Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

फाउंड्रीतही राबतात महिलांचे पोलादी हात

$
0
0

Raviraj.gaikwad@timesgroup.com

Twitter - @rg_ravirajMT

दुपारच्या जेवणाचा डबा घरातून न्यायचा. केएमटी बसने कागल एमआयडीसी गाठायची. सकाळी आठ वाजता तेथील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये पोहचायचे. दिवसभर काम करायचे आणि चार वाजता बाहेर पडायचे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमधील धातूतंत्र प्रबोधिनीच्या कॉलेजमध्ये पोहचायचे. तेथे पाच ते नऊ कॉलेज करायचे आणि रात्री नऊनंतर घरी जायचे. हा दिनक्रम एखाद्या कामगाराचा नाही. तर फाउंड्रीतील कामाचे प्रशिक्षण घेत काम करणाऱ्या मुलींचा आहे. सध्या राजारामपुरी परिसरातील सहा मुली पुरुषांचेच क्षेत्र समजल्या जाणाऱ्या फाउंड्रीत काम करून स्वतःच्याच नव्हे, तर तमाम स्त्रीयांची पो‌लादी क्षमता सिद्ध करत आहेत.

धनश्री श्रीपती माने, संध्या शिवाजी घुणकीकर, शीतल मारुती चौगुले, ऐश्वर्या सुरेश कुंभार, शिवानी सुरेश नलवडे, बेबी राजेंद्र टकले या मुलींनी करिअरची नवी वाट धुंडाळली आहे. प्रबोधिनीतील कास्टिंग डेव्हलपमेंट अँड क्वालिटी अश्युअरन्स या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला आहे. अभ्यासक्रमाचे वर्ष पूर्ण केल्यानंतर पाच मुलींना कागलमधील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये सीएसआर उपक्रमातून नोकरी मिळाली. एआयसीटीकडून स्किल नॉलेज प्रोव्हायडर म्हणून मान्यता मिळालेली कंपनी मुलींना महिन्याला सहा हजार मानधन देते. त्याचबरोबर त्यांच्या तीन वर्षांच्या कोर्सची फीची जबाबदारीही कंपनीनेच उचलली आहे.

काम करण्याला घरच्यांनी किंवा इतर नातेवाईकांनी विरोध केला नाही का? या प्रश्नावर मुली म्हणाल्या, ‘सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता. पण, मेकॅनिकल डिपार्टमेंटचे दत्ता सुतार यांनी व प्रबोधिनीचे मुख्य समन्वयक एस. एम. मांडरे यांनी घरच्यांची भेट घेऊन त्यांना समजावल्यानंतर घरचेही तयार झाले. आज घरीच नव्हे, तर आमच्या शेजाऱ्यांकडूनही आम्हाला वेगळा सन्मान मिळतो आहे.’ काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशानेच हे क्षेत्र निवडल्याचे या मुली सांगतात. जिल्ह्यात जवळपास २८० फाउंड्री आहेत. त्यात काम करणाऱ्या या मुलींची संख्या प्रातिनिधीक असली तरी इतर मुली आणि महिलांना प्रोत्साहन देणारी नक्कीच आहे.

‘कुठेही काम करू शकतो’

कारखान्यामध्ये इतर विभागांत महिला आहेत. पण, कोअर मशिन ऑपरेट करणाऱ्या या चौघीच आहेत. त्यात चार मशिन चौघीजणी स्वतंत्रपणे हाताळतात. मशिनसाठी लागणारे दहा ते चौदा किलोचे कोअर उचलले कष्टाचे असते. आता त्याचे काही वाटत नाही, असे या मुली आत्मविश्वासाने सांगतात. कोअर मशीनबरोबरच मेल्टिंग पॉइंट, मोल्डिंग, असेंब्लीचे कामही मुलींनी शिकून घेतले आहे. यातील कोणत्याही विभागात सक्षमपणे काम करू शकतो, असा विश्वास त्या व्यक्त करतात.

===
सीएसआरच्या माध्यमातून आम्ही मुलींची जबाबदारी उचलली आहे. कंपनी आउट ऑफ वे जाऊन मुलींना सहकार्य करते. चारपैकी एका युनिटमध्ये केवळ महिलांनी काम करावे, असे आमच्या कंपनीचे स्वप्न आहे.

- गिरीष श्रीखंडे, एचआर विभागप्रमुख घाटगे-पाटील इंडस्ट्रीज

===

या मुलींना दहावीत ७० टक्के गुण आहेत. या मुली मात्र खूप सीन्सिअर आहेत. त्यांची प्रगती खूप चांगली आहे. यातील एका मुलीने कंपनीत चांगल्या अटेंडन्ससाठी बक्षीसही मिळवले आहे.

एस. एम. मांडरे, मुख्य समन्वयक, धातूतंत्र प्रबोधिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीड लाख विद्यार्थ्यांची परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालेय प्रवासानंतरच्या करिअरचे पहिले वळण असलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारी प्रारंभ झाला. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी मराठीची परीक्षा दिली. दरम्यान, कोल्हापूर विभागातून एक लाख ५१ हजार ६४२ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. एकूण ३५१ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीच्या परीक्षेसाठी यंत्रणा कार्यरत झाली. कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह सांगली व सातारा या जिल्ह्यात ४४ परिरक्षक केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक विभागासाठी सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ताणमुक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी समुपदेशकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर बोर्डातर्फे विशेष लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी परीक्षा केंद्रांच्या आवारात जमण्यास सुरूवात झाली. परीक्षा क्रमांक आणि परीक्षागृह यांची माहिती घेण्यात काही विद्यार्थी दंग झाले. काही विद्यार्थी पालकांसमेवत तर काही विद्यार्थी ग्रुप करून परीक्षेसाठी आले होते. विद्यार्थिंनींसोबत मात्र पालकांनीच परीक्षा केंद्रांपर्यंत येण्यास प्राधान्य दिल्यामुळे सकाळी अकरा ते दोन या वेळेत केंद्राबाहेर पालक थांबल्याचे चित्र दिसले.

उपनगर किंवा लांब पल्ल्याच्या अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालकांनी रिक्षा व खाजगी वाहनांची व्यवस्था केल्यामुळे शाळांबाहेर वाहनांची गर्दी झाली. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शाळांच्या परिसरात सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत वाहतुकीची कोंडी झाली.

संवेदनशील केंद्रावर वॉच

शिक्षण मंडळाच्यावतीने विभागातील संवेदनशील व गैरप्रकारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या केंद्राची यादी तयार करण्यात आली असून या केंद्रावर भरारी पथकाचा वॉच राहणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण, मिरज तालुक्यातील एरंडोली, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, भवानीनगर, उमदी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर, किणी, पारगाव आणि मुरगूड या केंद्रांचा समावेश आहे. तर सातारा जिल्ह्यातील परळी, वाघोली, वाठार किरोली, सांगली जिल्ह्यातील मालगाव, शिराळा, वाळवा, येलूर, कुची, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, परिते, शाहूनगर, सोळांकूर ही केंद्रे उपद्रवी केंद्र म्हणून नोंद करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईतून ३४५ विद्यार्थ्यांना प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोफत व सक्तीच्या शिक्षणाधिकार कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीसाठी मंगळवारी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. या फेरीत ३४५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. या लॉटरी सोडतीसाठी दुधाळी येथील मामा भोसले विद्यालयात पालकांची गर्दी झाली.

आरटीई कायद्यानुसार प्राथमिक व पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये या कायद्याअंतर्गत प्रवेश देण्यासाठी ३२८६ जागा आहेत. यामध्ये ३२१ पात्र शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.

यामध्ये जिल्हा परिषदेच्या २७८ व महापालिकेच्या ४३ शाळांचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये १३२६ ऑनलाइन अर्ज मिळाले होते. मात्र ३४ शाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे पहिल्या फेरीसाठी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. बुधवारी प्रवेश निश्चितीबाबत विद्यार्थ्यांना कळवण्यात येणार आहे. २० मार्चनंतर प्रवेशाची दुसरी फेरी होणार आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, उपशिक्षणाधिकारी ए. जी. मगदूम, शिक्षण विस्तार अधिकारी जे. टी. पाटील, अधीक्षक पी. एन. नलवडे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर विमानतळाला चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधिमंडळ सदस्यासमोर केलेल्या अभिभाषणात राज्यातील दहा विमानतळे विकसित करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गेले काही वर्षे प्रलंबित राहिलेल्या कोल्हापूर विमानतळाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात दहा विमानतळे विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सोमवारी विधिमंडळातील अभिभाषणात हा विषय राज्यपालांच्या भाषणात मांडला गेला. त्यामुळे विमानतळ विकास आणि विमानसेवेला गती येणार आहे.

केंद्र सरकारने प्रादेशिक जोड योजनेंतर्गत छोटी शहरे जोडण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतून पहिले विमान कोल्हापूर विमानतळावरून टेकऑफ करू अशी ग्वाही दिली होती. केंद्र सरकारच्या रिमोट कनेक्टिव्हीटी योजनेतंर्गत अकोला, नांदेड, अमरावती आणि सोलापूर या चार छोट्या विमानतळांसह देशातील ४३ छोट्या शहरांतील विमानतळ सहा महिन्यांत देशातील मुख्य ७२ विमानतळांना जोडले जाणार आहेत.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी गोवा येथे झालेल्या जागतिक हवाई वाहतूक कार्यशाळेतही अशी ग्वाही दिली होती. मात्र या योजनेत कोल्हापूर विमानतळाचा समावेश नव्हता. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अभिभाषणात राज्यातील दहा विमानतळे विकसित करण्याचे सांगितले. पहिल्या दहा विमानतळांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, शिर्डीसह राज्यातील दहा विमानतळांचा विकास करण्यात येणार आहे. दहा विमानतळांचा विकास झाल्यास दळणवळण सेवेत सुधारणा होणार आहे. राष्ट्रीय नागरी विमानचालन धोरण २०१६ अंतर्गत प्रादेशिक दळणवळण जोड योजनेत कोल्हापूर, शिर्डी, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, गोंदिया, जळगाव व नांदेड ही दहा विमानतळे विकसित करण्यात येणार असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अभिभाषणात सांगितले. राज्य सरकारकडून कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हवाई वाहतूक परवान्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या तीन समितीने कोल्हापूर विमानतळाची तांत्रिक पाहणी पूर्ण केली आहे.

त्याबाबतचा अहवाल नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील दहा विमानतळाच्या विकासाला चालना देण्याचे अभिभाषण सांगितल्याने कोल्हापूर विमानतळाच्या विकासाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. राज्य सरकारने नव्या वर्षात कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विमानाचे टेक ऑफ करण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त काढला असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिद्रापुरेचे कर्नाटक कनेक्शनअथणी, विजयपुऱ्यातील डॉक्टरना अटक

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

म्हैसाळमध्ये (ता. मिरज) गर्भलिंग निदान करून १९ गर्भपात करणारा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेचे लागेबांधे कर्नाटकातही असल्याचे बुधवारी पोलिस तपासात समोर आले. सांगली पोलिसांनी या प्रकरणी कागवाड आणि विजयपुरातील दोन डॉक्टरांसह पाच जणांना अटक करून, चार सोनोग्राफी मशिन जप्त केली.

डॉ. खिद्रापुरेला गर्भपातावेळी मदत करणारा कंपाउंडर उमेश ज्योतिराम साळुंखे (वय २६, हनुमान गल्ली, नरवाड, ता. मिरज) आणि परिचारिका कांचन कुंतीनाथ रोजे (वय ३५, इंदिरानगर, शेडबाळ , ता. मिरज) आणि अथणी येथील डॉ. श्रीकृष्ण घोडके अशी अटक केलेल्या अन्य तिघांची नावे आहेत. त्यांना कोर्टाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विजयपुरामधील डॉक्टर आणि माधवनगरचा औषध वितरक या दोघांना गुरुवारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकारांना दिली.

गलेलठ्ठ कमिशनच्या बदल्यात एजंटांकडून पेशंट भारती हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर खिद्रापुरे त्या महिलांना गर्भलिंग निदानासाठी कर्नाटकात पाठवित होता. सांगली पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने कागवाड (ता. अथणी) येथे बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉ. श्रीहरी कृष्णा घोडके (वय ६८) याच्या सेंटरवर बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास छापा मारून दोन सोनोग्राफी मशिन जप्त केली. डॉ. घोडके याच्याकडेही होमिओपॅथीची पदवी आहे. कागवाडमधील कारवाईनंतर सांगली पोलिसांच्या पथकाने थेट विजयपुरा येथील डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकर (वय ६४) याच्या हॉस्पिटलवर छापा मारला. डॉ. देवगीकर हा एमबीबीएस, डीएमआरडी पदवीधारक असून, तो गर्भलिंग निदान करीत होता. डॉ. खिद्रापुरे आपल्याकडे पेशंट पाठवत असल्याची कबुली त्याने दिली आहे.

सांगलीनजीकच्या माधवनगरमध्ये अन्य एका पथकाने रत्ना डिस्टिब्युटर्स या औषध वितरण एजन्सीवर छापा मारून एजन्सीचा मालक सुनील काशीनाथ खेडकर (वय ३५, रा. सोमवार पेठ, माधवनगर) याला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अटक केली. गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा पुरवठा खेडकर खिद्रापुरे याला करीत होता.

कारवाई करताना तांत्रिक गोष्टींची किंवा वैद्यकीय माहितीची अडचण येऊ नये म्हणून पोलिसांनी तीन वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक सोबत ठेवले आहे.

२५ फायली हस्तगत

तपासादरम्यान २३ डिसेंबर २००९ ते ३१ मार्च २०१३या काळातील महत्त्वाच्या नोंदी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. खिद्रापुरेच्या हॉस्पिटलच्या तळघरात गर्भपात केला जाणाऱ्या ठिकाणी गर्भवती महिलांच्या नावांच्या २५ फायली पोलिसांना सापडल्या आहेत. हाच या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. या प्रकरणाने गंभीर वळण घेताच डॉ. खिद्रापुरे कर्नाटकातील ओळखीच्या ठिकाणी आश्रय घेत लपून राहिला. त्याची पत्नीचा तपासही अजून पोलिसांना लागलेला नाही. या प्रकरणातील एक महत्त्वाचा साक्षीदार पोलिसांबरोबर आहे.

...
महाराष्ट्र-कर्नाटकची संयुक्त समिती

सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती


‘म्हैसाळ (ता. मिरज) येथील गर्भलिंग निदान प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या उच्च अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नेमण्यात येणार आहे,’ अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सावंत यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता म्हैसाळ येथे भेट देऊन या प्रकरणाबाबत अधिकारी, ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार तसेच अतिरिक्त मुख्य सचिव विजय सतबीरसिंग, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.

सावंत यांनी डॉ. खिद्रापुरेच्या हॉस्पिटलबरोबरच भ्रूण गाडलेल्या ओढ्याच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर सरकारी विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. सावंत म्हणाले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या बाबतचा अहवाल विधिमंडळात अहवाल सादर करणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. यात सहभागी आरोपीची गय केली जाणार नाही.

या प्रकरणात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची हलगर्जी, निष्काळजी आणि आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग या बाबत पत्रकारांनी छडले असता, त्यांनी या सर्व प्रश्नांना विधानसभा अधिवशेनाचे कारण सांगत बगल दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरच्या महापौरपदी शोभा बनशेट्टीउपमहापौरपदी शशिकला बत्तुल, भाजप सत्ताधारी; शिवसेना विरोधात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी शोभा बनशेट्टी; तर उपमहापौरपदी शशिकला बत्तुल यांची निवड करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली; तर शिवसेना विरोधात बसणार आहे. असे असले तरी मुंबईच्या धर्तीवर सोलापुरात शिवसेना आणि भाजप हातात हात घालूनच काम करणार आहेत. काँग्रेस पक्षाला पदांपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-सेनेने ही खेळी केली आहे.

महापौर आणि उपमहापौरपदासाठी चौरंगी सामना होणार होता. मात्र, एमआयएमने आपले उमेदवार माघार घेतल्याने तिरंगी सामना झाला. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम आणि काँग्रेसच्या प्रिया माने यांचा पराभव केला. बनशेट्टी यांना अपेक्षेप्रमाणे ४९ मते पडली. अंकाराम यांना २१; तर माने यांना १८ मते मिळाली. एमआयएमच्या उमेदवार नगरसेविका नूतन गायकवाड यांनी माघार घेतली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शशिकला बत्तुल यांनी सेनेचे नगरसेवक अमोल शिंदे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक किसन जाधव यांचा पराभव केला. बत्तुल यांना ४९, शिंदे यांना २१; तर जाधव यांना १८ मते मिळाली. एमआयएमचे नगरसेवक अझहर हुंडेकरी यांनी माघार घेतली. महापौर आणि उपमहापौर या दोनही पदांच्या निवडीसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. सर्वाधिक ४९ जागा जिंकणाऱ्या भाजपने मनपात सत्ता स्थापन केली. बहुमतासाठी ५३ आकडा अपेक्षित होता, मात्र संख्याबळानुसार भाजप सत्तेत आला. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत एमआयएम, बसपा आणि माकपाने मतदान न करता तटस्थ राहणे पसंत केले. पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी काम पाहिले.

दरम्यान, २१ सदस्य असलेला शिवसेना पक्ष विरोधी बाकावर बसला. जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी यशस्वी खेळी करीत काँग्रेसला ऐनवेळी खिंडीत गाठले आणि बाजूला ठेवण्यात यश मिळविले. महापौर आणि उपमहापौर या दोनही पदाचा कालावधी सव्वा वर्षांचा ठेवण्यात आला असून, तसे राजीनामा पत्र दोन्ही पदाधिकाऱ्यांकडून लिहून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मनपा सभागृहात येऊन महापौर आणि उपामहापौर यांचे अभिनंदन करून स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, सरचिटणीस दत्तात्रय गणपा यांच्यासह शोभा बनशेट्टी यांचे वडील माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, पती श्रीशैल बनशेट्टी यांच्यासह बनशेट्टी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या ५० वर्षांची काँग्रेस पक्षाची सत्ता नेस्तनाबूत करून भाजपने सोलापूर महानगरपालिकेत एकहाती सत्ता स्थापन करून कमळ फुलविण्यात यश मिळविले आहे.

महेश कोठे विरोधी पक्षनेते

भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सलग आठ वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांची सभागृहनेतेपदी वर्णी लागली. तर सेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक महेश कोठे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली. या शिवाय बसपाच्या गटनेतेपदी नगरसेवक आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी गटनेतापदी किसन जाधव, काँग्रेस गटनेतापदी चेतन नरोटे तर एमआयएमच्या गटनेतापदी नगरसेविका नूतन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

असे आहेत स्थायी समिती सदस्य

स्थायी समिती सदस्यपदी भाजपचे रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, नागेश वल्याळ, संजय कोळी, श्रीनिवास करली, राजश्री बिराजदार, मीनाक्षी कंपली, मनीषा हुच्चे तर काँग्रेसचे नरसिंग कोळी आणि प्रवीण निकाळजे या शिवाय शिवसेनेचे महेश कोठे, विठ्ठल कोटा आणि गुरुशांत धुत्तरगावकर, बसपाचे आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नागेश गायकवाड आणि एमआयएमचे तौफिक शेख यांची निवड करण्यात आली.

परिवहन समिती सदस्य

भैरण्णा भैरमडगी, दैदिप्य वडापुरकर, संतोष कदम, गणेश जाधव, विरेश उंबरजे आणि मल्लेश सरगम (भाजप), परशुराम भिसे, तुकाराम मस्के आणि विजय पुकाळे (शिवसेना), नितीन भोपळे आणि भीमाशंकर टेकाळे (काँग्रेस) आणि झाकिरहुसेन सगरी (एमआयएम) यांची निवड करण्यात आली. बसपा आणि राष्ट्रवादी हे दोनही पक्ष परिवहमधून आउट झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्किटेक्ट्स’साठी हवे स्वतंत्र दालन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम परवाने एकाच छताखाली देण्याच्या निर्णयाची महापालिका प्रशासनाकडून एक जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. परवान्यांची पूर्तता एकाच ठिकाणी होऊ लागल्याने नागरिकांची सोय झाली. मात्र नगररचना विभागात लिफ्टची सुविधा नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची दमछाक होऊ लागली आहे. याशिवाय आर्किटेक्ट आणि इंजिनीअर्ससाठी स्वतंत्र दालन स्थापन करण्याची मागणी होत आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या सभेतही नगररचना विभागात लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी झाली होती. तीन मजली इमारतीत ये-जा करताना यंग सीनिअर्सना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाकडून लिफ्ट बसविण्याच्या हालचाली सुरू आहेत. नगरररचना विभागासाठी लिफ्टची सुविधा करताना नागरिकांच्या सोयीसाठी बैठक व्यवस्था, कनिष्ठ अभियंत्यांसाठी स्वतंत्र केबीन असेल. राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडून ८० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. ​

प्रशासनाने शिवाजी मार्केट आणि राजारामपुरी मार्केट येथे लिफ्ट बसविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. शिवाजी मार्केटमध्ये १५ वर्षांपूर्वी लिफ्ट बसविण्यात आली होती. जुन्या लिफ्टऐवजी नवीन लिफ्ट बसविण्याचा निर्णय झाला आहे. शिवाजी मार्केट आ​णि राजारामपुरी मार्केटमधील लिफ्टसाठी चाळीस लाखांचा खर्च अपेक्षित आहे. प्रशासनाकडून प्रस्ताव तयार असून निविदा प्रक्रियेने लिफ्ट खरेदी होईल. संबंधित कंपनीवर दोन वर्षे देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असेल. लिफ्टसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

स्वतंत्र दालन हवे

बांधकाम परवान्यांतर्गत प्रकल्पाच्या डिझाइन, नकाशे व इतर कामांसाठी आर्किटेक्टससाठीच्या दालनची निर्मिती करावी यासाठी आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशनचा पाठपुरावा सुरू आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत म्हणाले, ‘बांधकाम परवाने एका छताखाली मिळावेत यासाठी संस्थेचा पाठपुरावा सुरू होता. आर्किटेक्ट्स व इंजिनीअर्सना प्रकल्पात बदल करावयाचे असले, नगरचनासंदर्भात नवीन आदेशांसंदर्भात चर्चा, महापालिका अधिकाऱ्यांसमवेत विचारविनिमय करण्यासाठी एक दालन असावे हा उद्देश आहे. मात्र दालन उभारण्याबाबत प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे. अधिकारी नकाशा दाखवायला तयार नाहीत.’

........

‘टीपी’तील सुविधांसाठी ८० लाखांचा सुधारित आराखडा तयार आहे. नागरिकांकरिता बैठक व्यवस्था, ​कनिष्ठ अभियंत्यांसाठी केबिनचा यात समावेश आहे. आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असो​सिएशने टीपी विभागात दालन निर्माण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दालन उभारले जाईळ. महिनाभरात कामाला सुरुवात होईल.

आर. के. जाधव, उपशहर अभियंता, राजारामपुरी विभागीय कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्डपार्टी ऑडिटशिवाय बिल नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा तलावाच्या भिंतीचे भक्कमीकरणासाठी करण्यात आलेले पिचिंग पावसाळ्यात वाहून गेले आहे. तलाव सुशोभीकरणाची कामे अजून अपुर्ण आहेत. या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय ठेकेदारास बिल अदा करु नये व उर्वरित कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुर्ण करण्याच्या सूचना बुधवारी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. दगडी बांधकाम, जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक ही कामे पुर्ण होत आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पाहणीदरम्यान, तलावातील जुन्या दगडी पाटातून पाण्याची गळती असून त्याची दुरुस्ती करण्याची महत्वाची सूचना करण्यात आली.

कळंबा तलावाच्या सुशोभिकरणासाठी सरकारकडून दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्या कामांची उपमहापौर अर्जुन माने व स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी नगरसेवक, अधिकारी व कळंबा ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्या समवेत बुधवारी संयुक्त पाहणी केली. सध्या सुशोभिकरणाचे काम थंडावले आहे. वळीव पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा कामामध्ये खंड पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पाऊस सुरु होण्यापूर्वी कामे पुर्ण करण्याच्या सुचना उपमहापौर माने यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच सुशोभिकरणाच्यादृष्टीने वृक्ष लागवड, लॉन, इलेक्ट्रीक ही कामेही पावसाळयापुर्वी करण्यास सांगितले. सुशोभीकरणाच्या कामाची माहिती या प्रकल्पाची सल्लागार असलेल्या ‘युनिटी’ संस्थेच्यावतीने कामांची माहिती दिली.

दगडी बांधकाम, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक ही कामे पुर्ण होत आल्याचे सांगण्यात आले. यासाठी ६ कोटी ९० लाख रुपये खर्च झाले आहेत. सुशोभीकरणाबरोबरच बंधाऱ्याच्या भक्कमीकरणाचे काम महत्वाचे आहे. त्यातील पिचिंगचे काम पावसाळ्यात वाहून गेल्याचे सांगितले. यावर पदाधिकाऱ्यांनी कामाचे बिल ठेकेदारास देऊ नये असे सांगितले. उपायुक्त विजय खोराटे यांनीही कामाच्या दर्जाबाबत दक्षता घेण्यात येईल. दर्जाबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही. तसेच कामाचे थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय ठेकेदारास बिल अदा करण्यात येणार नाही, असे सांगितले.गटनेता शारंगधर देशमुख यांनी वृक्षलागवड करताना ३ ते ४ वर्ष वयाची अथवा मोठ्या झाडांची लागवड करावी अशी सुचना केली.

कळंबा तलावातील जुन्या दगडी पाटातून मोठया प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्याची गळती तातडीने शोधून ती बंद करण्याची सूचना केली. यावेळी नगरसेवक राहुल माने, लाला भोसले, शाखा अभियंता पी. जी. कुऱ्हाडे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, कळंब्याच्या सरपंच कविता टिपुगडे, सदस्य दत्तात्रय हळदे, अजय सावेकर, विश्वास गुरव, सुरेश टिपुगडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी समाजाने सक्रीय व्हावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आजच्या काळात महिलांचे झपाट्याने सक्षमीकरण होत असले तरी दिवसेंदिवस होत असलेले महिलांवरील अत्याचारही वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. एकीकडे आपण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांचे कौतुक करतो, तिला देवीचे स्थान देतो, तर दुसरीकडे सुरक्षतेच्या नावाखाली तिला घराबाहेर पडण्यावर निर्बंध करतो. मुलींना ती जन्माला येण्याआधी तिची गर्भातच हत्त्या केली जाते, ही चिंतेची बाब असून स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी समाजाने सक्रीय व्हावे’, असे आवाहन प्रमुख पाहुण्या डॉ. अंशू सैनी यांनी केले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित जागतिक महिला दिन व महिला मतदार जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, ‘आपल्याकडे कुटुंबात मुलगी जन्माला आली की सगळ्यात आधी तिच्या लग्नाची काळजी वाटू लागते आणि त्यादृष्टीने तिच्यासाठी गुंतवणूक केली जाते. मात्र समाजाची ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आपल्या मुलीला सक्षम करणे, तिच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि एक व्यक्ती म्हणून तिच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास कसा होईल, यासाठी प्रयत्न करणे जास्त महत्वाचे आहे. कोल्हापुरात जागतिक बुद्धिबळपटू ऋचा पुजारी आणि नृत्यांगना संयोगिता पाटील घडल्या आहेत, हा आपला सन्मान आहे. भविष्यात अशाच अनेक ऋचा आणि संयोगिता घडल्या पाहिजेत.’

बुद्धिबळपटू ऋचा पुजारी म्हणाल्या, ‘शिक्षण, नोकरी यापुरती आपली क्षेत्रे मर्यादित न ठेवता मुलींनी कला, क्रीडा क्षेत्रातही आपले करियर घडवायला हवे. माझ्या यशामागे माझ्या पालकांची भूमिका महत्वाची ठरली आहे. मुलींच्या पाठीशी पालकांनी खंबीरपणे उभे रहायला हवे.’

नृत्यांगना संयोगिता पाटील म्हणाली, ‘अडचणी सर्वांनाच येतात त्यामुळे हार न मानता मार्ग काढणे गरजेचे असते. त्यासाठी पालकांचा, कुटुंबाचा व समाजाचा पाठींबा खूप गरजेचा असतो. माझ्या आईने मला ज्या पद्धतीने माझ्या वाटचालीला पाठींबा दिला, जे परिश्रम घेतले त्यामुळेच मी आज घडले.’

अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा निवडणूक अधिकारी रवीद्र खाडे उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले, उपविभागीय अधिकारी कीर्ती नलावडे, निवडणूक तहसीलदार सुचित्रा आमले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन महिला मतदारांना मतदानपत्राचे वाटप करण्यात आले. सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी दिव्यांगणांकरिता दिलेला सात हजार रुपयांचा निधी चेतना शाळेच्या प्राचार्यांकडे सुपूर्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरीतील बडे लाचखोर मोकाटच

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत गेल्या पंधरवड्यात लाचखोरीच्या दोन घटना उघडकीस आल्याने दररोजचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. आस्थापना असो की रेकॉर्ड विभाग सर्वच विभागांना लाचखोरीने ग्रासले आहे. नागरिकांनी विविध कामासाठी सादर केलेल्या फायलींत त्रुटी काढायच्या, हेलपाटे मारायला लावायचे आणि मनासारखा व्यवहार घडला तरच कामांची सोडवणूक अशी काहीजणांची पद्धत बनली आहे. लाचखोरीच्या प्रकरणात विविध विभागांतील छोट्या कर्मचाऱ्यांची नावे रेकॉर्डवर आली. मात्र महापालिकेतील बड्या लाचखोरावर कारवाई कधी? असा प्रश्न नागरिकांचा आहे.

महापालिकेतील घरफाळा, नगररचना, पाणी पुरवठा, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग आणि जन्म मृत्यू दाखला विभाग ही नागरिकांशी निगडीत आहेत. जन्म, मृत्यू दाखला विभागांशी तर प्रत्येकाचा संबंध येतो. १९९५ नंतरचे सर्व प्रकारचे दाखले हे नागरी सेवा केंद्रातून उपलब्ध होतात. मात्र त्यापूर्वीचे दाखले मॅन्युअल पद्धतीने दिले जातात. जुने दाखले काढण्यासाठी थेट रेकॉर्ड विभागातील कर्मचाऱ्यांशी संबंध येतो. रेकॉर्ड विभागातील श्रीमती लक्ष्मी चव्हाण यांच्यावरील कारवाईने या विभागातील कारभार चव्हाट्यावर आला. महापालिकेत गेल्या पंधरवड्यात लाचखोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या. दोन्ही घटनेत लाचखोरीत सापडलेले कर्मचारी हे शिपाई आणि पहारेकरी होते.

कर्मचारी उघडपणे कार्यालयात लाच मागतात, लाच स्वीकारतात यावरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी यंत्रणा विभागात ​सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाने, खोलवर चौकशी करुन सर्वच विभागातील सूत्रधारांना चाप लावला तर गैरकारभार थांबणार आहे.


सामान्य नागरिकांचे धाडस

तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कार्यालयात लाच घेताना पकडले जाण्याचा प्रकार हा धक्कादायक आहे. अस्थापना विभागातील कुंदन लिमकर यांच्यावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई झाली.यावरुन कर्मचारी किती निर्ढावलेले आहेत हे स्पष्ट होत आहे. लाचखोरांच्या विरोधात दोन्ही तक्रारी या सामान्य नागरिकांनी केल्या आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. महासभेत आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी थेट अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप केला. सभागृहात अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करणाऱ्या नगरसेवकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केल्या नाहीत. सर्वसामान्य नागरिक लाचखोरीच्या विरोधात तक्रार करण्याचे धाडस करत असताना नगरसेवकांनी मात्र ते पाऊल उचलले नाही. नगररचना, घरफाळा, अस्थापना, शिक्षण समिती, पाणीपट्टी, आरोग्य या विभागात उलाढाली मोठ्या आहेत. नगरसेवकांकडून सभागृहात आरोपही होतात. सभागृहात आरोप करायचे, प्रशासनाने कारवाईची ग्वाही दिली की प्रकरण संपले असा प्रकार सुरु आहे.


महापालिकेतील गैरव्यवहार, लाचखोरी

वर्कशॉपचे तत्कालिन अधीक्षक एम.डी.सावंत (तीन लाख २७ हजार रुपयांची वसुली निश्चित, विभागीय खाते चौकशी)

आस्थापना विभागातील लिपिक कुंदन लिमकर (लाच मागितल्याप्रकरणी निलंबित, विभागीय चौकशीचे आदेश)

आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील (गैरहजर कर्मचाऱ्यांची हजेरी मांडून महापालिकेचे आर्थिक नुकसान, निलंबित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेवटचे नाटक करू दे गं...’

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कोल्हापूर ः अहो...तुमची धावपळ, दगदग मला बघवत नाहीय... दिवसभर जाहिरातीचं काम आणि रात्री दोन वाजेपर्यंत नाटकांच्या तालमी यामुळे तुमच्यावर येणारा ताण मला दिसतोय. आपली अकरा महिन्यांची नारायणी तुमची वाट बघून झोपते. सोडा ते नाटक आणि शांतपणे जाहिरातीचं काम करा...पंधरा दिवसांपूर्वी सागर आणि वनिता यांच्यातील हा संवाद. ‘राज्य नाट्यच्या अंतिम फेरीत पोहोचलोय...आता मी मागे आलो तर अख्खा संघ मोडून पडेल. एवढं शेवटचं नाटक करू दे गं.. मग नाटक बंद करतो..वचन समज माझं...’ सागरने वनिताला दिलेलं हे उत्तर. यानंतर पंधराव्या दिवशी, जे नाटक शेवटचं असं म्हटले होते तेच नाटक सुरू असताना सागरने मान टाकली. सागरच्या पार्थिवाला कवटाळून वनिता टाहो फोडून म्हणत होती की या नाटकानेच तुम्हाला गिळलं...पोरगी आत्ता कुठे बाबा म्हणून तुम्हाला हाक मारायला ​शिकलीय ती ऐकायला तरी थांबायचं होतं....तेव्हा ‘शेवटचं एकच नाटक करू दे गं,’ म्हणून कायमचा निघून गेलेला सागर मात्र अचेतन होता.

‘अग्निदिव्य’ नाटकाचा प्रयोग राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रंगलेला असताना हृदयविकाराने काळाच्या पडद्याआड गेलेल्या सागर चौगुले या कलाकाराच्या घरातील सुन्नपणाही धाय मोकलून रडत असल्याची जाणीव झाली. राजारामपुरीतील त्याच्या घरात पाऊल टाकल्यानंतर समोरच दिसलेला त्याचा देखणा फोटो, त्याने मिळवलेल्या बक्षीसांची रांग सागरच्या अभिनयकौशल्याची प्रचिती देणारे. सागरची पत्नी व​निता शून्यात नजर लावून बसलेली आणि डोळ्यातून अखंड वाहणारे पा​णी. मी सांगत होते त्यांना की थांबवा नाटक...किंवा फक्त नाटकच करा...याआधी ऐकलं नाही. जेव्हा ऐकलं तेव्हा नियतीने घात केला. आईभोवती नुकतीच पावलं टाकायला शिकलेली नारायणी सागरच्या फोटोकडे बघून बाबा बाबा अशी हाक मारत निरागसपणे हसत होती. सागरच्या आईच्या तोंडून तर शब्दही फुटत नव्हता.

सागर अवघा दहा वर्षाचा असताना त्याच्या वडीलांचेही हृदयविकाराने निधन झाले. ​सिनेमा निर्मितीच्या कामात आर्थिक नुकसान झाले त्याचा ताण आल्याने हृदयविकाराने त्यांना गाठले. मुंबईत उपचारासाठी जात असताना हॉस्पिटलच्या लिफ्टबाहेर सागरच्या मांडीवरच वडीलांनी अखेरचा श्वास घेतला. दहा वर्षाच्या सागरने हा धक्का पचवत कुटुंबाची जबाबदारी घेतली. जाहिरात संकलनाचा व्यवसाय आणि नाटकाचे प्रयोग अशी कसरत करणाऱ्या सागरने कुटुंब सावरले. वर्षभरापूर्वी मुलीच्या जन्मानंतर तो खूप खुश होता. नाटक थांबवून आता शांत आयुष्य जगायचे असे ठरवलेही होते. पण, आयुष्यातील शेवटचे नाटक आयुष्याचाच शेवट करेल, असे मात्र त्याला कधीच वाटले नसेल. अभिनय ज्याच्या श्वासात होता तो अभिनय करतानाच त्याने शेवटचा श्वास घेतला.

मुलीच्या वाढदिवसाचे स्वप्न अपूर्ण

येत्या २८ मार्चला सागरची मुलगी नारायणी हिचा पहिला वाढदिवस आहे. मुलीचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचे नियोजनही त्याने केले होते. राज्य नाट्यच्या अंतिम फेरीत बाजी मारणारच आणि तो आनंद नारायणीच्या वाढदिवशी साजरा करू असे तो मित्रांना म्हणालाही होता. गुढीपाडवाही त्याच दिवशी असल्यामुळे नाटकाच्या यशाची गुढी उभारू असं तो नाटकाच्या अंतिम फेरीच्या रात्री विंगेत म्हणाला होता. पण लेकील्या पहिल्या वाढदिवसाचे स्वप्नही अपूर्ण ठेवून गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट हे संस्कृती समजून घेण्याचे माध्यम

$
0
0

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘चित्रपट हे जागतिक संस्कृती समजून घेण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांची दृष्टी विकसित करण्यासाठी, त्यांची विवेकी मानसिकतता घडवण्यासाठी ते अतिशय प्रभावी साधन आहे. चित्रपट पाहताना माणूस दृश्य आणि त्यामागील कथन यांचा गंभीर विचार करायला शिकत जातो. समाज अत्यंत निर्मळ व्हायचा असेल तर मने निर्मळ व्हायला हवीत. त्यासाठी जगभरातील सशक्त, सकारात्मक आशयप्रधान चित्रपट आपल्याला मदत करतील,’ असे मत शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त विदेशी भाषा विभागाचा ‘दृष्टी उपक्रम दक्षिणायन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते प्रसंगी बोलत होते.

डॉ. गवस म्हणाले, ‘मानवी जीवनावर चित्रपटांचा नेहमीच प्रभाव राहिला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्ती गंभीरपणे विचार करण्यास प्रवृत्त होतो. जगात लोकशाही तत्त्व जपणारा, लिंगभेद नाकारणारा हिंसामुक्त अवकाश निर्माण करायचा असेल तर आपण परिघाबाहेरचे, अन्यायाविरोधात लढ्याची प्रेरणा देणारे परक्या भाषा व संस्कृतीचे चित्रपट पहिले पाहिजेत. अशावेळी चित्रपट महोत्सव सहायभूत ठरतील.’

‘कोणतीही भाषा शिकत असताना भाषेची संस्कृती समजून घेणे आवश्यक असते. त्यासाठी चित्रपट प्रभावी मध्यम आहे. म्हणूनच दृष्टी उपक्रमातून अनेक उत्तम, आशयसंपन्न चित्रपट विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शित केले जातात. यावर्षी समाजत विविधस्तरांवर संघर्ष करणाऱ्या महिलांच्या लढ्याची गाथा मांडली जात आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविकांमध्ये केले. पहिल्या दिवशी स्मिता पाटील व नसिरुद्दीन शहा अभिनित ‘मिर्च मसाला’ या चित्रपट दाखवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्री-भ्रूण हत्यांना कुप्रथाच जबाबदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘समाजातील कुप्रथा आणि अंधश्रद्धांमुळेच स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत. भविष्यात स्त्री-पुरुष असमतोल निर्माण झाल्यास मोठ्या अराजकास कारणीभूत ठरेल. यासाठी स्त्रीभ्रूण हत्येचा विषय समाजाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन ‘स्त्री जन्माचे स्वागत करा,’ चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या ‘बेटी बचाओ अभियानां’तर्गत आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

डॉ. कांकरिया म्हणाल्या, ‘स्त्रीभ्रूण हत्येचा विषय समाजाने अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. भविष्यात स्त्री-पुरूष असमतोल निर्माण झाल्यास मोठ्या अराजकास कारणीभूत ठरेल. मुलगाच हवा हा अट्टाहास, मुलीला दुय्यम वागणूक, महिलांमध्ये असणारी आर्थिक, सामाजिक व शारीरिक असुरक्षितता, हुंडा पद्धती, मुलगी अविवाहित राहिल्यास कुटुंबाला कलंक अशी भावना, गर्भलिंग निदानाची सहज व परवडण्याजोगी उपलब्धता, वैद्यकीय क्षेत्रातील ढासळलेली नैतिकता इत्यादी कारणे स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार आहेत. समाजमानसात रुजलेले स्त्री-पुरूष असमानतेचे बीज व्यापक लोकचळवळ व प्रबोधनातून नष्ट करणे शक्य आहे.’े

कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, ‘स्त्री सबलीकरणासाठी शिक्षण, सुरक्षा व सन्मान या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्त्री सन्मान हा स्त्रीच्या कुटंबातूनच होणे आवश्यक आहे.’

यावेळी डॉ. कौस्तुभ कुलकर्णी यांनी स्त्रियांमध्ये सर्वाधिक मृत्यू घडविणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाविषयी माहिती दिली. बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिमा एस. पवार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहने चोरणारी टोळी अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगर परिसरातील वाहनांमधील डिझेल आणि वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला गांधीनगर पोलिसांनी अटक केली. संजय दया ठाकूर (वय २५, रा. फुरसुंगी रोड, हारपळे वस्ती हडपसर, पुणे), शंकर यल्लाप्पा मुतपिल्ले (वय २०, रा. साणपाडा वाशी, मुंबई) आणि किरण विश्वनाथ बेझ (वय २०, रा. साणावाडा वाशी) अशी चोरट्यांची नावे आहेत. टोळीकडून पोलिसांनी सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी (ता. ८) सकाळी अटकेची कारवाई करण्यात आली.

गुरुवारी (ता. २) रात्री उचगाव येथील घाटगे- पाटील इंडस्ट्रीजसमोर रस्त्याकडेला लावलेला टाटा ४०७ टेम्पो (एम. एच. ०९ बी. सी. २३४५) हा चोरट्यांनी चोरुन नेल्याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात सुजित मोरे (रा. उचगाव) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून गांधीनगर पोलिसांची दोन पथके संशयितांचा शोध घेत होते. चोरटे खेड शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडे सागर धाब्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

तेथे संशयित इंडिगोतून (एमएच १२ जीझेड ०६००) गाडीतून आलेल्या संशयितांची चौकशी केली. गुन्ह्यात वापरलेल्या इंडिका कारसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह प्रदीप जाधव, अमित सुळगावकर, राकेश माने, बाबासाहेब कोळेकर, कृष्णात पिंगळे, नारायण गावडे, मुरलीधर रेडेकर, राजू भोसले यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम कामगारांची चौकशी सुरू

$
0
0

satish.ghatage
@timesgroup.com

Tweet : @satishgMT

कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या नोंदणीतील फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५६ हजार ६०० बांधकाम कामगारांच्या कागदपत्रांची छाननीसह प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्तांनी दिले. चौकशीच्या आदेशाने बोगस नोंदणी केलेल्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारच्या कामगार विभागाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाकडे प्रत्येक बांधकाम कामगाराने नोंदणी करण्याचे बंधन आहे. जिल्ह्यातील १८ ते ६० वयोगटातील ५६ हजार ६०० कामगारांनी नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे झाली आहे. नोंदणी करणाऱ्या कामगाराला एक वर्षात किमान तीन महिने बांधकाम करणे बंधणकारक आहे. नोंदणीसाठी वयाचा पुरावा, ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा द्यावा लागतो. दर तीन वर्षांनी नोंदणी करण्याची सक्ती असते.

१० लाखांहून अधिक किंमतीचे काम करणाऱ्या बांधकाम विकाससकाडून एक टक्के उपकर कल्याणकारी मंडळाला जमा होतो. या रक्कमेतून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. २०१२ मध्ये कल्याणकारी योजनेतून नोंदणी झालेल्या प्रत्येक बांधकाम कामगाराला रोख पाच हजार रुपये देण्यात आले. आता फेरनोंदणीनंतर मंडळाच्यावतीने पाच हजार रुपये दिले जात आहेत. सध्या सुमारे ३० हजार बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे. शिवाय दररोज सुमारे ३०० कामगार नोंदणीचे नुतनीकरण करत आहेत. बांधकाम क्षेत्र विस्तारले असले तरी ५६ हजार ६०० ही कामगारांची संख्या आश्चर्यचकित करणारी आहे. तसेच दररोज नवी नोंदणीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यात बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी उघडकीस आल्यावर पुणे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त एस. एल. वाघ यांच्या आदेशाने तेथे चौकशी सुरू झाली आहे. शिवाय, कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची चौकशी सात अधिकाऱ्यांची समिती करणार आहे. कामगारांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल. सध्या नोंदणीकृत कामगारांचा डाटा तयार करण्याचे काम सुरू आहे.

ज्या कामगारांची नोंदणी झाली आहे, तेथे समितीतील सदस्य सरप्राइज व्हिजिट देऊन तपासणी करतील. या निर्णयामुळे बोगस कामगारांचे पितळ उघडे पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मुलांच्या तुलनेत मुलींचा कमी असलेला जननदर ही चिंतेची बाब आहे. मुलींचा जननदर वाढविण्यासाठी भविष्यात सामाजिक जाणिवेच्या भावनेतून जिल्ह्याला लागलेला स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी’, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले.

डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, ‘महिला सक्षम, स्वावलंबी आणि निर्भय बनत आहेत. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारस्तरावर विविध कायदे प्रभावीपणे राबविले जात आहेत. मात्र या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. भविष्यात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी महिलांनी सक्षमपणे पुढे येण्याची गरज आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिला मतदारांची नोंदणी अत्यावश्यक आहे. महिलांनी मतदार जागृती आणि मतदार नोंदणीत पुढाकार घेतला पाहिजे.’

जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील म्हणाल्या, ‘सध्याच्या काळात स्थिती बदलली आहे. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांनी सर्व क्षेत्रात देदिप्यमान कामगिरी करावी.’

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे म्हणाले, ‘महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहे. ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. मात्र महिलांवर होणारा कौटुंबिक हिंसाचार ही चिंतेची बाब आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षणासाठी कायद्यांचे प्रभावी पालन करण्यासह महिलांसाठी विविध कायद्याविषयी साक्षरता महत्वाची आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कायदा साक्षरतेचे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. वाद निवारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. विधी सेवा प्राधिकरणाने भविष्यात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.’

यावेळी महिला व बाल विकास विभाग सभापती ज्योती पाटील, आरोग्य सभापती सीमा पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र खाडे, राणी पाटील आदी उपस्थित होते. अनघा सुर्यवंशी, सिध्दी बेलेकर या विद्यार्थींनी मनोगत व्यक्त केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले.

०००

पुरस्कार वितरण

समारंभात महिलांमध्ये मतदान प्रक्रिया संदर्भात जागृती कार्यक्रम, नवमहिला मतदारांना निवडणूक ओळखपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. बेटी बचाओ, बेटी पढाओ हा जनजागृती कार्यक्रम, आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराचे वितरण आणि डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्काराचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक हरिष जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे आदी उपस्थित होते.

०००

डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार

डॉ. आनंदीबाई गोपाळी जोशी पुरस्काराचे दहावे वर्ष आहे. मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारचे वितरण प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना वितरण करण्यात आले. कसबा बावडा येथील ग्रामीण रूग्णालय, सेवा रुग्णालयाला ५० हजार रूपयांचे बक्षीस देण्यात आले. शिरोली (ता. करवीर) प्राथमिक आरोग्य केंद्राला २५ हजार, जयसिंगपूर (ता. शिरोळ) १५ हजार आणि कळे (ता. पन्हाळा) प्राथमिक आरोग्य केंद्राला१० हजार रूपयांचे बक्षीस देण्यात आले. शेळोली (ता. भुदरगड), निगवे (ता. करवीर) तेलवे (ता. पन्हाळा) या उपकेंद्राला अनुक्रमे १५, १० आणि ५ हजार रूपयांचे बक्षीस देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा महिलांसह आठजण हद्दपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात मटक्याच्या टोळीतील तिघांना आणि घरफोडी करुन धुमाकूळ घालणार्या सहा महिलांना पोलिसांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले. दोन्ही टोळ्यांतील एकूण ९ जणांचा यात समावेश आहे. मटका चालविणाऱ्या टोळीत माजी उपमहापौर शमा मुल्ला यांचे पती सलीम यासीन मुल्ला यांचाही समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की, सलीम यासीन मुल्ला (रा. यादवनगर), दस्तगीर आप्पालाल बोरगावे (रा. विक्रमनगर), पुंडलिक तानाजी सांगावकर (रा. भाजीमंडई समोर, शाहूनगर) या तिघांना मटका व्यवसाय प्रकरणी हद्दपार करण्यात आले. पुंडलिक सांगावकर याच्यावर ३, तर दस्तगीर बोरगावे याच्याविरुद्ध २ गुन्हे दाखल आहेत. तिघांच्या हद्दपारीचे प्रस्ताव राजारामपुरी पोलिसांनी पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांच्याकडे पाठविले होते. तांबडे यांनी या प्रस्तावाला बुधवारी (ता. ८) मंजुरी दिली.

शहरातील घरफोड्यांच्या टोळीतील सहा महिलांवरही हद्दपारीची कारवाई झाली. अण्णू विकास देवकर (रा. टेंबलाई रेल्वेफाटक), संगीता उर्फ ताई वाल्मिकी फुलोरे, बायडी सागर रसाळ, अश्विनी दत्ता नाईक (रा. राजेंद्रनगर), पूजा शिवाजी माळी (रा. डवरी वसाहत, यादवनगर), सुरेखा राजू नरदे (रा. टेंबलाई रेल्वेगेट झोपडपट्टी) यांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात देवकर हिच्याविरुध्द घरफोडीचे पाच गुन्हे नोंद आहेत. फुलोरे व रसाळ यांच्याविरुध्द ११, नाईक हिच्याविरुध्द ४, माळी व नरदे यांच्याविरुध्द प्रत्येकी ३ गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टिंग ऑपरेशन बंदच

$
0
0


Sachin.Yadav@timesgroup.com
tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर : ‘येथे गर्भलिंग तपासणी होत नाही. त्यासाठी कोणीही संपर्क करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे’ असे फलक शहरातील सर्वच दवाखान्यांत झळकले आहेत. प्रत्यक्षात गर्भलिंग निदान खण्यासाठी जिल्हास्तरावर आरोग्य विभागाकडून फुटकळ प्रयत्न केले जात आहे. गर्भलिंग निदान रोखण्यासाठी सरकारी पातळीवर उदासीनता आहे. तक्रार आली तरच कारवाई अशी प्रशासनाची भूमिका असल्याने गर्भलिंग निदान करणाऱ्यांना अधिक बळ मिळत आहे. त्यांचे जाळे अधिकाधिक घट्ट बनत आहे. प्रशासनाकडून गर्भलिंग तपासणीसाठीची स्टिंग ऑपरेशन्स अडगळीत पडल्याची स्थिती आहे.

सरकारी पातळीवर गर्भलिंग निदानाच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र, या यंत्रणेच्या बेफिकिरीने गर्भलिंग तपासणीचे जाळे जिल्ह्यात अधिक फोफावले आहे. छुप्या गर्भलिंग निदानात वैद्यकीय सेवेतील कार्यरत काही परिचारिका, आरोग्य मदतनीस, डॉक्टर आणि एजंटाची साखळी अजूनही कार्यरत आहे. प्रत्येक दवाखान्यातील सोनोग्राफी मशीनची तपासणी केली जात असल्याचे प्रशासन सांगते. मात्र, ग्रामीण भागात व्हॅनसह काही वाहनांत राजेरोसपणे गर्भलिंग निदान केले जाते. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती असते. मात्र, प्रशासनाला त्याची माहिती दिली जात नाही. संशयित सोनोग्राफी केंद्रांची निनावी माहिती, सोनोग्राफी केंद्रातील त्रुटी देण्याचे आवाहन केले जाते. मात्र, प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी, पोलिस अधीक्षक (गृह), अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक आहे. मात्र, तक्रारीनंतरच कारवाई होते. सरकारी पातळीवर कारवाईसाठी उदासिनता आहे. दर तीन महिन्यांतून एकदा सोनोग्राफी मशीनची तपासणी केली जाते. हा कागदोपत्री अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला जिल्हा प्रशासनाकडून सादर केला जातो. मात्र पुढाकार घेऊन गर्भलिंग तपासणीसाठी विशेष मोहिम उघडली जात नाही. प्रत्येक तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही जबाबदारी सोपविली जात नाही.

जिल्ह्यात १०१ बोगस आणि अवैध व्यावसायिक आहेत. या डॉक्टरांनी चारही मेडिकल कौन्सिलची परवानगी घेतलेली नाही. डेंन्टिस्ट कौन्सिल, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल, होमिओपॅथिक या चार कौन्सिलची परवागनी घेतली जात नाही. त्यांच्या दवाखान्यात गर्भलिंग तपासणी होत नसल्याचे फलक लावले जातात. मात्र रुग्ण तपासणीसाठी आल्यानंतर गर्भलिंग तपासणीची छुपी चर्चाही याच बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यात होते. त्यांना गर्भलिंग तपासणीची ठिकाणांची माहिती आणि दरही सांगितले जातात. प्रशासनाच्या पातळीवर ठोस जनजागृती आणि कारावाई केली जात नसल्याने बोगस डॉक्टरांना बळ मिळत आहे. बोगस डॉक्टरांकडूनच काही अधिकृत वैद्यकीय सेवारत असलेल्या डॉक्टरांची नावे सुचविली जातात. अनेकदा नामवंत डॉक्टरांच्या दवाखान्यात गर्भलिंग तपासणी केली जाते. या तपासणीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

तक्रार कोण दाखल करणार?

गर्भलिंग निवड हा १९९४ चा गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र वापर (गर्भलिंग निदान प्रतिबंध) या कायद्यानुसार गुन्हा आहे. सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर करून गर्भलिंग करू नये, यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांपर्यंत कैद आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षेची तरतूद आहे. अजूनही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. मोजक्याच लोकांना शिक्षा झाली आहे. न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकदा साक्षीदार फितूर केले जातात. गुन्हा सिद्ध करणं हेच सर्वात मोठा आव्हान मानले जाते. गर्भलिंग निदान उघडपणे होत नाही आणि अनेकदा दोन्ही पक्षांच्या संमतीने घडत जात असल्याने तक्रार कोणी दाखल करायची असा प्रश्न निर्माण होतो.

दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी मशीन्सची तपासणी केली जाते. गर्भलिंग तपासणीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८२३३४४७५ आहे. www.
amchimulgi.in या संकेतस्थळावरही तक्रार करू शकतात. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जात आहे.

- एल. एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक


दोनच तक्रारी

जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे गेल्यावर्षी बोगस डॉक्टरांच्या केवळ दोनच तक्रारी दाखल झाल्या आहेत. बोगस आणि अवैध व्यावसायिक असलेल्यांना नोटिसा पाठविल्या आहे. वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची छाननी केली जात असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयीस्कर भूमिका मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत, वॉर्ड मिटींग व स्थायी समिती सभेत नगरसेवकांकडून अतिक्रमण कारवाई करण्याच्या सूचना केल्या जातात. कर्मचारी अतिक्रमण विरोधी मोहिम राबविताना नागरिकांकडून मारहाणीच्या घटना घडतात. मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याऐवजी नगरसेवक कर्मचाऱ्यांना माघार घ्यायला लावतात. नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकारी, पाठीशी राहणार नसतील तर कर्मचाऱ्यांना वाली कोण ? असा सवाल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला.

गंगावेश येथे जेसीबी ड्रायव्हर, व मुकादमाला मारहाणीची घटना घडल्यानंतर या प्रकाराच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारत काम बंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय हटणार नाही असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. यामुळे गंगावेश येथे गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तणाव निर्माण झाला होता. महापालिकेचे अधिकारी ही कर्मचाऱ्यांना मारहाणीची घटना घडूनही मूग गिळून गप्प राहिल्याने कर्मचारी नाराज झाले. दरम्यान दिवसभरात पापाची तिकटी, गंगावेश, पाडळकर मार्केट,रंकाळा स्टँड, ताराबाई रोड, लुगडी ओळ, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी परिसरात कारवाई करुन वीस होर्डिंग्ज, चार केबीन, पानशेड, लोखंडी ग्रील काढण्यात आले. दिवसभर कारवाई सुरू होती.

वारंवार मारहाणीच्या घटना

कारवाईदरम्यान गोंधळ झाल्याचे समजताच विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, विश्वास आयरेकर घटनास्थळी दाखल झाले. सहायक आयुक्त सचिन खाडे, प्रभारी सहायक आयुक्त संजय भोसले, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आस्थापना विभागातील विजय वणकुद्रे हेही आले. कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर पोलिस कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. नगरसेवकांनी हस्तक्षेप करत, आपसात तोडगा काढता येऊ शकतो असे सांगत प्रकरणावर पडदा टाकला. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

नगरसेवकांनी हस्पक्षेप केल्याने पोलिस ठाण्याबाहेरच प्रकरण मिटले. काही कर्मचाऱ्यांनी आम्ही नियमानुसार काम करताना किती दिवस मार खायचा, आमचा काय दोष? असा प्रश्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिजंड ऑफ पद्मावतीचे मसाई पठारावर शूटिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राणी पद्मावती यांचे चरित्र उलगडून दाखवणाऱ्या आणि प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरलेल्या ‘द लिजंड ऑफ पद्मावती’ सिनेमाच्या चित्रीकरणाची टीम कोल्हापुरात पन्हाळा येथील मसाई पठारवर दाखल झाल्याने सिने इंडस्ट्रीत कोल्हापूरचे नाव चर्चेत आले आहे. मसाई पठारवर सध्या या सिनेमातील युद्धाचा सीन ​चित्रीत केला जात आहे. राजस्थानमध्ये या सिनेमाच्या चित्रिकरणाला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पठाराकडे जाणाऱ्या १५ किलोमीटरच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘बाजीराव मस्तानी’नंतर संजय लीला भन्साली यांच्या बहुच​र्चित ‘द लिजंड ऑफ पद्मावती’ या सिनेमाची घोषणा झाली. दरम्यान, सिनेमात राणी पद्मावती यांचा विकृत इतिहास दाखवला जाणार असल्याचा आरोप करत इतिहासप्रेमी नागरिक व संस्थांनी जयपूर येथे चित्रीकरणाला जोरदार विरोध केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. त्यानंतर काहीदिवस चित्रीकरण बंद होते. राजस्थान येथील चित्रीकरणाला विरोधामुळे महाराष्ट्रात चित्रीकरणाचा​ निर्णय घेण्यात आला. सिनेमातील युद्धाची दृश्ये चित्रीत करण्यासाठी आवश्यक लोकेशन्ससाठी सिनेमाच्या प्रॉडक्शन टीमने पन्हाळा येथील मसाई पठाराची जागा निश्चित केली. पन्हाळ्यातील ऐतिहासिक स्थळांची वैविध्यता असल्यामुळे येथे चित्रिकरणावर शिक्कामोर्तब झाले. युद्धाच्या चित्रीकरणासाठी घोडे, उंट असा लवाजमाही मागवण्यात आला.


स्थानिक कलाकारांना मिळाला रोजगार

द लिजंड ऑफ पद्मावती सिनेमातील युद्धाची दृश्ये मसाई पठारवर चित्रीत करण्यात येणार असल्यामुळे स्थानिक कलाकारांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मॉबसाठी सध्या टीममध्ये कोल्हापुरातील तीनशे कलाकारांना रोजगार मिळाला आहे. तसेच पन्हाळा परिसरातील खाद्यपदार्थ व्यावसायिक, जेवणाची ऑर्डर घेणारे उद्योजक यांनाही आर्थिक स्रोत निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images