Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्राचीन कोल्हापूर- ३

$
0
0

प्राचीन कोल्हापूर- ३

पोहाळे, मसाईच्या बौद्ध लेण्यांचे वैभव

योगेश प्रभुदेसाई

मागच्या भागात आपण प्राचीन कोल्हापूरमध्ये (आजचा शहरी भाग) सुस्थिर झालेला बौद्ध धर्म अवशेषांच्या रुपात पाहिला. आज आपण शहराबाहेर डोंगरात असलेली पोहाळे आणि मसाई येथील बौद्ध लेणी जाणून घेऊ आणि त्या अनुषंगाने बौद्ध धर्माचा झालेला प्रवास जाणून घेऊ.

डी. सी. ग्रॅहॅमनी त्यांच्या १८५४ सालच्या 'स्टॅटिस्टिकल रिपोर्ट ऑन द प्रिन्सिपॅलिटी ऑफ कोल्हापूर' या ग्रंथात मसाई आणि पोहाळे येथील लेण्यांची भूमीआयतने प्रमाणासह दिली आहेत. पोहाळ्याच्या गुहा या जोतिबाच्या डोंगरात तर मसाईच्या गुहा या पन्हाळ्याकडे जाताना मसाईच्या पठाराजवळ आहेत. कालखंडानुसार मसाईच्या गुहा पोहाळ्याच्या गुहांपेक्षा थोड्या नंतरच्या वाटतात.

ज्येष्ठ पुरातत्त्वज्ज्ञ जामखेडकर यांनी पोहाळ्याच्या गुहांचा कालखंड इसवी सनाचे तिसरे शतक ठरवला आहे. त्यामानाने तुलना करू जाता मसाईच्या गुहा या इसवी सनाच्या चौथ्या शतकातील असाव्यात. बौद्ध गुहांचे दोन ठळक विभाग असतात - एक म्हणजे चैत्य; ज्यामध्ये स्तूप असतो. दुसरा म्हणजे विहार; ज्यामध्ये बौद्ध भिक्खू स्थायी स्वरूपात किंवा फक्त उपोसथसाठी (पाक्षिक सामूहिक प्रार्थना आणि कर्मांची कबुली) एकत्र येत असत. मसाईच्या गुहांनाच पांडवलेणी असं स्थानिक संबोधन आहे. मसाईच्या गुहांमध्ये कुठेही स्तूपाच्या खुणा दिसत नसल्या तरी गुहांच्या बाहेर उथळ कोनाड्यांमध्ये स्तूप कोरलेले आढळतात. त्यावरून या गुहा बौद्धांच्या आहेत हे सिद्ध होते.

मसाईच्या गुहांची रचनादेखील पारंपरिक अश्वनालाकृती पद्धतीनं केलेली आढळत नाही. शिवाय आतमधल्या दालनांमध्ये चैत्य कोणता आणि विहार कोणता हे समजत नाही. पण, पोहाळ्याच्या गुहांमध्ये चैत्य आणि विहार अशी विभागणी स्पष्ट दिसते. चैत्यगृहामध्ये असलेला स्तूप हा त्या डोंगराच्या दगडातच अखंड कोरलेला आहे. स्तूपावर असणारे छत्र आणि त्याची यष्टी आज मोडून पडलेले असलेले तरी त्या छत्राच्या खुणा वर छतावर दिसतात. चैत्यगृहाचे छत सपाट आहे, पण मागील भिंत मात्र पारंपरिक बौद्ध स्थापत्त्याप्रमाणे चापाकृती म्हणजेच अर्धगोल आहे. चैत्यगृहाच्या पलीकडे असलेल्या विहारामध्ये एकूण अठरा दालने असून विहाराच्या मध्यभागी प्रशस्त मोकळी जागा आहे. विहारातील स्तंभ हे वरच्या-खालच्या बाजूला चौकोनी तर मध्ये अष्टकोनी असे होते. काही स्तंभांमध्ये दिवे ठेवण्यासाठीचे कोनाडेही केलेले आढळतात. पारंपरिक बौद्ध लेण्यांप्रमाणे या गुहांच्या बाहेरही पाण्याची टाकी दिसतात.

पोहाळ्याच्या गुहा या हीनयान आणि महायान या संप्रदायांच्या मधल्या टप्प्यातील वाटतात तर मसाईच्या गुहा या महायान संप्रदायाच्या वाटतात. कराडवरून आलेली महायानीयांची एक शाखा पन्हाळा-जोतिबावरून खाली कोकणात उतरलेली दिसते. पोहाळे आणि मसाई या दोन्ही ठिकाणच्या गुहा या बौद्ध भिक्खूंच्या प्रवासातील थांबा म्हणून वापरल्या गेल्या असाव्यात. कराडमध्ये असलेल्या जखीणवाडी, आगाशिव इथल्या गुहा या हीनयान आणि महायान या दोन्ही टप्प्यांमधे मोडतात. त्यातील पूर्व आणि उत्तर टप्प्यांमधील महायानी भिक्खूंची एक शाखा कदाचित कोल्हापूरवरून कोकणात उतरली असावी.

इसवी सनाच्या पाचव्या शतकानंतर भारतातील बौद्ध धर्म हा आपले स्वरूप बदलताना दिसतो. हीनयान ते महायान; महायान ते वज्रयान आणि वज्रयान ते सहजयान अशा स्थित्त्यंतरांमधून बौद्ध धर्म जाताना दिसतो. कोल्हापूरच्या शिलाहार राजा गंडरादित्याने इसवी सनाच्या बाराव्या शतकात मिरजेजवळ बांधलेले बुद्धाचे मंदिर हे कदाचित वज्रयानी सांप्रदायिकांचे असावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन व्यापाराविरोधात निदर्शने

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'अॅमेझॉन गो बॅक' अशा घोषणा देत ऑनलाइन व्यापाराविरोधात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने बुधवारी बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये चेंबरशी संलग्न असलेल्या विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस भारत दौऱ्यावर येत असताना त्यांच्यासारख्या आनॅलाइन कंपन्यांच्या व्यापारास विरोध करण्याबरोबरच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी देशभरात निदर्शने करण्याचे आदेश कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्यावतीने दिले होते. त्यानुसार चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने बुधवारी बिंदू चौकात निदर्शने केली.

विविध प्रकारच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन अॅमझोन गो बॅक, व्यापारी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच अॅमेझॉन गो बॅकचे फलकही यावेळी दाखवण्यात आले. याप्रसंगी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी ऑनलाइन व्यापाराविरोधात व्यापारी संघटनांनी यापूर्वीही आंदोलने केली आहेत. त्याची गांभीर्यता सरकारपर्यंत पोहचवली आहे. अशा परिस्थितीत या कंपन्यांकडून होत असलेला ऑनलाइन व्यापार बंद झालाच पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी धैर्यशील पाटील, आनंद माने, प्रदिप कापडिया, संपत पाटील, धनंजय दुग्गे, अजित कोठारी, हरिभाई पटेल, राहुल नष्टे, वैभव सावर्डेकर, संभाजीराव पोवार, वसंतराव देशमुख, अनिल धडाम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालक-पालक संवादातील दरी ठरतेय कारणीभूत

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कोल्हापूर : आर्थिक गणिते जुळवण्यासाठी नोकरी करणारे आई-वडील, कामाच्या वेळांची अनिश्चिती, विभक्त कुटुंबात मुलांना देण्याचा कमी होणारा वेळ आणि पालक व मुलांमधील संवादातील वाढती दरी यामुळे घराघरात मोबाइल गेम्सच्या अधीन जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढत आहे. मोबाइल गेम्सच्या विळख्यात अडकलेल्या मुलांशी बोलणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांच्या निरीक्षणात बालक- पालक यांच्यात संवाद नसलेल्या घरातील मुलांचा ओढा मोबाइलमधील गेम्सकडे वाढ असल्याचा निष्कर्ष ठळक झाला आहे.

अनेक कारणांनी मुलांकडे सतत लक्ष देणे शक्य होत नसलेल्या पालकांकडून मुलांच्या हातात पौगंडावस्थेतच मोबाइल फोन दिल्याचे प्रकार सर्रास आढळून येतात. सध्याची तणावयुक्त जीवनशैली, आई व वडील दोघांनाही नोकरी करण्याची गरज यामुळे घरामध्ये मुलांना वेळ देणाऱ्या पालकांचे प्रमाण कमी आहे. शाळा, त्यानंतर खाजगी क्लास अशा चौकटीत अडकणाऱ्या मुलांचा अनौपचारीक शिक्षणातून होणारा व्यक्तीमत्व विकास होण्यासाठी पालकांचा सहवास दुरापास्त होत आहे. याचा एकत्रित परिणाम मुले व पालक यांच्यातील संवादावर झाला आहे.

वयाच्या १३ ते १९ वयोगटातील मुलांमध्ये होणारे शारीरीक व मानसिक बदल लक्षात घेऊन त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची गरज पालकांना त्यांच्या व्यस्त कामामुळे पूर्ण करता येत नाही. शाळेतून घरी येण्याच्या वेळी नोकरदार पालक घरी नसतात, त्यासाठी मुलांना संपर्काचे साधन म्हणून मोबाइल फोन दिले जातात, मात्र पालकांच्या अनुपस्थित एकटेपणा घालवण्यासाठी मुले मोबाइल गेम खेळण्यास सुरूवात करतात. यातूनच या खेळांमध्ये मुले अडकली जातात.

सध्याच्या नोकऱ्यांमध्ये कामाचा प्रचंड दबाव आहे. कार्यालयीन वेळेनंतरही अनेकदा पालक घरात काम करत बसतात. त्यामुळे घरी आल्यानंतरही मुलांच्या दिवसभरातील अनुभवाबाबत कोणतीही चर्चा अनेक कुटुंबात होत नाही. यातून मुलं त्यांचे मनोरंजन, वेळ घालवण्याचे साधन म्हणून ऑनलाइन गेम्समध्ये रमतात. सुरूवातीला मनोरंजन असलेले हे माध्यम ऑनलाइन गेम्समधील उत्कटता, वेग यातून मुलांच्या मनाचा ताबा घेते व त्यातून मुलांना या खेळाचे व्यसन लागते.

(क्रमश:)

काही कारणांनी एकत्र कुटुंबपद्धती संपून विभक्त कुटुंबपद्धती ही गरज बनली आहे. अशा कुटुंबात पालक व मुलांमध्ये अवांतर बोलणे होत नाही. मुलांना त्यांच्या दिवसभरातील गंमतीजंमती पालकांना सांगाव्या असे वाटत असते. मात्र अनेक घरांमध्ये मुलांची ही मानसिक भूक भागवली जात नाही. 'मी कामात आहे' हे पालकांचे उत्तर मुलांना मोबाइल गेम्सकडे आकर्षित करते. पालकांना आपल्यासाठी वेळ नाही हा विचार मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करणारा असतो. जेव्हा पालकांकडूनच मुलांना मोबाइल दिला जातो, तेव्हा त्यावरील गेम्समधील जिंकण्याचा अनुभव त्यांना त्यांचे महत्त्व वाढवणारा वाटतो. यासाठी पालकांनी मुलांशी संवाद ठेवण्याचे महत्व लक्षात घेतले पाहिजे

- प्रा. वर्षा साठे, तज्ज्ञ, चाइल्ड डेव्हलपमेंट

\Bअसा व्हावा बदल\B

- पालकांनी घरात मोबाइलच्या वापराबाबत नियमावली करावी

- दिवसभर शाळा ,कॉलेजमध्ये काय काय झाले याविषयी गप्पा माराव्यात

- दररोज रात्रीचे जेवण कुटुंबातील सर्वांनी एकत्र करावे

- मुलांच्या आवडी निवडींविषयी पालकांनी जाणून घ्यावे

- मुलांचा एकटेपणा घालवण्यासाठी त्यांना उपक्रमशील खेळ द्यावेत

- मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यासाठी कोचिंग लावावे

- कौटुंबिक समारंभात मुलांना घेऊन जावे व नातेवाईकांशी बोलण्यासाठी उद्युक्त करावे

- चांगला सिनेमा, शहरातील प्रदर्शने याविषयी मुलांशी चर्चा व मत घ्यावीत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथा, कवितांची रंगली मैफल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र टाइम्स, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि महावीर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या 'वाङ्मय मैफली'च्या निमित्ताने कथा, कवितांची मैफल रंगली. महावीर महाविद्यालयाच्या अॅम्पी थिएटरमध्ये बुधवारी या मैफलीत विद्यार्थ्यांसह साहित्यरसिक न्हाऊन निघाले.

मराठी भाषेचे सौंदर्य मराठी साहित्यात आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि साहित्य रसिकांना साहित्यातील सौंदर्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी वाङ्मय मैफलीचे आयोजन केले होते. महावीर कॉलेजच्या अॅम्पी थिएटरमध्ये मैफल रंगली. कोनवडेचे कवी गोविंद पाटील, सुरेश मोहिते आणि कथाकथनकार जयवंत आवटे यांच्या बहारदार सादरीकरणाने अवघे थिएटर मंत्रमुग्ध झाले. कवी गोविंद पाटील यांच्या प्रेम कवितांनी मैफलीची सुरुवात झाली.

तुझ्यासारखीने बघावे कशाला, तू रेलगाडी तुझा रूळ झालो,

तुझा स्पर्श होता मी वारुळ झालो, तू म्हणतेस स्वारी कशाला कशाला

तुझ्या वागण्याने मती गुंग झाली, जिवांची घड्याळे किती बंद झाली

सुचेना जगावे कसे आरशाला, तुझ्यासारखीने बघावे कशाला

या प्रेम कवितेने हास्याचे फवारे उडवत प्रेमाच्या तरल भावना व्यक्त केल्या. ग्रामीण बाज, शब्दांचे सौंदर्य आणि अनुभवाची उत्कटता यामुळे पाटील यांच्या कवितांना उपस्थितांची उत्स्फुर्त दाद मिळाली. यावेळी कवी गोविंद पाटील म्हणाले, 'मराठी भाषा टिकवण्याचे आणि वाढवण्याचे प्रामाणिक काम खेड्यातील माणसांनीच केले आहे. अस्सल मराठी साहित्य खेड्यातूनच जन्माला येते. मराठी साहित्याच्या परंपरेतील बहुतांश लेखकांची नाळ गावगाड्याशी आहे. मोबाइल आणि इंटरनेटच्या जमान्यातील तरुणाई मराठी भाषा कशी स्वीकारते, यावरच भाषेचे भवितव्य अवलंबून आहे.'

सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे कथाकथनकार जयवंत आवटे यांनी जाणती ही कथा सादर केली. लग्नानंतर नवदाम्पत्याची परस्परांशी भेटीची ओढ आणि एकाच खोलीच्या घरातील तडजोडीचा संसार याचे नेमके चित्रण त्यांनी या कथेद्वारे सादर केले. विनोदी ढंगात त्यांनी गावगाड्यातील व्यक्तिचित्रे उभी केली. अस्सल बोली भाषेतील सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली, तसेच अंतर्मुखही करण्यास भाग पाडले. इस्लामपूर येथील कवी सुरेश मोहिते यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करीत कवितांचे सादरीकरण केले. त्यांच्या 'मिरगाचा किडा', 'कोयता' या कवितांनी बदलते गाव, सहकारातील भीषण वास्तव साहित्य रसिकांसमोर मांडले. मराठी साहित्यातील दर्जेदार कवींच्या काव्याचा ओझरता आढावाही त्यांनी घेतला. गोविंद पाटील यांच्या कवितांनी मैफलीचा समारोप झाला.

वाङ्मय मैफलीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे होते. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, 'साहित्य हा समाज जीवनाचा आरसा आहे. साहित्यामुळेच बुद्धी आणि मनाची मशागत होते, यामुळे वाङ्मय मैफल विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.'

डॉ. गोपाळ गावडे यांनी स्वागत केले. डॉ. शरद गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमासाठी मानसी दिवेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, आय. जी. शेख, डॉ. गोमटेश पाटील, डॉ. मनगोंडा मायगोंडा, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे विक्रम राजवर्धन, जगजीत महावंश, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

वाङ्मयाचे तिळगूळ वाटप

मकर संक्रांतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वाङ्मय मैफलीत निमंत्रित साहित्यिकांनी कथा आणि कवितांचे सादरीकरण केले. याशिवाय उपस्थित साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्याही प्रतिभेला धुमारे फुटले. वाङ्मय मैफल संपली तरी कवी आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद सुरूच होता. यानिमित्ताने वाङ्मय मैफलीत वाङ्मयाच्या तिळगुळाचे वाटप झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभेत पडणार ‘एलइडी’चा उजेड

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहरात बसविण्यात येत असलेल्या एलइडी दिवे बसविण्याचे काम इइएसएल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, कंपनीचे काम असमाधानकारक आणि निकृष्ट दर्जाचे असल्याची टीका सातत्याने होत आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कंपनीचा समावेश काळ्या यादीत करा असा ठराव स्थायी समितीकडून महासभेत चर्चेला येणार आहे. त्यामुळे बुध‌वारी (ता. २२) होणाऱ्या सभेत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबतच महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर या पदाचा राजीनामा देणार आहेत.

विद्युत बिलामध्ये बचत आणि पुरेसा प्रकाश देणारे एलइडी दिवे बसविण्याचे काम इइएसएल कंपनीला देण्यात आले. पहिल्यांदा दोन प्रभागांत प्रायोगिक तत्वावर केलेल्या कामांमध्ये प्रचंड त्रुटी असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. मात्र केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या राज्यांत भाजपाची सत्ता आहे, तेथे हा प्रकल्प राबवण्यात आला. त्यानुसार शहरात २२ हजार एलइडी दिवे बसविण्यात आले. कमी वॅटचे दिवे असल्याने अनेक ठिकाणी अपुरा प्रकाश पडत आहे. ज्या ठिकाणी यापूर्वी दिवे बसवण्यात आले, तेथील बिघाडाची तक्रार झाल्यानंतर त्यांची दुरुस्ती झालेली नाही. याबाबत महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत कंपनीच्या कामकाजाबाबत जोरदार ताशेरे ओढण्यात आले. पण कंपनीच्या कामकाजात फारसा फरक पडला नाही. कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना बैठकीस अथवा महासभेत उपस्थित राहण्याच्या अनेकवेळा सूचना देण्यात आल्या. पण वेळ मारून नेण्यासाठी निर्णय प्रक्रियेत सहभाग नसलेल्या अधिकाऱ्यांना पाठवून देण्यात आले. त्यामुळे अनेकवेळा अधिकाऱ्यांना सभेतून बाहेर काढण्यात आले. काम अंतिम टप्प्यात असताना कंपनीचा काळ्या यादीत समावेश करण्यासाठी स्थायी समितीच्या शिफारसीनुसार ठराव महासभेसमोर चर्चेला येणार आहे.

महासभेत स्थायी, परिवहन, महिला व बालकल्याण समितीमधून निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या ठिकाणी नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. स्थायीमधून उपमहापौर संजय मोहिते, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, दीपा मगदूम, सविता घोरपडे, प्रतीक्षा पाटील, प्रतिज्ञा उत्तूरे, भाग्यश्री शेटके, गीता गुरव यांचा कार्यकाळ संपणार आहे. तर परिवहन समितीतून सभापती अभिजित चव्हाण, सदस्य शेखर कुसाळे, शोभा कवाळे, सचिन पाटील तर महिला व बालकल्याण समितीमधून सभापती अनुराधा खेडकर, उपसभापती छाया पोवार, सदस्या सीमा कदम, शोभा कवाळे, मेहजबीन सुभेदार, जयश्री चव्हाण, अश्विनी बारामते, मनीषा कुंभार, मेघा पाटील निवृत्त होणार आहे.

महापौर देणार राजीनामा

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिकेतील सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर बुध‌वारी महासभेत राजीनामा देणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर पद काँग्रेसकडे जाणार असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोर्चेबांधणीला गती निवड कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर येणार आहे. महापौरांना ठरल्याप्रमाणे राजीनाम्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठांनी केली आहे.

०००

(मूळ कॉपी)

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहरात बसविण्यात येत असलेल्या एलइडी ब्लब बसवण्याचे काम इइएसएल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीचे काम असमाधानकारक आणि निकृष्ट दर्जाचे असल्याने नेहमीच टिका होत आली आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कंपनीचा काळ्यायादीत समावेश करा. असा ठराव स्थायी समितीकडून महासभेत चर्चेला येणार आहे. त्यामुळे बुध‌वारी (ता. २२) होणाऱ्या सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. याचबरोबर महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

विद्युत बिलामध्ये बचत आणि पुरेसा प्रकाश देणारे एलइडी ब्लब बसवण्याचे काम इइएसएल कंपनीला देण्यात आले. प्रथम दोन प्रभागात प्रायोगिक तत्वावर केलेल्या कामामध्ये प्रचंड त्रुटी असल्याने गंभीर आरोप करण्यात आले. पण केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे, तेथे हा प्रकल्प राबवण्यात आला. त्यानुसार २२ हजार एलइडी दिवे शहरात बसवण्यात आले. कमी वॅटचे दिवे असल्याने अनेकठिकाणी अपुरा प्रकाश पडत आहे. ज्या ठिकाणी यापूर्वी दिवे बसवण्यात आले आहेत, तेथे बिघाड झाल्यानंतर दुरुस्तीही झालेले नाही. याबाबत महासभा, स्थायी समिती बैठकीत कंपनीच्या कामकाजाबाबत जोरदार ताशेरे ओढण्यात आले. पण कंपनीच्या कामकाजामध्ये फारसा फरक पडला नाही. कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना बैठकीस अथवा महासभेत उपस्थित राहण्याच्या अनेकवेळा सूचना देण्यात आल्या. पण वेळ मारुन नेण्यासाठी निर्णय प्रक्रियेत सहभागी नसलेल्या अधिकाऱ्यांना पाठवून देण्यात आले. त्यामुळे अनेकवेळा अधिकाऱ्यांना सभेतून बाहेर काढण्यात आले. काम अंतिम टप्प्यात असताना कंपनीचा काळ्यायादीत समावेश करण्यासाठी स्थायी समितीच्या शिफारसीनुसार ठराव महासभेसमोर चर्चेला येणार आहे.

महासभेत स्थायी, परिवहन, महिला व बालकल्याणच समितीमधून निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या ठिकाणी नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. स्थायीमधून उपमहापौर संजय मोहिते, ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, दीपा मगदूम, सविता घोरपडे, प्रतीक्षा पाटील, प्रतिज्ञा उत्तूरे, भाग्यश्री शेटके, गीता गुरव यांचा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपणार आहे. तर परिवहनमधून सभापती अभिजित चव्हाण, सदस्य शेखर कुसाळे, शोभा कवाळे, सचिन पाटील तर महिला व बालकल्याण समितीमधून सभापती अनुराधा खेडकर, उपसभापती छाया पोवार, सदस्या सीमा कदम, शोभा कवाळे, मेहजबीन सुभेदार, जयश्री चव्हाण, अश्विनी बारामते, मनीषा कुंभार, मेघा पाटील निवृत्त होणार आहे.

..................

चौकट

महापौर अॅड. लाटकर यांचा राजीनामा

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिकेतील सत्तेच्या फॉर्म्युलानुसार महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर बुध‌वारी (ता. २२) होणाऱ्या महासभेत राजीनामा देणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर पद काँग्रेसकडे जाणार असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मोर्चेबांधणीला गती निवड कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर येणार आहे. महापौरांना ठरल्याप्रमाणे राजीनामा देण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर रोडवर रंगणार हॅपी स्ट्रीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिक खेळ आणि करमणुकीच्या कार्यक्रमामुळे अबालवृद्धांचे आकर्षण ठरलेला 'हॅपी स्ट्रीट' येत्या रविवारी (ता. १९) सायबर रोड येथे रंगणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून या आनंददायी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित या उपक्रमाला कोल्हापूरकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यातील चार रविवारी होणाऱ्या 'हॅपी स्ट्रीट'उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. यंदाही मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम मार्ग व रंकाळा पदपथ उद्याननजीक झालेल्या 'हॅपी स्ट्रीट'मध्ये शहरवासियांना मनोरंजनाचा आस्वाद लुटता आला. सायबर रोडवर रविवारी नागरिकांना या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

'हॅपी स्ट्रीट'चे मुख्य प्रायोजक फ्रूस्टार संजय घोडावत ग्रुप, पॉवर्ड बाय प्रायोजक गोकुळ, एज्युकेशन पार्टनर विश्वकर्मा कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, रियल इस्टेट पार्टनर मेट्रो लाइफ सिटी डेव्हलपर्स व पायताण डॉट कॉम हे स्टार्ट अप पार्टनर आहेत. या उपक्रमासाठी कोल्हापूर पोलिस प्रशासन, कोल्हापूर महापालिका आणि शहर वाहतूक शाखा यांचे सहकार्य लाभले आहे. 'हॅपी स्ट्रीट'मधील पारंपरिक खेळ हे प्रत्येकाच्या आवडीचे खेळ ठरले आहेत. जुन्या काळातील या खेळांविषयी प्रत्येकाला आकर्षण आहे. रस्सीखेच, जिबल्या, लंगडी, पोत्यात पाय घालून पळणे, भोवरा खेळणे, टायर पळविणे या खेळात शाळकरी मुलांसह महिला व पुरुषही रमत आहेत.

....

लाल रंगाची थीम

जानेवारी महिन्यातील चार रविवारी 'हॅपी स्ट्रीट'चा उपक्रम रंगतो. यंदापासून प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या रंगाच्या संकल्पनेची त्याला जोड दिली आहे. सायबर रोड येथे तिसऱ्या रविवारी होणाऱ्या 'हॅपी स्ट्रीट'साठी लाल रंग निवडला आहे. तरुणाईसह नागरिकांनी यामध्ये यामध्ये सहभागी होत असताना लाल रंगाची थीम वापरावी. या रंगाच्या आधारे आकर्षक संकल्पना साकारणाऱ्यांचे निवडक फोटो प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. लाल रंगाचे कपडे परिधान करण्यासह या रंगाच्या आधारे वेगळ्या संकल्पनेवर 'हॅपी स्ट्रीट'मध्ये काढलेले फोटो happystreetskop.com मेलवर पाठवावेत.

.......

संपूर्ण कुटुंबीयांचे आकर्षण

'हॅपी स्ट्रीट'म्हणजे संपूर्ण कुटुंबीयांचे मनोरंजन असे जणू समीकरण बनले आहे. रविवारी, सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या उपक्रमात लहान मुलांसह आई वडील मोठ्या संख्येने सहभागी होतात. कुटुंबासोबत विविध खेळ खेळत सुट्टी सार्थकी लावतात. सायबर रोड येथे होणाऱ्या 'हॅपी स्ट्रीट'मध्ये पारंपरिक खेळांची रेलचेल असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआर हृदयरोग विभागात दुर्मिळ शस्त्रक्रिया

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या हृदयरोग विभागातील डॉक्टरांनी अमृता मांगलेकर या महिलेच्या हृदयातील चार किलो वजनाची गाठ यशस्वी शस्त्रक्रिया करून काढली. डॉ. किशोर देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

प्रयाग चिखली येथील पंचवीस वर्षीय अमृता यांची दोन महिन्यांपूर्वी प्रसूती झाली होती. काही दिवसांपासून त्यांना झोपताना दम लागण्याचा त्रास सुरू होता. त्यासाठी तपासणी केली असता त्यांच्या हृदयाच्या बाजूला एक मोठी गाठ असल्याचे आढळले. त्यामुळे हृदय पूर्णपणे डावीकडे दाबले जाऊन हृदयात येणाऱ्या रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण झाला होता. शिवाय ही गाठ फुप्फुस व हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीला चिकटल्याचे आढळले. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाला होता.

कोणत्याही परिस्थितीत ही गाठ काढणे आवश्यक होते. यासंबंधी शस्त्रक्रिया करण्याबाबत मुंबई येथे जाण्याबाबत रुग्णाच्या कुटुंबियांना सुचविण्यात आले. मात्र, मांगलेकर यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना उपचारासाठी परगावी जाणे शक्य नव्हते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. भूपेंद्र पाटील, डॉ. माजिद मुल्ला, डॉ. हेमलता देसाई, डॉ. पल्लवी पवार, डॉ. अजित लोकरे यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत फलक हटवण्यावरुन तणाव

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मिरजकर तिकटी येथील ईगल प्राइड इमारतीमधील दुकानांवरील अनधिकृत जाहिरात फलक हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत दुकानदारांचा चांगलाच वाद झाला. फलक उतरताना शटर उचकटल्याने संतप्त झालेल्या दुकानदारांनी अधिकाऱ्यांची कॉलर पकडली. तसेच कारवाईसाठी आणलेल्या जेसीबीच्या आडवे उभा राहून विरोध केला. त्यामुळे येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. यामुळे पथकाला कारवाई अर्धवट सोडून परतावे लागले.

शहरात कोणत्याही ठिकाणी जाहिरात फलक अथवा होर्डिंग्ज लावताना महापालिकेच्या इस्टेट विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक उभा आहेत. असे फलक काढून घेण्यासाठी इस्टेट विभागाच्यावतीने मिरजकर तिकटी येथील ईगल प्राइडमधील दुकानदारांना कंपन्याचे अनधिकृत जाहिरात फलक काढण्यासाठी आठवड्यापूर्वी नोटिसा दिल्या होत्या. पण त्यानंतरही फलक न काढल्याने इस्टेट विभागाचे प्रमुख प्रमोद बराले यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी जेसीबी यंत्रणेसह सकाळी दाखल झाले.

अनधिकृत फलक काढताना एका दुकानाच्या शटरला धक्का लागून ते खाली पडले. त्यामुळे दुकानदार आक्रमक झाले. कारवाईला थेट विरोध करताना त्यांनी अधिकाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवत कागदपत्रे दाखवत कारवाई योग्य आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक झालेल्या काही दुकानदारांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कॉलर पकडली. यावेळी मोठी गर्दी जमा झाल्याने तणावात अधिकच भर पडली. इमारतीमधील सर्वच दुकानदार एकवटल्याने आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली. तर कारवाईसाठी आणलेले जेसीबी मशिन काही दुकानदारांनी अडवून ठेवले. दरम्यान, तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

काहींना पोलिसांसोबतही हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अधिकाऱ्यांना कारवाई अटोपती घ्यावी लागली. नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी सुरू असताना अनेक अधिकाऱ्यांवर विविध कार्यक्रमांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. नियोजनामध्ये ते व्यस्त असल्याने महापालिकेची कुमक अपुरी पडली. त्यामुळे कारवाई अर्धवट सोडावी लागली.

...

चौकट

दुपारनंतर स्वत:हून फलक हटवले

जाहीरात फलक हटवताना ईगल प्राइडमधील दुकानदारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रचंड वाद घातला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद संपुष्टात आला. त्यानंतर पथक परत गेले. मात्र दुपारनंतर काही दुकानमालकांनी स्वत:हून फलक हटवण्यास सुरुवात केली. पथकांसोबत घातलेला वाद आणि शहर विद्रुपीकरण कायद्याखाली गुन्हा नोंद होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वत:हून फलक काढण्यास सुरुवात केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

...

कोट

'अनधिकृत जाहिरात फलकप्रश्नी येथील दुकानदारांना यापूर्वी नोटिसा दिल्या आहेत. शुक्रवार (ता. १०) फलक काढण्याची सूचना केली होती. या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याने कारवाई केली.

प्रमोद बराले, इस्टेट अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहू समाधी स्मारक लोकोत्सव आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक, शाहू चरित्रावर आधारित कला प्रदर्शन, शाहिरी, हेरिटेज वॉक आणि मर्दानी खेळांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चार दिवस चालणाऱ्या लोकोत्सवाला गुरुवारी (ता. १६) सकाळी दहा वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे,' अशी माहिती महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.

महापौर अॅड. लाटकर म्हणाल्या, 'श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमांतर्गत समता ज्योत काढण्यात येणार आहे. ज्योत समाधीस्थळी आल्यानंतर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेले शाहू मॅरेथॉन मंडळ ही ज्योत दसरा चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी गणेश मंदिर येथे नेणार आहे.'

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'राजर्षी शाहू समाधीस्थळ सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत शनिवारी भवानी मंडप येथून शाहू विचार दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडी सोहळ्यामध्ये दहा चित्ररथ, लेझिम व झांजपथक आणि शहरातील ४०० शालेय विद्यार्थींनी नऊवारी साड्या परिधान करुन सहभागी होणार आहेत.'

पत्रकार बैठकीस उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

....

लोकोत्सवातील कार्यक्रम

गुरुवार : शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम : सकाळी १० वा.

शुक्रवार : शाहू चरित्रावर आधारित कला प्रदर्शन: सकाळी १० वा., शाहिरी कार्यक्रम: सायंकाळी ५ वा. (शिर्के उद्यान)

शनिवार : शाहू विचार दिंडी, सकाळी ९ वा. (भवानी मंडप), मर्दानी खेळ प्रात्यक्षिके, ११ वा. (शिर्के उद्यान), शाहू हेरिटेज वॉक, दुपारी ४ वा. (भवानी मंडप).

रविवार : शाहू समाधी स्मारक लोकार्पण, सकाळी ११ वा. (नर्सरी बाग), प्रमुख पाहुण्यांची भाषणे (दसरा चौक)

.......

लोकार्पणानिमित्त रविवारी समता रॅली

शहरातील ८५ संघटनांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्मारक लोकार्पण सोहळा रविवारी (ता १९) होत आहे. यानिमित्त सकाळी नऊ वाजता कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ ते समाधीस्थळ अशी समता रॅली काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ८५ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी हा निर्णय जाहीर केला. राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकार्पण सोहळा लोकोत्सव होण्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीस विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमादिवशी शहरवासियांनी रांगोळी घालावी, गुढी उभा करावी असे आवाहन करण्यात आले. तसेच शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या सर्व संस्थांवर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शाहू जन्मस्थळ येथून समता रॅलीला सुरुवात होणार आहे. कसबा बावडा ते दसरा चौक या मुख्य रस्त्यावरुन चालत ही रॅली समाधीस्थळी दाखल होईल. रॅलीमध्ये शहरातील सर्व तालीम संस्था, समाजिक संघटना आणि समाजबांधव यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. यावेळी व्यंकप्पा भोसले, हुसेन देसाई, किशोर घाटगे, प्रा. शहाजी कांबळे, कादर मलबारी, नगरसेवक इश्वर परमार, बबन रानगे, अशोक भंडारे, मनीष झंवर, बाळासाहेब भोसले, अवधूत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध; उदयनराजे समर्थकांचा सातारा बंद

$
0
0

सातारा: शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या गादीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजप नेते उदयनराजे भोसले समर्थक आणि भाजपने आज सातारा बंद पुकारला आहे. तर सोलापूर, सांगली आणि नगरमध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात छत्रपतींच्या वारसांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. उदयनराजे भोसले समर्थकांनी तर राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सातारा बंद पुकारले असून सकाळपासूनच साताऱ्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत. साताऱ्यातील मुख्य बाजारपेठाही बंद झाल्या असून वाहतूक व्यवस्थाही तुरळक प्रमाणात सुरू आहेत. बसस्टँड परिसरातही दुकाने बंद असल्याने या परिसरात शुकशुकाट निर्माण झाला आहे. दरम्यान, बंद शांततेत सुरू असून अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. काही वेळातच राजवाड्यातील गांधी मैदान ते साताऱ्यातील पोवई नाका असा मोर्चाही काढण्यात येणार असून पोवई नाका येथे सर्व आंदोलक जमणार आहेत. या मोर्चात भाजपसह साताऱ्यातील जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या मोर्चात उदयनराजे भोसलेही सहभागी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे उदयनराजे राऊतांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप शिवरायांच्या वंशजांची माफी मागेल का?

दरम्यान, साताऱ्यात बंद पुकारलेला असतानाच मंगळवेढा आणि संगमनेर येथेही आंदोलकांनी राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं. यावेळी 'जय शिवाजी, जय भवानी'च्या घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे राऊत यांच्या वक्तव्यामुळे साताऱ्यासह सोलापूर, नगर आणि सांगलीतील वातावरण ढवळून निघालं आहे. 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकावर टीका करताना राऊत यांनी यावर छत्रपतींच्या वंशजांनीच बोलावे अशी टीका केली होती. त्यावर उदयनराजे यांनी शिवसेनेचं नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांना विचारले होते का? असा सवाल केला होता. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडेच ते वंशज असल्याचे पुरावे मागितले होते, त्यामुळे उदयनराजे समर्थक आणि भाजप आक्रमक झाली असून याप्रकरणावरून त्यांनी राऊत यांना घेरले आहे.

'महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे'

...तर केंद्रावर 'महागाईची संक्रांत' उलटेल: सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय राऊतांच्या 'त्या' विधानाचा निषेध; साताऱ्यात कडकडीत बंद

$
0
0

सातारा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध व्यक्त करत साताऱ्यात आज उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला.

साताऱ्यात बाजारपेठ आणि ठिकठिकाणची दुकानं बंद ठेवण्यात आल्याने सकाळपासूनच साताऱ्यातील व्यवहार ठप्प झाले. उदयनराजेंच्या समर्थकांनी राजवाड्यातील गांधी मैदान ते साताऱ्यातील पोवई नाका असा मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर उदयनराजेंसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत दोन गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पाट्या टांगून निषेध व्यक्त करण्यात आला. सातारच्या बाजारपेठेतल्या नेहमीच्या गजबलेल्या ठिकाणी आज शांतता पाहायला मिळाली. उदयनराजे यांच्या समर्थकांनी उर्त्फुतपणे बंदला पाठिंबा दिला. आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग लक्षणीय होता.

73296729

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात छत्रपतींच्या वारसांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे साताऱ्यासह सोलापूर, नगर आणि सांगलीतील वातावरण ढवळून निघालं आहे.
73296766


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लॅक स्पॉट कागदावरच

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet : sachinyadavMT

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात सव्वादोनशे लोकांना रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. जीवघेणे, खड्डे, धोकादायक वळणांवर अपघात झाले आहेत. शहरात अशी १६ धोकादायक ठिकाणे असून अद्याप याठिकाणी अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही. अपघात रोखण्यासाठी आणि उपाययोजनांसाठी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ आणि पोलिस या चार यंत्रणांनी संयुक्तपणे काम करणे अपेक्षित आहे. ब्लॅकस्पॉटबाबत नियम मोडणारे वाहनचालकही तितकेच जबाबदार आहेत. यातील अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी कागदावरच असून ब्लॅक स्पॉटच्या यादीत कोल्हापूर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एखाद्या ठिकाणी सलग तीन वर्षांत एकूण पाच प्राणांतिक किंवा गंभीर अपघात घडले, एक वा त्यापेक्षा जास्त अधिक अपघात झाल्यास त्या ठिकाणाला अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) जाहीर केले जाते. मात्र रस्त्यांवर बेदरकारपणे किंवा दारू पिवून वाहन चालविणे, वाहनांना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे ही प्रमुख कारणे अपघातांमागे असली तरी रस्त्यांची दुरवस्था, धोकादायक वळणे, संरक्षक भिंत किंवा कठडे नसणे, गतिरोधक नसणे हे घटकदेखील तेवढेच कारणीभूत ठरतात. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी फक्त प्रबोधनाचे काम केले जाते.

धोकादायक वळणे, संरक्षक भिंत किंवा कठडे नसणे यासह अन्य कारणांमुळे रस्ते अपघातांत वाढ होत आहे. खराब रस्त्यासह वाहनचालकांच्या चुकांमुळे अपघात वाढले आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने शहर आणि ग्रामीण भागात ८५ ब्लॅक स्पॉट ठरविले. पैकी शहरात १६ ब्लॅक स्पॉट आहेत. यातील अपघाताला कारणीभूत ठरणारे चौकही अद्याप मोकळे झालेले नाहीत. वाढती वाहन संख्या, रस्त्यांची दुरवस्था, धोकादायक वळणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, नियमांचे अज्ञान, सुसाट वेगाने चालविणाऱ्यावर अजूनही नियंत्रण नाही. वळणांच्या ठिकाणी सुधारणा, उड्डाणपूल बांधणे, गतिरोधक रबरी स्पीट, ब्लिंकर बसविणे, कॅट आय बसविणे ही कामे झालेली नाहीत.

राज्यातील ब्लॅक स्पॉट

६२८

राष्ट्रीय महामार्ग

३१५

राज्य मार्ग

३७४

जिल्हा मार्ग

एक्स्प्रेस वे

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती

३०

राष्ट्रीय महामार्ग

२३

राज्य मार्ग

३२

इतर जिल्हा मार्ग

२३३ अपघात, १२१ जणांचा मृत्यू, २०७ जखमी

जानेवारी ते मार्च २०१८

२५० अपघात, १०६ जणांचा मृत्यू, २८४ जखमी

जानेवारी ते मार्च २०१९

१९० अपघात ४० जणांचा मृत्यू, १५० जखमी

एप्रिल ते डिसेंबर २०१९

मटा भूमिका : सामूहिक प्रयत्नाची गरज

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष खासदार आहेत. मानवी चुका, परिस्थिती आणि वाहनांतील दोष या तीन कारणांमुळे अपघात होत आहेत. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटवर पोलिस, आरटीओ, महामार्ग पोलिसांकडून सुरु आहेत. रस्ता सुरक्षा समितीने ब्लॅक स्पॉटवर सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी नाही. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीने दर महिन्याला आढावा घेण्याची गरज असून कामचुकारांवर कारवाई अपेक्षित आहे. त्यासह वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक वाहनचालकावर आहे. पाच गंभीर अपघात झालेल्या ठिकाणी ब्लॅकस्पॉटवर तत्काळ उपाययोजना गरजेच्या आहेत. केवळ सरकारला अहवाल पाठवून कागदोपत्री उपाययोजना पूर्ण झाल्याचा दावा करण्यापेक्षा अंमलबजावणी आणि कारवाईची गरज आहे.

शहरातील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी वाहनधारकांचे प्रबोधन केले आहे. स्पीड गनच्या सहाय्याने वाहनांचा वेग मोजून संबधित वाहनचालकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे.

- वसंत बाबर, वाहतूक पोलिस निरीक्षक

शहर आणि जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटची यादी निश्चित केली आहे. जिल्ह्यात आणि शहरात झालेल्या अपघातात पाचपेक्षा अधिक मृत्यू झालेल्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट जाहीर केला आहे. अपघात प्रवण क्षेत्र शोधून त्याच्यावर उपायही सुचविले आहेत.

- एस. टी. अल्वारिस, आरटीओ

दुभाजकांसह स्प्रिंग पोस्टची गरज

शहरातील क्रशर चौक, हॉकी स्टेडियम परिसर, सायबर चौक, टाकाळा चौक, सीपीआर चौक, गोखले कॉलेज चौक, गंगावेश चौक, व्हीनस चौक आणि लिशां हॉटेल चौक येथे काही ठिकाणी दुभाजक नाहीत. ताराराणी चौक, सीपीआर चौक, असेंब्ली कॉर्नर, हॉकी स्टेडियम, सायबर चौक, आदी ठिकाणी रस्त्याची डावी बाजू रिकामी राहण्यासाठी कायमस्वरुपी स्प्रिंग पोस्टसह रस्त्यांचे रुंदीकरण महापालिकेने करणे गरजेचे आहे.

पोलिस ठाणेनिहाय शहरातील ब्लॅक स्पॉट

करवीर : रिलायन्स पेट्रोल पंप, बालिंगा

लक्ष्मीपुरी : रिलायन्स मॉल ते फोर्ड कॉर्नर, सीपीआर हॉस्पिटल, शिवाजी पूल ते दसरा चौक, सीपीआर हॉस्पिटल चौक.

जुना राजवाडा : डी मार्ट मॉल, उमा टॉकीज चौक, समशेर चौक, संभाजीनगर चौक ते गंगोत्री हॉस्टिपल, राजकपूर पुतळा ते क्रशर चौक.

शाहूपुरी : ताराराणी चौक, लिशा हॉटेल चौक, शिये टोल नाका, व्हिनस कॉर्नर ते दाभोलकर कॉर्नर चौक.

राजारामपुरी : एनसीसी ऑफिस चौक, शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोल नाका, कोयस्को चौक ते शिवाजी विद्यापीठ रोड.

फोटो :

१) सीपीआर चौकात वाहतूकीच कोंडी, डावी बाजून रिकामी नाहीच.

२) ताराराणी चौकात वाहतूकीची प्रचंडा कोंडी आहे.

३) फोर्ड कॉर्नर ते रिलायन्स मॉल रोडवर धोकादायक खड्डे, वळणे आहेत. (अर्जुन टाकळकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज काढून घेतलेल्या सायकलच्या साथीने सुवर्णवर्षाव

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : सायकलिंग या क्रीडा प्रकारात आपल्या मुलीची कामगिरी पाहून आई-वडील सुखावले. बेताची आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या प्रशिक्षण आणि क्रीडा साहित्याचा खर्च त्यांना पेलवणारा नव्हता. तरीही लेकीच्या स्वप्नांना गती मिळावी म्हणून आई-वडिलांनी पाच लाख रुपयांचे कर्ज काढून तिला अत्याधुनिक सायकल घेऊन दिली. त्या सायकलवरील सरावाच्या जोरावर इंगळीच्या पूजा दानोळेने कुटुंबीयांचा विश्वास सार्थ ठरवला. गुवाहाटी (आसाम) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह एक ब्राँझ पदकाची घसघशीत कमाई केली. हातकणंगले तालुक्यातील छोट्या खेड्यातील पूजाचा सायकलिंगमधील प्रवास खेळात करिअर करणाऱ्या तरुणाईसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

गुणवत्तेला वेळीच पाठबळाची जोड मिळाल्यास किती मोठी झेप घेता येते हे पूजाने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले. इंगळीतून सुरू झालेला पूजाचा प्रवास राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. त्यामागे तिचे कष्ट आणि कुटुंबीयांची प्रेरणा मोलाची ठरली आहे. पूजाची सायकलिंग या क्रीडा प्रकाराची जडण-घडण प्राथमिक शिक्षण घेत असताना झाली असे कुटुंबीय सांगतात. शाळेत शिकायला ती इंगळीहून पट्टणकोडोलीच्या अनंत विद्यामंदिरपर्यंतचा जायची. तिचा हा प्रवास सायकलवरून असायचा. इयत्ता सातवीत असताना तिने सायकलिंगमध्ये राज्यस्तरीय पदक मिळवले.

या पहिल्या यशानंतर पूजाने आपल्या करिअरमध्ये मागे वळून पाहिलेच नाही. आठवीला असताना तिची पुणे येथे क्रीडा प्रबोधिनीत सरावासाठी निवड झाली. तिथे पूजाच्या कौशल्याला अधिक वाव मिळाला. तिथला सराव आणि नंतरच्या टप्प्यात तिला नवी दिल्लीतील 'साई' संस्थेत सरावाची संधी मिळाली. त्यातून आपल्या करिअरमध्ये पूजाने सायकलिंग क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील तब्बल चौदा सुवर्णपदके मिळवली आहेत.

सायकलिंगबरोबर तिने शैक्षणिक वाटचाल यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. सध्या ती इचलकरंजी येथील खंजिरे कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत अकरावीच्या वर्गात शिकते. तिचे वडील बबन दानोळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीला आहेत. तर आई अर्चना गृहिणी आहे. भाऊ हर्षद हा कुस्तीमध्ये करिअर करत असून तो सध्या पुण्यात प्रशिक्षण घेत आहे.

दुसऱ्याच्या सायकलवर सुवर्णपदक

'रोड' या प्रकारात सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारी सायकल पूजाकडे नव्हती. त्यामुळे तिने दुसऱ्याची सायकल घेऊन स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. प्रशिक्षक अनिल कुमार यांनी तिला सायकल उपलब्ध करून देऊन स्पर्धेसाठी प्रोत्साहित केले असे कुटुंबीयांनी सांगितले.

समाजाने द्यावा मदतीचा हात

अत्यंत होतकरू असलेल्या पूजाला सायकलिंगमध्ये आपल्या करिअरसाठी, पुढे जाण्यासाठी अनेकदा झगडावे लागले. या क्रीडा प्रकारासाठी अत्याधुनिक आणि चांगल्या दर्जाच्या सायकलची आवश्यकता असते. मात्र, त्यांच्या किमती प्रचंड आहेत. हा खर्च तिच्या कुटुंबीयांना पेलवणारा नाही. तरीही तिच्या जिद्दीपोटी पाच लाख रुपयांची सायकल कुटुंबीयांनी विकत घेऊन दिली. सध्या तिला 'रोड' या प्रकारासाठी नऊ लाख रुपये किंमतीची सायकल घेणे आवश्यक आहे. यासाठी दानोळए कुटुंबीयांची धडपड सुरू असून समाजातील दातृत्वावन व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. तरच पूजाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या स्वप्नांना आकार मिळू शकेल.

पूजाची कामगिरी पाहून मनापासून आनंद वाटला. यासाठी तिने खूप कष्ट घेतले आहेत. रोज पहाटे पाचला उठून ती सलग दोन ते तीन तास सायकलींचा सराव करते. खेलो इंडिया स्पर्धेतील कामगिरीमुळे आत्मविश्वास वाढला आहे. यापुढेदेखील तिने कोल्हापूरचे नाव तिने कायम उंचावत ठेवावे.

- अर्चना दानोळे, पूजाची आई

कुटुंबीयांच्या भक्कम पाठबळामुळे खेलो इंडिया स्पर्धेत यश मिळवता आले. यापुढे कामगिरीत सातत्य ठेवून ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न आहे. विविध क्रीडा प्रकारांत मुली पुढे जात आहेत. प्रत्येक आई-वडिलांनी मुलींच्या स्वप्नांना पाठबळ द्यावे असे वाटते.

- पूजा दानोळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिक असंतुलनातून धोक्याची घंटा

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:anuradhakadamMT

कोल्हापूर : कोणत्याही गोष्टीवर आक्रमक प्रतिसाद देणे, हातात येणारी वस्तू फेकणे, समवयस्कांसोबत खेळताना वर्चस्व गाजवणे, आपले म्हणणे दुसऱ्यावर लादण्यासाठी हट्ट करणे, इतरांचे मत न पटल्यास अंगावर धावून जाणे अशा प्रकारच्या वर्तनातून मानसिक संतुलन बिघडण्याच्या धोक्याची घंटा मोबाइल गेम्सच्या विळख्यात अडकलेल्या मुलांना आहे. सलग एक ते चार तासांपर्यंत मोबाइल गेम्स खेळणाऱ्या किशोरवयीन मुलांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याच्या निष्कर्षाला मानसिक आरोग्य संशोधकांनीही पुष्टी दिली आहे. सहा ते १९ वर्षे वयाच्या मुलांमध्ये ही मानसिक हिंसक प्रवृत्ती वाढत आहे.

मुलांकडून टास्क, मारहाण व वेग असलेल्या ऑनलाइन गेम्सना पसंती दिली जाते. दोन वर्षापूर्वी आलेल्या ब्ल्यू व्हेल या गेममध्ये देण्यात येणारा टास्क पूर्ण करण्यापायी अनेक मुलांनी जीव गमावला. मोबाइल गेम्स खेळताना त्यातील पात्र बनून एकमेकांना मारायचे असते. सलग चार तास असे गेम खेळण्याने मुलांच्या प्रवृत्तीत हिंसकता येते. पब्जी या खेळामध्ये आभासी जग आहे. खेळात अजिंक्य झाल्यास बक्षीसांचे आमिष असते. मात्र, कोणतेही बक्षीस प्रत्यक्ष मिळत नसूनही मुलांच्या मानसिकतेवर आक्रमण करणारी आभासी दुनिया मुलांच्या मनावर आघात करते. सतत मोबाइल गेम खेळणाऱ्या मुलांमध्ये शारीरिक व मानसिक दोष आढळत असल्याचे स्पष्ट होत आहे. डोळे निकामी होण्याचा तसेच डोळ्यांमध्ये तिरळेपणा येण्याचा धोकाही वाढत आहे. मानसिक संतुलन गमावण्याचाही परिणाम काही मुलांत दिसून आला आहे. हाताची बोटे बधीर होण्यासाठी मोबाइलचा अतिवापर हे गंभीर कारण ठरत आहे.

शालेय व किशोर वयातील मुलांमधील वाढती चिडचीड हे सध्या पालकांच्या चिंतेचे कारण आहे. सतत मोबाइलवर गेम खेळण्यात दंग झालेल्या मुलांमध्ये एखादी गोष्ट पालकांकडून न मिळाल्यास आदळआपट करणे, नकार पचवण्याची क्षमता कमी होणे यांसारख्या गोष्टींनाही तोंड द्यावे लागत आहे. वागण्यात उद्धटपणा येण्यासाठीही मोबाइल गेम्सची रचना कारणीभूत ठरत आहे. गेम्समधील काल्पनिक हिंसा, मारहाण मुलांच्या दैनंदिन वर्तनात प्रतिबिंबित होत असल्याने मुलांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मुलांमध्ये वयाच्या पाच वर्षांपासून विविध गोष्टींबाबत जाणून घेण्याची जिज्ञासा असते. मात्र, सतत गेम्स खेळणाऱ्या मुलांच्या मनातील ही जिज्ञासा बोथट होत असल्याचाही मानसिक धोका मुलांच्या आयुष्यात आहे. बक्षीस मिळवणे हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. पण, मोबाइल गेम्समध्ये मिळणारी बक्षीसे ही मनात लालसा निर्माण करणारी असतात. गेम्समध्ये बक्षीस मिळवण्यासाठी काहीही करायचे हा चुकीचा विचार मुलांमध्ये रूजवण्याचा धोकादायक प्रकार या ऑनलाइन गेम्समुळे होत आहे.

जागतिक संशोधन काय सांगते?

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रकाशनाच्या २०१८च्या ११व्या आवृत्तीनुसार गेमिंग डिसऑर्डरला सातत्याने वाढणारी आरोग्य समस्या अशी नोंद करण्यात आली आहे. युनिसेफच्या २०११ च्या अहवालानुसार जगात १२० कोटी किशोरवयीन मुले मोबाइल गेम्सच्या आहारी गेली असून भारतात हा आकडा २४ कोटी आहे. २०१४ मध्ये जर्नल सायकोलॉजिकल मेडिसीनमध्ये प्रकाशित संशोधनप्रकल्पात मुलांमध्ये वाढत्या रागाचे कारण मोबाइल गेम्स असल्याचे नोंदवण्यात आले. टीनएज मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचे प्रमाणही ऑनलाइन गेम्सच्या विळख्याचे कारण आहे.

मोबाइल गेम्स हे मानसिक आजार वाढवणारे स्लो पॉयझन आहे. किशोरवयीन मुले मोबाइल गेम्सच्या आहारी जाण्यासाठी अनेक कौटुंबिक व सामाजिक कारणे आहेत. मात्र, त्यांचा परिणाम मुलांच्या मानसिक संतुलनावर होत आहे. हे धोके वेळीच ओळखून मुलांना या मानसिक कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी कुटुंब, समाज, शिक्षकांच्या पुढाकाराची गरज आहे.

- शाल्मली रानमाळे, मानसोपचार तज्ज्ञ

गेम्समुळे मानसिक दोष असे ओळखा

- दैनंदिन महत्त्वाच्या कृतींपेक्षा मुले गेम खेळण्यास जास्त पसंती देते.

- किती वेळ गेम खेळावं यावर नियंत्रण राहत नाही.

- मोबाइन न मिळाल्यास अस्वस्थ होतात

- इतरवेळी बोलतानाही सतत मोबाइल गेम्सचा संदर्भ देतात

- गेम्समधील पात्रे, बक्षिसांचे जिंगल्स याविषयी बोलतात

- एकटे असताना तोंडातल्या तोंडात पुटपुटणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण रिक्षांना शहरात प्रवेश नकोच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ग्रामीण परवानाधारक रिक्षांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी शहरात प्रवेश मिळू नये, अशी मागणी शहरातील रिक्षाचालकांनी केली आहे. शिवाजी पेठेतील प्रहार प्रतिष्ठानसह रिक्षाचालकांनी या मागणीचे निवेदन गुरुवारी (ता. १६) प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस यांना दिले. तातडीने ग्रामीण रिक्षांना शहरबंदी न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शहरातील रिक्षाचालकांनी दिला आहे.

ग्रामीण परवानाधारक रिक्षा शहरात येऊन प्रवासी वाहतूक करीत असल्याने शहरातील रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे शहरातील रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. यासाठी ग्रामीण रिक्षांना शहरात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी शहरातील रिक्षाचालकांकडून सुरू आहे. यापूर्वी १८ डिसेंबरला आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मागणीची अंमलबजावणी करण्याचा आग्रह रिक्षाचालकांनी धरला होता. दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ग्रामीण परवानाधारक रिक्षांना शहराबाहेर थांबे देण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार शहराबाहेर थांबे निर्माण केले होते. मात्र, ग्रामीण परवानाधारक काही रिक्षाचालकांनी याला विरोध केला. मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वर्दळीच्या मार्गांवरील रिक्षांना नवीन स्टॉप देऊन तोडगा काढण्यात आला. शहरातील रिक्षाचालकांनी याला विरोध केला असून, ग्रामीण परवानाधारक रिक्षांना शहरबंदी करण्याची मागणी केली आहे. शिवाजी पेठेतील प्रहार प्रतिष्ठानसह रिक्षाचालकांनी गरुवारी आरटीओ अधिकारी डॉ. अल्वारिस यांना निवेदन दिले. या मागणीवर तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही रिक्षाचालकांनी दिला आहे. निवेदन देण्यासाठी प्रहार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर जाधव यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मणकर्णिका कुंड जागेचा ताबा देवस्थान समितीकडे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील मणकर्णिका कुंड या जागेचा ताबा महानगरपालिका प्रशासनाकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे गुरुवारी हस्तांतरीत करण्यात आला. १९५८ साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा देवस्थान समितीकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले होते. या हस्तांतरण प्रक्रियेनंतर जागेचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन भाविकांसाठी सार्वजनिक उद्यान विकसित करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

अंबाबाई मंदिरातील देवीच्या नित्य स्नानाचे पाणी मणकर्णिका या कुंडात जाते. मंदिराच्या घाटी दरवाजालगत हे कुंड आहे. या कुंडाचा परीघ ६ हजार ८०० चौरस फूट असून ही जागा देवस्थान समितीच्या मालकी हक्कात आहे. १९५७ मध्ये सार्वजनिक उद्यानासाठी ही जागा देवस्थान समितीकडून महानगरपालिकेने ९९ वर्षांच्या भाडेकरारावर घेतली होती. सुरुवातीच्या काळात महापालिकेने या जागेवर उद्यान विकसित केले. मात्र १९९९ला या जागेवर 'पैसे द्या व वापरा' या तत्वावर स्वच्छतागृहाची उभारणी केली. देवीच्या स्नानाचे पाणी साठणाऱ्या कुंडाच्या जागेवर स्वच्छतागृह बांधल्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. याबाबत तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे मणकर्णिक कुंडाच्या जागेबाबत भाविकांचे लक्ष लागून राहिले होते.

मणकर्णिक कुंडाची जागा पुन्हा देवस्थान समितीच्या ताब्यात यावी यासाठी गेल्या वर्षभरापासून देवस्थान समिती महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होती. जुलै २०१९मध्ये याबाबत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी चर्चा झाली होती. यानुसार मणकर्णिका कुंड अधिकृतरित्या महापालिकेकडून देवस्थान समितीकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया गुरूवारी पूर्ण झाली. यावेळी प्रमोद बराले, सुनील ठोंबरे आणि शेखर साळोखे, नितीन चौगले, यांच्यासह देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार सचिव एस. एस. साळवी, सदस्य राजेंद्र जाधव, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधी स्मारक लोकोत्सव आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक, शाहू चरित्रावर आधारित कला प्रदर्शन, शाहिरी, हेरिटेज वॉक आणि मर्दानी खेळांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चार दिवस चालणाऱ्या लोकोत्सवाला गुरुवारी (ता. १६) सकाळी दहा वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे,' अशी माहिती महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.

महापौर अॅड. लाटकर म्हणाल्या, 'श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमांतर्गत समता ज्योत काढण्यात येणार आहे. ज्योत समाधीस्थळी आल्यानंतर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेले शाहू मॅरेथॉन मंडळ ही ज्योत दसरा चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी गणेश मंदिर येथे नेणार आहे.'

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'राजर्षी शाहू समाधीस्थळ सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत शनिवारी भवानी मंडप येथून शाहू विचार दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडी सोहळ्यामध्ये दहा चित्ररथ, लेझिम व झांजपथक आणि शहरातील ४०० शालेय विद्यार्थींनी नऊवारी साड्या परिधान करुन सहभागी होणार आहेत.'

पत्रकार बैठकीस उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

....

लोकोत्सवातील कार्यक्रम

गुरुवार : शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम : सकाळी १० वा.

शुक्रवार : शाहू चरित्रावर आधारित कला प्रदर्शन: सकाळी १० वा., शाहिरी कार्यक्रम: सायंकाळी ५ वा. (शिर्के उद्यान)

शनिवार : शाहू विचार दिंडी, सकाळी ९ वा. (भवानी मंडप), मर्दानी खेळ प्रात्यक्षिके, ११ वा. (शिर्के उद्यान), शाहू हेरिटेज वॉक, दुपारी ४ वा. (भवानी मंडप).

रविवार : शाहू समाधी स्मारक लोकार्पण, सकाळी ११ वा. (नर्सरी बाग), प्रमुख पाहुण्यांची भाषणे (दसरा चौक)

.......

लोकार्पणानिमित्त रविवारी समता रॅली

शहरातील ८५ संघटनांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्मारक लोकार्पण सोहळा रविवारी (ता १९) होत आहे. यानिमित्त सकाळी नऊ वाजता कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ ते समाधीस्थळ अशी समता रॅली काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ८५ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी हा निर्णय जाहीर केला. राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकार्पण सोहळा लोकोत्सव होण्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीस विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमादिवशी शहरवासियांनी रांगोळी घालावी, गुढी उभा करावी असे आवाहन करण्यात आले. तसेच शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या सर्व संस्थांवर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शाहू जन्मस्थळ येथून समता रॅलीला सुरुवात होणार आहे. कसबा बावडा ते दसरा चौक या मुख्य रस्त्यावरुन चालत ही रॅली समाधीस्थळी दाखल होईल. रॅलीमध्ये शहरातील सर्व तालीम संस्था, समाजिक संघटना आणि समाजबांधव यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. यावेळी व्यंकप्पा भोसले, हुसेन देसाई, किशोर घाटगे, प्रा. शहाजी कांबळे, कादर मलबारी, नगरसेवक इश्वर परमार, बबन रानगे, अशोक भंडारे, मनीष झंवर, बाळासाहेब भोसले, अवधूत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरातील पुलांची चेन्नई आयआयटीद्वारे तपासणी

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाच्या मार्गांवरील पूल पाण्याखाली गेले होते. महापूर ओसरताच पुलांचे प्राथमिक सेफ्टी ऑडिट करून वाहतूक सुरू झाली. पाण्यातील पुलांची शास्त्रीय तपासणी करण्यासाठी चेन्नई आयआयटीचे पथक दाखल झाले असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील प्रमुख ४५ पुलांची तपासणी सुरू आहे. तपासणीनंतर उपाययोजनांचा अहवालही पथकाकडून मिळणार आहे.

यंदा विक्रमी अतिवृष्टीने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराचा जनजीवनावर परिणाम झाला. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पुणे-बेंगलोर, कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-सांगली या महामार्गांसह कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-राधानगरी अशा सर्वच प्रमुख मार्गांवर महापुराचे पाणी होते. कोल्हापूर जिल्ह्यात ४७९ पूल आहे, तर सांगली जिल्ह्यात ४५२ पूल आहेत. यातील बहुतांश पूल पाण्याखाली गेल्याने त्यांच्या सुरक्षेची चिंता वाढली होती. पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल, नवीन पर्यायी पूल, महामार्गावर वारणा नदीवरील पूल काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. महापूर ओसरताच सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांची प्राथमिक तपासणी केली. सुरक्षित पुलांवरून वाहतूक पूर्ववत सुरू केली. मात्र, पाण्याखालील पुलांचे खांब, बांधकामाचा दर्जा याची नेमकी तपासणी करण्याचे साधन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध नव्हते. पुरात वाहून आलेले लाकडाचे ओंडके आणि अवजड वस्तुंमुळे पुलाच्या बांधकामासही धोका पोहोचू शकतो. याशिवाय भूस्खलन, गाळ, वाळू वाहून जाण्यामुळे पाण्यातील खांबांवरही परिणाम होऊ शकतो. याची माहिती मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरू होते.

चेन्नई येथील आयआयटीचे तज्ज्ञ प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी पाण्यातील पुलांची शास्त्रीय तपासणी करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांना मिळाली. त्यांच्याशी माने यांनी संपर्क साधून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुलांची तपासणी करण्याची विनंती केली. चेन्नई आयाआयटीचे पथक कोल्हापुरात दाखल झाले असून, त्यांच्याकडून महापुरातील पुलांची तपासणी सुरू आहे. अत्याधुनिक साधनांद्वारे पुलाची बाह्यस्थिती, पाण्यातील खांबांची स्थिती आणि बांधकामांचा दर्जाही तपासला जात आहे.

आरओव्ही मशीनद्वारे (रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल) पाण्यात ८० मीटर खोल जाता येते. लेजर किरणांद्वारे पुलांच्या नुकसानीची नेमकी माहिती मिळते. कॅमेऱ्यांद्वारे फोटो आणि व्हिडिओ मिळतात. मार्च २०२० पर्यंत दोन्ही जिल्ह्यातील सर्व प्रमुख पुलांची तपासणी होणार आहे. यानंतर जीर्ण किंवा धोकादायक पुलांची आवश्यक डागडुजी केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रस्त्यांवरील पुलांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. महापुराने झालेल्या नुकसानीची प्राथमिक तपासणी केल्यानंतर पाण्यातील पुलांची तपासणी गरजेची असल्याने चेन्नई आयआयटीच्या तज्ज्ञांना बोलवले. तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून, आवश्यक उपाययोजनांचा अहवालही मिळणार आहे.

- संभाजी माने, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

कोल्हापूर जिल्ह्यातील पूल

प्रकार प्रमुख राज्य मार्ग इतर राज्य मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग एकूण

लांब पूल २ १ १ ४

मोठे पूल ० ३३ २० ५३

लहान पूल १३ २११ १९८४२२

सांगली जिल्ह्यातील पूल

प्रकार प्रमुख राज्य मार्ग इतर राज्य मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग एकूण

लांब पूल ० ० १ १

मोठे पूल ० ४९ १५ ६४

लहान पूल १ २६२ १२४ ३८७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारभाऱ्यांकडून नियम धाब्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर चारचाकी वाहनांचे पार्किंग करायचे नाही हा सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय महाविकास आघाडीच्या काही कारभाऱ्यांनी धाब्यावर बसविला. सर्वसाधारण सभेच्या निर्णयानंतर प्रशासनाने मुख्यालय परिसर 'नो पार्किंग झोन'म्हणून जाहीर केला. मात्र, नुकत्याच सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या काही कारभाऱ्यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता 'हम करे सो कायदा' या उक्तीप्रमाणे चारचाकी वाहने लावण्यास सुरुवात केली आहे.

वाहतुकीची शिस्त आणि मुख्यालय परिसरात वाहनांची वर्दळ नको यासाठी आजही सगळे अधिकारी आणि अनेक सदस्य आपापली वाहने कागलकर हाऊस परिसरात लावतात. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काही सदस्य व कारभारी असलेले माजी सदस्य नियम पायदळी तुडवत आहेत. प्रशासनाने, सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना 'नो पार्किंग झोन' बदलता येणार नाही हे संबंधितांच्या निदर्शनास आणले. मात्र, त्याकडे काणाडोळा करुन नियम मोडण्यात काहीजण धन्यता मानत असल्याची टीका नागरिकांतून होऊ लागली आहे.

जि.प.मध्ये तत्कालीन भाजप व मित्रपक्ष आघाडीने मुख्यालय परिसरात चारचाकी वाहनांचे पार्किंग करायचे नाही असा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभेने तसा ठराव मंजूर केला. कागलकर हाऊस परिसरात प्रशासनाने पार्किंगची सुविधा केली. जवळपास चाळीस लाख रुपये खर्च करुन पत्र्याचा शेड मारला. काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविले. तरीही कारभाऱ्यांचा नियम धाब्यावर बसविला. याविषयी नाराजीचा सूर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर रोडवर रंगणार हॅपी स्ट्रीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिक खेळ आणि करमणुकीच्या कार्यक्रमामुळे अबालवृद्धांचे आकर्षण ठरलेला 'हॅपी स्ट्रीट' येत्या रविवारी (ता. १९) सायबर रोड येथे रंगणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून या आनंददायी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित या उपक्रमाला कोल्हापूरकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यातील चार रविवारी होणाऱ्या 'हॅपी स्ट्रीट'उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. यंदाही मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम मार्ग व रंकाळा पदपथ उद्याननजीक झालेल्या 'हॅपी स्ट्रीट'मध्ये शहरवासियांना मनोरंजनाचा आस्वाद लुटता आला. सायबर रोडवर रविवारी नागरिकांना या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

'हॅपी स्ट्रीट'चे मुख्य प्रायोजक फ्रूस्टार संजय घोडावत ग्रुप, पॉवर्ड बाय प्रायोजक गोकुळ, एज्युकेशन पार्टनर विश्वकर्मा कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, रियल इस्टेट पार्टनर मेट्रो लाइफ सिटी डेव्हलपर्स व पायताण डॉट कॉम हे स्टार्ट अप पार्टनर आहेत. या उपक्रमासाठी कोल्हापूर पोलिस प्रशासन, कोल्हापूर महापालिका आणि शहर वाहतूक शाखा यांचे सहकार्य लाभले आहे. 'हॅपी स्ट्रीट'मधील पारंपरिक खेळ हे प्रत्येकाच्या आवडीचे खेळ ठरले आहेत. जुन्या काळातील या खेळांविषयी प्रत्येकाला आकर्षण आहे. रस्सीखेच, जिबल्या, लंगडी, पोत्यात पाय घालून पळणे, भोवरा खेळणे, टायर पळविणे या खेळात शाळकरी मुलांसह महिला व पुरुषही रमत आहेत.

....

लाल रंगाची थीम

जानेवारी महिन्यातील चार रविवारी 'हॅपी स्ट्रीट'चा उपक्रम रंगतो. यंदापासून प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या रंगाच्या संकल्पनेची त्याला जोड दिली आहे. सायबर रोड येथे तिसऱ्या रविवारी होणाऱ्या 'हॅपी स्ट्रीट'साठी लाल रंग निवडला आहे. तरुणाईसह नागरिकांनी यामध्ये यामध्ये सहभागी होत असताना लाल रंगाची थीम वापरावी. या रंगाच्या आधारे आकर्षक संकल्पना साकारणाऱ्यांचे निवडक फोटो प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. लाल रंगाचे कपडे परिधान करण्यासह या रंगाच्या आधारे वेगळ्या संकल्पनेवर 'हॅपी स्ट्रीट'मध्ये काढलेले फोटो happystreetskop.com मेलवर पाठवावेत.

.......

संपूर्ण कुटुंबीयांचे आकर्षण

'हॅपी स्ट्रीट'म्हणजे संपूर्ण कुटुंबीयांचे मनोरंजन असे जणू समीकरण बनले आहे. रविवारी, सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या उपक्रमात लहान मुलांसह आई वडील मोठ्या संख्येने सहभागी होतात. कुटुंबासोबत विविध खेळ खेळत सुट्टी सार्थकी लावतात. सायबर रोड येथे होणाऱ्या 'हॅपी स्ट्रीट'मध्ये पारंपरिक खेळांची रेलचेल असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images