Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मुल‌ींच्या नावे लाखाची ठेव

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : सरकारच्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेतर्गंत आता १ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या दारिद्र्यरेषेवरील कुटुंबातीलही मुलीच्या खात्यावर १८ वर्षानंतर १ लाख रूपये जमा होणार आहेत. यापूर्वी केवळ दारिद्ररेषेखालील कुटुंबासाठी ही योजना कार्यरत होती. सुधारणेमुळे सर्व मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी मुलीच्या पालकानी महिला व बालकल्याण विभागच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज भरून देणे बंधनकारक आहे. सुधारित आदेशानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्याची सूचना तालुका पातळीवरील महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना ‌देण्यात आल्या आहेत. जाणीव जागृती करण्याचाही आदेश आहेत.

मुलगाच वंशाचा दिवा या गैरसमजुतीमुळे अजूनही गर्भातच स्त्री भ्रूणहत्या केली जात आहे. परिणामी स्त्री जन्मदर घटत आहे. मुलगा, मुलगीचे प्रमाण व्यस्त होत आहे. हे चित्र बदल्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. मुलगी जन्माचे स्वागत केले जात आहे. सरकारच्यावतीने १३ फेब्रुवारी, २०१४ रोजी दारिद्र्य रेषेखालील दात्पंत्यास मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावावर १८ वर्षानंतर १ लाख रुपये जमा केले जातात. त्यामध्ये सुधारणा करून दारिद्र्य रेषेवरील कुटुंबातही मुलीचा जन्म झाल्यास या योजनेचा लाभ देण्याचा‌ निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे.

नव्या आदेशानुसार आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरून दिल्यास त्या मुलीच्या नावे आयुर्विमा महामंडळ २१ हजार २०० रुपये भरणार आहेत. त्यासाठी पालकांना पैसे भरण्याची गरज नाही. योजनेत पात्र झाल्यानंतरच विविध टप्यात लाभ दिला जाणार आहे. जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पाच हजार रुपये, तिच्या आजी, आजोबांना सोन्याची नाणे भेट देण्यासाठी पेच हजार, ती मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षी पोषणासाठी दोन हजार, ती मुलगी शाळेत गेल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक वर्षाला शिक्षणासाठी अडीच हजार मिळणार आहेत. त्यानंतर मुलीस सहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षाला तीन हजार दिले जाणार आहेत. योजनेचे निकष, अटींसंबंधी अ‌धिक माहितीसाठी महिला व बालकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावे लागणार आहे.

शिक्षण, पालन पोषणासाठीही

पात्र मुलीस १८ वर्षानंतर एक लाख रुपये मिळणार आहेतच. शिवाय विविध टप्यात शिक्षण, पालनपोषणासाठीही पैसे मिळणार आहेत. योजनेच्या नावाप्रमाणे माझी कन्या भाग्यश्रीचा खरा आनंद पालकांना देण्याचे ‌उद्दिष्ट सरकारचे आहे.

सुधारित सरकारच्या निर्णयानुसार दारिद्रय रेषेवरील कुटुंबांतील मुलीसही १८ वर्षानंतर एक लाख रुपये मिळणार आहे. महिला व बालकल्याण विभागृतर्फे तालुका पातळीवर बैठका घेऊन व्यापक अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या आहेत. अधिक माहितीसाठी पालकांनी कार्यालयात जाऊन चौकशी करावी, आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावेत.

शिल्पा पाटील, उममुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण अधिकारी)

लाभासाठी महत्त्वाचे निकष

कुटुंबातील पहिल्या दोनच मुली लाभास पात्र

मुलीचे वडील महाराष्ट्रातील रहिवाशी असावेत

बालिकेचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र आवश्यक

१८ वर्षानंतर रक्कम मिळण्यासाठी मुलगी अविवाहित व १० पुर्ण केलेली असावी.

दत्तक, अनाथ, बालसंकुलातील मुलगीही पात्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिचारकांच्या घरावर सैनिक पत्नींचा मोर्चा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या कुटुंबियांबाबत काढलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ करण्यासाठी सैनिक पत्नी आणि माजी सैनिकांनी परिचारकांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. या मोर्च्यात कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सैनिक पत्नी आणि माजी सैनिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

सोमवारी रात्रीपासून शेकडोंच्या संख्येने माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय पंढरपूरमध्ये निषेध मोर्चासाठी दाखल होत होते. त्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. मंगळवारपी सकाळी अकरा वाजता शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. परिचारकांच्या आमदारकीचा राजीनामा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा घोषणा देत हा मोर्चा प्रदक्षिणा मार्गावरून आमदार परिचारक यांच्या घराकडे मार्गस्थ झाला. आंदोलक घराकडे गेले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा मोर्चा महाद्वार चौकात रोखून धरला. मोर्चा रोखल्यावरून पोलिस आणि आंदोलकांत तणाव निर्माण झाला होता. शेवटी आंदोलकांनी या चौकात सभा घेऊन आमदार परिचारक यांचा जाहीर निषेध करून नायब तहसीलदार सीमा सोनावणे यांना निवेदन दिले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ची निघाली दहावीच्या परीक्षेला

$
0
0

पंढरपूर : सैराट चित्रपटामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिची मंगळवारपासून दहावीच्या परिक्षा सुरू झाली. अकलूजच्या शाळेत तिचा परीक्षा क्रमांक आल्याने मुख्याध्यापिका मंजुषा जैन आणि शिक्षकांनी तिचे गुलाबपुष्प देत स्वागत केले.

सैराट चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तिचे शिक्षण थोडेसे बाजूला पडले होते. शूटिंगच्या कालावधीतही घरी अभ्यास करून तिने नववीला ९० टक्के गुण मिळवीत आपली अभ्यासातील गुणवत्ता सिद्ध केली होती. मात्र, सैराटनंतर तिला तिच्या शाळेलाही जाणे चाहत्यांमुळे अवघड बनू लागल्यावर तिने अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशाला या शाळेतून आपले नाव काढून बाहेरून दहावीची परीक्षा देण्यासाठी १७ नंबर फॉर्म भरला होता. सैराटाच्या कानडी रिमेकमध्येही ती काम करीत असल्यामुळे दहावीच्या महत्वाच्या वर्षातील ८ ते ९ महिने शूटिंगमध्ये गेले होते. त्यानंतर आर्चीने गेल्या दीड महिन्यात तिने अभ्यासावरच लक्ष केंद्रित करून दहावीच्या परीक्षेची तयारी केली आहे.

वर्षभराच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच पेपर देत आहे. शूटिंग संपल्यानंतर अभ्यासाठी जेमतेम दीड-दोन महिन्यांचा वेळ मिळाला, त्यात होईल तितका अभ्यास केला. परीक्षेच्या निमित्ताने मैत्रिणींना भेटता आले, याचा आनंदही घेत आहे.

- आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरच्या महापौरपदी शोभा बनशेट्टीउपमहापौरपदी शशिकला बत्तुल, भाजप सत्ताधारी; शिवसेना विरोधात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी शोभा बनशेट्टी; तर उपमहापौरपदी शशिकला बत्तुल यांची निवड करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली; तर शिवसेना विरोधात बसणार आहे. असे असले तरी मुंबईच्या धर्तीवर सोलापुरात शिवसेना आणि भाजप हातात हात घालूनच काम करणार आहेत. काँग्रेस पक्षाला पदांपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-सेनेने ही खेळी केली आहे.

महापौर आणि उपमहापौरपदासाठी चौरंगी सामना होणार होता. मात्र, एमआयएमने आपले उमेदवार माघार घेतल्याने तिरंगी सामना झाला. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम आणि काँग्रेसच्या प्रिया माने यांचा पराभव केला. बनशेट्टी यांना अपेक्षेप्रमाणे ४९ मते पडली. अंकाराम यांना २१; तर माने यांना १८ मते मिळाली. एमआयएमच्या उमेदवार नगरसेविका नूतन गायकवाड यांनी माघार घेतली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शशिकला बत्तुल यांनी सेनेचे नगरसेवक अमोल शिंदे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक किसन जाधव यांचा पराभव केला. बत्तुल यांना ४९, शिंदे यांना २१; तर जाधव यांना १८ मते मिळाली. एमआयएमचे नगरसेवक अझहर हुंडेकरी यांनी माघार घेतली. महापौर आणि उपमहापौर या दोनही पदांच्या निवडीसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. सर्वाधिक ४९ जागा जिंकणाऱ्या भाजपने मनपात सत्ता स्थापन केली. बहुमतासाठी ५३ आकडा अपेक्षित होता, मात्र संख्याबळानुसार भाजप सत्तेत आला. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत एमआयएम, बसपा आणि माकपाने मतदान न करता तटस्थ राहणे पसंत केले. पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी काम पाहिले.

दरम्यान, २१ सदस्य असलेला शिवसेना पक्ष विरोधी बाकावर बसला. जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी यशस्वी खेळी करीत काँग्रेसला ऐनवेळी खिंडीत गाठले आणि बाजूला ठेवण्यात यश मिळविले. महापौर आणि उपमहापौर या दोनही पदाचा कालावधी सव्वा वर्षांचा ठेवण्यात आला असून, तसे राजीनामा पत्र दोन्ही पदाधिकाऱ्यांकडून लिहून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मनपा सभागृहात येऊन महापौर आणि उपामहापौर यांचे अभिनंदन करून स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, सरचिटणीस दत्तात्रय गणपा यांच्यासह शोभा बनशेट्टी यांचे वडील माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, पती श्रीशैल बनशेट्टी यांच्यासह बनशेट्टी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या ५० वर्षांची काँग्रेस पक्षाची सत्ता नेस्तनाबूत करून भाजपने सोलापूर महानगरपालिकेत एकहाती सत्ता स्थापन करून कमळ फुलविण्यात यश मिळविले आहे.

महेश कोठे विरोधी पक्षनेते

भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सलग आठ वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांची सभागृहनेतेपदी वर्णी लागली. तर सेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक महेश कोठे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली. या शिवाय बसपाच्या गटनेतेपदी नगरसेवक आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी गटनेतापदी किसन जाधव, काँग्रेस गटनेतापदी चेतन नरोटे तर एमआयएमच्या गटनेतापदी नगरसेविका नूतन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

असे आहेत स्थायी समिती सदस्य

स्थायी समिती सदस्यपदी भाजपचे रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, नागेश वल्याळ, संजय कोळी, श्रीनिवास करली, राजश्री बिराजदार, मीनाक्षी कंपली, मनीषा हुच्चे तर काँग्रेसचे नरसिंग कोळी आणि प्रवीण निकाळजे या शिवाय शिवसेनेचे महेश कोठे, विठ्ठल कोटा आणि गुरुशांत धुत्तरगावकर, बसपाचे आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नागेश गायकवाड आणि एमआयएमचे तौफिक शेख यांची निवड करण्यात आली.

परिवहन समिती सदस्य

भैरण्णा भैरमडगी, दैदिप्य वडापुरकर, संतोष कदम, गणेश जाधव, विरेश उंबरजे आणि मल्लेश सरगम (भाजप), परशुराम भिसे, तुकाराम मस्के आणि विजय पुकाळे (शिवसेना), नितीन भोपळे आणि भीमाशंकर टेकाळे (काँग्रेस) आणि झाकिरहुसेन सगरी (एमआयएम) यांची निवड करण्यात आली. बसपा आणि राष्ट्रवादी हे दोनही पक्ष परिवहमधून आउट झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​शिखर शिंगणापूरजवळसामूहिक बलात्कारएकाला अटक

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

मित्राबरोबर फिरायला गेलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर शिखर शिंगणापूरजवळ घाटात तीन दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी सुनील माने याला अटक करण्यात आली असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

पीडित विद्यार्थिनी अकलूज परिसरातील एका शिक्षण संस्थेत डिप्लोमा इंजिनिअरिंग शिकत आहे. ती व तिचा मित्र आठ मार्च रोजी सकाळी दुचाकीवरून शिखर शिंगणापूरला दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन परतताना घाटात थांबून ते दोघे बोलत होते. त्यावेळी आरोपीने जोडीदारासह त्यांना धमकविले. मित्राला पीडितेबरोबर बळजबरी करायला लावून त्याचे मोबाइलमध्ये शुटिंग केले. त्या नंतर हे शुटिंग व्हायरल करण्याची धमकी देत दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. या नंतर दोघांचे मोबाइल, पैसे दागिने काढून घेऊन त्यांना सोडून दिले. मात्र, काढून घेतलेले ओळखपत्र व मोबाइल परत देण्यासाठी दहा मार्च रोजी दहा हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे नेण्यासाठी आलेला आरोपी माने यास लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

अटक करण्यात आलेला सुनील माने यास कोर्टाने १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शिखर शिंगणापूर येथील घाटात जोडप्याने लुटण्यात येत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा खासगीकरणावरूनसोलापुरात ‛पारदर्शी’ कारभार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गहण बनत चालला आहे. भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिल्याच दिवशी भाजपच्या पारदर्शक कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत मनपा प्रशासनाने चढ्या दराने खासगी ठेकेदाराबरोबर कचरा संकलनाचा करार करून भाजपाला आहेर दिला आहे. नेमण्यात आलेला ठेकेदार भाजपच्या एका नेत्याचा जवळचा असून, त्याच्याकडे कचरा उचलण्याचे कोणतेही साहित्य नसताना प्रशासनाने करार केलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळत असल्यानेच अधिकाऱ्यांनी साखळी करून त्याच ठेकेदाराबरोबर करार केल्याने पालकमंत्री विजयकुमार देशमुखही संतापले असून, खासगीकरणाला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.

शहरात दररोज सुमारे साडे तीनशे ते चारशे टन कचरा साचतो. हा कचरा उचलण्यासाठी मनपाने या पूर्वी समीक्षा कंपनीला टेंडर दिले होते. त्यांच्याबरोबर दहा वर्षांचा करार करताना प्रतिटन ६५० रुपयांचा दर दिला होता. कचरा उचलण्यासाठीची सर्व यंत्रणा या कंपनीकडे होती. दररोज ४२० टन कचरा उचलला जात होता, त्या बदल्यात समीक्षाला २ लाख ७३ हजार रुपये दिले जात होते. परंतु, तक्रारी करून प्रशासनाने समीक्षा कंपनीचा ठेका रद्द करून त्या ठिकाणी यशश्री इंटरप्रायझेसचे अश्विन मानवी यांच्याबरोबर करार केला हा करार केला. त्यांना प्रतिटन तब्बल १६७० रुपये देण्याचे ठरविले. यशश्री मार्फत दररोज २१० टन कचरा उचलण्यात येणार असून, त्यांना मनपा दररोज सुमारे ३ लाख ५० हजार ७०० रुपये मोजणार आहे. या शिवाय दुसरा ठेका ग्लोबल कंपनीला मंजूर केला असून, त्यांना प्रतिटन १६८० रुपये दर देण्यात आला आहे. २१० टन कचरा उचळण्यापोटी दररोज त्यांना सुमारे ३ लाख ५२ हजार ८०० रुपये मिळणार आहेत. केवळ पावणेतीन लाखात होणारे काम प्रशासनाने सुमारे सात लाखांवर नेले आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपासून अनेकांचे हाथ ओले झाल्याचे समजते. कचरा खासगीकरणाला या पूर्वी भाजपने कडाडून विरोध केला होता. आता मात्र खासगीकरण होऊनही भाजप पदाधिकारी काहीही बोलत नसल्याने संशय बळावला आहे. या पूर्वीचा ठेकेदार असलेल्या समीक्षा कंपनीला ठेका मंजूर करताना वार्षिक दरवाढ ३ टक्के ठरविण्यात आली होती. मात्र, यशश्री आणि ग्लोबल यांच्याशी करार करताना वार्षिक दरवाढ तब्बल १० टक्के ठरविण्यात आली असल्याने मोठे गौडबंगाल झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. समीक्षा कंपनीचा करार कायदेशीर संपला नसताना आता तिसऱ्यांदा मनपाने करार करून वादाला तोंड फोडले आहे.

दरम्यान, समीक्षा कंपनीला पहिल्या वर्षी सुमारे ९ कोटी ९६ लाख ४५ हजार मिळाले होते. आता नव्याने करार झाल्यामुळे यशश्री आणि ग्लोबल या दोघांना सुमारे २५ कोटी ६७ लाख ७७ हजार ५०० रुपये इतकी घसघशीत रक्कम मिळणार आहे. या पूर्वी समीक्षा कंपनीवर पाच वर्षांत ५२ कोटी ९० लाख रुपयांचा खरच होणार होता आता, या दोन कंपन्यांवर सुमारे १५६ कोटी ७६ लाख रुपये खर्च होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धांना समजून घेतले नाहीडॉ. आ. ह. साळुंखेंनी व्यक्त केली खंतसाळुंखे, सचिन पिळगावकरांना दमानी-पटेल पुरस्कार प्रदान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘गौतम बुद्धांना भारतीय समाजाने समजून घेतले नाही, ही भारतीय समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे,’ अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली. साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल दमानी-पटेल प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणारा कर्मयोगी पुरस्कार डॉ. साळुंखे आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांना मंगळवारी सायंकाळी निर्मलकुमार फडकुले सभागृहात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. साळुंखे बोलत होते. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख ५१ हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘छोट्याशा चिमणीला जसा चिवचीवण्याचा अधिकार आहे, तसा तो प्रत्येक व्यक्तीला आहे, हे बुद्धांनी पटवून सांगितले. धर्मग्रंथ आणि धर्मगुरुने सांगितलेले तसेच ऐकीव एवढ्या कारणावरून कोणतीही गोष्ट स्वीकारू नका. स्वतःला अनुभव येईल, तेव्हा ती स्वीकारा, मानवी संस्कृतीची प्रगती ही चिकित्सक दृष्टीकोनातून झाली असून, चिकित्सा न करता आंधळेपणाने जसेच्या तसे स्वीकारणे चुकीचे आहे,’ असेही डॉ. साळुंखे म्हणाले.

अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील कार्याचा आढावा घेताना राजाभाऊ परांजपे आपले पहिले गुरू असून, त्यानंतर महान गुरुंच्या हाताखाली काम करता आले असे सांगतानाच मीनाकुमारी यांच्यामुळे आपणास उर्दू भाषा शिकता आली आणि कट्यारमध्ये त्याचा आपणास फायदा झाल्याचे सांगितले. मी ज्या क्षेत्रात आहोत ते क्षेत्र अद्यापही नीट समजूही शकलो नसल्याने राजकारणात येण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन यांनी सांगितले. ज्यांना राजकारणाचे ज्ञान नाही त्यांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना वाकून नमस्कार करावा, असे पिळगांवकर यांनी सांगताच एकच हशा पिकला. आदेश बांदेकर यांनी एका महिलेला भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण, असा प्रश्न विचारला असता, त्या महिलेने शरद पवार असे उत्तर दिले होते, असा किस्सा सांगत पिळगावकर यांनी आपण राजकारणात शून्य असल्याचे सांगताच सभागृह खळाळून हसले. आपण आधी भारतीय आहोत आणि नंतर महाराष्ट्रीयन आहोत, असे सांगून देशाला जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा आपण योगदान देऊ असे पिळगावकर म्हणाले. या वेळी प्रेमरतन दमानी, बिपिनभाई पटेल, दत्ता गायकवाड, बाबुराव मैदर्गीकर, डॉ. मिर इसहाक शेख, डॉ. राजेंद्र घुली, अक्षय जव्हेरी यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पाऊस: राज्यसरकारची ४ लाखांची मदत

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. अवकाळी पावसात दगावलेली व्यक्ती शेतकरी असेल तर त्यांच्या कुटुंबियांना 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने'अंतर्गत दोन लाख रूपयांची मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पंढरपूरमधील गारपीटग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढाव घेतला. यावेळी अवकाळी पावसात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना चार लाखांची मदत केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. राज्यातील ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांना बसला आहे. सोलापूरमध्येही पंढरपूरसह मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्ये पावसासह गारपीटीने झोडपले आहे. यात द्राक्ष बागांसह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

द्राक्ष बागांमध्ये तयार झालेली द्राक्षे काढली जात असताना अचानक झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा द्राक्ष बागांना फटका बसला आहे. या पावसामुळे सामान्य शेतकऱ्यांसह द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. काही ठिकाणी आंब्याचा मोहोर गळाल्यानेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​प्रतापगड होणार जागतिक वारसा?युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या पथकाची भेट

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

किल्ले प्रतापगडला युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे सदस्य आणि तज्ज्ञांनी भेट दिली. पथकाने रविवारी सात तास प्रतापगडावर भ्रमंती केली. छत्रपतींची युद्धनीती व दुर्गस्थापत्य कौशल्याने पथक अचंबित झाले. युनेस्कोच्या समितीने भेट दिल्याने गडाचा वारसा जागतिक नकाशावर पोहोचण्याची शक्यता आहे.

देदीप्यमान इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रातील गडांचे युरोप तसेच राजस्थान येथील गडांप्रमाणेच संवर्धन व्हावे, गडपर्यटन (फोर्ट टुरिझम) ही संकल्पना रुजावी, यासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे सदस्य आणि युरोपीय तज्ज्ञांनी १७ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील गडकोटांच्या दौऱ्याचे आयोजन केले आहे. स्वित्झर्लंड, ब्रिटन, जर्मनी व फ्रान्स येथील तज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार तसेच इकोफोर्टच्या सदस्या डॉ. शिखा जैन यांच्यासह, एमटीडीसीच्या वल्सा नायर, भारतीय पुरातत्त्व खात्याचे पश्चिम विभागाचे संचालक नांबीराजन, इंटरनॅशनल सायंटिफीक कमिटीचे सदस्य जर्मनीचे डॉ. हन्स रुडोल्फ, डॉ. एडमंड स्फोर, ब्रिटिश फोर्ट्रेस स्टडी ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि इंटरनॅशनल फोर्ट्रेस कौन्सिल ग्रेट ब्रिटनचे अध्यक्ष डेव्हिड बसेत, डॉ. शाड, चाल्स ब्लॅकवूड यांच्यासह २२ सदस्यांच्या समितीने किल्ले प्रतापगडाला भेट दिली.

युनेस्कोच्या सदस्यांनी रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास किल्ले प्रतापगड चढण्यास सुरुवात केली. किल्ल्यांची भिंत कशा पद्धतीने बांधण्यात आली आहे. दिंडी दरवाजा, महादरवाजा, भवानी मातेच्या मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची पाहणी केली. किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरून किल्ल्यांची महिती इतिहासप्रेमींकडून घेतली. या वेळी दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी प्रतापगडावर झालेल्या

युद्धाची महती सदस्यांना सांगितली. युनेस्कोच्या सदस्यांनी सुमारे ६ ते ७ तास प्रतापगडावर भ्रमंती केली. छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेतल्यानंतर सदस्य भारावून गेले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत किल्ले प्रतापगडावर युनेस्कोचे सदस्य होते.

बारा मोटेच्या विहिरीची भूरळ

युनेस्कोचे सदस्यांनी सोमवारी किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली, लिंब शेरी येथील बारा मोटेच्या विहिरींची पाहणी केली, अशी माहिती मालोजी जगदाळे व अजय जाधवराव यांनी दिली आहे. पुढे कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथेही युनेस्कोचे पथक भेट देणार असल्याचे समजते. कास पठाराचे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, अजिंक्यतारा, धोमचे मंदिर, वाई मेणवली वाडा, संगम माहुली, लिंबशेरीची बारामोटेची विहीर हेही आता जगाच्या नकाशावर दिमाखात झळकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजे यांच्या वाहनावर दगडफेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नशीब आजमावणाऱ्या सुमारे ८१७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मशीनबंद झाले. जिल्ह्यात २,५८३ मतदानकेंद्रांवर सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता सर्वच मतदानकेंद्रांवर शांततेत मतदान झाले. मतदान संपता संपता राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जावली तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर खर्शी बारामुरे येथे दगडफेक झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेचा अपवाद वगळता मिनीमंत्रालयासाठी सातारा जिल्ह्यात अंदाजे ७० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या आदेशाप्रमाणे सुमारे चार हजार महसूल कर्मचारी निवडणूक मोहिमेवर होते. २५८३ मतदानकेंद्रांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. सातारा, कराड, जावली, वाई फलटण या पाच तालुक्यातील सुमारे अकराशे मतदानकेंद्रे संवेदनशील असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

सातारा व कराड तालुक्यातही मतदानाचा टक्का ६० टक्क्यांच्या पुढे सरकल्याने राष्ट्रवादीची धाकधूक वाढली असून, आमदार गट बाजी मारणार की खासदार गट याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सातारा पोलिसांनी बंदोबस्ताची जय्यत तयारी ठेवल्याने फार कोठे तणावाच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीचे पडसाद पडसाद उमटत राहिले. राजे समर्थकांनी खासदारांच्या मोटारीवर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने साताऱ्यातही तणाव होता. पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी तसे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.

उदयनराजे यांच्या

वाहनावर दगडफेक

वली तालुक्यातील म्हसवे गटातील खर्शी बारामुरे येथे राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या समर्थकांकडून खा. उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर दगडफेक झाली. हे वृत्त संपूर्ण सातारा जिल्ह्यात पसरल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान संपता संपता तणावाचे वातावरण निर्माण झाले. दगडफेकीचे नक्की कारण समजू शकले नाही. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा पोलिस स्टेशन गाठल्याने दोन्ही नेते पुन्हा एकदा आमने सामने आल्याची चर्चा आहे. तक्रारीची नोंद मेढा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.

कुडाळ गटामध्ये राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. म्हसवे आणि कुडाळ येथील दोन्ही लढती राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केल्याने या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले दुपारनंतर जावली तालुक्याच्या दौऱ्यावर होते. संध्याकाळी पाचनंतर खा. उदयनराजे खर्शी बारमुरे येथे आले असता त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. ही दगडफेक राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

मेढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी खा. उदयनराजे भोसले आले असता, कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या घटनेचे वृत्त कळताच साताऱ्यातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व वसंतराव मानकुमरे हे सुद्धा तातडीने पोलिस ठाण्यात पोहोचले. दोन्ही गटांनी मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. पी. काठाळे यांच्याशी चर्चा केली. तक्रार दाखल करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठिय्या दिल्याने रात्री उशिरापर्यंत मेढ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने परिस्थिती नियंत्रणात होती.

दगडफेकीचा राजकीय ताण मेढ्याने अनुभवला. तसा त्याचे पडसाद रात्री उशिरा साताऱ्यात उमटले. दगडफेकीचे वृत्त साताऱ्यात पसरताच सुमारे दोन हजार राजे समर्थकांचा जमाव पोलिस मुख्यालय परिसरात जमा झाला. समर्थकांनी मुख्यालय परिसरात तळ देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री उशिरा उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले. तेव्हा काही काळ समर्थकांची गर्दी आवरता आवरता पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. उदयनराजे यांनी रात्री पोलिस अधिक्षकांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी बांगड्या भरलेल्या नाहीत: उदयनराजेंचा संताप

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर सातारा व परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी उदयनराजे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 'भांडणं करून काही मिळणार नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांनी शांत राहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मात्र, 'आम्ही बांगड्या भरल्या नाहीत,' असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानावेळी उदयनराजे जावळी तालुक्यातील खुर्शी मुरा गावी भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वसंत मानकुमरे यांनी ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. तर, मानकुमरे यांनीही उदयनराजे यांच्याविरोधात मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उदयनराजेंच्या समर्थकांनी मला आणि माझ्या पत्नीला धक्काबुक्की केली. त्यामुळंच चिडलेल्या जमावानं उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यावर दगडफेक केली, असं मानकुमरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

भोसले बंधू आमने-सामने

या घटनेच्या निमित्तानं उदयनराजे व शिवेंद्रराजे हे दोन भोसले बंधू आमनेसामने आले आहेत. 'आमच्या ताफ्यावरील दडगफेकीत शिवेंद्रराजेंचाच हात असल्याचा दावा उदयनराजे यांनी केला आहे. तर, साताऱ्याचे खासदार हे दहशत माजवण्यासाठी जावळीत आले होते आणि त्यामुळंच लोकांनी राग व्यक्त केला,' असं प्रत्युत्तर शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​साताऱ्यात पुन्हा राष्ट्रवादी

$
0
0



अतुल देशपांडे, कराड

सातारा जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर विजय मिळवित पुन्हा आपली हुकुमत प्रस्थापित केली आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात या वेळी भाजपने सहा जागांवर विजय मिळवित चंचूप्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपच्या या मुसंडीचा भविष्यातील राजकीय उलथापालथीची नांदी झाल्याचे मानले जावू लागले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण ६४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१, काँग्रेस ७, भाजप ६, सातारा विकास आघाडी ३ अपक्ष २, पाटण विकास आघाडी १, कराड विकास आघाडी १ व अन्य ३, असे पक्षीय बलाबल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा जि. प. वर आपला झेंडा फडकविला आहे. मात्र, या वेळी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत जि. प. व पं. स. साठी पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. पश्चिम महाराष्ट्र आणि भाजपा-सेना, असे व्यस्त राजकीय समीकरण असतानाही या वेळी भाजपाने सर्व पर्यायांचा वापर करीत पक्षाची बीजे रोवण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यामुळेच जि. प. मध्ये तब्बल सहा जागांवर विजय मिळवित स्थानिक स्वराज्य संस्थांतील आपले स्थान भक्कम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत प्रस्थापितांना धक्का दिला आहे.

सातारा जिल्हा परिषद बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस- ४१

काँग्रेस- ७

भाजप- ६

सातारा विकास आघाडी ३

अपक्ष २

पाटण विकास आघाडी १

कराड विकास आघाडी १

अपक्ष ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ज्योती मांढरे अखेर माफीची साक्षीदार

$
0
0



सातारा

वाई हत्याकांड प्रकरणात ज्योती मांढरे ही माफीची साक्षीदार झाल्याचा निर्णय न्यायाधिशांनी दिला आहे. तिला काही अटीही घालण्यात आल्या आहेत. वाई हत्याकांड प्रकरणात एक एक खटला चालवायचा की सर्व खटले एकदम चालवायचे या बाबत सरकार पक्षाला विचार करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केल्यानंतर न्यायाधिशांनी २४ मार्च ही पुढील तारीख निश्चित केली आहे.

वाई हत्याकांड प्रकरणी या अगोदर सरकार पक्षाने ज्योतीला माफीचा साक्षीदार करावे, यासाठी युक्तिवाद केला होता, तर ज्योतीला माफीचा साक्षीदार करू नये, असा बचाव पक्षाने युक्तिवाद केला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कोणता निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालयात या प्रकरणाच्या कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन ज्योतीला माफीची साक्षीदार केल्याचा निर्णय दिला. न्यायाधीशांनी तिला माफीची साक्षीदार होणार आहे का? त्यासाठी अटी असून, त्या मान्य आहेत का? असे तिला विचारले. त्यावर ज्योतीने माफीचा साक्षीदार होणार असल्याचे मान्य केले. या वेळी सरकार पक्षाला सर्व खरी माहिती सांगावी तसेच ज्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे त्यामधील तुझी व संतोष पोळ याची भूमिका सांगणे, अशा अटी सांगितल्यानंतर तिने त्या मान्य केल्या.

विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, संशयित आरोपीने पोलिसांकडे सर्व गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्या बाबतचा बंद लखोटा खुला करावा व तो सरकार पक्षाला द्यावा, अशी विनंती केली. न्यायाधिशांनी तो मान्य करुन सरकार पक्षाला वाचण्यासाठी दिला. मात्र, संतोष पोळ याचा कबुली जबाब इतर ठिकाणी खुला करु नये, असे न्यायाधिशांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील जवान जम्मूजवळ हुतात्मा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेजवळ पूंछ येथे पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी केलेल्या गोळीबारात सातारा जिल्ह्यातील फत्त्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे (वय ३२) हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव आज, शुक्रवारी गावी आणले जाणार आहे.

गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गुलपूर भागात भारतीय ठाण्यावर गोळीबार केला. त्यात घाडगे गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. दीपक यांच्या मागे वडील, आई शोभा, पत्नी निशा, चार वर्षांचा मुलगा शंभू आणि एक वर्षाची मुलगी परी आणि विवाहित बहीण माला असा परिवार आहे.

घाडगे १५ मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. दीपक यांच्या मृत्यूचा बातमी कळताच फत्त्यापूर गावातील व्यवहार व बाजारपेठ बंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरुंगाधिकाऱ्याची बदली; सुभेदार निलंबितआरोपीकडे मोबाइल सापडल्याने कारवाई

$
0
0

तुरुंगाधिकाऱ्याची बदली; सुभेदार निलंबित

आरोपीकडे मोबाइल सापडल्याने कारवाई

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्हा कारागृहात मोक्काअंतर्गत कारवाई झालेला आरोपी निलेश घायवळ याच्याकडे मोबाइल सापडला होता. या प्रकरणी वरिष्ठ तुरुंगाधिकारी अवघडे यांची तडकाफडकी बदली तर सुभेदार कल्पना खरात यांना कारागृह महानिरीक्षकांनी निलंबित केले आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी निलेश घायवळ याच्याकडे २३ फेब्रुवारी रोजी कारागृहात च मोबाइल सापडला होता आणि कारागृहाच्या दक्षता पथकाच्या झडतीत मोबाइल वापराचे हे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाचा अहवाल कारागृह अधीक्षक एन. एन. चोंदे यांनी कारागृह महानिरीक्षकांना पाठवला होता. या अहवालाची गंभीर दखल घेऊन सुभेदार कल्पना खरात यांना तातडीने निलंबित करण्यात आले. वरीष्ठ तुरूंग अधिकारी अवघडे यांची खुले कारागृह आटपाडी येथे तातडीने बदली करण्यात आली. या बदलीला प्रतिनियुक्तीचे गोंडस कारण देण्यात आले. कारागृह अधीक्षकांच्या आशिर्वादानेच घायवळला पंचतारांकित सुविधा मिळत असल्याची बातमी आहे मात्र, कारवाईचे झेंगट अवघडे व खरात यांच्या गळ्यात पडले. दक्षता समितीने कारागृहातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. यामध्ये १७ फेब्रुवारी रोजी खरात घायवळ यांच्याशी बोलताना आढळून आल्या. या अनुषंगाने चौकशी करून त्यांच्यार दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोनोग्राफी बंद, व्हेंटिलेटर पॅकबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोडकळीस आलेली विद्युत उपकरणे, छताला गेलेले तडे, भिंतीवरील उडालेले रंग, खराब विद्युत उपकरण, उपचारासाठी तिष्ठत थांबलेले रुग्ण हे चित्र आहे, महापालिकेच्या मालकीच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील. सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून म्हणून या हॉस्पिटलची ओळख आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी हॉस्पिटल्सची अचानक पाहणी केली. यावेळी हॉस्पिटलमधील गैरसुविधा, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीची झाडाझडती घेत येथील कामकाजाचे ऑपरेशनच केले. पदाधिकाऱ्यांच्या तपासणीत तीन वर्षांपासून १८ लाख रुपये किंमतीचे सोनोग्राफी मशिन बंद तर व्हेटिलेंटर पॅक बंद असल्याचे आढळले. तपासणीत वॉर्डची दुरवस्था तर डॉक्टर रुम, मिटींग रुम चकाचक असल्याचे निदर्शनास आले.

पदाधिकाऱ्यांनी हजेरीपत्रकाची तपासणी केली असता, हजेरी नोंदवून काही कर्मचाऱ्यांनी घर गाठल्याचे सामोरे आले. तर डॉ. नवजीवन पाटील हे गेल्या तीन महिन्यांपासून रजेवर असल्याची माहिती पुढे आली. रुग्ण ४० आणि कर्मचाऱ्यांची संख्या १०० वर असूनही रुग्णांना उपचार व इतर सुविधासाठी हेपलाटे मारावे लागत असल्याचे सामोरे आल्यामुळे कामचुकार वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा, असा आदेशच महापौर हसीना फरास यांनी प्रशासनाला दिला. रोजंदारी तत्वावर काम करत असलेले अभिजीत साळोखे हे डॉक्टरांना दमदाटी करुन हजेरी मांडायला लावतात. झाडू कामगार म्हणून त्यांची नियुक्ती असताना ते सातत्याने गैरहजर असतात. डॉक्टरांवर दादागिरी करुन हजेरी मांडायला लावणाऱ्या कर्मचारी साळोखेला पदाधिकाऱ्यांनी चांगलीच समज दिली.

महापौर फरास, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, महिला व बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर, परिवहन समिती सभापती नियाज खान, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक भूपाल शेटे, दीपा मगदूम, सचिन पाटील, महेश सावंत, माजी नगरसेवक आदिल फरास यांनी मंगळवारी अकरा वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलला भेट दिली.

………….

चौकट

कर्मचाऱ्यांचे खासगी लॅबशी संगनमत

पहिल्यांदा बाह्य रुग्ण विभाग, लॅबची पाहणी झाली. हॉस्पिटलमध्ये रक्त आणि लघवी तपासणी करण्याची सुविधा आहे. टीबीचे निदान करणारी यंत्रणा आहे. थॉयरॉइड चाचणी करणारी मशिनरी नसल्याचे सामोरे आले. पदाधिकारी आणि नगरसेवक तपासणी करत असताना वंदे मातरम यूथ ऑर्गनायझेशनचे अवधूत भाट्ये यांनी हॉस्पिटलमधील गैरसुविधांचा पाढा वाचला. हॉस्पिटलमधील काही कर्मचारी रुग्णांना विविध प्रकारच्या तपासणीसाठी खासगी लॅबकडे पाठवितात. खासगी लॅब आणि कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक संगनमतातून रुग्णांना लुबाडण्याचे काम सुरु असल्याचा आरोप केला.

…………….

रुग्ण डॉक्टरांच्या प्रतिक्षेत

नागेश सुतार, सुनंदा माने, रुपाली नंदीवाले हे रूग्ण गेले तीन दिवस उपचारासाठी येथे आहेत. मात्र ऑर्थोपेडीक डॉक्टराअभावी त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. उपचारासाठी रोज हेलपाटे मारावे लागत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. आरोग्य अधिकारी डॉ. अरुण परितेकर, प्रशासनाधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी आवश्यक मशिनरी, औषध साठ्याची माहिती दिली. एक्स रे टेक्निशियन, रेडिओलॉजीस्ट उपलब्ध नसल्याचे सांगितले. पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त ढेरे यांना आरोग्य विभागाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी अशा सूचना केल्या. आरोग्य अधिकारी डॉ. परितेकर यांच्या कामकाजाविषयी तक्रारी असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी सूचना नगरसेवक देशमुख यांनी केली.

…………….

कोट

‘रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळायला पाहिजेत. जे कर्मचारी कामचुकार करतात, उपचारात हलगर्जीपणा दाखवितात त्यांच्यावर सक्त कारवाई करा. वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी करुन अन्यत्र बदली करा. हॉस्पिटलमधील सुविधा, बांधकामासाठी निधी मिळवून दिला जाईल. लहान मुलांच्याकरिता इनक्युबेटरची खरेदी केली जाईल. हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधेबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

हसीना फरास, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमसा संमेलनाच्या अध्यक्षपदी जयसिंगराव पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (ता २६ मार्च) इचलकरंजी येथे संमेलन होत आहे.

सांगली जिल्ह्यातील तडसर येथील रहिवाशी असलेल्या डॉ. जयसिंगराव पवार यांची शैक्षणिक आणि संशोधकीय कारकीर्द राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत बहरली. शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक असलेल्या डॉ. पवार यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे चरित्र देश-विदेशातील अनेक भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले.

महाराणी ताराराणी, सरसेनापती संताजी घोरपडे आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचे त्यांनी केलेले चरित्रलेखन महत्त्वाचे मानले जाते. शिवकालीन इतिहासासंदर्भात आधीच्या इतिहासकारांनी केलेले विपर्यस्त लेखन खोडून काढण्यात त्यांनी अलीकडच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची मराठी साम्राज्याचा उदय आणि अस्त, मानव जातीचा इतिहास, हिंदुस्थानचा राजकीय व घटनात्मक इतिहास, शिवाजी व शिवकाल, छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी छत्रपती स्मृतिग्रंथ अशी इतरही अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून त्यांचे फुले-शाहू-आंबेडकरी विचारप्रसाराचे कार्य सातत्याने सुरू असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाड करणाऱ्यांना मुलींनी दाखवला हिसका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉलेजच्या खाजगी बसमध्ये विद्यार्थिंनीची छेड काढणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना व्हाइट आर्मी संस्थेच्या दोन महिला कार्यकर्त्यांनी निर्भया पथकाच्या मदतीने चोप देत छेडछाड होणाऱ्या मुलीला न्याय दिला. कॉलेजच्या बसमध्ये छेडछाड होत असल्याची तक्रार संबंधित मुलीने व्हाइट आर्मी संस्थेकडे केली होती. त्यानुसार सापळा रचून संस्थेच्या मुलींनी बसमधून प्रवास करत छेड काढणाऱ्या मुलांना रंगेहाथ पकडून हिसका दाखवला.

हातकणंगले तालुक्यातील कॉलेजची खाजगी बस कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना घेऊन दररोज कॉलेजच्या मार्गावर धावते. या बसमध्ये कॉलेजमधील विविध अभ्यासशाखांच्या विद्यार्थी व विद्यार्थिंनींचा समावेश आहे. या बसमधून कोल्हापुरातील एक विद्यार्थिनी दररोज प्रवास करते. बसमधील दोन मुले तिला रोज टोमणे मारणे, अश्लील बोलणे अशी छेडछाड करत होते. गेल्या दोन महिन्यांपासून होणाऱ्या या त्रासाकडे तिने आधी दुर्लक्ष केले. मात्र संबंधितांकडून छेडछाड थांबली नाही. संबंधित मुलीने थेट व्हाइट आर्मीच्या कार्यालयात जाऊन बसमधील रोज घडणारा प्रकार कार्यकर्त्यांना सांगितला. व्हाइट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कस्तुरी आणि शर्वरी रोकडे यांनी सापळा रचला.

कस्तुरी आणि शर्वरी कॉलेजच्या बसमध्ये चढल्या आणि त्यांनी कोण मुलं छेड काढतात हे पाहिले. मुलांकडून मारले जाणारे टोमणे, अश्लील गाणी यामुळे बसमधील सर्वच मुलींना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कस्तुरी हिने निर्भया पथकाच्या प्रमुख आरती नांद्रेकर यांना दूरध्वनीद्वारे या प्रकाराची माहिती दिली आणि पोलिसांची मदत मागितली. दरम्यान, बस कॉलेजच्या आवारात आल्यानंतर बसमधील विद्यार्थिंनींना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. मात्र मुलांना बसमध्येच थांबण्यास सांगण्यात आले.

यावेळी निर्भया पथकातील पोलिस कॉलेजच्या आवारात दाखल झाल्या. छेड काढणाऱ्या दोन मुलांसह त्यांना साथ देणाऱ्या अन्य दोन मुलांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. व्हाइट आर्मीच्या महिला कार्यकर्त्यांनीही या सडकसख्याहरींना चोप दिला.

बसमधील ​​शिक्षकांचे तोंडावर बोट

बसमध्ये मुलांकडून छेडछाड होत असल्याबद्दल बसमध्ये मेन्टॉर म्हणून असलेल्या​ शिक्षकांना संबंधित मुलीने सांगितले होते. बसच्या चालकालाही हा प्रकार माहीत होता. मात्र, तक्रार करूनही शिक्षकांनी छेड काढणाऱ्या मुलांना कोणतीही समज दिली नाही असे संबंधित विद्यार्थिंनीने सांगितले. बसमधून प्रवास करणाऱ्या शिक्षकांकडून छेड काढणाऱ्या मुलांवर कारवाई झाली असती तर विद्यार्थिंनीना होणारा त्रास वाढला नसता. तक्रार करूनही या प्रकाराबाबत तोंडावर बोट ठेवणाऱ्या शिक्षकांना जाब विचारण्याची जबाबदारी कॉलेज प्रशासनाची आहे.

सुरक्षा वाऱ्यावर

बसमध्ये मुलींची संख्याही लक्षणीय आहे. कस्तुरी व शर्वरी रोकडे या व्हाइट आर्मीच्या कार्यकर्त्या जेव्हा छेडछाड होत असल्याच्या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी या बसमध्ये चढल्या, तेव्हा बसचालक व ​बसमधील शिक्षकांनी त्यांना ‘तुम्ही कोण’ असे विचारले. यावेळी, ‘आम्ही कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी जात असून याबाबत कॉलेजमधील मगदूम सर यांच्याशी बोलणे झाले आहे’ असे कस्तुरीने सांगितले. मात्र याची खात्री करून घेणे ही बसमधील शिक्षकांची जबाबदारी होती. अशा प्रकारांतून विद्यार्थी व विद्यार्थिंनीची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटीने सेनेची ताकद घटणार

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com
twitter:@satishgMT

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दहा जागा जिंकून सत्तेचे समिकरण ठरवणारी मॅजिक फिगर गाठणाऱ्या शिवसेनेला फुटीनंतरही उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. उपाध्यक्षपदाच्या रुपाने सेनेला प्रथमच जिल्हा परिषदेच्या सत्तेत स्थान मिळाले. मात्र पाठिंबा कुणाला द्यायचा, यावरुन फूट पडल्याने उशीरा मिळालेली अध्यक्षपक्षाची ऑफर हातून निसटण्यासह आगामी काळात पक्षाची ताकद घटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत आमदारकीच्या १०पैकी सहा जागा जिंकून शिवसेनेने जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा वाढवला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सेनेला फक्त दोनअंकी संख्या गाठता आली. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यामुळे दहा जागा असल्याने सेनेला सत्ता स्थापनेत मोठे महत्व आले. सेना ज्याला पाठिंबा देईल, त्याची सत्ता असे चित्र निर्माण झाले. अध्यक्ष निवडीच्या पूर्वसंध्येला सोमवारी ‘मातोश्री’वरून आलेल्या आदेशानुसार पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली. मात्र आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत सात सदस्य भाजपकडे गेले. भाजपने सेनेला उपाध्यक्षपदाची संधी दिली. मात्र, सेनेतील फूट अधोरेखित झाली.

पक्षाचा आदेश न पाळता भाजपला पाठिंबा देण्यात शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आघाडीवर होते. आगामी विधानसभा निवडणुकीत कट्टर विरोधक काँग्रेसशीच लढत द्यायची असल्याने त्यांनी भाजपला पाठींबा दिला. मात्र विधानसभा निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक गटाने, नरके यांचे विरोधक माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यामागे ताकद लावली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नरके यांनी पाठिंबा दिल्याने, आगामी काळात महाडिक हे नरके यांचा पैरा फेडणार की पी. एन. पाटील यांच्याशी दोस्ती निभावणार हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

हातकणंगलेत भाजपला पाठिंबा देऊन आमदार मिणचेकर यांनी महाडिक गटांकडून विधानसभा निवडणुकीत त्रास होऊ नये याची काळजी घेतली आहे. शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्यशक्ती हा भाजपचा सहयोगी पक्ष असतानाही आमदार सत्यजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला. ‘गोकुळ’च्या राजकारणाची परतफेड त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केली. त्यामुळे आगामी विधानसभेत पाटील यांना मदत करायची की कोरे यांना हा पेच महाडिक गटासमोर असेल.

कागल तालुक्यातील घाटगे, मंडलिक हे दोन्ही गट सेनेबरोबर राहिले. घाटगे गटाने भाजपला तर शिवसेनेतील मंडलिक गट काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबर राहिला. घाटगे-मंडलिक यांच्या परस्परविरोधी पाठिंब्यामुळे कागल तालुक्याच्या राजकारणाचा सारीपाट बदलणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कागलच्या राजकारणाचे चित्र बदलणार आहे. त्यावेळी मंडलिक-मुश्रीफ एकत्र येणार की संजय घाटगे-समरजित घाटगे एकत्र येणार हे पहायला मिळेल. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत राहताना पी. एन. पाटील यांच्याशी निष्ठा दाखवली असली तरी तालुक्याच्या राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी पक्षाशी मुकाबला करताना त्यांचा कस लागणार आहे. एकंदर सेना सत्तेत सहभागी झाली, तरीही पक्षात पडलेली फूट आगामी राजकारणात नवे रंग दाखवेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकारणात महाडिकांचे कमबॅक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या २०१०च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीची सत्ता उलथवून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर आली. या विजयानंतर आमदार हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पवार यांनी मुश्रीफ आणि पाटील यांना ‘महाडिक यांच्यावर लक्ष ठेवा, ते काहीतरी करतील’ अशी सूचना केली होती. दोन्ही नेत्यांनी पवार यांच्या सूचनेकडे त्यावेळी लक्ष दिले. मात्र आताच्या जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत याच जोडगोळीने दुर्लक्ष केल्याने, माजी आमदार महा​देवराव महाडिक यांनी जिल्ह्याच्या राजकारणात कमबॅक केले.

महापालिकेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. त्यानंतर एकच महिन्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी आमदार महाडिक यांचा पराभव केला. या पराभवानंतर राजकारणात पुन्हा परतण्यासाठी महाडिक यांनी शांतपणे सूत्रे हलविली. विधानपरिषदेच्या २०२१च्या निवडणुकीत महाडिक गटाची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक आखणी केली. नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपबरोबर ताराराणी आघाडीची युती करताना जयसिंगपूर, इचलकरंजीसह अन्य नगरपालिकेत महाडिक गटाचे प्राबल्य वाढेल यासाठी प्रयत्न केले. पैकी जयसिंगपूर व इचलकरंजी त्यांना चांगले यश मिळाले. अन्य नगरपालिकांत महाडिक गटाचा शिरकाव झाला.

माजी आमदार महाडिक यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुलगा आमदार अमल यांच्या साथीने सत्तेचा ग्राफ वाढवला. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे १४ सदस्य निवडून आले. विधानपरिषद निवडणुकीत ज्यांनी विरोध केला, त्यांच्यापैकी काहीजणांचा काटाही महाडिकांनी या निवडणुकीत काढला. भाजप -ताराराणी आघाडीची मोट जमवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची अमल महाडिक यांची हुकलेली संधी त्यांना डाचत होती. नेहमीप्रमाणे जाहीर आव्हाने, प्रतिआव्हाने न देता महाडिक यांनी शांतपणे व्यूहरचना करत, भाजपचा पहिला अध्यक्ष म्हणून सून शौमिका यांना विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. पी. एन. पाटील यांना थेट न दुखावता त्यांचे विरोधक, माजी आमदार प्रकाश आवाडे यांना आपल्याबाजुने वळवण्यात यश मिळवले. लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांना महाडिक गटाची पूर्ण ताकद हवी असल्याने भाजपला विरोध असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपच्या पारड्यात मते टाकली. जनसुराज्यच्या विनय कोरे यांच्याशी जमवून घेतले. आमदार महाडिक यांनी काँग्रेसच्या बेरजेच्या राजकारणाचा वापर करत भाजपची सत्ता आणली आणि जिल्ह्याच्या राजकारणात कमबॅक केले. मात्र ते लोकसभा, विधानपरिषद निवडणुकीत फलदायी ठरण्यासाठी महाडिक यांना आणखी कष्ट घ्यावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images