Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साडविलकरांविरोधात आज तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील साक्षीदार संजय साडविलकरनी अवैध शस्त्र खरेदी-विक्री केल्याचे जबाबात नोंदवले आहे. साडविलकरांच्या अवैध शस्त्रविक्रीची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड याने केली आहे. साडविलकरांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कोल्हापुरात येण्याची परवानगी समीरने कोर्टाकडे अर्जाद्वारे मागितली होती. न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सोमवारी अर्ज मंजूर करून मंगळवारी ११ ते ५ या वेळेत समीरला कोल्हापुरात येण्याची परवानगी दिली आहे. मंगळवारी तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली आहे.

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कोल्हापुरातील चांदी कारागीर संजय साडविलकर यांनी कलम १६४ नुसार सीबीआयकडे साक्ष दिली आहे. ‘१९८३ ते १९८८ या काळात चरितार्थाचे कोणतेही साधन नसल्याने आपण अवैध शस्त्रांची खरेदी, विक्री आणि दुरुस्तीचे काम करीत होतो,’ असा उल्लेख साडविलकरांनी जबाबात केला आहे. साडविलकरांनी असाच जबाब कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येनंतर एसआयटीकडेही दिला आहे. पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड याला आरोपपत्राची प्रत मिळाल्यानंतर साडविलकरांच्या अवैध शस्त्रविक्री आणि खरेदीबाबतची शंका वकील समीर पटवर्धन यांच्याकडे बोलून दाखवली. यानंतर वकिलांच्या सल्ल्याने साडविलकरांच्या अवैध शस्त्रखरेदी, विक्रीबाबत तक्रार देण्याचा निर्णय समीर गायकवाड याने घेतला आहे. पानसरे हत्या प्रकरणी कोर्टाने समीरचा जामीन १७ जूनला मंजूर केला आहे, मात्र न्यायालयीन कामकाज आणि प्रत्येक रविवारची पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याखेरीज कोल्हापुरात येऊ नये, अशी अट घातली आहे.

साडविलकरांच्या चौकशीचा अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापुरात येण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज गायकवाड याने अॅड. पटवर्धन यांच्यामार्फत सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे सादर केला. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवसांतील कोणताही दिवस कोर्टाने द्यावा, अशी मागणी अॅड. पटवर्धन यांनी केली होती. कोर्टाने अर्ज मंजूर केला असून, मंगळवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत समीरला कोल्हापुरात येण्याची परवानगी दिली आहे. मंगळवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात साडविलकरांविरोधात समीर तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती अॅड. पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शस्त्रांच्या गैरवापराची तक्रार

पिस्तूल खरेदी, विक्री आणि त्यांच्या दुरुस्तीचे काम पाच ते सहा वर्ष केल्याचे संजय साडविलकर यांनीच जबाबात सांगितले आहे. एसआयटीच्या जबाबात १९८५ ते ८८, तर सीआयडीकडे दिलेल्या जबाबात १९८३ ते ८८ या कालावधीत शस्त्र खरेदी, विक्री केल्याचे सांगितले आहे. साडविलकरांनी विकलेल्या शस्त्रांचा गैरवापर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी विकण्यासाठी शस्त्रे कुठून आणली? ती कोणाला विकली? त्या शस्त्रांचे पुढे काय झाले? याची चौकशी पोलिसांनी करावी. अशी मागणी समीर गायकवाड याने केली आहे.

साक्षीदारावर दबाव आणण्याचा आमचा हेतू नाही, मात्र त्यांनी जबाबात दिलेली माहिती धक्कादायक आहे. साडविलकरांनी विकलेल्या शस्त्रांचा गैरवापर होऊ शकतो. कदाचित तसा गैरवापर झालाही असेल, त्यामुळे अवैध शस्त्रांची आणि त्यांच्या खरेदी-विक्रीची चौकशी करण्यासाठी आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहे.

अॅड. समीर पटवर्धन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोकुळवर सोमवारी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) संचालक मंडळ नामधारी असून संघ एका व्यापाऱ्याच्या ताब्यात गेल्याने दूध उत्पादकांची लूट सुरू असून त्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळत नाही. दूध खरेदीदर कपातीचा निर्णय संचालक मंडळाचा नसून व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप घणाघती आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. दर कपातीच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २७) गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

गोकुळवर नियोजीत मोर्चाच्या नियोजनासाठी सोमवारी अजिंक्यतारा येथे दूध संस्था, दूध उत्पादक शेतकऱ्यांची मेळावा झाला यावेळी आमदार पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, ‘गोकुळ संघाने उत्पादकांचा विचार न करता गायीच्या दूध दर कपातीचा घाइगडबडीने निर्णय घेतला. उत्पादकांना दूध उत्पादनासाठी किती खर्च येतो, याचा विचार न करता निर्णय घेतला. यामुळे सहा लाख दूध उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. अमूल दूध संघ ९२ टक्के नफ्याचा परतावा उत्पादकांना करते. गोकुळला हे शक्य आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरला मागणी घटल्यामुळे दरकपात करण्याचे कारण सांगितले जात आहे. संचालकांचे अभ्यास दौरे, स्कॉर्पिओ गाड्यांचे ताफे, मुंबई वाऱ्या, कार्यक्रमाच्या अनावश्यक जाहिराती आणि कारभारातील अनेक वायफळ खर्च कमी न करता थेट दूध दराला कात्री लावली. गोकुळला सहकारावर नाही, तर खासगी व्यापारतत्वावर चालवण्याचे काम संचालक मंडळ करत असल्याचा आरोपही केला.’

गोकुळच्या संचालक मंडळास किती अधिकार आहेत, असा प्रश्न उपस्थित करत माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता टिकेची झोड उडवली. पाटील म्हणाले, ‘गोकुळचा कारभार एका व्यापाऱ्याच्या इशाऱ्यावर सुरू आहे. ते सांगतील तोच निर्णय संचालक मंडळाला घ्यावा लागतो. ज्या विश्वासाने उत्पादकांनी गोकुळच्या संचालकांच्या हातात चाव्या दिल्या, त्या विश्वासाला संचालकांनी काळिमा फासला, त्याचा जाब २७ नोव्हेंबर रोजी विचारला जाईल. स्वत:चे दरकपातीचे पाप लपवण्यासाठी राज्यातील दूध संघांना बरोबर घेऊन अन्य जिल्ह्यातील दूध उत्पादकांनाही दर कपातीच्या खाईत लोटण्याचे पाप संचालकांनी केले. उत्पादकांना २७ रुपये प्रतिलिटर दर कसा देता येईल याचे चिंतन करण्यापेक्षा गोकुळने घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, हे सांगण्यासाठी धडपड केली. साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना जादा एफआरपी देण्यासाठी बैठक घेतली, मात्र गोकुळमध्ये वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. या सर्वाचा जाब विचारण्यासाठी २७ रोजी धडक मोर्चाचे आयोजन केले असून मोर्चास सहभागी होण्याचे आवाहन पाटील यांनी दूध उत्पादक व संस्थांना केले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी: शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे माघारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या ‘मी लाभार्थी’च्या जाहिराती एकीकडे धडाक्यात सुरू आहेत, तर दुसरीकडे कर्जमाफीचा घोळ संपायला तयार नाही. कर्जमाफीसाठी शेतकऱ्याच्या खात्यावर भरलेली रक्कम सरकारने पुन्हा काढून घेतल्याचा प्रकार प्रकार समोर आला आहे.

पंढरपूर तालुक्यातील उपरी गावाचे देवानंद गणपत जगदाळे यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या गादेगाव शाखेतून ६४,४०१ रुपयाचे कर्ज घेतले होते. सरकारच्या कर्जमाफीमध्ये या शाखेतील आठ कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. त्यांच्या खात्यात ३१ ऑक्टोंबरला कर्जाची रक्कम जमा झाली होती. त्यानंतर बँकेने देवानंद जगदाळे यांना मेसेज पाठवून कर्जखाते संपल्याचे कळविले होते. कर्जमाफीचा जगदाळे कुटुंबाला झाला. मात्र, तो फार काळ टिकला नाही. बँकेने १३ नोव्हेंबरला पुन्हा मेसेज करून खात्यावरील पैसे सरकारने परत घेतल्याचे सांगताच जगदाळे हादरून गेले. जगदाळे यांच्याप्रमाणे गादेगाव येथील अर्जुन कदम यांनादेखील ५६,५१६ रुपयाची कर्जमाफी झाली होती मात्र, त्यांच्याही खात्यातील रक्कम परत सरकारने काढून घेतली आहेत. जगदाळे यांच्यावर दुसऱ्या कोणत्याच बँकेचे कर्ज नाही. सरकारकडून फसवणूक झाल्याची भावना त्यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली आहे. जगदाळे आणि कदम या दोन शेतकऱ्यांची कर्जखात्यात भरलेली रक्कम परत गेल्याने त्यांच्यासाठी औटघटकेची कर्जमाफी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारमंत्र्यांनी ऊसदराची कोंडी फोडली‘लोकमंगल’कडून एफआरपी अधिक ४००रुपयांचा दर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
उसाला पहिली उचल २७०० रुपये मिळाली पाहिजे, या मागणीसाठी गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची कोंडी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी फोडली. देशमुख यांच्या दोन्ही लोकमंगल साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक ४००रुपये दर जाहीर केला आहे. मात्र, जिल्ह्यातील अन्य साखर कारखाने हा दर देण्याच्या मानसिकतेत नाहीत. परंतु, आता सर्व कारखान्यांना हाच दर द्यावा लागेल, अन्यथा त्या कारखान्यांचा गाळप हंगाम बंद पाडू, असा इशारा चार शेतकरी संघटनांनी दिला आहे. अन्य चार संघटनाना मात्र हा फर्म्युला मान्य नाही. २७०० दर घेतल्याशिवाय लोकमंगल समोरील आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका बळीराजा संघटनेने घेतल्याने दराचा तिढा कायमच राहणार असल्याचे दिसते.
गेल्या अकरा दिवसांपासून ऊसदरासाठी आंदोलन सुरू आहे. जवळपास आठ संघटना यामध्ये होत्या. जिल्हाभरात जाळपोळ, गाड्यांचे टायर फोडणे आदी आक्रमक आंदोलन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अनेकदा बैठका घेऊनही निर्णय होत नव्हता. एकूण सहा बैठका झाल्या मात्र, त्या निष्फळ ठरल्या. सहकारमंत्री देशमुख यांचे दोन्ही कारखाने संघटनांनी बंद पाडले होते. साखर कारखानदार एफआरपी अधिक २०० वरच ठाम असताना मंगळवारी सायंकाळी जनहित, स्वाभिमानी, मनसे, रयत क्रांती या चार संघटनांनी लोकमंगलचे संचालक शहाजी पवार यांच्याशी बैठक घेऊन एफआरपी अधिक ३०० अधिक एक महिन्यानंतर १०० असा विनाकपात तोडगा काढला. हा हफ्ता किमान २६००पर्यंत जाईल, असे म्हणणे आहे. हा फक लोकमंगलसाठी तोडगा असला तरी अन्य कारखान्यांना हाच दर द्यावा लागणार आहे, असे या चार संघटनांचे म्हणणे आहे. तसे न झाल्यास त्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश सहकारमंत्री देशमुख यांनी दिले पाहिजेत, असे संघटनांचे म्हणणे आहे.
२७०० रुपयांसाठी आग्रह कायम
बळीराजा, प्रहार, रघुनाथ पाटील प्रणीत संघटना, अखिल भारतीय किसान सभा यांनी या फॉर्म्युलाला विरोध दर्शवला आहे. हा निर्णय म्हणजे सर्व कारखानदार सुमारे एक कोटी रुपयांची लूट करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप संजय पाटील-घाटणेकर यांनी केला आहे. जिल्ह्यातील अन्य साखर कारखाने मात्र हा दर देण्याच्या मानसिकतेत नाहीत, असे काही कारखानदारांनी सांगितले.
दर न देणाऱ्यांवर हवी कारवाई- तुपकर
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या आदेशानुसार दोन कारखान्यांनी दर जाहीर करून कोंडी फोडली आहे. अन्य कारखान्यांनीही हाच दर शेतकऱ्यांना दिला पाहिजे. आम्ही आंदोलन थांबवले आहे, स्थगित केलेले नाही. जे कारखाने शेतकऱ्यांच्या खात्यावर ठरल्याप्रमाणे पहिली उचल टाकणार नाहीत त्यांचा गळीत हंगाम रोखू. सहकारमंत्र्यांना संबधित कारखान्याच्या चेअरमनवर कारवाई करण्यासाठी भाग पाडू, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
उपोषण अकराव्या दिवशी संपले
पंढरपूर
ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या अकरा दिवसांपासून पंढरपूर-पुणे रोडवरील बाजीराव विहिरीजवळ सुरू असलेले आमरण उपोषण मंगळवारी रात्री उशिरा उसाचा रस देऊन संपविण्यात आले. या वेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार घोषणाबाजीत जल्लोष केला. ऊसदराच्या तोडग्यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, चंद्रकांत बागल आणि नवनाथ माने गेल्या अकरा दिवसांपासून उपोषणाला बसले होते. या काळात उपोषण करणाऱ्या तिन्ही कार्यकर्त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. शिवाय त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. मंगळवारी सोलापूर येथील बैठकीत एफआरपी अधिक ४०० रुपये, हा यशस्वी तोडगा निघाल्याने रात्री नऊ वाजता स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते उसाचा रस पिऊन आंदोलकांनी उपोषण सोडले. या वेळी स्वाभिमानीचे शेकडो कार्यकर्ते, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह जनहित शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख, शिवसेनेचे प्राचार्य बब्रुवान रोंगे, मनसे जिल्हयध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्यानेवायरमनचा खांबावरच मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
निगडी (ता. कराड) येथे वीजवाहक तारांची दुरुस्ती करताना अचानक वीजप्रवाह सुरू केल्याने तरुण वायरमन धोंडिराम दत्तू गायकवाड (वय २६, रा. करवडी, ता. कराड) यांचा विजेच्या धक्क्याने खांबावरच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली.
या घटनेमुळे निगडी व करवडी येथील संतप्त ग्रामस्थांनी दोषींवर संबंधित अधिकाऱ्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तोपर्यंत मृतदेह खांबावरून खाली उतरवण्यास मज्जाव केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या प्रकरणी सोमवारी रात्री उशीरा महावितरणच्या दोन ऑपरेटरांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशीरा या बाबत मृत वायरमनच्या चुलत भावाने या बाबतची फिर्याद दिली आहे.
दरम्यान, या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करू आणि मृताच्या कुटुंबीयांना योग्य मदत करू, असे लेखी आश्वासन वीज कंपनीच्या वतीने देण्यात आल्यानंतरच गायकवाड यांचा मृतदेह खांबावरून खाली उतरवण्यात आला. शवविच्छेदनानंतर रात्री उशीरा तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला व रात्री उशीर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निगडी येथे रविवारी वीजवाहक तारांच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या विहिरींवरील विद्युत पंप सुरू होत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वायरमन धोंडिराम गायकवाड यांना या बाबतची माहिती दिली. गायकवाड घटनास्थळी आल्यानंतर त्यांना रविवारी केलेल्या कामात काही तरी चूक राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी वीजपुरवठा बंद करणे आवश्यक असल्याने गायकवाड यांनी संबंधितांशी मोबाईलवरून संपर्क साधला. वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री झाल्यानंतर आपल्याकडील एक मोबाइल तेथील एका शेतकऱ्याकडे देऊन गायकवाड दुसरा मोबाइल सोबत घेऊन खांबावर चढले. दोन विद्युत तारा तोडून झाल्यानंतर तिसरी तार जोडत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाला. त्यामुळे काही क्षणात विजेच्या जोरदार धक्क्याने गायकवाड यांचा खांबावरच मृत्यू झाला. खांबावरील तिसरी तार खाली पडली व सर्वत्र ठिणग्या उडू लागल्या. अचानक घडलेल्या या प्रकाराने शेतात काम असलेले शेतकरी भयभीत झाले. गायकवाड यांना विजेचा धक्का लागल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला. काही जणांनी फोनवरून अधिकाऱ्यांशी व संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु फोन कोणीही उचलत नसल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला.
रात्री उशीरा या बाबत मृत वायरमनच्या चुलत भावाने याची फिर्याद दिली. या प्रकरणी शुभम दिलीप नलवडे (मसूर उपकेंद्र), विनोद भिमराव कांबळे (शिरवडे उपकेंद्र) या ऑपरेटरांवर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या चुकांचा पंचनामाजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पक्ष, संघटना आक्रमक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
अनिकेत कोथळे प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या पोलिस दलाच्या गेल्या दोन वर्षांतील चुकांवर विविध पक्ष, संघटना आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी बोट ठेवले. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या कायदा आणि सुव्यवस्था आढावा बैठकीत अनेकांनी बिनधास्तपणे विविध घटनांचा उल्लेख करीत पोलिस दलाबाबत रोष व्यक्त केला. सर्वच पोलिस वाईट नाहीत, परंतु नेमक्या पोलिसिंगचा अभाव जाणवत असल्याने पोलिस यंत्रणेवरील विश्वास उडत असल्याची भावनाही या वेळी व्यक्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, संजयसिंह चव्हाण, पोलिस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी केलेल्या लेखी मागणीनंतर या बैठकीचे आयोजन केले करण्यात आले होते. उपस्थित प्रतिनिधींचे पोलिसांबद्दलचे आक्षेप आणि त्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली.
काळम-पाटील म्हणाले, कच्ची नोंद हे कायद्यात नाहीच, प्रत्येक तक्रारीची नोंद करा. अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल. हातात काठी व डोक्यावर टोपी म्हणजे शिस्त असलीच पाहिजे. सीसीटीव्ही ही गरज आहे, त्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन तसेच सरकारकडून मिळवून देऊ. बीअरबार, हॉटेल अशा ठिकाणी सीसीटीव्ही नसतील तर परवाने देऊ नका. पोलिसिंग बाबतचे सविस्तर परिपत्रकच पुन्हा एकदा काढावे. जाणिवपूर्वक परस्पर विरोधी तकारी घेऊ नका. जनता दरबारसारखे उपक्रम राबवून वेळीच शंका निरसन करण्याचे काम परिमाणकारकतेने करून पोलिसांबाबत जनतेत विश्वास निर्माण करावा. लोकांशी संपर्क वाढवा, लोकच मदत करतील. अशा एखाद्या प्रकरणावरून पोलिसांचे खच्चीकरण होणार नाही, याची खबरदारीही जनतेने घेतली पाहिजे.
कोथळेप्रकरणी दोषींना फाशीच हवी : जिल्हाधिकारी
अनिकेत कोथळे प्रकरणी दोषी असणाऱ्यांना फाशीच होणे योग्य आहे, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी विजय-काळम यांनी व्यक्त केले. वाढते गुन्हे रोखायचे असतील तर सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. सध्या अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहे. ते पूर्ववत सुरू व्हावेत तसेच आवश्यक त्या ठिकाणी ते बसविण्यासाठी निधीची तरतूद जिल्हा नियोजन समिती निधीतून करण्यात येईल.
स्त्रीभूण हत्याप्रकरणी गंभीर तक्रार
जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्त्येचे एक गंभीर प्रकरण माझ्याकडे आले आहे. त्या बाबतची सर्व माहिती मिळाली आहे. आवश्यक असे ठोस पुरावेही हाती येत आहे. सर्व पुरावे हाती येताच त्याची खातरजमा करून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांविरोधात थेट कोर्टात

$
0
0

कोल्हापूर ः ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब,’ अशी म्हण आहे. रस्त्यांवरील खड्डयांच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते. यामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना चांगले रस्ते मिळावेत यासाठी थेट हायकोर्टानेच पुढाकार घेतला असून, खड्डयांविरोधात थेट कोर्टात तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणकडे स्वतंत्र कक्षही स्थापन केला आहे. खराब रस्ते आणि खड्डयांविरोधात गेल्या साडेतीन महिन्यात नागरिकांच्या २७ तक्रारी कोर्टात दाखल झाल्या आहेत. थेट कोर्टानेच नागरिकांच्या खड्डेमुक्त प्रवासासाठी पाऊल उचलल्याने नागरिकांचा रस्त्यांवरील प्रवास सुखाचा होण्याची शक्यता बळावली आहे.

नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. कराच्या माध्यमातून जमा झालेले कोट्यवधी रुपये रस्ते निर्मितीवर खर्च होतात, तरीही रस्ते खड्ड्यात जातात. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांचे जीव जातात, तर अनेकांना अपंगत्व येते. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील अपघात टाळण्यासाठी, रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात थेट कोर्टात तक्रारी करण्याचे आवाहन हायकोर्टाने केले आहे. या तक्रारींचे निराकरण करण्याची जबाबदारी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणकडे दिली आहे. जिल्ह्यातील विधि सेवा प्राधिकरणने तक्रारींची नोंद घेण्यासाठी ऑगस्ट महिन्यात कसबा बावड्यातील न्यायसंकुलात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. शिवाय प्राधिकरणच्या इ मेल आयडीवरही ऑनलाइन तक्रारी देता येतात. गेल्या साडेतीन महिन्यात खड्ड्यांविरोधात २७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांश तक्रारी ऑनलाइन दाखल झाल्या आहेत, तर काही नागरिकांनी लेखी स्वरुपात तक्रारी प्राधिकरणकडे दिल्या आहेत.

शहरातील महावीर गार्डन, शाहूपुरी, खानविलकर पेट्रोल पंप, जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज मार्ग, हिम्मत बहाद्दर परिसर, कारंडे मळा, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, राजारामपुरीतील स्टेट बँक परिसर, शाहूपुरीतील बेकर गल्ली, टिंबर मार्केट, कळंबा, फुलेवाडी आदी १९ ठिकाणांच्या तक्रारी आल्या आहेत. इचलकरंजीतून ८ तक्रारी कोर्टात दाखल झाल्या आहेत. सजग नागरिकांनी खड्ड्यांच्या फोटोंसह परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे निवेदनही दिले आहे. खड्ड्यांचे स्वरुप, किती दिवसांपासून खड्डे आहेत, याचा नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांची नावे अशी सविस्तर माहिती कोर्टात दिली आहे.

कोर्टाने याची तातडीने दखल घेऊन सर्व तक्रारी महापालिकेचे आयुक्त आणि शहर अभियंता यांना पाठवल्या आहेत. यातील तीन ठिकाणी खड्डे भरण्याचे कामही पूर्ण झाले आहे. महापालिकेने शिवाजी पार्क, बेकर गल्ली आणि राजेंद्रनगरातील हुडको कॉलनी परिसरातील खड्डे बुजवले आहेत. उर्वरित ठिकाणी तात्पुरते रस्त्यांचे पॅचवर्क करण्याचे आदेश दिले आहेत. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी कोर्टाकडून पाठपुरावा सुरू आहे.

कोर्टाच्या आदेशानंतरही रस्त्यांवरील खड्डे बजवण्याकडे दुर्लक्ष झाल्यास महापालिका आणि नगरपालिका प्रशासनाला कोर्टाच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. खड्ड्यांच्या स्वरुपानुसार दुरुस्तीसाठी मुदत दिली जात आहे. मुदतीत काम न झाल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते, अशा स्पष्ट सूचना कोर्टाने दिल्या आहेत, त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते देण्यासाठी नगरपालिका आणि महानगरपालिकांवरील दबाव वाढत आहे. नागरिकांनी मात्र याचे स्वागत केले असून, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणकडे आभाराची पत्रेही मिळत आहेत. नागरिकांनी अधिकाधिक तक्रारी कराव्यात, असे आवाहन प्राधिकरणचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले आहे.

००००००

एकूण तक्रारी – २७

कोल्हापूर शहर – १९

इचलकरंजी - ८

००००००००००००

इचलकरंजीतून ८ तक्रारी दाखल

इचलकरंजीकर रस्त्यांवरील खड्ड्यंबात दक्ष आहेत. साडेतीन महिन्यात इचलकरंजीतून ८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. आठवड्यापूर्वी एका डॉक्टरांचा अपघाती मृत्यू झाल्याने संतापलेल्या इचलकरंजीकरांनी नगरपालिकेच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. रस्ते खड्डेमुक्त व्हावेत यासाठी नागरिक पाठपुरावा करीत आहेत.

स्वतंत्र भाग

००००००००००००००००००००

दखल न घेतल्यास कोर्टाकडून कारवाई

खड्ड्यांबाबत कोर्टात तक्रार दाखल होताच ही तक्रार पुढे संबंधित महापालिका, नगरपालिकांकडे पाठवली जाते. वेळेत समाधानकारक दुरुस्ती न झाल्यास नगरपालिका प्रशासनावर कडक कारवाईदेखील होणार आहे. कारवाईच्या भीतीपोटी तातडीने खड्डे दुरुस्तीचे कम सुरू आहे. राजेंद्रनगर येथील हुडको परिसरातील विश्रांती पाटील यांनी १६ सप्टेंबरला प्राधिकरणकडे मेल पाठवून खड्ड्यांची तक्रार केली होती. महिन्याभरात महापालिकेने तेथील खड्डे भरून घेतले. पाटील यांनी पुन्हा दुरुस्तीचे फोटो पाठवून कोर्टाचे आभार मानले आहेत.

०००००००००००

इथे करा तक्रार

०२३१-२५५१२९५

Dlsa.dc.klp@gmail.com

०००००००००००००००००००

नागरिकांना चांगले रस्ते मिळावेत यासाठी हायकोर्टाने लोकहितार्थ हा निर्णय घेतला आहे. तक्रारींसाठी विधि सेवा प्राधिकरणचा ई मेल आयडी आणि मोबाइल नंबर दिले आहेत. नागरिकांनी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांबाबत तक्रारी द्याव्यात.

उमेशचंद्र मोरे, न्यायाधीश, सचिव, प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृतच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने शहरात राबवण्यात येणाऱ्या ‘अमृत’ योजनेच्या ५९ कोटी रुपयांच्या कामाच्या अंमलबजावणीच्या कालबद्ध कार्यक्रमाची माहिती देण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारी महापालिकेला दिले. ३० महिन्यात हे काम कोणत्या टप्प्यानुसार केले जाणार आहे, त्याचा अंतर्भाव केला जावा, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, वर्कऑर्डरमध्ये नमूद केलेल्या कामाबाबतचे स्पष्टीकरण लवादासमोर प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी दिले.

‘अमृत’ योजनेंतर्गत ५९ कोटी रुपयांच्या कामाची वर्कऑर्डर महापालिकेने लवादाच्या आदेशानुसारच काढली होती. ही वर्कऑर्डर लवादासमोर सादर करण्यात यावी असे आदेश दिले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी लवादाचे यू. डी. साळवी व नंदा यांनी वर्कऑर्डरमध्ये कामाची माहिती स्पष्ट दिली नसल्याचे ताशेरे महापालिकेवर ओढले होते. त्यामुळे मंगळवारी सुनावणीची तारीख देऊन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी प्रभारी​ जलअभियंता सुरेश कुलकर्णी व पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे लवादासमोर उपस्थित राहिले.

सुनावणीदरम्यान, साळवी व नंदा यांनी वर्कऑर्डरची सविस्तर माहिती घेतली. कोणती कामे करण्यात येणार आहेत, त्यासाठी घेण्यात आलेली मंजुरी याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. त्यानंतर लवादाने या कामाची ३० महिन्यात नेमकी कशी अंमलबजावणी होणार याची विचारणा केली. अंमलबजावणीचे कोणते टप्पे आहेत याचा कालबद्ध कार्यक्रमाची माहिती पुढील सुनावणीवेळी देण्यात यावी, असे आदेश दिले. यावेळी याचिकाकर्ते सुनील केंबळे, महापालिकेचे वकील नितीन आढाव उपस्थित होते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शस्त्रविक्रीची चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याने याच गुन्ह्यातील साक्षीदार संजय अरुण साडविलकर यांनी विकलेल्या अवैध शस्त्रांची चौकशी करावी, असा तक्रार अर्ज जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिला. सात दिवसांत तक्रारीची चौकशी न केल्यास कोर्टात दाद मागावी लागेल, असा इशाराही गायकवाड याने पोलिसांना दिला आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळी साडेअकराच्या सुमारास गायकवाड याने वकिलांच्या उपस्थितीत तक्रार अर्ज दिला.

शहरातील चांदी कारागीर संजय साडविलकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर पोलिसांकडे साक्ष दिली आहे. सीबीआय आणि एसआयटी या दोन्ही तपास यंत्रणांना दिलेल्या साक्षीत साडविलकर यांनी १९८५ ते ८८ या काळात अवैध शस्त्र खरेदी आणि विक्री करीत होतो, असे सांगितले आहे. साडविलकर यांनी केलेल्या शस्त्रविक्रीचा गैरवापर केल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांनी कुणाला शस्त्रे विकली आणि त्याचा वापर काय झाला याच्या चौकशीची गरज समीर गायकवाड याने कोर्टाकडे व्यक्त केली होती. या चौकशीसाठी तक्रार अर्ज दाखल करता यावा यासाठी समीर गायकवाड याने वकिलांकरवी जिल्हा कोर्टाकडे परवानगी मागितली होती. कोर्टाने परवानगी दिल्याने मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास समीरने जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला.

समीर याने तक्रार अर्जात २९ मुद्दे मांडून सोबत साक्षीदार संजय साडविलकर यांचा पानसरे हत्येतील जबाबही जोडला आहे. तक्रार अर्जात म्हटले आहे, ‘संजय साडविलकर यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांनी अवैध शस्त्र खरेदी, विक्री केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी शस्त्र परवाना कायद्याचा भंग केला आहे, त्यामुळे त्यांनी शस्त्रविक्री केलेल्या अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मी तक्रार देत आहे. साडविलकर यांनी शस्त्रविक्री केल्यानंतर अनेक ठिकाणी खुनाचे गंभीर गुन्हे घडले आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये अशा शस्त्रांचा वापर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध शस्त्र खरेदी करणारे आणि विकणारेही कायद्यानुसार दोषी आहेत, त्यामुळे संबंधितांची पोलिसांनी चौकशी करावी. सात दिवसांच्या आत तक्रार अर्जावर कार्यवाही व्हावी, अन्यथा मला कोर्टात दाद मागावी लागेल.’

पोलिस निरीक्षक गुजर यांनी तक्रार अर्ज घेऊन तो पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे सोपवणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. यावेळी समीर गायकवाड याचे वकील समीर पटवर्धन यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी बंडा साळुंखे, महेश उरसाल, मधुकर नाझरे, किशोर घाडगे, आदी उपस्थित होते. तक्रार अर्ज दिल्यानंतर काही वेळाने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रारीची माहिती घेतली. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते.

साडविलकर आणि तावडे तत्कालीन मित्र

डॉ. दाभोलकर हत्येतील संशयित आरोपी वीरेंद्रसिंह तावडे आणि संजय साडविलकर हे २००१ ते २००६ या काळात एकत्र काम करीत होते. तावडेच्या संगण्यावरून साडविलकरांनी साथीदारांच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांना धक्काबुक्की केली होती. करवीर पीठाच्या शंकराचार्यांविरोधात पुरोगामी संघटनांनी मोर्चे काढल्यानंतर तावडे आणि साडविलकर यांनी प्रतिमोर्चा काढला होता. यानंतर तावडेच्या सांगण्यावरूनच साडविलकरने पिस्तूल तयार करून देण्याचे मान्य केले होते, असा उल्लेख साडविलकर यांच्या जबाबात आहे.

माझ्यावर दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत मिळाल्यानंतर अवैध शस्त्र विक्रीचा मुद्दा लक्षात आला. नागरिक या नात्याने मी अवैध शस्त्र विक्रीच्या चौकशीसाठी पोलिसांकडे अर्ज दिला आहे. सात दिवसांच्या आत यावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा आहे, अन्यथा कोर्टात दाद मागावी लागेल.

समीर गायकवाड, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा घनसाळला ‘अच्छे दिन’

$
0
0

रमेश चव्हाण, आजरा

राज्य स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प (एमएसीपी) कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या सेंद्रिय आजरा घनसाळ उत्पादन कार्यक्रमाला यावर्षी अच्छे दिन आले आहेत. आता घनसाळचा हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रति गुंठा व प्रति हेक्टरी घेण्यात आलेल्या रँडम सॅम्पलिंग सर्वेक्षणात याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उसाच्या तुलनेत केवळ पाच महिन्यात प्रतिएकरी एक ते सव्वा लाख रुपयांची उच्चांकी कमाई या पायलट प्रकल्पंतर्गत शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आजरा तालुका कृष्ण विभागाने व्यक्त केली आहे.

अंगभूत सुवास व चवीमुळे सर्वदूर पसरलेला आजरा घनसाळ सध्या खवैय्यांची पहिली पसंती बनला आहे. मात्र एकरी उत्पादनाच्या तुलनेत शेतकऱ्याला फार तुटपुंजे पैसे हाती यायचे. त्यामुळे काही वर्षापूर्वी घनसाळ जणूकाही अस्तंगत होण्याच्या शेवटच्या टप्प्यात पोचला होता. पण कृष्ण विभाग, काही प्रगतिशील शेतकरी आणि काही गावातून मिळालेल्या पाठिंब्यावर घनसाळ केवळ तरला असे नाही, तर त्याला पुरेसा बाजारभाव मिळू लागल्याने तालुक्यातील विशेषतः पश्चिम भागातील शिवारात खूपच घमघमू लागला.

तरीही उसप्रमाणे नगदी पीक म्हणून पाहण्याचा व पिकविण्याचा दर्जा घनसाळला मिळू शकला नव्हता. त्यासाठी कृषी विभागाच्या वरिष्ठस्तरावरील अधिकारी, भात संशोधक व उत्साही शेतकऱ्यांनी धीर सोडला नव्हता. दरवर्षी काही नवीन लागवड तंत्रांचा वापर केला जात होता. यावर्षीही एमएसीपीच्या माध्यमातून सेंद्रिय घनसाळचा पायलट प्रकल्प तालुक्यातील पेरणोली, पोळगाव, देवर्डे, दरडेवाडी व मसोली या पाच गावांमधील ५० शेतकऱ्यांसाठी राबविला गेला. यासाठी कृषी विभाग, आजरा ऍग्रो-प्रोड्युसर कंपनी व ‘आत्मा’च्या संयुक्त विद्यमाने कंबर कसली गेली. यावर्षी रोपलावणीचे तरवे टाकण्यापासून आता काढणीपर्यंत सर्व प्रकारचे मार्गदर्शन संबंधीत ५० शेतकऱ्यांना बांधावर पोचवले. सेंद्रिय खते, लिंबाळी कीटकनाशके आदी निविष्ठा दिल्या गेल्या. यावर्षी पाऊसमानही समाधानकारक झाले. त्यामुळे यानिमित्ताने केलेल्या रँडम सर्वेक्षणात उच्चांकी उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार आहे, हे निश्चित झाले असल्याचे कृषी विभागातून स्पष्ट करण्यात आले आहे.

..............

चौकट

सर्वेक्षणातून उत्पादनाचे चित्र

‘या प्रकल्पातील तीन गावच्या तीन प्रातिनिधिक शेतकऱ्यांच्या शेतामधून केलेल्या रँडम सर्वेक्षणात हिंदुराव कालेकर, जयसिंग नार्वेकर व आप्पासाहेब पावले यांच्या शेतातून घेतलेल्या नमुन्यातून अनुक्रमे प्रति एकरी २८, २९.५० व १९.६० क्विंटल घनसाळ उत्पादित होणार आहे. या प्रमाणात विचार केल्यास प्रतवारीप्रमाणे प्रतिक्विंटल चार ते सव्वा चार हजार रुपये दर निश्चित आहे. त्यानुसार उसापेक्षा हा दर परवडणारा ठरला आहे’, असे तालुका कृषी अधिकारी श्रीकांत निकम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात डेंगीचे २० रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरामध्ये गेल्या दहा महिन्यांपासून डेंगीचे रुग्ण सापडत असून या आठवड्यात २० जणांना डेंगीची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. शहरावर डेंगीचा धोका घोंगावू लागला आहे. सध्या जुना बुधवार पेठ, सीपीआर, मंगेशकरनगर, कनाननगर, जवाहरनगर या भागामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. एखाद्या भागात रुग्ण आढळल्यास तिथे साथीचा फैलाव होऊ नये, यासाठी शहरातील ११ केंद्रामधील डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ तसेच आरोग्य निरीक्षक यांना घर पातळीपर्यंत सर्व्हे तसेच स्वच्छता करण्याचे आदेश मंगळवारी ​देण्यात आले. महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालयात उपायुक्त मंगेश शिंदे यांनी बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण कमी झाल्यानंतर डेंगीच्या साथीने डोके वर काढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून डेंगीचे रुग्ण आढळून येत आहेत. खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार केले जात असले तरी त्या दवाखान्याकडून महापालिकेला व्य​वस्थित माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शहरातील साथीचा आवाका लक्षात येत नव्हता. दवाखान्यांकडून माहिती दिली जात नसतानाही दहा महिन्यात १२५ आसपास रुग्ण असल्याची माहिती आहे. तर या आठवड्यातच डेंगीची लागण झाल्याचे खासगी रुग्णालयातील ११ रुग्ण तर सरकारी रुग्णालयात नऊ रुग्ण आढळून आले. यामुळे उपायुक्त शिंदे यांनी प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर, डॉ. अमोल माने यांच्यासह ११ केंद्रातील डॉक्टर व स्टाफ यांची मंगळवारी बैठक घेतली.

याबाबत डॉ. वाडेकर यांनी सांगितले की वेळीच उपाययोजना न केल्यास डेंगीची साथ वाढण्याचा धोका असल्याचे मांडण्यात आले. जवाहरनगरमध्ये यापुर्वी डेंगीने एकाचा मृत्यू झाला होता. तिथे अजून डेंगीचे रुग्ण आढळत असल्याने सर्व्हे केले जात आहेत. रुग्ण आढळल्यास तिथे साथीचा उद्रेक होऊ नये, यासाठी डॉक्टर व सिस्टर यांनी त्या भागात जाऊन तेथील शंभर घरांचा सर्व्हे करावा. अगदी कंटेनरपर्यंत पाहणी करून त्यामध्ये अळ्यांची घनता आढळून आल्यास त्याच्या स्वच्छतेचे आदेश आरोग्य निरीक्षकांना देण्यात यावेत. तसेच घरामधील सर्व भांडी कोरडी करण्यात यावीत. त्या भागात तिथे डास नियंत्रणासाठी धूर व औषध फवारणी करण्याबरोबरच गप्पी मासे सोडण्याचे आदेश आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले आहेत. दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डेंगीची लक्षणे काय?

जोराचा ताप येणे, थंडी वाजणे, तीव्र स्वरुपाची अंगदुखी, डोळ्यामागे दुखणे, पुरळ तसेच लाल चट्टे अंगावर उठणे ही लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे क्रमप्राप्त असल्याचे डॉ. वाडेकर यांनी सांगितले. डास नियंत्रणासाठी योग्य ते उपाय योजल्यास डेंगीवर नियंत्रण राखता येणे शक्य आहे.

उपचार काय?

ही साथ विषाणूजन्य आहे. त्यावर अँट‌िव्हायरल औषध उपलब्ध नाही. ताप व अंगदुखीवर पॅरासिटमॉल गोळी खाणे व विश्रांती तसेच भरपूर पाणी पिणे हेच केवळ उपचार आहेत, असेही डॉ. वाडेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीतून शेतकऱ्यांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिल्ली येथील आंदोलन आणि किसान मुक्ती संसदेला देशभरातील शेतकरी पोहचू नये, त्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे अडवून अडथळा आणला, पोलिसांनी नाकाबंदी करून त्रास दिला. त्यावर मात करून शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक दिली. दोन‌ दिवसांच्या किसान मुक्ती संसद यशस्वीपणे यशस्वी केली. त्या संसदेत किसान कृषी उत्पाद‌ित मूल्य प्राप्त अधिकार, किसान कर्जमुक्ती बील २००१७ असे दोन ‌खासगी बिल मांडण्यात आले. ही दोन्ही बिले स्वाभिमानी शे‌तकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी संसदेत मांडणार आहेत. भविष्यात या दोन बिलासाठीच देशव्यापी तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार घेण्यात आला. दिल्लीतील संसदभवनच्या रस्त्यावर शेतकऱ्यांची दोन दिवसाची संसद झाली.

गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शेतमाल उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देऊ, स्वामिनाथन आयोग लागू करू, असे आश्वासन‌ दिले होते. त्याची अंमलबजावणी न केल्याने देशातील शेतकरी कर्जबाजारी झाले. यामुळेच सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, शेतमालाचा चांगला भाव मिळावा या दोन मागण्यांना कायद्याच्या चौकटीत आणण्याचा मुद्दा खासदार शेट्टी, माजी खासदार हनम मुल्ला (प‌श्चिम बंगाल), नर्मदा बचावच्या नेत्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव, रामपाल जाट आदींनी मांडला. त्यावर मंगळवारी दिवसभर सविस्तर चर्चा झाली. चर्चेतून दोन्ही बिलांचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी दोन समित्यांची नियुक्त झाली.

किसान कृषी उत्पाद‌ित मूल्य प्राप्त अधिकार कायदा बिल अंतिम मसुदा तयार करण्याच्या समितीचे अध्यक्ष खासदार शेट्टी तर किसान कर्जमुक्ती बील २०१७ बिलच्या समितीचे अध्यक्ष हनम मुल्ला अध्यक्ष आहे. दोन्ही समितीत प्रत्येकी पाच सदस्य आहेत. हे दोन्ही बिल सामान्यांना पाहण्यासाठी वेबसाइटवर टाकण्यात येणार आहे. त्यावर विविध घटकांतील तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी देशातील सर्व राज्यात देशभरातील १८७ शेतकरी संघटनेचे नेते दौरा करणार आहेत. सर्वाचा अभिप्राय घेऊन अंतिम बिल तयार करण्यात येईल.

महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, ‌तेलगंना, आंधप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, जम्मू काश्मिर आदी राज्यातून लाखो शेतकरी उपस्थित होते.

परिसर गहिवरला

देशभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या २०० पत्नी किसान मुक्ती संसदेत सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यातील ७० जणींचा सहभाग होता. त्यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्यानेच आमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. त्यातूनच पतीने आत्महत्या केल्याच्या भावना मांडल्या. किसान मुक्ती संसदेत त्यांनी मांडलेल्या व्यथा एकूण परिसर गहिवरला.


‘स्वाभिमानी’ एक्सप्रेसला अडथळा

कोल्हापुरातून दिल्लीतील आंदोलनासाठी जाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र रेल्वे बुक केली. ती १८ नोव्हेंबरला कोल्हापूरहून निघाली. पोलिसांनी रेल्वे मथुरेच्या रेल्वेस्टेशनवर दोन ‌तास थांबवली. कोणत्याही कारणाशिवाय रेल्वे थांबवून अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. मध्यप्रदेशातील आंदोलक शेतकऱ्यांचीही अशीच रेल्वे थांबवून ठेवली होती. दिल्लीतील शेतकरी किसान मुक्ती संसदेच्या ठिकाणी पोहचू नये, यासाठी नाकाबंदी केली. अशाप्रकारे सरकारने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवराज कामटेसह संशयितांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

पोलिस कोठडीत अनिकेत कोथळेचा खून केल्याप्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजणांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ करण्यात आली. घटनेनंतर साक्षीदार अमोल भंडारेला काही काळ धरुन ठेवणाऱ्या दोघांकडे तपास करणे बाकी आहे. संशयितांचे मोबाइल जप्त करुन त्यातील कॉल डिटेल्सनुसार संपर्कात आलेल्यांची चौकशी करायची असल्याने सीआडीने आणखी तीन दिवस कोठडीची मागणी केली. दरम्यान संशयितांचे वकीलपत्र घ्यायला कुणीच पुढे न आल्याने मंगळवारी विधी व सेवा प्राधिकरणामार्फत वकील देण्यात आला.

युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, हवालदार अरुण टोणे, कॉन्स्टेबल नसरुद्दीन मुल्ला आणि झाकीर पट्टेवाले अशी संशयितांची नावे आहेत. मारहाणीत कोठडीतच अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस गाडीचा चालक राहुल शिंगटेची मदत घेऊन अनिकेतचा मृतदेह ठाण्यातून हलविण्यात आला. मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ९ नोव्हेंबरला सहाही संशयितांना अटक केली आहे. कोर्टाने पहिल्या टप्प्यात त्या सर्वांना तेरा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मंगळवारी कोठडीची मुदत संपल्याने सीआयडीचे तपास अधिकारी, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी संशयितांना मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती पी.पी. खापे यांच्या कोर्टात हजर केले.

पोलिस छावणीचे स्वरुप आलेल्या कोर्टाच्या आवारात बंदोबस्तात संशयितांची वाहने मंगळवारी अकराच्या सुमारास एका पाठोपाठ आली. सरकारी वकील उज्ज्वला आवटे आणि सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक कुलकर्णी यांनी गेल्या तेरा दिवसातील तपासाची प्रगती मांडली. अनिकेतच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावताना सांगलीत कृष्णा नदीकाठी अंधारात अमोल भंडारे याला धरुन बसलेल्या दोघांची चौकशी बाकी आहे, या दरम्यान संशयितांशी संपर्कात असलेल्यांची चौकशी करायची आहे, शिवाय आणखी एक वाहन जप्त करायचे असल्याने पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली. यावेळी संशयीतांची बाजू मांडायला कोणीही वकील पुढे आला नाही. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाने विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनेलवरील अ‍ॅड. आर.पी.पाटील यांनी संशयितांची बाजू मांडली. त्यांनी संशयितांना याआधी कोठडी दिल्याचा युक्तिवाद करुन आता कमीत कमी कोठडी द्यावी, अशी मागणी केली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने संशयितांना आणखी दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणीपतीसह तिघांना पोलिस कोठडी

$
0
0

इचलकरंजी

शहापुरातील करांडे मळा परिसरातील विवाहिता तरन्नुम फारुख मारुक (वय २६) हिच्या मृत्यू प्रकरणी शहापूर पोलिसांनी अटक केलेल्या पती फारुख कलीउद्दीन मारुक, सासरे कलीउद्दीन चाँदसाहेब मारुक, दीर असिफ कलीउद्दीन मारुक या तिघांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

तरन्नुम हिने आत्महत्या केल्याची घटना कळताच तरन्नुमच्या माहेरकडील नातलगांनी पती फारुख, सासरा कलीमुद्दीन आणि दीर आसिफ या तिघांना मारहाण करुन त्यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली होती. सासरी झालेल्या छळामुळेच तरन्नुमने आत्महत्या केल्याची फिर्याद तरन्नुमचे वडील इम्तियाजअहमद शमशुद्दीन हंगड (रा. मिरज) यांनी दिली होती. फिर्यादीनुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करून फारुखसह तिघांना अटक केली आहे. तर सासू आखाबो मारुक, जाऊ आजादुन मारुक आणि ओमाणी मारुक(सर्व रा. मूळ गाव कुडची सध्या रा. करांडे मळा शहापूर) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. तर अधिक तपासासाठी तरन्नुम हिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.

वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत, विवाहानंतर तरन्नुम हिचा पतीसह सासरा, सासू, दीर व जावांनी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ सुरू केला होता. मागणीप्रमाणे मुलीच्या सासरच्या मंडळींना पैसे देण्यात आले. तरीही सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. त्यासाठी तरन्नुमचा मानसिक व शारीरिक छळ सुरु होता. तरन्नुमने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने तिचा छळ झाल्याने तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. सासरच्या मंडळींनी मुलीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगून कुडची (ता. रायबाग) येथे अंत्यसंस्कारासाठी पार्थिव नेण्यात येत असल्याचे तरन्नुमच्या नातलगांना सांगितले होते. त्यामुळे शंका आल्याने वडील हंगड यांनी नातेवाईकांसह इचलकरंजीत येऊन पाहणी केली असता आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी जागृती गुजरातमधून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिल्ली येथे झालेल्या दोन दिवसाच्या किसान मुक्ती संसदेत शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या दोन विधेयकांच्या जागृतीसाठी गुजरात येथून शेतकरी यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय किसान मुक्ती समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ही जागृती यात्रा काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा कसा‌ विश्वासघात केला, त्याची माहिती गुजरातमध्येच जाऊन समन्वय समितीचे नेते देणार आहेत. तेथील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींची कोंडी करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, या प्रमुख मागण्या कायद्याच्या चौकटीत बसवण्यावर चर्चा झाली. त्यातून किसान कृषी उत्पादित मूल्य प्राप्त अधिकार, किसान कर्जमुक्ती विधेयक २०१७ अशी दोन ‌खासगी विधेयके मांडण्यात आली. दोन्ही ‌विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभिप्राय घेण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील सर्व राज्यात या विधेयकासंबंधी जागृती आणि अभिप्रायासाठी किसान यात्रा काढण्याचा निर्णय झाला. त्याची सुरूवात गुजरातमधून करण्यात येणार आहे. या यात्रेत समन्वय समितीत समावेश असलेल्या १८७ शेतकरी संघटनांचे नेते असतील. अंतिम मसुद्यानंतर तयार झालेली दोन्ही विधेयके खासदार राजू शेट्टी संसदेत मांडणार आहेत.

००००००००
लढा तीव्र करणार

दिल्लीतील आंदोलन आणि किसान मुक्ती संसदेची माहिती पत्राव्दारे पंतप्रधान कार्यालयाला दिली होती. यामुळे किसान संसदेच्या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयाकडून प्रतिनिधी येऊन माहिती घेणे अपेक्षीत होते. मात्र तसे न झाल्याने देशभरातील सर्वच संघटनांचे नेते आक्रमक झाले. त्यांनी यापुढील काळात सरकारविरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार केला.
========
प्रचंड थंडी असतानाही दिल्लीतील किसान मुक्ती संसदेला देशभरातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या संसदेत दोन विधेयके तयार करण्यात आली. त्याच्या जागृतीसाठी गुजरातमधून शेतकरी यात्रा काढण्यात येणार आहे. मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत, तेथील शेतकऱ्यांनीही त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करणार आहे.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उसाच्या ट्रॉलीखाली सापडून मुलगा ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ता ओलांडताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. सूरज तानाजी पाटील (वय १६, रा. रामनगर, शिये, ता. करवीर) असे मृत मुलाचे नाव आहे. शिये-बावडा मार्गावर परमार पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक शामराव बाळू कोळी (रा. रुकडी, ता. हातकणंगले) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शामराव कोळी हा ट्रॅक्टर चालक मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उसाने भरलेल्या दोन ट्रॉली आणि ट्रॅक्टर (एम.एक्स.एम. ६८५६) घेऊन शिये फाट्याकडून कसबा बावड्याकडे निघाला होता. परमार पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर रस्ता ओलांडणाऱ्या सूरज पाटील या मुलाला ट्रॅक्टरने धडक दिली. या धडकेत रस्त्यावर कोसळलेल्या सूरजच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. या घटनेनंतर घाबरलेल्या ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी तातडीने गंभीर जखमी अवस्थेतील सूरजला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.

सूरजचे नातेवाईक आकाश लक्ष्मण वाडकर (२४, रा. संभाजीनगर, नागाव, ता. हातकणंगले) यांनी शिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानुसार पोलिसांनी ट्रॅक्टर चालक शामराव कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सूरज हा शिये येथील शाळेत शिकत होता. त्याच्या आईची शिरोली एमआयडीसी परिसरात चहाची गाडी आहे, तर वडील ड्रायव्हर आहेत. मुलाच्या अपघाताची माहिती मिळताच सूरजच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे. नातेवाईकांनी सीपीआर परिसरात गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात ‘आघाडी’च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ विविध अभ्यास मंडळ व अ​धिसभा (सिनेट) निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधर, प्राचार्य व संस्था गटाच्या सर्व जागा तर विद्यापीठ शिक्षक गटातील तीन आणि महाविद्यालयीन शिक्षक गटातील दोन जागा जिंकत सिनेटवर विकास आघाडीने एकहाती सरशी केली. पाच विविध संस्थांची युती करत एकत्र आलेल्या विकास आघाडीचे आव्हान पेलणाऱ्या शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) या निवडणुकीत सवतासुभा मांडत प्रतिष्ठेच्या विद्या​ परिषदेच्या सहाही जागांवर विजय मिळवत दबदबा कायम ठेवला. मात्र आजवर हक्काच्या समजल्या जाणाऱ्या कॉलेज शिक्षक गटात दहापैकी आठ जागा जिंकल्या असल्या तरी दोन जागांवर त्यांना पराभव पत्करावा लागला. आजी माजी विद्यार्थी कृती समितीला मात्र आपले खाते उघडता आले नाही. गेल्या निवडणुकीत अवघ्या तीन जागांवर समाधान मानणाऱ्या आघाडीच्या हाती आलेली सिनेटची सत्ता, निवडणुकीच्या ऐन तोंडावर अंतर्गत कलहामुळे पडलेल्या फुटीचा ‘सुटा’ला बसलेला दणका या दोन गोष्टी यंदाच्या निवडणुकीत चर्चेच्या ठरल्या. दरम्यान, एकूण सिनेटमधील ३८ जागांपैकी विकास आघाडीने ३० इतक्या जागांवर बाजी मारली असून शिक्षक गटातील ८ जागांवर ‘सुटा’ला समाधान मानावे लागले.

विद्या परिषदेच्या सहाही जागांसाठी सुटा आणि आघाडी यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विद्यापीठाच्या कारभारात सिनेटबरोबरच विद्यापरिषदेत होणाऱ्या निर्णयांना असलेले महत्त्व लक्षात घेउन विद्या परिषदेवर कुणाचा विजय होणार याकडे लक्ष लागले होते. या गटातील एकूण आठ जागांपैकी दोन जागा रिक्त होत्या. उर्वरित सहा जागांवर सुटाने निर्विवाद वर्चस्व मिळवत आघाडीचा एकहाती पराभव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीत आवाडे गटाला धक्का

$
0
0

हातकणंगले

नवनिर्मित हुपरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकीय उलाढालीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या गटाच्या चार समर्थकांनी आमदार सुरेश हाळवणकर व जि.प.अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामध्ये ज्येष्ठ नेते व चांदी कारखानदार असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर ससे, वडगाव बाजार समितीचे माजी उपसभापती देवाप्पा मुधाळे, माजी उपसरपंच भरत वाळवेकर, उद्योगपती सुभाष माळी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या ऐन धामधुमीत घडलेल्या घडामोडीने आवाडे गटाला मोठा धक्का बसला असून याचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी जयश्री महावीर गाट यांचे नाव घोषित करण्यात आले.

दरम्यान, आवाडे गटाच्या या चारजणांचा भाजप प्रवेश व उमेदवारी निवड यादी यावर उद्योगपती महावीर गाट यांचे वर्चस्व असल्याचे चित्र स्पष्ट होताच जनता उद्योग समूहाचे नेते आण्णासाहेब शेंडूरे हे नाराज झाले असून ते स्वतंत्र आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

चंदेरीनगरी हुपरी येथे लोकलढ्यातून एप्रिल महिन्यात नगरपरिषद मंजूर झाली. ही नगरपरिषद मंजूर करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर व आण्णासाहेब शेंडूरे यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत याचे श्रेय घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणली पाहिजे यासाठी भाजपच्या वरिष्ठांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आण्णासाहेब शेंडूरे व महावीर गाट यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु उमेदवार निवडीत या दोघांत मोठ्या प्रमाणात मतभेद झाल्याने आमदार सुरेश हाळवणकर यांनी लक्ष घालून मंगळवारी जिव्हेश्वर भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बारा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी जयश्री महावीर गाट यांचे नाव घोषित केले.

यावेळी बोलताना आमदार हाळवणकर म्हणाले,‘ भाजपकडे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित नगराध्यक्षपदासाठी पाचजणांनी तर नगरसेवकपदासाठी साठजणांनी मागणी केली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक,जि.प.अध्यक्षा शौमिका महाडिक, हिंदूराव शेळके, बाबा देसाई, मंगलराव माळगे, सुदर्शन खाडे, महावीर गाट, आण्णासाहेब शेंडूरे यांचा समावेश असलेल्या निवड समितीने नगराध्यक्षपदासाठी जयश्री गाट यांच्यासह बारा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.’

दरम्यान, भाजपात आवाडे गटाच्या चार समर्थकांचा प्रवेश व उमेदवारांच्या निवडलेल्या यादीवरुन आण्णासाहेब शेंडूरे हे नाराज झाल्याने ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------

भाजपची १२ उमेदवारांची यादी

प्रभाग क्र.एक- अनिता मधाळे,दादासाहेब गाट,

प्रभाग क्र.दोन - सीमा पाटील

प्रभाग क्र.तीन - आण्णासाहेब शेंडूरे, सुप्रिया श्रीनिवास पालकर

प्रभाग क्र.चार - ऋतुजा अभिनव गोंधळी

प्रभाग क्र.पाच - जयश्री सुभाष मधाळे,

प्रभाग क्र.सहा - जयकुमार मंगलराव माळगे, लक्ष्मी साळोखे

प्रभाग क्र.आठ - सागर माळी,आनंदी मुधाळे

प्रभाग क्र.नऊ - सपना नलवडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नैतिकता गमावलेल्यांची टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘गोकुळ’चे व्यवस्थापन संघातून चालते, कोणत्याही व्यक्तीच्या हातात नाही. स्वत:च्या संस्थांचा पारदर्शी कारभार झाकून ठेवून नैतिकता गमावलेल्यांनी गोकुळवर टीका करत रडीचा डाव खेळू नये, असा अपरोधीक टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना लगावला. ‘गोकुळ’च्या कारभाराची त्यांना माहिती हवी असल्यास, समोर येऊन चर्चा करावी असे थेट आव्हानही दिले. सोमवारी आमदार पाटील यांनी गोकुळ व्यापाऱ्यांच्या हातात अशी टीका केल्यानंतर महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले.

महाडिक म्हणाले, ‘आमदार पाटील यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द लुबाडणूक करण्यात गेली. महापालिकेची जागा हॉटेलच्या पार्किंगसाठी लाटली, शांतीनिकेतन, हॉस्पिटलसाठी जमीन बळकावली, शेती महामंडळाच्या जमिनी लुटण्याचा धंदा केला, त्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत. राज्यमंत्री असताना मटकेवाल्याकडून हप्ते घेणाऱ्यांनी राजकारणातील नैतिकताही गमावली आहे. थेटपाइपलाइन आणि आयआरबी प्रकल्पात ढपला पाडणाऱ्यांनी आणि गगनबावडा साखर कारखान्याचे वर्षभरात चार हजार सभासद कमी करणाऱ्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. पाडणाऱ्या गोकुळचे व्यवस्थापन उत्पादकांच्या हितासाठी चालत असून कोणा एका व्यक्तीच्या हातात नाही. स्वत:च्या संस्थांच्या कारभार तपासवा आणि नंतरच गोकुळवर आणि माझ्यावर आरोप करावेत.’

‘गोकुळचा कारभार व्यापारी तत्त्वावर चालतो, त्यामुळेच संघ राज्यात व देशात आघाडीवर आहे. दिशाभूल करणारे आरोप करण्यापेक्षा आरोप खरे करावे, अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी करून ते म्हणाले, सत्ता येत नाही म्हणून रडीचा डाव खेळला जात आहे. सत्तेत असताना वाटणी मागायला येणाऱ्यांनी आता खोटे आरोप करून गोकुळची बदनामी थांबवावी. ते म्हणाले, ‘अमूल’च्या आकडेवारीचा आधार घेऊन गोकुळबरोबर तुलना करताना त्यांचा अभ्यास कमीच दिसतो. अमूल एक फेडरेशन असून गोकुळसारखे २६ संघ त्यांचे सभासद आहेत. गोकुळ उत्पादकांना एकूण उत्पन्नाच्या ९२ टक्के रक्कम देते, अमूलही ९१ टक्के देते आहे असा दावा असेल, तर प्रत्यक्ष उत्पादकांना अमूल किती देते याचा अभ्यास करून नंतर संघांवर आरोप करावेत. संघात पी. एन., महाडिक यांचे नेतृत्व आहे, त्यांचे खोटे आरोप उत्पादकांना पटणार नसल्याचाही विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.


बक्षिसांची रक्कम वाढवावी लागेल

राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत अहवालावर कार्यकर्त्यांना प्रश्न विचारण्यास सांगणाऱ्या कारखान्याचा अहवालच निघत नाही. त्यांनी अहवाल द्यावा, यासाठी आपण ११ हजारांचे बक्षीस लावले होते, पण आजअखेर अहवाल आलेला नाही. त्यामुळे बक्षिसांची रक्कम वाढवावी का असा प्रश्न पडल्याचा टोला महाडिक यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्या परिषदेवर ‘सुटा’ची बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ विविध अभ्यास मंडळ व अ​धिसभा (सिनेट) निवडणुकीमध्ये नोंदणीकृत पदवीधर गटातील सर्व दहा जागांवर शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवत पदवीधर गटाचा गड जिंकला. यासाठी नऊ जागांसाठी निवडणूक झाली. एक जागा बिनविरोध निवडून आली होती. तर प्रतिष्ठीत विद्यापरिषद गटातील सर्व सहा जागांवर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) सर्व जागा जिंकत बाजी मारली. पाच जागांसाठी निवडणूक झाली तर एक जाग बिनविरोध निवडून आली होती. या गटातील दोन जागा योग्य उमेदवाराअभ्यावी रिक्त राहिल्या आहेत.

अधिसभा शिक्षक गटातील आठ जागा ‘सुटा’ने जिंकल्या असून उर्वरित दोन जागा काबीज करण्यात आघाडीला यश आल्याने शिक्षक गटावर सुटाचे वर्चस्व राहिले. प्राचार्य गटातील सर्व दहा जागा व संस्था प्रतिनिधी गटातील सर्व सहा जागा बिनविरोध निवडून आणण्यात आघाडीने बाजी मारल्याने हे दोन्ही गट आघाडीने ​जिंकले आहेत. दोन गट पूर्णपणे आघाडी व सुटा यांनी एकहाती काबीज केले असले तरी सरासरी सर्वाधिक जागांवर ​विजय मिळवून शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने सिनेटवर झेंडा फडकवला.

शुक्रवारी १७ रोजी सिनेट व अभ्यासमंडळाच्या निवडणुकीसाठी चुरशीने सरासरी ६२ टक्के मतदान झाले होते. सोमवारी दि. २० रोजी सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी मंगळवारी सकाळी आठ वाजता संपली. तब्बल चोवीस तास मतमोजणी सुरू होती. दरम्यान सिनेटअंतर्गत प्राचार्य गट व संस्था प्रतिनिधी गट आघाडीसोबत असल्यामुळे या गटातील निवडी बिनविरोध झाल्या. विद्यापरिषदेच्या सहा जागा, नोंदणीकृती पदवीधरच्या नऊ जागा, महाविद्यालयीन शिक्षक गटातील नऊ जागा आणि अधिसभा शिक्षक गटातील नऊ जागांच्या मतमोजणीनंतर सविस्तर निकाल जाहीर करण्यात आला.

विद्यापरिषदेसाठी आठ जागा होत्या. त्यापैकी दोन जागा रिक्त राहिल्यामुळे आणि एन.टी. महिला प्रवर्गातील डॉ. शर्मिला साबळे यांची जागा बिनविरोध झाल्याने पाच जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. यामध्ये सुटाने सर्वच्या सर्व सहा जागा काबीज करत विद्यापीठाच्या सिनेटमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या विद्यापरिषदेवर ​वर्चस्व राखले. तर चर्चेत असलेल्या नोंदणीकृत पदवीधर गटातील सर्व दहा जागांवर विद्यापीठ विकास आघाडीने एकहाती विजय मिळवला. यापैकी नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती तर एक जागा ​बिनविरोध करण्यात आघाडीला यश आले होते. महाविद्यालयीन शिक्षक संघ या गटात कोण बाजी मारेल याकडे निवडणूककाळात चांगलेच लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या गटातील दहा जागांपैकी आठ जागा सुटाने काबीज करत महाविद्यालयीन शिक्षक गटाचा बालेकिल्ला राखण्यात यश​ मिळवले. तर या गटातील अवघ्या दोन जागांवर विकास आघाडीने विजय मिळवला.

दोन जागा सुटाने गमावल्या

सिनेटमध्ये शिक्षक संघ अर्थात सुटाचे वर्चस्व राखण्यासाठी मदत करणाऱ्या शिक्षक गटातील दहापैकी दहा जागा जिंकणारच असा विश्वास सुटाला होता. मात्र या गटातील दहापैकी एक बिनविरोध जागा वगळता दोन जागांवर विकास आघाडीने बाजी मारली. या दोन जागा सुटाकडे येणार असे सुटाला अपेक्षित होते. त्यापैकी बिद्रीच्या डॉ. डी. एन. पाटील यांचा पराभव सुटाच्या पदाधिकाऱ्यांना धक्का देणारा ठरला आहे. तर आघाडीने या गटातील सुटाच्या दोन जागा जिंकत सुटाच्या शिक्षकगटातील वर्चस्वाला सुरूंग लावला आहे.

प्रा. ढमकले पराभूत

ऐन सिनेटच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातील (सुटा) अंतर्गत वाद उफाळून आला आणि त्यातून सुटाचे अध्यक्ष प्रा. रघुनाथ ढमकले यांची संघटनेतून उचलबांगडी केली. त्यानंतर ढमकले यांनी बंडखोरी करून शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ढमकले यांच्या विजय पराजयाकडे कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. सुटातून बाजूला होत एकाकी लढत देणाऱ्या ढमकले यांना ६५३ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुटाचे डॉ. आर. आर थोरात यांना १३६५ मते मिळाली. ढमकले यांचा ७१३ मतांनी पराभव झाला.

डेळेकर यांची निवड वादाच्या भोवऱ्यात

विद्यापीठ शिक्षक गटातून विकास आघाडीचे एस. डी. डेळेकर विजयी झाले आहेत. मात्र त्यांची भरती बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्यांच्या निवडीविरोधात विरोधी गट आक्षेप घेण्याच्या तयारीत आहे. २०१० ते २०१५ या काळातील भरती प्रक्रिया बेकायदेशीर असल्याच्या शिक्षण सहसंचालक (सोलापूर) यांच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर डेळेकर यांच्या निवडीला आव्हान देण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

शेवटचा निकाल वसंत पाटील यांच्या विजयाचा

तब्बल २४ तास सुरू असलेली मतमोजणी मंगळवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी संपली. सोमवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता पहिला निकाल विद्यापीठ शिक्षक गटाचा जाहीर करण्यात आला होता. यामध्ये भारती पाटील, एस.डी. डेळेकर आणि एन. बी.गायकवाड यांची नावे घोषित करण्यात आली होती. तर या मतमोजणीप्रक्रियेतील शेवटचा निकाल महाविद्यालयीन शिक्षक गटातील आघाडीचे उमेदवार वसंत पाटील यांच्या विजयाच्या घोषणेने जाहीर करण्यात आला. पहिला व शेवटचा निकाल जाहीर होताना आघाडीच्या उमेदवाराचे विजयी नाव जाहीर केल्याची चर्चा मतमोजणी कार्यालय परिसरात सुरू होती.

९ महिला विजयी

प्राचार्य, संस्थाचालक, नोंदणीकृत पदवीधर, विद्यापीठ शिक्षक, विद्यापरिषद आणि महाविद्यालयीन शिक्षक या गटातील एकूण उमेदवारांपैकी नऊ जागांवर महिलांनी बाजी मारली आहे. यामध्ये महाविद्यालयीन शिक्षक गटात एस.टी. प्रवर्गातून सुटाच्या डॉ. अलका निकम आणि महिला प्रवर्गातून सुटाच्या डॉ. ईला जोगी यांची वर्णी लागली आहे. विद्यापरिषद या गटात शिक्षणशास्त्र विभागाच्या डॉ. प्रतिभा पाटणकर या सुटाच्या उमेदवार महिलांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. तर याच गटातून मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या डॉ. शर्मिला साबळे यांनी बिनविरोध विजयी होत बाजी मारली आहे. संस्थाचालक गटातून विकास आघाडीच्या डॉ. शुभांगी गावडे, पदवीधर गटातून आघाडीच्या स्वाती पंडित आणि आरती शिंदे यांना संधी मिळाली आहे. प्राचार्य गटातून एकमेव डॉ. भाग्यश्री जाधव यांनी आघाडीच्या माध्यमातून बिनविरोध विजय मिळवला आहे. विद्यापीठ शिक्षक गटातून राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील यांची निवड झाली आहे.

नोंदणीकृत पदवीधर गट एकूण १० जागा (सर्व विकास आघाडी)

उमेदवार मिळालेली मते गट

मल्लाप्पा चौगुले १०६३ विकास आघाडी

श्रीनिवास गायकवाड १००९ विकास आघाडी

संजय जाधव १२७४ विकास आघाडी

पंकज मेहता ११६१ विकास आघाडी

मधुकर पाटील ११२४ विकास आघाडी

लोभाजी भिसे बिनविरोध विकास आघाडी

आरती शिंदे ५१३८ विकास आघाडी

स्वाती पंडित ५२२५ विकास आघाडी

​दिनेश जंगम ४८७९ विकास आघाडी

अमरसिंह रजपूत ५०६३ विकास आघाडी

000

विद्यापरिषद एकूण ८ जागा पैकी २ रिक्त असल्याने ६ जागांसाठी निवडणूक

उमेदवार मिळालेली मते सर्व सुटा

डॉ. आर. जी. कोरबू १८०२ सुटा

डॉ. सुनील सावंत १७०५ सुटा

डॉ. पी. एन. वासंबेकर १८९२ सुटा

डॉ. प्रतिभा पाटणकर १८६६ सुटा

डॉ. शर्मिला साबळे बिनविरोध सुटा

डॉ. डी.एच. दगडे १९२७ सुटा

000

अधिसभा शिक्षक गट

उमेदवार मिळालेली मते गट

डॉ. अरूण पाटील ५५६ सुटा

प्रा. अशोक पाटील ५२२ सुटा

मनोज गुजर ४९४ सुटा

डॉ अलका निकम १७०७ सुटा

डॉ. एन. के. खंदारे १४६८ सुटा

डॉ. आर. आर. थोरात १३६६ सुटा

प्रकाश कुंभार बिनविरोध सुटा

प्रा. डॉ. इला जोगी १६९७ सुटा

वसंत पाटील ४४५ विकास आघाडी

सतीश घाटगे ५१५ विकास आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images