Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सीईओंकडून दमदाटीचा आरोप, कर्मचारी अस्वस्थ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

बुधवारच्या देशव्यापी संपामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मुख्यालयातील बहुतांश कर्मचारी संपात उतरल्यामुळे सर्व विभागांचे कामकाज ठप्प होते. अधिकारी केबिनमध्ये आणि कर्मचारी संपात असे चित्र होते. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी कर्मचाऱ्यांना पंधरा मिनिटांत कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाई करू अशी दमदाटी केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. या प्रकारानंतर कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दीड तासानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. संपात कर्मचारी मोठ्या संख्येमुळे उतरल्यामुळे सर्वच विभागांत शुकशुकाट होता.

जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन संपात सहभागी होणार असल्याचे निवेदन दोन दिवसांपूर्वी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांना दिले. सीईओ मित्तल त्यादरम्यान कामानिमित्त बाहेर होते. त्यामुळे कर्मचारी प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन संपातील सहभागाविषयी कल्पना दिली होती असे संघटनेच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. नियोजनानुसार संघटना बुधवारी एकत्र आल्या आणि त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर सभा घेतली. कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव, महावीर सोळांकुरे, अजित मगदूम, स्वप्निल घस्ते, निलेश म्हाळुंगेकर, किरण निकम, दिपक साठे, रणजित पाटील, के. आर. किरुळकर आदींची भाषणे झाली.

सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सीईओ मित्तल आणि रवीकांत आडसूळ हे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपवून जिल्हा परिषदेत दाखल झाले. यावेळी काही कर्मचारी रस्त्यावर, काहीजण मुख्यालय परिसरात होते. या कर्मचाऱ्यांना सीईओंनी 'पंधरा मिनिटात कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाई केली जाईल' असा इशारा दिला. गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करा अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली. प्रशासनाला रितसर नोटीस देऊन संपात सहभागी झालो. प्रशासनाला आमचे नेहमी सहकार्य असते अशी बाजू संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडली. मात्र, सीईओंनी कामावर हजर होत नसाल तर कारवाई होईल असे सुनावत मुख्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्या. किती कर्मचारी कामावर आहेत याची विचारणा अधिकाऱ्यांकडे केली. तत्काळ माहिती देण्याची सूचना केली.

दुसरीकडे कर्मचारी संपावर ठाम राहिले. कर्मचाऱ्यांनी जि. प. सदस्या मनीषा टोणपे यांचे पती प्रकाश यांना हा प्रकार सांगितला. टोणपे यांनी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधीसह सीईओंची भेट घेतली. चर्चेअंती या विषयावर पडदा टाकण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. शिवराम भोजेंना कर्मयोगी पुरस्कार जाहीर

$
0
0

सिंगल फोटो

म. टा. वृत्तसेवा, सांगली

ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील फोरमच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा कर्मयोगी पुरस्कार प्रख्यात भारतीय अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांना जाहीर झाला आहे. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १४ जानेवारी रोजी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात पुरस्काराचे वितरण होणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप असल्याची माहिती फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

काही ध्येय ठेवून आयुष्यभर तळमळीने, निष्ठेने कार्य करीत समाज परिवर्तनासाठी अव्याहतपणे कार्यरत असलेल्या कार्यकर्त्याला बळ दिले पाहिजे. या उद्देशानेच सोशल फोरमची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फोरमच्या वतीने दरवर्षी समाजासाठी वाहून घेतलेल्या व्यक्तीला कर्मयोगी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार डॉ. शिवराम भोजे यांना जाहीर करण्यात आला आहे. भोजे प्रख्यात भारतीय अणुशास्त्रज्ञ असून, त्यांनी आरखाडा, बांधकाम, ऑपरेशन, संशोधन आणि विकास या क्षेत्रात चाळीस वर्षे फास्ट ब्रीडर अणुभट्टीच्या तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य केले आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. सध्या ते शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय भोसलेंकडे घरफाळा विभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेचे कर निर्धारक व संग्राहक (घरफाळा) दिवाकर कारंडे व अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांची बदली झाली. भोसले यांच्याकडे घरफाळा विभागाची तर कारंडे यांच्याकडे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. कारंडे यांच्याकडील नगरसचिव पदाचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिलेले बदलीचे आदेश बुधवारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले. दोन ते तीन दिवसांत बदलीच्या ठिकाणी अधिकारी रुजू होण्याची शक्यता आहे.

२०१५ पासून कारंडे यांच्याकडे नगरसचिव पदासह कर निर्धारक व संग्राहक पदाचा कार्यभार होता. २०११ पासून भोसले यांच्याकडे घरफाळा विभागाची जबाबदारी होती. त्यांच्याकडे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकपदाचा पदभार दिल्यानंतर कारंडेंची या पदावर नियुक्ती झाली होती. कारंडे यांनी चार वर्षे या पदाचा पदभार सांभाळला. कारंडेंची बदली झाल्याने पुन्हा भोसले यांच्याकडे घरफाळा विभागाची जबाबदारी आली आहे. तर कारंडे यांच्याकडे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक पद सोपवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साई कार्डिअ‍ॅकच्या पार्किंगवर हातोडा

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी सहाव्या गल्लीतील साई कॉर्डिअॅक सेंटरचे (हॉस्पिटल) बंदिस्त पार्किंग बुधवारी महापालिकेने खुले केले. याबाबतची नोटीस प्रशासनाने देऊनही दखल न घेतलेल्या सेंटरमधील पार्किंगच्या जागेवरील स्टाफरुमवर हातोडा घातला. ३० बाय ३० फूट जागेवरील तीन फूट उंचीचे बांधकाम कर्मचाऱ्यांनी उद्ध्वस्थ केले. त्यासाठी आलेला खर्च हॉस्पिटल प्रशासनाकडून वसूल करण्यात येणार आहे. राजारामपुरी विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली.

तीन डिसेंबरमध्ये झालेली महासभा व त्यानंतर झालेल्या स्थायी समितीमध्ये बंदिस्त पार्किंग खुले करण्याचे आदेश महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी दिले होते. त्यानंतर या मोहिमेला धडाक्यात सुरुवात झाली, पण त्यानंतर मोहिमेमध्ये खंड पडला. स्थायी समितीच्या बैठकीत बंदिस्त पार्किंगबाबत विचारणा झाल्यानंतर बुधवारपासून पुन्हा मोहिमेला सुरुवात झाली. राजारामपुरी विभागीय कार्यालयाच्यावतीने पार्किंग खुले करण्यापूर्वी साई कॉर्डिअॅक प्रशासनाला तीन दिवसांपूर्वी नोटीस दिली होती. २४ तासात पार्किंग खुले करण्याचे आदेश दिले होते. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न केल्याने विभागीय कार्यालयाच्यावतीने पार्किंग खुले करण्यात आले.

सकाळी दहा वाजता उपशहर अभियंता आर. के. जाधव, कनिष्ठ अभियंता मिलिंद जाधव, हेमंत जाधव, उपशहररचनाकार एन. एस. पाटील आदी अधिकारी सुमारे दहा ते १५ कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. प्रशासनाला यापूर्वी पाठवलेल्या नोटिसीचा आधार घेत थेट पार्किंगच्या जागेत ३० बाय ३० फुटामध्ये स्टाफरुम बांधले होते. सुमारे दोन तास कारवाई सुरू होती. राजारामपुरी विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या १५ हॉस्पिटलचे पार्किंग बंदिस्त आहे. अशा व्यवस्थापनाने पार्किंग स्वत:हून काढून घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

कारवाईची रक्कम वसूल होणार

पार्किंग खुले करण्यासाठी सर्वच विभागीय कार्यालयाच्यावतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटीस किंवा तत्पूर्वी संबंधितांना पार्किंग खुले करावे. तसे न केल्यास कारवाईसाठी येणारा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. बुधवारी साई कॉर्डिअॅकवर करण्यात आलेल्या कारवाईसाठी आलेला खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. त्याबाबतची नोटीस गुरुवारी (ता. ९) राजारामपुरी विभागीय कार्यालयाच्यावतीने पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती उपशहर अभियंता आर. के. जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शमा मुल्ला यांचेनगरसेवकपद कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या महासभेस सलग सहा महिने गैरहजर राहिलेल्या मोक्कातील संशयित आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व माजी उपमहापौर शमा मुल्ला यांचा न्यायालयीन निवडा सुरू असल्याने त्यांना अपात्र ठरवता येणार नाही. नगरसेवक म्हणून कामकाजात सहभागी करून घ्यावे, असा अभिप्राय महापालिकेचे विधिज्ज्ञ अॅड. मुकुंद पोवार व अॅड. विवेक घाटगे यांनी बुधवारी दिला.

मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी पती सलीम मुल्ला याच्यासह शमा मुल्ला यांना मोक्काखाली अटक केली होती. सध्या त्यांची रवानगी कळंबा कारागृहात असल्याने सलग सहा महिने महासभेच्या कामकाजामध्ये सहभाग घेता आला नाही. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सभेला तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याने त्या गैरहजर राहिल्या. त्यानंतर प्रशासनाने अधिनियमातील तरतुदीनुसार नगरसेवकपद अपात्र ठरवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुनील पाटील यांनी पॅनेलवरील विधिज्ज्ञाकडे अभिप्राय मागितला होता. त्यांनी दिलेल्या अभिप्रायामध्ये 'न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत मुल्ला यांना महापालिकेच्या कामकाजापासून प्रतिबंध करता येणार नाही. तसेच मुल्ला यांना अपात्र ही समजू नये.' असे म्हणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणजित देसाई यांचे व्यक्तिमत्त्व चौकटीबाहेरचे

$
0
0

प्राचार्य डॉ. जी. पी. माळी

फोटो आहे..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विपुल लेखन करत मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक रणजित देसाई यांचे व्यक्तिमत्त्व कोणत्याही चौकटीत न सामावणारे होते. अत्यंत संवेदनशील, हळव्या मनाच्या व दिलदार व्यक्तिमत्त्वाला समजून घेताना त्यांच्यावर ठराविक प्रकारचा शिक्का मारणे, पुरोगामी किंवा प्रतिगामी चौकटीत बसवणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल,' असे मत प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी व्यक्त केले.

कनवातर्फे आयोजित वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत प्राचार्य माळी यांचे बुधवारी 'कादंबरीकार रणजित देसाई' या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य माळी यांनी देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडले. तसेच त्यांच्या साहित्यकृतीची वैशिष्ट्ये अधोरेखित केली. रणजित देसाई यांचे कोवाड येथील बालपण, त्यांच्यावर आजी व शिक्षकांकडून झालेले वाचन व लेखनाचे संस्कार आणि ख्यातनाम लेखक वि. स. खांडेकर यांचा सहवास याची तपशीलवार मांडणी करत त्यांच्या साहित्यविश्वाची ओळख करून दिली.

प्राचार्य माळी म्हणाले, 'रणजित देसाई यांनी विविध वाङ्मयीन प्रकारात वैविध्यपूर्ण लिखाण केले. त्यांचे सोळा कथासंग्रह, चार चित्रपटकथा, १३ नाटके आणि सामाजिक, ऐतिहासिक विषयांवरील कादंबऱ्या मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या आहेत. मॅट्रिकला असताना त्यांनी लिहिलेल्या 'भैरव' कथासंग्रहाला राज्यस्तरावरील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. या कथेनंतर जवळपास बारा वर्षांनी १९६० च्या सुमारास त्यांनी कादंबरी लेखनाला सुरुवात केली.'

ते पुढे म्हणाले, 'देसाईंच्या प्रारंभीच्या काळातील कांदबऱ्यांत सामाजिक आशयाचे दर्शन घडते. त्यांनी बारी, माझा गाव, समिधा यांसह चार सामाजिक कांदबऱ्या लिहिल्या. त्यांच्या ऐतिहासिक साहित्यकृतींमध्ये वीररस, करुणरस आणि श्रृंगाररस ओतप्रोत भरलेले आहेत. 'स्वामी'कार म्हणून त्यांनी वाचकांच्या हृदयसिंहानावर स्थान मिळवले. मात्र, त्यांच्या साहित्यकृतीचा एक अभ्यासक म्हणून 'स्वामी'कारपेक्षा 'समिधा'कार म्हणून ते अधिक जवळचे वाटतात. त्यांच्या साहित्यावर वाचकांनी भरभरून प्रेम केले.'

कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संचालक डॉ. रमेश जाधव यांनी परिचय करून दिला. संस्थेच्या संचालिका मनीषा वाडीकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक दीपक गाडवे यांनी आभार मानले.

००००

आजचे व्याख्यान

विषय :

वक्ता :

वेळ : सायं. ६ वा.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यराणी धावणार

$
0
0

नांदेड : गेल्या अनेक दिवसांपासून नांदेडकरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नव्या नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस शुक्रवारपासून धावणार आहे. मनमाड-मुंबई दरम्यान धावणारी राज्यराणी आता नांदेडहून धावणार असल्याने नांदेडसह लगतच्या जिल्ह्यातल्या प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. नांदेडहून, मुंबईला सुरूवातीच्या काळात नंदिग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस धावत होत्या. कालांतराने या गाड्यांचा विस्तार झाला. रात्री दहा वाजता नांदेडहून सुटणारी ही गाडी मुंबईत सकाळी दहा वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी ६.५० मिनिटांनी निघणारी ही गाडी नांदेडला सकाळी ७.२० वाजता पोहचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपी बाजीरावबुवाला पोलिस कोठडी (कराडकर मठ खून प्रकरण, आत सविस्तर)

$
0
0

लोगो : मठाधिपती खून प्रकरण

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपुरातील कराडकर मठात मठाधिपतीपदाच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी आरोपी बाजीरावबुवा कराडकर याला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मठाधिपतीपदावरून हकालपट्टी केल्याच्या अपमानातूनच त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी दुपारी आरोपी बाजीरावबुवा याने मठाधिपती जयवंत पिसाळ यांना प्रवचन करण्यास मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, पिसाळ यांनी नकार दिला होता. पिसाळ यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू फळे कापण्यासाठी वापरण्यात येता होता. प्रत्यक्ष हत्येची घटना असताना ७ ते ८ साक्षीदार मठात हजर होते, त्यांच्या आणि पोलिसांच्या हुशारीमुळे आरोपी हत्यारांसह घटनास्थळी सापडल्याने सर्व महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत.

कराडकर मठाला मोठी परंपरा

वारकरी संप्रदाय आणि पालखी सोहळ्यात कराडकर दिंडीला सन्मानाचे स्थान आहे. या मठाचे तत्कालीन मठाधिपती वैकुंठवासी ह.भ.प. भगवान महाराज कराडकर १९५८ ते २००९ पर्यत मठाधिपतीपदी कार्यरत होते. त्यांच्या वैकुंठगमनानंतर ह.भ.प. बाजीराव भागवत जगताप उर्फ बाजीरावबुवा कराडकर (वय ३४, रा. कोडोली, कराड) यांची मठाधिपती एकमुखाने नियुक्ती करण्यात आली होती. कराडकर परंपरेत एकदा मठाधिपती निवडल्यावर त्याच्या मृत्यूपर्यंत तोच मठाधिपती राहतो, अशी परंपरा आहे. निवडण्यात येणार मठाधिपती हा ब्रह्मचारी असावा आणि वारकरी सांप्रदायिक असावा, असे काही संकेत या मठाधिपती निवडीसाठी पळाले जातात. यातूनच आरोपी बाजीरावबुवा याना मठाधिपती निवडले होते. त्या नंतर त्यांनी स्वतःचे नावही सरकारी गॅझेटमध्ये बदलून घेतले होते. मठाधिपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर बाजीराव याने मठाधिपतीचे सर्व निर्बंध तोडून भ्रष्ट आचरण करू लागल्याने ज्येष्ठ मंडळी बाजीराववर नाराज होती त्यातून त्याला मठाधिपतीपदावरून काढून टाकल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर ह.भ.प. जयवंत हिंदुराव पिसाळ (वय ३३, रा. वाळवा, जि. सांगली) यांची मठाधिपती म्हणून नियुक्ती केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ दहा हजार कर्मचारी कामावर’

$
0
0

देशव्यापी संपात जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. कर्मचारी संपात उतरल्यामुळे मुख्यालयासह अन्य विभागातील कामकाज ठप्प झाले. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाकडून अधिकारी व कर्मचारी मिळून १०,३१८ जण कार्यालयात उपस्थित होते, असा दावा केला आहे. १२,२५५ पैकी १५७२ कर्मचारी संपात सहभागी होते अशी प्रशासनाकडील आकडेवारी आहे. पूर्वपरवानगीने ३६५ कर्मचारी रजेवर होते. जि.प.च्या प्राथमिक शाळेतील बहुसंख्य शिक्षक कामावर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२०१५ पासून कारंडे यांच्याकडे नगरसचिव पदासह कर

$
0
0

२०१५ पासून कारंडे यांच्याकडे नगरसचिव पदासह कर निर्धारक व संग्राहक पदाचा कार्यभार होता. २०११ पासून भोसले यांच्याकडे घरफाळा विभागाची जबाबदारी होती. त्यांच्याकडे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकपदाचा पदभार दिल्यानंतर कारंडेंची या पदावर नियुक्ती झाली होती. कारंडे यांनी चार वर्षे या पदाचा पदभार सांभाळला. कारंडेंची बदली झाल्याने पुन्हा भोसले यांच्याकडे घरफाळा विभागाची जबाबदारी आली आहे. तर कारंडे यांच्याकडे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक पद सोपवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे विकासाचा फास्ट ट्रॅक कधी?

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या रेल्वेची कोल्हापूरशी कनेक्टिव्हिटी वाढवणे गरजेचे आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गाच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी दोनदा कामाचे उद्घाटन केले. मात्र, या मार्गाचे काम कोकण रेल्वे करणार की मध्य रेल्वेकडून होणार, याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्येच संभ्रमावस्था आहे. सध्या सुरू असलेले प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम रखडले आहे. नवीन गाड्या सुरू करण्याची मागणीही प्रलंबित आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी रेल्वेची कामे फास्टट्रॅकवर येण्याची गरज निर्माण झाली आहे.

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस म्हणजेच कोल्हापूर रेल्वे स्थानक हे राज्याचे दक्षिणेतील सर्वात शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. कोकण, कर्नाटकसह मध्य, उत्तर महाराष्ट्राला जोडणारे हे प्रमुख केंद्र आहे. औद्योगिक विकास आणि वाढते पर्यटन यामुळे कोल्हापुरातील रेल्वेचे महत्त्व वाढले आहे. कोल्हापूर-कोकण, कोल्हापूर-बेळगाव, कोल्हापूर-कराड हे मार्ग तयार झाल्यास कोल्हापुरातून गतिमान रेल्वेसेवा मिळू शकते. याचा फायदा कोल्हापुरातील पर्यटनासह उद्योगांच्या वाढीसाठीही होऊ शकतो. यामुळेच गेल्या ३०-३५ वर्षांपासून कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा आग्रह सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर अखेर कोल्हापूर ते वैभववाडी या मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. २०१८-१९ मध्ये या मार्गाच्या कामासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दोनदा या कामाचे उद्घाटन केले. प्रत्यक्षात मात्र उद्घाटनानंतर भूसंपादनाच्याही कामाला गती आलेली नाही. त्यामुळे कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे काम नेमके कोकण रेल्वे करणार आहे, की मध्य रेल्वे करणार याबाबत गोंधळाची स्थिती आहे.

कोल्हापूर हे मॉडेल रेल्वे स्थानक तयार करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू होता. यानुसार रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम काही प्रमाणात झाले. सुविधाही वाढवण्याचे काम सुरू आहे. मात्र कोल्हापूरची अन्य शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या कामाला गती आली नाही. कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-सांगली पॅसेंजरची संख्या वाढवणे, लांबच्या शहरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेस वाढवणे, कोल्हापूर ते वैभववाडी मार्गाचे काम सुरू करणे, कोल्हापूर ते बेळगाव आणि कोल्हापूर ते कराड मार्गाचा पाठपुरावा रखडला आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील विकासकामेही रखडली आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाचच्या विस्तारीकरणाला सव्वा कोटींचा निधी मंजूर झाला होता. वेळेत निधी न मिळाल्याने हे काम रखडले आहे. प्लॅटफॉर्मवरील शेडसह अन्य सुविधांचीही कामे रखडली आहेत. कोल्हापूर ते मिरज मार्गाचे दुहेरीकरण करण्याची मागणीही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

गेल्या दोन वर्षात मिरज ते कोल्हापूर या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम झाले. विद्युतीकरणामुळे रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. यामुळे नवीन गाड्या सुरू होऊ शकतात. याशिवाय रेल्वेकडून इंधनाचीही बचत होणार आहे. रेल्वे स्टेशनवर सरकता जिना सुरू झाला आहे. मात्र, गर्दीच्या वेळेत हा नियमित सुरू राहावा अशी प्रवाशांची मागणी आहे. सर्व प्लॅटफॉर्मना जोडणारा रॅम्प, नवीन तिकीटगृह आणि प्रवाशांसाठी विश्रामगृह तयार झाले. प्रवाशांकडून याचा वापरही सुरू आहे. रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रलंबित कामांचा पाठपुरावा केल्यास रेल्वेची उपयुक्तता आणखी वाढणार आहे.

झालेली कामे

- रल्वे मार्गाचे विद्युतीकरण

- सरकता जिना

- रॅम्प

- विश्रामगृह

- नवीन तिकीटगृह

प्रलंबित कामे

- प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण

- प्लॅटफॉर्म शेड

- पादचारी उड्डाणपूल

- कोल्हापूर-मिरज मार्गाचे दुहेरीकरण

- कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग

- कोल्हापूर-कराड, कोल्हापूर-बेळगाव मार्गाचा पाठपुरावा

पादचारी उड्डाणपूल अधांतरी

रेल्वे फाटक येथे पादचाऱ्यांसाठी उड्डाणपूल मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीने या कामासाठी महापालिकेस एक कोटी ३४ लाखांचा निधी दिला. निधी देऊन दोन वर्षे उलटली तरी अजूनही उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळाला नाही. अनेकदा अपघात होऊनही या कामासाठी चालढकल सुरू आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पादचारी उड्डाणपूल तयार करणे गरजेचे आहे.

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचा सर्व्हे करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेकडे होती. यानुसार आम्ही सर्व्हे करून अहवाल मध्य रेल्वेकडे सोपवला आहे. यापुढील जबाबदारी मध्य रेल्वेची आहे. यामुळे कामाच्या सद्य:स्थितीबद्दल मध्य रेल्वेकडेच माहिती मिळेल.

- गिरीश करंदीकर, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम कोकण रेल्वेकडून होणार आहे. सर्व्हेही कोकण रेल्वेच्या पथकानेच केला. या मार्गाच्या कामाबाबत मध्य रेल्वेकडे सध्या तरी कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

- मनीष झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढवण्याबाबत रेल्वे प्रशासन फारसे उत्साही दिसत नाही. प्रत्येक कामांसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागतो. लोकप्रतिनिधींनी याची दखल घेण्याची गरज आहे. रेल्वेच्या उदासिनतेमुळे कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.

- शिवनाथ बियाणी, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

लोगो : मटा भूमिका

लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा आवश्यक

कोल्हापूर शहर रेल्वेने कोकण आणि कर्नाटकशी जोडणे अत्यावश्यक आहे. सध्या केवळ मिरजला जाऊनच दक्षिण, उत्तर किंवा मध्य महाराष्ट्रात पोहोचता येते. कोल्हापूर ते कराड हा मार्गही महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र गेल्या २५-३० वर्षात केवळ कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला मंजुरी मिळाली. या मार्गाचे उद्घाटन होऊनही कामाला सुरुवात नाही. कराड ते बेळगाव व्हाया इचलकरंजी मार्गाची फाइल बंद केली आहे. कोल्हापूर-मिरज पॅसेंजरची संख्या वाढवणे सहज शक्य आहे. प्रवाशांची प्रचंड गर्दी असूनही या मार्गावर पॅसेंजरची संख्या वाढवली जात नाही. एक्सप्रेस गाड्यांचीही संख्या वाढवणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करवा लागणार आहे.

रेल्वे कामांसाठी मिळालेला निधी (रुपयांत)

९४ लाख

प्लॅटफॉर्म वाढवणे

१ कोटी २७ लाख

प्लॅटफॉर्म शेड व सुविधा

२ कोटी ५० लाख

रॅम्प व सरकता जिना

९० लाख

विश्रामगृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी म्हणतात... आम्ही पृथ्वीरक्षक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

प्रदूषणकारी वायूंमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. हवामानातील बदल हा त्याचाच मोठा परिणाम आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टीसारख्या घटना घडतात. ही संकटे थांबविण्यासाठी पर्यावरणाचा समतोल साधावा लागेल आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा लागेल. या साऱ्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागेल. त्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने सुरू केलेल्या 'पृथ्वीरक्षण' उपक्रमात शहरातील मंगळवार पेठेतील प्रायव्हेट एज्युकेशन संस्थेच्या प्रायव्हेट हायस्कूल आणि सानेगुरुजी वसाहत परिसरातील श्री लक्ष्मी प्रसारक मंडळाच्या वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल, सन्मित्र विद्यालय, तेजस स्कूलमधील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत पृथ्वी रक्षणाची शपथ घेतली.

वसुंधरा वाचवण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या 'पृथ्वीरक्षण' उपक्रमात गुरुवारी प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभागी होण्याचा निर्धार केला. हायस्कूलमधील १६५० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शपथ घेतली. शिक्षक पी. एम. जोशी यांनी पृथ्वीरक्षण उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले 'हवामानातील बदलांमुळे जगभरात दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, वणवे अशी संकटाची मालिका सुरू आहे. वणव्यामुळे ऑस्ट्रेलियातील जंगलात झालेल्या अग्नितांडवात प्रचंड वन आणि प्राणी संपदा नष्ट झाली. निसर्गाची हानी टाळण्यासाठी सुरू झालेली पृथ्वी रक्षण मोहीम हितकारक आहे. त्यामध्ये प्रायव्हेटचे विद्यार्थी सहभागी होत आहे ही चांगली बाब आहे.'

यावेळी विद्यार्थ्यांनी हात उंचावून पृथ्वीरक्षणाची शपथ घेतली. मुख्याध्यापक एम. आर. गोरे म्हणाले, 'हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून विद्यार्थ्यांनी पृथ्वीरक्षणाची सामूहिक शपथ घेऊन चळवळीला बळ देण्याचा निर्धार केला आहे.' उपमुख्याध्यापक व्ही. एल. डेळेकर, जिमखाना प्रमुख टी. ए. सकट, समारंभ प्रमुख एस. आर. गणबावले यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

सानेगुरुजी वसाहत परिसरातील वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलमध्ये १४०० मुलींनी पृथ्वीरक्षणाची शपथ घेतली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. ते म्हणाले, 'महाराष्ट्र टाइम्सतर्फे सुरू असलेला हा उपक्रम काळाची गरज आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांना अनेक गोष्टीचे धडे दिल्यास विधायक समाजनिर्मितीसाठी यशस्वी प्रयत्न होतात. गेल्यावर्षी कोल्हापूरला महापुराने वेढले होते. काही जंगलांना आग लागली. काही भागात दुष्काळ पडला होता. ही नैसर्गिक संकटे थांबविण्यासाठी पृथ्वी रक्षकाची जबाबदारी प्रत्येक कुटंबाने घेतली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी हा महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्र टाइम्सचा उपक्रम पृथ्वीच्या रक्षणासाठी मोलाचा आहे.'

संस्थेचे सचिव सुनील कुरणे, तेजस स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता साळोखे, सन्मित्र स्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी भोसले, वसंतराव देशमुख हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. यू. जाधव, पर्यवेक्षक भास्कर जमदाडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजीचा बागुलबुवा पळवणारा अवलिया शिक्षक

$
0
0

लोगो : प्रयोगशील शिक्षणाची दिशा

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@aunradhakadamMT

कोल्हापूर : मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी असलेला बागुलबुवा इतका आहे की त्यामुळेच त्यांच्यात ही जगाची भाषा बोलण्याचा आत्मविश्वास येत नाही. इंग्रजी सोपी करून शिकवली तर मुलांना त्याची गोडी लागेल आणि भीतीपेक्षा या भाषेसोबत त्यांची मैत्री होईल. या विचाराला कृतीची जोड देत कोल्हापुरातील मंगळवार पेठेत राहणारे कृपाल यादव हे अवलिया शिक्षक गेल्या ९ वर्षांपासून इन्स्पायरिंग यंग इंडिया या उपक्रमातून महापालिका शाळेतील मुलांना इंग्रजी शिकवत आहेत. त्यासाठी यादव यांनी आजवर २५० मोफत कार्यशाळा घेतल्या आहेत.

मोरेवाडी येथील शांतिनिकेतन स्कूल येथे इंग्रजी विषय शिकवणाऱ्या कृपाल यादव यांना २०११ मध्ये ही कल्पना सुचली. शिक्षण क्षेत्राचे विद्यार्थी असताना ग्रामीण भागात सराव पाठ घेताना त्यांच्या लक्षात आले की जिल्हा परिषद, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षित पालकांची नाही. अनेक आर्थिक अडचणींतून मार्ग काढत ही मुलं शाळेत येतात. त्यातच भविष्यातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्वाची गरज असूनही या मुलांच्या मनातील इंग्रजीची भीती त्यांना या भाषेपासून दूर नेते. तेव्हाच यादव यांच्या मनात या प्रयोगशील उपक्रमाची सुरूवात झाली. स्वत:ची नोकरी सांभाळून उर्वरित वेळेत यादव यांनी त्यांच्या प्रयोगासाठी आठवड्यातील काही वेळ बाजूला काढला.

शिकवण्याच्या प्रचलित पद्धतीला फाटा देत यादव यांनी खेळ, कोडी, दैनंदिन जीवनातील शब्द, क्रिया यातून इंग्रजी भाषा शिकण्याची पद्धत तयार केली आहे. इंग्रजीची भीती मनातून जावी, मुलांना इंग्रजीतून संभाषण करता यावे, इंग्रजीतून कार्यालयीन काम, पत्रव्यवहार, संवाद याची समज यावी यासाठी यादव काम करतात. त्यासाठी लागणारे साहित्य यादव यांनी सुरूवातीच्या टप्प्यात स्वखर्चातून जमा केले. महापालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन त्यांनी मोफत कार्यशाळा सुरू केल्या.

कार्यशाळेच्या निमित्ताने शाळांमध्ये गेल्यावर, मुलांशी संवाद साधल्यावर यादव यांच्या लक्षात आले की अनेक मुलांकडे शालेय साहित्य नाही. घरातून आणण्यासाठी पैसे नाहीत. शाळांचीही यासाठी आर्थिक क्षमता नाही. त्यासाठी यादव यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करून मित्रपरिवाराला मदतीचे आवाहन केले. यादव यांच्या मोफत उपक्रमशील प्रयोगाची माहिती झाल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शालेय साहित्याची मदत उभी राहिली. त्यातून मोफत कार्यशाळेत इंग्रजी शिकण्यासाठी येणाऱ्या गरीब मुलांना शालेय साहित्य वाटण्यात आले. आजपर्यंत यादव यांनी पाच हजार गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या ज्ञानासोबत शालेय साहित्याचीही मदत केली आहे. यादव यांच्या कार्यशाळेत दहा हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवगत केली आहे. यादव यांनी एमए, बीएड या पदवीसह स्कूल मॅनेजमेंट या विषयात पदविका शिक्षण घेतले आहे. तसेच हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट या विषयातही ते तज्ज्ञ आहेत.

इंग्रजी भाषा ही भविष्यात अत्यंत महत्त्वाची आहे. जगाची भाषा अशी ओळख असलेल्या या भाषेला आपण नाकारून चालणार नाही. शिक्षणाचे माध्यम कोणतेही असले तरी इंग्रजी भाषा आली पाहिजे. महापालिकेच्या शाळांमधील मुलांना इंग्रजी ज्ञान योग्य पद्धतीने मिळत नसल्याने त्यांना इंग्रजी शिकण्याचीच भीती वाटते. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा अडथळा असल्याचे लक्षात आल्यामुळे या प्रयोगशील उपक्रमाला सुरूवात केली. यातून मला शिक्षक म्हणून खूप वेगळे समाधान मिळते.

- कृपाल यादव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविकास आघाडीची आज बैठक

$
0
0

जिल्हा परिषद लोगो

........

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या विविध समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने हालचाली सुरू केल्या आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीप्रमाणे समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी मोर्चेबांधणी करत महाविकास आघाडीच्या सदस्यांना शुक्रवारी सायंकाळी सहलीवर पाठविण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीच्या सदस्यांची बैठक होणार आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक हे बैठकीला उपस्थित राहून सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत. समिती सभापतिपदासंदर्भात या नेतेमंडळीमध्ये स्वतंत्रपणे चर्चा होणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी ,शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शाहू विकास आघाडी, ताराराणी विकास आघाडी व चंदगड विकास आघाडीचा एक सदस्य व अपक्ष सदस्य अशी महाविकास आघाडी आकाराला आली होती. शिवसेनेला तीन आणि अपक्ष व अन्य मित्रपक्षांना एक पद असा फॉर्म्युला ठरला आहे.

दरम्यान, बांधकाम, शिक्षण समिती सभापतिपदासाठी महाविकास आघाडीत इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यावर बैठकीत काय तोडगा निघणार, पहिल्या वर्षी कोणत्या घटकांना पदाची लॉटरी लागू शकते याविषयी सदस्यांत उत्सुकता आहे. आमदार पी. एन. पाटील गटाकडून बांधकाम समिती सभापतिपदासाठी दावा करण्यात येत आहे. शिवाय शिवसेनेला तीन पदे दिल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीतील अन्य सदस्य पदापासून लांब राहणार आहेत याकडेही दोन्ही काँग्रेसमधील काही मंडळी लक्ष वेधत आहेत.

...

भाजप आघाडीत शांतता

महाविकास आघाडीकडून समिती सभापतिपदासाठी घडामोडी सुरू झाल्या असताना भाजप व मित्रपक्ष आघाडीत मात्र शांतता आहे. महाविकास आघाडीतील नाराज घटकांवर जाळे फेकण्याचा प्रयत्न झाला. पण महाविकास आघाडीचे ४१ पर्यंत पोहचलेले संख्याबळ, राज्यातील सत्तेची समीकरणे यामुळे भाजप आघाडीला सभापतिपदासाठी आवश्यक संख्याबळ जमविताना मर्यादा पडत आहेत. भाजप आघाडीत सध्या भाजपचे १४, जनसुराज्यचे सहा, आवाडे गटाचे दोन, ताराराणी विकास आघाडीचे दोन, चंदगड विकास आघाडीचा एक सदस्य सोबत आहे. दरम्यान, मित्र पक्ष असलेल्या एका आघाडीचा आणखी एक सदस्य महाविकास आघाडीत सामील होणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे भाजप आघाडीचे संख्याबळ आणखी एका सदस्यानी कमी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाध्यक्षपदी चिकोडे, घाटगे?

$
0
0

फोटो : राहुल चिकोडे, समरजित घाटगे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीची निवड प्रक्रिया रखडली असून १३ ते १४ जानेवारीपर्यंत नवे पदाधिकारी निवडले जाण्याची शक्यता आहे. महानगर अध्यक्षपदी राहुल चिकोडे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी समरजित घाटगे यांची नावे निश्चित झाली आहेत.

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर भाजपने राज्यात पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची निवडणूक प्रक्रिया समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. ३१ डिसेंबरपूर्वी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा केली होती. पण राज्यात काही ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपद निवड आणि सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे हा कार्यक्रम एक महिना पुढे ढकलण्यात आला.

जिल्ह्यातील बूथ प्रमुखांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरातील सात आणि ग्रामीण भागातील १४ मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया आज सोमवारपासून सुरू झाली. महानगर अध्यक्षपदी प्रभारी राहुल चिकोडे, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अशोक देसाई, अॅड संपतराव पवार, गणेश देसाई यांनी तर ग्रामीण अध्यक्षपदी सध्या हिंदूराव शेळके असून अनेक पदाधिकाऱ्यांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. ही सर्व नावे राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीपुढे पाठवण्यात आली. विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवड प्रक्रियेचे अध्यक्ष माजी आमदार हळवणकर आणि राज्यातील २२ उपाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यभरातील महानगर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाली. कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी प्रभारी अध्यक्ष राहुल चिकोडे यांना कायम ठेवून ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांचे नाव निश्चित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पी. एन. पाटलांचा मुश्रीफांसमोर प्रस्ताव

$
0
0

गोकुळ निवडणूक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्ताधारी आघाडीसोबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोबत यावे, यासाठी गोकुळचे नेते आमदार पी. एन. पाटील येत्या दोन दिवसांत भेटणार आहेत. याबाबत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह संचालकांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. या भेटीत राष्ट्रवादीला काही जागांची ऑफर देण्याची शक्यता आहे.

गोकुळवर महाडिक आणि पी. एन. पाटील गटाची सत्ता असली तरी सत्ताधारी संचालक मंडळात काँग्रेसेसह राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे संचालक आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना मोठे आव्हान देताना त्यांची दमछाक केली होती. त्यांचे दोन संचालकही विजयी झाले होते. तर काही जागा ५० ते १२५ मतांच्या फरकाने पराभूत झाल्या होत्या. मल्टिस्टेटच्या प्रश्नांवर सतेज पाटील यांनी विरोध केला होता. त्याला मुश्रीफ, माजी आमदार चंद्रदीप नरके, संपतराव पवार यांनी साथ देत सत्ताधारी संचालक मंडळाला हा ठराव मागे करण्यास भाग पाडले. त्यामुळे 'गोकुळ'च्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात नवीन आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवत जिल्ह्यात सहा जागा जिंकल्या. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून 'आमचं ठरलंय, गोकुळ उरलंय' ही घोषणा करत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. पण मंत्रिमंडळ विस्तारात पी. एन. पाटील यांना डावलल्याने त्यांचा गट नाराज झाला असून तो महाडिक गटाच्या पुन्हा जवळ गेला आहे. दोन दिवसांपुर्वी 'गोकुळ'मध्ये झालेल्या बैठकीत पी. एन. आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह ज्येष्ठ संचालकांची बैठक झाली. बैठकीत पी. एन. यांनी मुश्रीफ यांच्याशी चर्चा करावी, असा निर्णय घेण्यात आला.

'गोकुळ'च्या निवडणुकीत सतेज पाटील यांना मुश्रीफ, नरके गटाने पाठिंबा दिल्यास निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अरुण नरके यांनी मुलगा चेतन नरके यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाकडे नरके गट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुश्रीफही सत्ताधारी गटाकडे रहावेत यासाठी आमदार पाटील, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. 'गोकुळ'च्या संचालक मंडळात तीन जागा वाढल्याने त्यापैकी दोन जागा राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी सत्ताधारी पक्षाने दाखवली आहे. जिल्हा बँकेचा कारभार चांगला असल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन यापूर्वीच मुश्रीफांनी केले आहे. त्यानुसार 'गोकुळ'बाबतही तोच विचार करावा असे नेत्यांना वाटते.

शेतकरी व 'गोकुळ'च्या हितासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेणार आहे. एकत्रित निवडणूक लढवावी ही आमच्यासह संचालक मंडळाचीही तशी भावना आहे. पुढील दोन ते तीन दिवसात ही भेट होईल.

आमदार पी. एन. पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी- ट्रॅक्टरची धडक, एक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते गारगोटी मार्गावर निगवे खालसा फाट्यानजीक एसटी व ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर अकराहून अधिकजण गंभीर जखमी झाले. कावणे ते निगवे खालसा रस्त्यावर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दत्तात्रय तुकाराम पाटील (वय ५०, रा.निगवे खालसा) असे मृताचे नाव आहे. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. जखमींना येथील सीपीआरमध्ये उपचारासाठी रात्री दाखल करण्यात आले.

अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. जखमीपैकी काही प्रवासी पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. अपघातामध्ये वाळवे खुर्द येथील तानवडे कुटुंबीयांतील चौघे जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांची समोरासमोरील धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एसटीचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे. गारगोटी ते कोल्हापूर या एसटीमध्ये २५ हून अधिक प्रवासी होते. ट्रॅक्टर निलगिरीच्या लाकडांनी भरला होता.

या अपघातामध्ये एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही वाहनांच्या धडकेमुळे एसटीमधील प्रवासांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. काही प्रवाशांच्या डोक्याला मार बसून रक्तस्त्राव झाला. हात, पायाला गंभीर इजा पोहचल्या आहेत. घटनास्थळावरील वातावरण अतिशय गंभीर होते. प्रवाशांचे विव्हळणे, मदतीसाठी हाक दिली जात होती. अपघात झाल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जखमींना घेऊन एक रुणवाहिका सीपीआरमध्ये पोहचली. त्यानंतर दोन रुग्णवाहिकांतून जखमींना उपचारासाठी आणण्यात आले.

जखमींमध्ये कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथील अरविंद महिपती तानवडे (वय ५०), लता अरविंद तानवडे (४५), बाजीराव महिपती तानवडे (४२) आणि वैशाली बाजीराव तानवडे (वय ३५) हे गंभीर जखमी आहेत. अन्य जखमींमध्ये गौतम बाबू कांबळे (विचारेमाळ), बळवंत पाटील (निगवे खालसा), साताप्पा महादेव लोकरे (कळंबा), पदमाकर काटमारे (सोलापूर), गुणवंत मुंडे (माळेगाव, सोलापूर), राहुल लोंढे (भोसरी)यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्याचे जवान ज्ञानेश्‍वर जाधव शहीद

$
0
0

साताराः सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले धकटवाडी, ता. खटाव येथील जवान ज्ञानेश्‍वर चंद्रकांत जाधव जम्मू-काश्‍मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव उद्या (शनिवार) गावी येणार असल्याची माहिती देण्यात आली.

शहीद जवान ज्ञानेश्वर जाधव हे २०१५मध्ये सीमा सुरक्षा दलात दाखल झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना सहा महिन्यांचा मुलगा आहे. घरची परिस्थिती जेमतेम असून ज्ञानेश्वर यांचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथे झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, आई, वडील व दोन विवाहित बहिणी, असा परिवार आहे.

ज्ञानेश्वर यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना जम्मू-काश्‍मीरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी कळविले. ज्ञानेश्वर यांचे पार्थिव उद्या (शनिवार) सायंकाळपर्यंत गावात पोहोचेल, अशी माहिती सरपंच कृष्णाजी माने यांनी दिली. जवान ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

मिलिंद एकबोटेंचा आयोगापुढे साक्ष देण्यास नकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लेवअर मिल्क, बासुंदी अन् गुलाबजाम

$
0
0

कोल्हापूर

फ्लेवर मिल्क, बासुंदी आणि टिकणारा गुलाबजाम अशी अनेक उत्पादने निर्मितीत तरुण उद्योजक निलेश पै यांनी खासियत मिळवली आहे. स्थानिक बाजारपेठेसह देशभरातील ब्रॅंडेड कंपन्यांना डेअरी प्रॉडक्ट करुन देणाऱ्या त्यांच्या कंपनीने कोल्हापूरचा ब्रँड देशभर विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

वाणिज्य पदवीधर असलेल्या निलेश यांनी वडील दयानंद पै यांच्या डेअरी प्रॉडक्ट या पारंपरिक व्यवसायात लक्ष घातले आहे. आधुनिकतेची कास धरत त्यांनी २०११ मध्ये कंपनी स्थापन करुन कणेरीमठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल येथे प्लांट उभारला आणि २०१४ मध्ये उत्पादनास सुरुवात केली. फ्रोजन डिव्हिजन आणि निर्जंतुकीकरण (स्टेरिलायझेशन) हे विभाग सुरू केले. त्यामधून डेअरी प्रॉडक्ट तयार करुन देण्यास सुरुवात केली. सुगंधी दूध, प्रोटिन शेक तयार करण्याची ऑर्डर मिळविली. सहा महिने टिकणारे गुलाबजाम, अंजीर आणि सीताफळ बासुंदी आदींना ग्राहकांची चंगली पसंती मिळत आहे. डेअरी प्रॉडक्टना मोठी मागणी असून अनेक कंपन्यांना पै यांच्या कंपनीकडून उत्पादने तयार करुन दिली जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्ही करणार पर्यावरण संवर्धन

$
0
0

फोटो अर्जुन टाकळकर

...........

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल

कोल्हापूर

पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी इतरांमध्येही जागृती करू, असा संकल्प संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास स्कूलमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी हात पुढे करत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'पृथ्वीरक्षण'उपक्रमात विद्यार्थीही पुढे सरसावले. या उपक्रमावेळी शाळेचे मैदान विद्यार्थ्यांनी फुलून गेले होते. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. संभाजीनगर, गजानन महाराजनगर, रामानंदनगर, जरगनगर, मंगळवार पेठ, जवाहरनगर, गड मुडशिंगी, उचगाव आणि वडणगे येथील मुले येथे शिकायला आहेत. प्राचार्या श्रीमती शिवानी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक श्रीराम जाधव आणि इतर शिक्षकांनी नियोजन केले. शिक्षक अभय बकरे यांनी शपथ दिली. विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात, हात पुढे करत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

.. .. ..

शालेय मुलांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती करणारा हा स्तुत्य उपक्रम आहे. शाळेमार्फत विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयक धडे दिले जातात. 'पृथ्वीरक्षण' उपक्रमामुळे पर्यावरण जपण्याच्या जाणीवा आणखी प्रगल्भ होतील. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येकाने 'निसर्ग वाचवू या'साठी कटिबद्ध झाले पाहिजे.

श्रीराम जाधव, पर्यवेक्षक

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images