Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कडक कारवाई करा

$
0
0

कोल्हापूर: 'विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी,' अशा सूचना सर्वधारण निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा यांनी गुरूवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय आणि नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक विकास कुमार आरोरा, संजीव सिंग, बाबू लाल मीना, अमर नाथ तलवदे, सुरेंद्र राम, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात राजकीय 'जोडणी'ला वेग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम विधानसभेसाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांची यादी निश्चित झाली आहे. उमेदवारांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते कामाला लागले असून प्रचार यंत्रणा सक्रीय झाली आहे. गावोगावी बलाबल असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांना गाठले जात असून एकगठ्ठा मते मिळतील अशाच स्थानिक नेत्याला आपल्याकडे खेचण्यात येत आहे. एकंदरीत राजकीय 'जोडण्या' लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत प्रचाराच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर उमेदवारांकडून केला जातो. मात्र, नव्या बदलांसोबत प्रत्यक्ष वैयक्तिक भेटीगाठीवर भर दिला जात आहे. गटाची, पक्षाची बांधणी करताना अनाहूत भेटी महत्त्वाच्या ठरतात. जिल्ह्यात सहकाराचे जाळे विस्तारलेले आहे. सहकारी साखर कारखाने, पतसंस्था त्याला जोडून दुधसंस्था राजकीय नेत्यांच्या ताब्यात आहेत. सहकारातून राजकीय करिअरला सुरुवात करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गावोगावी संस्थांचे जाळे विणताना एकगठ्ठा मतदान आणि आपल्या गटाचे प्राबल्य राहील याकडे नेतृत्वाकडून जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. यासाठी विधानसभेचे आराखडे बनवताना मतदार संघातील किती ग्रामपंचायती, सहकारी संस्था, सोयासायट्या, प्रमुख मातब्बर मंडळी आपल्या बाजूला आहेत याचा प्रामुख्याने विचार होतो. यासाठी प्रसंगी प्राथमिक स्तरावर पॅनेल लढवताना काहीवेळा नेतृवाकडून तडजोडी होतात. गावात 'होल्ड' राहावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीलाच तालुका पातळीवरील नेतृत्व जवळ करते. अगदी एखाद्याचे अडकलेले काम मार्गी लावतानाही गावच्या प्रमुखाचा सल्ला नेत्यांकडून घेतला जातो. यासाठी कुठे कोण सक्षम, कुणाचे वर्चस्व आहे याकडे बारकाईने लक्ष ठेवून विधानसभेची गोळाबेरीज केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गार्डन्स क्लबतर्फे उद्यान स्पर्धेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रतिवर्षाप्रमाणे येथील गार्डन्स क्लबच्यावतीने ४९ व्या उद्यान स्पर्धेचे आयोजन २३ व २४ नोव्हेंबर रोजी केले आहे. स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्यास शनिवार (ता.५) पासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून खासगी तसेच संस्थात्मक उद्यानच्या प्रवेशिका दाखल करता येणार आहेत.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याबरोबरच विविध फुलांच्या झाडांची शहरात जास्तीतजास्त लागवड व्हावी यासाठी दरवर्षी गार्डन्स क्लबतर्फे उद्यान स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या तीन ते चार गटांत २३ व २४ नोव्हेंबरला स्पर्धेचे आयोजन केले आहे. खासगी उद्यानामध्ये दहा हजार चौ. फूट, मध्यम पाच ते दहा हजार चौ. फूट, लहान तीन ते पाच हजार चौ. फूट व मिनी उद्यानात तीन चौ. फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाचा समावेश केला आहे. त्याचबरोबर टेरेस व बाल्कनीतील उद्यानांचाही या स्पर्धेत समावेश केला आहे.

संस्था व सार्वजनिक व उद्यान स्पर्धेत मोठ्या बागांसाठी तीन एकर क्षेत्र, मध्यम बागेसाठी दोन ते तीन एकर, लहान बागेसाठी अर्धा ते एक एकर तर मिनी बागेसाठी अर्धा एकरपेक्षा कमी क्षेत्रफळातील बाग असणे आवश्यक आहे. कारखाना विभागामध्ये तीन एकर, दोन ते तीन एकर, अर्धा ते तीन एकर व मिनी बागेसाठी अर्धा एकरपेक्षा कमी क्षेत्र निश्चित केले आहे.

स्पर्धेत सहभागी बागांचे परीक्षण शास्रोक्त पद्धतीने केले जाणार आहे. त्यासाठी बागेचा आराखडा, झाडांची विविधता, हार्डस्केप व सॉफ्टस्केपची सांगड, बागेची निगा, स्वच्छता, सेंद्रिय खते व औषधांचा वापर आदींचे तज्ज्ञांमार्फत परीक्षण केले जाणार आहे. स्पर्धकांना मध्यवर्ती बसस्थानक येथील जेम्स स्टोन इमारतीमधील कॅडसन कलर लॅबमध्ये फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शनिवार (ता. ५) पासून फॉर्म मिळणार असून १५ नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरावा लागणार आहे. स्पर्धेची अधिक माहिती www.gardensclubkolhapur.org या संकेस्थळावरही मिळेल.'महापुराच्या संकटावर मात करत अनेकांनी आपल्या बागा पुनरुज्जीवित केल्या आहेत. अशा बागामालकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे,' असे आवाहन क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचे सरकार जनताच उलथवेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी
'ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याबद्दल भ्रमनिरास झाल्याची भावना राज्यातील जनतेच्या मनात आहे. केवळ घोषणाबाजी करून सत्तेवर आलेल्या जनताविरोधी सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. चुकीच्या प्रवृत्तीकडून राज्य काढून घेऊन राज्य योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राज्यातील जनतेला परिवर्तनाची आस आहे. त्यामुळे युतीचे सरकार जनताच उलथवून टाकेल,' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. मुदाळ (ता. भुदरगड) येथे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रचार प्रारंभ प्रसंगी जाहीर सभेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, 'राज्यातील जनविरोधी सरकार घालवून आघाडीचे सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलो आहे. ज्या ज्या ठिकाणी मी गेलो तेथे सरकारबद्दल कमालीची अनास्था दिसत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तनाची आस लागल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. देश आणि राज्याची सूत्रे ज्यांच्या हातात दिली त्यांना सरकार चालवण्यात किती अपयश आले आहे, ते यावरून दिसते. राज्यातील युतीचे सरकार जनता उलटून टाकील, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपतराव देशमुखांचा वारसा अखेर नातू अनिकेतकडे

$
0
0

गणपतराव देशमुखांचा वारसा अखेर नातू अनिकेतकडे

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आमदार गणपतराव देशमुख यांच्या नंतर अबाधित ठेवण्यासाठी सांगोल्यातील शेकाप नेते कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर शुक्रवारी पक्षाने या पूर्वी जाहीर केलेली भाऊसाहेब रूपनर यांची उमेदवारी रद्द करीत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

गेली ५५ वर्षे सांगोल्याचे आमदार म्हणून विक्रम करणारे ९४ वर्षांचे आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यावर शेकापच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगोल्यात येऊन बैठकीत गणपतराव देशमुख यांचे निकटवर्तीय उद्योजक भाऊसाहेब रूपनर यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, सांगोल्यातील शेकाप कार्यकर्त्यांना हे मान्य नसल्याने त्यांनी सर्वांनुमते गणपतरावांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचे नाव पुढे केले. कार्यकर्त्यांचा टोकाचा आग्रह पाहून अखेर शेकापच्या नेत्यांनी यास मान्यता देत आणि गणपतराव देशमुख यांची समजूत घालून शुक्रवारी डॉ. अनिकेत देशमुख यांचा उमेदवारी दाखल करण्यात आला.

सकाळी आजोबा-आजींना नमस्कार करून अनिकेत यांनी वडील चंद्रकांत देशमुख व आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांसमवेत उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे शेकापकडून फक्त अनिकेत देशमुख यांचाच अर्ज भरताना सूचक अर्ज देखील दाखल केला नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देत अनिकेत यांचा उमेदवारी अर्ज भरल्याचे सांगताना गणपतरावांना चेहऱ्यावरील आनंद लपवता येत नव्हते. या उमेदवारीमुळे मी खूप समाधानी आहे. आता माझा राजकीय वारसदार म्हणून अनिकेत काम करेल. त्याला निवडून आणून सर्वांत तरुण आमदार बनवू, असा विश्वास गणपतराव देशमुख यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला. नातवासाठी आपली उमेदवारी सोडणाऱ्या भाऊसाहेब रूपनर यांचेही गणपतराव देशमुख यांनी आभार मानले. डॉ. अनिकेत सध्या वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. गणपतराव देशमुख यांच्या जागी शेकापने भाऊसाहेब रुपनर यांची उमेदवारी जाहीर केल्यावर कार्यकर्त्यांत मोठी नाराजी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रयतने शैक्षणिक धोरणात सकारात्मक बदल घडविले

$
0
0

शरद पवार यांचे प्रतिपादन; एन. नारायण मूर्ती, अनु आगा यांचा सन्मान

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन रयतच्या माध्यमातून महाराष्ट्रात शिक्षणाचे जाळे निर्माण केले. कर्मवीरांनी लावलेल्या या रोपट्याचे महावृक्षात रुपांतर झाले आहे. या महावृक्षाच्या छायेत गेल्या शंभर वर्षांत ज्ञानाने संपन्न असणारी एक फळी निर्माण झाली आहे. रयत शिक्षण संस्थेने समाजाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या शैक्षणिक धोरणात नेहमीच सकारात्मक बदल घडविले आहेत. त्याचा चांगला परिणाम समाज जीवनावर झालेला पहावयास मिळतो आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर समाधी परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

या वेळी इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती व माजी राज्यसभा सदस्य अनु आगा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेने रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने अनु आगा यांना, तर इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मनोगत व्यक्त करताना अनु आगा म्हणाल्या, 'आपल्या देशात आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी, कुटुंब नियोजन लोकसंख्या नियंत्रण, गरिबी, कुपोषण या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. देशासमोरीलही गंभीर आव्हाने सोडवण्यासाठी व्यक्ती, सेवाभावी संस्था, उद्योजक तसेच युवक अशा सर्वांनी वेळ, कौशल्य, ज्ञान देऊन हे प्रश्न सोडविले पाहिजेत.'

नारायण मूर्ती म्हणाले, 'कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली संस्था अविरत परिश्रम करीत निष्ठेने शंभर वर्षे समाजाची सेवा करीत आहेत. निष्ठा आणि शिस्त घेऊन कृतीशील प्रवास केला आहे. खरोखरच पिण्याचे पाणी, मानवी संसाधन विकास, प्रदूषण हे प्रश्न आजही आहेत. गेल्या साठ वर्षांत ग्रामीण शहरी, गरीब श्रीमंत भेदभाव तसेच राहिले आहेत. लोकशाही स्वच्छ भारत, मेरा भारत महान, हे सर्व चांगले आहे. मात्र, त्यासाठी आपण चांगल्या मूल्यांचा अंगीकार केला पाहिजे.'

रयतचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील म्हणाले, '१९१९ ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली, तेव्हापासून शंभर वर्षांच्या वाटचालीत कर्मवीर अण्णांनी सुरुवाती पासूनच उद्योग आणि शिक्षण यांची सांगड घातली. १९९४नंतर भारताला आर्थिक स्वातंत्र मिळाले आहे. यामध्ये तंत्रज्ञान, इंग्रजी भाषा व व्यक्तीमत्वाला महत्व आले आहे. कस्तुरीरंगन कमिटीने नवीन शैक्षणिक धोरणात अनेक क्रांतिकारक बदल केलेले आहेत. रयत शिक्षण संस्थेने या पूर्वीच अनेक धोरणाची पूर्तता केलेली आहे. संस्थेने रयत विज्ञान परिषदेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संशोधक तयार केले आहेत व त्यांच्या संशोधनासाठी पेटंट मिळविण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.'

...............

ओळी

रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने अनु आगा यांना सन्मानित करताना शरद पवार.

.......

इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करताना शरद पवार.

..................

ªªªªªªªªªªªªªªªªªªªªªªª

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजे, शिवेंद्रराजेंची पदयात्रा

$
0
0

ªªªªªªªªªªªªªªªªªªªªªªª

कोरेगावमधून रणजित भोसले अपक्ष

सातारा :

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून युवा सेनेचे सातारा जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांना डावलून ऐनवेळी भाजपतून आलेल्या महेश शिंदे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने रणजित भोसले यांनी बंडखोरी केली आहे. भोसले यांनी माघार येऊ नये यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. गेल्या तीन वर्षांपासून रणजित भोसले यांनी आमदारकीसाठी चांगली तयारी केली होती. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आपल्या बंधूला पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आणले होते.

...........

उदयनराजे, शिवेंद्रराजेंची पदयात्रा

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'सातारकर आणि राजघराण्याचे ऋणानुबंध फार जुने आहेत. सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी, सातारा शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राजघराण्यातील प्रत्येक व्यक्तीने सक्षमतेने काम केले आहे. सामाजिक ऐक्य, जातीय सलोखा टिकवण्यात आणि सातारकरांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध राहू,' अशी ग्वाही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षांच्या महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महायुतीचे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात पदयात्रा सुरू आहेत. या प्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. या वेळी उदयनराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदयात्रेचा प्रारंभ गारेचा गणपती (चिमणपुरा पेठ) येथून गणरायाच्या दर्शनाने झाल्यानंतर पदयात्रा कारंडबी नाका, कृष्णेश्‍वर पार्क, गोखले हौद, चिरमुले शाळा, शाहू बोर्डींग, अभ्यंकर गणपती, मंगळवार तळे, विठोबाचा नळ, जलमंदीर पॅलेस, सुरुची बंगला, जाधववाडा, कोटेश्‍वर मैदान, ऐक्य प्रेस, राधिका चौक ते मोती चौक या मार्गावरुन गेली आणि मोती चौक येथे पदयात्रेची सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधाकर परिचारकांचा महायुतीकडून अर्ज

$
0
0

सुधाकर परिचारकांचा महायुतीकडून अर्ज

भाजपच्या समाधान आवताडेंची बंडखोरी

पंढरपूर :

उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अंतिम दिवशी महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांनी विराट शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार रणजित निंबाळकर, सदाभाऊ खोत, प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, कल्याणराव काळे आदी नेते उपस्थित होते.

८३ वर्षांचे सुधाकर परिचारक उमेदवारी दाखल करणार असल्याने पंढरपूर व मंगळवेढ्यातून हजारो कार्यकर्ते शिवाजी चौकात जमा झाले होते. सुधाकर परिचारक यांनी २५ वर्षे पंढरपूरची आमदारकी ताब्यात ठेवल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, दहा वर्षांपूर्वी मोहिते-पाटील यांच्यासाठी मतदारसंघ सोडल्यानंतर ते राजकारणातून अलिप्त झाले होते. यंदा दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांना रयत क्रांतीकडून रिंगणात उतरविल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

दरम्यान, कॉँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, भारत भालके भाजपचे उद्योजक समाधान आवताडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. भालके यांनी गुरुवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, शुक्रवारी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म जोडून अर्ज त्यांनी स्वतः दाखल केला. या वेळी त्यांना आघाडी असताना ही काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीराव काळुंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, 'या बाबत मला काही माहित नाही. त्या पक्षाच्या अध्यक्षांना विचारा. मी शुक्रवारी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल केला आहे. मला याची चिंता नाही कारण माझी विधानसभा विजयाची सुरूवात अपक्ष उमेदवारीने झाली आहे.' गत निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेले समाधान आवताडे यांनी यंदा अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू

$
0
0

विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू

सातारा :

मणकर्णवाडी (ता. माण) येथील इयत्ता पाचवीत शिकत असलेली विद्यार्थिनी साक्षी संतोष जगदाळे ही मैत्रिणी बरोबर ओढ्यावर कपडे धुवायला गेली होती. ओढ्यावरील बंधाऱ्यात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने मणकर्णवाडीसह पळशी येथील विद्यालयात शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माढ्यात वीस अर्ज दाखल

$
0
0

माढ्यात वीस अर्ज दाखल

पंढरपूर

माढा विधानसभा मतदारसंघात एकूण वीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यंदाही राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधकांची एकी न झाल्याने शिंदे यांचे पारडे जड वाटत आहे. शिंदे यांच्या विरोधात एकास एक लढत देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार हालचाली सुरू होत्या. मात्र, ही जागा शिवसेनेला गेल्याने आणि याची जबाबदारी असलेले जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांना विरोधकांची मोट न बांधता आल्याने महायुतीच्या संजय कोकाटे यांच्यासह शिवाजी कांबळे, दादासाहेब साठे आणि मीनल साठे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. युतीसह आघाडीतही या ठिकाणी बंडखोरी झाली असून, राष्ट्रवादीकडून राजू पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी देखील वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेच्या पोटनिवडणुकीतशरद पवारांचा अपमान भरून काढा

$
0
0

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत

शरद पवारांचा अपमान भरून काढा

राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, कराड

'लग्नामध्ये वाडपी आपल्या ओळखीचा बघून माणसं पंगतीत बसतात. तसेच या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, मी व बाळासाहेब पाटील या आपल्या वाडप्यांच्या पंगतीला बसा. आपल्या जिल्ह्याला पाच मुख्यमंत्री मिळाले. हे जाणून यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर आबांचा सातारा येत्या २१ तारखेला राज्यात गाजवा. २४ तारखेला यशवंतराव चव्हाण यांची परंपरा कायम राखत शरद पवारांचा सातारा जिल्ह्यात जो अपमान झाला आहे. तो भरून काढण्यासाठी हात आणि घड्याळ्याच्या चिन्हाला मतदान करा,' असे आवाहन लोकसभेचे कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी केले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांचा गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्या नंतर सायंकाळी चव्हाण यांची कराडमध्ये भव्य रॅली झाली. कराडच्या नगरपालिकेजवळ झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले, 'पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षांत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राहून जे काम केले आहे. त्याची मोजदाद करणे अवघड आहे. बाळासाहेब पाटील यांनी चार वेळा आमदार राहून आपल्या घराण्याची विकासाची परंपरा जपली आहे. काल-परवापर्यंत आपण प्रचाराला जायचे एवढेच चित्र होते. पण वरून एक माळ येते आणि ती आपल्या गळ्यात पडते. मतदारराजा म्हणतो की, तुम्हीच उमेदवारी घ्या. माझ्याकडे माणसं येवून त्यांनीच मला उभे केले आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी तीन वेळेस खासदारकी लढवली. त्यांना माझ्या उमेदवारीबाबत विचारात घेतले गेले. कसलीही तयारी नसताना मला उमेदवारी मिळाली आहे. कुस्तीच्या मैदानात हिंदकेसरी पैलवानाला जोड मिळाली नाही तर त्याला वाटखर्ची देतात. तशी जनतेने मला दिल्लीला जाण्यासाठी विजयी मतांच्या रुपाने वाचखर्ची द्यावी.'

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, '२० वर्षानंतर दोन्ही कॉँग्रेसनी मजबूत आघाडी केली आहे. हे दोन्ही भाऊ २०१४ साली झालेली चूक पुन्हा करणार नाहीत. भाजपने विरोधी पक्ष संपविण्याचे आवाहन दिले आहे. दहशतीच्या जोरावर अनेक नेतेमंडळी पक्ष सोडून गेली. परंतु ज्यांनी संस्था चांगल्या चालवल्या आहेत. ते पक्षाबरोबर ठाम राहिले आहेत. त्यामध्ये बाळासाहेब पाटील हे एक आहेत. मी देखील सीबीआय खात्याचा मंत्री होतो. पण, सध्याच्या सरकारप्रमाणे सीबीआयचा गैरवापर मी कधी केला नाही. दिल्लीत मोदी व शहा या जोडगोळीची हुकूमशाही सुरू आहे.'

ओळ

कराड येथील प्रचार सभेत बोलताना श्रीनिवास पाटील, व्यासपीठावर पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळशिरसमधून राम सातपुतेंचा अर्ज

$
0
0

माळशिरसमधून राम सातपुतेंचा अर्ज

पंढरपूर

मोहिते-पाटील यांच्यामुळे हाय प्रोफाइल मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या माळशिरस राखीव मतदारसंघातून यंदा भाजपने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते राम सातपुते यांना उमेवारी जाहीर केली होती. सातपुते यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर यांना डावलून सातपुते यांना संधी दिली आहे. जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू, अशी ओळख असल्याने भाजपने राम सातपुते यांना येथून उमेदवारी दिली आहे. जयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत सातपुते यांनी आपली उमेदवारी दाखल केली.

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले राम सातपुते बीड जिल्ह्यातील आष्टी गावाचे असून, त्यांचे वडील मोहिते-पाटील यांच्या सहकार महर्षी साखर कारखान्यावर ऊस तोडीसाठी येत असत. राज्यातील अनेक दिग्गज या सुरक्षित मतदारसंघातून उमेदवारीसाठी धडपडत असताना मोहिते-पाटील यांनी थेट एका ऊसतोड मजुराच्या मुलाला निवडून आणायची जबाबदारी घेतल्याने अनेक इच्छुक नाराज झाले आहेत. 'मी पहिल्यापासून संघाचे काम करीत आलो आहे. सध्या भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्ष आहे. घराची परिस्थिती अतिशय हलाखीची असली तरी मुख्यमंत्री व मोहिते पाटील यांनी टाकलेली जबाबदारी समर्थपणे पेलू,' असे राम सातपुते यांनी म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवारी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीची उमेदवारी घेतलेले उत्तमराव जानकर यांनी ही राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी २२ उमेदवारांकडून ३० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्तर’मध्ये दुरंगी लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना, काँग्रेस, माकप, महाराष्ट्र क्रांती सेना, वंचित बहुजन आघाडीसह पाचजणांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार असले, तरी खरी लढत शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मतदारसंघाला दुरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

युतीच्या निर्णयात उत्तर मतदारसंघ कोणाकडे जाणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. सेनेने मतदारसंघावर हक्क अबाधित ठेवत क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांच्याविरोधात उमेदवारच निश्चित होत नव्हता. काँग्रेसकडून अनेक दिग्गजांनी मुलाखती दिल्या, तरी अखेरपर्यंत उमेदवारीचा घोळ सुरू राहिला. क्षीरसागर यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी तगड्या उमेदवाराचा शोध सुरू होता.

अर्ज दाखल करण्यास एक दिवस शिल्लक असताना उद्योगपती चंद्रकांत जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यांचे भाऊ संभाजी जाधव व पत्नी जयश्री जाधव भाजपच्या नगरसेवक असताना जाधव यांच्या उमेदवारीने विविध चर्चा झडल्या. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत शुक्रवारी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आमदार क्षीरसागर विरुद्ध जाधव अशा दुरंगी लढतीचे स्वरूप या मतदारसंघात प्राप्त झाले आहे. मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपचा उमेदवार रिंगणात नसला तरी त्यांची उल्लेखनीय अशी मते आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीत महेश जाधव यांना ४० हजार मते मिळाली होती. भाजपबरोबरच्या पूर्वीच्या संबंधाचा फायदा घेत जाधव यातील मते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. माकपचे सतीशचंद्र कांबळे, वंचितचे राहुल राजहंस, बसपचे अजय कुरणे, महाराष्ट्र क्रांती सेनेचे भरत पाटील यांच्यासह संभाजी साळुंखे, अमित अतिग्रे, मुश्ताक मुल्ला, सलीम बागवान, प्रसाद पाटील व ईश्वर चन्नी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

००००

दोघांचीही मदार पेठांवर

शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह जुन्या पेठांमध्ये नेहमीच शिवसेनेची मदार राहिली आहे. सेनेच्या उमेदवाराला येथून नेहमीच भरघोस मतांचे दान मिळाल्याचा इतिहास असला, तरी मंगळवार पेठेतील जाधव यांच्या उमेदवारीमुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. जाधव यांनी विविध फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून विविध संघांपर्यंत त्यांचा थेट संपर्क असतो. त्यामुळे सेनेचा पारंपरिक मतदार आणि जाधव यांचा संपर्क यामुळे दोघांचेही पेठांमधील मतदारांवर लक्ष अधिक केंद्रित करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत जाधव यांची ९७ कोटींचे धनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील उत्तर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले चंद्रकांत जाधव यांनी प्रतिज्ञापत्रात ९६ कोटी ८६ लाखांवर मालमत्ता दाखवली आहे. करवीरचे शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्नीसह तीन मुलांच्या नावे एकूण मालमत्ता ९ कोटी ७ लाख ५ हजार ५५ रूपये असल्याचे उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. नरके यांनी उत्पन्नाचे स्त्रोत शेती तर जाधव यांनी उद्योग दाखवला आहे.

आमदार नरके यांनी तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात येण्यासाठी अर्ज दाखल केला. ते येथील शिवाजी पेठेत राहतात. उत्पन्नाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी सोने, शेती, वाहने, घर यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी आयकर विवरणपत्रात दाखवलेल्या पाच वर्षातील उत्पन्नावर नजर टाकल्यास प्रत्येक वर्षात उत्पन्न वाढत गेल्याचे दिसले. सन २०१५-१६ मध्ये त्यांचे उत्पन्न ६ लाख २० हजार ५१६ रूपये होते. २०१९-२० मध्ये १७ लाख १६ हजार २०७ रूपये उत्पन्न झाले आहे. संभाजीनगरात प्लॉट, शिवाजी पेठेत घर, शाहूपुरीतील शशी चेंबर्समध्ये दुकानगाळा, सदनिका आहे.

चंद्रकांत जाधव यांच्या नावे जाधव इंडस्ट्रिज, प्रेमला पिक्चर्स, जाधव टूल्स, जाधव बेवरेजेस, जाधव मेटल्स तर त्यांच्या पत्नींच्या नावे प्रेमला इंडस्ट्रिज असे उद्योग आहेत. त्यांनी भरलेल्या आयकर विवरण पत्रात सन २०१७ - १८ मध्ये ७ कोटी १८ लाख २३ हजार ६३० रूपयांचे वार्षिक उत्पन्न दाखवले आहे.

राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात १ कोटी ४७ लाख ७९१ रूपयांची मालमत्ता दाखवली आहे. त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे. आयकर भरलेल्या उत्पन्नात आबिटकरांचे २०१४-१५ मध्ये ५ लाख ४९ हजार उत्पन्न होते. २०१८-१९ मध्ये २० लाख ९४ हजारांचे उत्पन्न झाले आहे. उत्पन्नाचे स्त्रोत शेती, व्यवसाय असल्याचे म्हटले आहे.

...

चंद्रदीप नरके

एकूण मालमत्ता : ९ कोटी ७ लाख

जंगम मालमत्ता : १ कोटी ७२ लाख

स्थावर मालमत्ता : ७ कोटी २७ लाख

रोख : स्वत:कडे ३ लाख ८३ हजार, पत्नी राजलक्ष्मीकडे २ लाख ३६ हजार

सोने : स्वत:कडे १६ लाख ३० हजार, पत्नी २२ लाख ८० हजार रूपयांचे

चांदी : स्व:ताकडे १ लाख ४४ हजार, पत्नीकडे २८ हजार.

शेती (कुटुंबांकडे) : ३३ एकरांवर

कर्ज : १८ लाख ७१ हजार

वाहने : तीन

...

प्रकाश आबिटकर

एकूण मालमत्ता : १ कोटी ४७ लाख

रोख : ३६ हजार

जंगम : ४६ लाख

स्थावर : १ कोटी

वाहने : दोन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ ऑक्टोबरपासून फिल्म फेस्टिव्हल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम येथील विंटेज फिल्म फाउंडेशनतर्फे ५ ते ६ ऑक्टोबरअखेर शाहू स्मारक भवनात विंटेज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल होणार आहे. यासाठी भारतासह २१ देशांतील २१० लघुपट आले होते. त्यातून निवडलेल्या दर्जेदार ७२ कलाकृती रसिकांना या फेस्टिवलमध्ये विनामूल्य पाहण्यास मिळेल, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भोईराजे, चेतन पडोळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, फेस्टिवलचे उदघाटन ५ ऑक्टोबरला साडे अकरा वाजता 'नेटिव्ह' या माहितीपटाने होणार आहे. यामध्ये भारतातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही तीव्रपणे प्रकाझोत टाकण्यात आला आहे. जागतिक चित्रपटांमध्ये इराण या देशाचा चांगलाच दबदबा आहे. तेथील लघुपटकर्त्यांनी बनविलेल्या लघुपटांचा आस्वाद 'कंट्री फोकस-इराण' या सदरात घेता येईल. ॲनिमेशन विभागात 'नाऊ युवर होम' (प्रसाद महेकर) या कोल्हापूरच्या लघुपटाची निवड झाली. या शिवाय स्थानिक लघुपटकर्त्याना प्रोत्साहन देण्यासाठी 'कोल्हापूर प्रिझम' या विभागात 'दृष्टिकोन' (अरुण अडसूळ), 'धागा' (सिद्धार्थ बदी), 'घुसमट' (मुकुंद खुपेरकर) हे लघुपट दाखविण्यात येणार आहे. फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरापासून 'मी'पासून लघुपटांच्या सादरीकरणाराला सुरूवात होईल. याच दिवशी लघुपटकर्त्यांना व रसिकांना ज्युरींशी संवाद व्हावा, चित्रपट आणि सादरीकरणाविषयी, जुरी प्रोसेस विषयी माहिती मिळण्यासाठी 'मीट द ज्युरी' हे डॉ. अनमोल कोठाडिया यांचे विशेष सत्र होईल. याला सायंकाळी साडेसहा वाजता प्रारंभ होईल. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्राप्त लघुपट, माहितीपट, म्युझिक व्हिडिओंना सन्मानित करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक: शरद पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'युतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचे सांगितले. त्यांना राज्यातील गरिबी, बेरोजगारी दिसत नाही. केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक आहे. सर्वधर्मियांचा सन्मान राखण्यासह सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी राज्यातील निवडणूक महत्त्वाची आहे,' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केलं.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या शरद पवार यांनी आज सकाळी पंचशील हॉटेलात आघाडीच्या उमेदवारांशी संवाद साधला. प्रचारात कोणते मुद्दे असावेत याबाबत त्यांनी उमेदवारांना सूचना केल्या. उमेदवारांना वैयक्तिक मार्गदर्शनही त्यांनी केले. ते म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीचे विचार मांडले. त्यांना राज्यातील गरिबी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आर्थिक मंदी दिसली नाही. त्यांनी केवळ हिंदुत्वाचा विचार मांडला. या देशात सर्वधर्मीय संस्कृती असताना केवळ हिंदुत्ववादाचा विचार मांडणे देशासाठी घातक आहे. विकासाचे मुद्दे नसल्याने त्यांना हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागत आहे. सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे घातक असल्याने सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्ती थोपवणे गरजेचे आहे. या दृष्टीने निवडणूक राज्यासह देशासाठीही महत्त्वाची आहे,' असं ते म्हणाले.

वाचा: युतीचे सरकार जनताच उलथवेलः शरद पवार

'आघाडीतील बंडखोरांचीही त्यांनी कानघडणी केली. ते म्हणाले, 'चुकीच्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. एकजुटीने लढण्याची ही वेळ आहे. अशावेळी नाराजी सोडून सर्वांनी एकत्र यावे. कोल्हापूर हा प्रगतशील विचारांचा जिल्हा आहे. शाहू महाराजांच्या विचारांची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरात तत्वनिष्ठ राजकारण होते. कोल्हापुरातील विचार आम्ही जगभर मांडतो. गेल्या निवडणुकीत मात्र, शाहू-फुले यांच्या विचारांपासून जिल्ह्याने फारकत घेतली. कोल्हापुरात सेना-भाजप वाढणे हे शाहू महाराजांच्या विचारांशी सुसंगत नाही. यामुळे काहीही झाले तरी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झालेच पाहिजे. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास हे अशक्य नाही.' माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे यांच्यासह व्ही. बी. पाटील व आघाडीचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांनी मागवली आघाडीतील बंडखोरांची यादी; कारवाईचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीत युतीला रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आघाडी केल्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरून नेत्यांनाच आव्हान दिले आहे. शरद पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून, शनिवारी आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांसोबत घेतलेल्या बैठकीत कडक शब्दांत सूचना दिल्या. काँग्रेसमधील बंडखोरांसाठी ते सोनिया गांधींशीही चर्चा करणार आहेत.

वाचा: केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक: पवार

विधानसभा निवडणुकीत खासदार शरद पवार हे आघाडीच्या नेतृत्वाची धुरा एकहाती सांभाळत आहेत. युतीला रोखण्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर नेत्यांशी चर्चा करून आघाडीची मोट बांधली. यासाठी जागावाटपात काही ठिकाणी तडजोडीचीही भूमिका स्वीकारली. ते स्वत: दिवस-रात्र प्रचारात व्यग्र आहेत. आघाडीला तरुणांचा प्रतिसाद वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरांनी उसळी घेतल्याने पवार यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. शुक्रवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीच्या बंडखोरांबाबत पवार यांच्याकडे तक्रार केली होती. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील आमदार भारत भालके यांनीही कॉँग्रेसच्या नेत्यांसोबत तक्रार केली होती. याबाबत पवार यांनी शनिवारी सकाळी आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बंडखोरांना रोखण्याच्या सूचना केल्या. आघाडीतील प्रत्येक नेत्याने त्यांच्या जिल्ह्यातील बंडखोरांची समजूत घालावी, असे त्यांनी सांगितले. जे आघाडीसोबत राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसमधील बंडखोरी रोखण्यासाठी स्वत: सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

वाचा: युतीचे सरकार जनताच उलथवेलः शरद पवार

राज्यात आघाडीच्या बंडखोरांची यादीच त्यांनी मागवून घेतली आहे. त्यांना वैयक्तिक फोन करून माघार घेण्याचे आवाहन केले जात आहे. शिरोळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या बंडखोरीची गंभीर दखल त्यांनी घेतली. त्यांनी स्वत: बैठकीतूनच यड्रावकर यांना फोन लावला. मात्र, यड्रावकरांशी संपर्क झाला नाही. त्यांना निरोप पोहोचवून माघार घेण्यास सांगितले जाईल. यानंतरही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास पक्षाकडून कारवाई होईल. राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवारासोबत राहतील, असे त्यांनी माजी खासदार शेट्टी यांना सांगितले. काही अपक्षांना भाजपची अप्रत्यक्ष मदत मिळण्याची शक्यता असल्याने आशा अपक्षांवरही नजर ठेवण्याचे आवाहन त्यांनी बैठकीत केले.

विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फिल्म फेस्टिव्हल विचारमंथन चळवळ ठरावी’

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सिनेमाच्या माध्यमाला कुठल्याही सीमारेषा नाहीत. भाषा, प्रांतापलीकडील लोकांना एकत्र जोडणारी आणि त्यांच्या समस्यांचे वेध घेणारे हे एक प्रभावी माध्यम आहे. फिल्म फेस्टिव्हलही कलाविषयक अभिरुची उंचावणारी व विचारमंथनाची चळवळ ठरावी,' असे मत सिने अभ्यासक व शिवाजी विद्यापीठातील इंग्रजी विभागातील प्रा. चंद्रकांत लंगरे यांनी व्यक्त केले.

विंटेज फिल्म फाउंडेशनतर्फे दुसऱ्या विंटेज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला शनिवारी प्रारंभ झाला. या दोन दिवसीय महोत्सवात जगभरातील शॉर्ट फिल्मचा समावेश आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी लंगरे बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे महोत्सव सुरू आहे. महोत्सवात डच, फ्रेंच, जर्मनी, पोर्तुगीजसह विविध भाषांतील शॉर्टफिल्म आहेत.

प्रा. लंगरे म्हणाले, 'कोल्हापूरला सिनेमानिर्मितीचा मोठी परंपरा लाभली आहे. या कलानगरीत आंतरराष्ट्रीय धर्तीवरील शॉर्ट फिल्म महोत्सव होत आहे. त्याद्वारे सिनेमा चळवळीला चालना मिळणार आहे. प्रत्येक कलाकृतीमध्ये एक वेगळा आशय असतो. लघुपट असो वा सिनेमा, त्यामध्ये मानवी भावभावनांचे प्रतिबिंब उमटलेले असते. लोकांच्या समस्यांचा वेध घेतलेला असतो. लोकांच्या समस्या सारख्या असतात. सिनेमातून त्या परिणामकारकपणे लोकांपर्यंत पोहोचविल्या जातात. महोत्सवामुळे वेगवेगळ्या देशांतील कलाकृतीचा सखोल अभ्यास, सखोल चिंतन झाले पाहिजे.'

याप्रसंगी सिने अभ्यासक व परीक्षक अनमोल कोठाडिया यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटनानंतर 'इराणी' भाषेतील 'नेटिव्ह' ही शेतकऱ्यांच्या 'जलिल अँड खलिल' हा दोन भावांवर आधारित शॉर्टफिल्म दाखविली. दरम्यान, फाउंडेशनचे प्रमुख सचिन भोईराज यांनी प्रास्ताविक केले. चेतन पडोळे यांनी स्वागत केले. सायली कुलकर्णी यांनी आभार मानले.

००००

कोल्हापुरातील कलाकृतींचा समावेश

कोल्हापुरातील कलाकारांनी बनविलेल्या 'धागा', 'दृष्टिकोन' आणि 'घुसमट' या शॉर्टफिल्मचा समावेश आहे. महोत्सवाच्या माध्यमातून कोल्हापुरातील कलाकारांच्या कलानिर्मितीचा आस्वाद लुटता येणार आहे. रविवारी 'धागा' आणि 'दृष्टिकोन' दाखविण्यात येणार आहेत. तसेच 'नाऊ युवर होम' ही अॅनिमेशन कलाकृती महोत्सवात आहे. शनिवारी घुसमट प्रदर्शित झाला.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षीरसागर, मंडलिक यांच्यावर भाजपची टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेनेचा प्रचार करायचा का? युती धर्माचे पालन फक्त भाजपनेच का करायचे? महानगरपालिकेच्या राजकारणात भाजपला सत्तेपासून वंचित ठेवणाऱ्या सेनेला मदत का करायची? अशा प्रश्नांची सरबत्ती करत भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि खासदार प्रा. संजय मंडलिकांवर तीव्र शब्दात टीका केली. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे पालन करा. सर्वांनी प्रचारात सहभागी झाले पाहिजे अशा स्पष्ट सुचना दिल्या. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा देण्यात आला.

निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी भाजपने बिंदू चौकातील कार्यालयात कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र पदाधिकाऱ्यांनी आमदार क्षीरसागर आणि खासदार मंडलिक यांच्यावर टीका केल्याने बैठकीचा नूर पालटला.

'क्षीरसागर यांच्या पहिल्या विजयात भाजपचा वाटा असताना गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकदाही भाजप कार्यालयाला भेट दिलेली नाही. पालकमंत्री पाटील यांच्या संपत्तीची ईडीतर्फे चौकशीची मागणी करणाऱ्या क्षीरसागरांचा प्रचार करणार नाही' असे स्पष्टपणे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली. 'प्रत्येक निवडणूकीत भाजपनेच युतीचे पालन का करायचे?' असा प्रश्न उपस्थित करत 'यंदा भाजपने सेनेचा प्रचार करू नये,' अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. शिवाजी पेठ आणि जुना बुधवार पेठेतील दोन कार्यकर्त्यांनी युतीचे पालन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. महापालिका निवडणूकीत भाजपने चांगले यश मिळवून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत केल्याने भाजप सत्तेपासून वंचित राहिली, असा आरोप नगरसेवकांनी केला.

कार्यकर्त्यांचा मते ऐकून घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्षापर्यंत कळवल्या जातील असे सांगितले. युती झाल्याने सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेचा प्रचार करावा लागेल, असे स्पष्ट केले. भाजपमध्ये बंड चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. लोकसभा निवडणूकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई केली याकडे त्यांनी लक्ष वेधताना या निवडणूकीत विरोधी प्रचार केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांना दिला.

बैठकीला सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, संतोष भिवटे, मारुती भागोजी, सुरेश जरग, तुषार देसाई, हेमंत आराध्ये, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे पाटील आदी उपस्थित होते.

मंडलिकांची भूमिका खपवून घेतली जाणार नाही

लोकसभा निवडणूकीत प्रा. मंडलिक यांच्या विजयात भाजपने जीवाचे रान केले होते, याची आठवण कार्यकर्त्यांनी करून दिली. कोल्हापूर दक्षिणमध्ये प्रा. मंडलिक आमचे ठरलंय असे म्हणत असेल तर आम्हाला शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडू नका अशा इशाराही देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमित शहा, उद्धव ठाकरे आणि खासदार ओवेसी यांच्या सोलापुरात जाहीर सभा

$
0
0

सोलापूर :

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भाजप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या उमेदवारांसाठी नेत्यांना प्रचारासाठी आणण्याची तयारी विविध पक्षांकडून सुरू झाली आहे. सोलापुरातील एमआयएम पक्षाचे शहर मध्यचे उमेदवार फारूक शाब्दी यांच्यासह शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे. अक्कलकोट येथे १० ऑक्टोबर रोजी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होईल. या शिवाय १२ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या करमाळा येथे सेनेच्या उमेदवार रश्मी बागल, मोहोळ येथे सेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर आणि सोलापुरात शहर मध्य मतदारसंघात सेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्यासाठी जाहीर सभा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images