Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

यंत्रमागधारकांना कर्जावरीलव्याजात पाच टक्के अनुदान

$
0
0

इचलकरंजी

राज्यातील यंत्रमाग उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी यंत्रमागधारकांनी बँकेसह वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याज दरात पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फायदा राज्यातील ९० हजार साध्या यंत्रमागधारकांना होणार आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, वीज दरात प्रती युनिट एक रूपये सवलत देण्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

वस्त्रनगरीसह राज्यात यंत्रमाग उद्योगात मंदीचे वातावरण असल्यामुळे त्यांना विविध सोयी- सवलती देण्याची मागणी मागील तीन वर्षापासून सातत्याने केली जात आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनीही पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच इचलकरंजी येथे मागील वर्षी झालेल्या वस्त्रोद्योग परिषदेत राज्यातील यंत्रमागधारकांची मंदी, दुष्काळामुळे झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेता विविध सोयीसवलती देण्याची घोषणा वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. मात्र राज्यातील यंत्रमाग उद्योगासाठी हा मोठा निर्णय असल्याने सरकारवर याचा मोठा आर्थिक भार पडणार होता. त्यामुळे वस्त्रोद्योगाकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले होते. या प्रश्नी राज्यात आंदोलन देखील झाले होते, अखेर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मंगळवारी मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

सरकारच्या या निर्णयानुसार साध्या यंत्रमागधारकांनी २१ नोव्हेंबर २०१७ पूर्वी राष्ट्रीयकृत व सहकारी बँका, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्था यांच्याकडून घेतलेल्या कर्जावरील पाच टक्के व्याज सरकार भरणार आहे. यंत्रमागधारकाचे कर्ज संपेपर्यंत अथवा पुढील पाच वर्षे सरकारमार्फत व्याज भरण्यात येईल. राज्यात ९० हजार यंत्रमाग कारखाने असून साडेबारा लाख साधे यंत्रमाग आहेत. या निर्णयाचा फायदा राज्यातील ९० हजार यंत्रमागधारकांना होणार आहे.

दरम्यान, राज्यातील यंत्रमागधारकांना एक जून २०१६ पासून वीजदरात प्रती युनिट एक रुपये सवलत देण्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले होते. मात्र यावर अद्याप निर्णय होऊ शकला नाही. या निर्णयाकडेही कारखानदारांचे लक्ष लागून राहीले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या साध्या यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला असून मंदीच्या तडाख्यातून बाहेर काढण्यासाठी यंत्रमागधारकांना सरकारने मदतीचा हात दिला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोपींविरुद्ध सबळ पुरावे‘सीआडी’च्या अप्पर पोलिस अधीक्षकांची माहिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
अनिकेत कोथळे खूनप्रकरणी ‘आम्ही काही केले नाही आणि आम्हाला काही माहित नाही,’ या पलिकडे संशयित तोंड उघडत नसले तरी आमच्या हाती भक्कम आणि सबळ पुरावे आले आहेत. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर त्या रात्री ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये अनिकेतचा मृतदेह नेण्याचा प्रयत्न झाला होता, त्या डॉक्टरची आणि त्यांच्या सहाय्यकाची चौकशी सुरू केली आहे. त्या ठिकाणचे चार मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. आतापर्यंतच्या तपासात अमानुष थर्ड डिग्रीमुळेच अनिकेतचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आज, गुरुवारी संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्या सर्वांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती सीआयडीचे अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
गायकवाड म्हणाले, ‘कोठडीत अनिकेत कोथळेला झालेली मारहाण, त्याच्या मृतदेहाची हाताळणी आणि आंबोलीत तो मृतदेह जाळण्याचा केलेला प्रयत्न, अशा तीन घटना केंद्रस्थानी ठेवून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे या तीन घटनांमध्ये प्रत्यक्षात संपर्कात आलेल्यांचीही चौकशी केली जात आहे. त्यापैकी कोणी संशयितांना गुन्ह्यात मदत केल्याचे समोर आल्यास त्यांना सहआरोपी केले जाईल. मोबाइलवरील कॉल डाटा समोर आल्यानंतर कोणी कशासाठी संशयितांशी संपर्क साधला होता, हे तपासण्याला गती येणार आहे. अनिकेत कामाला असलेल्या लकी बॅग दुकानदाराची चौकशी सुरूच आहे, उद्याही त्याला बोलाविले आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबधित असलेल्या कोणालाही क्लिन चिट दिलेली नाही. घटनेच्या रात्री अमोल भंडारे याला धरून बसलेले दोघे अद्यापही सापडलेले नाहीत. संशयित दिर्घकाळ पोलिस दलात कार्यरत होते. त्यामुळे त्यांना गुन्ह्याच्या तपासाची पद्धत, कायदे याची पूर्णतः माहिती आहे. आपल्या तोंडून चुकूनही काहीतरी जाऊ नये, याची ते पुरेपूर काळजी घेत असल्याचे दिसत आहे. वारंवार सवाल केले तरी बहिरेपणाचे सोंग आणले जात आहे. ते गप्प राहिले म्हणून तपास पुढे जाणे थांबत नाही. ठोस पुरावे, घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार समोर आणण्यात यश आले आहे. डीएनएचा अहवाल अद्याप आलेला नाही किंवा त्या अनुषंगाने कोणत्या सूचनाही अद्याप आलेल्या नाहीत.’
‘क्राइम ब्रॅँच’चे महासंचालक सांगलीत
राज्य गुन्हे अन्वेषणच्या क्राइम डाटा कलेक्शन विंगचे अप्पर महासंचालक संजयकुमार सिंघल मंगळवारी सांगलीत आले आहेत. राज्यभरातील विविध गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्ह्यांच्या पद्धती, गुन्हेगारांची माहिती एकत्रित करण्यासाठी त्यांचा दौरा असून, त्यांचे कामकाज पोलिस अधीक्षक कार्यालयातूनच सुरू आहे. अनिकेत कोथळे खून प्रकरणाचीही त्यांनी माहिती घेतल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीने साथीदाराच्यामदतीने केला खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली/ शिराळा
शिराळा तालुक्यातील शिरशी येथील चक्रभैरव मंदिरात कृष्णात तुकाराम शिंदे (वय ४३, कुंडल) यांचा झालेला खून त्यांच्या पत्नीनेच एका साथीदाराच्या मदतीने केल्याचे उघड झाले आहे. चारित्र्याचा संशय घेऊन सतत होणाऱ्या छळामुळेच नियोजित कट करून पतीचा खून केल्याची कबुली उज्ज्वला शिंदे (वय २७) हिने दिली आहे. तिला अटकही करण्यात आली असून, तिच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांना दिली.
अमावास्येच्या रात्री शिरशी येथील डोंगरावर असलेल्या चक्रभैरव मंदिराच्या गाभाऱ्यात १८ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीचा खून झाल्याचे समोर आले होते. त्या ठिकाणी लिंबू, गंडा, दोरा अशा वस्तू आढळल्याने सुरुवातील हा नरबळीचा प्रकार असावा, असा संशय होता. परंतु, संबधित देवस्थान महादेवाचा अवतार मानले जात असल्याने त्या ठिकाणी गोड नैवद्याचीच प्रथा आहे. तरीही नरबळीच्या शक्यतेकडे दुर्लक्ष न करता पोलिसांनी तपास सुरू ठेवला. त्या व्यक्तीची ओळख पटविण्यापासून ते कृत्य करणाऱ्या संशयितांचा शोध घेणे, हे एक प्रकारचे आव्हानच होते. पोलिस उपअधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने, गुंडा विरोधी पथकांबरोबरच शिराळा, इस्लामपूरचे पोलिस तपासात मग्न होते. संबधित व्यक्तीचे नाव कृष्णात तुकाराम शिंदे असे असून, ते मूळचे कुंडल येथील राहणारी असल्याचे समोर येताच तपासाला गती आली. हा नरबळीचा प्रकार नसून कृष्णात शिंदे यांच्या छळाला कंटाळूनच पत्नीने नियोजित कट करून साथीदाराच्या मदतीने त्यांचा खून करून नरबळीचा आभास निर्माण केल्याचे प्राथमिक तपास उघडकीस आले.
कृष्णात शिंदे आणि त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्यात सतत वाद होत होता. चारित्र्याचा संशय घेऊन पती मारहाण करीत असल्याने ती भिलवडी येथे माहेरी रहात होती. १६ नोव्हेंबर रोजी तिने पतीचा खून करण्याचा कट रचला. दोघांतला वाद मिटविण्यासाठी देवाला जायचे असल्याचे सांगून तिने कृष्णात शिंदे यांना अंकलखोपला बोलवून घेतले. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी काही अंतरापर्यंत साथीदाराच्या मोटारसायकलवरुन तिघेजण गेले. तेथून दुसऱ्या वाहनाने शिरशी येथे जाऊन रात्री तेथील डोंगरावरील चक्रभैरव मंदिरात गेले. त्या ठिकाणी वरवंटा, विटांच्या सहाय्याने शिंदे यांचा खून केला. त्या ठिकाणी लिंबूसह अन्य साहित्य मुद्दाम टाकून संबधित प्रकार नरबळीचा असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करून संशयित पसार झाले. १८ नोव्हेंबर रोजी खुनाचा प्रकार समोर आला. सखोल तपासानंतर हा प्रकार नरबळीचा नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही अधीक्षक शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडजवळील उंब्रज येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
उंब्रजच्या (ता. कराड) बाजारपेठेत असणाऱ्या एका बंगल्यावर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बंगल्यातील वृद्धेच्या तोंडावर उशी दाबून तिचा खून केला. प्रतिकार करणारांना बेदम मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी अक्षरश: थैमान घालत अन्य पाच ठिकाणी दरोडा टाकला. या घटनेत दरोडेखोरांनी सुमारे ४० तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडली.
या घटनेने उंब्रजसह परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जैबुन करीम मुल्ला (वय ८६, रा. उंब्रज, ता. कराड) असे दरोड्यात खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बाजारपेठेत असणाऱ्या कन्याशाळेलगतच्या अल्ताफ करीम मुल्ला यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. बंगल्याच्या पाठीमागील बाजूने आत प्रवेश करून बंगल्याचे मागील दरवाजा उचकटून बंगल्यात प्रवेश केला. या वेळी चोरी करीत असताना अल्ताफ यांच्या आई जैबुन करीम मुल्ला यांच्या रुममध्ये प्रवेश केला. त्या जाग्या झाल्याने दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडावर उशी ठेवून दाबून धरल्याने त्यातच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यांच्या अंगावरील असणारे सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे सोने चोरुन दरोडेखोरांनी याच कंपाऊंडमधील अल्ताफ यांचे बंधू रियाज मुल्ला यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला. पाठीमागील दरवाजा कटावणीने फोडत असताना रियाज यांची अभ्यास करीत असलेली मुलीला चाहूल लागली. तिने लगेच घरातील लोकांना जागे केल्याने दरोडेखोर पसार झाले. घटनेची फिर्याद सुहेल अल्ताफ मुल्ला यांनी उंब्रज पोलिसांत दिली आहे.
आणखी चार ठिकाणी दरोडे
अन्य एका घटनेत अडीच ते तीनच्या सुमारास दरोडेखोर पाटण-पंढरपूर राज्य मार्गावरील महावितरण कार्यालयासमोर असलेल्या संजय मोरकळ यांच्या बंगल्याचे गेट उघडून आत प्रवेश केला. या वेळी घरातील मोरकळ यांच्या पत्नी जाग्या असल्याने त्यांनी लगेच मोरकळ यांना सांगितले. मोरकळ यांनी चोर...चोर.., असा आवाज दिल्याने दरोडेखोर तेथूनही पसार झाले. या बाबत माहिती देताना मोरकळ यांनी सांगितले. किमान ३ ते ४ जण हातात ग्लोज तोंडाला व डोक्याला रुमाल गुंडाळलेले लोक हातात कटावणी, कटर, कुऱ्हाड, अशी धारधार शस्त्रे घेऊन आली होती. त्यांनी जाताना त्यांच्या कंम्पाउडच्या तारा तोडून टेंम्पोतून पसार झाले.
दहा तोळे लंपास
तिसऱ्या घटनेत महामार्गालगत असणाऱ्या हॉस्पिटल पाठीमागील संजय कुंभार यांच्या बंद बंगल्याचे कुलूप उचकटून बंगल्यात प्रवेश करून बंगल्यातील सर्व खोल्यांतील साहित्य उसकटले. चोरट्यांनी घरातील सुमारे ५ ते १० तोळे लंपास केले आहे. कुंभार कुटुंबीय जवळच्या नातलगाच्या लग्नासाठी परगावी गेले आहेत. कुंभार यांच्या घराचे कुलुप तोडण्याआगोदर दरोडेखोरांनी शेजारील घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या.
दरोडेखोर गावातील भैरवनाथ मंदिरानजीक असणाऱ्या संजीव प्रभाकर जाधव व राजेंद्र गोविंद रावळ यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून घरातील साहित्य विस्कटून दरोडेखोरांनी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
‘इडली कामत’वरही दरोडा
दरोडोखोरांनी महामार्गावरील शिवडे गावच्या हद्दीतील हॉटेल इडली कामत या हॉटेलवर पहाटे साडेतीन वाजणेच्या सुमारास दरोडा टाकून गल्यातील सुमारे सात हजार रुपयांची रोकड लांबवला आहे. सदर चोरीची घटना हॉटेलमध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये तीन चोरटे दिसून येत आहेत.
आयजी नागरे-पाटील यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील,जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार,येथील उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस यांनी भेट देऊन तपास केला. सदर घटनेचा अधिक तपास उंब्रज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे करीत आहेत. दरोड्यातील घटनाक्रम पहाता हे काम परजिल्ह्यातील सराईत टोळीचे काम असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याकरीता विविध पथके तयार करून पुढील तपासासाठी पाठवली असून, वेळ पडल्यास सीआयडीची मदत घेउन लवकरात लवकर तपास पूर्ण केला जाईल, असे अधीक्षक संदीप पाटील म्हणाले.
दुकाने, घरे फोडली; लोकांनी मारहाण
दरोडेखोरांनी दुकाने, घरे फोडत लोकांना मारहाण केली. दरोडेखोरांनी परिसरातील पाच ठिकाणी दरोडा टाकत जवळपास पंधरा लाखांपेक्षाही अधिक रक्कमेचा दरोडा टाकणाऱ्या या टोळीने चक्क ४०७ टेम्पो वापरल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाले आहे. धक्कादायक म्हणजे उंब्रजमधील नागरिक जीव वाचवण्यासाठी जोर जोरात आरडाओरडा करीत असतानाही कुणालाही न घाबरता अत्यंत शांत डोक्याने ही टोळी हातात कुऱ्हाड व कोयते घेऊन दरोडे टाकत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ने ट्रॅक सोडला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिल्ली येथील किसान मुक्ती संसदेहून कोल्हापूरला कार्यकर्ते घेऊन परतणारी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ कोल्हापूरचा ट्रॅक सोडला आणि गाडी मध्य प्रदेशच्या दिशेने १८० किलोमीटरपर्यंत धावली. बानमोर (मध्य प्रदेश) रेल्वेस्टेशनवर चुकीच्या ‌दिशेने रेल्वे जात असल्याचे समजल्यानंतर कार्यकर्ते संतप्त झाले. आरडाओरड करीत कार्यकर्ते खाली उतरले आणि त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

रेल्वे प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर गाडीला ग्वाल्हेरमार्गे कोल्हापूरपर्यंतचा ट्रॅक उपलब्ध करून दिला. खासदार राजू शेट्टी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली. सध्या ही गाडीचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. ही गाडी आज, (गुरूवार) दुपारपर्यंत कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा पोहचण्याची शक्यता आहे.

दिल्लीत २० आणि २१ नोव्हेंबरला देशव्यापी किसान मुक्ती संसद आयोजित केले होते. त्यासाठी कोल्हापूरहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ डब्यांची स्वतंत्र गाडी बुक केली. किसान संसद संपल्यानंतर २१ला ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ कोल्हापूरच्या दिशेने येण्यासाठी निघाली. दिल्लीहून मथुरा येथे आली. तेथे कोटा, कल्याण, पुणे, कोल्हापूर या मार्गावरील रूळावरून न येता मध्य प्रदेशच्या दिशेने १८० ‌किलोमीटर गेली. प्रवासादरम्यान रेल्वेतील सर्व शेतकरी गाढ झोपेत होते. बानमोर रेल्वे स्टेशनवर गाडीला सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे तासाहून अधिक काळ गाडी थांबली.

यासंबंधीची विचारणा इंजिन ड्रायव्हरने स्टेशनमास्तरला केली. रेल्वेतील शेतकरीही उतरून स्टेशनमास्तरला जाब विचारू लागले. त्यावेळी स्टेशनमास्तरने उलट तुम्ही इकडे कुठे आलात असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रूळावर येत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
0000000000
स्वाभिमानी एक्स्प्रेस ही विशेष रेल्वे होती. अशा गाड्यांचा मार्ग निश्चित नसतो. जो सर्वांत सोयीस्कर मार्ग असेल त्यावरून प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवले जाते. पॉइंट टू पॉइंट अशा धर्तीवरील ही सेवा असते. प्रवाशांच्या विनंतीनुसार या गाड्यांना थांबे दिले जातात. दिल्लीला जाताना ही गाडी नगाडा, कोटा, रतलाम या पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून गेली. परतीच्या प्रवासासाठी मात्र तिला मध्य रेल्वेचा मथुरा, झाशी, भोपाळ, ग्वाल्हेर, इटारसी, भुसावळ हा मार्ग देण्यात आला. आमच्याकडून कोणताही निष्काळजीपणा वा गैरकारभार झालेला नाही. आलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने गाडी जात असल्याने प्रवासी गोंधळले असावेत. मात्र, त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. उद्या (गुरुवारी) सकाळी ही गाडी कोल्हापूरला पोहोचेल.

अनिल सक्सेना

प्रवक्ते, रेल्वे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकच सांगणार गुन्हेगारी रोखण्याचे उपाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांत बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. बिहार, उत्तरप्रदेश या राज्यांनाही मागे टाकत महाराष्ट्रात वाढलेल्या या गुन्हेगारीमुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे बाल आणि युवकांतील गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘तुम्हीच उपाय सांगा’ असे म्हणत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये कोल्हापूर परिक्षेत्रात तब्बल ३० हजार मुलांशी ‘पोलिस महासंचालक युवा संसद’चे आयोजन करून हा संवाद साधला जाणार आहे.

भारतात १८ वर्षांखालील मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. किरकोळ कारणावरून मुले हिंसक बनत आहेत. खून, मारामारी, लूट याबरोबरच बलात्कार व इतर गुन्ह्यातही मुलांचा सहभाग वाढत आहे. टीव्हीवरील मालिका पाहून ही मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. पूर्वी बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांत गुन्हेगारीचे प्रमाण जास्त होते; पण गतवर्षी झालेल्या पाहणीत महाराष्ट्रातील बालगुन्हेगारी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक बालगुन्हेगारी आहे. किरकोळ चोऱ्या, मारामारी या पलीकडे जात खून, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांतही मुलांना अटक केली जात आहे. कोल्हापुरात दोन महिन्यांपूर्वी एका महिलेचा खून अशाच एका युवकाकडून झाला. मुंबईपाठोपाठ राज्याच्या इतर भागांतही अशी गुन्हेगारी वाढत असल्याने ती रोखण्यासाठी पोलिसांनी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

बालगुन्हेगारी रोखण्यासाठी ‘पोलिस महासंचालक युवा संसद’ हा उपक्रम यावेळी पुन्हा राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम अधिक व्यापक पातळीवर राबविला जाणार आहे. परिक्षेत्रातील १४५ पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून १४०० शाळा-कॉलेजमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये तब्बल ३० हजार मुले गुन्हेगारीविषयी आपले मत मांडतानाच उपायसुद्धा सुचवणार आहेत. विशेष म्हणजे या मुलांना बोलते करण्यासाठी तज्ज्ञांच्या वतीने संवाद साधला जाणार आहे. आठवी ते बारावीत शिकणाऱ्या मुलांबरोबरच पदवीचा अभ्यास करणाऱ्या युवकांचा दुसरा गट तयार करण्यात आला आहे. या मुलांना कायद्याची माहिती देतानाच त्यांच्याच गट तयार करून वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

बालगुन्हेगारीच्या प्रमाणात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्यासाठी युवकांशी संवाद साधणे आवश्यक आहे. म्हणूनच मुलांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

- विश्वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांवर परिणाम शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर विकासासाठी काम करणाऱ्या महापालिकेच्या यंदाच्या बजेटमधील अपेक्षित धरलेल्या ३९७ कोटी रुपयांच्या जमेपैकी १८५ कोटी रुपयांचीच जमा झाली आहे. त्यातील ५८ टक्के प्रशासकीय खर्च आहे. अल्प उत्पन्न, त्यातीलही निम्म्याहून अधिक प्रशासकीय खर्च आहे. त्यामुळ सध्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता दरमहा पगार करण्यासाठी प्रशासनाला ओढाताण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेतील जवळपास हजारहून ​अधिक रिक्त पदे भरणार कशी? हा मोठा प्रश्न आहे. ही पदे भरली नाही तर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच विकास कामांवर निश्चितच परिणाम होणार आहे.

महापालिकेची हद्दवाढ नाही, त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होत नाही. सध्या कर देणाऱ्या नागरिकांवर कराचा बोजा आणखी वाढवता येत नाही. या परिस्थितीत महापालिकेचा प्रशासकीय डोलारा सांभाळण्याबरोबरच नागरिकांसाठी असलेली विकास कामे करण्याचे आव्हान प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर आहे. उत्पन्न कमी व प्रशासकीय खर्चाची वाढत जाणारी टक्केवारी पाहता सरकारनेही नवीन पदे भरण्यास हात आखडता घेतला आहे. या प्रकारामुळे सध्या वर्ग एकपासून वर्ग चारपर्यंतची आवश्यक असलेली एक हजार ४८ पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी प्रशासनाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव विचारात घेण्यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती सरकार तपासणार हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे महापालिकेने यावर्षी बजेटमध्ये पकडलेले अपेक्षित उत्पन्न व सहा महिन्यानंतर त्यातील जमा झालेले उत्पन्न पाहता आहे ती परिस्थिती निभावणार हा प्रश्न उभा ठाकत आहे. तर एक हजार पदे भरली तर त्यांचे वेतन कशातून करणार? हा प्रश्नही आहे. सध्याचाच प्रशासकीय खर्च डोईजड आहे. ही पदे भरली तर त्यांचा पगार करणे शक्य होणार नाही, असे सुत्रांचे मत आहे. ही पदे भरता आली नाही तर महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधांची गाडी पुढे सरकरणार नाही, असेच दिसते.

गेल्यावर्षी ३१० कोटी रुपयांचे बजेट सादर करण्यात आले होते. यंदा हे बजेट ३९७ कोटी रुपयांचे सादर करण्यात आले आहे. सहा महिन्यात त्यापैकी उत्पन्नाच्या आकड्याने निम्मा टप्पा गाठला आहे. गेल्यावर्षी नोटबंदीमुळे अनेक थकबाकी जमा झाली होती. पण यंदा ती परिस्थिती होईल, असे नाही. त्यामुळे उद्दिष्टापर्यंत पोहचणार का? हाही प्रश्न

आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहता सर्वात जास्त एलबीटीसाठीचे ​अनुदान येत असून इस्टेट विभागाची सर्वात कमी जमा आहे. प्रशासनाला येत्या चार महिन्यात इतर विकास कामे करुन २१२ कोटी रुपये जमा करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४२३ संस्थांची नोंदणी रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकाराचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली होती. या अंतर्गत पाच वर्षांपेक्षा अधिकाळ लेखापरीक्षण न झालेल्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत जिल्ह्यातील २४२३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून १६२९ संस्थांवरील कारवाई अंतिम टप्प्यात आली आहे. सहकार विभागाच्या कारवाईमुळे संस्थांचालकांचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात संस्थांची स्थापना झाल्याने एकप्रकारे दोन्ही पक्षांना कारवाईचा दणका बसला आहे.

सहकार फेडरेशन तथा सहकार महासंघाची निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन आघाडी सरकारच्या कार्यकाळात सहकारी संस्थांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली. नोंदणी झालेल्या अनेक संस्था केवळ कागदोपत्री होत्या. अनेक संस्थांचे कामकाज, कार्यालयाचाच पत्ता नव्हता. त्यामुळे लेखापरीक्षण किंवा चेंज रिपोर्टचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. २०१२ च्या ९७ व्या घटनादुरुस्ती केल्यानंतर राज्य सरकारने १९६० च्या महाराष्ट्र सहकार कायद्यात सुधारणा केली. सुधारणानुसार २०१५ नंतर सहकारी संस्थांचे सर्वेक्षण हाती घेतले. त्यानंतर कागदोपत्री किंवा पिशवीबंद असलेल्या राज्यातील सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून २०१५ पासून सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली. ८,७८१ संस्थांची पडताळणी केली. यामध्ये पडताळणीमध्ये केवळ कागदोपत्री संस्थेची नोंदणी केली, पण कामकाज सुरू नाही अशा ३,३७२ संस्था बंद आढळल्या. या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ऑक्टोबर २०१६ अखरे २,८८२ संस्था अंतिम अवसायनात काढल्या. अशा संस्थांना वार्षिक अहवाल, लेखापरीक्षण, ताळेबंद पूर्ण करुन कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर २२३ संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा आदेश मागे घेतला. तर ८७ संस्थांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्यामुळे २,४२३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली. तसा अहवालही सहकार विभागाकडे पाठवला आहे. यानंतर १,५७४ संस्था अद्याप अवसायनात आहेत, या संस्थांची येणी-देणी अहवालाची पडताळणी केल्यानंतर नोंदणी रद्द करण्याची कारवाई होणार आहे.



मागासवर्गीय संस्थांवरील कारवाईला मुहूर्त मिळेना

जिल्ह्यातील मागसवर्गीय संस्थांमध्ये सुमारे ५०० कोटींचा गैरव्यवहार असल्याची शक्यता व्यक्त करुन सर्व संस्थांचे लेखापरीक्षण करण्यात आले. यामधील ३० संस्थांमध्ये अपहार झाल्याचे नमुद करण्यात आले. यापैकी केवळ चार संस्थांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले. पण यानंतर मोर्चे, आंदोलन झाल्याने ही कारवाई थांबली आहे. कवेळ संस्थांची नोंदणी न करता गैरव्यवहारांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींवर कारवाइ करण्याची मागणी सहकार विभागातून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरची उद्योग भरारी

$
0
0


Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : फाउंड्री क्षेत्रात देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कोल्हापुरातील फाउंड्रीचे तंत्रज्ञान आता परदेशात पोहोचले आहे. आफ्रिका खंडाच्या सुदान देशातील खार्टूम शहरात पूर्ण फाऊंड्री सेटअप उभारण्याची संधी शिरोली एमआयडीसीतील विजय इंजिनीअरिंग कंपनीला मिळाली आहे. ३० प्रकारच्या मशिन्सची निर्मिती आणि निर्यात करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, सुदानमधील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे काम सध्या विजय इंजिनीअरिंग कंपनीत सुरू आहे. या निमित्ताने सुदानच्या फाउंड्रीला कोल्हापुरी हातभार लागला आहे.

गेल्या काही वर्षांपासून मंदीच्या झळा सोसणारा फाउंड्री उद्योग पूर्वपदावर येत आहे. कोल्हापुरातील फाउंड्रीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आफ्रिका खंडातील देशांनी उत्सुकता दर्शविल्याने कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात आफ्रिकन देशांसाठी फाउंड्री तंत्रज्ञान दिले जात आहे. शिरोली एमआयडीसीतील विजय इंजिनीअरिंग अँड फॅब्रिकेटर्स कंपनीने कोल्हापुरातील फाउंड्रीच्या यशात मोलाची भर घातली आहे. कंपनीने सुदान देशातील खार्टूम शहरात संपूर्ण फाउंड्री सेटअप पुरविण्याचा करार केला आहे. यासाठी प्रतितास १५ टन सँड मूव्हिंग करण्याची क्षमता असलेल्या मशिन्स पुरविल्या जाणार आहेत. फाउंड्रीसाठी आवश्यक सँड प्लान्ट, मोल्ड बॉक्स, सँड मिक्सर, सँड कुलर, मोल्ड ट्रॅक लाइन, पोअरिंग लॅडल, कोल्ड बॉक्स कोअर मशिन, आदी ३० प्रकारची मशिन्स पाठविली जाणार आहेत. मशिन्स तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, नोव्हेंबरअखेरीस सर्व मशिन्सची निर्यात होणार आहे. या मशिन्स कोल्हापुरातून मुंबईला पाठविल्या जातील. त्यानंतर समुद्रमार्गे त्या सुदानमध्ये पोहोचणार आहेत.

फाउंड्री मशिन्स देण्यासह सुदानमधील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे. मशिन्सचे डिझाइन, पॅटर्न, प्रॉडक्शन, क्वॉलिटी कंट्रोल, देखभाल दुरुस्ती यांची माहिती प्रशिक्षणादरम्यान दिली जात असून, प्रत्यक्षात मशिन्स चालविण्याचा अनुभवही या प्रशिक्षणात दिला जात आहे. ऑक्टोबर महिन्यात पहिल्या १२ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले, तर सध्या आणखी १२ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. २५ नोव्हेंबरला प्रशिक्षण पूर्ण होणार असल्याची माहिती विजय इंजिनीअरिंगचे प्रमुख विजय पवार यांनी दिली आहे. भगवान पवार, अजय पवार, रोहित पवार, नवनाथ पवार यांनी प्रशिक्षण दिले. कोल्हापुरातून कमी क्षमतेच्या फाउंड्री मशिन्सची विक्री यापूर्वी अनेकदा झाली आहे. मात्र, पहिल्यांदाच मोठ्या क्षमतेचा संपूर्ण फाउंड्री सेटअप उभारण्याची संधी कोल्हापुरातील कंपनीला मिळाली आहे. यातून कोल्हापूरच्या फाउंड्रीचा नावलौकिक वाढणार असल्याचे पवार यांनी सांगितले.


विक्रीपश्चातही देणार सेवा

आफ्रिकन देशांमध्ये पाठवली जाणारी फाउंड्री मशिन्स चालविण्याचे प्रशिक्षण तेथील कर्मचाऱ्यांना देण्याचे काम सुरू आहे. यानंतर सुदानमध्ये संपूर्ण फाउंड्री सेटअप उभा करून देण्याची जबाबदारी कोल्हापुरातील विजय इंजिनीअरिंगने घेतली आहे. मशिन्स विक्रीनंतर काही तांत्रिक अडचणी आल्यास सुदानमध्ये जाऊन सेवा दिली जाणार आहे. मशिन्ससह प्रशिक्षण आणि विक्रीपश्चात सेवेमुळे निर्यातीतही कोल्हापुरी फाउंड्रीचा ब्रँड निर्माण होऊ शकतो.

यापूर्वी देशात अनेक ठिकाणी आम्ही फाउंड्री मशिन्स पाठवल्या आहेत. निर्यातीच्या माध्यमातून कोल्हापुरी गुणवत्ता सातासमुद्रापार पोहोचत आहे. यातून रोजगारवाढीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. निर्यातीत कोल्हापुरी फाउंड्रीचा दबदबा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

विजय पवार, प्रमुख, विजय इंजिनीअरिंग कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरटे सुसाट, दीड महिन्यात ५० चोऱ्या

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या दीड महिन्यात चोरीच्या घटनांचे अर्धशतक झाले आहे. घरफोड्या आणि जबरी चोरीच्या घटना रोज घडत आहेत. पोलिस असल्याची बतावणी करून भामटे वृद्ध महिलांचे दागिने लंपास करतात. पोलिस ठाण्यांपासून हाकेच्या अंतरावर कारच्या काचा फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला जातो. मात्र पोलिसांना याची कुणकूणही लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सुट्ट्यांच्या कालावधीत बंद घरांना लक्ष करून चोरटे सक्रीय होतात, त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीसह दिवाळीच्या सुट्टीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते. अलिकडे मात्र रोजच चोरीच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचे प्रमाणही कमी आहे. भरदिवसा चोरटे महिलांचे दागिने लुबाडतात. बंद घरांचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करतात. चोरटे सीसीटीव्हीतही कैद होत आहेत, मात्र पोलिसांच्या हाती लागत नाहीत. चोरीच्या घटना रोखण्यासाठी रेकॉर्डवरील चोरट्यांचा बंदोबस्त केल्याचे पोलिस वारंवार सांगतात. गेल्या वर्षभरात अवैध व्यावसायिकांसह चोरट्यांनाही पोलिसांनी हद्दपार केले, पण हद्दपार चोरटे पुन्हा जिल्ह्यात सक्रीय होत आहेत. गेल्या दीड महिन्यात शहरासह जिल्ह्यात चोरीच्या ५० घटना घडल्या आहेत. चोऱ्यांचे सत्र थांबवण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

00000

घरफोड्यांनी नागरिक त्रस्त

बंद घरांना लक्ष्य करून चोरटे लाखोंचा ऐवज लंपास करीत आहेत. कडी-कोयंडा तोडणे, खिडकीचे गज कापणे, छतावरील कौले काढून चोरट्यांनी रोख रकमेसह किमती ऐवज लंपास केला आहे. दोन-तीन तासांसाठी घराबाहेर गेलेल्या लोकांनाही घरी येईपर्यंत घरात होत्याचे नव्हते होईल, याची धास्ती असते. काही क्षणात चोरटे घर साफ करतात. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांचा तर पोलिस यंत्रणेवरील विश्वासच उडाला आहे. शिवाय बंद दुकानांतही चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दुकानांचे शटर उचकटून साहित्यासह रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेलाही चोरटे आव्हान देत आहेत.

000000

भामट्याचे पोलिसांनाच आव्हान

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या दीड महिन्यांत दहा ठिकाणी भामट्यांनी महिलांचे दागिने लंपास केले आहेत. सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वृद्ध महिलांना गाठून हे भामटे पोलिस असल्याची बतावणी करतात. समोर खून झाला आहे, आमचे साहेब तपासणी करीत आहे, अशा भूलथापा मारून अंगावरील दागिने रुमालात गुंडाळण्यास सांगतात. पाहण्यासाठी दागिने हातात घेतात. काही क्षणात रिकामा रुमाल महिलांच्या हातात किंवा त्यांच्या पिशवीत ठेवतात. भामटे निघून गेल्यानंतर दागिने लंपास झाल्याचे महिलांच्या लक्षात येते. हातचालाखी करून चोरटे दागिने घेऊन पोबारा करतात. काही घटनांमध्ये चोरटे महिलांना अडवून ठेवतात. अंगावरील दागिने काढून ठेवण्याचा सल्ला देतात. काही वेळात पाठीमागून दुचाकीवरून आलेले चोरटे महिलांच्या हातातील दागिने घेऊन पळ काढतात. अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. दीड महिन्यात दहा ठिकाणी भामट्यांनी चोऱ्या करून पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

000000

नागरिकांनीच पकडले चोरटे

पोलिसांना चोरटे सापडत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसात नागरिकांनी स्वतःच दोन ठिकाणी चोरट्यांना रंगेहात पकडले. आर. के. नगर येथे घरफोडी करणारा चोरटा नागरिकांच्या हाती लागला, तर जामदार क्लब परिसरात नागरिकांनी चोरट्याला रंगेहात पकडले होते. या दोन्ही चोरट्यांना नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अधिक चौकशीत यांच्याकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांची कार्यपद्धती अशीच सुरू राहिली तर येणाऱ्या काळात नागरिकांनाच गस्तीचेही काम करावे लागण्याची शक्यता आहे.

00000000

उघडकीस येण्याचे प्रमाण कमी

चोरी, घरफोडीच्या घटनांत वाढ होत असताना अशा घटना उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात ३२ चोऱ्यांची नोंद आहे. यातील केवळ ५ चोऱ्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. चोरटे सापडलेच नाहीत, तर पुन्हा पुन्हा ते चोऱ्या करीत राहणार. यामुळे नागरिक धास्तावले असून, पोलिसांना चोरटे सापडत नाहीत की पोलिस त्यांना पकडत नाहीत? असा सवाल उपस्थित केला आहेत.

0000000

चोरीच्या घटना

ऑक्टोबर – २०१७

घरफोड्या – २५

उघड – ४

जबरी चोऱ्या – ८

उघड – १

नोव्हेंबर – २०१७

घरफोड्या – १७

जबरी चोऱ्या - ८

========

वाढत्या घरफोड्या आणि जबरी चोऱ्या रोखण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. काही चोरट्यांचा सुगावा पोलिसांना लागला आहे. सीसीटीव्ही फुटेजसह काही गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस संशयितांच्या मागावर आहेत. लवकरच बहुतांश चोरीच्या घटनांचा छडा लागेल. शिवाय चोऱ्या रोखण्यासाठी गस्तही वाढवली आहे.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॅकवेलचे काम मे पूर्वी पूर्ण करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासाठी महत्वाच्या असलेल्या थेट पाइपलाइन योजनेतील महत्त्वाचे असलेल्या जॅकवेलचे काम मेपूर्वी पुर्ण करण्याचे आदेश आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी आढावा बैठकीत महापालिका प्रशासनाला दिले. सध्या जॅकवेलबरोबरच २२ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम शिल्लक आहे. तर योजनेवर आतापर्यंत १८४ कोटी रुपये खर्च झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा १४९ कोटींचा निधी अजून मिळायचा असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, केएमटी वापरण्याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी महिन्यातील पहिल्या सोमवारी बस डे आयोजित करण्यात येणार आहे.

आमदार पाटील यांनी महापौर हसीना फरास, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात आढावा बैठक घेतली. यामध्ये थेट पाइपलाइन योजनेबरोबरच उत्पन्न वाढ, केएमटीची सुधारणा, अतिक्रमण निर्मूलन अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही उपाययोजनाही सुचवण्यात आल्या. शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे.

बैठकीनंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, थेट पाइपलाइनमधील ३० किलोमीटर पाइपचे काम झाले आहे. मुख्य जॅकवेलच्या कामासाठी मात्र काळम्मावाडी धरणातील पाणी कमी होण्याची आवश्यकता आहे. जानेवारीनंतर या कामाला सुरुवात करता येणार आहे. त्यानंतर प्रशासनाला कंत्राटदाराशी बोलून कोणत्याही परिस्थितीत जॅकवेलचे काम पावसाळ्यापूर्वी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर इतर कामे पावसाळ्यातही होत राहतील. यामुळे ठरल्यानुसार मे २०१८पर्यंत काम पूर्ण होणार नाही. आतापर्यंत योजनेसाठी केंद्र सरकारचे १७० कोटी व राज्य सरकारचे २० कोटी रुपये खर्च झाले आहेत. महापालिकेचा ५० टक्के हिस्सा २१ कोटी रुपयेही खर्च झाला आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी दोन्ही सरकारकडून निधी यायचा आहे. या योजनेच्या कामावर निरीक्षणासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची मागणी सातत्याने केली आहे. तसेच पाणीपुरवठ्यातील भरती करण्यासाठी प्रशासनाला सांगण्यात आले आहे. यावेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, सभागृह नेते प्रविण केसरकर, महिला बालकल्याण सभापती वहिदा सौदागर आदी उपस्थित होते.

००००००००००००

महिन्याच्या पहिल्या सोमवारी बस डे

केएमटीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी बस डे करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी केएमटी प्रशासनाला तयारी करण्यास सांगितली आहे. या डेसाठी विविध व्यावसायिकांच्या बस उपलब्ध करण्यात येणार आहेत. या दिवशी नागरिकांनी केएमटीचाच वापर करावा, असे नियोजन केले जात आहे. यातून शहरासाठी आवश्यक केएमटी किती लागणार आहेत याचा अंदाज येण्यास मदत होणार असून त्यानुसार तयारी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लाख’मोलाचा ग्रंथोत्सव ‘उरकला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रंथोत्सवातून साहित्याचा जागर घडावा, वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा, नववाचक निर्माण व्हावेत, हा उद्देश असतो. राज्य सरकार त्यासाठी लाखो रुपये खर्चून ग्रंथोत्सव भरविते. मात्र प्रशासना​ची उदासिनता, नियोजनात त्रुटी आणि साहित्यिक कार्यक्रमांचा अभाव यामुळे यंदाचा ‘कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव’ हा निव्वळ सरकारी कार्यक्रम ठरला. दोनदिवसीय महोत्सवातून कोल्हापुरात कसलाही साहित्यिक माहौल तयार झाला नाही. ना कथाकथन, ना शाळकरी मुले व कॉलेज युवा-युवतींसाठी साहित्यिक कार्यक्रम, नावापुरते आयोजित परिसंवाद यामुळे ‘लाख’मोलाच्या ग्रंथोत्सवातून कसलाच साहित्य जागर घडला नाही.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या आठवड्यात ग्रंथोत्सव भरविला होता. गेल्या काही वर्षांत शिक्षण विभाग आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून कोल्हापुरातील ग्रंथोत्सवाची वेगळी ओळख निर्माण झाली होती होती. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून साहित्याचा जागर मांडला होता. त्यानुसार ग्रंथोत्सवचे नियोजन करणे अत्यावश्यक होते.

मात्र, संयोजन समितीत सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांचा भरणा आणि साहित्य संस्थांना कमी स्थान यामुळे संयोजनापासून घडी विस्कळीत झाली. सरकारी अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठका घेत नियोजन केले. नियोजन बैठकीतही संयोजन समितीतील सर्वांना सामावून घेतले नसल्याने अनेक सदस्यांना ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांची रूपरेषा उद्घाटनाच्या दिवसापर्यंत माहीत नव्हती. शाळकरी मुलांच्या सहभागाने ग्रंथदिंडी जोरकसपणे निघाली; पण ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला विलंब लागला.

वरिष्ठ अ​धिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, ते तिकडे फिरकलेच नाहीत. यामुळे संयोजकांना ऐनवेळी पाहुण्यांसाठी धावपळ करावी लागली. नियोजनाअभावी व सरकारी छाप कार्यक्रमामुळे ज्येष्ठ साहित्यिकांना मात्र उद्घाटन सोहळ्यासाठी तीन तास सरकारी पाहुण्यांची वाट पाहात सभागृहात थांबावे लागले.

ग्रंथोत्सवात दोन परिसंवादाला एक वक्ता आणि अध्यक्ष एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. वास्तविक एखाद्या विषयावर तीन-चार वक्ते आणि अध्यक्ष यांच्या उपस्थितीत परिसंवाद होतो. मात्र, ग्रंथोत्सवात प्रत्येक कार्यक्रम उरकण्याइतकाच संयोजकांचा उद्देश होता की काय, अशी शंका येण्याइतपत त्यांचा कारभार होता. ग्रंथोत्सवाची प्रसिद्धी, मार्केटिंग न झाल्याने अनेकदा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत संयोजक असे चित्र पाहावयास मिळाले. नवीन वाचक घडविणे, साहित्यिक व वाचक भेटीचा कार्यक्रम, कथाकथन, महिला लेखकांना ग्रंथोत्सवात सामावून घेणे, मराठीतील ख्यातनाम साहित्यिकांना आमंत्रित करून त्यांचा आणि स्थानिक लेखकांत संवाद घडविणे यापैकी कुठलाच साहित्यिक कार्यक्रम घेण्याचे संयोजकांना सुचले नसल्याने ग्रंथोत्सव वाचकांपासून लांबच राहिला.
वाचनसंस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने ग्रंथोत्सव भरविला होता. ग्रंथोत्सव सर्वांसाठी खुला होता. त्यानुसार नामवंत लेखकांना आमंत्रित केले होते. स्थानिक कवी व उदयोन्मुख कवींना व्यासपीठ मिळावे म्हणून कवितावाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. प्रत्येक सत्रात सहभागी वक्ते, लेखकांना ग्रंथ भेट दिले. ग्रंथोत्सवाला दोनही दिवस चांगला प्रतिसाद लाभला. ग्रंथोत्सवाच्या आठ दिवस अगोदर प्रसिद्धी सुरू होती.

अपर्णा वाईकर,

जिल्हा ग्रंथालय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट केबिन्स जप्त करणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शहरामधील अनाधिकृत केबीन्स हटवण्याची मोहीम महापालिका सोमवारपासून हाती घेणार आहे. या मोहिमेत केबीन्स जप्त केल्या जाणार आहेत. त्या परत दिल्या जाणार नसल्याने पुन्हा त्या जागेवर येण्याचा प्रश्न कमी होईल, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. अतिक्रमणे हटवली जाण्याची आवश्यकता असली तरी प्रत्येक भागातील अतिक्रमणांची माहिती नगरसेवकांना द्या, अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी आयुक्तांना केली.

आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासोबत घेतलेल्या आढावा बैठकीत अतिक्रमणाचा प्रश्न चर्चेला आला. अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे केबीन्स लावण्यात येत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्याबाबतची माहिती देताना आमदार पाटील म्हणाले, अतिक्रमणांबाबत कारवाई केली पाहिजे. पण ती कोणाच्या भागात आहेत, त्याची माहिती नगरसेवकांना द्या. एकदा मोहीम राबवल्यानंतर पुन्हा केबीन्स लावली जातात. त्यामुळे ठोस कारवाई करता येते का याबाबत आयुक्तांना सांगण्यात आले.

केएमटीबाबतही काही निर्णय घेण्याचे ठरवण्यात आल्याचे सांगत आमदार पाटील म्हणाले, ‘देखभाल व पगारावर जास्त खर्च होत आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी तोट्यातील मार्ग बंद करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी त्या गावातील ग्रामस्थांची बैठक घेण्यात येणार आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठीही विचार करण्यात आला. मोबाइल टॉवरकडून त्यांच्या ऑपरेटरनुसार वसुली, ज्यांचा घरफाळा लागलेला नाही त्यांना तातडीने घरफाळा लावून देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र घरफाळा कॅम्प घेतला जाणार आहे. त्याचेही नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या सी व डी वॉर्डमधील सर्व्हे झाला असून ई वॉर्डमधील सर्व्हेला सुरुवात झाली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर नवीन मिळकती सापडतील, अशी आशा आहे.’

आमदार पाटील म्हणाले, ‘शहरातील चौक व दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यास जे लोक इच्छूक असतील, त्यांना नियम व अटी घालून महापालिकेच्यावतीने परवानगी देण्यात यावी. त्यांच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून ती व्यवस्थित करण्यासाठी डिपॉझिट घेण्याबाबत विचार करावा.’

शिवसेनेचा अतिक्रमण निर्मूलनाला पाठींबा

शहर अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी महापालिका प्रशासनाला शिवसेनेचा पाठींबा असेल. पण प्रशासनाने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याबरोबरच कोर्टात दाद मागू असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे. पवार यांनी अनेक पुढाऱ्यांच्या बेकायदेशीर टपऱ्या व हातगाड्या असून त्यापासून त्यांना भाडे मिळत आहे. अनेक ठिकाणी बोगस ठराव करुन एक लाख रुपये घेऊन शहरात मोक्याच्या ठिकाणी केबीन्स दिल्या आहेत. अशी फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकशाही हुकूमशाहीकडे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘भारताची सर्वात मोठी ताकद लोकशाही ही आहे. मात्र गेल्या काही वर्षात लोकशाहीला सत्तेतील काही मक्तेदारांनी हुकूमशाहीचे स्वरूप दिले आहे. सध्याच्या पिढीची विचारशक्ती थांबवून तिला आभासी जगाचे आकर्षण देणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे देश हुकूशाहीच्या दिशेने चालला आहे. ही अवस्था धोकादायक आहे’ अशी खंत भाषातज्ज्ञ, गणेश देवी यांनी व्यक्त केली. दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय, महिला दक्षता समिती, निसर्गमित्र, जनस्वास्थ्य दक्षता समिती व पाटगावकर कुटुंबिंयांच्यावतीने स्वातंत्र्यसैनिक प्रा. चंद्रकांत पाटगावकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘प्रगतीशीलतेचे नवे संदर्भ तथा समतेचा पुनर्विचार’ या विषयावर गणेश देवी यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. राजन गवस होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर, विनय पाटगावकर उपस्थित होते.

गणेश देवी म्हणाले, ‘सत्ताधारी डिजिटल युगाला प्राधान्य देत आहेत. मात्र या तंत्रज्ञानाच्या जगातून बाहेर पडायचे असेल तर जैविक आणि सांस्कृतिक वैविध्य व माहितीपूर्ण ज्ञानाकडे आजच्या तरूणाईने वळले पाहिजे. लोकशाहीची खरी व्याख्या जाणून घेण्यासाठी तरूणाईची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ज्यावेळी राज्यघटना आस्तित्वात आली तेव्हा माणसांना महत्त्व होते. मात्र, आता आधारकार्ड, पॅनकार्ड अशी तंत्रज्ञानाची माध्यमे डिजिटल ओळख बनली आहेत. बोलीभाषा लोप पावत आहेत आणि नव्या डिजिटल भाषा जन्माला येत आहेत. कार्पोरेट जगामुळे राहणीमानाच्या कक्षा रूंदावल्या आहेत आणि त्यातून माणसामाणसांमध्ये दरी निर्माण होत आहे. प्रसिद्धीच्या माऱ्यातून प्रतिमा तयार करण्याचे काम सुरू आहे.’

गणेश देवी म्हणाले, ‘या सगळ्या आक्रमणांविरोधात लढण्यासाठी आज आपल्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकर, गांधी या व्यक्ती नाहीत. प्रगती आणि विकास करत असताना तंत्रज्ञानाच्या यांत्रिकीकरणाशी किती अधीन व्हायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीच्या मुखवट्यामागे हुकूमशाहीचा चेहरा लपलेला असून नव्या नियम आणि कायद्याच्या कचाट्यात आपली लोकशाही अडकवली जात आहे. त्यासाठी ज्ञानाचा मार्गच उपयुक्त ठरू शकतो.’

सुरेश शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. अनुराधा मेहता यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. राणिता चौगुले यांनी स्वागत केले. अलका देवलापूरकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकीचा पेपर फुटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सुरू असलेल्या अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल शाखेच्या मशीन डिझाइन या विषयाची प्रश्नपत्रिका बुधवारी फुटली. या प्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न परीक्षेच्या व्हॉटसअॅपद्वारे व्हायरल होत असल्याची निनावी तक्रार विद्यापीठाच्या परीक्षाविभागाकडे आली होती. या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता दुपारी हा प्रकार उघडकीस आला.
सध्या अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू आहेत. प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी दोन तास ऑनलाइन पाठवल्या जातात. संबंधित कॉलेजमार्फत त्यांच्या प्रिंट काढून मुलांना दिल्या जातात. त्यानुसार बुधवारी पन्हाळा येथील एका अभियांत्रिकी कॉलेजला प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठवण्यात आली, पण काही वेळातच या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व्हॉटसअॅपद्वारे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हायरल झाला. याबाबतची तक्रार अभियांत्रिकीच्या काही विद्यार्थ्यांनीच परीक्षा विभागाकडे तक्रार केली. तक्रार करण्यात आलेल्या माहितीमध्ये प्रश्नपत्रिकेतील मजकूर परीक्षेच्या वेळेआधी दीड तास व्हायरल झाल्याचे म्हटले आहे. या तक्रारीचीही शहानिशा विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तक्रार येण्यापूर्वीच पेपर झाल्याने विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामध्ये तीन मुलांना चौकशीसाठी बोलावून घेतले. याबाबत सत्यता आढळून आल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
गुन्हा उघड झाल्यास कडक शिक्षा
प्रश्नपत्रिका फोडणे, त्यातील मजकूर व्हायरल करणे हा गंभीर गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास पाच वर्षे सक्तमजुरी व एक लाख रूपये दंड अशी तरतूद आहे. तसेच याबाबत संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनाही दोषी ठरवण्यात येते.
०००००००००
पन्हाळ्यातील एका कॉलेजमध्ये पेपर फुटल्याबाबत काही तक्रारी दुपारी आल्या होत्या. तक्रारींची शहानिशा करण्यासाठी परीक्षा विभागाने काही कर्मचाऱ्यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तीन विद्यार्थ्यांची नावे पुढे आली. त्यांची चौकशी करण्याचे काम सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही बोलवून घेतले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रश्नपत्रिकेतील मजकूर पसरवणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल. सध्या प्रश्नपत्रिकेतील काही मजकूर बाहेर पडला आहे मात्र तो मजकूर विद्यापीठाच्या अधिकृत प्रश्नपत्रिकेतील आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सरकारने पावडरची खरेदी करावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडरचे दर घटल्याने दूध संघ आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा अडचणीच्या काळात डॉ. वर्गीस कुरियन यांनी नेहमीच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मार्ग काढला. पण सध्या त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव बासत आहेत. संघांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने ‘ना नफा, ना तोटा’ धर्तीवर पावडरची खरेदी करावी. अथवा, थेट शेतकऱ्यांना प्रतिलिटर चार ते पाच रुपये अनुदान द्यावे’ असे मत राष्ट्रीय डेअरी विकास प्रकल्पाचे अध्यक्ष अरुण नरके यांनी व्यक्त केले.

डॉ. वर्गीस कुरियन यांच्या २६ नोव्हेंबर जन्म दिवस ‘भारतीय दुग्ध दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. डॉ. कुरियन यांना अभिवादन करण्यसाठी देशभरात काढलेल्या मोटारसायकल रॅलीचे बुधवारी गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात स्वागत करण्यात आले. कोल्हापुरी फेटा बांधुन रायडरांचे खास स्वागत झाले. ‘अमुल’ने आयोजित केलेल्या रॅलीला कुचीकोडी (केरळ) येथून सुरुवात झाली.

नरके म्हणाले, ‘गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्यामुळे डॉ. कुरियन यांच्याशी संपर्क आला. यानंतर डॉ. कुरियन यांचे दुग्ध व्यवसायासाठी सातत्याने मार्गदर्शन मिळाले. संपूर्ण देशात दुग्ध व्यवसाय अडचणीत येईल, त्यावेळी डॉ. कुरियन यांची मदत मिळाली. केंद्र सरकारबरोबर चर्चा करुन मार्ग काढण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार होता. पण सद्य:स्थितीला त्यांच्या नेतृत्वाची उणीव भासत आहे.’

ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे म्हणाले, ‘गोकुळ संघाला शेअर्स भांडवल वाढवण्याचा सल्ला डॉ. कुरियनन यांनीच दिला. त्यामुळे गोकुळ आज सक्षमपणे उभा आहे.’

यावेळी रायडर कृष्णकुमार, प्रवीण मोरच्छाले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास समीर नागरे, अतुल सुरू, मनोज सोनावणे, हरी शंकर, मानसिंग पाटील यांच्यासह संचालक जयश्री पाटील-चुयेकर, उदय पाटील, महाव्यवस्थापक आर. सी. शहा व अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी प्रास्ताविक केले. संचालक धैर्यशील देसाई यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी चौक सुशोभीकरण लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विविध गड किल्ल्यांवरील माती, दगड व पाणी तसेच जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी, शहरातील विविध तालमींमधील मातीच्या कलशांची सवाद्य मिरवणूक, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व जलाभिषेक, सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून शहरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. १० डिसेंबर रोजी पायाभरणी व भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमदार राजेश क्षीरसागर व महापौर हसीना फरास यांनी ही माहिती दिली. सुशोभीकरणासाठीच्या ८७ लाखांच्या इस्टिमेटपैकी ८५ लाख रुपयांचा निधी महापालिकेकडे वर्ग झाला आहे असे आमदार क्षीरसागर म्हणाले.

आमदार क्षीरसागर यांनी शिवाजी चौक सुशोभिकरणासाठी प्रयत्न केले. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीच्या चार बैठक झाल्या आहेत. आर्किटेक्ट सूरत जाधव यांनी आराखडा तयार केला आहे. १० डिसेंबर रोजी पायाभरणी होणार आहे.

याबाबत आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘शिवाजी महाराजांचे वास्तव्य असणाऱ्या निवडक ४२ गड किल्ल्यांवरील माती, दगड, पाणी यांचे संकलन केले आहे. जिल्ह्यातील नद्यांचे पाणी व शहरातील विविध तालमींमधील माती एकत्र करून पायाभरणीला वापरले जाईल. तत्पूर्वी सकाळी आठ वाजता या सर्व कलशांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. भवानी मंडपातून ढोल ताशा, धनगरी ढोल, हलगी वादन व महिला लेझीम पथकांसह ही मिरवणूक काढून हे कलश शिवाजी चौकात आणण्यात येणार आहेत. भूमीपूजनाचा मान शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सेवा करणाऱ्या दांपत्याला देण्यात येणार आहे. दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात येईल. पोवाडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवाजी स्टेडियम येथे तीन ते पाच दिवसांचा लोकोत्सव साजरा करण्याचेही नियोजन आहे.

महापौर हसीना फरास म्हणाल्या, ‘सुशोभीकरणाचे काम सर्वांनी एकत्र येऊन करायचे आहे. त्यासाठी आवश्यक तयारी केली आहे. पायाभरणीच्या कार्यक्रमासाठीच्या कामासाठी आवश्यक समितींची स्थापना करण्यात येईल.’

आर्किटेक्ट सूरत जाधव म्हणाले, ‘सुशोभीकरणात केवळ शिवाजी महाराजांचाच इतिहास असावा या सूचनेप्रमाणे त्याची माहिती दिली जाणार आहे. पुतळ्याचा इतिहास लिहिला जाणार आहे. तर बाजीप्रभूंचा इतिहास, मावळा आदी रद्द करण्यात आले आहे. चबुतऱ्याची उंची दोन फुटाने वाढवण्यात येणार आहे. त्याचा आकारही बदलला जाणार आहे. या व्यतिरिक्त आराखड्यात अन्य बदल करण्यात आलेले नाहीत.’

बैठकीस माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे, मारुतराव कातवरे, आर. के. पोवार, परिवहन सभापती​ नियाज खान, मानसिंग जाधव, रविकिरण इंगवले, उमा बनछोडे, ईश्वर परमार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडू मुलींना लज्जास्पद वागणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील निवासी शालेय क्रीडा प्रशालेतील कबड्डी प्रशिक्षकाकडून खेळाडू मुलींना लज्जास्पद वागणूक दिली जाते. अश्लील भाषा वापरली जाते. त्यामुळे त्या‌ शिक्षकाची तरी बदली करावी, अन्यथा आम्हाला तरी प्रशालेतून काढावे, असे निवदेन ३० विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बुधवारी दिले. त्यांच्यासह शिक्षण सभापतींच्या कार्यालयात जाऊन काही विद्यार्थ्यांनी हे निवेदन दिले.

जिल्हा परिषदेची एकमेव निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे आहे. येथे ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण खेळाडू शिक्षण घेतात. खेळाचा सराव करतात. तेथील कबड्डी शिकवणाऱ्या प्रशिक्षका‌विरोधात खेळाडू मुले आणि मुलींनी गंभीर तक्रारीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, जून महिन्यात नियुक्त केलेल्या कबड्डी प्रशिक्षकाकडून वाईट वागणूक मिळत आहे. ते मुलांना शिव्या देतात. अपमान होईल, अशा नावाने हाक मारतात. मुलींना लांच्छनास्पद नावाने हाक मारतात. प्रशिक्षण देताना मुलींकडे घाणेरड्या नजरेने पाहतात. अश्लील भाषेत बोलतात. त्यासंबंधी मुख्याध्यापकांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांनी याची गंभीर दखल घेतली नाही. मुलामुलींच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने प्रशिक्षकांची बदली करावी. या ‌‌निवेदनावर ३० मुला, मुलींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीच्या फैलावानंतर यंत्रणेला जाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरामध्ये डेंगीची साथ वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात सापडलेल्या रुग्णांच्या ठिकाणांव्यतिरिक्त बुधवारी नव्या भागांमध्ये रुग्ण आढळून आले. या सर्व ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हे करण्यात येत आहे. राजारामपुरी, ​बागल चौक, शिवाजी पेठ या नव्या भागातील सहा रुग्ण आढळल्याचा अहवाल खासगी दवाखान्यांनी दिला आहे. याशिवाय ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून धूर व औषध फवारणी केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाकडून घराघरांमध्ये जाऊन तपासणी केली जात आहे.

गेल्या आठवड्यात शहरातील बुधवार पेठ, सीपीआर, मंगेशकरनगर, कनाननगर, जवाहरनगर भागात डेंगीचे रुग्ण आढळून आले होते. शहरातील अनेक खासगी दवाखान्यातून रुग्णांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिली जात नसल्याने साथीचा अंदाज येत नव्हता. पण अनेक भागात तापाचे रुग्ण, प्लेटलेट कमी होत असलेले रुग्ण आढळून येत होते. खासगी दवाखान्यांवर सक्ती केल्यानंतर तीन दिवसांपासून व्यवस्थित अहवाल दिले जात आहेत. बुधवारी राजारामपुरी, बागल चौक, शिवाजी पेठ तसेच खुपीरे गावातील रुग्ण आढळून आले. यापूर्वी ज्या भागात रुग्ण आढळले होते, तिथे डास निर्मूलनासाठी धूर फवारणी केली जात आहे. तसेच अळ्यांची पैदास थांबवण्यासाठी पाहणी करुन योग्य त्या ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. यासाठी शहरातील अकरा

केंद्रामधील डॉक्टर व सिस्टर सर्व्हे करत आहेत.

रुग्ण सापडलेल्या परिसरातील शंभरहून अधिक घरांमध्ये जाऊन पाणी साठवण्याच्या टाकी, बॅरेल, डबे तपासले जात आहेत. घराजवळील छोट्या भांड्यांमध्ये तसेच पाणी साठणाऱ्या ठिकाणीही अळ्यांची किती प्रमाणात पैदास होत आहे याचीही पाहणी केली जात आहे. जिथे पाणी साठण्याची ठिकाणे आहेत, तिथे गप्पी मासे सोडण्याचाही विचार केला जात आहे. ज्या परिसरात बांधकामे सुरू आहेत. तेथील पाणी साठवण्याच्या ठिकाणीही पाहणी करुन अळ्यांची पैदास पाहिली जात आहे. महिलांना एकत्र करुन कोरडा दिवस कसा पाळायचा याचे मार्गदर्शन केले जात आहे. जे रुग्ण आढळतील त्यांना सावित्रीबाई फुले रुग्णालयात

दाखल करुन घेण्याची व्यवस्था केली आहे. एक रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. ज्या भागात रुग्ण आढळले त्या भागात सकाळपासून आरोग्य यंत्रणा काम करत आहे. कोणत्या ठिकाणी औषध फवारणी प्रभावी ठरु शकेल, याचाही सर्व्हे केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठुरायाच्या मूर्तीवर पुन्हा रासायनिक लेपन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपन करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यासाठी पुरातत्व विभागाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी मटाशी बोलताना दिली. आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देण्यासाठी अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेल्या विठुरायाच्या मूर्तीची झीज ही भक्तांसाठी चिंतेचा विषय असून दुर्दैवाने गेली १० वर्षे पुरातत्व विभाग देत असलेल्या सर्व सूचनांचे योग्य पालन झाले नसल्यानेच ही झीज वाढत चालली आहे.

विठूरायाची हि स्वयंभू मूर्ती वालुकाशम दगडाची असून अनेक वर्षांपासून मूर्तीवर झालेल्या महापुजांमुळे रासायनिक क्रियेने मूर्तीची झीज झपाट्याने होत गेली. २०१० पासून या महापूजा बंद करण्यात आल्या. मात्र त्यामुळे अलीकडच्या काळात १९ फेब्रुवारी १९८८ साली मूर्तीवर पहिल्यांदा एपॉक्सीचा लेप देण्यात आला होता. यानंतर २४ मार्च २००५ आणि शेवटची प्रक्रिया १८ ते २० मार्च २०१२ मध्ये करण्यात आली होती. शेवटच्या दोन प्रक्रियांच्यावेळी सिलिकॉन (वॉकर बी एस २९०) या रसायनाचा लेप देण्यात आला असला तरी दर पाच वर्षानंतर मूर्तीवर आता ही प्रक्रिया सातत्याने करावी लागणार आहे.

वर्षभरात विठुरायाच्या दर्शनासाठी सव्वा ते दीड कोटी भाविक मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेत असल्याने या घर्षणामुळे सर्वात जास्त झीज पायाची होत असते. विठ्ठल गाभाऱ्यातील नंतरच्या काळात भिंतीवर बसविलेल्या संगमरवरी फरशा हटविण्याबाबत पुरातत्व विभागाने अनेक वेळा सूचना देऊनही त्या हटविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गाभाऱ्यातील उष्णता वाढून मूर्तीला धोका निर्माण होत आहे. प्रत्येक वज्रलेपाच्यावेळी यावर नुसती चर्चा होते मात्र मार्बल हटविण्याचे काम होत नसल्याने दिवसेंदिवस मूर्तीला धोका वाढत आहे. गेल्या वेळी लेपणाची प्रक्रिया ३ दिवस करावी लागली होती. पहिल्या दिवशी मूर्तीची रासायनिक पदार्थाने स्वच्छता करून घेऊन दुसऱ्या दिवशी मूर्तीवरील लहान भेगा भरून घेण्यात आल्या होत्या . तिसऱ्या दिवशी संपूर्ण मूर्तीवर सिलिकॉन चा लेप दिल्यावर हि प्रक्रिया पूर्ण झाली होती. हे तीन देवास देवाचे दुरून दर्शन घ्यावे लागले होते . या प्रक्रियेच्यावेळी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी मंदिरात उपस्थित राहिले होते. आता पुन्हा पाच वर्षानंतर हीच लेपन प्रक्रिया करावी लागणार असून मंदिर समितीने बैठकीत यास मान्यता दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images