Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बनावट दस्ताने प्लॉटची खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनावट दस्त तयार करून प्लॉटची विक्री करणाऱ्या नऊ जणांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील कुमार शामलाल पंजाबी (वय ४०, सिध्दी विनायक अपार्टमेंट, राजारामपुरी) यास अटक केली. अन्य आठ जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. छाया ओमप्रकाश चव्हाण (वय ७१, रा. मूळ, तेलंगणा, सध्या. राजारामपुरी) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

कुमार पंजाबी याच्यासह गौरव गोकुळ परिट (रा. सम्राटनगर), अजिंक्य राजू भिके (रा. राजेंद्रनगर), निखील नाथाजी सकट (रा. आर. के. नगर), दीपक गोते (रा. गोतेवाडी ता. पन्हाळा), बनावट आधारकार्ड देणारी अज्ञात महिला, वासंती कृष्णा शेट्टी, स्नेहल अभिजित पित्रगट, सुजाता प्रवीण चौगुले (रा. माळी कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया यांचा प्लॉट लाटण्यासाठी त्यांच्या वयाची बनावट महिला उभी करून बनावट आधारकार्ड तयार करून भवानी मंडप परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त करण्यात आला. चव्हाण यांना याची माहिती समजल्यावर त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार बुधवारी याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला. यातील कुमार पंजाबी याला अटक केली आहे. तर अन्य संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल देशमुख करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंमलबजावणीवरच विद्यापीठ कायद्याची यशस्विता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायद्याच्या योग्य अंमलबजावणीवरच त्याची यशस्विता अवलंबून राहील’, असे मत जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.आर. माळी यांनी आज येथे व्यक्त केले. मार्च २०१७ पासून अंमलात आलेल्या नवीन ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा-२०१६’च्या संदर्भात शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत बीजभाषण करताना ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात कार्यशाळा झाली.

डॉ. माळी म्हणाले, दर्जावृद्धीसाठी नवसंशोधन व नवनिर्मितीस प्रोत्साहन, परीक्षा व मूल्यमापन पद्धतीत सुधारणा, आंतरविद्याशाखीय सहसंबंधात वृद्धी, इन्क्युबेशन, औद्योगिक साहचर्य तसेच कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रमांना प्रोत्साहन आदी बाबी या कायद्यात आहेत.’

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात म्हणाले, ‘प्रगतीचा मार्ग हा उच्च शिक्षणातूनच जातो, हे लक्षात घेऊन नवीन कायद्यात पूर्वीच्या १९९४च्या कायद्यापेक्षा साधारणतः ४० टक्के बदल करण्यात आला आहे. विद्यापीठांना परदेशात जाता येईल, क्लस्टर विद्यापीठे स्थापन करता येतील, आर्थिक अनियमितता टाळण्यासाठी त्यांचे इन्पेक्शन, ऑडिट करता येईल. विद्यापीठांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी स्वतःचे वित्तीय स्रोत निर्माण करता येतील, निवडणुका, नामांकने यांचा योग्य मेळ साधत अधिसभा, विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषद यांची फेररचना, बोर्ड ऑफ डीन्सचा समावेश अशा अनेक महत्त्वाच्या तरतुदी या कायद्यात केल्या आहेत.’

शिक्षणतज्ज्ञ डॉ. आनंद मापुस्कर म्हणाले, ‘बदलत्या काळानुरुप कायदा बदलणे आवश्यक होते. त्या दृष्टीने या कायद्यात बोर्ड ऑफ इनोव्हेशन, इन्क्युबेशन एन्ड एंटरप्राईजेस वगैरेंचा समावेश केला आहे. युवापिढीला कुशल मनुष्यबळामध्ये रुपांतरित करून तिची ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरण्यासाठी कौशल्य शिक्षणाची तरतूद कायद्यात आहे.’

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी कार्यशाळा आयोजनामागील उद्दिष्ट्ये सांगितली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दुपारच्या सत्रात शिक्षणतज्ज्ञ प्रा. सुधाकर मानकर, शंकरराव कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

पहिले विद्यापीठ

राज्यातल्या ११ अकृषी विद्यापीठांमध्ये नूतन कायद्याविषयी पहिले चर्चासत्र भरविणारे तसेच नवीन कायद्यातील तरतुदींनुसार हंगामी अधिकार मंडळांची स्थापना करणारे शिवाजी विद्यापीठ राज्यातले पहिले आणि एकमेव विद्यापीठ असल्याचे गौरवोद्गारही डॉ. माळी यांनी प्रसंगी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कल्चर क्लबतर्फे रविवारी समरकँप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परीक्षा संपल्यानंतर सुटीत खऱ्या अर्थाने मुलांच्या कलागुणांना बहर येतो. अभ्यासाचा ताण आणि शाळेच्या वेळापत्रकाच्या चौकटीतून बाहेर पडत मुलं स्वच्छंदीपणे सुटीचा आनंद घेत असतात. या सुटीतील दिवसांमध्ये जर कलागुणांनाही व्यासपीठ मिळाले तर त्यांच्यातील निर्मितीकौशल्य, कल्पना यांनाही चालना मिळते. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कल्चर क्लब आणि ‘हॉटेल के ट्री’ यांच्यावतीने आयोजित एक दिवसीय समर कँपमध्ये बच्चेकंपनीच्या कलागुणांना बहर येणार आहे. जंगल, प्राणी यांच्या फोटोग्राफीतील गंमतीजंमतीसह या कँपमधून मुलांना किचन​किंग होण्याची संधीही मिळणार आहे. रविवारी (ता. १६ एप्रिल) सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत हे शिवाजी पार्क येथील हॉटेल के ट्री येथे होणाऱ्या या ​शिबिरात ८ ते १६ वयोगटातील मुलांमुलींना प्रवेश देण्यात येणार आहे.

परीक्षांचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. परीक्षा संपल्यानंतर मुलांना कोणत्या शिबिरात प्रवेश घ्यायचा, क्रीडाप्रकाराचे प्राथमिक शिक्षण द्यायचे, निसर्गाची ओळख कशी करून द्यायची, हस्ताक्षर कसे सुधारायचे अशा अनेक प्रश्नांची चर्चा घरात सुरू झाली आहे. मुलांची आवड लक्षात घेऊन शिबिरांची निवड केली जात आहे. यामध्ये जंगल फोटोग्राफी हा उत्सुकतेचा विषय मुलांना या शिबिरात शिकायला मिळणार आहे. फोटोग्राफर मंगेश देसाई यामध्ये माहिती देणार आहेत. ‘फोटोग्राफीचा छंद आणि करिअर’ या​विषयी ते बोलणार आहेत. तसेच जंगल सफारी, गिर्यारोहण, अरण्यातील फोटोग्राफी याविषयीचे अनुभव आणि चित्रफित पाहता येणार आहे.

दुसऱ्या सत्रात मुलांना सोपे खाद्यपदार्थ बनवण्यास शिकवण्यात येणार आहेत. नवीन पदार्थ बनवण्याची मुलांना हौस असते. मुलांना पदार्थ बनवण्यात आनंद मिळेल आणि त्यांच्यासाठी सुरक्षित असतील असे पदार्थ शिकवण्यात येणार आहेत. यामध्ये स्वीट पोटॅटो कबाब, पान ड्रिंक, बनाना स्टफिंग, डेझर्ट, स्प्राउट चाट, पुदिना टिक्की अशा १२ पदार्थांच्या रेसिपी शिकण्याची संधी या शिबिरात मिळणार आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी कल्चरक्लब सदस्यांना १००० रुपये तर इतर वाचकांना १२०० रूपये प्रवेशमूल्य आहे. यामध्ये नाष्टा आणि दुपारचे जेवण सहभागी ​शिबिरार्थींना देण्यात येणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी ९२०९५९ ४४९७ किंवा ०२३१ २५२७९९० क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हपुरात तीन तास वीजपुरवठा खंडित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुईखडी येथील वीज केंद्रातून शहराला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीत बापट कॅम्प परिसरात बिघाड झाल्याने बुधवारी सकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. हा तांत्रिक दोष दूर झाल्यानंतर वीज पुरवठा सुरू झाला. वीज पुरवठा बंद झाल्याने शहरातील काही भागात पाणीही आले नाही.

सोमवारपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. सोमवार आणि मंगळवारी दोन दिवस काही तास शहरातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून वीजपुरवठा बंद झाला. सध्या कमालीचे तापमान वाढल्याने शहरवासिय हैराण झाले आहेत. सकाळी वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सानेगुरूजी वसाहत, आपटेनगर, जिवबा नाना जाधव पार्क, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, क्रशर चौक, संभाजीनगर परिसरात सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत पाणी येते. वीजपुरवठा नसल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा उपसा झाला नाही. कळंबा परिसरातही साडेदहा वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला.

महावितरणकडे वीजपुरवठा बंद असल्याचे दूरध्वनी खणखणत राहिले. त्याची दखल घेत साडेनऊ वाजता या बिघडलेल्या दोन वीज वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले. सानेगुरूजी वसाहत, आपटेनगर आणि परिसरात दहा वाजता वीजपुरवठा सुरू झाला. दरम्यान, महावितारणचे अभियंता सुनील माने म्हणाले, ‘अचानक उद्भभवलेली तांत्रिक दोष दूर केला आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर तारांना स्पर्श करणारी झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा परिसरात धोकादायक वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील वडाप वाहतूक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या मुळावर आल्या असताना धोकादायक वडाप वाहतुकीमुळे खासबाग, देवल क्लब, प्रायव्हेट हायस्कूल या परिसरातील शाळा परिसरही धोक्यात आला आहे. या धोकादायक वाहतुकीला प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक नियंत्रण शाखा अभय देत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.

देवल क्लब ते खासबाग या मार्गावर केएमटी बस स्टॉप आहे. या बसस्टॉपवरुन संभाजीनगर, राजेंद्रनगर, कळंबा, पाचगाव, रायगड कॉलनी, आर. के. नगर या मार्गावरील बसेस धावतात. पण या स्टॉपच्या पिछाडीस राजारामियन क्लब ते प्रायव्हेट हायस्कूल मैदानाची पश्चिमेकडील सरंक्षक भिंतीजवळ वडापची वाहने उभी असतात. त्यामध्ये सहा सिटर, ऑटो रिक्षा, पिवळी काळी मोटार उभ्या असतात. राजेंद्रनगर, आर. के. नगर, मोरेवाडी, उचगाव, घाटगे-पाटील कारखाना या मार्गावर वडापची वाहतूक सुरू असते.

प्रायव्हेट हायस्कूल परिसरात चार शाळा भरतात. चार शाळांमध्ये साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शाळांच्या वेगवेगळ्या वेळेत विद्यार्थी या रस्त्यांवर असतात. वडाप वाहनातून वाट काढत विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. शाळा सुरू होताना व शाळा संपल्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. त्यातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असते. वडापची वाहने, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, पालकांच्या वाहनामुळे पाच ते साडेपाच या वेळेत वाहतुकीची मोठी कोंडी होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम असल्यास वाहतुकीच्या कोंडीत मोठी भर पडते. केशवराव भोसले नाट्यगृहाला लागून असलेल्या खाऊ गल्लीला भेट देणारे नागरिकही रस्त्यांवर वाहने पार्क करतात. वडाप व्यावसायिकांनी प्रायव्हेट हायस्कूलच्या सरंक्षक भिंतीजवळ मंदिर उभारून आपला तळ पक्का करण्याचा प्रयत्न करत आहेत. वडाप वाहतूकधारांना राजकीय पक्षाच्या वाहतूक संघटनांचा आशीर्वाद असल्याने आरटीओ व शहर वाहतूक नियंत्रण शाखा डोळेझाक करत आहेत.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याने यापूर्वी प्रायव्हेट हायस्कूलशी संबधित पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे लेखी अर्ज व निवेदन देऊनही केराची टोपली दाखवली जात आहे. उलट प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांकडून दंडाची पावती करून महिनाभर बेकायदेशीर वाहतुकीकडे कानाडोळा करतात.

अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

राजारामियन क्लबच्या संरक्षक भिंतीजवळ फुटपाथ आहे. पण या फुटपाथवर जुने फर्निचर विक्रेत्याने अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाला स्थानिक नगरसेवकांचा आशीर्वाद असल्याने तात्पुरती कारवाई केली जाते. त्यानंतर पुन्हा विक्रेता अतिक्रमण करत असतो. या अतिक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करून फुटपाथ नागरिकांना खुला करुन द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

प्रायव्हेट हायस्कूल, खाऊगल्ली, देवल क्लबमुळे या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यातच या परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीचा थांबा झाल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शाळा सुटल्यावर जीव मुठीत घेऊन विद्यार्थी ये जा कसे करतात यासाठी आरटीओचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी.

विश्वास जाधव, मंगळवार पेठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे शंभर कार्यकर्ते अन्य जिल्ह्यांत काम करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील शंभरहून अधिक कार्यकर्ते अन्य जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी जाणार आहेत’, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. डिजिटल इंडिया योजनेंतर्गत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील ३० हजार व्यक्तींपर्यंत भीम अॅप पोहचवल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हे वर्ष संघटन वर्ष म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पंडीत उपाध्याय कार्यविस्तार योजनेंतर्गत भाजपचे कार्यकर्ते सहा महिने, एक वर्ष अथवा १५ दिवस विस्तारक म्हणून परजिल्ह्यात काम करण्यास जाणार आहेत. जिल्ह्यातील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी योजनेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांची नावे प्रदेश कार्यकारिणीला कळवण्यात येणार आहेत. पक्षाचे प्रचार करणारे कार्यकर्ते पक्षाने नियुक्ती केलेल्या जिल्ह्यात जाऊन भीम अॅप, स्वच्छ भारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करतील.

दरम्यान, आमदार अमल महाडिक हे कोल्हापूर ​दक्षिण आणि उत्तर या दोन विधानसभा मतदारसंघाचे या योजनेचे प्रमुख आहेत. त्यांनी गुरुवारी सकाळी बिंदू चौकातील पक्ष कार्यालयात योजनेच्या नियोजनासाठी बैठक घेतली. योजनेचे मुख्य महानगर संयोजक म्हणून अशोक देसाई आहेत. जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, सरचिटणीस संतोष भिवते यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती झाल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. बैठकीत योजनेच्या नियोजनाची माहिती आमदार महाडिक यांनी कार्यकर्त्यांना दिली.

महानगर अध्यक्ष संदीप देसाई, महेश जाधव, विजय जाधव, संतोष भिवटे, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, नगरसेवक अजित ठाणेकर, अशिष ढवळे, संतोष गायकवाड, किरण नकाते, विजय खाडे, नगरसेविका जयश्री जाधव, उमा इंगळे, ​सविता भालकर, भाग्यश्री शेटके, गीता गुरव, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, संपतराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, मारुती भागोजी, गणेश देसाई, श्रीकांत घुंटे, किशोरी स्वामी, भारती जोशी, मधुमती पावनगडकर आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंजरस मोबाइल पीपलचा परवाना होणार निलंबीत

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com

Tweet : @gurubalmaliMT

कोल्हापूर ः मोबाइलवर बोलत वाहन चालवणाऱ्या ‘डेंजरस मोबाइल पीपल’चे लायसन यापुढे निलंबित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा लोकांवर जनतेच्या माध्यमातून आरटीओ कार्यालय वॉच ठेवणार आहे. वाहतूक नियम पायदळी तुडवत वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघात होतात. त्यात अनेकांना हकनाक ‌जीव गमवावा लागतो. मोबाइलवर बोलत वाहन चालवताना आढळल्यास संबंधिताला शंभर ते तीनशे रूपये दंड केला जातो. पण, हे प्रमाणही फारच कमी आहे. दंडही किरकोळ असल्याने वाहनधारक बेदरकारपणे मोबाइलवर बोलत जाताना सर्रास दिसतात. यामुळे अशांना सहा ते दहा हजार दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवा मोटार वाहन कायदा चार दिवसांपूर्वी मंजूर झाला आहे. यात सध्याच्या दंडात कमाल दहापट वाढ करायला राज्य सरकारांना मुभा दिली आहे.

वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्या डेंजरस पीपलरोधात ‘महाराष्ट्र टाइम्स’नेही मोहीम राबवली आहे. आता अशा चालकांचा वाहन चालवण्याचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. यासाठी जनतेची मदत घेण्यात येणार आहे. संबंधितांची माहिती, वाहन क्रमांक १८००२३३९९०९ या हेल्पलाइन क्रमांकावर कळवल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

=====

मोबाइलवर बोलत वाहन चालवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच यापुढे अशा वाहनधारकांचा परवाना निलंबित करण्यात येईल.

डॉ. डी. टी.पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

व्हॉट्सअॅपची घेणार मदत

यापुढील काळात जनतेलाही मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. वाहनचालकाने नियमभंग केल्याचे स्पष्ट फोटो किंवा व्हिडिओ आरटीओच्या ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांकावर मागवले जातील. तो पुरावा मानून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, सध्या शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्यावतीने नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याची व्याप्ती आता वाढवण्यात येणार आहे.

मटा भूमिका

वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा चालकांमुळे अपघातात अनेकांचा बळी जातो. अशा लोकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. अशा डेंजरस पीपलविरोधात गेले दोन वर्षे ‘मटा’च्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला जात आहे. या उपक्रमाला सरकारच्या भूमिकेमुळे बळकटी मिळाली आहे. धोकादायकरित्या वाहने चालवत अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याच्यादृष्टीने परिवहन विभागाने उचलले पाऊल महत्त्वाचे आहे. या उपक्रमात आता लोकांनाही सहभागी होता येणार आहे. हेल्पलाइनचा वापर केल्यास डेंजरस पीपलना आळा बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने आता पाण्याचा प्रश्न तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिलचे दोन आठवडे संपत आले असताना आता जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ‘टंचाई भासणाऱ्या ७३ गावांमध्ये सध्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची कामे सुरू आहेत. त्यात ९ वेगवेगळ्या पद्धतीने ग्रामस्थांना गावातच पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहेत,’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.

ऑक्टोबर २०१६ ते जून २०१७ या कालावधीसाठी जिल्हा परिषदेकडून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. जानेवारी २०१७मध्ये हा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील १०० गावे आणि १७१ वाड्यांचा समावेश होता. यात सर्वाधिक गावे भुदरगड तालुक्यात (वाड्यांसह ५२) तर सर्वांत कमी गावे गगनबावडा आणि करवीर तालुक्यात (एकूण तीन) होती. या आराखड्यातील उपाय योजनांचा अपेक्षित खर्च दोन कोटी दोन लाख रुपये होता. या आराखड्यातील ७३ गावे आता टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत या गावांच्या संख्येत वाढ होणार आहे.

सध्या या गावांमध्ये सार्वजनिक विहीरी खोल करणे किंवा त्यातील गाळ काढणे, बुडक्या खोदणे, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, प्रगतीपथावरील योजना शीघ्र गतीने पूर्ण करणे, नवीन विंधन विहिरी खोदणे, टँकर किंवा बैलगाडीतून पाणी पुरवठा, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे, तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना सुरू करणे, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती करणे अशा मार्गांनी पाणी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यातील टँकर किंवा बैलगाडीतून पुरवठा, प्रगतीपथावरील नळ योजना तातडीने पूर्ण करणे आणि विंधन विहिरी विशेष दुरुस्ती या पर्यायी मार्गांचा अधार घेण्यात येणार नसल्याचे आराखड्यात स्पष्ट दिसते.

प्रामुख्याने खासगी विहिरी अधिग्रहण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यातही अनेक गावांमध्ये सामंजस्याने विहिरीतील किंवा बोअरवेलमधील पाणी ग्रामस्थांना वापरण्यासाठी खुले करून दिले जाते. अधिग्रहणाची अधिकार तहसीलदार पातळीवर असून, अनेक ठिकाणी अधिग्रहण करण्याची गरज पडत नाही. टंचाईग्रस्त गावात टँकर हा शेवटचा पर्याय असून, सध्या टँकर पुरवावा लागेल, असे एकही गाव जिल्ह्यात नाही. पण, येत्या पंधरा दिवसांत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे, हे निश्चित.

जिल्ह्यात एकही टँकर नाही

जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या २७१ गावांच्या टंचाई कृती आराखड्यात एकाही टँकरचा प्रस्ताव नाही. गेल्यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र होती. त्याकाळातही कोल्हापूर जिल्ह्याने टँकरशिवाय इतर उपाययोजनांमधून गावांमधील पाणीटंचाईचा सामना केला. यंदा गेल्यावर्षीपेक्षा तुलनेत समाधानकारक स्थिती आहे. त्यामुळे यावर्षीही कोणत्याही परिस्थितीत टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा टाळण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे

राधानगरी – १०

गडहिंग्लज – ४

चंदगड – २३

भुदरगड – १७

आजरा – ५

शिरोळ – ५

हातकणंगले - ९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रयत ही कर्मवीरांची प्रयोगशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोणताही शिक्षणग्रंथ न वाचता शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोगांची नांदी घडविणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणतज्ज्ञांचे महर्षी होते, तर रयत शिक्षण संस्था ही त्यांच्या यशस्वी प्रयोगांची प्रयोगशाळा ठरली’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एन. डी. पाटील यांनी काढले. शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा ‘प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार’ साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेस गुरूवारी सकाळी प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला. रोख १,५१,००० रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ‘कर्मवीरांनी केलेल्या प्रयोगांमुळे समाजातल्या तळागाळातल्या, गोरगरीब, दलित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील होणे शक्य झाले. रा. कृ. कणबरकर यांना त्यांनी असेच बेळगावहून साताऱ्याला शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून आणले. त्यांना कराडच्या संत गाडगे महाराज महाविद्यालयाचा प्राचार्यही केले. अण्णांचा कणबरकर यांना साताऱ्याला आणण्याचा निर्णय सरांच्या कारकीर्दीवर दूरगामी परिणाम करणारा ठरला.’

प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्राचे व्यापक कार्यक्षेत्र कणबरकरांना लाभले आणि आपली लेखणी, वाणी बहुजनांच्या उद्धारासाठी वापरून त्यांनी नवी महाविद्यालये आणि विद्यार्थी घडविले. कणबरकर हे अत्यंत नेकदार, सरळमार्गी व सर्जनशील वृत्तीचे व्यक्ती होते. राजर्षी शाहू महाराजांविषयीचा जिव्हाळा हा आम्हा दोघांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा होता.’

पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले, ‘आजवर रयत शिक्षण संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले, पण, शिवाजी विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आलेला पुरस्कार आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र वसतिगृह काढण्याचे स्वप्न कर्मवीरांना पुढे पूर्ण केले. म्हणून या भूमीचा हा पुरस्कार महत्त्वाचा आहे.’

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्थेस प्रदान करण्यात येत असलेला हा पुरस्कार म्हणजे कर्मवीर अण्णांच्या संस्कारांचा सत्कार आहे. वंचित, शोषित समाजघटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कर्मवीरांचे कार्य हे भारतरत्नाच्या तोडीचे आहे. त्या दृष्टीने कर्मवीर नवसमाजाचे रचनाकार होते.’

प्राचार्य कणबरकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रफीत दाखविण्यात आली. प्राचार्य बी. ए. खोत यांनी स्वागत केले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. अरुण कणबरकर यांनी कुटुंबियांतर्फे मान्यवरांचा सत्कार केला. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एन. जे. पवार, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण, डॉ. बी. पी. साबळे, श्रीमती शालिनी कणबरकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. भालबा विभुते आदींसह प्राचार्य, शिक्षक, सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहलींमध्ये मिळतेय युरोपीय देशांना पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परीक्षा संपत आल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही परदेश सहलींचे वेध लागले आहेत. अनेकांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच सुट्ट्यांचे नियोजन करून केलेल्या बुकिंगमुळे अनेकांच्या उन्हाळी सुट्ट्या परदेशात रंगणार आहेत. युरोपमधील लहान-मोठ्या देशांसह थायलंड, बँकॉक, जपान, चीन, रशियासाठीही कोल्हापूरकरांनी बुकिंग केले आहे.

‘पर्यटनाची बदलती व्याख्या आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या प्रवासामुळे नागरिक परदेशी पर्यटनाला प्राधान्य देत आहेत. लांब पल्ल्याच्या सहलींसाठी पाच ते सहा महिने आधी नियोजन करून पर्यटक देशांतर्गत सहलीच्या खर्चात परदेश दौरे पूर्ण करीत आहेत. यावर्षीही उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये छोट्या परदेश सहलींना पर्यटकांची पसंती आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पर्यटक उल्लेखनीय प्रमाणात सहलीला जाणार आहेत. सहलींसाठी मुख्यतः बाली, फुकेत, काब्री, बँकॉक तसेच युरोपातील काही देश, पोर्तुगाल, स्पेन, स्कॉटलंड आदी देशांना पर्यटकांची पसंती आहे. याशिवाय जपान आणि चीनमधील पर्यटनातही गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे,’ असे निरीक्षण पर्यटन कंपनी चालकांनी नोंदवले आहे.

महाराष्ट्रातून दिल्ली - पंजाब - काश्मीर, राजस्थान, केरळची आठवडाभराची सहल केली तर त्यासाठी जेवढा खर्च येतो, तेवढ्या रक्कमेत परदेशातील एक छोटी सहल सहज शक्य आहे. त्यामुळे तुम्ही छोट्या देशांच्या सहलींचा नवीन पर्याय निवडण्याचा विचार करा, अशा जाहिराती वारंवार टूर ऑपरेटर्स आणि पर्यटन क्षेत्रातील कंपन्यांकडून करण्यात येत आहेत. ‘एक लाख रुपयांमध्ये युरोप टूर’, ‘सत्तर हजार रुपयांमध्ये ग्रीक’, ‘सत्तर हजारांमध्ये स्वित्झर्लंड’, ‘साठ हजार रुपयांमध्ये मोरोक्को’ अशा खर्चात सहलींच्या जाहिराती केल्या जात आहेत. वेगवेगळ्या देशांच्या सहली अल्प खर्चामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या असल्याचे वारंवार सांगितले जाते आहे. त्यामुळे पर्यटकांनीही परदेशवारीची भुरळ पडते आहे. दरवर्षी परदेशी सहलींमध्ये १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे.


मुलांच्या शाळांना सुट्या सुरू झाल्याने अनेकांनी सहकुटूंब सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा देशांतील सहलींना पसंती दिली आहे. अधिकाधिक बुकिंग या देशांसाठी केले जात आहे. देशातर्गंत ठिकाणांण्याकडे जाण्याचा पर्यटकांचा अधिक कल दिसतो.

राजू ननवरे, सेल्स मॅनेजर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉटविक्रीत महिला कॉन्स्टेबलचा मुलगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनावट दस्त तयार करून प्लॉटची विक्री करणाऱ्या टोळीचा सूत्रधार पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गौरव अशोक भालकर (वय २५, रा. सम्राटनगर) हा असल्याचे उघडकीस आले आहे. भालकर हा गगनबावडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा असून, त्याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या विरोधात हद्दवारीचा प्रस्तावदेखील तयार केला आहे.

बनावट आधारकार्ड आणि दस्त तयार करून बनावट महिलेला उभे करून प्लॉट खरेदी केल्याप्रकरणी बुधवारी (ता. १२) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नऊ संशयितांवर गुन्हा दाखल झाला होता. यात गौरव भालकर (रा. सम्राटनगर), याच्यासह कुमार शामलाल पंजाबी, अजिंक्य राजू भिके (रा. राजेंद्रनगर), निखील नाथाजी सकट (रा. आर. के. नगर), दीपक गोते (रा. गोतेवाडी ता. पन्हाळा), बनावट आधारकार्ड देणारी अज्ञात महिला, वासंती कृष्णा शेट्टी, स्नेहल अभिजित पित्रगट, सुजाता प्रवीण चौगुले (रा. माळी कॉलनी) यांचा समावेश आहे. छाया ओमप्रकाश चव्हाण (वय ७१, रा. मूळ तेलंगणा, सध्या रा. राजारामपुरी) यांनी फिर्याद दाखल केली होती. भवानी मंडप परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे आणि दस्ताच्या आधारे छाया चव्हाण यांच्या प्लॉटच्या खरेदीचा व्यवहार करण्यात आला होता. पोलिसांनी कुमार पंजाबी याला अटक केल्यानंतर फसवणूक करणाऱ्या टोळीचा सूत्रधार गौरव भालकर हा असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित भालकर याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात फसवणूक, धमकावणे, मारहाण असे पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. सध्या तो फरार असून, जुना राजवाडा पोलिस त्याचा आणि इतर सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत.

गौरवची आई पोलिस कॉन्स्टेबल

ठकबाजी करणारा गौरव पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, पोलिसांनी त्याच्यावर यापूर्वी तीनवेळा प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्याची आई सध्या गगनबावडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही त्याचे कारनामे थांबलेले नाहीत. राजारामपुरीतील एका कुप्रसिद्ध टोळीशीदेखील गौरवचे संबंध असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असह्य उष्म्याने नागरिक हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रखर उन्हाळ्यामध्येही कधी तरी ३९ अंशावर पोहचणारा कोल्हापूरच्या तापमानाचा पारा आठवडाभर सातत्याने ३९ अंशावर पोहचला आहे. दोन दिवसांपासून ४० चाही टप्पा गाठल्याने दुपारी उन्हाचा कहर जाणवत असून तप्त झळांनी अंग भाजून काढले जात आहे. यामुळे नागरिकांना हा उष्मा असह्य झाला आहे. दिवसा घराबाहेर न पडण्याबरोबरच थंडगार फळांबरोबर कोल्ड्रींक्स, ताक, सोलकडी, माठातील पाण्याने गारवा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मार्चच्या शेवटच्या टप्प्यात उन्हाचा पारा ३९ अंशावर गेला होता. तापमान मार्चमध्ये ३९ अंशावर जात असल्याने एप्रिलमध्ये ४१ अंशावर जाईल, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र तापमान कमी झाले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मात्र पुन्हा तापमानाने ३९ चा टप्पा गाठला. या तापमानाबरोबरच वाऱ्याचा वेगही कमी झाला होता. त्यामुळे उन्हाचा चटका प्रचंड जाणवत होता. सकाळी नऊ वाजताही हा चटका असह्य होत होता. त्यानंतर हे तापमान दोन आठवड्यात ४० अंशावर पोहचले आहे. एप्रिल, मे या महिन्यांमध्ये कोल्हापूरचे तापमान जास्तीत जास्त ३९ अंशावर जात होते. कधी तरी हा टप्पा गाठला जात होता. शक्यतो ३७ ते ३८ अंशा दरम्यानच तापमान रहात होते. मात्र सायंकाळी वाऱ्याची झुळूक येत असल्याने उन्हाळ्यामध्येही दिवसभरातील उन्हाचा त्रास सोडल्यास फार त्रास होत नव्हता.

गेल्या आठवड्यापासून मात्र उन्हाचा जबर तडाखा जाणवू लागला आहे. गुरुवारी तर उष्म्याने कहर केल्याचे जाणवत होते. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्यप्रकाश भाजून काढत होता. दुपारी चार वाजेपर्यंत तर उन्हाच्या झळा आणखीच तीव्र झाल्या. यामुळे आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडण्याचे अनेकांनी टाळलेच. घरामध्ये थांबल्यानंतर पंखा, कुलरचा वारा दिलासा देणारा असला तरी दरवाजे, खिडक्या उघड्या राहिल्यास त्यामधून गरम झळाच आत येत असल्याने सायंकाळपर्यंत अनेकांनी घराचे दरवाजे, खिडक्या बंदच ठेवल्या होत्या. रस्त्यावरील वर्दळ अतिशय कमी झाली होती. डोक्यावर टोपी, गॉगल, तोंडाला रुमाल, स्कार्फ बांधूनच बहुतांश दुचाकीस्वार कामानिमित्त बाहेर पडताना दिसत होते. पादचाऱ्यांची संख्या तर रस्त्यावर जाणवतच नव्हती.

कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी अशा वातावरणात रस्त्यावरील हातगाड्यांवर असणारी थंडगार कलिंगडे, अननससारखी फळे, ताक, सोलकडीतून गारवा शोधण्याचा प्रयत्न केला होता. एसटी, केएमटी चालकांनाही या उष्म्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे जिथे ​बस थांबवली जाईल, तिथे सावलीमध्ये थांबून गारवा मिळवण्याचा प्रयत्न करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ची खपात आघाडी

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर ः ‘जातिव्यवस्था केवळ श्रमविभाजन नाही तर श्रमिकांचे विभाजन आहे. जातीची परिणिती आर्थिक क्षमतेत होत नाही. जात ही वंश सुधारणा करू शकत नाही आणि तिने तसे केलेही नाही. तथापि, जातीने एक गोष्ट केली आहे. तिने संपूर्ण समाज विघटित आणि नाउमेद केला आहे....’ देशातील जातीव्यवस्थेवर परखड भाष्य करणारे हे विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन,’ या पुस्तकातील आहे. अभ्यासकांना आजही या पुस्तकातील विचार मार्गदर्शक ठरत आहेत. गेल्या वर्षभरात कोल्हापुरातील शासकीय मुद्रणालयातून या पुस्तकाच्या सात हजार प्रतींची विक्री झाली आहे. शिवाय डॉ. आंबेडकरांच्या १० हजार ग्रंथांची विक्री झाली आहे.

लाहोरमध्ये १९३६ मध्ये जात-पात तोडक मंडळाने आयोजित केलेल्या परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली होती. डॉ. आंबेडकरांनी त्यासाठी भाषण तयार केले होते. मात्र ही परिषद रद्द करण्यात आली होती. हे भाषण त्याचवेळी मुंबईतील भारतभूषण प्रिंटिंग प्रेसने ‘Annihilation of Caste’ या शीर्षकाने पुस्तकरुपात प्रकाशित झाले. २०१५ मध्ये ते राज्य सरकारने प्रा. प्रकाश शिरसट यांच्याकडून ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या नावाने मराठीत भाषांतरीत करवून घेतले. १९३६ ते २०१३ या काळात या इंग्रजी पुस्तकाच्या १४ आवृत्त्या छापल्या आहेत. तर गेल्या अडीच वर्षांत मराठी पुस्तकाच्या ५० हजार २५२ प्रती छापल्या आहेत. कोल्हापुरातील मुद्रणालयातून वर्षभरात पुस्तकाच्या मराठी ६६००, तर इंग्रतीजील ४०० प्रतींची विक्री झाली आहे. नव्याने एक हजार पुस्तकांची मागणी आली आहे. मात्र सध्या केवळ पाचशे प्रतीच उपलब्ध आहेत. १९३६ मध्ये या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची किंमत ८ रुपये होती. आज १५ रुपये किंमत आहे.

डॉ. आंबेडकर यांनी या पुस्तकात जगभरातील वर्ण आणि जातीव्यवस्थेचा धांडोळा घेतला आहे. ‘निदान भारतात तरी समाज सुधारणेचा मार्ग स्वर्गाच्या मार्गाप्रमाणे असंख्य अडचणींनी भरलेला आहे. भारतात सामाजिक सुधारणेला मित्र कमी आणि टीकाकारच जास्त आहेत,’ असे परखड मत नोंदवून ही स्थिती कायम राहण्यासाठी काही ठराविक लोक जाणीवपूर्वक कार्यरत असल्याचे मत डॉ. आंबेडकरांनी या पुस्तकात मांडले आहे. जातीनिर्मूलनाच्या चळवळीसाठी मार्गदर्शक ठरलेले हे पुस्तक आजही वाचकांच्या मेंदूची मशागत करीत आहे.

==

डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथांना मोठी मागणी

कोल्हापुरातील शासकीय मुद्रणालयातून आंबेडकर लिखित मूळ इंग्रजी भाषेतील आणि मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथांना मोठी मागणी आहे. राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून या ग्रंथांचे प्रकाशन केले जाते. आंबेडकरांचे लेखन, भाषणे, संविधान या ग्रंथांना मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे यातील जातिव्यवस्थेचे निर्मूलन, भारताचे संविधान, लेखन व भाषणे खंड १९, २०, २१ एवढीच ग्रंथसंपदा मराठीत उपलब्ध आहे. गेल्या वर्षभरात यातील १० हजार पुस्तकांची विक्री झाली आहे.

न झालेल्या भाषणाच्या लाखो प्रती

डॉ. आंबेडकरांच्या भाषणाची लिखित प्रत वाचून लाहोरमधील जात-पात तोडक मंडळाने १९३६ मधील वार्षिक परिषद रद्द केली होती. ज्या भाषणामुळे परिषद रद्द करण्याची वेळ संयोजकांवर आली ते न झालेले भाषण पुढे पुस्तकरुपाने लाखो लोकांपर्यंत पोहोचले. आज देशातील विविध भाषांमध्ये या पुस्तकाच्या लाखो प्रती खपतात.

===

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच ग्रंथांना मोठा प्रतिसाद असतो. यंदा यात लक्षणीय वाढ झाली आहे. दहा हजार पुस्तकांमध्ये ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’च्या सात हजार प्रती आहेत. यावरूनच या पुस्तकाचे मोल समजते.

सं. बा. वायचळ, व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दपारीचे प्रस्ताव तयार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, खंडणी वसूल करणे, संघटित गुन्हेगारी अशा गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून बाहेर पडलेले, त्याचबरोबर जामिनावर सुटलेल्या गुंडांकडून पुन्हा गुन्हेगारी कृत्ये होऊ नयेत, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ गुंडांना स्थानबद्ध केले जाणार आहे. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुणे(ग्रामीण)मधील १७ टोळ्या आणि ८० गुंडांच्या तड‌िपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, लवकरच हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांना दिली.

गुन्ह्यांची शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात गेलेल्या गुंडांची सराईत गुंडांशी भेट होते. यातून गुंडांचे नेटवर्क वाढते. शिक्षा भोगून किंवा जामिनावर कारागृहाबाहेर आल्यानंतर या गुंडांच्या दहशती कारवाया वाढतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी गंभीर गुन्ह्यातील उपद्रवी गुंडाना एक ते दोन वर्षांसाठी स्थानबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांना कारवाई करून झोपडपट्टीतील दादा व हातभट्टी अधिनियम १९८१ प्रमाणे कारवाई करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात हे प्रस्ताव पाठवले आहेत.

जानेवारी २०१६ ते २८ फेब्रुवारी, २०१७ या १४ महिन्यांच्या कालावधीत परिक्षेत्रात तडीपारीचे ५८० प्रस्ताव तयार केले आहेत. या सर्वांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार आहे. हद्दपार करूनही हे लोक जिल्ह्यात दिसून आले तर, त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे, असेही नांगरे-पाटील म्हणाले.

स्थानबध्दतेचे प्रस्ताव

कोल्हापूर: ७, सांगली : ८, सातारा : १, सोलापूर : ४, पुणे ग्रामीण: ८


हद्दपारीचे प्रस्ताव

कोल्हापूर : १७ टोळ्या, ८० गुंड

सांगली - १५६

सातारा - १०७

सोलापूर ग्रामीण - ११६

पुणे ग्रामीण: ९३


आर्म ॲक्टचे १०२ गुन्हे दाखल

परिक्षेत्रात आर्म ॲक्टचे १०२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर २७, सांगली ३३, सातारा ११, सोलापूर १२ आणि पुणे ग्रामीणमध्ये १६ गुन्ह्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जीवावर उठले ‘जीवन’पाण्याअभावी शेतकरी दाम्पत्याची जतमध्ये आत्महत्या

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

शेतात दोन बोअर मारूनही पाणी न लागल्याने आलेली निराशा आणि डोक्यावरील कर्ज यामुळे खिलारवाडी (ता. जत) येथील शेतकरी दाम्पत्याने गुरुवारी रात्री कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. घराच्या अंगणात झोपलेल्या त्यांच्या दोन मुलांनी शुक्रवारी सकाळी आई-वडिलांचे मृतदेह दिसताच हंबरडा फोडला. पाण्याला जीवन असे म्हटले जाते, मात्र याच जीवनाचा अभाव शेतकरी दाम्पत्याच्या जीवावर उठला.

भैराप्पा अण्णाप्पा कोडलकर (वय ३७) आणि त्यांची पत्नी पदूबाई (३४) अशी या दुर्दैवी पती-पत्नीची नावे आहेत. सततची नापिकी आणि पाण्याअभावी ‘पाण्यात गेलेला’ खर्च यामुळे परिस्थितीसमोर शरण जाण्याखेरीज दोघांपुढे दुसरा मार्ग राहिला नाही.

जतपासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या खिलारवाडीत भैराप्पा आणि त्यांची पत्नी पदूबाई यांची जेमतेम अर्धा एकर शेती आहे. आठवीत शिकणारा विशाल आणि सहावीतील अजित ही मुले आई-वडिलांना साथ देत. शेजारी असलेली भावाची अर्धा एकर शेती कसायला घेऊन त्यांनी द्राक्ष लागवड केली होती. पलूस येथील एका खासगी बँकेतून त्यांनी २ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी शेतातील बोअरचे पाणी आटल्यामुळे व्याज भागेल, इतकेच उत्पन्न आले. पुढील हंगामासाठी त्यांनी गुरुवारी शेतात पुन्हा बोअर मारली.

पहिल्या बोअरला पाणी लागले नाही. दुसऱ्या ठिकाणी आणखी एक बोअर घेतली. रात्री साडेदहा वाजेपर्यंत पाण्याचा थेंबही नजरेला न पडल्याने या द्मपत्याचा धीर खचला. दोन्ही मुलांना बोअर मशिनजवळ थांबवून भैराप्पा आणि पदूबाई घरी गेले. घराचा दरवाजा आतून बंद करून दोघांनीही आत्महत्या केली.

इकडे शेतात पाणी न लागल्याने मध्यरात्री बोअर खणण्याचे काम थांबविण्यात आले. जड अंतःकरणाने विशाल आणि अजित घरी परतले. आई-वडील झोपले असतील, या विचाराने दार न वाजवता दोघे भाऊ अंगणातच झोपले. शुक्रवारी सकाळी उठून त्यांनी दरवाजा वाजवला असता आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडल्यानंतर दोन्ही मुले जागच्या जागी थिजून गेली. आई-वडिलांचे मृतदेह आणि त्याशेजारी पडलेली कीटकनाशकाची रिकामी बाटली एवढेच्या त्या उद्ध्वस्त घराच्या अवकाशात व्यापून राहिले.

दुष्काळ पाचवीलाच पूजलेला

सततचा दुष्काळ आणि टंचाईच्या झळा जत तालुक्याच्या पाचवीलाच पूजल्या आहेत. प्रत्येक वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या वाटेकडे डोळे लावणाऱ्यांना शेतीसाठी पाणी कोठून मिळणार? अशा स्थितीत आयुष्य कसे काढायचे, प्रपंचा कसा चालवायचा, मुलांचे शिक्षण कसे करायचे असे अनेक प्रश्न उभे ठाकतात. उत्पन्नाचे अन्य साधनच नसल्याने शेतकऱ्याला शेतीकडूनच अपेक्षा ठेवण्याशिवाय गत्यंतर नसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाबळेश्वर@ अशांवर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वर मुंबईपेक्षा जास्त उष्ण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत महाबळेश्वरमधील तापमान आयएमडीने मुंबईत नोंदवलेल्या तापमानापेक्षा जास्त आहे. मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेने तापमानाची नोंद केली आहे. मुंबईच्या किनारी भागापेक्षा महाबळेश्वरमधील पारा हा सामान्यतः कमी असतो.

महाबळेश्वरमध्ये बुधवारी, बारा एप्रिल रोजी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईत ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी, महाबळेश्वरमध्ये तेरा एप्रिल रोजी ३५.९ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईचा पारा ३४.८ अंश सेल्सिअसवर होता. गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये प्रत्यावर्त (अँटीसायक्लोन) मध्ये असलेल्या ईशान्येकडील उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाबळेश्वरमधील तापमान वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पूर्वेकडील वारे ईशान्ये वाऱ्यात मिसळले आहेत. येत्या आठवड्यात हे वारे पुढे सरकल्यानंतर पुन्हा तापमान खालावेल, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

सौराष्ट्र आणि कच्छमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत तापमान ३५ अंशाच्या आसपास आहे. येत्या काही दिवसांत पारा दोन अंशांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकाला पाणी देण्यास आमदारांचा विरोध

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यास कृष्णा व कोयना नदी काठांच्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई उद्भवणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्ह्यातील आमदारांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

या बाबत सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आमदारांनी आपली पाणी सोडण्याविरोधी भूमिका मांडली.

दरम्यान, आमदारांचा वाढता विरोध लक्षात घेत विजय शिवतारे यांनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास महाबळेश्वर, पाटण, व जावली तालुक्यातील किती गावांमध्ये टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचा अभ्यास करून २४ एप्रिलच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीटंचाई आढाव बैठकीत जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, मोहनराव कदम यांच्यासह जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी कर्नाटकाला कोयना धरणातून देण्यात येत असलेल्या २.६५ टीएमसी पाणी देण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे.

जॅकवेल उघडे पडणार?

मकरंद पाटील यांनी धरणालगत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे जॅकवेल उघडे पडणार आहेत. त्यामुळे तेथील गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात येवू नये, अशी मागणी केली. पाटील यांच्या भूमिकेला शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच आमदारांनी पाठींबा दिला.
सिंचन, वीजनिर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा

कोयनेचे अभियंता ज्ञानेश्वर बागडेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

‘कोयना धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असून, कर्नाटकला दोन टीएमसी पाणी देऊनही जूनपर्यंत सिंचनासह वीजनिर्मितीला पाणी पुरून शिल्लक राहील इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे,’ अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

कर्नाटकसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बागडे म्हणाले, ‘राज्यात भीषण पाणीटंचाई असताना कर्नाटकाला पाणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. आज रोजी धरणात ३९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. वीज निर्मितीला लागणारे पाणी तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागून यंदा पावसाळ्यापर्यंत काही पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा याच दिवशी १३ एप्रिल रोजी धरणात ४ टीएमसी जादा पाणी आहे. धरणातील एकूण पाण्यापैकी वर्षभरात सरासरी ६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. या सर्व बाबींचा विचार करूनच हा निणय घेतला आहे, त्यामुळे येथील जनतेने या बाबत साशंकता बाळगू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी गाडून घेतलेक्षारपड शेतकऱ्यांचे आंदोलन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

तीस वर्षांपासून क्षारपड जमिनीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मिरज तालुक्यातील नांद्रे येथील मातंग समाजाच्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी त्याच जमिनीत स्वतःला छातीपर्यंत गाडून घेतले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही त्याच शेतात साजरी करून खोदलेल्या चरीत सव्वीस शेतकऱ्यांनी भर उन्हात स्वतःला छातीपर्यंत गाडून घेतल्याचे समजताच पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम खात्यांचे अधिकारी, पोलिस त्या ठिकाणी धावले. जुन-जुलैपर्यंत तुमचा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नांद्रे गावातील मातंग समाजासाठी नावरसवाडी परिसरातील ४८ एकर शेती देण्यात आली आहे. एकूण २६ कुटुंबासाठी दिलेली ही जमीन १९८५पासून क्षारपड झाली आहे. त्यामुळे कसलेच पीक घेता येत नाही. त्यामुळे त्या शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबानी मातंग समाज क्षारपड सुधार समितीची स्थापना करून समितीच्या माध्यमातून आपला प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. परंतु आतापर्यंत नैसर्गिक आपतीसारख्या कोणत्याही योजनेतून सरकारने शेतकऱ्यांना कसलाच दिलेला नाही. जमीन दुरुस्तीही करुन दिली गेली नाही. पर्यायी जमीन म्हणून वनखात्याची जमीन द्यावी, अशी मागणी केली तरीही याकडे लक्ष दिले जात नाही. वारंवार आंदोलन करुनही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शुक्रवारी दीन-दलितांचा उद्धार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वतःला गाडून घेण्याचे आंदोलन केले. समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, मुख्य प्रवर्तक विलास कांबळे, उपाध्यक्ष बापू कांबळे, सुनील कांबळे, किरण सदामते यांच्यासह शंभर पेक्षा अधिक जणांनी सकाळी गावातील समाज मंदिरात डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. नंतर आपल्या क्षारपड जमिनीवर जावून त्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. त्या शेतात खोदलेल्या चरीत छातीपर्यंत स्वतःला गाडून घेतले. सांगली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पाटबंधारेचे अधिकारी तेथे धावत आले. त्यांनी संबधित जमिनीबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविल्याचे पुरावे दाखविले. जुन-जुलैपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता दुरुस्तीचे ११ कोटी पाण्यात

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet :@Appasaheb_MT

राष्ट्रीय व राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी सरकारी निधीचा अभाव, शहरातंर्गत रस्त्यांची देखभाल आणि शहराच्या वाढत्या विस्तारामुळे उपनगरातील नवीन रस्त्यांची निर्मिती याकरिता महापालिकेला रस्ता दुरुस्तीसाठी दरवर्षी ११ कोटी रुपयांचा भार उचलावा लागत आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती आणि पॅचवर्क याकामासाठी स्वनिधीतून रकमेची तरतूद करावी लागत असल्याने महापालिकेच्या आर्थिक तिजोरीवर ताण पडत आहे. आयआरबी रस्त्यांच्या देखभालीसंदर्भात सरकारने हात वर केल्याने महापालिकेच्या डोक्यावर आणखी तीन कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र आ​णि कोकण व गोव्याला जोडणारा दुवा असलेल्या कोल्हापुरातून राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जातात. मोठ्या प्रमाणातील वाहतूक, अवजड वाहनांची ये जा यामुळे रस्ते खराब होतात. सरकारकडून रस्ते दुरस्तीसाठी अनुदान मिळत नाही. कोल्हापूर शहरात ७५० किलो मीटरहून अ​धिक लांबीचे रस्ते आहेत. नवीन उपनगरे, कॉलन्या विकसित होत आहेत. रस्त्यांची निर्मिती, डांबरीकरणाच्या खर्चाचा आकडा कोटीच्या पटीत आहे. प्रशासनाने गतवर्षी डांबरी रस्ते तयार करण्यासाठी तीन कोटी ७७ लाख, ६१ हजार रुपयांची तर रस्ते दुरुस्ती, पॅचवर्कसाठी ५७ लाख रुपयांची तरतूद केली होती. नगरसेवकांच्या ऐच्छिक निधीतून ठराविक रक्कम प्रभागातील रस्त्यावर खर्च होतो. वर्षाला साधारणपणे आठ कोटी रुपये रस्ता दुरुस्तीसाठी खर्च होत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आयआरबीच्या रस्ते दुरुस्तीचा प्रश्न

महापालिकेसमोर आयआरबी रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न उभा ठाकला आहे. रस्ते विकास प्रकल्पातंर्गत ४९ किलोमीटरचे रस्ते तयार झाले आहेत. आयआरबीच्या अनेक रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. फूटपाथ खराब झाले आहेत. रस्त्यांना भेगा पडल्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. नजीकच्या काळात आयआरबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करावी लागणार आहेत. महापालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला, पण रस्ता देखभालीसाठी अनुदानाचा निर्णय घेतला नाही.



शहरातील रस्त्यांच्यावर एक दृष्ट‌िक्षेप

५९.५० किलो मीटर

सिमेंट काँक्र‌िट रस्ते

६६८.८४ किमी

डांबरी रस्ते

६९.९० किमी

खडीचे रस्ते

२३.२२ किमी

इतर रस्ते

८२१.४६ किमी

रस्त्यांची एकूण लांबी



५.४४ किमी

शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग

२४.१८ किमी

राज्य महामार्ग

१.८७ किमी

प्रमुख जिल्हा रस्ते

७८९.९७ किमी

इतर रस्ते

८२१.४६ किमी

रस्त्यांची एकूण लांबी



रस्ता नादुरुस्त होण्याची प्रमुख कारणे

सण, समारंभ, उत्सवाकरिता रस्त्याची खोदाई

पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूला गटारीचा अभाव

शहरात मोठ्या प्रमाणात होणारी अवजड वाहनांची वाहतूक

नळ कनेक्शनकरिता रस्त्याची खोदाई,

रस्त्यावर पाण्याचा मारा, केबल, ड्रेनेजलाइनसाठी रस्ता उकरणे


महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. आयआरबी, नगरोत्थान, राज्य व राष्ट्रीय महामार्ग महापालिका सांभाळू शकत नाही. या रस्त्यावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. या रस्त्यांचा देखभाल खर्च महापालिकेला परवडणारा नाही. आतापर्यंतचा खर्च सरकारने द्यावा आणि पुढील काळात देखील राष्ट्रीय महामार्गाच्या खर्चातूनच देखभाल करावी.

संदीप नेजदार,सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना घरांची प्रतीक्षा कायम

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर ः कोल्हापुरातील पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने १३३९ घरांना मंजुरी दिली. मंजुरी देऊन वर्ष उलटले तरी अजूनही कामांना सुरुवात झाली नाही. त्यामुळे पोलिसांची अस्वस्थता वाढली आहे. तीन वर्षांत नवीन घरे पोलिसांना मिळतील, अशी घोषणा राज्य सरकारने केली. पण, कामाला सुरूवात नसल्याने पोलिसांना जुन्याच अडगळीच्या घरांत रहावे लागत आहे. नवीन घरांची घोषणा केल्याने जुन्या घरांच्या डागडुजीकडेही दुर्लक्ष होत आहे.

पोलिसांना कामाच्या ठिकाणी राहून कर्तव्य बजावता यावे, यासाठी पोलिस वसाहतींची संकल्पना राबवली गेली. यानंतर सरकारने विशेष लक्ष घालून पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांसह राहण्यासाठी वसाहती वाढवल्या. शंभर वर्षांपूर्वीच्या गरजांनुसार तत्कालीन प्रशासनाने छोटेखानी घरे बांधली. मात्र आजच्या काळात ती घरे म्हणजे अंधार कोठड्या ठरत आहेत. शंभर वर्षांत अपवादानेच डागडुजी केलेली ही घरे अक्षरशः पोलिस कुटुंबीयांच्या जीवावर उठल्यासारखी स्थिती आहे. या घरांत राहून ताणतणाव आणि दगदगीची नोकरी करणे म्हणजे पोलिसांसाठी दिव्यच ठरत आहे. अनेकदा मागणी केल्यानंतर अखेर कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांसाठी १३३९ घरांना मंजुरी मिळाली. २७ एप्रिल २०१६ रोजी गृह विभागाचे अपर सचिव के. पी. बक्षी यांनी स्वतः घरांची पाहणी करून नवीन घरांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. सचिवांच्या या घोषणेने पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाला खरा. पण, त्याची अंमलबजावणी अजून तरी कागदावरच आहे.

पोलिसांच्या सध्याच्या घरात बेडरुम आणि किचन अशी मिळून अवघी ३८० क्वेअर फुटांची जागा आहे. घरांची उंची अवघी आठ ते दहा फूट. गळके छप्पर आणि तडे गेलेल्या भिंती. अनेक घरांत स्लॅबचे ढपले पडले आहेत. गिलावा निघाला आहे. पावसाचे पाणी घरात येऊ नये यासाठी कुणी प्लास्टिक कागदाने घर झाकले आहे, तर कुणी बांबूचे तट्टे लावले आहेत. घरात पुरेशी जागा नसल्याने अर्धाअधिक संसार अंगणातच मांडला जातो. एखादा पाहुणा आला तर त्याला थांबवताना पोलिस कुटुंबीयांच्या अंगावर काटा येतो. डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केल्यानंतर एकाच वेळी सर्व कामे होत नाहीत. त्यामुळे पोलिसांना पदरमोड करून डागडुजी करावी लागते ही वस्तुस्थिती आहे.

शहरातील सर्वांत मोठी पोलिस वसाहत मुख्यालयाशेजारी आहे. या परिसरात अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. ड्रेनेज सुविधा नाही. गटर्स तुंबलेल्या असतात. काही घरांसाठी धड रस्ताही नाही. कचऱ्याचा उठाव वेळेत होत नाही. कचरा गाडीसाठी महापालिकेला वारंवार फोन करावे लागतात. शिवाय मुख्यालयापासून जवळच असलेल्या झूम कचरा प्रकल्पाने तर वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांचे आरोग्यच बिघडले आहे. लक्ष्मीपुरी आणि जुना बुधवार पोलिस लाइनमध्येही अशीच दुरवस्था आहे.


ठेकेदारांची नेमणूक

पोलिस मुख्यालयातील ६९७ घरांच्या बांधकामांसाठी पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने तायवाडे पाटील अँड असोसिएट्सला ठेका दिला आहे. जुना बुधवार आणि लक्ष्मीपुरी पोलिस लाइनमधील ४०० घरांसाठी गिरिजा कुलकर्णी आणि मधुकर देसाई अँड असोसिएट्सला ठेका दिला आहे. इचलकरंजीतील २४२ घरांसाठी सोमानी अँड असोसिएट्सला ठेका दिला आहे.

चौकट –

सध्याच्या पोलिस वसाहती आणि घरे

मुख्यालय – ७१८

लक्ष्मीपुरी – ६०

भगवा चौक(कसबा बावडा) - ५१

बुधवार पेठ – ८४

यातील दीडशेहून अधिक घरे वापरासाठी धोकादायक आहेत.

चौकट - नवीन मंजूर घरे

मुख्यालय ६९७

लक्ष्मीपुरी – २००

बुधवार पेठ – २००

इचलकरंजी - २४२

एकूण – १३३९


नवीन घरे बांधण्यासाठी मंजुरी मिळाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. वेळेत कामांना सुरुवात झाली तरच आम्हाला वेळेत घर मिळेल. राज्य सरकारने पैशांची तरतूद केल्याची चर्चा आहे. त्यामुळे तातडीने कामांना सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा आहे.

एक पोलिस कर्मचारी


पोलिसांच्या नवीन घरांना मंजुरी मिळून ठेकेदारांचीही नियुक्ती झाली आहे. नवीन घरे बांधण्यासाठी सुमारे ७०० जुनी घरे पाडावी लागणार आहे. पर्यायी व्यवस्थेचे काम सुरू आहे. लवकरच नवीन घरांचे काम सुरू होणार आहे.

सतीश माने पोलिस उपअधीक्षक, गृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images