Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

​ सोमवारी सोलापूर बंदची हाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सोलापुरातील वीरशैव लिंगायत समाजामध्ये नाराजी पसरली आहे. बुधवारी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या सभेत सोमवारी सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही या सभेत करण्यात आल्याने विद्यापीठ नामकरणाचा वाद आणखी चिघळला आहे.
सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाने केली होती. तत्पूर्वी धनगर समाजाने सोलापुरात मोर्चा काढून राजमाता अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्याला लिंगायत समाज वगळता सर्व समाजाने जाहीर पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अखेर नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार असल्याची घोषणा केल्यानंतर सोलापुरात धनगर समाजाने जल्लोष केला तर लिंगायत समाजाने मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुतळे जाळून निषेध नोंदवला होता.
दरम्यान, शिवा विरशैव संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे आणि सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी सिद्धेश्वर मंदिरात समाजाची बैठक बोलावली होती. या बैठकीत सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी सोलापूर बंदची हाक देण्यात आली. यामुळे सोलापुरात पुन्हा एकदा नामकरणाचा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिजाऊ ब्रिगेड रस्त्यावर
दरम्यान विद्यापीठाला अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय झाल्यानंतर नाराज झालेल्या लिंगायत समाजाला दिलासा देण्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकाला बसवेश्वरांचे नाव देण्याबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांना हिरवा कंदील देण्यात आला. त्यानंतर जिजाऊ ब्रिगेडने बुधवारी सायंकाळी कार्यकर्त्यांनी स्वतःहून सोलापूर रेल्वे स्थानकासमोर राजमाता जिजाऊ रेल्वे स्थानक, असा फलक लावल्याने नामांतराचा प्रश्न आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा प‌रिषदेतही वाढले लाचखोरीचे प्रकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात उत्कृष्ट कामगिरीने एकेकाळी नावलौकिक मिळवलेली जिल्हा परिषदेत वर्षभरात लाचखोरीतही आघाडीवर राहिली. माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण, वित्त तसेच आरोग्य या विभागांतील सातजण लाच घेताना जाळ्यात अडकले.

प्रभारी वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी तर चक्क अधिकाऱ्यांना दीड टक्के देण्याचा ‘प्रोटोकॉल’ असल्याचे सांगून लाच मागितल्याचे समोर आले होते. लिपिक ते अधिकाऱ्यांपर्यंतच्या साखळीवर यातून शिक्कामोर्तब झाले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून जिल्हा परिषद ग्रामीण विकासात महत्वाची भूमिका बजावते. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली १४ महत्वांच्या विभागातर्फे जिल्हा परिषदेचे काम चालते. त्यापैकी सर्वाधिक लाचखोरी माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण, आरोग्य, वित्त, बांधकाम, पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत या विभागांत चालते. त्याची लागण इतर विभागांनाही होताना दिसत आहेत.

शिक्षण संस्था, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संबंध माध्यमिक शिक्षण विभागाशी येतो. ‘लक्ष्मी’ दर्शनाशिवाय फाईलच पुढे जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळेच सहा महिन्यांपूर्वी विभागाची चौकशी झाली. आर्थिक लाभापोटी चुकीच्या शिक्षक मान्यता दिल्याच्या आरोपातून तत्कालीन शिक्षणाधिकारी ज्योस्त्ना शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांची बदलीही झाली. मात्र अद्याप विभागातील काही लिपिकांची ‘वसुली’ तेजीत आहे.

गेल्या महिन्यांत प्राथमिक शिक्षण विभागातील सर्वशिक्षा अभियान योजनेवर काम करणारा लिपिक लाच घेताचा सापडला. बांधकाम विभागांत कामाची बीले मंजूर करणे, धनादेश काढून देण्यासाठी टक्केवारी गोळा केल्याच्या तक्रारी आहेत. टक्केवारी न दिल्यास फाइलमध्ये त्रुटी काढल्या जातात. ग्रामपंचात विभागात तक्रारीच्या प्रकरणांची चौकशी करण्यास

असलेल्या अधिकाऱ्यांची खाबुगिरी फोफावली आहे. त्याचे पडसाद विभागाच्या कामात दिसत आहेत.

तक्रार असलेल्या ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांसोबत पार्ट्या करण्यात ते तरबेज आहेत. त्या मोबदल्यात दोषींना क्लिनचीट दिली जात आहे. पैशांशिवाय सामान्य प्रशासनमधील फाइल्सना गती येत नसल्याचा आरोप आहे. त्यातूनच चार सहायक गटवि‌कास अधिकाऱ्यांना चुकीची पदोन्नती दिल्याची तक्रार झाली होती.

पे नव्हे दे युनिट

माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तीनंतर लाभाच्या प्रकरणांना ‘पे युनीट’ मंजुरी देते. तेथे पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचा नेहमीचा आरोप आहे. सरकारकडून लाभाचे किती पैसे मिळणार त्यावर टक्केवारी ठरते. मग प्रकरण मंजूर होते. त्यामुळेच ‘पे’ नव्हे ‘दे’ युनीट अशी त्याची कुप्रसिद्धी झाली आहे. वरकमाई करून देणारे युनीट असल्याने अधिकारीही खाबुगिरीकडे सोयीस्कर दूर्लक्ष करतात.



या नंबरवर करा तक्रारी

कोणीही लाच मागत असेल तर नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुढील क्रमांकांवर फोन करून तक्रारी द्याव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्याचा लढा प्राणापेक्षा प्रिय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘संघवाद, मनुवाद, जातीयवाद, बेरोजगारी, उपासमारीच्या विरोधात आंदोलन छेडले असून ही एका अर्थी स्वातंत्र्याची लढाई आहे. सध्याचे राजकारण हे धन आणि बाहुबलीच्या बळावर सुरू असून त्याच्या विरोधात सामाजिक आंदोलने हाच पर्याय आहे. विचार आणि स्वातंत्र्याची लढाई आम्हाला प्राणापेक्षा प्रिय असून ‘हम लढके लेंगे आजादी, हम छिनके लेंगे आजादी’ असा वज्रनिर्धार जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांच्या साथीने हजारो नागरिकांनी ‘लाल सलाम’या घोषात केला.

केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ या विषयावर बोलताना कन्हैयाकुमार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सामाजिक लोकशाहीसाठी लढा तीव्र करण्यासाठी साऱ्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. ‘कोल्हापूर लई भारी’ म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या केंद्र सरकारला कन्हैयाकुमार यांनी ‘माझ्यावर देशद्रोही वक्तव्य केल्याप्रकरणी खोटेनाटे आरोप सुरु आहेत. सरकारला गेल्या सोळा महिन्यात आरोपपत्र दाखल करता आले नाही. सरकारने एकतरी आरोपपत्र सादर करावे, अन्यथा आरोपमुक्त करा’ असे खुले आव्हानही दिले.

सभेवेळी कन्हैयाकुमार यांनी सहकाऱ्यांसह ‘हम लढके लेंगे आजादी, हम छिनके लेंगे आजादी’ हे गीत जोशात सादर केले. ‘कॉम्रेड पानसरे अमर रहे, लढेंगे जितेंगे, इन्कलाब झिंदाबाद’ घोषणांनी वातावरण बदलले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा जयघोष करत सभेला सुरुवात झाली. यावेळी कॉम्रेड पानसरे यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन झाले.

ही लाजिरवाणी गोष्ट

अध्यक्षस्थानावरुन बोलताना कॉम्रेड उमा पानसरे यांनी देशातील सद्यस्थितीवरून चिंता व्यक्त केली. ‘सध्या लोकशाहीसमोर आव्हाने उभी ठाकली ओत. सरकारच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. धर्मांध शक्ती समाजात तेढ निर्माण करत आहेत. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या खुनातील मारेकऱ्यांना अद्याप पकडलेले नाहीत ही सरकारसाटी लाजिरवाणी गोष्ट आहे’ अशा भावना पानसरे यांनी व्यक्त केल्या. त्यांनी ‘कॉम्रेड पानसरे का अधुरा काम कौन पुरा करेगा’ अशी घोषणा दिल्यावर उपस्थितांतून ‘हम करेंगे हम करेंगे’ असा प्रतिसाद मिळाला.

यावेळी ऑल इंडिया स्टुडंड फेडरेशनचे राज्य सचिव प्रशांत चव्हाण, गिरीश फोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत आंबी यांनी स्वागत केले. धीरज कटारे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता अमृतसागर, आरती रेडेकर, संदीप पाटील यांनी ठरावांचे वाचन केले. दिलशाद मुजावर यांनी आभार मानले. सतीश कांबळे, अनिल चव्हाण, नामदेव गावडे यांच्या हस्ते कन्हैयाकुमार यांचा सत्कार झाला. सभेला सरोज पाटील, कॉम्रेड भालचंद्र कांगो, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, कॉम्रेड उदय नारकर, दत्ता मोरे, सुभाष वाणी, सुमन पाटील, रवी जाधव, बाबूराव कदम, प्राचार्य टी. एस. पाटील, व्यंकाप्पा भोसले, आय. एन. बेग, एम. बी. शेख आदी उपस्थित होते.


सभेतील ठराव
- विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुन्यांना शोध घेऊन त्यामागील मास्टरमाईंडला पकडावे.
- शिक्षणाचे खासगीकरण व भगवेकरण थांबवावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ८३ शिक्षक अद्याप वर्गाबाहेरच

$
0
0


कोल्हापूर : अतिरिक्त ८३ माध्यमिक शिक्षकांना समायोजन प्रक्रियेतून मिळालेल्या हायस्कूलचे संस्थाचालक, मुख्याध्यापकांनी हजर करून घेतले नाही. परिणामी त्यांना निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी त्यांना वर्गाबाहेरच राहावे लागले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी हजर करून घेण्याचा आदेश देऊनही त्या शिक्षकांना हजर करून घेतले जात नाही. त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे संबंधीत हायस्कूल्सना नोटीस देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

जिल्ह्यात १००३ अनुदानीत, विनाअनुदान‌ीत हायस्कूल्स आहेत. पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला कल, सरकारी शाळेत गुणवत्ता वाढीसाठी होत नसलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांची घटती संख्या आदी कारणांमुळे प्रत्येक वर्षी सर्वच शाळांची पटसंख्या घटत आहे. परिणामी दोन- तीन वर्षांपासून अतिरिक्त शिक्षकांच्या संख्या वाढते आहे. सन २०१६-२७ शैक्षणिक वर्षात एकूण १२९ माध्यमिक शिक्षक अतिरिक्त झाले. १३ ऑक्टोबर रोजी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिरिक्त सर्व शिक्षक पदस्थापना समुपदेशनाने देण्याची प्र‌क्रिया राबवली. त्यावेळी ९६ शिक्षकांचे समायोजन झाले. रोस्टरनुसार जागा नसणे, त्या भाषेच्या शिक्षकांचे पद रिक्त नसल्याने उर्वरित ३३ शिक्षकांचे प्रस्ताव सरकारच्या नियमानुसार विभागीय स्तरावर समायोजनासाठी पाठवले.

९६ शिक्षकांना पदस्थापना झालेल्या हायस्कूलमध्ये तातडीने हजर करून घेण्याचा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधीत हायस्कूल्सना दिले. त्या शाळेत शिक्षक हजर होण्यासाठी वारंवार जात आहेत. मात्र मुख्याध्यापक, संस्थाचालक त्यांना हजर करून घेत नाहीत. वजनदार राजकीय वरदहस्त असलेल्या शिक्षण संस्थांकडून शिक्षकांना कार्यालयाबाहेरच उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. अतिरिक्त शिक्षक हजर करून घेण्यास टाळाटाळ होण्यामागे आधीच संस्थाचालकांनी लाखांत डोनेशन घेऊन रिक्त जागांचे बुकिंग केले हे महत्वाचे कारण आहे. शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांना हजर करून न घेणाऱ्या संस्थांवर कारवाईचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार संबंधित ८३ हायस्कूलना प्रशासनाने नोटीस दिली आहे. नोटिशीनंतर थेट कारवाई केली जाणार आहे.

शहरातील ११ हायस्कूल्सचा समावेश

अतिरिक्त शिक्षकांना हजर करून न घेणाऱ्या शहरातील ११ हायस्कूल आहेत. त्या शाळांना नोटीस देणे, त्यांच्या मुख्याध्यापकांवर कारवाईसह संस्थेचे वेतनेतर अनुदान बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्येचा छडा लावा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

‘ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा लवकर लागला पाहिजे. यासाठी सरकारविरोधात तीव्र संघर्ष केला जाणार आहे. पानसरे यांच्यासह डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. मारेकरी पकडणे हे सरकार समोर मोठे आव्हान आहे. देश महासत्ता बनवायला निघालेल्यांना या नेत्यांच्या हत्येतील आरोपीही सापडत नाहीत,’ अशा शब्दांत जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष, विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी उडविली. पानसरे कुटुंबीयांच्या घरी भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कन्हैयाकुमार यांनी पानसरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. उमा पानसरे यांनी आतापर्यंत पोलिस कारवाई, न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची माहिती दिली. पानसरे यांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी संघर्ष सरकारशी संघर्षाचा पुनरुच्चार करून ते म्हणाले, ‘सत्य आणि माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधायक समाजनिर्मिती आणि परिवर्तनासाठी लढणाऱ्यांची हत्या केली जात आहे. विशिष्ट यंत्रणेकडून हत्यासत्र सुरु आहे. आतापर्यंत पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश यांची हत्या करण्यात आली. या चौघांच्या हत्येचा अद्याप काहीही तपास लागलेला नाही. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सापडलेल्या संशयित आरोपीला जामिनावर सोडून देण्यात आले. आरोपी पकडण्यात सरकारला अपयश आले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात झालेल्या हत्येचे आरोपी सापडत नाहीत, ही नामुष्की आहे. आताच्या काळात खरे बोलले की, मृत्युला सामोरे जावे लागते, अशी स्थिती आहे. काही प्रवृत्ती संघटितपणे अपराध करत आहेत. देशात दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या शक्तींविरोधात सर्वसामान्य नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. ’

येनकेनप्रकारे माझाही आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरु आहे. असा प्रयत्न करणारेच मूर्ख आहेत, अशी सणकून टीका करत ते म्हणाले, ‘आवाज दाबला गेला की तो उफाळून येतो, हे या वृत्तीनी लक्षात घ्यावे. अनेकांचे पितळ उघडे पडले. खरे बोलले तर शिक्षा भोगावी लागते, असे चित्र या यंत्रणेने उभे केले आहे. शाळा आणि विद्यापीठात अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत. सामान्य नागरिकांना सायंकाळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. महिलांची सुरक्षाही धोक्यात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर आहे, असे विदाराक चित्र असताना देश महासत्ता बनविण्याचे स्वप्न बाळगले जात आहे. सरकार खोट्या आश्वासननांची खैरात करीत आहे.’

यावेळी मुकुंद कदम, मिलिंद कदम, रुपाली कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमानुष कृत्याने आंबोली हादरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सांगली

लुटमारप्रकरणी सांगली पोलिसांनी अटक केलेल्या दोघांपैकी अनिकेत कोथळेचा खून केल्यानंतर पोलिस उपनिरिक्षक युवराज कामटेसह सहाजणांनी त्याचा साथीदार अमोल भंडारेला आपल्या ताब्यात ठेवले. त्याच्या समोरच आंबोली घाटात अनिकेत कोथळे याचा मृतदेह पेट्रोल, डिझेल ओतून जाळून टाकला. नंतर अमोल भंडारे याला जीवे मारण्याची धमकी दिली. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी त्याला विश्वासात घेवून सुरक्षेची हमी दिल्यानंतर त्याने सविस्तर घटना सांगितली. तो या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

सांगली शहर पोलिसांनी चोरीतील संशयित अनिकेत कोथळेचा खून केला. नंतर दुसरा संशयित अमोल भंडारे याला ओलिस ठेवून दोन्ही संशयितांनी पलायन केल्याचे आभास निर्माण केला. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय २६) याचे नातेवाईक मंगळवारी पोलिस ठाण्यासमोर हंबरडा फोडून न्याय मागत होते. शहर पोलिसांकडून काही गंभीर प्रकार घडला आहे. मात्र ते जाणीवपूर्वक लपालपवी करून सहकाऱ्यांचा बचाव करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजताच आमदार सुधीर गाडगीळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन जाब विचारला. संतप्त जमावाने पोलिस ठाण्याला घेराव घालताना रस्ताही रोखून धरला. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेल्यानंतर सांगलीच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना जाग आली.

सांगलीच्या दौऱ्यावर असलेले विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सांगलीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे समजले. त्यानी सूचना केल्यानंतर तपासाला गती आली आणि पोलिस कोठडीत अनिकेतचा खून झाल्याचे चव्हाट्यावर आले.

कामटेसह पाच पोलिस निलंबित

‘पोलिस उपनिरिक्षक युवराज कामटे याच्या कृत्याच्या काही गोष्टी कानावर येत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उद्धट भाषा वापरणे, जनतेशी नीट न वागणे असे त्याचे वर्तन होते. कर्तव्यात कसूर आणि पोलिस शिस्तीचा भंग केल्याबाबत यापूर्वीही त्याला दोनवेळा खात्यांतर्गत शिक्षा करण्यात आलेली आहे. कोठडीतल्या मृत्यूप्रकरणात तर तोच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यासह सर्वच संशयित पोलिस कर्मचाऱ्यांना मंगळवारीच निलंबित करण्यात आले आहे’ असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले.

पोलिस ठाण्याला सुरक्षेचे कडे

बुधवारी शहर पोलिस ठाण्यालाच संरक्षण द्यावे लागल्याचे चित्र दिसून येत होते. पोलिस ठाण्याचे गेट काठ्या बांधून, बॅरॅकेड्स लावून बंद करण्यात आले. अर्धवट उघड्या खिडक्यांतून कर्मचारी बाहेर डोकावत होते. पोलिस ठाण्यासमोरचे अनिकेत कोथळेचे नातेवाईक आणि जमाव केव्हा काय करेल, याचा नेम नसल्याने राजवाडा चौकापासून वाहतूक बंद करून रस्ता निर्मनुष्य करण्यात आला. उपाधिक्षक निंबाळकर आणि लष्करी गणवेशातील पोलिस अश्रुधूरांच्या नळकांड्यांसह सज्ज होते. दिवसभर तणावाची स्थिती होती.

लाचखोरीनंतर अमानुष कृत्य

सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन अधिकाऱ्यांसह सातजणांनी वारणानगरमधील शिक्षक कॉलनीतील ९ कोटी १८ लाख रुपयांवर डल्ला मारला. हे प्रकरण अद्याप ताजे आहे. त्यातच शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत पोलिसांनी संशयित चोरट्याचा खून केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले. खूनाचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. कोट्यवधींच्या रोकड लंपास प्रकरणातील निलंबित पोलिस निरिक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरिक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह सात पोलिस कारागृहात असताना उपनिरिक्षक कामटे आणि े पथक गजाआड गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीविरोधात ‘स्वा‌भिमानी’ची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वर्षश्राद्ध घालून साजरा केला. त्यानिमित्त बुधवारी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खर्डा-भाकरी खाऊन निदर्शन केली. नोटाबंदीमुळे शेतकरी, कष्टकरी, मजुरांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत सरकारचा निषेध करून घोषणाबाजी केली.

‘स्वाभिमानी’ युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. तेथे सागर शंभूसेटे, अजित पोवार, शैलेश चौगुले, वैभव कांबळे, सागर कोंडेकर यांची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांची नोटबंदीच्या परिणामांचा आढावा घेत सरकारवर जोरदार टीका केली. नोट बंदी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसरत दणाणून गेला. दरम्यान, भारिप बहुजन महासंघातर्फे नोटबंदीचा निषेध केला. ८ नोव्हेंबर दिवस लुटारूंचा दिवस म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदन देताना संजय गुदगे, सुभाष कापसे, सुनीता चिकदोळे, दिंगबर सकट, संभाजी कागलकर, सतिश कुरणे उपस्थित होते.

‘रिप‌‌ब्लिकन’कडून समर्थन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे नोटाबंदीचा दिवस पांढरा पैसा दिन म्हणून साजरा केला. बिंदू चौकात कार्यक्रम झाला. जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन काळा पैसा रोखला गेला, असे सांगितले. यावेळी राजू ठिपकुर्लीकर, अविनाश शिंदे, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटिळे, अंकुश वराळे, राहुल कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुटा’ संघटनेतील वाद पुन्हा चिघळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीच्या तोंडावर प्राध्यापकांची संघटना असलेल्या शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातील (सुटा) संघर्ष पुन्हा चिघळला आहे. ‘सुटा’चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. आर. डी. ढमकले यांच्यावरील कारवाईवरुन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्यांना सुरुवात झाली.

सुटाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात प्रा. ढमकले यांनी अर्ज दाखल करुन बंडखोरी केल्यामुळे त्यांचे कायम सभासद व जिल्हाध्यक्ष पदावरुन निलंबित केल्याचे पत्रक ‘सुटा’ मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रा. आर. एच. पाटील यांनी म्हटले आहे. दुसरीकडे ‘सुटा’ कोल्हापूर जिल्ह्याचे सहकार्यवाह प्रा. राहुल मोपरे यांनी ढमकले यांच्या कारवाईला विरोध करत मध्यवर्ती अध्यक्ष प्रा. पाटील यांच्यावर तोफ डागली.

याबाबत ‘सुटा’चे मध्यवर्ती अध्यक्ष आर. एच. पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, ‘सुटा’ कार्यकारिणीच्या पाच नोव्हेंबरच्या बैठकीत प्रा. ढमकले यांनी सिनेट निवडणुकीत शिक्षक गटातून उमेदवारी मागे घ्यावे असे आवाहन केले होते. मात्र त्यांनी बंडखोरी करुन दाखल केलेली उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला. शिवाय बाजू मांडताना स्वतच्या उमेदवारीचे समर्थन करण्याऐवजी कार्यकारिणी सदस्यांवर आधारहीन आरोप केले. अखेर कार्यकारिणीने निलंबनाचा निर्णय घेतला असे सांगण्यात आले.

जिल्हा कार्यकारिणीचे सुटा अध्यक्षांवर आरोप

सुटाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीने ठरावाव्दारे आदेश देऊन करुन प्रा. आर. डी. ढमकले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केाला. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय हा कार्यकारिणीचा आहे. ढमकले यांना विजयी करण्याचा निर्धार कार्यकारिणीने केला आहे. यामुळे ‘सुटा’चे अध्यक्ष प्रा. आर. एच. पाटील यांनी प्राध्यापकांची दिशाभूल करु नये. जाणीवपूर्वक षडयंत्र रचून ढमकले यांची उमेदवारी नाकारली. सुटाच्या प्राध्यापकांनाही माहीत नसलेल्या प्रा. पाटील यांनी समन्वयकाच्या कुंपणावर बसून बिनबुडाचे आरोप करु नयेत. प्रा. पाटील समन्वयकांच्या हाताचे बाहुले आहेत. त्यांच्या कृपेने पाटील संघटनेत पद भोगत आहेत. अध्यक्ष असताना ज्यांनी जनरल सेक्रेटरी म्हणून जागा खरेदीपत्रावर सही केली अशांना ढमकले यांच्या योगदानावर बोलण्याचा अधिकार नाही’ असे जिल्हा सहकार्यवाह प्रा. राहुल मोपरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषी कर्जमाफीचे काम ठप्प

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आयटी विभागाकडून प्राप्त झालेल्या ग्रीन लिस्टमध्ये अनेक त्रुटी असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे. पहिल्या यादीत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती असूनही यात त्रुटी राहिल्याने प्रोत्साहनपर योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रमाणपत्र केलेल्या लाभार्थ्यांची बँक खाती निरंक करण्यात आली. मात्र बँक खात्यावर रक्कम वर्ग झालेली नसल्याने जिल्हा बँकेही कर्जमाफीच्या रक्कमेच्या प्रतीक्षेत आहे.

दिवाळीपर्यंत कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा केलेला सरकारचा दावा फोल ठरला आहे. लेखापरीक्षण, चावडी वाचनासह सरकारने दिलेल्या सर्व निकषांनुसार लाभार्थ्यांची यादी आयटी विभागाकडे पाठविण्यात आली. आयटी विभागाने ग्रीन, यलो, रेड आणि व्हाइट अशा चार स्वरुपात लिस्ट तयार केली. पात्र, तात्पुरते अपात्र, निकषानुसार तात्पुरते अपात्र आणि विचाराधीन अशा लिस्ट तयार केल्या. त्यानुसार ग्रीन लिस्ट पूर्ण कर्जमाफी मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावांचा समावेश होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात जास्त त्रुटी राहिल्या. त्यामुळे पुढील कामकाज थांबले आहे. पहिल्या यादीत दीड लाखांच्या आतील संपूर्ण कर्जमाफी द्यायच्या लाभार्थ्यांच्या नावांचा समावेश होणार होता. पण या यादीत त्रुटी राहिल्या. काम त्वरित होण्यासाठी लेखापरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अहोरात्र काम करूनही हयगय केल्याचा ठपका ठेवला गेला. मात्र सद्य:स्थितीत लाभार्थ्यांच्या याद्या तयार असूनही लाभ मिळत नसल्याने सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी नाराज आहेत.
दरम्यान, अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांची नावे पात्र यादीत आल्याने सहकार विभाग व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत गोंधळ उडला आहे. यादीतून ही नावे वगळण्यासाठी सहकार विभागाने शोधमोहीम सुरू केली आहे. जिल्हा बँकेच्या आयटी विभागात दिवसरात्र काम सुरू आहे. आतापर्यंत दहा ते बारा लाभार्थ्यांची नावे आढळली आहेत. अद्याप नावे शोधण्याचे काम सुरू आहे. ग्रीन लिस्टमध्ये जिल्ह्यातील २१ हजार ९६४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तशी यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली. यादीतून सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरकारी सेवेत कार्यरत ७७ लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली. अंतिम यादी पूर्ण झाल्यानंतर १०६९ लाभार्थ्यांना चार कोटी ७८ लाखांची रक्कम निश्चित केली. उर्वरीत यादीची छाननी सुरू आहे. मात्र यादीत अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांचा अधिक भरणा असल्याने गोंधळ उडाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संधी मिळाल्यास निवडणूक लढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘क्रांती तत्काळ घडत नाही. सर्वसामान्यांच्यावर हुकूमशाही आणि दडपडशाही केल्यास क्रांतीची सुरुवात होते. सध्या देशभरात धर्म, जात, पंथातून वाद निर्माण केले जात आहेत. हे थांबवण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी नवी सामाजिक क्रांती घडवली पाहिजे’, अशी अपेक्षा जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी व्यक्त केली. ‘सध्या मी विद्यार्थी दशेत आहे. भविष्यात संधी मिळाल्यास निश्चितच निवडणूक लढवू’, असेही त्यांनी सांगितले. बुधवारी सभेनंतर केशवराव भोसले नाट्यगृहातील कलातपस्वी बाबूराव पेंढारकर दालनात निवडक कार्यकर्ते, विचारवंत यांच्याशी संवाद साधला.

‘सध्याची शिक्षण पद्धती, महागडे शिक्षण आणि युवकांना दिशा कशी देणार?’ या प्रश्नावर कन्हैयाकुमार म्हणाले, ‘माझ्याजवळ अल्लाउद्दीन का जादूचा दिवा नाही. तातडीने कोणतीही व्यवस्था बदलणे शक्य नाही. मात्र, विद्यार्थ्यांना अपेक्षित शिक्षण पद्धती अत्यावश्यक आहे. देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलाला समान शिक्षण पद्धतीची गरज आहे. संविधानात खूप मोठी शक्ती आहे. मात्र संविधानाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नाही.’

‘लोकशाही वाचविण्यासाठी काय करता येईल? त्यासाठी कोणत्या क्रांतीची गरज आहे का?, या प्रश्नावर कन्हैयाकुमार म्हणाले, ‘रोहिम वेमुलाच्या जातीच्या प्रमाणपत्रावरुन वाद निर्माण केला जात आहे. मात्र, वस्तूस्थिती समजावून घेण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. विद्यार्थ्यांचे हक्क दडपण्याचे प्रयत्न केले जात आहे. अनेक यंत्रणा जातीयवाद भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.’

कन्हैयाकुमार म्हणाले, ‘मला कोणताही राजकीय वारसा नाही. माजी मंत्री नारायण राणे, त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासारखे साम्राज्य नाही. निवडणूक हा माझा व्यवसाय नाही. प्रत्येक राज्यात काही घराण्याची सत्ता आहे. भविष्यात निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्यास निश्चितच विचार केला जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर विक्री ऑनलाइन दाखवावी लागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या हंगामात साखर विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील ७०-३० फॉर्म्युल्याप्रमाणे साखर कारखान्यांनी दिलेल्या वाढीव दराच्या प्रस्तावांना बुधवारी सरकारच्या ऊस दर नियंत्रण मंडळाने मंजुरी दिली. तर ज्या कारखान्यांनी ७० टक्क्यापेक्षाही शेतकऱ्यांना जादा दर देण्याची तयारी दाखवली आहे, त्यांच्या प्रस्तावांबाबत आयुक्तांनी मंजुरी द्यावी, असे सुचवण्यात आले आहे. तर साखर विक्री पारदर्शकपणे करण्यासाठी कारखान्यांना विक्री ऑनलाइन दाखवण्याची सक्ती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

गेल्या हंगामातील अंतिम दराची व यंदाच्या हंगामातील पहिली बैठक मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार राजू शेट्टी, साखर आयुक्त संभाजी पाटील, सहकार सचिव एस. एस. संधू, वित्त सचिव डी. के. जैन, जयप्रकाश दांडेगावकर, रघुनाथ पाटील, पृथ्वीराज जाचक, शहाजीराव काकडे आदी उपस्थित होते. कारखान्यांनी इंधन खरेदी खर्च म्हणून जादा टाकलेल्या खर्चाची चौकशी केली जाणार आहे.बैठकीत गेल्या हंगामातील अंतिम दराबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा विषय अग्रक्रमावर होता. त्याप्रमाणे कारखान्यांनी अंतिम नफ्यातील ७० टक्के वाटा शेतकऱ्यांना ऊस दरासाठी तर ३० टक्के वाटा कारखान्यांना या फॉर्म्युल्याप्रमाणे प्रस्ताव सादर केले होते. याप्रमाणे जादा दर दिलेल्या साखर कारखान्याच्या वाढीव दरास मंजुरी देण्यात आली. तसेच कारखान्यांच्या उत्पादन खर्चाऐवजी तत्कालिन बाजारमूल्य धरून साखरेचे मूल्यांकन करावे. यासाठी राज्य सहकारी बँकेचे मूल्यांकन गृहीत धरावे असेही सांगण्यात आले. कारखान्यांना नफा दडवता येणार नाही यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.

‘त्यांच्या’वर कारवाई

गेल्या तीन महिन्यातील साखरेच्या बाजारपेठेतील प्रचलित भावाच्या तुलनेत ऊसाला प्रति टन हमी भावाच्या तुलनेत अधिक दर देण्याच्या मागणीस तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय ऊस दर नियंत्रण समितीच्या बैठकीत झाला, अशी माहिती शेट्टी यांनी पत्रकारांना दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राने निश्चित केलेल्या हमी भावापेक्षा जादा दर देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले. गेल्या हंगामात राज्यातील नऊ कारखान्यांनी किमान हमी भाव दिला नव्हता. तसेच अशा कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची येणी आहेत, अशा कारखान्यांवर कायदेशीर कारवाईचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतल्याचेही शेट्टी यांनी उशिरा सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कर्तबगार महिलांचा ग्रंथरूपाने मागोवा हवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘लोकसंख्येत महिलांचे प्रमाण ५२ टक्क्यांहून अधिक असूनही त्यांची समाजात होणारी उपेक्षा ९० टक्क्यांइतकी आहे. त्यामुळे महिलांमधील कर्तृत्वाला उजेडात आणण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे. विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा ग्रंथरूपाने मागोवा घेतल्यास तो अमूल्य ठेवा होईल’ असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कै. (श्रीमती) शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया' या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.

डॉ. पवार म्हणाले, ‘विमलाबाई बागल यांनी कोल्हापुरात महिलांसाठी हॉस्पिटल व्हावे म्हणून आमरण उपोषण केले. त्यामुळेच सावित्रीबाई फुले हॉस्पिटल उभे राहिले. आज त्यांच्या कार्याचा विसर पडला आहे. अशा विस्मृतीत गेलेल्या कोल्हापुरातील कर्तृत्ववान महिलांच्या कर्तबगारीला सलाम करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ‘स्त्रियांनी सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे. क्रीडा क्षेत्रात महिलांचे प्रमाणही वाढत आहे. कर्तबगार महिलांच्या योगदानाचे संकलनासाठी प्रयत्न हवेत.’

शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले. चर्चासत्रासाठी विजया पाटील. वसुधा पवार, डॉ. प्रमिला जरग यांची भाषणे झाली. डॉ. भारती पाटील यांनी स्वागत केले. तर डॉ. निलांबरी जगताप यांनी आभार मानले. चर्चासत्रासाठी विजया पाटील, वसुधा पवार, दशरथ पारेकर, डॉ. विलास पवार, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदा पारेकर, डॉ. अवनिश पाटील, उदय गायकवाड, सूर्यकांत गायकवाड आदी उपस्थित होते. डॉ. नीलांबरी जगताप यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेक्कन ओडिसी धावणार डिसेंबरपासून

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

कोल्हापूर: देशी आणि परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेली राजेशाही डेक्कन ओडीसी गाडी डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. डिसेंबर ते एप्रिलपर्यंत ही गाडी धावणार असल्याने महाराष्ट्र आणि पर्यायाने कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. गेल्या वर्षी ब्रेक लागलेली डेक्कन ओडिसी गाडी पुन्हा धावणार असल्याने पर्यटकांना महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला साजेसा राजेशाही प्रवास सुरु होणार आहे.

ऑक्टोबर २०१६ पासून ही गाडी बंद होती. यंदाच्या हंगामात ६ नोव्हेंबरला ही गाडी कोल्हापुरात येणार होती. मात्र प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसल्याने नोव्हेंबर महिन्यातील फेरी रद्द करावी लागली. डेक्कन ओडिसी देशभरात जाते. स्थानिक पर्यटनासह संबंधित राज्यांना या राजेशाही गाडीची प्रतीक्षा असते. ही प्रतीक्षा आता संपणार असून डिसेंबरपासून देशभरात डेक्कन ओडिसी धावणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ही गाडी चालविण्यासाठी कॉक्स अँड किंग्ज लि. (सीकेएल) या पर्यटन कंपनीची ‘आउटसोर्स पार्टनर’ म्हणून नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांचे दर्शन घडवणाऱ्या ‘डेक्कन ओडिसी’ ला परदेशी पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असे. २६-११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पर्यटकांचा ओघ कमी होऊन ही गाडी बंद पडली. मात्र सुमारे आठ महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा या राजेशाही गाडीचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. एमटीडीसीने ही आलिशान गाडी पूर्णपणे व्यावसायिक तत्त्वावर चालविण्यासाठी कॉक्स अँड किंग्ज कंपनीशी ‘प्रॉफिट शेअरिंग’ तत्त्वावर भागीदारी केली. सर्व ‘ऑन-बोर्ड’ आणि ‘ऑफ-बोर्ड’ सेवा, विक्री, मार्केटिंग आणि या उपक्रमाचे व्यवस्थापन समाविष्ट असलेला हा भागीदारीचा करार करण्यात आला. पिवळ्या रंगाची नऊवारी साडी, महिला, लेझीम, तुतारीचा निनाद आणि पर्यटकांना हार घालून स्वागत केले जाते. पर्यटकांच्या आदरातिथ्य हे या शाही रेल्वेचे वैशिष्ट्य आहे. महिन्यात एक वेळा डेक्कन ओडिसीचा मुक्काम कोल्हापुरात असतो.

२०१६ पासून या गाडीने विश्रांती घेतली होती. आता पर्यटन हंगाम सुरू झाल्याने ही गाडी पुन्हा धावणार आहे. २००४ पासून सुरू झालेल्या या गाडीच्या आजअखेर ४० फेऱ्या झाल्या आहेत. डेक्कन ओडिसीमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होते. कोल्हापूरची खाद्यसंस्कृती, मर्दानी खेळ, कोल्हापुरी चप्पल, गूळांसह हॉटेल व्यवसायालाही यानिमित्ताने मोठी चालना मिळते.

००

देशभरातील पर्यटनस्थळांचे दर्शन

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचे दर्शन घडवणारी ‘डेक्कन ओडिसी’ देशात वेगवेगळ्या १० मार्गांवर धावते. ‘महाराष्ट्र स्प्लेंडर’ ही टूर मुंबई-औरंगाबाद, वेरूळ, ताडोबा, अजिंठा लेणी, नाशिक, कोल्हापूर, गोवा आणि परत मुंबई असा मार्ग आहे. ‘महाराष्ट्र वाइल्ड ट्रेल’ ही टूर मुंबई- अजिंठा लेणी, नागपूर- पेंच, ताडोबा, औरंगाबाद-वेरूळ लेणी, मुंबई मार्गावर धावते. ‘स्पिरिच्युअल सह्य़ाद्री’ ही मुंबई-नाशिक, शिर्डी, मुंबई मार्गावर धावते. ‘सोल क्वेस्ट’ ही टूर मुंबई-शिर्डी-मुंबई मार्गावर धावते. त्यासह ‘हिडन ट्रेझर्स ऑफ गुजरात’ ही आठ दिवस सात रात्रीची सहल मुंबई- वडोदरा, पलिताना, सासण, गीर, कच्छचे छोटे रण, पाटणा, अहमदाबाद, दिल्ली या मार्गावर धावते. दक्षिण भारतात ‘ज्युवेल्स ऑफ द डेक्कन’ ही आठ दिवस सात दिवसांची सहल असून मुंबई-विजापूर, ऐहोळे, पट्टदकल, बदामी, हंपी, हैदराबादमार्गे पुन्हा मुंबई असा तिचा मार्ग आहे. त्यासह ‘इंडियन सॉयरी’ ‘इंडियन ओडिसी’ ‘गोल्डन ट्रेझर्स’ ‘इंडियन सोजर्न’ या मार्गावरही अलिशान गाडी धावते.

००

राजेशाही अनुभव

राज्यातील पर्यटन विकासासाठी डेक्कन ओडिसी ही अलिशान रेल्वे भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाच्यावतीने सुरू करण्यात आली. पॅलेस ऑन व्हील्सच्या धर्तीवर जानेवारी २००४ मध्ये ही गाडी सुरु झाली. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरु होणारी डेक्कन ओडिसी २४०० किलोमीटर अंतर धावते. आठ दिवसांच्या प्रवासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अजिंठा-वेरुळ, जळगाव, नाशिक आणि परत मुंबई अशी पर्यटनस्थळे आहेत.

००

डेक्कन ओडिसीची वैशिष्ट्ये

४० जणांचा स्टाफ

स्पा, ब्युटी पार्लर, जीम, कॉन्फरन्स हॉल

पंचतारांकित रेस्टॉरंट

विविध पद्धतीच्या डिशेश

दोन किचन, १२ शेफ

दोन कोचमध्ये चार प्रेसिडेन्शियल रुम

८८ पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था

वायफाय, टिव्ही, २१ कोच, १० डिलक्स कोच ४० डिलक्स रुम

राज्यातील पर्यटन स्थळांचे चित्रांतून प्रतिबिंब

००


कोल्हापूरचे नाव जागतिक पातळीवर जाण्यासाठी डेक्कन ओडिसीची नीतांत गरज आहे. त्यासाठी राजकीय पातळीवर ठोस प्रयत्न होण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर पर्यटनाला अधिक चालना दिली पाहिजे. देशाची कला, संस्कृती आणि पर्यटनस्थळांचे दर्शन घडविणारा हा सुरक्षित प्रवास आहे. पर्यटनाच्या पुस्तकातून कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा जगभर पोहोचेल.

अरुणा देशपांडे, पर्यटन अभ्यासिका

००

नोव्हेंबर महिन्यापासून ही अलिशान गाडी पर्यटकांच्या सेवेत रुजू होण्याचे नियोजन होते. मात्र ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस सुरु राहिला. बदललेल्या वातावरणामुळे प्रवाशांनी नोंदणीला प्रतिसाद दिलेला नव्हता. मात्र डिसेंबरपासून ही गाडी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.

स्नेहल पाटुकले, समन्वयक, कॉक्स अँड किंग्ज लि.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयिताला घटनास्थळी फिरवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाळकरी मुलगा प्रदीप सरदार सुतार (वय ९, रा. मरळी, ता. पन्हाळा) याचे अपहरण करून रंकाळा परिसरातील खणीत ढकलून खून करणारा संशयित आरोपी विश्वास उर्फ प्रकाश बंडा लोहार (वय २४, रा. तिसंगी, ता. गगनबावडा) याला गुरुवारी पोलिसांनी तपासासाठी रंकाळा परिसरात फिरवले. दरम्यान, संशयिताने हा खून का केला? याचे गूढ अद्याप कायम आहे. मृत प्रदीपचा व्हिसेरा पुण्याला पाठवला असून, दोन दिवसात याचा अहवाल येण्याची शक्यता पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी वर्तवली आहे.

शाळकरी मुलगा प्रदीप याचे त्याच्याच काकाने रविवारी (ता. ५) संध्याकाळी मरळी येथील घरातून अपहरण केले होते. खाऊचे आमिष दाखवून त्याला कोल्हापुरात आणून संशयित विश्वास याने रंकाळ्यानजिक असलेल्या खणीत ढकलल्याची कबुली पोलिसांकडे दिली होती. यानुसार पोलिसांनी तपास करून मंगळवारी अपहृत प्रदीपचा मृतदेह शोधला. सीपीआरमध्ये प्रदीपच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याच्या शरीरावर कोणत्याही खुना आढळलेल्या नाहीत, मात्र त्याच्या छातीचे एक हाड मोडल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. पाण्यात ढकलल्यानंतर गुदमरून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, मात्र अन्य कारणांचाही शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. गुरुवारी पोलिसांनी संशयिताला रंकाळा परिसरात फिरवले, मात्र त्याने खून का केला याचे नेमके कारण पोलिसांना सांगितले नाही.

शोधकार्यातील मदतीबद्दल कृतज्ञता

रंकाळा परिसरातील खणीत प्रदीपला ढकलल्याची कबुली संशयित विश्वास लोहार याने दिल्यानंतर पोलिसांनी प्रदीपच्या शोधासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जीवनज्योती, व्हाइट आर्मी आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले होते. सर्वच तपास यंत्रणांनी दोन दिवस अत्याधुनिक साधनांसह तपासात पोलिसांना मदत केली. याबद्दल पोलिसांनी स्वयंसेवी संस्थाचे आभार मानले आहेत. उपविभागीय पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी बुधवारी प्रशस्तिपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीएसके’विरोधात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुण्यातील डीएसके ग्रुपमध्ये गुंतवलेली २० लाख रुपयांची रक्कम परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार बाजीराव दादोबा किल्लेदार (वय ६८, रा. महाराष्ट्रनगर, कळंबा) यांनी गुरुवारी (ता. ९) डीएसके ग्रुपच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. राजारामपुरी पोलिसांनी या फिर्यादीनुसार दीपक सखाराम कुलकर्णी, हेमंती दीपक कुलकर्णी आणि मुलगा शिरिष कुलकर्णी या तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

कोल्हापुरातील सहाशेहून अधिक गुंतवणूकदारांची डीएसके ग्रुपमध्ये सुमारे अडीचशे कोटींची गुंतवणूक आहे. ठेवींची मुदत संपल्यानंतरही गेल्या दीड वर्षांपासून पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिसांसह आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार अर्ज दिले होते. कळंबा येथील बाजीराव किल्लेदार यांनी २१ एप्रिल २०१४ ते २७ जून २०१७ या कालावधीत डीएसके फर्म व डीएसके प्रा. लि. या कंपनीत पत्नी भारती किल्लेदार यांच्या नावे १ लाख तर स्वत:च्या नावे ११ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. जून २०१७ पर्यंत या रकमेचे ७ लाख ५० हजार रुपये व्याज होते. मात्र डीएसके ग्रुपने केवळ २५ हजार रुपये व्याज दिले आहे. किल्लेदार यांचे मुद्दल व व्याज असे १८ लाख ८४ हजार ६६८ रुपये येणे बाकी आहे. त्यांनी पुणे येथे जाऊन दीपक कुलकर्णी यांची भेट घेतली, मात्र पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे दीपक कुलकर्णींसह हेमंती आणि शिरिष या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती ॲड. सत्यजित पवार यांनी दिली.

कोल्हापुरात ३०० हून अधिक गुंतवणूकदारांनी तक्रार अर्ज पोलिसांकडे दिले आहेत. या तक्रारींनंतर आता गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे पोलिस डीएसके ग्रुपची चौकशी करणार आहेत. कोल्हापुरातील कार्यालयात चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिस पुण्यात जाऊनही चौकशी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधावरून पडूनशेतकऱ्याचा मृत्यू

$
0
0

गारगोटी

दारवाड (ता.भुदरगड) येथे जनावरांसाठी गवताचा भारा आणण्यासाठी गेलेल्या शिवाजी साताप्पा कोकाटे (वय ४८) यांचा बांधावरून पडल्याने मृत्यू झाला. शिवाजी कोकाटे हे ‘माळ’ नावाच्या शेतात जनावरांसाठी गवताचा भारा आणण्यासाठी गेले होते. बांधावरून पाय घसरुन पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांसाठी गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते, पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांनीच पकडले चोरट्यास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना पोलिसांना चोरटे सापडत नसल्याने नागरिकच सतर्क बनले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुरुवारी आर. के. नगर परिसरात नागरिकांनी चोरट्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. नचित चौहाण (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) असे चोरट्याचे नाव असून, त्याचे दोन साथीदार पळाले आहेत. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. बुधवारी जामदार क्लब परिसरात नागरिकांनी एका चोरट्याला पकडले होते.

बुधवारी जामदार क्लब परिसरात दोन फ्लॅट फोडणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी पाठलाग करून पकडले. यातील दोघे पळाले, तर ग्यानशेखर शेट्टी हा चोरटा नागरिकांच्या हाती लागला. गुरुवारी आर. के. नगरातील अनुराधा आनंदराव पाटील (वय ६२, रा. प्लॉट नं. २३०, आर. के. नगर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून तीन चोरटे आत शिरले होते. शेजारी राहणारे सुनील जरग यांना चोरट्यांची चाहूल लागताच त्यांनी अंदाज घेतला. परिसरातील नागरिकांना बोलवून त्यांनी धाडसाने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरटे जवळच्या एका बंगल्याच्या परिसरात आडोशाला दडले होते. सुनील जरग, बाजीराव जरग, सुनील शिंदे, विक्रम रेपे यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन चोरटे हिसडा देऊन पळाले, तर नचित चौहाण हा नागरिकांच्या हाती लागला. नागरिकांनी संशयिताला बेदम चोप देऊन आर. के. नगर चौकीतील पोलिसांना बोलवले.

याची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला नागरिकांच्या तावडीतून सोडवून घेतले. जखमी संशयिताला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. त्याच्या इतर दोन साथीदारांचाही शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. चार दिवसांपूर्वीही अनुराधा पाटील यांच्या घरात चोरी झाली होती. याची पोलिसांनी केवळ कच्ची नोंद घेतली. ती चोरी याच चोरट्यांनी केल्याचा संशय आहे. गुरुवारी झालेल्या चोरीबाबत रणजित राजाराम काळे (वय ३५, रा. संभाजीनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

आठवड्यात पाच चोऱ्या

आर. के. नगर परिसरात चोरट्यांनी आठवड्यात पाच चोऱ्या केल्या आहेत. मात्र पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतल्या नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी अनुराधा पाटील यांच्या घरातून रोख पाच हजार रुपये, लॅपटॉप, कॅमेरा आणि साउंड सस्टिम असा सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. याची फिर्याद घेण्यास करवीर पोलिसांनी टाळाटाळ केली. केवळ कच्ची नोंद घेऊन फिर्यादींना माघारी पाठवले, अशी तक्रार रणजित काळे यांनी केली आहे.

गस्तीचे पोलिस गायब

पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षा पुरवणे अपेक्षित आहे. मात्र, पोलिसांकडून चोऱ्या रोखण्यासह झालेल्या चोऱ्यांची उकलही होत नाही. गस्तीचे पोलिस रस्त्यावर दिसत नाहीत. सायकल गस्तीचा उपक्रम अयशस्वी ठरला आहे. चोऱ्यांचे सत्र मात्र सुरूच असल्याने पोलिस नेमके काय करीत आहेत? असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. चोरट्यांना पकडून देण्याचेही काम नागरिकच करीत आहेत. तर नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीपूर्वी चोरटे पकडले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातून विद्यार्थी बचावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला कारने धडक दिल्याने रिक्षा उलटून सात विद्यार्थी जखमी झाले. गुरुवारी (ता. ९) सकाळी सव्वानऊच्या सुमारास रुईकर कॉलनी परिसरात वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या अपघातात सात विद्यार्थी जखमी झाले. संतप्त नागरिकांनी कारची मोडतोड करून कारचालकाला बेदम चोप दिला. कारचालक रणजित लक्ष्मण माळी (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सागर एकनाथ बाबर (वय २८, रा. कदमवाडी) हे रिक्षाचालक सकाळी सव्वानऊच्या सुमारास कावळा नाका, रुईकर कॉलनी येथून विद्यार्थ्यांना घेऊन कदमवाडीच्या दिशेने रिक्षा (एमएच ०९ सी डब्ल्यू ०२९४) निघाले होते. रुईकर कॉलनीतील शिवाजी तरुण मंडळासमोर आल्यानंतर रुक्मिणीनगरच्या दिशेने आलेल्या एका कारने (एमएच ०९ डीएम ४४८८) रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षा उलटल्याने सात विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यास चालढकल केल्यने संतप्त नागरिकांनी कारचालकास बेदम मारहाण केली. त्याचबरोबर कारचीही तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारचालकाला ताब्यात घेतले. सुदैवाने अपघातातील विद्यार्थी बचावले. किरकोळ जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अॅड. निकम यांची नियुक्ती करा

$
0
0

‘अमानुष मारहाण करून अनिकेत कोथळेचा बळी घेणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची जनमानसातून तीव्र शब्दात निंदा होऊ लागली आहे. गुरुवारी सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने व्यापक बैठक घेऊन राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशा मागण्या केल्या आहेत. ही समिती विविध पातळ्यांवर या मागण्यांचा पाठपुरावा करणार असून, यासंबंधीचे निवेदन मानवी हक्क आयोगासह सर्व सरकारी यंत्रणांना देण्यात येणार आहे,’ अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक सतीश टाकळकर यांनी दिली.
सांगलीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या व्यापक बैठकीत सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत घडलेल्या गंभीर प्रकाराचा निषेध करण्यात आला. या बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधींनी आपली मते मांडली. त्यानंतर सर्वानुमते सरकारले देण्यासाठी मागण्या निश्चित करण्यात आल्या. याबाबत टाकळकर म्हणाले,‘ राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा, सांगली जिल्हा पोलिस दलाची फेररचना करावी, पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अनिकेत कोथळे खून प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या प्रकरणाच्या दरम्यान जे कोणी कर्तव्यावर होते त्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी. विशेषतः पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची स्वतंत्रपणे चौकशी करावी. मृत अनिकेतच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी. कोथळे कुटुंबाला २५ लाख रुपयांची अर्थिक मदत द्यावी अशा प्रमुख मागण्या आम्ही निश्चित केल्या आहेत.’ ‘त्याचबरोबर पोलिसांवर असलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षकाची तत्काळ बदली करावी. अनिकेतच्या खुनातील संशयितांची प्राप्तीकर विभागाकडून चौकशी करुन त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेवर टाच आणावी, झीरो पोलिस ही संकल्पना हद्दपार करावी. सर्व पोलिस ठाण्यांमध्ये आणि चौक्यांमधील सीसीटीव्ही बसवून ते २४ तास कार्यरत राहतील याची खबरदारी घ्यावी, अशाही मागण्या या वेळी निश्चित करण्यात आल्याचे टाकळकर यांनी सांगितले. शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनीही गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाती पोलिसांचा निषेध केला.
सांगलीत घडलेल्या अनिकेत कोथळेच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेला कडक शिक्षा करावी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री असल्याने त्यांनाही या प्रकरणी सहआरोपी करावे, अशी मागणी मिरज विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार यांनी एका निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोथळे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी पुढे आलेल्या कोणालाही पोलिसांकडून धमकावण्याचा प्रयत्न झाल्यास संबधितांनी कृती समितीशी संपर्क साधावा. या प्रकरणात सर्वपक्षीय नेते माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतील. या प्रकरणामध्ये अनिकेतच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. त्यामुळे माहिती कृती समितीला द्यावी, असे टाकळकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयजी, एसपींच्या राजीनाम्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पोलिस कोठडीत संशयित आरोपीचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या सांगली पोलिसांनी पोलिस दलाच्या प्रतिमेला काळिमा फासला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर धाक नाही. त्यामुळेच पोलिस कायदा हातात घेत आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगली पोलिसांच्या गैरकृत्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामे द्यावेत,’ अशी मागणी शिवसेनेने गुरुवारी केली. सांगली पोलिसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासण्यात आले. सकाळी आयजी ऑफिससमोर निदर्शने करण्यात आली.

‘गेल्या दोन वर्षात सांगली पोलिस गैरकृत्यांमुळे चर्चेत आहेत. वारणा लूट, उस्मानाबादमध्ये जाऊन महिलेवर बलात्कार आणि आता पोलिस ठाण्यात संशयित आरोपीचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे असे गंभीर गुन्हे सांगली पोलिसांनी केले. जनतेचे रक्षण करण्याऐवजी तपासाच्या नावाखाली अमानुष मारहाण करून खून केले जातात. माणुसकीचा खून करणाऱ्या पोलिसांनी नैतिकता गमावली आहे. आयजी विश्वास नांगरे-पाटील आणि सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी याची गांभीर्याने देखल घेऊन राजीनामे द्यावेत, अन्यथा त्यांना पदावरून हटवण्याची मागणी मुख्यमंत्री, गृह राज्यमंत्र्यांकडे केली जाईल,’ असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिला.

जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ‘सांगलीसह कोल्हापूर पोलिसही वारणा लुटीच्या तपासात वादग्रस्त ठरले आहेत. पोलिसांनी आत्मचिंतन करून स्वतःची प्रतिमा सुधारावी, अन्यथा नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी भय निर्माण होईल,’ असे देवणे म्हणाले.

सांगलीतील पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासण्यात आले. आयजी नांगरे-पाटील पोलिस अधीक्षक कार्यालयातील बैठकीत असल्याने आंदोलकांची भेट झाली नाही. आयजी ऑफिसबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस निरीक्षक संजय मोरे, अशोक धुमाळ यांच्यासह शीघ्रकृती दलाची एक तुकडी बंदोबस्तासाठी होती. शिवसेनेचे शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, रवी चौगुले, प्रा. शिवाजीराव पाटील, दत्ताजी टिपुगडे, शशी बिडकर, संजय जाधव, कमलाकर जगदाळे, धनाजी यादव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images