Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दिंडोर्लेच्या भावाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रभागात स्वच्छता कामगार कमी पाठवल्याच्या रागातून आपटेनगर-तुळजाभवानी प्रभागातील नगरसेवक राजू दिंडोर्ले यांचे भाऊ विशाल उर्फ पप्पू आनंदराव दिंडोर्ले (वय २८, रा. सानेगुरुजी वसाहत) यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिंडोर्ले याना शुक्रवारी (ता. १४) चौकशीसाठी ताब्यात घेतले. घटना घडल्यांतर तिसऱ्या दिवशी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोग्य निरीक्षक अमर भीमराव कांबळे (वय २९, रा. शिवाजी पेठ) यांनी फिर्याद दाखल केली.

आपटेनगर-तुळजाभवानी प्रभागात स्वच्छतेसाठी कमी कामगार पाठवले जातात असा आरोप करीत नगरसेवक राजू दिंडोर्ले यांचा भाऊ विशाल उर्फ पप्पू दिंडोर्ले यानी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. बुधवारी (ता. १२) सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास दिंडोर्ले यानी संभाजीनगर एसटी स्टँड परिसरात आरोग्य निरीक्षक अमर कांबळे व सौरभ पावरा यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. यानंतर कळंबा फिल्टर हाऊस येथील कार्यालयात जाऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत बायोमेट्रीक हजेरी मशिनची मोडतोड केली. यात मशिनचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले होते.

दिंडोर्ले यांच्याकडून दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून दिंडोर्ले यांच्या विरोधात निदर्शने केली होती, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. याबाबत पोलिस ठाण्यात मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आरोग्य निरीक्षक अमर कांबळे यांनी शुक्रवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत विशाल दिंडोर्ले यांच्यावर शिवीगाळ, दमदाटी आणि सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी तातडीने विशाल दिंडोर्ले यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील अधिक तपास करीत आहेत.

गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई

नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांकडून महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आरेरावी करण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रत्येकवेळी मारहाण किंवा दमदाटीची घटना घडल्यानंतर तात्पुरता राग व्यक्त होतो, पण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली जात नाही. याहीवेळी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ सुरू होती. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही २४ तासांनी फिर्याद दाखल झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोखीने खत विक्रीवर बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांना रासायनिक खतांची विक्री रोखीने न करता केवळ पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीनव्दारेच करण्याचे आदेश केंद्राने जिल्हा कृषी विभागाला दिले आहेत. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे. त्यासाठी ‌खत विक्री करणाऱ्या दुकानदारांना पीओएस मशीनची मागणी नोंदवण्याची सूचनाही केली आहे. काळा बाजार करून खतांवरील सरकारी अनुदान लाटण्याच्या कंपन्यांच्या प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला. मात्र बँक खात्यावर पैसे शिल्लक ठेवण्याची ऐपत नसणाऱ्या गरीब, सामान्य शेतकऱ्यांना ऐन हंगामावेळी खतांपासून वंचित राहावे लागेल, भीती व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विभागकडून यूरिया, डीएपी, एसएसपी, एमओपी या खतांसाठी अनुदान मिळते. कृषी प्रशासन पेरणी क्षेत्रानुसार आणि सरासरी गरजेनुसार ‌‌‌कंपन्यांकडून रासायनिक खतांची उपलब्धता कृषी सेवा केंद्र, विक्रेते यांच्याकडे करते. शेतकरी प्रत्येक हंगामाला आवश्यकतेनुसार खते खरेदी करतो. वर्षानुवर्षे एकाच दुकानातून खरेदी करीत असल्यामुळे अनेकदा पैसे नसतानाही उधारीवर खते दिली जातात. पैसे उपलब्ध झाल्यानंतर उधारी भागवली जाते. नव्या आदेशामुळे उधारी व्यवहार पूर्णपणे बंद होतील.

प्रत्येक विक्रेत्यास पीओएस मशीन बसवावे लागणार आहे. या मशीनचा पुरवठा सरकार करणार आहे. खते खरेदी करायची असल्यास शेतकऱ्याला पीओएस मशीनवर बोटांचे ठसे उठवून आधार क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. खरेदीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरून कपात होईल. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खताच्या अनुदानाची रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा केली जाईल.

कृषि अधिकारी, कंपन्याच्या प्रतिनिधींना या नव्या यंत्रणेची माहिती दिली आहे. खतांची विक्री करणाऱ्या‌ जिल्ह्यातील ११६६ दुकानात पीओएस मशीन बसवावे लागणार आहेत. त्याची मागणी प्रशासनाने सरकारकडे नोंदवली. त्यामुळे १ जूनपासून रोखीने खते ‌विक्री बंदीची तयारी केली आहे.


१९ जिल्ह्यांत अंमलबजावणी

रोखीने खत विक्री बंदीचा पथदर्शी प्रयोग गेल्यावर्षी महाराष्ट्रातील नाशिक, रायगडसह १५ राज्यांतील १९ जिल्ह्यात राबवला. यंदा १ जूनपासून कोल्हापूरसह राज्यातील उर्वरित जिल्ह्यात राबवण्याची तयारी केली आहे. अनुदान लाटण्यासाठीच्या चोरवाटा बंद करण्यासाठी पीओएस मशीनव्दारेच खते खरेदीची केलेली सक्ती बहुतांशी शेतकऱ्यांना मात्र गैरसोयीची ठरणार आहे.

.........................


दीड लाख टन विक्री

जिल्ह्यात १८६६ रासायनिक खत विक्रीची दुकाने आहे. या दुकानातून खरीप हंगामासाठी १ लाख ५१ हजार ६०० मेट्रिक टन रासायनिक खतांची विक्री होते. तालुकानिहाय विक्री होणारे रासायनिक खते टनात असे ः आजरा – ६०६४, भुदरगड- ४५४७, चंदगड- १०६१२, गडहिंग्लज- ७५८०, गगनबावडा- १५१४, हातकणंगले – १९७०७, कागल- १९७०७, करवीर- ३६३९७, पन्हाळा- १२११५, राधानगरी- ९०९७, शाहूवाडी- ३०३३, शिरोळ- २१२२७.

……………


सरकारच्या नव्या आदेशानुसार रासायनिक खते १ जूनपासून रोखीने खरेदी करता येणार नाहीत. पीओएस मशीनव्दारे खरेदी करावी लागेल. त्यासाठी आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर पैसे असणे गरजेचे आहे.

सी. वाय. सूर्यवंशी, कृषि विकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रत्नागिरी महामार्गावर बनलेत ‘अड्डे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोन्या मारुती चौक म्हणजे शहरातील अवैध प्रवाशी वाहतुकीचे केंद्रच झाले आहे. येथून तीन आसनी रिक्षांबरोबरच सात आसनी वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची धोकादायक वाहतूक होत आहे. तीन आसनी रिक्षांमध्ये तर प्रवाशांना चालकाशेजारी बसवून वाहतूक केली जाते. महत्वाचे म्हणजे ही सर्व वाहने प्रचंड वर्दळ असलेल्या रत्नागिरी महामार्गावर धावत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांबरोबर आरटीओ विभागाकडून त्यांच्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.

वडणगे, वरणगे, केर्ली, आंबेवाडी तसेच आसुर्ले पोर्ले भागातून दररोज सकाळी शेतकरी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत असतात. शेतमालाची विक्री करुन दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत परत गावी जाण्यासाठी बहुतांशजण वडापचाच वापर करतात. केएमटीची सेवा असताना त्यातून फार कमी प्रमाणात प्रवाशी जातात. त्यामुळे सीपीआर चौक ते सोन्या मारुती चौकपर्यंतच्या परिसरात वडापचा अड्डा आहे. तिथे शहरातून बाहेर जाणाऱ्या व शहरात येणाऱ्या एसटींचे थांबे आहेत. त्यामुळे तिथे वाहतुकीची कोंडी होत असते. तिथेच मलकापूर, बांबवडे परिसराचे वडाप सुरू आहे. प्रवाशी वाहतुकीचा परवाना असलेली वाहने असली तरी त्यामधून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोजली तर दररोज मोठ्या प्रमाणावर कारवाई करता येऊ शकते. पण या परिसरात वाहतूक शाखेचे ​पोलिस दिवसभर असूनही त्यांचा या वडाप चालकांवर धाक राहिलेला नाही हे स्पष्ट झाले आहे. अनेकदा ही वाहने रस्त्यावर असतात. त्यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ लागली तर त्यांना बाजूला करण्याचेच काम केले जाते. त्यांच्याकडून किती प्रवाशांची वाहतूक होते, त्याकडे लक्ष दिले जात नाही. नर्सरी बागेच्या रिकाम्या असलेल्या परिसरात वडाप वाहनांचा अड्डाच बनला आहे.

तिथून शंभर मीटरच्या आतच ​तीन आसनी रिक्षांची वडाप वाहतूक केली जात आहे. तिथे गावनिहाय वेगवेगळे थांबे केले आहेत. आसुर्ले पोर्लेचे अंतर जास्त असल्याने तिथे सात प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमात असलेल्या चारचाकी वाहनांची रांग मुख्य रस्त्यावरच लागलेली असते. एकावेळी कमीत कमी आठ वाहने उभी असतात. प्रवाशी येतील तशी ही वाहने बाहेर पडत असतात. सात प्रवाशांची क्षमता असली तरी दहाच्या पुढे प्रवाशी या वाहनांमध्ये असतात. त्याच्या काही अंतरावर पुढे वडणगे, निगवे, वरणगे पाडळीकडे जाण्यासाठी तीन आसनी रिक्षा आहेत. त्यामध्ये पाठीमागे दोन टप्पे करुन किमान सहाजण बसवून वाहतूक केली जाते. अनेकवेळा तर चालकाशेजारीही प्रवाशांना बसवले जाते.

या वडाप वाहतुकीमुळे सिद्धार्थनगर कमानीपासून सोन्या मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षा व चारचाकी वाहनेच थांबलेली असतात. मंदिराकडे चालत जाणेही त्रासदायक होत असते. तिथे येणाऱ्या प्रवाशांमध्ये केएमटीसाठी प्रतिक्षा करण्याची मानसिकता दिसून येत नाही. त्यामुळे केएमटीचा प्रवाशी वर्ग या वडापकडे वळत असल्याचेच दिसून येत आहे.



रिक्षांमधून अथवा प्रवाशी वाहतुकीचा परवाना घेतलेल्या वाहनातून प्रवाशांची ने आण करण्यास काही हरकत नाही. पण त्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवून केली जाणारी वाहतूक धोकादायक आहे. रत्नागिरी महामार्गावर एसटी, ट्रकसारख्या अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर अशा वडाप वाहतुकीमुळे अनेक प्रवाशांच्या जिवाला धोका आहे. त्याबाबत पोलिस, आरटीओकडून कारवाई होताना दिसत नाही.

मनोज चव्हाण, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांसाठी ‘स्पर्श’ संवेदनेचा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या वर्षीच्या दुष्काळाने साऱ्यांचीच परीक्षा घेतली. उन्हाच्या तडाख्याने नागरिकही हैराण झाले असताना पक्ष्यांची अन्नपाण्यासाठी प्रचंड ससेहोलपट झाली. अनेक संवेदनशील नागरिकांनी आपापल्या घरांच्या परिसरात पाण्याची भांडी व धान्य ठेवले. शिवाय ज्या ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची व अन्नाची गरज होती त्यावेळी ‘स्पर्श फाउंडेशन’ने विविध ३०० ठिकाणी पाण्यासाठी मातीची भांडी व धान्य पोहचवण्याचे काम केले. यावर्षीही ‘स्पर्श’ चे कार्यकर्ते ‘पक्षी वाचवू या’ मोहिमेंतर्गत कामाला लागले आहेत.

शहराच्या उपनगरांच्या परिसरात रिकाम्या जागा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे तिथे असलेल्या गवताळ भागात व झाडाझुडुपांमुळे पक्ष्यांचा वावर असतो. पण, त्यांना अन्न व पाण्यासाठी शहराच्या परिसरातच भटकंती करावी लागते. अनेक पक्षी घरांच्या आवारातील खाद्यपदार्थ व पाणीसाठ्यांवर अवलंबून असतात. काही संवेदनशील नागरिक रोज आठवणीने पाण्याची प्लेट व धान्य घराच्या परिसरात ठेवतात. पण, बहुसंख्य ठिकाणाहून पक्ष्यांना पाणी व अन्न मिळत नसल्याने भटकंती करावी लागते. हे पाहून ‘स्पर्श’ ने गेल्या दोन वर्षापासून पक्ष्यांसाठी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. इतर भांड्यांमध्ये पाणी ठेवल्यास गरम होते व ते पक्ष्यांच्या उपयोगी पडत नसल्याने कार्यकर्त्यांनी मातीची भांडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वखर्चाने पाण्यासाठी मातीची भांडी तसेच विविध प्रकारचे धान्य खरेदी केले.

हे सर्व साहित्य केवळ एका परिसरात न देता विविध ठिकाणी साहित्य दिल्यास पक्ष्यांची भटकंती थांबेल. तसेच जिथे वर्दळ आहे, अशा परिसरात असलेल्या पक्ष्यांना फायदा व्हावा यासाठी ‘स्पर्श’ ने ठिकाणे निश्चित केली. अवधूत अपराध, हारनिश पटेल, नदीम मुजावर, रवीराज सोनुले, निखिल मुजुमदार, ऋषिकेश व्हन्नुरे, चंद्रेश ओसवाल, सचिन मुदगल, आकाश मुंडे, विनीत साळोखे यांनी भागाभागात फिरुन जवळपास महत्त्वाच्या ठिकाणी पाण्याची भांडी व धान्य दिले. ३०० घरांमध्ये ही भांडी पोहचवण्यात आली.

अंबाबाई मंदिर, बाबूजमाल परिसर, कसबा गेट, गुजरी, कासार गल्ली, भेंडे गल्ली, आझाद गल्ली या परिसरात भांड्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे नागरिकांनीही अगदी आपुलकीने ही भांडी घेऊन त्यामध्ये दररोज पाणी व धान्य ठेवले. अंबाबाई मंदिर, बाबूजमाल सारख्या सार्वजनिक ठिकाणच्या परिसरात ‘स्पर्श’ ने दररोज पाणी ठेवले. तसेच काही ठिकाणी अगदी चहा विक्रेत्यांनीही पाणी ठेवण्यास मदत केली. पावसाळा सुरु होईपर्यंत कार्यकर्ते या उपक्रमासाठी सजग होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालावधीपूर्वीच घरफाळा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांनी ३१ मार्चअखेर घरफाळा भरण्यासाठी धावपळ केली. प्रत्यक्षात घरफाळा भरत असताना पुढील सहा मह‌िन्यांच्या आकारल्या गेलेल्या दंडाच्या रकमेमुळे अनेकांना भुर्दंड बसला आहे. त्यामुळे या दंड व्याजाबाबत असंतोष निर्माण होऊ लागला आहे. पहिल्या ९० दिवसांत ५० टक्के घरफाळा न भरल्यास व्याजाचा मोठा बोजा बसतो. चालू वर्षातील रकमेवर व्याज आकारण्याच्या प्रकारामुळे शहरवासियांची पिळवणूक होत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. नगरसेवकांकडूनही या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

घरफाळ्यातून महापालिकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील मिळकतींच्या प्रमाणात फार मोठी वाढ झालेली नाही. सध्या १ लाख, ३६ हजारावर मिळकतधारक आहेत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ केली जात नसल्याने रेडिरेकनरवर आधारित घरफाळा आकारण्याची पद्धत अवलंबली. यामुळे दर पाच वर्षांनी आपोआप घरफाळा वाढला जावा, असे नियोजन करून ठेवण्यात आले. त्याच दरम्यान एचसीएल या कंपनीला महापालिकेतील विविध सुविधा देण्याचे काम देण्यात आले. त्यांच्याकडून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घरफाळ्याची आकारणी करुन बिले पाठवण्यात येत आहेत. ही बिले देत असताना यंदाच्या वर्षातील बिलावर व्याज आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनही जादा पैसे वसूल करण्याचा प्रकार महापालिकेने केला आहे.

वसुली लवकर व्हावी, यासाठी विविध यंत्रणा सवलतींच्या योजना जाहीर करतात. पण महापालिकेने सवलत देण्यापेक्षा जादा रक्कम वसूल करण्याचा फंडा अवलंबला आहे. घरफाळ्यासाठी सप्टेंबरनंतर सवलत बंद होऊन दंडाची दोन टक्के व्याज आकारणी करण्यात येत आहे. मुळात घरफाळा हा संपुर्ण वर्षासाठीचा आकारला जातो. अशा परिस्थितीत बिलाचा वर्षाचा कालावधी पुर्ण होण्याआधीच १२ टक्के व्याज आकारणी करणे म्हणजे सरळ सरळ लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार आहे. सॉफ्टवेअर असल्याने सप्टेंबरनंतर प्रत्येक दिवसाची व्याज आकारणी होत आहे. यामुळे सामान्य नागरिकाने जर डिसेंबरमध्ये घरफाळा भरायचे ठरवल्यास तीन महिन्यांचा जवळपास सहा टक्क्यापर्यंत विनाकारण दंड भरावा लागत आहे. याबाबत नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत असून नगरसेवकांच्या पातळीवरही नाराजी व्यक्त केली जात आहे.

फोनच्या बिलाचा कालावधी ठरलेला असतो. त्यासाठी बिल भरण्याची तारीख असते. त्यानंतर जर बिल भरले गेले तर दंड आकारणे स्वाभाविक आहे. पण बिलाच्या अंतिम तारखेपूर्वी जर दंड आकारला तर ते भरणार का? घरफाळ्याचे बिल मार्च २०१८ पर्यंतचे आहे. त्यासाठी सप्टेंबर २०१७ पासूनच दंड कसा आकारला जात आहे. हा लुबाडणुकीचाच प्रकार आहे.

विनोद पाटील, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला फक्त पंतप्रधानांनाच भेटायचंय..!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तळागाळात शिक्षण पोहचविण्यासाठी काय करता येईल? उप्तादन शेत्रात कोणत्या क्षेत्राला आपण प्राधान्य दिले पाहिजे? अवकाश संशोधनात काय केले पाहिजे? अनिवासी भारतीयांकडून येणाऱ्या निधीचे काय करावे? या आणि अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं सामान्य माणसाकडे नसतात. पण, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करून केर्लेच्या एका अपंग तरुणानं एक असामान्य काम केलं आहे. केर्लेतील हर्षवर्धन गुरव असं या तरुणाचं नाव असून, या प्रश्नांची उत्तरं घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची धडपड या तरुणानं सुरू केली आहे.

हर्षवर्धन जन्मापासून अपंगत्व. अपंगात्वामुळं त्याला जागेवरून हालता येत नाही. दहावीपर्यंत गावातच शिक्षण झालं. पण, पुढचं शिक्षण घेणं शक्य नसल्यानं घरातच बसावं लागलं. घरात बसून वाचन झालं. इंटरनेटवर बरीच माहिती मिळवली. टीव्हीचाही आधार घेतला. त्यातून त्यानं बरीच माहिती गोळ केली असून, त्या आधारे त्यानं विविध क्षेत्रांचा एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. हा सगळा प्लॅन फक्त पंतप्रधान मोदींशीच शेअर करण्याची त्याची मनीषा आहे.

केर्लेतून जोतिबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला गुरव कुटुंबाचे छोटेसे घर आहे. हर्षवर्धनसह आई शोभा गुरव, वडील महादेव आणि धाकटा भाऊ शुभम राहतात. शुभमही जन्मापासून अपंग आहे. घरी भेट घेऊन हर्षवर्धनला बोलतं केलं, तर त्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यापासून इस्त्रोच्या कामगिरीपर्यंत अनेक कल्पना मांडल्या. शिक्षण क्षेत्रात मुलभूत सुविधांचाच अभाव असल्याचं हर्षवर्धन सांगतो. छत्तीसगडमधील मनीष गर्ग या दहावीनंतर शिक्षण सोडलेल्या तरुणाने कॉम्प्युटर चिप मेकिंगमध्ये नाव कमावल्याचे उदाहरण त्याने दिले. औद्योगिक क्षेत्रात चीनने आघाडी घेतली असली, तरी आपण आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये उत्पादन क्षमता न वाढवता, फूड इंडस्ट्रीवर लक्ष केंद्रीत करायला हवे. चीन त्यांच्या उत्पादनांना ‘गॅरंटी’ देऊ शकत नाही. बाजारातील ती उणीव आपण भरून काढली पाहिजे, असं हर्षवर्धन सागंतो. मोबाइल रेडियेशन्समुळे ब्रेन कॅन्सरचा धोका असल्याचं सर्वेक्षण सागतं, तर रेडियेशन्सशिवाय चालणारा एखादा डिव्हाइस आपण का निर्माण करू नये?, असा विचार करायला लावणार प्रश्न हर्षवर्धनने उपस्थित केला. सौर ऊर्जा असेल, किंवा पवन ऊर्जा याविषयीही त्याने अनेक कल्पना मांडल्या आहेत. त्याच्या कल्पना ऐकून घेण्यासाठी अनेक पुणे, नाशिकच नव्हे, तर उत्तर भारतातील काही उद्योजकांनी त्याची भेट घेतली आहे.

या सगळ्या कल्पना एका शिदोरीसारख्या आहेत आणि ही शिदोरी मला पंतप्रधान मोदींच्यापुढेच उघडायची आहे, असं हर्षवर्धननं स्पष्ट केलं. जिल्हाधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्यानं आता हर्षवर्धनच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

तीन वर्षे भेटीचा प्रयत्न

हर्षवर्धन गेली तीन वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचा प्रयत्न करत आहे. फोन, ई-मेल, पत्र या सगळ्या माध्यमांतून प्रयत्न केल्यानंतर त्याने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेतली. ही भेट घेण्यातही बरेच अडथळे आले. पण, अखेर भेट झाली. जिल्हाधिकाऱ्यांना हर्षवर्धनला पंतप्रधानांची भेट घडवून देण्याची ग्वाही दिली आहे. त्याचा येण्या-जाण्याचा राहण्याचा खर्च, तसेच त्याला गरज असल्यास लॅपटॉप, मोबाइल घेऊन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

२९ अर्ज गेले कोठे?

हर्षवर्धनने समाजकल्याण विभागात विविध योजनांच्या अंतर्गत २९ वेळा अर्ज दाखल केले होते. पण, ते सर्व अर्ज गहाळ झाल्याचे उत्तर तेथील कर्मचारी देतात. एका कर्मचाऱ्याने ‘तुमची कागदपत्रे मंत्रालयातील आगीत नष्ट झाली,’ असे उत्तर दिले. तर, जिल्हाधिकारी कार्यालयातील एक अधिकाऱ्याने समोर खुर्चीवर बसल्याचे पाहूनही अपंगत्व सिद्ध करावे लागेल, असे सांगतो, याविषयी हर्षवर्धनने खेद व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा खासगीकरणावरूनसोलापुरात ‛पारदर्शी’ कारभार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गहण बनत चालला आहे. भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिल्याच दिवशी भाजपच्या पारदर्शक कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत मनपा प्रशासनाने चढ्या दराने खासगी ठेकेदाराबरोबर कचरा संकलनाचा करार करून भाजपाला आहेर दिला आहे. नेमण्यात आलेला ठेकेदार भाजपच्या एका नेत्याचा जवळचा असून, त्याच्याकडे कचरा उचलण्याचे कोणतेही साहित्य नसताना प्रशासनाने करार केलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळत असल्यानेच अधिकाऱ्यांनी साखळी करून त्याच ठेकेदाराबरोबर करार केल्याने पालकमंत्री विजयकुमार देशमुखही संतापले असून, खासगीकरणाला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.

शहरात दररोज सुमारे साडे तीनशे ते चारशे टन कचरा साचतो. हा कचरा उचलण्यासाठी मनपाने या पूर्वी समीक्षा कंपनीला टेंडर दिले होते. त्यांच्याबरोबर दहा वर्षांचा करार करताना प्रतिटन ६५० रुपयांचा दर दिला होता. कचरा उचलण्यासाठीची सर्व यंत्रणा या कंपनीकडे होती. दररोज ४२० टन कचरा उचलला जात होता, त्या बदल्यात समीक्षाला २ लाख ७३ हजार रुपये दिले जात होते. परंतु, तक्रारी करून प्रशासनाने समीक्षा कंपनीचा ठेका रद्द करून त्या ठिकाणी यशश्री इंटरप्रायझेसचे अश्विन मानवी यांच्याबरोबर करार केला हा करार केला. त्यांना प्रतिटन तब्बल १६७० रुपये देण्याचे ठरविले. यशश्री मार्फत दररोज २१० टन कचरा उचलण्यात येणार असून, त्यांना मनपा दररोज सुमारे ३ लाख ५० हजार ७०० रुपये मोजणार आहे. या शिवाय दुसरा ठेका ग्लोबल कंपनीला मंजूर केला असून, त्यांना प्रतिटन १६८० रुपये दर देण्यात आला आहे. २१० टन कचरा उचळण्यापोटी दररोज त्यांना सुमारे ३ लाख ५२ हजार ८०० रुपये मिळणार आहेत. केवळ पावणेतीन लाखात होणारे काम प्रशासनाने सुमारे सात लाखांवर नेले आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपासून अनेकांचे हाथ ओले झाल्याचे समजते. कचरा खासगीकरणाला या पूर्वी भाजपने कडाडून विरोध केला होता. आता मात्र खासगीकरण होऊनही भाजप पदाधिकारी काहीही बोलत नसल्याने संशय बळावला आहे. या पूर्वीचा ठेकेदार असलेल्या समीक्षा कंपनीला ठेका मंजूर करताना वार्षिक दरवाढ ३ टक्के ठरविण्यात आली होती. मात्र, यशश्री आणि ग्लोबल यांच्याशी करार करताना वार्षिक दरवाढ तब्बल १० टक्के ठरविण्यात आली असल्याने मोठे गौडबंगाल झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. समीक्षा कंपनीचा करार कायदेशीर संपला नसताना आता तिसऱ्यांदा मनपाने करार करून वादाला तोंड फोडले आहे.

दरम्यान, समीक्षा कंपनीला पहिल्या वर्षी सुमारे ९ कोटी ९६ लाख ४५ हजार मिळाले होते. आता नव्याने करार झाल्यामुळे यशश्री आणि ग्लोबल या दोघांना सुमारे २५ कोटी ६७ लाख ७७ हजार ५०० रुपये इतकी घसघशीत रक्कम मिळणार आहे. या पूर्वी समीक्षा कंपनीवर पाच वर्षांत ५२ कोटी ९० लाख रुपयांचा खरच होणार होता आता, या दोन कंपन्यांवर सुमारे १५६ कोटी ७६ लाख रुपये खर्च होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धांना समजून घेतले नाहीडॉ. आ. ह. साळुंखेंनी व्यक्त केली खंतसाळुंखे, सचिन पिळगावकरांना दमानी-पटेल पुरस्कार प्रदान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘गौतम बुद्धांना भारतीय समाजाने समजून घेतले नाही, ही भारतीय समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे,’ अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली. साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल दमानी-पटेल प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणारा कर्मयोगी पुरस्कार डॉ. साळुंखे आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांना मंगळवारी सायंकाळी निर्मलकुमार फडकुले सभागृहात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. साळुंखे बोलत होते. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख ५१ हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘छोट्याशा चिमणीला जसा चिवचीवण्याचा अधिकार आहे, तसा तो प्रत्येक व्यक्तीला आहे, हे बुद्धांनी पटवून सांगितले. धर्मग्रंथ आणि धर्मगुरुने सांगितलेले तसेच ऐकीव एवढ्या कारणावरून कोणतीही गोष्ट स्वीकारू नका. स्वतःला अनुभव येईल, तेव्हा ती स्वीकारा, मानवी संस्कृतीची प्रगती ही चिकित्सक दृष्टीकोनातून झाली असून, चिकित्सा न करता आंधळेपणाने जसेच्या तसे स्वीकारणे चुकीचे आहे,’ असेही डॉ. साळुंखे म्हणाले.

अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील कार्याचा आढावा घेताना राजाभाऊ परांजपे आपले पहिले गुरू असून, त्यानंतर महान गुरुंच्या हाताखाली काम करता आले असे सांगतानाच मीनाकुमारी यांच्यामुळे आपणास उर्दू भाषा शिकता आली आणि कट्यारमध्ये त्याचा आपणास फायदा झाल्याचे सांगितले. मी ज्या क्षेत्रात आहोत ते क्षेत्र अद्यापही नीट समजूही शकलो नसल्याने राजकारणात येण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन यांनी सांगितले. ज्यांना राजकारणाचे ज्ञान नाही त्यांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना वाकून नमस्कार करावा, असे पिळगांवकर यांनी सांगताच एकच हशा पिकला. आदेश बांदेकर यांनी एका महिलेला भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण, असा प्रश्न विचारला असता, त्या महिलेने शरद पवार असे उत्तर दिले होते, असा किस्सा सांगत पिळगावकर यांनी आपण राजकारणात शून्य असल्याचे सांगताच सभागृह खळाळून हसले. आपण आधी भारतीय आहोत आणि नंतर महाराष्ट्रीयन आहोत, असे सांगून देशाला जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा आपण योगदान देऊ असे पिळगावकर म्हणाले. या वेळी प्रेमरतन दमानी, बिपिनभाई पटेल, दत्ता गायकवाड, बाबुराव मैदर्गीकर, डॉ. मिर इसहाक शेख, डॉ. राजेंद्र घुली, अक्षय जव्हेरी यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवकाळी पाऊस: राज्यसरकारची ४ लाखांची मदत

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. अवकाळी पावसात दगावलेली व्यक्ती शेतकरी असेल तर त्यांच्या कुटुंबियांना 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने'अंतर्गत दोन लाख रूपयांची मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पंढरपूरमधील गारपीटग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढाव घेतला. यावेळी अवकाळी पावसात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना चार लाखांची मदत केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. राज्यातील ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांना बसला आहे. सोलापूरमध्येही पंढरपूरसह मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्ये पावसासह गारपीटीने झोडपले आहे. यात द्राक्ष बागांसह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

द्राक्ष बागांमध्ये तयार झालेली द्राक्षे काढली जात असताना अचानक झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा द्राक्ष बागांना फटका बसला आहे. या पावसामुळे सामान्य शेतकऱ्यांसह द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. काही ठिकाणी आंब्याचा मोहोर गळाल्यानेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​एमआयएमचे तौफिक शेखवरस्थानबद्धतेची कारवाई

$
0
0



सोलापूर

सोलापुरातील एमआयएमचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सोमवारी केली. शेख याची रवानगी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

शेख याच्याविरुद्ध १९८९पासून फेब्रुवारी २०१७पर्यंत सोलापुरातील विविध पोलिस ठाण्यात विविध कालमांतर्गत एकूण २९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यातून तो निर्दोष मुक्त झाला आहे. त्याच्याविरुद्ध दोनवेळा फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई आणि चारवेळा महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून त्याने त्याच्या साथीदारांसह एमआयडीसी, सदर बझार, विजापूर नाका, जेलरोड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्रनिशी फिरून खुनाचा प्रयत्न करणे, हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, अपहरण, गैरमंडळी जमाव जमवून गैरकृत्य करणे, बेकायदा दुकान घरजागा बळकावविणे, लोकांना किरकोळ कारणावरून घातक शास्त्रनिशी मारहाण करून परिसरात दहशत निर्माण करणे आदी गुन्हे दाखल आहेत. या वरून पोलिसांनी तौफिक शेख याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. तौफिक शेख याने मागील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एमआयएमकडून निवडणूक लढविली होती. त्याला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्या निवडणुकीत शेख याने प्रणिती शिंदे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना नामोहरम केले होते. या शिवाय नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत तौफिक याच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे ९ नगरसेवकही निवडून आले आहेत. मनपा निवडणुकीत मतदानावेळी नई जिंदगी परिसरात राष्ट्रवादीचे माजी महापौर हरून सैय्यद याला तौफिक याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून रक्तबंबाळ केले होते, त्यावेळी त्याच्याविरुद्ध आणि त्याचा मुलगा अदनान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवस तौफिक फरार होता. मात्र पोलिस आयुक्त सेनगावकार यांनी अखेर तौफिकवर स्थाबद्धतेची कारवाई केली. तौफिक हा एकेकाळी सुशीलकुमार आणि कन्या आमदार प्रणिती यांचा कट्टर समर्थक होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात काँग्रेस किंगमेकर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आज, मंगळवारी दुपारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून, दोन्ही पदे आणि सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीने ताकद पणाला लावली आहे. भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. भाजपने आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. तर राष्ट्रवादीकडून शितलदेवी आणि स्वरूपराणी मोहिते-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. खासदार विजयसिह मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजितसिह मोहिते-पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. २३ जागा जिंकून राष्ट्रवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाचीच मदत घ्यावी लागणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीने २३, भाजप-शिवसेना आघाडी २२, काँग्रेस ७, स्थानिक आघाडी १०, शेकाप ३ आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. ६८ सदस्य संख्या असलेल्या झेडपीमध्ये सत्ता स्थापन कारण्यासाठी ३५ जागांची जुळवाजुळव करण्यासाठी खासदार विजयसिह मोहिते-पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शेकाप ३ आणि अपक्ष किवा स्थानिक विकास आघाडीतील काहींना बरोबर घेऊन राष्ट्रवादी सत्ता स्थापन करू शकते, असे चित्र असतानाच भाजपने झेडपी ताब्यात घेण्यासाठी संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. मोहिते-पाटील विरोधक आणि विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढाचे समाधान आवताडे यांनीही भाजप पुरस्कृत महाआघाडीचे संजय शिंदे यांना मदत करण्याची तयारी दर्शविली असल्याने यामध्ये त्यांना कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे २३ सदस्य निवडून आले आहेत, त्यामध्ये तब्बल ८ सदस्य एकट्या माळशिरस म्हणजेच मोहिते-पाटील यांच्या तालुक्यातील आहेत. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाचे म्हणजेच काँग्रेसचे सहाजण आणि आणखी एक असे सातजण ज्या पक्षाबरोबर जातात त्या पक्षाची सत्ता झेडपीत येणार आहे. त्यामुळे आमदार म्हेत्रे हे सत्तेचे किंगमेकर ठरू शकतात. आघाडी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. शरद पवार यांनी लक्ष घातल्यास आणि शिंदे यांना बोलल्यास आघाडीचा अध्यक्ष होऊ शकतो, असे चित्र आज दिसून येत आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शिवसेना ४, शेकाप ३ असे ३७ संख्याबळाची जुळवाजुळव राष्ट्रवादी आघाडीने केली आहे. तर भाजप १४, परिचारक गट ६, भीमा परिवार ३, आवताडे गट ४, अपक्ष २, शिवसेना १ अशी ३१ जणांची जुळवाजुळव भाजप आघाडीने केली आहे. सत्तेसाठी जवळपास सहा जागा कमी पडत असतानासुद्धा माढामधील ७ सदस्य यांना गैरहजर ठेऊन भाजप आघाडीने चमत्कार घडविण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच शेकाप आणि काँग्रेस तटस्थ राहिल्यास भाजपाला विजय आणखी सोपा करण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरु असल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. एकूणच सत्तेसाठीचा मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सैराट'मधील आर्चीची छेड काढणारा ताब्यात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । अकलूज (सोलापूर)

'सैराट'फेम आर्ची अर्थात, रिंकू राजगुरू हिची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय घरत असं या तरुणाचं नाव असून तो ठाण्याचा रहिवाशी असल्याचं समजतं.

मराठी सिनेसृष्टीत अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या 'सैराट' चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू अल्पावधीतच स्टार झाली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिला भेटण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत. यापूर्वीही अनेकदा तिला धक्काबुक्की झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी एका तरुणानं तिची छेड काढल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी करून दत्ता घरत याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सेना आमदार पाटीलविरोधात पोलिसात तक्रार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘शेतीच्या वादातून पोलिसात दाखल केलेली तक्रार माघार घे, नाहीतर तुला उलट टांगून मारीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात एका शेतकऱ्याने केला आहे. आमदार पाटील यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, असा तक्रार अर्जही शेतकरी रोहिदास राजाराम कांबळे यांनी पोलिस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडे केला आहे. नारायण पाटील करमाळ्याचे आमदार आहेत.

रोहिदास कांबळे यांची करमाळा तालुक्यात मौजे शेटफळ येथे शेतजमीन आहे. या शेतातील पाइपलाइन सचिन नरोटे यांनी फोडली. या विरोधात कांबळे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा माघार घ्यावा म्हणून नरोटे कांबळेंना धमकावत होता. या प्रकरणी शिवसेना आमदार नारायण पाटील यांनीही मोबाइलवरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज शेतकरी कांबळेंनी दाखल केला आहे. आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दहा एकर तुर जाळून टाकली

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

तुरीचे भाव पडल्यामुळे काढणी, मळणी आणि आडतीचा खर्चही निघत नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांने तुरीच्या दहा एकर उभ्या पिकाला आग लावून तूर जाळून टाकली. ही दुर्दैवी बासलेगाव (ता. अक्कलकोट) येथे रविवारी घडली.

अक्कलकोट तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी काढणी, मळणी, अडतीचा खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळ-मेळ बसत नसल्यामुळे पिकाची काढणी न करता उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. वर्षभर ज्या शेतीची निगा राखली तीच शेती पेटवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली.

शशिकांत बिराजदार सधन शेतकरी आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातल्या बासलेगावच्या पंचक्रोशीत ते प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. दर वर्षी साधारण १५० ते २०० क्विंटल तूर उत्पादन ते घेतात. यंदा ही त्यांनी आपल्या शेतात २६ एकर तूर पेरली होती. त्यापैकी १६ एकराची रास करून उत्पादनही घेतले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी विक्रीला पाठवली. परंतु, अजूनपर्यंत तूर विकली गेली नाही. ३५०० ते ४२००पर्यंत त्यांच्या तुरीला मागणी होती. परंतु सरकारने ५१०० रुपये हमी दराने विकत घ्यायचे धोरण जाहीर केल्यामुळे त्यांनी तुरीची विक्री केली नाही. काढणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत होणारा खर्च याचा कुठेच ताळमेळ लागणार नाही याचा अंदाज आल्याने दहा एकराच्या तूर शेतीला त्यांनी आग लावली. यंदा केलेली तूर शेती त्यांच्या अंगलट आली आहे.

गेल्यावेळी मिळालेला तुरीचा चांगला भाव पाहून त्यांनी तूर लावली. पण हळूहळू तुरीचे दर कोसळत गेले त्यामुळे बिराजदार यांनी किमान पुढील पिकासाठी शेत तरी मोकळे होईल म्हणून उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोट तालुक्‍यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगलेच नुकसान सहन करावे लागले आहे. हमीभाव देण्याच्या आणि तूर विकत घेण्याच्या सरकारी यंत्रणेवर आता शेतकऱ्यांचा विश्‍वास उडाल्याचेच या घटनेतून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी काठावर गाळपेरणी सुरू

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उजनी जलाशयातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जलाशयातील पाण्याने व्यापलेल्या जमिनी आता उघड्या पडल्या असल्याने या जमिनीवर उन्हाळी पिके घेण्याची बळीराजांची लगबग सुरू झाली आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोंढार चिंचोलीसह परिसरात असे चित्र दिसून येत आहे.

उजनी जलाशयामुळे लाखो सजीवांची पाण्याची गरज भागविली जात असतानाच जलाशयातील पाण्याच्या आधारावर हजारो शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. दरम्यान, जलाशयातील पाणी कमी फायद्या शेतकऱ्यांना होते आहे, पाणी घटत असताना उघड्या पडणाऱ्या जमिनीवर शेतकरी उन्हाळी पिकांचे उत्पादन घेतात. यंदाही सद्यस्थितीत उजनी काठावर अशा गाळपेरण्या सुरू आहेत. या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या जमिनींची हलकीशी मशागत करताना शेतकरी दिसून येत असून या भागात आता कडवळ, मका, कांदा, भुईमुग, मुग, बाजरी या पिकांची पेरणी होणार आहे.
कसदार जमिनी ठरतायत फायदेशीर

उन्हाळ्यात जलाशयाच्या पाण्याबाहेर पडणाऱ्या या जमिनीत गाळाचे प्रमाण जास्त असल्याने त्या कसदार असतात. या शिवाय जलाशयाकाठच्या या जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याची गरज नसते. एकदा पेरणी झाली की खत, पाण्याविना पिके बहारदार येतात. एकूणच अल्प कष्ट व खर्चात चांगले उत्पन्न मिळते. कोंढारचिंचोली, पारेवाडी, उमरड, पोमलवाडी, जिंती, टाकळी, कात्रजसह परिसरातील शेतकऱ्यांना असा अनुभव आहे.

वेगाने पाण्यात घट

यंदा उजनी ११० टक्के भरले होते. मात्र, सद्यस्थितीत पाण्याची घट वेगाने होऊ लागली आहे. मुख्यतः धरणातून खाली सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जलाशयातील पाणीसाठा पोटाच्या दिशेने खाली सरकत आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ होत आहे, अशा स्थितीत जलाशयाने व्यापलेला जमिनीचा भाग उघडा पडण्याचा वेग आता वाढणार आहे. जमिनी उघड्या पडल्या की त्या ठिकाणी गाळपेरणी करण्याची लगबगही वाढणार आहे.
उजनीच्या पाण्याच्या नियोजनाची मागणी

उजनी जलाशयाने शंभरी ओलांडली तरी उन्हाळ्यात जलाशयाची पाणीपातळी वजा होऊन पाण्याची अडचण निर्माण होते. शेती पंपांची वीज कपात केली जाते. परिणामी धरणासाठी त्याग करणाऱ्या शेतकऱ्यांना पिके जगविणे अवघड होते, अशी स्थिती दर वर्षी आढळून येते. यंदा पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणेच वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीचा फोटो काढताना दरीत पडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सज्जनगडावर पत्नीचा फोटो काढत असताना पाय घसरून दरीत पडल्याने धनंजय जाधव (३२, सातारा) यांचा मृत्यू झाला. अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.
धनंजय जाधव पत्नी नीलमबरोबर शुक्रवारी दुपारी दर्शनासाठी सज्जनगडावर गेले होते. मारुती मंदिराजवळ दोघेही विसावा घेण्यासाठी थांबले. या वेळी धनंजय जाधव फोटो काढत होते. फोटो काढत असताना दरीच्या दिशेने ते गेले. या वेळी त्यांचा पाय घसरून ते दरीत कोसळले. डोळ्यांसमोर पती दरीत खाली पडल्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. काही वेळानंतर त्या ठिकाणी काही ग्रामस्थ गेले. मात्र, पती दरीत पडल्याच्या धक्क्याने नीलम बेशुद्ध पडली होती.
त्यामुळे घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांना नेमकी घटना समजू शकली नाही. नीलम शुद्धीवर आल्यानंतर पती दरीत पडले असल्याचे तिने सांगितले. तोपर्यंत अंधार पडण्यास सुरुवात झाली होती.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शोधमोहीम सुरू केली. रात्री ११च्या सुमारास धनंजय जाधव यांना शोधण्यात यश आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सातारा झेडपीचेअध्यक्ष संजीवराजे?

$
0
0



सातारा

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची रंगीत तालिम सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडले. दोन तासांच्या राजकीय खलबतानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले. उपाध्यक्ष निवडीसाठी पाटण तालुक्यातून माजी आमदार विक्रमसिह पाटणकर यांचे समर्थक राजेंद्र पवार व खटाव तालुक्यातून सुरेंद्र गुदगे यांच्या प्रत्येकी सव्वा वर्षे मुदत देण्याच्या चर्चा रंगल्या. या निवडी जवळपास निश्चित असून मंगळवारी प्रत्यक्ष सभेपूर्वी शरद पवार यांच्याकडून निवड जाहीर करणारा दूरध्वनी केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार उदयनराजेंवर मारहाण, खंडणीचा गुन्हा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील संघर्षातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन गटांतील संघर्ष पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे.

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर हे करतात. कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते तसेच त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजे यांचा आरोप होता. त्यामुळे १८ फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतले होते.

सातारा विश्रामगृहात आल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडे असलेला ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे यांचे समर्थक अशोक सावंत, रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल अशा ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफजलखानाच्या कबरीभोवतीच्या१९ अवैध खोल्या पाडण्याचे आदेश

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

किल्ले प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीभोवती वन खात्याच्या भूमीवर बेकायदा बांधण्यात आलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम काढून टाकण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च रोजी वनखाते आणि सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला आहे.

विधानभवनातील सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात दुपारी तीन वाजता श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. चर्चेनंतर त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा आदेश दिला.

या बैठकीला वन विभागाचे सचिव खारगे, मुख्य वनसंरक्षक पाटील, विभागीय वनअधिकारी अंजनकर, श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि सांगलीचे माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रितिनिधी उपस्थित होते.

अफझलखान कबर परिसरातील वनखात्याच्या भूमीवर केलेले बेकायदा बांधकाम त्वरित हटवण्यात यावे, असा आदेश मुंबई हायकोर्टाने सरकारला दोन वेळा दिला आहे. तरीही सरकारने बांधकामे हटविली नाहीत. या पूर्वीच्या सरकारने या विषयी काहीच कृती केलेली नाही. सरकारने संबधित बांधकामे हटवावीत, अशी मागणी नितीन शिंदे यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यांना अवैध बांधकामांची छायाचित्रेही दाखवली.

मुनगंटीवार म्हणाले, ‘वन खात्याच्या जमिनीवरील बेकायदा १९ खोल्यांचे बांधकाम हटवण्यात येईल; मात्र वनखात्याची जमीन सोडून अन्य ठिकाणी असलेले बांधकाम आम्हाला पाडता येणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर बंदला प्रतिसाद

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

जंगलात चोरून सुरू असलेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावांनी पुकारलेल्या तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांच्या असमाधानकारक तपासाच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तेथेच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले

गोहत्या व धोंडीबा आखाडे यांच्या खुनाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी तहसीलदार रमेश शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली

गोहत्या बंदी असतानाही महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात जंगलात गोहत्या केली जात आहे. तसेच देवळी गावातील वृद्ध शेतकरी धोंडीबा आखाडे यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून या दोन्ही घटनांचा परस्पर संबधित आहेत. मात्र, पोलिस या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासात दिरंगाई करीत आहेत. २५ दिवसांत पोलिस काहीच प्रगती करू शकले नाहीत, त्यामुळे तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांच्या अशा कामगिरीच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावातील जनतेने आज तालुका बंदची हाक दिली होती. या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. महाबळेश्वर बंद ठेवून तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने येथीय छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. तेथे छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मार्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, गणेश उतेकर आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images