Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पर्यटनस्थळांचा विकास ‘कागदावर’च

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

Twitt:satishgMT

कोल्हापूर ः ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गरम्य परिसरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला मोठी संधी आहे. देशविदेशातील पर्यटकांकडून कोल्हापुरात देवदर्शन घेऊन गोवा आणि कर्नाटककडे जातात. पर्यटकांचे कोल्हापुरात वास्तव्य वाढावे, यासाठी पायाभूत सुविधा, पर्यटनस्थळांचा विकास, पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना व्हाव्यात यासाठी अनेक योजना राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. पण या योजना अद्याप कागदावरच राहिल्या आहेत. त्या पूर्णत्वास येण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने योजनांचे कागदी घोडे नाचवण्याऐवजी पर्यटनासंबंधीच्या योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा

२००९ मध्ये आघाडी सरकारच्या काळापासून सुरू झालेले अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम अद्याप सुरुच आहे. २५० कोटींचा हा आराखडा तयार करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ७० कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात ९० कोटी निधी देण्याची राज्य सरकारकडून घोषणा झाली. दर्शन मंडप आणि पार्किंग अशी पहिल्या टप्प्यातील कामे होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर नवरात्र उत्सवात दर्शन मंडप कामाचा प्रारंभ होईल, असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांसमवेत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक झाली, पण अजूनही तीर्थक्षेत्र विकासाच्या कामाचा नारळ फुटलेला नाही.

जोतिबा तीर्थक्षेत्र विकास

जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह २५ कोटी रुपये निधीला मंजुरीही मिळाली आहे. पाच कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे. दर्शन मंडप व टॉयलेट कॉम्प्लेक्स, घनकचरा व्यवस्थापन, इलेक्ट्रीकल, पाणी पुरवठा या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात कामांच्या वर्कऑर्डर अद्याप निघालेल्या नाहीत.

पन्हाळा लाइट अँड साउंड शो

पन्हाळा व पावनखिडींचा इतिहास पर्यटकांना माहित व्हावा, यासाठी पन्हाळा येथे लाइट अँड साउंड शोसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अंदमान सेल्युलर जेल आणि गोवळकोंडा किल्ल्याच्या धर्तीवर लाइट अँड साउंड शोचे नियोजन मंजूर केला आहे. पन्हाळा नगरपरिषदेने या प्रकल्पाला मंजुरी मिळावी, म्हणून केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव वेळेत मंजूर होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

माणगाव परिषद

हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे झालेल्या माणगाव परिषदेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणाच्या विकासाची योजनाही आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत ही परिषद झाली होती. या परिसराचे सामाजिक महत्त्व लक्षात घेता माणगावातील या स्थळाचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने दोन कोटी निधीची घोषणा केली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून या कामाचा पाठपुरावा सुरु असला तरी प्रत्यक्षात काम सुरु झालेले नाही.

लक्ष्मी विलास पॅलेस,शाहू जन्मस्थळ

राजर्षी शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस जन्मस्थळांचे काम गेली अनेक वर्षे सुरु आहे. आजअखेर निधीतून सर्व दालनांचे काम पूर्ण झाले असले तर राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित आर्ट गॅलरीचे काम अपूर्ण आहे. त्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य पुरातत्त्व विभागाकडून चित्रे आणि ​शिल्पे घडवण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु असली तरी त्याला प्रतिसाद ​न मिळाल्याने हे काम रखडले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या कला​ विभागाकडून चित्रे व शिल्पे तयार करुन घ्यावीत, असा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वी शाहू जन्मस्थळ समितीने देऊनही सरकारने निर्णय घेतलेला नाही.

पंचगंगा घाट विकास

पंचगंगा घाट विकास संवर्धनासाठी राज्य सरकारने चार कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दगडी प्रवेशव्दार, बागबगीचा, नवीन घाटबांधणी, घाटांचे संवर्धन करण्यात येणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने कामास मंजुरी दिली असून प्रत्यक्षात कामास प्रारंभ झालेला नाही.

३०३ फूट तिरंगा ध्वजाचे दर्शन क्वचितच

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ३०३ फूट उंचीवरील तिरंगा ध्वज व पोलिस उद्यानाचे उद्घाटन एक मे रोजी झाले आहे. वर्षभर तिरंगा ध्वज फडकत राहील, अशी घोषणा यावेळी करण्यात आली होती. पर्यटक हा ध्वज पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतील व नवीन पर्यटनस्थळ विकसीत होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री पाटील यांनी त्यावेळी केली होती, पण वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे गेल्या सहा महिन्यात ५० दिवसही तिरंगी ध्वज फडकू शकलेला नाही.

००००००

कोल्हापुरातील पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरु आहे. काही कामांना मंजुरी मिळाली असून काही कामांच्या वर्कऑर्डर दोन महिन्यात काढण्यात येतील. दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जवसुलीसाठी पुन्हा ढोल-ताशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बड्या थकबाकीदारांकडून कर्जवसुली करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने ढोल-ताशा गजरात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वसुली मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा बँकेकडून घेतलेल्या मोठ्या थकबाकीदार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन ढोल-ताशा वाजवत बँकेचे संचालक व कर्मचारी थकबाकी भरण्याचे आवाहन करणार आहेत. गेल्यावर्षी सनई-चौघडा कर्जवसुली मोहीम राबवल्यानंतर बँकेच्या संचित तोटा भरुन काढण्यास चांगल्याप्रकारे यश मिळाले होते. त्यामुळे तशीच मोहीम पुन्हा राबवण्याचा निर्णय शुक्रवारी बँकेच्या संचालकांच्या वसुली समितीने घेतला.

२०१५ मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर नूतन संचालकांसमोर कर्जवसुलीचे मोठे आव्हान होते. बँकेचा परवानाच धोक्यात आल्याने संचालक मंडळानेही बड्या थकबाकीदारांच्या दारात जावून कर्जवसुली मोहीम राबवली. बँकेने एकरकमी कर्जफेड योजनेला थकबाकीदारांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. बँकेच्या कर्जवसुली मोहिमेमुळे बँकेचा संचित तोटा भरुन काढण्यात यश आले होते. तरीही काही संस्थांच्याकडे अद्याप थकीत कर्जाची रक्कम मोठी असल्याने पुन्हा ढोल-ताशा घेवून कर्जवसुली मोहीम राबवण्यात येणार आहे.

राधानगरी तालुका शेतकरी सहकारी मक्का प्रक्रिया कारखाना (ठिकपूर्ली), विजयमाला देसाई ऊस तोडणी-वाहतूक संस्था (मडिलगे), भोगावती कुक्कुटपालन संस्था (परिते), शाहू मार्केट यार्ड नागरी सहकारी पतसंस्था आणि शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. गेल्यावर्षीच्या मोहिमेत या संस्थांच्या अध्यक्षांच्या निवासस्थानासमोर सनई-चौघडा वाजवण्यात आला. त्यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काही रक्कम भरण्याची तयारी दर्शवली. पण नंतर कर्जवसुली न झाल्याने पुन्हा ही मोहीम असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहीम हाती घेण्याचा निर्णय शुक्रवारी संचालकांच्या वसुली समितीमध्ये घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार पोलिसांवर आरोपपत्र दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील शिक्षण संस्थेच्या इमारतीत झालेल्या चोरीचा तपास करताना कोट्यवधींची रक्कम हडप करणाऱ्या चार पोलिसांवर सीआयडीने शुक्रवारी (ता. २७) पन्हाळा कोर्टात आरोपपत्र दाखल केले. सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा निलंबित निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार दीपक पाटील आणि पोलिस नाईक कुलदीप कांबळे या चौघांचा यात समावेश आहे.

वारणा लुटीचे कोडोली पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. यातील १५ मार्च २०१६ मध्ये पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट याने तीन सहकाऱ्यांसह तपासाच्या बहाण्याने ३ कोटी १८ लाख लंपास केले होते. गुन्ह्याचा तपास सीआयडी करीत असून, सीआयडी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पन्हाळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जी. बेहेरे यांच्याकडे चौघांवर आरोपपत्र दाखल केले. १२७० पानांच्या आरोपपत्रात पदाचा गैरवापर, बनावट कागदपत्रे तयार करणे, संगनमताने अपहार, वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक असे प्रमुख मुद्दे समाविष्ट आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपअधीक्षक दीपक कांबळे आदींनी ही कारवाई केली.


कुरळपकरच्या मालमत्तेवर टाच

संशयित आरोपी सहायक पोलिस निरीक्षक शरद कुरळपकर पोलिसांना गुंगारा देऊन पळाला आहे. त्यामुळे त्याची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. यासाठी सीआयडीचे अधिकारी मालमत्तेचा तपशील जमा करीत आहेत. आठ दिवसांत कुरळपकर हजर न झाल्यास मालमत्तेवर टाच येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तातडीने ड्रेनेज पाइपलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीमध्ये दररोज ५० एमएलडीहून अधिक मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने पंचगंगेच्या प्रदूषणाची गंभीरता लक्षात आल्यानंतर जयंती नाल्याजवळ सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइन जोडणीचे काम महापालिकेच्यावतीने शनिवारपासून युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे. तात्पुरता नवा लोखंडी पूल उभा करून नवीन पाइपलाइन टाकण्यात येत असून त्यातून पहिल्या टप्प्यात भुयारी गटारीतून जमा होणारा जवळपास १५ एमएलडी मैला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे पाठवण्याचे नियोजन केले आहे. प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या पाहणीदरम्यान या कामाची रुपरेषा ठरवण्यात आली.

सांडपाणी वाहून नेणारी पाइलपाइन तुटल्याने जयंती नाल्याजवळील संप हाऊसमधून उपसा केले जाणारे ५० एमएलडी सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे ३८ गावांना धोका निर्माण झाला असल्याने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या समितीतील पाहणी समितीने शुक्रवारी पाहणी केली. त्यामध्ये जयंती नाल्यावरील मुख्य ठिकाणी दुपारी भेट दिली.यावेळी प्रांताधिकारी इथापे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राज कामत, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी, आर. के. पाटील, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, तलाठी प्रल्हाद यादव उपस्थित होत. यावेळी उदय गायकवाड म्हणाले, तुटलेली पाइपलाइन जोडण्यासाठी पुर्ण पुलाची उभारणी न करता तात्पुरत्या लोखंडी पुलाची उभारणी करावी. त्यासाठी सांडपाणी अडवून काम करणे शक्य आहे. या कामासाठी कमीत कमी वेळ लागेल. या पाइपलाइनमधून जयंती नाल्यातून येणारे सर्व सांडपाणी उपसण्यापेक्षा भुयारी गटार योजनेतून येणारा १५ एमएलडी मैला वाहून नेण्याचे नियोजन होऊ शकते. त्यानंतर ही पाइपलाइन अन्य सांडपाणी उपसण्यास सक्षम आहे, असे वाटल्यास उर्वरित सांडपाणीही उपसा करता येऊ शकेल. या कामानंतर तेथील कोसळलेला पूल व पाइप हलवाव्यात.

प्रांताधिकारी इथापे यांनी जलअभियंता कुलकर्णी यांना या सूचनेबाबत मत विचारल्यानंतर अशा प्रकारे काम करणे शक्य असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानुसार तातडीने कंत्राटदाराला बोलवून घेतले व त्याला कशा पद्धतीने काम करायचे आहे याच्या सूचना दिल्या. इथापे व गायकवाड यांनी शनिवारपासूनच कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. जयंती नाल्यातील उपसा विहीरीमध्ये केवळ मैला घेतला जाणार असून तोपर्यंत सांडपाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर दुधाळी नाल्यातून मिसळणाऱ्या सांडपाण्याचीही समितीने पाहणी केली. तिथेही दिवसरात्र ब्लिचिंग पावडरचा डोस देऊन प्रदूषण कमी करण्याचे आदेश दिले. राजाराम बंधारा परिसरात केलेल्या पाहणीवेळी नदीची पातळी कमी झाली असल्याने तेथील दगडांचा भाग उघडा पडला आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता सोडले तर बंधाऱ्यात सांडपाणी जमा होईल व तिथे गंभीर परिस्थिती निर्माण होईल असे निदर्शनास आणून दिले.

ज्यावेळी जयंती नाल्याजवळून केवळ मैला उपसा केला जाईल, त्यावेळी त्या मैल्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रियेत बदल केले पाहिजेत असे सांगण्यात आले. १८० मिनिटांच्या प्रक्रियेच्या सायकलऐवजी त्या कालावधीत वाढ केली पाहिजे, अशी सूचना पर्यावरणप्रेमी गायकवाड यांनी केली. शहरातील सर्व मैला भुयारी गटारी योजनेतून जमा होत नाही. बंद पडलेल्या ३६ बेडची स्वच्छता करण्यात येणार आहे. दररोज किमान १५ टँकर या बेडवर टाकण्यात येण्याचे नियोजन केले आहे. याबरोबर जुन्या एसटीपीच्या कनेक्शनच्या काढण्यात आलेल्या दोन पाइप बसवण्यासाठीही शनिवारी पाहणी करण्यात येणार आहे. यामुळे जुन्या एसटीपीतून प्राथमिक प्रक्रिया करणे शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात तब्बल ६६० अतिक्रमणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विनापरवाना केबिन्स, खाद्यपदार्थांच्या मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी शुक्रवारी शहरात ६६० वर अतिक्रमणे असल्याचे स्पष्ट केले. अतिक्रमणे महिनाभरात हटवली नाहीत तर अधिकाऱ्यांना बांगड्या भरण्यासह आयुक्तांना महापालिकेत प्रवेश देणार नाही. असा इशारा शिवसेनेने शुक्रवारी दिला. अतिक्रमणमुक्तीच्या कामात कच खाणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवण्याची मागणीही शिवसेनेने केली.

​अतिक्रमणांच्या वाढत्या धोक्याबाबत जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ शुक्रवारी सकाळी आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. आयुक्त उपस्थित नसल्याने अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्याशी चर्चा केली. यावेळी संजय पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पवार म्हणाले, ‘अनेक ठिकाणी हातगाड्या, केबिन्स, मोबाइल व्हॅन दिसून येत आहेत. त्यांच्यामुळे अतिक्रमणांचा विळखा वाढत असून त्याला शहर अभियंता कार्यालय, अतिक्रमण निर्मूलन विभाग कारणीभूत आहे. काही लोकप्रतिनिधी खोट्या ठरावांद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. अशा कारभारामुळे जनतेला जीव मुठीत धरुन रस्त्यावर चालावे लागत आहे. अधिकारी व नगरसेवकांचा पैशाचा हव्यास कारणीभूत ठरत आहे. अनेकवेळा अतिक्रमणे काढण्याबाबत अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर पदाधिकारी दमदाटी करतात असे सांगितले जाते. अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा. त्यांना घरातच बसवा’.

अतिक्रमणांबाबत शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी शहरात ६६०हून अधिक अतिक्रमणे असल्याचे सांगितले. महिनाभरात त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही दिली. त्यामुळे शिवसेनेने या बैठकीत अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर न देता महिन्याची मुदत दिली. महिन्यात पोलिसांच्यामदतीने शहर अतिक्रमणमुक्त न झाल्यास अधिकाऱ्यांना बांगड्या भरण्यासह आयुक्तांना महापालिकेत प्रवेश देणार नसल्याचा इशारा दिला. उप जिल्हाप्रमुख सुजीत चव्हाण, रवी चौगुले, राजेंद्र जाधव, शशिकांत बिडकर, अवधूत साळोखे, राजेंद्र पाटील, दिलीप देसाई, संजय जाधव, पप्पू नाईक, सुनिल पोवार, निलेश जाधव, शुभांगी पोवार, दिपाली शिंदे, जयश्री खोत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांची टोळी अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पादचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण करून मोबाइलसह रोख रक्कम लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला गांधीनगर पोलिसांनी जेरबंद केले. स्वप्निल सुनील बुचडे (वय २३, रा. राजारामपुरी २ री गल्ली), अक्षय अशोक गिरी (२१) आनंदा लक्ष्मण वासुदेव (२२, दोघेही रा. जोशी गल्ली, विक्रमनगर) आणि सचिन शिवाजी आगलावे (२४, रा. विक्रमनगर) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. गांधीनगर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील चार मोबाईल, एक दुचाकी आणि रोख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

पुणे-बेंगळुरू महामार्गासह तावडे हॉटेल, उचगाव, राजाराम तलाव परिसरात पादचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील किमती ऐवज लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. सोमवारी (ता. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास अशोक कैलास प्रसाद हा त्याच्या आतेभावासह महामार्गावरून उजळाईवाडीकडे निघाला होता. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी उचगाव पुलावर प्रसाद याला अडवून तंबाखू मागण्याचा बहाणा केला.

यानंतर लुटारुंनी धमकावून दोघांकडील मोबाइल आणि रोख रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसाद आणि त्याच्या आतेभावाने प्रतिकार केल्याने दोघे लुटारू पळून गेले. यानंतर प्रसाद यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने दोन पथके तयार केली. संशयित तावडे हॉटेल परिसरात असल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पथकासह सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. स्वप्निल बुचडे, अक्षय गिरी, आनंदा वासुदेव आणि सचिन आगलावे यांनी चौकशीत गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील पाच मोबाइल, रोख ३० हजार रुपये आणि एक दुचाकी हस्तगत केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ, पोलिस हवालदार मोहन गवळी, सुभाष सुदर्शनी, विराज डांगे, आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बसवलेले कॅमेरे बंद केल्याने शुक्रवारी पुजारी आणि देवस्थान समिती पुन्हा एकदा आमने-सामने आले. समितीने पुजाऱ्यांच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेतला असून, कॅमेऱ्यांशी छेडछाड केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे ठणकावले आहे. समिती आणि पुजाऱ्यांच्या बैठकीत जोरदार वाद निर्माण झाल्याचे समजताच पुजारी हटाओ संघर्ष समितीने धाव घेऊन गाभाऱ्यावर मालकी हक्क गाजवू पाहणाऱ्या पुजाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी पुजाऱ्यांना बंदोबस्तात बैठकीतून बाहेर काढले.

अंबाबाई देवीच्या लाइव्ह दर्शनासाठी देवस्थान समितीने गुरुवारी दुपारी मंदिराच्या गाभाऱ्यात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. यानंतर संध्याकाळी काही पुजाऱ्यांनी कॅमेरे बंद केले. शुक्रवारी सकाळी कॅमेरे कापडात बांधून ठेवले होते. याबाबत समितीने तातडीने पुजाऱ्यांच्या प्रतिनिधींसह समिती कार्यालयात बैठक बोलवली. शुक्रवारी साडेअकराच्या सुमारास बैठक सुरू झाली. बैठकीसाठी पुजाऱ्यांच्यावतीने बाबुराव ठाणेकर, माधव मुनीश्वर, केदार मुनीश्वर, अनिल कुलकर्णी आणि गजानन मुनीश्वर उपस्थित होते. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी कॅमेरे बंद केल्याबद्दल पुजाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पुजाऱ्यांनी समितीला निवेदन दिले. ‘गाभाऱ्याची किल्ली पुजाऱ्यांकडे असते. मंदिरातील गाभाऱ्याचा कायदेशीर ताबा पुजाऱ्यांकडे आहे. समितीने बळजबरीने कॅमेरे बसवून पुजाऱ्यांच्या अधिकारावर गदा आणली आहे. कॅमेरे त्वरीत काढून घ्यावेत, अन्यथा समितीविरोधात कायदेशीर कारवाई करावी लागेल,’ असा इशारा समितीलाच दिल्याने अध्यक्ष जाधव, खजिनदार वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, सुभाष वोरा संतापले. पुजाऱ्यांनी कॅमेऱ्यांशी छेडछाड करुनही उलट उद्धट निवेदन देण्याचा प्रकार आहे, असा संताप पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर दोघांत जुंपली.

अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘पुजाऱ्यांना केवळ पूजेचा अधिकार आहे. गाभाऱ्याला कुलूप लावण्याची भाषा करणाऱ्या पुजाऱ्यांसाठी आमच्याकडे मंदिराच्या सर्वच दरवाजांच्या चाव्या आहेत. कॅमेऱ्यांना विरोध करण्याचा अधिकार पुजाऱ्यांना नाही. गाभाऱ्यातील कॅमेरे सुरूच राहतील. कॅमेऱ्यांशी छेडछाड केल्याबद्दल संबंधित पुजाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. त्यावर कुणाचा आक्षेप असेल तर त्याने कोर्टात जावे.’

शिवाजी जाधव यांनी पुजाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत गैरव्यवहाराचे आरोप केले. ते म्हणाले, ‘पारदर्शकतेला पुजाऱ्यांचा विरोध का? पुजारी आर्थिक घोळ करतात. देवीला येणारे दागिने लंपास करतात, त्यामुळेच गाभाऱ्यातील कॅमेऱ्यांना विरोध होत आहे.’

खजिनदार क्षीरसागर यांनीही कॅमेरे सुरूच राहतील असे पुजाऱ्यांना ठणकावले. वाद वाढल्याने बैठकीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी सदस्य शिवाजी जाधव आणि पुजारी बाबुराव ठाणेकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.

बैठकीची माहिती मिळताच पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी देवस्थान कार्यालयात धाव घेतली. संजय पवार यांनी बैठकीत जाऊन दमदाटी करणाऱ्या पुजाऱ्यांचा निषेध नोंदवला. यानंतर संघर्ष समितीचे आर. के. पोवार, विजय देवणे, दिलीप पाटील, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक आदींनी समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. कॅमेरे बंद करणाऱ्या पुजाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरला. पुजाऱ्यांनी मुद्दाम कुरापत काढून वाद वाढवला असल्याने यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास पुजारीच जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे सदस्य बी. एन. पाटील-मुंगळीकर, सहसचिव शिवाजी साळवी, आदी उपस्थित होते.

कॅमेरे पुन्हा सुरू

पुजाऱ्यांनी गाभाऱ्यातील कॅमेरे कापडाने झाकून ठेवले होते. कोणत्याही स्थितीत कॅमेरे सुरूच राहणार असे ठणकावत महेश जाधव यांनी कॅमेरे पुन्हा सुरू करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना बैठकीतूनच दिले. यानुसार कर्मचाऱ्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास गाभाऱ्यातील चारही कॅमेरे सुरू केले. कॅमेरे बंद केल्यास किंवा सुरू करण्यास विरोध केल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही जाधव यांनी पुजाऱ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिनॅशनल कंपन्याच राज्य चालवतात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘सध्या राज्याचा कारभार मुख्यमंत्री नव्हे तर राज्यातील मल्टिनॅशनल कंपन्या चालवत आहेत. सर्व्हिस सेक्टरमधून पैशाची निर्मिती होणे हे चुकीचे आहे. अर्थार्जनाचे स्रोत हे ज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झाले पाहिजेत. त्यामुळे भांडवलदारांना अभय देणाऱ्या सरकारने अशा कुबड्या वापरू नयेत. पुढील पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून काय द्यायचे याचा विचार करून शिक्षणाचे धोरण ठरवणे ही काळाची गरज आहे’ असे टीकास्त्र भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी सोडले. राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पहित्र्या सत्रात नवीन शैक्षणिक धोरण या विषयीच्या परिसंवादात अध्यक्षस्थानावरून डॉ. साळुंखे बोलत होते. या परिसंवादात डॉ. सुनीलकुमार लवटे, प्राचार्य आनंद मेणसे आणि डॉ. सागर देशपांडे यांनी सहभाग घेतला.

डॉ. साळुंखे म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरणाबाबत नूतन समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात या समितीने अहवाल द्यायचा असल्यामुळे या धोरणात संभ्रम होण्याची शक्यता आहे. शिक्षण पद्धतीत सार्वत्रिकरण झाल्यामुळे गुणवत्ता ढासळली आहे. ही गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने ताकद देण्याची गरज आहे. येत्या काळात जगभरात ज्ञानाचा वापर शस्त्रासारखा केला जाईल अशी परिस्थिती आहे. भविष्यात जगात जर युद्ध झाले तर ते ज्ञानाच्या आधारे होणार आहे. हे संकेत ओळखून ज्ञानकक्षेच्या पातळीवर ​शैक्षणिक धोरणाची रचना करणे हे आव्हान आहे. मात्र सरकारचे शैक्ष​णिक धोरणाबाबत आणि आर्थिक तरतूदींबाबत असलेले उदासीन धोरण पाहता सरकारची भूमिका अयोग्य आहे. पैसेवाल्या कंपन्यांना हाताशी धरून विकासाचे गणित आखणाऱ्या सरकारने नव्या पिढीला सक्षम बनवणाऱ्या शिक्षणावर खर्च करणे आवश्यक आहे.’

डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, ‘देशातील शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणे अपेक्षित आहे. माध्यमिक शिक्षण हा गाभा आहे. शिक्षणात नवीन धोरणांचा स्वीकार करून तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढवून बेकारांची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. बदलत्याकाळात शाळांची गुणवत्तावाढ झाली पाहिजे. त्यासाठी सुविधांवर सरकारने विशेष तरतूद केली पाहिजे.’

सागर देशपांडे म्हणाले, ‘देशात मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असेल तर महासत्ता बनवण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. सरकार बदलले की धोरण बदलते. आज समाजात चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला समाजातीलच काही घटक बहिष्कृत करतात. शिक्षण, शिक्षक, शाळांमधील सुविधा याबाबत शैक्षणिक धोरणात प्राधान्याने विचार झाला पाहिजे.’

प्राचार्य मेणसे म्हणाले, ‘शैक्षणिक धोरणात अपेक्षित असलेले बदल राजकीय इच्छाशक्ती असेल तरच दिसणार आहेत. ​शिक्षणावर सरकारने सहा टक्के निधी खर्च करणे गरजेचे असताना सध्या तो साडेतीनटक्केच खर्च होत आहे.’

ए. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अधिवेशनाचे अध्यक्ष संदिपान मस्तूद, महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जमाफीमुळे विकासकामांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुठे दुष्काळ तर कुठे अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटले. एकीकडे कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला. राज्याच्या एक लाख ५३ हजार कोटींच्या बजेटपैकी ३४ हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठीच गेल्याने त्याचा भार अन्य विकासकामांच्या निधीवर आला आहे. परिणामी यंदा राज्यातील सर्व विकासकामांच्या निधीत ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघाच्या अ​धिवेशनप्रसंगी शिक्षकांनी केलेल्या वेतनवाढ व शाळाअनुदान मागणीला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडला.

मंत्री पाटील म्हणाले, ‘राज्यातील सर्व खात्यांमधील विकासकामांना कात्री लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप सत्तेवर आल्यानंतरच्या पहिल्या सहा महिन्यातच दुष्काळाची परिस्थिती हाताळण्याचा सामना पक्षाला करावा लागला. तर यावर्षी अवकाळ व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रश्न वाढवले. ही परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांकडून सातत्याने होणारी कर्जमाफीची मागणी प्राधान्यक्रमाने विचारात घेण्यात आली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सरकारच्या तिजोरीतून जवळपास ३४ हजार कोटी रूपये खर्च झाले. उर्वरित बजेटपैकी वेतन, निवृत्तीवेतन आणि सरकारवर असलेल्या कर्जाचे व्याज भरण्यासाठी एक लाख कोटी रूपयांचा खर्च होतो. परिणामी राज्यातील विकासकामांवरील खर्चासाठी यंदा ५३ कोटी रूपये उरणार आहेत. हे गणित जुळवत असताना बचतीचा मार्ग अवलंबण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व खात्यातील विकासकामांवर खर्च होणाऱ्या निधीत ३० टक्के कपात करण्यात येणार आहे. दरम्यान, जीएसटीमुळे आर्थिक फायदा होत आहे. काहीठिकाणी बचतीचा पर्याय अवलंबला आहे. अटी, शर्तीचा समावेश असलेल्या क्षेत्रात दंडाची रक्कम वाढवून महसूलखात्यातील उत्पन्नात २४ हजार कोटी रूपयांची वाढ केली आहे. उत्पन्नवाढीचे नवे स्रोतही विचारात घेतले जात आहेत. मात्र याची फलश्रुती दिसण्यासाठी अजून आठ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत राज्यातील विविध संघटना, घटक यांच्या आर्थिक मागण्या पूर्ण होण्यासाठी धीर धरावा लागणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर हॉटेल, हॉस्पिटल्सचे परवाने रद्द करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील मैलामिश्रीत सांडपाण्याबाबत हॉटेल व हॉस्पिटलना नोटीस काढल्या असून त्यांनी मुदतीमध्ये एसटीपीचे काम न केल्यास किंवा ड्रेनेजेचा आउटलेट वेगळा न जोडल्यास हॉटेल, हॉस्पिटल सील किंवा परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे. ऑईल व ग्रीसचे पाणी बाहेर सोडल्याप्रकरणी एसटीलाही नोटीस काढण्यात आली आहे. शुक्रवारी स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्था​यी समितीच्या बैठकीत पंचगंगा प्रदूषणाबाबतही चर्चा करण्यात आली.

जयंती नाल्याजवळील फुटलेल्या पाईपबाबत नेमके काय सुरू आहे, याची माहिती मिळत नसल्याची तक्रार नगरसेवक सत्यजीत कदम यांनी केली. त्यावर वालचंद कॉलेजकडून या प्रकाराची पाहणी केल्यानंतर त्यांच्या आलेल्या अहवालानुसार पावसाच्या पाण्याच्या प्रेशरने पाइप फुटली आहे. हा प्रकार भविष्यात होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्याचा समावेश करुन २८ लाख रुपयांची निविदा काढली आहे. त्याला मुदतवाढ दिली आहे. तसेच सहा ठिकाणी पहिल्या टप्यात प्लास्टीक बंदी केली असून आतापर्यंत तीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.कचऱ्याच्या प्रश्नावर दिलीप पोवार यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कोंडाळे भरुन वाहतात. झूमवर कचरा टाकण्यास विरोध आहे. दोन दिवस गाड्या अडवल्या आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेची विचारणा त्यांनी केली. त्याबाबत प्रशासनाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभे करण्यात येणार आहेत. पाच टनाच्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे. आणखी तीन प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे असे सांगितले. पोवार यांनी गाडी अड्डयातील लोक भाडे न देता मोफत जागा वापरत आहेत. तीर्थक्षेत्र आराखडा अंतिम मंजूरीपुर्वी जागा खाली करुन घ्या, असे निदर्शनास आणून दिले. अतिक्रमण, वॉर्ड ऑफिस व इस्टेट विभाग यांच्या मार्फत संयुक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. विकासकामांच्या फाइलबाबत कॅम्प घेणे जरुरीचे आहे. सर्वांना समोर बसवून फाइल निकाली काढा, असे सत्यजित कदम यांनी सुचवले. त्यानुसार कॅम्प घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.नऊ बागांत ६५ कर्मचारी आहेत. ज्या बागेत कर्मचारी नाहीत तिथे बागेला कुलूप लावा. २०० कर्मचाऱ्यांची यादी द्या, अशी मागणी राहुल माने यांनी केली. त्यासाठी बदल्यांचे नियोजन लवकरच करू असे प्रशासनाने सांगितले. कटींग मशिन खराब असल्याची तक्रार दिलीप पोवार यांनी केली. त्यावेळी या मशिनचे बील अजून अदा केलेले नाही. मशिन खराब असल्यास बिल थांबवण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंब्यात ८१ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा ग्रामपंचायतीच्या सोळा जागांसह सरपंचपदासाठी शुक्रवारी अत्यंत ईर्ष्येने मात्र शांततेत ८१.५२ टक्के मतदान झाले. सहा प्रभागांत उमेदवारांची भाऊगर्दी असल्याने मतदान केंद्राबाहेर जत्रेचे स्वरुप होते. मतदारांना अखेरच्या क्षणापर्यंत आपले चिन्ह सांगत मतदानासाठी विनंती केली जात होती. प्रत्येक प्रभागात मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी खासगी वाहतुकीचा सर्वच उमेदवारांनी वापर केला. निवडणुकीसाठी ५६ उमेदवार रिंगणात असून सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. शनिवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय केंद्रावर सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

दक्षिण मतदारसंघातील अत्यंत जागरुक अशा कळंबा ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. विद्यामंदिर शाळा (माळवाडी), ग्रामपंचायत आणि कात्यायनी या तीन ठिकाणच्या ११ केंद्रांवर मतदान झाले. सहा प्रभागांत उमेदवारांची संख्या जास्त असल्याने एकूण ६,९५७ पैकी तब्बल ५,६७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १३ जागांसाठी ४६ तर सरपंचपदासाठी १० उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या स्वागतासाठी उमेदवार, समर्थकांनी शेवटपर्यंत गर्दी केली.

सरपंचपदासाठी प्रथमच थेट ग्रामस्थातून निवड होणार असल्याने इच्छुकांची संख्या जास्त होती. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. दुपारच्या टप्प्यात केंद्रातील रांगा थोड्या कमी झाल्या. पण दुपारी तीननंतर पुन्हा मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या. सायंकाळी ५.३० मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवार व समर्थक आकडेवारींमध्ये मग्न झाल्याचे चित्र होते.

अनेकांची उपस्थिती

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दक्षिण मतदारसंघातील १४ ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे शुक्रवारी कळंबा व वळिवडे येथील मतदान केंद्रावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती. कळंबा येथे महापालिका काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, बाजार समितीचे माजी उपसभापती विलास साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, माजी नगरसेवक मधुकर रामाणे आदींनी हजेरी लावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाईंना धमकी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांना कथित हिंदुत्ववादी संघटनांकडून धमकीचे पत्र आले आहे. हे पत्र निनावी असून त्यावर हिंदुत्ववादी असा उल्लेख आहे. डाव्या पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी याचा निषेध नोंदवला आहे. यासंदर्भातली तक्रारही शुक्रवारी आजरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

'कम्युनिस्टांच्या, विद्रोहीवाल्यांच्या नादी लागून तुझी नाटकं चालू आहेत. तुमच्या विद्रोहीवाल्यांना कोणी विचारत नाही. जास्त नाटक करू नको, मर्यादेत वाग नाहीतर हिसका दाखवू. आजरेकर फडाबद्दल कार्यक्रम घेऊन वारकऱ्यांना फितवण्याचा प्रयत्न बंद करा,' असा मजकूर पत्रात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीतर्फे ५ नोव्हेंबरला निषेध व निर्धार मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यात राज्यातील विचारवंत आपली मते मांडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीने प्रेमविवाह केल्याने आईवडिलांची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

मुलीने प्रेमविवाह केला म्हणून नैराश्य आलेल्या आईवडिलांनी ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी कराड तालुक्यात घडली आहे. बबन नारायण पवार आणि कमल बबन पवार अशी या दाम्पत्याची नावं आहेत. बबन पवार एसटी महामंडळाच्या कराड आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत होते.

पवार दाम्पत्याची बारावीत शिकणारी मुलगी काही दिवसांपूर्वी अचानक घरातून निघून गेली. नंतर तिने फोन करून लग्न केल्याचे घरी सांगितले. तेव्हापासून हे दाम्पत्य निराश होते. त्यांना मोठ्या मुलीव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आणि मुलगा अशी दोन लहान मुलं आहेत. शनिवारी पहाटे हे दोघेही मुलं घरात झोपली असताना घराबाहेर पडले. घरापासून दोनेक किमीवर असलेल्या रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी आले, तेव्हा पवार दाम्पत्याचे छिन्नविछिन्न मृतदेह त्यांना आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्रीच अकार्यक्षम, धनंजय मुंडेंची टीका

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

राज्यातील सगळे सरकारच अकार्यक्षम असून कोण कोणाला काढणार? आता वैतागलेली जनताच यांना नारळ देईल, अशी सडकून टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या १७ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी ते आले होते. यावेळी मुंडे यांनी राज्यातील युती सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

राज्यात गेल्या चार महिन्यात ९९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकाने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्याच नाही तर योजनेला छत्रपतींचे नाव देऊन त्यांचाही अपमान केला, असा आरोप मुंडेंनी केला. मूग उडीद, सोयाबीन यांच्या खरेदीत देखील सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. याची नोंदणी ऑनलाइन करण्याचे सांगताना गावात एकाच मोबाइल दिला आहे. हे सरकार शेतकरी ही जातच मुळापासून संपवू पाहत असल्याने सगळे ऑनलाइन करा म्हणणाऱ्या सरकारला येत्या निवडणुकीत जनता ऑफलाइन करून टाकेल, असा टोला मुंडे यांनी लगावला. राज्यावरील कर्जाचा बोजा सव्वा चार लाख कोटींवर गेला आहे. ३ वर्षात दीड लाख कोटी कुठे गेले याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी मुंडेंनी केली. राज्यभर चांगला पाऊस झाला. आता गेल्या वर्षीचे दुष्काळातील वीज बिल वसुलीसाठी सरकार गावोगावी वीज तोडू लागली आहे. आता तर चांगला पाऊस झाल्याने यंदा चांगले पीक यायची चिन्हे असताना वीज तोडून पुन्हा शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे उद्योग सरकारने करू नयेत. वीज तोड मोहीम तातडीने थांबवावी, असं मुंडे यांनी सांगितलं. यावेळी माजी आमदार सुधाकर परिचारक , आ बबनदादा शिंदे , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयामामा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिन्यांचे अर्भकआढळले

$
0
0

इस्लामपूर
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालतगाच्या येवलेवाडी फाटा-केदारवाडी दरम्यानच्या सेवा रस्त्यालगत शनिवारी अंदाजे दोन महिन्याचे पुरुष जातीचे अर्भक सापडले. कोणी अज्ञात हे अर्भक सेवा रस्त्याकडेला ठेवून गेले होते. काळामवाडीच्या अमोल दिलीप पाटील यांनी बाबत कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कासेगाव पोलिसांनी त्या बाळावर उपचार करून सांगलीला हलवले.
दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार निर्दशनास आला. अमोल पाटील यांनी तातडीने कासेगाव पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. कासेगाव पोलिस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल ए. व्ही. नलवडे यांनी घटनास्थळी येऊन बाळाला उपचारासाठी कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीने प्रेमविवाह केल्यानेआई-वडिलांची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
मुलीने घरातून पळून जाऊन एका रिक्षा चालकाबरोबर प्रेम विवाह केल्याने नैराश्येतून एसटी वाहक असलेल्या पित्याने आपल्या पत्नीसह धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना कराडजवळील विरवडे गावात शनिवारी सकाळी घडली. बबन नारायण पवार (वय ५६) आणि कमल बबन पवार (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. पवार दाम्पत्य कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील रहिवासी होते.
बबन पवार एसटीमध्ये वाहक पदावर सातारा आगारात काम करीत होते. बबन व कमल पवार दाम्पत्याला दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. यातील सर्वांत मोठी मुलगी बारावीत शिकत असून, त्यांचा मुलगा दहावीला तर दुसरी मुलगी आठवीच्या वर्गात शिकत आहे. बारावीत शिकणारी मोठी मुलगी शुक्रवारी सकाळी घरातून कॉलेजला जाते असे सांगून बाहेर पडली ती रात्री उशीरापर्यंत घरी परत आलीच नाही. त्यामुळे पवार दाम्पत्याने तिचा शोध घेणे सुरू ठेवले. तिने रात्री वडिलांना फोन करून मी लग्न केले असून, मला कुठेही शोधू नका, असे सांगितले. मुलीचा फोन ऐकून वडील अस्वस्थ झाले. त्यांनी या बाबतची माहिती आपली पत्नी कमल यांनाही सांगितली. त्यानंतर दोघैही अस्वस्थ होते.
शुक्रवारी रात्री जेवण करून पवार कुटुंबीय झोपले होते. पहाटे झोपी गेलेल्या मुलांना घरातच ठेवून ओगलेवाडीजवळील विरवडे गावाच्या हद्दतील रेल्वे मार्गावरती येऊन त्यांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे या परिसरात फिरायला येणाऱ्या लोकांना भीषण दृश्य नजरेस पडले. यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. मृतदेहाचे जागीच शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी ओगलेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री अकार्यक्षम;आता जनताच नारळ देईल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
‘राज्य सरकारच अकार्यक्षम आहे. कोण कोणाला काढणार, आता वैतागलेली जनताच सरकारलाच नारळ देईल,’ अशी टीका विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.
माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या १७व्या गळीत हंगाम प्रारंभासाठी आलेले मुंडे ‘मटा’शी बोलत होते. कर्जमाफी जाहीर केल्यापासून चार महिन्यांत ९९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकाने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा अवमान केला आहे, शिवाय योजनेला छत्रपतींचे नाव देऊन छत्रपतींचाही अवमान केला आहे. मूग, उडीद, सोयाबीन खरेदीत देखील सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. याचीही नोंदणी ऑनलाइन करण्याचे सांगताना गावात एकाच मोबाइल दिला आहे. सरकार शेतकऱ्यांना मुळापासून संपवू पाहत आहे. सगळे ऑनलाइन करा, म्हणणाऱ्या सरकारला येत्या निवडणुकीत जनता ऑफलाइन करून टाकेल, असेही मुंडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींनी शेट्टींविरोधात लढून दाखवावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

‘शेतकऱ्यांसाठी लढताना वैयक्त‌िक मतभेद बाजूला ठेवायचे असा संकेत संघटनेत आहे. मात्र, काहीजण केवळ सत्तेचे लोणी चाखण्यासाठी हातकणंगले मतदारसंघातून लढण्याचे आव्हान देत आहेत. आता तुम्हीच काय नरेंद्र मोंदीनींही हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी,’ असे जाहीर आव्हान वस्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत शनिवारी दिले.

खोत यांनी हातकणंगले सोडून अन्य कुठेही शेट्टी यांनी लढावे, असे आव्हान दिले होते. तर नंतर प्रसंगी हातकणंगलेतून शेट्टींविरोधात लढू, असे आव्हान दिले होते. त्याचा संदर्भ घेत तूपकर यांनी प्रतिआव्हान दिले. अध्यक्षस्थानी अजितमामा शिंदे- नेसरीकर होते. यावेळी विविध ११ ठराव मंजूर करण्यात आले. सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी आणि आघाडी सरकारमधून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडल्यानंतर ही पहिलीच ऊस परिषद पार पडली.

ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका करताना उसाचा दर म्हणजे मटक्याचा आकडा नाही, अशी जोरदार टीका केली होती. त्यावर खासदार शेट्टी काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण आपल्या संपूर्ण भाषणात खासदार शेट्टी यांनी एकदाही खोत यांचा उल्लेखही केला नाही. तर दुसरीकडे अन्य वक्त्यांनी बोचरी टीका केली. या परिषदेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी तूपकर यांनी खोत यांच्यावर नामोल्लेख टाळून जोरदार टीका केली ते म्हणाले, ‘माझ्या हाती त्यांच्या सर्व कुंडल्या आहेत. मी जर तोंड उघडले तर त्यांना राज्यात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. केवळ कुणालातरी खूश करायचे म्हणून हातकणंगले मतदारसंघातून लढण्याचे आव्हान देत आहात. शेतकरी शहाणा झाला आहे. त्यामुळे तुम्हीच काय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक लढवून दाखवावी. शेतकरी ह‌िसका दाखवतील. झोनबंदी उठली असतानाही परत राज्यबंदी करून उसाची कोंडी का करता ? जर साखर कारखाने चांगला दर देत असतील तर कोणत्याही राज्यातील कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करावा. आम्ही सत्तेवर पाणी सोडले असून लाचार होवून कदापि जगणार नाही. प्रसंगी कारखानदारांच्या उरावर बसू पण घामाचे दाम सोडणार नाही,’ असा इशारा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘त्यांनी एका रात्रीत केलेल्या नोटाबंदीने देशातील सर्वांचीच वाट लावली आहे. सर्वच क्षेत्रांना अवकळा आल्याने अच्छे दिन येण्यापेक्षा ‘मागील दिवस आम्हांला परत द्या’ म्हणण्याची वेळ आली आहे. मोदी हुकूमशहाप्रमाणे नवनवे कायदे करून बंधने लादत आहेत. आश्वासनांचे गाजर दाखवणारे हे थापाडे सरकार आहे. ६० वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेसने जितका घोटाळा केला नाही, त्यापेक्षा मोठा घोटाळा एकट्याने नोटाबंदी करून केला.

स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील म्हणाले, ‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे प्रयत्न करू नयेत. जर तसा प्रयत्न केल्यास जनताच तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांचा कळवळा घेऊन संघटनांचे पेव फुटले असले तरी चळवळीतला खरा वजीर केवळ राजू शेट्टीच आहेत. पाटील हे भेटेल त्याला पदाचे आश्वासन देतात. मात्र, दिलेला शब्द कधीच पाळत नाहीत,’ असा टोला हाणला. सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीत हजारो सदाभाऊ निर्माण करण्याची ताकद आहे. खासदार शेट्टी यांनी ऊस दराचा आकडा काढला नसता तर खोत यांच्या अंगावर कपडे आले नसते. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घालण्यासाठी गडबड करू नये. कारखान्यांनी ऊस दर ठरवलेला नाही, तरी स्वाभिमानी जो ऊस दर ठरवेल तो सोन्याच्या भावाचा असेल,’ असे सांगितले.

प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे म्हणाले, ‘ऊस दराचा विषय संपल्याचे म्हणणाऱ्या पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी ऊस परिषदेला असलेली गर्दी पाहिल्यास त्यांना धडकी भरेल. ऊस दराचा विषय संपलेला नसून तो आम्हीच सोडवू. ऊस पिकवायचं आम्हाला कळतय तसं पिकविलेला ऊस विकायचंही कळतं. सरकारने आता शेतकऱ्यांना थापा मारण्याचे उद्योग बंद करावेत,’ असेही ते म्हणाले.

यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे, प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोफळे, जालंदर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती अनिल मादनाईक, माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, स्वाभिमानी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले, कुमार मुतनाप्पा आदींसह मान्यवर उपस्थित होते. तर सभेला महाराष्ट्र, कर्नाटक सिमाभागासह सोलापूर, हिंगोली, सांगोला, बार्शी, नांदेड, बीड, पंढरपूर या भागातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातबारा कोरा झाल्याशिवाय थांबणार नाही

खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या न्याय हक्कावर साखर कारखानदारांनी सरकारच्या पडद्याआड राहून फसवण्याचा प्रयत्न करू नये. तसा प्रकार झाल्यास शेतकरी त्यांना धडा शिकवतील. शिवारातील उसाला किती दर घ्यायचा ते शेतकरी ठरवेल, असे सांगत मागील वर्षी ऊस दराच्या आंदोलनात मध्यस्थी केल्याचे श्रेय घेणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

परिषदेतील ठराव

आगामी गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांना एकरकमी, विनाकापात ३४०० रुपये उचल द्यावी.

देशातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव त्वरित द्यावा.

२०१६-१७ च्या गळीत हंगामासाठी सरकारी आदेशानुसार एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर फौजदारी करावी.

राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना देण्यात येणारी उचल ९० टक्के करावी.

ऊस बिलातून कोणतीही कपात करून नये, झोनबंदी उठवावी.

परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई द्यावी.

आधारभूत किमतीवर भात, सोयाबीन, मका, उडीद, मूग, घेवडा यांची खरेदी केंद्रे सरकारने त्वरित सुरू करावीत.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीवरील जीएसटी कमी करावा.

कृषीपंपासाठी १२ तास वीज द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिली उचल ३४००च

$
0
0


राजेंद्र पाटील/जयसिंगपूर

‘चालू गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल विनाकपात ३४०० रुपये द्यावी अन्यथा उसाचे कांडेही तोडू देणार नाही,’ असा सणसणीत इशारा देतानाच परदेशातून केली जाणारी साखर आयात बंद करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली.

जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील विक्रमसिंह मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १६ वी ऊस परिषद पार पडली. त्यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी अजितमामा शिंदे-नेसरीकर होते. यावेळी विविध ११ ठराव मंजूर करण्यात आले. सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी आणि आघाडी सरकारमधून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडल्यानंतर ही पहिलीच ऊस परिषद पार पडली. प्रथम शहीद जवानांना आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका करताना उसाचा दर म्हणजे मटक्याचा आकडा नाही, अशी जोरदार टीका केली होती. त्यावर शेट्टी काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते, मात्र आपल्या संपूर्ण भाषणात खासदार शेट्टी यांनी एकदाही खोत यांचा नामोल्लेख केला नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत या परिषदेसाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांवर साखर कारखानदारांनी सरकारच्या पडद्याआड राहून फसवण्याचा प्रयत्न करु नये. तसा प्रकार झाल्यास शेतकरी धडा शिकवतील. उसाला किती दर घ्यायचा ते शेतकरी ठरवेल, असे सांगत मागील वर्षी ऊस दराच्या आंदोलनात मध्यस्थी केल्याचे श्रेय घेणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आम्ही सत्तेला लाथ मारली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनीच एनडीचे ४२ खासदार निवडून दिले. मात्र आता या सरकारवरचा विश्वास उडाला आहे. विश्वासघातकी पंतप्रधानांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे गांभीर्य नाही. शेतीप्रधान देशाचे पंतप्रधान १६ लाखाचा सूट घालून मिरवतात, पण याच देशात मुलीच्या लग्नासाठी १३ हजाराचे कपडे खरेदी करता न आल्याने शेतकरी आत्महत्या करतो. याला सरकारची धोरणेच कारणीभूत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे सरकार शेतकऱ्यांचा अपमान करीत आहे. पण आता खासगी सावकारासह संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा झाल्याशिवाय लढा थांबणार नाही.’

वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी, एका रात्रीत केलेल्या नोटाबंदीने सर्वांचीच वाट लावली. सर्वच क्षेत्रांना अवकाळ आल्याने अच्छे दिन येण्यापेक्षा मागील दिवस आम्हांला परत द्या म्हणण्याची वेळ आली असल्याचे सांगत हुकूमशहाप्रमाणे सरकार नवनवे कायदे करुन बंधने लादत असल्याचा आरोप केला.

अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग म्हणाले, ‘उत्तर प्रदेशात २५ वर्षे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढाई सुरु आहे. त्यासाठी वेगवेगळे लढण्यापेक्षा देशातील १८२ संघटनांना एकत्र करुन २० नोव्हेंबरला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ठिय्या मारुन शेतकऱ्यांचा हिशोब मागणार आहोत. स्वामीनाथन अहवालाप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हेच आमचे उद्दिष्ट असून त्यासाठी खासदार शेट्टी यांची मोठी साथ लाभली आहे.’

सभेला महाराष्ट्र, कर्नाटक सिमाभागासह सोलापूर, हिंगोली, सांगोला, बार्शी, नांदेड, बीड, पंढरपूर या भागातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदींनी शेट्टींविरोधात लढवून दाखवावी

तुपकर म्हणाले की, आश्वासनांचे गाजर दाखवणारे हे थापाडे सरकार आहे. सत्ताकाळात काँग्रेसने जितका घोटाळा केला नाही, त्यापेक्षा मोठा घोटाळा एकट्या नोटाबंदीमुळे झाला आहे. कुणीही पंतप्रधान मोदी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेट्टींविरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

ते म्हणाले ‘माझ्या हाती खोत यांच्या सर्व कुंडल्या आहेत. मी तोंड उघडले तर खोत यांना राज्यात तोंड दाखवायला जागा उरणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. झोनबंदी उठली आहे. तरीही परत राज्यबंदी का? साखर कारखाने चांगला दर देत असतील तर कोणत्याही राज्यातील कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करावा. आम्ही सत्तेवर पाणी सोडले असून लाचार होऊन कदापी जगणार नाही. प्रसंगी कारखानदारांच्या उरावर बसू, पण घामाचे दाम सोडणार नाही.’

खोतांना घरात घेऊ नका

शेतकरी कृषी समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी सदाभाऊंचा खरपूस समाचार घेतला. खोत बारामतीला आले तर त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. त्यांना कुणीही घरात घेऊ नका. ते खाल्ल्या घराचे वासे मोजल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहांत ‘सुलभ’ आर्थिक लूट

$
0
0


Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet: @sachinyadavMT

कोल्हापूर : येथील मुख्य आगारातील सुलभ शौचालय म्हणजे प्रवाशांच्या आर्थिक लुबाडणुकीचे उत्तम उदाहरण आहे. आम्ही पैसे घेतच नाही, असे ठामपणे सांगत असलेल्या व्यवस्थापकांनी नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच लूटमार सुरू आहे. कर्मचाऱ्यांना रोजचे टार्गेटच ठरवून दिले असल्याने सुविधांसाठी पैसे देण्याशिवाय प्रवाशांपुढे पर्यायच राहत नाही. अक्षरशः दा‌दागिरी करून पैसे वसूल केले जातात, असा प्रवाशांचा अनुभव आहे. महिला आणि बारा वर्षांखालील मुलांना स्वच्छतागृह, आंघोळीची व्यवस्था मोफत असूनही दहा ते वीस रुपये घेतले जातात. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सौजन्यानेच सुरू असलेल्या या सुलभ शौचालय संकुलात प्रवाशांची ‘सुलभ’ लूटमारच यानिमित्ताने सुरू असल्याचे अनुभवास येत आहे.

जिल्ह्यातील बारा मुख्य बसस्थानकांतील स्वच्छतागृहांचा ठेका सुलभ इंटरनॅशनल कंपनीकडे आहे. ठेकेदार पुणे येथून स्वच्छतागृहाचे कामकाज चालवितो. कोल्हापूरच्या मध्यवर्ती स्थानकात हिंदी भाषिक दोन ते तीन कामगार आहेत. पुरुष शौचालयासाठी पुरुष आणि महिलांच्या स्वच्छतागृहासाठी वृद्ध महिला नेमली आहे. दररोज दुपारी दोनच्या सुमारास या स्वच्छतागृहाचा उप मुख्य व्यवस्थापक (ठेकेदार) कलेक्शनसाठी येतो. महिला आणि मुलांसाठी स्वच्छतागृहे मोफत आहेत. मात्र तसा फलक न दिसेल अशा ‌पद्धतीने लावला आहे. पुरुषांकडून स्वच्छतागृहासाठी दोन आणि आंघोळीसाठी तीन रुपये असा दर आहे. स्वच्छतागृहात प्रवेश करताना डाव्या बाजूला न दिसेल, असा हा दरफलक लावला आहे. फलकावरील शुल्कापेक्षा प्रत्यक्षात सर्वांकडून स्वच्छतागृहासाठी १० आणि आंघोळीसाठी २० रुपये घेतले जातात. महिला आणि मुलांसाठीही १० रुपये घेतले जातात.

दोन ते तीन शिफ्टमध्ये स्वच्छतागृहाची देखभाल केली जाते. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवसभरासाठी वसुलीचे टार्गेट आहे. मध्यवर्ती स्थानकात दिवसभरात ४० हजारांवर प्रवाशांची ये-जा असते. त्यांपैकी १५ हजार महिला आणि मुले असतात. यापैकी रोज ७ ते ८ हजार महिला स्वच्छतागृहांचा उपयोग करतात, तर आठ हजाराच्या आसपास पुरुष स्वच्छतागृहांचा वापर करतात. पुरुषांसाठी १२ आणि महिलांसाठी १२ ब्लॉक आहेत. मात्र या ब्लॉकमध्ये जाताना तोंडाला रुमाल लावूनच आत प्रवेश करावा लागतो. प्रवाशांच्या तुलनेत ब्लॉकची संख्या कमी असल्याने अनेकदा रांग लावावी लागते. सॅनिटरी नॅपकिन टाकण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे महिलांची प्रचंड कुंचबणा होते. पाण्यासाठी परिसरात बोअरची व्यवस्था केली आहे. पाणी साठवणुकीसाठी असलेली टाकी वर्षानुवर्षे स्वच्छ केली जात नाही. या बसस्थानकासह संभाजीनगर, रंकाळा बसस्थानकातील स्वच्छतागृहांचीही हीच अवस्था आहे. या बसस्थानकांत येणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील महिलांची मोठी संख्या आहे. मात्र तुलनेत स्वच्छता नाही. महिला प्रवाशांच्या आर्थिक लूटमारीचे खुले कुरणच या सर्व स्थानकांमध्ये दिसते.

०००००००००००

एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. मात्र ती सध्या सुरू नाहीत. त्यामुळे खासगी स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. कोणत्याही प्रकारची स्वच्छता आणि सौजन्याने बोलण्याची मानसिकता या कर्मचाऱ्यांमध्‍ये नाही. स्वच्छतागृहासाठी अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली नाही.

स्वप्नाली पाटील, कंडक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images