Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सातारा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) आर्थिक व्यवहारावर चौकशी अहवालात गंभीर ताशेरे ओढले आहेत. ट्रस्टमधील घोटाळे पाहता त्याचे विशेष लेखा परिक्षण करावे. ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याने ‘अंनिस’वर प्रशासक नेमावा, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

अभय वर्तक म्हणाले, ‘अंनिस’च्या आर्थिक व्यवहाराबाबत अनेक जणांनी तक्रारी केल्या आहेत. सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ट्रस्टच्या कामांमध्ये अनेक त्रुटी दाखवल्या. सभेच्या इतिवृत्तात काही ठिकाणी खाडाखोड केली आहे. विलंब शुल्क आकारून हिशोबपत्रके स्वीकारण्यात आली आहेत. हिशोबपत्रे नियमित सादर कलेली नाहीत. संस्थेचा उद्देश मिश्र स्वरूपाचा असताना हिशोब तपासणीने संस्थेचा उद्देश शैक्षणिक दाखवला आहे. संस्थेने ठेवी, कायम ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्समध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. संस्थेला मोठ्या प्रमाणात परदेशी देणग्या मिळाल्या आहेत. परदेशातून आलेल्या देणग्यांच्या जमा पावत्या तपासल्या असता, त्यांवर एफसीआरए नोंदणी क्रमांक नाही. संस्थेच्या विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणावर मानधन व अन्य संस्थांना देणग्यांचे वाटप केले आहे. महाराष्ट्र फाउंडेशन इंडिया (अमेरिका) या संस्थेने दाभोलकरांना १० लाख रुपये रक्कम दिली होती. मात्र २००६ च्या ऑडीट रिपोर्टमध्ये व किर्द खतावणीमध्ये ही रक्कम नोंदवलेली नाही.’

संस्थेच्या आर्थिक व्यवहारात त्रुटी आढळत असल्याने आर्थिक व्यवहारांची चौकशी करून संस्थेवर प्रशासक नेमावा अशी मागणी वर्तक यांनी केली. संस्थेच्या विश्वस्तांची चौकशी करून दाभोलकर यांची हत्या आर्थिक कारणावरून झाली आहे का याचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

वर्तक यांना विचारणार होते जाब

एका वृत्तवाहिनीवर अभय वर्तक यांनी ‘मुंबईत मराठा महिला पोलिसांवर मुस्लिमांनी अत्याचार केले’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी मराठा मोर्चातील मराठा व मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शाहू स्मारक भवन परिसरात येणार होते. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत शाहू स्मारक भवन परिसरात कडक बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कार्यकर्ते परिसरातून निघून गेले. पत्रकार परिषद संपल्यावरही वर्तक यांना कडक पोलिस बंदोबस्तात बाहेर नेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संभाजीराजे यांना मुंबई येथे दिले. राज्य सरकार कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २० टक्के हिस्सा उचलणार असल्याचे अधिकृत पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार संभाजीराजे यांच्याकडे दिले.

विमानतळाची स्थापना छत्रपती राजाराम महाराज यांनी केली. राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी वेळोवेळी अनेक निवेदने, उपोषण आणि आंदोलने कोल्हापुरात झाली. त्यामुळे या विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केले. त्यावेळी कोल्हापूरच्या विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. कोल्हापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. अजूनही निधी दिला जाईल, असेही आश्वासनही फडणवीस यांनी संभाजीराजेंना दिले.

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी मंगळवारी दिल्लीत बैठक झाली. बैठकीत विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पासाठी २७४ कोटींच्या खर्चापैकी राज्य सरकारने तीस टक्के रक्कम द्यावी, अशी सूचना भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निधी देण्याची लेखी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे खासदार संभाजीराजेंनी केली. त्याला तत्काळ प्रतिसाद देत राज्य सरकारने निधीला तत्वतः मंजुरी दिली. हा हिस्सा राज्य सरकार उचलण्यास तयार असल्याचे लेखी पत्रही भारतीय विमान प्राधिकरणाला देत असल्याचे सांगितले. याबाबतचे पत्र खासदार संभाजीराजे यांच्याकडे सोपविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक कार्यकर्त्यांचा आर्थिक कारणावरून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर (ता. करवीर) येथे आर्थिक देवघेवीत मध्यस्ती करण्यास गेलेल्या सामाजिक कार्यकर्ते सुरेश दिनकर कांबळे (वय ४० रा. शिंगणापूर) यांच्यावर सत्तूराने वार करून निर्घुण खून केला. संशयित गणेश कुंभार ( वय २२) याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांनी खुनासंबधी प्राथमिक माहिती दिली. ‘संशयित गणेश कुंभार व आकाश नाथाजी कांबळे हे मित्र आहेत. आकाशने गणेशच्या वडिलांकडून एक लाख ३० हजार रुपये उसने घेतले होते. या पैशाची परतफेड करण्यासाठी आकाशच्या वडिलांनी काळे नावाच्या व्यक्तीला स्वतःचा प्लॉट विकला. प्लॉट विक्रीतून आलेल्या रक्कमेतून सर्व एक लाख ३० हजार रुपयांची मागणी गणेशकडून आकाशकडे केली होती. प्लॉट खरेदी करणारे काळे यांच्याकडून वेळोवेळी ८० हजार रुपये गणेश कुंभार यांच्या कुटंबाला रक्कम मिळाली होती. राहिलेली सर्व रक्कम एकदम मिळावी म्हणून गणेशने आकाशकडे तगादा लावला होता. यातून गुरुवारी सकाळी दोघांमध्ये वादही झाला होता.’

गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता गणेश डेअरीत दूध घालण्यासाठी गेला होता. यावेळी सकाळी झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी आकाश व त्यांचा नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे यांनी गणेशला अडवले. यावेळी दोघांत वाद झाला. चिडलेल्या गणेशने घरातून सत्तूर आणला. त्याने सुरेश कांबळे यांच्यावर सपासप वार केले. यावेळी आकाश पळून गेला. गंभीर जखमी सुरेश कांबळे यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच सुरेश यांचा मृत्यू झाला. सुरेश यांच्या डोक्यात सात, पाठीवर व हातावर चार असे अकरा वार झाले होते. या घटनेची माहिती कळताच करवीर पोलिसांनी शिंगणापूर गावात धाव घेत संशयित गणेशला ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेची माहिती कळताच सीपीआर हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी झाली होती. सुरेश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपायुक्त खोराटेंचा हस्तक्षेप कशाला ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘उपायुक्त विजयकुमार खोराटे यांचा नगररचना विभागाशी काही संबंध नाही. तरीही खोराटे नगररचना विभागाच्या कामकाजात फक्त पैसे गोळा करण्यासाठी हस्तक्षेप करतात. महापालिकेच्या हिताच्या शहर विकासाच्या कामात त्यांना काहीही इंटरेस्ट नाही. खोराटे पैसे खाऊन कामे करतात. प्रत्येक फायलीत खाबूगिरी प्रवृत्तीमुळे शहराची वाट लागत आहे’ अशा शब्दांत ताराराणी आघाडीचे नेते सुनील कदम यांनी उपायुक्तांच्या कामकाजावर हल्ला चढविला. गुरुवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजाचे वाभाडे काढले. उपमहापौर शमा मुल्ला सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. दरम्यान, खाबुगिरीविषयीच्या तक्रारी लाचलुचपत विभागाकडे करा असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सदस्यांना सुनावले.

शहरातील औद्योगिक वसाहतीतील दुरवस्था, अनधिकृत फलकांवरील कारवाई, होर्डिंग पॉलिसी, विस्कळीत पाणीपुरवठा प्रकरणी प्रशासन निष्प्रभ ठरल्याचा आरोप प्रा. जयंत पाटील यांनी केला. सरळसेवा भरती प्रक्रियेवरून त्यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. सध्याच्या कनिष्ठ अभियंत्याच्या वेतनाकडे लक्ष वेधले. सत्तारुढ आणि विरोधकांनी एकत्रित प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. शिवसेनेचे गटनेते नियाज खान, नगरसेविका दीपा मगदूम यांनी वायपी पोवारनगर, उद्यमनगर, पांजरपोळ येथील रस्ते, गटर्स अशा पायाभूत सुविधांबाबत विचारणा केली. दरवर्षी पाच कोटींचा महसूल जमा होत असूनही पंधरा वर्षात रस्ते झाले नसल्याने नगरसेवकांना रोषाला सामोरे जावे लागते अशा शब्दांत टीकेची झोड उठविली. याबाबत आयुक्त शिवशंकर यांनी सर्वसाधारण सभेने विकासकामे मंजूर करुन द्यावीत, सुविधा उपलब्ध करू असे उत्तर देताच नगरसेवक भडकले. बजेटमध्ये तरतूद करायची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे उत्तर नगरसेवकांनी दिले.

शर्यतीत पळायला कसे सांगता ?

नगरसेवकांच्या आरोपांना उत्तर देताना आयुक्तांनी ‘स्थायी समिती विकासकामे मंजूर करत नाही. एकीकडे उत्पन्नवाढीला खो घालायचा, विकासकामांना मंजुरी द्यायची नाही आणि दुसरीकडे मोघम आरोप करायचे असा प्रकार चालणार नाही. पाय बांधता आणि शर्यतीत पळायला सांगता हा काय प्रकार आहे?’ असे म्हणताच स्थायीचे सभापती मुरलीधर जाधव, अजित ठाणेकर, सत्यजित कदम यांनी त्याला आक्षेप घेतला. कुठली विकासकामे अडवली? स्थायी समिती व नगरसेवकांना कशाला बदनाम करता? अशी विचारणा त्यांनी केली. नगरसेवक सूरमंजिरी लाटकर, राजसिंह शेळके, भूपाल शेटे, राहुल चव्हाण, विजय खाडे, जयश्री चव्हाण, अभिजित चव्हाण, किरण नकाते यांनी होर्डिंग्ज पॉलिशी, स्वागत कमानीचा हक्क, अनधिकृत फलकावरून प्रशासनाला धारेवर धरले. सभेत कळंबा कारागृहानजीकची ओपन जेलसाठी जागा आरक्षित करण्याचा ठराव मागे घेण्यात आला. पाणीपुरवठा सुरू असताना वीज पुरवठा बंद करण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.

चुकीच्या फाइलवर आयुक्तांची स्वाक्षरी

ताराराणी आघाडीचे गटनेते सुनील कदम यांनी घरफाळा आणि पाइपलाइन योजनेवरून आयुक्तांवर निशाणा साधला. सिलाई वल्ड शोरुमला चुकीच्या पद्धतीने घरफाळ्यात ५० लाख रुपयांची सवलत दिली असून त्या फायलीवर आयुक्तांची सही आहे. थेट पाइपलाइन योजनेच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. ५३५ कोटी रुपयांची ही योजना फेब्रुवारी २०१७ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक असताना अजून १५ किलोमीटर अंतराच्या मार्गाला मंजुरी मिळाली नाही. आयुक्त, उपायुक्तांनी ​आतापर्यत किती वेळा फिरती केली? आयुक्तांनी दहा मिनिटात योजनेची वस्तुस्थिती मांडावी, मी नगरसेवकपदाचा राजीनामा देतो असे आव्हान कदम यांनी दिले. आयुक्तांनी ३५ टक्के काम झाल्याचा दावा केला.

आयुक्त, कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी उद्धटपणाने वागत असल्याने प्रशासनाची घडी विस्कटली आहे. कार्यकारी अभियंता प्रविण जाधव यांची बगिचा, वर्कशॉप विभागात नियुक्ती करत त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. आयुक्त, उपायुक्त खोराटे यांच्या त्रासाला कंटाळून अधिकारी रजेवर जात आहेत. आयुक्तांनी कामकाजात सक्षमता दाखवावी. नगरसेवकांना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर देऊ. हिटलरशाही खपवून घेतली जाणारी नाही.

शारंगधर देशमुख, गटनेता, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक संचालकांविरोधात आयुक्तांचा अहवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरसेवक आणि अधिकाऱ्यांतील संघर्ष अनुभवलेल्या सभागृहात गुरूवारी प्रशासनातील वाद चव्हाट्यावर आला. नगरसेवकांकडून उपायुक्त विजयकुमार खोराटे यांच्या कामकाजाचा पंचनामा सुरू असताना आयुक्त पी. शिवशंकर हे नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांच्या कामकाजावर घसरले. धनंजय खोत हे अकार्यक्षम अधिकारी असून त्यांची अन्यत्र बदली करावी अशी मागणी सरकारकडे केल्याचे आयुक्तांनी सभेत सांगितले.

नगररचना विभागाचे कामकाज आणि उपायुक्त खोराटे यांचा टीपी फायलीतील इंटरेस्ट यावरून नगरसेवक आक्रमक बनले होते. गेल्या काही महिन्यात अधिकारी आ​णि कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईचा मुद्दा चर्चेत होता. खोराटे यांना टीपीचे अधिकार आहेत का ? नगरसेवकांच्या या प्रश्नावर आयुक्त खोत यांच्या कामकाजावर घसरले. त्यांनी खोत यांना महापालिकेतून कार्यमुक्त करावे असे सरकारकडे पत्राद्वारे विनंती केल्याचे सांगितले.

आयुक्तांच्या विधानामुळे दुखावलेल्या खोत यांनी तत्काळ महापौरांसमोरील टेबलाजवळ येऊन, ‘आयुक्तांनी कामकाजाला आक्षेप घेत माझा अपमान केला आहे. त्यांनी मला तातडीने महापालिकेतून कार्यमुक्त करावे. मी आता सभागृह सोडत आहे.’ असे सांगितले. यावेळी खोत यांना भावना मांडताना अश्रू अनावर झाले. ‘आयुक्तांनी माझ्या पदवीचा, अनुभवाचाही अपमान केला आहे. गेली १५ वर्षे मी नोकरी करत आहे. नगररचना विभागाचे उत्पन्न ५० कोटींपर्यंत वाढविले. कामकाजावरून अपमानित होण्याचा प्रसंग घडत असेल तर शुक्रवारपासून मी महापालिकेत येणार नाही’ असे म्हणत ते सभागृहातून बाहेर पडू लागले. नगरसेवकांनी तुम्ही सभागृहातून बाहेर पडू नका. सभागृह तुमच्या सोबत आहे अशा शब्दांत त्यांना पाठबळ दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी कर्मचारी आज संप मागे घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर केएमटी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यास प्रशासनाने तत्वतः मंजुरी दिली. मात्र प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात लेखी स्वरूपात पत्र मिळत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार केएमटी कर्मचाऱ्यांनी दिला. प्रशासनाकडून लेखी पत्र मिळाल्यानंतर शुक्रवारी बारा वाजल्यानंतर संप मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. केएमटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक शुक्रवारी अधिकृतपणे पत्र मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल असे स्पष्ट केले.

दरम्यान केएमटी कर्मचाऱ्यांनी सहावा वेतन आयोग लागू करावा याकरिता गुरूवारी दिवसभर महापालिकेसमोर ठिय्या मारला. केएमटी कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर जोरदार निदर्शने करत लक्ष वेधले. गुरूवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही केएमटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद उमटले. प्रा. जयंत पाटील, सुनील कदम, सूरमंजिरी लाटकर, सभापती लाला भोसले यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. आयुक्तांनी केएमटी कर्मचाऱ्यांना वेतन करार लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचारात आहे. वेतन करार लागू केल्यामुळे किती आर्थिक ताण वाढणार, आर्थिक तरतूद कशी करायची यासंबंधी अभ्यास सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान केमटीचे एक हजारहून अधिक कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. सहावा वेतन आयोगासह एकूण ११ मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. वाहक चालक, अस्थापना आणि वर्कशॉप विभागातील सगळे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने केएमटीची वाहतूक पूर्ण बंद होती.

केएमटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दिवसभर चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, गटनेते विजय सुर्यवंशी,शारंगधर देशमुख सत्यजित कदम, सुनील पाटील, प्रविण केसरकर, शेखर कुसाळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, राजेंद्र तिवले यांच्यासोबत चर्चा झाली. आयुक्त पी. शिवशंकर, केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांच्यासोबत संयुक्त बैठक झाल्यानंतर सहावा वेतन आयोग लागू करण्यास तत्वता मान्यता दिली. शुक्रवारी पत्र दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम फोडणारा निघाला स्वयंपाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, प्रतिनिधी

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने पॅरोलवर सुटल्यावर फरारी झाला. त्यानंतर तो गोकुळ हॉटेलमध्ये पुऱ्या तळायला लागला. पुऱ्या तळत असताना त्याने एटीएम सेंटर फोडून रोख रक्कम चोरण्याचा प्लॅन आखला. मात्र सतर्क नागरिक व गस्त घालणाऱ्या पोलिसांनी एटीएम मशिन फोडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या सुबोध प्रसाद महतो (वय ३४, रा. बरका खुर्द, पो. रतनपूर, ठाणा ईचाक, जि. हाजारीबाग, झारखंड) याला अटक केली.

राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी गुन्ह्याची माहिती दिली. बुधवारी मध्यरात्री स्वतः देशमुख यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे गस्त घालत होते. राजारामपुरी दहावी गल्लीत राजाबाळ पान शॉप येथे पोलिसांची मोटार थांबली असता सरस्वती कॉम्प्लेक्समधील सुजय जयसिंगराव शिंदे यांनी त्यांना बिल्डिंगच्या एटीएम सेंटरच्या गाळ्यात आवाज येत असल्याचे सांगितले. शिंदे यांनी रात्री अकरा वाजता एटीएम सेंटर बंद केले होते. पोलिसांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला असता तिथे संशयित एटीएम मशिनचे फ्रंट डोअर उघडण्याचा प्रयत्न करत होता. सेंटरमध्ये दोन गॅस सिलिंडर, नोजल, मीटर असलेली गॅस पाइप, लहान लोखंडी पहार, स्क्रू ड्रायव्हर, पाने, गोणपाट सापडली. पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता त्याने विनोद जगदीश गहलोत असे नाव सांगितले. त्यानंतर दुसऱ्यांदा चौकशी केल्यावर अनिल उर्फ छोट्या असे नाव सांगितले. पोलिसांनी त्याला पुन्हा खडसावून विचारले असता त्याने सुबोध महतो असे नाव सांगितले. त्याने राजारामपुरी येथील सिंडीकेट बँकेचे एटीएम सेंटरही फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्याने दोन सीसीटीव्ही कॅमेरे काढून गॅस सिलिंडरव्दारे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न केला.

दिवसभर पोलिसांनी संशयित महतोकडे चौकशी केली असता तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगणारा कैदी असल्याचे तपासात पुढे आले. २००३ मध्ये अंधेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने एका व्यक्तीचे अपहरण करून, चोरी करून खून केल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली असून तो कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. २०११ मध्ये तो पॅरोल रजेवर सुटला. रजा संपल्यानंतरही तो कळंबा कारागृहात परतला नाही. गेली सहा वर्षे तो फरारी होता. गेले वर्षभर तो गोकुळ हॉटेलमध्ये पुऱ्या तळण्याचे काम करत होता. त्याच्यावर ओशिवरा पोलिस ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल आहे. पाच दिवसांपूर्वी गोकुळ हॉटेलचे मॅनेजरला आपण गावी जाऊन येथून असे खोटे सांगितले होते. त्यानंतर त्याने एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न केला आणि चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या सापळ्यात पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेवर अतिप्रसंग;तिघांना अटक

$
0
0



सोलापूर

सोलापूर रेल्वे स्थानकावर चुकून आलेल्या एका महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या तिघांविरूद्ध लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पैगंबर ऊर्फ सय्यद दगडू शेख (४०, रा. एमआयडीसी चिंचोळी सोलापूर), चंद्रकांत महादेव स्वामी (वय ३१, रा. सुल्तानपूर ता. अक्कलकोट), आप्पासाहेब तोडकर (वय ४२, रा. नान्नज. ता. उत्तर सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेची अधिक माहिती अशी की, नगर जिल्ह्यातून एक महिला तिच्या घरातून वाद करून रागाने ११ ऑक्टोबर रोजी निघून आली होती. रेल्वेने ती दौड येथे आली तेथून तिला पुण्याला जायचे होते. परंतु, चुकून ती सोलापूर रेल्वेस्थानकावर आली. त्यावेळी तिला चंद्रकांत स्वामी हा भेटला आणि तिच्याशी मैत्री वाढवून तिला गाणगापूरकडे जाऊ असे सांगून कोल्हापूरला नेले. त्या पीडित महिलेला कोल्हापूरला आल्याचे समजल्यावर तिने गाणगापूरला जायचे होते, असे सांगितले त्यावरून ते दोघे गाणगापूरला आले तेथे चार ते पाच दिवस ते भिक्षा मागून राहिले. त्यानंतर ते पुन्हा सोलापूरला आल्यानंतर महिलेला काम पाहिजे आहे, असे म्हणून चंद्रकांत स्वामी याने पैगंबर शेखला बोलावून घेतले आणि त्या महिलेची ओळख करून दिला पैगंबर शेख याने त्याचा साथीदार आप्पासाहेब तोडकर याच्या मोटारसायकलवर महिलेला बसवून चिंचोळी एमआयडीसी परिसरात नेले आणि तेथे तिच्यावर अतिप्रसंग करून तिला तेथेच सोडून गेला. त्यानंतर ती महिला पुन्हा सोलापूर रेल्वे स्टेशनवर आली आणि पुण्याला जाणाऱ्या गाडीत चंद्रकांत स्वामी याला पाहून तिने लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले आणि वरील तिघांविरूद्ध विनयभंग आणि अतिप्रसंग केल्याची फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्मचाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सानुग्रह अनुदानाबाबत ठराव मंजूर झाला असतानाही औंधकर यांनी सानुग्रह अनुदान देण्याबाबत असमर्थता दर्शविल्याने पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.

सभेत ठराव मंजूर होऊनही १७ हजार ५०० रुपये दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देण्यास मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी असमर्थता दर्शविल्याने पालिका कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी प्रथम पालिका चौकात ठिय्या आंदोलन करून पुन्हा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये त्यांना घेराव घालण्यासाठी त्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र, मुख्याधिकारी औंधकर निवडणुकीसंदर्भातील बैठकीत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी बैठक संपेपर्यंत मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मुख्याधिकारी केबिनमध्ये आल्यानंतर त्यांना कर्मचाऱ्यांनी घेराव घालून जाब विचारला. यावेळी मुख्याधिकारी यांनी त्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करून कर्मचाऱ्यांचे म्हणणे सरकारकडे पाठवणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पन्नवाढीला स्थायीचा ‘खो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काही नगरसेवक सभागृहात मोघम आरोप करून अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करायचे, गोंधळ करायचा. अधिकाऱ्यांना स्पष्टीकरणाची संधी द्यायची नाही, ही पद्धत योग्य नाही. त्रासांनी अधिकारी कसे काम करणार? महापालिकेत काम करण्यासाठी आलो आहोत, वाद विवाद आणि भांडायला नाही. नगरसेवकांनी प्रशासनाची बदनामी थांबवावी,’ असे आवाहन करत विकासकामे आणि उत्पन्नवाढीच्या विषयांना स्थायी समिती सभेत खो घातला जातो, असा आरोप आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

अधिकाऱ्यांवर मोघम आरोप करण्यापेक्षा पुरावे द्या, कारवाई करतो असे आव्हानही त्यांनी नगरसेवकांना दिले.

राजारामपुरी येथील सिलाई शो रूमला घरफाळ्यात ५० लाख रुपयांची सवलत दिल्याचा माझ्यावरील आरोप चुकीचा आहे. वकिलांचा अभिप्राय, बांधकाम परवाना, भोगवटा या साऱ्या तांत्रिक बाबींची माहिती दिली. कदम यांचे नाव न घेता माझ्यावर केलेले आरोप हे चुकीच्या माहितीच्या आधारे आहेत. १४ ऑगस्ट, २०१४ पासून चुकीच्या पद्धतीने घरफाळा लागू करण्यात आल्याची तक्रार ‘ सिलाई…’तर्फे प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे वक‌िलांचा अभिप्राय, बांधकाम परवाना, भोगवटा आदी बाबींचा विचार करून एक एप्रिल २०१५ पासून घरफाळा लागू करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी विकास कामांच्या प्रस्तावांना आणि उत्पन्न वाढीच्या प्रस्तावांना स्थायी समिती खो घालत असल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधी आयुक्त म्हणाले, ‘महापालिकेच्या उत्पन्नातून विकासकामांची अंमलबजावणी होते. एलबीटी बंद झाल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी व्यवसाय परवाना, पाणीपट्टी, महापालिका मार्केटमधील दुकानगाळ्यांचा भाडेवाढ, इस्टेटचे प्रस्ताव मंजूर केले नाहीत. घरफाळा वाढीचा प्रस्ताव सभागृहाने फेटाळला. काही नगरसेवक प्रशासनाला बदनाम करायचे असे ठरवून कसलेही पुरावे नसताना सभागृहात अधिकाऱ्यांवर बेछूट आरोप करतात. मानसिक त्रास देतात. पाइपलाइन गळती काढण्यासाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली होती. आतापर्यंत ५० लाख रुपये खर्ची पडले आहेत.’


खोत हे तांत्रिकदृष्टया अकार्यक्षम

आयुक्त म्हणाले, ‘नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांचा प्रोबेशनरी कालावधी आहे. विभागाचा कामकाज हाताळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या ते अकार्यक्षम आहेत. त्यांच्याकडून कामाचा निपटारा होत नाही. त्यांना बांधकाम परवाने ऑनलाइन देण्याविषयी सूचना करून वर्ष झाले, पण अजूनही कार्यवाही केली नाही. त्यांच्या बदलीसाठी सरकारकडे पत्र पाठविल्याचा सांगतानाच सभागृहात खोत यांचा अपमान करण्याचा उ​द्देश नव्हता.’



धनंजय खोत रजेवर

आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत अकार्यक्षमतेचा आक्षेप नोंदविल्यानंत सहायक संचालक धनंजय खोत शुक्रवारी रजेवर होते. त्यांनी सकाळी आयुक्त कार्यालयाकडे अर्ज सादर केला. दोन दिवस महापालिकेला सुटी असल्याने ते सोमवारी हजर होण्याची शक्यता आहे. खोत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तोही झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्यातीसाठी धाडस करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताला सध्या सर्वाधिक संधी आहे. चिनी वस्तूंना दर्जामुळे विरोध होत असल्याने भारतातील उत्पादकांना मागणी वाढत आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी निर्यातीसाठी धाडस करण्याची गरज आहे,’ असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र इंडस्ट्रीयल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन तसेच एसएमई चेंबर ऑफ इंडिया यांच्यावतीने लघू व मध्यम उद्योजकांच्या विकास व निर्यातवृद्धीसाठी ‘एसएमई मॅन्युफॅक्चरर्स अॅन्ड एक्स्पोर्टस् समिट’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार महाडिक बोलत होते. एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, उद्योजक श्रेनिक घोडावत व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होते.

हॉटेल सयाजी येथे झालेल्या समिटमध्ये कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे दीडशे लघू व मध्यम उद्योजक सहभागी झाले होते. कार्यक्रमात उद्योजकांना मेक इन इंडिया, भारतीय उद्योजकांसाठीच्या संधी व आव्हाने, अर्थ पुरवठ्या संदर्भात बँकांची भूमिका तसेच निर्यात बाजारातील फायदे याविषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

खासदार महाडिक म्हणाले, ‘चिनी वस्तूंना मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याने भारतासारख्या देशाचा नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून पुढे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता केवळ आपल्या उद्योजकांनी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी एसएमई चेंबर उद्योजकांना मदत करतच आहे. त्याच्या जोडीला केंद्र सरकारशी संबंधित जे प्रश्न असतील, ते सोडविण्याचा माझा प्रयत्न असेल.’

विदेशामध्ये विशेषतः अमेरिकेसारख्या देशात काहीच तयार होत नाही. मात्र, त्यांच्या वॉलमार्टसारख्या मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणावर फळे लागतात. त्यांना पुरवठा करणे हे कोण्या एकट्याचे काम नाही. त्यामुळे आता ग्रुप फार्मिंगकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे,’ असे मतही खासदार महाडिक यांनी व्यक्त केले.

घोडावत म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोल्हापूरचा ठसा उमटवायचा असेल, तर स्थानिकांनी विशेषतः लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.’ एसएमई चेंबर ऑफ इंडिया गेली २३ वर्षे उद्योजक विकासाचे काम करत असून, यामध्ये कुशल मनुष्यबळापासून निर्यातीसाठी मार्गदर्शन करण्यापर्यंत उद्योजकांना मदत केली जात असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.

दिवसभरात झालेल्या विविध सत्रांमध्ये तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे डीजीएम (एसएमई) जी. एस. राणा यांनी ‘बँका उद्योजकांना अर्थपुरवठा करण्यास तयार असून, त्यांच्यापर्यं उद्योजकांच्या गरजा पोहोचणे गरजेचे आहे,’ असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर बीएसईचे एसएमई प्रमुख अजय ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले.

जानेवारीत गुंतवणूक परिषद

कोल्हापुरात येत्या जानेवारीमध्ये वेस्टर्न महाराष्ट्र इनव्हेस्टमेंट समिट-डेस्टिनेशन कोल्हापूर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापुरात गुंतवणुकीला कशी चालना मिळेल, या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. यासाठी काही मोठ्या उद्योजकांना येथे निमंत्रित करण्याचे नियोजन असल्यांचे साळुंखे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकांत आघाडी, जि.प.त स्वबळ

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

twieet@gurubalmaliMT

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा नारा शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. स्थानिक नेत्यांनी देखील तशी घोषणा केली मात्र, असे झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकेवर अथवा जिल्हा परिषदेवर भगवा फडकण्याची शक्यता फारच असल्याने अखेरच्या टप्यात आघाडी होण्याचीच शक्यता आहे. यामुळे या निवडणुकीत स्वबळापेक्षा शिवसेना नेते मित्र पक्षाबरोबर आघाडी करण्यासाठीच इच्छुक असल्याचे चित्र आहे. महायुतीसाठी भाजपने हात पुढे केल्याने बहुतांशी नगरपालिकेत ही आघाडी होण्याची चिन्हे असली तरी जिल्हा परिषद मात्र स्वबळावरच लढण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेत सध्या दोन्ही काँग्रेसचेच वर्चस्व आहे. इचलकरंजीत सध्या काँग्रेस आणि नगराध्यक्ष शहर विकास आघाडीकडे बहुमत आहे. पेठवडगाव पालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. इतर ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. जनसुराज्य आणि जनता दलाचीदेखील दोन पालिकेत ताकद आहे. याउलट शिवसेना गेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी लढली असली तरी यश मात्र फार कुठे मिळाले नाही. मलकापूर नगरपालिकेत पक्षाच्या चिन्हाऐवजी आघाडी केल्याने तेथे काही जागा आल्या. इचलकरंजीत देखील शिवसेनेचे काही नगरसेवक आहेत. पाच वर्षानंतर मात्र काही ठिकाणी परिस्थिती बदलली आहे. सहा आमदार निवडून आल्याने पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सत्यज‌ित पाटील-सरूडकर या तीन आमदारांच्या मतदार संघात पाच नगरपालिका आहेत. सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे यांचे वर्चस्व असलेल्या कागल तालुक्यात कागल आणि मुरगूड या दोन पालिका आहेत.

सहा आमदार असल्याने नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी होऊ शकते. पण तसे झाल्यास सत्तेपर्यंत पोहचण्याची शक्यता कुठेच दिसत नाही. कागल आणि मुरगूडला समरजित घाटगेंना अर्थात भाजपला सोबत घेतले तरच राष्ट्रवादीला शह बसू शकतो. गडहिंग्लज, पन्हाळा, पेठवडगाव, जयसिंगपूर आणि कुरूंदवाड पालिकेत सेनेची ताकद फार कमी आहे. यामुळे येथे आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही. या कोणत्याच पालिकेत स्वबळावर लढण्याची ताकद नसल्याने येथे मित्र पक्षाबरोबर आघाडी होण्याचीच शक्यता आहे. मलकापूर पालिकेत राष्ट्रवादीचे नेते मानसिंग गायकवाड आणि सेनेची आघाडी झाली आहे, फक्त अधिकृत घोषणा होणे शिल्लक आहे.

इचलकरंजी पालिकेत काँग्रेसविरोधी सर्व पक्ष एकत्र येतात. आजपर्यंतची ही परपंरायावेळी देखील कायम राहण्याचीच शक्यता आहे. यामुळे येथे सेना चिन्हावर लढली तरी नंतर शहर विकास आघाडीत सहभागी होणार हे नक्की आहे. प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आणि राजेश क्षीरसागर या आमदारांच्या मतदारसंघात पालिका येत नाही. पण जिल्हा परिषद निवडणुकीत यांच्या ताकदी​चा सेनेला उपयोग होऊ शकतो. सध्या जिल्हा परिषदेत सेनेचे पाच सदस्य आहेत. यामध्ये करवीर तालुक्यातील संख्या जास्त आहे. सहा आमदार असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी होऊ शकते. पण त्याला अजून दोन तीन महिन्यांचा अवकाश आहे. जिल्हा परिषद स्वबळावर लढण्याची शक्यता जास्त आहे.

सध्या ज्या हालचाली सुरू आहेत, त्यानुसार मलकापूर, कागल, मुरगूड, जयसिंगपूर, कुरूंदवाड या पाच नगरपालिकेत शिवसेना मित्रपक्षाबरोबर आघाडी करण्याचीच दाट शक्यता आहे. इचलकरंजीत स्वबळावर लढून निवडणुकीनंतर शहर विकास आघाडीत सहभागी होण्याबाबत हालचाली सुरू आहेत. पन्हाळा,गडहिंग्लज पालिकेत सेनेची फारशी ताकद नाही. यामुळे येथे सेनेच्या भूमिकेला फारसे महत्त्व राहणार नाही. हीच अवस्था पेठवडगाव पालिकेत आहे. त्यामुळे सर्व पालिकेत स्वबळावर लढल्यास सेनेला फार मोठा फायदा होण्याची शक्यता नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देउन इचलकरंजी येथील मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मयूर दत्तात्रय पवार (रा. काशिपुरा तासगाव) याला कोर्टाने शुक्रवारी २६ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या पीडित तरुणीला सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तासगाव पोलिसांनी या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डान्स अकॅडमीच्या निमित्ताने एकत्रित आलेली पीडित तरुणी आणि संशयित मयूर पवार तासगावात डान्स क्लास चालवत होते. जवळीक असल्याचा फायदा घेऊन पवारने मारहाण करून आपल्यावर बलात्कार केल्याची फिर्याद तरुणीने दिल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी संशयिताचा भाऊ चेतन दत्तात्रय पवार याने गळफास घेउन आत्महत्या केली. त्यावेळी त्याच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीत त्या तरुणीच्या नातेवाईकांनी पाच लाखांची मागणी केली व आपल्या भावाची बदनामी झाली, त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्याची माहिती तासगावचे उपविभागीय पोलिस आधिकारी कृष्णात पिंगळे यांनी दिली आहे. तरुणीला मारहाण करून तिच्यावर केलेला अत्याचार आणि संशयिताचा भावाने केलेली आत्महत्या या दोन्ही घटनांची नोंद घेतली असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचेही पिंगळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सजले आकाश कंदिलांचे मार्केट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी सण काही दिवसांवर आल्यामुळे बाजारपेठ आकाश कंदिलांनी सजली आहे. विविध आकाराचे आकाश कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. महाद्वार रोड, भवानी मंडप, हुतात्मा चौक, लक्ष्मीरोड, पापाची तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी, गांधीनगर भागातील दुकानांमध्ये आकाश कंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मागणी कमी असल्याने यंदा चायनीज आकाश कंदील विक्रीसाठी कमी ठेवण्यात आले आहेत.

दसरा झाल्यानंतर सर्वांनाच दिवाळीचे वेध लागलेले असतात. तयारीही सुरू होते. दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खरेदीसाठी सहकुटुंब आलेल्यांनी बाजारपेठ फुलून जात आहे. दिवाळीत मध्यमवर्गीयांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या घरासमोर आकाश कं‌दील लावले जातात. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रंगाचे, रूपाचे, आकाराचे आकाश कंदील बनवून ग्राहकांचे लक्ष वेधले जाते. यंदाही पर्यावरणपूरकसह कापडी हँडमेड, कागदी, प्लास्टिक, फायबरपासून तयार केलेले आकाश कंदील वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत. बल्ब लावल्यानंतर बाहेर बहुरंगी प्रकाश दिसावेत असेही आकश कंदील आहेत. काही संस्थांनी टाकाऊ वस्तूंपासूनही आकाश कंदील तयार केले आहेत.

बटर पेपरने तयार केलेले पारंपरिक आकाश कंदिलांना सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. कमीत शंभर ते पाच हजार रुपयापर्यंत दर आहेत. मध्यमवर्गीय लोक कागदापासून तयार केलेले आणि कमी किमतीतील आकाश कंदील खरेदी करताना दिसत आहे. आलिशान हॉटेल, श्रीमंत लोक, सार्वजनिक तरुण मंडळातर्फे मोठे आकाश कंदील खरेदी केले जात आहेत. जशी मागणी असेल तसे आकाश कंदील बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

फुलेवाडी रिंगरोडवर राहणारे हिंदुराव पाटील व त्यांच्या पत्नी मेघा इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करत आहेत. ते गणेशचतुर्थीपासून सहकुटुंब आकाश कंदील बनविण्याचे काम करत आहेत. त्यांनी लहान, मोठे असे ४०० आकाश कंदील तयार केले आहेत. मागणी वाढत असल्याने पुन्हा तयार केले जात आहेत. अडीचशेपासून तीन हजार रुपये असा त्यांच्या आकाश कंदिलांचा दर आहे. शिवाजी तरुण मंडळ, दयावान, झुंझार या मंडळांकडून लावण्यात येणारे मोठे आकाश कंदील तयार करण्याची ऑर्डर त्यांना मिळाली आहे. त्यानुसार त्यांनी ते तयार केले आहेत.


दहा वर्षांपूर्वी लहान आकाश कंदील तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असे इको फ्रेंडली आकाश कंदील करतो. त्यांना मागणी वाढत आहे. यंदा शहरातील मोठी हॉटेल्स, तरुण मंडळांचे आकाश कंदील तयार करण्याच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

‌हिंदुराव पाटील, कारागीर

यंदाच्या दिवाळीसाठी चायनीज आकाश कंदिलांना मागणी कमी आहे. याउलट पारंपरिक कागदाद्वारे तयार केलेल्या आकाश कंदिलांना अधिक मागणी आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून लोक खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

आसिफ शेख, दुकानदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परीटघडी’ची आनंदी दिवाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी म्हणजे नव्या कपड्यांची नवलाई. अभ्यंगस्नानानंतर नवेकोरे परीटघडीचे कपडे घालून औक्षण करायचे आणि त्यानंतर सहकुटुंब फराळाचा आस्वाद घ्यायचा ही संस्कृती. त्यामुळे दिवाळीत परीट व्यावसायिकाकडून कडक इस्त्रीचे कपडे आणले जातात. नव्या कपड्याची परीटघडी देण्यासाठी दिवाळीच्या आदल्या रात्रीपर्यंत इस्त्रीसोबत हात चालवणारा परीट समाज त्यानंतरच खरी दिवाळी साजरी करतो.

बारा बलुतेदारांपैकी एक परीट समाज गणला जातो. पूर्वी वर्षभर जे कपडे धुण्यासाठी आणि इस्त्रीसाठी देत त्या जमीनदार, सरदार, गावातील व्यापारी यांचे दिवाळीच्या पहाटे औक्षण करण्यासाठी परीट घरी यायचे. परटांनी औक्षण केल्यानंतरच दिवाळीचे नवे वस्त्र घालून फराळ करण्याची प्रथा होती. दिवाळीदिवशी ओवाळणीला आलेल्या परटाला दिवाळीची भेट म्हणून धान्य, फराळ द्यायचा ही पद्धत. त्यामुळे दिवाळीचा पहिला दिवस आणि परीट यांचे वेगळेच नाते होते. कालौघात ही प्रथा बंद झाली असली तरी दिवाळीसाठी आणलेल्या नव्या कपड्यांच्या इस्त्रीसाठी आजही परीटच लागतो.

परीट समाजामध्ये दिवाळीचे विधी नेहमीसारखे असले तरी नोंदवहीचे पूजन आणि नदीची पूजा आवर्जून केली जाते. कोल्हापुरात शुक्रवार पेठ परिसरात आजही परीट गल्ली अस्तित्वात आहे. तेथे मोठ्या संख्येने परीट समाज पारंपरिक कपडे धुणे आणि इस्त्रीचा व्यवसाय करतो. शहरात इतर ठिकाणीही परटांची कुटुंबे आहेत.

दिवाळीच्या आदल्या रात्रीपर्यंत परीट समाजाचा सर्व वेळ कपडे इस्त्री करण्यात जातो. दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशा प्रत्येक दिवशी कपड्यांची नवलाई असते. त्यामुळे महिलांच्या साड्यांच्या रोलप्रेसपासून इस्त्रीपर्यंतचे काम करण्यातच या समाजाची दिवाळी साजरी होते. मात्र, लक्ष्मीपूजनाचा दिवस परीट समाज उत्साहात साजरा करतात. यादिवशी अगदी नदीघाटाच्या पूजेपासून इस्त्रीच्या दुकानातील नोंदवहीचे पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनादिवशी पारंपरिक कुबेरपूजन तर समाज करतोच, पण ज्या पाण्यामुळे कपडे धुण्याचा व्यवसाय चालतो, त्या नदी किंवा तलावाच्या घाटाची मनोभावे पूजा केली जाते.

सध्या या समाजाला नदीवर कपडे धुण्यासाठी अटकाव केला आहे. मात्र, तरीही या समाजातील व्यावसायिकांनी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त कामाची जोड देत व्यवसाय फुलवला आहे. दिवाळीदिवशी परीटघडीचे कपडे घालताना या समाजातील लोकांची आठवण प्रत्येकाला येते. नव्या कपड्यांना परीटघडी देत अनेकांच्या दिवाळीचा आनंद मात्र हा समाज दिवाळीआधीच्या कित्येक रात्री जागून उलगडत असतो.

नदीबाबत कृतज्ञता

कोल्हापुरात परीट समाजाची साधारण पाचशे कुटुंबे आहेत. नव्या पिढीने जरी या व्यवसायाकडे पाठ फिरवली असली तरी अजूनह साठ टक्के समाज हा पारंपरिक व्यवसाय करतो. दिवाळी साजरी करण्याचे संदर्भ आज बदलले आहेत. आज या समाजातील कुणी ओवाळण्यासाठी जात नाही. तसेच नदीघाटाऐवजी वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतले जातात. इस्त्री, ड्रायक्लीनमध्ये आधुनिकता आली आहे. मात्र दिवाळी म्हटले की घाटाची पूजा, पाण्याविषयी कृतज्ञता केल्याशिवाय यांची दिवाळी सुरू होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खरेदीला महागाईची किनार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीसाठी अगदी पणत्या, रांगोळीपासून मोठ्या कार, वेगवेगळ्या पद्धतीच्या दागिन्यांनी विविध मार्केट सजली आहेत. रेडिमेड कपड्यांपासून सणासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी सुरू झाली असून, अनेकांनी दिवाळी पाडव्यानिमित्ताने वाहन, घर, दागिने अशी मोठी खरेदी करण्याची तयारी केली आहे. रेडिमेड कपड्यांच्या दरात मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. हरभरा डाळीचे दरही चढेच असल्याने यंदा रेडिमेड फराळही महागणार आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, दुचाकी वाहनांच्या किमतीत फार मोठी वाढ झाली नाही. दसऱ्यापासून या मार्केटमध्येही फार तेजी आहे, अशी परिस्थिती नाही. सोन्याच्या दरातही वाढ नाही.

दिवाळीनिमित्त होणाऱ्या खरेदीमुळे मार्केटला चालना मिळत असते. सणामध्ये लागणाऱ्या अगदी छोट्या-छोट्या वस्तूंपासून दिवाळीनिमित्त मोठी खरेदी करण्याचाही ट्रेंड आता वाढत आहे. या कालावधीत कपड्यांची खरेदी मोठी होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध पद्धतीच्या रेडिमेड कपड्यांनी दुकाने सजली आहेत. या कपड्यांच्या किमती दर्जानुसार असल्या तरी यंदा सर्वच प्रकारच्या दरामध्ये दहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन कपड्यांची खरेदी यंदा महागडी ठरणार आहे. हीच परिस्थिती फराळामध्येही आहे. तेल, मैदा, आटा, साखरेच्या दरात गेल्या दोन-तीन महिन्यांत वाढ झालेली नाही; पण फराळाच्या विविध पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जाणाऱ्या हरभरा डाळीचा दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत ३० रुपयांहून अधिक वाढला. त्यामुळे या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असणारे फराळाचे साहित्य निश्चितच महागणार आहे. दर वाढण्यास सुरुवात झाली आहे.

प्रामुख्याने घरात लागणाऱ्या टी. व्ही., फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशिन, एसी यांसारख्या वस्तूंचा समावेश असतो. दिवाळीमध्ये या वस्तूंच्या खरेदीची उलाढाल मोठीच असते. त्यादृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स मार्केट सज्ज झाले आहे. सध्या या वस्तूंच्या दरांमध्ये काही वाढ नसल्याने या मार्केटमध्ये उलाढाल मोठी होईल, अशी आशा आहे. यापाठोपाठ वाहनांची खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल असतो. त्यातही दुचाकी वाहने घेणाऱ्यांची संख्या मोठी असते. गेल्यावर्षीच्या तुलनेत व्हॅट एक टक्क्याने वाढला असल्याने दुचाकींच्या किमतीत थोडीफार वाढ झाली असली तरी फार मोठी महागाई नाही. त्यामुळे या मार्केटमध्येही मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी रेडिमेड कपड्यांचे मार्केट थोडे थंड होते. तुलनेने यंदा दहा टक्क्यांनी दर वाढले असले तरी कपड्यांच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. मार्केटमध्ये चांगले वातावरण जाणवत आहे. त्यामुळे आठवडाभरात मोठी उलाढाल होण्याची आशा आहे.

सतीश माने, व्यंकटेश्वरा गारमेंट

यंदा व्हॅट एक टक्क्याने वाढला आहे. पेट्रोलची दरवाढ सुरू आहे. स्पेअर पार्टचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर फायनान्सचा व्याजदरही वाढला आहे. त्या साऱ्यांचा परिणाम दुचाकी वाहनखरेदीवर जाणवत आहे. चार ते पाच वर्षांच्या कालावधीतील महागाईचा विचार करता यंदा त्या तुलनेत महागाई कमी जाणवते. तरीही दसऱ्यापर्यंत फार मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी झाली नव्हती. दिवाळीदरम्यान वातावरण बदलू शकते.

सुरेश काशीद, संचालक, शिवगंगा सुझुकी

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दरात मात्र थोडी घसरण झाली आहे. त्यामुळे या मार्केटमध्ये चांगली उलाढाल होण्याची शक्यता आहे. आतापासूनच ग्राहकांची दुकानातील वर्दळ वाढली असून, खरेदी करण्याची वस्तू निवडण्यास सुरुवात झाली आहे.

सचिन मांगले, सिद्धी होम अप्लायसेन्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी दर, ताज्या भाजीपाल्याला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील इतर भाजी मंडईंपेक्षा कमी दर व खात्रीशीर ताजा भाजीपाला यामुळे नागाळा पार्क येथील शेतकरी आठवडा बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाला. काही भाज्यांचे दर इतर ठिकाणच्या दराबरोबर असले तरी ताजा भाजीपाला असल्याने नागरिकांनी तो दर मान्य केल्याचे चित्र शुक्रवारी होते. खानविलकर पंपाशेजारील रस्त्यावर पणन महामंडळामार्फत सुरू केलेल्या आठवडी बाजारात शुक्रवारी २४ शेतकरी सहभागी झाले होते.

आकर्षक तंबू तसेच स्वच्छ परिसरामुळे यापूर्वी भाजी घेऊन गेलेले नागरिक पुन्हा या शुक्रवारी दुपारी चार वाजताच बाजारात दाखल झाले होते. शेतकऱ्यांनी वाहनातून भाजीपाला उतरवताच त्यांच्याभोवती गर्दी होत होती. ताजी पालेभाजी, लुसलुशीत भेंडी, लालभडक टोमॅटो पाहून नागरिकांनी पिशव्या भरून भाज्या घेतल्या. दोडक्याचा दर इतर बाजारातील दरापेक्षा जास्त असला तरी कोवळा दोडका पाहून तो दर नागरिक देत असल्याचे चित्र होते. सध्या शेतात भुईमूग काढण्याची धांदल सुरू आहे. या बाजारात भुईमुगाच्या ओल्या शेंगाही विक्रीसाठी आल्या होत्या. त्यालाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सायंकाळी सातजेपर्यंत बहुतांश भाजीपाला संपला होता. बाजारात कर्मवीर, दूधगंगा, ग्रीन अॅग्रो या कंपन्यांमार्फत शेतकरी सहभागी झाले होते.

दर शुक्रवारी हा बाजार भरवला जातो, पण येत्या शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) धनत्रयोदशी असल्याने त्या दिवसाऐवजी एक दिवस आधी गुरुवारी (२७ ऑक्टोबर) खानविलकर पेट्रोल पंपाशेजारीच बाजार भरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसदराची मजल तीन हजारांवर ?

$
0
0

Udaysing.patil@timesgroup.com

udaysingpatilMT

कोल्हापूर : ऊस हंगाम सुरू करण्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी यंदाच्या हंगामातील दराची अजून चर्चाच सुरू झालेली नाही. त्यामुळे एक नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदराच्या संभाव्य आंदोलनांमुळे हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबरची पंधरा तारीख उजाडण्याची शक्यता आहे.

स्वाभीमानी संघटनेची ऊस परिषद मंगळवारी (ता. २५ ऑक्टोबर) होत आहे. त्याचवेळी दराबाबत चर्चेला सुरूवात होईल. यंदा तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दराचे गणित शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी मांडले आहे. त्यापेक्षा किती जास्त दर मिळेल याची उत्सुकता लागली आहे. उसाची कमी उललब्धता, सीमाभागातील ऊस कर्नाटकात नेला जाण्याची शक्यता यामुळे सरकार आणि कारखानदारांनी पुढाकार घेऊन चर्चा पूर्ण केल्यास सर्वांनाच बसणारा फटका कमी करता येणार आहे. अन्यथा, आंदोलनाची धग पेटत राहून शेतकऱ्यांसह कारखानदारांनाही फटका बसू शकतो.

गेल्या दोन हंगामात बाजारात असलेल्या साखरेच्या कमी दरामुळे संघटनेला ऊस दराबाबत आग्रही भूमिका घेता आली नव्हती. किमान एफआरपी घेण्याबरोबरच ती दोन टप्प्यात घेण्याचीही भूमिका स्वीकारावी लागली होती. यंदा साखरेचा दर चांगलाच वधारला आहे. दर त्यापेक्षा जास्त जाऊ नये यासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहे. त्यामुळे सध्या राज्य बँकेने साखरेचे प्रति क्विंटल मूल्यांकन ३२०० रुपये केले आहे. या मूल्यांकनामुळे त्यातील ८५ टक्के रक्कम ऊस दरासाठी देणे क्रमप्राप्त आहे. हा दर १९७० रुपयांपर्यंत गेला आहे.

गळीत हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार असल्याने राज्य बँक पुनर्मूल्यांकन करणार आहे. हे मूल्यांकन थोडे जरी वाढले, तरी बँकेकडून दिल्या जाणाऱ्या उचलीपैकी केन पेमेंटसाठीची रक्कम २ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. संघटनेने पूर्वीपासूनच एफआरपीपेक्षा जास्त उचल घेण्याचा पवित्रा घेतला आहे. तर प्रति टनासाठी सरकारने ५०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी कारखानदारांनी केली आहे. गेल्यावर्षी उताऱ्याप्रमाणे जिल्ह्यातील काही कारखान्यांनी २८०० रुपयांपर्यंत ऊस ​दर दिला. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील उतारा १२.६९ टक्के होता. तर सांगलीत उतारा १२.१० टक्के होता. यंदा साखरेचा उतारा कमी होईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र सध्याची स्थिती पाहिली तर एफआरपीपेक्षा जास्त दर मिळू शकतो. शेतकऱ्यांना एफआरपी आरामात एकरकमी मिळू शकते अशी जाणकारांची अटकळ आहे. फक्त त्यापेक्षा किती जास्त दर द्यायचा याचा सारासारा विचार करण्यासाठी कारखानदारांनी आतापासूनच तयारी केली पाहिजे.

यंदा पहिली उचल एफआरपीपेक्षा जास्त असेल असे आमचे धोरण आहे. त्याशिवाय संघटना तोडगा मान्य करणार नाही. साखरेचे दर पाहता त्यादृष्टीने सरकारने पुढाकार घेऊन बैठक बोलवावी. सारासार विचार करुन यंदा दरनिश्चितीची गरज आहे. आम्ही केव्हाही चर्चेस तयार आहोत.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तयार फराळाला अधिक मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. घरी फराळ करण्यासाठी लागणारा वेळ आणि होणारे कष्ट यामुळे यंदा तयार फराळ खरेदी करण्याचा अधिक कल दिसून येत आहे. शहरातील स्वीट्स दुकाने, बचत गटांच्या कार्यालयातील फोन सध्या चकली, चिवडा, लाडूच्या ऑर्डरसाठी खणखणत आहेत.

दिवाळीतील मुख्य आकर्षण असलेला फराळ बनविण्यासाठी नोकरी किंवा व्यवसायामुळे अनेक महिलांना वेळ मिळत नाही. मुख्यतः अवघड रेसिपी असलेले पदार्थांचे प्रयोग कऱण्याऐवजी पदार्थ विकत घेण्यास ग्राहकांची पसंती मिळत असल्याने महिला उद्योजिका आणि बचत गटांची सध्या लगबग सुरू झाली आहे. अनारसे, चकली, चिवडा, शंकरपाळ्या आणि करंजीला सर्वाधिक मागणी मिळते आहे. एकीकडे ऑर्डरची यादी वाढत असताना महाग सामान आणि पदार्थांची किंमत किती वाढावयाची, असा संभ्रम लघु उद्योजिकांसमोर आहे.

गेल्या वर्षभऱात डाळी, डालडा, तेल सगळ्याच्या किमती वाढल्या आहेत. पदार्थ बनविण्याच्या खर्चात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन महाग दर ऐकल्यावर पटकन महिलांना आश्चर्य वाटते. काही महिला ऑर्डरचे प्रमाण कमी करीत आहेत, तर काही गुणवत्तेच्या विश्वासार्हतेमुळे महाग पदार्थही विकत घेत आहेत. गेल्या आठवड्यापासूनच ऑर्डर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या बचत गटासह वहिणी, महालक्ष्मी गृहउद्योग भांडार, स्वयंसिद्धासारख्या संस्थेच्या माध्यमातून महिलांना ऑर्डर मिळत आहेत. यंदा तयार फराळाला पॅकींग केल्यामुळे ग्राहकांनाही ते आकर्षित करत आहे.

यंदाही डाळीचे, तूप, डालडाचे दर वाढल्यामुळे तयार फराळाचे दरही वाढले आहेत. चकली ३२० रुपये किलो, कोल्हापूर चिवडा २८० रुपये किलो, पुडाची वडी ३२० रुपये किलो, तिखट शेव ३४० रुपये किलो, शंकरपाळी २८० रुपये किलो, बुंदी लाडू ३२० रुपये किलो, करंजी ४०० रुपये किलो, रवा लाडू व बेसन लाडू ३२० रुपये किलो, अनारसे ४०० रुपये किलो, नायलॉन पोहे चिवडा २८० रुपये किलो, चिरोटे ४०० रुपये किलोने विक्री होत आहे.



दिवाळीनिमित्त गेल्या काही वर्षांपासून तयार फराळाला अधिक मागणी आहे. यानिमित्ताने घरगुती व्यवसाय करत येतो. काही ऑर्डस दिल्या जातात तर काही याकाळात थेट विक्री होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तयार फराळ खरेदीला कल वाढला आहे.

सुजाता चव्हाण, फराळ विक्रेत्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरीत ब्रँडेड शोरूम्स फुल्ल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरीत ब्रँडेड वस्तूंच्या प्रशस्त शोरूम्समध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. राजारामपुरी जनता बझार ते श्री मारुती मंदिरापर्यंत दुतर्फा मार्केट सजले आहे. ब्रँडेड कपडे, सोन्या-चांदीचे दागिने, आकाश कंदिलांसह दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याने राजारामपुरीची बाजारपेठ हाउसफुस झाली आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी सकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत दुकाने खुली आहेत. ब्रँडेड कपड्यांसाठी युवक आणि युवतींची गर्दी होत आहे.

राजारामपुरी पहिल्या गल्लीपासून ते चौदाव्या गल्लीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेले मार्केट ग्राहकांच्या गर्दीने हाउसफुल्ल झाले आहे. कपड्यांचे मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजारामपुरीत खरेदीसाठी धूम उडाली आहे. बहुतांश दुकानांत सहकुटुंब गर्दी होत आहे. रेमंड, पीटर इंग्लंड, कॉटन किंग, लूई फिलीप, जय हिंद, पीपल, जॉन प्लेयर, लिवाइज्, स्पायकर, रॅँगलर, अरविंद, आदी जगविख्यात ब्रँडचे कपडे या परिसरातील शोरूममध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, कोकणातील ग्राहकांची गर्दी दुकानांत होत आहे. विशेषतः कॉलेज युवकांमध्ये फॅशनचा ट्रेंड कायम आहे. त्यामुळे ब्रँडेड कपड्यांसाठी युवकांची गर्दी दुकानांत आहे. क्रेडिट आणि डेबिट कार्डेही दुकानात स्वीकारली जात आहेत. खरेदीनंतर ग्राहकांना लकी ड्रॉ आणि भेटवस्तू देण्याची ऑफर काही दुकानांत सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठा कल राजारामपुरी मार्केटकडे आहे.

राजारामपुरीत कपड्यांच्या बाजारपेठेसह आकर्षक आकाश कंदील, फ्लोटिंग आणि विविध आकारातील डेकोरेटिव्ह पणत्या उपलब्ध आहेत. पणत्यांमध्ये एकेरी पणतीसह पंचरंगी ताट, नंदादीप आकारातील पणत्यांची विशेष क्रेझ राजारामपुरीत आहे. सुगंधी उटणे, साबण आणि तेल यांचे स्टॉल्स, परफ्युम, बॉडी स्प्रेची बाजारपेठही गर्दीने फुलली आहे. अनेक नामवंत ब्रँडचे कपडे, सोन्या-चांदीची आलिशान दुकाने, तरुणाईला आकर्षित करणारे नावीन्यपूर्ण फॅशनचे कपडे, युवतींसाठीच्या सौंदर्यप्रसाधनांसह कलाकुसरीच्या आकाशदिव्यांनी राजारामपुरी सजली आहे. ब्रँडेड शोरुमला केलेली आकर्षक रोषणाई आणि प्रत्येक दुकानात कुटुंबासह ओसंडून वाहणारी गर्दी, असे चित्र राजारामपुरीत सुरू आहे. फराळासाठी लागणारे मसाले, तयार पीठ आणि फराळाचे स्टॉलही सजले आहेत.

तरुणाईवर कलाकारांचा प्रभाव

फॅशन आणि कॉमन मॅनचे गणित बदलले आहे. सामान्य माणसापर्यंत फॅशनचा ट्रेंड डेव्हलप झाला आहे. त्यामुळे फॅशन इंडस्ट्रीने कॉमन मॅनसह तरुणांकडे मोठे लक्ष आहे. चित्रपट, टीव्ही मालिकेतील अभिनेते, अभिनेत्री यांनी परिधान केलेल्या कपड्यांचा ट्रेंड युवकांमध्ये अधिक आहे. त्याच पद्धतीची साड्या आणि कपड्यांची मागणी युवकांकडून केली जात आहे. ब्रँडेड, पण सोबर लूक देणाऱ्या कलेक्शनकडे तरुणांचा ओढा आहे. तरुणांना आवडणारे ब्रँड मोठ्या डिझायनर्सनी बनविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images