींसह असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्स संस्थेने विरोध केला. लोकप्रतिनिधी आणि संघटनात्मक पातळीवर विरोध होऊनही ३१ मार्चची डेललाइन ओलांडली तर आराखडा रद्द होईल या भीतीने काही अधिकाऱ्यांनी गडबड केली. परिणामी प्रादेशिक विकास आराखडा लटकला आहे. आराखडा ३१ मार्चपर्यंत सरकारकडे सादर केला नाही तर तो रद्द होण्याची टांगती तलवार होती. परिणामी २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक नियोजन मंडळाच्या बैठकीत उपसमितीने केलेल्या शिफारशींनुसार आराखड्याला अंतिम स्वरुप​ दिले गेले.

आराखड्यात प्रचंड त्रुटी असतानाही प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत आराखडा सरकारला सादर करून अहवाल दिला. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आराखड्याची एका पानाची प्रत नगरविकासला पाठविल्याची धक्कादायक माहिती आहे. वास्तविक आराखडा नगरविकास विभागाला सादर झाल्यानंतर तो पुण्यातील नगररचना संचालक कार्यालयाकडे अभिप्रायासाठी पाठविला जातो. मात्र, प्रचंड त्रुटीत दुरुस्ती न झाल्याने पूर्ण आराखडा नगरविकास खात्याकडे सादरच झालेला नाही. २९ ते ३१ मार्च या कालावधीत आराखड्यातील त्रुटींच्या निराकरणाचे काम होऊ शकले नाही. त्रुटी दूर न झाल्यामुळे आजही पुण्यामध्ये त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. प्रशासकीय नियंत्रणाखाली हे काम सुरु असले तरी, त्यामध्ये काहीजणांकडून सोयीनुसार फेरफार करण्याचे प्रकार सुरू आहेत. वस्तूतः त्रुटी दूर करण्याचे काम कोल्हापुरातच होणे अत्यावश्यक होते. या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी प्रादेशिक योजना कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र जबाबदार अधिकारी भेटत नाहीत. पुण्यामध्ये आराखडा दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते हे धक्कादायक आहे.

प्रादेशिक विकास आराखड्यासंदर्भात सुमारे ५५०० हजार तक्रारी झाल्या होत्या. नागरिक, संघटना व लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले. त्यावर सुनावणी झाली. त्रुटी दूर करून अहवाल नगरविकास खात्याककडे सादर केल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर प्रादेशिक कार्यालयाकडून ज्या शिफारसी केल्या गेल्या त्याचे काय झाले याची माहिती दिली जात नाही. अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ सुरू आहे. आराखडा जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्याविषयी पारदर्शकता असलीच पाहिजे.

सुधीर राऊत, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळरात्रीत झाले कुटुंब उद्ध्वस्थ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वर्षभर कष्ट करून वाचवलेल्या पैशातून देवदर्शन केल्यानंतर घरच्या ओढीने परतणाऱ्या हेगडे कुटुबीयांना आपल्यावर काळाचा घाला येणार असल्याची कल्पनाही आली नसेल. घराच्या दिशेने धावणारे वाहन रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. नंदकुमार हेगडे यांच्या कुटुंबातील तिघांसह दोन नातेवाईक असे पाच जण अपघातात ठार झाले, तर सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेने अवघे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे.

नंदकुमार जयंत हेगडे (वय ४०, रा. म्हसोबा माळ झोपडपट्टी, गांधीनगर) यांची तावडे हॉटेल परिसरात चायनीज फूडची गाडी आहे. त्यांची पत्नी गांधीनगरातील एका अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवते, तर त्यांचे इतर भाऊ सेंट्रिंगचे काम करतात. वर्षभरात किमान एकदा तरी देवाच्या दारात जाऊन त्याचे दर्शन घ्यावे आणि पुन्हा जोमाने कामाला लागावे या हेतूने त्यांनी देवदर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. गेली १५ दिवस नियोजन करून ३० जणांसाठी एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक टाटा सुमो अशी दोन वाहने भाड्याने घेऊन हे ३० जण सोमवारी सकाळी देवदर्शनासाठी घरातून बाहेर पडले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील सौंदत्ती, चिंचणी, विजापूर, अलमट्टी, कुडलसंगम, तुळजापूर येथे जाऊन देवदर्शन घेतले. गुरुवारी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. गुरुवारी रात्रीच घरी पोहोचण्याचे नियोजन होते, मात्र पुंढरपुरात देवदर्शनासाठी उशीर झाला. यानंतर खरेदी आणि जेवण यात आणखी वेळ गेला.

पंढरपुरात जेवण आटोपल्यानंतर दोन्ही वाहने कोल्हापूरच्या दिशेने निघाली. ठरवल्याप्रमाणे सर्वच ठिकाणी मनासारखे देवदर्शन झाले होते, त्यामुळे आता सगळ्यांनाच घरी पोहोचण्याची ओढ लागली होती. रात्री दहाच्या सुमारास नंदकुमार हेगडे यांनी घरी फोन करून परत येत असल्याची माहिती दिली. पंढरपुरातून वाहने बाहेर पडताच प्रवाशांना डुलकी लागली. टेम्पो ट्रॅव्हलर पुढे आणि काही अंतरावर मागे सुमो होती. नागज फाट्याजवळ आल्यानंतर ट्रॅव्हलरच्या चालकाचा ताबा सुटला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव ट्रॅव्हलर जोराने आदळली. या भीषण अपघाताने ट्रॅव्हलरमधील सहा प्रवाशी जागीच ठार झाले. ट्रॅव्हलरचे हूड उडाले. दरवाजे निघून पडले, तर खुर्च्याही निघाल्या. काही क्षणात झोपेत असलेले भाविक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काही मृतदेह दोन्ही खुर्च्यांमध्ये अडकले होते. पाठीमागून अलेल्या सुमोतील भाविकांना अपघाताच प्रकार लक्षात येताच त्यांनी थांबून जखमींना उपचारासाठी मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमद्ये पाठवले. या अपघातात नंदकुमार हेगडे, त्यांच्या पत्नी रेणुका, मुलगा आदित्य, नंदकुमार यांच्या सासू रेखा देवकुळे आणि पाहुणे लखन संकाजी यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील पाच जण दगावल्याने हेगडे कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

म्हसोबा माळावर शोककळा

गांधीनगरसह कोल्हापुरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी कुटुंबे गांधीनगरच्या म्हसोबा माळावर राहतात. या परिसरात म्हसोबा माळ झोपडपट्टी आणि इंदिरा झोपडपट्टी वसली आहे. अपघाताची माहिती मिळताच या परिसरातील नागरिकांना प्रचंड धक्का बसला. पहाटे चारच्या सुमारास अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी मिरजेकडे धाव घेतली. पत्र्याचे शेड आणि साध्या घरांची ही वस्ती शुक्रवारी दिवसभर सुन्न होती. अपघातग्रस्तांच्या घरांसमोर लोकांची गर्दी, महिलांचा आक्रोश आणि मृतदेहांची प्रतीक्षा करणारे पै-पाहुणे दिवसभर थांबले होते.

अनमोल झाली पोरकी

नंदकुमार हेगडे यांच्यासह त्यांची पत्नी रेणुका आणि १२ वर्षीय मुलगा आदित्यचाही मृतांमध्ये समावेश आहे. नंदकुमार यांची अनमोल ही बारा वर्षांची मुलगी अपघातातून बचावली आहे. किरकोळ जखमी अनमोलवर उपचार सुरू असून तिला आई, वडील आणि भाऊ हे अपघातात ठार झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले नाही. हेगडे कुटुंबातील स्नेहल हेगडे, काजल हेगडे, शीतल हेगडे, कोमल हेगडे आणि गौरी हेगडे हे पाच जखमी आहेत. यात दोन शालेय मुलींचाही समावेश आहे.

रौनकचा चटका लावणारा मृत्यू

राजू नरदे हे मूळचे कळे (ता. पन्हाळा) येथील राहणारे असून, ते मोलमजुरीच्या कामासाठी गांधीनगरातील झोपडपट्टीत राहतात. हेगडे कुटुंबीयांसह राजू नरदे यांची पत्नी आणि दोन मुले देवदर्शनासाठी गेले होते. टाटा सुमोमध्ये बसण्यासाठी जागा नसल्याने रौनकच्या आईने रौनकला ट्रॅव्हलरमध्ये पाठवले. दुर्वैवाने ट्रॅव्हलरचा अपघात झाला आणि यात सात वर्षीय रौनकचा मृत्यू झाला. देवदर्शनासाठी जाताना रौनकने आजीकडून घेतलेली दहा रुपयांची नोट वडिलांना दिली होती. ती आठवण सांगताना राजू नरदे यानी हंबरडा फोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्षयात्रा मंळवारी कोल्हापुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी काढण्यात आलेली संघर्षयात्रा मंगळवारी कोल्हापुरात येत आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात २५ एप्रिलला तीन ठिकाणी सभेचे आयोजित केले आहे. संघर्षयात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह शंभर आमदार या संघर्ष यात्रेत सहभागी आहेत. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. शहर जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात बैठक झाली. २५ एप्रिल रोजी पहिली सभा मुदाळतिट्टा (ता. भुदरगड), दसरा चौक (कोल्हापूर) आणि जयसिंगपूर (ता. हातकणंगले) येथे होईल. दसरा चौकात सायंकाळी पाच वाजता सभा होईल. २४ एप्रिलला रात्री संघर्षयात्रा कोल्हापुरात दाखल होईल. लाखो शेतकऱ्यांनी संघर्षयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी केलेली नाही. माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांची ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. प्रामाणिक कर्जदारांची २० हजार रुपये कर्जमाफी केली. राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. कर्जमाफी होईपर्यंत शेतकरी कर्जेही भरणार नाही. त्यामुळे बँका अडचणीत येतील. उत्तरप्रदेशमध्ये केलेली कर्जमाफीचा निर्णयही मान्य नाही. संपूर्ण कर्जमाफी करून सात बारा कोरा झाला पाहिजे.’

राज्य सरकारवर कडाडून टीका करीत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘भाजप-सेनेचे राज्य सरकार संवेदनाशून्य आहे. राज्यात उष्णतेची लाट असूनही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष यात्रा काढावी लागत आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. सरकार केवळ कर्जमाफीची घोषणा करीत आहे. त्याची अंमलबजावणी करीत नाही. कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या थांबतील का, असा संवेदनशून्य प्रश्न सरकारकडून उपस्थित केला जात आहे. सरकार शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करीत आहे. मुंबई, दिल्ली येथे न्याय मिळत नसेल तर संपूर्ण कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरावे लागेल.’

या वेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी संघर्षयात्रेचा आढावा घेतला. बैठकीला आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर हसीना फरास, माजी आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, प्रताप माने, आदिल फरास आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

या पक्ष्यांनो...आमच्या अंगणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तहानलेल्या चोची घेऊन आता तुम्ही कुठेही भटकण्याची गरज नाही... थेंबभर पाण्यासाठी तळ गाठलेल्या पाणवठ्यांच्या घिरट्या घालण्याची गरज नाही. पिल्लांना भरवण्यासाठी लागणारा तांदुळकण्यांचा घास शोधण्यासाठी वणवण करण्याची गरज नाही. रणरणत्या उन्हात सावली देणाऱ्या घरट्यासाठी काड्या जोडण्याचीही गरज नाही. मूठभर धान्य, ओंजळभर पाणी आणि विसाव्यासाठी निवारा आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. पक्ष्यांनो, तुम्ही फक्त किलबिल करत आमच्या अंगणात यायचं आहे...ही साद आहे कोल्हापुरातील पक्षीप्रेमी नागरिकांची. महाराष्ट्र टाइम्सने पक्षी वाचवूया या अभियानांतर्गत दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत पक्षीप्रेमी व्यक्तींसह संस्थांनी दिलेल्या घरटे, पाणीपात्र आणि धान्य यांचे वाटप करण्यात आले. पक्ष्यांसाठी हे साहित्य घेण्यासाठी आलेले संवेदनशील नागरिक यानिमित्ताने पक्ष्यांना मायेचा घास आणि निवारा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

उन्हाच्या तडाख्यात अन्न व पाण्यासाठी पक्ष्यांची भटकंती थांबवण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या ‘चला, पक्षी वाचवूया’ उपक्रमाला सर्वंच स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पक्षी वाचविण्याची हाक दिल्यानंतर शेकडो किलो धान्य, घरटी, पाणी प्लेट समाजातील सर्वंच घटकांनी जमा केल्या. वाढदिवसाची भेट, लग्नातील अक्षता, कॉलेज विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अन्नासाठी पक्ष्यांची ससेहोलपट थांबवण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने ‘पक्षी वाचवूया’ या अभियानांतर्गत दिलेल्या आवाहनाला अनेक पक्षीप्रेमींचे हात सरसावले. विविध समाजांचे प्रतिनिधी, महिला, लहान मुलांकडून घरटी, धान्य, पाण्याची भांडी देण्यात आली. या उपक्रमात जमा झालेल्या साहित्याचे वाटप शुक्रवारी नागाळा पार्कातील महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी पक्ष्यांसाठी आपल्या अंगणात, गच्चीत लावण्यासाठी घरटे, पाणीपात्र आणि धान्य नेण्यासाठी वाचकांनी मोठी गर्दी केली. स्पर्श फाऊंडेशन, समपर्ण फाउंडेशन आणि द कन्झर्वेशन ऑफ इंडिया या संस्थांच्यावतीने पक्ष्यांसाठी घरटे, पाणीपात्र आणि धान्य देण्यात आले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मटातर्फे या उपक्रमाला प्रारंभ झाला.

समर्पण फाउंडेशनचे संदीप पाटील, स्पर्श फाउंडेशनचे अवधूत अपराध, स्नेहल दुर्गुळे, द कन्झर्वेशन फाउंडेशन ऑफ इंडियाचे आशिष घेवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना संदीप पाटील यांनी पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या आवारात घरटे ठेवताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.

७०० घरटी, ५०० पाणीपात्र आण ६०० किलो धान्य

पक्ष्यांचा अधिवास टिकवण्यासाठी काम करणाऱ्या कोल्हापुरातील संस्थांच्या मदतीने देण्यात आलेले घरटे, पाणीपात्र आणि धान्य नागरिकांना वाटण्यात आले. या मोहिमेसाठी महाराष्ट्र टाइम्सने आवाहन केल्यानंतर ७०० घरटी, ५०० पाणीपात्र आणि ६०० किलो धान्य जमा झाले. ज्यांना आपल्या अंगणात, गच्चीत, परिसरातील झाडांवर घरटी, पाणीपात्र किंवा धान्य ठेवायचे असेल त्यांच्यासाठी हे वाटण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले होते. पक्ष्यांसाठी घरटे, पाणीपात्र आणि धान्य देणारे आणि ते घेऊन आपल्या अंगणात ठेवणारे अशा पक्षीप्रेमींमधील सेतू साधण्याची काम महाराष्ट्र टाइम्सने केले, असे अनेकांनी मत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशमुख बंधूंसह सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील २६७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर (आस्थापना) यांनी दिले आहेत. यात कोल्हापुरातील सहा निरीक्षकांचा समावेश असून, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे वादग्रस्त पोलिस निरीक्षक अनिल देशमुख आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या तपासातील राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांचाही समावेश आहे. लवकरच हे अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर राहणार आहेत.

रिक्त जागांवर गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक संजय शिवाजीराव मोरे, पुणे शहरातील सुनील दत्तात्रय पाटील आणि गुन्हे अन्वेषण राजीव अनंत चव्हाण यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिस ठाण्यांमध्ये दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या २६७ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे, त्याचबरोबर २११ विनंती बदल्याही केल्या आहेत. या बदल्यांचे आदेश आयजी व्हटकर यांनी गुरुवारी (ता. २०) रात्री उशिरा जारी केले. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पद्मा कदम यांची तुरची (जि. सांगली) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली, तर जुना राजवाडा ठाण्याचे अनिल देशमुख यांची बदली राज्य गुप्त वार्ता विभागाकडे झाली आहे. शिरोळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि पोलिस मुख्यालयातील नितीन गोकावे यांची बदली मुंबई शहर येथे, तर जातपडताळणी कार्यालयातील निर्मला माने-लोकरे यांची बदली सांगली येथे करण्यात आली आहे.

पानसरे हत्या तपासातील देशमुख प्रमुख अधिकारी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानतंर घटनास्थळावर पोहोचून तपास सुरू करणारे अमृत देशमुख हे पहिले अधिकारी होते. देशमुख यांनीच पानसरे हत्येचा पंचनामा करून तपासातही महत्त्वाचे योगदान दिले आहे. याशिवाय एसटी गँगवर मोक्काअंतर्गत कारवाई करून टोळीला हद्दपार करण्याचेही काम अमृत देशमुख यांनी केले. अवैध धंदे बंद करूनपरिसरातील गुन्हेगारांवर त्यांनी वचक निर्माण केला होता. वर्षापूर्वीच त्यांच्या बदलीचे आदेश आले होते, मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने ती बदली रद्द केली होती.

राजवाड्याचे देशमुख वादग्रस्त

जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख आणि राजारामपुरीचे अमृत देशमुख हे सख्खे भाऊ, मात्र या दोघांच्या कार्यशैलीत जमीन-आसमानाचा फरक असल्याची चर्चा शहरात होती. मटका, जुगार असे अवैध धंदे सुरू असल्याने आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनीदेखील अनिल देशमुखांना झापले होते. अखेर अनिल देशमुख यांची राज्य गुप्ता वार्ता विभागाकडे बदली करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेते भरत जाधव यांच्या वड‌िलांचे न‌िधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांचे वडील गणपत हरी जाधव (वय ८७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोल्हापुरात निधन झाले. मुंबई येथे अनेक वर्षे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आठ दिवसांपूर्वीच ते मुंबई येथून कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत येथील निवासस्थानी आले होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, किरण, हरिभाऊ आणि अभिनेते भरत ही तीन मुलं आणि एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शनिवार (ता २३) रोजी पंचगंगा स्मशानभूमी येथे सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पुर्वी सकाळी दहा वाजता सानेगुरुजी येथील काशीद कॉलनी येथील निवासस्थानापासून अंतयात्रा काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दत्तक बाळ : आईला मिळणार हक्काची विश्रांती

$
0
0

सहा महिन्यांची विशेष रजा; पालकत्व झाले सुकर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वत:चे मूल होऊ शकत नसलेल्या दाम्पत्यांकडून बाळ दत्तक घेण्याचा विचार आता रूजत आहे. कौटुंबिक पातळीवर अजूनही काही दाम्पत्यांना संघर्ष करावा लागत असला तरी आईबाप होण्याच्या आनंदासाठी तो पर्यायही ठेवला जात आहे. करिअर करणाऱ्या आजच्या मुलींचा विचार करून दत्तक मूल घेणाऱ्या नोकरदार आईला आता सरकारतर्फे १८० दिवसांची विशेष रजा मिळणार आहे. एक वर्षाच्या आतील वयाचे बाळ दत्तक घेणार असतील तर सहा महिने पगारी रजा घेऊन बाळाचे संगोपन करण्याची संधी मिळणार असल्यामुळे दत्तक बाळांच्या आई-वडिलांसाठी हा दिलासा देणारा निर्णय आहे.

दोनाचे चार झाले की दोघांचे तिघे कधी होणार ही उत्सुकता असतेच. कधी वर्षभराच्या तर कधी तीन वर्षाच्या ‘प्लॅनिंग’नंतर बाळाचा विचार सुरू होतो. सध्याच्या मुली करिअरिस्टीक असल्यामुळे लग्नानंतर लगेच जबाबदारीमध्ये अडकण्याची इच्छा नसते. तर काही दाम्पत्य बाळाच्या जन्मानंतर वाढणाऱ्या आर्थिक खर्चासाठी गुंतवणूक करून मगच आईबाबा होण्याचा निर्णय घेतात. शिवाय बाळाच्या जन्मानंतर त्याचे संगोपन करण्यासाठी अनेक मातांना त्यांच्या नोकरी व्यवसायातून ब्रेक घ्यावा लागतो. अगदीच महिन्यादोन महिन्यांच्या रजेनंतर कामावर रूजू होताना बाळाच्या काळजीने त्यांची धावपळ होते. एकत्र कुटुंब असेल तर काही गोष्टी एकमेकांच्या सहकार्याने होतात, मात्र विभक्त कुटुंब पद्धतीत बाळाच्या आगमनानंतर कुटुंबाची घडी विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशीही काही दाम्पत्म्य आहे ज्यांना स्वत:चे बाळ होऊ शकत नाहीत ते दत्तक घेण्याचा विचार करतात. कोल्हापुरातील बालकल्याण संकुल या संस्थेतून गेल्या पाच वर्षात दोनशेहून अधिक बालकांना दत्तक आईबाबा मिळाले आहे. ज्यांना एकही अपत्य नाही अशी दांम्पत्ये तर बाळ दत्तक घेण्याचा विचार करत आहेतच, पण ज्यांना पहिला मुलगा आहे त्यांनी दुसऱ्या अपत्याचा विचार करताना मुलगी दत्तक घेण्याला प्राधान्य दिले आहे.

सानेगुरूजी येथे राहणाऱ्या स्मिता गाडेकर यांनी पहिल्या मुलाला पाच वर्षे झाल्यानंतर सात महिन्यांची मुलगी दत्तक घेतली आहे. त्या एका शाळेत शिक्षिका असून त्यांना सरकारने देऊ केलेल्या १८० दिवसांच्या विशेष रजेचाही संगोपनासाठी लाभ होणार आहे. त्या सांगतात, ‘जेव्हा मी मुलगी दत्तक घेण्याचा विचार केला तेव्हा नोकरीतून तिला सांभाळण्यासाठी वेळ कसा द्यायचा हा प्रश्न होता. विभक्त कुटुंबात राहत असल्यामुळे तिला कुठे ठेवायचे यावर पतीसोबत चर्चा केली. तिच्या संगोपनासाठी पूर्णवेळ महिला ठेवण्याचे ठरवून मुलगी दत्तक घेतली. आता या निर्णयामुळे मला स्वत:ला सहा महिन्यांची रजा मिळणार असल्यामुळे ताणमुक्त आणि धावपळ न करता मी बाळाकडे लक्ष देऊ शकणार आहे.’

आई होणं आ​णि आईपण निभावणं या खूप जबाबदारीच्या गोष्टी आहेत. सध्याच्या महागाईच्या काळात दांपत्यांपैकी दोघांनीही नोकरी करणे गरजेचे बनले आहे. एकत्र कुटुंब व्यवस्थाही कोलमडत आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या जन्मानंतर जर नोकरदार आईला कामावर हजर होणे आवश्यक असेल तर बाळाच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. पाळणाघरात मुलांचा सांभाळ नीट होईल की नाही याबाबत आईच्या मनात साशंकता असते. तर एखादी बाई पगार देऊन ठेवल्यास आर्थिक खर्चही वाढतो. त्याऐवजी आईलाच जर सहा महिने पगारी रजा दिली तर ती बाळाची काळजी घेऊ शकते. तिच्या मनावर आर्थिक ताण नसल्याने ती आनंदाने मातृत्वाचे क्षण अनुभवू शकते. याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. त्यामुळे या निर्णयाला कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टिने ममत्त्वाची झालर आहे.

- सविता भोसले, समुपदेशक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पाऊस: राज्यसरकारची ४ लाखांची मदत

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. अवकाळी पावसात दगावलेली व्यक्ती शेतकरी असेल तर त्यांच्या कुटुंबियांना 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने'अंतर्गत दोन लाख रूपयांची मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पंढरपूरमधील गारपीटग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढाव घेतला. यावेळी अवकाळी पावसात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना चार लाखांची मदत केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. राज्यातील ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांना बसला आहे. सोलापूरमध्येही पंढरपूरसह मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्ये पावसासह गारपीटीने झोडपले आहे. यात द्राक्ष बागांसह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

द्राक्ष बागांमध्ये तयार झालेली द्राक्षे काढली जात असताना अचानक झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा द्राक्ष बागांना फटका बसला आहे. या पावसामुळे सामान्य शेतकऱ्यांसह द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. काही ठिकाणी आंब्याचा मोहोर गळाल्यानेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​एमआयएमचे तौफिक शेखवरस्थानबद्धतेची कारवाई

$
0
0



सोलापूर

सोलापुरातील एमआयएमचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सोमवारी केली. शेख याची रवानगी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

शेख याच्याविरुद्ध १९८९पासून फेब्रुवारी २०१७पर्यंत सोलापुरातील विविध पोलिस ठाण्यात विविध कालमांतर्गत एकूण २९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यातून तो निर्दोष मुक्त झाला आहे. त्याच्याविरुद्ध दोनवेळा फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई आणि चारवेळा महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून त्याने त्याच्या साथीदारांसह एमआयडीसी, सदर बझार, विजापूर नाका, जेलरोड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्रनिशी फिरून खुनाचा प्रयत्न करणे, हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, अपहरण, गैरमंडळी जमाव जमवून गैरकृत्य करणे, बेकायदा दुकान घरजागा बळकावविणे, लोकांना किरकोळ कारणावरून घातक शास्त्रनिशी मारहाण करून परिसरात दहशत निर्माण करणे आदी गुन्हे दाखल आहेत. या वरून पोलिसांनी तौफिक शेख याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. तौफिक शेख याने मागील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एमआयएमकडून निवडणूक लढविली होती. त्याला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्या निवडणुकीत शेख याने प्रणिती शिंदे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना नामोहरम केले होते. या शिवाय नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत तौफिक याच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे ९ नगरसेवकही निवडून आले आहेत. मनपा निवडणुकीत मतदानावेळी नई जिंदगी परिसरात राष्ट्रवादीचे माजी महापौर हरून सैय्यद याला तौफिक याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून रक्तबंबाळ केले होते, त्यावेळी त्याच्याविरुद्ध आणि त्याचा मुलगा अदनान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवस तौफिक फरार होता. मात्र पोलिस आयुक्त सेनगावकार यांनी अखेर तौफिकवर स्थाबद्धतेची कारवाई केली. तौफिक हा एकेकाळी सुशीलकुमार आणि कन्या आमदार प्रणिती यांचा कट्टर समर्थक होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात काँग्रेस किंगमेकर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आज, मंगळवारी दुपारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून, दोन्ही पदे आणि सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीने ताकद पणाला लावली आहे. भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. भाजपने आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. तर राष्ट्रवादीकडून शितलदेवी आणि स्वरूपराणी मोहिते-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. खासदार विजयसिह मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजितसिह मोहिते-पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. २३ जागा जिंकून राष्ट्रवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाचीच मदत घ्यावी लागणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीने २३, भाजप-शिवसेना आघाडी २२, काँग्रेस ७, स्थानिक आघाडी १०, शेकाप ३ आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. ६८ सदस्य संख्या असलेल्या झेडपीमध्ये सत्ता स्थापन कारण्यासाठी ३५ जागांची जुळवाजुळव करण्यासाठी खासदार विजयसिह मोहिते-पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शेकाप ३ आणि अपक्ष किवा स्थानिक विकास आघाडीतील काहींना बरोबर घेऊन राष्ट्रवादी सत्ता स्थापन करू शकते, असे चित्र असतानाच भाजपने झेडपी ताब्यात घेण्यासाठी संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. मोहिते-पाटील विरोधक आणि विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढाचे समाधान आवताडे यांनीही भाजप पुरस्कृत महाआघाडीचे संजय शिंदे यांना मदत करण्याची तयारी दर्शविली असल्याने यामध्ये त्यांना कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे २३ सदस्य निवडून आले आहेत, त्यामध्ये तब्बल ८ सदस्य एकट्या माळशिरस म्हणजेच मोहिते-पाटील यांच्या तालुक्यातील आहेत. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाचे म्हणजेच काँग्रेसचे सहाजण आणि आणखी एक असे सातजण ज्या पक्षाबरोबर जातात त्या पक्षाची सत्ता झेडपीत येणार आहे. त्यामुळे आमदार म्हेत्रे हे सत्तेचे किंगमेकर ठरू शकतात. आघाडी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. शरद पवार यांनी लक्ष घातल्यास आणि शिंदे यांना बोलल्यास आघाडीचा अध्यक्ष होऊ शकतो, असे चित्र आज दिसून येत आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शिवसेना ४, शेकाप ३ असे ३७ संख्याबळाची जुळवाजुळव राष्ट्रवादी आघाडीने केली आहे. तर भाजप १४, परिचारक गट ६, भीमा परिवार ३, आवताडे गट ४, अपक्ष २, शिवसेना १ अशी ३१ जणांची जुळवाजुळव भाजप आघाडीने केली आहे. सत्तेसाठी जवळपास सहा जागा कमी पडत असतानासुद्धा माढामधील ७ सदस्य यांना गैरहजर ठेऊन भाजप आघाडीने चमत्कार घडविण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच शेकाप आणि काँग्रेस तटस्थ राहिल्यास भाजपाला विजय आणखी सोपा करण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरु असल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. एकूणच सत्तेसाठीचा मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सैराट'मधील आर्चीची छेड काढणारा ताब्यात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । अकलूज (सोलापूर)

'सैराट'फेम आर्ची अर्थात, रिंकू राजगुरू हिची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय घरत असं या तरुणाचं नाव असून तो ठाण्याचा रहिवाशी असल्याचं समजतं.

मराठी सिनेसृष्टीत अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या 'सैराट' चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू अल्पावधीतच स्टार झाली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिला भेटण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत. यापूर्वीही अनेकदा तिला धक्काबुक्की झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी एका तरुणानं तिची छेड काढल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी करून दत्ता घरत याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images