Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राजकीय पक्ष, महिला आघाड्या ‘सायलंट’च

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com
twitter:@satishgMT

कोल्हापूर : म्हैसाळ (ता. मिरज) आणि पिराचीवाडी (ता. कागल) येथे उघडकीस आलेल्या गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर गर्भपात यांसारखी संवेदनशील प्रकरणे उघडकीस आल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष, महिला आघाड्यांनी त्याविषयी कोणतीच भूमिका घेतलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांच्या महिला आघाड्यांमध्येही शांतताच आहे. एरवी कोणत्याही प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या आघाडीवर असणाऱ्या महिला आघाड्यांची महिलांबाबतच्या संवेदनशील प्रश्नांवरील अशी प्रतिक्रीया अस्वस्थ करणारी ठरले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. सरकारच्या आदेशानंतर सर्वच राजकीय पक्षांनी महिला नेतृत्व पुढे आणण्यासाठी पुढाकार घेतला असून महिला आघाड्या स्थापन केल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या राजकीय पक्षांच्या शहर व जिल्हा अशा दोन आघाड्या कार्यरत आहेत. महागाई, पाणी अशा प्रश्नांवरील आंदोलनात त्या पुढे असतात. कोल्हापुरातील टोल आंदोलनात सर्व राजकीय पक्षांच्या महिला कार्यकर्त्या पक्षभेद विसरून आंदोलनात आक्रमक झाल्या होत्या. अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेशावेळी तर महिला आघाडीतील नेत्या, कार्यकर्त्यांनी थेट तृप्ती देसाई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

शिवसेनेची महिला आघाडी आंदोलनात पुढाकार घेते. अगदी चारच दिवसांपूर्वी अमेरिकेतील भारतीयांवरील होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अमेरिकन राष्ट्रध्वजाची होळी करण्यासाठी पुढे होत्या. मात्र म्हैसाळ, पिराचीवाडी यांसारख्या गावांत गर्भातच कळ्या खुडल्या जात असताना त्यांना याचे सोरयसूतक नाही. आमदार, जिल्हाप्रमुखांच्या वादात महिला आघाडीची सूत्रे पुरुषच ठरवत असल्याने या गंभीर प्रश्नाबाबत महिला कार्यकर्त्या शांत आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप महिला आघाडीनेही या प्रश्नावर मौन स्वीकारले आहे. स्वतःच्या पक्षाची सत्ता असताना आंदोलन का करता असा ‘मंत्र्यां’नी प्रश्न विचारला तर उत्तर काय द्यायचे अशी व्दिधा अवस्था या पक्षातील महिला आघाडीची असावी.

महिला पंतप्रधान, महिला पक्षाध्यक्षा पदाचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेसची महिला आघाडीही या प्रश्नांवर शांत आहे. पक्षाच्या केंद्र व राज्य पातळीवरुन जोपर्यंत आदेश येत नाही, तोपर्यंत आंदोलन अथवा निवेदन काढले जात नाही. पक्षशिस्तीच्या नावाखाली महिला आघाडीला ‘आवाज’ नसल्याने स्त्री भ्रूणहत्येसारख्या घटनांवर भाष्य करणे टाळले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवतात. मात्र स्थानिक महिला आघाडीच्या सदस्यांना ‘कागल’चा आदेश नसल्याने त्या आंदोलन करू शकत नाहीत. कागल तालुक्यातील पिराचीवाडीत गर्भलिंग चाचणीचा प्रकार उघड होऊनही पक्षाची महिला आघाडी ‘देवीं’च्या दर्शनात गुंग आहे. महिल्या आघाड्यांचे नेतृत्व पुरूषांकडेच असल्याचे यातून अधोरेखित होते.

‘डाव्या’ कार्यकर्त्यांचा आवाज

स्वाभिमानी, जनसुराज्य, ताराराणी आघाडी पक्ष यांच्याकडूनही आंदोलन अथवा अन्य कोणतीच पावले उचलली जात नाहीत. डाव्या आघाडीच्या भाकप व माकप या दोन पक्षांच्या महिला कार्यकर्त्या पक्षाची ताकद कमी असूनही गर्भलिंग चाचणी व गर्भपात केंद्रांविरोधात आवाज उठवत आहेत. ज्योती भालकर या यापूर्वी थेट स्टींग ऑपरेशमध्ये सहभागी झाल्या होत्या . मात्र अन्य राजकीय पक्षांकडून संवेदनशील प्रश्न बेदखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रलंबित गुन्ह्यांचा शोध लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील सहा गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली कराव्यात. संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव अपेक्षित प्रमाणात आलेले नाहीत. त्यामुळे संशयितांवर कारवाईत चालढकल का होतेय? असा संतप्त सवाल पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना विचारला. गुरूवारी (ता. ९) पोलिस अधीक्षक कार्यालयातील क्राईम आढावा बैठकीत ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव, शिरोली, रुकडी आणि गिरोली घाटात झालेल्या खुनांचा उलगडा अद्याप झलेला नाही. याबाबत अधीक्षक तांबडे यांनी आढावा बैठकीत झाडाझडती घेतली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडून जिल्हा प्रशासनाची तपासणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अधीक्षक तांबडे म्हणाले, ‘वाढते गुन्हे रोखण्यासह आधी घडलेल्या गुन्ह्यांची उकल होणेही महत्त्वाचे आहे. रुकडी आणि शिरोली एमआयडीसीतील खुनांचा तपास लागलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांसह गुन्हे अन्वेषण शाखेनेही प्रयत्न करावेत.’

अधीक्षक तांबडे यांनी पोलिस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकांचाही आढावा घेतला. यापूर्वी तांबडे यांनी मटका, जुगार, चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रस्तावाच्या सूचना पोलिस निरीक्षकांना दिल्या होत्या. राजारामपुरी आणि गांधीनगरचा अपवाद वगळता उर्वरित पोलिस ठाण्यांतून प्रतिबंधात्मक कारवायांचे प्रस्ताव आले नाहीत. याबाबत तांबडे यांनी विचारणा केली. प्रतंबिधात्मक कारवाईसाठी अद्ययावत आणि बिनचूक प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, डॉ. दिनेश बारी, उपअधीक्षक सतीश माने, भरतकुमार राणे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, प्रवीण चौगुले, अमृत देशमुख, अनिल देशमुख उपस्थित होते.

राजारामपुरी पोलिसांचे कौतुक

गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी राजारामपुरी पोलिस ठाण्यातून प्रतिबंधात्मक कारवायांचे तीन प्रस्ताव आले. अधीक्षक तांबडे यांनी तिन्ही प्रस्ताव मंजूर केल्याने १५ संशयित हद्दपार झाले. याशिवाय प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्या प्रकरणात कौशल्याने तपास करून तातडीने आरोपींना अटक केल्याबद्दल तांबडे यांनी राजारामपुरी पोलिसांचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालक, मुकादमाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गंगावेश येथे वडा पाव विक्रेत्याने गटारीवर उभारलेले अनधिकृत शेड हटविताना महापालिका कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. वडापाव विक्रेता किशोर आयरेकर आणि त्याच्या सहा साथीदारांनी केलेल्या मारहाणीत महापालिकेचे जेसीबी चालक शंकर मराडे व मुकादम उमेश मोहिते जखमी झाले आहेत. मराडे यांना जेसीबीवरुन खाली खेचून लाथाबुक्या घालण्यात आल्या. कारवाईवेळी कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे यांनाही शिवीगाळ करण्यात आली.

या घटनेनंतर अतिक्रमण विरोधी मोहिमेतील इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवत ‘रास्ता रोको’ केला. मारहाण आणि रास्ता रोकोमुळे गंगावेस परिसरात तणाव निर्माण झाला. नगरसेवकांच्या मध्यस्थीमुळे याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसही उशिरा घटनास्थळी दाखल झाले.

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत गुरुवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास पथक गंगावेस येथे आले. तेथे आयरेकरने गटारीवर उभारलेले शेड हटवायला सुरुवात केल्यानंतर वादावादी सुरू झाली.

लाथाबुक्क्यांनी मारहाण

जेसीबी चालक मराठे यांनी शेड हटवण्यासाठी जेसीबी सुरू केला. लोखंडी शटर उचकटले. तेव्हा किशोर आयरेकर व त्याचे पाच, सहा साथीदार जेसीबीवर चढले. मराडेंना मारहाण करत खाली खेचून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तेव्हा मुकादम उमेश मोहिते यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. कनिष्ठ अभियंता कांबळे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिविगाळ करण्यात आली.

……………..

वारंवार मारहाणीचे प्रकार

कारवाई दरम्यान गोंधळ झाल्याचे समजताच विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, विश्वास आयरेकर घटनास्थळी दाखल झाले. तसेच सहायक आयुक्त सचिन खाडे, प्रभारी सहायक आयुक्त संजय भोसले, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आस्थापना विभागातील विजय वणकुद्रे हेही आले. कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर पोलिस कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी नगरसेवकांनी हस्तक्षेप करत आपापसात तोडगा काढता येऊ शकतो असे सांगत प्रकरणावर पडदा टाकला. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नगरसेवकांनी हस्पक्षेप केल्यामुळे पोलिस ठाण्याबाहेरच प्रकरण मिटले. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी नियमानुसार काम करताना आम्ही किती दिवस मार खायचे, आमचा काय दोष? असा प्रश्न केला.

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याला झळाळी गुरुपुष्यामृताची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोने बाळगण्यावर असलेली मर्यादा, नोटाबंदी आणि त्यानंतर आलेली मंदी अशा वातावरणात गुरुवारी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्ताने सोन्याला झळाली मिळाली. कोल्हापूरकरांनी मोठ्या हौसेने आणि सराफी पेढ्यांमध्ये वेटिंग करून सोने खरेदी केले. यामुळे सायंकाळनंतर सोन्याची उलाढाल वाढल्याचे दिसून आले.

आपल्या समाजव्यवस्थेत सोन्याकडे गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते. बाजारात कितीही मंदी आली तरी सणवार, लग्नसराई आणि इतर कार्याच्या निमित्ताने सोन्याची खरेदी केली जाते. असेच काहीसे चित्र गुरुवारी सराफ बाजारपेठेत पाहायला मिळाले.

यामुळेच आतापर्यंत मंदीतील सोनेबाजारात अचानक उलाढाल वाढली. याला गुरुपुष्यामृताची जोड मिळाले. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्त साधत कोल्हापूरकरांनी उत्साहात सोने खरेदी केली. या दिवशी खरेदी केलेले सोने लाभदायी असते, असा समज असल्याने सोने खरेदीला वेगळी झालर होती.

गुरुपुष्यामृत असले तरी दुपारपर्यंत सराफ बाजारपेठ शांतच होती. पण, सायंकाळनंतर बाजारपेठेचे चित्र बदलले. सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडत अनेकांनी गुजरीचा रस्ता धरला. या परिसरात काहीकाळ वाहतूकही मंदावली होती. सराफ पेढ्यांबाहेर गर्दी होती. अनेक ठिकाणी तर ग्राहकांना उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. गुजरीत असेच चित्र ठिकठिकाणी दिसून येत होते.

सध्या सोन्याचा तोळ्याचा दर ३० हजाराच्या उंबरठ्यावर आहे. तरीही सोन्याला चांगली मागणी होती. काहींनी भविष्यातील शुभकार्यासाठी वळे घेण्याकडे कल दिला. तर बहुतांश ग्राहकांनी बदललेल्या ट्रेंडनुसार थेट दागिनेच खरेदी केल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

ग्राहकांचा खरेदीला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. गेल्या महिन्यातही गुरुपुष्यामृत होते. त्या तुलनेत आज थोडा कमी प्रतिसाद असला तरी गोल्ड कॉइनची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. काहींनी दागिनेही खरेदी केले आहेत. सोन्याचा दर आणखी कमी येईल, अशी अपेक्षा आहे. तसेच आगामी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोने खरेदी होल्डवर ठेवली आहे.

- कुणाल लडगे, सराफ व्यावसायिक

बाजारात अजूनही नोटाबंदीचा परिणाम दिसत आहे. पण, इतर दिवसांच्या तुलनेत आजचा गुरुपुष्यामृत योग निश्चितच सराफ बाजारासाठी चांगला होता. ग्राहकांनी प्रामुख्याने येणारी लग्ने, शुभकार्य लक्षात घेऊन सोन्याची खरेदी केल्याचे दिसते.

- किशोर परमार, सराफ व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरजातीय विवाह केलेल्यांचा सत्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जातीपातीच्या भिंती मोडण्यासाठी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह काळाची गरज आहे. युवा पिढीच जातीपातीची बंधने तोडू शकतात, असे मत राज्य सर्व श्रमिक महासंघाचे जनरल सेक्रेटरी उदय भट यांनी व्यक्त केले.

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या १६ जोडप्यांचा सत्कार श्रमिक कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी साखर कामगार युनियनचे अध्यक्ष राऊ पाटील होते.

युनियनचे राऊ पाटील म्हणाले की, विधायक समाजनिर्मितीसाठी अशा प्रकारचे विवाह करणाऱ्यांना सहाय्यता केंद्रातर्फे नेहमीच पाठबळ देण्यात येईल. मनीषा नायकवडी, निखील जोशी, सिंधू नीला, नर्सिग नायकवडी, अविनाश कोंडीग्रेकर, प्रशांत पाटील, पापालाल नायकवडी, धोंडिबा कुंभार, शबनम शिकलगार, रोहित बामणे, उदयकुमार चितारी यांनी मनोगत व्यक्त केले.

आंतरजातीय आंतरधर्मिय विवाह सहाय्यता केंद्राच्या वतीने सत्कार सोहळा झाला. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या सुवर्णा तळेकर, सर्व श्रमिक संघाचे अनंत कुलकर्णी, बँक एम्प्लॉईज युनियन दिलीप लोखंडे, कोतवाल संघटनेचे कृष्णात चौगले, केंद्र समवन्यक विजय बामणे उपस्थित होते. अतुल दिघे यांनी केंद्राची माहिती सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेच्या फॉर्म्युल्याला शिमग्याचा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेना कोणाला पाठिंबा देणार, याचे चित्र रविवारी (ता. १२) स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गेले काही दिवसांपासून होणारी उत्सुकता संपणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपने तटस्थ भूमिका घेतली आहे. त्याची परतफेड म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना भाजपला साथ देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना सत्तेचा बाण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात देणार की जिल्हा परिषदेत कमळ फुलविणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. याच दिवशी शिवसेनेच्या गटनेत्याची निवड केली जाणार आहे.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. दुधवडकर शनिवारी रात्री कोल्हापुरात दाखल होणार आहेत. रविवारी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामधाम येथे शिवसेनेचे आमदार, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निर्णय घेतला जाणार आहे. बैठकीत जिल्ह्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. बैठकीत पाठिंबा दिल्यास अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद किंवा विविध सभापती पदाची मागणी केली जाणार असल्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दहा सदस्य निवडून आले आहेत. दहा सदस्य भाजप प्रणित आघाडी किंवा दोन्ही काँग्रेसला मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या चाव्या सहज हातात मिळणार आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी ३४ सदस्यांची गरज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला शिवसेनेने पाठिंबा दिल्यास कोणत्याही आघाडीची गरज भासणार नाही. ही आघाडी झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील हे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा काँग्रेसचा होणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत.

भाजप प्रणित आघाडीही सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारी (ता. ११) पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे. भाजपचे १४, जनसुराज्यचे ६, ताराराणी पक्ष आघाडीचे ३, शाहू आघाडीचे २ आणि युवक क्रांती विकास आघाडीचे २ असे एकूण २७ सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. भाजप, जनसुराज्य, ताराराणी पक्ष, शाहू आघाडीचे मिळून २५ सदस्यांचे संख्याबळ होते. शिवसेनेचे दहा सदस्य मिळाल्यास ही सदस्य संख्या ३५ होते. शिवसेनेने साथ दिल्यास युवक क्रांती आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गरज लागणार नसल्याचा दावा केला जात आहे.


आघाडी करणार बिघाडी

दोन्ही काँग्रेस आणि भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ३४ सदस्य मिळविण्यासाठी आघाडीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या आघाडीनी ऐन वेळी पाठिंबा नाकारल्यास राजकीय पक्षांची मोठी कोंडी होणार आहे. या आघाडीच राजकीय नेत्याची बिघाडी करणार असल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, ताराराणी पक्ष आघाडी, शाहू आघाडी, युवक क्रांती आघाडी, जिल्हा ताराराणी विकास आघाडी आणि अपक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कुपेकर गटाचे युवक क्रांती आघाडीचे दोन सदस्य सहलीवर गेले आहे. कुपेकर गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. कुपेकर गटाचा पाठिंबा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे शब्द टाकला असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगडच्या जवानाला वीरमरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

महिपाळगड (ता.चंदगड) येथील जवान महादेव पांडूरंग तुपारे (वय ३४) हे बुधवारी रात्री लेह-लडाख येथील दराज येथे सेवा बजावत असताना बर्फात अडकून शहीद झाले. ८ मार्च रोजी ड्युटीवर असलेल्या ठिकाणी अतिबर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमध्ये जवान तुपारे सापडल्याने त्यांचा बर्फामध्ये गुदमरुन मृत्यू झाला.

महादेव तुपारे हे २००५ मध्ये १६ कुमाऊं रेजिमेंट उत्तराखंड येथे सैन्यात भरती झाले होते. गेली बारा वर्षे ते सैन्यात सेवा बजावत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण महिपाळगड तर महाविद्यालयीन शिक्षण कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयात झाले. मोठ्या कष्टाने ते सैन्यात भरती झाले होते. आठ मार्चला रात्री एक वाजण्याच्या सुमारास ते हिमवृष्टीत बेपत्ता झाले. गेल्या चार दिवसांपासून लेह-लडाख परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असल्यामुळे त्यांचे पार्थिक आणण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे महादेव तुपारे यांचे वडील पांडुरंग व आई सुमन शेताकडे गेले होते. सकाळी आठ वाजता महादेव यांच्या युनिटमधून या घटनेची माहीती देण्यासाठी फोन आला. ही बातमी समजताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.

महादेव तुपारे हे सैन्यात क्लार्क पदावर कार्यरत होते. गेल्या चार दिवसांपासून लेह येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने अजूनही त्यांचे पार्थिव लष्काराला मिळालेले नाही. हवामान स्वच्छ झाल्यानंतर पार्थिव १० मार्चला आणले जाणार असल्याचे समजते. लेह नंतर दिल्ली आणि दिल्लीहून विमानाने पुणे व बेळगाव येथील सांबरे विमानतळावर पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या महिपाळगड या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

महादेव तुपारे यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी रुपा, सात वर्षाचा प्रितम व पाच वर्षाचा अंश असे दोन मुलगे आहेत. मोठा भाऊ पुंडलिक हा गावातच पॉवरलूमचा व्यवसाय करत आहे. दोन महिन्यांपूर्वीच मजरे कार्वे येथील जवान राजेंद्र तुपारे हे शहीद झाले होते. लागोपाठ या दुसऱ्या घटनेने महिपाळगडसह चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील जवान जम्मूजवळ हुतात्मा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेजवळ पूंछ येथे पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी केलेल्या गोळीबारात सातारा जिल्ह्यातील फत्त्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे (वय ३२) हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव आज, शुक्रवारी गावी आणले जाणार आहे.

गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गुलपूर भागात भारतीय ठाण्यावर गोळीबार केला. त्यात घाडगे गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. दीपक यांच्या मागे वडील, आई शोभा, पत्नी निशा, चार वर्षांचा मुलगा शंभू आणि एक वर्षाची मुलगी परी आणि विवाहित बहीण माला असा परिवार आहे.

घाडगे १५ मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. दीपक यांच्या मृत्यूचा बातमी कळताच फत्त्यापूर गावातील व्यवहार व बाजारपेठ बंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. खिद्रापुरेची पत्नी ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

म्हैसाळ येथील गर्भपात प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या पत्नीला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, स्वाती प्रविण जमदाडे (वय २६) या महिलेच्या गर्भपातावेळी वापरलेल्या गोळ्या आणि इतर साहित्य जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी दिली. बुधवारी सायंकाळी विजापूरातून अटक केलेला डॉ.रमेश व्यंकटेश देवगीकर आणि गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारा माधवनगरचा सुनील काशिनाथ खेडकर या दोघांना कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिंदे यांनी सांगितले की, डॉ. खिद्रापुरेने चौकशीत दिलेल्या जबाबनुसार त्याने लपवलेली औषधे जप्त केली आहेत. गर्भपात करताना मृत्यू झालेल्या स्वाती जमदाडे यांच्यासाठी ही औषधे वापरल्याची कबुली खिद्रापुरेने दिली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीच्या अहवालानुसार डॉ. खिद्रापुरेवर वैद्यकीय गर्भपात कायदा ७१ आणि मुंबई नर्सिंग होम कायदा ४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम २०१, ३१३ , ३१८,४१९, ४२०,४६७,४६८ आणि ३४ प्रमाणे आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान अटकेत असलेले सात आणि संशयितांच्या यादीवर असलेल्यांविरोधात सबळ पुरावे गोळा केले जात आहेत.

गर्भपातासाठीच्या औषधी गोळ्यांचा पुरवठा केल्याप्रकरणी अटक केलेला खेडकर हा रत्ना डिस्टीब्युटर्स एजन्सीमधील कामगार आहे. मालकाने सांगितल्याशिवाय त्याने खिद्रापुरेकडे गोळ्या पोहच केल्या नसणार. असे असताना त्या डिस्टीब्युटरवर कारवाई का नाही, असे विचारताच शिंदे यांनी या प्रकरणातील एकाही संशयिताची गय केली जाणार नाही. डिस्टीब्युटर्स दोषी असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

‘ते’ डॉक्टर कोण?

दरम्यान, डॉ. खिद्रापुरेच्या कृष्णकृत्याच्या पर्दापाश झाला त्याच दिवशी पोलिसांना तपासाला गती देण्याच्या दृष्टीने आवश्यक कागदोपत्री नोंदी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णांना भूल देण्याची जबाबदारी पार पाडणारे डॉक्टर, गर्भपात आणि गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर संबंधित रुग्णाच्या फाईलवर शेरा मारणारे इतर डॉक्टर यांची नावेही पोलिसांना मिळाली आहेत. त्यापैकी कुणालाही अद्याप अटक झालेली नाही. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील कमिटी स्वतंत्र चौकशी करत आहे. डॉ. साळुंखे यांनी तपासादरम्यान अन्य पाच डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये येत असल्याची कबुली दिली होती. परंतु, ते डॉक्टर अद्यापही कारवाईपासून दूरच असल्याचे समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी दोघांना अटक; पोलिस कोठडीत रवानगी

$
0
0





म. टा. वृत्तसेवा, मिरज

म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी मिरज पोलिसांनी या प्रकरणी आणखी दोन जणांना अटक केली. हे प्रकरण उघडकीस येण्यास कारणीभूत ठरलेल्या दुर्दैवी विवाहितेचा पती प्रवीण जमदाडे याला तपासकामी पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह अटक केलेल्या दोघांना शुक्रवारी कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या सातगोंडा कलगोंडा पाटील (वय ६२, रा. कागवाड) आणि यासिन हुसेन तहसीलदार (वय ६०, रा. तेरवाड, ता. शिरोळ) या दोघांना शुक्रवारी पोलिसांनी अटक करून कोर्टासमोर उभे केले असता या दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, दुर्दैवी मयत स्वाती जमदाडे हिचा पती प्रवीण पतंगराव जमदाडे याची पोलिस कोठडी संपल्यावर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी त्याची आणखी चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊन त्याला पुन्हा पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार कोर्टाने प्रवीणला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सातगोंडा पाटील याचा डॉ. खिद्रापुरे यांच्या दवाखान्यासमोर चहाचा गाडा असून, तो डॉक्टरला गर्भलिंग चाचणी व गर्भपातासाठी रुग्ण पाठवून मध्यस्ती करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. तेरवाड येथील यासीन तहसीलदार डॉ. खिद्रापुरे याचा एजंट म्हणून काम करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोघांकडून आजवर किती जणांना मध्यस्ती करून दवाखान्यात आणले, त्यांचा तपशील आदी माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी या दोघांना पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार या दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

आतापर्यंत या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या नऊवर गेली असून, यात आणखी किती जणांची भर पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विजापूर, माधवनगर, मिरज, कागवाड, शिरोळ, सांगलीसह अनेक ठिकाणी पोलिसांची पथके या प्रकरणी सखोल चौकशी करीत असल्याचे समजते. त्यामुळे आणखी किती जणांचा या प्रकरणात सहभाग आहे, हे पोलिस तपासात लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाचीच चर्चा सुरु आहे. शहर आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध होत असून, अनेक संघटनांनी यातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय चौकशीची

मागणी करणार

सांगली :

‘म्हैसाळ येथील बेकायदा गर्भपात प्रकरणात डॉ. खिद्रापुरेच्या उद्योगाला पाठिशी घालण्यात आरोग्य अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. या प्रकरणाचे कनेक्शन कर्नाटकपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तपास करताना राज्यांच्या सीमांची मर्यादा येऊ नये. यासाठी आपण केंद्रीय आरोग्यमंत्री जयप्रकाश नड्डा यांच्याकडे स्वंतत्र केंद्रीय चौकशी समितीची मागणी करणार आहोत,’ अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांना दिली.

खासदार पाटील म्हणाले, ‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हैसाळला भेट दिल्यानंतर संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीला आपण उपस्थित होतो. त्यामुळे म्हैसाळमधील बेकायदा गर्भपात प्रकरणाकडे जबाबदार अधिकऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे आता उघड झाले आहे. संबधितांची चौकशी सुरू आहे. त्यापैकी कोणाचीही गय केली जाणार नाही. समाजाच्या भावना तीव्र आहेत. म्हैसाळसारख्या ऐतिहासिक आणि संस्कारी गावामध्ये डॉ. खिद्रापूरे सारख्या डॉक्टरने जे दुष्कर्म केले आहे, त्यामुळे गावाची तालुक्याची आणि सांगली जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली आहे. आपण आज पुन्हा म्हैसाळमध्ये जाऊन गावात चौकशी केली. प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आहे. माणुसकीला काळीमा फासण्याचे कृत्य डॉ. खिद्रापुरेने केले आणि त्याला इतरांनी सहकार्य केलेले आहे. पोलिस यंत्रणेलाही तपासाबाबतच्या सुचना केलेल्या आहेत. या प्रकरणाच्या साखळीमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यातील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलेले आहे, त्यामुळेच केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांच्याकडे म्हैसाळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र्य चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी करणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​हत्तीवरून साखरवाटून ‘दुर्गा’चे स्वागत

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

सांगली जिल्ह्यातील बागणी येथे सुखटणकर कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचे स्वागत हत्तीवरुन साखर वाटून केले. म्हैसाळच्या स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकरण राज्यभर गाजत असताना मुलीच्या जन्माचे स्वागत इतक्या उत्साहात केल्याने सुखटणकर कुटुंबीयांवर अभिनंदाचा वर्षाव होत आहे.

बागणी येथील सुनील सुखटणकर यांची मुलगी वृषाली हिचा विवाह सांगली येथील अवधूत कदम यांच्याशी झाला आहे. वृषाली आणि अवधूत या दाम्पत्याला २२ जानेवारी २०१७ रोजी कन्यारत्न झाले. त्या कन्येच्या बारशाचा कार्यक्रम नऊ मार्चला बागणी येथे होता. नातीच्या बारशाचा कार्यक्रम जोरदारपणे करताना हत्तीवरुन साखर वाटण्याचा निर्णय सुनील सुखटणकर यांनी घेतला. त्यासाठी हत्ती भाड्याने आणून गावातून साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वृषाली आणि अवधूत या दाम्पत्याच्या मुलीचे नाव ‘दुर्वा’ असे ठेवण्यात आले आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत हत्तीवरुन साखर वाटून केल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सुनील सुखटणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी महाराज रजपूत नव्हे मराठाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शिवाजी महाराज हे रजपूत नव्हते, तर मराठाच होते,’ अशी अभ्यासपूर्ण मांडणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आपल्या संशोधनपर ग्रंथात केली आहे. सबळ ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध केलेला त्यांच्या ‘श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता.१२) होणार आहे. यावेळी ‘शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध’ या पुस्तकांच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही होणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सांयकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पत्रकार ज्ञानेश महाराव व आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.

इतिहास संशोधक सावंत यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. शिवछत्रपती रजपूत होते की मराठा? याबाबतचा शोध या ग्रंथात घेतला आहे. आजपर्यंत शिवछत्रपतींच्या इतिहासात भोसले कूळ हे रजपूतवंशीय असल्याची मांडणी करण्यात येत होती. ही मांडणी अस्सल कागदपत्रांच्या आधारे नव्याने केलेल्या अभ्यासामुळे बाद ठरते. शिवछत्रपती स्वतःला मराठा म्हणूनच घेत होते. याची अभ्यासूपूर्ण मांडणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

सावंत म्हणाले, ‘साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांनी शिवछत्रपतींच्या भोसले कुलाचा वंशवृक्ष १८३७ मध्ये तयार करून घेतला होता. हा वंशवृक्ष राजर्षी शाहू महाराजांच्या आज्ञेने १९०५ मध्ये रावबहाद्दूर डोंगरे यांनी खासगी वितरणासाठी छापून घेतला होता. हा वंशवृक्ष अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शिवकालीन व त्यानंतरच्या मराठ्यांच्या इतिहासात कर्तृत्व गाजविणाऱ्या अनेक भोसल्यांची योग्य नावे व त्यांचे शिवछत्रपतींशी असणारे नातेसंबंध या वंशवृक्षातून उलगडण्यास मदत होणार आहे. सातारा व कोल्हापूर या दोन्ही गाद्यांवर छत्रपती म्हणून गादीवर बसलेले अनेक भोसले कुठल्या कुळातून दत्तक घेतले, याची माहिती वंशवृक्षातून मिळणार आहे. हा वंशवृक्ष शंभर वर्षांनी पुन्हा इतिहासप्रेमींसमोर या पुस्तकातून येत आहे. पुस्तकात शिवछत्रपतींची देश-विदेशातील संग्रहालयात असणारी दहा अस्सल चित्रे व ती आज कुठे आहेत याची माहितीही छापली आहे. तसेच पुस्तकात शहाजी महाराज, जिजाऊ, शिवाजी महाराज व त्यांच्या पुढील छत्रपतींच्या मुद्रा दिल्या आहेत.’

‘शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २८ ते ३० डिसेंबर १९२७ या काळात रायगड किल्ल्याला भेट दिली होती याची माहिती दिली आहे.

पुस्तक प्रकाशनाला मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, उद्योजक चंद्रकांत जाधव, वैभवराज भोसले, वसंतराव मुळीक उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला देविका पाटील, किरणसिंह चव्हाण, सुनील मुळीक, अवधूत पाटील, पवन निपाणीकर, गणेश नेर्लीकर, वैशाली महाडिक, सचिन तोडकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हैसाळ सुन्न... सुन्न!

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कोल्हापूर ः गावच्या कमानीच्या उजव्या खांबावरच ‘आई मला जन्म घेऊ दे,’ असा फलक वाचतच म्हैसाळ गावात पाऊल पडतं. लेक वाचवा अभियानाच्या प्रबोधनाला काळीमा फासणारा उद्योग मात्र या कमानीपासून अवघ्या शंभर पावलावर असलेल्या भारती हॉस्पिटलमध्ये राजरोस सुरू असतो. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे नावाच्या रूपाने गर्भातील लेकींचा गळा घोटणाऱ्या कसायाच्या दवाखान्यापासूनच खरे म्हैसाळ गाव सुरू होते. डॉ. खिद्रापुरेच्या दवाखान्यात जीव घेतलेल्या १९ स्त्रीभ्रूणांच्या मासांचे तुकडे ओढ्याकाठी पुरलेले सापडतात.

गावात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी ज्या भारती हॉस्पिटलसमोरूनच ये जा करत होतो त्या दवाखान्याकडे आता नजर वळताना किळस येते...लाज वाजते. नैतिक आणि अनैतिक असे कितीतरी गर्भ या इमारतीच्या तळघरात मारले गेले असतील याची कल्पना करून मन सुन्न होते...म्हैसाळ गावचे आहोत हे सांगण्याचीही शरम वाटते हे शब्द आहेत म्हैसाळ गावातील युवती आणि महिलांचे. या प्रकरणानंतर प्रत्येकजण आतून हलला आहे. काही बोलायाचे आहे...पण बोलणार नाही ही अवस्थाही दिसत आहे. अनपेक्षित घटनेने आलेले भेदरलेपण... दडपण आणि मौनातील अंगावर येणारी शांतता या वातावरणात म्हैसाळकरांचा एकेक दिवस सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या क्रूरकृत्याने म्हैसाळ गाव चर्चेत आल्यानंतर गेल्या पाच दिवसात गावात सुन्नपणा आला आहे. आसपासच्या गावातून गर्भवती महिला खिद्रापुरेच्या दवाखान्यात नव्या जीवाला जन्म देण्यासाठी नव्हे तर गर्भातील जीव मारण्यासाठी येत होत्या याचा विचार करून गावातील महिलांच्या मनातील हुंकार ओठावर येत आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवतींमध्ये या प्रकाराची प्रचंड चीड दिसत आहे. सुरेखा पाटील या साठीच्या गृहिणींना बोलतं केल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘खिद्रापुरे डॉक्टरच्या दवाखान्यात इतकी गर्दी का असते, या कोड्याचे उत्तर आता मिळाले. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना कँपसमध्येच गाठल्यानंतर या घटनेविषयी खूप काही बोलायचे असल्याची भावना त्यांना लपवता आली नाही. भारती हॉस्पिटलसमोरच्या दुकानांच्या पायरीवर बसलेल्या पंचविशीच्या तरूणांना या प्रकरणावरून छेडल्यानंतरही हाच आर्त भाव त्यांच्या बोलण्यातून आला. त्यातील एकजण म्हणाला, ‘पहिल्या मजल्यावर हॉस्पिटल आणि दुसऱ्या मजल्यावर घर एवढीच इमारत आहे, असे वाटत होते.’ खिद्रापुरेच्या हॉस्पिटलला तळघरही आहे हे हॉस्पिटलसमोरच्या दुकानचालकांनाही माहिती नाही. गावात असूनही डॉ. खिद्रापुरेने ओढ्याकाठी पुरलेल्या स्त्रीभ्रूणांची कल्पना नसल्याबद्दल म्हैसाळकरांच्या चेहऱ्यावरील आणि बोलण्यातील आश्चर्य त्यांच्यातील संताप दाखवत होते.

शाळांच्या भिंतीवर, चौकात स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनेचे निषेध करणारे फलक आहेत. ‘लेक वाचवा, लेक शिकवा,’ असे फलक आहेत. मात्र या फलकांसमोरून जाणाऱ्या मुली फलकावरील मजकूर वाचताना गलबलून जात आहेत. शाळेला जाणाऱ्या मुलींनाही डॉ. खिद्रापुरेच्या दवाखान्यात नेमके काय घडत होते हे समजत असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियाही अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. ​निकिता मगदूम नावाची चौथीतली मुलगी तिच्या आईला विचारते की, आपल्या गावातील डॉक्टरने मारलेल्या मुली कुणाच्या होत्या? या प्रश्नावर तिची आई निशब्द होते. उघड झालेल्या १९ स्त्रीभ्रूणहत्यांशिवाय आणखी किती कळ्या खुडणाऱ्या डॉ. खिद्रापुरेने मांडलेला गर्भाचा बाजार म्हैसाळ गावातच व्हावा, यासारखे दुर्दैव नाही, असे म्हणत म्हैसाळकराची चीड विकोपाला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण कारवाईत नगरसेवकांचा हस्तक्षेप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेत अतिक्रमण विरोधात जोरदार भाषण करायचे आणि प्रभागात अतिक्रमणाला पाठीशी घालण्याचा खटाटोप करायचा या नगरसेवकांच्या दुटप्पी भूमिकेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची मुजोरी वाढत चालली आहे. प्रमुख मार्ग, चौक आणि फूटपाथवर केबीनधारक आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढू लागले आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर ते महापालिकेचे पदाधिकारीही अनेकदा अतिक्रमण विरोधातील कारवाईत खोडा घालतात. त्यामुळे मोहीम कुचकामी ठरत आहे. काही ठिकाणी तर अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित अतिक्रमणधारक यांच्यातील संगनमतामुळे अनधिकृत बांधकाम, बेकायदेशीर टपऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

रस्ते विकास प्रकल्पांत शहरातील रस्ते प्रशस्त झाले. फूटपाथ तयार करण्यात आले. मात्र बहुतांश फूटपाथवर अतिक्रमण वाढू लागल्यामुळे फूटपाथ शोधायची वेळ आली आहे. दसरा चौक, महावीर कॉलेज परिसर, बिंदू चौक, ताराबाई रोड, आरटीओ ऑफिस, कसबा बावडा रोड, रंकाळा, सीबीएस परिसर, बागल चौक परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत केबिन थाटल्या आहेत. काही ठिकाणी केबिनसमोर शेड उभारले आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीर केबिनचा मुद्दा नेहमी सभागृहात गाजतो. मात्र विभागीय कार्यालय आणि अतिक्रमण निर्मूलन पथक प्रत्यक्ष कारवाई करू लागल्यावर नगरसेवकांचा थेट हस्पक्षेप होतो. त्यांच्या नातेवाईकांचाही कामकाजातील वाढता हस्पक्षेप कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

.............

नऊ फेब्रुवारीपासून मोहीम थंड

राज्य सरकारने फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी नऊ जानेवारी २०१७ रोजी नवी नियमावली महापालिकेला कळवली आहे. पुनर्वसनासाठी वीस सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण होणार आहे. महापालिकेने २०१३ ला फेरीवाल्यांचा सर्व्हे केला होता. महापालिकेकडील आकडेवारीनुसार ८४०० फेरीवाल्यांची नोंद आहे. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा भाग म्हणून बायामेट्रिक कार्ड पद्धत सुरु केली. ५४०० बायामेट्रिक कार्ड तयार आहेत. त्यापैकी ३५०० फेरीवाल्यांनी बायोमेट्रिक कार्ड नेले. आता सरकारच्या निर्णयानुसार नव्याने सर्व्हे होणार आहे. महापौर हसीना फरास, अन्य पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थायी समितीत झालेल्या बैठकीत सर्व्हे होईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करु नयेत, असे आदेश महापौरांनी दिले. नऊ फेब्रुवारीपासून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मोहीम थंडावली. त्याचा परिणाम म्हणून प्रमुख चौक आणि मार्गांवर अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे.

……………………

भार लि​पिकावर

​अतिक्रमण निर्मूलन पथकाकडे पुरेशे मनुष्यबळ नाही. पूर्णवेळ अधिकारी नाही. घरफाळा विभागाचा कार्यभार सध्या कनिष्ठ अधिकारी पंडित पोवार यांच्याकडे आहे. या पदावर सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक आवश्यक आहे. अतिक्रमण कारवाईवेळी कर्मचाऱ्यांना संबंधितांच्या रोषाला सामोरे जावे लागते. वरिष्ठ अधिकारी कारवाईदरम्यान फिरकत नाहीत, जबाबदारी स्वीकारत नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांना कारवाईदरम्यान अडचणी निर्माण होतात. उपायुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी कारवाईवेळी हजेरी लावली तर मोहीम अधिक प्रभावी होईल.


सर्वपक्षीय नेत्यांचा वरदहस्त

फेरीवाल्यांच्या संघटनांवर राजकीय नेत्यांचा वरचष्मा आहे. राजकीय पदाधिकारी, नगरसेवकांच्या वरदहस्तामुळे ठिकठिकाणी केबिन, दुकानासमोर अनधिकृत शेड उभारल्या जातात. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांची, शिवाजी चौक परिसरात महापालिकेतील एका माजी पदाधिकाऱ्याची, म़ह़ाव्दार रोड, बिंदू चौक परिसर, ताराबाई रोड, जोतिबा रोड परिसरात भाजपला जवळ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाजवळील खाऊ गल्लीत महापालिकेतील विद्यमान पदा​​धिकाऱ्याच्या चिरंजीवाची चलती आहे. महावीर गार्डन परिसरात केबिन कुणाच्या हे नियमानुसार नव्हे तर लोकप्रतिनिधीच्या मनावर ठरत आहे. सानेगुरुजी वसाहत, राजारामपुरी जनता बझार येथेही नगरसेवकांचा हस्तक्षेप असतो. मर्जीतील कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी या मंडळीकडून अनेकदा नियमांना फाटा दिला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद सत्तेसाठी आवश्यक संख्याबळापेक्षा अधिक सदस्य आमच्याकडे आहेत. आमचे आणि मित्रपक्षाचे मिळून ४० सदस्य आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होईल. केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे, असा पुनरुच्चार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड २१ रोजी होणार आहे. निवडीची तारीख जवळ येत असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, ‌भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप मोर्चेबांधणी करीत आहे. शिवसेना कुणासोबत जाणार हे अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. त्यासंबंधी प्राथमिक चर्चा करण्यासाठी आज (रविवारी) जिल्ह्यातील सेना आमदारांची बैठक होणार आहे.

संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, सेनेचे आमदार, प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार आहेत. त्यानंतर सेना आमदारांचे शिष्टमंडळ शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

भाजप शिवसेनेला गृहीत धरून सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा करीत आहे. शिवसेना मात्र आपला निर्णय लांबवत आहे. त्यामुळे उत्सुकता वाढत जात आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री पाटील यांनी आमच्याकडे ४० सदस्य आहेत. सत्ता आमचीच येणार असल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या बाजूला ‌शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी जोरदार प्रयत्न करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किरवले हत्येप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येने सामाजिक आणि वैचारिक चळवळीची हानी झाली आहे. या प्रकरणाची सर्वस्तरावरुन सखोल चौकशी करणार असून त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल. तसेच या प्रकरणामध्ये सरकारतर्फे चांगला वकीलही देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांनी डॉ. किरवले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच डॉ. किरवले यांच्या पत्नी श्रीमती कल्पना किरवले यांना सरकारच्यावतीने देण्यात येणारा चार लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेशही देण्यात आला. पोलिस पुरावे गोळा करत त्यांच्या जवळच्या लोकांनी तपास जलदगतीने होण्यासाठी पुरावे पोलिसांकडे द्यावेत, असे आावहन पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटांसाठी तालुक्यात विक्री केंद्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिला बचत गटांना सुलभ कर्जे तसेच विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी तालुका पातळीवर विक्री केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली. रंकाळा तलावासमोरील खराडे कॉलेज कॅम्पसमध्ये पाच दिवस आयोजित ताराराणी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.‌

जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढाकाराने महोत्सवाचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील होत्या. महापौर हसीना फरास यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, ‘अनुदान, कर्जमाफी ज्या-त्या वेळी आवश्यक असते; पण श्रमातून पैसे मिळवल्यानंतर प्रतिष्ठा मिळते. आता महिलाही बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने विविध उद्योग करीत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे. महोत्सवातून महिलांना प्रोत्साहन मिळेल. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी महोत्सवाचे नेटके नियोजन केले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे अॅप तयार केले असून, या अॅपमुळे जिल्हा परिषद मोबाइलवरूनही पाहता येईल.’

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘महिला बचत गटांनी दर्जेदार माल उत्पादित करून बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण करावी. भागीरथी महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध मालाचे उत्पादन करून ऑनलाइन मार्केटिंग केले जात आहे.’

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, डॉ. एच. टी. जगताप, लीड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श‌शिकांत किणिंगे, माजी महापौर सई खराडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लाइट अँड साउंड शो’ हवेतच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिराला भेट देणारे भाविक-पर्यटक ऐतिहासिक भवानी मंडपाला भेट देतात. त्यामुळे हा परिसर सुशोभित करण्याबरोबरच येथे ‘लाइट अँड साउंड शो’ प्रकल्प सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच ते जाहीर केले होते. मात्र, या प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेला काहीच माहिती नसल्याने ही घोषणा हवेतच राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी व पर्यटकांना परिसरातील वास्तूंचा इतिहास माहीत व्हावा, या उद्देशाने पावनखिंड, पन्हाळा किल्ला व भवानी मंडप येथे लाइट अॅँड साऊंड शोची घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली होती. पावनखिंड व पन्हाळा येथील शोसाठी पन्हाळा नगरपालिका, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र भवानी मंडपातील लाइट अँड साउंड शोबाबत अद्याप काहीच पावले उचलली नाहीत.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन मंडळाशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेने अद्याप प्रस्ताव पाठवला नसल्याचे सांगितले. तर महापालिका वार्षिक अंदाजपत्रकात गुंतली असल्याने या प्रकल्पाचा अहवालच तयार केलेला नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांची घोषणा हवेतच विरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्वीच्या फरास खान्याच्या इमारतीला जोडून हेरिटेज लूक असलेली दर्शन मंडपाची इमारत उभाण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यातील ७२ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. दर्शन मंडप झाल्यावर भवानी मंडपात येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी लाइट अँड साउंड शो सुरू करण्याचा करण्याचा विचार पालकमंत्री पाटील बोलून दाखवला होता. तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र प्रस्तावाची चांगली कल्पना असला तरी महापालिकेकडून त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सागर चौगलेच्या मुलीच्या नावे ५ लाखाची ठेव ठेवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीवेळी ‘अग्निदिव्य’ नाटकाच्या प्रयोगावेही रंगमंचावर ह्दयविकाराचा झटका येवून अभिनेता सागर चौगले याचा झालेला मृत्यू चटका लावणारा आहे. सागरच्या जाण्याने कुटुंबावर जो आघात झाला आहे त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. सागर यांची दहा महिन्याच्या नारायणी या मुलीच्या नावे ५ लाखाची ठेव रक्कम ठेवण्यात येईल, त्यासाठीचा निधी काही संस्था निधी उभा करत असून उर्वरित रक्कम आम्ही देऊ, असे सांगून सागरच्या पत्नी वनिता यांना सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसे जिल्ह्यातील कलाकारांची यादी तयार करुन त्यांना विविध विमा योजनेतून संरक्षण देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सागरच्या घरी पालकमंत्री पाटील यांनी भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन केले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, सागर चौगले यांच्या आई शालिनी चौगले आणि पत्नी वनिता उपस्थित होत्या. यावेळी अभिनेता सागर चौगले यांच्या वारसाना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे सांगून शासकीय व अशासकीय अशा दोन्ही पातळ्यांवर आवश्यक ती मदत करु, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी सागरच्या कुटुबीयांना दिली. जिल्ह्यात विविध पातळ्यांवर अभिनयाच्या क्षेत्रात ३ ते ४ हजार कलाकार काम करतात. त्यांची विविध संघटनांच्या माध्यमातून यादी तयार करण्यात येईल व त्यांच्या नावे ४५०० रुपयांची ठेव ठेवून त्या रक्कमेच्या येणाऱ्या व्याजातून जीवन ज्योती विमा योजना, जीवन सुरक्षा विमा योजना आणि अटल पेंशन योजनेची खाती उघडून त्यांना संरक्षण देण्यात येईल. या माध्यमातून या कलाकारांना विमा सुरक्षा कवच मिळेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ लाखांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गजबजलेल्या ताराबाई रोडवरील सराफी दुकान फोडून चोरट्यांनी १५ लाख रुपये किमतीचे सोने आणि रोख १३ लाख असा २८ लाखांचा ऐवज लंपास केला. तटाकडील तालीम चौकात ही घटना घडली. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, चोरटे तोंडावर मास्क, हँड ग्लोव्हज घालून आल्याचे दिसत आहे. शिवाय त्यांनी रेकी करुन नियोजनबद्ध चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सराफी व्यावसायिक किरण हिरोसो झाड (वय ५०, रा. पिनाक अपार्टमेंट रंकाळा टॉवर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.

तटाकडील तालीम चौकात झाड यांचे दोन मजली इमारतीत सराफी दुकान आहे. पहिल्या मजल्यावर सोन्याचे मणी बनवणारा कारखाना असून, तिथे सात कामगार काम करतात. पहिल्या मजल्यावर शोरुम आणि ऑफिस आहे. तर तिसऱ्या मजल्यावर ऑफिस वर्क असते. सकाळी नऊ ते रात्री साडेआठपर्यंत दुकान आणि कारखाना सुरु असतो. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता त्यांचा पुतण्या रोहन झाड दुकानात झोपायला येतो.

शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रोहन दुकानात झोपायला आला असता त्याला तळमजल्यावरील पहिल्या खोलीतील दाराला कुलूप नसल्याचे दिसून आले. आतून कुणीतरी दरवाजा लावला असल्याचे त्याला दिसले. त्यांना हाका मारल्या. पण, आतून प्रतिसाद न दिल्याने तो इमारतीशेजारील संजय मिस्कीन यांच्या इमारतीच्या टेरेसवर गेला. टेरेसवरुन त्याला दुकानाच्या इमरातीतील पहिल्या मजल्यावरील शोरुमची काच फोडल्याचे लक्षात आले. त्याने चुलते किरण व चुलत भाऊ पियूषला बोलावून घेतले. त्यानंतर दरवाजा उघडून प्रवेश केला असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्याद दिली. पोलिस रात्री दीड वाजता दुकानात आले. पण मालक किरण झाड हे गोव्यात असल्याने चोरीची किती रक्कम हे स्पष्ट होत नव्हते. ते शनिवारी सकाळी गोव्याहून कोल्हापुरात परतले. त्यांनी दुकानात पाहिले असता पंधरा लाख किमतीच्या साडेतीनशे ग्रॅमच्या सोन्याच्या लगडी, कच्चे मणी, मण्याचे नक्षीकाम करताना राहिलेले ३०० ग्रॅम वजनाचे सोने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. रोख १३ लाख रुपयेही चोरट्यांनी कपाट्याच्या लॉकरमधून चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही व परिसरातील दहा सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन चोरट्यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले.

सीसीटीव्हीत दोन चोरटे

सीसीटीव्हीमध्ये रात्री साडेनऊ वाजल्यापासून ताराबाई रोडवरुन मास्क घातलेले २० ते २५ वयाचे दोन चोरटे दुकानापासून फिरत होते. नऊ वाजून चाळीस मिनिटांनी चोरट्यांनी शोरुमकडून जाणारा रस्तावरचा दरवाजा उघडला. त्यानंतर पहिल्या खोलीतील दरवाजाचे कुलूप तोडून खिशात घातले. पहिल्या मजल्यावर शोरुमची काच फोडून ड्रॉवरमधील सोन्याचे दागिने खिशात घातले. ड्रावरमध्ये किल्ल्यांचा जुडगा सापडला. शोरुममधून शेजारील ऑफिसमध्ये प्रवेश केला. ते‌थील तीनही कपाटे उघडली. त्यांनी सोन्याचे दागिने, नोटाची बंडले पिशवीत घातली. एक सीसीटीव्ही फोडला तर दुसरा वाकवला. चोरी करुन दुकानाच्या मागील दाराने ते पळून गेले.

मोटारसायकलस्वार व रिक्षाचालकाची रेकी

दोन चोरटे जाण्यापूर्वी सराफी दुकानासमोर एक व्यक्ती मोटारसायकलवरुन दुकानाची व रस्त्यांवर टेहाळणी करत होते. चोरटे आत शिरल्यावर दुकानाच्या दारात एक रिक्षा थांबली. रिक्षाचालक मोटासायकलस्वाराजवळ रस्ता ओलांडून चालत गेला. पंधरा ते वीस मिनिटे ते बोलत होते. त्यानंतर रिक्षाचालक परत रिक्षाकडे परतला. त्याने रिक्षा दुकानाच्या मागच्या बोळात नेली. त्यानंतर रिक्षा परत ताराबाई रोडवरुन अंबाबाई मंदिराकडे गेली. रिक्षा गेल्यानंतर मोटारसायकवरुन रेकी करणारी व्यक्तीही निघून गेली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. तर चोरटे रिक्षातून पळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images