Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. विकास होणार असल्याने रोजगार निर्मिती आणि उत्पन्न वाढीला हातभार लागणार असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. विधानसभेत आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर सुविधा उपलब्ध नसल्याचा प्रश्न विचारला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना पर्यटनमंत्री रावल म्हणाले, ‘पर्यटकांच्या २२ वर्दळीच्या ठिकाणी फलक आणि मनपा हद्दीत ३३१ माहिती फलक बसविले आहेत. जिल्ह्यातील पर्यटन, धार्मिक, ऐतिहासिक स्थळांसाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना विशेष निधी, प्रादेशिक पर्यटक विकास योजना, सामाजिक न्याय विभागातर्फे निधी उपलब्ध झाला आहे. पर्यटनासाठी ४ कोटी आणि इको टुरिझमसाठी अडीच कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. पन्हाळा येथे लाइट अॅण्ड साऊंड शो उभारणीसाठी आणि वनविभागातर्फे इको टुरिझमअंतर्गत साहसी पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.’

तांत्रिक आणि चालनीय अडचणींमुळे मुंबई-पुणे मार्गावर डबल डेकर बससेवा चालविणे शक्य नाही. एसटी महामंडळ आणि प्रवाशांच्यासाठी ही सुविधा गैरसोयीची ठरेल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत एका प्रश्नाला उत्तर दिले. आमदार सतेज पाटील यांनी मुंबई-पुणे मार्गावर डबलडेकर सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. परिवहनमंत्री रावते म्हणाले, राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे वातानुकूलित डबलडेकर बसेस सुरू करण्यासाठी मुंबई-पुणे या मार्गाची तपासणी करण्यात आली. मात्र या मार्गावर डबलडेकर चालविण्यास तांत्रिक आणि चालनिय अडचणी आहेत. त्यामुळे सुरू करता येणार नाही.

शिरोळ तालुक्यातील सर्व रूग्णालयात १८० संशयित कॅन्सरचे रूग्ण असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उत्तर दिले.

आमदार सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्यात रासायनिक औषधे आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे १८ हजार नागरिक कॅन्सरग्रस्त आहेत. महिलांत स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सरचे प्रमाण वाढले असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘संशयित रुग्णांपैकी ५० रुग्ण कर्नाटक राज्यातील आहेत. पैकी ३७ रुग्ण मुख कर्करोग, ३ रुग्ण स्तनाचा कर्करोग, ५ रूग्ण गर्भाशय मुख कर्करोगाचे आढळले आहेत. कॅन्सरच्या प्रमाणातही फारसी वाढ नाही. राज्यात तंबाखू मुक्तीसाठी २५ जिल्हा रूग्णालयांत तंबाखू मुक्ती केंद्र सुरू आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाजाचा दबावगट हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘लोकशाही ही केवळ औपचारिकता रहायची नसेल तर नागरिकांनी स्वतःच्या मुलभूत हक्कांबाबत बोलण्याची आवश्यकता आहे. याकरिता समाजाचा दबाव गट असला पाहिजे,’ असे प्रतिपादन अॅड. असिम सरोदे यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानात अॅड. सरोदे बोलत होते. ‘लोकशाही-औपचारिकताच रा​हील काय?’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी म्हैस व गाईच्या चांगल्या प्रतीचा दुधाचा पुरवठा करणाऱ्या १३ सर्वोत्कृष्ट दूध संस्थांचा सत्कार करण्यात आला.

‘दर पाच वर्षांनी होणारी निवडणूक हा लोकशाहीचा ​आविष्कार आहे’ असे सांगत अॅड. सरोदे म्हणाले, ‘या निवडणुकांमधून उमेदवार व राजकीय पक्ष नागरिकांकडे जाऊन मते मागतात. नागरिकही त्यांच्यावर विश्वास ठेवून निवडून देतात. यामुळेच लोकशाही जिवंत आहे. मात्र निवडून आल्यानंतर नागरिकांशी बांधिलकी ठेवण्याऐवजी उमेदवार राजकीय पक्षांशी ठेवली जात आहे. त्यामुळे पक्षांचे अवास्तव महत्व कमी होण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे लोकशाही आहे. नागरिकांना मतदानाचा पवित्र हक्क जरी मिळाला असला तरी मतदानाच्या बदल्यात पत मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांना हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो. मुलभूत हक्कांसाठी झगडावे लागते. त्यावर बोलण्याची आवश्यकता असून जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हे सदृढ लोकशाहीचे लक्षण होत नाही. यासाठी राज्यकर्ते व प्रशासन या दोन्ही यंत्रणांनी लोकाभिमुख कारभार करण्याची आवश्यकता आहे. तसेच राजकारणात चांगल्या नागरिकांनी येण्याची गरज आहे.’

‘केंद्र सरकारमध्ये बदल झाला. त्याचा नागरिकांवर काही फरक पडणार नाही’, असे सांगताना अॅड. सरोदे म्हणाले, ‘इकडचे काही लोक तिकडच्या फांदीवर जाऊन बसले असल्याने नागरिकांच्या दररोजच्या जगण्यात फरक पडणार नाही. नागरिकांना काय पाहिजे हे समजून घेऊन काम करण्याची सध्या गरज आहे.’

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यात आणखी स्पर्धक निर्माण झाले तरी गोकुळची वाटचाल दमदारच राहिल, असा विश्वास कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी व्यक्त केला. संचालक रवींद्र आपटे यांनी आभार मानले. व्यासपीठावर संचालक अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, दीपक पाटील, उदय पाटील, राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, सत्यजीत पाटील, अनुराधा पाटील, जयश्री पाटील, रामराजे कुपेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते अपघातांत मेंदुवरच होतोय आघात

$
0
0

Janhavi.Sarate@ timesgroup.com
Tweet : @MTjanhavisarate

कोल्हापूर : वाढती वाहनांची संख्या, वाहतुकीची कोंडी आणि वाहनांचे गती या कारणांमुळे वाढलेल्या रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांपैकी ६० टक्के रुग्णांना थेट मेंदूला दुखापत होत असल्याचे कोल्हापुरातील वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अपघातांची तिव्रता इतकी वाढली आहे की दररोज सुमारे १५ रुग्ण अपघातात जखमी होऊन मेंदूला इजा होते. त्यापैकी दोन व्यक्तींना आपला जीव गमावात लागत आहेत. हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर केला जात नसल्याने तरुणांमध्ये अपघाताचे प्रमाण धोकादायक स्थितीपर्यंत वाढले आहे.

जागतिक मेंदू दुखापत सप्ताहानिमित्त विविध कारणांनी होणाऱ्या मेंदूच्या गंभीर दुखापतींचे चित्र सामोरे आले आहे. मेंदूला इजा होण्याची अनेक कारणे आहेत. यात अपघात हे महत्वाचे कारण ठरत आहे. याशिवाय मेंदूत रक्तस्त्राव होणे, ट्युमर, पक्षाघात, मॅनिजायटिस, मेंदूला प्राणवायू कमी पडणे, दीर्घकाळ व्यसन, मारामारी, उंचीवरुन पडणे, स्मृतीभ्रंश अशीही अनेक कारणे आहेत. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृत अपेक्षित असून सुरक्षा बाळगणेही महत्वाचे असल्याचे दिसून येत आहे.

विन्स हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांच्या टीमने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील वाढत्या अपघातांतील ‌६० टक्के रुग्ण हे डोक्याला मार बसल्यामुळे मेंदूच्या दुखापतीने उपचारासाठी दाखल होत आहेत. जिल्ह्यात दररोज अपघातानंतर छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलसह जिल्हाभरातील खासगी, शासकीय हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी किमान २ लोकांचा बळी जात आहे. तर असंख्य रुग्णांना अपघातानंतर कायमस्वरूपी अंथरुणास खिळून रहावे लागत आहे.

वस्तूतः अपघातात जीव गमवावा लागू नये म्हणून काही सोपे उपायही महत्वाचे ठरतात. मोबाइलवर बोलत वाहन चालविणे, कार चालविताना सीट बेल्ट न वापरणे, वाहन चालविताना हेल्मेट न वापरणे यांसह स्पीडवर नियंत्रण नसणे ही कारणे या अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहेत. याशिवाय मद्याचे (अल्कोहोल) सेवन करून वाहन चालविणे टाळणेही महत्वाचे असल्याचा निष्कर्षही या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर

आठवड्यापूर्वी ताराबाई पार्कातील आदित्य कॉर्नर परिसरात मोटारसायकलवरून जाताना झालेल्या अपघातात मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्गात शिकणारा हेमंत इंगळे (नाव बदलले आहे) हा २१ वर्षीय तरुण जागीच बेशुद्ध पडला. त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मेंदूला मोठी इजा झाल्यामुळे बेशुद्ध पडलेला हेमंत गेल्या सहा दिवसांपासून अजून तो शुद्धीवर आलेला नाही. केवळ वाहन चालविताना योग्य काळजी न घेतल्यामुळे आज तो जीवन-मरणाच्या उंबठ्यावर आहे.


अलिकडच्या काळात मेंदुला इजा होण्याच्या घटनांमध्ये अपघात हे मुख्य कारण बनत आहे. अशा घटनांमध्ये साठ टक्के रुग्णांना मेंदूच्या इजेला सामोरे जावे लागते. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर रस्ते अपघातांमुळे दिवसाला १५ हून अधिक रुग्णांच्या मेंदूला इजा होते. केवळ हेल्मेट अथवा सीटबेल्ट न लावाल्यामुळे अनेकांना गंभीर शारिरीक इजेला सामोरे जावे लागले आहे. वाहतुकीच्या सुरक्षेच्या कारणाबाबत लोकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.

डॉ. संतोष प्रभू, न्यूरोसर्जन, विन्स हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिरोली’चा आदर्श घ्यावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

‘जिह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी यांनी आदर्श घ्यावा असे कर्तबगारी शिरोली एमआयडीसीचे पोलिस ठाण्याने दाखवली आहे’ असे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. शिरोली एमआयडीसीसह जिल्ह्यातील इतर तीन पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळाले. त्याच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलांतर्गत करवीर विभागातील शिरोली एमआयडीसी, गांधीनगर, गोकुळ शिरगाव व मुरगूड या पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळाले. प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या आवरात झाले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रातील पहिल्या दहा पोलिस ठाण्यात या शिरोलीच्या ठाण्याचा समावेश होईल. अद्ययावत तंत्रज्ञानाने नवनवीन कल्पना राबवित पोलिस ठाणी स्मार्ट बनवावे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘परिस्थिती बदलत आहे. देश बदलत आहे, तसे आम्हीही बदलू . म्ही आमचे कौशल्य वाढवू. कर्मचारी कमी आहेत, पण त्यांना ट्रेनिंग देऊन कौशल्य दाखवून चित्र बदलू. पोलिसांच्या निर्भया पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमची भूमिका ही कडक पित्याची आहे.’

जिल्हा अधिकारी अमित सैनी म्हणाले, ‘कोल्हापुरातील पॅटर्न वेगळा असतो. तो महाराष्टात स्वीकारला जातो. ज्या पद्धतीने शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे आयएसओ झाले, त्याच पद्धतीने सरकारचे निर्देश नसताना आम्ही कोल्हापुरातील एक तहसील कार्यालयाच्या आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न करीत आहोत. त्याचा आदर्श महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही घेतला जाईल.

जिल्हा पोलिसप्रमुख महादेव तांबडे म्हणाले, ‘प्रत्येक जिल्ह्यात २ पोलिस

ठाणी आधुनिक करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश होते. त्याप्रमाणे जिल्ह्यात चार पोलिस ठाणी आयएसओ मानांकन मिळतील अशी तयार करण्यात आली आहेत. परंतु जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांचे कार्यसेत्र मोठे आहे. लोकसंख्याही वाढली आहे.

त्यामुळे अधिक चांगली पोलिस सेवा देण्यासाठी दूरक्षेत्र, वाहने ,कर्मचारी यात वाढ होण्याची गरज आहे.’

अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे आदी उपस्थित होते. करवीर उपविभागाचे सहायक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्धार यांनी प्रास्ताविक केले. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे संजय साळुंखे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा फोटो काढताना दरीत पडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सज्जनगडावर पत्नीचा फोटो काढत असताना पाय घसरून दरीत पडल्याने धनंजय जाधव (३२, सातारा) यांचा मृत्यू झाला. अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.
धनंजय जाधव पत्नी नीलमबरोबर शुक्रवारी दुपारी दर्शनासाठी सज्जनगडावर गेले होते. मारुती मंदिराजवळ दोघेही विसावा घेण्यासाठी थांबले. या वेळी धनंजय जाधव फोटो काढत होते. फोटो काढत असताना दरीच्या दिशेने ते गेले. या वेळी त्यांचा पाय घसरून ते दरीत कोसळले. डोळ्यांसमोर पती दरीत खाली पडल्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. काही वेळानंतर त्या ठिकाणी काही ग्रामस्थ गेले. मात्र, पती दरीत पडल्याच्या धक्क्याने नीलम बेशुद्ध पडली होती.
त्यामुळे घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांना नेमकी घटना समजू शकली नाही. नीलम शुद्धीवर आल्यानंतर पती दरीत पडले असल्याचे तिने सांगितले. तोपर्यंत अंधार पडण्यास सुरुवात झाली होती.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शोधमोहीम सुरू केली. रात्री ११च्या सुमारास धनंजय जाधव यांना शोधण्यात यश आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा भाजपला पाठिंबाकॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या खेळीला अपयश; सांगलीत फुलणार कमळ

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जोरदार फिल्डिंग लावली होती. सर्वाधिक जागा मिळविलेल्या भाजपकडे रयत आघाडीसह २९ संख्याबळ झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोडे २८ सदस्यांवर अडले होते. दोघांनीही शिवसेनेच्या तीन सदस्यांवर डोळा ठेवला होता. सोमवारी रात्री उशिरा शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी सेनेच्या तीन सदस्यांचा पाठिंबा भाजपला असल्याचे जाहीर केले आणि सत्तास्थापनेतील खेळ्यांना पूर्णविराम मिळाला. अनिल बाबर सोमवारी सांगलीत होते. पण, कोणाला दिसत नव्हते. त्यांच्या निर्णयावर भाजपचे भवितव्य अवलंबून होते. तर दुसरीकडे भले अध्यक्षपद शिवसेनेला द्यायला लागले तर बेहत्तर पण सत्तेची खुर्ची सोडायची नाही, असा निर्धार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला होता.

जिल्हा परिषदेच्या निमित्ताने मिनी मंत्रालयाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज, (मंगळवारी) निवड होणार आहे. निवडीपूर्वी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असल्याने कोणत्या पक्षाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार याची उत्सुकता होती. भाजपकडून संग्रामसिंह देशमुख आणि डी. के. पाटील यांच्यात अध्यक्षपदांसाठी चुरस आहे. काँग्रेसकडून सत्यजित देशमुख तर सेनेच्या सुहास बाबर यांचेही नाव उशिराने अध्यक्षपदांसाठी पुढे होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी आज, मंगळवारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी विशेष सभा बोलाविली आहे. निवडीसाठी अवघे काही तास उरलेले असताना राजकीय घडामोडींचे वारे वेगाने वाहत आहे. जिल्हा परिषदेत भाजपकडे २५, राष्ट्रवादी १४, काँग्रेस १०, रयत विकास आघाडी चार, शिवसेना तीन, स्वाभिमानी विकास आघाडी दोन, अपक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येकी एक, असे बलाबल आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजप आहे. पण, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सहा सदस्यांची गरज होती. पहिल्या टप्प्यात त्यांनी रयत विकास आघाडीच्या चार सदस्यांचा पाठिंबा मिळविला आहे. त्यांना अद्याप तीन जागांची आवश्यकता होती. शिवसेनेने पाठिंबा जाहीर केल्याने सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार हे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे भाजपची विजयी घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले. सत्तेची समीकरणे जुळविण्यासाठी त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत खलबत्ते सुरू होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे २८ सदस्य संख्या असल्याचा दावा कदम यांनी केला आहे.

सेनेच्या हातात सत्तेच्या चाव्या

सत्तेसाठी भाजपला दोन तर काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेसाठी तीन सदस्यांची गरज होती. शिवसेनेकडे तीन सदस्य आहेत. सेनेचे आमदार बाबर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामध्ये काहींनी भाजप तर काही कार्यकत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाण्याबाबत मते मांडली. कार्यकर्त्यांमध्ये दुमत दिसून आले. त्यामुळे बाबर यांनी रात्री उशिरापर्यंत भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. सेनेची मते वळविण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बाबर यांच्याशी संपर्क साधला आहे. उपाध्यक्षपद देण्याची ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते कदम आणि जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी बाबर यांच्या संपर्कात होते.

कदम यांच्या अस्मिता बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंतरावांनी ठिय्या मारला होता. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणते डावपेच आखायचे या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सेनेला वळविण्यासाठी कदम बंधूंनी प्रयत्न करावेत, अशी विनंती जयंतरावांनी केली. मोहनराव कदम यांच्याकडून आमदार बाबर यांच्याशी संवाद साधला जात होता. परंतु, त्यांची भूमिका स्पष्ट नसल्याचे सांगण्यात आले. पंतगराव कदम, मोहनराव यांच्यासह आमदार सुमन पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलिप पाटील, सत्यजित देशमुख यांची बंद खोलीत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी शेवटच्या टप्प्यात सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली.


झेडपीतील बलाबल

भाजप २५

राष्ट्रवादी १४

काँग्रेस १०

रयत विकास आघाडी ४

शिवसेना-३

स्वाभिमानी आघाडी २

स्वाभिमानी संघटना १

अपक्ष १

एकूण ६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सातारा झेडपीचेअध्यक्ष संजीवराजे?

$
0
0



सातारा

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची रंगीत तालिम सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडले. दोन तासांच्या राजकीय खलबतानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले. उपाध्यक्ष निवडीसाठी पाटण तालुक्यातून माजी आमदार विक्रमसिह पाटणकर यांचे समर्थक राजेंद्र पवार व खटाव तालुक्यातून सुरेंद्र गुदगे यांच्या प्रत्येकी सव्वा वर्षे मुदत देण्याच्या चर्चा रंगल्या. या निवडी जवळपास निश्चित असून मंगळवारी प्रत्यक्ष सभेपूर्वी शरद पवार यांच्याकडून निवड जाहीर करणारा दूरध्वनी केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​प्रशासकांची नियुक्ती कराशेतकरी संघटनेची मागणी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘सांगलीचा वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखना सुमारे २७० कोटी रुपयांपेक्षा अधिक तोट्यात आल्याने पुरता डबघाईला

आला आहे. कामगारांच्या पगारापासून ते भविष्यनिर्वाह निधीपर्यंतच्या कोट्यवधीच्या रकमा थकीत आहेत. या पार्श्वभूमीवर कारखाना परस्पर मर्जीतील व्यक्तींना चालविण्यास देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. असे होऊ नये म्हणून कारखान्यावर प्रशासकांची नियुक्ती करावी आणि जाहीर निविदा काढूनच चालविण्यास द्यावा,’ अशी मागणी मुख्यमंत्री, सहकार मंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य प्रचार प्रमुख संजय कोले यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली.

संजय कोले आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे म्हणाले, ‘सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना चालविण्यास देण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. २००५-१०या कालावधीतील ३६ आणि २०१६मधील १० महिन्यांचा कामगारांचा पगार थकीत आहे. २०१३पासून कोणतीही पगारवाढ देण्यात आलेली नाही. २००२पासून आतापर्यंत१६९८ कामगार निवृत्त झाले आहेत. त्यांची ग्रॅच्युएटी आणि भविष्यनिर्वाह निधीची रक्कम आजअखेर दिली गेलेली नाही, अशाप्रकारे सुमारे ६० कोटी रुपयांची कामगारांची थकबाकी आहे. १५ फेब्रुवारीला कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी कामगारांना बोलावून घेऊन बैठक घेतली. कारखान्यांची अर्थिक स्थिती बिघडली आहे. पुरेसा ऊस न आल्याने कामगारांची देणी व पगार देता येत नाही. त्यामुळे कामगारांनी ले-ऑफ घ्यावा, असे अध्यक्षांनी कामगारांना सांगितले आहे. कामगारांना परस्पर सांगितले जात आहे, अशाच प्रकारे कारखानाही परस्पर चालविण्यास दिला गेला तर कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. यांची दखल घेऊन कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​एमआयएमचे तौफिक शेखवरस्थानबद्धतेची कारवाई

$
0
0



सोलापूर

सोलापुरातील एमआयएमचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सोमवारी केली. शेख याची रवानगी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

शेख याच्याविरुद्ध १९८९पासून फेब्रुवारी २०१७पर्यंत सोलापुरातील विविध पोलिस ठाण्यात विविध कालमांतर्गत एकूण २९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यातून तो निर्दोष मुक्त झाला आहे. त्याच्याविरुद्ध दोनवेळा फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई आणि चारवेळा महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून त्याने त्याच्या साथीदारांसह एमआयडीसी, सदर बझार, विजापूर नाका, जेलरोड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्रनिशी फिरून खुनाचा प्रयत्न करणे, हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, अपहरण, गैरमंडळी जमाव जमवून गैरकृत्य करणे, बेकायदा दुकान घरजागा बळकावविणे, लोकांना किरकोळ कारणावरून घातक शास्त्रनिशी मारहाण करून परिसरात दहशत निर्माण करणे आदी गुन्हे दाखल आहेत. या वरून पोलिसांनी तौफिक शेख याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. तौफिक शेख याने मागील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एमआयएमकडून निवडणूक लढविली होती. त्याला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्या निवडणुकीत शेख याने प्रणिती शिंदे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना नामोहरम केले होते. या शिवाय नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत तौफिक याच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे ९ नगरसेवकही निवडून आले आहेत. मनपा निवडणुकीत मतदानावेळी नई जिंदगी परिसरात राष्ट्रवादीचे माजी महापौर हरून सैय्यद याला तौफिक याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून रक्तबंबाळ केले होते, त्यावेळी त्याच्याविरुद्ध आणि त्याचा मुलगा अदनान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवस तौफिक फरार होता. मात्र पोलिस आयुक्त सेनगावकार यांनी अखेर तौफिकवर स्थाबद्धतेची कारवाई केली. तौफिक हा एकेकाळी सुशीलकुमार आणि कन्या आमदार प्रणिती यांचा कट्टर समर्थक होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात काँग्रेस किंगमेकर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आज, मंगळवारी दुपारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून, दोन्ही पदे आणि सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीने ताकद पणाला लावली आहे. भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. भाजपने आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. तर राष्ट्रवादीकडून शितलदेवी आणि स्वरूपराणी मोहिते-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. खासदार विजयसिह मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजितसिह मोहिते-पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. २३ जागा जिंकून राष्ट्रवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाचीच मदत घ्यावी लागणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीने २३, भाजप-शिवसेना आघाडी २२, काँग्रेस ७, स्थानिक आघाडी १०, शेकाप ३ आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. ६८ सदस्य संख्या असलेल्या झेडपीमध्ये सत्ता स्थापन कारण्यासाठी ३५ जागांची जुळवाजुळव करण्यासाठी खासदार विजयसिह मोहिते-पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शेकाप ३ आणि अपक्ष किवा स्थानिक विकास आघाडीतील काहींना बरोबर घेऊन राष्ट्रवादी सत्ता स्थापन करू शकते, असे चित्र असतानाच भाजपने झेडपी ताब्यात घेण्यासाठी संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. मोहिते-पाटील विरोधक आणि विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढाचे समाधान आवताडे यांनीही भाजप पुरस्कृत महाआघाडीचे संजय शिंदे यांना मदत करण्याची तयारी दर्शविली असल्याने यामध्ये त्यांना कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे २३ सदस्य निवडून आले आहेत, त्यामध्ये तब्बल ८ सदस्य एकट्या माळशिरस म्हणजेच मोहिते-पाटील यांच्या तालुक्यातील आहेत. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाचे म्हणजेच काँग्रेसचे सहाजण आणि आणखी एक असे सातजण ज्या पक्षाबरोबर जातात त्या पक्षाची सत्ता झेडपीत येणार आहे. त्यामुळे आमदार म्हेत्रे हे सत्तेचे किंगमेकर ठरू शकतात. आघाडी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. शरद पवार यांनी लक्ष घातल्यास आणि शिंदे यांना बोलल्यास आघाडीचा अध्यक्ष होऊ शकतो, असे चित्र आज दिसून येत आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शिवसेना ४, शेकाप ३ असे ३७ संख्याबळाची जुळवाजुळव राष्ट्रवादी आघाडीने केली आहे. तर भाजप १४, परिचारक गट ६, भीमा परिवार ३, आवताडे गट ४, अपक्ष २, शिवसेना १ अशी ३१ जणांची जुळवाजुळव भाजप आघाडीने केली आहे. सत्तेसाठी जवळपास सहा जागा कमी पडत असतानासुद्धा माढामधील ७ सदस्य यांना गैरहजर ठेऊन भाजप आघाडीने चमत्कार घडविण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच शेकाप आणि काँग्रेस तटस्थ राहिल्यास भाजपाला विजय आणखी सोपा करण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरु असल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. एकूणच सत्तेसाठीचा मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळ्याच्या थकबाकीचा भांडाफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या घरफाळा विभागातील अनागोंदी कारभारावरुन प्रशासनाला धारेवर धरताना नगरसेवकांनी घरफाळा विभागाची ७३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा भांडाफोड सभागृहात केला. घरफाळ्याच्या थकीत रकमेची वसुली करण्याऐवजी नागरिकांच्या माथ्यावर करवाढीचा बोजा लादण्याचा प्रकार अन्यायकारक असून तो सहन केला जाणार नाही. प्रशासनाने, आधी ​घरफाळा विभागाच्या कामकाजात सुधारणा करावी, वसुली मोहिम राबवावी आणि नंतर करवाढीबाबतचा प्रस्तावावर चर्चा अशी आक्रमक भूमिका सभागृहाने घेतली. विविध प्रभागाच्या नगरसेवकांनी घरफाळा लागू होण्यासाठी नागरिक कार्यालयाचे उंबरठे झिजवतात, पण प्रशासनाकडून आकारणी होत नसल्याचे आकडेवारीसह सभागृहाच्या निदर्शनास आणले. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, ‘घरफाळा विभागाचे कामकाज चिंताजनक आहे. विभागाची तब्बल ७३ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे. ४९ मिळकतधारकांकडे दहा लाखांपेक्षा जास्त थकबाकी असून त्याची एकूण रक्कम ९ कोटी रुपये आहे. एक हजार ते दहा हजार रुपयापर्यंतची थकबाकीची रक्कम चाळीस कोटीच्या घरात आहे. ८९७ मिळकतधारक हे एक ते पाच लाख रुपयापर्यंतची थकबाकीधारक असून त्यांच्याकडून १७ कोटी रुपये वसूल होऊ शकतात. ८६ मिळकतधारकांकडे पाच ते दहा लाख रुपयांची थकबाकी असून ही रक्कम पाच कोटी ९८ लाख इतकी आहे. मोठ्या प्रमाणातील थकबाकी वसुलीऐवजी प्रशासन उत्पन्नवाढीचा प्रस्ताव देत आहे. मात्र उत्पन्नवाढीसाठी करवाढ हे एकमेव माध्यम असू शकत नाही. प्रशासनाने प्रभावी वसुली मोहिम, नव्या मिळकतीचा शोध घेऊन घरफाळा आकारणी केली तर करवाढीची गरज नाही.’

काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी घरफाळा विभागातील अधिकारी कार्यक्षमतेने काम करत नाहीत. मिळकतधारकांशी संगनमत करुन घरफाळा लागू केला जात नाही. यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांच्या नाकतर्पेणामुळे शहरातील हजारो मिळकतींना घरफाळा लागू झाला नसल्याचे सांगत भ्रष्ट कर्मचाऱ्यांना चाप लावावा अशी सूचना केली.

नगरसेवक भूपाल शेटे, वहिदा सौदागर, उमा बनछोडे, प्रविण केसरकर, सूरमंजिली लाटकर, किरण नकाते, शेखर कुसाळे, पूजा नाईकनवरे यांनी घरफाळा आणि पाणीपट्टीचा विषय हा संवेदनशील आहे. घरफाळा आकारणीसाठी प्रत्येक प्रभागात कॅम्प लावा अशा सूचना केल्या.

महापालिकेच्या इमारतीत घोड्याचा तबेला

राजेंद्रनगर येथे एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमातंर्गत कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या इमारतीत अतिक्रमण झाले आहे. काही जणांनी येथे जबरदस्तीने जागा बळकाविल्या आहेत. महापालिकेच्या मालकीची इमारतीत घोड्याचा तबेला सुरु झाला आहे. या ठिकाणी अन​धिकृत व्यवसाय सुरु असून महापालिकेचे अ​धिकारी आणि कर्मचारी काय करत आहेत? असा सवाल नगरसेविका रुपाराणी निकम यांनी केला. प्रा. जयंत पाटील यांनी हा प्रश्न उचलून धरत अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांच्याकडे याप्रश्नी विचारणा केली. निकम व पाटील यांनी, संबंधितांवर आजच्या आज करावी या शब्दात खडसावले. प्रशासनाने तत्काळ हालचाली करत राजेंद्रनगरमधील त्या इमारतीची तपासणी सुरु केली. नगरसेवक मुरलीधर जाधव, विलास वास्कर यांनी राजारामपुरी पाण्याच्या टाकीजवळील इमारतीत गैरप्रकार सुरु आहेत, गांजा पार्टी चालते. कर्मचारी कारवाईस गेल्यावर त्यांना मारहाणीच्या घटना घडतात असे सांगितले. महापालिकेच्या इमारतीत अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने केली सहा कोटींची बचत

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या यंत्रणेतील त्रुटींमधील दोष काढून टाकल्यामुळे गेल्या तीन वर्षांत महापालिकेच्या खात्यात तब्बल सहा कोटी रुपयांची बचत झाली आहे. पाणी पुरवठ्यासाठी होणाऱ्या वीज खर्चावरील हा आर्थिक बोजा कमी करण्यास महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा हातभार लागला आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या पाण्याच्या लेखापरीक्षणामध्ये शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा सदोष असल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये टाक्यांमध्ये पाणी चढवण्यासाठी वापरले जाणारे पंप, पाणी उपसा केंद्र, पाणी शुद्धीकरण यंत्रणेतील उपकरणांमध्ये त्रुटी असल्याचेही नमूद करण्यात आले होते. तसेच त्याच्या दुरूस्तीसाठी उपाय सुचवले होते. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या दिनक्रमात पाण्याचा पुरवठा करत असताना यंत्रणेतील त्रुटींचाही त्रास होत होता.

पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता आर. बी. गायकवाड यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि शहरातील सदोष पंपांचा अभ्यास केला. त्यानुसार कोणते पंप आयुष्यमान संपलेले आहेत, कोणत्या पंपांमध्ये त्रुटी आहेत, कोणत्या पंपांची क्षमता कमी झाली आहे याची माहिती संकलित करून त्यानुसार बदलाची प्रक्रिया सुरू केली. ऊर्जा संवर्धन योजनेतंर्गत राबवण्यात आलेल्या या मोहिमेतंर्गत ही बचत झाली आहे.

शहर पाणीपुरवठा विभागाच्या एकूण खर्चाच्या ४० ते ४५ टक्के खर्च हा वीजबिलावर होतो. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठीच्या यंत्रणेतील त्रुटी दूर केल्यास हा खर्च कमी होईल यादृष्टीने ही मोहीम राबवण्यात आली. शहरात अनेक पंप त्यांची कार्यक्षमता पूर्णपणे संपलेल्या अवस्थेत होते. असे पंप असलेल्या भागातील पाणीपुरवठा करताना इतर पंपांवर ताण आल्यामुळे विजेचा अतिरिक्त वापर वाढला होता. त्यामुळे ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर पॅनल उभारणे, कार्यक्षमता कमी झालेली मशीनरी दुरूस्त करणे गरजेचे होते. यामध्ये बालिंग अशुद्ध जल उपसा केंद्र आणि बालिंगा शुद्ध जल उपसा केंद्र, नागदेववाडी अशुद्ध जल उपसा केंद्र, आपटेनगर पंपींग स्टेशन, दसरा चौक पंपहाऊस येथील त्रुटी दुरूस्त केल्यानंतर वीजबिलात एकावेळी पूर्वीच्या बिलापेक्षा सात टक्क्यांनी कपात झाली.

कळंबा जल उपसा केंद्र, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्र, बावडा सुवेज ट्रीटमेंट, आपटेनगर नवीन पंपींग स्टेशन येथील अकार्यक्षम उपकरणांमध्ये दुरूस्ती व त्रुटी दूर केल्यानंतर गेल्या पाच वर्षात तीन लाख रूपयांची वीज बचत झाली आहे.

अशी केली बचत

बालिंगा येथील लो लेव्हल्स पंपींग चालू असताना चॅनल व भिंतीतून लिकेजमधून पाणी वाया जात असल्याने विजेच्या खर्चात वाढ होत होती. त्यामुळे बालिंगा रॉ वॉटर बंद करून वीजबचत करण्यात आली.

नागदेववाडी जॅकवेलमध्ये नवीन पंप बसवण्यात आला. बालिंगा येथे ११३५ किलोवॅट मशिनरी नियमितपणे सुरू ठेवावी लागते. यासाठी पॉवर फॅक्टरमध्ये सुधारणा केल्यामुळे अतिरिक्त वाया जाणाऱ्या विजेत गेल्या पाच वर्षांत ११ लाख रूपये महापालिकेला वाचवता येणे शक्य झाले. शिंगणापूर बंधाऱ्याचा अधिकाधिक वापर करून लो लेव्हल पंप बंद ठेवल्यामुळेही विजेवर येणारा ताण कमी झाला. व्हर्टिकल व सॅट्रीफ्युगल पंपांचे स्टेनर वेळोवेळी साफ केले जात नव्हते. त्याची सफाई नियमित केल्यानंतर त्याची कार्यक्षमता वाढल्याचे दिसून आले. जॅकवेल आणि शुद्ध जल पंपातील गाळ काढल्याने पुरेशी खोली मिळाली. याचाही परिणाम तीन लाख रूपयांच्या वीजबचतीत झाला आहे. बालिंगा येथील फिल्टर प्लांटला ५० वर्षे उलटून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. ही गळती काढल्यानंतर उपसा कमी वीज खर्चात अधिक क्षमतेने होत आहे.


पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विजेचा वापर अनिवार्य आहे. मात्र यंत्रणेतील दोषांमुळे वीज वापर वाढला होता. मशीनरी आणि पंप, फिल्टर व्हॉल्व्हमधील बदल, दुरूस्ती आणि जे पूर्णपणे अकार्यक्षम होते ते नवीन बसवणे यासाठी पुढाकार घेतल्याने अतिरिक्त खर्च वाचला. नादुरूस्त यंत्रणेमुळे विजेचा खर्च वाढत होता आणि गळतीमुळे पाणी वाया जात होते. दुरूस्ती व बदलामुळे महापालिकेला सहा कोटींचा फायदा झाला आहे.

आर. बी. गायकवाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत फूट, अध्यक्षपदासाठी चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कुणाला पाठिंबा द्यायचा, यावरुन गेले अने‌क दिवस चर्चा होऊनही शिवसेनेत सोमवारी अखेर फूट पडली. सेनेत उभी फूट पडल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अपेक्षेप्रमाणे ‌शिवसेनेच्या संजय मंडलिकांसह आमदार उल्हास पाटील, सत्यजित पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. तर आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर आणि संजय घाटगे गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही गटाकडे प्रत्येकी पाच सदस्य आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे. मंगळवारी (ता. २१) दुपारी तीन वाजता अध्यक्षपदाची निवड होणार आहे.

माजी मंत्री प्रकाश आवाडे, स्वाभिमानी संघटना आणि सेनेच्या पाच सदस्यांमुळे भाजपचे पारडे जड झाले असले तरीही आवाडे आणि नरकेंना सोबत ठेवण्यासाठी प्रसंगी उमेदवार बदलण्याची तयारी काँग्रेसने दाख‍विली तर ऐनवेळी काहीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिवसभर सत्तेचे पारडे दोलायमान राहिले. शेवटच्या क्षणापर्यंत संख्याबळ बदलण्याची चिन्हे आहेत.

जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने ३८ तर काँग्रेसने ३५ संख्याबळाचा दावा केला आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून राहुल पाटील आणि भाजपकडून शौमिका महाडिक यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. सोमवारी दिवसभर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, सुरेश हाळणवकर, विनय कोरे भाजपसाठी फिल्डिंग लावत होते. रेसिडन्सी क्लबमध्ये दिवसभर ठाण मांडून नेत्यांनी भाजपचे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केला. दुसरीकडे आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी सूत्रे हलविली. शिवसेनेचा निर्णय काय होतो, याबाबत उत्सुकता होती. सायंकाळी पाच वाजता सेनेने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. पण तत्पूर्वीच सेनेचे आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर यांनी भाजपला जवळ केले होते. याची कल्पना असलेल्या संपर्कप्रमुखांनी सायंकाळनंतर कोल्हापूर सोडले.

शिवसेनेचे पाच सदस्य काँग्रेससोबत असले तरी अन्य पाचजण भाजपसोबत गेल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या. सेना फुटल्यानंतर आवाडे आणि स्वाभिमानीला सोबत घेण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू झाले. आवाडेंना गाठण्यासाठी दोन्हीकडून फिल्डिंग लावण्यात आली. आवाडेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. आवाडेंच्या निर्णयाने सत्तेचे पारडे फिरले. यामुळे आमदार मुश्रीफ यांनी सक्रिय होत आवाडेंची मनधरणी सुरू केली. त्यासाठी रात्री त्यांनी इचलकरंजीही गाठली. खासदार राजू शेट्टी परगावी आहेत. त्यांनी अजूनही निर्णय जाहीर केला नाही. मात्र त्यांचे दोन सदस्य भाजपसोबत राहतील, अशी माहिती आवाडे यांनी दिली. अपक्ष रसिका पाटील याही भाजपसोबत असल्याने या आघाडीचे पारडे जड झाले. तरीही काँग्रेसचा उमेदवार बदलल्यास हे पारडे ऐनवेळी फिरण्याची शक्यता आहे. कारण राहुल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करून नरके, आवाडे भाजपसोबत गेले. उमेदवारी बदलल्यास ते काँग्रेससोबत येण्याची चिन्हे आहेत. यामुळे मंगळवारी दुपारपर्यंत अध्यक्षपदाची अनिश्चितच कायम आहे.

०००

............

भाजपचे पारडे जड ः कमळ फुलण्याची शक्यता

कोल्हापूर ः भाजपने ३८ संख्याबळ असल्याचा दावा केला असला तरी साधारणतः ३६ सदस्य या आघाडीकडे असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यात भाजप १४, जनसुराज्य ६, शिवसेना ५, स्वाभिमानी २, कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी २, चंदगड विकास आघाडीचे २ सदस्य आहेत. एका अपक्षही गळाला लागला आहे. यामुळे रात्री भाजपचे पारडे जड झाल्याने शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र काँग्रेसकडे असलेले संख्याबळ रात्री ३२ पर्यंत खाली आले. आवाडे, स्वाभिमानी आणि शाहू आघाडीच्या एका सदस्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ घटले. उमेदवार बदलूनही काही फरक पडेल का, याची चाचपणी रात्री काँग्रेसने सुरू केली. मात्र तोपर्यंत हातातील मतेच भाजपकडे गेल्याने काँग्रेसच्या प्रयत्नावर मर्यादा येणार आहेत.

सत्तेचे किंगमेकर

दोन्ही काँग्रेसकडे २५ तर भाजपकडे हक्काची २३ मते आहेत. अध्यक्षपदासाठी उर्वरित सदस्य मिळवण्यासाठी दोन्हीकडून दिवसभर प्रचंड घडामोडी घडल्या. तासातासाला संख्याबळ बदलत होते. त्यामुळे सत्तेचे पारडे फिरत होते. ते फिरवण्यात शिवसेना, कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी, स्वाभिमानी आघाडीवर होते. त्यांची भूमिका सतत बदलत होती. सत्तेच्या बाजूने राहण्याचा त्यांचा आग्रहच वातावरण बदलवत होता. सायंकाळनंतर आवाडेंचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला आणि भाजपचे पारडे जड झाले. कारण आमदार नरके गटाचे तीन सदस्य भाजपला मदत करणार हे निश्चित होते. अपक्ष रसिका पाटील या व्ही. बी. पाटील यांच्या सून आहेत. ‘व्हीबीं’चा दोन्ही काँग्रेसवर राग आहे. ताराराणी आघाडीचे दोन सदस्य फोडण्यात काँग्रेसला यश आले होते. पण, रात्री उशिरा त्यांना पुन्हा तंबूत आणण्यात भाजपला यश आल्याचा दावा करण्यात आला.

ती​न वाजेपर्यंत बदलत राहणार

मंगळवारी दुपारी तीन वाजता अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तासातासाला पारडे बदलत जाण्याची शक्यता आहे. काहीही करून सत्ता आणण्याचे दोन्हीकडून प्रयत्न सुरू आहेत. राहुल पाटील यांची उमेदवारी काँग्रेसला अडचणीची ठरत आहे. कारण त्यांच्या उमेदवारीला विरोध करत आवाडे व नरके भाजपसोबत जात आहेत. ऐनवेळी उमेदवारी बदलल्यास नरके भूमिका बदलू शकतात. खासदार शेट्टी यांचा भाजपवर राग आहे. पण, आमदार उल्हास पाटील काँग्रेससोबत गेल्याने ते भाजपबरोबर राहण्याची चिन्हे आहेत. मात्र तेही शेवटच्याक्षणी काहीही आदेश देऊ शकतात. यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत सत्तेचे पारडे फिरत राहण्याची चिन्हे आहेत.

..........

आवाडेंना उपाध्यक्षपद

भाजपला मदत करण्याची भूमिका घेणाऱ्या आवाडे गटाला उपाध्यक्षपद देण्यात येणार असल्याचे समजते. यामुळे जनसुराज्यला सभापतिपद मिळेल, असे कळते. सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरल्यास पुढीलवेळी जनसुराज्यला हे पद देण्याबाबत चर्चा झाली.

नेत्यांची घालमेल

क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या संख्याबळामुळे दिवसभर अनेक नेत्यांची घालमेल होत होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, पी. एन. पाटील, सतेज पाटील, हसन मुश्रीफ हे दिवसभर या प्रक्रियेत होते. चर्चेचे ठिकाण बदलत होते. नेते बदलत होते. निर्णय होत नसल्याने अस्वस्थता वाढत होती.

हालचालीचे केंद्र

ताराबाई पार्कातील आमदार हसन मुश्रीफ यांचे घर, कोल्हापुरातील प्रकाश आवाडे यांचे घर, रेसिडन्सी क्लब (भाजप), अजिंक्यतारा (काँग्रेस) या ठिकाणी दिवसभर बैठकांच्या फेऱ्या होत राहिल्या. नेत्यांच्या बैठकांत काय निर्णय होतो, याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खलबते, नाराजी आणि दावे-प्रतिदावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सोमवारी दिवसभर दोन्ही काँग्रेस, शिवसेना, भाजपप्रणित आघाडीच्या बैठकीत खलबते झाली. दोन्ही पक्ष ३४ प्लस संख्याबळ आपल्याकडेच असल्याचा दावा केला जात आहे. दिवसभर राजकीय घडामोंडीना वेग आला. काँग्रेसची रात्री उशीरा एका खासगी हॉटेलमध्ये बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार हसन मुश्रीफ यांची ताराबाई पार्कातील निवासस्थानी बैठक झाली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन सत्तेच्या काठापर्यंत पोहोचल्याचा दावा केला. अखेर सायंकाळी शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या त्रासाला कंटाळून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर यांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याने शिवसेनेत फूट पडली. सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेस आणि भाजपप्रणित आघाडीने दावा केला आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी सोमवारी सकाळपासून राजकीय घडामोडींना अधिक वेग आला. रविवारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आमदार चंद्रदीप नरके यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शिवसेनेत फूट पडल्याने अखेर चंद्रदीप नरके यांनी भाजपकडे धाव घेतली. काँग्रेसला शिवसेनेच्या पाच सदस्यांनी पाठिंबा दिला. त्याबाबत दिवसभर कावळा नाका येथील हॉटेलमध्ये संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या सदस्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले. चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर यांनी संपर्कप्रमुखांची भेट घेतली. मात्र ठोस तोडगा निघाला नाही. सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिवसेनेने जाहीर केला नाही. संपर्कप्रमुख रवाना झाल्यानंतरच सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी दोन्ही काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील,आमदार महादेवराव महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक यांनी बैठक घेऊन ३४ प्लस संख्याबळ असल्याचा दावा केला. आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार सुजित मिणचेकर आणि कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीचे प्रकाश आवाडे यांच्यासोबत चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर आदी उपस्थित होते.


आज अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड

निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही काँग्रेस आणि भाजपप्रणित आघाडीकडून सत्तेसाठी दावा केला जात आहे. नव्या सभागृहाची पहिली सभा मंगळवारी (ता. २१) होत आहेत. ११ ते १ या वेळेत पदासाठी अर्ज भरले जाणार आहेत. दुपारी तीननंतर दुपारी तीन वाजता बैठक होईल. सहलीवर गेलेल्या सदस्यांना मंगळवारी सकाळी कोल्हापुरात आणले जाणार आहे. काही सदस्य कोल्हापुरात आले आहेत. दोन्ही काँग्रेससह आघाडीला पाठिंबा दिलेल्या सदस्यांना पक्षाचा आदेश (व्हीप) रात्री बजाविण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्हीप बजावला आहे. या आघाडीला पाठिंबा दिलेल्या सदस्यांची एकत्रित आघाडी करून त्यांनाही गटनेत्यांद्वारे व्हीप लागू केला आहे.

नरके, मिणचेकरांची दांडी

हॉटेल अयोध्या येथे दिवसभर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासोबत चर्चा झाली. आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर यांनीही संपर्कप्रमुखांची भेट घेतली. मात्र सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेला दुधडवकर यांच्यासह आमदार नरके, मिणचेकर उपस्थित नव्हते. दुपारनंतरच या बैठकीतून उठून नरके पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेले. मात्र परिषदेत शिवसेनेचे दहा सदस्यांचा दोन्ही काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.


‘भाजपला कंटाळूनच दोन्ही काँग्रेससोबत’

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसला पाठिंबा देण्याचा आदेश मातोश्रीवरून आला आहे. त्यानुसार शिवसेनेचे दहा सदस्य काँग्रेससोबत राहणार आहेत. आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर आणि संजय घाटगे यांनी संपर्कप्रमुखांची सकाळी भेट घेतली आहे. मातोश्रीवरून आलेला आदेश शक्यतो सदस्यांना टाळता येत नाही. त्यामुळे हे सदस्य शिवसेनेसोबतच राहतील. भाजपपेक्षा दोन्ही काँग्रेस जवळच आहेत. कारण भाजपने सोयीनुसार शिवसेनेला विचारले आहे. निवडणुकीनंतर शिवसेनेसोबत लगेचच चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र त्यांना अन्य पक्ष आणि आघाडी जवळच्या वाटल्या. त्यामुळे स्थानिक राजकारणात भाजप हाच जवळचा शत्रू असल्याने दोन्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत सदस्यांनी दगाफटका केल्यास पक्ष नियमानुसार कारवाई करणार आहे. यावेळी आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सत्यजित पाटील, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव यांच्यासह शिवसेनेचे सदस्य आकांक्षा पाटील, स्वाती सासने, शिवाजी भोसले, हंबीरराव पाटील, अरूण जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठिंब्यावरून सेनेत फूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाठिंबा द्यायचा कुणाला याबाबत शिवसेना नेत्यांनी पक्ष आणि सदस्यांच्या फायद्यापेक्षा स्वत:च्या राजकारणाची काळजी केल्याने अखेर लढाईपूर्वीच सेनेचा धणुष्यबाण मोडला. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत सेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे या फुटीचा फायदा दोन्ही काँग्रेसला होणार की भाजपला हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही काँग्र्रेसने आघाडी केली. पण आघाडीनंतरही सत्तेपर्यंत त्यांचे संख्याबळ जात नाही. भाजप, ताराराणी आघाडी व जनसुराज्य आघाडीचीदेखील तीच अवस्था आहे. यामुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसने प्रयत्न सुरू केले. सेनेचे दहा सदस्य ज्यांच्याकडे त्यांची सत्ता निश्च‌ित होती. पण अपेक्षेप्रमाणे सेनेत उभी फूट पडली आहे. कारण मातोश्री वरून दोन्ही काँग्रेससोबत जाण्याचा आदेश आला आहे. पण तसा व्हीप जारी करण्यात येणार नाही. याचा अर्थ सोयीने ​मतदान करा असाच अप्रत्यक्ष आदेश आला आहे.

भाजपला मदत करण्यात प्रा. संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर गटाचा विरोध आहे. मंडलिकांनी आमदार हसन मुश्रीफांबरोबर आघाडी केली आहे. शाहूवाडीतील सेनेचे सदस्यही काँग्रेस सोबत आहेत. मात्र आमदार चंद्रदीप नरके यांचा याला विरोध होता. कारण पी. एन. पाटील यांच्या मुलाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीस नरके यांनी उघड विरोध केला. उमेदवार बदलणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत अशी अट घातल्याने फुटीला सुरूवात झाली. संजय घाटगे यांना डावलून कागलमध्ये मंडलिक व मुश्रीफ युती झाल्याने घाटगे यांनी भाजपला पसंती दिली. आमदार सुजित मिणचेकर शेवटच्या क्षणापर्यंत तळ्यात मळ्यात राहण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येक नेत्यांनी पक्षापेक्षा राजकीय सोय पाहिल्याने अखेर सेनेत उभी फूट पडणार हे निश्च‌ित आहे.

या फुटीमुळे काँग्रेसकडे पाच व भाजपकडे पाच अशी विभागणी झाली आहे. आमदार आबिटकर गट काँग्रेस सोबत असणार आहे. यामुळे सात पाच अशी विभागणी होणार हे जवळजवळ निश्च‌ित आहे. हा पक्ष एकसंघ राहिला असता तर त्यांना एका वर्षासाठी अध्यक्षपद देखील मिळाले असते. उपाध्यक्षासह सभापती पदावर त्यांना दावा करता आला असता. पण आता मात्र फुटीमुळे सेनेच्या पदरात फारसे काही पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यांच्या फुटीचा फायदा काँग्रेसला होणार की भाजपला हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पी.एन, सतेज यांना धडा शिकवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आवाडे गट काँग्रेस सोबत एकनिष्ठ असतानाही जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील हे सतत आमच्यावर अन्यायच करत आहेत, सतेज पाटील माझ्यामुळे आमदार झाले, मात्र नंतर मला जिल्हाध्यक्ष करताना ते उलटले, असा थेट आरोप प्रकाश आवाडे यांनी सोमवारी केला. माझ्यावर अन्याय करणाऱ्या या नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच आवाडे गट भाजपसोबत जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आवाडे यांच्या मुलास काँग्रेसची उमेदवारी न दिल्याने त्यांनी कोल्हापूर जिल्हा ताराराराणी आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. दोन जागा निवडून आल्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांना महत्त्व आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी भा​जपला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, कल्लाप्पाणा आवाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होताना पी. एन. पाटील यांनी विरोध केला. मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. काँग्रसमध्ये सतत आवाडे गटाला संपविण्याचे काम ते करत आहेत. राहुल आवाडेंना पक्षाची उमेदवारी मिळू नये म्हणून जयवंतराव आवळे व पी. एन. पाटील आघाडीवर होते. विधानपरिषद निवडणुकीत सतेज पाटील यांना मदत केली. आमच्या ३३ मतांमुळेच ते आमदार झाले. पण त्यांनी नंतर आमचे उपकार विसरले. जिल्हाध्यक्ष होण्यास विरोध सुरू केला. दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही.’

ते पुढे म्हणाले,‘ महाडिक यांची आमदारकी माझ्यामुळे गेली. आता माझ्या मदतीनेच त्यांच्या घरात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जाईल. माझ्यावर अन्याय करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे आपण त्यांना धडा शिकवू,’ असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते सुरक्षेबाबत प्रबोधनाची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासन ‌विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असते. त्याला सामाजिक प्रबोधनाचीही जोड दिली तर हे अपघाताचे प्रमाण नियंत्रणात राहील,’ असे मत विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.

शाहू स्मारक भवन येथे जागतिक मेंदू दुखापत सप्ताहानिमित्त विन्स हॉस्पिटलच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण हेंद्रे व डॉ. सुजाता प्रभू प्रमुख उपस्थित होते. यावेळी अपघात आणि मेंदूला होणारी दुखापत याविषयी डॉ. संतोष प्रभू यांनी स्लाइड शोद्वारे मार्गदर्शन केले.

नांगरे-पाटील म्हणाले, ‘रस्ते अपघातात ६० टक्के लोकांना मेंदूला दुखापत होते, असे दिसून आले आहे. पाच जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अपघातात २९०० लोकांचा मृत्यू झाला आहे. रोज १० लोक मृत्युमुखी पडत आहेत. केवळ योग्य काळजी न घेतल्यामुळे संबंधितांचे कुटुंबच उद्ध्वस्थ होते. रस्ते अपघाताचे हे प्रमाण कमी होण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. मात्र लोकांनीच सजगपणे नियमांचे पालन केल्यास अपघात होणार नाही. युवकांनी जागृत राहून कायद्याचे पालन करावे.’

डॉ. सैनी म्हणाले, ‘वाहन चालविताना हेल्मेट, सीटबेल्ट आवश्यकच आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव स्वतः घेतला आहे. तरुणांनी याबाबत प्रबोधन करुन सजगपणे जीवन जगण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.’

डॉ. हेंद्रे यांनीही मार्गदर्शन केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दीत टाइम्स प्रॉपर्टी शोची सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टाइम्स प्रॉपर्टी शो मध्ये ग्राहकांनी दाखवलेल्या उदंड प्रतिसादामुळे नोटाबंदीनंतर बाजारपेठ पुन्हा सावरून उसळी मारण्याच्या अवस्थेत पोचला असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. शेवटच्या दिवशी कुटुंबीयांसह ग्राहकांनी टाइम्स प्रापर्टी शो ला भेट देऊन फ्लॅट, बंगले खरेदीसाठी पसंती दर्शवली. महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडियांच्या यांच्यातीने प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये बांधकाम क्षेत्रातील नवीन साईटस, नवे तंत्रज्ञान, कल्पना ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी एकाच छताखाली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तीन दिवसांत ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांनी दिली.

प्रदर्शनात २५ बांधकाम व्यावसायिकांनी आकर्षक स्टॉल मांडले होते. तसेच यावेळी फ्लॅट व बंगल्याची थेट रक्कम प्रेझेंटेशेनमध्ये दाखवण्यात आली होती. रविवारच्या हाऊसफुल्ल गर्दीनंतर सोमवारी ग्राहकांची पावले प्रॉपर्टी शोकडे वळली. युवा पिढीही घर खरेदीसाठी उत्सुक दिसत होती. बांधकाम व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहिती पत्रकाची माहिती घेऊन शंकांचे समाधान करून घेत होती. प्रकल्पामध्ये कोणत्या सुविधा आहेत, कोणत्या भागात आहेत, त्याचे दर किती आहे याची माहिती घेऊन अनेकांनी प्रत्यक्ष साईटवर भेटी दाखवण्यास उत्सुकता दाखवली. सायंकाळनंतर ग्राहकांच्या गर्दीने हॉल फुलून गेला होता. सेंकड होमची संकल्पनाही ग्राहक समजून घेत होते.

रंकाळा, मुक्त सैनिक वसाहत, कदमवाडी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रुईकर कॉलनी, उजळाईवाडी, कदमवाडी, कसबा बावडा, जरगनगर, मोहिते पार्क, कळंबा, हनुमानगर, आर.के. नगर, सीबीएस, शिवाजी पार्क, राजोपाध्येनगर, संभाजीनगर येथील प्रकल्पाची माहिती एके ठिकाणी मिळाल्याने ग्राहकांतून समाधान व्यक्त होते. खरेदी करताना कर्जांची माहिती घेण्यासाठी ग्राहकांकडून बँकांच्या स्टॉलकडेही विचारणा झाली. गृह प्रकल्पाची माहिती घेताना काही ग्राहकांनी गुढी पाडवा व अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करण्यासंदर्भात खरेदी विक्री व्यवहाराची माहितीही घेतली.



सलग तीन दिवस ग्राहकांकडून घर खरेदीबाबत विचारणा झाली. तसेच बांधकामसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची माहितीही ग्राहक घेत होते. चोखंदळ ग्राहकांकडून विचारणा होऊन बुकींगसाठी रुची दाखवली. नोटबंदीनंतर ग्राहक खरेदीसाठी पुढे येत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे.

अद्व‌ित ​दीक्षित, तक्षशीला सीबीएस प्रकल्प



कर्जासंबधी ग्राहकांकडून विचारणा झाली. गृहकर्जावरील व्याजांची माहिती ग्राहकांनी घेतली. बहुतांशी ग्राहक गांभीर्याने घर खरेदीचा विचार करत आहेत हे लक्षात आले. ग्राहकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे नोटबंदीनंतर गृहकर्जाला मागणी वाढण्याची शक्यता आहे.

पवन मुंगळे, प्रतिनिधी, कॅनरा बँक



मटा व टाइम्सच्या प्रत्येक टाइम्स प्रापर्टी शो मध्ये आम्ही सहभागी होतो. सर्वात महत्त्वाचे प्रत्येक प्रापर्टी शो मध्ये आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी ज्यांना घरात गुंतवणूक करायची आहे व ज्यांना स्वतः च्या नवीन घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, अशा ग्राहकांकडून चौकशी झाली आहे. सध्या फ्लॅट व बंगले घेण्याची हीच योग्य वेळ असून ग्राहक योग्य वेळ साधत आहेत.

अनंत शहा, आनंद प्रास्पेरा, रंकाळा

सेंकड होमची कल्पना लोकांच्या रुजू लागली आहे. आमच्याकडे सर्व स्थरातील ग्राहकांनी सेंकड होमसाठी विचारणा केली. सर्वसामान्यांच्या आवाक्यात सेकंड होम खरेदी करण्याची इच्छा साकारण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे.

अभिजित पाटील, हाऊसओर्ट सिलिनो



गेले तीन दिवस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. दोन दिवस टाइम्स प्रॉपर्टी शो ला भेट देऊन ग्राहकांनी साईटलाही भेट दिल्या आहेत. टाईम्स प्रापर्टी शो थेट ग्राहकांच्यापर्यंत बांधकाम प्रोजेक्ट पोहचवण्यात यशस्वी ठरला आहे.

विकेश ओसवाल, रामसिना ग्रुप



प्रदर्शनात भेट देणाऱ्या ग्राहकांमध्ये फ्लॅट, बंगल्याबरोबर कमर्शिअल गाळ्यांसाठी चौकशी झाली. ग्राहकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लोकेशनवर भर होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रदर्शनाला भेट देणारा ग्राहक हा क्वालिटी क्लायंट होता.

प्रसाद जगताप, वेस्ट‌िन इन्फ्रा



महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडियाचा प्रॉपर्टी शो हा नेहमीचा नियोजनाच्यादृष्टीने उजवा ठरतो आहे. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून साईट व्ह‌िजीट होऊ लागल्या आहेत. नोटबंदीनंतर बांधकाम व्यावसायिकांच्यादृष्टीने चांगला सीझन ठरणार आहे.

संजय शिंदे, ज्योतिरादित्य इस्टेट डेव्हलपर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक पिशवीमुक्त शहरासाठी सरसावले नगरसेवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्लास्टिक पिशवीच्या वापरावर जुजबी बंधने आणण्याऐवजी प्रशासनाने कोल्हापूर शहराच्या पर्यावरणाचा सर्वंकष विचार करुन प्लास्टिक पिशवीमुक्त शहर ही संकल्पना राबवावी. सर्वच प्रकारच्या प्लास्टिक पिशवीवर निर्बंध आणावेत. प्रशासनाने पर्यावरणपूर वातावरणासाठी पाऊल टाकावे, सभागृह त्यांच्या सोबत आहे असा आश्वासक सूर सभागृहात उमटला.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकानदारांना दरमहा चार हजार रुपये शुल्क आकारणीचा प्रस्ताव सभागृहात जाहीर केला. यावरुन सभागृह आणि अधिकाऱ्यांत खडाजंगी उडाली. प्लास्टिक पिशवी वापरासाठी सगळ्या दुकानदारांना चार हजार रुपयांचा शुल्क आकारणी त्यांना परवडणारे नसल्याचे नगरसेवक शारंगधर देशमुख, संतोष गायकवाड, किरण शिराळे, अशोक जाधव, अफजल पिरजादे, विजय खाडे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले. त्यावर अधिकाऱ्यांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी आहे. त्याविरोधात कारवाई सुरू असल्याचे सांगितल्यावर नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेतला. महापौर फरास यांनी प्रशासनाला सूचना करत प्लास्टिक पिशवीमुक्त शहरासंदर्भात सुधारित प्रस्ताव मांडण्याची सूचना केली.

कारवाईचा फार्स, ५०० ठिकाणी पिशव्या

प्रा. जयंत पाटील यांनी, ‘महापालिकेच्या आसपासच ५०० ठिकाणी अशा पिशव्या सापडतील. अधिकाऱ्यांची कारवाई म्हणजे केवळ फार्स आहे’ अशी टीका केली. कारवाई दरम्यान दंड कमी, व्यवहार जास्त असा प्रकार सुरू आहेत. कारवाईच्या नावाखाली वसुली अधिकाऱ्यांची दुकानदारी सुरु असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नगरसेविका रुपाराणी निकम कापडी पिशव्यांचा वापर केला तर बचत गटांना काम मिळेल असा मुद्दा मांडला. नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न निदर्शनास आणला. सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शन केले नसताना उमेदवारांच्या नेमणुका कशा​ दिल्या अशी विचारणा करत प्रा. जयंत पाटील व जयश्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळ्याचा निर्णय प्रलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बहुचर्चित घरफाळा आणि पाणीपट्टीवाढीचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला. या प्रस्तावाला प्रस्तावाला सत्ताधारी दोन्ही काँग्रेस, शिवसेनेसह विरोधी भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला. घरफाळा विभागाचा कारभार भ्रष्ट असल्याची टीकाही सभागृहात झाली. महापौर हसीना फरास अध्यक्षस्थानी होत्या. तहकूब सभा २४ मार्चला होणार आहे.

दोन तासाच्या चर्चेअंती सामान्य माणसांना झळ बसणार नाही आणि महापालिकेचे नुकसान होणार नाही, असा प्रस्ताव प्रशासनाने तयार करुन सभागृहापुढे मांडावा. त्यानंतर करवाढीच्या निर्णयावर चर्चा होईल, अशी भूमिका घेत सभा तहकूब केली. महापौर फरास यांनी हा विषय जिव्हाळ्याचा असून या संदर्भात पुन्हा एकदा महापालिका, अधिकारी, गटनेत्यांची स्वतंत्र बैठक होईल.

रेडीरेकनरवर आधारित घरफाळा आकारणी हा चुकीचा प्रकार असून त्यात शहरवासीय भरडणार आहेत. कसलीही करवाढ होऊ नये, ही सभागृहाची भूमिका आहे. त्याचवेळी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी सभागृह सकारात्मक आहे. मात्र प्रशासनाकडून लोकहिताचे काम होत नाही. कराचा पैसा केवळ कर्मचाऱ्यांच्या पगार, पेन्शनवर खर्ची पडू नये, उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने नव्या मिळकतींचा शोध घेऊन आकारणी करावी. नवीन बांधकामांना घरफाळा लागू करावा. कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम करुन उत्पन्न वाढवावे, अशी भूमिका प्रा. जयंत पाटील यांनी मांडली. उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, भाजप गटनेते विजय सुर्यवंशी यांनी करासंदर्भात सभागृह संवेदनशील असताना प्रशासनाकडून योग्य प्रस्ताव सादर होत नाहीत. पर्याय मांडले जात नसल्याचा आक्षेप घेतला.

===

घरफाळा विभागावर होणारे आरोप योग्य नाहीत. विभाग सक्षमपणे काम करत आहे. विभागाने आतापर्यंत ४६ कोटी रुपये घरफाळा जमा केला आहेत. थकीत फाळ्याच्या काही मिळकतीचे प्रश्न न्यायप्रविष्ट आहेत.

कर निर्धारक दिवाकर कारंडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images