Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बँकांनी कर्ज देत नसल्यानेफायनान्स कंपन्यांना लुबाडणूकबापूसाहेब पुजारी यांचा आरोप

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

बचत गटांतील महिलांना बँका कर्ज देत नसल्यामुळेच फायनान्स कंपन्यांना लुबाडणुकीसाठी रान मोकळे झाले आहे. तोंडी आणि रोखीने कर्ज देणाऱ्या कंपन्या महिलांची घोर फसवणूक करीत आहेत. अशा महिलांना कोणीच तारणहार नसल्याने खेड्यांपाड्यातील महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. त्यामुळे लुबाडणूक करणाऱ्या कंपन्यांच्या मुसक्या त्वरीत आवळाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा एकात्म समाज केंद्राचे अध्यक्ष बापूसाहेब पुजारी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

एकात्म समाज केंद्राच्या माध्यमातून चाळीस हजार सभासद असणारे दोन हजार महिला बचत गट चालविण्यात येत आहेत. गेली तीस वर्षे हे काम अव्याहतपणे सुरू आहे. परंतु अलिकडे बँकांनी बचत गटांना कर्ज देणे बंद केल्याने फायनान्स कंपन्यांचे चांगलेच फावले आहे. गेली दहा वर्षे कंपन्या लुबाडणूक करीत आहेत. फायनान्स कंपन्यांची कार्यालये निघतात आणि लुबाडणुकीचे टार्गेट पूर्ण करून एका रात्रीत गायब होतात. राजरोसपणे सुरू असलेला हा फसवणुकीचा धंदा बंद झाला पाहिजे. संबधितांच्या हातात बेड्या पडल्या पाहिजेत, अशी मागणी पुजारी यांनी केली.

बचत गट ही गोरगरिबांची चळवळ आहे. या मधील महिलांना रोखीने कर्ज देऊन रोखीने वसूल करून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा फायनान्स कंपन्या बंदच झाल्या पाहिजेत. त्यांची वसुली त्वरीत थांबवावी, वसुलीसाठी त्यांनी महिलांच्या दारात जायचे नाही. बचत गटांना कर्ज देण्याचे आदेश बँकांना देणे आवश्यक आहे. या गोष्टी तत्काळ झाल्या नाहीतर महिलांच्या समोर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरत नाही, इतकी भयावह स्थिती आहे, असेही पुजारी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राख नियंत्रण यंत्रणानसलेले बॉयलर बंद होणारप्रदूषण नियंत्रण मंडळाची वसंतदादा कारखान्यावर कारवाई

$
0
0



सांगली :

राख नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित नसलेले बॉयलर बंद करण्याचे आदेश शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला दिले. कारखान्याने बॉयलर बंद करण्यासाठी बहात्तर तासांची मुदत मागितली असून, राख नियंत्रण यंत्रणा रविवारी सायंकाळपर्यंत कार्यान्वित झाली नाहीतर कारखाना बंद करावा लागणार आहे, अशी माहिती सांगली जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांना दिली. समितीच्या आंदोलनाचे हे यश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी प्रदूषण नियंत्रणच्या सांगलीतील कार्यालयात ठिय्या आंदोलन करून वसंतदादा साखर कारखान्याच्या राखेच्या नियंत्रणाबाबत जाब विचारला होता. राखनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करावी आणि मगच कारखाना सुरू करावा, अशी भूमिका घेतली होती. या आंदोलनात समितीचे कार्याध्यक्ष अॅड. शिंदे, आर्किटेक्ट चव्हाण, प्रा. आर. बी. शिंदे, मुनीर मुल्ला, संतोष शिंदे, जयंत जाधव, अॅड. राजाराम यमगर, संजय जाधव, अंकुश केरीपाळे, सुनील गिड्डे, श्रेणीक गुरव, सचिन तामगावे, शंकर माळी, आप्पा तीमगोळ, रघुनाथ पाटील आदी कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी आपली बाजू मांडण्यासाठी प्रदूषणच्या कार्यालयात धाव घेतली होती. परंतु समिती आपल्या भूमिकेवर ठाम होती. त्यामुळे कारखान्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदूषणच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाला पाठवला होता. तो अहवाल प्राप्त झाल्यावर प्रादेशिक अधिकारी शिवांगी यांनी कारखान्यावर कारवाईचे आदेश दिले. आदेश हातात पडताच संध्याकाळी ७.३०ला उपप्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड व क्षेत्र अधिकारी यु. जी. माने यांनी कारखान्याला भेट कारवाईची कल्पना दिली. त्यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी कारखान्याचे बॉयलर तत्काळ बंद करता येत नसल्यामुळे राख नियंत्रणाची यंत्रणा नसलेले बॉयलर ७२ तासांच्या आत बंद करण्यासाठी परवानगी मागितली. त्यामुळे रविवार संध्याकाळीपर्यंत करखान्याने राख नियंत्रण करणारी यंत्रणा कार्यन्वित न केल्यास कारखाना बंद करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केवळ आश्वासनांचा पाऊस

$
0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील वस्त्रोद्योग व्यवसायाला 'अच्छे दिन' येतील, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र दोन वर्षानंतरही उद्योजकांना केवळ आश्वासनेच दिली जात असल्याने शेतीखालोखाल रोजगार देणारा वस्त्रोद्योग सरकारच्या नाकर्तेपणामुळे नामशेष होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

कॉँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत काही अंशी तग धरलेला हा व्यवसाय मागील दोन वर्षापासून मंदीच्या चक्रव्यूहात अधिक गुरफटला जात आहे. या उद्योगाच्या विकासासाठी अनुदानीत योजनांची जोड असावी लागते. पण भाजप सरकारने हा उद्योग जिवंत ठेवण्याऐवजी तो मोडकळीस कसा येईल, अशी रणनिती वापरुन मोठ-मोठ्या उद्योजकांपुढे पायघड्या पसरुन लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना संपविण्याचा डाव आखत असल्याचा आरोप होत आहे. भाजप सरकारने मागील दोन वर्षांपासून सर्वच अनुदानांना ब्रेक लावल्याने अगोदरच अडचणीत सापडलेला वस्त्रोद्योग आता अखेरची घटका मोजत आहे.

आघाडी सरकारच्या काळात यंत्रमाग व्यवसायाला ३५ टक्के अनुदान दिले जात होते. यामध्ये कारखाना इमारत, यंत्रसामग्री, सिलींग, एअर डक्टींग, स्पेअर पार्टस्, प्लॅन्टरुम आदींचा समावेश होता. सन २००९ मध्ये ही योजना बदलण्यात आली. नवीन उद्योगासाठी भांडवली खर्चाच्या २५ टक्के अनुदान जाहीर करण्यात आले. उद्योजकांना काहीसा दिलासा मिळत असतानाच या योजनेचे खरे स्वरुप बाहेर आले. यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाऊ रक्कमेवर २५ टक्के अनुदान आणि ते देखील सात वर्षे टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याचे समजताच नवउद्योजकांचा भ्रमनिरास झाला. साध्या यंत्रमागाच्या आधुनिकीकरणाचा निर्णयही सरकारच्या लाल फितीत गुरफटला आहे.

वस्त्रोद्योग जगविण्यासाठी कर्जावरील व्याज अनुदान व वीज दरातील सवलत मिळावी यासाठी राज्यातील भिवंडी, मालेगाव, विटा, तासगांव, माधवनगर, पेठवडगांव, रेंदाळ, हुपरी यासह इचलकरंजीतील कारखानदारांनी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने केली. सरकारदरबारी हा प्रश्न धसास लावण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रयत्न चालविला. पण दोन वर्षापासून केवळ आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने राज्यातील या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा भ्रमनिरास झाला आहे. हा उद्योग बंद पडण्याचा धोका निर्माण झाल्यास लाखो कामगारावर उपासमारीची वेळ येणार आहे. व्यवसायातील मंदीमुळे अनेक यंत्रमाग कारखानदार कर्जाचा बोजा अधिक घट्ट होत चालला आहे. यातूनच मध्यंतरी काही कारखानदारांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्याज अनुदान व वीज दरातील अनुदान पॅकेज देण्याची घोषणा केली होती. अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसात मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री देशमुख यांनी दिले होते. पण सहा महिन्यानंतरही यावर काहीच हालचाल होत नसल्यामुळे हिवाळी अधिवेशनात आमदार हाळवणकर यांनी पुन्हा लक्षवेधी उपस्थित करुन सरकारला यावर ठोस निर्णय द्यावा, अशी मागणी केली. पण वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी नेहमीच्या स्टाईलने येत्या १५ दिवसात निर्णय घेण्याचे गाजर दाखवून उद्योजकांची घोर निराशा केली. ‘अगोदरच मंदी त्यात आता नोटाबंदी’ अशा समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या वस्त्रोद्योग वाचविण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी आता राज्यातील यंत्रमाग केंद्रांतून आंदोलन होण्याची शक्यता आहे, याचे पहिले पाऊल इचलकरंजीकरांनी उचलले आहे.

...

चौकट

निराशाजनक उत्तर

यंत्रमाग व्यवसायातील मागण्यांसंदर्भात अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधीवरील चर्चेवेळी आमदार हाळवणकर यांनी सरकारचेच वाभाडे काढत वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून सरकार या उद्योगाला दिलासा देईल, असे वाटत नसल्याचे म्हटले. मागील वेळीही आश्वासन आणि आताही पुन्हा आश्वासनच दिले जात असेल तर सरकारचा कार्यक्रम कशाप्रकारे सुरु आहे. हे जनतेलाही समजेल, असा खोचक मुद्दा उपस्थित करुन सरकारच्या आश्वासनाने भाकरीचा प्रश्न सुटत नाही, ठोस निर्णयाची गरज आहे, अशी आठवण करुन दिली. मात्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या छापील उत्तरानंतर या प्रश्नावर भविष्यातही मार्ग निघू शकतो, ही अशी आशा मावळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्ल‌िनिकमध्येच छापखाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरातील डॉक्टरी पेशाची परंपरा मुलाने पुढे चालवावी म्हणून वडिलांनी त्याचे बीएचएमएसला अॅडमिशन केले. शिक्षणानंतर देवगड येथील वडिलांच्या क्लिनिकमध्ये काही काळ काम केल्यानंतर त्याला कष्टाविना पैसा मिळवण्याचा हव्यास त्याला जडला. केंद्र सरकारने घेतलेला नोटा बंदीचा निर्णय त्याला बनावट नोटा छापण्यासाठी संधीच ठरला आणि डॉक्टरचे रुपांतर अट्टल आरोपीमध्ये झाले. हव्यासानेच आत्मघात झाल्याने डॉ. सुधीर रावसाहेब कुंबळे (वय ३३, रा. एव्हरग्रीन होम्स, नागाळा पार्क) पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

सुधीर रावसाहेब कुंबळे हे नाव काल-परवापर्यंत नातेवाईकांसाठी आणि शेजाऱ्यांसाठी एक सज्जन डॉक्टर म्हणून परिचित होते. देवगड येथे वडिलांसोबत क्लिनिकमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर कोल्हापुरात स्वतःचे नाव कमविण्याच्या हेतूने सुधीर कुंबळे कोल्हापुरात आला होता. नागाळा पार्कातील एव्हरग्रीन होम्समध्ये त्याने फ्लॅटही घेतला. स्वतःचे क्लिनिक चालेल आणि मुलींचे शिक्षण होईल या हेतूने तो कुटुंबासह नागाळा पार्कातील घरात राहत होता. क्लिनिकसाठी त्याने खानविलकर पेट्रोल पंपासमोर गाळाही भाड्याने घेतला होता. गुरुवारी (ता. १५) मांगल्य क्लिनिकचे उद्‍घाटन करण्याचे नियोजन होते, मात्र याआधीच त्याला बनावट नोटांचा हव्यास जडला. वैद्यकीय क्षेत्रात बुद्ध‌िकौशल्याचा वापर करण्याऐवजी त्याने नोटांचा छापखानाच सुरू करण्याचा विचार केला. प्रिंटरच्या साहायाने सुरुवातीला वीस रुपयांच्या नोटा तयार केल्या. यानंतर १०० रुपयांच्या नोटा हुबेहूब तयार करण्यात यश आल्यानंतर त्याने दोन हजार रुपयांच्या नोटा तयार केल्या.

मोठ्या दुकानांमध्ये न जाता रस्त्याकडेला विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांकडे त्याने बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न केला. अशाच एका प्रयत्नात तो लक्ष्मीपुरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सुरुवातीला त्याने सज्जनपणाचा आव आणला, पण पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर तो निरुत्तर झाला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बनावट नोटा छापत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या क्लिनिकमधून १७ हजार, १२० रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटर, स्कॅनर आणि कटर जप्त केला. पोलिसांच्या कारवाईनंतर डॉक्टरचे खरे रुप समोर आले, तर या घटनेने कुंबळे कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.

नागाळा पार्क येथील घरात त्याची आई, भाऊ, पत्नी आणि दोन मुली राहतात. कुंबळे याने किती नोटा छापल्या आणि त्या कुठे खपवल्या याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्याच्यावर कलम ४२०, ५११, ४८९ अ आणि ब हे फसवणूक, बनावट नोटा छापणे आणि बाळगण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. कोर्टात हजर केले असता, त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. अशी माहिती पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

ठराविक नंबरच्याच नोटा

डॉ. सुधीर कुंबळे याने छापलेल्या नोटांपैकी २ हजार रुपयांच्या नोटा 6AV 358276, 4FB 412450, 4AP 737962 या क्रमांकाच्या आहेत. नोटांसाठी त्याने एक्सेल बॉन्ड कागद वापरला असून, १०० रुपयांच्या नोटा हुबेहूब तयार केल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटेच्या कागदाचा सुमार दर्जा, तसेच पांढऱ्या गोलात गांधीजींची प्रतिमा नसल्याने ही फसवणूक उघडकीस आली. विक्रेत्याच्या चाणाक्षपणामुळेच डॉ. कुंबळे पोलिसांच्या हाती लागला.

क्लिनिकमध्येच छापाई

कुंबळे याने बीएचएमएस पदवी संपादन केल्याची महिती पोलिसांना दिली आहे. त्याने खानविलकर पेट्रोल पंपासमोर नुकतेच मांगल्य क्लिनिकसाठी गाळा घेतला होता. मात्र ते सुरू केले नव्हते. याच क्लिनिकमध्ये तो नोटांची छापाई करीत होता. गुरुवारीच क्लिनिकचे उद्घाटन करणार होतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र उद्घाटनाची कोणतीच तयारी नसल्याने त्याच्या पदवीबाबतही शंका उपस्थित झाली आहे.

अटकेनंतरही मग्रुरी कायम

कुंबळेला पोलिसांनी अटक केल्यानंतर पत्रकारांनी त्याच्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पश्चातापाची भावना व्यक्त करण्याऐवजी आपण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगत त्याने पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा वापरली. फसवणुकीचा मोठा गुन्हा करूनही काहीच चुकीचे केले नसल्याच्या अविर्भावात तो पोलिस ठाण्यात वावरत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळा भाड्याचे पाच कोटी थक‌ित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या दुकानगाळ्यांच्या भाडेवाढीबाबत वाद असताना विचारे कॉम्प्लेक्समधील बहुतांश गाळ्यांचे भाडे थकित असतानाही गाळे वापरले जात आहेत. असा आरोप स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. अनेकांनी गाळे नावावर घेतले आहेत, पण त्यांचे भाडे भरले जात नसल्याने ५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची गंभीर बाब नगरसेवक सत्यज‌ित कदम यांनी बैठकीत निदर्शनास आणली.

दरम्यान, थेट पाइपलाइन योजनेच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट पुर्ण झालेले नसताना योजनेचे काम कसे सुरू आहे, अशी विचारणा नगरसेवक अजित ठाणेकर यांनी केली. शहरात सध्या महापालिकेच्या दुकानगाळ्यांचा विषय महत्त्वाचा बनला आहे. सत्यज‌ित कदम यांनी दुकानगाळ्यांबाबत प्रशासनाची विसंगत भूमिका मांडली. एकीकडे भाडेवाढीचा चुकीचा प्रस्ताव सादर केल्याचा आरोप केलाच, शिवाय नोव्हेंबरपर्यंत जुने भाडे भरून घेऊन नवीन दरवाढीचा प्रस्ताव सादर करा असेही सांगितले. एकीकडे भाडेवाढ केली जाते तर दुसरीकडे विचारे कॉम्प्लेक्समधील ५०० गाळ्यांपैकी फक्त २५ गाळेधारक प्रामाणिकपणे भाडे भरतात. अन्य ठिकाणी अवैध धंदे व गैरकारभार सुरू आहे. फुकट गाळे वापरणाऱ्यांचे गाळे का काढून घेतले जात नाहीत. पाच कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा फुकट गाळे वापरणाऱ्यांचे गाळे काढून घ्या, अशी मागणी कदम यांनी केली. यावेळी अशा प्रकारचे गाळे ताब्यात घेऊन निविदा काढून भाड्याने देऊ असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. तर गाळेधारकांनी मुदतवाढ घेतलेली नाही. करार संपलेले असल्याने भाडे भरलेले नाही. मुदतीनंतर थकलेल्या भाड्यावर कायद्याच्या तरतुदीनुसार रेडीरेकनरप्रमाणे भाडे लावले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

थेट पाइपलाइन योजनेच्या थर्ड पार्टी ऑडिट होईपर्यंत काम का सुरू आहे, अशी विचारणा अजित ठाणेकर यांनी केली. ऑडिट झाल्याशिवाय सरकारकडून पुढील निधी मिळणार आहे, असे प्रशासनाने ​स्पष्ट केले. आरई इन्फ्राच्यावतीने केलेल्या फोर्ड कॉर्नरवरील कामाची विचारणा मेहजबीन सुभेदार यांनी केली. तर शहरात अतिक्रमण वाढत असून रिक्षा कशाही उभ्या केल्या जात आहेत. पट्टे मारले तरी विक्रेते रस्त्यावर बसतात. अतिक्रमण विभागाचे लक्ष नसल्याचा आरोप जयश्री चव्हाण यांनी केला.

तीन वर्षे गैरहजर

झाडू कामगार एक ते दोन महिने गैरहजर असल्यास त्यांना पुन्हा कामावर हजर करून घेतले जात नाही. विजयकुमार दाभाडे तीन वर्षानंतर हजर झाले. त्यांना चौकशीआधी हजर कसे करुन घेतले, असे जयश्री चव्हाण यांनी विचारणा केली. याबाबत प्रशासनालाही काही उत्तर देता आलेले नसून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर तसलमातची रक्कम वैयक्तिक कारणासाठी वापरल्याबद्दल बिसुरे या कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली? त्यांच्याकडून दोन लाख ६४ हजार रुपये येणे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचे अजित ठाणेकर, सत्यजित कदम यांनी सांगितले. प्रशासनाने त्यांच्या पगारातून पैसे वसुलीसाठी प्रस्तावित केले असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृतनगर फाटा येथे सडलेला मृतदेह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील अमृतनगर फाटा येथे मुलाच्या सैनिकी स्कूलमध्ये भेटीला आलेल्या संतोष शेषराव माळी (वय ४२, रा. पळसप, ता.जि.उस्मानाबाद,सध्या रा.वाडेगांव, ता.सांगोला,जि.सोलापूर) यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी इंडिका कारमध्ये सडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वी घडली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून दारुच्या नशेत गाडीत त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे वैद्यकिय अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेची नोंद पेठ वडगाव पोलिसांत झालेली आहे.

याबाबत घटनास्थळावरुन व पेठ वडगांव पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संतोष माळी यांचा मुलगा वल्लभ (वय १२) हा इयत्ता सहावीमध्ये नवे पारगाव येथील विश्ववारणा निवासी सैनिकी शाळेत शिकत आहे. रविवारी( ता. ११) रोजी पालक भेट असल्यामुळे ते सकाळी माळी हे नऊच्या दरम्यान टाटा इंडिकामधून आले होते. त्यांनी आपल्या मुलाच्या सहलीसाठीची लागणारी २००० रु. रक्कमही शाळेत भरली. त्यानंतर पालकभेटीला न थांबताच ते निघून गेले.

संतोष माळी हे व्यसनाधीन होते. शाळेतून रविवारी सकाळीच ते निघून गेले. आपल्या इंडिका कारमधून अमृतनगर या ठिकाणी सरनाईक यांच्या पेट्रोल पंपाशेजारी मोकळ्या जागेत त्यानी गाडी पार्क केली. त्यानंतर जवळच असणाऱ्या बिअरबार व वाईन शॉपच्या दिशेने ते गेलेले व आलेले पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता पोलिसांना दिसून आले आहे. संतोष यांनी पार्क केलेली इंडिका गाडी पेट्रोल पंपाच्या संरक्षक भिंतीच्या पश्चिमेला पेट्रोल पंपाकडे तोंड करुन उभी केली आहे. ती गाडी रविवारपासून तेथेच उभी होती. हे देखील फुटेजमध्ये स्पष्ट होते. बुधवारी (ता.१४) सकाळी ७-३० च्या दरम्यान शाळेची सहल गेली असून या सहलीतून माळी यांचा मुलगा वल्लभ़ रत्नागिरी,सिंधुदुर्ग,मालवण या ठिकाणी सहलीसाठी गेला आहे.

शुक्रवारी सकाळी पेट्रोल पंपाचे मॅनेजर यशवंत देसाई हे नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर आले असता पेट्रोल पंपाशेजारच्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या इंडिका गाडीतून उग्र वास येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी गाडीजवळ जाऊन पाहिले असता बंद गाडीमध्ये मृत पुरूष आढळून आला. त्यांनी पोलिसांना वर्दी दिल्यानंतर पोलिसांनी पुढील कार्यवाही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. ते आत्मसात करून त्याचा समाजासाठी करण्याची डॉक्टरांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. कान, नाक व घसा तज्ज्ञ संघटना, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवशीय वैद्यकीय परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. पाटील पाटील बोलत होते. यावेळी मलेशिया येथील डॉ. पी. नारायण प्रमुख उपस्थित होते. या परिषदेत डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते डॉ. एन. डी. गुरव, डॉ. शिवकुमार कुलकर्णी-सोलापूरकर आणि औरंगाबादचे डॉ. अशोक रेगे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी परिषदेचे चेअरमन डॉ. व्यंकटेश रायकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. पाटील म्हणाले, ‘मी शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टर आहे. वैद्यकीय क्षेत्रातील घडामोडी फार माहिती नसली तरी येथे अनेक बदल घडत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहेत. डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेतच. पण त्यांच्यातील सकारात्मक विचार नवनिर्मितीला प्रेरणा देत असतात. चांगले विचार आणि आचार ठेऊन ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट ठेवा.’

सत्काराला उत्तर देताना डॉ. रेगे म्हणाले, ‘डॉक्टरांनी संगीताच्या अभ्यासासारखाच वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास केला तर रुग्णांमधील आजाराचे बारकावे लक्षात येतील. सकारात्मक विचार करून वाटचाल केल्यास कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.’

डॉ. गुरव म्हणाले, ‘वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्ष केलेल्या कार्यामुळे हा पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार सामाजिक कार्य करण्यास प्रेरणा देईल.’

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘या पुरस्कारामध्ये माझ्या पत्नीचेही योगदान मोठे आहे. आपल्या क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती घेऊन युवापिढीने वाटचाल करावी.’

याप्रसंगी डॉ. प्रकाश बहेरे, डॉ. राकेश शर्मा, डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. एच. विजयेंद्र, डॉ. टी. एन. जानकिराम उपस्थित होते. परिषदेचे चेअरमन डॉ. व्यंकटेश रायकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. निवेदिता पाटील व अमित बुरांडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले.

...

शस्त्रक्रियेचे थेट प्रेक्षपण

या क्षेत्रातील अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान व त्याची माहिती सर्वांना मिळावी, यासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये करण्यात येणाऱ्या नाक व कानाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे थेट प्रेक्षपण हॉटेल सयाजी येथील परिषदेमध्ये दाखवण्यात आले.या परिषदेमध्ये राज्यभरातून ८०० तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेवर दारुबंदी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्गांवरील दारुविक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे यापुढे महामार्गांच्या दोन्ही बाजूला अर्धा किलोमीटर अंतरावर दारू विक्री होणार नाही. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १५० वाइन शॉप, बिअर बार आणि देशी दारू विक्रीच्या दुकानांना कुलूप लागणार आहे.

देशात महामार्ग प्रशस्त झाल्यानंतरही अपघातांची संख्या कमी झालेली नाही. उलट दररोज होणाऱ्या अपघातांमध्ये हजारो प्रवाशांचे प्राण जात आहेत, तर लाखो प्रवाशी आयुष्यभरासाठी जायबंदी होत आहेत. बहुतांश अपघातांमध्ये वाहनचालकाने मद्यप्राशान केल्याचे स्पष्ट होत आहे. महामार्गांवर सहज दारू उपलब्ध होत असल्याने बहुतांश वाहनधारक प्रवासादरम्यानच दारूची खरेदी करतात आणि मद्यप्राशनही करतात. नशेत वाहन चालवताना अपघात होऊन मोठी हानी होते. याबाबत पंजाबमधील काही सामाजिक संघटनांनी सुप्रिम कोर्टात धाव घेऊन राष्ट्रीय महामार्गांसह राज्य महामार्गांवरील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याची विनंती केली होती.

महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण आणि कारणमीमांसा ऐकल्यानंतर सुप्रिम कोर्टाने महामार्गांवरील दारू विक्रीची दुकाने ५०० मीटरच्या बाहेर हटवण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे देशभरातील महामार्गांवरील दुकाने ५०० मीटर अंतराबाहेर जाणार आहेत, अन्यथा १ एप्रिल २०१७ पासून या दुकानांना परवाने मिळणार नाहीत.

कोल्हापूर जिल्ह्यात ४५ वाइन शॉप, ६८० परमीट रुम बिअर बार, ३५५ बिअर शॉपी आणि २८५ देशी दारुची दुकाने आहेत. पुणे-बेंगळुरू महामार्गावर कागल ते घुणकी, कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-राधानगरी, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-गारगोटी आणि बहिरेवाडी ते आजरा-आंबोली या मार्गांवरील सर्व दारू विक्रीची दुकाने नवीन आदेशाच्या कक्षेत आली आहेत. यातील बहुतांश दुकाने गावठाणापासून जवळच आहेत. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयात गावठाणातील दुकानांबाबत स्पष्टता नसल्याने याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नवीन आदेशाची अंमलबजावणी होताच जिल्ह्यातील सुमारे १५० दुकानांना कुलूप लागणार आहे. यामध्ये कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-रत्नागिरी आणि राष्ट्रीय महामार्गावरील सर्वाधिक दुकानांचा समावेश आहे. सुप्रिम कोर्टाचा आदेश जाहीर होताच जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, शुक्रवारी बऱ्याच विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात धाव घेऊन आदेशाबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या निर्णयामुळे नवीन परवान्यांच्या मागणीलाही ब्रेक लागला आहे.

चौकट

‌जिल्ह्यातील स्थिती

वाइन शॉप ४५

परमिट रुम बिअर बार ६८०

बिअर शॉपी ३५५

देशी दारू दुकाने २८५

एकूण दुकाने १३६५

चौकट – परवाना फी

वाइन शॉप ३ लाख

परमिट रुम बिअर बार ५० हजार

बिअर शॉपी १८ हजार

देशी दारू दुकान ३८ हजार



आदेश येताच त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू. महामार्गांपासून ५०० मीटर अंतरातील दुकानांचे कोर्टाच्या आदेशानुसार परवाने नूतनीकरण होणार नाहीत. गावठाणातील दुकानांबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. प्रत्यक्षात आदेश आल्यानंतरच निश्चित माहिती मिळेल.

संतोष झगडे,

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग



सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. नशेत वाहने चालवणाऱ्यांमुळेच जास्त अपघात होतात. काही चालकांच्या नशाबाजीमुळे निर्दोष लोकांचे बळी जातात. महामार्गांवरील दारूविक्रीची दुकाने बंद झाल्यास अपघातांचेही प्रमाण कमी होईल.

सुनील मोहिते, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मिशन कॅशलेस’ साठी तरूणाई बनली अॅपगुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीमुळे रोखीच्या व्यवहारावर आलेल्या मर्यादेवर मात करत ऑनलाइन व्यवहाराचा सुकर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स, केआयटी कॉलेज आणि एसबीआय यांच्या माध्यमातून अॅपगुरू बनलेल्या तरूणाईने शुक्रवारी नागरिकांना एसबीआय बडी मोबाइल अॅपच्या वापरासंदर्भात माहिती दिली. गुरूवारपासून सुरू झालेल्या मोहिमेच्या प्रत्यक्ष जागृतीमोहिमेला युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी आरटीओ कार्यालयात लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बडी अॅप डाउनलोड करून सहजपणे आर्थिक व्यवहार करण्याचे प्रशिक्षण या मोहिमेतील अॅपदूत बनलेल्या युवकांनी दिले.

कॅशलेस व्यवहारासाठी ‘एसबीआय बडी मोबाइलअॅप’च्या वापरासंबंधी ‘केआयटी’ (आयएमईआर)च्या १०० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी प्रमुख बाजारपेठेतील छोट्या व्यवसायिकांना अॅप वापरण्याबाबत प्रशिक्षण देण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. गुरूवारी शहरातील महाविद्यालयीन तरूणांना बडी अॅप वापराबाबत माहिती देण्याची मोहीम फत्ते केल्यानंतर आज, शुक्रवारी मिशन कॅशलेस कोल्हापूर या मोहिमेतील तरूणाईने आपला मोर्चा सर्वसामान्य नागरिकांकडे वळवला.

ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना वाटणारी असुरक्षितता आणि भीती काढून टाकण्यासाठी तरूणाईने पुढाकार घेतला. हातातल्या स्मार्ट फोनचा उपयोग स्मार्ट कसा करायचा हे सांगत बडी अॅप अनेक सामान्य ग्राहकांच्या, छोट्या व्यापाऱ्यांच्या मोबइल फोनमध्ये डाउनलोड करण्यात आले. अगदी आपला फोटो काढून मित्राला पाठवला जावा, इतक्या सोप्या पदधतीने आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा असलेल्या बडी अॅपमधील विविध पर्याय आणि उपयुक्तता याविषयीच्या शंकाही तरूणाईने दूर केल्या.

शुक्रवारी तरूणाईची एक टीम इचलकरंजी, जयसिंगपूर आणि मिरज येथे रवाना झाली होती. येथील व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रेते, व्यावसायिक यांच्यासह ऑनलाइन व्यवहारापासून लांब असलेल्या सामान्य नागरिकांमध्ये बडी अॅपच्या स्वीकारार्हतेबाबत जागृती करण्याची मोहीम युवकांनी राबवली.

कॅशलेस व्यवहार कसे करायचे, वॉलेटमध्ये रक्कम कशी जमा करायची, त्याचा वापर व्यक्ती-व्यक्तींमध्ये, मोबाइल रिचार्ज, दैनंदिन बिले (लाइट, पाणी, फोन, गॅस सिलिंडर) ऑनलाइन शॉपिंगसाठी कसा करायचा, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी युवा टीम काम करणार आहे. विद्यार्थ्यांचा ग्रुप करुन प्रत्येक ग्रुपसाठी एक स्वतंत्र बँक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, हे सर्व विद्यार्थी विद्यापीठ, विविध कॉलेज, नागरिकांना कॅशलेस व्यवहारांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटा छापणारा डॉक्टर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनावट नोटा छापून त्या खपवणाऱ्या डॉक्टरला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. डॉ. सुधीर रावसाहेब कुंबळे (वय ३३, मूळ रा. मुक्काम भाटवाडी, पो. धालवली, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. प्लॉट नं. ५०४, एव्हरग्रीन होम्स, नागाळा पार्क) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने बनावट नोटा छापल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्या क्लिनिकमधून १७ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह प्रिंटर, कटर असे छापाईचे साहित्य जप्त केले. याबाबत विक्रेते औरंगजेब मुबारक नदाफ यांनी फिर्याद दाखल केली होती.

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शहरात बनावट नोटा खपवणाऱ्या व्यक्ती सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुरूवारी दुपारी भाऊसिंगजी रोडवर बीएसएनएल ऑफिससमोर बूट, चप्पल विक्रेत्याकडे एक व्यक्ती बूट खरेदीसाठी आली होती. बूट खरेदी केल्यानंतर त्याने विक्रेते औरंगजेब मुबारक नदाफ (वय ३८) यांच्याकडे २ हजाराची नोट दिली. उरलेले पैसे परत घेण्यासाठी घाई करत असल्याने नदाफ यांना संशय आला. नोटेची पाहणी केली असता त्यावरील पांढऱ्या गोलात महात्मा गांधीजींची प्रतिमा दिसली नाही. नदाफ यांनी संशयित व्यक्तीला बोलण्यात गुंतवून लक्ष्मीपुरी पोलिसांना माहिती कळवली. तातडीने पोलिसांनी भाऊसिंगजी रोडकडे धाव घेतली आणि संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडील नोटेची तपासणी केली असता नोट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीमध्ये त्याने स्वतःचे नाव डॉ. सुधीर कुंबळे असल्याचे सांगितले. पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बनावट नोटा छापल्याची कबुली दिली. पोलिसांनी खानविलकर पेट्रोल पंपासमोरील डॉ. कुंबळे याच्या मांगल्य क्लिनिकची झडती घेतली असता प्रिंटर, कटर आणि १७ हजार १२० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांना मिळाल्या. यात २ हजार रुपयांच्या ८ नोटा, १०० रुपयांच्या १०, तर २० रुपयांच्या ६ नोटा आहेत. काही नोटा अर्धवट छापलेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेचा ३०४ कोटींचा बोजा कमी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारच्यावतीने जिल्हा बँकांकडे जमा असलेल्या जुन्या नोटा स्वीकारण्याचे संकेत दिल्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या महिनाभरापासून असलेला ३०४ कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा बोजा कमी होणार आहे. या रकमेवर द्यावे लागणाऱ्या व्याजामुळे जिल्हा बँकेला चार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर दहा ते १३ नोव्हेंबरपर्यंत इतर बँकांप्रमाणे जिल्हा बँकांनाही जुन्या नोटा स्वीकारण्याबरोबर नोटा बदलून देण्यास परवानगी होती. मात्र १३ नोव्हेंबरला अचानक रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांवर नोटा स्वीकारण्याबरोबरच नोटा बदलून ​देण्यावरही निर्बंध आणले. यामुळे जिल्हा बँकांचे कामकाजच ठप्प झाले. महिनाभरात अगदी जुजबी उलाढाल होत आहे. त्याचवेळी ८ नोव्हेंबरपर्यंत बँकेत जमा असलेली रक्कम व १० ते १३ तारखेपर्यंत जमा झालेल्या रकमेचा आकडा ३०४ कोटी रुपयापर्यंत पोहचला होता. ही रक्कम त्यानंतर करन्सी चेस्ट असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनी स्वीकारण्यास नकार दिला. जिल्ह्यातील सर्व शाखांमधील जमा रक्कम ​मुख्य कार्यालयात आणून ठेवण्यात आली होती. याबाबत ​सर्व जिल्हा बँकांबरोबर कोल्हापूर बँकही सर्वोच्च न्यायालयात गेली होती. त्यावरील सुनावणीवेळी सरकारने जुन्या जमा असलेल्या नोटा स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.

सरकारच्या या पवित्र्यामुळे जिल्हा बँकेकडे महिनाभरापासून जमा असलेली ३०४ कोटी रुपयांची रोकड ​करन्सी चेस्टकडे जमा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यासाठी रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक आवश्यक आहे. त्याकडे आता जिल्हा बँकेचे डोळे लागले आहेत. या रकमेवर जिल्हा बँकेला दररोज व्याज द्यावे लागत आहे. याप्रकारे दररोज १५ लाख रुपयांचा व्याजाचा बोजा बँकेवर पडत आहे. यानुसार आतापर्यंत ४ कोटी रुपयांचे नुकसान बँकेला सोसावे लागले आहे. सुनावणीनंतर जिल्हा बँकेवरील हा बोजा लवकरच कमी होण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.

....

जिल्हा बँकेकडे जमा झालेल्या नोटा स्वीकारण्याबाबत कोर्टात जावे लागले. या रकमेवरील व्याजामुळे बँकेवर बोजा पडला आहे. आतापर्यंत तोट्यात जाऊन पीक कर्जाचे वितरण बँक करत होती. पण आता यानंतर पीक कर्जाचे वितरण करायचे की नाही याबाबत विचार करावा लागणार आहे.

आमदार हसन मुश्रीफ, चेअरमन, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचारप्रकरणी फौजदारीचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील भारत निर्माण योजना आणि राष्ट्रीय पेयजल योजनेत एकच गाव दोन वेळा लाभार्थी दाखविण्यात आले. खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे रक्कम लाटली. या घोटाळ्यातील सहभागी असलेल्या दोषीवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केल्याप्रकरणी मुख्य जबाबदार म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदेसह १५ जणांच्या विरोधात फौजदारी दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने शाहुपूरी पोलिसांना दिले आहेत, असा दावा याचिकाकर्ते रंगराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

याचिकाकर्ते रंगराव पाटील म्हणाले, ‘माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार शाहुपूरी पोलिसांत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर, २०१६ मध्ये फिर्याद दिली. शाहुपूरी पोलिसांनीही चौकशी अहवालानुसार प्राथमिक गुन्हा नोंद न करता टाळाटाळ केली. राजकीय दबावाखाली सीईओ खेमणार यांनीही संबधितांच्यावर कारवाई केली नसल्याने न्यायालयात याचिका दाखल केली. पणुत्रे येथे कंत्राटाप्रमाणे विना त्रूटी व परिपूर्ण काम करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची होती. पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी भारत निर्माण योजना ही पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेत भारत निर्माण योजना दरडोई ४० लि. पाणी पुरवठा करण्यासाठी खर्च म्हणून ४९. ६० लाख रूपये मंजूर झाले. योजनेप्रमाणे जॅकवेलमधील गाळ, ट्रेंच गॅलरी, कॉपर डॅम आदीची जबाबदारी जिल्हा परिषदेवर होती. मात्र जबाबदार असलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी योजनेतील कामे अपूर्ण आणि त्रूटीयुक्त असतानाही पूर्ण झाल्याची कागदपत्रे तयार केली. त्या कागदपत्रांच्या आधारे संबधित कंत्राटदाराला ४९.४० लाख रूपये २०१२ मध्ये दिले आहेत.

रंगराव पाटील म्हणाले, ‘त्रुटीयुक्त योजना सुरू असतानाच पुन्हा पणुत्रे गावी २०१२-१३ मध्ये केंद्र सरकारची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना लागू केली. वाढीव १५ लिटर पाणी देत असल्याचे भासवून पणुत्रे गावाला लाभार्थी म्हणून घोषित करून ५० लाखांचा खर्च योजनेत दाखविला. खोटी आणि बनावट कागदपत्रे तयारी केली. एकाच गावांत दोन दोन योजना राबवून एका योजनेतील खर्चाची कामे पुन्हा दुसऱ्या योजनेत दाखविली. पहिल्या योजनेचा खर्च दुसऱ्या योजनेत लागणार असल्याचे सांगितले. काम कमी करून जादा पैसे मिळविण्याचा खटाटोप केला. त्यानंतर झालेल्या तक्रारी आणि चौकशी अहवालानुसार गुन्हा सिद्ध होत असतानाही सीईओ डॉ. कुणाल खेमणार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. भारत निर्माण योजनेत ४७ लाख खर्च झाली. त्यानंतर राष्ट्रीय पेयजल योजनेत ४९ लाख खर्च करण्याची गरज नव्हती.


न्यायालयाकडून अद्याप नोटीस आलेली नाही. संबधित प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, असे आदेश दिल्याचे समजते. नोटीस आल्यानंतर वकिलांचा सल्ला घेऊन न्यायालयात म्हणणे मांडले जाईल. यापूर्वीही तक्रार केलेल्या योजनेची चौकशी अहवाल दिला आहे.

डॉ. कुणाल खेमणार, सीईओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायनान्स कंपन्यांवर कारवाई करणारअर्थमंत्री मुनगंटीवार यांची विधानसभेत घोषणा

$
0
0



भगवान शेवडे, शिराळा

‘मांगले (ता. शिराळा) गावातील महिला बचत गटांची लुबाडणूक करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,’ अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपुरात सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात दिली. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक या बाबत लक्षवेधी माडून हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता.

‘बचत गटांना बँका कर्ज देत नसल्याने महाराष्ट्रात सर्वत्र हा प्रकार सुरू आहे. महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मायक्रो कंपन्यांनी महिलांची आर्थिक लुबाडणूक सुरू केली आहे. २६ टक्के व्याजाने पैसे देऊन काही वस्तूही या बचत गटांमधील महिलांच्या गळ्यात मारल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. सक्तीच्या वसुलीमुळे मांगल्यात एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतरही फायन्सास कंपनीने सक्तीने वसुली सुरूच ठेवली होती. वसुलीबाबत इतर महिलांवर दबाव आणला गेला. या सक्तीने वसुली करणाऱ्या व अवाजवी व्याज आकारणी करणाऱ्या फायनान्स कंपनीवर कारवाई करावी. महिलांनी फायनान्स कंपनीकडून काढलेले कर्ज इतर बॅँकांकडे वर्ग करून थकबाकीत राहिलेले कर्ज माफ करावे,’ अशी मागणी आमदार नाईक यांनी लक्षवेधी मांडताना केली. त्यांच्या मागणीला आमदार मिलिंद साने, चरण वाघमारे, अतुल भातखळकर, आशिष शेलार, डॉ. अनिल बोंडे, देवयानी फरांदे, अजित पवार, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे, जयदत्त क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, पांडुरंग वरोरा, सुरेश लाड, भास्कर जाधव यांनी या विषयाला अनुमोदन दिले. विषयाचे गाभीर्य लक्ष्यात घेऊन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबधित फायनान्स कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सभागृहाला दिल्याची माहिती आमदार नाईक ‘मटा’शी बोलताना दिली.


वसुली अधिकाऱ्यांनी पळ काढला

मांगले गावात शनिवारी मायक्रो फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी आले. मात्र, संबधित महिलांनी गावातील प्रमुख मंडळींना या बाबत कल्पना दिल्याचे व लोक आक्रमक असल्याचे कळताच त्यांनी पळ काढला. दरम्यान, ग्रामस्थांनी वसुलीसाठी येताना कुबड्या घेऊन या, असा दम दिल्याने वसुली अधिकाऱ्यांनी महिला बचत गटांच्या प्रमुख महिलांना फोन करून एचडीएफसी बँकेच्या खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. मात्र, महिलांनी अन्यायी कर्ज आणि व्याज वसुलीला कडाडून विरोध केला आहे. गट प्रमुख महिलांनी जमा केलेले हप्त्याचे पैसे संबधित महिलांना परत दिले आहेत. महिलांनी सतरा खासगी सावकारांच्या विरोधात तक्रारी दिल्या असून, त्या आम्ही जिल्हा पोलिस प्रमुखांना देणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेंभूर्णीत पन्नासलाख जप्त

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास ५० लाखांची रोकड एका चारचाकी गाडीतून टेंभुर्णी पोलिसानी जप्त केली. या बाबतची टीप पोलिसाना मिळाली होती, साद्या वेशातील पोलिस संशयित गाडीवर दिवसभर नजर ठेवून होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास टेंभुर्णी जवळील वरवडे टोल नाक्यावर गाडी येताच पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली.

ताब्यात घेतलेल्या गाडीत ५० लाख रुपयांची रोकड असल्याचे आढळून आले. गाडीसोबत ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेचे अधिकारी, २ कर्मचारी व सुरक्षारक्षक असून, पुणे येथील लक्ष्मी रोड शाखेतून ही रक्कम सोलापूरकडे नेत असल्याचे या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

५० लाख रुपयांत जुन्या १ हजार रुपयाच्या १५६६, ५०० रुपयांच्या २५४६ नोटा तर नवीन २ हजारांच्या ४४२ व १००च्या १० नोटा असल्याचे पोलिस पंचनाम्यात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या बाबत आयकर विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. मात्र, आयकर विभागाकडून योग्य प्रतिसाद येत नसल्याने पोलिसांनी स्थानिक स्टेट बँकेचे अधिकारी आणि तंटामुक्ती समिती अध्यक्षांच्या उपस्थितीत या पैशाचा पंचनामा केला आहे. दरम्यान, टेंभुर्णी पोलिस निरीक्षक बल्लाळ आयकर विभागाच्या संपर्कात असून, रविवारी सकाळपर्यंत आयकर विभागाची टीम पोचण्याची अपेक्षा आहे. नोटबंदीनंतर सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम सापडली असून, आयकर खात्याच्या तपासनंतरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओढ्यावरील रेणुका देवीची आंबिल यात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘उदं गं आई उद’च्या नामघोषात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओढ्यावरील रेणुका देवीची आंबिल यात्रा शनिवारी पारंपरिक व उत्साही वातावरणात पार पडली. पहाटे साडेतीन वाजल्यापासून नैवद्य देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराचा परिसर दिवसभर गजबजून गेला होता. अनुचित प्रकार घडू नये तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोल्हापूर शहर व परिसरातून कर्नाटकातील सौंदती येथे भरणाऱ्या रेणुका यात्रेसाठी हजारो भाविक जात असतात. येथील यात्रा संपल्यानंतर शहरातील जवाहरनगर येथील रेणुका देवीच्या मंदिरात आज आंबिल यात्रा भरली होती. सकाळी विधीवत अभिषेकानंतर देवीची बैठी पूजा बांधण्यात आली. त्यानंतर मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. पहाटे साडेतीन वाजता छत्रपती मधुरिमाराजे आणि संयोगिताराजे यांनी नैवेद्य दाखविल्यानंतर आंबिल यात्रेला प्रारंभ झाला.

पहाटे साडेतीन- चार वाजल्यापासूनच देवीच्या दर्शन आणि नैवेद्य देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. देवीचे दर्शन सुलभरीत्या होण्यासाठी पुरुष व महिलांच्या स्वतंत्र दर्शन रांगा लावण्यात आल्या होत्या. देवीला भरलं वांगं, मेथीची भाजी, वडी, गाजर, कांदापात, लिंबू, केळ आणि भाकरीचा नैवेद्य देण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

शहरासह मंगळवार पेठ शिवाजी पेठ, बुधवार पेठ, जवाहरनगर, भीमनगर, संभाजीनगर, उद्यमनगर, रविवार पेठ, सम्राटनगर आदी भागातील महिला नैवेद्य घेऊन मंदिराकडे येत होत्या. मंदिराच्या परिसरात विविध प्रकारची खेळणी, खाद्य पदार्थ व प्रसादाचे स्टॉल उभारण्यात आले होते. अनेक महिलांनी नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओढयाच्या बाजूलाच सामूहिक भोजन केले. सायंकाळी सहानंतर केवळ दर्शनासाठी येणाऱयांची गर्दी वाढली. रात्री ९ वाजता जगाची आरती झाल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर प्रेस क्लबचे खंडपीठासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात झालेच पाहिजे, या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये कोल्हापूर प्रेस क्लब सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला. खंडपीठाचा प्रश्न केवळ वकिलांचा नसून सर्व जनतेचा आहे. हे दर्शवण्यासाठी आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

खंडपीठासाठी खंडपीठ कृती समितीच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनामध्ये विविध संघटनांनी तसेच ​जिल्ह्यातील ​वकिलांनी सहभागी होऊन हा लढा सर्व जनतेचा असल्याचे दाखवून दिले आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर मुंबईतून आंदोलनाकडे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रेस क्लबने आंदोलनात सहभागी होऊन खंडपीठाच्या मागणीला पाठिंबा दिला.

यावेळी कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे व माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवण्याची भूमिका मांडली. यावेळी खंडपीठ झालेच पाहिजे, ३२ वर्षांची खंडपीठाची मागणी मान्य करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष पाटील यांनी सहा जिल्ह्यातील नागरिकांसाठी खंडपीठ आवश्यक आहे. हा केवळ वकिलांचा प्रश्न नसून सर्व जनतेचा आहे. त्याची तीव्रता येथील माध्यमातून मांडण्यात येत आहे, असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संतोष पाटील, बाबूराव रानगे, विकास कांबळे, सरदार करले, विजय पाटील, समीर मुजावर, अमोल सावंत, शिवाजीराव यादव, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपावरही नोटा खपविण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनावट नोटा प्रकरणातील संशयित डॉ. सुधीर कुंबळे याने गुरुवारी सकाळी, भाऊसिंगजी रोडवरील खानविलकर पेट्रोलपंपावरही २००० रुपयांची नोट खपविण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे. संशयित डॉ. कुंबळे याला शुक्रवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

डॉ. कुंबळेने तीन महिन्यापूर्वी स्कॅनर खरेदी केला होता. त्यानंतर नोटा छापण्यासाठी त्याने गोकुळ शिरगाव आणि लक्ष्मीपुरीतून कागद खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. गुरुवारी त्याने खानविलकर पेट्रोप पंपावर तीनशे रुपयांचे पेट्रोल भरले. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्याला त्याने दोन हजार रुपयांची नोट दिली. बनावट नोट खपविण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना ती बनावट नोट लक्षात आले. त्यानंतर डॉ. कुंबळेने घरी जाऊन पैसे आणले आणि पेट्रोलचे बील भागवले अशी माहिती शनिवारी तपासात उघड झाली.

बनावट नोटा छापून खपविण्याचा प्रयत्न करणारा संशयित डॉ. सुधीर कुंबळे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचा जिल्हा सहसंयोजक आहे. काँग्रेसचे नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. गुरुवारी (ता. १५ डिसेंबर) भाऊसिंगजी रोडवर २००० रुपयांची बनावट नोट खपवताना चप्पल विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे लक्ष्मीपुरी पोलिसांनी डॉ. कुंबळेला अटक केली आहे.

नगरसेवक मुल्लाणी यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. रामदास बोरकर यांनी डॉ. कुंबळे याला सहसंयोजक म्हणून निवडीचे दिलेले पत्र सादर केले. मुल्लाणी म्हणाले, ‘सध्या नोटाबंदीमुळे जनता त्रस्त झाले आहेत. तीन ते चार तास रांगेत थांबल्यावर नागरिकांच्या हातात दोन हजार रुपये मिळतात. डॉ. कुंबळे सुशिक्षित असून त्याला पाठीशी कोण घातल आहे याचा तपास झाला पाहिजे. डॉ. कुंबळे बनावट नोटा किती खपवल्या आहेत व वितरीत केल्या आहेत, याचा तपास करावा. गेल्या काही दिवसांत सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे मोठ्या प्रमाणात नव्या नोटा सापडत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा बाहेर कशा येतात याची चौकशी सरकारने करावी.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुपक कुलकर्णी यांना पन्नालाल घोष पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाच्या निमित्ताने कोल्हापुरात दरवर्षी देण्यात येणारा पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्कार यावर्षी पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य पंडित रूपक कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. सोमवारी (ता. १९ डिसेंबर) रात्री साडेआठ वाजता शाहू स्मारक भवन येथे पन्नालाल घोष संगीत संमेलन्नात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संयोजक आणि बासरीवादक सचिन जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सचिन जगताप म्हणाले, ‘पन्नालाल घोष यांचे बासरीवादनात फार मोठे योगदान आहे. त्यांच्या नावाने बासरीवादनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकाराला केवळ कोल्हापुरातच पुरस्कार दिला जातो. गेल्या १५ वर्षापासून हा सोहळा आयोजित करण्यात येत असून बासरीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जाते.

घोष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारे रूपक कुलकर्णी वयाच्या नवव्या वर्षापासून बासरीवादनाचे धडे घेत आहेत. ध्रुपद ख्याल वाजवण्यात ते निपुण आहेत. आजवर त्यांनी विविध महत्त्वाच्या महोत्सवात बासरीवादन केले आहे. तसेच दहा देशांमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या बासरीवादनाची मोहिनी रसिकांनी अनुभवली आहे.’

पुरस्काराच्या निमित्ताने सोमवारी रात्री नऊ वाजता रूपक कुलकर्णी यांच्या बासरीवादनाची मैफलही होणार आहे.

पत्रकार परिषदेला केदार गुळवणी, वैजयंती कुलकर्णी, अजय कुरणे, राजेंद्र हांडे, जयवंत देसाई, संदीप आफळे, ज्ञानेश रायबागकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीककर्ज वितरण बंद करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दरवर्षाला ३० कोटी रुपयांचा तोटा सहन करुन लाखो शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणाऱ्या जिल्हा बँकेवर रिझर्व्ह बँकेचा विश्वास नसेल तर पीककर्जाचे ​वाटपाचे तोट्याचे काम राष्ट्रीयीकृत बँकांनी करावे, अशी भूमिका मांडत त्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व जिल्हा बँकांचे संघटन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व जिल्हा बँकांना एकत्र करुन पीककर्जाच्या वाटपाबाबत धोरण ठरवण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

अगदी पेट्रोल पंप, मॉल, नागरी सहकारी बँकांना जुन्या पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी होती, पण रिझर्व्ह बँकेचे लायसन्स असूनही जिल्हा बँकेला या प्रक्रियेत निर्बंध घालण्यात आले. तसेच त्यांना पैसे वितरणासाठीही योग्य प्रमाणात चलन दिले नाही. सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर जिल्हा बँकेकडे जमा असलेल्या ३०४ कोटींच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचे केंद्र सरकारने संकेत दिले. हा प्रकार म्हणजे जिल्हा बँकेवर ​सरकार व रिझर्व्ह बँकेचा विश्वास नसल्याचीच भावना जिल्हा बँकांकडून व्यक्त करण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘नोटाबंदीच्या प्रकरणात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आक्रमक भूमिका घेतली. आमचा कारभार पारदर्शी असल्याने कोणतीही चौकशी करा, पण निर्बंध लादू नका, असे सांगितले होते. पण निर्बंध लादण्यात आले. दरवर्षी बँक लाखो शेतकऱ्यांना पीक कर्ज देते. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यासाठी होणारा तोटा सहन करतो. दरवर्षी ३० कोटींच्या आसपास तोटा होत असतानाही राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जास्त पीककर्ज वाटप केले जाते. जिल्हा बँकेवर रिझर्व्ह बँकेचा विश्वास नसेल तर तोटा सहन करुन दिले जाणारे पीककर्ज वितरणाचे काम बंद करु. यापुढे राष्ट्रीयीकृत बँकांनीच पीककर्ज वाटप करावे. यासाठी तातडीने सर्व जिल्हा बँकांना पत्र पाठवून या मुद्यावर एकत्रित भूमिका घेण्यात येणार आहे. एखाद्या निर्णयातून जिल्हा बँकांवर अन्याय होत असेल तर त्याबाबत दाद मागण्यासाठी जिल्हा बँकांची संघटना बांधण्यात येणार आहे. पीककर्ज वाटपाचे जिल्हा बँकांचे काम कमी झाल्यानंतर सेवा सोसायट्यांवर परिणाम होईल. पण त्याला इलाज नाही. याबाबत सर्व जिल्हा बँका एकत्र जमून पीक कर्जाबाबतचे धोरण ठरवणार आहेत.

जिल्हा बँकेच्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

१० ते १४ तारखेपर्यंत जमा नोटा करन्सी चेस्टमार्फत बदलून देण्यापूर्वी केवायसीची १०० टक्के पूर्तता झाल्याची तपासणी नाबार्ड करेल.

विकास सोसायट्यांनी स्वीकारलेल्या जुन्या नोटा भरणाऱ्या सभासदांची केवायसी तपासणी नाबार्डकडून करुन घेऊन नोटा बदलून दिल्या जातील.

करन्सी चेस्ट अशा नोटा नेहमीच्या पद्धतीने तपासून घेईल.

जुन्या नोटा बदलण्याचा कालावधी वाढवण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत यंत्रमागधारकांच्या उपोषणाला सुरूवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

यंत्रमाग व्यवसायाला प्रतियुनिट १ रुपये ६६ पैसे दराने वीज मिळावी, कर्ज व्याजात पाच टक्के सबसिडी मिळावी, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची मजुरी निश्चित करावी, सूत दर १५ दिवस स्थिर ठेवावा, सूतावर एमआरपी छापावी आदी मागण्यांसाठी मी स्वाभिमानी कारखानदार संघटनेच्यावतीने बेमुदत उपोषणाला शनिवारी सुरुवात करण्यात आली. महात्मा गांधी पुतळा चौकात सुरू करण्यात आलेल्या उपोषणात संतोष कोळी आणि अमोद म्हेतर सहभागी झाले आहेत. दरम्यान, गणेशनगर परिसरात सुरू असलेल्या यंत्रमागाची बिमे कापण्याचा प्रयत्न जमावाने केला. तर जवाहरनगर परिसरात गांधीगिरी पद्धतीने पुष्पगुच्छ देऊन यंत्रमाग बंद पाडले.

दोन वर्षांपासून यंत्रमाग व्यवसायत आर्थिक संकटातून मार्गक्रमण करीत आहे. या व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सरकारकडून केवळ घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र पदरी काहीच पडत नसल्याने सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानुसार संघटनेच्यावतीने सर्व कारखानदारांनी छत्रपती शिवाजी पुतळा येथे एकत्र येऊन महाराजांना अभिवादन करून मोटरसायकल रॅलीला सुरुवात केली. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून गावभागातील महादेव, अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन ही रॅली नाट्यगृह चौकाद्वारे दातार यांच्या कारखान्यात आली. यानंतर उपोषणाला प्रारंभ झाला.

शहरातील बहुतांशी यंत्रमागधारकांनी आपले यंत्रमाग बंद ठेवून या उपोषणाला पाठींबा दर्शविला. तर जवाहरनगर परिसरात यंत्रमाग सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आंदोलकांच्यावतीने गांधीगिरी पद्धतीने त्यांना गुलाबपुष्प देऊन बंदचे आवाहन करण्यात आले. गणेशनगर परिसरात काही कारखान्यातील बिमे कापण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला. दरम्यान, हे आंदोलन सर्वच यंत्रमागधारकांसाठी सुरु असून तोडफोड, बिमे कापण्यामया प्रकारामुळे आपलेच नुकसान होणार असल्याने असे प्रकार कोणीही करू नयेत, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images