Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अनधिकृत फलक लावल्यास गुन्हा

$
0
0

कोल्हापूर: शहरात जाहिरातींसाठी अनधिकृत फलक लावल्यास संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या इस्टेट विभागाने दिला आहे. महापालिकेने पाच वर्षांसाठी जाहिरात प्रसिद्धीबाबत महासभेत ठराव केला आहे. त्यानुसार शहरात अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स लावल्यास गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी शुल्क भरुन परवाना घेणे आवश्यक आहे. मात्र अशी परवानगी न घेता जाहिरात प्रसिद्ध केल्यास २४ मेपासून शहर विद्रुपीकरण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा स्वरुपाची कारवाई टाळण्यासाठी शुल्क भरुन परवाना घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टिफिन बॉक्स मेकिंग कार्यशाळा शनिवारी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

टिफिन बॉक्स हा प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये खाद्यपदार्थ कोणते असावे, त्यांच्या आवडीनिवडी या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. नेमकी हीच गरज ओळखून 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'तर्फे शनिवारी (ता. २५) टिफिन बॉक्स मेकिंग कार्यशाळा आयोजित केली आहे.

राजारामपुरी सातवी गल्ली येथील हाय टी कॅफे येथे दुपारी तीन वाजता कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत विविध पदार्थ शिकवण्यात येतील. यामध्ये आलू कुरकुरे बॉक्स, आलू पनीर बर्ड नेस्ट, पेरी पेरी सँडविच, चिली चीज सँडविच, मटार पॅटीस हे पदार्थ शिकवले जातील. कार्यशाळेतील सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. सुट्टीच्या कालावधीत ही कार्यशाळा होत आहे.

या कार्यशाळेसाठी 'मटा कल्चर क्लब' सभासदांना २५० रुपये शुल्क आहे. तर इतरांना ४०० रुपये शुल्क आहे. कार्यशाळेविषयक अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९७६७८९०६२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच या क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारेही नोंदणी करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंधळ घातल्यास जागेवर कारवाई

$
0
0

मतमोजणी केंद्र परिसरात सशस्त्र बंदोबस्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. मतमोजणी केंद्र परिसरात दंगा करणाऱ्या हुल्लडबाजांवर, चेतावणी देणाऱ्यांवर जागेवरच कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, मग तो कोणीही असो', अशा कडक सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या. दरम्यान, शहरात रात्री प्रमुख चौकात नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात आली.

नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी कोल्हापुरातील रमणमळा व राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोडावूनच्या ठिकाणी मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गांत बदल केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. साध्या वेशातील पोलिसांची विशेष पथके रस्त्यावर असणार आहेत. व्हिडीओ कॅमेरा, सीसीटीव्हींची नजरही कार्यकर्त्यांवर असणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या हालचालीवर पोलिस लक्ष ठेवून असणार आहेत. पोलिसांची गोपनीय यंत्रणा कार्यकर्त्यांच्यात मिसळून हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार, हवालदार, कॉन्स्टेबल, होमगार्ड यांच्यासह राज्य राखीव दल, जलद कृती दल अशी सुमारे पाच हजार जणांची फौज रस्त्यावर असणार आहे. पोलिसांनी पहिल्यांदाच आजी-माजी नगरसेवक, राजकीय, सामाजिक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निकालादिवशी शहर व तालुक्यातून दोन दिवसांसाठी हद्दपार केले आहे. या कारवाईची धास्ती कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

..........

कोट

'जनतेने दिलेल्या मतांचा कौल सर्वांनी स्वीकारावा. कोणीही कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल.

डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी दिवसभर करतात काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कृषी अधिकारी म्हणून दिवसभर आपण किती शेतकऱ्यांना भेटला? राज्य सरकारच्या किती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या? एसएमएस केला म्हणजे आपली जबाबदारी संपली का? अशी प्रश्नांची सरबत्ती करत कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी खरीप आढावा बैठकीत कृषी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. दोन-तीन अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी बैठकीत प्रश्न विचारल्यानंतर ते निरुत्तर झाले.

राज्य सरकारचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने खरीप आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डी. डी. वाकुरे, जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल, कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विभाग व एमएसईबीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. ६० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून असताना, फिल्डवर जाऊन किती शेतकऱ्यांना भेटला?, त्यांच्या समस्यांचे निराकरण केले का? राज्य सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या, आदी प्रश्न तीन ते चार अधिकाऱ्यांना विचारत संपूर्ण कृषी विभागाचीच झाडाझडती घेतल्याचे समजते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, 'सात लाख ७६ हजार हेक्टरपैकी अडीच लाख हेक्टरवर ऊस क्षेत्राची नोंद असून भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी आदी पिकांची सुमारे तीन लाख ९३ हजार हेक्टरवर पेरणी होईल. शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यासाठी २,३०० कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी जिल्हा बँक, राष्ट्रीयीकृत बँकांनी तयारी केली आहे. गेल्या काही वर्षांत शेतीचे धारणक्षेत्र कमी होत आहे. परिणामी कमी क्षेत्रात अद्ययावत साधनांचा वापर करता येत नाही. त्यासाठी गटशेतीला राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. गेल्यावर्षी स्थापन झालेल्या २० गटांपैकी १३ गटांना एक कोटीचा निधी दिला. तसेच शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादन विक्रीसाठी कंपन्यांची स्थापना करून ब्रँडिंग करावे, त्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.'

१८ हजार वीजजोडण्या प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पाटील म्हणाले, 'शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. जिल्ह्यात केवळ आठ हजार वीजजोडण्या शिल्लक असून, मार्च २०२० पर्यंत सर्व वीजजोडण्या पूर्ण केल्या जातील. तसेच एकूण ऊस क्षेत्रापैकी एक लाख हेक्टर ऊसक्षेत्रावर ठिबक सिंचन योजना कार्यन्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.'

०००००

चौकट...

लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करा

शेतकरी खताची खरेदी करताना कृषी सेवा केंद्र लिंकिंग करत असून, माहिती देऊनही कृषी विभाग कारवाई करत नसल्याचे कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी अशा लिंकिंग करणाऱ्यांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात शिंदे पराभूत; माढ्यात राष्ट्रवादीचा पराभव अटळ

$
0
0

सोलापूर :

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मात केली आहे तर माढा हा राष्ट्रवादीचा गड भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जवळपास सर केला आहे.

सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली. यात स्वामींनी बाजी मारली आहे. मतविभाजनाचा थेट फायदा स्वामींना झाला आहे.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार महास्वामी यांनी ५ लाख २४ हजार ९८५ मते मिळवत विजय संपादन केला आहे. शिंदे यांना ३ लाख ६६ हजार ३७७ तर आंबेडकर यांना १ लाख ७० हजार ७ मते मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडे यांनी शिंदे यांना पराभवाचा धक्का दिला होता.

माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. राष्ट्रवादीच्या या गडात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेलं बळ भाजपला विजयपथावर घेऊन गेलं आहे. येथे भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांच्यावर ८४ हजार ७५० मतांची भक्कम आघाडी घेतली आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या हातून निसटल्यात जमा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयसिंह मोहिते पाटील २५ हजार ३४४ मतांनी विजयी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेलाही सेना, भाजप एकत्रच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य व्यक्तीसाठी केलेल्या कामामुळे देशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी कामकाजामुळे शिवसेना, भाजपला चांगले यश मिळाले आहे. यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीतही घटक पक्षांना जागा देऊन शिल्लक राहिलेल्या जागा पन्नास पन्नास टक्के वाटून घेत शिवसेना, भाजप एकत्रच लढवेल', अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, 'लोकसभा निवडणूक देशाचे धोरण, सुरक्षितता या मुद्यावर होत असते. विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे आणि सहज उपलब्ध होणारा उमेदवार कोण आहे, असा विचार मतदार करतात. यामुळे विधानसभेची निवडणूक वेगळ्या पध्दतीने लढवली जाईल. रिपब्लिकन पार्टी, रासप, शिवसंग्राम, रयत संघटना अशा घटक पक्षांना जागा देऊन शिल्लक जागा निम्यानिम्या भाजप आणि शिवसेना वाटून घेईल. बारामतीसह सर्व जागा जिंकू असा विश्वास पहिल्यापासून व्यक्त केला होता. मात्र बारामतीमध्ये अंदाज चुकला. पण तेथील पराभवाचे खापर एव्हीएमवर फोडणार नाही. पराभव मान्य करून तेथील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे. काँग्रेसने देशातील सर्वच स्वायत्त यंत्रणांवर अविश्वास दाखवला. यामुळे देशात मोठा वैचारिक संघर्ष निर्माण झाला होता. यातून मार्ग काढत मोदी यांनी देशात स्पष्ट बहुमत मिळवले. जिल्ह्यात सहा आमदार आणि दोन खासदार शिवसेनेचे झाले आहेत. यामुळे दोनपैकी एका खासदारास मंत्रीपद देण्यासंबंधीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील.'

पवारांच्या घरी जाणार

'बारामतीची जागा जिंकण्याबद्दल स्वत: शरद पवार साशंक होते. तेथील जागा आता आम्ही हरलो तरी पाच वर्षानंतर जिंकणार आहे. शरद पवार, सुप्रिया सुळेंचा पराभव भाजपकडून जोपर्यंत होत नाही, तोर्यंत माझा संघर्ष सुरूच राहील. त्यासाठी पंधरा दिवसातून एकदा बारामतीत जाऊन तेथील जनेतचे प्रश्न सोडवणार आहे. तेथे भाजपचे मोठे कार्यालयही बांधले जाईल. हे करताना मैत्री म्हणून लवकरच पवार यांच्या घरी चहा प्यायला जाणार आहे', असे पाटील यांनी सांगितले.


शेट्टींचा पराभव काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्याने

पाटील म्हणाले, 'काँग्रेस, राष्ट्रवादीने राज्याची वाट लावली. त्याच पक्षाच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने राजू शेट्टी यांचा पराभव झाला. आमच्या सोबत यायचे नव्हते तर ते अपक्ष म्हणून लढले असते तर आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या लढतीची धार कमी झाली असती. मुंगी होऊन साखर खायची असते. तसे न करता उठसूठ खुर्चीचा आब न राखता पंतप्रधान, मुख्यमंत्र्यावर टीका करण्याचा व्यक्तीदोषही शेट्टींना भोवला. महाडिकांसोबतची दोस्ती कायम राहील. विधानसभेसाठी त्यांना सोबत घेण्यासंबंधी प्रमुख कार्यकर्ते, सर्व्हेचा विचार करून निर्णय घेतला जाईल.'

विजय बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण

'प्रा. मंडलिक यांच्या विजयात 'आमचं ठरलंय'चा फायदा झाला आहे. मात्र राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ'चा काहीही परिणाम मतदारांवर झाला नाही. मतदार त्यांच्या सभेकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार त्यांना बाजूला ठेवतील', असा टोलाही पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. ते पुढे म्हणाले,' केवळ तीन महिने शिल्लक राहिल्याने मुदतपूर्व विधानसभा निवडणूक होणे शक्य नाही. त्यामुळे १५ ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका होतील. पुन्हा भाजप, शिवसेनाच राज्यात सत्तेवर येईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक वर्षांपासून कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा करण्याचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरचा विजय दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण करतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोख बंदोबस्त, प्रतिबंधात्मक कारवाई

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी पोलिस प्रशासनाने सर्व ती दक्षता घेतली होती. जिल्ह्यात ४ हजारांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापूर परिक्षेत्रातही १ हजारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शहर आणि करवीरमध्ये ४०० हून अधिक जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या. लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी गेले महिनाभर पोलिस दलाने नियोजन केले.

रमणमळा येथे कोल्हापूर आणि राजाराम तलावाजवळील शासकीय गोदाममध्ये हातकणंगले मतदारसंघाच्या मतमोजणीचे नियोजन करण्यात आले. दोन्ही ठिकाणची निवडणूक अटीतटीची असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून चोख बंदोबस्त तैनात केला. ओळखपत्र असल्याशिवाय कुणालाही मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला नाही. मतमोजणीसाठी वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला. सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यावर किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईसह समाजकंटकावर सायबर सेलतर्फे करडी नजर ठेवण्यात आली. कोल्हापूर मतदारसंघातील कागल, मुरगूड, आजरा, चंदगड, भुदरगड, तर हातकणंगले मतदारसंघातील शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा, वाळवा या संवेदनशील गावांत विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. राज्य राखीव दलाची मदत घेण्यात आली. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात कार्यकर्त्यांना थांबविण्यासाठी स्वतंत्र ठिकाणे ठेवण्यात आली.

विनापरवानगी विजयी मिरवणूक काढल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग करणारे काही मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यास संबंधित पोस्ट व्हायरल करणारा आणि त्या ग्रुपच्या अॅडमिनवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सायबर शाखेकडे काहींनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याची माहिती दिली आहे. त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही मतदारासंघात ३३ ठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये पक्ष कार्यालय, उमेदवारांची निवासस्थाने, महत्त्वाच्या चौकांवर लक्ष ठेवण्यात आले. मतमोजणीच्या ठिकाणी सुमारे २०० मीटर परिसरात गुलाल, फटाके उडवण्यास, विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली ओ. मतमोजणी परिसराच्या दोनशे मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची हत्यारे, मोबाइल, कॉर्डलेस फोन, स्पीकर, खासगी वाहने नेण्यास, मजकूर छापणे-प्रसिद्ध करण्यास मज्जाव केला आहे. त्यासह ३१ मे पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राजकीय गट एकमेकांसमोर येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस दक्ष राहिले.

केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) आणि राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) प्रत्येक एक तुकडी तैनात करण्यात आली.

.

बंदोबस्त असा

पोलिस अधीक्षक १

अपर पोलिस अधीक्षक १

पोलिस उपअधीक्षक ८

पोलिस निरीक्षक ३४

सहायक व उपनिरीक्षक १३५

राखीव दल तुकड्या ४०

पोलिस कर्मचारी १७००

होमगार्ड १७००

..

कोट

कोल्हापूर शहर हे आर्थिक संवेदनशील शहर म्हणून घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार एक महिना अगोदर नियोजन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली.

डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभा निहाय उमेदवारांना पडलेली मते

$
0
0

विधानसभानिहाय उमेदवारांना पडलेली मते

मतदारसंघ महाडिक मंडलिक डॉ. माळी नोटा

चंदगड ७०,११५ १,२०,८५७ ८,०८१ १९,३४

राधानगरी ८६,९५४ १,२५,२७५ १,०,०४७ १,३०८

कागल ७७,३०० १,४८,७६१ ९,८२४ १,३९०

दक्षिण ८३,५५८ १,३३,१७२ १,१२,६५ १,५४१

करवीर ८४,०५४ १,२०,८७४ १६,५२२ १,१३३

उत्तर ७३,९४१ १,०८,६८१ ७,१८३ १,४८३

पोस्टल १,६९७ ३,४१० १८८ ३२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उदयनराजेंची साताऱ्यात हॅटट्रिक

$
0
0

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात शानदार हॅटट्रिक नोंदवत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सव्वा लाखांच्या मताधिक्याने पुन्हा दिल्ली गाठली. भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांचा एक लाख नऊ हजार बारा मतांनी पराभव करीत साताऱ्यात आपलीच कॉलर टाईट असल्याचे उदयनराजे यांनी दाखवून दिले. उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा दणदणीत पराभव केला. लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले हॅट्रीक करणार? याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून होते. पहिल्या फेरीत उदयनराजे यांनी साडेचार मतांचे लीड घेतले होते. मात्र, सर्वर डाउन असल्याने निकाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. पहिल्या चार फेऱ्यामध्ये पोस्टल व ईटीबीपीएसची मते मोजण्यात आली तेव्हा राजेंची पाटलांवर साडेसहा हजार मतांची आघाडी होती. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला हादरे बसत असताना साताऱ्यात उदयनराजे यांच्या करिष्म्याने राष्ट्रवादीची पत वाचली. जो चमत्कार भाजपने महाराष्ट्रात घडवला, तो साताऱ्यात घडू शकला नाही. सहा विधानसभा मतदारसंघात फेरीनिहाय उदयनराजे यांना ५४७७९६ तर भाजपच्या नरेंद्र पाटील ४३६७६२ इतकी मते मिळाली. राजेंनी १११०३४ मतांची आघाडी घेत उदयनराजे यांनी खासदारकी तिसऱ्यांदा खिशात घातली. युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनीही त्यांना निवडणुकीत कडवी लढत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टल मतातही मानेंची आघाडी

$
0
0

हातकणंगले मतदारसंघात ८०५७ पोस्टल मते होती. यातील ३००० मते शिवसेनेचे धैर्यशील माने यांना मिळाली. शेट्टी यांना २४६१ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद यांना २६८ मते मिळाली. 'नोटा'ला ६५ मते मिळाली, तर तब्बल २१०२ मते बाद ठरली. सकाळपासून सुरू झालेल्या पोस्टल मतमोजणीचा निकाल रात्री साडेआठच्या सुमारास जाहीर करण्यात आला. पोस्टल मतातही माने यांनी आघाडी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर उत्तर, दक्षिण मतदारसंघावर विश्लेषण

$
0
0

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ

'दक्षिण'स्वारी पाटलांना सुकर, महाडिकांसाठी बिकट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची ताकद लोकसभेच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाली. आताच्या मताधिक्याच्या बळावर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा मार्ग सुकर, तर भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यासाठी विधानसभेची निवडणूक बिकट होत असल्याचे चित्र आहे. मुळात 'दक्षिण' मतदारसंघातील निवडणूक पक्षाऐवजी आमदार पाटील आणि महाडिक गटात लढली जाते. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आमदार पाटील यांनी या मतदारसंघात पद्धतशीर बांधणी केली. विधानसभेसाठी आमदार पाटील आणि भाजपचे अमल महाडिक यांच्यात थेट लढतीची शक्यता आहे. अमल महाडिक हे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्याव्यतिरिक्त भाजपकडे दुसरा सक्षम उमेदवारही आढळत नाही. लोकसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिकांचा पराभव झाल्यामुळे महाडिक कुटुंबीय आता संपूर्ण लक्ष 'दक्षिण'वर केंद्रित करणार हे निश्चित आहे. तर लोकसभेत मंडलिकांना मोठे मताधिक्य मिळवून दिल्यामुळे पाटील गटाचा आत्मविश्वास दुणावला. लोकसभा निवडणुकीत 'दक्षिण'मधील मंडलिकांच्या प्रचाराची सूत्रे पाटील गटाच्या हाती होती. दक्षिणमध्ये शिवसेनेची ताकत मर्यादित आहे. युती झाल्यास त्यांना भाजपला पाठिंबा द्यावा लागेल. परिणामी 'दक्षिण'मध्ये पुन्हा एकदा पाटील विरुद्ध महाडिक यांच्यामध्ये वर्चस्ववादाची लढत पाहावयास मिळणार आहे.

००००

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ

सेनेला मताधिक्य, भाजपची महत्त्वाकांक्षा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला. लोकसभेच्या निवडणुकीत प्रा. मंडलिकांना 'उत्तर'मधून २७ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने सेनेची ताकद स्पष्ट झाली. मात्र, मंडलिकांला मिळालेल्या आघाडीत भाजप आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गटाचाही वाटा आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काहींनी प्रचार यंत्रणा राबविली. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आमदारकीची हॅटट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे भाजपने या मतदारसंघात नियोजनबद्ध ताकद वाढवली आहे. गेल्या विधानसभेला मिळालेली मते आणि आताच्या विजयातील वाटा यामुळे भाजपची मंडळी 'उत्तर'वर दावा करत आहेत. भाजपच्या महत्त्वाकांक्षेमुळे नजीकच्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची चिन्हे आहेत. भाजपकडून देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी गेल्या वेळेला निवडणूक लढविली होती. दुसरीकडे 'उत्तर'मध्ये काँग्रेसची ताकद लक्षणीय आहे. आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त होणार आहे. पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे छत्रपती, दौलत देसाई यांच्या नावाची चर्चा आहे. महाडिकसमर्थक सत्यजित कदम यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना दोन नंबरची मते मिळवली होती. ते ही विधानसभेची तयारी करत आहेत. महाडिक गटाची भूमिका काय असणार यावर 'उत्तर'मधील गणिते अवलंबून आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंदगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना सातव्या फेरी दरम्यान मासेवाडी, हुंबरवाडी (गडहिंग्लज) या दोन मतदारसंघातील ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या केंद्रातील मतमोजणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनाद्वारे व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करुन मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

सातव्या फेरीदरम्यान चंदगड मतदारसंघातील दोन मतदारसंघातील ईव्हीएम मशिनमधील एकूण आकडेवारी दिसत होती. पण उमेदवारनिहाय मते दिसत नव्हती. मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणी कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र दोन मतदान केंद्रातील मतमोजणीसाठी व्हीव्हीपॅट मशिनचा वापर केला. त्यामुळे या मतदारसंघातील सातव्या फेरीला काहिसा विलंब झाला.

सायंकाळी ईव्हीएम मशिनची संपूर्ण मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या लकी ड्रा काडून व्हीव्हीपॅट मशिनमधील चिठ्ठ्यांची मतमोजणी केली. यामध्ये राधानगरी मतदारसंघातील केळोशी खुर्द, गंगापूर, पिंपळवाडी, कासारपुतळे, वाघवडे तर चंदगड मतदारसंघातील किणे, पेद्रेवाडी (आजरा), तुमरी, वाघराळे (गडहिंग्लज), घुलेवाडी (चंदगड) व करवीर मतदारसंघातील कारभारवाडी, कळे, हसूर दुमाला, सावर्डे दुमाला व मांजरवाडी केंद्रातील व्हीव्हीपॅट मशिनमधील चिठ्ठ्यांची मतमोजणी केली.

..............

राधानगरीची मतमोजणी सर्वात प्रथम

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सर्वात जास्त २२ फेऱ्या राधानगरी मतदारसंघात होणार होत्या. राधानगरीचे प्रातांधिकारी संपत खिलारे यांनी अत्यंत नियोजनबद्ध मतमोजणी प्रक्रिया राबवत सर्वात जास्त फेऱ्या असूनही अडीच वाजता ईव्हीएम मशिनची तर सायंकाळी पावणेसात वाजता व्हीव्हीपॅटची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षणचित्रे ...

$
0
0

सुरुवात बाद मताने

सकाळी आठपासून टपाल मतदानाने मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीची सलग सहा मते बाद ठरली. यानंतर मोजलेल्या मतांमध्ये शिवसेनेच्या बाजूने कल दिसत होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी टपाली मतदान जाहीर करण्यापूर्वी पुढील मतमोजणी सुरू केली. सायंकाळपर्यंत टपाल मतदान जाहीर झाले नाही.

..............

'नोटा'चा फटका

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात १७ उमेदवार होते. या सर्वच उमेदवारांना नाकारण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. दहाव्या फेरीपर्यंत ४५३३ मतदारांनी 'नोटा'चा पर्याय वापरला. संपूर्ण मतमोजणीत 'नोटा'ची आकडेवारी आठ ते दहा हजारांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. 'नोटा'चाही फटका राजू शेट्टी यांना बसला.

...............

'वंचित'चा फॅक्टर ठरला निर्णायक

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांनी राजू शेट्टी यांचे विजयाचे गणित बिघडवले. दुसऱ्या फेरीपासून ते अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कायम राहिला. प्रत्येक फेरीमध्ये जेवढी मते सय्यद यांना मिळत होती, सुमारे तेवढेच मताधिक्य शिवसेनेचे उमेदवार माने यांना मिळत गेले. दहाव्या फेरीअखेर सय्यद यांनी ७५,८८४ मते मिळवली. यावेळी माने यांना ६७ हजार ८१६ मतांची आघाडी मिळाली होती. 'वंचित'चा फॅक्टर शिवसेनेच्या पत्थावर पडला.

...............

'दुसऱ्या' शेट्टींनाही पाच हजारांवर मते

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावात साधर्म्य असलेले राजू मुजिकराव शेट्टी यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची युतीची शक्कल यशस्वी ठरली. स्वाभिमानीचे यापूर्वीचे 'शिट्टी' हे चिन्ह राजू मुजिकराव शेट्टी यांना मिळाले होते. याशिवाय मतदान यादीत त्यांचे नावही राजू शेट्टी यांच्या नावापूर्वी होते. या 'दुसऱ्या' शेट्टींनी दहाव्या फेरीपर्यंत ५१३१ मते मिळवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबरिश घाटगेंना पोलिसांकडून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रमणमळा मतमोजणी केंद्राबाहेर जाण्यासाठी आदेश धुडकावून हुज्जत घालणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती व गोकुळचे संचालक अंबरिश संजय घाटगे (वय ३७) यांना बंदोबस्ताला असलेल्या राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. त्यांना रस्त्यावर पाडून पायाच्या तळव्यावर काठीने मारहाण केल्याने दोन्ही पायांना गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, घाटगे कुटुंबियांनी झालेल्या या प्रकाराबाबत तक्रार नसल्याचे सीपीआर पोलिस चौकीत सांगितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथे गुरुवारी सकाळी सुरु झाली. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचे प्रतिनिधी म्हणून अंबरिश घाटगे मतमोजणी केंद्रामध्ये सकाळी नऊ वाजता गेले होते. त्यांचे घर मतमोजणी केंद्रापासून हाकेच्या अंतरावरील 'स्माइल स्टोन' बिल्डिंग येथे आहे. मतमोजणी केंद्रातून ते दुपारी बारापर्यंत दोन ते तीन वेळा कामानिमित्त घरी गेले. ते पुन्हा काही वेळाने मतमोजणी केंद्रावर आले. साडेबारा वाजता ते पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी प्रवेशद्वारासमोर सशस्त्र पोलिस बंदोबस्त होता. महिला अधिकाऱ्याने त्यांना अडवून तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, असे बजावले. त्यावर घाटगे यांनी मी घराकडे निघालो आहे, मला सोडा, असे सांगितले. त्या महिला अधिकाऱ्याने 'तुम्ही सारखे घरी जाता, एकदा आत आल्यानंतर पुन्हा बाहेर जाता येत नाही, तसे सोडायचे आदेशही आम्हाला नाहीत. त्यामुळे तुम्हाला बाहेर जाता येणार नाही' असे सांगितले. त्यावर घाटगे हे 'मी एकटा आहे, दोनशे कार्यकर्ते आल्यानंतर काय करणार ' असे सांगत पोलिसांना बाजूला ढकलून पुढे निघाले. त्यावेळी राज्य राखीव दलाचे पोलिसांसह जिल्ह्यातील पोलिस या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते. घाटगे आणि पोलिसांत झटापट झाली. बंदोबस्ताला असलेल्या १५ हून अधिक पोलिसांनी घाटगे यांना रस्त्यावर पाडून काठीने मारहाण केली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून हाकेच्या अंतरावरील घराच्या गॅलरीत उभे असलेले माजी आमदार संजय घाटगे हे 'अंबरिश यांना मारु नका, काय झाले?' असे म्हणत घराबाहेर धावतच आले. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी अरुंधती, सून सुयशा आल्या. त्यांनी पोलिसांच्या तावडीतून अंबरिश यांना सोडवून घेत कारमधून सीपीआरमध्ये दाखल केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, डॉ. विजय बरगे, डॉ. सचिन शिंदे यांनी तत्काळ त्यांच्या दोन्ही पायावर शस्त्रक्रिया केली.

या प्रकाराची माहिती कळताच आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सीपीआरमध्ये भेट देवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, घाटगे यांच्या पायाला सूज आली असून त्यांना चालता येणार नसून अ‍ॅडमिट करावे लागेल, असे डॉक्टरांनी घाटगे कुटुंबियांना सांगितले. त्यावर त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी सीपीआर पोलिस चौकीत फिर्याद दाखल केली. ठाणे अंमलदारांनी जबाब घेतला असता आमची कोणाबद्दल तक्रार नसल्याचे अंबरिश घाटगे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना ताराबाई पार्कमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकांवरील राग पुतण्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा अट्टाहास धनंजय महाडिक यांना चांगलाच महागात पडला. या ठरावामुळेच ग्रामीण भागात महाडिक यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. शिवाय 'सगळीकडे महाडिक नको' ही लोकभावना वाढली, साहजिकच यामुळे प्रा. संजय मंडलिकांचे मताधिक्य वाढले.

गेली अनेक वर्षे 'गोकुळ' वर महाडिक आणि पी.एन. पाटील यांची सत्ता आहे. या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, प्रा. मंडलिक यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये आमदार हसन मुश्रीफांची साथ मिळाली. गोकुळची निवडणूक हा गट थोडक्यात हरला. पण मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाला तरी नेत्यांच्या विरोधात हवा तयार करण्यात या गटाला यश मिळाले. गोकुळ दूध संघ सहकारी आहे, मल्टिस्टेटमुळे तो महाडिकांच्या हाती जाईल असे वातावरण या गटाने केले. शेतकरी आणि दूध उत्पादकांना देखील हा ठराव नको होता. त्यामुळे महाडिक यांच्याबाबत त्यांच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली. महाडिकांच्या समवेत खासदार महाडिकदेखील या ठराव प्रक्रियेत होते. यामुळे महादेवराव महाडिक यांच्यावरील राग मतदारांनी लोकसभा निवडणुकीत काढला. याचा ग्रामीण भागात महाडिकांना फार मोठा फटका बसला.

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच महादेवराव महाडिक यांनी लोकसभा हरल्यास गोकुळ ताब्यातून जाईल, अशी भीती व्यक्त केली. पण प्रचारात हा मल्टिस्टेचा मुद्दा विरोधकांनी फारसा आणला नाही, पण लोकांच्या मनात तो नक्की होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात मल्टिस्टेट होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यांचे ज्या पद्धतीने कौतुक झाले, त्यावरून हा मुद्दा किती महत्वाचा होता याचा पुरावा मिळाला. महाडिक यांचे संपूर्ण राजकारण 'गोकुळ' भोवती फिरते. त्यामुळे 'गोकुळ' साठी ते सर्वत्र तडजोडीचे राजकारण करत असतात. लोकसभेला पुतण्या, विधानसभेला मुलगा, जिल्हा परिषदेला सून हे त्यांचे राजकारण लोकांना आवडले नाही. सगळीकडे महाडिकच का, असा सवाल जनतेतून सुरू होता. त्यामुळे धनंजय महाडिक यांचे काम चांगले आहे, असे म्हणणाऱ्यांनी देखील 'पण महाडिक नको' असे म्हणत लोकसभेला राग काढला. यामुळेच महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातीय समीकरणाचा शेट्टींना दणका

$
0
0

हातकणंगले वार्तापत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्या साखर कारखानदारांविरोधात पंधरा वर्षे लढले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय, इचलकरंजी शहराच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष, जातीय समीकरणे, शेतकरी वगळता इतर घटकांना न दिलेला न्याय याचा फटका खासदार राजू शेट्टी यांना बसला. याउलट नवखा असूनही सेनेची तयार झालेली हवा, मोदी लाट, भाजपची वाढलेली ताकद, चार आमदार व एका राज्यमंत्र्याने राबविलेली यंत्रणा याचा फायदा धैर्यशील माने यांना झाला. सोयीचे राजकारण करणाऱ्याला जनता नाकारते हे दाखवणारा हा निकाल असून, यामुळे शेतकरी संघटनेच्या आगामी राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे.

गेल्या दहा वर्षांत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा नेता म्हणून आपली प्रतिमा तयार केली. देशभरातील शेतकरी संघटनांना एकत्र आणत त्यांनी मूठ बांधली. दिल्लीत आंदोलन करत देशातील शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख निर्माण केली. भाजप-शिवसेनेच्या विरोधात रान उठवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सातत्याने बोलत राहिल्याने देश आणि राज्य पातळीवर त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न झाले. शेट्टींना रोखा, असा आदेशच मिळाल्याने वर्षभर त्यांच्या विरोधात तयारी सुरू होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या मोहिमेचे सूत्रधार होते. यातून त्यांनी या मतदारसंघात भाजपची ताकद वाढवली. सेनेचे तीन व भाजपचा एक आमदार, एक राज्यमंत्री, नगरपालिकांवरील सत्ता याचा फायदा धैर्यशील माने यांना झाला.

शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या पलीकडे इतर घटकांचा फारसा कधी विचार केला नाही. शेतकरी आंदोलन सोडले तर विकासकामांचा धडाका कधी दिसलाच नाही. इचलकरंजी शहराकडे केलेले दुर्लक्ष त्यांना महागात पडले. वस्त्रोद्योग संकटात असताना शेट्टी मदतीसाठी धावले नाहीत, वारणा पाणी योजनेला विरोध केल्याने इचलकरंजीकरांच्या मनात त्यांच्याबद्दल राग होता. शिवाय या भागातील मोदीप्रेमी दुखावले होते. याचा फटका त्यांना बसला. समोर नवखा उमेदवार असूनही त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. दोन्ही काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेट्टींनी त्यांच्याच सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो मतदारांना आवडला नाही. सत्तेसाठी काहीही तडजोडी करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांना नडला.

विजयासाठी नाही तर अस्तित्व दाखविण्यासाठी मैदानात उतरलेल्या मानेंना विजयाची लॉटरी लागली. अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना उमेदवारी मिळाली. अपुरी यंत्रणा असूनही त्यांनी त्याचा वापर करत हवा केली. मोदी लाट, जातीय समीकरणाचा त्यांना हातभार लागला. या निमित्ताने माने गटाची विखुरलेली ताकद पुन्हा एकत्र आली. राज्य पातळीवरून या गटाला रसद मिळाली. राष्ट्रवादीने या गटावर अन्याय केला, त्यामुळे मतदारांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. निवेदिता माने यांनीदेखील सेनेत प्रवेश करताना राष्ट्रवादीच्या अन्यायाचा पाढा वाचला होता. भाजप व सेनेचे नेते कार्यकर्ते प्रामाणिकपणे राबले. यामुळे मानेंचा आश्चर्यकारक विजय झाला.

०००००

राजू शेट्टींचा पराभव का?

केवळ शेतकऱ्यांचा नेता या प्रतिमेमुळे इतर घटकांकडून मदत नाही

दोन्ही काँग्रेसचे नेते सोबत, कार्यकर्ते विरोधात

इचलकरंजी शहराकडे केलेले दुर्लक्ष

केवळ दूध व ऊसदर आंदोलन, इतर गोष्टींकडे दुर्लक्ष

मोदी लाट, शिवसेनेची हवा याचा परिणाम

काँग्रेस आघाडीसोबत गेल्याचा मतदारांना राग

जातीय राजकारणाचा मोठा फटका

काही जातीबाबत काढलेले अनुद्गार भोवले

००००००

धैर्यशील मानेंचा विजय का?

नवखा असूनही वातावरणनिर्मिती

भाजप-सेनेची वाढलेली ताकद

वंचित आघाडीचा फायदा

जातीय समीकरणाची नाळ फायदेशीर

सेनेच्या तीन, तर भाजपच्या एक आमदाराची ताकद

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची टोलेबाजी

अपुरी यंत्रणा असूनही त्याचा योग्य वापर

राज्य पातळीवरून सेना-भाजपची रसद

माने गटाची विखुरलेली ताकद एकत्रित

विनय कोरेंची अखेरच्या टप्प्यात झालेली मदत

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी लाट, सतेज साथमुळे मंडलिक सुसाट

$
0
0

कोल्हापूर मतदारसंघ वार्तापत्र

Gurubal.Mali@timesgroup.com

Tweet : @gurubalmaliMT

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच तयार झालेली शिवसेनेची हवा शेवटच्या क्षणापर्यंत रोखण्यात आलेले अपयश, गोकुळ मल्टिस्टेटमुळे महाडिक यांच्याविरोधात तयार झालेले वातावरण, सगळी पदे माझ्याच घरात ही प्रवृत्ती वाढल्याने महाडिक नको ही लोकभावना आणि आमदार सतेज पाटील यांनी 'आमचं ठरलंय' म्हणत राबविलेली यंत्रणा यामुळे खासदार धनंजय महाडिक यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालाने जिल्ह्यात यापुढे महाडिक आणि पाटील यांच्यातील संघर्षाची धार वाढणार हे निश्चित झाले. शिवाय पुढील राजकारणात महाडिक यांना एकाकी पाडत त्यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू होतील. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होतील.

कोल्हापूर नेहमीच प्रवाहाविरोधात असते. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये त्याचा पुरावा मिळाला आहे. कोल्हापूर मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पण राष्ट्रवादीने दुखावलेल्या नेत्यांच्या वारसदारांनी या पक्षाला दणका दिला आहे. सदाशिवराव मंडलिकांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने प्रा. मंडलिकांनी सेनेचा रस्ता धरला. पराभवानंतरही पाच वर्षे ते या पक्षाशी एकनिष्ठ राहिले. याउलट राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यानंतर मोदी लाटेतही वादळात दिवा लावलेल्या महाडिकांनी पक्षापेक्षा भाजपशी निष्ठा दाखवली. विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची वाढलेली जवळिकता आणि त्यातून त्यांनी भाजपवाढीसाठी केलेले काम मतदारांना आवडले नाही. यातून राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते दुखावले. गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी मदत केली, त्यातून त्यांचा विजय सुकर झाला, पण नंतर विधानसभा निवडणुकीत महाडिकांनी त्यांचा पराभव केला. यामुळे पाटील संतप्त झाले. त्यामुळे या निवडणुकीत आघाडी धर्म खुंटीला टांगून त्यांनी महाडिकांच्या विरोधात प्रचाराचे रान उठवले. शिवसेनेच्या आमदारापेक्षा पाटील अधिक सक्रिय होते.

महाडिक नको ही भावना

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, गोकुळ, साखर कारखाना या सर्वच ठिकाणी महाडिकांच्या घरातील सदस्य दिसतात. सगळे मलाच ही महाडिक कुटुंबीयांची प्रवृत्ती लोकांना आवडली नाही. याचा फटका धनंजय महाडिकांना बसला. कार्यकर्त्यांना संधी देण्यापेक्षा प्रत्येक निवडणुकीत अमल महाडिक, शौमिका महाडिक, स्वरूप महाडिक यांना पुढे केल्याने लोकांनी ठरवून या निवडणुकीत महाडिक कुटुंबावर राग काढला. महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाचा राग लोकांनी धनंजय महाडिक यांच्यावर काढला.

राष्ट्रवादी विरोधातच

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुसंख्य नेते व कार्यकर्ते महाडिक यांच्या प्रचारापासून दूर होते. जे होते ते मनापासून नव्हतेच. कागल, राधानगरीत मंडलिकांना जे मताधिक्य मिळाले आहे, त्यातून हे लक्षात येईल. ज्यांच्यावर आशा होती, त्या आमदार हसन मुश्रीफांच्या मतदारसंघात मंडलिकांना भले मोठे लीड मिळाले. सतेज पाटील उघड तर इतर अनेकजण छुप्या मार्गाने महाडिकांविरोधात होते. पी. एन. पाटील यांनी मंडलिकांची लाट थोपविण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला, पण कार्यकर्त्यांनी तो ऐकला नाही.

मंडलिकांना भक्कम पाठबळ

मंडलिकांच्या विजयात सर्वांत मोठा हातभार लागला तो आमदार सतेज पाटील यांचा. पहिल्या टप्प्यापासूनच त्यांनी सेनेची सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात घेऊन राबविली. यातून हवा तयार झाली. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात राज्याच्या प्रचाराचा प्रारंभ केला. तेथून जी हवा झाली, ते मतदान होईपर्यंत कायम राहिली. गोकुळ मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाला, पण त्याचा राजकीय फायदा मंडलिकांना झाला. गोकुळमुळे महाडिकांविरोधात वातावरण निर्माण झाले. स्थानिक उमेदवार म्हणून कागल, राधानगरीने भरभरून मते दिली. त्यामुळे मताधिक्य वाढण्यात मदत झाली. पाच वर्षांत भाजपची ताकद वाढली आहे, सेनेचे तीन आमदार या मतदारसंघात आहेत, त्याचा फायदा झाला. युवा मतदारांनी मोदींकडे पाहून सेनेला मतदान केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीधर्म पाळला. संजय घाटगे, समरजित घाटगे, दिनकरराव जाधव, श्रीपतराव शिंदे अशा विविध गटांकडून मंडलिकांना बळ मिळाले. शरद पवार वगळता दोन्ही काँग्रेसचे स्टार प्रचारक जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. त्यामुळे मंडलिक विरोधात प्रचाराची धार आलीच नाही. याचा फायदा मंडलिकांना झाला. त्यांचा विजय अपेक्षित होता पण जे मताधिक्य मिळाले ते धक्कादायक आहे.

मंडलिक विजयी का?

गोकुळ मल्टिस्टेटने फिरवले राजकारण

महादेवराव महाडिकांचा राग धनंजयवर

सतेज पाटील बनले किंगमेकर!

भाजपने दिला मदतीचा हात

स्थानिक उमेदवार म्हणून कागल, राधानगरीने विजय केला सोपा

पहिल्या टप्प्यापासूनच तयार झालेली सेनेची हवा

राष्ट्रवादीतील महाडिकांविषयी नाराजी

काँग्रेसचे नेते सोबत, कार्यकर्ते विरोधात

महाडिक नको ही सार्वत्रिक भावना

ग्रामीण मतदार मंडलिकांसोबत

मोदींकडे पाहून मतदान

पवार व महाडिकांची शेवटची जुळवाजुळव असफल

शिवसेनेच्या आमदारांकडून प्रामाणिक काम

पालकमंत्र्यांनी पाळला पाळला युतीधर्म

मतदारसंघातील युतीच्या सत्तेचा फायदा, महापालिका, नगरपालिका, साखर कारखाने

महाडिक वगळता आक्रमक प्रचार नाही

वडील दिवंगत सदाशिवराव मंडलिकांची पुण्याई

दोन्ही घाटगे गट, दिनकरराव जाधव, श्रीपतराव शिंदे यांची मदत

दोन्ही काँग्रेसचे स्टार नेते प्रचाराला नाहीत

मुश्रीफ फॅक्टर

महाडिकांचा अतिआत्मविश्वास नडला

००००००

महाडिकांचा पराभव का?

राष्ट्रवादीबरोबर एकनिष्ठ न राहिल्याने स्वकियांची नाराजी

'आमचं ठरलंय'ने केली दमछाक, आमदार सतेज पाटील यांची विरोधातील मोठी यंत्रणा

भाजपची, पालकमंत्र्यांची छुपी मदत झालीच नाही

काकांचा राग पुतण्यावर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अपेक्षित मदत नाही

गोकुळचे राजकारण नडले

दिल्लीत काम चांगले, गल्लीत संपर्क कमीचा दणका

अरुंधती महाडिकांची एकाकी मदत

हात सैल सोडत मोठी उलाढाल.. उपयोग झाला नाही

डॅमेजचे पॅचवर्क झालेच नाही

केवळ पवारच सोबत, इतर सारे विरोधात

सर्व पक्षांत महाडिक.. त्याचाही फटका

ठोस विकासकामांचा फटका

महापालिका व जिल्हा परिषद राजकारण नडले, आघाडीचे नगरसेवक विरोधात

शिवसेनेची लाट थांबविता आली नाही

युवा मतदारांकडून अपेक्षित साथ नाही

वंचित आघाडीमुळे मतांची विभागणी

मुश्रीफ सोबत, पण… कार्यकर्ते विरोधात

कागल व राधानगरीचा मोठा फटका

आक्रमक प्रत्युत्तराऐवजी बचावात्मक प्रचाराचा फटका

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुश्रीफांची राजकीय वाट बिकट

$
0
0

मुश्रीफांचा फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादीची प्रचार सभा असो वा कार्यकर्त्यांचा मेळावा, त्या मेळाव्यासाठी इतर तालुक्यांतील कार्यकर्त्यांपेक्षा जादा गर्दी कागल तालुक्यातील असायची. पक्षाचे नेतेही कागलची रसद मिळाली की 'राजकारण' यशस्वी होणार या खात्रीने बिनधास्त राहायचे. आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर बहुतांश मदार असे. राष्ट्रवादीसाठी कणा ठरलेल्या कागल तालुक्यात यंदा चित्र पालटले. 'स्थानिक उमेदवार' म्हणून शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पारड्यात मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकले. जिल्ह्यातील आणि तालुक्यातील बदलते राजकीय वातावरण आमदार मुश्रीफ यांच्या राजकीय वाटचालीसाठी बिकट ठरण्याची चिन्हे आहेत.

कागलमध्ये प्रा. मंडलिकांना मिळालेले मताधिक्य हे मुश्रीफांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याच्या बळावर कागलमध्ये विधानसभेसाठी नवे आडाखे बांधले जातील. मुळात कागलमधील राजकारण पक्षापेक्षा गटातटाचे. मंडलिक, मुश्रीफ आणि दोन्ही घाटगे गट यांच्याभोवती राजकारण फिरणारे. विधानसभा, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूकही प्रत्येक गट हा स्वतंत्रपणे लढणारा. मुश्रीफांना राजकारणात अटकाव करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजपने येथे शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना संधी दिली आहे. 'म्हाडा'चे अध्यक्षपद, विकासकामांना निधी वाटप करत भाजपने मुश्रीफांविरोधात पर्याय उभा करण्यास सुरुवात केली आहे. माजी आमदार संजय घाटगे, समरजित घाटगे आणि मंडलिक गट एकत्रित करून मुश्रीफांविरोधात राजकारण आकाराला येऊ शकते.

कोल्हापुरातील राष्ट्रवादीचा पराभव हा महाडिकांइतकाच पक्षासाठीसुद्धा लाजिरवाणा ठरला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील विजय हा प्रतिष्ठेचा बनविला होता. कोणत्याही परिस्थितीत येथे पक्षाचाच झेंडा फडकला पाहिजे यासाठी त्यांनी कोल्हापूरवर विशेष लक्ष केंद्रित करून पाचवळा दौरा केला होता. त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र आणून महाडिकांना निवडून देण्याचा आदेश दिला. कागलमध्ये मंडलिक आघाडी घेणार हे निश्चित होते. मात्र, महाडिक आणि त्यांच्या मतांमधील अंतर मुश्रीफ गटाला अंतर्मूख बनविणारे आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, सेनेची युती कायम राहिल्यास दोन्ही घाटगे आणि मंडलिक असे समीकरण बनू शकते.

००००००

मुश्रीफांचे प्रयत्न फोल

पक्षाचे धोरण आणि नेत्यांच्या आदेशानुसार आमदार मुश्रीफ यांनी महाडिकांच्या विजयासाठी प्रयत्न केले. मुश्रीफांनी कागलमधील पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रयत्न केले. महाडिकांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष पवार यांनी कागलमध्ये सभा घेतली. मात्र, शिवसेनेचे उमेदवार प्रा. मंडलिक हे कागल तालुक्यातील. मात्र कागलमध्ये 'स्थानिक उमेदवार' असा मेसेज तत्पूर्वीच सर्वांपर्यंत व्हायरल झाला होता. आपसूकपणे मंडलिक यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. शिवाय युतीधर्मामुळे दोन्ही घाटगे गट, प्रा. मंडलिक यांच्यासोबत राहिले. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतील कार्यकर्ते मंडलिकांच्या बाजूने सक्रिय झाले. कागलमधील अशी सर्व पातळ्यांवरील आघाडी निर्णायक ठरली. परिणामी मुश्रीफांचे प्रयत्न फोल ठरले.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोळा लाखांची रोकड गांधीनगरातून लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगर (ता. करवीर) येथील एका कापड दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली १६ लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी दुकानमालक सुरेश जेठानंद जेवराणी (वय ४३, रा. ताराबाई पार्क) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली. बुधवारी (ता. २२) रात्री पावनेनऊ वाजता हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवराणी बंधूंचे गांधीनगर मार्केटमध्ये 'संजना गाउन सेंटर' दुकान आहे. जेवराणी दररोज जमा झालेली रोकड बँकेत भरतात. बुधवारी रात्रीही त्यांनी तिघा भावांची एकत्र मिळून १६ लाख रुपयांची रोकड जमा केली होती. ती एका बॅगेत काउंटरवर ठेवली होती. दुकानाचे शटर अर्धे बंद केले होते. त्यावेळी देवराणी पार्किंगमध्ये लावलेली चारचाकी गाडी आणण्यासाठी गेले. ते परत आल्यानंतर त्यांना काउंटवर ठेवलेली बॅग लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फुटेजमध्ये चोरटा स्पष्टपणे दिसत नाही. दरम्यान, या प्रकरणी जेवराणी यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दुकानातील फुटेजच्या सहायाने कामगारांकडे चौकशी केली. चोरटा सराईत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर, माढ्यात कमळ

$
0
0

आंबेडकरांमुळे सुशीलकुमार शिंदे 'वंचित'

सोलापूर :

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे विजयापासून वंचित राहिले. भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी कमळ फुलवत सोलापूर लोकसभा भाजपकडे ठेवण्यात यश मिळविले. महास्वामींनी शिंदे यांचा पराभव केला. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने देशभराचे लक्ष लागलेल्या व शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माढा मतदारसंघात भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा दारुण पराभव करीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्वस्त केला. या पूर्वी राष्ट्रवादीकडून माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील आणि शरद पवार यांनी माढ्याचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र, ऐनवेळी शरद पवार यांनी माघार घेऊन संजय शिंदे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी दिली. परंतु, निंबाळकर यांनी शिंदे यांचा दारुण पराभव केला आणि भाजपचे कमळ फुलविले.

सोलापूरसाठी ५८ तर माढा मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले होते. सोलापूर लोकसभा निवडणुकीत एकूण १८ लाख ५० हजार २ मतदारांपैकी १० लाख ७९ हजार ८४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा विधानसभेचा मतदारसंघ असलेल्या शहर शहर उत्तर मतदारसंघात ५८ आणि शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे आमदार असलेल्या शहर मध्य मतदारसंघात ५५ टक्के मतदान झाले होते. मोहोळ मतदासंघातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी शिंदे यांना तारेल असे वाटत होते. मात्र, मोहोळचे लीड अन्य विधानसभा मतदारसंघात तुटल्याने शिंदे यांच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले. त्यातच प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने शिंदे यांचा घात केला. सुरुवातीपासूनच महास्वामी लिडवर होते. अखेरपर्यंत महास्वामींनी लीड कायम ठेवले. शिंदे दुसऱ्या क्रमांकावर तर आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. शहर उत्तर, अक्कलकोट, शहर मध्य या तीन मतदारसंघात महास्वामींना लीड मिळाला. लिंगायत समाजाने महास्वामींनी तारले.

या शिवाय माढा लोकसभा मतदारसंघात १९ लाख ४ हजार ८४५ पैकी १२ लाख ११ हजार ४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. माढा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २ लाख २५ हजार ७०८ मतदारांनी मतदान केले होते. त्या खालोखाल मोहिते-पाटील यांचे वर्चस्व असलेल्या माळशिरस तालुक्यात सुमारे २ लाख ७ हजार ५६१ मतदारांनी मतदान केले होते. माढा मतदारसंघातील विजेता या दोनच मतदारसंघातील मताधिक्यावर निवडून येणार असेच चित्र होते आणि झाले सुद्धा तसेच माळशिरसने निंबाळकरांना तारले. सायंकाळपर्यंत महास्वामी दीड तर निंबाळकर ७० हजाराने लिडवर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images