Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सीसीटीव्हीचे फुटेज उघड करा

$
0
0

कागल

‘ कागल नगरपालिकेला लागलेल्या आगीसंदर्भात सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे याचा खुलासा पोलिसांनी लवकरात लवकर केला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली पाहिजे. कोणी बिल्डर यामागे आहे का, हे देखील तपासावे लागेल. या घटनेची शहानिशा झालीच पाहिजे नाहीतर नगरसेवकांसह पोलिस ठाण्यासमोर उपोषणाला बसावे लागेल’ असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल येथे पत्रकार परिषदेत दिला.

कागल नगरपालिकेला लागलेली लाग ही पालिकेच्या इतिहासात दुर्दैवी घटना आहे. वादाचा विषय होणार हे गृहीतच धरले होते, असे स्पष्ट करुन आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘जनतेच्या मनातील संभ्रम दूर होणे आवश्यक आहे. घरकुलाचे पाप झाकण्यासाठी व गुंठेवारी प्रकरणे जाळली असे दोन आरोप भाजपने केले आहेत. त्यापैकी घरकुलाचे काम गेली काही वर्षे सुरु आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात विरोधकांना दोन वेळा माहिती देण्यात आली आहे. त्याचा डाटाही शिल्लक आहे, म्हाडाकडेही त्याची कॉपी आहे. प्रकल्पाच्या कन्स्लटंटकडेही त्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा ती माहिती गोळा होऊ शकते असे अधिकाऱ्यांनी अगोदरच सांगितलेलेच आहे.’

भारतीय जनता पक्षाने एवढे मोठे धडधडीत आरोप कसे काय केले, त्याचे काय कारण असावे, साडेतीन वर्षे आमची सत्ताही नाही. आम्ही काही गोलमाल केले आहे काय? एवढे दडविण्यासारखे व जाळण्यासारखे काय आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करुन मुश्रीफ म्हणाले, ‘याउलट आमचे नगरसेवक प्रविण काळबर व इतरांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी सीसीटीव्हीचे फुटेज असलेले डीव्हीआर मशीन सुरक्षित काढून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. एकतर शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असेल, अन्यथा हे कुणी केले, याचा खुलासा त्यातून होईलच. त्याहीपेक्षा मला असे वाटते की,कागलमध्ये सध्या मोठमोठे बिल्डर्स आलेले आहेत. कागलच्या एक चतुर्थांश मालकीची जमीन असलेले मोठे बिल्डरदेखील यामध्ये आहेत. त्यांच्या काही जमिनींवर आरक्षण आहे. बांधकामाला त्यांनी परवानगी घेतलेली आहे. ती परवानगी खोटी कागदपत्रे दाखल करुन घेतली की काय? त्यासाठीच उपद्व्याप झाला असावा की काय, अशी शंका आहे. मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय असेल ते जनतेपुढे आले पाहिजे. जळले की जाळले हे लोकांना कळालेच पाहिजे. सामान्य माणसांच्या मनातील शंकेचे निराकरण होणे गरजेचे आहे.’ यावेळी भैय्या माने, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, पक्षप्रतोद प्रविण काळबर, आनंदा पसारे, सौरभ पाटील, बाबासो नाईक आदी उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोथळे हत्याप्रकरण: खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

सांगलीतील अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फासावर चढविण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील यांनी आज सांगली येथे कोथळे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर कडाडून टीका केली. दरम्यान, अनिकेत कोथळेच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

अलिकडच्या काळात पोलीस खात्याची अधोगती झाली आहे. राज्यकर्त्यांकडून गुन्हेगारांना उघड राजाश्रय मिळत असल्याने गुन्हेगार बेलगाम झाले असून, परिणामतः गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारीकडे डोळेझाक करता-करता आता पोलीस स्वतःच ‘सुपारी किलिंग’करू लागल्याचा आरोप त्यांनी अनिकेत कोथळेच्या मृत्युचा संदर्भ देताना विखे-पाटील यांनी केला. बेकायदेशीर व्यवसाय दडपण्यासाठी पोलिसांनी अनिकेतला खोट्या गुन्ह्यात अडकवून ताब्यात घेतल्याचा कोथळे कुटुंबीयांचा आरोप अत्यंत गंभीर आहे. अनिकेत कोथळेला न्याय द्यायचा असेल तर आरोपींना शिक्षा होण्यासोबतच त्याच्या उद्धवस्त झालेल्या कुटुंबाला आधार देण्याची मागणीही त्यांनी केली.

प्रकाश सुर्वेंवर गुन्हा का दाखल होत नाही?

एकीकडे केवळ संशयाच्या आधारे सर्वसाधारण कुटुंबातील युवक असलेल्या अनिकेत कोथळेला तातडीने अटक करून मरेपर्यंत मारहाण करण्यात आली तर दुसरीकडे मुंबईत शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरूद्ध मागील महिनाभरापासून अपहरणाची लेखी तक्रार असताना या प्रकरणात अद्याप साधा गुन्हा दाखल करण्याची तसदी देखील पोलिसांनी घेतलेली नाही, अशी खंत विखे-पाटील यांनी व्यक्त केली.

मुंबईतील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावरील आरोपाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज कोरडे नामक तरूणाच्या अपहरणाची अत्यंत गंभीर लेखी तक्रार महिनाभरापासून पोलिसांकडे आलेली आहे. आमदार सुर्वे, त्यांचे व्यावसायिक भागीदार गणेश नायडू व इतरांनी या युवकाचे अपहरण करून त्याला सुरतला डांबून ठेवल्याचा स्पष्ट उल्लेख या तक्रारीत आहे. पीडित युवक व त्याच्या आईचा लेखी जबाबदेखील घेण्यात आला आहे. तरीही या प्रकरणात अजून गुन्हा का दाखल झालेला नाही? यातील संशयित आरोपी शिवसेनेचे आमदार असल्याने त्यांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे का? असे प्रश्न उपस्थित करून सुर्वे व त्यांच्या साथीदारांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली. शिवसेना सतत नैतिकतेच्या गप्पा करते. पण आता त्यांच्याच एका आमदारावर गंभीर आरोप असताना शिवसेना मौन धरून बसली आहे. त्यांचा राजीनामा घेण्याची इच्छाशक्ती शिवसेना दाखवणार का, अशीही विचारणा त्यांनी केली.

अनिकेतच्या नातेवाईकांना मदत

अनिकेत कोथळेच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगलीला जाऊन कोथळे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अनिकेतच्या मृत्यू प्रकरणाचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे दिली जाणार आहे, अशी माहितीही केसरकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्फूर्तीस्थळा’वरून स्फूर्ती घेण्याचा निर्धार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने दादांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन पुन्हा एकदा काँग्रेसचे काम गतीने सुरू करण्याचा निर्धार सोमवारी वसंतदादांच्या स्फूर्तीस्थळ या समाधीच्या ठिकाणी करण्यात आला.
सांगली कृष्णानदीकाठी असलेल्या वसंतदादा पाटील यांच्या समाधीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शैलजा प्रकाश पाटील, जयश्री मदन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, आमदार शिवाजीराव नाईक, सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादांचे स्वीय सहय्यक यशवंत हप्पे, आमदार रामहरी रूपनवर, महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, मदन पाटील युवा मंचचे अध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव, युवक काँग्रेसचे मंगेश चव्हाण आदींनी दादांच्या स्फूर्तीस्थळावर पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी विविध धर्मातील प्रमुखांनी प्रार्थना केली. सांगलीसह जिल्ह्यात सर्वत्रच संस्थांच्या पातळीवर वसंतदादांना आदरांजली वाहण्यात आली.
दादांसारखा मित्र-शत्रू होणे नाही-पंतगराव कदम
‘वसंतदादा पाटील यांच्यासारखा मित्र आणि शत्रू होणे नाही. सातवी पास असलेल्या दादांनी शैक्षणिक क्रांती केली. अनेक नेते स्वतःला शेतकऱ्यांची पोरं म्हणवून घेतात पण, एकच शेतकरी मुख्यमंत्री तो म्हणजे, वसंतदादा,’ अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी सोमवारी वसंदादासंबधी आठवणींना उजाळा दिला.
सरकारने वसंतदादांच्या जन्मशताब्दीचा कागदी अध्यादेश काढण्यापलिकडे काहीच केले नाही. ज्या दादांनी काँग्रेस बळकटीसाठी आयुष्य वेचले, त्या प्रदेश काँग्रेसनेही वर्षभरातील उपक्रमांचा कागद काढण्यापलिकडे काहीच केले नाही, अशी खंत व्यक्त करून कदम म्हणाले, ‘दादांनी कुजकं राजकारण कधीही केले नाही. दोन वर्षे सत्तेवर आलेली मंडळी इतिहास पुसायला निघाली आहेत. पण, अशांने इतिहास पुसला जात नाही. गेली अनेक वर्षांतील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा मी साक्षीदार आहे. कोणता मुख्यमंत्री कसा आला आणि कसा गेला, हे ठामपणे सांगण्याइतकी हिम्मत आपल्यात आहे. विधान सभेतील पटलावर अनेकदा सांगितलेही आहे.’
पत्रकार संघटनेच्या वतीने वसंतदादांच्या जन्मशताब्दीनिमित्ता पतंगराव कदम यांचे सोमवारी व्याख्यान आयोजित केले होते. स्वागत अमृत चौगुले यांनी केले तर प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांनी केले. या वेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते. वसंतदादांच्या आठवणींना उजाळा देताना कदम अनेकवेळा भाऊकही झाले. तत्कालीन सातारा जिल्ह्यात समावेश असलेल्या खानापूर तालुक्यात आमचे गाव असल्याने सांगलीशी फारसा संबध येत नव्हता. एकदा गणपती उत्सवात मिरवणूक बघायला आलो होतो. त्यावेळी रात्री रस्त्याकडे झोपलो होतो. वसंतदादांसारख्या सहृदयी माणसाने मला एसटी बोर्डाचे सदस्य केले. सांगलीत एसटीचे विभागीय कार्यालय सुरू करायचे असेल तर वर्कशॉपची आवश्यकता होती. साखर कारखान्याच्या अध्यक्षासह सर्वांचा कारखाने वर्कशॉप द्यायला विरोध होता. परंतु, एका क्षणात वर्कशॉप दिले आणि एसटीचे डिव्हिजन सुरू झाले. माजी उपप्रधान यशवंत चव्हाण यांच्याकडे उमेदवारीसाठी गर्दी होऊ लागल्यानंतर दादांनी त्यांना एकच सांगितले. मला आणि राजारामबापूना उमेदवारी देऊ नका म्हणजे वाद होत नाही. त्यांची खेळी इतकी यशस्वी ठरली की, सर्व उमेदवाऱ्या दादांसमर्थकांना मिळाल्या आणि केवळ एक म्हणजे राजारामबापू यांना उमदेवारी दिली गेली. दादांच्या एका कारस्थानाने हे सर्व घडले.
का साखर कारखान्याने वसंतदादांना देशपातळीवरचा नेता केल्यानंतर त्यांनी सुतगिरण्या, साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकाराचे जाळे विणून सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावले. रोजगार निर्माण केला. कारखानदारीमुळेच परिवर्तन होऊन गाड्या, घोडे आले. दादा मंत्री व्हायच्या भानगडीत कधी पडले नाहीत. जोखमीने काम करून पक्ष बळकट करण्यावर त्यांनी भर दिला. आणीबाणीनंतर त्यांनी राजकीय संन्यास घेतला. परंतु, काँग्रेसची पिछेहाट होऊ लागल्यानंतर ते पुन्हा मैदानात उतरले. त्यांचा दरारा आणि सर्वसामान्यांना आपलस करण्याचे कसब त्यांच्यात होते. मेडीकल, इंजिनिअरिंग कॉलेजचा निर्णयही त्यांनी अनेकांचा विरोध डावलून घेतला. हे पाऊल क्रांतीकारक ठरले. सरकारचा एक पैसाही खर्च न होता ३०० पेक्षा अधिक कॉलेज उभा राहिली. मीही त्यांच्याकडे मेडीकल कॉलेज मागितले. पण, त्यांनी तुझ्याकडे साखर कारखाना नसल्याचे त्यांनी सांगितले. तरीही मी त्यांना तुम्ही जसे कागदावर ‘तपासून पहावे,’ असे लिहिता तसा शेरा मारून देण्यास सांगितले. त्यांनी तसे दिले. पुढे कोर्टात केस चालत राहिली. पुण्यात पहिली वहिली दहा मजली बिल्डिंग भारती विद्यापीठाने बांधायला सुरुवात केली. विरोध झाला पण एकेदिवशी दादांनी त्या बिल्डिंगच्या प्रतिकृतीला हात लावून फोटो काढला आणि या कामाला दादांचा पाठींबा असल्याची जाणीव करून दिली.
मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेल्या शालिनीताई पाटील यांनी दादांना विरोध केला नसता तर त्या पंचवीस वर्षे लिडर म्हणून राहिल्या असत्या, जयंत पाटील यांना दादांनीच पदरात घेऊन राजकारणात आणले. शरद पवारांनी दादांचे सरकार पाडले असतानाही दादांनी आपल्याला जवळ बोलवून महाराष्ट्र चालवणारा शरद पवारांइतका सक्षम नेता दुसरा कोणी नाही. त्यांना आपण मुख्यमंत्री करायचे आहे, असे सांगितले. असे सांगून शरद पवारांना मुख्यमंत्री केले. पवार हे दादांना घाबरत होते. तासगाव कारखान्याच्या बाबतीत असलेली स्थगिती दादांच्या सांगण्यावरुनच पवारांनी उठविली. पण, त्या कारखान्याची किती दयनीय अवस्था झाली आहे. ते बघा. मशिनरी कापून नेण्याचे उद्योग झाले. हे बरोबर नाही. लोकशाहीत माणसं महत्वाची असतात हे ओळखून दादांनी नेहमीच सर्वसामान्यांसाठी राजकारण केले. यापुढेही लोक काँग्रेसबरोबरच राहतील. मोदी लाटेप्रमाणे काँग्रेसची लाट येणार आहे. एकदा झालेली चूक लोक दुसऱ्यांदा करणार नाहीत, असा आत्मविश्वासही कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ घुमला मराठी आवाज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
कर्नाटक सरकारकडून मराठी बांधवांची वारंवार करण्यात येणारी मुस्कटदाबी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या एकीकरण समितीच्या महामेळाव्यावेळीही दिसून आली. तथापि, या मुस्कटदाबीला भीक न घालता हा महामेळावा मराठी बांधवांनी यशस्वी केला. यानिमित्ताने मराठी बाणा पुन्हा ‌एकदा दिसून आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला होणारी गर्दी आणि महाराष्ट्रातून येणारी नेतेमंडळी लक्षात घेत कर्नाटक पोलिसांनी सीमाभागात नाकेबंदी केली होती. तथापि, विविध मार्गांनी गनिमी काव्याने सीमाभागातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी मेळाव्याला उपस्थिती दर्शवत सीमाभागातील जनतेच्या पाठीशी महाराष्ट्र असल्याची ग्वाही दिली.
मेळाव्यात बोलताना महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंती पाटील म्हणाले, ‘‘पोलिसी बळाद्वारे सीमावासीयांना त्रास दिला जात आहे. मराठी माणूस न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरत असताना कर्नाटक सरकार दंडुकेशाहीची भूमिका घेत आहे. मराठी भाषिकांचा आवाज दडपायचा, महाराष्ट्रातील नेत्यांनी येथे येऊन त्यांच्याशी संवाद साधायचा नाही, ही भूमिका चुकीची आहे. कर्नाटकची ही दंडूकेशाही मराठी जनता कधीही सहन करणार नाही.’
व्यासपीठावर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुप्पेकर, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, निंगोजी हुद्दार, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, बिदर समितीचे अध्यक्ष रामराव राठोड आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त करून जयंत पाटील म्हणाले, ‘कर्नाटक सरकार जतमधील कन्नड शाळांना अनुदान देते. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील मराठी भागातील शाळांना अनुदान देणे आवश्यक आहे. सीमाप्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टात लवकर निर्णय व्हावा आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे अधिवेशन बेळगावात घेण्याची संधी मिळावी.’
सीमालढ्याचे मार्गदर्शक प्रा. एन. डी. पाटील यांनी मोबाइलवरून सीमावासियांशी संवाद साधला.
मेळाव्यात चौथी पिढी
सीमावासियांची चौथी पिढी उतरल्याचे महामेळाव्यानिमित्त पाहायला मिळाले. शहर आणि ग्रामीण भागातील समितीचे कार्यकर्ते भगवे ध्वज हातात घेऊन गटागटांने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होत होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांची अडवणूक करायला सुरुवात केली होती, पण समितीच्या नेत्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना खडसावल्यावर अडवणूक थांबवली. कर्नाटक सरकारने बेळगावात अधिवेशन घेण्यास प्रारंभ केल्यापासून त्याचा निषेध करण्यासाठी महामेळाव्याने प्रत्युत्तर दिले जात आहे.
‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाय,’ ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेलमे,’ ‘बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ अशा घोषणांनी मेळाव्याचा परिसर दणाणून गेला.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेत आमदार अरविंद पाटील मराठीत बोलू लागताच कन्नड आमदारांनी गोंधळ घातला. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. हिवाळी अधिवेशनातून समितीच्या आमदार संभाजी पाटील आणि आमदार अरविंद पाटील यांनी सभात्याग करून महामेळाव्याला हजेरी लावली.
पोलिसांची नरमाई
महामेळाव्यासाठी मैदान देण्यास महापालिकेने टाळाटाळ केल्यामुळे आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मेळाव्याचे व्यासपीठ आणि मंडप रस्त्यावर उभारण्यात आला. मराठी भाषिकांची जिद्द आणि जोश पाहून बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही बघ्याची भूमिका घेऊन गप्प उभारावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड पोलिसांचीहीतरुणांना बेदम मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
सांगली शहर पोलिसांनी केलेल्या आरोपींच्या खूनप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असतानाच कराड शहर पोलिसांनीही तरुणंना अशीच मारहाण केल्याचा आरोप होत आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी वडगाव हवेली (ता. कराड)तील दलित चळवळीतील कार्यकर्ते विजय संदे, अभय संदे, सचिन संदे या तरुणांना बेदम मारहाण केली आहे.
दोषी पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी कराड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी कराड शहर पोलिसांतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संदे कुटुबीयांसह वडगांव हवेली ग्रामस्थांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सातारचे अधीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधानांनाही लेखी निवेदन पाठविले आहे.
दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संदे कुटंबीयांसह वडगाव हवेली ग्रामस्थांनी सोमवारी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला आहे. या आंदोलनाला सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला आहे. सांगलीनंतर आता कराडचा हा धक्कादायक प्रकार ऐरणीवरती आला आहे.
अशी आहे घटना
वडगाव हवेली ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक गेल्या १६ ऑक्टोंबरला झाली. मतमोजणी १७ ऑक्टोंबरला कराडमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. निकाल ऐकण्यासाठी आलेल्या अभय संदे, विजय संदे आणि सचिन संदे यांना पोलिसांनी पकडून शहर पोलिस ठाण्यात नेऊन बेदम जबर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या तिघांवर कराडच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. विजय संदे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर मिरजेच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांचा सर्वपक्षीय गौरव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
‘यशवंतराव चव्हाणांनी दिलेला वारसा आणि विशेषकरून महिलांना व दलितांना समाजात पुढे आणण्याचा विचार आपण केला पाहिजे. सातारा जिल्हा सर्वच क्षेत्रात क्रांती करणारा जिल्हा आहे. सर्व चळवळीत अग्रेसर राहणाऱ्या या जिल्ह्याचा मला अभिमान आहे. आजपर्यंत साताऱ्याने मला दिलेली साथ कधीच विसरणार नाही. लहानपणी नांदवळ येथे असतानाच या क्रांतीची बीजे आणि साताऱ्याचे गुण माझ्या अंगी भिनले. संघर्षाचा हा गुण या मातीतून माझ्यात आला आहे,’ असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सातारा येथे काढले.
शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला १३ नोव्हेंबर रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. याबद्दल सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषद मैदानावर भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते.
सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्याला सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची मांदियाळी जमली होती. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, जलसंपदा, पालकमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह साताऱ्यातील आमदार, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी दाम्पत्य मारुतराव गोपाळराव निकम (वय ८७) व इंदूमती निकम (वय ७८) यांचे हस्ते पुष्पगुच्छ, भगवा फेटा, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन खासदार शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यात बोलताना विधान परिषदेचे सभापती नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘शरद पवारांवर केवळ सातारा जिल्हाच प्रेम करीत नाही तर संपूर्ण देश प्रेम करीत आहे. स्व. यशवंतराव चव्हाणांवर देशाने भरभरून प्रेम केले तसेच प्रेम देशातील जनतेने तुमच्यावर केले. जनतेचे प्रेम मिळविणारे तुम्ही दुसरे नेते आहात.’
दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनीही अजित पवार, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे यांची नावे घेत राजकीय चिमटे काढत शरद पवारांच्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री विजय शिवतारे यांनी मनोगत व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी शरद पवार यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखवण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर बंदला संमिश्र प्रतिसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केल्यानंतर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्याच्या मागणीसाठी शिवा वीरशैव संघटनेच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मार्केट यार्ड, कुंभार वेस बाजारपेठ वगळता अन्य ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. नामकरणावरून सोलापूर बंद ठेऊन सामान्य जनतेला वेठीस धरले जात असल्याने अनेक व्यापारी संघटनांनी बंदकडे पाठ फिरविली. त्यामुळे नवी पेठ, चाटी गल्ली, मधला मारुती, टिळक चौक, कापड मार्केट, सुराणा मार्केट, पार्क चौक, एसटी बसस्थानक, बाळीवेस, पार्क चौक, विजापूर वेस, जुळे सोलापूर या महत्त्वाच्या बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू होते.
सोमवारी सकाळी महिला संघटनांच्या वतीने सिद्धेश्वर मंदिरात महाआरती आणि महाभिषेक करून सरकारला सदबुद्धी देण्याचे साकडे घातले. यामध्ये बसव केंद्र, महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी, अक्कनबळग महिला मंडळ, शिवा संघटना, वीरशैव व्हिजन, शंकरलिंग, नाडहब्ब ओंकारेश्वर, सारथी, जंगम, भगवती गौरी माता, उमा महिला, तनिष्का, किरीटेश्वर, वीरशैव सखी, अखिल भारतीय वीरशैव सभा, कांचन फाउंडेशन आदी महिला मंडळे सहभागी झाली होती.
बाजार समितीत कडकडीत बंद
बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने आणि सौदेही बंद असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल यार्डात आणला नाही. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. या बंदमध्ये राणी लक्ष्मीबाई, कस्तुरबा मंडई, ऑइल मिल असोसिएशन, दाळ मिल असोसिएशन, मिरची असोसिएशन, किराणा मसाला असोसिएशन, बारदाना असोसिएशन, भुसार आडत व्यापारी संघ, दलाल असोसिएशन आदींनी सहभाग घेतला.
दरम्यान, अहल्यादेवी होळकर नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्‍यांनी केल्याबद्धल धनगर समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरले होते. मात्र, आनंदोत्सव रद्द करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
‘शिवा’च्या कार्यकर्त्यांनी रिक्षा जाळली
सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्याच्या मागणीसाठी शिवा संघटनेने पुकारलेल्या सोलापूर बंदला हिंसक वळण लागले. रेल्वे लाइन परिसरात एक जुनी रिक्षा जाळणाऱ्या शिवा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले. दुकाने बंद करण्यासाठी फिरणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि लिंगायत समाजाचे नेते प्रकाश वाले, बसवराज बगले, माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार, विश्वनाथ चाकोते यांच्यासह शिवा संघटनेच्या नेत्यांना पोलिसांनी सकाळपासूनच पोलिस ठाण्यात आणून नजरकैदेत ठेवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील दोषी गुन्हेगार पोलिसांना फाशी द्यावी, या प्रमुख मागणीसह पोलिस गुंडगिरीच्या निषेधार्थ सोमवारी सांगलीत पुकारण्यात आलेल्या बंदला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त पाठींबा मिळाला. अगदी टपरीपासून ते मॉलपर्यंतचे व्यवहार ठप्प होते. काही शाळा, कॉलेजनी परीक्षा पुढे ढकलल्या तर काही शाळांना दुपारनंतर सुटी देण्यात आली. सर्वपक्षीय कृती समितीने शहरातील प्रमुख बाजारपेठांसह इतर भागात रॅली काढून बंदचे आवाहन केले. अनिकेत कोथळेला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, आंदोलनात सहभाग नसणाऱ्या काही समाजकंटकांनी दोन ठिकाणी एसटीवर दगडफेक केली तर दोन ठिकाणी टायर पेटवून रस्त्यावर टाकून शांततेत सुरु असलेल्या बंदलाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.

कोथळे मृत्यू प्रकरणात आरोपी असणाऱ्यांना फाशी द्यावी तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्यांची तातडीने बदली करावी, या मागणीने जोर धरल्याचे सोमवारच्या बंदला मिळालेल्या ऊस्फूर्त पाठिंब्यातून जाणवले. सकाळी १० वाजता सर्वपक्षीय कार्यकर्ते स्टेशन चौकात दंडावर काळ्या पट्ट्या बांधलेल्यांची गर्दी होऊ लागली. चौकातील वसंतदादांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोटरसायकल रॅली सुरू झाली. राजवाडा चौक, टिळक चौक, हरभट रोड, मारुती रोड , स्टँडमार्गे सरकारी रुग्णालय, चांदणी चौक, विश्रामबाग, मार्केट यार्ड, राम मंदिर, पंचमुखी मारुती रस्तामार्गे शिवाजी पुतळ्यासमोर सर्वजण एकत्र झाले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. रॅलीत अनेकांच्या हातात विविध घोषणा लिहिलेले फलक होते. यामध्ये अनिकेतच्या चिमुरडीने विचारलेला प्रश्न ‘आई, पप्पांना पोलिसांनी मारले आहे का?’ यासह दोषींवर तातडीने कारवाई करा, अनिकेतला न्याय द्या ,असा मजकूर होता. रॅलीचे नेतृत्व सतीश साखळकर, अ‍ॅड. अमित शिंदे, उमेश देशमुख, पृथ्वीराज पाटील, महेश खराडे, गौतम पवार, अशरफ वांकर, समित कदम, अमर पडळकर, डॉ. संजय पाटील, नितिन चव्हाण, सुरेश दुधगावकर आदींनी केले. दोन मिनिटे स्तब्धता पाळून अनिकेत कोथळेला श्रध्दांजली वाहण्यात आली.

दरम्यान, शांततेत आंदोलन सुरु असताना काही समाजकंटकांनी औरंगाबाद सांगली व सांगली सातारा या एसटीवर तरुण भारत क्रिडांगण परिसरात दगडफेक केली. तरूणभारत स्टेडियमजवळ तसेच कोल्हापूर रोडवर एक ठिकाणी टायर जाळून रस्त्यावर टाकण्यात आले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती तातडीने नियंत्रणाखाली आणली. मोटरसायकल रॅलीत सामान्यांचाही सहभाग लक्षणीय होता. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवले होते.

०००००००००००००००

गुरूवारी कँडलमार्च

मोटरसायकल रॅली मारुती चौकात आल्यानंतर तेथे कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात मागण्या मान्य होईपर्यत आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी (ता. १६) सायंकाळी वाजता सांगली शहर पोलिस ठाण्यावर कँडल मार्च काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सांगलीकरांनी बंदप्रमाणेच या आंदोलनातही मेणबत्त्या घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कराड पोलिसांचीही तरुणांना बेदम मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

सांगली शहर पोलिसांनी केलेल्या आरोपींच्या खूनप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असतानाच कराड शहर पोलिसांनीही तरुणंना अशीच मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी वडगाव हवेली (ता. कराड)तील दलित चळवळीतील कार्यकर्ते विजय संदे, अभय संदे, सचिन संदे या तरुणांना बेदम मारहाण केली आहे.

दोषी पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी कराड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी कराड शहर पोलिसांतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संदे कुटुबीयांसह वडगांव हवेली ग्रामस्थांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सातारचे अधीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधानांनाही लेखी निवेदन पाठविले आहे.

दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संदे कुटंबीयांसह वडगाव हवेली ग्रामस्थांनी सोमवारी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला आहे. या आंदोलनाला सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला आहे. सांगलीनंतर आता कराडचा हा धक्कादायक प्रकार ऐरणीवरती आला आहे.

अशी आहे घटना

वडगाव हवेली ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक गेल्या १६ ऑक्टोंबरला झाली. मतमोजणी १७ ऑक्टोंबरला कराडमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. निकाल ऐकण्यासाठी आलेल्या अभय संदे, विजय संदे आणि सचिन संदे यांना पोलिसांनी पकडून शहर पोलिस ठाण्यात नेऊन बेदम जबर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या तिघांवर कराडच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. विजय संदे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर मिरजेच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यावरून जलअभ‌ियंता धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या समस्या, वारंवार तक्रार केल्यानंतरही त्यामध्ये सुधारणा नाही, कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त नाही, अपुऱ्या पाणीपुरवठ्यावेळी टँकरमार्फत होणाऱ्या पुरवठ्याचे योग्य नियोजन नाही, आंदोलन केले की पाणी पुरवठा व्यवस्थित केला जातो पण नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असते अशा अनेक तक्रारी सोमवारी एका नगरसेविकेने मांडल्यानंतर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना चांगलेच फैलावर घेतले. अशा तक्रारी माझ्यापर्यंत येतात ही चांगली बाब नसून यातून नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याने तातडीने पाणीपुरवठ्याचे नियोजनबद्ध वेळापत्रक सादर करण्याचे आदेशही दिले. पावसाळा संपल्यानंतर गेल्या महिन्यापासून शहरात पाण्याचे प्रश्न डोके वर काढत असून नगरसेवकांच्या तक्रारींची संख्याही वाढत आहे.

बाजारगेट परिसरातील नगरसेविका उमा बनछोडे यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पाण्याची तक्रार मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुलकर्णी यांनी पठडीतील उत्तरे दिली होती. मात्र बनछोडे यांनी सोमवारी आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी गेल्या महिन्यात आंदोलन केल्यानंतर १५ दिवस व्यवस्थित पाणीपुरवठा केला जातो. मग अन्य वेळी का होऊ शकत नाही? पापाची तिकटी परिसर उंचावर असल्याने ज्यावेळी पाण्याच्या टाकींमधील पातळी जास्त असते, त्यावेळी पाणी सोडण्याची गरज आहे. पण त्यावेळी पाणी न सोडता पातळी कमी झाली की पाणी सोडले जाते. त्यामुळे अनेक भागात अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणी सोडणारे कर्मचारीही व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार करताना माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे यांनी स्वतः पाणी सोडल्यानंतर भागात व्यवस्थित पाणी आले असाही दाखला उमा बनछोडे यांनी दिला. यामुळे नगरसेवकांनी आता ​तेवढेच काम करायचे राहिले आहे, अशी व्यथा मांडली. सभेत थातूरमातूर उत्तरे द्यायची व पुढचे पुढे पाहू अशी प्रवृत्ती पाणीपुरवठा विभागात वाढत असल्याची तक्रारही केली.

या सर्व तक्रारी ऐकल्यानंतर आयुक्तांनी अशा बाबी माझ्यापर्यंत येतात ही गोष्ट चांगली नाही. यातून पाणीपुरवठा विभागाचे नियोजन नाही, असेच दिसत असल्याचे सांगत कुलकर्णी यांना चांगलेच फैलावर घेतले. पाण्याच्या टाकीतील पाणी पातळी पाहून भागांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन केले पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करुन भागनिहाय वेळापत्रक बनवण्याचे आदेश दिले.


नियोजन नसल्याचा आणखी दाखला

पंचगंगा नदीमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याने शहरासाठीचा पाणी उपसा कमी झाला. त्यामुळे शहरवासियांना अपुरा पाणीपुरवठा झाला. यासाठी पाणीपुरवठा विभागाने लक्ष दिले असते तर पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी पूर्वीच नोंदवली असती तर योग्यवेळेत पाणी आले असते. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला नसता. पण महापालिकेने अगदी दोन दिवस अगोदर पाणी सोडण्याची मागणी केल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अशा ऐनवेळच्या कारभारामुळेच पाणीपुरवठ्याचे नियोजन कोसळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचे वागणेगुन्हेगारीला बळ देणारे

$
0
0

सांगली

‘गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री तातडीने सांगलीत धाव घेऊन या प्रकरणात लक्ष घालतील,असे वाटले होते. पालकमंत्रीही इकडे फिरकायला तयार नाहीत. त्यांचे असे हे वागणे पोलिसांच्या गुन्हेगारीला बळ देण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांना जराजरी चाड असेल तर त्यांनी विद्यमान न्यायाधीशांमार्फत मर्यादित कालावधीत या प्रकरणातील संशयित आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करुन आरोपींना फाशीच्या शिक्षेबाबत पाठपुरावा करावा’, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी सांगलीत केली.

विखे-पाटील यांनी अनिकेत कोथळे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे आणि चौकशीबाबतचे आक्षेप ऐकून घेतल्यानंतर ते म्हणाले, ‘अनिकेतची पोलिस कोठडीतील अमानुष हत्येची घटना समोर आल्याने पोलिस खात्याची कधी नव्हे इतकी अधोगती झाल्याचे उघड झाले आहे. गुन्हेगारांना राजाश्रय मिळाला असल्याने ते उजळ माथ्याने गुन्हे करत बेलगाम सुटल्याचे चित्र आहे. पोलिस सुपारी किलर असल्याचा आरोप होऊ लागला आहे. अनिकेतच्या नातेवाईकांचे आरोप गंभीर आहेत. खोट्या गुन्ह्यात अडकवून अनिकेतची हत्या करण्यात आल्याचे समोर येत असल्याने पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. केवळ सीआयडी तपासावर अवलंबून न राहता विद्यामान न्यायाधीशांपर्यंत या प्रकरणाची चौकशी करणे आवश्यक आहे. अॅड. उज्वल निकम यांच्यासारख्या कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करावा, जलदगती न्यायालयात खटला चालवून त्या कुटुंबाला न्याय द्यावा. सरकारच्या अटी शिथिल करुन कुटुंबाला मदत करावी. गोरगरीबांना जिवानिशी मारणारे पोलिस धनदांडग्या गुन्हेगारांकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात. कायदा आणि सुवव्यस्थेचा बोजवारा उडाला असून गुन्हेगारांनी थैमान घातल्याने ११ डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधक सरकारला याचा जाब विचारणार आहेत.’ भ्रष्ट मंत्र्यांवरील कारवाईबाबत विचारले असता विखे-पाटील म्हणाले,‘मुख्यमंत्र्यांनी क्लिनचीट विभागच उघडला आहे. अशा कारभाराला काय म्हणायचे ?’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभाविप’चा दे धक्का, आघाडीत अस्वस्थता

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com
Tweet:@Appasaheb_MT

शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीत संस्थाचालक, प्राचार्य संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी एकत्र येऊन विद्यापीठ विकास आघाडीची स्थापना केली. पदव्युत्तर (विद्यापीठ) शिक्षक गट वगळता अन्य सर्व अधिकार मंडळे आणि अभ्यास मंडळांसाठी विद्यापीठ विकास आघाडी आणि ‘अभाविप’ एकत्र आले आहेत. मात्र राज्यपालनियुक्त कोट्यातून व्यवस्थापन परिषदेवर विकास आघाडीशी निगडीत दोन नावे मागे पडली. तेथे ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली. यावरुन विद्यापीठ ​राजकारणात ‘अभाविप’ने दे धक्का तंत्राचा अवलंब केल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे. या बदलत्या घडामोडीमुळे विकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नवीन विद्यापीठ कायदा अंमलात आल्यानंतर त्यानुसार शिवाजी विद्यापीठाची पहिलीच निवडणूक होत आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यामध्ये अधिकार मंडळ, अभ्यास मंडळासाठी थेट लढत आहे. निवडणुकीला सामोरे जाताना विकास आघाडीसह अन्य घटकांनी अनेकांना वेगवेगळ्या मंडळावर ‘नियुक्ती’संदर्भात शब्द दिला आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार नामनिर्देशित सदस्यांची संख्या मोठी आहे. नियुक्त सदस्य कोट्यातून वर्णी लागावी यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

दुसरीकडे विद्यापीठ निवडणुकीत विकास आघाडीसोबत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही ही निवडणूक ताकदीने लढवत आहे. त्यांनी नोंदणीकृत पदवीधरमध्ये चार जागांसाठी उमेदवार दिले आहेत. राज्यातील सत्ताकारणाचा फायदा उठवत कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी वर्णी लागावी, यासाठी व्यूहरचना आखली आहे. राज्यपालनियुक्त प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापन परिषदेवर अमित कुलकर्णी यांची नियुक्ती झाली. कुलकर्णी अभाविपचे कार्यकर्ते आहेत. राज्यपालनियुक्त प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापन परिषदेसाठी ‘रयत’चे चेअरमन अनिल पाटील, विद्यापीठाचे माजी बीसीयूडी प्राचार्य डी. आर. मोरे यांच्या शिफारसी झाल्या होत्या. यामध्ये अमित कुलकर्णी यांनी बाजी मारली. तिघेही विकास आघाडीशी निगडीत आहेत. राज्यपालनियुक्त प्रतिनिधी म्हणून आघाडीच्याच उमेदवाराचा समावेश झाल्याचा दावा सुरु आहे, पण व्यवस्थापन परिषदेवर ‘नियुक्त’ प्रतिनिधी म्हणून ‘अभाविप’ने साऱ्यांनाच धक्का दिला. कारण कुलकर्णी यांनी पहिल्यांदा नोंदणीकृत पदवीधरमधून अर्ज भरला होता. त्यातून माघार घेत त्यांनी थेट व्यवस्थापन परिषदेत प्रवेश केला. दुसरीकडे अभाविपने स्वतंत्रपणे सिनेट आणि अभ्यास मंडळावरही कुलगुरुनियुक्त कोट्यासाठी यादी सादर केल्याचे वृत्त आहे.


सिनेटवर नियुक्त सदस्यांत कुणाला संधी?

सिनेटवरील ७६ जागांपैकी १७ जागा नामनिर्देशित आहेत. यामध्ये कुलपतीनियुक्त सदस्य संख्या दहा तर कुलगुरुनियुक्त सदस्य संख्या सात आहे. कुलपतीनियुक्त दहा सदस्यांपैकी चार सदस्य हे कृषीक्षेत्र, समाजकार्य, सहकार, कायदा, वित्तीय, बँकिंग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील असणार आहेत. तर उद्योग, शिक्षण, विज्ञान, फाइन आर्टस, पर्यावरण क्षेत्रातील प्रत्येकी एक असे पाच सदस्य असतील. महिला विकास, ज्येष्ठ नागरिक क्षेत्रातील एक सदस्य निवडला जाईल. कुलगुरुनियुक्त सात सदस्यांत विद्यापीठ सेवक, कॉलेजमधील सेवक, महपालिका, पालिका आणि जिल्हा परिषदांमधील एक सदस्य निवडला जाईल. या तीनही संस्थेतून सिनेटवर निवडलेल्या सदस्यांचा कालावधी वर्षाचा आहे. कुलपती आणि कुलगुरुनियुक्त कोट्यातून वर्णी लागावी, म्हणून शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी कुलगुरु कार्यालयाकडे बायोडाटा सादर केला आहे. विद्यापीठ निवडणूक लढविणाऱ्या सर्वच आघाड्यांनी ‘नियुक्त’ सदस्य कोट्यासाठी यादी तयार केली आहे.


विद्या परिषदेवर वीस सदस्यांची नियुक्ती होणार

अॅकेडमिक कौन्सिलवर (विद्या परिषद) वीस सदस्यांची नियुक्ती होणार आहे. या वीस जागांपैकी ‘नॅक’मूल्यांकन झालेल्या कॉलेजमधील आठ प्राचार्य, दोन प्राध्यापक, मान्यताप्राप्त संस्थेचा प्रमुख एक आणि संस्था प्रतिनिधी एक अशी संख्या असणार आहे. शिवाय कुलपती नियुक्त सदस्यांची संख्या आठ आहे. यामध्ये राष्ट्रीय दर्जाच्या मान्यता प्राप्त संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश होता. यात भारतीय तंत्रज्ञान संस्था, विज्ञान संशोधन संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था, अवकाश संशोधन संस्था, भारतीय औद्यो​गिक संघ, भारतीय कंपनी सचिव संस्थेतील तज्ज्ञ, शास्त्रज्ञांची नियुक्ती होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएसबीपीने व्यवसाय करू नये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएसबीपीच्यावतीने आता शहरात सुरू असलेल्या रस्ता सौंदर्यीकरणाच्या कामाबाबत काहीच हरकत नाही. पण महापलिकेच्या नावावर देणगी घेऊन त्यांनी त्याचा व्यवसाय करू नये. आर्थिक व्यवहारांशी महापालिकेचा संबंध नसेल अशा पद्धतीने करार करणे म्हणजे गैरकारभाराला चालना देण्याचा प्रकार आहे. अशा कराराला विरोध असेल, अशी भूमिका काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, सभागृह नेते प्रवीण केसरकर, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी मांडली.

गटनेते देशमुख म्हणाले, ‘अशा प्रकारचा करार करून कोणत्याही शहरात, कोणत्याही महापालिकेत काम करण्यात येत नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाने हा प्रस्ताव सभागृहासमोर आणण्याचा प्रयत्न केला. केएसबीपीने महापालिकेच्यावतीने देणगी स्वीकारायची व त्याची विल्हेवाट महापालिकेला न विचारता लावायची असाच अर्थ या प्रस्तावाचा निघतो. केएसबीपीने आता चालवलेल्या कामाबाबत कुणाचीच हरकत नाही. त्यांनी त्याच पद्धतीने काम करावे, करार करण्याची काय गरज आहे? पण केएसबीपी या प्रकल्पातून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. देणगीशी​ महापालिकेशी काही संबंध न ठेवता महापालिकेवर केवळ जबाबदारी ठेवण्याचा हा प्रकार आहे. यातून केएसबीपीकडून गैरकारभार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अधिकार देण्याच्या कराराला विरोध असेल. सध्या ज्या कंपनींकडून केएसबीपीने निधी घेतला, त्या कंपन्यांकडून आता ठिकठिकाणी फलक लावण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळेच अशा प्रकारचा प्रस्ताव करण्याची धडपड सुरू आहे.

उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, सचिन चव्हाण म्हणाले, यापूर्वी क्रिडाई तसेच अन्य संस्थांकडून चौक सुशोभीकरणासाठी आलेले प्रस्ताव शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे पाठवण्यात आले होते. पण त्यांच्याशी पाठपुरावा न केल्याने चौकांचे सुशोभीकरण होऊ शकले नाही. यामध्ये नगरसेवकांचा दोष काय? प्रशासनाने त्यासाठी पाठपुरावा केला असता तर केएसबीपीला काम राहिले नसते. केएसबीपीकडून अशा प्रकारचे स्वतंत्ररित्या करार करण्याऐवजी महापालिकेला सोबत घेऊनच करार केले पा​हिजे. अशा प्रकारची दुरुस्ती करून घेतली तरच हा प्रस्ताव मान्य करण्यात येईल. याप्रसंगी प्रताप जाधव, अफजल पिरजादे, वनिता देठे, स्वाती यवलुजे, उमा बनछोडे, शोभा कवाळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुमला मराठी आवाज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

कर्नाटक सरकारकडून मराठी बांधवांची वारंवार करण्यात येणारी मुस्कटदाबी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या एकीकरण समितीच्या महामेळाव्यावेळीही दिसून आली. तथापि, या मुस्कटदाबीला भीक न घालता हा महामेळावा मराठी बांधवांनी यशस्वी केला. यानिमित्ताने मराठी बाणा पुन्हा ‌एकदा दिसून आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला होणारी गर्दी आणि महाराष्ट्रातून येणारी नेतेमंडळी लक्षात घेत कर्नाटक पोलिसांनी सीमाभागात नाकेबंदी केली होती. तथापि, विविध मार्गांनी गनिमी काव्याने सीमाभागातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी मेळाव्याला उपस्थिती दर्शवत सीमाभागातील जनतेच्या पाठीशी महाराष्ट्र असल्याची ग्वाही दिली.

मेळाव्यात बोलताना महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंती पाटील म्हणाले, ‘‘पोलिसी बळाद्वारे सीमावासीयांना त्रास दिला जात आहे. मराठी माणूस न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरत असताना कर्नाटक सरकार दंडुकेशाहीची भूमिका घेत आहे. मराठी भाषिकांचा आवाज दडपायचा, महाराष्ट्रातील नेत्यांनी येथे येऊन त्यांच्याशी संवाद साधायचा नाही, ही भूमिका चुकीची आहे. कर्नाटकची ही दंडूकेशाही मराठी जनता कधीही सहन करणार नाही.’

व्यासपीठावर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुप्पेकर, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, निंगोजी हुद्दार, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, बिदर समितीचे अध्यक्ष रामराव राठोड आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त करून जयंत पाटील म्हणाले, ‘कर्नाटक सरकार जतमधील कन्नड शाळांना अनुदान देते. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील मराठी भागातील शाळांना अनुदान देणे आवश्यक आहे. सीमाप्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टात लवकर निर्णय व्हावा आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे अधिवेशन बेळगावात घेण्याची संधी मिळावी.’

सीमालढ्याचे मार्गदर्शक प्रा. एन. डी. पाटील यांनी मोबाइलवरून सीमावासियांशी संवाद साधला.

मेळाव्यात चौथी पिढी

सीमावासियांची चौथी पिढी उतरल्याचे महामेळाव्यानिमित्त पाहायला मिळाले. शहर आणि ग्रामीण भागातील समितीचे कार्यकर्ते भगवे ध्वज हातात घेऊन गटागटांने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होत होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांची अडवणूक करायला सुरुवात केली होती, पण समितीच्या नेत्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना खडसावल्यावर अडवणूक थांबवली. कर्नाटक सरकारने बेळगावात अधिवेशन घेण्यास प्रारंभ केल्यापासून त्याचा निषेध करण्यासाठी महामेळाव्याने प्रत्युत्तर दिले जात आहे.

‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाय,’ ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेलमे,’ ‘बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ अशा घोषणांनी मेळाव्याचा परिसर दणाणून गेला.

दरम्यान, कर्नाटक विधानसभेत आमदार अरविंद पाटील मराठीत बोलू लागताच कन्नड आमदारांनी गोंधळ घातला. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. हिवाळी अधिवेशनातून समितीच्या आमदार संभाजी पाटील आणि आमदार अरविंद पाटील यांनी सभात्याग करून महामेळाव्याला हजेरी लावली.

पोलिसांची नरमाई

महामेळाव्यासाठी मैदान देण्यास महापालिकेने टाळाटाळ केल्यामुळे आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मेळाव्याचे व्यासपीठ आणि मंडप रस्त्यावर उभारण्यात आला. मराठी भाषिकांची जिद्द आणि जोश पाहून बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही बघ्याची भूमिका घेऊन गप्प उभारावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

केवळ सांगलीच नाहीतर नागपूरसह जालना, पुणे आणि हिंगोलीतही गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. यावरून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते. सरकारचा प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी, पोलिस महासंचालकांनी तत्काळ सांगलीत येऊन अनिकेतच्या कुटुंबाला आणि पर्यायाने समस्त जनतेला संबंधित गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याच्या मार्गाने चौकशी सुरु आहे, याची ग्वाही दिली पाहिजे.’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.

चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वज‌ित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मंगेश चव्हाण आदींनी सोमवारी अनिकेत कोथळेच्या कुटुंबाची भेट घेतली. अनिकेतच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी पृथ्वीराज पाटील यांनी घेतली आहे, कुटुंबाला मदत आणि अनिकेतच्या पत्नीला नोकरी देण्याची जबाबदारी पतंगराव कदम यांनी घेतली असल्याचे स्पष्ट करून चव्हाण म्हणाले, ‘अनिकेतचा कोठडीतला मृत्यू आणि त्यानंतर गुन्हा लपविण्यासाठी केलेला प्रकार पाहता हे प्रकरण साधेसुधे नाही. अद्यापही कुटुंबीयांची फिर्याद घेतली जात नाही. पोलिसांनी एक प्रकारचे चित्र निर्माण करून दिलेली फिर्याद म्हणजे संबधित पोलिसांना वाचविण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केलेल्या आंबोली घाटात आणखी एक मृतदेह मिळालेला आहे. त्यामुळे मृतदेहांची अदलाबदल करून आपल्या पोलिसांना वाचविण्याचा प्रयत्न होता का? पोलिसांनी केलेला अनिकेतचा खून आणि तो लपविण्यासाठी केलेला आटापिटा पाहता, या प्रकरणात काहीही होऊ शकते.’

पोलिसांच्या बाबतीत रक्षकच भक्षक झाल्याचे चित्र वारंवार पुढे येत आहे, असा आरोप करुन ते म्हणाले, ‘केवळ सांगलीच्या बाबतीतच बोलायचे झाले तर वारणानगरमध्ये जाऊन पोलिसांनी ९ कोटी १८ लाख रुपये चोरल्याचे प्रकरण, मिरजेत बलात्कार पिडीतेवरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रकार, वाळवा तालुक्यातील मुलीला जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांची पोलिसांनी केलेली पाठराखण, सांगलीत सधन व्यापाऱ्याची आत्महत्या की, खून याचा तपास झालेला नाही. इस्लामपूरमधील डॉक्टर दाम्पत्याच्या खुनाचा छडा लागलेला नाही. त्यातच महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अनिकेतच्या खुनाच्या गंभीर घटनेची भर पडली आहे.

‘हा पोरखेळ आहे काय?’

पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही यंत्रणा ठराविक काळात बंदच कशी पडते. पोलिसांना ठरविक काळासाठी सीसीटीव्ही बंद करण्याची, झालेले चित्रण पुसून टाकण्याची आणि या यंत्राचा हवा तसा वापर करता यावा, म्हणून तसे यंत्र जाणीवपूर्वक दिले आहे काय? लाखो रुपये खर्चून बसविलेली यंत्रणा पोलिस हवी तशी सोयीप्रमाणे वापरत असेल तर हा काय पोरखेळ आहे काय?, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार

राज्य आणि केंद्राच्या मानवाधिकार आयोगाकडे अनिकेत कोथळे खून प्रकरणाबाबत तक्रार करणार आहोत. किरकोळ चोरीतील संशय‌ित म्हणून पोलिस एखाद्याचा धडधडीत जीव घेत असतील, दुसऱ्या एकाच्या जिवावर उठत असतील तर अतिशय गंभीर आहे. मानवी हक्कांची पायमल्ली करणारी ही घटना आहे. त्यामुळे मानवी हक्क आयोगाने स्वतंत्र अधिकारी सांगलीला पाठवून या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्याधिकाऱ्यांना कोंडीतपकडण्याचा प्रयत्न

$
0
0

इचलकरंजी

आरोग्याधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना कार्यमुक्त व जलअभियंता सुरेश कमळे यांच्या बदली प्रश्नावरुन सत्तारुढ व विरोधी सदस्यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर वाढीव दराच्या निविदा कामांना मंजुरीसह १४ व्या वित्त आयोगातील रकमेचा विनियोग आदी विषय सोमवारी झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. शिवाय पाणी उपशाच्या पोकळ थकबाकी विषयावर सत्ताधारी व विरोधी गटात जोरदार शाब्दिक वाद झडला.

विविध १४ विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी सोमवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. सभेच्या प्रारंभी काँग्रेस नगरसेवक राहुल खंजिरे यांनी सध्या सांगली रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असले तरी काही ठिकाणी गळती असतानाही ती नीटपणे न काढल्याने रस्ता दुरुस्तीचा खर्च नाहक ठरत असल्याबद्दल लक्षवेधी मुद्दा उपस्थित केला. अधिकारी वा कर्मचाऱ्याकडून नगराध्यक्षांसह लोकप्रतिनिधींकडून केल्या जाणाऱ्या सूचनांची दखल घेतली जात नाही. त्यांच्या मनमानीमुळे पालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यावर नगराध्यक्षांनी मुख्याधिकारी व संबंधित विभागप्रमुखांना कामे वेळेत व दर्जेदार होतात की नाही याबद्दल माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

भाजपचे अजित जाधव यांनी शहरात दीड कोटी रुपये खर्चून लागवड केलेल्या १९ हजार वृक्षांच्या सद्यस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी मोघम उत्तर देऊन वेळ मारुन नेत विषयच गुंडाळला. राजर्षि शाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंग पाटील यांनी डॉ. संगेवार यांना नगरपालिका सेवेतून कार्यमुक्त करण्याचा ठराव झाला असताना तसेच जलअभियंता सुरेश कमळे यांची सहा महिन्यापूर्वी बदली झाली असतानाही दोघेही अद्याप येथेच कसे असा सवाल उपस्थित केला. त्यावर खुलासा करताना मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी संगेवार यांच्याकडे हरित लवाद, डॉ. आंबेडकर रुग्णालय व स्वमछ संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची आता बदली केल्यास ही कामे प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. तर भुयारी गटर व वारणा योजना कामांसाठी कमळे यांची आवश्यकता असल्याचे सांगून तीन महिन्यानंतर दोघांनाही कार्यमुक्त करण्यात येईल असे सांगितले. त्यावर समाधान न झाल्याने विठ्ठल चोपडे यांनी मुख्याधिकाऱ्यांचे बोलणे हे दिशाभूल करणारे व सभागृहाला खोटे ठरविणारे असल्याचा आरोप केला.

विषयपत्रिकेवरील दुसऱ्या विषयाच्या कामगार चाळ येथील शौचालय बांधकाम व बेघरांसाठी निवारा या तीन कामांसाठी अनुक्रमे ४.९० व ८.९० टक्के अशा जादा दराने आलेल्या निविदांना विरोधी सदस्यांनी विरोध दर्शविला. अखेर हा विषय मतदानाला टाकण्यात येऊन ३० विरुध्द २१ मतांनी मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडी झाल्यास आठ आमदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘केंद्र आ​णि राज्यातील भाजप सरकारवरील लोकांचा विश्वास संपुष्टात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०१४ सारखी लाट नाही. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला असून हे बदलाचे वारे आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास जिल्ह्यातील दहापैकी आठ जागा जिंकण्याची ताकद आहे. या आघाडीसाठी राज्यातील नेत्यांनी पुढाकार घ्यावा,’ असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. जिल्हा परिषद निवडणुकीत काही चुका झाल्या. अन्यथा काँग्रेसची सत्ता आली असता. ही चूक सुधारुन येत्या अडीच वर्षांनी जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आणू अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी पाचगाव येथे झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील यांनी शक्त‌िप्रदर्शन करत आगामी विधानसभा निवडणुकीत ताकदीने उतरण्याचे संकेत दिले. दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.

कळंबा येथील विश्वास खानविलकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि अपक्ष निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य विजय खानविलकर व राजेंद्र गुरव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उजळाईवाडी येथील धनगर समाजाचे बाबूराव हजारे हे ही कार्यकर्त्यांसहित काँग्रेसमध्ये दाखल झाले.

‘ग्रामपंचायतही ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया आहे. नूतन सरपंच व सदस्यांनी ‘गाव माझा आहे, गावचा शंभर टक्के विकास करणार’अशी शपथ घेऊन कामाला लागावे. पाचगावचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण काही अंशी कमी पडलो, अशी कबुली देत आमदार पाटील म्हणाले, ‘पाचगाव आणि कळंबा गावच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी जीवन प्राधिकरणची २१ कोटी रुपयांची योजना आखली आहे. दोन्ही गावच्या सरपंचांनी यासाठी पुढाकार घ्यावा संपूर्ण सहकार्य करू,’ अशी ग्वाही त्यांनी दिली. नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफीवरुन टीका करताना भाजप सरकार हे फसवं सरकार असल्याची टीका त्यांनी केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खड्डेमुक्तीची घोषणा ही फसवी आहे. खराब रस्त्यांनी नागरिक त्रस्त बनले असून पंधरा डिसेंबरनंतर काँग्रेसतर्फे खड्ड्यांचे फोटो काढण्याची मोहीम राबविणार असून सरकारची फसवणूक जनतेच्या सामोरे आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी घोषित केले.

यावेळी हणबरवाडीच्या सरपंच सुप्रिया वाडकर, दऱ्याचे वडगाव येथील सदस्य अनिल मुळीक, प्रकाश जिरंगे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला प्रतिमा पाटील, करवीर सभापती प्रदीप झांबरे, गोपाळ पाटील, कृती समिती अध्यक्ष नारायण गाडगीळ, संजय पाटील, उपमहापौर अर्जुन माने, सभागृह नेता प्रवीण केसरकर, जि.प. सदस्या सरिता खोत, विजया पाटील आदी उपस्थित होते. पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी मेळाव्याचे संयोजन केले होते. यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे व बांधकाम व्यावसायिक रामचंद्र भोगम कुटुंबींयातर्फे आमदार सतेज पाटील यांचा चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला.

‘महाडिकांनी राजकारण शिकवू नये’

ऋतुराज पाटील यांनी महाडिक कुटुंबियातील कुणाही सदस्याचे नाव न घेता ‘शिरोली ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना आपला किल्ला शाबूत ठेवता आला नाही त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये’ असा टोला लगावला. ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधील नागरिक व कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना साथ दिली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत अशीच साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.


आता ट्रेलर, विधानसभेला पिक्चर’

पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी ‘तरुण वयात सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल पाचगाववासियांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पाचगावची गेल्या काही वर्षांत वेगळ्या पद्धतीने चर्चा झाली. पण येथील नागरिक शांतताप्रिय असून, त्यांचा विश्वास सार्थ ठरवत येत्या काळात पाचगावचा विकास साधू. पाचगावमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय हा ट्रेलर आहे, २०१९ मध्ये विधानसभेत निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाच्या रुपाने पूर्ण पिक्चर दाखविल्याशिवाय कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत,’ असे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘सांगली शहर पोलिस ठाण्यातील कोठडीतला खून आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा केलेला प्रयत्न ही गंभीर घटना आहे. हा कोठडीतला मृत्यू आहे की, सुपारी घेऊन पोलिसांनी केलेला एन्काउंटर आहे, याची चौकशी झाली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही अनिकेतच्या नातेवाईकांची फिर्याद नोंदवून घेतली गेलेली नाही. टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असून, संशयित अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी सांगलीत येऊन हे प्रकरण दडपले जाणार नाही, याबाबत जनतेला विश्वास दिला पाहिजे,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.

चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वज‌ित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मंगेश चव्हाण आदींनी सोमवारी अनिकेत कोथळेच्या कुटुंबाची भेट घेतली. अनिकेतच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी पृथ्वीराज पाटील यांनी घेतली आहे, कुटुंबाला मदत आणि अनिकेतच्या पत्नीला नोकरी देण्याची जबाबदारी पतंगराव कदम यांनी घेतली असल्याचे स्पष्ट करून चव्हाण म्हणाले, ‘अनिकेतचा कोठडीतला मृत्यू आणि त्यानंतर गुन्हा लपविण्यासाठी केलेला प्रकार पाहता हे प्रकरण साधेसुधे नाही. अद्यापही कुटुंबीयांची फिर्याद घेतली जात नाही. पोलिसांनी एक प्रकारचे चित्र निर्माण करून दिलेली फिर्याद म्हणजे संबधित पोलिसांना वाचविण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केलेल्या आंबोली घाटात आणखी एक मृतदेह मिळालेला आहे. त्यामुळे मृतदेहांची अदलाबदल करून आपल्या पोलिसांना वाचविण्याचा प्रयत्न होता का? पोलिसांनी केलेला अनिकेतचा खून आणि तो लपविण्यासाठी केलेला आटापिटा पाहता, या प्रकरणात काहीही होऊ शकते.’

पोलिसांच्या बाबतीत रक्षकच भक्षक झाल्याचे चित्र वारंवार पुढे येत आहे, असा आरोप करुन ते म्हणाले, ‘केवळ सांगलीच्या बाबतीतच बोलायचे झाले तर वारणानगरमध्ये जाऊन पोलिसांनी ९ कोटी १८ लाख रुपये चोरल्याचे प्रकरण, मिरजेत बलात्कार पिडीतेवरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रकार, वाळवा तालुक्यातील मुलीला जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांची पोलिसांनी केलेली पाठराखण, सांगलीत सधन व्यापाऱ्याची आत्महत्या की, खून याचा तपास झालेला नाही. इस्लामपूरमधील डॉक्टर दाम्पत्याच्या खुनाचा छडा लागलेला नाही. त्यातच महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अनिकेतच्या खुनाच्या गंभीर घटनेची भर पडली आहे. केवळ सांगलीच नाहीतर नागपूरसह जालना, पुणे आणि हिंगोलीतही गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. यावरून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते. सरकारचा प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी, पोलिस महासंचालकांनी तत्काळ सांगलीत येऊन अनिकेतच्या कुटुंबाला आणि पर्यायाने समस्त जनतेला संबंधित गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याच्या मार्गाने चौकशी सुरु आहे, याची ग्वाही दिली पाहिजे.’

‘हा पोरखेळ आहे काय?’

पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही यंत्रणा ठराविक काळात बंदच कशी पडते. पोलिसांना ठरविक काळासाठी सीसीटीव्ही बंद करण्याची, झालेले चित्रण पुसून टाकण्याची आणि या यंत्राचा हवा तसा वापर करता यावा, म्हणून तसे यंत्र जाणीवपूर्वक दिले आहे काय? लाखो रुपये खर्चून बसविलेली यंत्रणा पोलिस हवी तशी सोयीप्रमाणे वापरत असेल तर हा काय पोरखेळ आहे काय?, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार

राज्य आणि केंद्राच्या मानवाधिकार आयोगाकडे अनिकेत कोथळे खून प्रकरणाबाबत तक्रार करणार आहोत. किरकोळ चोरीतील संशय‌ित म्हणून पोलिस एखाद्याचा धडधडीत जीव घेत असतील, दुसऱ्या एकाच्या जिवावर उठत असतील तर अतिशय गंभीर आहे. मानवी हक्कांची पायमल्ली करणारी ही घटना आहे. त्यामुळे मानवी हक्क आयोगाने स्वतंत्र अधिकारी सांगलीला पाठवून या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसांच्या किरणोत्सवावर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात पाच वर्षांनी किरणोत्सव सोहळा पूर्ण झाला. गेल्या पाच वर्षापासून किरणोत्सव तीन दिवसांऐवजी पाच दिवस होत असावा याबाबत पाहणी सुरू होती. यंदाच्या किरणोत्सव सोहळ्यादरम्यानही पाच दिवस नोंदी घेण्यात आल्या, मात्र किरणोत्सव तीन दिवसच होत असल्याचे स्पष्ट झाले.

हवामानातील बदल, भौगोलिक परिवर्तन आणि अक्षांशरेखांशातील बदल यामुळे किरणोत्सवाच्या पारंपरिक तारखांमध्ये बदल झाल्याची शक्यता काही अभ्यासकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार नियोजित तारखांच्या आदल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी किरणोत्सव होतो की नाही हे पाहण्यासाठी रविवारी अभ्यास समितीचे सदस्य मंदिरात उपस्थित होते. मात्र रविवारी सूर्यास्ताची किरणे देवीच्या गाभाऱ्यातील कटांजलीपर्यंत आली आणि झुकली. त्यामुळे ९ ते ११ या तीन दिवशीच किरणोत्सव अधिकृत असल्याचे देवस्थान समितीतर्फे जाहीर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिन, जयंत्यांमध्ये अडकले अध्यापन

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर : शैक्षणिक वर्षात शिक्षकांना किमान ३९ दिवस ‌जयंती, ‘दिना’मध्ये साजरे करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. ११ ते ५ या अध्यापनाच्या वेळातच ‘दिन’ साजरे केले जातात. परिणामी शिक्षणाचे धडे देण्याला वेळ कमी मिळतो. त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसतो. शैक्षणिक नुकसान होते. काही दिवस शहर, गावात जवळच्या लोकप्रतिनिधींना बोलवणे मुख्याध्यापकांना बंधनकारक केले आहे. लोकप्रतिनिधींनी उपस्थिती कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षकांना अनावश्यक उपदेश, सल्ले ऐकून घ्यावे लागते. काही लोकप्रतिनिधी प्रचार सभेप्रमाणे भाषणे करून शिक्षक, विद्यार्थ्यांना वेठीस धरतात.

शाळांच्या वेळातच शिक्षकांना अध्यापनबाह्य कामे लावली जात आहेत. प्रत्येक वर्षी शाळाबाह्य कामात भर पडत आहे. यामुळे शिक्षक ‌मिळालेल्या वेळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गडबड करतात. अनेक विद्यार्थ्यांना अध्यापन केलेला अभ्यासक्रमाचे पूर्ण आकलन होत नाही. ते संभ्रमात राहतात. परीक्षेत त्या अभ्यासक्रमावर प्रश्न पडल्यानंतर येत नाही. गुण कमी पडतात. असे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होतात. तरीही सरकारने मतांसाठी, कोणत्या तरी घटकास खूश करण्यासाठी प्रत्येक वर्षी दिन साजरे करण्याचा सपाटाच लावला आहे.

एका वर्षात नव्याने पाच दिवस साजरे करण्याच फतवा सरकारने काढला आहे. हे पाच आणि पूर्वीचे ३४ दिन, जयंत्या, उपक्रम साजरे करण्यात मुख्याध्यापक, शिक्षक मेटाकुटीस आले आहे. सरकारकडून आदेश आल्यामुळे जिल्हा, तालुका प्रशासन शहर, ग्रामीणमधील प्राथमिक, माध्यमिक शाळांना अंमलबजावणीची सक्ती करते. प्रत्येक‌ दिन, उपक्रमाचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा होतो त्याचे स्वतंत्रपणे मूल्यमापन आजअखरे शिक्षण प्रशासनाने केलेले नाही. त्यामुळे शिक्षण यंत्रणाही दिन साजरे करून नेमके काय साध्य केले हे सांगू शकत नाही. शालेय वयात काहीही संबंध नसणारे दिन साजरे कशासाठी करायचे असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


महत्वाचे दिन असे

वाचन प्रेरणा, फुटबॉल मिशन, वृक्ष लागवड, योग, विद्यार्थी, बाल, साक्षरता, शिक्षक, संविधान, जल‌असे महत्वाचे दिन आहेत. याशिवाय जयंती, उपक्रम साजरे केले जातात.



विद्यार्थ्यांच्या हितासाठी नसलेले दिन, उपक्रम टाळणे गरजेचेच आहे. अभ्यासक्रमाशी संबंधीत दिन, कार्यक्रम साजरे झाल्यास शिक्षक, विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. अध्यापनासाठी वेळ कमी पडतो. यामुळे शालेय वयात जे गरजेचे नाहीत, असे उपक्रम, दिन होऊ नयेत.

सदानंद माने, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>