Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गर्भपाताचे रॅकेट उघड, २ डॉक्टरांवर गुन्हा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पंढरपूर

अकलूज येथे ३६ गर्भपात केल्या प्रकरणी डॉक्टर गांधी दाम्पत्याला अटक करून तपास सुरु असताना आज पहाटे माळशिरस परिसरातील दोन डॉक्टरांवर ९ महिलांचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील डॉक्टर विजयसिंह भगत आणि मेडद येथील डॉक्टर सुखदेव कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची कुणकुण लागताच दोन्ही डॉक्टर हॉस्पिटलला कुलूप ठोकून पळून गेल्याने आता पोलिसांनी शोधकार्य सुरु केले आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी, खुळेवाडी, उंबरे दहिगाव परिसरातील ९ महिलांचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी सिव्हिल सर्जन डॉक्टर मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांच्या तक्रारीवरून माळशिरस पोलीस ठाण्यात भादंवि ३१२ , २०१ व वैद्यकीय गर्भपात अधिकार १९७१ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भपाताची ही प्रकरणे ९ ऑगस्ट २०१६ ते १३ जानेवारी १७ या पाच महिन्यांच्या कालावधीतील असून आता पोलिसांपुढे या सर्व रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विठ्ठल मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडीट सुरू

$
0
0

सुनील दिवाण । पंढरपूर

देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडीट सुरू करण्यात आले असून मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी सुचविण्यात येणाऱ्या सर्व दुरुस्त्या केल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

बाराव्या शतकामध्ये बांधण्यात आलेल्या विठ्ठल मंदिरात वर्षभरात दीड कोटी पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा या पुरातन मंदिरात गेल्या काही वर्षात वास्तूला धक्का लागल्याने काही दुर्घटना घडल्या होत्या. विठ्ठलाच्या मूळ मंदिरावर वजन टाकणारी काही बांधकामे झाल्याने मूळ वास्तू खचू लागल्याचे 'मटा'ने समोर आणले होते. त्यानंतर बाजीराव पाडसाळीचा संपूर्ण सिमेंटचा मंडप पाडून टाकण्यात आला होता. यानंतरही काही ठिकाणी वास्तूमध्ये डागडुजी व दुरुस्त्या करणे गरजेचे बनल्याचे वास्तव 'मटा'ने दाखविल्यावर मंदिर समितीने संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

यानुसार पुणे येथील सरकारी इंजिनियरिंग कॉलेजच्या टीमने विठ्ठल मंदिरात येऊन सर्व वास्तूचा सखोल अभ्यास केला आहे. याचबरोबर मंदिराच्या नंतर झालेल्या बांधकामाचा मजबुतीकरणाच्या दृष्टीने अभ्यास करण्यात आला आहे. मंदिराच्या वास्तूला वीज आणि आगीपासून धोका टाळण्यासाठीही हे ऑडीट करण्यात आले असून येत्या आठ दिवसात याचा अहवाल प्राप्त होणार आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यापासून बाहेरच्या प्रवेशद्वारापर्यंत सर्वच वास्तूच्या मजबुतीकरणाचे काम पुरातत्व विभागामार्फत केले जाणार असल्याचे समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

राज्यात प्रथमच अशा पद्धतीने एखाद्या मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येत असून यामुळे मंदिराचे आयुष्य वाढविण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पंढरपूर

उजनी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून भीमा नदीत ६० हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात अली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील धरणातून १५ हजार क्युसेक्स विसर्गाने उजनी धरणात पाणी येत असले तरी उजनीच्या परिसरात सातत्याने मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होऊ लागला आहे. सध्या उजनी धरण ११० टक्के भरले असल्याने धरणात पाणीच साठवण्यास जागा उरलेली नाही. परिणामी धरणातून भीमा नदीत ६० हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पाण्यामुळे भीमा नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पाऊस कमी न झाल्यास या विसर्गात अजून वाढ करावी लागणार आहे.

दुचाकीसह दोघे वाहून गेले

सध्या भीमा नदीवरील बहुसंख्य बंधारे भरून वाहत असल्याने वरून सोडलेले पाणी वेगाने येणार आहे. आज सायंकाळी पंढरपूर मुंढेवाडी बंधाऱ्यावरून दुचाकीसह दोघे जण वाहून गेले. या दोघांचा शोध सुरू आहे. मुंढेवाडी बंधाऱ्यावरून सायंकाळी ७ च्या सुमारास दुचाकीवरून एक पुरुष व एक महिला चालली होती. बंधाऱ्यावर पाणी असल्याने त्यांना न जाण्याचा सल्ला दिला होता मात्र त्यांनी न ऐकता तशीच दुचाकी बंधाऱ्यावरून नेण्याचा प्रयत्न केला असता हे दोघेही वाहून गेले आहेत. याची माहिती पोलिसांना मिळताच बंधारा परिसरात रात्री शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात पावसाने हाहाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि परिसरात बुधवारी रात्री पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली. अकराच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने जराही उसंत न घेता शहरवासीयांच्या मनात दहशत निर्माण केली. जवळपास तीन तास पावसाचे थैमान सुरू होते. एका रात्रीत शहर परिसरात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रस्त्यांवर चार ते पाच फूट पाणी साचले. रामानंदनगर, जरगनगर, पाचगाव, शास्त्रीनगर परिसरातील घरांमध्ये गुडघाभर पाणी आले. पावसामुळे ८ मोटारी, २० दुचाकी, तीन ऑटो रिक्षा वाहून गेल्या. पाण्याच्या प्रवाहात या वाहनांसह कंटेनर आणि अनेक घरांतील प्रापंचिक साहित्य वाहून गेले. करवीर तालुक्यात दोन ठिकाणी घरांची पडझड झाली. पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्रचंड पाऊस आणि विजांच्या कडकडाटांमुळे रात्री काम उरकून जाणाऱ्या वाहनधारकांतही भीती निर्माण झाली. अनेकांना पाण्याचा आणि रस्त्याचा अंदाज आला नाही. पाण्याचे लोंढे अनेक ठिकाणी मोठ्या वेगाने वाहू लागले. शहरातील वाहतूकही या काळात मंदावली. कळंबा, पाचगांव, उजळाईवाडी या उपनगरांतील घरांत सात ते आठ फूट उंच पाणी साचले. रामानंदनगर, जरगनगर, श्री रेणुका मंदिर परिसर, शास्त्रीनगर परिसरातील घरातही पाणी घुसले. रात्री बारा वाजता अचानक झालेल्या घटनेमुळे या परिसरातील रहिवाशी भीतीच्या छायेखाली राहिले. अनेक कुटुंबाचे प्रापंचिक साहित्य वाहून गेले. नाल्यांची पातळी वाढली. पाण्याचा वेग आणि नाल्याचे पात्र विस्तारल्याने या परिसरातील घरात पाणीच पाणी झाले. तीन तास या कुटुंबांनी पाण्याच्या दहशतीखाली घालवली.

रुईकर कॉलनी परिसरात मोटारीवर झाड पडले. सोसाट्याचा वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. उद्यमनगर, शास्त्रीनगर, शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाले. काही घरांचे नुकसानही झाले. नाल्याच्या काठावरील दोन संरक्षक भिंतीही कोसळल्या. विल्सन पुलावरील मंदिराचे शेड वाहून गेले. पाचगाव परिसरातील मगदूम कॉलनीतील काही घरांत पाणी आले. शहरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव, कळंबा तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. कळंबा तलाव काठोकाठ भरला आहे.

दरम्यान, अतिवृष्टीच्या दणक्याने महापालिका आणि अग्निशमन दलाची धावपळ उडाली. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सायंकाळपर्यंत मदतकार्य सुरूच होते. वाहून गेलेली वाहने शोधण्याचे आणि क्रेन लावून काढण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागली. या मोहिमेत चार मोटारी, एका रिक्षाचा शोध लागला. ती पाण्याबाहेर काढण्यात आली.

दमदार पावसामुळे धरण, शहरातील ऐतिहासिक रंकाळा, कळंबा तलाव काठोकाठ भरले. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. पंचगंगेची पाणीपातळी तीन तासांत १६ फूट ८ इंच झाली आहे. बुधवारी रात्री पावसाने घातलेल्या थैमानामुळे पूरस्थितीच निर्माण झाली. २०० हून अधिक जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधींकडून पाहणी

दरम्यान आमदार अमल महाडिक यांनीही शास्त्रीनगर, उद्यमनगर परिसराची पाहणी केली. पाण्याचा निचरा होत नसलेल्या ठिकाणी तातडीने कामे करण्याचे आदेश दिले. नुकसान झालेल्या ठिकाणाचा पंचनामा करुन संबधितांना तातडीने मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. यादवनगर, शास्त्रीनगर येथील कुटुंबीयांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीची प्रत्येक दहा हजारांची मदत जाहीर केली. रेड झोन क्षेत्रात अवैध बांधकामामुळेच ही घटना घडली आहे. त्याचा जाब महापालिका आयुक्तांना विचारणार असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी काही ठिकाणी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ उद्योगाने स्वीकाराले बदल

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : कोल्हापुरात गुळाचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतले जात होते. गुळाला हक्काची बाजारपेठ मिळत असल्याने गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सध्या गूळ उद्योगाला विविध समस्या भेडसावत असताना स्वत: उत्पादकांनीच पुढाकार घेत बदल करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे ३० किलो रव्यांची संकल्पना मागे पडून दहा ते एक किलो गुळाची निर्मितीपासून वडी, मोदक व सेंद्रिय गूळ अशा स्वरुपात गुळाचे उत्पादन घेतले जात आहे. तसेच हंगामही लवकरच सुरू करुन दर अधिक मिळवण्याकडे कल वाढला आहे. उत्पादकांच्या प्रयत्नांना अधिक बळकटी निर्माण करून देण्यासाठी कागदावरील गूळ क्लस्टर योजना अस्तित्वात येण्याची आवश्यकता आहे.

साधारणता: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला ऑक्टोबरच्या अखेरीस सुरुवात होते. पण गेल्या १६-१७ वर्षांपासून एफआरपीवरुन शेतकरी संघटना, ऊस उत्पादक व कारखानदारांमध्ये संघर्ष निर्माण होऊ लागल्याने कारखान्यांच्या गळीत हंगाम काहीसा उशीरा सुरुवात होत आहे. कारखान्यांच्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरे पेटत होती. पण गेल्या काही दिवसांत यामध्ये अमुलाग्र बदल होऊ लागला आहे. साखरेच्या दरावरच गुळाचा दर ठरवला जात असल्याने उत्पादकांनी यावर तोडगा काढण्यासाठी गुऱ्हाळघरे लवकर सुरू करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फायदाही उत्पादकांना होऊ लागला आहे.

दहा वर्षापूर्वी पारंपरिकरित्या उत्पादन घेताना ३० किलो गूळ रव्याची निर्मिती केली जात होती. त्यामध्ये उत्पादकांनी बदल करत दहा किलो रव्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्याचा फायदा उत्पादकांना होऊ लागल्यानंतर त्यामध्ये आणखी बदल करण्यात आले. एक, पाच किलोच्या गूळ रवे तयार करताना गुळाची वडी, मोदक असेही उत्पादन घेण्यात येऊ लागले. आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रीय गुळाला महत्त्व प्राप्त झाल्यानंतर या पद्धतीच्या शेतीलाही उत्पादकांनी सुरुवात केली. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये असा गूळ विक्री करताना स्वयंस्फुर्तीने मार्केटिंग करत बाजारपेठेचा शोध घेतला. त्यामुळे उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होऊ लागला. गूळ हंगामाला अगोदर सुरुवात करताना मुहूर्तांच्या सौद्यांना मिळणार दर आणि संपूर्ण हंगामात मिळणारा दर याच्याशी सांगड घालण्यास बाजार समितीला भाग पाडले, त्यामुळे वाजवी दर मिळण्यास सुरुवात झाली.

उत्पादक असे प्रयत्न करताना शासकीय आणि लोकप्रतिनिधींनी गूळ उद्योग म्हणून अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी गूळ क्लस्टर योजना फलदायी ठरणार आहे. क्लस्टर योजनेतून उत्पादकांना प्रशिक्षण देणे, सेंद्रिय गूळ निर्मिताला चालना, उपपदार्थ निर्मितीला संधी, कोल्ड स्टोरजची उभारणी, गूळ उत्पादनाला दर्जा प्राप्त करून देणे आणि निर्यात झोन उपलब्ध करुन दिल्यास निश्चितच कोल्हापूर गूळ सातासमुद्रापार पोहोचून एक उद्योग म्हणून अस्तित्वात येईल.

बाजार समितीतील पाच वर्षातील गूळ उत्पादनाचा लेखाजोखा

वर्ष विक्री (क्विंटल) उलाढाल सरासरी दर

२०१२-१३ ८,६५,४४८ दोन कोटी ७० लाख ३२००

२०१३-१४ ७,६५,२६४ दोन कोटी २२ लाख ३०००

२०१४-१५ ६,५५,४४२ एक कोटी ९१ लाख २९००

२०१५-१६ ७,५०,५४४ दोन कोटी १७ लाख ३४००

२०१६-१७ ७,३८,२०१ दोन कोटी १९ लाख ३५००

महाराष्ट्र टाइम्सचा सातत्याने पाठपुरावा

महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीच्या नुकताच पाचवा वर्धापनदिनानिमित्त मटा कॉन्क्लेवचे आयोजन करण्यात आले होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने १३ मुद्यांची मांडणी करण्यात आली होती. जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या मुद्यांवर राज्यस्तरावर चर्चा घडून आली. कोल्हापूर ही गूळ उत्पादनाची प्रमुख उत्पादन केंद्र असल्याने गूळ क्लस्टर योजनेला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गूळ उत्पादन, त्याच्या समस्या, उद्योगाला उभारी येणासाठी उपायोजना, गुऱ्हाळघरांची घटती संख्या, मार्केटिंग आदींबाबत महाराष्ट्र टाइम्सने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे राज्यस्तरावर हा गूळ क्लस्टर योजना कार्यन्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष प्रयत्न

पारंपरिकरीत्या उत्पादन होणाऱ्या कोल्हापुरातील गूळ उत्पादनाची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. गूळ उत्पादनाला उद्योगाचा दर्जा मिळवून दिल्यास येथील उत्पादन वाढीबरोबरच ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळकटी मिळणार आहे. रोजगार निर्मिती, गूळाचे उपपदार्थ निर्मिती त्यामुळे येथीले अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम होणार आहे. याचा विशेष फायदा ग्रामीण भागातील युवकांना होणार असल्याने गूळ क्लस्टर योजना कार्यन्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना क्सल्टर योजनेसाठी काय आवश्यक आहे, याची माहिती जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीतच जागेच्या प्रश्नाबाबत चर्चा घडून येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैनुद्दीनची बिंदू चौक सबजेलमध्ये ओळख परेड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा लुट प्रकरणातील संशयित चोरटा मैनुद्दीन मुल्ला याची गुरुवारी (ता. १४) बिंदू चौकातील सबजेलमध्ये ओळख परेड झाली. पुण्यातील एका महिलेसह दोघे ओळख परेडसाठी उपस्थित होते. करवीरचे नायब तहसीलदार आणि जेल अधिकाऱ्यांसमोर ही ओळखपरेड झाली. दरम्यान, वारणा लुटीतील संशयित पोलिस सूरज चंदनशिवे याचे वकील अनुपस्थित राहिल्याने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

वारणानगर येथील शिक्षण संस्थेत ९ कोटी १८ लाख रुपयांच्या लुटीप्रकरणी सीआयडीने संशयित चोरटा मैनुद्दीन मुल्ला याला अटक केले आहे. सध्या मैनुद्दीन बिंदू चौकातील सबजेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. सीआयडीने गुरुवारी मैनुद्दीनची ओळख परेड घेतली. पैशांची चोरी केल्यानंतर सांगली पोलिसांनी मैनुद्दीनला अटक केले होते. यानंतर कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याची चौकशी केली. न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मिळाल्याने तो पसार झाला होता. दरम्यानच्या काळात सांगली येथील सात पोलिसांचाही या चोरीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने मैनुद्दीनवर पुन्हा कोडोली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास सीआयडीकडे वर्ग केल्यानंतर सीआयडीने त्याला पुण्यातून अटक केले. पसार असताना मैनुद्दीन पुणे जिल्ह्यात वावरत होता. त्याने एका मित्राच्या नावे सोने गहान ठेवून रक्कम घेतली होती, त्याचबरोबर आपण कमिशन एजंट असल्याचेही तो नागरिकांना सांगत होता.

सीआयडीच्या पथकाने गुरुवारी त्याची ओळख परेड घेतली. मैनुद्दीन पुण्यात ज्या ठिकाणी राहत होता तेथील एक महिला आणि एक पुरुष ओळख परेडसाठी उपस्थित होते. करवीरचे नायब तहसीलदार आणि जेल अधिकाऱ्यांच्या समोर ही ओळख परेड पार पडली. याचा अहवाल तहसीलदारांमार्फत पन्हाळा कोर्टात सादर केला जाणार आहे. दरम्यान, अटकेतील संशयित सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे याच्या जामीन अर्जावर गुरुवारी पन्हाळा कोर्टात सुनावणी होती, मात्र चंदनशिवे याचे वकील उपस्थित न राहिल्याने सुनावणी होऊ शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान समितीस म्हणणे मांडण्यास मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील पुजारी आणि पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या वादावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेली सुनावणी रद्द करावी यासाठी पुजारी गजानन मुनीश्वर यांनी जिल्हाकोर्टात धाव घेतली आहे. गुरुवारी (ता. १४) पाचवे जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एस. निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन देवस्थान समितीने म्हणणे मांडण्यास मुदतवाढ मागितली. कोर्टाने ही मागणी मंजूर केली असून, पुढील सुनावणी उद्या (ता. १६) होणार आहे.

अंबाबाई देवीच्या मूर्तीला परिधान केलेल्या घागरा-चोलीच्या पोशाखावरून पुजारी आणि पुजारी हटाओ संघर्ष समितीमध्ये जोरदार वाद निर्माण झाला होता. या वादानंतर दोन्ही बाजुची मते आणि पुरावे मांडण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सूचना केली होती. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू झाली, मात्र पुजारी गजानन मुनीश्वर यांनी याच्याविरोधात दिवाणी कोर्टात धाव घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली, मात्र कोर्टाने मुनीश्वरांसहीत देवस्थान समिती, कोर्ट आणि थर्ट पार्टी अर्जदारांचे युक्त‌िवाद ऐकून मुनीश्वरांचा अर्ज फेटाळला होता. मुनीश्वरांनी यानंतर जिल्हा कोर्टात धाव घेतली आहे. याबाबत गुरुवारी पाचवे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत मुनीश्वर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने युक्त‌िवाद झाले, तर देवस्थान समितीने म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढीचा अर्ज सादर केला होता. कोर्टाने या अर्जाला मंजुरी दिली.

यावेळी पुजारी मुनीश्वरांच्यावतीने युक्त‌िवाद करताना अॅड. नरेंद्र गांधी म्हणाले, ‘अंबाबाई मंदिरातील पूजेचा अधिकार ही पुजाऱ्यांची खासगी बाब आहे. विविध कागदपत्रांच्या आधारे पूजा-विधी करणे हा पुजाऱ्यांचा हक्क आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या सुनावणीला कायदेशीर अधिकार नाही. ही सुनावणी सुरू राहिल्यास पुजाऱ्यांच्या हक्कांवर गदा येऊ शकते, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी रद्द करावी.’ जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने युक्त‌िवाद करताना सरकारी वकील विवेक शुक्ल म्हणाले, ‘पालकमंत्र्यांच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी सुरू आहे. पुजारीही या सुनावणीला उपस्थित राहिले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी ही सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमुळे पुजाऱ्यांच्या हक्कांवर कोणतीच मर्यादा येणार नसल्याने सुनावणी रद्द करू नये.’ गुरुवारी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात सुनावणी झाली. यावेळी पुजारी गजानन मुनीश्वर, जिल्हा विधी सल्लागार अॅड. वैभव इनामदार, आदी उपस्थित होते.

देवस्थान समिती उद्या म्हणणे मांडणार

देवस्थान समितीनेही पुजारी मुनीश्वर यांच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत समितीने म्हणणे न मांडता यासाठी मुदतवाढ मागितली. कोर्टानेही यासाठी मुदतवाढ दिली असून, उद्या (ता. १६) होणाऱ्या सुनावणीत समिती त्यांचे म्हणणे मांडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकमुक्तीसाठी सक्ती हाच मार्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘समाजाचे स्वास्थ्य धोक्यात आणणाऱ्या प्लास्टिकचा भस्मासूर नष्ट करण्यासाठी आता सौजन्याचा नव्हे तर सक्तीचाच मार्ग अवलंबण्याची गरज आहे. दैनंदिन व व्यावहारिक जीवनातील प्लास्टिकच्या बंदी मोहिमेत, तांत्रिक किंवा प्रशासकीय यंत्रणेपेक्षा लोकांची मानसिकता हाच सर्वात मोठा अडथळा आहे’ असे परखड मत वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी व्यक्त केले. गुरुवारी शाहू स्मारक भवनात आठव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार होते. ‘नदी वाचवा ​जीवन वाचवा’ या संकल्पनेवर बेतलेल्या या चित्रपट महोत्सवात चार दिवसात ३५ सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू असलेला महोत्सव टेंपल ऑफ दि टायगर्स सिनेमाने सुरू झाला.

लोकसहभागातून स्वच्छ वेंगुर्ला पॅटर्न यशस्वी करणाऱ्या कोकरे यांनी यावेळी अनुभव मांडले. कोकरे म्हणाले, ‘मायक्रोनच्या निकषांना रद्द करून पूर्णपणे प्लास्टिक पिशव्या बंद झाल्या पाहिजेत. घनकचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण २० टक्के असल्याचे पाहणीमध्ये दिसून आले आहे. जागतिक स्तरावर प्लास्टिकवर कर लागू आहे. तसेच नाले तुंबण्यात प्लास्टिकचा हातभार असल्याचे लक्षात आल्यानंतर काही देशांमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंड आकारला जात आहे. महासागरातही प्लास्टिक पिशव्यांमुळे जलचरांना धोका निर्माण होत आहे. पक्ष्यांच्या विष्ठेत ९ टक्के प्लास्टिक आढळून आले आहे. प्लास्टिकमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. याचा विचार समाजातील प्रत्येक घटकाने केला पाहिजे. प्लास्टिक वापराबाबत समाजाचा ‘मेंटल ब्लॉक’ घनकचऱ्याच्या व्यवस्थापनातील प्रयोगांना खीळ घालणारा आहे.’

कोकरे म्हणाले, ‘नदी प्रदूषणाबाबतही समाज गंभीर नाही. प्रदूषित नद्यांमुळेच मानवाचा ऱ्हास होत आहे. कचऱ्यातील प्लास्टिक समूळ नष्ट करण्यासाठी प्लास्टिक वापर, निर्मितीवर पूर्णपणे बंदीसाठी नागरीक, प्रशासन आणि उत्पादकांच्या समन्वयातूनच पाऊल टाकले पाहिजे.’

अध्यक्षीय भाषणात डॉ. खेमनार म्हणाले, ‘नदी वाहती असली पाहिजे. मात्र मानवाने सोयीसाठी बांधलेले बंधारे आणि साठलेल्या पाण्यातील प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. कचरा आणि सांडपाणी याच्या निर्गतीबाबत घराघरातून सहकार्य मिळाले तर कचऱ्यातून खतनिर्मितीसारखे प्रयोग राबवणे अवघड नाही.’

किर्लोस्कर कंपनीचे प्लँट हेड चंद्रहास रानडे यांनी प्रास्ताविक केले. व्हाइस प्रेसिडेंट कृष्णा गावडे यांनी स्वागत केले. महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव, समन्वयक व निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, प्रा. महादेव नरके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सँड आर्ट फिल्म सादर करण्यात आली. कोकरे यांनी वेंगुर्ल्यात राबवलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची चित्रफीत दाखवण्यात आली.

पर्यावरणस्नेही सजावट

महोत्सवात मांडलेल्या पर्यावरण संवर्धन विचाराची नांदी कार्यक्रमस्थळी प्रवेशद्वारापासूनच सजावटीच्या माध्यमातून करण्यात आली. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या युनाते क्रिएशन या ग्रुपतर्फे नैसर्गिक वस्तू, वनस्पतीच्या कमानी, कागदी पताका यापासून पर्यावरणस्नेही सजावट केली. या सजावटीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सेल्फी क्लिक केली.

छायाचित्र प्रदर्शनाला प्रतिसाद

महोत्सवाचे उदघाटन रामदास कोकरे, अध्यक्ष डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेतील छायाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटनाने झाले. कलादालन येथे हे प्रदर्शन सुरू आहे. रसिकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आज पुरस्कारांचे वितरण

महोत्सवानिमित्त देण्यात येणाऱ्या वसुंधरा मित्र, वसुंधरा गौरव पुरस्कार आज (शुक्रवारी) जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. अनिल बडदारे, रणजित माजगावकर यांच्यासह एन्व्हायरो लीगल फोरम या संस्थेला वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरवण्यात येणार आहेत. तर विश्वास बालिघाटे, बाळगोंडा पाटील, लहू मोरे यांना वसुंधरा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आजचे लघुसिनेमे

शुक्रवारी महोत्सवात अॅडप्ट, अॅडोप्ट अँड सर्व्हाइव्ह, अरमर, पॅराडाइज फाउंड, रिव्हर रेज्युव्हेनेशन, बाल पांड्ये... अ लाइफ ऑफ बर्डस, व्हेन दि पिकॉक सिंग आणि दि अँग्री रिव्हर हे लघुसिनेमे दाखवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिवृष्टीने पुलाचा भराव खचला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ढगफुटीसदृश्य पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी घुसण्याच्या प्रकारामुळे पडझडही झाली. जरगनगर कमान ते ज्योर्तिलिंग कॉलनी रस्त्यावरील पुलाचा भाग खचला. साळोखेनगरमध्येही पुलाचा भराव खचला. वाय. पी. पोवारनगर येथील यशवंत आयर्न कारखान्याची ४० फूट लांबीची दगडी भिंत ढासळली. तर रूईकर कॉलनी येथे चार चाकी गाडीवर मोठे झाड कोसळले. देवकर पाणंद परिसरातील शाम सोसायटी परिसरातील सुमारे ३० घरांमध्ये पाणी घुसल्याने प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, पाण्यामुळे हानी झालेल्या ठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, महापौर हसिना फरास, आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या ठिकाणी दक्षता घेण्याबरोबरच इतर ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याची यंत्रणा राबवली. यासाठी अधिकाऱ्यांसह ४५० कर्मचारी, एक क्रेन, चार जेसीबी, बारा डंपर अशी यंत्रणा कार्यरत होती.

जरगनगर कमान ते जोतिर्लिंग कॉलनी रस्त्यावरील पुलाचा भाग खचल्याने त्याठिकाणी बॅरेकेटींग लावण्यात आले. तसेच ढासळलेली कंपाउंड वॉल काढण्यात आली. फुलेवाडी रिंग रोड मधील डायना टाऊन जवळ येथील अपार्टमेटची व शिवशक्तीनगर येथील कंपाउंड वॉल काढून पाणी निर्गत करण्यात आली. साळोखेनगर येथील संभाजी विद्यालयालगत पुलाचा भराव ढासळल्याने रस्ता खचला. यशवंत आयर्न कारखान्याची ४० फुट लांबीची दगडी भिंत ढासळली. रूईकर कॉलनी येथे चार चाकी गाडीवर मोठे झाड पडले. रामनंदनगरमध्ये ६, देवकर पाणंदमध्ये २, शास्त्रीनगरमध्ये ३ नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. पावसात वाहनांवर व रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे अग्निशमन जवानांनी कटरच्या सहाय्याने कटींग करुन रस्ता वाहतुकीस खुला केला.

आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्य, पवडी व अग्निशमन विभागाचे ४५० कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसचे माजी उपमहापौर मोहन गोंजारे, माजी सभागृह नेता चंद्रकांत घाटगे व माजी स्थायी समिती सदस्य प्रदीप उलपे यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश लोळगे यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे तीनही माजी नगरसेवक हे आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे महापालिकेतील काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान पक्षप्रवेशावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर महानगरपालिका भाजपच्या ताब्यात नसल्याने येथे अडवणुकीची भाषा चालली आहे. पण योग्य वेळी योग्य पान उघडण्यात येईल. आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशामुळे येथून पुढे भाजप म्हणेल तसेच येथे होईल. ’

ताराबाई पार्क प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी ताराराणी आघाडीकडून रत्नेश शिरोळकर यांची उमेदवारी आघाडीचे अध्यक्ष स्वरुप महाडिक यांनी जाहीर केली. त्याचवेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचे भाजपमध्ये पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रवेश झाले.

पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता येण्यासाठी ४१ नगरसेवकांची आवश्यकता आहे. सध्या कासवगतीने वाटचाल सुरू आहे. पण शेवटी कासवच शर्यत जिंकते. ताराबाई पार्कमधून ताराराणी आघाडीचाच नगरसेवक निवडून आलेला असला तरी कार्यकर्त्यांनी अजिबात गाफील राहू नये. कार्यकर्त्याने प्रभागातील घराघरापर्यंत सातत्याने जाऊन प्रचार करण्याची आवश्यकता आहे. शहरात चांगले घडवण्याच्यादृष्टीने भाजप काम करणार आहे.’

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आता भाजपमध्ये प्रवेश द्या म्हणून मोठी रांग लागली आहे, असे सांगितले. तर महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी भाजप ताराराणी आघाडीचा महापौर बनण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार अमल महाडिक, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुहास लटोरे, सभागृह नेता विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुनील कदम, किरण शिराळे, सत्यज‌ित कदम, नीलेश देसाई, अशोक देसाई, माणिक पाटील आदी उपस्थित होते.

भविष्यासाठी भाजपमध्ये

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची काम करण्याची पद्धत व विचार चांगले वाटल्याने भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारणामध्ये बाजूला पडू नये. मुख्य प्रवाहात राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे चंद्रकांत घाटगे, मोहन गोंजारे, प्रदीप उलपे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाइम्स प्रॉपर्टी शो २४ पासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वतःचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कधी कधी हे स्वप्न साकार करायला आयुष्य खर्ची घालावं लागतं. हवं तसं घर मिळतं. पण, बजेट नसतं. बजेट असतं तर घर पसंत पडत नाही. या संभ्रमावस्थेला पूर्णविराम देऊ घराचं स्वप्न साकार करण्याची संधी ‘टाइम्स प्रॉपर्टी शो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनात शहराच्या विविध भागांतील प्रॉपर्टी पाहता येणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्यावतीने येत्या २४ ते २६ सप्टेंबर या दरम्यान हॉटेल सयाजी येथे हे प्रदर्शन होणार आहे.

‘टाइम्स प्रॉपर्टी शो’मध्ये नामवंत बांधकाम व्यावसायिक, बँका आणि वित्तसंस्था सहभागी होणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वतीने २०१३, २०१५ आणि २०१६, २०१७ (गुढीपाढव्याआधी) मध्ये ‘टाइम्स प्रापर्टी शो’चे आयोजन केले होते. यंदा दुसरा प्रॉपर्टी शो दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला आहे. यंदाच्या प्रदर्शनात रंकाळा, मुक्त सैनिक वसाहत, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रुईकर कॉलनी, उजळाईवाडी, कदमवाडी, कसबा बावडा, जरगनगर, मोहिते पार्क, कळंबा, हनुमाननगर, आर. के. नगर, सीबीएस, शिवाजी पार्क, राजोपाध्येनगर, संभाजीनगर, रमणमळा या परिसरातील घरे आपल्याला बुक करता येणार आहेत. सध्या गृहकर्जाशिवाय वास्तूचे स्वप्न साकारता येत नाही. त्यानुसार या प्रदर्शनात विविध बँका आणि वित्तसंस्थाही सहभागी होत आहेत. या वित्तसंस्था आणि बँकांकडील गृहकर्जांचे प्रकार, व्याजदर, सवलतीही या प्रदर्शनात समजून घेता येणार आहेत. यात काही रेडीपझेशन प्रॉपर्टीही उपलब्ध असल्याने दसरा व दिवाळीला गृहप्रवेशाचे स्वप्नही साकरणार आहे. टाइम्स प्रापर्टी शोच्या अधिक माहितीसाठी लक्ष्मीकांत औंधकर (९५२७९७२५००) आणि मंदार मिरजकर (९६८९८८६६३०) यांच्याशी संपर्क साधावा. हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे. ‘टाइम्स प्रॉपर्टी शो’मधून कोल्हापुरातील नामवंत हाउसिंग स्कीम्स आपल्याला एकाच छताखाली पहायला मिळणार आहेत. संधीचे सोने करावे, असा योग या प्रॉपर्टी शोच्या माध्यमातून जुळून आला आहे.


एकाच छताखाली मिळणार माहिती...

‘टाइम्स प्रापर्टी शो’ मध्ये कोल्हापुरातील विविध आकारांचे फ्लॅटस, रो हाउसेस, बंगलो, पेंट हाउस आणि व्यावसायिक जागांची निवड करणे सोपे होणार आहे. प्रदर्शनात कोल्हापूर व पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांतील गृहप्रकल्प प्रत्यक्षात पाहताही येणार आहेत. १५ लाख रुपयांपासून ते एक कोटींपर्यंतचे प्लॅट यामध्ये खरेदी करता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्शन शहा खूनप्रकरणी दोन्हीकडून युक्तिवाद पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देवकर पाणंद येथील शालेय मुलगा दर्शन रोहित शहा (वय १०) याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याच्याविरोधात खटला सुरू आहे. या खटल्यात गुरुवारी (ता. १४) झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजुचे युक्त‌िवाद पूर्ण झाले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संशयिताच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे खोडून काढत अखेरचा युक्त‌िवाद केला. पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार असून, त्या सुनावणीत खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देवकर पाणंद येथे २५ डिसेंबर, २०१२ मध्ये दर्शन शहा या शालेय मुलाचे अपहरण झाले होते. दुसऱ्या दिवशी दर्शनचा मृतदेह जवळच्याच शेतातील विहिरीत सापडला. याशिवाय दर्शनच्या घरात खंडणीचे पत्रही मिळाले होते. जुना राजवाडा पोलिसांनी याचा तपास करून त्याच परिसरात राहणारा संशयित योगेश उर्फ चारू चांदणे याला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. गेली तीन वर्षे जिल्हा सत्र न्यायालयात या गुन्ह्याचा खटला सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीसहून अधिक साक्षीदारांच्या साक्षी कोर्टात सादर केल्या. याशिवाय घटनास्थळावरून मिळालेले पुरावेही कोर्टात सादर केले. संशयिताचे वकील पीटर बारदेस्कर यांनी साक्षीदारांची उलट तपासणी करून बचावाचे मुद्दे मांडले. अखेर गुरुवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूचे युक्त‌िवाद पूर्ण झाले.

संशयिताचे वकील बारदेस्कर यांनी घटनास्थळावर मिळालेले संशयिताच्या शर्टचे बटन आणि दोरी यावर आक्षेप नोंदवले होते. बटनाला चिखल लागला होता, तर दोरीला चिखल लागला नव्हता, अशी नोंद पंचनाम्यात आहे. एकाच शेतात सापडलेल्या दोन्ही वस्तूंमध्ये फरक असल्याने पुराव्यांवर शंका उपस्थित केली होती. याबाबत गुरुवारी झालेल्या सुनावणीत अॅड. निकम यांनी शेताचा नकाशा सादर करून बटन आणि दोरी या दोन्ही वस्तू मिळालेली ठिकाणे स्पष्ट केली. विहिरीजवळ चिखल होता, त्यामुळे बटन चिखलाने माखले, तर कोरड्या मातीत दोरी पडल्याने तिला चिखल लागला नव्हता, असे स्पष्टीकरण दिले. यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्त‌िवाद संपल्याचे सांगण्यात आले. पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे. त्या सुनावणीत दर्शन शहा अपहरण आणि खून खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संशयित चारू चांदणे यालाही पोलिस बंदोबस्तात कोर्टात हजर केले होते. यावेळी तपास अधिकारी यशवंत केडगे, दर्शनचे नातेवाईक कोर्टात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ बंधारे पाण्याखाली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

कालचा ढगफुटी सारखा पाऊस तसेच सलग दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह राधानगरी परिसरात पावसाची संततधार सुरु असल्याने भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज सातच्या सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. यावर्षी चौथ्यां वेळेस राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे यामार्गावरून वडणगे,भूये, निगवे, केर्ले, केर्ली, जोतीबा आदी गावांवरून ये-जा करणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या या बंधाऱ्यावर १७ फुटापर्यंत पाण्याने पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीवरील सात बंधाऱ्यांपैकी पाच बंधारे पाण्याखाली गेले त्यामध्ये राजाराम बंधाऱ्यासह , शिंगणापूर ,सुर्वे,रुई , इचलकरंजी व भोगावती नदीवरील राशिवडे,हळदी, खडककोगे हे बंधारे पहाटे पाण्याखाली गेले असून यामुळे आजूबाजूच्या गावाकडे जाणारे रस्ते बंद झाले असून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

काल रात्रीच्या मोठ्या पावसामुळे राजाराम बंधारा या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांची आज मोठी अडचण झाली आहे.पहाटे बंधारा पाण्याखाली गेला आहे हे माहित नसल्याने अनेक वाहनधारकांना बंधाऱ्या जवळून परत फिरावे लागत आहे. दरम्यान, पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेल्याने अनेक मासेमारी करणारे तसेच काही हौशी मंडळी बंधाऱ्याजवळ जाळे आणि गळ टाकून मासेमारीचा आनंद लुटत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपुरात पूरस्थिती; अनेक मंदिरं पाण्याखाली

$
0
0

सुनील दिवाण । पंढरपूर

उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून पंढरपूर शहरातील काही भागात व नदी काठाच्या गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

उजनी धरणातून रात्री ७० हजार क्युसेक तर वीर धरणातून १५ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत होते. याशिवाय उजनी धरण व पंढरपूर परिसरात सलग दोन दिवस पाऊस पडत असल्याने पाणी पातळीत कमालीची वाढ होऊ लागली आहे. सध्या वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून नदी घाटाना पाणी लागलं आहे . चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीसह इतर सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाल्यानं प्रशासनानं या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था केली आहे. पंढरपूर शहरासह नदी काठच्या गावातील लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्याच्या तयारीला प्रशासन लागले आहे. आज रात्रीपर्यंत नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

चंद्रभागेची पाणी पातळी वाढू लागली असताना नदीपात्राजवळ प्रशासनानं कोणतीच यंत्रणा लावली नसल्यानं अशा धोकादायक स्थितीत देखील भाविक स्नानासाठी नदीत उतरू लागल्यानं धोका वाढला आहे. पाण्याखाली गेलेल्या जुन्या दगडी पुलावर बसून काही भाविक स्नान करत आहेत. मात्र, या पुलावरून वेगानं पाणी वाहत असल्यानं भाविकांना स्नानापासून रोखणे गरजेचं झालं आहे. आज दशमी असून मोठ्या संख्येनी भाविकांनी चंद्रभागेवर गर्दी केल्यानं प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा तातडीने कार्यान्वित न झाल्यास दुर्घटना संभवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनेक शाळांची फुटबॉलला स्वखर्चानं 'किक'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । कोल्हापूर

'महाराष्ट्र मिशन १ मिलियन' उपक्रमासाठी एक लाख फुटबॉल घेऊन येणारा कंटनेर वाटेतच बंद पडल्यानं फुटबॉलचं वाटप करताना क्रीडा खात्याची मोठीच दमछाक झाली. काही ठिकाणी आज ऐनवेळी फुटबॉल पोहोचले; तर, ग्रामीण भागातील काही शाळांना फुटबॉल मिळालेच नाहीत. त्यामुळं अनेक शाळांना स्वखर्चानं फुटबॉल घेऊन खेळाचा आनंद लुटावा लागला.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं राज्यातील ३० हजार शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणं एक लाख फुटबॉल वाटण्याचं निश्चित केलं होतं. त्यासाठी शाळांना ऑनलाइन नोंदणी करण्यास सांगण्यात आली होती. ऑफलाइन नोंदणी करणाऱ्यांना दोन फुटबॉल देण्यात येणार होते. फुटबॉल वाटपासाठी समितीही नियुक्ती करण्यात आली होती. पुण्यातील क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडं याची जबाबदारी होती. त्यासाठी दिल्लीतील गुरुग्राम येथील कंपनीला ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, फुटबॉलची डिलिव्हरी करणारा कंटेनर महाराष्ट्रात येत असताना जंगलात बंद पडला. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी जिल्ह्याच्या ठिकाणी फुटबॉल पोहोचले नाहीत.

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ होणार होता. मात्र, फुटबॉल मिळाले नसल्यानं जिल्हा क्रीडा कार्यालयाची धांदल उडाली होती. त्यामुळं बंद पडलेल्या कंटेनरमधून एका टेम्पोनं पुण्यात फुटबॉल आणण्यात आले. मुंबई व पुण्यात फुटबॉलचे वाटप करून अन्य जिल्ह्यांना मोजकेच फुटबॉल पाठवले गेले. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापुरचा अनिकेत जाधव हा मुख्य खेळाडू असल्यानं कोल्हापुरात कोणत्याही परिस्थितीत फुटबॉल पाठवण्याची विनंती जिल्हा क्रीडा कार्यालयाने पुणे उपसंचालक कार्यालयाला केली. त्यानंतर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता पुण्याहून फुटबॉल जिल्हा क्रीडा कार्यालयात आले. काही शाळांना तीन तर काहींना दोन व एक असं वाटप करण्यात आलं. शहरातील बहुतांशी शाळेत सकाळी सात वाजता फुटबॉल पोहोचले. ज्या शाळांना फुटबॉल मिळाले नाहीत त्यांनी तक्रार सुरू केली. त्यावर, तुमच्याकडे असलेल्या फुटबॉलचा वापर करून आजचा उपक्रम पूर्ण करा, अशा सूचना देण्यात आल्या.

फुटबॉल गेले कुठे?

एवढा मोठा उपक्रम असताना वेळेत फुटबॉल का आले नाहीत अशी विचारणा क्रीडा शिक्षकांकडून होत होती. एक लाख फुटबॉल तयार नव्हते की फुटबॉलची मोजकीच ऑर्डर दिली होती, अशी चर्चा क्रीडा शिक्षकांमध्ये सुरू होती. यापुढं फुटबॉल वितरण पारदर्शकपणं व्हावं, अशी आग्रही शिक्षकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पंढरपुरात पूरस्थितीशंभर कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने शुक्रवारी भीमा नदी काठावरील व्यासनारायण झोपडपट्टीतील जवळपास शंभर कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
उजनी धरणातून ७० हजार आणि वीर धरणातून १४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने पंढरपूर शहर व नदीकाठी असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, गेले दोन दिवस पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात चंद्रभागेत मिसळल्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या चंद्रभागा वाळवंट पाण्याखाली गेले असून, मंदिरे, जुना दगडी पूल आणि बंधारा पाण्यात गेला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाटबंधारे विभागाने केलेल्या मोजणीत चंद्रभागा पात्रातून ६५ हजार क्युसेकने पाणी वाहत आहे. चंद्रभागेच्या काठावर असलेल्या व्यासनारायण झोपडपट्टीतील घरांत रात्री पाणी शिरणार असल्याने प्रशासनाने नगरपालिका वाहनांच्या मदतीने शंभर कुटुंबांना लोकमान्य विद्यालय आणि इतर दोन मठांत हलविण्यास सुरुवात केली आहे. व्यासनारायण झोपडपट्टी चंद्रभागेनजीक असल्याने पुराचा पहिला फटका या भागाला बसतो. नदीचे पाणी वाढू लागताच नागरिकानी आपले सामान हलवून घराना कुलपे लावून स्थलांतर केल्याने आता प्रशासनाने ग्रामीण भागातील नदीकाठच्या लोकाना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आज, शनिवारी महिन्याची एकादशी असल्याने शहरात भाविकांची गर्दी वाढली आहे. चंद्रभागेत भाविकांना जाऊ न देण्याची मोठी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत संततधार

$
0
0

सांगली :
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने सांगली आणि परिसरात हजेरी लावायला सुरुवात केली. मात्र, पावसात जोर नाही. मध्यंतरीच्या दोन दिवसांत मात्र पावसाने दुष्काळी आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर-विटा, तासगाव आणि मिरज पूर्व भागात दमदार हजेरी लावून मोठा दिलासा दिला आहे.
या पावसाने काही भागात सुकून जाऊ लागलेल्या भूईमूगासारख्या पिकांना काहीप्रमाणात जीवनदान मिळाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या चोवीस तासांत जतला १७ आणि आटपाडी १२ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद वगळता अन्य सर्व तालुक्यात अगदी नगण्य पाऊस नोंदला गेला आहे. शुक्रवारी मात्र दुपारनंतर सुरू झालेली पावसाची रिपरिप कायम होती.
मिरजेत जोरदार पाऊस
शुक्रवारी दुपारपासून मिरज शहरासह पूर्वभागात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी पावसाने थोडीशी उसंत घेतली होती. मात्र शुक्रवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली. शहरासह पूर्व भागात जोरदार पाऊस पडला. गेला आठवडाभर पाऊस सुरुच आहे. दोन दिवसापूर्वी वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. या पावसामुळे शहर आणि उपनगरातील रस्यांची वाताहत झाली आहे. सर्वत्र चिखल आणि दलदल झाली आहे. गणेश विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून ओढे; नाले भरुन वहात आहेत. मिरज, मालगाव, म्हैसाळ, आरग, बेडग, सलगरे , भोसे, सोनी परिसरातही दमदार पाऊस पडला.रात्रीपर्यंत पाऊस सुरुच होता.
शिराळा जोर कायम
शिराळा तालुक्याच्या दक्षिण भागाला शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यात इतरत्रही दमदार पाऊस पडला. दुपारी सुरु झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत सुरू होता. दुपारपासून सुरु असलेल्या पावसामुळे मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात व चांदोली धरण परिसरात मात्र पावसाची किरकोळ हजेरी होती. सध्या पडणारा पाऊस भात पिकासाठी उपयुक्त असला तरी आगाप पेरणी केलेल्या सोयाबीन, भूईमुग पिकाच्या काढणीत व्यत्यय आणणारा आणि नुकसान करणारा आहे. हायब्रीड पिकालाही हा पाऊस हानिकारक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सातारा शहरात तुफान पाऊस

$
0
0

सातारा
सातारा शहर आणि परिसराला शुक्रवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. मागील आठ दिवसांपासून हलक्या सरी कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी दुपारी कहर केला. दुपारी एक वाजल्यापासूनच शहर परिसरात काळे ढग जमा होत होते. दोनच्या सुमारास तुफान पावसाला सुरुवात झाली. अतिशय वेगाने कोसळणाऱ्या या पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांना रस्त्यातून पळ काढत निवारा शोधावा लागला. ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाशिवाय तुफान पाऊस पडला. पावसाने जनजीवन अक्षरश: ठप्प झाले. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पाणी अनेक ठिकाणी घरातही घुसले. राजवाडा, राधीका रोड, देवीचौक, नगर पालिका, गोडोली परिसरातील रस्ता येथे पाण्याची मोठी तळी निर्माण झाली. जोराचा पाऊस असल्याने रस्ते ही अगदी निर्मनुष्य झाले होते. सलग अर्धातास हा जोराचा पाऊस कोसळत होता.
दरम्यान येत्या रविवारी होणाऱ्या आतंरराष्ट्रीय सातारा हिल अर्ध मॅरेर्थान स्पर्धेच्या संयोजनाचे मंडप उभारणी व धावपटूंसाठी उभारल्या जाणाऱ्या प्रतीक्षा मंडपाच्या कामांत पावसाने मोठा अडथळा निर्माण झाला आहे. संयोजकांचीही मोठी तारांबळ झाली.
फलटण-बारामती मार्गावरील सोमंथळी पूल वाहून गेला
साताऱ्यात महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती होता-होता टळली. गुरुवारपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे फलटण-बारामती मार्गावरील साठ फूट लांब सोमंथळी पूल वाहून गेला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पूल कोसळल्याची घटना स्थानिक लोकांच्या वेळीच लक्षात आल्यानंतर पुलावरुन जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. दरम्यान, हा पूल वाहून गेल्यानंतर राजाळे पुलावरुन जाण्याचा प्रयत्न करणारे दोन दुचाकीस्वार वाहून गेल्याची माहिती समोर आहे. मुसळधार पावसामुळे फलटण तालुक्यातील बंधारेदेखील ओसंडून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे फलटण तालुक्यात अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. शेतांमध्ये जागोजागी पाणी साचले आहे. शिवाय, जोरदार वाऱ्यांमुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर शेकडो झाडे उन्मळून पडल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यांवरील बांधकामे हटवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील नाल्याच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी अतिक्रमण करत बांधकाम झाल्याने पावसाचे पाणी अनेकांच्या घरात घुसले, यामुळे अशा बांधकामावर तातडीने कारवाई करा, अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. नाल्यापासून नऊ मीटर सोडून बांधकाम करण्याचा नियम असताना तो पाळला जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती डॉ. संदीप नेजदार होते.

बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक घरात पाणी घुसले. यातील बहुसंख्य घरे नाल्याच्या काठावरील होती. नाल्यापासून अंतर ठेवून बांधकाम न केल्याने अनेक घरांना फटका बसला. याबाबत सत्यजित कदम यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नाल्याच्या दोन्ही बाजूस जागा आरक्षित करण्याची व गुगल मॅपवरून शहरातील सर्व नाल्यांची माहिती संकलित करुन आराखडा तयार करण्याची मागणी केली. टाकाळा खणीच्या पाण्याचा वास येत असल्याची तक्रार कदम यांनी केली. वारंवार सांगूनही अजून भिंत बांधण्याची निविदा मंजूर केलेली नाही. नागरिकांच्या घरात पाणी शिरते. सात महिने झाले निविदा प्रक्रिया सुरू आहे. इतर फायलींवर सह्या होतात. जनतेच्या कामाच्या फायली पुढे जात नाहीत, असा आरोप प्रतिज्ञा निल्ले यांनी केला. याबाबत नवीन आराखडा तयार करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

ठेकेदारानी मजुरांची पीएफ कार्यालयात नोंदणी नाही म्हणून गेली सात महिने कामेच केलेली नाहीत. आता जीएसटी लागू झालेने खर्च वाढणार असल्याने नवीन अंदाजपत्रकास मान्यता देण्याची मागणी राहुल माने यांनी केली. यानुसार नवीन अंदाजपत्रक जीएसटीनुसार तयार करण्यात येत असल्याचा खुलासा प्रशासनाने केला. नगरोत्थान यो​जनेतील काम रखडल्याबद्दल ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करण्याची नोटीस दिली असून त्याचे बिल न दिल्याचे प्रशासनाने सांगितले.

लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार येथे प्रकल्पाचे काय झाले असा सवाल निलोफर आजरेकर यांनी केला. प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचा खुलासा यावेळी करण्यात आला. खानविलकर पेट्रोल पंपासमोरील महापालिकेची रिकामी जागा तातडीने ताब्यात घेण्याची मागणी चव्हाण व कदम यांनी केली. सरकारच्या निर्णयानुसार प्राथमिक शाळांसाठी कळंबा कारागृहाकडून बेंच खरेदी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. याबाबत उमा इंगळे यांनी प्रश्न विचारला होता. पाणी बिल कळण्यासाठी बिलाबरोबरच एसएमएस सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लक्ष्मीपुरी येथील जयंती नाल्यावरील पडलेली संरक्षित भिंत बांधण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. उद्यान विभागाच्या कामावर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. या विभागाकडील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केल्याशिवाय त्यांचा पगार काढू नका अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गाळ्यांच्या भाड्यावरून आक्रमक

महापालिकेच्या गाळ्याचे तेरा कोटी भाडे थकीत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. रेडिरेकनरपेक्षा कमी पैसे भरून घेऊ शकत नसल्याचे हे भाडे थकले आहे, असा खुलासा करणाऱ्या प्रशासनाला कदम, जयश्री चव्हाण व माने यांनी चांगलेच धारेवर धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! स्वाइनचा विळखा वाढतोय

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये ४३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात सहा रुग्ण दगावले असून, उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गुरुवारी आरोग्य विभागाने सीपीआरमध्ये तातडीची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील आरोग्य विभागाने नागरिकांच्या जनजागृतीसह रुग्णांवर औषधोपचाराची सोय निर्माण केली. मात्र, रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये ४३ रुग्ण दगावले आहे. आरोग्य विभागाने ११ हजार ८७६ नागरिकांचे सर्वेक्षण केले. यातील ४३२ संशयित रुग्ण आढळले. यापैकी २१६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बदलत्या वातावरणामुळे किरकोळ आजारांनंतर रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे बळावत आहेत. रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांना नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूपासून दक्षता घेण्याच्या उपाययोजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत हे काम अद्यापही सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयांसह सीपीआरमध्ये स्वाइनच्या रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार कक्ष तयार केला आहे. खासगी रुग्णालयांनाही स्वतंत्र कक्ष तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या उपाययोजनांनंतरही ४१ रुग्ण दगावल्याने आरोग्य यंत्रणा चिंतीत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी गुरुवारी तातडीची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. स्वाइन फ्लू रोखण्यासाठी आवश्यक औषध साठ्याची माहिती डॉ. पाटील यांनी घेतली, त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्येही स्वतंत्र उपचार कक्ष सुरू आहेत काय? याची माहिती घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध असून, स्वाइन फ्लूची लागण झालेल्या नागरिकांनी सार्वजनिक ठिकणी जाणे टाळावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

स्वाइनपासून अशी घ्या काळजी...

लागण झाल्यास तातडीने उपचार घ्या

गर्दीत जाणे टाळा

हस्तांदोलन करू नका

तोंडाला रूमाल किंवा मास्क वापरा

दिवसातून चार ते सहावेळा हात स्वच्छ धुवा

शिळे अन्न खाऊ नका

आजारी पडताच तातडीने उपचार घ्या

लहान मुले, रुग्ण आणि ज्येष्ठांनी विशेष दक्षता घ्यावी

स्वाइन फ्लूचे बळी

कोल्हापूर जिल्हा - ३१

कर्नाटकातील रुग्ण - २

सांगली - ३

रत्नागिरी - ५

सिंधुदुर्ग - २

पॉइन्ट्स

८ महिन्यात ४३ रुग्णांचा मृत्यू

११ हजार ८७६ रुग्णांचे सर्वेक्षण

४३२ संशयित रुग्ण

२१६ पॉझिटिव्ह रुग्ण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images