Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हद्दवाढ: राज्य सरकारविरोधील याचिका रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या हद्दीशेजारील २२ गावांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले असून, त्याबाबतचा अध्यादेशही सहा महिन्यापूर्वी काढण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने बुधवारी हायकोर्टात दिली. त्यामुळे माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी राज्य सरकारविरोधात दाखल केलेली अवमान याचिका हायकोर्टाच्या खंडपीठाने फेटाळली.

आडसुळे यांनी राज्य सरकारने हद्दवाढीबाबत निर्णय घेण्याची हमी दिलेली असताना त्याबाबत अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप करत दोन वर्षांपूर्वी हायकोर्टात धाव घेऊन राज्य सरकारविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती अभय ओक व पी. एम. देशमुख यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारच्या वतीने नगरविकास खात्याचे सचिव कैलास वाधन यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये सरकारने ऑगस्ट २०१७ मध्ये प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अध्यादेशही जारी केला आहे. त्याची दखल घेऊन हायकोर्टाने आडसुळे यांनी दाखल केलेली अवमान याचिका निकाली काढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'प्रदूषण'ची पालिकेला मार्चअखेर डेडलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला मार्च अखेरपर्यंतची डेडलाइन दिली आहे. यामध्ये लाइन बझार पंपिंग, विविध नाले जोडणे व वळवणे, उचगावकडून येणाऱ्या नाल्यावर स्वतंत्र प्रक्रिया केंद्राचे काम, १७ एमएलडी प्रक्रिया प्रकल्प अशा विविध कामांचा समावेश आहे. याबाबत कसूर झाल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिला आहे.

प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या वतीने दिलीप देसाई व बुरहान नायकवडी यांनी केलेल्या तक्रारीनुसार प्रांताधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. त्यावेळी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांसाठी कालबद्ध कार्यक्रम प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. त्यानुसार ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ५ फेब्रुवारीपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने कार्यान्वित करण्यास सांगितले आहे. लाइन बाजार येथील जॅकवेल, बापट कॅम्प नाला, उचगाव नाला, न्यू पॅलेस नाला २८ फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करणे, इतर नाल्यांचे काम ३१ मार्चपर्यंत काम करण्यास सांगितले आहे. १७ एमएलडी प्रकल्पाचे कामही ३१ मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याबरोबरच वाहने, जनावरे धुण्यावर निर्बंध आणून पर्यायी व्यवस्था उभी करणे, कत्तलखान्यातील कचरा व द्रव पदार्थावर प्रक्रिया करण्याचा नवीन प्रकल्प कार्यान्वित करणे, घनकचरा व्यवस्थापन करण्याचेही आदेश आहेत. यानुसार कार्यवाही न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान ग्राम सडक कार्यालयाची वीज तोडली

$
0
0

जि.प.च्या भाडे देण्याच्या नोटिशीला केराची टोपली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या भाडे देण्याच्या नोटिशीला केराची टोपली दाखविल्याप्रकरणी कागलकर हाउसमध्ये असलेल्या पंतप्रधान ग्राम सडक योजना कार्यालयाची बुधवारी वीज तोडण्यात आली. जिल्हा परिषद बांधकाम प्रशासनाने ही कारवाई केली. पंतप्रधानांच्या नावे असलेल्या योजनेच्या कार्यालयावर कारवाईची नामुष्की ओढवल्याने प्रशासनात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सरकारकडून भरीव निधी न मिळाल्याने स्व-उत्पन्नवाढीसाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कागलकर हाउसमध्ये असलेल्या सर्वच सरकारी कार्यालयांना भाडे देण्याची नोटीस दिली. त्यानुसार अनेक कार्यालयांनी भाडे भरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पंतप्रधान ग्राम सडक योजना कार्यालयास २०१६ पासून प्रतिमहा ३८ हजार रुपयांप्रमाणे देय रक्कम जिल्हा परिषदेकडे भरण्याची नोटीस वेळोवेळी दिली. मात्र, 'ग्राम सडक' प्रशासनाने त्या नोटिशीची दखल घेतली नाही. नोटिशीला केराची टोपली दाखवत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगत राहिले. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यालयास देय भाड्याची रक्कम सात दिवसात भरावी; अन्यथा वीज तोडण्याची नोटीस दिली. या नोटिशीलाही उत्तर दिले नाही. त्यामुळे प्रशासनाने वीज तोडण्याची कारवाई केली.

.............................

पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे कार्यालय जिल्हा परिषदेच्या कागलकर हाउसमध्ये आहे. भाड्याची देय रक्कम भरण्याची नोटीस कार्यालयाला दिली. मात्र, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्या कार्यालयाची वीज तोडण्यात आली.

तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता, बांधकाम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या टप्प्यातील विमानसेवा कोल्हापुरातून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या विमानतळाचा 'उडान'योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील सेवेत समावेश केला आहे. दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर ते बेंगळुरु, हैदराबाद आणि तिरुपती हे हवाई मार्ग जोडण्याची मान्यता मिळाली आहे. त्यासाठी बेंगळुरु आणि हैदराबादसाठी एलाइंस एअर, इंडिगो आणि तिरुपतीसाठी इंडिगो कंपनीची विमाने धावणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील विमानसेवा सुरु करण्यासाठी विमान कंपनीला सहा महिन्याची मुदत दिली आहे. विमान कंपनीकडून या सेवा सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशभरातील ९० हवाई प्रस्तावांना मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रात जळगाव, कोल्हापूर, ओझर (नाशिक), सोलापूरहून नवीन हवाई मार्गाची मान्यता दिली आहे. या मार्गांसाठी मान्यता मिळाली असली तरी प्रत्यक्षात कोल्हापूरची विमानसेवा अद्याप कागदावरच आहे.

जळगांव विमानतळावरुन अहमदाबाद, ओझर (नाशिक) विमानतळावरुन अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, गोवा, हिन्डन (दिल्ली), हैदराबाद आणि सोलापूर विमानतळावरुन बेंगळुरू, हैदराबाद या मार्गावरील विमानसेवा दुसऱ्या टप्प्यात आहे. या मार्गावरील हवाई मार्गाला मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन होते. मात्र या मार्गासाठी अद्याप विमान कंपनी निश्चित झालेली नसल्याने या मार्गावरील सेवा रखडली आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह जळगाव, सोलापूर विमानतळावरुन विमानसेवा देण्याचे नियोजन होते. मात्र ही विमानसेवा लांबणीवर पडली आहे. आता उडान योजनेच्या दुसऱ्या टप्यात कोल्हापूर विमानतळावरुन तीन महत्वाच्या शहरे जोडली जाणार आहेत. कोल्हापूर ते बेंगळुरु या हवाई मार्गासाठी एलाइंस एअर, कोल्हापूर हैदराबाद या मार्गासाठी एलाइंस एअर आणि इंडिगो विमान कंपनी सेवा देणार आहे. कोल्हापूर ते तिरुपती या मार्गावर इंडिगो विमान कंपनी सेवा देणार आहे. कोल्हापूरहून तीन महत्वाची शहरे जोडली जाणार आहे. या मार्गावरील तिकीट दर आणि टाइम स्लॉटची तयारी सुरु झाली आहे. उडान योजनेत ही हवाई सेवा असल्याने प्रवाशांना निम्म्या दरात विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास आणखी हवाई मार्ग जोडले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयाने उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या यादीत कोल्हापूर विमानतळाचा समावेश केला आहे. विमान कंपनीचे मार्ग निश्चित झाल्याने पुढील प्रक्रियेची सुरुवात होणार आहे. कंपनीचे विमानेत त्यासाठी मंत्रालयाकडे जमा करावे लागणारी अनामत रक्कम आणि मुंबई विमानतळावर व्यवस्थापन करणारी जीव्हीके कंपनीकडून वेळेचा स्लॉट मिळविला जाणार आहे. त्यासाठी काही कालावधी जाणार आहे. मात्र दुसऱ्या टप्प्याचे हवाई मार्ग आणि विमान कंपनी निश्चित झाल्याने विमानसेवा सुरु होण्यावर अधिक शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र सरकारने 'उडान'च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत १४१ मार्गांवर सेवेसाठी विमान कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले. यामध्ये राज्यातील १९ विमानतळांचा समावेश आहे. काही विमानतळांना अन्य राज्यातील विमानतळाला जोडले आहेत. पहिल्या टप्प्यात नांदेड, नाशिक आणि शिर्डी विमानतळावरुन विमानसेवा सुरु झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील योजनेत कोल्हापूर विमानतळाचा समावेश केला आहे. दरम्यान राज्य सरकारने कोल्हापूर ते मुंबई मार्गावर २५ डिसेंबर, २०१७ मध्ये ही सेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. १८ सीटर विमान मंगळवार, बुधवार आणि रविवारी टेक ऑफ करण्याची घोषणा केली होती. ही सेवा एअर डेक्कनने देण्याची तयारी दर्शविली होती.

पहिल्या टप्प्यातील कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासह दुसऱ्या टप्प्यातील विमानसेवा सुरु होणार आहे. त्यासाठी विमान कंपन्यांना सहा महिन्याची मुदत दिली आहे. कोल्हापूर विमानतळावरुन लवकरात लवकर विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

धनंजय महाडिक, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांदूळ दरात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशातंर्गत बाजारपेठेत तांदळाची आवक मंदावली आहे. त्यामुळे बासमती व कोलम तांदळाच्या दरात किलोमागे चार ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. बासमती तांदळाची ४१ ते ६५ रुपये तर जुन्या कोलम तांदळाची ६० रुपये, आंबेमोहर वाणाची ७६ रुपये किलो दराने विक्री होत आहे. इतर जाड वाणांच्या तांदळाच्या दरात मात्र फारशी वाढ झालेली नाही. खरीप हंगामात उत्पादीत तांदळाची निर्यातच या दरवाढीस कारणीभूत ठरली आहे.

कोल्हापुरात प्रामुख्याने तामिळनाडू, गुजरात व आंध्रप्रदेश राज्यातून आवक होते. कोल्हापुरात तांदळाला चांगली मागणी असल्याने या तांदूळ विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. गेल्या वर्षभरात तांदळाच्या दरात फारशी वाढ झालेली नव्हती. पण, गेल्या दोन दिवसांपासून तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. बासमतीच्या उच्च दर्जाच्या तांदळाची ५५ ते ६० रुपये किलो दराने विक्री होत होती. त्यामध्ये पाच रुपयांची वाढ होऊन हा दर ६० ते ६५ रुपयांवर पोहोचला आहे. बासमती नं-२ चा दर ४८ रुपयांवरुन ५२ रुपये तर बासमती नं-३ चा ४१ रुपयांवरुन ४७ रुपये झाला आहे.

कोलम जुन्या तांदळाचा दर ६० रुपये तर नवीन तांदळाचा दर ५२ रुपये झाला आहे. बासमती व कोलम वाणाच्या दरात किलोमागे चार ते पाच रुपयांची वाढ झाल्याने महिन्याच्या बजेटवर चांगलाच परिणाम होणार आहे. रत्नागिरी, इंद्रायणी या वाणांच्या दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. रत्नागिरी तांदूळ प्रतवारीनुसार ३२ ते ४० तर इंद्रायणी तांदळाची ३० ते ३२ रुपये किलो दराने विक्री होत आहे. सोना-मसुरी, परिमल, हावळा या जाडा प्रकारातील तांदळाचा दर सरासरी २६ ते ३० रुपयांवर स्थिर राहिला आहे.

'खरीप हंगामातील तांदळाची गेल्या काही महिन्यापासून निर्यात केली आहे. त्यामुळे तांदळाचा काहीसा तुटवडा निर्माण झाला असल्याने बासमती व कोलम तांदळाच्या दरात वाढ झाली आहे' असे तांदूळ विक्रेते संदीप वीर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रनगरी लवकरच कार्यान्वित होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यायचे असेल तर चित्रनगरी पूर्ण करा, अशी मागणी करणाऱ्या अभिनेता नाना पाटेकर यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरात चित्रनगरी पूर्णक्षमतेने सुरू करू, अशी ग्वाही दिली. कोरगाव भीमाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने सद्भावना मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी दादा-नाना संवादात पालकमंत्री पाटील, अभिनेता पाटेकर आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सामाजिक वीण पुन्हा घट्ट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नावर मते व्यक्त केली.

कोरेगाव भीमा अथवा यासारख्या कोणत्याही प्रश्नावर तरुण हातात दगड घेतात याचे कारण शोधले पाहिजे, असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले. जर तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला तर तो हातात दगड घेण्याचे टाळेल. कोरेगाव भीमासारख्या घटना विसरून पुढे चालले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

पाटेकर यांनी नुकतीच चित्रनगरीला भेट देऊन आल्याचे पालकमंत्र्यांना सांगितले. ७८ एकरांच्या माळावर चित्रीकरणासाठी ३५ लोकेशन आहेत. कोल्हापूर चित्रनगरीचे काम पूर्ण करण्याचे साकडे घालताना पाटेकर यांनी चिरमुरे, फुटाणे विकत घेण्यासारखे १२ कोटी दिले, दुसऱ्या टप्प्यात चार कोटी दिले असे न सांगता घसघशीत १०० ते १५० कोटी रुपये द्या, अशी थेट मागणी पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली. जर सरकारकडे रक्कम नसेल तर बीओटो तत्त्वावर काही प्रकल्प राबवा; पण चित्रनगरी सुरू करा असे सांगितले. पाटेकर यांनी आग्रह धरल्यावर एक वर्षात चित्रनगरी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. दादा, चित्रनगरीसाठी तुमच्या घरी शंभरावेळा खेटे मारण्याची माझी तयारी असल्याचे पाटेकर यांनी बोलून दाखवले.

मुंबईतील चित्रनगरीत जीव गुदमरून जातो. दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या चित्रनगरीत जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. त्याऐवजी कोल्हापुरात स्वच्छ, मोकळ्या हवेत, शूटिंग करण्यासाठी कलाकार पळत येतील, असे सांगायलाही नाना पाटेकर विसरले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतन अहवालाची होळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एसटी कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या तुटपुंज्या वेतनवाढीच्या अहवालाची होळी एसटी कर्मचारी कृती समितीने विभागीय कार्यालयासमोर केली. उच्चस्तरीय समितीने एकतर्फी लागू केलेल्या अहवालात फक्त साडेपाच टक्के वेतनवाढ दर्शविली आहे. ही वाढ कर्मचाऱ्यांची चेष्टा करणारी असल्याचा आरोप करुन अहवालाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या विरोधात ९ फेब्रुवारीला मुंबईत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

कर्मचाऱ्यांना योग्य पगारवाढीसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कृती समितीने दिवाळीच्या काळात संप केला होता. हा संप न्यायालयाने बेकायदेशीर ठरविला. न्यायालयाचा मान ठेऊन कर्मचाऱ्यांना हा संप मागे घेतला. त्यावेळी वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली. या समितीने तुटुपुंजी वेतनवाढ करण्याचा गोपनीय अहवाल सादर केला. हा अहवाल सादर करण्यासाठी जादा वेळ घेतला. उच्चस्तरीय समितीने संप केलेल्या संघटनाच्या सोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे ठरले होते. त्या संदर्भात न्यायालयानेही आदेश दिले होते. मात्र या समितीने संघटनांची कोणतीही चर्चा केलेली नाही. त्याऊलट सादर केलेल्या अहवालाची प्रत संघटनांना देऊन अवहेलना केली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा हा अपमान आहे. या समितीने पुन्हा १६ जानेवारी २०१७ मध्ये तुटपुंज्या वेतनवाढीचा अहवाल सादर करून कर्मचारयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. साडेपाच टक्के वाढीमुळे केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात ९०० रुपयांची वाढ होते. आंदोलनात एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव वसंत पाटील, विभाग अध्यक्ष उत्तम पाटील, एसटी वर्कस काँग्रेसचे सचिव अप्पा साळोखे, अध्यक्ष आनंदा दोपारे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिने लांबवण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन परप्रांतीय संशयितांना करवीर पोलिसांनी अटक केली. राजेशकुमार धनिलसा एटेरा (वय २०) आणि गगनकुमार शिवनसाव एटेरा (२०, दोघेही रा. लक्ष्मीपूल, ता. बराली, जि. कटिहाल, बिहार) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेनऊच्या सुमारास बहिरेश्वर (ता. करवीर) येथे प्रियंका संभाजी बचाकटे (२६)यांच्या घरात फसवणुकीचा प्रयत्न घडला.

करवीर पोलिसांनी सांगितले की, प्रियंका बचाकटे यांच्या घरी गुरुवारी सकाळी दोन तरुण आले. त्यांनी पितळ आणि तांब्याची भांडी घासण्याची पावडर विकत असल्याचे सांगितले. त्यांनी प्रियंका यांना तांब्याची कळशी, चांदीचे पैंजण पॉलिश करून दिले. प्रियंका यांचा विश्वास संपादन करून त्यांनी सोन्याच्या पाटल्याही पॉलिश करून देऊ असे सांगितले. नंतर सोन्याच्या पाटल्या घेऊन ते पळ काढण्याच्या तयारीत होते. यावेळी बाहेर गेलेल्या प्रियंका यांच्या सासू घरात परतल्या. दोन्ही संशयित सोन्याच्या पाटल्या घेऊन जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलवून संशयितांना पकडले. याबाबत करवीर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस बहिरेश्वर येथील प्रियंका यांच्या घरी पोहोचले. राजेशकुमार आणि गगनकुमार एटेरा या दोन्ही संशयितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रियंका यांनी फिर्याद दाखल केली. संशयितांनी अन्य कोणाची फसवणूक केली आहे काय? याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महामोर्चासाठी वाहतुकीत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रविवारी (ता. २८) शहरात होणाऱ्या लिंगायत समाजाच्या महामोर्चासाठी पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. अवजड वाहतूक पर्यायी मार्गांने वळवली आहे. दसरा चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक बंद राहणार आहे. मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांना पार्किंगची १३ ठिकाणी व्यवस्था केली आहे. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

शहरात रविवारी विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजबांधवांचा महामोर्चा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमधून मोठ्या संखेने लोक मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यांच्या आसपास आणि शहरातील रिकाम्या जागांवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. पार्किंगसाठी १३ ठिकाणे जाहीर केली आहेत. याशिवाय दसरा चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, स्वयंभू गणेश मंदिर, सीपीआर चौक आणि जुन्या वाहतूक नियंत्रण कार्यालयापासून पर्यायी मार्गाने वळवली आहे. मोर्चासाठी पोलिस अधीक्षक, आठ वरिष्ठ अधिकारी, ८०० पोलिस, ५०० होमगार्ड आणि एसआरपीची एक तुकडी बंदोबस्तासाठी असेल. रविवारी सकाळपासून मोर्चाचा समारोप होईपर्यंत याची अंमलबजावणी होईल.

वाहतुकीतील बदल

दसरा चौक हे मोर्चासाठी मुख्य ठिकाण असल्याने रविवारी सकाळपासून दसरा चौकाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. स्टेशन रोडवरील वाहतूक गोकुळ हॉटेलपासून पुढे गवत मंडई, पार्वती टॉकीज चौक मार्गे वळवली आहे. पंचगंगा पुलाकडून दसरा चौकाकडे येणारी वाहतूक सीपीआर चौकातून खानविलकर पंपाकडे वळवली आहे. व्हीनस कॉर्नर, स्वयंभू गणेश मंदिर, सीपीआर चौक आणि जुने ट्रॅफिक ऑफिसपासून वाहनांना दसरा चौकाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. याशिवाय मोर्चा काळात शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.

पार्किंगची व्यवस्था

लिंगायत महामोर्चावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रवेश नाके आणि शहरातील रिकाम्या जागांवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. ताडवे हॉटेलमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी सासने ग्राऊंड आणि एस्तर पॅटर्न हायस्कूलच्या मैदनात व्यवस्था केली आहे. शिये, वडगाव, इस्लामपूर, शिराळा, आष्टा परिसरातील वाहनांसाठी एस्टर पॅटर्न, १०० फुटी रोड, कसबा बावडा पॅव्हेलियन, आर. व्ही. ग्राऊंड या ठिकाणी पार्किंग असेल. कागल, कर्नाटक परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी राजारामपुरीतील ९ नंबर शाळेचे मैदान, आयर्विन हायस्कूलचे मैदान, युको बँक परिसरात पार्किंगची व्यवस्था आहे. गारगोटी, भुदरगडकडून येणाऱ्या वाहनांसाठी शाहू दयानंद हायस्कूल, शिवाजी स्टेडियममध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. गगनबावडा, सिंधुदुर्गकडून येणाऱ्या वाहनांसाठी पंचगंगा नदी घाटावर पार्किंग असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-रत्नागिरी हायवेवर भीषण अपघात, ८ ठार

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर फियाट पिंटो कारला झालेल्या भीषण अपघातात ८ जण जागीच ठार झाले आहेत. तर आणखी दोखे गंभीर आहेत. मृतांमध्ये ३ लहान मुले, २ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. अपघातात मरण पावलेले सर्वजण पुण्याचे रहिवाशी आहेत. ​आज सकाळी पावणे अकरा वाजता तळवडे गावाजवळ हा भीषण अपघात झाला.

mh11 aw 6600 ही फियाट पिंटो ही भरधाव वेगाने गणपतीपुळ्याकडे निघालेली असताना तळवडे गावजवळ एका झाडावर धडकली. अपघातानंतर या कारची झालेली अवस्था पाहता या भीषण अपघाताची कल्पना येते.


अपघातातील मृतांची नावे:


१) प्रशांत सदाशिव पाटणकर (४०), भागीरथी हाऊस पिंपळे गुरव ,पुणे

२) संतोष त्रिंबक राऊत (३७), शेवाळेवाडी ,हडपसर पुणे

३) स्नेहल संतोष राऊत (३२) शेवाळेवाडी, हडपसर, पुणे

४) स्वानंद संतोष राऊत (५ ते ६ वर्षे) शेवाळेवाडी, हडपसर, पुणे

५) दीपक बुधाजी शेळकंदे (४०) साई पार्क, लक्ष्मी सुपर मार्केट समोर, दिघी, पुणे

६) प्रणव दीपक शेळकंदे (३), साई पार्क, लक्ष्मी सुपर मार्केट समोर, दिघी, पुणे


अपघातातील जखमींची नावे:


१) वरूणा दीपक शेळकंदे (४०), साई पार्क, लक्ष्मी सुपर मार्केट समोर, दिघी, पुणे

२) यदन्या दीपक शेळकंदे वय (३), साई पार्क, लक्ष्मी सुपर मार्केट समोर, दिघी, पुणे

दोन्ही जखमींवर सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे उपचार करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलावरून बस नदीत कोसळली

$
0
0

कोल्हापूर

शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. गणपतीपुळेहून दर्शन घेऊन परत येत असताना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला.

बसमध्ये एकाच कुटुंबातील १७ जण होते. पुणे बालेवाडी येथील भरत केदारी यांचे हे कुटुंब असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. बसचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने शिवाजी पुलाचा कठडा ओलांडून बस १०० फूट खाली पंचगंगा नदीत कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अपघातात चार जणांना वाचवण्यात यश आल्याचं कळतंय. त्यांना जवळच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस आणि स्थानिक तरुणांकडून घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. बस बाहेर काढण्यासाठी तीन क्रेनची मदत घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधन दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मालवाहतुकीसाठी डिझेलची वाहने वापरली जात असल्याने विविध सेवांचा दर वाढत आहे. धान्य, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे एसटीच्या तिकीट दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. किराणा मालाच्या दरातही काही प्रमाणात वाढ होणार आहे. महागाईचा भडका आणखी उडणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर वधारल्याचे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यानंतर पेट्रोलच्या दरात सरासरी २ रुपये ६२ पैसे आणि डिझेलच्या दरात ५ रुपये ३३ पैसे वाढ झाली. सध्या पेट्रोल ८० रुपये ३५ पैसे आणि डिझेल ६६ रुपये ६९ पैसे दराने विक्री सुरु आहे. या दरवाढीचा मोठा फटका वाहतूक व्यवस्थेला बसणार आहे. देशभरातून वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो, डंपरच्या वाहतूकीचे दर वाढणार आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहतूकीच्या खर्चात वाढ होणार आहे. ऊस वाहतूक, वाळू, बॉक्साइट, उद्योगातील वाहतूकीसाठी लागणारे १६ चाकी ट्रक वाहतुकीसाठी दर करारानुसार भाड्यात वाढ केली जाणार आहे.

जिल्ह्यात सुमारे १६ हजार ट्रक आहेत. पैकी शहरात वाहतूक करणाऱ्या ट्रकची संख्या ५ हजार आहे. दरवाढीमुळे स्थानिक वाहतूक करणारे काही ट्रक थांबून राहिले आहेत. अनेक ठिकाणी दरभाडे हे ट्रकमालकापेक्षा मालाची आयात करणारे मूळ मालक ठरवित आहे. योग्य दर मिळत नसल्याने त्याचा मोठा फटका ट्रक व्यवसायावर झाला आहे. भाजीपाल्याची वाहतूक कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यात केली जात आहे. ही वाहतूक करणाऱ्या मालकांनी डिझेल दर वाढल्याने वाहतूकीच्या खर्चात वाढ केली आहे. त्याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसांत भाजीपाला दरातही वाढ होणार आहे. पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून किराणा मालाचे स्थिर असलेले दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

इंधनवाढीचा फटका उद्योग क्षेत्राला बसणार आहे. गोशिमा, स्मॅक आणि मॅक या तीन्ही औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात बसणार आहे. वाहतुकीसाठी मोठ्या ट्रकचा वापर केला जातो. हजारो किलोमीटरपर्यंत कोल्हापुरच्या उद्योग क्षेत्रातून वाहनांचे आणि फाउंड्रीचे पार्ट जातात. डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहतुकीच्या खर्चात वाढ होणार आहे. उद्योगांचे बजेटमध्ये वाढ होणार आहे.

- संदीप पाटील, उद्योजक

जिल्ह्यातील ट्रक मालकांना दर वाढीचा फटका बसत आहे. काही ठिकाणी ट्रक कार्यालय आणि घरात थांबून आहे. दरवाढीचा मोठा फटका व्यवसायावर होत आहे. ज्या प्रमाणात दर वाढले आहेत, त्या प्रमाणात भाडे दर मिळत नाही. व्यवसाय होत नसल्याने काही मालकांनी ट्रक विक्रीसाठी काढले आहेत. देशभर वाहतूकीसाठी डिझेल वापरले जाते. या डिझेल दराची किंमत परवेडल इतकी हवी.

- भाऊ घोगळे, उपाध्यक्ष, जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन

कपिलतीर्थ मार्केटमधील सर्व ऊलाढाल वाहतुकीवर अवलंबून आहे. मोठ्या बाजारपेठेतून मालाची आयात केली जात आहे. यामध्ये टेम्पो, ट्रकतून मालाची वाहतूक केली जाते. लातूर, बीड, बेळगांवसह राज्यभरातून धान्याची आयात केली जात आहे. वाहतूक खर्च वाढल्याने हमालाची खर्चही वाढविला जातो. त्याचा फटका वस्तूंच्या किंमत वाढीवर होत असल्याने सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.

- संदीप वीर, कार्याध्यक्ष, किरकोळ व्यापारी असोसिएशन

गोवा राज्याने प्रवेश कर कमी केल्याने इंधनाचे दर कमी झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून जीएसटी आकारला जात आहे. त्यासह विशेष करही लागू केले जात आहे. देशभरात इंधनाचे दर समान ठेवण्याची गरज आहे. तरच ग्राहकांना चांगला फायदा होऊ शकेल. तीन वर्षापूर्वी ५० रुपये प्रतिलिटर मिळणारे पेट्रोलची किंमत ८० रुपये झाली आहे. त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

- निखिल भागवत, ग्राहक

तीन महिन्यांतील दर

१ नोव्हेंबर : पेट्रोल : ७६.४४, डिझेल ५९. ६५ पैसे

३१ डिसेंबर : पेट्रोल ७७.९७, डिझेल ६२. ५१ पैसे

१२ जानेवारी : पेट्रोल ७८.६३, डिझेल ६४. २१ पैसे

२१ जानेवारी : पेट्रोल : ८०.१० , डिझेल ६६. १५ पैसे

२५ जानेवारी : पेट्रोल : ८०. ३५, डिझेल ६६. ६९ पैसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत महामोर्चासाठी वाहतुकीत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रविवारी (ता. २८) शहरात होणाऱ्या लिंगायत समाजाच्या महामोर्चासाठी पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. अवजड वाहतूक पर्यायी मार्गांने वळवली आहे. दसरा चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक बंद राहणार आहे. मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांना पार्किंगची १३ ठिकाणी व्यवस्था केली आहे. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

शहरात रविवारी विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजबांधवांचा महामोर्चा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमधून मोठ्या संखेने लोक मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यांच्या आसपास आणि शहरातील रिकाम्या जागांवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. पार्किंगसाठी १३ ठिकाणे जाहीर केली आहेत. याशिवाय दसरा चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, स्वयंभू गणेश मंदिर, सीपीआर चौक आणि जुन्या वाहतूक नियंत्रण कार्यालयापासून पर्यायी मार्गाने वळवली आहे. मोर्चासाठी पोलिस अधीक्षक, आठ वरिष्ठ अधिकारी, ८०० पोलिस, ५०० होमगार्ड आणि एसआरपीची एक तुकडी बंदोबस्तासाठी असेल. रविवारी सकाळपासून मोर्चाचा समारोप होईपर्यंत याची अंमलबजावणी होईल.

वाहतुकीतील बदल

दसरा चौक हे मोर्चासाठी मुख्य ठिकाण असल्याने रविवारी सकाळपासून दसरा चौकाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. स्टेशन रोडवरील वाहतूक गोकुळ हॉटेलपासून पुढे गवत मंडई, पार्वती टॉकीज चौक मार्गे वळवली आहे. पंचगंगा पुलाकडून दसरा चौकाकडे येणारी वाहतूक सीपीआर चौकातून खानविलकर पंपाकडे वळवली आहे. व्हीनस कॉर्नर, स्वयंभू गणेश मंदिर, सीपीआर चौक आणि जुने ट्रॅफिक ऑफिसपासून वाहनांना दसरा चौकाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. याशिवाय मोर्चा काळात शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.

पार्किंगची व्यवस्था

लिंगायत महामोर्चावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रवेश नाके आणि शहरातील रिकाम्या जागांवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. ताडवे हॉटेलमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी सासने ग्राऊंड आणि एस्तर पॅटर्न हायस्कूलच्या मैदनात व्यवस्था केली आहे. शिये, वडगाव, इस्लामपूर, शिराळा, आष्टा परिसरातील वाहनांसाठी एस्टर पॅटर्न, १०० फुटी रोड, कसबा बावडा पॅव्हेलियन, आर. व्ही. ग्राऊंड या ठिकाणी पार्किंग असेल. कागल, कर्नाटक परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी राजारामपुरीतील ९ नंबर शाळेचे मैदान, आयर्विन हायस्कूलचे मैदान, युको बँक परिसरात पार्किंगची व्यवस्था आहे. गारगोटी, भुदरगडकडून येणाऱ्या वाहनांसाठी शाहू दयानंद हायस्कूल, शिवाजी स्टेडियममध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. गगनबावडा, सिंधुदुर्गकडून येणाऱ्या वाहनांसाठी पंचगंगा नदी घाटावर पार्किंग असेल.

पोलिस बंदोबस्त

पोलिस अधीक्षक - १

अपर पोलिस अधीक्षक - २

उपअधीक्षक - ६

निरीक्षक - २०

एपीआय, उपनिरीक्षक - ५०

पोलिस कॉन्स्टेबल - ८००

होमगार्ड - ५००

एसआरपी - १ तुकडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीत खेळाडूंना प्रमाणपत्र आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खेळाडू कोट्यातून पोलिस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेपूर्वीच विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. अर्जासोबत पडताळणी प्रमाणपत्र नसल्यास संबंधित खेळाडूंना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे खेळाडू कोट्यातून पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी ५ फेब्रुवारीपूर्वी पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे निवेदन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

गृह विभागाच्यावतीने ५ फेब्रुवारीला पोलिस भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पोलिस भरतीत राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना ५ टक्के आरक्षण दिले आहे. या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंना विभागीय क्रीडा उपसंचालकांकडून प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. पोलिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच पडताळणी प्रमाणपत्र उमेदवाराने प्राप्त करणे गरजेचे आहे. भरतीसाठी अर्ज करतानाच पडताळणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागणार आहे. अर्जासोबत पडताळणी प्रमाणपत्र जोडले नसल्यास संबंधित उमेदवारांना खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. असे अर्ज खुल्या गटात गृहित धरले जातील. खेळाडू आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पडताळणी प्रमाणपत्रांसह विहीत नमुन्यातील अर्ज भरावा, असे निवेदन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी प्रसिद्धीस दिले आहे. यापूर्वी बहुतांश खेळाडू भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रमाणपत्र पडताळणी अर्ज विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयात सादर करीत होते. भरती झाल्यानंतर पडताळणी प्रमाणपत्र सादर केले जात होते. आता सुधारित तरतुदींनुसार पोलिस भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच खेळाडूंना पडताळणी प्रमाणत्र घेऊन ते अर्जासोबत जोडावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलीला चिथावणी देणारे नामानिराळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जे बंद पुकारतात, दंगलीला चिथावणी देतात, त्यांची त्यांची मुले कधीच हातात दगड घेत नाहीत. ती परदेशात शिकत असतात. चिथावणी देणारे घरात बसतात व ज्यांच्या हातात काम नसते ते तरुण आपला राग व्यक्त करण्यासाठी नेत्याच्या आवाहनाला बळी पडतात. गंभीर चुका करतात. अटक होतात. तुरुंगात जातात. त्यांचे करिअर उधवस्त होते. जमाव ज्यावेळी प्रक्षुब्ध होतो, गोळीबाराची परिस्थिती उद्भवते तेव्हा पहिला मला गोळ्या घाला असे म्हणणाराच खरा नेता असतो, हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे', असे परखड मत अभिनेता नाना पाटेकरने व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस मैदान उद्यान येथे आयोजित सद्भावना मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील 'दादा-नाना' मुक्त संवाद कार्यक्रम चांगलाच रंगला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही कोरेगाव भीमा घटनेतील पोलिसांनी हाताळलेल्या परिस्थितीची माहिती दिली.

अभिनेता नाना पाटेकर म्हणाले, 'राजकीय स्थैर्य डळमळीत झाले की राजकीय नेते वाद घडवून आणतात. अशावेळी प्रत्येक भारतीयाने आपली जात,धर्म विसरुन मी भारतीय आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. सरकार व पोलिसांनी दंगल घडवणाऱ्यांवर व हुल्लडबाजांवर कारवाई केली पाहिजे. दंगा करणाऱ्यांना व दंगल घडवणाऱ्यांना जाब विचारला कोणीतरी आहे, या भावनेने सरकार, पोलिस प्रशासनाने काम केले पाहिजे. उत्पन्नाचे स्त्रोत, नोकऱ्या आदी कारणांमुळे निर्माण झालेल्या तरुणांमधील असंतोषाचा फायदा काही घटक आपल्या स्वार्थासाठी उठविण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रयत्नांना तरुणांनी बळी पडू नये. चांगल्या घटनांमधून सकारात्मक ऊर्जा शोधली पाहिजे. वाईट घडून गेलेल्या घटना लवकरात लवकर विसरून आपण समाज म्हणून एकत्र येऊ या.'

संवादाच्या सुरुवातीला पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कोरेगाव भीमाची घटना आणि उमटलेल्या घटनांनी राज्यात संत महात्म्यांनी घट्ट विणलेली सामाजिक एकतेची वीण थोडी उसवली आहे. गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटना या क्लेशदायी असून माणसांच्या मनातून अजूनही जात गेलेली नाही, हेच या घटनांनी दाखवून दिले आहे. एखाद्या घटनेची प्रतिक्रिया जबाबदारीने कशी द्यावी, हे आज प्रत्येकाने शिकण्याची गरज आहे. आपण प्रथम भारतीय आहोत याचे भान प्रत्येकाने ठेवावे.'

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कोरेगाव-भीमा येथील घटनेच्यावेळी पोलिसांनी दोन्ही गट समोरासमोर येऊ देण्याचे नियोजन केल्याने मोठी जिवितहानी झाली नाही असे स्पष्ट केले. दंगेखोरांवर कडक कारवाई केली जात आहे. अनेकांना अटक केली आहे. संशयितांना जामीन मिळालेला नाही. एकीकडे कायदेशीर कारवाई सुरू असताना जाती-धर्मातील तेढ कमी करण्यासाठी व एकोपा साधण्यासाठी पोलिस मध्यस्त्याची भूमिका घेत असल्याचे सांगितले. चारुदत्त जोशी यांनी परिसंवादाचे संचालन केले. पोलिस अधीक्षक संजय माहिते यांनी आभार मानले.

तेढ निर्माण करू नका...

'सीमेवर आपले जवान चौदा-चौदा तास कडाक्याच्या थंडीत कर्तव्य बाजावत असतात. प्रसंगी प्राणांची आहुती देतात याची जाणिव ठेवून क्षुल्लक गोष्टींवरुन समाजात तेढ निर्माण करु नये', असे पाटेकर यांनी सांगितले. 'शहरात दु:खाच्या व्याख्या ठरलेल्या असतात. शेतकऱ्यांची अवस्था बघितली की आपल्या दु:खाच्या व्याख्या बदलतात' याकडे पाटेकर यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघाताची सात दिवसात चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवाजी पुलावरून नदीत कोसळलेल्या मिनी बस अपघातप्रकरणी नवीन पर्यायी पुलाचे काम रोखणारे दोषी आहेत. धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू ठेवून अधिकाऱ्यांनी प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,' अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे. करवीर उपविभागीय उपअधीक्षकांकडून चौकशी करून सात दिवसांत दोषींवर गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले आहे.

शिवाजी पुलावरील अपघातानंतर पर्यायी पुलाच्या कामाला विरोध करणारे पर्यावरणप्रेमी आणि विविध विभागांचे अधिकारी नागरिकांच्या रोषाचे धनी बनले आहेत. सर्वपक्षीय कृती समितीने शनिवारी सकाळी तातडीने आर. के. पोवार यांच्या घरी बैठक घेतली. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी, महापालिकेचे तत्कालीन आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, महामार्ग प्राधिकरण, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आणि पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत संध्याकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात कृती समितीची बैठक झाली. यावेळी बोलताना कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, 'पर्यायी शिवाजी पुलाबाबत जिल्ह्यातील खासदारांनी अनेकदा आश्वासने दिली. पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा केल्याचे फलक झळकले. आम्ही साखर-पेढेही वाटले. मात्र, पूल काही तयार झाला नाही. अधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलून नागरिकांची फसवणूक केली. अपघाताला हेच अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत.'

अपघातात शिवाजी पुलावरील कठडा कोसळल्याने पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेट्स लावले होते. पुन्हा एखादे वाहन जाऊन अपघात होऊ नये, यासाठी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या वतीने कठडा कोसळलेल्या ठिकाणी बंधकाम सुरू केले होते. सिमेंट कॉँक्रिटचा कठडा बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच सर्वपक्षीय कृती समितीचे बाबा पार्टे काही सदस्यांसह पुलावर गेले. त्यांनी काम बंद पाडले. पुरातत्त्वच्या अखत्यारितील पुलाची दुरुस्ती करण्यासाठी कोणाची परवानगी घेतली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'स्वतंत्र धर्मा'साठी लिंगायत समाजाचा महामोर्चा

$
0
0

कोल्हापूर:

लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी या मागणीसाठी लिंगायत समाजाने आज कोल्हापुरात प्रचंड मोर्चा काढला. या मोर्चात लिंगायत समाजातील लाखो लोक सहभागी झाले होते.

कोल्हापूरच्या दसरा चौकात सकाळी १० वाजल्यापासून संपूर्ण राज्यभरातून आणि सीमाभागातून लिंगायत समाजातील हजारो लोक मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात तरुणांचा भरणा अधिक होता. या मोर्चाचे दसरा चौकातच सभेत रुपांतर झाले. या सभेत विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी ७७ संघटनांनी स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीला पाठिंबा दिला. माजी महापौर स्वाती यवलुजे यांनीही सर्व नगरसेवकांच्या सोबत मोर्चात सहभागी होऊन स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी लावून धरली.

सभेनंतर लिंगायत समाजाच्यावतीने पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून घोषित करणे आणि अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. स्वत: चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, पंजाबच्या अकाली दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष समरजितसिंग मान, माजी आमदार संजय घाडगे आदींनी या मोर्चाला पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल दरवाढीविरोधात सेनेचा आज मोर्चा

$
0
0

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेल दरात सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाल्याने दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २९) शिवसेनेच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता शिवाजी चौकातून मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केले.

मोर्चा शिवाजी चौकातून बिंदू चौक, आयोध्या टॉकीज, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात येणार आहे. यावेळी शिवाजी पुलावर झालेल्या दुर्घटनेमध्ये मदतकार्य केलेल्या बुधवार पेठेतील युवकांचा सत्कार आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते केला. इंधन दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेसच्यावतीने मंगळवारी (ता. ३०) मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. बैलगाडी, सायकलवरून मोर्चा काढून शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात डॉक्टरांना २९ लाखांना फसवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डी मॅट अकाऊंटच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील चार डॉक्टरांची ३० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत कुणाल भरत कामत (ओम बिल्डिंग, शिवाजी पेठ, कोल्हापूर) या सबब्रोकरसह एंजल ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर (आकृती ट्रेड सेंटर, अंधेरी एमआयडीसी मुंबई) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अभिजित आप्पासाहेब पाटील (वय ४२, रा. पूर्वरंग, राजारामपुरी, १३ वी गल्ली, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 'महाराष्ट्र टाइम्स'ने दोन महिन्यांपुर्वीच या फसवणुकीचे वृत्त दिले होते.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पेठेतील कुणाल कामत हा मुंबईतील एंजल ब्रोकिंग कंपनीसाठी सबब्रोकर म्हणून कोल्हापुरात काम करतो. त्याने कोल्हापुरातील काही डॉक्टरांना डी मॅट अकाऊंटची माहिती दिली. याद्वारे कमी कालावधीत जास्त आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने चार डॉक्टरांचे डी मॅट अकाऊंट सुरू केले. यात डॉ. अभिजित पाटील यांनी नऊ लाख ८० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. याशिवाय डॉ. विठ्ठल अण्णासाहेब भोसले यांनी दोन लाख २० हजार रुपये, डॉ. विद्या भरत ठाकर यांनी ११ लाख ३५ हजार रुपये, तर डॉ. प्रसाद सुनील देसाई यांनी पाच लाख २२ हजार रुपये असे चौघांनी २८ लाख ८७ हजार रुपये गुंतवले होते.

डॉक्टरांनी २०१४ पासून पैशांची गुंतवणूक केली होती. गेल्या काही दिवसांत सबब्रोकर कामत याने गुंतवणुकदारांची परवानगी न घेताच डी मॅट अकाऊंटवरून शेअर्सची खरेदी-विक्री केली. यामुळे चारही डॉक्टरांचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. याबाबत सबब्रोकर कामत आणि एंजल कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. दोन महिन्यांपूर्वी 'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून फसवणुकीचा प्रकार सामोरा आणला. सबब्रोकरने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात डॉ. अभिजित पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी कुणाल कामत याच्यासह एंजल ब्रोकिंग कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित तपास करीत आहेत. अशा पद्धतीने अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हापूस आंबा कोल्हापुरात दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा शनिवारी (ता.२७) दाखल झाला. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला ९,५०० रुपयांचा दर निघाला. पहिला सौदा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते काढला.

कोल्हापुरात साधरत: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आंब्याची आवक सुरू होते. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. जैतापूर (ता. देवगड) येथील शेतकरी एस. जी. गोवेकर यांचा हापूस आंबा इकबाल मेहबूब बागवान यांच्या अडत दुकानात आला होता. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला उच्चांकी ९,५०० रुपये दर मिळाला असून सलीम बागवान यांनी आंबा खरेदी केला.

पाच डझनाला सुमारे दहा हजार रुपये दर मिळाल्याने एका डझनाचा दर कमीत-कमी दोन रुपये होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊन दर आवाक्यात येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या सौद्यावेळी समितीचे सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे, संचालक परशराम खुडे, सर्जेराव पाटील-गवशीकर, नंदकुमार वळंजू, विलास साठे, शारदा पाटील, सचिव दिलीप राऊत यांच्यासह समितीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images