Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अपघातात पिता-पुत्र जागीच ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर स्कूल बस अंगावरून गेल्याने श्रीपती महादेव गोळे (वय ६०) व पंडित श्रीपती गोळे (३५, रा. केर्ले, ता. करवीर) हे पिता-पुत्र जागीच ठार झाले. गोळे पिता-पुत्र शेतकरी असून, ते काकडी विक्रीसाठी मोटारसायकलवरून कोल्हापूर शहराकडे येत असताना सकाळी नऊच्या सुमारास अपघात झाला. संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

याबाबत माहिती अशी ः गोळे पिता-पुत्र मोटारसायकलवरून काकडी विक्रीसाठी कोल्हापूरकडे येत होते. त्यांच्या पुढे सुभाष कृष्णात पाटील (२८, रा. आळवे, ता. पन्हाळा) हे मोटारसायकलवर फुलाचे पोते बांधून शहराकडे चालले होते. त्यांना ओव्हरटेक करत असताना गोळेंच्या मोटारसायकलची धडक पाटील यांच्या मोटारसायकलला बसल्याने पाटील रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले, तर गोळे पिता-पुत्र रस्त्याच्या मध्ये पडले. यावेळी पन्हाळ्याकडे वेगाने निघालेली संजीवन विद्यानिकेतची बस गोळे पिता-पुत्रांच्या अंगावरून गेली. अपघातातील दृश्य भयानक होते. रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला होता, तर दोघांच्याही डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. दरम्यान, अपघातामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात रुतली. बसमध्ये इंजिनीअरिंगचे ४५ विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसने कॉलेजला पाठविण्यात आले.

दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच केर्ले, केर्ली, रजपूतवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते. त्यांनी बसवर दगडफेक करून तीव्र संताप व्यक्त केला. दोन्ही मृतदेह रस्त्यावर पडून राहिल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अर्धा तासानंतर करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव पोलिसांसह घटनास्थळी आले. मृतदेह रुग्ण​वाहिकेतून सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. रस्त्यावर सांडलेल्या रक्तावर माती टाकून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. अपघाताचे वृत्त कळाल्यानंतर गोळे यांच्या नातेवाइकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. आमदार चंद्रदीप नरके यांनी सीपीआर भेट देऊन गोळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. आंबेडकर मानवमुक्तीचे पुरस्कर्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘लोकशाही स्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका मांडली. राज्यघटनेच्या निर्मितीतून त्यांनी जगाला मानवमुक्तीचा संदेश दिला. डॉ. आंबेडकर कोणत्याही जातीसमूहाचे प्रतिनिधी नव्हते,’ असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि कवी अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केले. डॉ. एस. एस. धाकतोडे लिखित ‘थॉमस जेफरसन आणि डॉ. आंबेडकर,’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव रुपेश तामगावकर होते.

शाहू स्मारक भवनच्या मिनी सभागृहात ज्येष्ठ कॉम्रेड नेते अतुल दिघे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.

जेफरसन यांनी स्वातंत्र्यासंबंधी स्वतंत्र विचार मांडले तर डॉ. आंबेडकरांनी घटना लिहिली, असे सांगून डांगळे म्हणाले, ‘ज्यावेळी जाती व धर्मावर आधारित संघटना निर्माण होत होत्या त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेसारखी जातीविरहीत संघटना स्थापन केली. पुढे याच चळवळीच्या माध्यमातून त्यांनी लोकशाहीला पोषक अशी परिवर्तनाची चळवळ हाती घेतली. यातूनच राज्यघटनेची निर्मिती झाली. परिवर्तनच्या चळवळी सुरुवात होऊन ७० वर्षाचा काळ लोटला असला तरी डॉ. दाभोलकर, पानसरे व कुलबर्गींसारख्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांवर हल्ला करुन समता, बंधुता या मूल्यांवर श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण केला जात आहे. हेच लोकशाहीला धोकादायक आहे.

दिघे म्हणाले, ‘ज्या समाजावर हजारो वर्षाच्या परंपरेचा पगडा आणि बोजा होता अशांना घटनेच्या माध्यमातून मार्ग दाखवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. सध्या अमेरिकेत होणारे वर्णद्वेषी हल्ले आणि भारतामध्ये दाढी आणि टोपीवाल्यांना अतिरेकी संबोधले जाणे ही लोकशाहीवरील हल्ल्याचीच उदाहरणे आहेत.’

लेखक डॉ. धाकतोड व तामगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाशन समारंभास एस. पी. दीक्षित, दिगंबर सकट, संजय गुदगे, किरण गवळी, श्याम पाखरे, सुनील गायकवाड, अर्जुन कांबळे, सुभाष कापसे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक महेश भारतीय यांनी केले. जितेंद्र कोलप यांनी सूत्रसंचालन केले. अमोल वेटम यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरपत्नींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; आमदार परिचारक गोत्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील जिल्हा परिषद प्रचाराच्या सभेत भाजपचे सहयोगी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांबाबत बेताल वक्तव्य केले. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून त्यांनी तातडीने माफी मागून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. माजी सैनिकांनी मात्र परिचारक यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कायम ठेवली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमदार परिचारक यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन करून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला.

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे झालेल्या सभेत जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेत परिचारक यांनी सीमेवरील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अतिशय निंदनीय आणि संतापजनक विधान केले होते. त्यानंतर सोशल मीडियात परिचारक यांच्या भाषणाची क्लिप व्हायरल झाली होती. एक दिवस आपला फोन बंद करून बसलेल्या परिचारिकांना माध्यमांनी रविवारी गाठले. ‘हे विधान केले ही माझ्याकडून मोठी चूक झाली. याबद्दल सर्व जवान बांधव आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागितली,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. समाजाच्या सर्व स्तरांतून परिचारक यांच्या या विधानाचा जोरदार निषेध करण्यात आला.

परिचारकांची माफी नको, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त माजी सैनिकांनी कायम ठेवली आहे. जर राजीनामा दिला नाही तर पंढरपूर परिसरात फिरू देणार नाही, असा असा इशारा माजी सैनिकांनी दिला आहे. ‘आधी गुन्हा करायचा आणि मग माफी मागायची हे जवान कधीच खपवून घेणार नाहीत. जवान हा अपमानदेखील सहन करणार नाहीत,’ अशा संतप्त प्रतिक्रिया पंढरपूर तालुक्यातील माजी सैनिकांनी व्यक्त केल्या.

या प्रवृत्तीला ठेचा!

भारतीय जवानांच्या कुटुंबियांविषयी लज्जास्पद विधान करून घोर अपमान करणाºया भाजप समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांचा काँग्रेस पक्षातर्फे तीव्र निषेध, अशा विचारसरणीला वेळीच ठेचण्याची गरज - प्रणिती शिंदे

विषय संपला!

'परिचारक यांनी त्याच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळं हा विषय संपला आहे,' अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर झेडपीसाठी चुरशीने मतदान

$
0
0

सोलापूर झेडपीसाठी चुरशीने मतदान

पंढरपूर

सोलापूर जिल्हा परिषदेसाठी मंगळवारी ७० टक्के भरघोस मतदान झाले. या मतदानाचा फायदा पुन्हा एकदा सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रचाराच्या सुरुवातीपासून शिवसेना आणि भाजपात काडीमोड झाल्यानंतर विरोधक एकत्र येऊच शकले नाहीत. त्याचा फायदा अनेक ठिकाणी एकत्रित सामोऱ्या गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाला आहे. माळशिरस, माढा, सांगोला, मंगळवेढा, बार्शी अशा अनेक भागांत राष्ट्रवादीला फायदा मिळाल्याचे मतदानावरून समोर येत आहे.

सकाळपासून मतदान केंद्रे ओस पडल्याने उमेदवारांच्या चिंता वाढू लागल्या होत्या, मात्र सकाळची शेतातली कामे उरकून दुपारी मतदार बाहेर पडले आणि भराभर मतदानाची टक्केवारी वाढू लागली. दुपारी साडेतीनपर्यंत हा टक्का ५० च्या पुढे गेल्यावर मात्र उमेदवार सुखावले. काही ठिकाणी मतदान यंत्राच्या बिघाडामुळे थोडावेळ गोंधळ दिसून आला. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात देखील अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. सैनिकांबाबत वादग्रस्त विधान करणारे आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मंगळवेढ्यात मतदान यंत्रात बिघाड

मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथील मतदान केंद्रावरील मशीनमध्ये भाजप उमेदवारा समोरील बटन दाबताच दुसऱ्याच उमेदवारापुढील दिवा लागत असल्याचे निदर्शनास येताच येथील मतदान थांबविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षक या दोघांनीही या केंद्राला भेट दिली. त्यांना संतप्त मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मतदान यंत्र बदलून मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील यंत्र सकाळी बंद पडल्याने मतदारांना ताटकळत थांबावे लागले होते.

घड्याळावर लावला चुना

माळशिरस तालुक्यातील वेळापूर जिल्हा परिषदेच्या विझोरी केंद्रावर मतदान यंत्राशी छेडछाड झाली. अज्ञात मतदाराने सर्वच मशीनवरील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर चुना लावल्याने मतदारांना चिन्हच दिसत नव्हते. याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली. या बाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे तेरा कार्यकर्ते ताब्यात

माळशिरस तालुक्यातील वेळापूर जवळ मंगळवारी पहाटे पैसे आणि मतदारांच्या याद्या घेऊन जाणाऱ्या गाडीला पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडीतून ६७१०० रुपये आणि मतदारयादी जप्त करण्यात आली. या प्रकरणी १३ जणांना ताब्यात घेतले असून, हे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात आले.

सोलापुरात दुपारनंतर
मतदानाला वेग


सोलापूर
सोलापूर महानगरपालिकेसाठी मंगळवारी चुरशीने मतदान झाले. पालिकेच्या १०२ जागांसाठी ६२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, एमआयएम, बसपासह छोटे-मोठे पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.रविवार १९ फेब्रुवारी रोजी प्रचाराचा धुराळा संपल्यानंतर सोमवारी कोणताही प्रचार न करता उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. रात्री अनेकांना लक्ष्मी दर्शनही झाल्याचे सांगण्यात आले. मंगळवारचा मतदानाचा दिवस उजाडला. उमेदवारांनी सकाळी लवकर उठून कुलदैवताचे दर्शन घेतले आणि घराबाहेर पडले. आपापल्या भागातील मतदान केंद्रांवर चौघांनी एकत्र जाऊन भेटी दिल्या. प्रभागाचा परिसर लांबच लांब असल्याने आणि एकत्र फिरणे शक्य नसल्याने उमेदवारांनी भाग वाटून घेतला. सकाळी दमानी नगर, देगाव, निराळे वस्ती, कल्पना टॉकीज, पत्रा तालीम, मंगळवेढा तालीम यासह बापूजी नगर, लोधी गल्ली, शास्त्री नगर, नई जिंदगी, कुमठा नाका, विमानतळ या भागात फेरफटका मारला असता मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा दिसून आल्या. उमेदवार प्रत्येक मतदान केंद्रांवर फिरताना दिसून येत होते. एमआयएमचे उमेदवार तौफिक शेख आणि राष्ट्रवादीचे उमेदवार माजी उपमहापौर हारुन सैय्यद यांच्यात दोन दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाल्यानंतर मातदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नई जिंदगी अमन चौकात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नई जिंदगीमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी यांच्यात तसेच काही ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत होत असल्याने या भागात प्रत्येक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. हा भाग मुस्लिम बहुल असल्याने पुरुषांबरोबर महिलाही मतदानासाठी बाहेर पडल्या होत्या. या परिसरात प्रमुख रस्ते आणि गल्लोगल्ली कार्यकर्ते टेबल टाकून मतदारांना माहिती देण्यासाठी बसले होते. पोलिसांची गाडी फिरत असल्याने कोणीही गोंधळ करण्याचे धाडस दाखवले नाही. पोलिसांनी या भागाला वेढाच टाकला होता. बापूजी नगर हा कामगारवर्गाचा भाग असला तरी सुद्धा विडी कामगार महिलांनी मतदानासाठी गर्दी केली होती. लोधी गल्ली परिसरातील एक मतदान केंद्र भर रस्त्यावरच असल्याने मतदारांची रांगही रस्त्यावर आली होती. कायम हा भाग वर्दळीचा असल्याने आणि त्यातच मतदान असल्याने परिसर गर्दीने अधिकच फुलून गेला होता. कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे रस्त्यावर गर्दीने उभे होते. संवेदनशील भाग म्हणून घोषित केलेल्या प्रभाग क्रमांक सात पत्रा तालीम आणि मंगळवेढा तालीम परिसरात जणू अघोषित संचारबंदीच लागू असल्याचे चित्र होते. या भागातील मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू होते. या शिवाय याच प्रभागातील निराळे वस्ती परिसरातील शरदचंद्र पवार प्रशाला येथे असलेल्या एकूण आठ मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. उमेदवार नगरसेवक मनोहर सपाटे, नगरसेवक देवेंद्र कोठे, अमोल शिंदे, पद्माकर काळे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते गटागटाने मतदान केंद्राबाहेर थांबून मतदारांना आवाहन करताना दिसून आले. सकाळपासून या मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली. अश्विनी रुग्णालयाजवळील मतदान केंद्राबाहेर मैदानात गर्दी दिसून आली. या ठिकाणी मतदार कमी आणि कार्यकर्ते जास्त अशी परिस्थिती दिसून आली. शिवसेना नगरसेवक म्हेत्रे यांच्या घराजवळील मतदान केंद्रावर प्रथम मतदानासाठी आलेल्या तरुणींमध्ये उत्साह दिसून आला. सोशल हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मतदानासाठी उशीर लागत असल्याने महिलांना बसण्यासाठी बाकडे टाकण्यात आले होते. एकूणच शहराच्या काही भागात सकाळच्या सत्रात मतदानासाठी रांगा, दुपारी संथ तर शेवटच्या सत्रात मतदानासाठी जोर आल्याचे दिसून आले.महापौरांना हटकलेमहापौर प्रा. सुशीला आबुटे आयटीआय मतदान केंद्राच्या परिसरात सातत्याने फिरत होत्या. त्यामुळे पोलिस निरीक्षक अंकुशराव यांनी त्यांना हटकले. आपण केंद्राच्या परिसरात न फिरता बाहेर जावे, असे पोलिसांनी त्यांना सांगताच महापौर बाहेर पडल्या. याच केंद्रांवर सकाळची माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला होता.वृद्धांमध्ये मतदानासाठी उत्साहमतदानासाठी ज्येष्ठ आणि वृद्ध मंडळींनी हिरीरीने सहभाग नोदविला. नई जिंदगी, अश्विनी रुग्णालय परिसरासह अन्य ठिकाणी ही मंडळी आपली मुले, नातवांसमवेत रिक्षामधून, दुचाकीवरून आली होती. एका अपंग मतदाराने व्हिल-चेअरचा आधार घेऊन मतदानाचा हक्क बजावला. कोणी काटी टेकत, कोणी दुचाकीवर तर कोणी आपल्या नातेवाईकांसमवेत मतदानासाठी आले. सकाळच्या सत्रात ज्येष्ठ आणि वृद्ध मंडळी मतदानासाठी बाहेर पडली. परंतु, तरुणाई मतदानासाठी फारशी दिसून आली नाही.मतदान करताना तारेवरची करावी लागली कसरतमतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही जणांनी मतदान करण्यासाठी केंद्र गाठले खरे परंतु, मतदान यंत्रासमोर गेल्यानंतर अनेकांची अडचण होऊन बसली. मतदान यंत्रावरील बटन दाबले असतानाही आवाज येत नसल्याने मतदार गोंधळून गेल्याचे दिसून आले. अखेर केंद्रातील अधिकाऱ्यांना लांबून मदत करावी लागली. ज्यांना उमेदवारांचे नाव वाचता आले नाही त्यांनी तर दिसेल त्या बटनावर बोट दाबून मतदान केल्याचे समाधान मानले. काही मतदान केंद्रांवर चार तर काही मतदान केंद्रांवर तीन मशीन ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतदार गोंधळल्याचे दिसून आले त्यामुळे क्रॉस मतदानाची भिती व्यक्त करण्यात येत आहे.दिग्गजांनी केले रांगेतून मतदानमाजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पत्नी उज्वलाताई शिंदे, कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आयटीआय केंद्रावर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आई, मुलगा उमेदवार डॉ. किरण देशमुख आणि सुनबाई यांच्यासमवेत नुमवी प्रशाला येथे मतदानाचा हक्क बजावला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्नी स्मिता यांच्यासह लिटिल फ्लॉवर हायस्कूल, माजी आमदार नरसय्या आडम यांनी बापूजी नगर येथे पत्नी कामिनी, कन्या आणि चिरंजीवासह मतदानाचा हक्क बजावला. या शिवाय महापौर सुशीला आबूटे यांनीही मतदानाचा हक्क बजावून प्रभागात फेरी मारली. एकूणच दुपारपर्यंत शांततेत मतदान पार पडले.मतदान केंद्रातवृद्धाचा मृत्यूसोलापूर :सोलापूर महानगरपालिकेसाठी मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जाताना पार्टेक फरशीवरून घसरून पडल्याने गंगाधर आण्णाराव शेटे (वय ७५) यांचे निधन झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ग. ल. कुलकर्णी शाळेतील मतदान केंद्रात घडली.गंगाधर शेटे सिध्देश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी होते. मुलासमवेत ते मतदान करण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली. खाली पडल्यानंतर शेटे यांना तातडीने पोलिसांच्या मदतीने अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.भाजप उमेदवाराला चोपप्रभाग क्रमांक २५ येथे भाजपचे उमेदवार सुभाष शेजवाल यांना स्लिप वाटप करताना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र काहीकाळानंतर तो निवळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर झेडपी राष्ट्रवादीकडे, भाजपची मुसंडी

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ता राखताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची दमछाक झाली. आता राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शेकापच्या कुबड्या घेऊन काठावरच्या बहुमतावर पाच वर्षे कारभार करावा लागणार आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून एकट्याच्या जीवावर सोलापूर जिल्हा परिषदेच्या सत्ता आणणाऱ्या राष्ट्रवादीला यंदा केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे ७ आणि शेकापचे ३ यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापनेसाठीचा ३५चा जादुई आकडा गाठता येणार नाही. गेल्यावेळी एकही जागा नसलेल्या भाजपने सोलापूर जिल्हा परिषदेत जोरदार मुसंडी मारीत आपल्या मित्रांसह १९ जागा मिळविल्या. शिवसेनेने आपल्या मित्रांसह दहा जागांचा टप्पा गाठला. पक्षीय बलाबल राष्ट्रवादी आघाडीला सत्ता मिळवून देणारे दिसत असले तरी राष्ट्रवादीतील मोहिते पाटील आणि बबन शिंदे यांच्यातील गटबाजीतच अध्यक्षपदावरून एकमत न झाल्यास भाजप आघाडीला अलगत सोलापूर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या मिळणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सध्या विरोधात असलेले आणि बबन शिंदे यांचे भाऊ संजय शिंदे मोठे दावेदार मानले जात असून, यास मोहिते पाटील गटाचा विरोध असल्याने आजची आकडेवारी अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत उलटी पलटी झालेली दिसणार आहे. याची सुरुवात आजच्या निकालापासूनच सुरू झाली असून, संजय शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी जुळवाजुळविला सुरुवात केली आहे. या नवस फार विरोध झाल्यास आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचे नाव पुढे करण्याची तयारी आताच सुरू झाली आहे.


राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरस आणि माढा तालुक्यात पक्षाने भरघोस यश मिळविले असून, मोहिते-पाटील यांनी ११ पैकी ८ तर आमदार बबनदादा शिंदे यांनी सर्व सात जागांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांच्या घराणेशाहीबाबत आरोप होऊनही मोहिते पाटील यांच्या घरातील सर्व चार आणि शिंदे यांच्या घरातील देखील सर्व चारही उमेदवारांना जनतेने भरघोस मताने विजयी केले आहे. मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीला महाडिकांच्या भीमा परिवाराने आव्हान देत निम्म्या जागा पटकावला आहेत. माळशिरस पंचायत समितीवर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीची सत्ता आणली आहे. माढा पंचायत समितीमधील सर्व १४ जागा राष्ट्रवादी जिंकून एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे माढा पंचायत समितीमध्ये आता विरोधकच असणार नाही.

सांगोल्यात शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी ७ पैकी ५ जागा जिंकत शिवसेनेला रोखले आहे . सांगोला पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांनी १४ पैकी १२ जागा जिंकत आपली सत्ता अबाधित ठेवली आहे . करमाळ्यात मात्र शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी आपल्या झंझावातात राष्ट्रवादीचे पानिपत करून ५ पैकी ४ जागी जिंकल्या आहेत. करमाळा पंचायत समितीवर देखील आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली १० पैकी ८ जागा जिंकत भगवा फडकला आहे.

पंढरपूरमध्ये झेडपीच्या ८ पैकी ७ जागा जिंकत कार्यकर्त्यांनी पुन्हा परिचारकांवर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ यांचा कासेगाव गटातून निसटता पराभव झाल्याने येथे एकही जागा न मिळाल्याची नामुष्की भालकेंवर आली. पंढरपूर पंचायत समितीवर देखील भाजपाची सत्ता आली असून १६ पैकी १२ जागांवर भाजपाला भरघोस यश मिळाले आहे.

बार्शी तालुक्यातील सेनेच्या राजा राऊत यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील मतदान फारच चुरशीची झाले होते. मात्र राऊत यांनी बार्शीतून भाजपच्या तीन जागा जिंकत पंचायत समितीवर भाजपची सत्ता आणली. अक्कलकोटमध्ये लढतीत काँग्रेसने सहापैकी तीन जागा पटकाविल्या, मात्र, पंचायत समितीमध्ये काँग्रेस सहा भाजप चार आणि अपक्षांना दोन जागा मिळाल्याने सत्तेसाठी घोडेबाजार वाढणार आहे. मंगळवेढ्यात काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके आणि भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक याना मतदारांनी जोरदार दणका देत शिवसेना पुरस्कृत समाधान आवताडे गटाला चार पैकी तीन जागी विजयी केले आहे. मंगळवेढा पंचायत समितीवर देखील आवताडे यांच्या आघाडीला आठपैकी पाच जागी विजय मिळाल्याने दामाजी साखर कारखान्या पाठोपाठ आवताडे यांची पंचायत समितीवर देखील सत्ता आली आहे.

...........

सोलापूर जिल्हा परिषद ( एकूण जागा ६८ )

राष्ट्रवादी- २५

भाजप+आघाड्या-१९

शिवसेना - +आघाड्या-१०

शेकाप-३

भीमा परिवार-३

कॉँग्रेस-७

अपक्ष-१


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सोलापुरात शिवसेनाविरोधी बाकांवर, जिल्हाप्रमुखांची घोषणा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा न देता विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी ही भूमिका जाहीर केली.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व २१ नगरसेवकांचा सत्कार जुनी मिल कंपाउंड येथील शिवसेना भवनात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कोठे यांनी सत्तेत सहभागी न होता विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे सांगितले.

सोलापुरात भाजप ४९ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष झाला आहे. सभागृात बहुमतासाठी ५२ सदस्यांची गरज आहे.भाजपाला केवळ ३ जागा लागणार असून, राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या शिवाय बसपसुद्धा भाजपबरोबर जाण्यास तयार असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला कोणतीही अडचण नाही. मुंबईतही सेनेने स्वतंत्र सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केल्याने सोलापुरात आपणास भाजप सत्तेत सोबत घेणार नसल्याचे समजताच सेनेने आता विरोधी पक्ष म्हणून कामाची तयारी केली आहे.

सेना विरोधी पक्ष म्हणून काम करणार असेल तर भाजपाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. भाजपत बरेचसे नवीन चेहरे आल्याने आणि महेश कोठे यांना पालिकेची खडानखडा माहिती असल्याने तसेच महेश कोठे यांच्यासह देवेंद्र कोठे, अमोल शिंदे, गणेश वानकर, मनोज शेजवाल आदी भाजपाला विरोध करणारे सक्षम नगरसेवक असल्याने कोठे हे भाजपाची कोंडी होऊ शकते. आज कोठे यांनी जरी घोषणा केली असली तरी तो खडा टाकून पाहण्याचासुद्धा प्रकार असू शकतो, त्यामुळे आणखी आठवडाभर तरी वाट पाहावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-राष्ट्रवादी झेडपीसाठी एकत्र?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉँग्रेस २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला आहे. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाचीच मदत घ्यावी लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करून मिनी विधानसभेत सत्ता स्थापन करेल, असे राज्य स्तरावर ठरले असल्याने आता त्यानुसारच बोलणी सुरू झाली आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २३, भाजप-शिवसेना आघाडी २२, काँग्रेस ७, स्थानिक आघाडी १०, शेकाप ३ आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. ६८ सदस्य संख्या असलेल्या झेडपीमध्ये सत्ता स्थापन कारण्यासाठी ३५ जागांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. जिल्ह्यात खासदार विजयसिह मोहिते-पाटील यांनी त्यासाठी आपली तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७ शेकाप ३ आणि अपक्ष किंवा स्थानिक विकास आघाडीतील काहींना बरोबर घेऊन राष्ट्रवादी सत्ता स्थापन करू शकते, असे सध्याचे चित्र आहे. थेट खासदार विजयसिह मोहिते-पाटील यांनी विरोध करणारे विरोध करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, माढाचे संजय शिंदे, मंगळवेढाचे समाधान आवताडे यांनीही सत्ता स्थापन करण्यासाठी तयारी सुरू केली आहे, त्यांना कितपत यश येते याकडे ही सर्वांचे लक्ष आहे. मोहिते-पाटील घराण्यातील स्वरूपाराणी यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी हा खटाटोप सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे २३ सदस्य निवडून आले आहेत, त्यामध्ये तब्बल ८ सदस्य एकट्या माळशिरस म्हणजेच मोहिते-पाटील यांच्या तालुक्यातील आहेत. त्यामुळे त्यांना बाजूला ठेवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न किती यशस्वी होतात, याकडे लक्ष लागून आहे. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाचे म्हणजेच काँग्रेसचे सहा जण निवडून आले असून, ते सहा जण ज्या पक्षाबरोबर जातात त्या पक्षाची सत्ता झेडपीत येणार आहे. त्यामुळे आमदार म्हेत्रे सत्तेचे किंगमेकर ठरू शकतात. झेडपीत आघाडी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आ. ह. साळुंखे, सचिन पिळगावकरदमानी-पटेल पुरस्काराचे मानकरी

$
0
0





म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल दमानी-पटेल प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणारा कर्मयोगी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सचिन पिळगांवकर यांना जाहीर झाला आहे. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख ५१ हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मंगळवारी, १४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता निर्मालकुमार फडकुले सभागृहात होणाऱ्या समारंभात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते डॉ. साळुंखे आणि पिळगावकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे बिपिनभाई पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. साळुंखे मराठीतील लेखक तसेच महाराष्ट्रातील विचारवंत आणि व्याख्याते आहेत. नागर्जुन, शीख धर्मातील निरपेक्ष जाणिवा आणि स्वातंत्र्याचे भय, या ग्रंथाचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत. या शिवाय सचिन पिळगावकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात अजरामर भूमिका केल्या आहेत. नवरा माझा नवसाचा, नवरी मिळे नवऱ्याला, हा माझा मार्ग एकला, गंमत जंमत, अशी ही बनवाबनवी, अदला-बदल, माझा पती करोडपती, आयत्या बिळात घरोबा हे सचिन यांचे चित्रपट गाजले आहेत. त्यांच्या हा माझा मार्ग एकला, अजब तुझे सरकार या चित्रपटाला नॅशनल फिल्म अवॉर्ड तसेच कट्यार काळजात घुसली या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिचारकांच्या घरावर सैनिक पत्नींचा मोर्चा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या कुटुंबियांबाबत काढलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ करण्यासाठी सैनिक पत्नी आणि माजी सैनिकांनी परिचारकांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. या मोर्च्यात कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सैनिक पत्नी आणि माजी सैनिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

सोमवारी रात्रीपासून शेकडोंच्या संख्येने माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय पंढरपूरमध्ये निषेध मोर्चासाठी दाखल होत होते. त्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. मंगळवारपी सकाळी अकरा वाजता शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. परिचारकांच्या आमदारकीचा राजीनामा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा घोषणा देत हा मोर्चा प्रदक्षिणा मार्गावरून आमदार परिचारक यांच्या घराकडे मार्गस्थ झाला. आंदोलक घराकडे गेले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा मोर्चा महाद्वार चौकात रोखून धरला. मोर्चा रोखल्यावरून पोलिस आणि आंदोलकांत तणाव निर्माण झाला होता. शेवटी आंदोलकांनी या चौकात सभा घेऊन आमदार परिचारक यांचा जाहीर निषेध करून नायब तहसीलदार सीमा सोनावणे यांना निवेदन दिले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ची निघाली दहावीच्या परीक्षेला

$
0
0

पंढरपूर : सैराट चित्रपटामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिची मंगळवारपासून दहावीच्या परिक्षा सुरू झाली. अकलूजच्या शाळेत तिचा परीक्षा क्रमांक आल्याने मुख्याध्यापिका मंजुषा जैन आणि शिक्षकांनी तिचे गुलाबपुष्प देत स्वागत केले.

सैराट चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तिचे शिक्षण थोडेसे बाजूला पडले होते. शूटिंगच्या कालावधीतही घरी अभ्यास करून तिने नववीला ९० टक्के गुण मिळवीत आपली अभ्यासातील गुणवत्ता सिद्ध केली होती. मात्र, सैराटनंतर तिला तिच्या शाळेलाही जाणे चाहत्यांमुळे अवघड बनू लागल्यावर तिने अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशाला या शाळेतून आपले नाव काढून बाहेरून दहावीची परीक्षा देण्यासाठी १७ नंबर फॉर्म भरला होता. सैराटाच्या कानडी रिमेकमध्येही ती काम करीत असल्यामुळे दहावीच्या महत्वाच्या वर्षातील ८ ते ९ महिने शूटिंगमध्ये गेले होते. त्यानंतर आर्चीने गेल्या दीड महिन्यात तिने अभ्यासावरच लक्ष केंद्रित करून दहावीच्या परीक्षेची तयारी केली आहे.

वर्षभराच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच पेपर देत आहे. शूटिंग संपल्यानंतर अभ्यासाठी जेमतेम दीड-दोन महिन्यांचा वेळ मिळाला, त्यात होईल तितका अभ्यास केला. परीक्षेच्या निमित्ताने मैत्रिणींना भेटता आले, याचा आनंदही घेत आहे.

- आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरच्या महापौरपदी शोभा बनशेट्टीउपमहापौरपदी शशिकला बत्तुल, भाजप सत्ताधारी; शिवसेना विरोधात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी शोभा बनशेट्टी; तर उपमहापौरपदी शशिकला बत्तुल यांची निवड करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली; तर शिवसेना विरोधात बसणार आहे. असे असले तरी मुंबईच्या धर्तीवर सोलापुरात शिवसेना आणि भाजप हातात हात घालूनच काम करणार आहेत. काँग्रेस पक्षाला पदांपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-सेनेने ही खेळी केली आहे.

महापौर आणि उपमहापौरपदासाठी चौरंगी सामना होणार होता. मात्र, एमआयएमने आपले उमेदवार माघार घेतल्याने तिरंगी सामना झाला. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम आणि काँग्रेसच्या प्रिया माने यांचा पराभव केला. बनशेट्टी यांना अपेक्षेप्रमाणे ४९ मते पडली. अंकाराम यांना २१; तर माने यांना १८ मते मिळाली. एमआयएमच्या उमेदवार नगरसेविका नूतन गायकवाड यांनी माघार घेतली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शशिकला बत्तुल यांनी सेनेचे नगरसेवक अमोल शिंदे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक किसन जाधव यांचा पराभव केला. बत्तुल यांना ४९, शिंदे यांना २१; तर जाधव यांना १८ मते मिळाली. एमआयएमचे नगरसेवक अझहर हुंडेकरी यांनी माघार घेतली. महापौर आणि उपमहापौर या दोनही पदांच्या निवडीसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. सर्वाधिक ४९ जागा जिंकणाऱ्या भाजपने मनपात सत्ता स्थापन केली. बहुमतासाठी ५३ आकडा अपेक्षित होता, मात्र संख्याबळानुसार भाजप सत्तेत आला. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत एमआयएम, बसपा आणि माकपाने मतदान न करता तटस्थ राहणे पसंत केले. पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी काम पाहिले.

दरम्यान, २१ सदस्य असलेला शिवसेना पक्ष विरोधी बाकावर बसला. जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी यशस्वी खेळी करीत काँग्रेसला ऐनवेळी खिंडीत गाठले आणि बाजूला ठेवण्यात यश मिळविले. महापौर आणि उपमहापौर या दोनही पदाचा कालावधी सव्वा वर्षांचा ठेवण्यात आला असून, तसे राजीनामा पत्र दोन्ही पदाधिकाऱ्यांकडून लिहून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मनपा सभागृहात येऊन महापौर आणि उपामहापौर यांचे अभिनंदन करून स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, सरचिटणीस दत्तात्रय गणपा यांच्यासह शोभा बनशेट्टी यांचे वडील माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, पती श्रीशैल बनशेट्टी यांच्यासह बनशेट्टी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या ५० वर्षांची काँग्रेस पक्षाची सत्ता नेस्तनाबूत करून भाजपने सोलापूर महानगरपालिकेत एकहाती सत्ता स्थापन करून कमळ फुलविण्यात यश मिळविले आहे.

महेश कोठे विरोधी पक्षनेते

भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सलग आठ वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांची सभागृहनेतेपदी वर्णी लागली. तर सेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक महेश कोठे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली. या शिवाय बसपाच्या गटनेतेपदी नगरसेवक आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी गटनेतापदी किसन जाधव, काँग्रेस गटनेतापदी चेतन नरोटे तर एमआयएमच्या गटनेतापदी नगरसेविका नूतन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

असे आहेत स्थायी समिती सदस्य

स्थायी समिती सदस्यपदी भाजपचे रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, नागेश वल्याळ, संजय कोळी, श्रीनिवास करली, राजश्री बिराजदार, मीनाक्षी कंपली, मनीषा हुच्चे तर काँग्रेसचे नरसिंग कोळी आणि प्रवीण निकाळजे या शिवाय शिवसेनेचे महेश कोठे, विठ्ठल कोटा आणि गुरुशांत धुत्तरगावकर, बसपाचे आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नागेश गायकवाड आणि एमआयएमचे तौफिक शेख यांची निवड करण्यात आली.

परिवहन समिती सदस्य

भैरण्णा भैरमडगी, दैदिप्य वडापुरकर, संतोष कदम, गणेश जाधव, विरेश उंबरजे आणि मल्लेश सरगम (भाजप), परशुराम भिसे, तुकाराम मस्के आणि विजय पुकाळे (शिवसेना), नितीन भोपळे आणि भीमाशंकर टेकाळे (काँग्रेस) आणि झाकिरहुसेन सगरी (एमआयएम) यांची निवड करण्यात आली. बसपा आणि राष्ट्रवादी हे दोनही पक्ष परिवहमधून आउट झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंडांच्या खूनप्रकरणीसाथीदाराला अटक

$
0
0

गुंडांच्या खूनप्रकरणी

साथीदाराला अटक

म. टा. वृत्तसेवा, कराड

चोऱ्या, दरोड्यातील पैशाच्या देवाणघेवाणीतून बनवडी (ता. कराड) येथील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन राहत असलेल्या लिंब (जि. सातारा) येथील सराईत गुन्हेगाराचा त्यांच्या साथीदारानेच धारदार कोयत्याने मानेवार वार करून निर्घृण खून केला. ही घटना शनिवारी उघडकीस आली असली. हल्लेखोर अमोल पोळ यास रविवारी पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने अटक केली.

नान्या उर्फ अभिजित तुळशीदास पवार (वय ३५, मूळ रा. लिंब, ता. सातारा) असे खून झालेल्या दरोडेखोराचे नाव आहे. त्याचा साथीदार अमोल बाबूराव पोळ (३०, सध्या रा. सातारा, मूळ रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) असे अटक केलेल्या संशयित हल्लेखोराचे नाव आहे. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी येथील शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी नान्याने चोरी, दरोडे आदी गुन्ह्यांतून मिळविलेले पैसे साथीदार अमोल पोळ यास देण्यासाठी बोलाविले होते. दोघे दारू पिऊन पैशांच्या देवाणघेवाणीवर वाद घालत बसले होते. या वादाचे पर्यावसान दोघांच्या भांडणात होऊन अमोल पोळ याने नान्याच्या मानेवर सपासपा वार केल्याने तो जागीच ठार झाला. मात्र, नान्या बराच वेळ झाले घराबाहेर आला नाही म्हणून अपार्टमेंटचे वॉचमन रमेश पेठकर शनिवारी दुपारच्या सुमारास त्याच्या फ्लॅटमध्ये गेले असता फ्लॅटच्या बेडरूममध्ये नान्या पवार याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसले. पेटकर यांनी या बाबतची माहिती पोलिसांना कळविली.

नान्यावर ३६ गुन्हे

नान्या पवार पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोरटा होता. नान्यासह त्याचा साथीदार अमोल पोळ त्यांच्याविरूद्ध चोरी, जबरी चोरी, दरोडा, लुटमार, दुचाकी चोऱ्या, असे विविध प्रकारचे ३६ गुन्हे सातारा व सांगली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत नोंद आहेत. लग्नकार्यात पाहुणा म्हणून सहभागी होऊन कार्यालयातील गर्दीत महिलांच्या दागिन्यांची हातसफाई करण्यात ते तरबेज होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीभाजपच्या तगड्या आव्हानामुळे हा निर्णय

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कराड तालुक्यात अखेर राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचा झंझावात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असावा, असे कार्यकर्त्यांतून सांगितले जात आहे.

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत असल्याने सत्तेकडील पक्ष प्रवेशासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडत असल्याने कार्यकर्त्यांचे आऊट गोईंग व पक्षांतर्गत वाढती बंडाळी या पासून बचाव करण्यासाठी अगदी शेवटी कराड तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचा वाढता प्रभाव व कार्यकर्त्यांची वाढती नाराजी यामुळे भाजपचे तगडे आव्हान कोणा एकट्याला पेलता येणार नाही, याची खात्री झाल्यानेच या दोन्ही पक्षांना एकत्रित निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शिवाय पक्षांतर्गत बंडाळीचा भाजपला फायदा होऊ शकतो, त्यामुळे अखेरच्या टप्प्यात हे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण गटाला खिंडार

कराड तालुक्यातील वारूंजी पंचायत समिती गणाच्या काँग्रेसच्या विद्यमान सदस्या अश्विनी रमेश लवटे यांनी आपले पती व मुंढे गावचे विद्यमान सरपंच रमेश पांडुरंग लवटे, ग्रामपंचायत सदस्या स्वाती रवींद्र चव्हाण, कल्पना भगवान डोंबाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गावडे यांनी २०० कार्यकर्त्यांसह काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची भेट घेऊन येत्या गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी येथे होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत भाजपत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा झेडपीसाठी २८७ रिंगणात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्हा परिषदेच्या ६४ जागेसाठी २८७ उमेदवार रिंगणात असून, जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी २८७ उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उभे आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. या निवडणुकीत ज्यांना पक्षाची उमेदवारी नाकारली आहे, अशा उमेदवारांनी पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवारी ठेवून थेट पक्षालाच आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जि. प. साठी वाईतून १३, फलटणमधून ३३, कोरेगावमधून २२, खटावमधून २७, साताऱ्यातून ४०, महाबळेश्‍वरमधून ५, माणमधून २४, खंडाळ्यातून २०, जावलीतून १२ असे एकूण २८७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वाईत ३४, फलटणमध्ये ५४, कोरेगावमध्ये ३६, खटावमध्ये ५३, साताऱ्यात ६८, महाबळेश्‍वरमध्ये १०, माणमध्ये ४१, खंडाळ्यात ३१, जावलीत २६ असे एकूण ५३० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​प्रतापगड होणार जागतिक वारसा?युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या पथकाची भेट

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

किल्ले प्रतापगडला युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे सदस्य आणि तज्ज्ञांनी भेट दिली. पथकाने रविवारी सात तास प्रतापगडावर भ्रमंती केली. छत्रपतींची युद्धनीती व दुर्गस्थापत्य कौशल्याने पथक अचंबित झाले. युनेस्कोच्या समितीने भेट दिल्याने गडाचा वारसा जागतिक नकाशावर पोहोचण्याची शक्यता आहे.

देदीप्यमान इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रातील गडांचे युरोप तसेच राजस्थान येथील गडांप्रमाणेच संवर्धन व्हावे, गडपर्यटन (फोर्ट टुरिझम) ही संकल्पना रुजावी, यासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे सदस्य आणि युरोपीय तज्ज्ञांनी १७ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील गडकोटांच्या दौऱ्याचे आयोजन केले आहे. स्वित्झर्लंड, ब्रिटन, जर्मनी व फ्रान्स येथील तज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार तसेच इकोफोर्टच्या सदस्या डॉ. शिखा जैन यांच्यासह, एमटीडीसीच्या वल्सा नायर, भारतीय पुरातत्त्व खात्याचे पश्चिम विभागाचे संचालक नांबीराजन, इंटरनॅशनल सायंटिफीक कमिटीचे सदस्य जर्मनीचे डॉ. हन्स रुडोल्फ, डॉ. एडमंड स्फोर, ब्रिटिश फोर्ट्रेस स्टडी ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि इंटरनॅशनल फोर्ट्रेस कौन्सिल ग्रेट ब्रिटनचे अध्यक्ष डेव्हिड बसेत, डॉ. शाड, चाल्स ब्लॅकवूड यांच्यासह २२ सदस्यांच्या समितीने किल्ले प्रतापगडाला भेट दिली.

युनेस्कोच्या सदस्यांनी रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास किल्ले प्रतापगड चढण्यास सुरुवात केली. किल्ल्यांची भिंत कशा पद्धतीने बांधण्यात आली आहे. दिंडी दरवाजा, महादरवाजा, भवानी मातेच्या मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची पाहणी केली. किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरून किल्ल्यांची महिती इतिहासप्रेमींकडून घेतली. या वेळी दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी प्रतापगडावर झालेल्या

युद्धाची महती सदस्यांना सांगितली. युनेस्कोच्या सदस्यांनी सुमारे ६ ते ७ तास प्रतापगडावर भ्रमंती केली. छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेतल्यानंतर सदस्य भारावून गेले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत किल्ले प्रतापगडावर युनेस्कोचे सदस्य होते.

बारा मोटेच्या विहिरीची भूरळ

युनेस्कोचे सदस्यांनी सोमवारी किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली, लिंब शेरी येथील बारा मोटेच्या विहिरींची पाहणी केली, अशी माहिती मालोजी जगदाळे व अजय जाधवराव यांनी दिली आहे. पुढे कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथेही युनेस्कोचे पथक भेट देणार असल्याचे समजते. कास पठाराचे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, अजिंक्यतारा, धोमचे मंदिर, वाई मेणवली वाडा, संगम माहुली, लिंबशेरीची बारामोटेची विहीर हेही आता जगाच्या नकाशावर दिमाखात झळकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उदयनराजे यांच्या वाहनावर दगडफेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नशीब आजमावणाऱ्या सुमारे ८१७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मशीनबंद झाले. जिल्ह्यात २,५८३ मतदानकेंद्रांवर सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता सर्वच मतदानकेंद्रांवर शांततेत मतदान झाले. मतदान संपता संपता राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जावली तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर खर्शी बारामुरे येथे दगडफेक झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेचा अपवाद वगळता मिनीमंत्रालयासाठी सातारा जिल्ह्यात अंदाजे ७० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या आदेशाप्रमाणे सुमारे चार हजार महसूल कर्मचारी निवडणूक मोहिमेवर होते. २५८३ मतदानकेंद्रांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. सातारा, कराड, जावली, वाई फलटण या पाच तालुक्यातील सुमारे अकराशे मतदानकेंद्रे संवेदनशील असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

सातारा व कराड तालुक्यातही मतदानाचा टक्का ६० टक्क्यांच्या पुढे सरकल्याने राष्ट्रवादीची धाकधूक वाढली असून, आमदार गट बाजी मारणार की खासदार गट याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सातारा पोलिसांनी बंदोबस्ताची जय्यत तयारी ठेवल्याने फार कोठे तणावाच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीचे पडसाद पडसाद उमटत राहिले. राजे समर्थकांनी खासदारांच्या मोटारीवर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने साताऱ्यातही तणाव होता. पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी तसे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.

उदयनराजे यांच्या

वाहनावर दगडफेक

वली तालुक्यातील म्हसवे गटातील खर्शी बारामुरे येथे राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या समर्थकांकडून खा. उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर दगडफेक झाली. हे वृत्त संपूर्ण सातारा जिल्ह्यात पसरल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान संपता संपता तणावाचे वातावरण निर्माण झाले. दगडफेकीचे नक्की कारण समजू शकले नाही. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा पोलिस स्टेशन गाठल्याने दोन्ही नेते पुन्हा एकदा आमने सामने आल्याची चर्चा आहे. तक्रारीची नोंद मेढा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.

कुडाळ गटामध्ये राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. म्हसवे आणि कुडाळ येथील दोन्ही लढती राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केल्याने या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले दुपारनंतर जावली तालुक्याच्या दौऱ्यावर होते. संध्याकाळी पाचनंतर खा. उदयनराजे खर्शी बारमुरे येथे आले असता त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. ही दगडफेक राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

मेढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी खा. उदयनराजे भोसले आले असता, कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या घटनेचे वृत्त कळताच साताऱ्यातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व वसंतराव मानकुमरे हे सुद्धा तातडीने पोलिस ठाण्यात पोहोचले. दोन्ही गटांनी मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. पी. काठाळे यांच्याशी चर्चा केली. तक्रार दाखल करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठिय्या दिल्याने रात्री उशिरापर्यंत मेढ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने परिस्थिती नियंत्रणात होती.

दगडफेकीचा राजकीय ताण मेढ्याने अनुभवला. तसा त्याचे पडसाद रात्री उशिरा साताऱ्यात उमटले. दगडफेकीचे वृत्त साताऱ्यात पसरताच सुमारे दोन हजार राजे समर्थकांचा जमाव पोलिस मुख्यालय परिसरात जमा झाला. समर्थकांनी मुख्यालय परिसरात तळ देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री उशिरा उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले. तेव्हा काही काळ समर्थकांची गर्दी आवरता आवरता पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. उदयनराजे यांनी रात्री पोलिस अधिक्षकांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी बांगड्या भरलेल्या नाहीत: उदयनराजेंचा संताप

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर सातारा व परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी उदयनराजे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 'भांडणं करून काही मिळणार नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांनी शांत राहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मात्र, 'आम्ही बांगड्या भरल्या नाहीत,' असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानावेळी उदयनराजे जावळी तालुक्यातील खुर्शी मुरा गावी भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वसंत मानकुमरे यांनी ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. तर, मानकुमरे यांनीही उदयनराजे यांच्याविरोधात मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उदयनराजेंच्या समर्थकांनी मला आणि माझ्या पत्नीला धक्काबुक्की केली. त्यामुळंच चिडलेल्या जमावानं उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यावर दगडफेक केली, असं मानकुमरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

भोसले बंधू आमने-सामने

या घटनेच्या निमित्तानं उदयनराजे व शिवेंद्रराजे हे दोन भोसले बंधू आमनेसामने आले आहेत. 'आमच्या ताफ्यावरील दडगफेकीत शिवेंद्रराजेंचाच हात असल्याचा दावा उदयनराजे यांनी केला आहे. तर, साताऱ्याचे खासदार हे दहशत माजवण्यासाठी जावळीत आले होते आणि त्यामुळंच लोकांनी राग व्यक्त केला,' असं प्रत्युत्तर शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​साताऱ्यात पुन्हा राष्ट्रवादी

$
0
0



अतुल देशपांडे, कराड

सातारा जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर विजय मिळवित पुन्हा आपली हुकुमत प्रस्थापित केली आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात या वेळी भाजपने सहा जागांवर विजय मिळवित चंचूप्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपच्या या मुसंडीचा भविष्यातील राजकीय उलथापालथीची नांदी झाल्याचे मानले जावू लागले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण ६४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१, काँग्रेस ७, भाजप ६, सातारा विकास आघाडी ३ अपक्ष २, पाटण विकास आघाडी १, कराड विकास आघाडी १ व अन्य ३, असे पक्षीय बलाबल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा जि. प. वर आपला झेंडा फडकविला आहे. मात्र, या वेळी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत जि. प. व पं. स. साठी पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. पश्चिम महाराष्ट्र आणि भाजपा-सेना, असे व्यस्त राजकीय समीकरण असतानाही या वेळी भाजपाने सर्व पर्यायांचा वापर करीत पक्षाची बीजे रोवण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यामुळेच जि. प. मध्ये तब्बल सहा जागांवर विजय मिळवित स्थानिक स्वराज्य संस्थांतील आपले स्थान भक्कम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत प्रस्थापितांना धक्का दिला आहे.

सातारा जिल्हा परिषद बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस- ४१

काँग्रेस- ७

भाजप- ६

सातारा विकास आघाडी ३

अपक्ष २

पाटण विकास आघाडी १

कराड विकास आघाडी १

अपक्ष ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ज्योती मांढरे अखेर माफीची साक्षीदार

$
0
0



सातारा

वाई हत्याकांड प्रकरणात ज्योती मांढरे ही माफीची साक्षीदार झाल्याचा निर्णय न्यायाधिशांनी दिला आहे. तिला काही अटीही घालण्यात आल्या आहेत. वाई हत्याकांड प्रकरणात एक एक खटला चालवायचा की सर्व खटले एकदम चालवायचे या बाबत सरकार पक्षाला विचार करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केल्यानंतर न्यायाधिशांनी २४ मार्च ही पुढील तारीख निश्चित केली आहे.

वाई हत्याकांड प्रकरणी या अगोदर सरकार पक्षाने ज्योतीला माफीचा साक्षीदार करावे, यासाठी युक्तिवाद केला होता, तर ज्योतीला माफीचा साक्षीदार करू नये, असा बचाव पक्षाने युक्तिवाद केला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कोणता निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालयात या प्रकरणाच्या कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन ज्योतीला माफीची साक्षीदार केल्याचा निर्णय दिला. न्यायाधीशांनी तिला माफीची साक्षीदार होणार आहे का? त्यासाठी अटी असून, त्या मान्य आहेत का? असे तिला विचारले. त्यावर ज्योतीने माफीचा साक्षीदार होणार असल्याचे मान्य केले. या वेळी सरकार पक्षाला सर्व खरी माहिती सांगावी तसेच ज्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे त्यामधील तुझी व संतोष पोळ याची भूमिका सांगणे, अशा अटी सांगितल्यानंतर तिने त्या मान्य केल्या.

विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, संशयित आरोपीने पोलिसांकडे सर्व गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्या बाबतचा बंद लखोटा खुला करावा व तो सरकार पक्षाला द्यावा, अशी विनंती केली. न्यायाधिशांनी तो मान्य करुन सरकार पक्षाला वाचण्यासाठी दिला. मात्र, संतोष पोळ याचा कबुली जबाब इतर ठिकाणी खुला करु नये, असे न्यायाधिशांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवान म्हणतो, 'भ्रष्ट नेत्यांचा पार्थिवास स्पर्श नको'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। कोल्हापूर

भारतीय सैन्यदलातील जवान तेजबाद्दूर सिंह यांच्या व्हिडीओने देशभरात खळबळ उडवून दिली असताना जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर आपली सेवा बजावणाऱ्या आणखी एका जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लष्करात लान्स नायक असलेल्या या जवानाचे नाव रणजीत गावडे असे असून तो कोल्हापूरचा आहे. आपल्या व्हिडिओद्वारे मनोगत व्यक्त करताना रणजीतने भ्रष्ट्र नेत्यांवर ताशेरे ओढले आहेत. हा जवान सोशल मीडियावर केवळ व्हिडिओ पोस्ट करून थांबला नसून त्याने चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे गावात भ्रष्ट राजकारण्यांवर ताशेरे ओढणारे होर्डिंगही लावले आहेत.

आपल्या होर्डींगमध्ये हा जवान म्हणतो, 'मी सैनिकी सेवा बजावत असताना मला वीरमरण आल्यास नीतीमत्ता भ्रष्ट झालेल्या नेते आणि लाचखोर सरकारी अधिकारी यांनी माझ्या पार्थिवाला हात लावू नये. ही माझी शेवटची इच्छा असेल. सन्मानाने जगण्यासाठी आणि या भुंकणाऱ्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मावळ्यानओ संघटीत व्हा.'



भारतीय सैनिकांबद्दल वापरले जाणारे अपशब्द आणि अपमान यांमुळे जवान रणजीत गावडे उद्विग्न झाला आहे. 'मी कोण' या शिर्षकाखाली काव्यरचना करत या जवानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी सर्व काही देणारा तो मीच होतो आणि आजही मीच आहे असे म्हणत आपली राष्ट्रसेवा अधोरेखित केली आहे. सैनिकाचे राष्ट्रजीवनात स्थान काय, याबाबत बोलताना आपल्या कवितेत या जवानाने भ्रष्ट राजकारण्यांना इशारा देत आपल्या अपमानाला वाचा फोडली आहे.

हा जवान आपल्या काव्यात पुढे म्हणतो,

'...येथे आता जन्मास येतात रोजच नवे पुढारी! मग कोणी आम्हाला बलात्कारी म्हणतोय, तर कोणी आमची अब्रु वेशिला टांगतोय, कोणी सांगतोय आम्ही मरण्यासाठी असतोय, तर कोणी आमची अक्कल काढतोय. मग का लढावे प्रश्न पडतो, प्रश्न घेऊनच आम्ही जगतोय, पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय. त्यावेळी पण मीच होतो, आता पण मीच आहे, कधी सर्वार्थाने तर कधी स्वार्थाने लढलो आम्ही. असेल शेवटी काहीतरी.... लढणारा तो मीच सैनिक आहे राजे!'

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा मान सन्मान राखण्यासाठी सर्व मावळ्यांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहनही या जवानाने केले आहे. जवानाच्या या पवित्र्यामुळे कोल्हापूर शहरात तो चर्चेचा विषय बनला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images