Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अतिक्रमण, पॅचवर्कसाठी चालढकल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठवड्यात पॅचवर्क सुरू करण्याच्या महापौरांसमोर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाला १९ दिवस होऊन गेले. अतिक्रमण काढून घेण्याबाबत प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्याला दहा दिवस होऊन गेले. पण महापालिकेचे प्रशासन अजूनही नियोजनाच्या पातळीवरच गुरफटलेले आहे. खड्डे व अतिक्रमणांमुळे शहरवासियांची वाईट अवस्था झालेली असताना प्रशासनाकडून मात्र त्याबाबत तातडीने कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र आहे.

पावसाळा संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था सुधारण्याचे काम हाती घेण्याची गरज होती. पण त्यासाठी नागरिकांकडून नगरसेवकांकडे तक्रारी झाल्यानंतर महापौरांनी पुढाकार घेऊन बैठक घेतली. या बैठकीत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दोन दिवसात डांबरी प्लँट सुरू करून सर्व शहरात पॅचवर्कचे काम केले जाईल, असा शब्द दिला होता. तसेच ज्या कंत्राटदारांनी नुकतेच रस्ते केले होते व ते नादुरुस्त झाले आहेत, त्यांची कंत्राटदारांकडून दुरुस्ती करून घेतली जाईल, असेही सांगितले होते. या बैठकीस तब्बल १९ दिवस होऊन गेले. त्यासाठी शहर अभियंत्यांच्या पातळीवर अजून नियोजन सुरू आहे. डांबरी प्लँटचे काम आता पुर्ण झाले आहे. पण अजून डांबर खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवलेला नाही. यामुळे या आठवड्यात हा प्रस्ताव ठेवून मंजूर झाल्यानंतर डांबर येणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर कंत्राटदारांना बोलवून त्यांना रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. या प्रकारामुळे तेही दोन दिवसात काम सुरू करतील, असे वाटत नाही.

पॅचवर्कबरोबरच अतिक्रमण निर्मूलनाबाबत स्थायी समितीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. प्रशासन काही करत नसल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच दिवशी प्रशासनाकडून येत्या आठ दिवसांत अतिक्रमणे काढून घ्यावीत, त्यानंतर कारवाई केली जाईल. आर्थिक नुकसान झाल्यास जबाबदार राहणार नाही, असे सांगितले होते. ती मुदत उलटून गेली असून प्रशासन अजूनही पोलिसांसोबत चर्चा करत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याचे कागदावर नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्ष कारवाई कशी होणार याबाबत मात्र अजूनही संदिग्धता आहे.

डांबरी प्लँटवर कचरा येऊन पडला होता. तो कचरा पेटल्याने प्लँटची वायर जळून गेली होती. ती दोन दिवसापूर्वी पूर्ववत करण्यात आली आहे. प्लँट आता सुरू करण्यात आला असून त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. डांबर खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून कंत्राटदारांनाही त्यांनी केलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार पाटलांचे आरोप खोटे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उत्पादकांचे हित लक्षात घेऊन दोन वर्षांचा अपवाद वगळता सरकारी दरापेक्षा नेहमीच दूध खरेदीदर जास्त दिला. उत्पादकांबरोबरच मेट्रो सिटीमध्ये ‘गोकुळ’ने स्वत:चा ब्रँड निर्माण करत मार्केटमध्ये आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली असताना संघावर राजकीय द्वेषातून आमदार सतेज पाटील यांच्याकडून आरोप होत असून त्यांचे सर्व आरोप खोटे आहेत. संघाच्या कारभारावर टीका न करता त्यांनी स्वत: संघाचे कामकाज कसे चालते, याचा एकदा संघात येऊन अभ्यास करावा, असे आव्हान गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.

पाटील म्हणाले, ‘कर्जमाफी आंदोलनादरम्यान सरकारने दूध खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. निर्णयाची अंमलबजावणी संघाने केली, पण नंतर अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्याने गायीच्या खरेदीदरात कपात करण्याचा निर्णय घेतला. निर्णयानंतर आमदार पाटील यांनी दर कपात करण्याची मागणी करताना म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधाचा समावेश करत असल्याचा आरोप केला. आमदार पाटील यांचा आरोप पुर्णत: खोटा आहे. म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधाचा समावेश करताना लिटरमागे म्हैस दुधाच्या लिटरमागील दरापेक्षा जादा खर्च येणार असल्याने संघ असा तोट्याचे धोरण कधीही अंमलात आणत नाही. संघाच्या कारभारावर उत्पादक प्रश्न विचारत नसताना आमदार पाटील केवळ राजकीय द्वेषातून आरोप करत असल्याने त्यांचे आरोप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. संघाच्या कारभारावर जर पाटील यांना संशय असेल, तर त्यांनी कधीही येऊन संघाच्या कामकाजाची पाहणी करावी.’

संचालक रणजितसिंह पाटील म्हणाले, ‘एक हजार लिटरवरून संकलनास सुरुवात केलेल्या गोकुळने सद्य:स्थितीस दररोज दहा ते बारा लाख लिटर दूध संकलन करत आहे. केवळ संकलन न करता मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे स्वत:चा ब्रँड तयार केला आहे. मात्र संघावर होणाऱ्या राजकीय आरोपामुळे ब्रँडला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गोकुळ व्यावसायिक संस्था असल्याने उत्पादकांचे नुकसान होणार आहे.’

सभेवरुन मात्र सर्वच संचालकांचे मौन

आमदार पाटील यांनी दरकपात व इतर मागण्यांवर सर्वच संचालक बोलत होते. संघाचा ब्रँड, विक्री, उत्पादकांना देण्यात येणाऱ्या सुविधा याचा सातत्याने ऊहापोह केला जात होता. पण संघाच्या वार्षिक सभेमध्ये याविषयी का बोलला नाही, असे विचारताच सर्वच संचालक शांत होत होते. अनेक संचालक तर सभेवर ‘नंतर बोलू’ असे उत्तर देत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध दरात आणखी कपातीची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिरिक्त दुधाची पावडरनिर्मिती करावी लागत असल्याने, संघास दररोज सुमारे १९ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. उत्पादक आणि संघाचे हित लक्षात घेवून तोटा भरून काढण्यासाठी गायीच्या दूध खरेदीदरात कपात करण्याचा निर्णय घेतला. दरकपातीबाबत सहकार विभागाच्या नोटिसा लागू केलेल्या असताना दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दूध दराचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. समितीच्या अहवालानुसार दूध खरेदीदरात आणखी कपात होण्याची शक्यता असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी संघाचे (गोकुळ) चेअरमन विश्वास पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

गोकुळने एक नोव्हेंबरपासून गायीच्या दूध खरेदीदरात दोन रुपयांची कपात केली. दरकपात मागे घ्यावी यासाठी आमदार सतेज पाटील निवेदन देत संघाच्या कारभारांवर आक्षेप घेतले होते. गोकुळने पत्रकार परिषद घेऊन आक्षेपांचे खंडन केले. चेअरमन पाटील म्हणाले, ‘संघाचे दैनंदिन दहा लाख लिटर दूध संकलन असताना सध्या १३ लाख, ६६ हजार दूध संकलन होत आहे. संकलन वाढल्याने अतिरिक्त दुधाची पावडर तयार करावी लागत आहे. त्यामुळे संघाला प्रतिलिटर ९.७१ प्रमाणे दररोज १९ कोटी ४२ लाखांचा खर्च येत असल्याने संपूर्ण वर्षात २०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. पावडर तयार करणे व गुंतवणुकीतील रकमेचे व्याज मिळून सुमारे ४० कोटींचा संघाला तोटा होणार आहे हा तोटा पर्यायाने उत्पादकांचा होणार आहे. दर कपातीचा निर्णय मागे घेतल्यास उत्पादकांचे टप्प्याटप्प्याने दूध घेणे काही दिवसांसाठी बंद करावे लागणार आहे. त्यामुळे उत्पादकांचे अधिकच नुकसान होणार आहे. दूध खरेदीदर कपातीचा घेतलेला निर्णय संघ व उत्पादकांच्या हिताचा आहे.’

एनडीडीबीचे अध्यक्ष अरुण नरके म्हणाले, ‘दूध दरवाढीचा निर्णय अभ्यास न करता घेतला आहे. दर कपात केली म्हणून सहकार कलम ‘७९’ अन्वये नोटिसा दिल्या आहेत. याविरोधात कोर्टात जावेच लागेल. याबाबत दुग्धविकास मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. समितीमध्ये कोणत्याही दूध संघांना प्रतिनिध‌ित्व न देता केवळ आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे समितीचा निर्णय काय होणार, याची कल्पना आहे. ‘महानंद’चे व्यवस्थापकीय संचालक आएएस अधिकारी आहेत. त्यांनीच दुधाचा दर कमी केला आहे. त्यांचाही समितीमध्ये समावेश असल्याने ते कोणता निर्णय घेतात हे पाहावे लागेल.’

कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर म्हणाले, ‘कोणत्याही राज्यात दुधाचे दर सरकार ठरवत नाही. येथे सर्वच घोषणाबाजीवर चालत आहे. सरकारने स्वत:चे दूध संकलन बंद केले असून केवळ दरवाढीचे आदेश दिले जात आहेत. सरकारने असाच हस्तक्षेप केल्यास संपूर्ण दूग्ध व्यवसायच मोडून पडेल.’ संचालक रणजित पाटील यांनी इतर राज्याप्रमाणे थेट उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली.

पत्रकार बैठकीस संचालक अरुण डोंगळे, रवींद्र आपटे, बाळासाहेब खाडे, बाबा देसाई, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, उदय पाटील, रामराजे कुपेकर, राजेश पाटील, जयश्री पाटील-चुयेकर, सत्यजित पाटील, विलास कांबळे, पी. डी. धुंदरे, महाव्यवस्थापक आर. सी. शहा, हिमांशू कापडिया आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मी टेकडीजवळ महिलेचा खून

$
0
0

कागल

पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथील लक्ष्मी टेकडीवरील गर्द झाडीत एका अज्ञात महिलेचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी उघड झाली. संबंधित महिलेचे वय सुमारे ३० ते ३५आहे. या महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. घटनेचा शोध घेण्यासाठी कागल पोलिसांनी श्वानपथक व तज्ज्ञांना पाचारण केले. हा खून दोन दिवसापूर्वी अनैतिक संबंधातून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी भेट दिली.

लक्ष्मी टेकडीवरील पठारावर गुरे चारण्यासाठी आलेल्या गुराख्यांना झाडीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या गुराख्यांनी कागल पोलिसांना याची कल्पना दिली. कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. काही वेळातच उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनीही घटनास्थळाला भेट दिली. दगड डोक्यात घालून खून केल्याचे दिसून आले. या घटनेचा शोध घेण्यासाठी श्वानपथक व तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.परंतु श्वानपथक परिसरातच घुटमळले. हा खून दोन दिवसापूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र खून होण्याआधी मयत महिला व मारेकरी यांच्यात झटापट झाल्याच्या मृतदेहावरील काही खुणांवरुन स्पष्ट होते. शिवाय महिलेच्या हातामध्ये पुरुषाचे केस आढळून आले आहेत. तज्ज्ञांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा केले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव करीत असून लवकरच या घटनेचा उलघडा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मयत महिला ही विवाहित असून तिच्या अंगावर पांढरट केशरी साडी व केशरी ब्लाऊज आहे. फिकट गुलबी रंगाचे स्लिपर तिच्या मृतदेहाजवळ आढळून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंडारे परतला मृत्यूच्या दाढेतून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सांगली

पोलिसांनी कोठडीत ज्याच्यासमोर अनिकेत कोथळे याचा अमानुष छळ करुन जीव घेतला याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे हा अगदी मृत्यूच्या दाढेतून परतल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ‘याला तर जिवंत कशाला ठेवायचे?’, असा सवाल करुन संशयित आरोपी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेने अमोललाही संपविण्याचा विचार बोलून दाखवला होता. परंतु संशयित आरोपी हवालदार टोणे याने ‘एक केले आहे ते अगोदर निस्तरायचे बघा. याला कशाला मारताय?’, असा प्रतिसवाल केल्याने अमोलचा जीव वाचल्याची चर्चा आहे.

सांगलीत मध्यवर्ती बसस्थानकावर संतोष गायकवाड या कवलापूरच्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांनी लूटले होते. याप्रकरणी त्यांना अटक करून कोर्टात दाखल केले असता दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. सोमवारी रात्री त्या दोघांना कामटेने चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढले. हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सर्वांनी दोघांना बेदम मारहाण केली. अनिकेतला उलटा टांगून त्याचे तोंड बादलीत बुडवून मारहाण सुरू केली. अनिकेतला टांगलेली दोरी तुटल्याने तो डोक्यावर बादलीत पडला. त्यानंतर पुन्हा त्याला टेबलवर पालथे घालून बेदम मार दिला. यात श्वास गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. आपले कृत्य झाकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन अनिकेतचा मृतदेह घेऊन संशयित आरोपी आंबोली घाटात गेले. या प्रवासात अमोल भंडारे याला काहीवेळ कारच्या डिकीत ठेवले होते. आंबोलीत पोहचल्यानंतर अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा कट शिजला. त्याचवेळी अमोलला संपविण्याचा विचार कामटेच्या डोक्यात आला. हा साक्षीदार आहे. हा जिवंत राहिला तर आपले पितळ उघडे पडेल, असे सांगून कामटेने आपल्या डोक्यातला विचार इतरांना सांगितला. पण ‘एकाला मारलंय ते निस्तरेपर्यंत नाकी नऊ येणार आहेत. आता याला आणखी कशाला मारताय?’ असा प्रतिसवाल हवालदार टोणे याने केला. त्यानंतर लगेचच अमोल येऊन घाटाच्या वरच रस्त्यावर बसला. त्याच्या आधी सर्व संशयित पोलिस एकमेकांत चर्चा करू लागल्यानंतर अमोल भीतीने थरथर कापत होता. अनिकेतचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या अमोलला पोलिसांच्या क्रुरतेची कल्पना आली होती. त्यातच कामटेने डीबी रुममध्येच भंडारे याला ‘हा प्रकार जर कोणाला सांगितलास तर तुलाही असेच मारुन टाकीन,’ अशी धमकी दिली होती. त्यावेळी भंडारेने थरथरते हात जोडून ‘नाही साहेब, कुणाला सांगणार नाही’ असे म्हणून ‘तुम्ही सांगाला तसे सांगू’ अशी तयारी दाखविली होती, अशी माहिती सीआयडीच्या चौकशीतून पुढे येत आहे. त्यामुळे सीआयडीचे पथक न्यायालयीन कोठडीत असलेल्या भंडारेला चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच ब्रँडखाली दुधावर घाला

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : ऑपरेशन फ्लडनंतर राज्यातील दूध उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. सहकारी संघाच्या माध्यमातून दूध उत्पादकांच्या हातात नियमितपणे चलन येऊ लागल्याने या जोड व्यवसायाने मोठी मजल मारली. जिल्हास्तरावर थेट ग्रामीण भागापर्यंत निर्माण झालेल्या साखळीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक दूध संघाने स्वत:चा ब्रँड निर्माण केला. पण या ब्रँडवरच घाला घालण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. एकाच ब्रँडच्या नावाखाली संपूर्ण सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहकार चळवळ अबाधित राखण्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून धोरणांची अंमलबजावणी केली पाहिजे.

डॉ. वर्गिस कुरियन यांनी ऑपरेशन फ्लड योजनेची सुरुवात केली. डॉ. कुरियनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यात दुग्ध क्रांतीला सुरुवात झाली. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सहकारी दूध संघांची स्थापना झाली. जिल्हास्तरावरुन सुरू झालेली चळवळ प्राथमिक संस्थापर्यंत सुरू होऊन ती थेट उत्पादकांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचली. याच दरम्यान निर्माण झालेल्या सिंचन प्रकल्पामुळे त्याला अधिक दुग्ध क्रांतीला पोषक वातावरण तयार झाले. आणि काही हजारांवर संक‌िलित होणारे दूध सद्य:स्थितीला लाखो लिटरवर पोहोचले. यामुळे या व्यवसायाशी लाखो दूध उत्पादक जोडले गेले. एकीकडे दुग्ध उत्पादनामध्ये वाढत असताना काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्याने अनेक सहकारी संस्था अडचणीत आल्या. काहीवेळा राजकीयदृष्ट्याही अशा संघांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला.

राजकीय हेतूने सहकारी संस्थांना अडचणीत आणताना कायद्यामध्ये अमुलाग्र बदलही केले. पण असे बदल करताना राजकीय द्वेष समोर ठेवल्याने सध्या राज्यातील संपूर्ण दुग्ध व्यवसायच अडचणीत सापडला आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीमध्ये संचालक मंडळाच्या अधिकारांवर अनेक प्रकारच्या गदा आणलेल्या असताना शेतकरी आंदोलनाचाही या व्यवसायाला फटका बसत आहे. कर्जमाफी आंदोलनाचे लोण संपूर्ण राज्यभर पसरले असताना दूध खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. कोणताही अभ्यास न करता घेतलेला निर्णय संघांना अडचणीत आणणारा ठरत आहे. खासगी संघांवर कोणतेही निर्बंध नसताना केवळ दरवाढीची निर्णय सहकारी दूध संस्थांना लागू झाल्याने बाजारात मोठी स्पर्धा करावी लागत आहे. जगभरातच दुधाचे उत्पादन वाढल्याने अतिरिक्त ठरलेल्या दुधाचे पावडरमध्ये रुपांतर केले जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर पावडरचे उत्पादन वाढून दरामध्ये मोठी घसरण झाली. याचा परिणाम दूध संघांवर होऊन दररोज कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे संपूर्ण सहकारी संघ अडचणीत आले आहेत. सरकारने जाहीर केलेली दरवाढ देवून संघाला आर्थिक संकटात घालायचे की उत्पादकांना खूश करायचे अशा कात्रीत सध्या सहकारी संघ सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण सहकारी संघच आर्थिक अरिष्ठात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघांना तोट्यात जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारी धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवण्याची गरज आहे, अन्यथा सहकारच्या वेलीवर वाढलेली चळवळ संपुष्टात येण्याची शक्यता आहे.


जिल्हा दूध संघ : एक

सहकारी दूध संघ : पाच

मल्ट‌िस्टेट संघ : दोन

प्राथमिक दूध संस्था : १०,१०८

दूध उत्पादक सभासद : ६,१५,४१८

एकूण दूध संकलन : १५,०७,९१७

वार्षिक उलाढाल : सुमारे तीन हजार कोटी



उत्पादकांना हवा मतदानाचा अधिकार

हमीभावाची सक्ती हवी

खासगी संस्थावर सरकारी वचक आवश्यक

अतिरिक्त दुधाचा प्रश्न

खासगी-सहकारी संघाचा एकच दर हवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९० दिवसांत संशयितांवर दोषारोप

$
0
0

सांगली

पोलिस कोठडीत अमानुष मारहाण करुन अनिकेत कोथळेचा खून करणारे गुन्हेगार पोलिस तपासात सहकार्य करत नसले तरी सीआयडीच्या तपास पथकाने रात्रीचा दिवस करुन तपासाला गती दिली आहे. डीएनए चाचणीसाठी अनिकेतच्या आई-वडीलांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते पुण्याला पाठविण्यात आले आहेत. पोलिस ठाणे आणि लकी बॅग दुकानातील सीसीटिव्हीचा डाटा संकलित करणारे डीव्हीआर ताब्यात घेतले आहेत. ९० दिवसांच्या आत संशयितांवर दोषारोप दाखल करण्यात येणार असल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेतली आहे. त्यातील प्रत्येक मुद्याचा आणि त्यांचा संशय असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी सुरु केली असल्याचे सांगून गायकवाड म्हणाले,‘या चौकशीत संबधित दोषी असल्याचे पुरावे मिळताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास करताना कोणताही मुद्दा मागे राहणार नाही. ठोस पुरावे मिळवून ९० दिवसांच्या आत संशयितांवर दोषारोपपत्र दाखल केले जाईल. त्यानंतरही तपास सुरुच राहणार आहे. एखादा नवीन मुद्दा किंवा पुरावा समोर आलातर न्यायालयाच्या परवानगीने त्याचा समावेश दोषारोप पत्रात करण्यात येईल. घटना गंभीर असल्याने आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आहे. संशयितांना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेणारा तपास आणि पुरावा मिळविण्यासाठी तपास यंत्रणांना वेळ देणे आवश्यक आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर बनतेय मधुमेहाची राजधानी

$
0
0

कोल्हापूर

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. टाइप-टू प्रकारातील मधुमेहाचे प्रमाण सुमारे २५ टक्क्यांवर, तर टाइप-वन मधुमेहाचे प्रमाण आठ वरून चौदा टक्क्यांवर पोहोचले असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणात आढळली आहे.२० ते ३५ वयोगटातील तरुणांत आणि महिलांतही मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. मधुमेहाने घरोघरी प्रवेश करायला सुरूवात केल्याने ही धोक्याची घंटा मानली जाते. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही चक्रावल्या आहेत.

बदलती जीवनशैली, आहारातील चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढलेल्या ताणतणावांमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. जगाच्या तुलनेत मधुमेहाच्या रुग्णांत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापुरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इंडस हेल्थ प्लस संस्थेने दोन वर्षांपूर्वी केलेल्या तपासणीत कोल्हापुरातील मधुमेहाचे प्रमाण ८ टक्के होते. तेव्हा हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण ११ टक्के होते. २०१७ मध्ये हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण ११.५० टक्के, तर मधुमेहींचे प्रमाण १४ टक्के आहे. हृदयरोग, फुप्फुसाचे आजार, पोटविकार यापेक्षाही मधुमेहींचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे मधुमेहाने कोल्हापूरकरांची चिंता वाढवली आहे. या संस्थेने नुकतीच कोल्हापुरातील ९८७९ पुरुषांची, तर ७७६८ स्त्रियांची तपासणी केली. त्यानुसार १४ टक्के पुरुषांना, तर १२ टक्के स्त्रियांना मधुमेहाचा विकार जडला आहे.

मधुमेहाची लक्षणे थेट जाणवत नाहीत, मात्र मधुमेहाची सुरुवात झाली आहे, असे रुग्ण घरोघरी आहेत. स्त्रियांना मधुमेहाचा धोका वाढला आहे. गर्भवतींना मधुमेह झाल्यास याचा परिणाम त्यांच्या बाळावरही होतो. टाइप -१ मधील स्त्रियांचा गर्भपात होणे, बाळाचे वजन वाढणे, बाळाच्या शरीरात विकृती, बाळाला धोका उद्भवण्याच्या शक्यता वाढतात. मधुमेह असलेल्या प्रत्येक पाच स्त्रियांपैकी दोन स्त्रिया प्रजनन वयातील आहेत. स्त्रियांच्या मृत्यूला कारणीभूत घटकांत मधुमेह हे नवव्या क्रमांकाचे कारण आहे. टाइप -२ प्रकारातील मधुमेह असलेल्या स्त्रियांना हृदयविकार जडण्याची शक्यता अधिक असते. मधुमेहाबाबत पुरेशी माहिती नसल्याने याबाबत गैरसमज अधिक आहेत. महिलांमध्ये जागृती झाल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटनेने यंदाचे वर्ष ‘महिलांमधील मधुमेह जागृती’साठी जाहीर केले आहे.

सरकारचे आरोग्य प्रशासन शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील मधुमेह, उच्च रक्तदाब, अर्धांगवायूबाधीत रूग्णांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्यात रूग्णांचे निदान करून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. राज्यातील चार जिल्ह्यात प्रयोगिक तत्वावर ही मोहीम राबवून उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूरचा समावेश आहे. लवकरच या मोहिमेला सुरूवात करण्यासंबंधी सोमवारी आरोग्य अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी व्हिडिओ कान्फरन्सव्दारे सूचना दिल्या.

शहर आणि ग्रामीण भागात मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, अर्धांगवायू झटक्याच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. हे आजार असंसर्गजन्य असले तरी ते गंभीर आहेत. गंभीर आजाराबद्दल घराघरात जागृतीचा अभाव, जीवनशैली, आहारात फास्ट फूडचा वापर वाढतो आहे. या आजारासंबंधी प्राथमिक टप्प्यात माहिती न मिळाल्याने संबंधित रूग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आरोग्य विभागातर्फे मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, अधार्गंवायूचा झटका या आजारांचे रूग्ण आणि लक्षणे असणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सर्व्हे केला जाणार आहे.

वर्षापूर्वी असा सर्व्हे प्रायोगिक तत्त्वावर सातारा, सिंधुदुर्ग, भंडारा, वर्धा जिल्हयात करण्यात आला. कोल्हापूरसह उर्वरित जिल्हयात मोहीम राबवण्यासाठी गेल्या आठवड्यात सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची नागपुरात कार्यशाळा झाली. सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे आरोग्य अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. आरोग्य सेविका, सेवक, आशा कार्यकर्त्यांची टीम मोहिमेत प्रत्येक घराला भेट देतील. त्यावेळी कुटुंबांतील ३० वर्षांवरील सर्व सदस्यांची आरोग्य ‘हिस्ट्री’ घेण्यात येणार आहे. शिवाय एकाद्या कुटुंबात लहान मुलांमध्येही लक्षणे असल्याचे सांगितल्यास त्याची नोंद घेतली जाईल.

मधुमेह, कॅन्सर, उच्चरक्तदाब, अर्धांगवायू या आजाराची प्राथमिक लक्षणांबाबत विहित नमुन्याचा फॉर्म भरून घेतला जाईल. त्यामध्ये तंबाखू, मावा, ‌सिगारेट, दारूचे व्यसन असल्यास त्याची विशेष नोंद घेतली जाईल. मधुमेहासंबंधी अनुवं‌‌शिक आजार, महिलांमधील स्तन, गर्भाशय कॅन्सरच्या लक्षणांची विचारणा केली जाणार आहे. प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास संबंधितास प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. तेथे सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या जातील. त्यानंतर पहिल्या टप्प्यात आजार असल्यास समुपदेशकातर्फे आहार, जीवनशैलीसंबंधी मार्गदर्शन केले जाईल. आजाराची बाधा झाली असल्यास तज्ज्ञांकडे उपचारासाठी वर्ग केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोघांची सीआयडी चौकशी

$
0
0


सांगली : पोलिसांच्या अमानुषतेचा बळी ठरलेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांची मागणी अखेर मान्य झाली आणि कुटुंबीयांचा संशय असलेल्या दोन व्यक्तींची चौकशी सीआयडीने सुरु केली. यामध्ये अनिकेत कामाला असलेल्या लकी बॅग दुकानाचा मालक आहे तर दुसरी त्या मालकाची बाजू घेतल्याने संशयाच्या भोवऱ्यात आलेली व्यक्ती आहे. निलेश खत्री आणि गिरीष लोहाना अशी त्यांची नावे आहेत.
बॅग दुकानात संशयित युवराज कामटे याचे येणेजाणे आणि त्या दुकानात अवैध कृत्य चालत असल्याचा कुटुंबीयांचा संशय आहे. अनिकेतचा अमानुष छळ करुन खून करण्याचे नेमके कारण बॅग दुकानाशी निगडीत आहे का?, याचा उलघडा होण्यासाठी कुटुंबीयांनी संबंधित दोघांची कसून चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती.
फिर्यादी संशयास्पद
अनिकेतचा त्या दुकानाशी चार ते पाच वर्षांपासून संबंध होता. पण त्याच्या कामात सातत्य नव्हते, अशीही माहिती पुढे आली आहे. आठवड्यापूर्वी पगाराच्या कारणावरुन त्याचा मालकाबरोबर टोकाचा वाद झाला. मालकाने दुकानातून पैसे चोरल्याचा त्याच्यावर आरोप केला. हाणामारी झाली. मालकही काही प्रमाणात जखमी झाला. चोरी केली असेल तर सीसीटिव्ही फुटेज दाखवण्याची आणि पोलिसांना बोलवून घेण्याची मागणी अनिकेतनेच केली. प्रकरण पोलिसात गेले. त्यावेळी दुकानदाराची बाजू घेणारी व्यक्ती अन्य एका कामाच्या निमित्ताने पोलिस ठाण्यात आली होती. त्या व्यक्तीने अनिकेतवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याचवेळी अनिकेतचा भाऊ आशीष यांना पोलिसांनी बोलवून घेतले. तो येण्याअगोदरच मालकाने अनिकेत बरोबरचा वाद आपसात मिटवून घेतला. नंतर आशीष यांनी अनिकेतला घरी नेऊन भांडणाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनिकेतने त्या दुकानातील काही आक्षेपार्ह गोष्टींबाबत वाच्यता केली. त्याने यापूर्वी घरातील अन्य व्यक्तीलाही दुकानात काहीतरी अवैध चालत असल्याचे सांगितले होते. सुटीच्या दिवशी अमोल भंडारे अनिकेतसोबत असायचा. रविवारी सायंकाळी हे दोघे गाडीवरुन गेले ते सोमवारी सकाळी थेट पोलिस कोठडीतच नातेवाईकांना दिसले. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांच्यासाठी पोलिसांनीच वकील दिल्याचे सांगण्या आले. पोलिसांनी वकीलांना हाताशी धरुन दोन हजार रुपये आणि मोबाईल चोरी प्रकरणात त्या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळवली अन् मग सोमवारी रात्री पोलिसांनी अनिकेतच्या बाबतीत अमानुष कृत्य करुन त्याचा जीव घेतला.

नातेवाईकांच्या मते रोकड आणि मोबाइल चोरीचा खोटा गुन्हा आहे. पोलिसांनी अनिकेत आणि अमोलला गुन्ह्यात अटक केल्याचे सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कळविले. त्याच्या आगोदर तो कुठे होता. घरी का आला नाही, याची खरी माहिती समोर आलेली नाही. चोरीची फिर्याद देणारी व्यक्ती आमच्यासमोर उभी करा. त्यामुळे अनिकेत आणि अमोलने अशा प्रकारची लूटमार केलेली नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरुन त्या दोघांवर खोटा गुन्हा दाखल करुन जाणीवपूर्वक अटक केली. त्यानंतर अमानुष मारहाण करुन अनिकेतचा बळी घेतला आहे. त्यामुळे अनिकेतच्या खुनाचे नेमके आणि खरे कारण पुढे आले पाहिजे. यासाठी दुकानदार आणि मध्यस्थाची चौकशी करावी, दोषी असतील तर त्यांना अटक करावी, अशी कुटुंबीयांची मागणी कायम होती. त्यांची मागणी मान्य करुन त्या दोघा संशयीतांच्या सीआयडी चौकशीला सुरुवात झाल्याचे गृहखात्याचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले आहे.
सीसीटिव्हीचा डीव्हीआर जप्त
कोथळेच्या कुटुंबीयांनी बॅग दुकानदारासह दोघांवर संशय घेतल्याने सीआयडीने त्यांची चौकशी सुरु केली. बॅग दुकानातील सीसीटिव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. तत्पूर्वी अनिकेतचा कोठडीत खून झाल्याचे समोर येताच सीआयडीने लकी बॅग दुकानावर तत्काळ छापा घातला होता. अनिकेतच्या खुनाचे प्रकरण उजेडात आल्यापासून बॅग दुकान आणि त्याठिकाणच्या अवैध कृत्यांबाबत सतत चर्चा होत आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय आणि त्या दुकानाशी पोलिस खात्यातील अधिकारी,कर्मचाèयांचा सतत संबध येण्याचे कारण काय ? या पातळीवर सीआडीला सखोल तपास करावा लागणार आहे.
अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांच्या विरोधात लुटमारीची फिर्याद देणारा नेमका कोण आहे. त्याचे गाव कवलापूर असल्याचे पोलिसांनी सांगितल्याने काहींनी कवलापूरातले त्याचे घर शोधून काढले. पण त्या घराला सतत कुलुपच दिसत आहे. या व्यक्तीची चौकशी केल्याचे खुद्द अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांनी माध्यमांना सांगितले आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल काढून घेतल्याची चर्चा आहे. तो कुणाच्या संपर्कात येऊ नये, असा प्रयत्न आहे का?. मुंबईत राहणाऱ्या त्या व्यक्तीला अनिकेत आणि अमोल यांची नावे कुठून समजली, असे सवाल उपस्थित होत असतानाच आता तो तक्रारदार अनिकेतच्या खुनातील एका संशयिताचा नातेवाईक असल्याचे चर्चा आकार घेऊ लागली आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित पोलिसांनी खाकी वर्दीआड काय काय लपविले आहे? असा उपस्थित होऊ लागला आहे.
कोथळे कुटुंबीयांना दहा लाखांची मदत
पोलिसांचे मनोबल खच्ची होऊ देणार नाहीः केसरकर यांची माहिती
‘अनिकेत कोथळे खूनप्रकरणी नातेवाईकांना संशय असलेल्या दोन व्यक्तींची सीआयडीने चौकशी सुरु केली आहे. सीसीटीव्ही कधीच बंद पडत नाही. ते एक यंत्रच असल्याने गुन्हेगार त्याचा हवा तसा उपयोग करून घेऊ शकतो. असे असले तरी अद्यावत तंत्रप्रणालीवर आधारीत तपास यंत्रणा नेमके वास्तव समोर आणेल. कोणी किती मोठा असला तरी दोषी असणाऱ्यांची पाठराखण केली जाणार नाही आणि पोलिस दलाचे मानसिक खच्चीकरण होऊ नये, याची काळजी सरकार घेत आहे,’ अशी माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी सांगलीत दिली.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘कोठडीत बळी गेलेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला सरकारची मदत म्हणून दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यासाठी पुन्हा सांगलीत आलो आहे. कुटुंबाच्या बहुतांशी मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रार वजा निवेदनाची दखल मूळ फिर्यादीस पुरवणी म्हणून घेतली आहे. दोन संशयितांची सीआयडीकडून चौकशी सुरू झाली आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे मान्य केले आहे. संबधित गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल, असा तपास करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. घटनेच्या दरम्यान कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर, चौकशीमध्ये कुचराई करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेऊन चाचणी सुरू केली आहे. तपास पथकाच्या हाती जेवढा अनिकेतचा मृतदेह हाती लागला आहे. तो संपूर्णपणे फॉरेन्सिक लॅबच्या ताब्यात देण्यात आला आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी वैद्यकीय पुरावा भक्कम लागतो. त्यामुळे त्या मृतदेहाबाबतचा अंतिम निर्णय फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख घेऊ शकतात. या प्रकरणात सरकार पूर्णतः गंभीर आहे. सांगलीकरांनी खूप संयम पाळून गुन्हेगारांना कडक शिक्षा होण्याला अधिक महत्व दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत.’
सरकारी नोकरीसाठी
प्राधान्याने विचार
कोथळेच्या कुटुंबीयांनी अर्ज केल्यानंतर भविष्यात सरकारी नोकरीमध्ये जागा निर्माण झाल्यानंतर अनिकेतच्या पत्नीचा नोकरीसाठी प्राधान्यक्रमाने विचार केला जाईल. जलदगती न्यायालयात खटल्याचे कामकाज चालवून दोषींना कडक शिक्षा देण्याची सरकारची भूमिका राहील, अशी ग्वाही पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. त्यांनी आणि केसरकर यांनी कोथळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दहा लाखाचा धनादेश सुपूर्द केला. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे आदी उपस्थित होते.
सर्वांनी सयम ठेवावा
सीआडीने तपास सुरू केला आहे. आमचा संशय असलेल्या दोन व्यक्तींचीही सीआयडी चौकशी सुरू करून ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही सरकारने दिली आहे. अर्थिक मदत देऊन अनिकेतच्या पत्नीला सरकारी नोकरी घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे संबधित घटनेच्या बाबतीत भावना व्यक्त करताना सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहन अनिकेतची पत्नी संध्या आणि भाऊ अशिष कोथळे यांनी केले आहे.
कोथळे कुटुंबीयांची भूमिका
पोलिसांच्या कृतीचा प्रचंड संताप येतो, संबधितांना फाशीच झाली पाहिजे
अनिकेतच्या खूनाचे नेमके कारण आणि या घटनेला कोण कारणीभूत आहे, हे समोर आणण्यासाठी आग्रह धरणार
या खटल्यात अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी
प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि अनिकेतच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी
पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीचा पासवर्ड पोलिसना कसा माहित नाही
पोलिस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्यावर कारवाई करावी डीएनएसाठी आवश्यक अवयव घेऊन अनिकेतचा मृतदेह आमच्या ताब्यात द्या
तृप्ती देसाईंचा ठिय्या, रस्ता रोको
अनिकेत कोथळे खूनप्रकरणी दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करीत भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मंगळवारी आंदोलन केले. शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारून, रस्ता रोको करून देसाई कोथळेच्या घराजवळ मंत्र्यांची गाडी रोखण्याच्या उद्देशाने गेल्या असत्या पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांच्यासह सर्वच आंदोलक महिलांना ताब्यात घेऊन मिरजेला हलविले. मिरजेत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक, सांगलीचे पोलिस अधीक्षक आणि शहरविभागाच्या पोलिस उपाधिक्षिका यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत तृप्ती देसाई यांच्यासह अनेक महिलांनी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. त्यानंतर रस्ता रोको केला. पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री कोथळेंच्या घरी भेट देणार असल्याची माहिती मिळताच देसाई या महिलां आंदोलकांसह कोथळेंच्या घरानजीक गेल्या. त्यांच्या आंदोलनाची कुणकुण लागल्याने पोलिसांनी देसार्इंसह सर्व महिलांना उचलून पोलिस गाडीत घातले. त्यावेळी काही जणींना दुखापत झाल्याची चर्चा होती. या सर्वांना मिरजेच्या शहर पोलिस ठाण्यात बसवून नंतर सोडून देण्यात आले.
वळू बैलाने खळबळ
राष्ट्रविकास सेनेच्या नावाने काही जणांनी मंगळवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव कोरलेला एक वळू (बैल) शहर पोलिस ठाण्यात सोडून खळबळ उडवून दिली. पोलिस ठाण्यात वळू सोडल्याची चर्चा कानावर येताच पोलिस धावत आले. परंतु, तोपर्यंत ज्यांनी वळू सोडला होता, त्यांनीच तो वळू ताब्यात घेऊन तेथून पोबारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या नेत्यांवरबेळगावात गुन्हे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
महामेळावा झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी सोमवारी उशिरा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि महाराष्ट्रातून आलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेते मंडळींवर गुन्हे दाखल केले आहेत. ठळकवाडी पोलिस स्थानकात एकूण तेरा जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
बेळगावातील सुवर्णसौंध येथे घेण्यात येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाचा निषेध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी घेतलेल्या महामेळाव्याला परवानगी दिली नसताना रस्त्यावर मंडप घालणे आणि व्यासपीठ उभारून मेळावा घेतल्याबद्दल ‘मए’ समितीच्या नऊजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्रातून आलेल्या आमदार जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुप्पेकर आणि राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर प्रवेशबंदी हुकूम असताना बेळगावात प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समितीच्या नेत्यांना अद्याप पोलिसांकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले मराठी भाषिक पाहून कर्नाटक सरकारच्या पायाखालील वाळू घसरली आहे. मराठी भाषिकांना त्रास देण्याचे धोरण कर्नाटक सरकारकडून सुरूच असल्याची भावना यानिमित्ताने मराठी भाषिकांतून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा कामे अपूर्णपूर्णत्वाचा ‘जलसंपदा’चा दावा खोटा; मानसिंगराव नाईकांची माहिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
वारणा प्रकल्पाची कामे अपूर्ण असताना ती पूर्ण झाल्याचा जावईशोध महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने लावला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा डावा कालवा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा उजव्या कालव्याची अनेक कामे अपुरी आहेत. तरीही सर्व कामे पूर्ण झाल्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला आहे या बाबत फेरविचार करून वारणा डावा आणि उजवा कालव्याच्या अपूर्ण कामासाठी निधी ध्यावा अन्यथा आंदोलन उभा करू, इशारा शिराळ्याच्या विश्वास उद्योग समुहाचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार बैठकीत दिला आहे.
दोन्ही जिल्ह्यातील कालव्याची कामे अपूर्ण आहेत. कालव्यावरील अनेक पूल अद्याप झालेले नाहीत, त्यामुळे दळणवळनाची मोठी समस्या आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या आहेत ते शेतकरीही अडचणीत आहेतय या दोन्ही कालव्याची कामे अपूर्ण असताना सरकारच्या जलसंपदा विभागाने कशाच्या आधारावर सर्वे करून कामे पूर्ण झाली असल्याचा अहवाल दिला हे समजत नाही. विद्यमान आमदारांनी काय केले असा सवालही त्यांनी या वेळी केला. वारणा डाव्या कालव्या वरील ८० मीटर हेडच्या २५ योजनांचे काम अर्धवट आहे. एक वर्षापूर्वी या प्रोजेक्टसाठी सुधारीत मान्यता देण्यात आली होती. मात्र, या निर्णयामुळे केंद्र सरकारचा निधी मिळणार नाही. पर्यायाने काम पूर्ण न झाल्यास मोठे नुकसान होणार आहे. शिराळा तालुक्यातील वारणा डावा कालव्यासह वाकुर्डे बुद्रुक योजनेचे गेल्या तीन वर्षांत कोणतेही काम झालेले नाही. तरीही आमदार नाईक साडेतीनशे कोटी रुपयाची कामे झाल्याचा कांगावा करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. कामांपेक्षा मंत्रिपद कधी मिळते याची काळजी आमदार करीत आहेत. वारणा प्रोजेक्टची कामे होणार आहेत का, नाही याचे उत्तर आता आमदारांनी द्यावे असेही मानसिंगराव नाईक यांनी म्हणाले. मी आमदार असताना १२० कोटी निधी वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी खेचून आणला. मात्र, त्यांनतर या योजनेची सार्व कामे ठप्प आहेत. केंद्र सरकारकडे वारणा प्रोजेक्टची कामे पूर्ण झाल्याचा अहवाल गेला असताना येत्या फेब्रुवारी महिन्यात कामे सुरू होणार असल्याची खोटी माहिती विद्यमान आमदार देत आहेत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती
पंतप्रधान सिंचन योजनेत नवीन ओलिताखाली येणाऱ्या वाढीव क्षेत्रासाठी निधी देण्यात येत असल्यामुळे वारणा डावा कालवा आणि उजवा कालव्याचे उर्वरीत काम या योजनेत येत नाही. तरीही मी अधिवेशनात या बाबत लक्षवेधी मांडली होती. मात्र, गोंधळात त्यावर चर्चा झाली नाही. कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनीही चुकीची माहिती दिली आहे. या योजनेच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यातील डाव्या कालव्याचे काम ७० किमी पैकी ४० किमी काम झाले आहे. उजव्या कालव्याचेही ६० किमीपैकी ४० किमी काम झाले आहे. १००० कोटींचा खर्च करून तो वाया घालवण्यापेक्षा आणखी २०० कोटी रुपये खर्च केले तर जना पूर्ण होईल. त्याच बरोबर निधी देताना एकावेळी न देता दोन टप्प्यात द्या, या बाबत मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांच्या सोबत बैठक झाली आहे. वारणा डावा आणि उजवा कालव्याची उर्वरीत कामे कसल्याही परिस्थित पूर्ण करणार आहे. या बाबतच्या लक्षवेधीला पन्हाळा शाहुवाडीचे शिवसेनेचे आमदार यांनीही सहमती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडून चौकशीअधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली गंभीर दखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कृत्याची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली आहे. या मारहाण प्रकरणाची अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावातील दलित चळवळीतील विजय संदे, अभय संदे, सचिन संदे हे तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या बाबतचे वृत्त मंगळवारी ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. या प्रकरणाची गंभीर दखल साताऱ्याचे पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी घेतली आहे. अतिरिक्त पोलिस प्रमुख विजय पवार यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा संपूर्ण चौकशीचा अहवाल प्राप्त होताच, दोषींवर कडक कारवाई केली जाईल,अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी मंगळवारी ‘मटा’शी बोलताना दिली.
ऑट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी
कराड शहर पोलिसांतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमान्वये तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संदे कुटुबीयांसह वडगांव हवेली ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन त्यांनी सुरू केले आहे.
संदीप पाटील म्हणाले, कराड शहर पोलिसांबाबत संदे कुटुंबीयांनी लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली होती. त्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच दोषींवर कारवाई करण्यात येईल.
राज्य मानवी हक्क आयोग, मागासवर्गीय आयोकडेही तक्रार
पिडीत संदे कुटुंबीयांनी मंगळवारी राज्य मानवी हक्क आयोग व राज्य मागासवर्गीय आयोकडेही आपली लेखी तक्रार करीत आपल्याला न्याय देण्याची मागणी या केली आहे. त्यामुळे या बाबत हे आयोग काय भूमिका घेते, याकडेही येथील सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरातून लोकसभालढविणार नाहीसुशीलकुमार शिंदे यांची माहिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
‘सोलापुरातून मी आता लोकसभा निवडणूक लढविणार नाही. मी निवृत्त झाले आहे,’ असे सांगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुढील लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असणार काय? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सुशीकुमार शिंदे सोलापूर दौऱ्यावर आहेत. काँग्रेस भवनात आल्यानंतर त्यानी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘मी सोलापुरातून लोकसभेला उभारणार नाही. मी निवृत्ती घेतली आहे. आता नवीन पिढीने पुढे आले पाहिजे. जे लढाऊ आहेत, चांगले बोलतात ज्यांना अनुभव आहे. संसदेत आपला प्रश्न व्यवस्थित मांडू शकतील, अशा लोकांना निवडून दिले पाहिजे, या मताचा मी आहे.’
मागील लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून भाजपचे खासदार शरद बनसोडे यांच्याकडून सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर सोलापूर शहराची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. सोलापूरच्या विकासाचेही तीन-तेरा झाले आहेत. शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असे पक्षातील सर्वांना वाटत आहे. परंतु, सध्या परिस्थिती तशी नाही. वातावरण भाजपच्या विरोधात असले तरी निवडणुकीला आणखी बराच वेळ असल्याने आणि त्यावेळचे राजकीय वातावरण नेमके काय असेल, यावरच सर्व काही अवलंबून असल्याने शिंदे यांच्यानंतर त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जाऊ शकतो. काँग्रेस पक्षाकडे शिंदे यांच्याशिवाय लोकसभेसाठी दुसरा कोणताही उमेदवार नसल्याने आज जरी शिंदे निवृत्तीची भाषा करीत असले तरी हायकमांडचा आदेश आल्यानंतर काहीही होऊ शकते, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर चित्रनगरीत ३५ लोकेशन्स तयार

$
0
0


Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कोल्हापूर ः दोन पाच नव्हे तर तब्बल तीस वर्षांनी एखादे माळरान बनून राहिलेल्या कोल्हापूर चित्रनगरीला लवकरच श्वास मिळणार आहे. ७५ एकराच्या माळावर दोन तासांचे पडद्यावरचे जग निर्माण कधी होणार याकडे सिनेमाच्या राज्यातील प्रत्येकाचे लक्ष लागून राहिले होते. आता ही प्रतीक्षा संपणार आहे. डिसेंबरच्या अखेरीस कोल्हापूर ​चित्रनगरीचे औपचारिक उदघाटन होणार आहे आणि त्यानंतर पडद्यामागची ती सारी लगबग इथे सुरू होणार आहे. मनात असे कल्पनांचे इमले रचत आणि चित्रनगरीच्या विस्तीर्ण पठारावर काय पहायला मिळेल या उत्सुकतेतून गेल्यानंतर ​गेल्या तीन दशकांपासून मराठी सिनेमाचं हरवलेलं माहेर नव्याने उभं राहिलेलं दिसलं.

सिनेमाचे माहेरघर असं बिरूद जेव्हा कोल्हापूरच्या नावाला लावलं जातं तेव्हा नक्कीच अभिमान वाटतो. माहेर म्हणजे ज्या मातीत एखादी गोष्ट जन्म घेते, वाढते, समृद्ध होते अशी जागा. मराठी सिनेमाला माहेरघर देणाऱ्या कोल्हापुरात सिनेमाने पहिला श्वास घेतला आणि त्यामुळेच या सिनेमासाठी कोल्हापूरची भूमी ही माहेर बनली. पण राजकीय अनास्था आणि दुर्लक्ष यामुळे कोल्हापूरशी सिनेमाचा धागा विरळ झाला होता. पण आता चित्रनगरीने घेतलेल्या उभारीने ही वीण नव्याने गुंफली जात आहे.

भारती विद्यापीठाची हद्द संपली की दगडी संरक्षक भिंतीपासून पुढे दोन किलोमीटर अंतरावर चित्रनगरीकडे जाणारे वळण लागते. वर्षभरापूर्वी या परिसरात फक्त वाऱ्याचा आवाज आणि पानांची सळसळ किंवा पक्ष्यांचा किलबिलाट इतकीच काय ती जाग. सिनेमाच्या माहेरघरातील ​चित्रनगरीचा आवार असा भकासपणे विस्तारलेला होता. आता मात्र चित्रनगरीचा परिसर बोलका झाला आहे. लोकेशन्स उभारणीचे काम पूर्ण झाल्यामुळे वर्दळ वाढली आहे. रोडरोलर, पोकलँड मशीनची धडधड हवीहवीशी वाटत आहे. वेल्डिंग कामाचा एरव्ही नको वाटणारा आवाज कितीही कान किटले तरी सुरूच रहावा असे वाटत आहे. कारण त्यानंतर ‘सायलेन्स...अॅक्शन,’ हा आवाज इथे घुमणार आहे. प्रभात नावाची फिल्म कंपनी याच कोल्हापुरात स्थापन झाली. सिनेमा बनवण्याच्या कामाची ती पहाटच होती. मात्र त्यानंतर गेल्या तीस वर्षांत प्रशासनाचे दुर्लक्ष, राजकीय नेतृत्वाकडून उदासीनता यामुळे एक अंधार पसरला होता. आता हा अंधार दूर होण्याची वेळ आली आहे. ‘प्रभात’ या अर्थाने पुन्हा​ सिनेमाच्या माहेरघरात ​​चित्रनगरीच्या माळावर निर्मितीचा सूर्योदय होणार आहे.

चित्रनगरीच्या आवारात आल्यानंतर मध्यभागी पाटलाचा वाडा दिसतो. सध्या या वाड्याच्या दुसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे. एकेकाळी ग्रामीण सिनेमांची चलती होती. मधल्या काळात सिनेमा शहरी झाला असला तरी सध्या पुन्हा मराठी सिनेमांमध्ये गाव आणि शहर अशा दोन्ही विषयांवर काम होत आहे. त्यामुळे पडद्यावरून वाडा हद्दपार होणार नसल्याने चित्रनगरीच्या लोकेशन्समध्ये वाडा उभारत आहे. हा वाडाही कधी बंगला, कधी फार्म हाउस म्हणून वापरता येईल असे डिझाइन केले आहे. वाड्याच्या डाव्या बाजूच्या अर्थात पूर्वीच्या स्टुडिओच्या तीन बाजूंचा उत्तम उपयोग करण्यात आला आहे. मागच्या बाजूला कोर्ट तर उजव्या बाजूला मॉल तयार होत आहे. डावीकडे दवाखाना, पोलिस स्टेशन तर उजवीकडे आलिशान घरातील दिवाणखाना तयार झाला आहे. आवारातील रस्त्यांचा वापर आउटडोअर दृश्यांसाठी करता यावा म्हणून खास रचना करण्यात आली असून बस स्टॉप, कॉलेज कॅम्पस, कँटीन, कॅफे, चौकातला कट्टा, पार्किंग स्लॉट अशा नव्या काळातील सिनेमाच्या फ्रेममध्ये येणाऱ्या लोकेशन्सचेही काम झाले आहे. चित्रनगरीच्या पूर्णत्वामुळे कोल्हापुरात सिनेमा टुरिझमसह, सिनेमा, मालिका, लघुपट यांच्या ​चित्रीकरणासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे.

०००००

अशी होणार चित्रनगरी

चित्रनगरी विकासाचा हा पहिला टप्पा असून त्यात ३३ एकरांच्या जागेत २८ कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत. या माळरानावर नंदनवन फुलविण्यात आले असून त्याअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी ५५ लाखांचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. शिवाय बगीचा, स्वीमिंग पूल, हिरवळ (लॅँडस्केप), कलाकारांसह तंत्रज्ञांसाठी अद्ययावत सुविधा असलेले टॉवर बांधण्यात येणार आहेत. रस्त्यांवरचे चित्रीकरण करता यावे यासाठी परिसरात अंडाकृती आकारात मोठमोठे रस्ते तयार केले आहेत. स्ट्रीट लाइट असलेल्या गल्ल्यांचा लूक आणण्यात आला आहे. मुख्य वाडा आणि लोकेशन्स इमारतीसमोरील रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ, पांढरे पट्टे आणि विभाजक डिझाइन करण्याचे काम सुरू असल्यामुळे सिनेमाच्या पडद्यावर दिसणारा हायवे किंवा मोठा रस्ताही चित्रीकरणासाठी तयार होत आहे.

मुख्य चित्रीकरण हॉलचे रुपडे आता पालटले आहे. या एकाच इमारतीच्या बाहेरील चारीही बाजूंना वेगवेगळी लोकेशन्स आकाराला येत आहेत. एका बाजूला बंगल्याची दर्शनी बाजू, दुसऱ्या बाजूला दवाखाना, मागील बाजूला दुमजली न्यायालय, त्यापुढच्या बाजूला पोलिस ठाणे आणि तुरुंग अशी या मुख्य इमारतीची बांधणी झाली आहे. अंतर्गत भागात चित्रीकरणासाठीचा मोठा हॉल तयार करण्यात आला असून तेथे हवे ते लोकेशन साकारता येणार आहे.

============
याठिकाणी ३५ लोकेशन्स आकाराला आली आहेत. यामध्ये शॉपिंग मॉल, कोर्ट, हॉस्पिटल, पोलिस स्टेशन, कॉलेज एरिया, कॅफे, रेस्तराँ ही अशी स्थळे तर आहेतच. शिवाय सध्या मालिकांमध्ये दिसणारा घरांमधील आलिशान लूकही चित्रनगरीमध्ये विकसित करण्यात आला आहे. या बदलामुळे आणि सिनेमानिर्मितीच्या नव्या गरजांमुळे चित्रनगरी आजच्या सिनेमासाठी पूरक ठरणार आहे.

मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, ​अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर पगारी पुजाऱ्यांचा कायदा करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्याबाबत राज्य सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने यापुर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र या कायद्याची व्याप्ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या अखत्यारीतील ३०६४ मंदिरांनाही लागू करण्याचा डाव राज्य सरकार आखत आहे. यामुळे पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय लांबणीवर पडू शकतो. या पार्श्वभूमीवर पुजारी नेमणुकीच्या मुद्याला बगल देण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडू, तसेच अंबाबाई मंदिराबाबत स्वतंत्र कायदा करण्याच्या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, अंबाबाई मंदिरातील पुजारी नियुक्तीबाबत कायदा करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी अहवाल देण्याचा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. मात्र कोणताही ठोस निष्कर्ष न काढता हा अहवाल देण्यात आला आहे. दरम्यान पगारी पुजारी नियुक्ती कायदा केवळ अंबाबाई मंदिरच नव्हे तर देवस्थानच्या अखत्यारितील साडेतीन हजार मंदिरांमध्येही हा कायदा लागू करावा, असा मुद्दा पुढे आला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीची व्याप्ती जर साडेतीन हजार मंदिरांच्याबाबत वाढवली तर त्या मंदिरांबाबतच्या हरकती, दावे, प्रतिदावे, अहवाल यामुळे अंबाबाई मंदिरातील पुजारी नियुक्तीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अंबाबाई व जोतिबा या दोन मंदिरातून सरकारला मोठे उत्पन्न मिळते. त्यामुळे इतर छोट्या मंदिरांमध्ये सरकारी पुजारी नियुक्ती केल्यास पुजाऱ्यांच्या पगाराचा भार सरकारवरच पडणार आहे. पगारी पुजारी नेमण्याचा विषय हा अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांनी मनमानी करून देवीला घागराचोली पेहराव परिधान करण्याच्या प्रकरणावरून झाला होता. त्यासाठी कोल्हापुरात गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलनही सुरू आहे. त्यामुळे अंबाबाई मंदिरासाठी पगारी पुजारी नेमण्याचा कायदा स्वतंत्रपणे मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी हिवाळी अधिवेशनापुर्वी मुख्यमंत्री व विधी व न्याय राज्यमंत्री यांची भेटही घेणार असल्याचे क्षीरसागर यांनी नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑक्सिजन पार्कची मोडतोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

मुरगूड नगरपरिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून सुमारे ५० लाख रुपये खर्चाच्या ऑक्सिजन पार्कची सोमवारी रात्री अज्ञाताकडून मोडतोड झाली राजकीय आकसातून की अंधाराचा फायदा व्हावा म्हणून मोडतोड झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरपरिषदेने केली आहे.

मुरगूड नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेतून गावभागात ऑक्सिजन पार्कची उभारणी केली आहे. रात्री अज्ञाताकडून पार्कमधील दहा विद्युत पोल उखडून टाकले आहेत. विद्युत वाहिन्या तोडल्या, दिवे फोडले, त्यामुळे या मोडतोडीमुळे सुंदर अशा ऑक्सिजन पार्कचा ऑक्सिजन संपून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. दिवसा पालिका कर्मचाऱ्यांकडून दिवसभर देखभाल होते.

मात्र, हा मोडतोडीचा प्रकार रात्रीच्या वेळी घडला आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी परशराम मारुती कांबळे यांनी मुरगूड पोलिसांत तक्रार नोंदवली असून दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बेळगावात गुन्हे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

महामेळावा झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी सोमवारी उशिरा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि महाराष्ट्रातून आलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेते मंडळींवर गुन्हे दाखल केले आहेत. ठळकवाडी पोलिस स्थानकात एकूण तेरा जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

बेळगावातील सुवर्णसौंध येथे घेण्यात येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाचा निषेध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी घेतलेल्या महामेळाव्याला परवानगी दिली नसताना रस्त्यावर मंडप घालणे आणि व्यासपीठ उभारून मेळावा घेतल्याबद्दल ‘मए’ समितीच्या नऊजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्रातून आलेल्या आमदार जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुप्पेकर आणि राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर प्रवेशबंदी हुकूम असताना बेळगावात प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समितीच्या नेत्यांना अद्याप पोलिसांकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले मराठी भाषिक पाहून कर्नाटक सरकारच्या पायाखालील वाळू घसरली आहे. मराठी भाषिकांना त्रास देण्याचे धोरण कर्नाटक सरकारकडून सुरूच असल्याची भावना यानिमित्ताने मराठी भाषिकांतून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचंड दुर्गंधी अन् डासांचे साम्राज्य

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

श्वास गुदमरेल इतकी दुर्गंधी, परिसरात अस्वच्छता अन् डासांचे साम्राज्य, पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही, हे चित्र आहे प्रवाशांच्या सेवेसाठी असणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या जयसिंगपूर येथील बसस्थानकातील महिलांच्या स्च्छतागृहाचे. येथे वृध्द आणि अपंग महिलांसाठी कोणतीच वेगळी व्यवस्था नाही. आता बीओटी तत्त्वावर नवे स्वच्छतागृह उभारण्यात येत असून सुमारे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे.

जयसिंगपूर ही बाजारपेठ शिरोळ तालुक्याचे केंद्र आहे. येथे आरोग्य सुविधांबरोबरच शाळा, महाविद्यालयांमुळे बसस्थानकात व्यापारी, रूग्ण तसेच विद्यार्थी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. जयसिंगपूर बसस्थानकात आजही अनेक वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचाच वापर केला जातो. या स्वच्छतागृहाची देखभाल ठेवण्याचा ठेका कोपरगाव येथील शंभू पाठक यांच्याकडे आहे. याठिकाणी त्यांनी कर्मचाऱ्याची नेमणूकही केली आहे. येथे महिलांसाठी एक शौचालय तसेच अन्य एक स्वच्छतागृह आहे, मात्र त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहात गेल्यानंतर महिलांचा श्वास गुदमरतो, यामुळे नाकाला पदर लावूनच येथे प्रवेश करावा लागतो. शौचालयात वृध्द महिलांसाठी कमोडची तसेच अपंग महिलांसाठीही वेगळी व्यवस्था नाही. शौचालयात पाण्याचीही व्यवस्था नाही. बाहेर असणाऱ्या टाकीतील पाणी बादलीत घेऊनच शौचालयात जावे लागते. पाण्याचा पुरेसा वापर होत नसल्याचे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. अशाच स्थितीत दररोज तालुक्यातील शेकडो महिला तसेच महिला वाहक या स्वच्छतागृहाचा वापर करतात. स्वच्छतागृहासाठी महिलांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.

शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात डास तसेच दुर्गंधी असल्याने येथून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना आपली सुटका झाल्यासारखी वाटते. स्वच्छतागृहाच्या परिसरात सॅनिटरी नॅपकीन टाकण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. परिसरात पडलेले नॅपकीन एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली जाते. बसस्थानकात मुलांना स्तनपान देता यावे यासाठी हिरकणी कक्षही अस्तित्वात नाही.

जुन्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने बसस्थानक परिसरात नवे स्वच्छतागृह बांधण्यात येत आहे. एक महिन्यापूर्वी या कामास सुरूवात झाली असून ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्वावर बांधण्यात येत असलेल्या या स्वच्छतागृहामध्ये महिलांसाठी तीन शौचालये व एक स्वतंत्र स्वच्छतागृह आहे.

येथे वृध्द महिलांसाठी कमोडची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. तसेच अपंग महिलांसाठीही वेगळी व्यवस्था आहे. पुरूषांसाठी सात शौचालये, अपंग पुरूषांसाठी स्वतंत्र एक कमोडचे शौचालय तसेच स्वमछतागृह बांधण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत चौकशीसाठी आता तीन सदस्यीय पॅनेल

$
0
0



कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेतील विविध विभागात आर्थिक अपहार, गैरकारभार तसेच सातत्याने गैरहजर राहण्याचे प्रकार करणाऱ्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या खातेनिहाय चौकशी आता महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीच्या पॅनेलमुळे पुर्ण होणार आहेत. चौकशी अधिकाऱ्यांअभावी गेल्या दहा वर्षात ४४ प्रकरणांच्या मुळापर्यंत जाता आले नव्हते. महापालिकेत गाजलेल्या केंबळे प्रकरणाची चौकशीही या प्रलंबित प्रकरणामध्ये आहे. त्यामुळे नवीन पॅनेलसमोर या प्रकरणासह सर्व प्रकरणे पाठवण्यात येणार आहेत.

महापालिकेतील विद्युत घोटाळा मोठा होता. त्या प्रकरणाच्या धास्तीने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची तत्कालिन अधिकाऱ्यांनी खातेनिहाय चौकशी सुरू केली. मात्र त्यानंतर अधिकारी बदलत गेले तसे हे प्रकरण मागे पडत गेले. याबरोबरच आर्थिक अपहार, सातत्याने गैरहजर यासारख्या अनेक विभागातील प्रकरणांच्या चौकशी महापालिकेत प्रलंबित आहेत. दहा वर्षापूर्वी विद्युत घोटाळा झाला होता. त्यानंतर आजतागायत त्याची चौकशी पुर्ण होऊ शकली नाही. त्यामध्ये बदली होणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे व्यत्यय येत होता. इतर कार्यालयीन कामांमुळे या चौकशींवर लक्ष केंद्रीत करता येत नसल्यानेही या चौकशी पुर्ण होत नव्हत्या. यासाठी राज्य सरकारनेच चौकशींसाठी स्वतंत्र पॅनेल स्थापन करता येऊ शकेल, असे कळवले होते. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही केली असून तीन सदस्यीय पॅनेल निर्माण केले आहे.

सरकारच्या आदेशाप्रमाणे वर्ग एकमधील निवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करता येणार होती. त्याप्रमाणे महापालिकेने महादेव सुर्यवंशी हे निवृत्त उपजिल्हाधिकारी, किरण गौतम हे निवृत्त गटविकास अधिकारी तर डॉ. दिलीप पाटील हे निवृत्त आरोग्याधिकाऱ्यांचे एक पॅनेल नेमले आहे. त्यासाठी सरकारच्या आदेशाप्रमाणे मुलाखतीची प्रक्रिया राबवण्यात आली. या पॅनेलकडे आता यापूर्वीच्या चौकशी प्रकरणांची कागदपत्रे सुपुर्द करण्यात येणार आहेत. त्यानुसार ही समिती जुन्या प्रकरणांपासून चौकशीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने समितीला काही कालावधी दिला जाणार आहे. त्यामुळे एखादे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यासाठी जबाबदार धरलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्याची चौकशी अजून सुरू आहे, हे पालपूद आता बंद होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयआरसीटीसी रेल्वे कोल्हापुरातून धावणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेली काही वर्षे आयआरसीटीसीची रेल्वे कोल्हापुरातून सोडण्याच्या मागणी मान्य झाली आहे. येत्या २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत कोल्हापुरातून उत्तर भारत यात्रेसाठी रेल्वे धावणार आहे. या यात्रेसाठी ८२० आसनक्षमता असून ५५० तिकीटांची नोंदणी झाली आहे. ११ रात्री १२ दिवसांच्या कालावधीसाठी प्रत्येक व्यक्तिसाठी ११ हजार ३४० तिकीट दर आकारला जाणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेडचे सहाय्यक व्यवस्थापक (पर्यटन) गुरुराज सोन्ना यांनी ही माहिती दिली. त्यांनी मंगळवारी कोल्हापूर रेल्वेस्थानकाला भेट दिली.

व्यवस्थापक सोन्ना म्हणाले, ‘केंद्र सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. उत्तर भारत यात्रेत उदयपूर, अजमेर, जयपूर, मथुरा, आग्रा, हरिद्वार, अमृतसर, वैष्णोदेवी ही प्रेक्षणीय स्थळे पाहता येणार आहेत. यात्रेसाठी आकारल्या जाणाऱ्या तिकीट दरातून दोन वेळचे शाकाहरी भोजन, नाष्टा, निवासाची व्यवस्था, बस, प्रत्येक रेल्वेच्या डब्यात सुरक्षा कर्मचारी, प्रत्येक डब्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापक तैनात केला आहे. पर्यटनस्थळावर रात्रीच्या वेळी प्रवास आणि दिवसभरात विविध ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहे. २४ नोव्हेंबरला ही रेल्वे कोल्हापुरात येणार आहे. येत्या चार दिवसांत या रेल्वेच्या आगमनाची वेळ निश्चित केली जाणार आहे. बुधवार पर्यंत आयआरसीटीचे कर्मचारी कोल्हापुरात थांबणार आहेत. प्रवासी त्यांच्याकडे या यात्रेसाठी नोंदणी करु शकतात. त्यासह www.irctctourism.comवर ऑनलाइन बुकिंग करु शकतात. त्यासह अधिकृत प्रतिनिधीकडेही धनादेश किंवा रोख देऊन तिकीटाची नोंदणी करता येऊ शकते. आयआरसीटीचे अधिकृत केंद्र रेल्वेस्थानकाच्या आवारात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासह उत्तर भारत, दक्षिण भारत यात्रेसाठी भारत दर्शन यात्रेची नियोजन सुरु आहे.’

यावेळी रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images