Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जुन्या नाट्यसंस्था पडद्यामागेच

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMt

कोल्हापूर : हौशी रंगकर्मींमधील अभिनय, लेखन, दिग्दर्शन, रंगभूषा, वेशभूषा या कलाविष्काराला मुक्त रंगमंच देणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धेत गेल्या दोन दशकांहूनही अधिक काळापासून नाटकं गाजवणाऱ्या जुन्या नाट्यसंस्थांपैकी महत्त्वाच्या संस्था यावर्षी राज्यनाट्य स्पर्धेत नसतील. प्रायोगिक रंगभूमीबरोबरच राज्य नाट्य स्पर्धा गाजवणाऱ्या संस्था प्रथमच रंगमंचाबाहेर गेल्याने चर्चा रंगल्या आहेत.

‘प्रत्यय’ म्हटलं की राज्यनाट्य स्पर्धेत हमखास बक्षीस घेणारच...अभिरूची नाट्यसंस्था राज्यनाट्यच्या मंचावर कोणतं नाटक करणार ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनात...देवलक्लबचा संच राज्यनाट्यसाठी कोणता वेगळा प्रयोग करणार हे जाणून घेण्यासाठी रसिकांचे लक्ष लागून असणारच तर प्रतिज्ञा, हनुमान या नाट्यसंस्थांची तयारी कोणत्या संहितेवर सुरू आहे ही जिज्ञासा रसिकांना स्वस्थ बसू देणार नाही. दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धेचे बिगुल वाजले की कोल्हापुरातील या काही जुन्या आणि अनुभवी नाट्यसंस्थांच्या सादरीकरणाच्या चर्चेनेच राज्यनाट्यचे वातावरण तयार व्हायचे. १५ दिवसांवर आलेल्या राज्यनाट्य स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र कोल्हापुरातील जुन्याजाणत्या प्रायोगिक नाट्यसंस्थांनी राज्यनाट्य स्पर्धेत आपला सहभागच नोंदवलेला नाही.

गेल्या अनेक वर्षापासून राज्यनाट्य स्पर्धेत अभिरूची नाट्यसंस्था सहभाग देते. गेल्यावर्षी बऱ्याच कालावधीनंतर ‘बळी’ नाटक केलं. मात्र सध्या काही राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पांमध्ये अभिरुची संस्थेचा सहभाग देण्याचा संकल्प आहे. त्याकडे लक्ष केंद्रीत करता यावे म्हणून यावर्षी राज्यनाट्यच्या मंचापासून दूर राहिलो आहे.

प्रसाद जमदग्नी, अध्यक्ष, अभिरुची नाट्यसंस्था

योगायोग

गायन समाज देवलक्लब, अभिरुची, प्रत्यय आणि हनुमान या अनुभवी नाट्यसंस्था यावर्षी राज्यनाट्य स्पर्धेतून बाहेर असल्या तरी हा निव्वळ योगायोग आहे. प्रत्येक संस्थेच्या काही व्यक्त‌िगत प्रकल्प व वेगळ्या प्रयोगांवर काम सुरू असल्यामुळे या संस्था राज्यनाट्य स्पर्धेत उतरल्या नाहीत हे खरे आहे. त्याबाबत या चारही संस्थांच्या सदस्यांमध्ये चर्चाही झालेली नाही.

सात नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या ५६ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर येथील केंद्रावरील प्राथमिक फेरीला सात नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या राज्यनाट्यच्या मंचावर एकूण २१ नाट्यप्रयोग पाहण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. कोतोली, भुयेवाडी येथील संघ यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत उतरणार आहेत. दरम्यान, राज्यभरातील सर्व केंद्रावर सायंकाळी सात वाजता प्रयोग होतात. याच धर्तीवर येथील केंद्रावरही यंदा सात वाजता प्रयोगांना प्रारंभ होणार आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक असे

७ नोव्हेंबर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, बेळगाव (नाटक- नेकी)

८ नोव्हेंबर: भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर (बे दुणे साडे तीन)

९ नोव्हेबर: हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठ, कोल्हापूर (लव्ह इथले भयकारी, अंधार किंवा अग्निदिव्य)

१०नोव्हेंबर: जय हिंद कला, क्रीडा युवक मंडळ, इचलकरंजी (प्रयाणपार)

११ नोव्हेंबर: जीवनक्रांती बहुउद्देशीय संस्था, कोतोली (अंतयात्रा)

१२ नोव्हेंबर: कुंभीकासारी बहुउद्देशीय संस्था, कोतोली (आशा नाम मनुष्यनाम)

१३ नोव्हेंबर: नाट्यशुभांगी संस्था, जयसिंगपूर (सलवा जुलूम)

१४ नोव्हेंबर: नवनाट्य मंडळ, आजरा (सहेर)

१५नोव्हेंबर: पदन्यास कला अकादमी, इचलकरंजी (माकड)

१६नोव्हेंबर- परिवर्तन कला फाउंडेशन (आनिगॉन)

१७नोव्हेंबर- फिनिक्‍स क्रिएशन्स (खेळीमेळी)

१८नोव्हेंबर- प्रज्ञान कला अकादमी-वारणानगर (पुज्य गुरुजी)

१९ नोव्हेंबर- रंगयात्रा नाट्यसंस्था, इचलकरंजी (सलवा जुलूम)

२०नोव्हेंबर- रसिक कलामंच (ऍन इनेमी ऑफ द पीपल)

२१ नोव्हेंबर- रूद्रांश ऍकॅडमी (पुन:श्च हनीमून)

२२नोव्हेंबर- सुगुण नाट्य संस्था (दुसरा मृत्यू किंवा शांतता कोर्ट चालू आहे)

२३नोव्हेंबर- शिवम नाट्य संस्था (अनवाँटेड)

२४नोव्हेंबर- सुगंध रंगकर्मी (घोटाळा झाला)

२८नोव्हेंबर- टीएफटी युनीट (खात्मा)

२९नोव्हेंबर- वंदे मातरम्‌ नाट्य संस्था,भुयेवाडी (अंगार अर्थात डोंगरचा राजा)

३० नोव्हेंबर- वरेरकर नाट्य संघ,बेळगाव (वास्तव-अवास्तव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘फायर ऑडीट’ची बनवाबनवी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील प्रत्येक हॉस्पिटलला दरवर्षी अग्निशामन यंत्रणा बसवून त्या संदर्भात महापालिकेच्या अग्शिनमन विभागाकडून ‘ना हरकत’ दाखला घ्यावा लागतो. हॉस्पिटलच्या इमारतीची उंची, बेडसची संख्या यावर आधारित फायर ऑडीट होते. शहरातील दाट लोकवस्तीत, रहिवासी इमारतीत हॉस्पिटल्स सुरू आहेत. काही ठिकाणी तर चारचाकी वाहनही जाणार नाही एवढीच जागा आहे. इमारतीच्या दोन्ही बाजूनी रुंद जिने नाहीत. आवश्यक त्या प्रमाणात अग्निशमन यंत्रणा नाही. काही हॉस्पिटलमध्ये अलार्म सिस्टीम नाही. तरीही महापालिका आणि हॉस्पिटल व्यवस्थापन पातळीवर फायर ऑडीटचा अहवाल उत्तम असल्याची बनवाबनवी दिसत आहे. भुवनेश्वरमधील हॉस्पिटलला लागलेल्या आगीच्या प्रकरामुळे ही बाब पुन्हा अधोरे‌खीत होत आहे.

कोल्हापुरात गेल्या काही वर्षांत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटस्लची संख्या वाढली. शहर आणि उपनगरात मिळून १२ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. यासह २०११ नंतर झालेल्या हॉस्पिटल उभारणीदरम्यान बांधकाम इमारतविषयक नियमांच्या आधारे बांधकामे करण्यात आल्याचे जाणकारांचे मत आहे. नवीन इमारती १५ मीटर उंचीच्या असल्याने तेथे सुरक्षेच्या अनुषंगाने पूर्ण उपाययोजना केल्याचा अग्निशमन दलाचा दावा आहे. तसेच प्रत्यक्ष तपासणीत आवश्यक सुविधा आढळल्या तरच परवानासाठी एनओसी दिली जाते असे अग्निशमन दलाच्यावतीने सांगण्यात येते. दुसरीकडे शहरात, जुन्या पेठांत मोठ्या संख्येने हॉस्पिटल आहेत. काही कुटुंबांतील दुसरी, तिसरी पिढी वैद्यकीय सेवेत आहे. जुन्या काळातील इमारती असल्याने सध्याच्या नियमानुसार तेथे आवश्यक सुविधा नाहीत. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, उत्तरेश्वर, रंकाळा टॉवर परिसरातील रहिवासी इमारतीत​ हॉस्पिटल्स आहेत.

या इमारतीला दोन्ही बाजूंनी जिने नाहीत. टेरेसवर पाण्याची टाकी नाही. तळघरात स्वयंचलित तुषार यंत्रणा नाही. बेसमेंटमध्ये व्यवसाय सुरू आहेत. हॉस्पिटल्स परवान्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या आरोग्य, अग्शिनमन व बांधकाम विभागाकडून ना हरकत दाखला घ्यावा लागतो. व्यवसाय परवान्यासाठी ना हरकत देताना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्याचा नियम आहे. मात्र अनेक ठिकाणी आगीपासून सुरक्षेसंदर्भात पुरेशा सुविधा नसतानाही सारे काही आलबेल असल्यासारखे परवाने दिले आहेत. मध्यवस्तीतील काही हॉस्पिटल्सना पार्किंग सुविधा नाही. रुग्णवाहिका वगळली तर मोठी वाहने या भागात सहजपणे फिरू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. विविध भागात, दाट लोकवस्तीत तेही रहिवासी इमारतीत असलेल्या हॉस्पिटल्सची संख्या २०० च्या आसपास आहे. चेंज ऑफ युजसाठी १९३ हॉस्पिटल्सचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. विकसन कर आणि नव्या नियमानुसार शुल्क आकारणी या संदर्भात महापालिकेने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागविले आहे. ‘चेंज ऑफ यूज’साठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.

………

महापालिकेच्या अग्निशमन विभाग, आरोग्य आणि बांधकाम विभागाकडून तपासणी होवून ना हरकत दाखला दिला जातो. अग्निशमन विभागाकडील नोंदीनुसार २७७ हॉस्पिटल्सना फायर ऑडीट प्रकरणी पूर्णत्वाचा दाखला आहे. अनेक हॉस्पिटल्सनी २०१३ ते २०१६ या कालावधीत आगीच्या सुरक्षिततेविषयी उपाय योजना केल्या नव्हता. तसेच ‘चेंज ऑफ यूज’ घेतला नव्हता. अशा हॉस्पिटल्सना बांधकामकडून वापरात बदलाची प्रक्रिया व अग्निशमन विभागाची यंत्रसामग्री बसविल्यानंतर एनओसी दण्याची प्रक्रिया सुरू केली.

रणजित चिले, मुख्य अधिकारी, अग्निशमन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात आचारसंहिता लागू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदाच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या कामांसाठी जिल्हा परिषद व कोल्हापूर महानगरपालिकेकडे वाहनांची मागणी केली जाणार आहे. तसेच २४ तारखेपासून २९ तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी पत्रकारांना दिली.

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठीच्या आदर्श आचारसंहिता व अन्य निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शाहू सभागृहात आचारसंहितेच्याबाबत माहिती देण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी काटकर यांनी यावेळी दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह सर्व तालुक्याचे प्रातांधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, महानगरपालिकेसह सरकारी कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आचारसंहितेनुसार नवीन विकास कामाची घोषणा व उद्‍घाटन करता येणार नाही. ज्या विकास कामांना आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळाली असेल ती विकास कामे सुरू राहतील, असे काटकर यांनी स्पष्ट केले. नवीन भरती प्रक्रिया आचारसंहितेच्या काळात करता येणार नाही. आचारसंहितेचे पालन करताना जिल्ह्यातील सर्व अनधिकृत होर्डींग, बॅनर्स, पोस्टर्स तत्काळ काढून घ्यावेत. सरकारी विश्रामगृहासंदर्भात आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. बैठकीस महसूल उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, महापालिका आतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवडणूक निर्णय अधिकारी समिर शिंगटे, विजयसिंह देशमुख, मनीषा कुंभार, सचिन इथापे, संगीता चौगुले, डॉ. रेखा सोळंके, किर्ती नलावडे, शेलेंद्र सूर्यवंशी, अजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, जिल्हा प्रकल्प अधिकारी नितीन देसाई यांच्यासही नऊ नगरपालिकांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक कार्यक्रम असा

उमेदवारी अर्ज दाखल करणे व स्वीकारणे: २४ ते २९ ऑक्टोंबर

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :२९ ऑक्टोंबर दुपारी तीनपर्यंत.

अर्जांची छाननी व वैद्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे: २ नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ११ नोव्हेंबर

निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारी यादी प्रसिद्ध : १२ नोव्हेंबर

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द : २१ नोव्हेंबर

मतदान : २७ नोव्हेंबर

मतमोजणी: २८ नोव्हेंबर

निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकारी असे

इचलकरंजी नगरपालिका: इचलकरंजी प्रांत समीर शिंगटे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ,

जयसिंगपूर नगरपालिका: उपजिल्हा​धिकारी विजयसिंह देशमुख, मुख्याधिकारी हेमंत निकम,

कागल नगरपालिका :राधानगरी प्रांत मनीषा कुंभार, मुख्याधिकारी टीना गवळी,

वडगाव नगरपालिका: करवीर प्रांत सचिन इथापे, मुख्याधिकारी अतुल पाटील.

गडहिंग्लज नगरपालिका, गडहिंग्लज प्रांत संगीता चौगुले, मुख्याधिकारी तानाजी नरळे,

कुरुंदवाड नगरपालिका, विशेष भूमी संपादन अधिकारी डॉ. रेखा सोळंके, मुख्याधिकारी नागेद्र मुतकेकर,

मुरगुड नगरपालिका, भुदरगड प्रांत किर्ती नलावडे, मुख्याधिकारी सुनिल चव्हाण

मलकापूर नगरपालिका, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शेलेंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी चंद्रशेखर सानप,

पन्हाळा नगरपालिका, पन्हाळा प्रातांधिकारी अजय पवार, मुख्याधिकारी शाम गोसावी

पदाधिकाऱ्यांना वाहनांचा वापर फक्त कार्यालयीन कामापुरता

महानगरपालिका व जिल्हा​ परिषद पदाधिकाऱ्यांना वाहनांचा वापर फक्त घरापासून फक्त कार्यालयापुरता करता येणारे. सरकारी वाहन अन्य ठिकाणी त्यांना नेता येणार आहे. निवडणुकीच्या कामांसाठी पदाधिकाऱ्यांची वाहनेही अधिकारी ताब्यात घेऊ शकतात, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी काटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहिष्काराला सर्व पक्षांचा पाठिंबा

$
0
0




म. टा. वृत्तसेवा, शिराळा

शिराळा नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेवर गावातील नाग मंडळांनी व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने टाकलेल्या सर्वपक्षीय बहिष्काराच्या सर्मथनार्थ शिराळा तालुक्यातील नेत्यांनी सावध पावले उचलली आहेत. प्रमुख तीन राजकीय गटांनी नागमंडळे व ग्रामस्थांच्या पाठिशी ठाम उभे राहणार असल्याचे स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन जाहीर केले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगली जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी आम्ही नागपंचमीला गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून प्रयत्नशील आहोत. या संदर्भात आमदार शिवाजीराव नाईक प्रयत्नशील आहेत ते स्वत: केंद्रीय पर्यावरणमंत्री राम जाधव, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांच्याकडे या प्रश्नी पाठपुरावा करीत आहेत, असे सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनीही श्रद्धा व परंपरेचे पाईक असणारे शिराळा ग्रामस्थ, नागमंडळे यांनी जाहीर केलेल्या नगरपंचायत निवडणुकीवरील बहिष्कारास काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. सरकारने पौराणिक काळापासून चालत आलेल्या पारंपरिक नागपंचमी सणावरील निर्बंध मागे घेऊन लोकभावनेचा आदर करावा. शिराळकरांच्या संयमाचा अंत पाहू नये, कायद्यामध्ये दुरुस्ती करून केंद्र व राज्य सरकारने या ठिकाणी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिराळा तालुक्याचे अध्यक्ष विजयराव नलवडे म्हणाले, शिराळा शहरातील ग्रामस्थांबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष कायम राहील. शिराळा ग्रामस्थ, नागमंडळे यांनी जाहीर केलेल्या नगर पंचायत निवडणुकीवरील बहिष्कारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. नागपंचमी सुरू व्हावी यासाठी यापूर्वी अनेक वेळ सर्व पातळीवर प्रयत्न केले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी तीन दिवस चाललेला शिराळा बंद मागे घेण्यात आला होता. मात्र, मागण्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आता ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी आरक्षणावर हरकती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण संदर्भात जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते सुरेश मोहिते, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी तर वसगडे गणातील आरक्षणाबाबत मधूकर कांबळे यांनी विभागीय आयुक्तांकडे हरकत दाखल केली आहे. या प्रकरणी २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तक्रारदारांना हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सुरेश मोहिते यांनी खुल्या गटाची आरक्षण सोडत परत काढण्याची तर अ‍ॅड. मुळीक यांनी जि. प. गटाची रचना करताना खानापूर व शिराळा तालुक्यात पूर्वीप्रमाणेच सदस्य संख्या ठेवावी, अशी मागणी केली आहे. कांबळे यांनी वसगडे मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

आदेश दाखविला शुध्दीपत्रक नाही

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणाबाबत हरकत दाखल करण्यात आल्या आहेत. सुरेश मोहिते यांनी खुल्या ३७ जागांवर महिलांसाठी १८ जागांचे आरक्षण काढताना नियमाचा भंग केल्याचा आरोप केला आहे. ३७मध्ये ज्या ४ मतदारसंघात तीन टर्मला महिला राखीव नव्हते, त्या ठिकाणी मतदारसंघ महिला राखीव करण्यात आला. उर्ववरीत ३३मधून खुला गट महिलांसाठी राखीव करताना इतर आरक्षण काढल्याप्रमाणे कार्यवाही होणे गरजेचे होते. म्हणजे ३३मधून १४ मतदारसंघ निवडण्यात येणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता सलग महिला आरक्षण येऊ नये यासाठी लगतच्या निवडणुकीत महिला आरक्षण असणारे मतदारसंघ बाजुला काढण्यात आले. या बाबत ऑक्टोबर २०११ चा आदेश आहे. मात्र, याच आदेशाबाबत जून २०१४मध्ये काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रकाचा विचार केला नाही. शुद्धीपत्रकानुसार केवळ लगतच्या वर्षांतील नव्हे तर मागील तीन निवडणुकांमध्ये महिला आरक्षीत असणारे मतदारसंघ वगळणे गरजेचे होते, जे निवडले नाहीत. त्यामुळे ३७ मतदारसंघातून महिलांसाठी १८ मतदारसंघ आरक्षित करण्याची सोडत परत काढावी, अशी मागणी मोहिते यांनी केली आहे.

वांगी गटातून देवराष्ट्रे वगळा

कडेगाव तालुक्यातही जि. प. गटाची रचना करताना सर्व गटांत सरासरी समान मतदार संख्या राहील याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, भौगोलिक सलगताही डावलली आहे, असा आरोप मोहिते यांनी केला. वांगी हा एकच मतदारसंघ ३५५३२ मतदारांचा करण्यात आला आहे. त्याचवेळी तडसर ३१३०३, कडेपूर ३०८५४ तर देवराष्ट्रे ३३५०४ करण्यात आला आहे. त्यामुळे वांगी गटातील देवराष्ट्रे गाव वगळून भौगिलिक सलगतेनुसार कडेपूर मतदारसंघात घ्यावे, अशी मागणी सुरेश मोहिते यांनी केली आहे.

खानापूर-शिराळा तालुक्यावर अन्याय

अ‍ॅड. मुळीक यांनीही तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघात किमान समान मतदार संख्या असावी, या आधारेच हरकत घेतली आहे. खानापूर व शिराळा तालुक्यातील जि. प. मतदारसंघ सरासरी ३८४८९ व ३६८११ मतदार संख्येचे झाले आहेत. त्याचवेळी जिल्ह्यातील इतर तालुक्यातील जि. प. गटातील सरासरी मतदार संख्या ही जास्तीत ३५ हजार व कमीत कमी २७ हजारपर्यंत आहे. मग केवळ शिराळा व खानापूर तालुक्यातच अधिक मतदार संख्या का, असा सवाल अ‍ॅड. मुळीक यांनी उपस्थित केला आहे. खानापूर व शिराळा तालुक्यातील जि. प. गट कमी केल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. तरी या दोन्ही तालुक्यात पूर्वी प्रमाणेच खानापूर ४ व शिराळा येथे ५ मतदारसंघ करावेत. त्यासाठी वाळवा व मिरज येथे वाढवण्यात आलेला प्रत्येकी एक मतदारसंघ कमी करावी, अशी मागणी अ‍ॅड. मुळीक यांनी केली आहे.

मुद्दा क्रमांक चार टाळला

जि. प. गटाचे आरक्षण काढताना मुद्दा क्र. चारनुसार तक्ता तयार करून जाहीर न करता आरक्षण काढले आहे. यामुळे बेडग, मांगले, आरग, दुधोंडी, दरीबडची, पणुर्बेतर्फ वारूण, समडोळी सह अनेक जि. प. गटात बदल संभवतात. त्यामुळे जि. प. गटाचे आरक्षण काढताना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ४ नोव्हेंबर २०११चे आरक्षण सदरातील मुद्दा क्र. चारनुसार तक्ता तयार करून २००२, २००७ व २०१२मध्ये असणारे आरक्षण विचारात घेऊन २०१७च्या निवडणुकीसाठी आरक्षण चक्रानुक्रमे फिरवून काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

वसगडेमध्ये बदलाची मागणी

पलूस तालुक्यातील वसगडे या पंचायत समिती गणासाठी खुला आरक्षण निघाले आहे. या बाबतही मधूकर कांबळे यांनी हरकत घेतली आहे. हा गण २००२मध्ये हा गण खुला, २००७ मध्ये ओबीसीसाठी व २०१२मध्ये खुला होता. त्यामुळे यावेळी २०१७साठी हा गण एससीसाठी राखीव घोषीत करणे अपेक्षित आहे. या बाबत निर्णय घेऊन एससी., ओबीसी. व अल्पसंख्यांक मतदारांचे नुकसान थांबवावे, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर विमानतळ : विमानसेवेसाठी हालचाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या विमानतळावरुन ४० आसनक्षमतेपेक्षा छोट्या विमानांची सेवा सुरू करण्याबाबत सशर्त परवानगी देण्याची तयारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दाखवली आहे. त्याबाबत ३० ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असून त्यादृष्टीने सात दिवसात दिल्लीतून एक पथक पाहणीसाठी येणार आहे. यामुळे छोट्या आसनक्षमतेच्या विमानांच्या सेवेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंद असलेल्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २७४ कोटींचा निधी देता येणार नसल्याचे स्पष्ट करताना त्यातील ३० टक्के वाटा राज्य सरकारने उचलावा, असा प्रस्ताव प्राधिकरणाने ठेवला आहे.

प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद मोहापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली नागरी विमान वाहतूक महासंचालनालयासह दहा विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला भारतीय विमानपत्तन प्राधिकरणच्या (एएआय) ​पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक पवनकुमार नागपाल यांच्याबरोबर एएआय बोर्डाचे सदस्य एस. रहेजा, खासदार संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह एएआयचे अधिकारी, प्रधान सचिव शामलाल गोयल, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे (एमएडीए) विश्वास पाटील उपस्थित होते. विमानसेवा सुरु करण्याच्यादृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी डीजीसीएच्या दिल्लीमधील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस वनखात्याची जमीन, अतिक्रमणे यासारख्या काही अटींची पूर्तता राज्य सरकारने करुन देण्याबाबतच्या सूचना केल्या. त्यानंतर पुन्हा बैठक होणार आहे.

विस्तारीकरणाचा मुख्य मुद्दा बैठकीसमोर होता. त्यादृष्टीने २७४ कोटींचा आराखडा तयार केला होता. आराखड्यात धावपट्टीची लांबी वाढवण्याबरोबरच हा आराखडा बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर विमानतळ सुरू नसताना २७४ कोटींचा निधी देणे शक्य नसल्याचे डीजीसीएच्यावतीने सांगितले. त्याऐवजी राज्य सरकारने त्यातील ३० टक्के वाटा उचलावा. उर्वरित निधी देऊ, असा प्रस्ताव मांडला. यानुसार सरकारकडून ८० कोटींचा निधी अपेक्षित आहे. याबाबत मंजुरी घेण्यासाठी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु असे खासदार संभाजीराजे व खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. विमानतळ विस्तारीकरणाबाबत चर्चा होताना ७ ठिकाणी अतिक्रमण झाले असून दोन ठिकाणची सहा हेक्टरची जमीन आवश्यक असल्याचे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी प्राधिकरणाचे पत्र मिळताच तातडीने अतिक्रमणे हटवली जातील. तसेच वन विभागाची जमीन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यासाठी १ कोटी ८० लाखाची तरतूद केल्याचे सांगितले. त्याबाबतचे प्रमाणपत्रही लवकरच सादर केले जाईल, असे सांगितले.

विस्तारीकरणाची कामे पूर्ण होण्यास जवळपास तीन वर्षे लागतील. तोपर्यंत विमानसेवा थांबवण्याऐवजी तातडीने छोट्या विमानांची सेवा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणीही केली. त्याला मोहापात्रा यांनी सकारात्मकता दाखवली. विमानतळाला परवाना मिळालेला नाही. विमानतळापाशी सद्यस्थितीत असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून तत्काळ विमानसेवा सुरू करायची झाल्यास ‘नियम दोन ब’ अंतर्गत ४०पेक्षा कमी आसनसंख्या असलेल्या विमानाची सेवा सुरू करता येईल. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी विविध २२ अटींची पूर्तता केल्याची पाहणी केल्यानंतर कोल्हापूरला ३० ऑक्टोबरच्या आत प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. या अर्जावर महिन्याभरात निर्णय घेण्याचे आश्वासन विमानतळ प्राधिकरणाने दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'भाजपमधील भटजी सत्तेत, बहुजन अडगळीत!'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

भाजपमधील सगळे शेटजी-भटजी आज सत्तेत मिरवत आहेत, तर पक्षाला मोठं करणारे बहुजन नेते अडगळीत गेले आहेत, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी आणि फडणवीस यांनी शाहू, फुले, आंबेडकरांची विचारसरणी खुंटीला टांगून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

'भाजप हा शेटजी- भटजींचा पक्ष आहे, असं मी लहानपणी ऐकायचो. आज तेच चित्र प्रत्यक्ष पाहायला मिळतंय. मुंडे, डांगे, फरांदे या नेत्यांनी भाजपला बहुजन चेहरा दिला. भाजप तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवला. पण आता सत्ता आल्यानंतर हे नेते अडगळीत पडलेत आणि गडकरी, जावडेकर, प्रभू आणि पियुष गोयल हे नेते सत्तेत मिरवत आहेत. बहुजन नेत्यांचा, बहुजन समाजाचा भाजप फक्त मतांपुरता वापर करून घेतो, हेच यातून स्पष्ट दिसतं, असं टीकास्त्र अजित पवार यांनी सोडलं. माढा तालुक्यात पिंपळनेर इथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांनी सरकारवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्री आणि इतर अनेक मंत्री विदर्भातील असल्यानं ते पश्चिम महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप पवारांनी केला. अॅट्रॉसिटीतील चुकीच्या तरतुदी दुरुस्त करण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी योग्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसंच, पुण्यातील गुंड बाबा बोडके प्रकरणात मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत, वर्षा बंगल्यावर त्या दोघांची भेट झाली होती, असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'उपरा'कार लक्ष्मण माने निर्दोष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा । सातारा

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांची महिला अत्याचार प्रकरणांतून जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी आज निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गेली ४० वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणारे लक्ष्मण माने यांनी भटक्या विमुक्त जातीतील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जकातवाडी (ता. सातारा) येथे अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास व संशोधन संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभारली. या संस्थेतील चतुर्थश्रेणी वर्गात काम करणाऱ्या सहा महिलांनी, माने यांनी अत्याचार केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात २०१३ साली दाखल केली होती. या तक्रारीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. या तीन वर्षांच्या कालावधीत न्यायालयावर विश्वास ठेऊन माने यांनी न्यायालयीन लढा लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वतीने अॅड. एम. पी. यादव यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू समजून घेऊन लक्ष्मण माने यांची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने योग्य निकाल दिल्याबद्दल माने यांनी आभार मानले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्यिक लक्ष्मण मानेंचीपुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांना महिला अत्याचार प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांच्या कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गेली ४० वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणारे लक्ष्मण माने यांनी भटक्या विमुक्त जातीतील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जकातवाडी (ता. सातारा) येथे अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती विकास व संशोधन संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभारली. या संस्थेतील चतुर्थश्रेणी वर्गात काम करणाऱ्या सहा महिलांनी माने यांनी अत्याचार केल्याची तक्रार सातारा तालुका पोलिस ठाण्यात २०१३ साली दाखल केली होती. या तक्रारीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. या तीन वर्षांच्या कालावधीत कोर्टावर विश्वास ठेऊन माने यांनी न्यायालयीन लढा लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वतीने अॅड. एम. पी. यादव यांनी भक्कम मांडणी करून कोर्टाचे लक्ष वेधले. कोर्टाने दोन्ही बाजू समजून घेऊन लक्ष्मण माने यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे भारतीय भटके विमुक्त शिक्षण संशोधन संस्थेमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निकालानंतर अनेक मान्यवरांनी माने यांचे अभिनंदन केले. कोर्टाने योग्य निकाल दिल्याबद्दल माने यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो एकरातील ऊस धोक्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

निढोरी उजव्या कालव्याच्या परिसरातील ऊस कालव्यातून पाणी न सोडल्यामुळे धोक्यात येवू लागला आहे. याशिवाय उसाच्या लागणीही खोळंबल्या आहेत. परिणामी कागल तालुक्यातील म्हाकवे, आणूर, गोरंबे, केनवडे, हदनाळ, कुरणी, चौंडाळ, पिंपळगाव, सावर्डे परिसरातील हजारो एकर क्षेत्रातील ऊस पिक पाण्याअभावी धोक्यात आले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने त्वरीत कालव्यामधून पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

गतवर्षी काळम्मावाडी धरणात पाणीसाठा कमी होता, त्यामुळे पाणी कमी प्रमाणात सोडून काठावर उसाची पाण्याची गरज भागवण्यात आली. परंतु यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. यापूर्वी कालव्यामधून पंधरा ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडण्यात येत होते. परंतु यावर्षी अद्याप पाण्याचा पत्ताच नाही. उजव्या कालव्याचे पाणी या परिसराला गेल्या पंधारा ते वीस वर्षापासून वरदानच ठरले आहे. ऊस पिकापासून वंचित असणारा हा परिसर पाण्यामुळे सुजलाम-सुफलाम झाला आहे. ऊस हेच शेतकऱ्यांचे मुख्य पीक असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. कालव्याच्या पाण्यावर सत्तर ते ऐंशी टक्के ऊस पिक अवलंबून आहे. कालव्यास पाणी येवून गेल्यानंतरच अनेकांच्या विहीरीला पाणी येते. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. वळीवाच्या पावसाने सतत हुलकावणी दिल्यामुळे शेतीला पाण्याची गरज आहे. माळरानावरील पिकांना आठ दिवसातून पाण्याची गरज लागते. त्यामुळे कालव्यामधून किमान पंधरा दिवसातून एकदा तरी पाण्याचा फेर व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

...

कोट

‘उजव्या कालव्याचे दुरुस्तीचे तसेच साफसफाईचे काम सुरु आहे. हे काम संपण्यास आठ दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर लगेचच निढोरी उजव्या कालव्यामधून पाणी सोडण्यात येईल.

डी. डी. धारवाडकर, शाखा अभियंता, निढोरी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलर पॅसिव्ह हाऊस वाढवणार रेशीम उत्पादन

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com

Tweet :@ MarutipatilMT

कोल्हापूर : प्रगतशील शेतीचा ध्यास घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी तेजस्विनी अधिकराव जाधव हिने सोलर पॅसिव्ह तंत्रज्ञानातून रेशीम उत्पादन वाढीबाबतचा शोधनिबंध थायलंडमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला. भौगोलिक स्थितीचा विचार करुन ‘सोलर पॅसिव्ह’ तंत्राचा वापर केल्यास उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ शक्य असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. संगोपानगृहाचे तापमान आणि आर्द्रता नियंत्रीत केल्यास उत्पादनवाढ शक्य असल्याची विश्लेषण त्यांनी मांडले आहे. याच विषयावर सध्या त्या म्हैसूर येथील संस्थेत आणखी संशोधन करीत आहेत.

थायलंडमध्ये नुकतीच आंतरराष्ट्रीय रेशीम परिषद झाली. केंद्रीय रेशीम मंडळ आणि थायलंडच्या रेशीम व कृषी मंत्रालयामार्फत ही परिषद झाली. परिषदेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या बी. ई. सिव्हीलच्या तेजस्विनी जाधव यांनी ‘अॅप्लिकेशन ऑफ सोलर पॅसिव्ह टेक्नॉलॉजी फॉर रिअरिंग ऑफ सिल्कवॉर्म बाँबक्स मोरी लीन इन महाराष्ट्र’ हा शोधनिबंध सादर केला. रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी सहाय्यभूत असलेल्या बाबींच्या शोधासाठी जाधव यांनी जिल्ह्यात रेशीमशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. या भेटींदरम्यान काढलेल्या निष्कर्षातून त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगच्या नजरेतून रेशीम किटक संगोपनगृहाची मांडणी केली आहे. त्याद्वारे वर्षाला २० ते ३० टक्के उत्पादन वाढ शक्य असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

संगोपनकेंद्रात रेशीम किटकांची वाढ जोपाने होण्यासाठी तापमान कमी व आद्रर्ता जास्त लागते. येथील शेतकऱ्यांना हीच समस्या भेडसावते. त्यामुळे उत्पादनामध्ये घट होत असते. भौगोलिक घटकांनुसार संगोपनगृहाची उभारणी केल्यास तापमान व आद्रर्ता नियंत्रीत ठेवून रेशीम उत्पादन वाढू शकते. यासाठी सोलर पॅसिव्ह हाऊसचा पर्याय उत्कृष्ट असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यासाठी संगोपनगृहाच्या दक्षिणोत्तर बांधणीसह संगोपनगृहावर नारळाच्या झावळ्या टाकून ठिबक सिंचनाचा सातत्याने वापर केल्यास तापमान व आद्रर्ता नियंत्रीत राहून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल. शोधनिबंधाचा जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना अधिक फायदा होण्यासाठी म्हैसूर येथील संस्थेत पुढील संशोधन करण्यात येणार आहे. शोधनिबंधासाठी जाधव यांना प्राचार्य डॉ. सुहास पाटील, विभागप्रमुख प्रा. व्ही. एस. कदम, डॉ. ए. डी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना सायली बेळवडीकर यांनी सहाय्य केले.

सोलर पॅसिव्हचा वापर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी केल्यास त्याच्या उत्पादनामध्ये २० ते ३० वाढ होईल. शेतकऱ्यांना या पद्धतीचा अधिक फायदा होण्यासाठी भविष्यात म्हैसुर येथील संस्थेत संशोधन करण्याचा मानस आहे.

तेजस्विनी जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस पळवापळवीला अटकाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गळीत हंगाम उशीरा सुरू झाल्यास सीमा भागातील ऊस कर्नाटकात जाणार असल्याची भीती सरकारच्या गळी उतरवण्यास यश आले असले, ऊस परिषदेत जाहीर होणाऱ्या एफआरपीनंतर खऱ्या अर्थाने कारखान्यांची धुराडी कधी पेटणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. एफआरपीवरुन आंदोलनाची तीव्रता वाढल्यास मंत्री समितीने जाहीर केलेल्या ‘डेडलाइन’ पेक्षा उशीरा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. पाच नोव्हेंबर रोजी गळीत हंगामाला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगाम चांगल्या पद्धतीने घेण्याची संधी मिळणार आहे.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत एक डिसेंबरपासून गळीत हंगाम सुरू होणार असल्याचा निर्णय घेतला होता. सीमाभागातील उसाची कर्नाटक राज्यातील कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात उचल होऊन येथील कारखान्यांना उसाचा तुटवडा भासेल अशी शक्यता व्यक्त करत या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला होता. त्यामुळे हंगाम कधी सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मंत्री समितीची बैठक पुन्हा घेण्याचे आश्वासन दिले होते. तरीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी केली होती.

बुध‍वारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत पाच नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होणार असल्याची घोषणा केल्यानंतर येथील कारखानदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कर्नाटकप्रमाणे येथील कारखाने लवकर सुरू होणार असल्याने उसाच्या पळवापळवीला अटकाव बसणार आहे. उसाचे क्षेत्र आणि उताराही कमी असल्याचा फटका सर्वच कारखान्यांना बसणार आहे. त्यामुळे सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम केवळ दोन ते अडीच महिने चालणार आहे. उशीरा हंगाम सुरु झाला असता तर, आहे त्यापेक्षाही उसाचा तुटवडा जाणवला असता. त्यामुळे आजच्या निर्णयाचे स्वागत सर्वच स्तरातून होत आहे. कारखाने लवकर सुरू झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिके वेळेवर घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्याची संधी मिळणार आहे.

हंगामाची तारीख सरकराने जाहीर केलेली असली तरी, हंगाम कधी होणार हे २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेनंतरच स्पष्ट होणार आहे. परिषदेमध्ये एफआरपी मागणीनंतर आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे. संघटनेने मागणी केलेल्या दरापेक्षा कमी दर देण्याचे कारखानदारांनी जाहीर केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांसह कारखानदार आणि सरकारचे ऊस परिषदेकडे लक्ष लागले आहे.

कोट

‘उसाचा अपुरा पुरवठा व कमी उताऱ्यामुळे सरकारकडून प्रतिटन ५०० रुपये अनुदान देण्याची आवश्यकता आहे. मंत्री समितीच्या बैठकीत त्याबाबतची मागणी केली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर जिल्ह्यात लाल दिव्याच्या गाड्या फिरु देणार नाही. हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी अनुदानाची आवश्यकता आहे.

हसन मुश्रीफ, आमदार

.....

कोट

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. कारखाने कधी सुरू होणार त्यापेक्षा उत्पादकांना दर किती देणार हे जाहीर करणे आवश्यक होते. बँकाकडून कारखान्यांना प्रतिटन ३८०० ते चार हजार रुपये कर्ज मिळणार आहे. त्यामुळे उत्पादकांना ३५०० रुपये दर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे हंगाम कधी सुरू होतो, त्यापेक्षा दराची घोषणा करणे आवश्यक आहे.

रघुनाथ पाटील, राज्याध्यक्ष शेतकरी संघटना

......

कोट

‘सीमाभागातील साखर कारखाने उशिरा सुरू झाले असते तर कोल्हापूर जिल्ह्यातील बराच ऊस कर्नाटकातील कारखान्यांनी पळवला असता. त्यामुळे येथील कारखाने अडचणीत आले असते. त्यामुळे गळीत हंगाम तातडीने सुरू करावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. या प्रयत्नांना यश आले आहे.

प्रकाश आवाडे, अध्यक्ष, जवाहर साखर कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वाराला चुकवताना केएमटी शेतात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा - शिये मार्गावर अचानक आडव्या आलेल्या दुचाकीस्वाराला चुकवताना चालकाचे केएमटीवरील नियंत्रण सुटून बस रस्ता सोडून शेतात घुसली. या अपघातात बसमधील ७ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. बुधवारी (ता. १९) सकाळी साडेआठच्या सुमारास शिये जुना जकात नाक्याजवळ हा अपघात घडला. अपघातातील जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.

केएमटीची क्रांतिसिंह नाना पाटील नगर - कसबा बावडामार्गे पेठवडगाव जाणारी बस (एमएच ०९ बीसी २१६८) सकाळी ७.३५ वाजता सुटली. शिये टोल नाक्यापासूनच जवळील जुन्या जकात नाक्याजवळ बस पोहोचली असता, डाव्याबाजूने ओव्हरटेक करणारा दुचाकीस्वार अचानक रस्त्यात मध्येच आला. यावेळी चालक संजय मारुती कांबळे (४२) हे भरधाव वेगातील बसचा ब्रेक लावता केबीनमधील पाण्याची बाटली खाली पडली. ती ब्रेकखाली जाऊन अडकल्याने चालक कांबळे यांचे बसवरील नियंत्रण सुटले. बस रस्ता सोडून डाव्या बाजुला उसाच्या शेतात घुसली. अपघातात बसमधील सात प्रवाशी जखमी झाले.

अपघातात चालक संजय कांबळे यांच्यासह वाहक ज्ञानदेव बापू मोरे (५६), विजया शिवाजी कारंडे (वय ६०, रा. मनिषा कॉलनी, सुभाषनगर), प्रकाश निवृत्ती कांब‍ळे (५१, रा. भामटे, ता. करवीर), जनाबाई बापू पावणे (५०, रा. किणी. ता. हातकणंगले), मंगल सिद्राम मराठे (५०, रा. मनिषा कॉलनी, सुभाष नगर), अरविंद मेवालाल कुमार (४२, रा. लक्ष्मीपुरी) हे जखमी झाले. जखमींच्या चेहऱ्यावर, डोक्याला आणि हाताला किरकोळ जखमा झाल्या. अपघातानंतर या मार्गावरील अन्य ये-जा करणाऱ्या नागरीकांनी जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

बसमध्ये एकूण २६ प्रवाशी होते. ब्रेकखाली बाटली अडकली असताना चालकाने बस वेळीच थांबल्याने पुढील अनर्थ टळला. अपघात स्थळापासून काही अंतरावर पंचगंगा नदी आहे. तेथे ही घटना घडली असती तर मोठी हानी झाली असती. अपघातानंतर केएमटीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली. सीपीआर पोलिस चौकीत अपघाताची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्काराचा प्रयत्न;आरोपीला बेदम चोप

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे ओढ्यावर कपडे धुण्यास गेलेल्या एका महिलेच्या गळाला वस्तरा लावून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. संबधित तरुणाला ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी शानूर शेख (वय ३० रा. उगार ता. रायबाग जि. सांगली) याला अटक केली आहे.

बुधवारी दुपारी गावाजवळील ओढ्यात काही महिला कपडे धुण्यास गेल्या होत्या. सर्व महिला कपडे धुऊन निघून गेल्या. तेथे पीडित महिला एकटीस राहिली. त्यावेळी शानूर शेख ओढ्याजवळून जात होता. त्याने महिला एकटी असल्याचे पाहून तिच्याशी लंगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आरडाओरड केली. आरडाओरड करताचा शानूरने आपल्याकडीस वस्तरा तिच्या गळाला लावून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून ओढ्याजवळील काही ग्रामस्थ आपल्याकडे येत असल्याचे पाहून शानूर मोटारसायकल घेऊन पळून गेला. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो केंपवाडकडे पळून गेला. काहींनी याची माहिती केंपवाडमधील ग्रामस्थांना दिल्याने तेथेही शानूरला पकडण्यासाठी काही तरुण दबा धरून बसले होते. त्यामुळे शानूर पुन्हा मोटारसायकल घेऊन शिंदेवाडीकडे आला. ग्रामस्थ गोळा झालेले पाहून तो मोटारसायकल रस्त्यावरच टाकून शेतात पळून गेला. ग्रामस्थांनी त्याला पकडून त्याची यथेच्छ धुलाई केली. त्याला गावातील चौकात खांबाला बांधून महिलांनीही त्याला चप्पलांचा प्रसाद दिला. हा प्रकार ग्रामीण पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉँग्रेसचा स्वबळाचा नाराविधान परिषद निवडणूक

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली तर सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देऊ, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. आपण बंडखोरी करणार नाही, परंतु पक्षाने स्वबळाचा निर्णय घेऊन उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीही नक्की विचार करेल. राष्ट्रवादीच्या अनेक मतदारांचा आपला पाठिंबा आहे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी मोहनराव कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ही जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, या वेळी ही जागा काँग्रेसला सोडावी, असा आग्रह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांनी धरला आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांना या बाबत विचारले असता त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला.

कदम म्हणाले, ‘काँग्रेसला ही जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ती जागा काँग्रेसला मिळेल. कारण राष्ट्रवादीतही आपले मित्र आहेत. आपण गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळेच आपले नाव समोर आले असेल तर राष्ट्रवादीही ही जागा नक्की देईल. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी आमचे मतदार ज्यादा असल्याचे सांगितले असले तरी आमचेही मतदार आहेत. मागील वेळी आम्ही त्यांना मते दिली आहेतच. चर्चेतून राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला दिलिच नाही आणि काँग्रेसने स्वबळावर लढायचा निर्णय घेतला तर नक्की स्वबळावर लढावे. पक्षाने अधिकृत उमेदवारी व चिन्ह द्यावे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवदासीचा थाटात झाला विवाह

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

देवदासी म्हणून जगणे नशिबी आल्याने सांगलीतील वेश्या वस्तीत विसावलेल्या तरुणीचे बुधवारी लग्न झाले. संपूर्ण वसाहतीने उभयतांवर पुष्पवृष्टी करून त्यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब केले. सरकार दरबारी लग्न करीत असल्याच्या नोंदीचा सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते, महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेला अनोखा लग्नसोहळा वेश्यावस्तीने जवळून अनुभवला. त्या वस्तीत राहणाऱ्या तरुणीबरोबर लग्न करण्याचे धाडस दाखवणारा तरुण सरकारी नोकरीत असून, त्याने उचलेल्या पावलाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सांगलीतील काळ्या खणीच्या काठावर वसलेल्या आणि वेश्यावस्ती म्हणून परिचित असलेल्या परिसराचे रुपांतर सुंदरनगरमध्ये झाले आहे. स्वच्छता, सडा-रांगोळीने दररोज शोभून दिसणाऱ्या या वस्तीमध्ये सर्व राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात पार पडतात. बुधवारी मात्र देहविक्री करून आपले आयुष्य जगणाऱ्या महिलांची ही वस्ती सकाळपासून लगीन घाईत मग्न झाली होती. तेथील महिलांना, तरुणींना लग्न ही तशी दूरचीच गोष्ट असते, परंतु, बुधवारच्या लग्नसोहळ्याने त्यांचा समज दूर केला. एका तरुणीचे लग्न थाटामाटात करण्यात आले. यासाठी सांगलीतील वेश्या महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राने पुढाकार घेतला. या वस्तीत काम करणाऱ्या एका २५ वर्षीय देवदासी मुलीचे एका सरकारी नोकरीत असलेल्या तरुणावर प्रेम जडले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय संस्थेसमोर मांडला. संस्थेच्या अध्यक्षा अमिराबी शेख आणि सचिव दीपक चव्हाण यांनी पुढाकार घेत या दोघांच्या लग्नाचा निर्णय घेतला. त्या दोघांचे वेश्या वस्तीतील महिलांनी आणि मुलींनी लग्न लावून दिले आणि आपल्याच एका भागिणीचे लग्नाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यास मदत केली. आपल्या सहकारी मुलीचे लग्न होणार आहे, या कल्पनेतून संपूर्ण वेश्या वस्ती उजळून निघाली होती. अनेक मुलींनी आपल्या दारात आकर्षक रांगोळ्या काढून या आनंदात सहभाग घेतला. या वेळी एखाद्या वधू प्रमाणे मुलीला सजवण्यात आले. तसेच लग्नाची हळदी सुद्धा खेळण्यात आली. एकंदरीत वेश्या वस्ती सारख्या ठिकाणी लग्नाची लगबग दिसून आली. यावेळी महिला पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फुलांचा वर्षाव करीत या जोडीला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. हा लग्न सोहळा पाहिल्यावर या वस्तीतीत अनेक मुलींना आपण या वस्तीत आलो नसतो तर आपणही असे लग्न करून सुखाचा संसार थाटला असता, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. दुर्लक्षित घटकाला प्रवाहात आणण्यासाठी संस्थेने उचललेले पाऊल खरोखर देहविक्री करणाऱ्या महिलांच्या जीवनात नवे संजिवनी आनणारी ठरली आहे. या सोहळ्यासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक एस. व्ही. पाटील, महिला कर्मचारी स्वप्ना गलांडे, नगरसेविका अनारकली कुरणे, सादिक शेख, गौतम वाघमारे, विशाल गुड्डी आदींसह वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या महिला आणि देवदासी मुली उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसवेश्वर पुतळ्यावरून विद्यापीठ चौकात तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाजवळ विद्यानगरी चौकातील आयलंड सुशोभिकरणाच्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसविल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. महानगरपालिका आणि पोलिसांनी तेथून हा पुतळा हटविल्याने लिंगायत समाजासह भारिप - बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परीरसरात धरणे आंदोलन केले. त्यामुळे या परिसरात वातावरण तणावपूर्ण होते.

शिवाजी विद्यापीठानजीकच्या विद्यानगरी चौकात आयलंड सुशोभिकरणाचे काम महापालिकेच्यावतीने सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाकडून केली जात आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे आयलंडमध्ये अज्ञात व्यक्तींनी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविल्याचे परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी या घटनेची माहिती महापालिका प्रशासन आणि पोलिसांना दिली.

त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने हा विनापरवाना बसवलेला पुतळा हटवला. या घटनेची माहिती समजताच भारिप बहुजन महासंघ, लिंगायत समाजाच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुतळा पूर्ववत ठेवावा असा आग्रह ध्रला. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने घटनास्थळी पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुतळा पूर्ववत बसवल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणाहून हलणार नाही अशी भूमिका घेत आंदोलकांनी घटनास्थळीच धरणे आंदोलन केले.

यावेळी अतुल दिघे म्हणाले, ‘गेली चार वर्षे आम्ही मागणी करुनही बसवेश्वरांचा पुतळा बसविण्यास महापालिकेने टाळाटाळ केल्याने कार्यकर्त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग म्हणून हा पुतळा बसवला.पुतळा बसविल्याबाबत गुन्हे दाखल झाल्यास आमची तयारी आहे. प्रशासनाने पुतळा परत द्यावा. पूर्ववत या जागेवर बसवावा.

आंदोलक पुतळा बसविण्याच्या मागणीवर ठाम राहिले. महापालिकेने हटविलेला पुतळा तत्काळ परत द्यावा अशी मागणी केली. तर ‘महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्यास महापालिकेचा विरोध नाही. विनापरवाना पुतळा बसवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे,’ असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. या ठिकाणी दिवसभर पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता. मात्र आंदोलक पुतळा ताब्यात देण्याच्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. मात्र, पोलिसांनी पुतळा आंदोलकांच्या ताब्यात दिला नाही. यावेळी बाळासाहेब भोसले, सुखदेव बुद्धाळकर, सोमनाथ घोडेराव, दिगंबर सकट, मेघा पानसरे आदी उपस्थित होते.

आज आयुक्तांसोबत बैठक

बसवेश्वरांचा पुतळा बसवण्यावरून बुधवारी दिवसभर विद्यापीठ चौकात धरणे आंदोलन केल्यानंतर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आंदोलनाची दखल घेतली. याबाबत आयुक्तांनी गुरूवारी (ता. २०) महापालिकेत आयुक्त कार्यालयात बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुतळा समितीने तीन जागांचे पर्याय सुचविले आहेत. त्यावर गुरुवारच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या केएमटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जनजीवन कोलमडणार आहे. सहावा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसाठी केएमटीचे एक हजारहून अधिक कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपामुळे दैनंदिन एक लाख प्रवाशांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या माध्यमिक शाळांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. उपनगरासह आसपासच्या गावातून सुमारे दहा हजार पासधारक विद्यार्थी केएमटीमधून ये-जा करतात. संपामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची समस्या उभी ठाकणार आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. २०) आहे. सभेवेळी सकाळी दहा वाजता कर्मचारी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करणार आहेत. वाहक, चालक, आस्थापना आणि वर्कशॉप विभागातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

बुधवारी सायंकाळी बहुतांश कर्मचारी ड्यूटी संपवून शाहू क्लॉथ मार्केट येथील केएमटीच्या मुख्य कार्यालयासमोर जमले. संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, राजेंद्र तिवले, प्रमोद पाटील, विश्वनाथ चौगुले, मनोज नार्वेकर, बापू भोसले, अमर पाटील, के. व्ही. जाधव,डी. एस. माळी यांच्या उपस्थितीत तेथे निदर्शने झाली. सहावा वेतन आयोग लागू करावा, दरमहा २५ तारखेपूर्वी वेतन मिळावे, पीएफ, अल्पबचत खात्यावरील फरकाची रक्कम तत्काळ मिळावी अशा विविध मागण्या कर्मचारी संघटनेने केल्या आहेत. संघटनेने प्रशासनाला याबाबत पाच ऑक्टोबरलाच संपाची नोटीस दिली होती. त्यानंतर या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आयुक्त, केएमटी प्रशासन आणि कर्मचारी प्रतिनिधींची सोमवारी (ता. १७ ऑक्टोबर) चर्चा झाली. यात सहाव्या वेतन आयोगाचा विषय वगळता अन्य मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. संघटना सहावा वेतन आयोग लागू करण्यावर ठाम राहिल्याने चर्चा फिसकटली.

दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर हे कार्यालयीन कामानिमित्त मंगळवारपासून मुंबईत आहेत. परिणामी गेले दोन दिवस प्रशासकीय पातळीवरून अन्य कोणत्याच अधिकाऱ्यांनी कर्मचारी संघटनेशी चर्चा केली नाही. केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांनी मंगळवारी मान्यताप्राप्त कर्मचारी संघटेनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांना संप मागे घेण्याविषयी पत्र दिले. मात्र सरनाईक यांनी, ‘कर्मचारी सहावा वेतन आयोगाच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. प्रशासनाने ठोस निर्णय होत नसल्याने संप अटळ आहे’ असे सांगितले.

केएमटीची आर्थिक स्थिती नाजूक आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे पत्र कर्मचारी संघटनेला दिले.

संजय भोसले, अतिरिक्त व्यवस्थापक, केएमटी


कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आयुक्तांसोबत सहाव्या वेतन आयोगाबाबत चर्चाही झाली. मात्र प्रशासनाकडून ठोस काहीच मिळाले नाही. त्यामुळे कर्मचारी संपावर ठाम आहेत.

निशिकांत सरनाईक (अध्यक्ष, म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारातील संस्था भाजपच्या तंबुत

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

twieet@gurubalmaliMT

कोल्हापूर : ‘विना सहकार नहीं उद्धार’ याची जाणीव झालेल्या भाजपने सहकारातील आदर्श संस्थांना आपल्या तंबूत घेण्यास सुरूवात केली आहे. शाहू कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे यांच्या रुपाने त्याचा श्रीगणेशा झाला आहे. शिरोळ हे त्यांचे पुढील लक्ष्य राहणार आहे. जनसुराज्यबरोबर आघाडी करत वारणा उद्योग समुहातदेखील भाजपचा चंचूप्रवेश लवकरच होईल. राष्ट्रवादीला शह देतानाच आमदार हसन मुश्रीफ यांना कागलमध्येच रोखण्याचा भाजपचा डाव घाटगेंच्या प्रवेशाने यशस्वी होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराच्या बळावर दोन्ही काँग्रेसने आपली स्थिती मजबूत केली. बहूतेक सर्वच सहकारी संस्था दोन्ही पक्षांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेत यश मिळवणाऱ्या शिवसेना, भाजप अथवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सहकारी संस्था अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेत फारसा शिरकाव करता आलेला नाही. यामुळे सहकारातील ताकदवान नेत्यांना आपल्या तंबूत आणण्याची मोहीम भाजपने उघडली आहे. याआधीच साखर कारखान्यांच्या निवडणुका लढवत त्याची सुरूवात करण्यात आली.

गडहिंग्लज आणि आजरा साखर कारखान्यात हा डाव यशस्वी झाला. प्रकाश चव्हाण, डॉ. प्रकाश शहापूरकर यांना पक्षात घेतल्यानंतर भाजपने समरजित घाटगे, विनय कोरे, गणपतराव पाटील यांच्याभोवती जाळे फेकले. आता घाटगे यांचा भाजपप्रवेश निश्चीत झाल्याने राज्यातील आदर्श साखर कारखाना आता भाजपच्या ताब्यात आला आहे. आजरा आणि गोडसाखरमध्ये चंचूप्रवेश केल्यानंतर शाहू कारखान्यात भाजपची थेट सत्तेपर्यंत मजल गेली आहे.

मुश्रीफ हेच टार्गेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद राज्यभर पोहोचला. त्यातूनच भ्रष्ट संचालकांना दहा वर्षे निवडणूक बंदीचा कायदा झाला. राष्ट्रवादीला शह द्यायचा असेल तर आमदार मुश्रीफ यांना कागलमध्येच अडवण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. भाजप वाढण्यासाठी राष्ट्रवादीला ब्रेक लावणे आवश्यक आहे. मुश्रीफ ही राष्ट्रवादीची ताकद आहे. त्याला सुरूंग लावण्यासाठी कागलच्या राजकारणाला मंत्री पाटील यांनी महत्व दिले. समरजित यांची मुश्रीफ यांच्याबरोबर आघाडी होती. ती तोडण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. सेना-भाजप युती असल्याने आता प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे आणि समरजित घाटगे यांची आघाडी निश्चीत आहे. ही आघाडी मुश्रीफांना अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. त्याची सुरूवात नगरपालिका निवडणुकीत कागल, मुरगूडला होईल. विनय कोरे भा​जपबरोबर आघाडी करणार असल्याने पन्हाळा, मलकापूरात राष्ट्रवादीला दणका बसेल. जयसिंगपूर आणि कुरुंदवाड पालिकेतही राष्ट्रवादीला फटका बसण्याची चिन्हे आहेत. कागल तालुक्यात भाजपला घाटगे यांच्या रुपाने चेहरा आणि ताकद मिळाली आहे.

वेगळा चेहरा

संभाजीराजे यांना खासदार करून भाजपने छत्रपती घराण्याचा स्वच्छ चेहरा पक्षासोबत आणला. आता समरजित यांच्या प्रवेशाने आणखी एक मोठे घराणे भाजपमध्ये आले आहे. शिवाय सहकारातील चांगला चेहरा पक्षाला बोनस म्हणून मिळाला आहे. समरजित यांना पक्षात घेण्याची सुरूवात पालकमंत्री पाटील यांनी केली आणि संभाजीराजेंना त्याला गती दिली. आता शिरोळच्या दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये यश आल्यास दुसरा कारखाना आणि सहकारातील आदर्श चेहरा या रूपाने मिळणार आहे. गगनबावडा तालुक्यात भाजपची ताकद नगण्य आहे. पी. जी. शिंदे यांच्या प्रवेशाने पक्षाला या तालुक्यात ताकद मिळेल. गडहिंग्लज, आजरा आणि कागल तालुक्यानंतर शिरोळ आणि गगनबावडा तालुक्यात भाजपची ताकद वाढण्यात हे सर्व प्रवेश कारणीभूत ठरत आहेत.

नगरपालिकांत कमळ फुलविण्याचे प्रयत्न

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कागल, मुरगूड, पन्हाळा, गडहिंग्लज, मलकापूर, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेत प्रवेश करण्याचा पहिला टप्पा गाठला आहे. शहापूरकर, घाटगे, डॉ. अजित चौगुले, रामचंद्र डांगे आणि कोरे यांच्या रुपाने हा टप्पा पार केल्यानंतर इचलकरंजीत भाजप लक्ष घालणार आहे. गेली पाच वर्षे इचकलरंजी वगळता एकाही पालिकेत भाजपचा एकही सदस्य नव्हता. आता मात्र ज्या पद्धतीने पक्षाचे नियोजन सुरू आहे, ते पाहता सर्व पालिकांत कमळ दिसण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य परिचरांना सेवेत कायम करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरोग्य परिचरांना सेवेत कायम करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्य आरोग्य परिचर संघटना आणि करवीर कामगार संघाने गुरुवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. आरोग्य परिचरांनी मागण्यांचे निवेदन प्रशासन अधिकाऱ्यांना दिले.

संघटनेने आरोग्यसेविकांना सेवेत कायम करावे म्हणून २००४ मध्ये औद्योगिक न्यायालय येथे दावा दाखल केला होता. त्याचा निकाल १४ ऑगस्ट २०१३ ला लागला असून आरोग्यसेविकांना सेवेत कायम करावे असा महत्वपूर्ण निकाल कोर्टाने दिलेला आहे. मात्र, त्यावर अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. जिल्ह्यातील आरोग्य परिचरांना सेवेत कायम करावे, न‌िवृत्ती पेन्शन योजना लागू करावी, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, २० ऑक्टोंबर २०१४ च्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, थकीत मानधन त्वरीत द्यावे, दिपावली बोनस द्यावा, वारसांना सेवेत सामावून घ्यावे, परिचरांना वर्षातून दोन साड्या द्यावा यासह इतर मागण्यासाठी टाऊन हॉल येथून जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष कॉ. बाबा यादव यांनी केले. यावेळी रघुनाथ कांबळे, दिलीप पवार, सुशिला यादव यांच्यासह जिल्ह्यातील परिचर मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images