Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिका शाळा व खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्याला गुरुवारी सुरुवात झाली. पारंपरिक लोकगीते, भांगडा गीतांबरोबरच पर्यावरण वाचवा, देशप्रेमावरील विविध गीतांवर सादर केलेली समूह नृत्ये व सामाजिक संदेश देणाऱ्या लघुनाटिकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या नेहरुनगर विद्यामंदिरला प्रथम, प्रिन्स शिवाजी ताराराणी विद्यालयाला द्वितीय, जिवन कल्याण प्राथमिक विद्यालयाला तृतीय तर दत्ताबाळ हायस्कूला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते झाला. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, प्राथमिक शिक्षण समिती उपसभापती सचिन पाटील, विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक अशोक जाधव, प्रतापसिंह जाधव, नगरसेविका मेहजबीन सुभेदार आदी उपस्थित होते.

महापौर लाटकर म्हणाल्या, 'लोकार्पण सोहळयानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तालीम संस्था, बोर्डिंग्ज, शाहू प्रेमी यांच्यासह कोल्हापूरकर सहभागी होत आहेत.'

दरम्यान, महापालिकेच्या व खासगी शाळांतील मुलांनी कला सादर करून शाहू महाराजांच्या विचारांचा जागर केला आहे. दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूलने सरस्वती वंदना म्हटली. भाई माधवराव बागल प्रशालेने पहिले नमनवर केलेली कला सादरीकरण आकर्षक ठरले. सेंट अॅथोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शुभ दिन आयोरे, जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयाने पाणी हरवले (भारुड), एम. एस. पटेल स्कूलने शाहू राजे थोर होते गीते सादर केली. डॉ. दीपक साळुंखे प्राथमिक विद्यालयाने 'दार उघड ग बाई दार उघड', गणेश विद्यालयाने 'ए वतन ए वतन', नूतन मराठी विद्यालयाने 'जोगवा' गीत, दत्ताबाळ प्राथमिक विद्यालयाने रणी फडकतो, माझी शाळा भोसलेवाडी यांनी 'लवाटी भंडारा', म. ल. ग. प्राथमिक शाळेने 'रंग दे बसंती' या गाण्यांवर सादर केलेल्या समूह नृत्याने साऱ्यांचीच वाहवा मिळवली. महापालिकेच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर विद्यामंदिरने मऱ्हाटमोळी गाणी, आण्णासाहेब शिंदे विद्यामंदिरने 'लख्ख पडला प्रकाश' या गीतातून कला सादर केली. संभाजीनगरच्या चाटे स्कूलने 'से नो टु प्लास्टिक', नेहरुनगर विद्यामंदिरने 'इडा पिडा टळो' या देखाव्यातून जनजागृती केली. प्रिन्स शिवाजी ताराराणी शाळेने 'शिवशाही' देखावा सादर केला. दत्ताबाळ हायस्कूल (माध्यमिक) यांनी जोगवा गाण्यावर सादर केलेले नृत्य बहारदार झाले. आर्यविन ख्रिश्चन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम सादर केली. कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सेव्ह वॉटरची नाटीका सादर करून पाणी बचतीचा नारा दिला.

विजेत्या शाळेस पाच हजार, द्वितीयला तीन हजार तर तृतीय आणि उत्तेजनार्थ शाळांना १५०० रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम व शितल हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो : अर्जुन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गव्हर्न्मेंट बँक, पार्श्वनाथ बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरीत प्रधान संस्था असलेल्या राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि दी पार्श्वनाथ को- ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सहकार विभागाने जाहीर केला. शुक्रवारी (ता. १७) सकाळी अकरा वाजता दोन्ही संस्थांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होईल. २० ते २५ मार्च यांदरम्यान दोन्ही संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी मतदारयादी जाहीर झाल्यावर त्यावर आक्षेप आणि हरकती नोंदविण्यासाठी २७ जानेवारीपर्यंत मुदत आहे. या हरकतींवर सहा फेब्रुवारी रोजी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी निर्णय देतील. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्धीची तारीख जाहीर केली जाणार आहे. गव्हर्न्मेंट बँकेच्या निवडणुकीत १५ संचालकपदांसाठी निवडणूक होणार आहे. त्यांचे १९ हजार ८०३ मतदार आहेत. बँकेचे सात जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असून सर्व सरकारी कार्यालये आणि विभागांचे नोकरदार बँकेचे सभासद आहेत.

पार्श्वनाथ बँकेची निवडणूक १२ जागांसाठी होईल. बँकेचे ९४९० सभासद आहेत. संस्थेच्या इतिहासात फक्त एकदाच निवडणूक झाली होती. बँकेची ही निवडणूकही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. गव्हर्न्मेंट बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असले तरी निवडणुकीची शक्यता आहे. सत्ताधारी पॅनेलविरोधात निवडणूक लढविण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीची पाणीपातळी घटल्याने पाण्याचा तुटवडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूरबरोबरच बालिंगा उपसा केंद्राजवळील नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने गुरुवारीही सी., डी. तसेच ई. वॉर्डमधील काही भागात पाण्याचा तुटवडा जाणवला. शिंगणापूर बंधाऱ्याजवळील पाणीपातळीत वाढ झाल्याने शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल.

शिंगणापूर बंधाऱ्यात पाणी अडवून तिथून तसेच बालिंगा, नागदेववाडी येथील उपसा केंद्रातून पाणी उपसा केला जातो. धरणातून पाणी सोडून घेण्यासाठी महापालिकेचे सोमवारपासून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर पाणीपातळीत वाढ होत असली तरी शिंगणापूर येथील केंद्रातील पंपांचे आयुष्यमान संपले आहे. त्यातून पाणीउपसा कमी होत असल्याने ई वॉर्डमधील काही भागात बुधवारपासून कमी पाणीपुरवठा होत होता. गुरुवारी त्या बंधाऱ्याजवळ पाणीपातळी योग्य झाल्याने ई वॉर्डमधील पुरवठा सुरळीत झाला. पण, बालिंगा उपसा केंद्राजवळ पातळी कमी झाल्याने व नागदेववाडी जॅकवेलमधील सफाई सुरू असल्याने सी. व डी. वॉर्डसाठी आवश्यक पाणी उपसा होऊ शकला नाही. त्यातून काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यासाठी काही भागात टँकर पाठवण्यात आले होते. शुक्रवारपासून सर्वत्र व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा झेंडा, भाजपची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसल्याचे कारण पुढे करत भाजप व मित्रपक्ष आघाडीने निवडीकडे पाठ फिरवली. चारही समिती सभापतिपदांसाठी त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. निवडणुकीच्या मैदानापासून लांब राहिलेले विरोधक आणि बहुमताचा आकडा पूर्ण केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचा समिती निवडणुकीचा मार्ग आणखी सुकर झाला. गुरुवारी झालेल्या विशेष सभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या निवडी बिनविरोध झाल्या.

शिवसेनेकडून बांधकाम समिती सभापतिपदी हंबीरराव पाटील (सरुड मतदारसंघ), शिक्षण समिती सभापतिपदी प्रवीण यादव (मिणचे) आणि समाजकल्याण समिती सभापतिपदी स्वाती सासने (उदगाव) यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी स्वाभिमानी संघटनेच्या सदस्या पद्माराणी पाटील (रुकडी) यांना संधी मिळाली. करवीरचे उपविभागीय अधिकारी तथा पीठासन अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात निवडी झाल्या. निवडीनंतर उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

महाविकास आघाडीचे संख्याबळ ४३ पर्यंत पोहोचल्याने समिती सभापतिपदाच्या निवडणुकीविषयी केवळ औपचारिकता शिल्लक राहिली होती. मात्र, महिला व बालकल्याण समिती सभापतिपद वगळता अन्य तीन पदांसाठी महाविकास आघाडीतील सदस्यांमध्ये पदासाठी रस्सीखेच सुरू होती. यामुळे गुरुवारी सकाळपर्यंत नाव निश्चितीसाठी महाविकास आघाडीत काथ्याकूट सुरू होते. महाविकास आघाडीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सर्किट हाउस येथे पहिल्यांदा दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांची बैठक घेतली. खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांनी शिवसेनेच्या सदस्यांची बैठक झाली.

००००

नेते लांबच, सदस्यांनी घेतली बैठक

भाजप आघाडीकडे केवळ २३ सदस्य उरलेत. सत्ता समीकरणासाठी भाजप व मित्र पक्ष आघाडीचे नेते मंडळींनी फारसे लक्ष घातले नाही. सदस्यांची साधी बैठकही घेतली नाही. गुरुवारी निवडणुकीच्या दिवशी हॉटेल जोतिबा येथे बैठक बोलावली होती. बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, सरचिटणीस सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, नूतन जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यापैकी कुणीही बैठकीला उपस्थित नव्हते. भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे, गटनेते अरुण इंगवले, सदस्य अशोक माने, प्रसाद खोबरे, राहुल आवाडे, हेमंत कोलेकर, राजवर्धन निंबाळकर, प्रा. शिवाजी मोरे, शंकर पाटील, सदस्यांचे नातेवाईक केरबा चौगुले, प्रकाश टोणपे यांच्यासह अन्य सदस्यांनी आपआपसात चर्चा करुन निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.

०००

सरुडकर गटाला उभारी

शिवसेनेचे दहा सदस्य आहेत. पहिल्या टप्प्यात माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, सुजित मिणचेकर व उल्हास पाटील गटाला संधी मिळाली आहे. पुढील वर्षी आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार चंदद्रीप नरके यांच्या गटाला संधी दिली जाणार आहे.

०००

वर्षभराचा कालावधी, पुढील राजीनामेही घेतले

जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना वर्षभराचा कालावधी आहे. सर्किट हाउस येथील झालेल्या बैठकीत शिवसेनेने पहिल्या टप्प्यात संधी दिलेल्या तिघा सदस्यांकडून वर्षभरानंतर सभापतिपदाचा राजीनामा देणार असे लिहून घेतले आहे. स्वाभिमानीच्या सदस्यांनाही तशा सूचना आहेत.

०००

भाजप आघाडीचे दोन सदस्य बैठकीला

भाजप आघाडीने निवडणुकीकडे पाठ फिरवली. मात्र, या आघाडीशी निगडित व मावळत्या महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम आणि ताराराणी विकास आघाडीच्या सदस्या रेखा हत्तरकी या नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सभागृहात उपस्थित होत्या.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोलीकरांच्या चिठ्ठ्या घेणे थांबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? असा सवाल उपस्थित करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन्ही मंत्र्यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले. 'शिरोलीकरांच्या चिठ्ठ्या घेऊन बोलणे बंद करा. थेट पाइपलाइन योजनेवर बोलण्याआधी गेल्या पाच वर्षांत तुम्ही एक तरी आढावा बैठक घेतली का?' असा सवाल सतेज पाटील यांनी विचारला. तर 'चंद्रकांत पाटील यांना सत्ता गमावल्याचा झटका बसला आहे. परमेश्वराने त्यांना या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती द्यावी, अशी मी प्रार्थना करतो,' असा टोला ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी केली.

पालकमंत्री पाटील आणि ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेबद्दल पालकमंत्री पाटील म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांनी शिरोलीकरांच्या चिठ्ठ्या घेऊन बोलणे बंद करावे. २०१४च्या निवडणुकीपूर्वी थेट पाइपलाइनच्या कामास सुरुवात न झाल्यास निवडणूक लढवणार नाही, असे मी म्हटले होते. त्या निवडणुकीपूर्वीच योजनेला मंजुरी मिळवून आम्ही कामाला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत तुम्ही एकतरी आढावा बैठक घेतली का? थेट पाइपलाइन योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय केले?'

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'आमच्या हॉटेलसाठी कोणत्या बँकांचे किती कर्ज घेतले याची बॅलन्ससिट मी देतो. माझे वडील गेल्या ४०-५० वर्षांपासून अलिशान गाड्यांमधून फिरतात. आमच्या व्यवसायांची माहिती घेऊनच चंद्रकांत पाटील यांनी बोलावे. गेल्या चार-पाच वर्षांत तालीम आणि मंडळांना कोणी आणि किती पैसे दिले? याची माहिती आमच्याकडे आहे. त्यांची तक्रारी आल्यास चौकशी करावी लागेल.'

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, 'भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्यातील सत्ता गमावल्याचा झटका बसला आहे. सत्ता नसण्याचा झटका त्यांना सहन होत नाही. त्यामुळे ते आमच्यावर टीका करीत सुटलेत. परमेश्वराने त्यांना, या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती द्यावी, अशी मी प्रार्थना करतो.'

मंत्री मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची खिल्ली उडवली. मुश्रीफ म्हणाले, 'भाजपची राज्यात सत्ता असताना चंद्रकांत पाटील यांनी मला राजकारणात अनेकदा त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याविषयी आता मी फार बोलणार नाही. माझ्या स्कूटरविषयी बोलून खासगी कारखान्याविषयी यापूर्वी टीका झाली. तक्रारी झाल्या. मला आता त्या आरोपांना उत्तर देण्यामध्ये फारसे स्वारस्य नाही.'

टायरी लोखंड्या आहेत

'सरकारमधील मंत्र्याच्या वाहनांचे टायर बदलण्याआधी सत्ता बदलेल' या प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या टीकेवर मंत्री मुश्रीफ यांनी,'आम्ही वाहनांना लोखंडी टायरी घातल्या आहेत, त्या कशा बदलणार' अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचे असले तरी भक्कम आहे. पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करेल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनरक्षकाविरोधात खोटी तक्रार; दोघांविरोधात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चार महिन्यांपूर्वी बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील जंगलातील वृक्षतोडीबाबत लाचप्रकरणी वनरक्षक महेशकुमार आंबी यांच्याविरोधात तक्रार देऊन संबंधीतांनी खोटे पुरावे दिल्याचे उघड झाले आहे. याबद्दल तक्रारदार अभिमन्यू अर्जुन पाटील (वय ३५, रा. बांदीवडे) व त्याचा साथीदार अमित बाळासो येडगे (वय २७, रा. कणेरीपैकी धनगरवाडा, ता. पन्हाळा) यांच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

उपाधीक्षक बुधवंत म्हणाले, 'पन्हाळा विभागातील वनरक्षक महेशकुमार बाबूराव आंबी (वय ४३) यांनी २००० रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार १८ सप्टेंबर २०१९ रोजी अभिमन्यू पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. लाच मागणीच्या पडताळणीसाठी त्याचदिवशी तक्रारदार, सरकारी पंचांना दानेवाडी ते गिरोली रोडवरील हॉटेल श्रावणी येथे वनरक्षक आंबी यांची भेट घेण्यासाठी पाठविले होते. त्यानंतर तक्रारदार पाटील हा पंचांना हॉटेलच्या अलीकडे काही अंतरावर आपल्या मोटारसायकलवरून उतरवून एकटाच हॉटेलमध्ये गेला. पडताळणीसाठी तक्रारदाराची हकिकत व डिजिटल व्हॉइस रेकॉर्डमधील मेमरी कार्डवर ध्वनिमुद्रीत झालेले संभाषण ऐकून तातडीने सापळा रचला. तक्रारदार हॉटेलमध्ये गेला होता, मात्र त्या ठिकाणी आंबी नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गिरोली-शिये रोडवरील कासारवाडी येथील सुमीत हॉटेलजवळ असल्याचे सांगितले. येथे तक्रारदाराने जाऊन पैसे देण्याचा प्रयत्न केला असता आंबी यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी ते पैसे आंबी यांच्या मोटासायकलच्या सीटवर ठेवले. इशारा होताच दबा धरलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंबी यांना ताब्यात घेतले.'

बुधवंत म्हणाले, कारवाईदरम्यानचा आंबी यांचा ध्वनिमुद्रीत आवाज व पडताळणीवेळी ध्वनिमुद्रीत केलेल्या आवाजात तफावत जाणवली. प्रत्यक्ष हॉटेल श्रावणी येथे जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तेथे आंबी हजर नसल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदार अभिमन्यू पाटील व त्यांचा मित्र अमित येडगे हे या हॉटेल परिसरात बोलत असल्याचे कॅमेऱ्यात स्पष्ट झाले. जप्त केलेल्या मेमरी कार्डमधील संभाषण पुणे प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्यांनी पाठविलेल्या अहवालात अमित येडगे हा पाटील याच्याशी आंबी म्हणून बोलल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित दोघेही पसार झाले असून त्याचा शोध सुरू आहे.'

यावेळी पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील, युवराज सरनोबत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्राचा खून करणाऱ्यास जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून मित्राचा खून केलेला आरोपी रोहन बाबूराव काटाळे (३० रा. मोहिते कॉलनी) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेसह पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. नागलकर यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली.

सरकारी अभियोक्ता मंजुषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन आणि मृत अभिजित बाबूराव रावळ (वय २५, रा. गंगावेश) हे दोघेही आचारी काम करीत होते. रावळ याच्या मध्यस्थीने रोहन काटाळे याला काम मिळाले होते. त्यावेळी त्याने अंतरा ढवळे यांच्याकडून सात हजार रुपये परत देण्याच्या बोलीवर उसने घेतले होते. मात्र, त्यानंतर आरोपी कामावर आला नाही. पैसेही परत केले नाहीत. ७ जुलै २०१५ रोजी रावळ यांनी त्याच्याकडे पैसे मागितले असता त्याने टपरीचे लाकडी दांडके रावळ यांच्या डोक्यात मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समित्या महाविकास आघाडीकडेच

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयापाठोपाठ महाविकास आघाडीने विविध समिती सभापतिपदांच्या निवडणुकीत बाजी मारली. विरोधी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष आघाडीने समिती सभापतिपदाच्या निवडणुका लढविल्या नाहीत. भाजप आघाडी मैदानातच न उतरल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडी झाल्या. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला तीन पदे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक पद मिळाले.

शिवसेनेच्या सदस्य हंबीरराव पाटील यांची बांधकाम समिती सभापतिपदी तर प्रविण यादव यांची शिक्षण आणि स्वाती सासने यांची समाजकल्याण समिती सभापतिपदी निवड झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्या पद्माराणी पाटील या महिला व बालकल्याण समिती सभापती झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. महाविकास आघाडीने अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांचा ४१ विरुद्ध २४ मतांनी पराभव केला होता.

जिल्हा परिषदेतील सत्ता हस्तगत केल्यानंतर विविध समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीवेळी भाजप आघाडीसोबत असलेले चंदगड विकास आघाडीचे सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण व गेल्या आठवड्यात पदाधिकारी निवडीप्रसंगी गैरहजर राहिलेले राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील यांनी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे सदस्य संख्या ३४ पर्यंत वाढली होती. महाविकास आघाडीकडे भक्कम बहुमत असल्यामुळे समिती सभापतिपदाच्या निवडणुकीविषयी केवळ औपचारिकता राहिली होती.

.....

भाजप आघाडीवर नामुष्की

मार्च २०१७ मध्ये भाजप व मित्र पक्षाची आघाडी सत्तेवर आली. जवळपास पावणेतीन वर्षे भाजप आघाडीची जिल्हा परिषदेत सत्ता होती. विधानसभा निवडणुकीत राज्यातील समीकरणे बदलली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत यशस्वी झाला. दोन्ही काँग्रेसने, शिवसेनेला सोबत घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला सत्तेवरुन खाली खेचले. आता समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजप आघाडीने उमेदवारही दिले नाहीत. गेल्या वेळी पाठिंबा दिलेल्या सहकारी घटक पक्षांनी साथ सोडली. पुरेसे संख्याबळ जमत नसल्यामुळे भाजप आघाडीवर निवडणूक न लढविण्याची नामुष्की ओढवली, अशी चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.

...

हंबीरराव पाटील (शिवसेना) : सभापती बांधकाम समिती

प्रविण यादव (शिवसेना) : सभापती शिक्षण समिती

स्वाती सासने (शिवसेना) : समाजकल्याण समिती सभापती

पद्माराणी पाटील (स्वाभिमानी संघटना) : महिला व बालकल्याण समिती सभापती

...................

संबंधित वृत्त पान ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणुकीच्या रिंगणातील २७ जणांनी अर्ज मागे घेतल्याने विद्यमान अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह २३ संचालकांची नावे निवडणूक अधिकारी, अॅड. दीपक देसाई यांनी जाहीर केली. नगरसेवक तौफिक मुल्लाणी, विद्यानंद मुंढे, प्रशांत शिंदे आणि अजित कोठारी या चार जणांना संस्थेवर नव्याने प्रतिनिधीत्व मिळाले आहे.

त्रैवार्षिक निवडणुकीसाठी २३ जागांसाठी ५० अर्ज आले होते. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. विद्यमान अध्यक्ष संजय शेटे, आमदार चंद्रकांत जाधव, आनंद माने आणि प्रदीप कापडिया यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. व्यापारी गटात १० जागांसाठी २५ अर्ज आले होते. त्यापैकी १५ जणांनी माघार घेतली. उद्योग-संस्था गटातील पाच जागांसाठी ११ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी सहा जणांनी अर्ज मागे घेतले. संलग्न सभासद गटातून तिघांनी, कार्पोरेट गटातून एकाने तर सहमानद सभासद गटातून दोघांनी माघार घेतली.

निवडून आलेले संचालक :

संलग्न संस्था गट : संजय शेटे, आनंद माने, प्रदीप कापडिया, शिवाजीराव पोवार, प्रशांत शिंदे.

औद्योगिक संस्था गट : आमदार चंद्रकांत जाधव, योगेश कुलकर्णी, विजय मेनन, राजाराम पाटील, विद्यानंद मुंढे.

व्यापारी संस्था गट : जयेश ओसवाल, प्रकाश केसरकर, शिवाजीराव जगदाळे, अजित कोठारी, हरिभाई पटेल, राहुल नष्टे, धनंजय दुग्गे, संजय पाटील, भरत ओसवाल.

कार्पोरेट गट : ललित गांधी, दिलीप मोहिते.

सह मानद सभासद : तौफिक मुल्लाणी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाइट लँडिंगच्या अडथळ्यांची पाहणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी विमानतळ परिसरातील अडथळे हटवणे आवश्यक आहे. अडथळ्यांची पाहणी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणचे दिल्ली येथील तज्ज्ञांचे पथक आले असून, त्यांनी अडथळ्यांची पाहणी सुरू केली. २३ जानेवारीपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. यानंतर नाइट लँडिंगच्या कामाला गती येणार असल्याचा विश्वास विमानतळ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर विमानतळावरून विमानांची वाहतूक वाढत आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन विमानांसाठी नाइट लँडिंगची सुविधा आवश्यक बनली आहे. यामुळे विमानतळ प्राधिकरणकडून नाइट लँडिंगमधील अडथळे हटवण्यासाठी पाहणी सुरू झाली. प्राधिकरणचे अधिकारी जोगेंदर कुमार, पवित्रा घोष आणि आर. आर. शर्मा यांच्या पथकाकडून विमानतळापासून १२ किलोमीटर अंतराची पाहणी सुरू आहे. अॅरोडम रेफरन्स पॉईंट या यंत्रप्रणालीद्वारे अडथळ्यांची पाहणी केली जात आहे. विमानतळापासून सर्व बाजुला १२ किलोमीटर अंतराची पाहणी होणार असल्याचे २३ जानेवारीपर्यंत हे काम सरू राहणार आहे. या पाहणीनंतर अडथळ्यांचा अहवाल तयार होणार आहे.

पाहणीसाठी महावितरण, सार्वजनिक बांधकाम यासह महसूल विभागाचे अधिकारीही सहभागी आहेत. उंच इमारती, झाडे, विद्युत खांब, टॉवर असे अडथळे स्पष्ट होणार आहेत. अडथळे निघाल्यानंतर नाइट लँडिंगची सुविधा सुरू होण्यास गती येणार आहे.

कोल्हापुरातून सध्या अलाअन्स एअर कंपनीकडून बेंगलोर आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. इंडिगोकडून बेंगलोर आणि तिरुपतीसाठी, तर ट्रू जेटकडून मुंबईसाठी विमानसेवा सुरू आहे. १८ जानेवारीपासून बेळगावमार्गे तिरुपती विमानसेवा सुरू होणार आहे. अहमदाबाद, गोवा, शिर्डी या शहरांसाठीही कोल्हापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे. नाइट लँडिंगची सुविधा सुरू झाल्यास विमानसेवेचा विस्तार वाढणार आहे. याशिवाय विमानाद्वारे मालवाहतूकही सुरू होऊ शकते, असा विश्वास विमानतळ प्राधिकरण संचालक कमल कटारिया यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयश्री पाटील-चुयेकरही निवृत्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सक्रीय राजकारणातून ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्यापाठोपाठ गोकुळचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पत्नी जयश्री यांनी निवृत्तीची घोषणा केली. चुयेकर यांच्या सहाव्या स्मृतीदिनी, जयश्री पाटील यांनी मुलगा शशिकांत यांची उमेदवारी जाहीर केली.

गेल्या आठवड्यात अरुण नरके यांनी निवृत्ती जाहीर करत मुलगा चेतन यांची उमेदवारी जाहीर केली. गोकुळची निवडणूक २० एप्रिलपर्यंत होणार असून ठराव गोळा करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गोकुळची उभारणी करणाऱ्यांत दिवंगत आनंदराव पाटील यांचा समावेश होता. त्यांच्या निधनानंतर पत्नी जयश्री यांना संधी देण्यात आली. २०१५ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मुलगा शशिकांत यानेही उमेदवारीची मागणी केली होती. पण सत्ताधारी पॅनेलमध्ये जयश्री यांना संधी दिल्यावर शशिकांत यांनी अर्ज भरला होता. निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांनी उमेदवारी मागे घेतली नसली तरी आई जयश्री यांच्यासह सत्तारुढ आघाडीचा प्रचार केला. त्याचवेळीच शशिकांत पुढील निवडणूक लढवतील अशी चर्चा होती.

आज, आनंदराव पाटील यांच्या स्मृतीदिनी चुये येथे विविध कार्यक्रम झाले. पाटील यांचे नातलग आणि मित्रपरिवार उपस्थित होता. त्यावेळी जयश्री यांनी स्वत: निवडणूक लढवणार नसून मुलगा शशिकांत निवडणुकीला उभा राहील असे सांगितले. त्यामुळे सत्ताधारी पॅनेलमध्ये शशिकांत यांचा समावेश होणार हे निश्चित झाले आहे.

चुयेकरांची कन्या सतेज पाटील गटात

आनंदराव पाटील यांची कन्या छाया वाडकर यांनी आपल्या दूध संस्थेचा ठराव गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दिला आहे. वाडकर या खेबवडेच्या सरपंच आहेत. वाडकर यांचे पती सुभाष वाडकरही यावेळी उपस्थित होते. त्यामुळे मुलगा शशिकांत आणि कन्या छाया हे दोघे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन शैक्षणिक धोरणाची आज होळी

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, आयफेटो व विविध शिक्षक संघटनेतर्फे नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात शुक्रवारी (ता. १७) आंदोलन पुकारले आहे. सायंकाळी ५.३० वाजता बिंदू चौक येथे धोरणाच्या प्रतीची होळी करण्यात येणार आहे. आंदोलनात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आयफेटोचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी केले आहे. आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत, उमेश देसाई, अर्जुन पाटील, प्रमोद तौंदकर, राजेंद्र पाटील, वर्षा केनवडे, दीपाली भोईटे यांची बैठक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळमध्ये नेत्यांच्या सोयीचा झेंडा

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

Tweet@gurubalmaliMT

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक भाजप लढणार अशी घोषणा करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीला पक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघाचे नेतृत्व करणारे नेते आणि संचालकांना निवडणुकीत पक्षीय झेंडा सोयीचा नाही. पक्षाच्या पलिकडे जात अनेकांना मदत हवी असल्याने या निवडणुकीत नेत्यांच्या 'सोयीचा झेंडा'च महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्याप्रमाणे महापालिका, जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी असली तरी गोकुळमध्ये मात्र नेत्यांच्या सोयीची आघाडी स्थापन होण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने सध्या हालचाली सुरू आहेत.

गोकुळ निवडणुकीत ठराव जमा करण्याबरोबरच सध्या आघाडी करण्याच्या प्रक्रियेलादेखील जोर आला आहे. आघाडी करताना पक्षाचा झेंडा वापरण्याऐवजी अनेक नेते वैयक्तिक पातळीवर निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या संघात जे संचालक आहेत, ते सर्वपक्षीय आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते पक्ष बाजूला ठेवत काम करतात. यापुढेही सर्व पक्षांच्या नेत्यांना आणि संचालकांना सोबत घेऊनच आघाडी करण्याचा प्रयत्न महाडिक करीत आहेत.

मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या घोषणेने यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तो दूर करण्यासाठी येत्या काही दिवसांत गोकुळ निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जाणार नाही, अशी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तरच महाडिक यांना पी. एन. अथवा इतर काही पक्षांचे नेते मदत करतील. अन्यथा त्यांचीही अडचण होण्याची शक्यता आहे.

सध्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक यांची विरोधी आघाडी होणार हे नक्की आहे. त्यांच्या सोबत आणखी काही नेते असतील. दुसरीकडे माजी आमदार महाडिक हे सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करतील. त्यांच्यासोबत आमदार पी. एन. पाटील असतील की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. गोकुळच्या सत्ताप्रक्रियेत त्यांना अतिशय महत्व आहे. त्यांना सोबत घेण्यासाठी दोन्ही आघाड्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून महाडिक त्यांच्याशी चर्चा करत आहेत, तर मुश्रीफ त्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेतही आघाडीने सत्ता प्रस्थापित केली. पण सहकारी संस्थात अशी आघाडी अडचणीची ठरणार आहे. पक्षासोबत जाणे अनेकांना त्रासदायकच ठरेल. याची सुरूवात गोकुळच्या निवडणुकीपासूनच होण्याची चिन्हे आहेत.

घाटगे, पाटील सत्तारुढ आघाडीसोबतच

शिवसेनेत असलेले अंबरिष घाटगे, अनुराधा पाटील हे पुन्हा सत्ताधारी आघाडीसोबतच असतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक संचालक देखील याच आघाडीला पसंती देण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुश्रीफ आणि पाटील यांच्या आघाडीत भाजप वगळता सर्वच पक्ष असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत नेत्यांच्या सोयीचा झेंडाच महत्वाचा ठरणार आहे. निवडणूक पक्षीय पातळीवर न होता नेत्यांच्या मनाप्रमाणेच होणार हे जवळजवळ नक्की आहे.

चौकट

सध्याचे संचालकांचे पक्षीय बलाबल

काँग्रेस : रवींद्र आपटे, धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे, अरूण नरके, अरूण डोंगळे, पी. डी. धुंदरे, निवास पाटील, उदय पाटील, विश्वास पाटील, विश्वास जाधव, सत्यजित पाटील, जयश्री पाटील-चुयेकर,

राष्ट्रवादी काँग्रेस : विलास कांबळे , राजेश पाटील,

भाजप : बाबा देसाई, रणजित पाटील, अनिल यादव, दीपक पाटील, रामराजे कुपेकर

शिवसेना : अंबरिष घाटगे, अनुराधा पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय राऊत यांना पदावरून हाकला: संभाजी भिडे

$
0
0

सांगली: 'छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला,' अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केली आहे.

'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून साताऱ्यानंतर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे. भिडे यांच्या 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेनं या बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

वाचा: 'इंदिरा गांधींची काळजी ही भाजपातील बाटग्यांची उठाठेव'

'बोलताना तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. त्यांना राष्ट्रपतीच्या इतकाच मान मिळाला पाहिजे, असं भिडे म्हणाले. 'आमचा बंद कुठल्याही पक्षाच्या वा शिवसेनेच्या विरोधात नाही. उलट शिवसेना हवी या मताचा मी आहे. मात्र, समाजस्वास्थ्य बिघडू नये याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायला हवी. राऊत यांना कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पदावरून काढावे, अशी मागणी भिडे यांनी केली.

वाचा: 'तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात'

सांगली बंदला शिवसेनेचा विरोध असल्याचं निदर्शनास आणून दिलं असता भिडे भडकले. 'कोणाचा विरोध आहे की नाही हे आज दिसेलच. शिवसेना विरोध करणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वाचा: 'त्या' वक्तव्याबाबत राऊतांची चौकशी करा: पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटकात अटक

$
0
0

इचलकरंजी: सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कर्नाटकातील बेळगाव येथील हुतात्मा चौकात गेलेल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दुपारी कर्नाटक पोलिसांनी अटक केली.

मंत्री पाटील व कर्नाटक पोलीस यांचेत यावेळी वादावादी त्यांना अटक करण्यात आली. तत्पूर्वी मंत्री पाटील यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

'सांगली बंद' मागे राजकीय षडयंत्र: सुप्रिया सुळे

सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी १७ जानेवारी रोजी बेळगावच्या हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. यासाठी मंत्री पाटील शुक्रवारी मध्यरात्रीच बेळगावात दाखल झाले होते. कोणताही सरकारी फौजफाटा न घेता ते बेळगावात पोहचले. महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींनी बेळगावात येऊ नये यासाठी कर्नाटक पोलीस राष्ट्रीय महामार्गावर पहाटेपासूनच वाहनांची तपासणी करीत होते. मात्र मंत्री पाटील बेळगावात पोचले व ते हुतात्मा चौकात अभिवादन करण्यास हजर झाले. अभिवादान सुरू असतानाच त्यांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व अटक केली. यावेळी तेथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला.
देवेंद्र सिंगचा तपास मोदींकडे; राहुल यांना संशय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेरणादायी समाधीस्मारक

$
0
0

समतेचा विचार देणारे समाधीस्मारक

कोल्हापूर टाइम्स टीम

करवीर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी सामजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला. संस्थान काळात हा समतेचा संदेश रुजवण्यासाठी, त्याचा प्रसार होण्यासाठी कायद्याची जोड दिली. दीन-दलित, दलितेतर समाजाला न्याय देण्यासाठी समाजाचा विरोध झुगारुन केलेल्या कायद्याची अंमलबजावणी केली. रयतेच्या कल्याणाचा नेहमीच ध्यास घेतलेल्या शाहू राजांनी आपली जीवनशैली साधेपणाने जोपासली. मृत्यूपूर्व इच्छापत्रामध्ये आपली समाधी सिद्धार्थनगर जवळील नर्सरी बागेत बांधली जावी, अशी भावना व्यक्त केली होती. त्यांच्या निधनानंतर तब्बल ९७ वर्षांनी ही इच्छा पूर्ण होत आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अधिकारी, पदाधिकारी आणि समिती सदस्यांनी घेतलेल्या अविरत परिश्रमामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा लोकार्पण सोहळा होत आहे. शाहूंच्या समतेच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी नर्सरी बागेतील हे समाधीस्थळ शहरवासियांबरोबर येथे भेट देणाऱ्या शाहूप्रेमींना प्रेरणादायी ठरेल.

ज्या शाहूराजांनी सामाजिक समतेचा विचार संपूर्ण देशाला दिला, त्यांचीच समाधी अडगळीत असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर काही शाहूप्रेमींनी समाधीस्मारक उभारणीसाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ऐतिहासिक कागदपत्रे धुंडाळताना त्यांनी अनेक गोष्टी प्रकाशात आणल्या. अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मोडी लिपी अभ्यासक अमित आडसूळ यांच्या मदतीने त्यांनी सर्व कागदपत्रे संकलित केली. त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या शाहूप्रेमी शिष्टमंडळाने तत्कालीन महापौर जयश्री सोनवणे व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन दिले. सर्व ऐतिहासिक दस्ताऐवज दाखवत त्यांच्याकडे राजर्षी शाहू यांच्या इच्छेनुसार समाधीस्मारक उभारणीची मागणी केली. २०१२ मध्ये दिलेल्या निवेदनानंतर समाधीस्मारक उभारणीच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या. निवेदनानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिका पदाधिकाऱ्यांनी समाधीस्थळाची पाहणी केली. त्यानंतर विविध टप्प्यावर पाठपुरावा सुरू झाला.

छत्रपती घराण्याची असलेली जमीन हिरव्या पट्ट्यात असल्याने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या समंतीने जागेचे आरक्षण बदलून घेण्यात यश आले. पण यामध्ये दोन ते तीन वर्षाचे अंतर पडले. प्रशासकीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यानंतर झोन बदलून मिळाले. दरम्यानच्या काळात समाधीस्मारकासाठी सातत्याने निवेदने, बैठका सुरुच होत्या. प्रशासकीय पातळीवरील अडचण दूर झाल्यानंतर महापालिकेच्या स्वनिधीतून समाधीस्मारक उभारणीचा निर्णय झाला. त्यासाठी पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी आपल्या विकासनिधीतील रक्कम या कामासाठी वर्ग केली. चबुतऱ्याच्या बांधकामाबरोबरच मेघडंबरीच्या कामाला सुरुवात झाली. पण मेघडंबरीच्या कामाला विलंब लागला. मेघडंबरीचे अत्यंत जिकिरीचे व किचकट असणारे काम इतिहास संशोधक, अभ्यासक आणि शाहूप्रेमींच्या सूचनेनुसार साकारण्यात आले. ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रत्यक्ष मेघडंबरी बसवण्यात आल्यानंतर समाधीस्थळाच्या कामाने आणखी वेग घेतला. संरक्षक भिंत, लॉन, दगडी फरशी व आकर्षक प्रकाश योजना आदी कामे करताना ऐतिहासिक बाज जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात अनेकजणांना महापौरपदाची संधी मिळाली. त्यांचा कार्यकाळ मर्यादित असला, तरी सर्वांनी राजर्षी शाहूंच्या समाधीस्मारकाच्या कामाला प्राधान्य दिले. या सर्वांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी (ता. १९) होत आहे. हा सोहळा लोकोत्सव व्हावा यासाठी गेल्या दोन दिवसांपासून विविध कार्यक्रम होत असून संपूर्ण शहर शाहूमय झाले आहे.

......

............

मेघडंबरी

इटली (फ्लोरेन्स) येथील राजाराम महाराजांच्या समाधीस्थळावरील मेघडंबरीसारखा बाज, जुन्या राजवाड्यातील दगडी स्तंभाची प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाप्रमाणे समाधीस्थळाचा अष्टकोनी चौथरा अशा परिपूर्ण ऐतिहासिक बाज असलेली मेघडंबरी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्मारकावरील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सव्वा तीन टन वजनाची शंभर वर्षे टिकेल अशी रचना मेघडंबरी केली आहे. मेघडंबरीच्या निर्मितीतून छत्रपतींच्या घराण्यासाठी वापरलेली स्थापत्य कला एकत्र आणण्याचे कसब शिल्पकार किशोर पुरेकर यांनी दाखवले आहे. भविष्यात मेघडंबरीसह संपूर्ण परिसर शाहू महाराजांच्या कार्याची साक्ष देण्याबरोबर ऐतिहासिक पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरेल.

टाऊन हॉल (नर्सरी बाग) येथील राजर्षी शाहू महाराज समाधीस्मारकाच्या विकासाची कल्पना पुढे आल्यानंतर समाधीस्मारकावर मेघडंबरी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. प्रथम दगडी बांधकामामध्ये मेघडंबरी उभारण्यात येणार होती. मात्र यामधील तांत्रिक अडचणी लक्षात घेवून त्यामध्ये बदल केला. ब्राँझपासून मेघडंबरी तयार करण्याचा निर्णय घेतला. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या मूळ संकल्पनेतून मेघडंबरी साकारत असताना फ्लोरेन्स येथील राजाराम महाराजांच्या समाधीस्थळावरील मेघडंबरीची प्रतिकृती तयार केली, जी प्रतिकृती करवीर दरबारात तयार झाली होती. मेघडंबरीचा वरील भाग फ्लोरेन्स येथील मेघडंबरीप्रमाणे तयार करताना चारही स्तंभ जुन्या राजवाड्यातील स्तंभाप्रमाणे तयार केले आहेत. रायगडवरील छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळाच्या चौथऱ्याप्रमाणे अष्टकोनी चौथरा तयार करुन मेघडंबरी साकारली आहे.

वेगवेगळ्या ठिकाणावरील ऐतिहासिक संदर्भ जोडून मेघडंबरी तयार करताना तब्बल ७२ ब्राँझचे तुकडे एकमेकांना जोडले गेले आहेत. अत्यंत अवघड आणि वेळखाऊ काम असताना पुरेकर यांनी आपला २२ वर्षांचा अनुभव पणाला लावल्याचे दिसत आहे. नऊ महिने अहोरात्र परिश्रम घेत कास्टिंग आणि फिनिशिंगच्या सहायाने सुमारे सव्वा तीन टन वजनाची आणि १५ फूट सहा इंच उंचीची सुबक कलाकृती साकारली आहे. मेघडंबरी आणि समाधी चौथऱ्याच्या माध्यमातून छत्रपती राजघराण्याचे ऐतिसाहिक संदर्भ जोडण्यात आले आहेत.

पुरेकरांना या कामात जयदीप साळवी, संदीप कुंभार, अजित चौधरी, अनिकेत सुतार व लक्ष्मी भोसले आणि कुटुंबीयांच्या मदत झाली. महापालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे, शिल्पकार पुरेकर यांनी सांगितले.

....

चौकट

पदाधिकाऱ्यांचा सततचा पाठपुरावा

राजर्षी शाहू समाधीस्मारक त्वरीत पूर्ण होण्यासाठी सर्वच अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पाठपुराव्याच्या माध्यमातून अनेकांना वरिष्ठांचे खडे बोल ऐकण्याची वेळ आली. मात्र यापाठीमागे समाधीस्मारकाचे काम त्वरित व्हावे, अशीच सर्वांची इच्छा होती. सर्वांच्याच प्रयत्नामुळे शाहू नगरीमध्ये समाधीस्मारकाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा होत आहे. यामध्ये विशेषत: माजी महापौर जयश्री, सोनवणे, प्रतिभा नाइकनवरे, हसीना फरास, सरिता मोरे, माजी उपमहापौर भूपाल शेटे, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, आदिल फरास, विद्यमान सभापती शारंगधर देशमुख यांनी विशेष लक्ष दिले. तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, निवृत्त उपशहर अभियंता एस. के. माने, उपशहर अभियंता रमेश मस्कर, हर्षजित घाटगे यांनी प्रशासकीय पातळीवर नेहमीच कामाला वेग देण्याचा प्रयत्न केला.

....

चौकट

पहिल्या टप्प्यातील कामे

१ कोटी

चबुतरा व मेघडंबरी

१ कोटी १० लाख

संरक्षक भिंत

७० लाख

लॉन, दगडी फरशी व विद्युत रोषणाई

.......

दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित कामे

नर्सरी बाग व शिर्के उद्यान विकसित करणे

प्रवेशद्वारासमोरील दगडी फूटपाथ तयार करणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विकसित करणे

आर्ट गॅलरी

अंदाजे खर्च पाच कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळमध्ये तीव्र पडसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कर्नाटक सरकारने दडपशाही करीत महाराष्ट्राचे राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेचे शिरोळ तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. जयसिंगपूर, कुरुंदवाड, नांदणी, अब्दुललाट, कवठेगुलंद, यड्राव, शिरदवाड आणि शिरोळ यांसह तालुक्यात अन्य ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करुन कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राजेंद्र पाटील-यड्रावकर शुक्रवारी बेळगाव येथे गेले होते. यावेळी कर्नाटक पोलिसांनी मंत्री यड्रावकर यांना कार्यक्रमस्थळी जाण्यास अटकाव केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे तसेच याठिकाणी धक्काबुक्कीही झाल्याचे वृत्त समजताच शिरोळ तालुक्यात कार्यकर्ते आक्रमक झाले. जयसिंगपूर शहरातील क्रांती चौकात संतप्त कार्यकर्ते एकत्र आले. कर्नाटक परिवहन मंडळाची एकही बस पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत शांततेचे आवाहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, कर्नाटक सरकारचं करायचं काय...खाली डोकं वर पाय, अशा घोषणा दिल्या. यावेळी क्रांती चौकात कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या आंदोलनात नगरसेवक राहुल बंडगर, महेश कलकुटगी, बजरंग खामकर, उदयसिंह खाडे तसेच अजित उपाध्ये, राहुल पाटील-यड्रावकर, प्रकाश पोवार, बाळासो वगरे, अमोल शिंदे, विनायक गायकवाड, हबीब मुजावर, अर्जुन देशमुख यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, नांदणी येथे रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्याच्या मंत्र्यास कार्यक्रमस्थळी जाण्यास अटकाव करण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे स्पष्ट करुन कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी शिरोळसह यड्राव, कुरुंदवाड, अब्दुललाट, कवठेगुलंद, गणेशवाडी या ठिकाणीही रास्ता रोको आंदोलन करुन कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

.. .. . . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज काढून घेतलेल्या सायकलच्या साथीने सुवर्णवर्षाव

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : सायकलिंग या क्रीडा प्रकारात आपल्या मुलीची कामगिरी पाहून आई-वडील सुखावले. बेताची आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या प्रशिक्षण आणि क्रीडा साहित्याचा खर्च त्यांना पेलवणारा नव्हता. तरीही लेकीच्या स्वप्नांना गती मिळावी म्हणून आई-वडिलांनी पाच लाख रुपयांचे कर्ज काढून तिला अत्याधुनिक सायकल घेऊन दिली. त्या सायकलवरील सरावाच्या जोरावर इंगळीच्या पूजा दानोळेने कुटुंबीयांचा विश्वास सार्थ ठरवला. गुवाहाटी (आसाम) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह एक ब्राँझ पदकाची घसघशीत कमाई केली. हातकणंगले तालुक्यातील छोट्या खेड्यातील पूजाचा सायकलिंगमधील प्रवास खेळात करिअर करणाऱ्या तरुणाईसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

गुणवत्तेला वेळीच पाठबळाची जोड मिळाल्यास किती मोठी झेप घेता येते हे पूजाने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले. इंगळीतून सुरू झालेला पूजाचा प्रवास राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. त्यामागे तिचे कष्ट आणि कुटुंबीयांची प्रेरणा मोलाची ठरली आहे. पूजाची सायकलिंग या क्रीडा प्रकाराची जडण-घडण प्राथमिक शिक्षण घेत असताना झाली असे कुटुंबीय सांगतात. शाळेत शिकायला ती इंगळीहून पट्टणकोडोलीच्या अनंत विद्यामंदिरपर्यंतचा जायची. तिचा हा प्रवास सायकलवरून असायचा. इयत्ता सातवीत असताना तिने सायकलिंगमध्ये राज्यस्तरीय पदक मिळवले.

या पहिल्या यशानंतर पूजाने आपल्या करिअरमध्ये मागे वळून पाहिलेच नाही. आठवीला असताना तिची पुणे येथे क्रीडा प्रबोधिनीत सरावासाठी निवड झाली. तिथे पूजाच्या कौशल्याला अधिक वाव मिळाला. तिथला सराव आणि नंतरच्या टप्प्यात तिला नवी दिल्लीतील 'साई' संस्थेत सरावाची संधी मिळाली. त्यातून आपल्या करिअरमध्ये पूजाने सायकलिंग क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील तब्बल चौदा सुवर्णपदके मिळवली आहेत.

सायकलिंगबरोबर तिने शैक्षणिक वाटचाल यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. सध्या ती इचलकरंजी येथील खंजिरे कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत अकरावीच्या वर्गात शिकते. तिचे वडील बबन दानोळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीला आहेत. तर आई अर्चना गृहिणी आहे. भाऊ हर्षद हा कुस्तीमध्ये करिअर करत असून तो सध्या पुण्यात प्रशिक्षण घेत आहे.

दुसऱ्याच्या सायकलवर सुवर्णपदक

'रोड' या प्रकारात सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारी सायकल पूजाकडे नव्हती. त्यामुळे तिने दुसऱ्याची सायकल घेऊन स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. प्रशिक्षक अनिल कुमार यांनी तिला सायकल उपलब्ध करून देऊन स्पर्धेसाठी प्रोत्साहित केले असे कुटुंबीयांनी सांगितले.

समाजाने द्यावा मदतीचा हात

अत्यंत होतकरू असलेल्या पूजाला सायकलिंगमध्ये आपल्या करिअरसाठी, पुढे जाण्यासाठी अनेकदा झगडावे लागले. या क्रीडा प्रकारासाठी अत्याधुनिक आणि चांगल्या दर्जाच्या सायकलची आवश्यकता असते. मात्र, त्यांच्या किमती प्रचंड आहेत. हा खर्च तिच्या कुटुंबीयांना पेलवणारा नाही. तरीही तिच्या जिद्दीपोटी पाच लाख रुपयांची सायकल कुटुंबीयांनी विकत घेऊन दिली. सध्या तिला 'रोड' या प्रकारासाठी नऊ लाख रुपये किंमतीची सायकल घेणे आवश्यक आहे. यासाठी दानोळए कुटुंबीयांची धडपड सुरू असून समाजातील दातृत्वावन व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. तरच पूजाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या स्वप्नांना आकार मिळू शकेल.

पूजाची कामगिरी पाहून मनापासून आनंद वाटला. यासाठी तिने खूप कष्ट घेतले आहेत. रोज पहाटे पाचला उठून ती सलग दोन ते तीन तास सायकलींचा सराव करते. खेलो इंडिया स्पर्धेतील कामगिरीमुळे आत्मविश्वास वाढला आहे. यापुढेदेखील तिने कोल्हापूरचे नाव तिने कायम उंचावत ठेवावे.

- अर्चना दानोळे, पूजाची आई

कुटुंबीयांच्या भक्कम पाठबळामुळे खेलो इंडिया स्पर्धेत यश मिळवता आले. यापुढे कामगिरीत सातत्य ठेवून ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न आहे. विविध क्रीडा प्रकारांत मुली पुढे जात आहेत. प्रत्येक आई-वडिलांनी मुलींच्या स्वप्नांना पाठबळ द्यावे असे वाटते.

- पूजा दानोळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारभाऱ्यांकडून नियम धाब्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर चारचाकी वाहनांचे पार्किंग करायचे नाही हा सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय महाविकास आघाडीच्या काही कारभाऱ्यांनी धाब्यावर बसविला. सर्वसाधारण सभेच्या निर्णयानंतर प्रशासनाने मुख्यालय परिसर 'नो पार्किंग झोन'म्हणून जाहीर केला. मात्र, नुकत्याच सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या काही कारभाऱ्यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता 'हम करे सो कायदा' या उक्तीप्रमाणे चारचाकी वाहने लावण्यास सुरुवात केली आहे. वाहतुकीची शिस्त आणि मुख्यालय परिसरात वाहनांची वर्दळ नको यासाठी आजही सगळे अधिकारी आणि अनेक सदस्य आपापली वाहने कागलकर हाऊस परिसरात लावतात. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काही सदस्य व कारभारी असलेले माजी सदस्य नियम पायदळी तुडवत आहेत. प्रशासनाने, सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना 'नो पार्किंग झोन' बदलता येणार नाही हे संबंधितांच्या निदर्शनास आणले. मात्र, त्याकडे काणाडोळा करुन नियम मोडण्यात काहीजण धन्यता मानत आहे. जि.प.मध्ये तत्कालीन भाजप व मित्रपक्ष आघाडीने मुख्यालय परिसरात चारचाकी वाहनांचे पार्किंग करायचे नाही असा निर्णय घेतला. कागलकर हाऊस परिसरात प्रशासनाने पार्किंगची सुविधा केली. जवळपास चाळीस लाख रुपये खर्च करुन पत्र्याचा शेड मारला. काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविले. तरीही कारभाऱ्यांचा नियम धाब्यावर बसविला. याविषयी नाराजीचा सूर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री यड्रावकरांना धक्काबुक्की

$
0
0

विलास अध्यापक, बेळगाव

सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी आलेल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की केली. कहर म्हणजे पाटील यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून रोखून दडपशाहीचे दर्शन पुन्हा एकदा घडवले. अभिवादनस्थळापासून दहा फुटांवर पोलिसांनी यड्रावकर यांना हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास अटकाव करण्यात आला. यावेळी मंत्र्यांचे सहकारी, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर पोलिसांनी यड्रावकर यांना एका खासगी वाहनातून पोलिस आयुक्तालयाकडे नेले. तेथून त्यांना कोगनोळीजवळ महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्यात आले.

या संतापजनक प्रकाराचा मराठी भाषिकांनी ठिकठिकाणी तीव्र शब्दांत निषेध केला. सीमालढ्यावेळी १७ जानेवारी १९५६ रोजी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौकात अभिवादन करण्यात येते. शुक्रवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला यड्रावकर हेही येणार असल्याची कुणकुण पोलिस खात्याला लागली होती. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सीमेवर, कोगनोळी येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे यड्रावकर यांनी गनिमी काव्याने बसमधून प्रवास करून बेळगाव गाठले. नंतर हुतात्मा चौकात ते रिक्षाने दाखल झाले. पोलिसांना चकवा देऊन यड्रावकर हुतात्मा चौकात आल्याचे समजताच पोलिस संतप्त झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांनी त्यांच्याभोवती गराडा घालत त्यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासूनही रोखले. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनीही संताप व्यक्त केला. यड्रावकर यांना खासगी वाहनात घालून पोलिसांनी सुरुवातीला पोलिस आयुक्तालय आणि तेथून कोगनोळीजवळ सोडले.

.. .. .. .. ....

गनिमी काव्याने बेळगावात आलो यात विशेष केलेले नाही. सीमालढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान आणि त्याग मोठा आहे. महाराष्ट्र सरकार सीमाबांधवांच्या पाठीशी आहे, हा संदेश घेऊन बेळगावात आलो होतो.

राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यमंत्री

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images