Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नाल्यांवरील अतिक्रमणे जिवावर

$
0
0


Sachin.Yadav@timesgroup.com

@sachinyadavMT

कोल्हापूर ः बुधवारी रात्री हाहाकार उडवून दिलेल्या पावसाने शहराच्या आपत्कालीन स्थितीचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शहरांतील सर्व नाल्यांवर झालेले अतिक्रमण, नाल्याचे पाणी पसरणाऱ्या भागात भराव टाकून करण्यात आलेली बांधकामे, मूळ नाल्यांची रुंदी कमी करून त्याला मोठ्या गटारीचे दिलेले स्वरूप आणि विशेष म्हणजे रेडझोनमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली बांधकामे यामुळे पाण्याच्या नै‌सर्गिक फुगवटीला येणाऱ्या मर्यांदांमुळे पाण्याचा जोरदार प्रवाह घरेच्या घरे उद्‍ध्वस्त करू पाहत आहे. या सर्व कारणांमुळेच बुधवारी रात्री घरांमध्ये पाणी शिरलेल्या अनेक कुटुंबीयांना जीव मुठीत धरून रात्र घालवावी लागली.

मनमानी पद्धतीने केलेल्या बांधकामामुळे नाल्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेडझोनमध्ये अवैध बांधकामाचा सपाटा सुरुच आहे. दुसरीकडे महापालिकेतील यंत्रणेच्या आशीर्वादामुळे नाल्याजवळ केलेल्या बांधकामाचा फटका नाल्याशेजारच्या लहान मोठ्या कॉलनींना बसला आहे. नाल्याशेजारील घरातील कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही बांधकाम व्यावसायिक आणि प्लॉट पाडलेल्या ठिकाणी घरमालकांनी नाल्याच्या शेजारी घरे बांधली आहे. नाल्याचे नैसर्गिक पात्र कायम न ठेवल्यास भविष्यात मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार आहे. २००५ च्या अतिवृष्टीनंतर चर्चेला आलेला पंचगंगा नदीच्या रेड झोनचा मुद्दाही वाहून गेला आहे. रेडझोनमधील परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. पूररेषा डावलून केलेली बांधकामे आता नागरिकांच्या जिवावर उठू लागली आहेत.

पंचगंगा नदीचा रेडझोन तसेच नाल्यांच्या काठावर वाढणारी बांधकामे, नालेपात्रांत खरमाती आणि भराव टाकण्याच्या प्रकारांकडे महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्याचा फटका म्हणून पंचगंगेच्या पुराच्या पाण्याची फूग नागरी वस्तीच्या दिशेने वाढत जाणार आहे. बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक कुटुंबांवर आपत्ती ओढवली आहे. नाल्यात पाणी वाढल्यानंतर काय करायचे ते पुढचे पुढे पाहू, असा विचार करुन नाल्याशेजारीच काही बिल्डरांनी प्रकल्प उभारले आहेत. रेडझोनमध्ये बांधकामे केली आहेत. महापालिकेच्या सुकाणू समितीने पाहणी करुन रेडझोनच्या खुणा केल्या आहेत. या खुणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. राज्य सरकारने रेडझोनमध्ये बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश दिले आहेत. मात्र महापालिकेच्या दुलर्क्षामुळे आणि बांधकामाला परवानगी देणाऱ्या झारीतील शुक्राचार्यामुळे रेडझोनमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प उभारले आहेत. शहर, उपनगरातील नाल्यावर बांधकामे झाली आहे. नाल्यावर भराव टाकून अपार्टमेंट बांधल्या आहेत. रामानंदनगर, जरगनगर, पाचगांव परिसरासह बहुतांश नाल्याच्या ठिकाणी बांधकामे केली आहे. नाल्याला लागूनच अपार्टमेंट झाल्या आहेत. नाल्याची रुंदी कमी करुन प्लॉटची रुंदी वाढविली आहे. बांधकामाच्या ले आऊटला मंजूरी देण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागातील काहींनी ‘लाख’मोलाची कामगिरी बजाविली आहे. क्रशर चौकातील शाम हौसिंग सोसायटीत असलेल्या नाल्याचा गाळ काढला जात नाही. नाल्याची रुंदीही कमी आहे. या ठिकाणी कळंबा आणि जिवबा नाना जाधव पार्क परिसरातून येणारे सांडपाणी वाहते. परताळ्यावरही बांधकामे आणि भराव टाकला आहे. त्याचा परिणाम म्हणून पाण्याची फूग वाढते आणि त्याचा फटका घरांना बसतो. कुंभार गल्लीमध्ये नाल्याचे पात्र कमी करुन बांधकाम झाले आहे. विकसकांनी कागदावर पार्किंगसाठी जागा ठेवली असली तरी प्रत्यक्षात काही अपार्टमेंटमध्ये गाळे बांधले आहेत. त्यामुळे नाल्याच्या परिसरातील गाळ्यातही पाणी शिरले आहे.

२००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगेला महापूर आला. बरेच दिवस पुराचे पाणी ओसरले नव्हते. त्यावेळी पंचगंगेचा रेडझोन निश्चित करण्याची गरज भासली. मात्र तेव्हापासून आजतागायत रेडझोन ठरविलेला नाही. पंचगंगेच्या पुराचे पाणी शहरातील जयंती व दुधाळी नाल्यांच्या परिसरात पसरते. मात्र या परिसरातच भराव टाकण्यात आले आहेत. जुन्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयाजवळ टाकलेल्या भरावामुळे अक्षरशः रस्ता तयार झाला आहे. पेंढारकर सांस्कृतिक केंद्राजवळ निघणारा आणि जयंती नाल्याला जोडणारा ओढाही दोन्ही बाजूने भिंत घालून बंद केला आहे. नाल्याच्या मार्गावर भंगार व्यावसायिकांनी भर, बांधकाम व्यावसायिकांनी खरमाती टाकली आहे. महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईतून भराव काढला जात नाही. दुधाळी नाल्याजवळही उत्तरेश्वर पेठेतून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खरमाती आहे. भराव आणि खरमातीमुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी मोकळा मार्ग मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील पाणी नागरिकांच्या घरात जाण्याची भीती कायम आहे. रेडझोनमध्ये खानविलकर पेट्रोल पंपाजवळील प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण झाल्याची निरीक्षणे महापालिकेने नोंदविली होती. अजूनही रेडझोनमधील आणि नाल्यातील अवैध बांधकामे असल्याने पुराचा धोका कायम आहे. पंचगंगा नदीकाठावरही आंबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खरमातीचा पसारा वाढत आहे. या परिसरात नवीन बांधकामाचेही भराव वाढले आहेत. शिरोली पंचगंगा पुलाशेजारील भरावामुळे २००५ साली पुराची फूग चिखलीपर्यंत वाढली होती.

०००००००

राज्य सरकार कोणतेही बेकायदेशीर बांधकाम चालू देणार नाही. रेडझोनमधील अवैध बांधकामे करु दिली जाणार नाहीत. त्यासह नाल्यात होणारी अवैध बांधकामे हा मोठा विषय असून या बांधकामावर लक्ष घालणार आहे. रेडझोनमधील बांधकामे हा चिंतेचा विषय आहे. या क्षेत्रात केलेली बांधकामेही लवकरच रडावरवर येणार आहे.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

००००००००००००००

पूरजन्यस्थितीला रेडझोन क्षेत्रातील अवैध बांधकामे जबाबदार आहेत. विधानसभेत उपस्थित केलेल्या यासंबंधीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेडझोनमध्ये बांधकामांना महानगरपालिकेने परवानगी देऊ नये, असा आदेश दिला असतानाही रेडझोनमध्ये अवैध बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी नालेच गायब झाले आहेत. पूरसंरक्षक भिंतीचे कामही अपूर्ण आहे. रेडझोन क्षेत्रातील अवैध बांधकामांना महापालिकाच जबाबदार आहे.

राजेश क्षीरसागर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२० लाख दूध संकलांने उद्द‌िष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एनडीडीबीने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणारा गोकुळ संघ देशात सातव्या स्थानावर आहे. दररोज ग्राहकांच्या घरी पॅकबंद दूध पोहोचवणार राज्यातील एकमेव संघ असून उत्पादक व कर्मचाऱ्यांनी घेतेल्या कष्टामुळे शक्य झाले आहे. उत्पादकांनी घडवून आणलेल्या क्रांतीमुळेच २०२० पर्यंत दैनंदिन २० लाख लिटर दूध संकलन करण्याचा मनोदय अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सभेत केला. शुक्रवारी ताराबाई पार्क येथील प्रधान कार्यालयात सभा पार पडली.

संघाचे मार्गदर्शक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, ‘संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या गोकुळ संकलन केंद्रातील पुतळा अनावरण प्रसंगी स्वत: सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संघाच्या कारभाराचे कौतुक केले. आजारी व्यक्तीला वेळेत सुविधा मिळत नसताना संघामार्फत जनावरांसाठी योग्य वेळेत सुविधा मिळत असून संचालकांनी पुढील काळात असेच काम करावे.’

माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, ‘गोकुळ संघाला उत्पादकांनी सक्षम बनवले आहे. मात्र आता संघावर संकट घोंगावत आहे, त्यामुळेच मी आणि पी. एन. पाटील सभेला उपस्थित असून त्यावर प्रश्न उपस्थित करु नका. संघावर आरोप करणाऱ्यांनी राज्यातील सर्वात सक्षम अशा लेखापरीक्षकाकहून लेखापरीक्षण करून घ्यावे.’

सभेत एनडीडीबीचे अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक अरुण नरके, कर्मचारी रघुनाथ पाटील, दत्तात्रय वागरे, अमर मगर, दिलीप पाटील व चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. म्हैस दूध उत्पादक संजय जरळी, राजेंद्र अंकलखोपे, अमरसिंह पाटील तर गाय दूध उत्पादक प्रफुल्ल माळी, गजानन पाटील, सचिन पाटील यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला.

रणजितसिंह पाटील, रवींद्र आपटे, अरुणकुमार डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, पी. डी. धुंदरे, बाबा देसाई, अनुराधा पाटील, जयश्री पाटील-चुयेकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

प्रचंड पोलिस बंदोबस्त

यावर्षीच्या सभेसाठीही दूध संस्थांकरवी आमदार सतेज पाटील यांनी ३४ प्रश्नांची सूची संघाकडे पाठवली होती. गोकुळच्या भ्रष्ट कारभारांवर विचारलेल्या प्रश्नामुळे वादळी चर्चा होणार अशी शक्यता होती. त्यामुळे सभागृहाबाहेर पोलिस उपाधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, एक पोलिस निरीक्षक यांच्यासह पोलिस कर्मचारी तैनात होते. त्यामुळे सभागृहाबाहरे पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

अनेक सभासद सभेला मुकले

सभेत सभासदांनी लिखित स्वरुपात उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन मोठा गदारोळ उडणार असल्याने सभासदांची कसून तपासणी केली जात होती. सभागृहात प्रवेश करताना सभासदांचे ठराव, कोणत्या संस्थेचे सभासद आणि संघाकडून वितरित केलेल्या पासची तपासणी करून सोडले जात होते. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून सभासदांनी गर्दी केली होती. कागदपत्रांची तपासणी करण्यास बराच उशीर लागत असल्याने सभासदांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नियोजित वेळेपेक्षा अधीच सभा सुरू झाल्याने अनेकांना सभागृहात प्रवेश करता वेळ लागत होता. त्यातच सभा संपल्याचे जाहीर केल्याने अनेक सभासदांनी सभागृहात जाण्याऐवजी परतीची वाट धरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदगाव दरोड्याचा उलगडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उदगाव (ता. शिरोळ) येथील दरोड्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उलगडा केला. दरोडा घालून ७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शेळक्या जुरब्या पवार (वय ४९, रा. समडोळी, जि. सांगली), आकाश नामदेव पवार उर्फ जाबाज उपकाऱ्या पवार ( २०, रा. तासगाव, जि. सांगली), मैनेश झाजम्या पवार (३५, रा. इटकरे, जि. सांगली) आणि विशाल उर्फ मुक्या भीमराव पवार (२३, रा. बहाद्दूरवाडी, जि. सांगली) त्यांची नावे आहेत. या टोळीतील तिघे अद्याप फरार आहेत. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

उदगावच्या निकम मळ्यातील निवृत्त प्राध्यापक बाबूराव निकम (वय ६२) यांच्या घरावर १३ ऑगस्टच्या मध्यरात्री दरोडा पडला. हॉलमध्ये झोपलेल्या अरुणा निकम (५५) यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांना ठार मारले, तर बाबूराव निकम हे गंभीर जखमी झाले होते. यानंतर दरोडेखोरांनी ७ लाख २२ हजार ५०० रुपयांची सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. दरोडेखोरांनी चलाखीने हा गुन्हा करून कोणताही पुरावा पाठीमागे सोडला नव्हता, त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. जयसिंगपूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुन्ह्याच्या पद्धतीवरून दरोडेखोरांमा माग काढण्याचे काम सुरू केल्यानंतर त्यांना अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील काही टोळ्यांची माहिती मिळाली. यातील इंदापूरच्या (जि. पुणे) टोळीतील गुन्हेगार सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि वाळवा परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या संशयितांनी नात्यातील काही लोकांची टोळी तयार केल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी शेळक्या जुरब्या पवार (रा. समडोळी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर बाबूराव निकम यांचे पॅनकार्ड मिळाले. शिवाय निकम यांच्या घरातील सोने खरेदीची पावतीही मिळाली. अधिक तपासात संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.

दरोड्याच्या गुन्ह्यातील इतर संशयित पसार होते. यातील आकाश पवार, मैनेश पवार आणि विशाल पवार या तिघांनाही पोलिसांनी अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातून अटक केले. या टोळीतील आणखी तीन संशयित पसार आहेत. पोलिसांचे एक पथक त्यांचा शोध घेत आहे. टोळीने उदगावातील दरोड्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडील साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा सुमारे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. हे सर्वच संशयित सराईत असून, त्यांच्यावर चोरी, घरफोड्या खुनाचेही गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी वर्तवली आहे. यावेळी जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे, एलसीबीचे निरीक्षक दिनकर मोहिते, वाचक शाखेचे शशिकांत पाटोळे, जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे एपीआय दत्तात्रय कदम यांच्यासह एपीआय संजीव झाडे, यावराज आठरे, मोल माळी, राजेंद्र सानप, शरद माळी, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोल...गोल...गोल...चा जयजयकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
मराठमोळ्या हलगीचा घुमका, फुटबॉल थीम साँग, आफ्रिकी नृत्यांवर कलाकारांनी धरलेला ठेका, सिग्नेचर पॉइंटवर शुभेच्छांचा वर्षाव, सेल्फी पॉइंटवर छबी टिपण्यासाठी तरुणाईची गर्दी, भारतीय संघातील स्टार फुटबॉलपटू अनिकेत जाधवचे कटाउट्स आणि चिमुकल्यांच्या फुटबॉल सामन्यात अचूक फटक्याने साधलेला गोल आणि नंतर विद्यार्थ्यांचा घुमलेला गोल...गोल...गोल...चा आवाज, अशा उल्हासी वातावरणात महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन मिलियन’ कार्यक्रमात फुटबॉलचा जयजयकार झाला. जिल्ह्यातील साडेनऊशेहून अधिक शाळांमध्ये शुक्रवारी विद्यार्थ्यांनी फुटबॉल सामन्याचा आनंद लुटून १७ वर्षे वयोगटातील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा ६ ते २४ ऑक्टोबरदरम्यान भारतात होणार आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ उपक्रमांतर्गत दहा लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र हायस्कूलच्याच्या क्रीडांगणावर पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी फुटबॉलची किक मारून केला. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने एक उत्साही वातावरण निर्माण व्हावे यासाठी सर्वांनी मिळून आज पुन्हा एकदा फुटबॉलमय होऊया आणि क्रीडा संस्कृती रुजवूया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
या उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होण्यासाठी उभारलेल्या सिग्नेचर पॉइंटवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘आय एम प्राउड ऑफ यू, आय लव्ह यू टीम इंडिया, शंभर टक्के यशासाठी अंबाबाई चरणी प्रार्थना’ अशा भावना व्यक्त करून स्वाक्षरी करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. तसेच सेल्फी पॉइंटचे उद्घाटनही केले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी, फुटबॉल हा जगभरात सर्वांत लोकप्रिय असणारा खेळ असल्याने महाराष्ट्राने यात मागे राहून चालणार नाही असे सांगून या खेळामुळे सर्वांगीण विकास होईल. कोल्हापुरात त्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे या खेळाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
महापौर हसीना फरास यांनीही महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियनला शुभेच्छा दिल्या. डी. बी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. अमर सासने यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी आभार मानले. व्हॉलिबॉल प्रशिक्षक अजित पाटील यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी फिफा वर्ल्डकप साँगवरील गाण्यांवर युवकांनी, तर महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे चेअरमन डी. बी. पाटील. अध्यक्ष एस. आर. चरापले उपस्थित होते.

शिवाजी, शाहू स्टेडियमचे
स्ट्रक्चरल ऑडिट करणार
कोल्हापुरात शाहू स्टेडियम व शिवाजी स्टेडियमवर फुटबॉलचे सामने होतात; पण तेथील सुविधांची वानवा आहे. या मैदानांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून खेळाशी संबंधित आवश्यक त्या सर्व सुविधा तेथे उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विद्यापीठातही स्पर्धेचे आयोजन
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर फुटबॉल स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धे सहभागी चौदा संघांमध्ये मुलींच्याही चार संघांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी .टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभरात विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी फुटबॉलला कीक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकच्या बसचालकास सीबीएसवर मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात बस पुढे घेण्याच्या कारणातून दोन बस चालकांमध्ये मारामारी झाली. बेळगाव आगारातील बसचालक अनिल सुरेश रेडेकर (वय ३०, रा. कणंगला ता. हुक्केरी, बेळगाव) यांना गारगोटी आगारातील बसचालकाने मारहाण केली. शुक्रवारी (ता. १५) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी रेडेकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अनिल रेडेकर हे बेळगाव ते कोल्हापूर बसचे चालक असून शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ते कोल्हापुरात आले. बसस्थानकात इतर बसची गर्दी असल्याने त्यांनी दुचाकी पार्किंगच्या झाडाजवळ बस थांबवली. यावेळी युवराज केरबा पाटोळे (रा. गारगोटी) हे गारगोटी आगाराची बस घेऊन आगारात आले. हॉर्न वाजवूनही समोरची बस पुढे जात नसल्याने संतप्त झालेले पाटोळे यांनी बसमधून उतरून कर्नाटकातील बसचालकाला मारहाण केली. परिसरातील प्रवाशांनी या दोघांमधील वाद मिटवला. त्यानंतर जखमी रेडेकर यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेडेकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीचे पंचनामे सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि परिसरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. येत्या दोन दिवसांत पंचनामे आणि नुकसानीचा अहवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिला जाणार आहे. पहिल्या दिवशी नुकसानीचे ढोबळ आकडे नोंदविण्याचे काम सुरू झाले असून जिल्ह्यात सुमारे दोन लाखांपर्यंतचा नुकसानाची अंदाज आहे. तर शहरातील नुकसानीची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या ठिकाणचे पंचनामे सुरू आहेत.

बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील काही भागांत घरांत पाणी शिरले होते. तर काही ठिकाणी वाहने वाहून गेली होती. त्यानंतर आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांनी शास्त्रीनगर, उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर, कुंभार गल्ली परिसराची पाहणी केली होती. दोन्ही आमदारांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारपासून यंत्रणा कामाला लागली. एका रात्रीत शहर परिसरात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रस्त्यांवर चार ते पाच फूट पाणी साचले होते. या पावसात शहरात आठ मोटारी, २० दुचाकी, तीन ऑटो रिक्षा वाहून गेल्या होत्या. पाण्याच्या प्रवाहात या वाहनांसह कंटेनर आणि अनेक घरांतील प्रापंचिक साहित्य वाहून गेले. जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. शास्त्रीनगर परिसरातील ओढ्यात वाहून गेलेल्या तीन दुचाकी सापडल्या. संबधित वाहनमालकांनी या दुचाकी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये टाकल्या आहे.

आजरा, करवीमधील कसबा बावडा, निगवे खालसा येथे घराच्या पडझडीचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शहरात शास्त्रीनगर, उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर, पाचगांव परिसरातील नुकसानीची पाहणी करवीर तहसीलदार कार्यालयाकडून सुरू आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार अहवाल तयार केला जात आहे.



अतिवृष्टी झालेल्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहेत. नुकसानाची आकडा घेतले जात आहे. घरे, जनावरांसह नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाची अहवाल तहसीलदारांकडून पूर्ण केला जात आहे. दोन दिवसांत नुकसानाचा निश्चित आकडा स्पष्ट होईल. सर्वांधिक पाऊस करवीरमध्ये झाला आहे.

सचिन इथापे, प्रांताधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघडला दुचाकी, चारचाकींचा खजिना

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑडी, डुकाटी, जग्वार लँडरोव्हर, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, मोटारॅड ते सुपर बाइक्स, क्राउन मित्सुबिशी, साई सर्व्हिस, रिव्हरसाइड होंडा, एसएमजी निसान, युनिटी मोटर्स टाटासह नामांकित कंपन्यांच्या अत्याधुनिक चारचाकी वाहनांसह दुचाकी वाहनांचा खजिना ‘ऑटो एक्स्पो २०१७’मध्ये उघडला आहे. रेडिओ मिर्ची ९८.३ आणि कोल्हापूर ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनच्या वतीने ‘ऑटो एक्स्पो २०१७’चे शुक्रवारी सायंकाळी महापौर हसीना फरास यांच्या हस्ते उदघाटन झाले. नागाळा पार्क येथील एस्तेर पॅटन ग्राउंडवर १८ सप्टेंबरअखेर प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे महाराष्ट्र टाइम्स मीडिया पाटर्नर आहे. आपल्या आवडत्या गाड्यांना प्रत्यक्ष आणि एकत्र पाहून त्यातून सर्वोत्तम गाडी बुक करण्याची संधी यावेळी सर्वांना मिळणार आहे.

उद्घाटनन सोहळ्याप्रसंगी क्लायमॅक्सचे संचालक उदय जोशी, बँक ऑफ इंडियाचे व्यवसायवृद्धी व्यवस्थापक परेश हातकर, कोल्हापूर ऑटो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, सेक्रेटरी नीलेश कदम, कार रेसर कृष्णराज महाडिक, पृथ्वीराज महाडिक, रेडिओ मिर्चीचे स्टेशन डायरेक्टर तेजोमय खर्डेकर, आदी उपस्थित होते. प्रदर्शनात जगभरातील उत्तमोत्तम आणि लेटेस्ट मॉडेल्सच्या ऑडी, डुकाटी, जग्वार लँडरोव्हर, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, मोटारॅड ते सुपर बाइक्स ड्रीम कार्स पाहण्याची संधी मिळणार आहे. प्रदर्शनात विविध विक्रेत्यांकडून आकर्षक सवलती आणि योजनांसह त्यांच्या स्पॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. मोपेडपासून सुपर बाइक्सपर्यंत आणि बेसिक कारपासून प्रीमियर कार मॉडेल्सपर्यंत सर्वांच्या पसंतीच्या गाड्या एकाच छताखाली आहेत. ६४ स्टॉलमध्ये कोल्हापूर आणि परिसरातील मोटारसायकल व चारचाकी विक्रेत्यांनी लेटेस्ट मॉडेल्स आणि ऑफर्स दिल्या आहेत. ऑटो फायनान्स पुरवणाऱ्या विविध बँका आणि संस्थांचे प्रतिनिधीही उपलब्ध आहेत. मिर्ची ९८.३ चे सर्व आरजे काही आवडते सेलिब्रिटीही प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेले प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. नामांकित कंपन्यांची वाहने, फायनान्स आणि स्पॉट बुकिंगवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती घेण्यासाठी उपस्थितांची गर्दी झाली.

सहभागी फोर व्हीलर डीलर्स

क्राउन मित्सुबिशी, साई सर्व्हिस, रिव्हरसाइड होंडा, एसएमजी निसान, युनिटी मोटर्स टाटा, युनिक रेनॉल्ट, युनिक फॉक्सवॅगन, युनिक फोर्ड, युनिक ह्युंदाई, नेक्सा, माई ह्युंदाई, ट्रिनिटी बेंझ घाटगे ग्रुप, ट्रेंडी व्हील्स महिंद्रा, टाटा मोटर्स चेतन मोटर्स, अॅरॉन व्हील्स जीप अँड फियाट, डीएसके बेनेली वेलस् मोटर्स, संजय घोडावत ग्रुप प्रीमियम कार्स अँड बाइक्स

सहभागी टू व्हीलर डीलर्स

केआर टीव्हीएस, मोहिते सुझुकी, मोटर इंडिया, माई टीव्हीएस, कदम बजाज, एसएमजी हिरो, युनिक हिरो, वेनेशन वेस्पा, महालक्ष्मी होंडा, माय ड्रिम होंडा.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पगारी पुजारी’चा विशेष उल्लेख

$
0
0


म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसंदर्भातील तयार झालेल्या अहवालावर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी सही केली. शनिवारी हा अहवाल राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. पगारी पुजारी नेमण्याबाबतच्या अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या मागणीचा ‘विशेष’ उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.

विधी व न्याय विभाग अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याच्या कायद्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला सादर करणार आहे. राज्य व देशातील पगारी पुजारी नियुक्तींचा अभ्यास व जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या अहवालावरुन कायदा केला जाणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत पगारी पुजारीचा प्रस्ताव मंजूर होणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. हा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात विधानसभा व विधान परिषदेत मंजूरीस ठेवला जाणार आहे. सूचना व उपसूचनांच्यामुळे कायद्याच्या मंजुरीला तांत्रिक अडचण आली तर राज्यपालांकडून अद्यादेश काढला जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

००००

पगारी पुजारी नेमण्याबाबत दोन्ही बाजूंचे म्हणणे, कोर्टातील दावे, पुजारी हटाओ समितीची विशेष मागणीचा यांचा उल्लेख असलेल्या अहवालावर आज सही झाली आहे. उद्या शनिवारी (१६) अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठवला जाईल.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उदगाव दरोड्याचा पॅनकार्डवरून लागला छडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उदगाव (ता. शिरोळ) येथील प्रा. बाबूराव निकम यांच्या घरातील दरोड्यानंतर पोलिसांना घटनास्थळावर काहीच पुरावे मिळाले नाहीत. श्वानपथकही परिसरातच घुटमळले. पोलिसांनी दोनशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले तर हजारो मोबाइल कॉल्सची तपासणी केली. ताब्यात घेतलेला संशयितदेखील तोंड उघडायला तयार नव्हता, त्यामुळे हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. अखेर चोरी करताना निकम यांचे चोरलेले पॅनकार्ड संशयिताच्या घराची झडती घेताना सापडल्याने उदगाव दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

निवृत्त प्राध्यापक बाबूराव निकम यांच्या घरात दरोडा टाकण्यापुर्वी दरोडेखोरांनी घराच्या परिसराची रेकी केली होती. १३ ऑगस्टला मध्यरात्री तीन मोटारसायकलवरून आलेल्या सात चोरट्यांनी शिरोळ रोडलगत उसाच्या शेतात मोटारसायकल लपवल्या. यानंतर पायी चालत जाऊन त्यांनी कटावणीने खिडकीचे दार उघडून खिडकीतून हात घालून कात्रीने दरवाजाचे दार उघडले. हॉलमध्ये झोपलेल्या अपर्णा निकम यांच्यावर हल्ला करून कटावणी आणि जांबियाने त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या आणि गळ्यातील दागिने काढून घेतले. यानंतर बाबूराव निकम ज्या बेडरुममध्ये झोपले होते त्या बेडरुमध्ये जाऊन त्यांना गंभीर जखमी करून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने सोबत घेतले. याचवेळी निकम यांचे पॅनकार्ड आणि सोने खरेदीच्या काही पावत्यादेखील चोरट्यांच्या हाती लागल्या. गुन्ह्यातील शस्त्र किंवा इतर कोणताच पुरावा पाठीमागे उरला नव्हता. पोलिसांनी जयसिंगपूर, सांगली, शिरोळ, कोल्हापूरसह परिसरातील दोनशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. १२ ते १४ ऑगस्टदरम्यान दोन हजारहून अधिक मोबाइल नंबरचे सीडीआर तपासले, मात्र चोरट्यांनी मोबाइलचा वापर टाळल्याने काहीच माहिती हाती लागली नाही.

गुन्ह्याच्या पद्धतीवरूनच पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळ्यांचा शोध घेतला, पण ताब्यात घेतलेला संशयित काही केल्या तोंड उघडत नसल्याने तपास पुढे सरकत नव्हता. पोलिसांच्या एका पथकाने संशयिताच्या नातेवाइकांच्या घरांची झडती घेतली. यातील एकाच्या घरात बाबूराव निकम यांचे पॅनकार्ड, दागिन्यांचा रिकामा बॉक्स आणि सोने खरेदीच्या पावत्या मिळाल्याने दरोड्याचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील चौघांना अटक केले. याच टोळीने वर्षभरापूर्वी शहरात कसबा बावड्यात एक घरफोडी केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. निकम यांचे पॅनकार्ड पोलिसांच्या हाती लागले नसते तर कदाचित हा गुन्हा उघडकीस आणण्यास आणखी वेळ लागला असता. पॅनकार्डच्या आधारे मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली आणि दरोड्याचा उलगडा झाला.

समडोळीत रचला कट

शेळक्या जुरब्या पवार याने आकाश पवार, मैनेश पवार आणि विशाल पवार या तिघांना समडोळी येथे बोलवून घेतले. त्यांच्यासोबत इतर तीन साथीदारही होते. समडोळीतच त्यांनी दरोड्याचा कट रचून कटावणी, जांबिया, चाकू आणि कात्री या साहित्याची जमावाजमव केली. यातील मैनेश पवार याच्यावर आष्टा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. शेळक्या पवार याच्यावर पाच, मुक्या पवार याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. याशिवाय शिक्षा सुनावल्यानंतरही फरार असलेले काही संशयित या टोळीत सहभागी आहेत. सराईत असल्यानेच त्यांनी दरोड्यादरम्यान एकही पुरावा मागे सोडला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टोळीवर मोक्का लावण्याचा विचार

या टोळीने एकत्रित अनेक घरफोड्या आणि चोऱ्या केल्या आहेत. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची असल्याने संपूर्ण टोळीवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच या संशयितांविरोधात मकोकाचे प्रस्ताव तयार केले जणार आहेत.

उदगावमधील दरोड्याचा गंभीर गुन्हा उघडकीस आणून त्यातील मुद्देमालही हस्तगत केला आहे. जिल्ह्यातील रुकडीचा डबल मर्डर आणि कोडोली येथील खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकर ते गुन्हेही उघडकीस आणले जातील.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पितळी गणपतीजवळ खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रेसिडेन्सी क्लब ते पितळी गणपती या मार्गावर खड्ड्यांमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला. राहुल विजय साठे (वय २६, रा. रुईकर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव असून, शनिवारी (ता. ९) खड्डा चुकवताना दुचाकी घसरून त्याचा अपघात झाला होता. शुक्रवारी (ता. १५) सकाळी त्याचा उपचारादरम्यान सीपआर रुग्णालयात मृत्यू झाला.

राहुल साठे हा बी. एस्सी. नर्सिंगचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील कसबा बावड्यातील शाळेत शिपाई पदावर काम करीत आहेत, तर आई गृहिणी आहे. शनिवारी तो दुचाकीवरून रमणमळा येथील मित्राकडे गेला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा घरी जाताना रेसिडेन्सी क्लब ते पितळी गणपती या मार्गावरील खड्डा चुकवताना राहुलची दुचाकी घसरली. या अपघातात जमिनीवर आदळलेल्या राहुलच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. काही वाहनधारकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने राहूलची प्रकृती चिंताजनक बनली होती. गेली सहा दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली, मात्र शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राहुलच्या अपघाती मृत्यूने साठे कुटुंबीयांना धक्का बसला असून, शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांवर वाढलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहवाल वाचणारे महाडिक कोण?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघात संचालक, कर्मचारी नसताना वार्ष‌िक अहवाल वाचणारे माजी आमदार महादेवराव महाडिक कोण? असा संतप्त सवाल गोकुळच्या सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या समांतर सभेत सभासदांनी विचारला. केवळ एक मिनिटात ११ विषयांना मंजुरी घेतल्याने सभासदांचा हक्क संपुष्टात आला असून गोकुळमध्ये हुकूमशाही सुरू झाली आहे. गोकुळ ठेकेदारांचा अड्डा झाला आहे, असा आरोप आमदार सतेज पाटील गटाच्या सभासदांनी यावेळी केला.

गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार सतेज पाटील यांनी‌ विचारलेल्या ३४ प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर वादळी होण्याची चिन्हे होती. या पार्श्वभूमीवर माजी आमदार महाडिक यांनी भाषण करून शेवटी अहवाल हातात घेत ‘यातील एक ते अकरा विषय मंजूर का? ’असा प्रश्न केला. यावर ‘मंजूर, मंजूर’ असा गदारोळ झाला आणि सभा गुंडाळली. त्यांनतर संतप्त सभासदांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

संघाचे (गोकुळ) कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. संघाच्या सभेला संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सभासद येणे अपेक्ष‌ित असते. सभेसाठी दुपारी एकची वेळ सोयीची असताना सभा सकाळीच ठेवून सभासदांच्या हक्कावर गदा आणली आहे. सभेपूर्वी बोगस पास तयार करुन दोन तीन हजार कार्यकर्ते घुसवून सभासदांची गळचेपी केली आहे. गोकुळचे संचालक अथवा कर्मचारी नसताना गोकुळचा अहवाल वाचणारे माजी आमदार महादेवराव महाडिक कोण असा सवाल दूध उत्पादकांनी केला. गोकुळची वार्षिक सभा अवघ्या ४५ मिनिटात गुंडाळल्यानंतर दूध उत्पादक सभासद व आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी करत संघाच्या कारभाराचा निषेध केला.

हसूर येथील श्रीपती पाटील म्हणाले, ‘सर्वसाधारण सभेपूर्वी संघाकडे प्रश्न पाठवले होते. पण या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी सभाच गुंडाळून एकाधिकारशाहीचे प्रदर्शन करत सभासदांच्या हक्कावर गदा आणली. अहवालाचे वाचन करून सर्व विषयांना मंजुरी घेण्याचे अधिकार अध्यक्ष, कार्यकारी संचालक अथवा संचालकांना असतात. पण असे कोणतेही पद नसताना महाडिक यांनी कोणी अधिकार दिला. विषयांना मंजुरी देणारे महाडिक कोण?’

माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, ‘सभेला भाडोत्री गुंड आणून दबाव निर्माण केला. गोकुळ शॉपीतील अपहार, टँकरचे टेंडर, त्यापासून निर्माण झालेले ठेकेदार, असे अनेक प्रश्न होते. या सर्व प्रश्नांना बगल देणाऱ्या संचालकांनी एक हजार कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. भ्रष्टाचारी संचालकांचे कारणामे सभासदांसमोर येऊ नयेत यासाठीच सभा गुंडाळली आहे.’

राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन विश्वासराव नेजदार म्हणाले, ‘सर्वसाधारण सभेमध्ये भाषणाचा नवा पायंडा पाडत धर्माची भाषा बोलणाऱ्या महाडिकांनी अहवाल न वाचताच सभा गुंडाळण्याचे अधर्मी कृत्य केले. गोकुळच्या कोणत्याही पदावर नसताना अहवाल वाचन करणारे महाडिक संघात कधीपासून नोकरीला लागले?’

संघाचा कारभार जर पारदर्शी असेल तर सभा गुंडाळून प्रश्न झाकून का ठेवता? असा प्रश्न करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य किरण पाटील यांनी उपस्थित केला.

यावेळी बाळासाहेब कुपेकर, कुंभी-कासारी कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर पाटील, विलास पाटील, एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, विलास साठे, सदाशिव चरापले, सतीश बरगे आदी दूध उत्पादक होते.


अध्यक्ष खोटी माहिती देत आहेत.

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी देशात व राज्यात अव्वल असलेल्या संघ स्वामिनाथन समितीच्या शिफारसीनुसार ७०:३० फार्म्युल्यापेक्षा जास्त दर देत असल्याचे सांगितले. वस्तुत: समितीने उत्पादन खर्चावर ५० टक्के जादा नफा अशी शिफारस असताना अध्यक्ष वारंवार खोटी माहिती सभेत देत आहेत. सांगली जिल्हा दूध संघ ८५:०२ नुसार परतावा देत असताना गोकुळ मात्र दूध खरेदी, वस्तू व सेवा यानुसार ८१:४२ टक्के इतका परतावा देत आहे. या सूत्रानुसार संघाने सभासदांचे ७३ कोटी २२ लाखांचे नुकसान केले आहे. आमदार सतेज पाटील यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून ३४ प्रश्न विचारले होते. त्याद्वारे त्यांनी ५० कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचे सभासदांच्या निदर्शनास आणले होते. बल्क कुलर, जाहिरात खर्च, गोकुळ शॉपीतील अपहार, संचालकांचा गाड्यावरील खर्च, पशुखाद्य येणेबाकी, एनडीडीबीचे व्याज आदींबाबत खुलासा न करता सभा गुंडाळून राष्ट्रगीत सुरू केले, असा आरोप सभासद मारुती पाटील यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे भविष्यकाळ अंधकारमय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘निसर्गावर आघात करून पर्यावरणाला हानी पोहोचवणारी जीवनशैली ही आजच्या पिढीची सवय बनली आहे. मात्र आजच्या पिढीने जर पृथ्वी सांभाळली नाही तर पुढच्या पिढीचे शाप लागतील, अशाप्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरण उद्ध्वस्त केल्यास मानवाचा भविष्यकाळ घातक असून हे धोके वेळीच ओळखले नाहीत तर मानवाचे अस्तित्वच अधांतरी होईल,’ अशी भीती ​जिल्हा परिषदेचे ​अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केली.

‘नदी वाचवा, जीवन वाचवा’ या संकल्पनेवर बेतलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा​​निमित्त आयोजित वसुंधरा मित्र आणि वसुंधरा गौरव या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी देशमुख यांच्या हस्ते राधानगरी येथील अनिल बडदारे, पत्रकार रणजित माजगावकर आणि एन्वहायरो लिगल फोरम या संस्थेला वसुंधरा मित्र पुरस्कार तसेच विश्वास बालिघाटे, बाळगोंडा पाटील आणि लहू मोरे यांना वसुंधरा गौरव पुरस्कार देण्यात आला. शाहू स्मारक भवन येथे शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि त्याचा मानवी जीवनावर होत असलेला परिणाम याविषयी विश्लेषण करताना देशमुख म्हणाले. ‘पृथ्वीचे तापमान दरवर्षी वाढत आहे. ​‘थिंक ग्लोबल, अॅक्ट लोकल’ या ब्रीदवाक्याने जगभर पर्यावरण संवर्धनाची हाक दिली जात आहे. मात्र तरीही मानवाचे निसर्गाच्या विरोधातील वर्तन हे समाजाचे स्वास्थ्य हरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. बदलत्या हवामानाचे फटके त्सुनामी, अवकाळी, ढगफुटी, दुष्काळ यासारख्या नैस​र्गिक आपत्तीमुळे माणसाला बसत आहेत. ही परिस्थिती बदलली नाही तर आणखी तीस वर्षांनी खाण्यालायक सकस धान्य मिळणार नाही. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार नाही. श्वास घेण्यासाठी चांगली हवा मिळणार नाही. कोल्हापूरसारख्या निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातही गेल्या उन्हाळ्यात तापतानाचा पारा ४२ अंशावर गेला होता. पुढच्या पिढीसाठी प्रदूषित हवा, पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी धोकादायक भेट देणाऱ्या आजच्या पिढीतल्या लोकांनी गांभीर्याने याचा विचार करण्याची गरज आहे.’

वसुंधरा मित्र व गौरव पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्यावतीने मनोगत व्यक्त करताना अनिल बडदारे म्हणाले, ‘निसर्गावर ​अतिक्रमण करून जर कुठला​ विकास केला जात असेल तर असा विकास मानवाची अधोगती करणारा आहे. याचे भान जपण्याची गरज आहे. या पुरस्काराच्यानिमित्ताने पर्यावरणासाठी केलेल्या कामाची दखल घेतल्याचे समाधान आहे.’

राहुल पवार यांनी प्रास्ताविक केले. अनिल चौगुले यांनी स्वागत केले. उदय गायकवाड यांनी पुरस्कारप्राप्त कार्यकर्ते व संस्थेचा परिचय करून दिला. यावेळी भाऊसाहेब सूर्यवंशी, सचिन जिल्हेदार, दीपक भोसले, कृष्णा गावडे, सुवर्णा भांबूलकर, विजय टिपुगडे आदी उपस्थित होते.

आज महोत्सवात

सकाळी साडेआठ वाजता रिव्हर फन अंतर्गत लहान मुलांसाठी पर्यावरणपूरक खेळांचा कार्यक्रम पंचगंगा घाट येथे होणार आहे. तर नऊ वाजता सायबर येथे शोध नदीचा हा युवा संवाद होणार आहे. दुपारी दोन वाजता महिलांसाठी पर्यावरण विषयक सिनेमांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तर सायंकाळी साडेपाच वाजता ‘सूर सरिता’ हा किर्लोस्कर कंपनीतील कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकातील पथक कोल्हापुरात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र आणि गोव्यातही तपास सुरू केला आहे. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्यानंतर गौरी लंकेश यांच्याही हत्येत वापरलेल्या शस्त्रामध्ये साम्य असल्याची माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने बेंगळुरू येथील एका पथकाने कोल्हापूर पोलिसांकडून कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येबाबत माहिती घेतली. पुणे आणि गोव्यातही तपास सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

बंगळुरू येथे ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या झाली. महाराष्ट्रातील डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासह कर्नाटकातील डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्याही हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रामध्ये साम्य असल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवला होता. तसे काही निष्कर्षही काढण्यात आले होते. पुन्हा त्याच पद्धतीने आणि साम्य असलेल्या शस्त्राने गौरी लंकेश यांची हत्या झाल्याने या चारही हत्यांमागे समान विचारांच्या व्यक्ती किंवा संघटना असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने बेंगळुरूमधील पोलिस पथक कोल्हापुरात दखल झाले आहे. या पथकाकडून कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येची माहिती घेतली जात आहे. पथकाने राजारामपुरी पोलिस ठाण्यासह एसआयटीसोबतही चर्चा केली. पानसरे यांच्या हत्येत वापरलेल्या शस्त्राचीही सविस्तर माहिती पथकाने घेतली. या पथकाकडून पुणे आणि गोव्यातही तपास सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

कर्नाटकातील पथक पानसरे कुटुंबीयांकडूनही माहिती घेणार आहे. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास थंडावल्याने याबाबत कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी २६ ऑगस्टला देशभरातील पुरेगामी कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ बेंगळुरू येथे गेले होते. त्या शिष्टमंडळात मेघा पानसरे आणि गौरी लंकेश सहभागी होत्या. तेव्हा या दोघींमध्ये दाभोलकर आणि पानसरे हत्येच्या तपासाबाबत चर्चाही झाली होती. कलबुर्गी हत्येच्या तपासाबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती जाहीर करावी, असा लंकेश यांचा आग्रह होता. यानंतर काही दिवसांतच लंकेश यांच्यावर हल्ला झाला. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येप्रमाणेच लंकेश यांच्या हत्येमध्ये साम्य असल्याने कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रात तपास सुरू केला आहे. पोलिस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक एसआयटीच्या अधिकाऱ्यांसह पानसरे आणि दाभोलकर कुटुंबीयांकडून माहिती घेत आहे.


पुणे आणि गोव्यातही तपास

अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दोभोलकर यांची पुण्यात हत्या झाली होती. सीबीआयने पुण्यातूनच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या संशयिताला अटक केले होते. शिवाय गोव्यातील एका आश्रमाची झडती घेऊन त्यातील साधकांकडेही चौकशी केली होती. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर तपासाची सूत्रे पुन्हा गोव्याकडे वळली आहेत. पुणे आणि गोव्यातही तपास सुरू आहे.


शस्त्रात साम्य

डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता गौरी लंकेश यांच्या हत्येतही एकाच प्रकारचे पिस्तूल वापरल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. याची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारच्या शस्त्रांची तस्करी आणि विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील संशयितांना अटक करण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यात इचलकरंजीतील दोन संशयितांना पुन्हा अटक होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरचा पुराचा धोका टळला!

$
0
0

सुनील दिवाण । पंढरपूर

उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचं प्रमाण कमी करण्यात आल्यानं पंढरपूर शहरासह नदीकाठच्या गावांचा पुराचा धोका टळला आहे. उद्या दुपारीपर्यंत चंद्रभागेतील पाण्याच्या पातळीही खाली येईल, असा अंदाज आहे.

उजनी व वीर धरणातून जवळपास ८५ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडल्यानं चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली होती. चंद्रभागा तीरावरील लोकांना प्रशासनानं सुरक्षेसाठी इतरत्र हलविण्याचं काम पूर्ण केलं होतं. मात्र, आज सकाळपासून उजनीचा विसर्ग २ हजार क्युसेकपर्यंत कमी केल्यानं पुराचा धोका टळला आहे. गेले दोन दिवस सोडलेलं पाणी खऱ्या अर्थानं उद्यापासून ओसरणार असल्यानं चंद्रभागेत स्नानाला न जाण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. आज इंदिरा एकादशी असल्यानं शहरात दीड लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून प्रशासनानं चंद्रभागेच्या तीरावर पोलीस आणि अग्निशामक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. काही दुर्घटना घडल्यास सुरक्षा म्हणून पाणबुडे आणि बोटी देखील जुन्या दगडी पुलाजवळ तैनात ठेवण्यात आल्या असून भाविकांना चंद्रभागा स्नानापासून रोखले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी मुंडेवाडी बंधाऱ्यावरून वाहून गेलेल्या दुचाकीवरील सुरेश बनकर यांचा मृतदेह १० किलोमीटर लांब नळी बंधाऱ्यात सापडला असून त्यांच्या पत्नी वंदना यांच्या मृतदेहाचा अजूनही शोध सुरू आहे. चंद्रभागा तीरावरील व्यसनारायण झोपडपट्टी सध्या रिकामी करण्यात आली असून येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकांच्या गावात रंगले ‘विंदाचे स्मरण!’

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुस्तकांचं गाव-भिलार (सातारा)

गंभीर परिसंवाद, बहारदार कविसंमेलन आणि दर्जेदार अभिवाचन अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून, आज पुस्तकांच्या गावी (भिलार येथे) मुसळधार पावसातही ‘स्मरण विंदांचे’ हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम जणू विंदा करंदीकरांच्या साहित्याचे एकदिवसीय संमेलनच ठरले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या अरुणा ढेरे आणि स्वागताध्यक्ष होते समस्त भिलारवासी.

‘स्मरण विंदांचे’ या पुस्तकांच्या गावी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन विंदांच्या कन्या जयश्री काळे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन सत्रात बाळासाहेब भिलारे यांनी भिलारवासीयांच्या वतीने सर्व उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. अरुणा ढेरे यांनी कार्यक्रमामागची भूमिका मांडली. जयश्री काळे यांनी विंदांच्या आठवणी उलगडून सांगितल्या आणि शासनाच्या माध्यमातून हे समर्पक ‘विंदा-स्मरण’ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नुकतेच प्रकाशित झालेले विंदांचे बालकविता संग्रह त्यांनी पुस्तकांच्या गावाला सस्नेह भेट दिले. विंदांच्या ‘दातृत्व’ भावाबद्दल विशेष आठवणी त्यांनी सांगितल्या. उद्घाटन सत्रात राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दृकश्राव्य संदेशाद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि विंदांना अभिवादन केले. तसेच विंदा करंदीकर यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणाऱ्या चित्रफीतीही या प्रसंगी दाखवण्यात आल्या. यावेळी भिलारच्या सरपंच वंदना भिलारे उपस्थित होत्या.

कविवर्य विंदांच्या वैश्विक भानाचा परामर्श परिसंवादाच्या माध्यमातून ज्येष्ठ अभ्यासकांनी घेतला. सांगलीचे डॉ. अविनाश सप्रे, कोल्हापूरचे डॉ. रणधीर शिंदे, बेळगावच्या डॉ. शोभा नाईक आणि पुण्याच्या डॉ. वंदना बोकील यांनी विंदांच्या कवितेच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंवर आपले सधन विचार उपस्थितांसमोर मांडले.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कवींनी आपल्या काव्यप्रतिभेचे उत्तम सादरीकरण केले. प्रदीप निफाडकर, वृषाली किन्हाळकर, उषा परब, संगीता बर्वे, पवन नालट, ऐश्वर्य पाटेकर, आबा पाटील, श्रीधर नांदेडकर, इत्यादी कवींनी उपस्थितांची मनं जिंकली. कविसंमेलनात सर्व श्रोत्यांना विंदांचे सार्थ स्मरण झाले. बहुतत्ववादी, नित्यनूतनेचा शोध घेणारे विंदा, विश्वभान साधणारी प्रतिभा असणारे विंदा, विज्ञाननिष्ठ विंदा अशा अनेक प्रकारे विंदा रसिकांना उलगडले.

शेवटच्या सत्रात अभिराम भडकमकर, सौरभ गोखले, अतुल आगलावे आणि प्रमिती नरके यांनी अभिवाचनातून विंदा करंदीकर यांचे स्मरण साधले. या कार्यक्रमात सातारा व पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि भिलार परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिद्रीत राष्ट्रवादी-भाजपची आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आघाडीवर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. कारखान्याच्या एकूण २१ जागा पैकी भाजप सहा तर राष्ट्रवादी काँग्रेस १५ जागा लढ‍वणार असून आघाडीची घोषणा आमदार हसन मुश्रीप व सुरेश हळवणकर यांनी पत्रकार बैठकीत केली. आघाडीमध्ये म्हाडाचे अध्यक्ष समरज‌ितसिंह घाटगे, माजी आमदार बजरंग देसाई व विठ्ठलराव खोराटे यांचाही पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत आघाडी केली.

आघाडीची अधिकृत घोषणा शासकीय विश्रामगृहावर झाली. आघाडीबाबत बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘बिद्री कारखाना निवडणुकासाठी भाजपबरोबर आघाडी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चार बैठका झाल्या होत्या. बैठकीत राष्ट्रवादीकडून पाच जागांचा प्रस्ताव दिला होता, तर भाजपने सहा जागांची मागणी केली होती. याबाबत शुक्रवारी आमदार हळवणकर यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर भाजपला सहा जागा देण्यावर एकमत झाले. बिद्री कारखान्याच्या यापुर्वीच्या निवडणुकीमध्ये विक्रमसिंह घाटगे, रणजितसिंह पाटील, प्रवीणसिंह पाटील, विजय मोरे, विठ्ठलराव खोराटे यांच्यासोबत निवडणुका लढवल्या आहेत. यातील काही नेते भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुन्हा याच व्यक्ती आघाडीमध्ये सामील होतील.’

आमदार हळवणकर म्हणाले, ‘चार तालुक्यात कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्यामध्ये भाजपचे सुमारे १४ हजार सभासद आहेत. एवढ्या मतांच्या बळावर स्वतंत्र पॅनेल करणे अशक्य होते. त्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. उत्तम व्यवस्थापन, आर्थिक स्थिती भक्कम आणि कर्जमुक्त कारखाना असल्याने सत्तारुढ गटाला पाठिंबा दिला आहे. राजकीय तत्वे बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आघाडीचा निर्णय घेतला. दुसऱ्या आघाडीकडून आठ जागांचा प्रस्ताव होता, पण त्यामध्ये एकवाक्यता नव्हती. तसेच कारखान्याच्या माध्यमातून माजी आमदार के. पी. पाटील यांनी कारखान्याचा कारभार चांगला केल्याने आघाडीचा निर्णय घेतला. आघाडीचा निर्णय झालेला असला, तरी अर्ज माघारीनंतर पुन्हा पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा करून कोणत्या गटातील जागांची मागणी करायची याचा निर्णय होईल.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ‘आघाडी करताना संख्याबळापेक्षा कारखान्याच्या प्रगतीला जास्त महत्त्व दिले आहे. इथेनॉल, डिस्टलरी प्रकल्प व कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार वरून सात हजार मेट्रिक टन करायची आहे. तसेच ठिबक सिंचन, ऊस विकास योजना आदी प्रकल्प राबवायचे आहेत. यासाठी सरकारच्या परवानगी व मदतीची आवश्यकता आहे. सरकारी मदत आणि कारखान्याच्या विकासासाठी आघाडी केली आहे. ऊस तोडणी कार्यक्रमाची नोंदणीनुसार अंमलबजावणी करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठी टाटा कन्सलटंन्सी सोबत चर्चा झाली आहे. तर कारखाना विस्तारीकरणासाठी प्रशासक येण्यापूर्वी १७ कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली आहे.’

कारखाना निवडणुकीबाबत प्रदेशपातळीवर कोणताही निर्णय झालेला नसला, तरी स्थानिकपातळीवर भुदरगडमधील काँग्रेस राष्ट्रवादी-भाजप आघाडीसोबत असल्याचे माजी आमदार बजरंग देसाई यांनी सांगितले. पत्रकार बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील, बाबा देसाई, हिंदुराव शेळके, कागल कारखान्याचे संचालक यशवंत ऊर्फ बॉबी माने, प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर ऊर्फ आप्पा देसाई यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

सभासद अपात्र ठरवणे चुकीचे

अनेक ऊस उत्पादक दागिने विकून कारखान्याचे सभासद झाले. पण राजकीय द्वेषाने अशा व्यक्तींना अपात्र ठरवणे चुकीचे आहे. ज्या सभासदांना अपात्र केले, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. अनेक कारखान्यामध्ये उत्पादकांना सभासद करुन घेतले जात नाही. पण बिद्रीमध्ये मात्र कोणालाही सभासदत्व दिले जाते. त्यामुळे विधानसभा मतदारसंघ येवढे मतदार झाले आहेत. सर्वांना सभासदत्व देणारा बिद्री कारखाना एकमेव असल्याचे प्रशिस्तीपत्र आमदार हळवणकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलअभियंत्याच्या दोन वेतनवाढी रोखल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेंतर्गत ठिकपुर्लीत २५ लाख रुपये खर्चाच्या लोखंडी पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ४८ लाखांचा खर्च दाखविण्याचा प्रताप करणाऱ्या सल्लागार युनिटी कंपनी आणि महापालिका अधिकाऱ्यांना आयुक्त अभिजित चौधरी यांनी कारवाईचा झटका दिला. युनिटी कंपनीला तीन लाख तर जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्या दोन वेतनवाढी रोखण्यात आल्या. या पुलाच्या बांधकामासाठी दाखविलेला वाढीव खर्च निदर्शनास आणण्याची जबाबदारी जलअभियंत्यांची होती. मात्र त्यांनी हे काम केले नसल्याच्या कारणावरुन कारवाई केल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

तत्कालीन उपायुक्त विजय खोराटे, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे आणि पाणी पुरवठातील शाखा अभियंता हेमंत गोगांणे यांना वाढीव बिलप्रकरणी सक्त ताकीद देण्यात आली आहे. टेंडरमध्येच पुलाच्या बांधकामासाठी अंदाजित रक्कम धरल्याचा आधार घेत युनिटीने २५ लाखांच्या पुलाचा खर्च २ कोटी ४८ लाख रुपये दाखविला होता. या कंपनीने वाढीव बिल तयार करून ते प्रशासनाला सादर केले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ठेकेदार जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला संबंधित रकमेचे बिलही दिले. दरम्यान या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महापालिकेतील भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी केला. सर्वसाधारण सभेतही भाजप, ताराराणी आघाडीसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दोषी अधिकारी आणि सल्लागार कंपनीवर कारवाईची मागणी केली.

आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करुन कंपनीच्या बिलामधून लोखंडी पुलासाठी दिलेली वाढीव बिलाची रक्कम कपात केली. तर बिल मंजूर करताना शहानिशा केली नसल्याच्या कारणावरुन तत्कालीन उपायुक्त विजय खोराटे, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, शाखा अभियंता गोगांणे यांना कारणे दाखवा नोटीस काढली होती. दरम्यानच्या कालावधीत उपायुक्त खोराटे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत बदली झाली. पाइपलाइन योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी आयुक्त काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले होते.


कारवाईतून उपायुक्त निसटले

तत्कालीन उपायुक्त विजय खोराटे यांना थेट पाइपलाइन योजनेतील कामांच्या बिल मंजुरीचे अधिकार दिले होते. त्यांच्या कालावधीत कोट्यवधींची बिले मंजूर झाली. लोखंडी पुलाचे वाढीव बिल मंजुरीवर त्यांची सही असल्याने आयुक्तांनी नोटीस काढली होती. अंतिमतः जलअभियंत्यावर थेट कारवाई तर उपायुक्तांना सक्त ताकीद दिल्यामुळे खोराटे हे कारवाईतून निसटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.

पगाराला कात्री

दरम्यान, शनिवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीसाठी बोलाविलेल्या बैठकीलाच आठ अधिकाऱ्यांनी दांडी मारली. आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेत आठही अधिकाऱ्यांच्या शनिवारच्या अर्धा दिवसाच्या वेतनात कपात केली. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्यामुळे महापालिकेत खळबळ माजली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विष तस्करीप्रकरणी चौघांना कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

शुक्रवारी मध्यरात्री आजरा पोलिसांनी विष तस्करी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चौघांना शनिवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. माद्याळ (ता. आजरा) फाट्यावर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी तानाजी लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा-मेढेवाडी), अनिल शंकर कांबळे (३०, रा.बडस, बेळगाव), तौसिफ उर्फ समीर बाबाजान नासुर (२९, आमराई कॉलनी, फोंडा, पणजी) व रामचंद्र करू पाटील (म्हाळुंगे, ता.चंदगड, सध्या रा. आजरा) यांना अटक केली आहे.

शुक्रवारी रात्री हे चौघेजण सापाचे विष घेऊन विकण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याने दिली. त्यानुसार माद्याळ फाटा येथे सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांच्याकडे प्लास्टिक बाटलीत सापाचे विष आढळून आले. या विषाची बाजारपेठेत अंदाजे ३५ लाख रुपये आहे. हे विष देसाई नामक व्यक्तीस १२ लाख रुपयांना विकण्याचा या चौघांचा प्रयत्न होता. त्यानुसार दोन मोटार सायकलींवरून जात असलेल्या चौघांना मोटारसायकलीसमवेत ताब्यात घेण्यात आले. दरम्यान देसाई या व्यक्तीस ताब्यात घेण्यासाठी एक पथक पाठविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणातील पाटील हा सूत्रधार असून, यापूर्वी वर्षभरापूर्वी पुणे जिल्ह्यात घडलेल्या अशा प्रकरणातील आरोपी असल्याची माहितीही पुढे आली आहे. आजरा तालुका व परिसरात जंगल व दुर्मिळ सापांच्या जाती असल्याने पैसे मिळविण्याच्या हव्यासाने अशा प्रकारे विषाची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे धक्का मार आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पेट्रोल, डिझेल व गॅस दरात वाढ करुन जनतेच्या भावनेशी खेळ खेळणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने दुचाकी वाहनांना ढकलत नेत ‘धक्का मार आंदोलन’ करण्यात आले. काँग्रेस कमिटीपासून कॉ. मलाबादे चौकापर्यंत एका बैलगाडीत दुचाकी ठेवण्यात आली होती. दुचाकी, चारचाकी वाहने ढकलत नेण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवून जनतेच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आहे, या प्रवृत्तीच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे, इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीपासून मोर्चाला सुरुवात झाली. जयहिंद मंडळापासून मुख्य मार्गाने मोर्चा कॉ. मलाबादे चौकात आला. याठिकाणी ‘मोदी हटाव देश बचाव’, ‘चले जाव चले जाव’, ‘जनतेची फसवणूक करणार्‍या भाजपा सरकारचा धिक्कार असो’ आदी घोषणांनी चौक दणाणून सोडला.

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून मोदी सरकारने जनतेची शु्द्ध फसवणूक केली आहे. जनतेच्या नावाखाली भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे. जीवनावश्यक वस्तुच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुशिकलीचे केले आहे. शेजारील राज्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर अत्यंत कमी असताना महाराष्ट्रात ते अधिक आहेत. यातून केवळ सर्वसामान्यांना त्रास होत आहे. त्यामुळे महागाईने होरपळत असलेली जनता आता जनता सुज्ञ झाली असल्याचे प्रकाश मोरे यांनी सांगितले. नगरसेवक शशांक बावचकर व अहमद मुजावर यांनीही मोदी व भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. नोटाबंदी व जीएसटीच्या माध्यमातून देशाचा विकास होण्याच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली जात आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात विरोध करणार्‍या मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून आपलेच खरे म्हणण्यास सुरुवात केल्याचे सांगितले.

आंदोलनात महावीर कुरुंदवाडे, बाळासाहेब कलागते, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, महावीर केटकाळे, आनंदराव नेमिष्टे, सतीश कोष्टी, बंडोपंत लाड, चंद्रकांत पाटील, यांच्यासह शहर काँग्रेस कार्यकारीणी पदाधिकारी, सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, महिला, युवक तसेच विविध सेलचे प्रमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानीचे पेड दर्शन महागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळात पेड दर्शनाच्या दरात तिपटीने वाढ करण्यात आली असून दर्शनासाठी ३०० रुपये मोजावे लागणार आहेत. हा दर १०० रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानीचा नवरात्र उत्सव देशभरात महत्वाचा मानला जातो. या महोत्सवा दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश तेलंगणासह देशभरातील भाविक लाखोंच्या संख्यने उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुरात येत असतात. येथील दर्शनाचे व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी व व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानाने पेड दर्शनाचा निर्णय घेतला व यासाठी प्रति व्यक्ती १०० रुपये दराने आकारणी सुरू केली. या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले. यामुळे मंदिराचे उत्पन्न लाखो रुपयाने वाढले. मात्र, अवघ्या १ महिन्यात मंदिर संस्थानाने नवरात्र उत्सवाचे कारण दर्शवित पेड दर्शनाच्या दरात तिपटीने वाढ केली.

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात २१ सप्टेंबर रोजी घटस्थापना होत असून ही दरवाढ घटस्थापना ते अश्विन पौर्णिमा दरम्यान ६ ऑक्टोबर पर्यंत लागू असणार आहे. या काळात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पेड दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. विशेष म्हणजे पेड दर्शनाचे पास हे मंदिरापासून २ किलो मीटर लांब असलेल्या घाटशीळ येथील प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आले आहेत.

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पेड दर्शनाचा उपक्रम राबविताना शिर्डी व तिरुपती बालाजी या मंदिर संस्थांच्या धर्तीवर हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. तिरुपती असो की शिर्डी मंदिर भाविकांची कितीही गर्दी झाली किंवा विविध महोत्सवात पेड दर्शनासह इतर दर्शनाच्या दरात कसलीही वाढ केली जात नाही. मात्र, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मात्र नवरात्रात भाविकांची गर्दी जास्त असल्याचे कारण पुढे करीत ही दर वाढ केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images