Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

क्रेन नाल्यात कोसळली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयंती नाल्यात वाहून गेलेला लोखंडी पूल आणि ड्रेनेज पाइप बाहेर काढताना क्रेनच कोसळण्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. प्रचंड रहदारीच्या या पुलावर ऐन वर्दळीच्या वेळीच ही घटना घडल्याने शहरवासीयांना धक्काच बसला. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. लोखंडी पूल आणि पाइपलाइनचा भार न पेलल्याने क्रेन पुलावरुन तब्बल ३० फूट खोल नाल्यात कोसळली. दहा टन वजनाच्या क्रेनमुळे पुलालाही धोका पोहचला असून संरक्षक कठडाही उद्‍ध्वस्त झाला आहे.

क्रेन कोसळल्यामुळे नागरिकांची आरडाओरड आणि जिवांच्या आकांताने कर्मचारी व बघ्यांनी केलेली धावपळ यामुळे या ठिकाणी घबराट निर्माण झाली. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर क्रेन बाहेर काढण्यात यश आले.

अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरुन एका बाजूकडील वाहतूक बंद ठेवण्यात आली. शिवाय दसरा चौक परिसर, खानविलकर पेट्रोल पंप आणि महावीर गार्डन परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. पावसामुळे नाल्यातील साडेतीन फूट व्यासाची लोखंडी पाइप (रायझिंग मेन) आणि लोखंडी पूल वाहून गेला आहे. नाल्याकडून कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे सांडपाणी वाहून नेणारी पाइप तुटल्याने गेले दीड महिने पंचगंगेत थेट मैलायुक्त पाणी मिसळत आहे. त्यामुळे महापालिकेवर चौफेर टीका सुरु झाली होती. जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला कारवाईच्या नोटिसा दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाइपलाइन दुरुस्तीसाठी २८ लाखांच्या कामाची निविदा काढली आहे. ठेकेदार मिलिंद कणसे यांनी दुपारी दोनच्या सुमारास नाल्यातील लोखंडी पूल, पाइप हटविण्याच्या कामाला सुरुवात केली. चौदा, बारा आ​णि दहा टन वजनाच्या क्षमतेच्या तीन क्रेनव्दारे सायंकाळी साडे पाचच्या सुमारास लोखंडी पूल आणि ड्रेनेज पाइप काढण्याचे काम सुरु होते. लोखंडी पुलात साडेतीन फूट व्यासाची पाइप अडकली होती. रेणुका सर्व्हिसच्या तीनही क्रेन एकाचवेळी कार्यान्वित होत्या. मात्र नाल्यातील पूल आणि पाइपचा भार क्रेनला पेलवला नाही. त्यामुळे काही कळायच्या आतच पुलावरील क्रेनची मागील चाके पहिल्यांदा वर उचलली आणि क्षणार्धात पुलाचा कठडा तोडून क्रेन नाल्यात कोसळली.


नशीब बलवत्तर म्हणून वाचले

नाल्यातून लोखंडी पूल वर काढताना ड्रेनेज विभागाचे चार आणि ठेकेदार कंपनीचे दोन कर्मचारी नाला पात्रात होते. काहीजण लोखंडी पुलावर दोरी पकडून उभे होते. क्रेन उंचावल्याचे लक्षात येताच सर्वच कर्मचारी जिवाच्या आकांताने पात्रातून सुरक्षितस्थळी धाव घेतली. अपघाताच्या थरारामुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली. काही नागरिक पुलावर क्रेनजवळ उभे होते. तेही जिवाच्या आकांताने धावत सुटले. कोसळलेल्या क्रेनमध्ये ड्रायव्हर महेश अडकला होता. अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला क्रेनमधून बाहेर काढले. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. पाच मिनिटांत अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेन मागावून घेण्यात आली. अग्निशमन विभाग, ड्रेनेज विभाग आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तासाभराच्या प्रयत्नानंतर क्रेन बाहेर काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेहिशेबी मालमत्तेबाबतघनवट, पाटीलला नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
वारणानगरमधील ९ कोटी १८ लाख रुपयांच्या रोकड चोरी प्रकरणातील संशयित निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि हवालदार दीपक पाटील या दोघांना बेहिशेबी मालमत्तेबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिकची मालमत्ता असल्याचे समोर आल्याने या नोटिसा बजावल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषणच्या कोल्हापूर विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मोहिद्दीन उर्फ मैनुद्दीन मुल्ला याच्या घरातून १२ मार्च २०१६ रोजी ३ कोटी १८ लाखांची रोकड जप्त केल्यानंतर संशयित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १३ आणि १५ मार्च २०१६ रोजी दोनदा वारणानगरमधील शिक्षक कॉलनीतील कार्यालयातून ९ कोटी १८ लाखांची रोकड चोरल्याचा गुन्हा मार्च २०१७मध्ये कोडोली पोलिसांत दाखल आहे. प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषणच्या कोल्हापूर विभागाने १३ मार्च २०१६च्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले. दुसऱ्या गुन्ह्यात हेच संशयित असल्याने त्या गुन्ह्यात पुन्हा त्यांना अटक करण्यात येणार आहे.
दरम्यान, पहिल्या गुन्ह्याचा तपास करताना निलंबित निरीक्षक घनवट (खराडकरनगर, वडगाव शेरी, पुणे) आणि हवालदार दीपक पाटील (कवलापूर) या दोघांनी बेहिशेबी मालमत्ता केल्याचे समोर आले आहे. या मालमत्ता कोणत्या उत्पन्नातून कशी केली याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची नोटीस त्या दोघांना बजावण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्तेबाबत संबंधिताला पूर्ण मोकळीक देऊन त्याचा जबाब घेतला जातो. त्यात त्याने स्वतःहून ती मालमत्ता कोणत्या उत्पन्नातून कशी आणि केव्हा केली, हे लेखी स्वरुपात द्यायचे आहे. या प्रक्रियेनंतर त्याने मालमत्ता करण्यासाठी वापरलेल्या मार्गांची कायदेशीर पातळीवर छाननी केली जाते.
संशयितांपैकी सहायक फौजदार शरद कुरळपकर अद्यापही अटकेपासून दूर असून त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. कुरळपकरला फरारी घोषित केल्यानंतर त्याच्या मालमत्तेवरील टाच प्रक्रियेला वेग येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमाभागातील लोकांनामहाराष्ट्र रहिवासी दाखला

$
0
0

बेळगाव
‘बेळगाव अजून महाराष्ट्रात आला नसला तरी तो महाराष्ट्राचाच भाग आहे. बेळगावशी माझे वेगळे नाते आहे. सीमाभागात १४ वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलेल्या मराठी माणसाला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला मिळू शकतो. यासाठी मंत्रालयात स्वतंत्र स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे,’ असे उद्गार महाराष्ट्राचे वित्त, नियोजन आणि गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी काढले.
हिंदवाडी महिला मंडळाच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, विजयादेवी राणे, महापौर संज्योत बांदेकर, मंडळाच्या अध्यक्षा आशा मनोहर आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपक केसरकर म्हणाले, ‘बेळगाव हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. सीमाभागात १४ वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलेल्या मराठी माणसाला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला मिळू शकतो. यासाठी मंत्रालयात स्वतंत्र स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. पन्नास वर्षे हिंदवाडी महिला मंडळाने चालवलेले कार्य कौतुकास्पद आहे.’ प्रमुख पाहुणे गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनीही महिला मंडळाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. महिलांना स्वावलंबी करण्यात मंडळाने केलेले कार्य मोलाचे आहे, असे राणे म्हणाले. या वेळी सुवर्णमहोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी हिंदवाडी महिला मंडळाच्या महालक्ष्मी मंदिरापासून झान्ज पथकासह शोभायात्रा काढण्यात आली. कमल यादव, धनश्री सावंत, भारती किल्लेकर, शोभा कंग्राळकर, अश्विनी जांगळे आदी पदाधिकाऱ्यांनी सुवर्ण महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णेचे दूषित पाणी सोडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कराडजवळील टेंभू योजनेसाठी कृष्णा नदीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाण्यालाही दुर्गंधी येत होती. त्यातच पिण्याच्या पाण्याचीही चव बदलल्याने नागरीकांत मोठी नाराजी होती. याबाबत वृत्त शनिवारी ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची पालिका आणि येथील प्रशासनाने गंभीर दखल घेऊन दिवसभर पाणी सोडण्याबाबत कार्यवाही सुरू होती. अखेर टेंभू उपसा प्रकल्प योजनेच्या अधिकाऱ्यांना या बाबतची वस्तूस्थिती सांगण्यात आल्यानंतर अडवण्यात आलेल्या पाण्यातील दोन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले, अशी माहिती प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
पाणी अडविल्यामुळे प्रीतीसंगमावरील कोयनेच्या पाण्याचा प्रवाह रोडावला होता. शिवाय दोन्ही नद्यांच्या पाण्याला दुर्गंधी येत होती. त्यातच पिण्यासाठीच्या पाण्याचीही चव बदलल्याने नागरीकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेत दिवसभर पाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही सुरू होती. अखेर टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांना वस्तूस्थिती सांगण्यात आल्यानंतर या योजनेसाठी अडवण्यात आलेले पाणी सोडण्याबाबतचे आदेश येथील प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांनी टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार टेंभू प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याचा एक दरवाजा उचलून १२०० क्युसेक तर पायथा वीज गृहातून वीज निर्मिती करून ८०० क्युसेक असे दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे साचून राहिलेल्या पाण्याचा प्रवाह अल्प प्रमाणात का होईना सुरू झाल्याने दूषित पाणी वाहून जाण्यास मदत होत आहे.
पालिकेला पाणी तपासणीच आदेश
कृष्णा-कोयनेचे पाणी अडवण्यात आल्याने पाणी दूषित झाले आहे. पालिकेमार्फत पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुरवठा केले जाणारे पाणी शुद्ध आहे. तरीही नागरिकांच्या आरोग्याचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पिण्याची तपासणी करून घेण्याचे आदेश पालिका प्रशासनास दिल्याचे हिंम्मत खराडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्तिकीसाठी पंढरी सज्जमंदिर समितीवरून वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातील भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. पंढरपूर शहरात गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, मंदिर समितीच्या मुद्द्यावर वारकरी संप्रदायाने सुरू केलेल्या आंदोलन यात्रेदरम्यान तीव्र होण्याची शक्यता आहे. वारकरी संप्रदायाने दिलेला अल्टिमेटम संपल्यावर संप्रदायाच्या वतीने महसूलमंत्र्यांना लेखी पात्र देऊन याची जाणीव करून दिली आहे. आता पुन्हा कार्तिकी यात्रेत वारकरी आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फडणवीस सरकारने आषाढी यात्रेच्या तोंडावर घिसाडघाई करीत मंदिर समितीची घोषणा केल्याने आंदोलनाची ठिणगी पडली होती. यानंतर सरकारने आश्वासने देत वारकरी संप्रदायाची दिशाभूल करून त्याच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदाय संतप्त झाला आहे. मंदिर समितीवर वारकरी संप्रदायाचा एकाच अध्यक्ष आणि किमान आहे या समितीत ५१ टक्के वारकरी प्रतिनिधी घ्यावेत, या मागण्यास सरकारने हिरवा कंदील दिला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी परत सहअध्यक्ष नेमण्याची घोषणा केल्याने वारकरी संप्रदाय संतप्त झाला आहे. कार्तिकी यात्रेच्या सरकारी महापूजेसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील येणार आहेत. वारकऱ्यांनी त्यांनाच अल्टिमेटम संपल्याचे पत्र दिल्याने कार्तिकीमध्ये वारकरी आणि सरकार यांच्यातील संघर्ष अटळ बनला
आहे.
आज होणार महत्त्वपूर्ण बैठक
रविवारी रात्री राज्यभरातील सांप्रदायाचे नेते पंढरीत दाखल होत असून, सोमवारी यासाठीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील देखील सोमवारी पंढरपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे आज, सोमवारी वेगवान घडामोडी घडणार आहेत.
दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत
एका बाजूला वारकरी नेते मंदिर समितीसाठी संघर्ष करीत असताना सर्वसामान्य वारकरी भाविकांना सुलभ दर्शन देण्याची मागणी करू लागला आहे. विद्यमान अध्यक्षांनी कार्तिकी यात्रेत टोकन दर्शन व्यवस्था सुरू करून दर्शन रांग बंद करण्याची घोषणा केली असली तरी आजच देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपुराच्या पत्राशेडपर्यंत पोचली आहे. दर्शनाला २० ते २२ तास एवढा कालावधी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल चोरटा जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी पोलिसांनी मोटारासायकल चोरणाऱ्या विनायक प्रकाश सावंत (वय ३१,रा. बिरदेव मंदिर,वडगाव, ता. हातकणंगले) या संशयिताला शनिवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किंमतीच्या चोरलेल्या दहा मोटारसायकली जप्त केल्या. संशयित सावंत याने मोटारसायकल चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी तपासासंबधी माहिती दिली. वाढत्या मोटारसायकल चोरीच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार हे शनिवारी (ता. २८) दुपारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गस्त घालत होते. त्यांच्या समवेत साध्या वेषातील सहाय्यक फौजदार संदीप जाधव, बजरंग हेब्बाळकर, निलेश साळोखे, दिवाकर होवाळे, प्रशांत घोलत, सागर डोंगरे, विशाल चौगले, दिगंबर पाटील, महेश गवळी, विजय इंगळे गस्त घालत होते. परिख पुलाजवळ पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली असता एका मोटार सायकलस्वारला अडवून चौकशी केली. त्याच्याकडे मोटार सायकलची कागदपत्रे मागितली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी मोटार सायकलस्वाराला शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चार महिन्यापूर्वी सासने मैदान व स्टेट बँकेमध्ये असणाऱ्या बोळातून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. चोरीच्या मोटारसायकलचा क्रमांक एम एच ०९ सीडी ४९६० असा होता. याच क्रमांकाची मोटार सायकल चोरीस गेल्याची फिर्यादही पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आढळून आले. मोटारसायकल चोरीची सत्यता पटल्यानंतर पोलिसांनी सावंत याच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीत त्याने शाहूपुरी, लक्ष्मी, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आठ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरलेल्या आठही मोटारसायकली जप्त केल्या. तसेच दोन मोटारसायकली शिरोळ पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेहिशेबी मालमत्तेबाबत घनवट, पाटीलला नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

वारणानगरमधील ९ कोटी १८ लाख रुपयांच्या रोकड चोरी प्रकरणातील संशयित निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि हवालदार दीपक पाटील या दोघांना बेहिशेबी मालमत्तेबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिकची मालमत्ता असल्याचे समोर आल्याने या नोटिसा बजावल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषणच्या कोल्हापूर विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मोहिद्दीन उर्फ मैनुद्दीन मुल्ला याच्या घरातून १२ मार्च २०१६ रोजी ३ कोटी १८ लाखांची रोकड जप्त केल्यानंतर संशयित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १३ आणि १५ मार्च २०१६ रोजी दोनदा वारणानगरमधील शिक्षक कॉलनीतील कार्यालयातून ९ कोटी १८ लाखांची रोकड चोरल्याचा गुन्हा मार्च २०१७मध्ये कोडोली पोलिसांत दाखल आहे. प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषणच्या कोल्हापूर विभागाने १३ मार्च २०१६च्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले. दुसऱ्या गुन्ह्यात हेच संशयित असल्याने त्या गुन्ह्यात पुन्हा त्यांना अटक करण्यात येणार आहे.

दरम्यान, पहिल्या गुन्ह्याचा तपास करताना निलंबित निरीक्षक घनवट (खराडकरनगर, वडगाव शेरी, पुणे) आणि हवालदार दीपक पाटील (कवलापूर) या दोघांनी बेहिशेबी मालमत्ता केल्याचे समोर आले आहे. या मालमत्ता कोणत्या उत्पन्नातून कशी केली याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची नोटीस त्या दोघांना बजावण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्तेबाबत संबंधिताला पूर्ण मोकळीक देऊन त्याचा जबाब घेतला जातो. त्यात त्याने स्वतःहून ती मालमत्ता कोणत्या उत्पन्नातून कशी आणि केव्हा केली, हे लेखी स्वरुपात द्यायचे आहे. या प्रक्रियेनंतर त्याने मालमत्ता करण्यासाठी वापरलेल्या मार्गांची कायदेशीर पातळीवर छाननी केली जाते.

संशयितांपैकी सहायक फौजदार शरद कुरळपकर अद्यापही अटकेपासून दूर असून त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. कुरळपकरला फरारी घोषित केल्यानंतर त्याच्या मालमत्तेवरील टाच प्रक्रियेला वेग येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा खासदार होऊन दाखवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे आव्हान देण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांविरोधात निवडून येवून दाखवावे, असे आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके व गोकुळचे संचालक बाबा देसाई यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिले. केवळ संघटनेची दुकानदारी चालवण्यासाठी सरकारवर टीका करून भावनिक आंदोलन पेटवून नये, अशी टीका त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकारने निश्चित केलेली वाजवी व किफायतशीर दर (एफआरपी) देण्यास सर्व कारखानदार तयार असून कारखाने सुरू राहण्यासाठी सरकार व भाजपचे कार्यकर्ते संरक्षण देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १६ व्या ऊस परिषदेत वस्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी खोत यांनी दिलेल्या आव्हानाचा संदर्भ देत ‘तुम्हीच काय मोदींनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी’ असे प्रतिआव्हान दिले होते. यानंतर भाजपच्या गोटातून शेट्टी यांना उत्तर दिले असून ‘भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याविरोधात लढून खासदार होऊन दाखवा’ असे आव्हान दिले आहे.

जिल्हाध्यक्ष शेळके म्हणाले, ‘राज्यात सहकारी व खासगी असे १८० साखर कारखाने आहेत. केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना वेठीस धरण्याचा उद्योग सध्या केला जात आहे. त्यातून संघटनेची दुकानदारी मजबूत केली जाते. यापुर्वी ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. पण पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी. रंगराजन समितीच्या शिफारसी स्वीकारल्या. त्यामुळे शंभर टक्के एफआरपी १५ दिवसांत उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा होत आहे. नव्या कायद्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने करत आहेत. जे कारखाने कायद्याची पायमल्ली करत आहेत, त्यांच्यावर साखर आयुक्तांमार्फत मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. केंद्र व राज्य सरकार कठोर निर्णय घेत असताना खासदार शेट्टी आपली दुकानदारी बंद पडेल यासाठी सरकारवर टीका करण्यासाठी संमेलन भरवत आहेत.’

‘कायद्यानुसार एफआरपी देण्यास सक्षम असलेले सर्व कारखाने एक नोव्हेंबपासून सुरू होतील. दरावरुन उसतोडणी किंवा कारखान्याचे गळीत रोखण्याचा प्रयत्न झाल्यास सरकार व भाजपचे कार्यकर्ते संरक्षण देतील. कारखानदारांनी संघटनेच्या धमकीला भीक न घालता कारखाने सुरू करावेत,’ असेही ते म्हणाले.

गोकुळचे संचालक देसाई म्हणाले, ‘दुष्काळ व कमी उत्पन्नामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आंदोलनामुळे कर्जमाफी मिळाल्याचे सांगत खासदार शेट्टी गल्लोगल्ली हारतुरे स्वीकारत आहेत. पण यातील काही तांत्र‌िक कारणे पुढे करून कर्जमाफीची खिल्ली उडवत आहेत. बँकांकडून राहिलेल्या त्रुटी आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे कर्जमाफीला दिरंगाई होत असली, तरी नोव्हेंबरअखेर सर्व कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांना मिळेल.’ पत्रकार परिषदेस युवराज पाटील, संभाजी पाटील, अनिल देसाई, भिकाजी पाटील आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पण उमेदवार कोण?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर खासदार शेट्टी निवडून आले आहेत. हातकणंगले मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपने मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्याशी लढण्यापूर्वी येथील स्थानिक कार्यकर्त्याबरोबर लढा आणि निवडून ये‍वून दाखवा असे, आव्हान देताना देसाई यांनी संभाव्य उमेदवाराचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला.

संघटनेतील वाद भाजपपर्यंत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दोघांतील दोस्तीची जागा आता कुस्तीने घेतली आहे. खोत यांना मंत्र‌िपद मिळाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या भूमिकांबाबत संघटनेने आक्षेप घेतले. त्यातून दोघांतील दरी अधिक वाढत गेली. शेट्टी यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत खोत सहभागी न झाल्याने पुण्यात त्यांना चौकशी समितीसमोर बोलविण्यात आले. त्या समितीच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. मात्र, खोत यांनी जुळवून न घेतल्याने अखेर त्यांची पक्षाच्या बैठकीत हकालपट्टी केली. त्यानंतर खोत यांनी हातकणंगले मतदारसंघात दौरे सुरू केले. त्यांनी स्वतंत्र संघटनेची स्थापना करत खासदार शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघाबाहेर लढण्याचे आव्हान दिले. तर ऊस दराच्या पार्श्वभूमीवर ‘हा मटक्याचा आकडा नाही’ अशी जहरी टीका केली. त्यामुळे संघटनेच्या ऊस परिषदेत खोत यांचा जोरदार समाचार घेतला. मात्र, खोत यांची भाजपशी असलेली जवळीक पाहता संघटनेतील वाद आता थेट भाजपपर्यंत गेला आहे. आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हातकणंगले मतदारसंघातून लढण्याचे आव्हान दिले. आव्हान आणि प्रतिआव्हानामुळे संघटनेतील वादाची झळ भाजपला सोसावी लागत आहे. त्यामुळे भविष्यात स्वाभिमानी विरुद्ध मंत्री खोत असा संघर्ष न होता, स्वाभिमानीचे खासदार शेट्टी विरुद्ध भाजप असाच होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेत्यांच्या आदेशानंतर राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एक महिन्यानंतर मुदत संपणार असल्याने महापौरांना मुदतवाढ मिळणार की राजीनामा देणार याबाबत महापालिकेच्या राजकीय वर्तुळात औत्सुक्य आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजप प्रयत्न करत असला तरी दोन्ही काँग्रेसमधील समझोत्याप्रमाणे नवीन महापौर काँग्रेसचा होणार असल्याने काँग्रेसच्या गोटात नव्या महापौरपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर हसीना फरास यांनीही ‘नेत्यांनी आदेश दिल्यानंतर राजीनामा दिला जाईल,’ असे सांगून आघाडीच्या समझोत्याप्रमाणे ​नेते जे निर्णय घेतील, त्यानुसार वाटचाल राहील असे सांगितले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन होऊ नये, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले. पण त्यावेळी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी तातडीने एकत्र येऊन महापालिकेवर दोन्ही काँग्रेसची सत्ता असेल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर पदाधिकारी निवडीवेळी महापालिकेत मोठा तणाव निर्माण होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील समझोत्याप्रमाणे यंदाचे महापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीच्या हसीना फरास यांना महापौरपदासाठी एक वर्षाचा कालावधी दिला होता. हा कालावधी ८ डिसेंबर रोजी संपणार आहे. महापौरपद ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्याचा अडीच वर्षासाठीचा कालावधी पुढील सहा महिन्यात संपणार आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपद आहे.

पुढील महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौर व स्थायी स​भापतिपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. पुढील सहा महिन्यात काँग्रेसकडे महापौरपद राहणार असल्याने महापौरांचा राजीनामा घेण्यासाठी काँग्रेस आग्रही राहणार आहे. आगामी महापौरपद केवळ सहा महिन्यासाठी असेल. त्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे भाजप जरी प्रयत्न करत असला तरी या सहा महिन्यासाठी पत्ते खुले करतील, असे वाटत नाही. त्यामुळे पुढील अडीच वर्षाच्या महापौरपदाच्या कालावधीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

बलाबल

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी

४४

भाजप व ताराराणी आघाडी

३३

शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासने ग्राउंडला पुन्हा अतिक्रमणाचा विळखा

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

एखादा अपघात, अधिकाऱ्यांची पाहणी, नगरसेवकांचा सभेत गोंधळ झाला की अतिक्रमण निर्मूलन विभाग जागा होतो. त्यानंतरचा आठवडा कारवाई होते. अनेक ठिकाणच्या जागा रिकाम्या होतात. पण काही ठिकाणी दुसऱ्याच तर काही ठिकाणी हळूहळू करत पुन्हा अतिक्रमणाचे पाय पसरतात. पाहता पाहता इतकी अतिक्रमणे होतात की येथे कारवाई केली होती का? असा प्रश्न पडतो. अशा प्रकारच्या महापालिकेच्या कारभारामुळे शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोरीलच सासने मैदानाभोवतीची अतिक्रमणे पूर्वीप्रमाणेच झाली असतील तर इतर ठिकाणच्या अतिक्रमणांना चाप बसण्याचे दूरच. सहा महिन्यात पुन्हा सर्वत्र अतिक्रमणे वाढू लागल्याने त्याचा विपरित परिणाम पादचारी, वाहनधारक सर्वांनाच होऊ लागला आहे.

शहरातील वर्दळीचे रस्ते, उद्यानांचा परिसर, सरकारी कार्यालयांच्या परिसरात, स्टेशन व स्टँडचा परिसर, बाजारपेठांचा परिसर अशा ठिकाणी अतिक्रमणांची संख्या वाढू लागली आहे. महापालिकेने काही ठिकाणी अधिकृत केबिन्स दिल्या आहेत. त्यांचा आधार घेऊन त्याच्याशेजारी अनधिकृत विक्रेते ठाण मांडत असून यामुळे अतिक्रमणांची रांग विविध ठिकाणी पहायला मिळत आहे. दसरा चौक, महावीर उद्यान परिसर, राजारामपुरी, स्टँडचा परिसर, हुतात्मा गार्डन परिसर, महावीर कॉलेज रोड, टाऊन हॉल रोड, भाऊसिंगजी रोड, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल परिसर अशा अनेक ठिकाणी चायनीज तसेच फास्टफूडचे स्टॉल, चहागाड्या, विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने यांनी रस्त्याशेजारील जागा व्यापून टाकली आहे. तिथे जाणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने अनेक ठिकाणे वाहतुकीच्या कोंडीची ठिकाणे बनली आहेत.

सासने मैदान हे शहरातील मध्यवस्तीतील ठिकाण. या मैदानाच्या पूर्वेला महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे. मे महिन्यापूर्वी या निवासस्थानासमोर अतिक्रमणांची संख्या इतकी वाढली की अतिक्रमणे म्हणजेच मैदानाची संरक्षक भिंत अशी परिस्थिती झाली. त्यामुळे महापालिकेने कारवाई केली. अनेक गाड्या हटवण्यात आल्या. पण सहा महिन्यानंतर पुन्हा या जागेवर खाद्यपदार्थांच्या गाड्यांची संख्या वाढू लागली आहे. महापालिकेने या मैदानात जाण्यासाठीचा रस्ता केला असून प्रशस्त प्रवेशद्वारही केले आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या आहेत. काही गाड्या साखळीने तेथील झाडांना बांधून ठेवल्या आहेत. यामधील काही गाड्यांवर गॅस शेगडीचा वापर करुन पदार्थ बनवले जातात. या परिसरात असलेल्या मॉलमुळे सायंकाळी नागरिकांची गर्दी असते. त्यांच्या वाहनांची वर्दळ व खाद्यपदार्थांच्या गाड्यांकडे जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक खोळंबून राहते. दाभोळकर कॉर्नर ते आदित्य कॉर्नर हा वर्दळीचा रस्ता या मैदानाजवळूनच जातो. त्या रस्त्यालगत चहागाडी, भजीवाले, भाजीवाले यांच्या गाड्या आहेत. त्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची वाहने या वर्दळीच्या रस्त्यावरच असतात. त्यामुळे सायंकाळी तिथे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे वारंवार पहायला मिळते.

महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आहे. आयुक्तांच्या निवासस्थानासमोर असलेल्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, त्याचा फटका केव्हा तरी आपल्यालाच बसणार आहे याची ​काळजीच केली जात नसल्याची परिस्थिती आहे. आयुक्तांच्या नजरेसमोरील मैदानाजवळ जर अतिक्रमणे वाढत असतील तर आयुक्तांनी इतर ठिकाणी अतिक्रमणांची काय परिस्थिती असेल याचा अंदाजच केलेला बरा. केवळ एकदा मोहिम राबवली तर तो आठवडा, दोन आठवडे जागा खुली होईल. पण पुन्हा जैसे थे परिस्थिती होत आहे. यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून वारंवार कारवाई झाल्या पाहिजे.

मैदानात चारचाकी वाहने

मैदानाबाहेरच्या जागेवर खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी अतिक्रमण केले आहे. पण मैदानातही स्थानिक नागरिकांची, व्यापाऱ्यांची वाहने उभी केलेली पहायला मिळतात. तिथे महापालिकेचा हॉल आहे. कर्मचारीही दिवसभर असतात. पण अशा वाहनांना कुणी हटकत नाही. प्रवेशद्वार केले आहे, ते बंद केले तरी ही वाहने बंद होतील. तसेच चारचाकी वाहनांचे पार्किंगही या मैदानालगत केले जात आहे.

अतिक्रमण निर्मूलनाचे रेकॉर्ड हवे

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी व वाहने शहरात ठिकठिकाणी फिरतात. पण त्यांच्याकडून कारवाई काय झाली व तिथे अडथळा काय आला याबाबत केवळ तोंडी माहिती घेतली जाते. याऐवजी या विभागाने दररोज कोणत्या भागात किती कारवाई केली याचे रेकॉर्ड तयार करुन अधिकाऱ्यांना सादर करण्याची गरज आहे. तसेच एकाच भागात फिरती करण्यापेक्षा त्यांच्याकडून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी फिरती करुन कारवाई झाली तर बहुतांश अतिक्रमणांचा प्रश्न निकाली निघेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसाला टनाला दोनशे वाढीची

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यंदाचा ऊस दरावर अजून तोडगा निघालेला नसताना कृषिमूल्य आयोगाने पुढील वर्षीच्या (२०१८-१९) साखर हंगामासाठी एफआरपीमध्ये प्र​ति टन ऊसाला २०० रुपयांची वाढ सुचवली आहे. यामुळे ९.५० टक्के रिकव्हरीसाठी २७५० रुपये मिळणार आहेत. तर त्यापुढील रिकव्हरीच्या टक्क्याला २६८ रुपये कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांच्या हातात ३०५० रुपयांचा पहिला हप्ता पडेल असे दिसते.

सध्याच्या हंगामासाठी कृषिमूल्य आयोगाने २५५० रुपये एफआरपी निश्चित केली होती. तर पुढील प्रत्येक टक्क्याला २६८ रुपये दिले होते. हा हंगाम अजून सुरू झालेला नाही. अशा वेळी आयोगाने २०१८-१९ च्या साखर हंगामासाठी साखर कारखान्यांनी ऊसकरी शेतकऱ्यांना द्यायच्या एफआरपीच्या रकमेची केंद्रीय अन्न मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. यंदाच्या हंगामातील २५५० रुपयांच्या एफआरपीमध्ये २०० रुपयांची वाढ सुचवली आहे. तर पुढील प्रत्येक टक्क्याला २६८ रुपयांचा दर कायम ठेवला आहे. या नवीन दरामुळे साडेनऊ टक्क्याला २७५० एफआरपी होणार आहे. कोल्हापुरात सरासरी साडेबारा टक्के रिकव्हरी मिळते. त्यामुळे पुढील तीन टक्क्यांना प्रत्येकी २६८ प्रमाणे ८०४ रुपये मिळतील. या दरातील वाहतुकीचा खर्च वजा जाता पहिला हप्ता तीन हजारावर मिळण्याची आशा आहे. या शिफारशीमुळे एफआरपीचा दर तीन हजारावर राहणार असला तरी पुढील वर्षी बाजारात साखरेचे दर कसे राहणार यावर वाढीव एफआरपी कशी द्यायची याचे गणित कारखान्यांना करावे लागणार आहे. यंदाच्या हंगामासाठी २५५० एफआरपी निश्चित केली होती. आयोगाने केलेल्या शिफारशी सरकार मान्य करत असल्याने ही वाढ होईल, असे स्पष्ट आहे.
तर सरकार बैठक घेईल

सध्या ऊस दराच्या निश्चितीवरुन शेतकरी संघटना आक्रमक होऊ लागल्या आहेत. वाहने अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून वातावरण तापू लागल्याने गेल्यावर्षी सरकारने ज्या पद्धतीने मध्यस्थी करुन तोडगा काढला. त्याप्रमाणे यावर्षीही सरकारने बैठक बोलवावी, अशी साखर क्षेत्रातील सर्व घटकांची इच्छा आहे. याबाबत भाजपचे जिल्हा संघटक बाबा देसाई यांना विचारल्यानंतर मध्यस्थीसाठी सरकार बैठक घेईल, असे सांगितले. त्यामुळे ही बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंढोलीत ट्रॅक्टर अपघातात एकजण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

दुपारच्या जेवणाचा पत्नीने आग्रह धरला होता. पण खडीची एक खेप नेतो आणि नंतर जेऊया, असे सांगून गेलेल्या पतीचा मृतदेह पाहण्याची वेळ जोशीलकर कुटुंबावर ओढवली. स्टोन क्रशवरील खडीची ट्रॉली उलटत असताना ट्रॅक्टरचे मश‌िन उलटून पडल्याने मेंढोली (ता. आजरा) येथील शिवाजी मारुती जोशीलकर यांचा जागीच मृत्यू झाला. जेवणासाठी वाट पाहणाऱ्या पत्नीवर पतीचा मृतदेहच पाहण्याची वेळ आल्याने, संपूर्ण परिसरच गलबलून गेला. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

मेंढोली येथील शिवाजी जोशीलकर त्यांच्या गावनजीकच्या स्वस्तिक स्टोन क्रशरमध्ये कामासाठी जात होते. ट्रॅक्टरने ते दगड व खडी वाहतूक करत होते. शनिवारी दुपारी तेथे ट्रॅक्टर लावून ट्रॉली उतरवताना अचानक ट्रॅक्टरचे इंजिन उचलले गेले. उतार असल्याने त्यांचे स्ट‌िअरिंग हातातून सुटले नाही. त्यामुळे इंजिनासह उलटे होताना ते आधी खाली पडले व त्यांच्या अंगावर इंजिन पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाजूला करण्यात आला. त्यानंतर मृतदेह आजरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. येथे नातेवाईकांची येथे गर्दी झाली. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. शिवाजी यांच्या पश्चात पत्नी उज्ज्वला, दोन मुले, पत्नी व आई-वडील असा परिवार आहे. याबाबत आजरा पोलिसात नोंद झाली असून सहायक फौजदार नजीर पटेल तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोकणातील सावित्री नदीवरील पूल कोसळण्याच्या घटनेनंतर कोल्हापूर शहरातील दहाही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. प्रत्येक पुलाच्या देखभाल दुरुस्तीची आवश्यकता असल्याचा अहवाल महापालिकेला मिळाला. जयंती नाल्यावरील पूल देखरेखीखाली ठेवण्याच्या सक्त सूचना होत्या. शिवाय पुलाच्या कमानीचे काही दगड निसटल्याचे, क्राँकीटचे पडलेले ढपले, पुलाच्या भिंतीवर उगवलेले झाडे झुडपे हटविणे गरजेचे असताना निधी अभावी कामे झाली नाहीत. महापालिकेने, राज्य सरकारकडे दहा पुलाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी दोन कोटीचा प्रस्ताव सादर केला आहे, मात्र राज्य सरकारने अद्याप निधी उपलब्ध केला नाही.

कोल्हापूर शहरातील विविध भागात दहा पूल आहेत. यापैकी दोन पुलाचे बांधकाम हे हे ब्रिट‌िशकालीन आहे. जयंती नाल्यावरील पुलाचे बांधकाम हे १८७६ ते १८७९ या कालावधीत झाले. कोल्हापूर संस्थानचे राजे, तिसरे शिवाजी यांच्या कालावधीत पुलाचे बांधकाम झाले. पुलावर दगडी कमान, घडीव दगड, पुलाच्या दोन्ही बाजूला दगडी घुमट आणि शोभा वाढविणारे नक्षीदार दगडी खांब यामुळे संस्थानकालीन पुलाचे सौंदर्य खुलले होते. जयंती नाल्यावरील पूल हे प्रिन्स शिवाजी पूल या नावांनी ओळखला जातो.

जयंती नाल्यावरील पूल तब्बल १४० वर्षे शहरातील वाहतुकीचा भार पेलत आहे. शिवाय कसबा बावडा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, रमणमळा या भागांना जोडणारा हा मार्ग आहे. सरकारी कार्यालयेही या मार्गाशी जोडली आहेत. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयआरबी कंपनीने २०१२ मध्ये जुन्या पुलाला पर्यायी नवा पूल बांधला. गेल्या पाच वर्षांपासून दोन्ही पुलाचा रहदारीसाठी वापर होत आहे. दोन्ही पुलावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे.

कोकणात पूल कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील जयंती नाल्यावरील पूल, शेळके पूल, फुलेवाडी पूल, संभाजी पूल, शाहू पूल, शाहू पूल, हुतात्मा गार्डनच्या दक्षिण व उत्तर बाजूकडील पुलासह एकूण दहा पुलांच्या ऑडिटचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण केले होते. यापैकी जयंती पूल आणि विल्सन पूल हे संस्थानकालीन आहेत. मुंबई येथील स्ट्रक्टवेल डिझायनर्स कन्सल्टन्सी प्रायव्हेट लि​मिटेड कंपनीने दहा पुलांचे ऑडिट करून महापालिकेला स्वतंत्र अहवाल दिला.

पुल देखरेखीखाली ठेवण्याच्या सूचनेकडेही लक्ष

अहवालात ब्रिटीशकालीन पुलाची देखभाल, दुरुस्ती गांभीर्याने करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. काही पुलांचे काँक्रीटला ढपले पडल्याचे, बांधकामाचा दर्जा ढासळल्याचे निदर्शनास आणले. जयंती नाल्यावरील पुलाच्या कमानीचे काही दगड निखळल्याने हा पूल देखरेखीखाली ठेवण्याची सूचना केली होती. पुलाचे आयुष्यमान, वातावरणाचा परिणाम, प्रदूषणाचा विळखा यामुळे काँक्रीटचा दर्जा खराब झाल्याचे अहवालात म्हटले आहे. शिवाय सहा महिने निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. जयंती नाल्यावरील पुलाखाली गाळ, प्लास्किटचा कचरा, टाकावू साहित्याची भर पडली आहे. पुलावर झाडे झुडपी वाढल्याने पुलाला धक्का पोहचत आहे.


शहरातील दहा पुलाच्या देखभाल, दुरुस्तीचा दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरही वस्तुस्थिती मांडली आहे. पालकमंत्र्यांनी निधी देण्याची ग्वाही दिली आहे. निधी उपलब्ध होताच दुरुस्तीचे काम प्राधान्याने करण्याचे नियोजन आहे.

नेत्रदीप सरनोबत,शहर अभियंता महापालिका


स्ट्रक्टवेल कंपनीकडून पुन्हा पाहणी होणार

शहरातील पुलांचे ऑडिट केलेल्या स्ट्रक्टवेल डिझायनर्स कंपनीच्या प्रतिनिधींशी महापालिकेने संपर्क साधला आहे. येत्या चार दिवसात कंपनीचे प्रतिनिधी पुलाची पाहणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांच्या फुटबॉल सामन्यावरुन दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलांच्या फुटबॉल सामन्यातील मारामारीच्या कारणावरुन राजेबागस्वार आणि सोमवार पेठेतील दोन गटांनी सिद्धार्थनगर चौकात एकमेकांवर दगडफेक करत अक्षरशः धुडगूस घातला. भर दुपारी हा प्रकार घडल्याने चौकात तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या मारामारीत महाराणा प्रताप चौक परिसरातील आदर्श नामदेव पोवार (वय १९) हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सौम्य लाठीमार करत दोन्ही गटांना पिटाळून लावले.

सिद्धार्थनगर परिसरातील एका मंडळाने मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. दादासाहेब शिर्के उद्यानात स्पर्धा सुरु होत्या. सोमवार पेठ महाराणा प्रताप चौक व राजेबागस्वार परिसरातील दोन संघात सामना सुरु होता. सामन्यातदरम्यान सोमवार पेठेतील एका खेळाडूने राजेबागस्वारच्या खेळाडूला शिवी हासडली. त्यावरून मैदानात वाद सुरु झाला. दोन्ही संघातील मुले एकमेकांच्या अंगावर धावून गेली. यावेळी सामना पाहण्यासाठी सोमवार पेठेतील आदर्श पोवार व ऋषिकेश राजेंद्र मेहता हे दोघेही उपस्थित होते. त्यांनी वादावादी सुरू केल्यानंतर राजेबागस्वार येथील तरुणही उद्यानात आले. राजेबागस्वारमधील काही युवकांनी पोवारच्या डोक्यात सळी मारली. घाव वर्मी बसल्याने तो बेशुद्ध पडला. ही घटना समजताच सोमवार पेठेतील तरुण मोठ्या संख्येने तेथे आले. दोन्ही गट भिडले. राजेबागस्वार परिसरातील महिलाही मोठ्या संख्येने बाहेर आल्या. दोन्हीकडून तुफान दगडफेक सुरु झाली. महिलाही दगडफेकीत सहभागी झाल्या होत्या. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे सीपीआर चौक, टाउन हॉल परिसरातील स्टॉपवरील प्रवासी घाबरुन पळून गेले. या घटनेची माहिती समजताच लक्ष्मीपुरी पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी जमावावर सौम्य लाठीमार करुन हुल्लडबाजांना पिटाळून लावले.

जखमी पोवारला सीपीआरमध्ये दाखल केले, पण डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. ही घटना समजताच सोमवार पेठेतील जमाव पुन्हा राजेबागस्वारकडे चाल करुन जाऊ लागला. तेव्हा घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर आले. त्यांनी जादा पोलिस बंदोबस्त मागवून घेतला. स्वयंभू गणेश मंदिर चौकात पोलिसांनी सोमवार पेठेतील जमावाला रोखून धरले. परिसरात संचलनही केले. या घटनेनंतर जमाव पांगला. ऋषिकेश मेहताने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर जमाव पांगला. रात्री उशिरापर्यंत सोमवार पेठ व राजेबागस्वार परिसरात तणाव होता.
दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलिसांनी ऋषिकेश मेहता आणि आदर्श पोवार याला लाथाबुक्क्या आणि काठीने मारहाण करुन जखमी केल्याबद्दल पाच संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बिलाल झरेकर, झिब्रान नांदणीकर, शाहरूख शेख, सोहेल पटेकर, असिफ शेख (सर्व,, रा. राजेबागस्वार दर्गा परिसर) अशी संशयितांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'१५ डिसेंबर नंतर एकही खड्डा दिसणार नाही'

$
0
0

चंद्रकांत पाटील यांचा नवा वायदा

सुनील दिवाण, पंढरपूर

राज्यातील रस्ते खड्ड्यांनी भरुन गेलेले असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता १५ डिसेंबरचा नवीन वायदा करत यानंतर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे आले असता ते बोलत होते.

यंदा राज्यात प्रचंड पाऊस झाल्याने सर्वत्र खड्डे झाले. यामुळे आता पुन्हा नव्याने खड्डे बुजवायची टेंडर काढल्याचं पाटील यांनी सांगितलं. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे बहुतांश रस्ते हे रोजगार हमी योजनेत केले असल्याने त्यांचा पायाच मजबुत नसल्याचा शोधही त्यांनी लावला. कोकणातील रस्ते तर गणपती पूर्वी आपण स्वतः लक्ष देवून दुरुस्त केले. मात्र, पावसाने पुन्हा खड्डे झाल्याचा दावा पाटील यानी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील २२ हजार किलोमीटरच्या राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याने ही कामे सुरू होतील. मात्र तोपर्यंत या रस्त्यांचे खड्डे नियमात बदल करुन राज्य सरकार बुजवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

वारकरी संप्रदाय आणि सरकार यातील संघर्षाला नेहमीप्रमाणे फुटीचे ग्रहण लागले. वारकरी नेत्यांशी केवळ ५ मिनिटांत चंद्रकांत पाटलांनी चर्चा गुंडाळली. वारकरी संप्रदायाला उरलेल्या २ सदस्यांची नावं देण्याचे सांगण्यात आल्याचं सांगत त्यांना हवं असेल तर सहअध्यक्ष पद देण्याची तयारी असल्याची भूमिका घेत आंदोलनाची हवाच काढून घेतली. मंदिर समिती बरखास्त करून १०० टक्के वारकऱ्यांची समिती नेमण्याच्या मागणीसाठी वारकरी संप्रदायाने आषाढी यात्रेपासून आंदोलन छेडले होते. मात्र फक्त चार महिन्यांत आणि दोन बैठकातच हे आंदोलन गुंडाळल्याचं दिसून आलं. विश्रामगृहावरील बैठकीनंतर आपली फसगत झाल्याची भावना वारकरी नेत्यांमध्ये दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्तिकीसाठी पंढरीत ५ लाख भाविक दाखल

$
0
0

दर्शनासाठी लागताहेत २६ तास

सुनील दिवाण, पंढरपूर

राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने यंदा कार्तिकी यात्रेसाठी आज दशमीला ५ लाख भाविक पंढरीत दाखल झालेत. कार्तिकीसाठी चंद्रभागेच्या तीरावर भाविकांचा महासागर लोटला आहे. आज भल्यापहाटेपासून चंद्रभागा तीरावर स्नानासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. कार्तिकी महासोहळ्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्या पहाटे विठूरायाची शासकीय महापूजा केली जाणार आहे.

कार्तिकी यात्रेसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे विठूरायाची राऊळी उजळून निघाली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी सध्या २४ ते २६ तास लागत आहेत. तसंच दर्शन रांग गोपाळपुरच्या पत्राशेडमध्ये पोचली आहे. कार्तिकी यात्रेत टोकन दर्शन व्यवस्था सुरू करून दर्शन रांग कायमची बंद करण्याची मंदिर समितीची घोषणा हवेतच राहिली. आज दर्शन रांगेत दीड ते दोन लाख भाविक उभे आहेत.

दर्शन रांगेत काही ठिकाणी घुसखोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याच्या भाविकांच्या तक्रारी आहेत. यामुळे पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. भाविकांच्या निवासासाठी चंद्रभागेच्या पलीकडे उभारलेल्या ६५ एकराच्या निवासतळावर जवळपास दीड लाख भाविकांनी राहुट्या उभारून निवास केला आहे. अजूनही भाविकांच्या दिंड्या या ठिकाणी दाखल होत आहेत.



चंद्रभागेत भरपूर पाणी असल्याने भाविक स्नानसोबत नौकाविहाराचा आनंद घेत आहेत. चंद्रभागेच्या एका तीरावरून दुसऱ्या तीराला जाण्यासाठी भाविक होड्यातून प्रवास करत हा नौकाविहाराचा आनंद घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीच्या कर्जमाफीच्या यादीतसोलापूर, परभणी, ठाण्यातील सोसायट्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली जिल्ह्यातील कर्जमाफीच्या यादीवर सोलापूर, परभणी, ठाणे, जिल्ह्यातील सोसायट्यांची नावे आल्याने बँकांच्या अधिकाऱ्यांचाही गोंधळ उडाला. त्यामुळे कर्जमाफीचा माहितीतील घोळ सोमवारीही सुरूच राहिल्याचे समोर आले. डाटामधील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांसह तांत्रिक कर्मचारी मुंबईला रवाना करण्यात आले आहेत. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ३४६ शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही. सहकार विभागाच्या वतीने मात्र लवकरच संबधितांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले.
सहकार विभागाकडून कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांना पाठविण्यात आली आहे. परंतु, सांगली जिल्ह्याच्या यादीमध्ये परभणी, सोलापूर, पुणे, ठाणे, गोंदिया, नवी मुंबई आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सोसायट्यांची नावे आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सोसायट्यांची यादी निश्चित करताना जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांचा कस लागत असल्याचे दिसत आहे. ९० सोसायट्यांच्या याद्या पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी १५ सोसायट्या जिल्ह्याच्या यादीवर सापडत नसल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीची पहिली ग्रीन यादी वेबपोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे मागील २३ ऑक्टोंबरपासून उघडलीच नाही. त्यामुळे सहकार खात्याच्या यंत्रणेसह शेतकरीही हवालदिल झाले होते. आपले सरकार पोर्टलवर सोमवारी पुन्हा ग्रीन यादी दिसू लागली आहे. त्यामुळे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
आठवड्याभरापासून कर्जमाफीच्या रकमेविषयी गोंधळ निर्माण झाला असताना सोमवारी जिल्ह्यातील १ हजार ३४६ शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे समोर आले. बँकाकडून पाठविण्यात आलेल्या कर्जमाफीच्या माहितीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात शंभर टक्के सोसायट्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. परंतु, अनेक संस्थांच्या माहितीमध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. डाटातील माहिती दुरुस्तीसह पाठविण्याचे कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी जादा कालावधी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या शिवाय त्यांच्यासोबत माहितीची सॉफ्ट कॉपीही देण्यात आली आहे. परंतु मुंबईतही आयटी विभागाकडून विशेष प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ७६३ सोसायट्यांची यादी पुन्हा अपलोड करण्यात येत असल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसंतदादा दहा वर्षांतकर्जमुक्त करणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘सहकार क्षेत्रात सर्वाधिक २६१ रुपये प्रतिटन भाडे देऊन वसंतदादा कारखाना चालवण्यास घेणाऱ्या श्री दत्त इंडिया कंपनीकडून शेतकऱ्यांच्या ऊसालाही सर्वांपेक्षा चांगलाच दर दिला जाईल. भडकावणारे अनेक जण असतात तिकडे लक्ष देऊन काहीही डोक्यात ठेऊ नका. वसंतदादांवर जसे प्रेम करीत आलात, त्याच प्रेमाने कारखान्याला ऊस द्यावा. दहा वर्षांत कारखाना कर्जमुक्त करून पुन्हा सभासदांच्या ताब्यात दिला जाईल,’ असा विश्वास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलिप पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला.
श्री दत्त इंडिया कंपनीच्या वतीने चालवण्यास घेण्यात आलेल्या वसंतदादा कारखान्याचा पहिल्या गळीत हंगामाची मोळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष पाटील, कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, महंत श्यामसुंदर शास्त्री जिल्हा बँकेचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘राजकारणापेक्षाही समाजकारण व अर्थकारण महत्वाचे असते. म्हणूनच राजकारण बाजूला ठेऊन वसंतदादा कारखाना सुरू व्हावा यासाठी मदत केली. आमदार जयंत पाटील यांचाही या कारखान्याला पाठिंबाच होता. हा कारखाना बंद असल्याने सांगलीतल्या सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला होता. कंपनीने कारखाना घेतल्यानंतर धावपळ करुन गळीत हंगामाला गाठ घालताना अनेकांची देणी दिली आहेत. तब्बल ३९ हजार एकर उसाची नोंद करुन आठ दिवसांत गाळप झालेल्या ऊसाचे बील त्या त्यावेळी देण्याची ग्वाही दिल्याने एक वेगळेच आणि विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.’
श्यामसुंदर शास्त्री म्हणाले, ‘रूपारेल हे बारदान विकण्याचा व्यवसाय सुरू करून इतक्या मोठ्या पातळीवर पोहचले आहेत. केवळ वसंतदादांच्या प्रेमापोटी त्यांच्या नावाची संस्था चालावी यासाठी ते येथे आले आहेत. इतरांच्या प्रमाणात ऊसाला दर देण्यात हे कुठेह कमी पडणार नाहीत. स्वागत व प्रास्ताविक दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मुत्यूजंय शिंदे यांनी केले. ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज आहे. वसंतदादांवर करीत असणाऱ्या प्रेमाप्रमाणे या कंपनीवरही प्रेम करा.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानीने ऊसतोडबंद पाडली

$
0
0


कराड
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पार्ले (ता. कराड) येथे सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली. ऊसदर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करू नये. जबरदस्तीने ऊसतोड केल्यास होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला आहे. उपजिल्हाध्यक्ष दादासो यादव, अनिल घराळ, कराड तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाले, युवा आघाडी तालुकाध्यक्ष रोहित पाटील, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष बालासो पिसाळ आदी उपस्थित होते.
मिरेजत ऊसतोड थांबवण्याचा निर्णय
ऊसाला पहिली उचल ३५००रुपये मिळावी, या मागण्यांसाठी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने रविवारी वड्डी (ता. मिरज) येथे कर्नाटकातील अंकली-मांजरी येथील शिवशक्ती साखर कारखान्याची ऊसतोड बंद पाडली होती. ऊसतोड बंद पाडून तीन ऊसतोड टोळ्यांना हुसकावून लावले होते. त्यामुळे सोमवारी शेतकरी संघटना आणि या कारखान्याचे शेती अधिकारी दरीगोडा यांच्यामध्ये म्हैसाळ येथे बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकार जोपर्यंत ३५०० हजारांची पहिली उचल जाहीर करीत नाही, तोपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघी दुमदुमली पंढरीकार्तिकीसाठी पाच लाख भाविक दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपुरात कार्तिकी यात्रेसाठी सोमवारी, दशमीला पाच लाख भाविक दाखल झाले आहेत. चंद्रभागा तीरावर भाविकांचा महासागर लोटला आहे. सोमवारी भल्यापहाटेपासून चंद्रभागा तीरावर स्नानासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. चंद्रभागेत भरपूर पाणी असल्याने भाविक स्नानसोबत नौकाविहाराचा आनंद घेत आहेत. चंद्रभागेच्या एका तीरावरून दुसऱ्या तीराला जाण्यासाठी भाविक होड्यांतून प्रवास करीत आहेत. कार्तिकी महासोहळ्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पंढरपुरात दाखल झाले असून, मंगळवारी पहाटे पाटील यांच्या हस्ते विठूरायाची सरकारी महापूजा केली जाणार आहे.
कार्तिकी यात्रेसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे विठूरायाची राऊळे उजळून निघाली आहेत. विठूरायाच्या दर्शनासाठी सध्या २४ ते २६ तासांचा वेळ लागत असून, दर्शन रांग गोपाळपुरच्या पत्राशेडमध्ये पोचली आहे. मंदिर समितीने कार्तिकी यात्रेत टोकन दर्शन व्यवस्था सुरू करून दर्शन रांग कायमची बंद करण्याची घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे. सोमवारी दर्शन रांगेत दीड ते दोन लाख भाविक उभे होते. दर्शन रांगेत काही ठिकाणी घुसखोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याच्या भाविकांच्या तक्रारी असून, पोलिस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आला आहे. भाविकांच्या निवासासाठी चंद्रभागेच्या पलिकडे उभारलेल्या ६५ एकरांच्या निवासतळावर जवळपास दीड लाख भाविक राहुट्या उभारून निवास करून राहिले आहेत. अजूनही भाविकांच्या दिंड्या दाखल होत आहेत.
वारकरी आंदोलनात फूट
विठ्ठल मंदिर समितीवरून सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या वारकरी आंदोलनात फुट पडल्याचे सोमवारी समोर आले. वारकरी नेत्यांना केवळ पाच मिनिटांच्या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी गुंडाळून टाकले आणि वारकरी आंदोलन संपल्याच्या अविर्भावात पत्रकारांशी संवाद साधला. वारकरी संप्रदायाला समितीतील उरलेल्या दोन सदस्यांची नावे सूचविण्याचे सांगण्यात आले. शिवाय त्यांना हवे असेल तर सहअध्यक्ष पद देण्याची तयारी असल्याचे सांगत पाटील यांनी आंदोलनातील हवाच काढून घेतली.
मंदिर समिती बरखास्त करून शंभर टक्के वारकऱ्यांची समिती नेमण्याच्या मागणीसाठी वारकरी संप्रदायाने आषाढी यात्रेपासून आंदोलन छेडले होते. मात्र, फक्त चार महिन्यांत आणि दोन बैठकातच हे आंदोलन गुंडाळले गेले. विश्रामगृहावरील बैठकीनंतर आपली फसगत झाल्याची भावना काही वारकरी नेत्यांनी बोलून दाखवली.
पंधरा डिसेंबरनंतर
राज्य खड्डेमुक्त
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील राज्यातील ९६ हजार किलोमीटर रस्त्यांवर पंधरा डिसेंबरनंतर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही महसूल आणि सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, ‘राज्यात प्रचंड पाऊस झाल्याने सर्वत्र खड्डे झाले आहेत. आता पुन्हा नव्याने खड्डे बुजवायची टेंडर निघाली आहेत. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे बहुतांश रस्ते रोजगार हमी योजनेतून केले असल्याने त्यांचा भराव मजबूत नाही. कोकणातील रस्ते गणपती पूर्वी स्वतः लक्ष देऊन दुरुस्त केले. मात्र, पावसाने पुन्हा खड्डे झाले आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राज्यातील २२ हजार किलोमीटरच्या राज्यमार्गाना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याने ही कामे वेगाने सुरू होतील. मात्र, तोपर्यंत या रस्त्याचे खड्डे नियमात बदल करून राज्य सरकार बुजविणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images