Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ओपन टॉयलेट पाडणार

$
0
0


Gurubal.mali@timesgroup.com

tweet@:gurubalmaliMT

भरवस्तीत बांधण्यात आलेले ओपन टॉयलेट पाडण्याचा निर्णय महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेला स्वच्छ भारत अभियानात सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. मात्र शहराच्या आरोग्याकडे महापालिका गांभीर्याने पाहत नाही, हा विरोधाभास ‘मटा’ने ‘स्वच्छ भारत योजनेला महापालिकेचा हरताळ !’ या मथळ्याखाली शुक्रवारी दिलेल्या वृत्तात दाखवून दिला होता. यामध्ये शिवाजी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात उभारलेल्या ओपन टॉयलेटमुळे होणाऱ्या अनारोग्याकडे लक्ष वेधतानाच शहर स्वच्छ असल्याचा दिखावा उघडकीस आणला होता.

या वृत्ताची महापौर हसीना फरास यांनी तातडीने गंभीर दखल घेत महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत संबंधित टॉयलेट तातडीने पाडण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी सकाळी स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी या प्रश्नावर प्रशासनाला ही बाब गंभीर असून, तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानुसार सभापती डॉ. संदीप नेजदार यांनीही हे टॉयलेट पाडण्याचे आदेश दिले.

स्वच्छता अभियानात महापालिकेचा गौरव झाला आहे. याचे भान ठेवून नागरिकांच्या आरोग्याबाबत नेहमी दक्ष राहावे लागेल, असे सांगत महापौर फरास यांनी अनेक वर्षे बांधलेले हे ओपन टॉयलेट अधिकारी-पदाधिकाऱ्यांनाही कसे दिसले नाही, असा सवाल केला. तसेच तातडीने ते उद्‍ध्वस्त करण्याचे आदेश दिले. यामुळे गेले दहा वर्षे दुर्गंधीचा त्रास सहन करणाऱ्या सरनाईक कॉलनीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सरनाईक कॉलनीत लहान मुलांची सोय म्हणून हे ओपन टॉयलेट उभारण्यात आले होते, पण त्याचा सरसकट वापर होऊ लागला. भरवस्तीत सुरू झालेल्या या प्रकाराने भागातील नागरिकांना लाजेने मान खाली घालण्याची वेळ आली. प्रचंड दुर्गंधीमुळे या रस्त्यावरून येजा करणेही मुश्कील झाले. याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शुक्रवारच्या अंकात प्र‌सिद्ध केले. त्यानंतर महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आणि तातडीने हालचाली करत हे टॉयलेट पाडण्याचे आदेश देण्यात आले.

महापौरांनी बोलवली तातडीची बैठक

‘मटा’मधील वृत्ताची दखल घेत महापौरांनी बैठक घेतली. स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकाचे बक्षीस घेणाऱ्या शहरातच हा प्रकार असल्याचे निदर्शनास येताच खुद्द महापौरांनीच कपाळावर हात मारून घेतला. एवढी वर्षे हा प्रकार सुरूच कसा आहे? असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. ओपन टॉयलेट असणे ही शहराची बेअब्रूच आहे. ते तातडीने पाडा, असे आदेश त्यांनी दिले.

०००००००००००

नेजदारांनी भरला दम

स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी या प्रश्नावर अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शनिवारी संध्याकाळी हे टॉयलेट दिसता कामा नये, असा दमच त्यांनी अधिकाऱ्यांना भरला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी हे टॉयलेट पाडून टाकण्यात येईल, असे सांगितले.

======

पुरस्कार परत करण्याची

वेळ येऊ देऊ नका

हागणदारीमुक्त शहर योजनेत कोल्हापूरचा देशात पहिला क्रमांक आला आहे. हा पुरस्कार महापालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या अभिमानाने स्वीकारला, पण याच शहरात ओपन टॉयलेट सुरू असतील, तर ते गंभीर आहे. अशाने मोठ्या अ​भिमानाने घेतलेला हा सन्मान परत करण्याची वेळ महापालिकेवर येईल, असा इशारा महापौर फरास यांनी अधिकाऱ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीर जवान येलकर यांना भावपूर्ण निरोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

जम्मू-काश्मिरमध्ये कारगील सीमेवर झालेल्या अपघातात वीरमरण आलेले जवान प्रवीण तानाजी येलकर यांना शनिवारी सकाळी शासकीय इतमामात बहिरेवाडी (ता. आजरा) येथे साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी लष्करी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांसह पंचक्रोशीतील हजारो नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ‘वीर जवान प्रवीण अमर रहे’ च्या घोषणांनी आणि भरल्या डोळ्यांनी येलकर यांना निरोप दिला.

येथील भैरवनाथ हायस्कूलच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर लष्कर आणि पोलिसांच्या बंदूकीच्या फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर लहान भाऊ राजेंद्र यांनी प्रवीण येलकर यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. त्यावेळी अनेकांना आपले हुंदके अनावर झाले.

लडाख (जम्मू-काश्मिर) हून कारगिल सीमेवर दारुगोळ्याचे बॉक्स नेणारे वाहन बुधवारी (ता.११) सायंकाळी चारच्या सुमारास टायर फुटल्याने अपघातग्रस्त झाले. त्यामधील बॉक्सखाली दबले गेल्याने लान्सनायक येलकर जागीच मृत्यूमुखी पडले होते. याबाबतची माहिती समजल्यानंतर प्रवीण यांचे मूळगाव बेगवडे आणि आजोळ बहिरेवाडीसह तालुक्यावर शोककळा पसरली. प्रवीण यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी आणले जाणार होते. पण हवामान खराब असल्याने ते पार्थिव काल दिल्लीहून पुणे येथे व तेथून कोल्हापूरला रात्री तर आज पहाटे सहाच्या सुमारास बहिरेवाडी येथे प्रवीण यांचे मामा श्रीपती इंचनाळकर यांच्या घरामध्ये आणले. यावेळी प्रवीण यांचे पार्थिव पाहून येलकर, इंचनाळकर कुटुंबियांच्या भावना अनावर झाल्या. पत्नी पूनम, लहानगी मुलगी प्राजक्ता, आई शालन, वडील तानाजी, लहान भाऊ राजेंद्र यांच्यासह बेगवडेस्थित येलकर भाऊबंद व बहिरेवाडीस्थित इंचनाळकर नातलगांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. प्रवीण यांच्या स्मृती जागवताना सर्वांचेच हृदय हेलावून गेले.

पार्थ‌िव सकाळी सात वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर सव्वासात वाजता फुलांनी सजविलेल्या वाहनातून बहिरेवाडीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये लष्करी जवान, विद्यार्थी आणि ग्रामस्थ शिस्तबद्धपणे सहभागी झाले. यावेळी ‘अमर रहे, अमर रहे, प्रवीण येलकर, अमर रहे’, ‘भारतमाता की जय’,‘वंदे मातरम’ व ‘जबतक सूरज चाँद रहेगा, प्रवीण तेरा नाम रहेगा’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. भैरवनाथ हायस्कूलच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर प्रवीण यांचे पार्थिव ठेवल्यानंतर लष्करी अधिकारी व शासकीय प्रतिनिधींसह आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर कोल्हापूर येथील लष्कराच्या टी. ए. बटालियनने नायक सुभेदार उत्तम नाईक व कोल्हापूर पो‌लिस मुख्यालयाचे अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पथकांनी हवेत बंदुकीच्या तीन-तीन फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर पार्थिवास अग्नी देण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारे, आजरा व भुदरगडचे तहसीलदार, जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, वसंतराव धुरे, मारुती घोरपडे, सरपंच अर्जुन कुंभार, बेगवडे सरपंच सरिता पाटील, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भैरवनाथ हायस्कूलचे शिक्षक, तालुक्यातील आजी-माजी सैनिक, पुणे व मुंबईमधून आलेला प्रवीण यांचे मित्र आणि विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉँग्रेस प्रदेश कार्यकारिणीवरसाताऱ्यातून नऊ प्रतिनिधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीवर सातारा जिल्ह्यातून प्रतिनिधी म्हणून नऊ जणांना पाठविण्यात आले आहे. काँग्रेसचे आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील एका पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, माण मतदारसंघात जयकुमार गोरे काँग्रेसचे आमदार असतानाही माण-खटाव तालुक्यांच्या सभासद याद्या नसल्याचे कारण देत कोणाचेही नाव देण्यात आलेले नाही. परिणामी कॉँग्रेसचे विधान परिषद सदस्य, सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्यातील वाद आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेश प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कोरेगावातून अ‍ॅड. विजयराव कणसे, सातारा शहरातून रजनी पवार, सातारा तालुक्यातून प्रल्हाद चव्हाण, महाबळेश्वरातून मोहन भोसले, वाईतून मदन भोसले, खंडाळ्यातून बाळासाहेब बागवान, कराड उत्तरमधून अजित पाटील-चिखलीकर, फलटणमधून हिंदूराव निंबाळकर यांना प्रदेश समितीवर पाठविण्यात आले आहे.
आमदार गोरे भाजपच्या वाटेवर
माणचे काँग्रेस आमदार असलेल्या जयकुमार गोरेंना प्रदेश समितीत स्थान मिळालेले नाही. गोरे आक्रमक आहेत. त्यांना जिल्हाध्यक्षपद हवे होते, अशी दोन महिन्यांपूर्वीची परिस्थिती होती. मात्र, गोरेंना जोरदार विरोध असल्याने ते भाजपच्या संपर्कात गेल्याची चर्चा आहे. भाजप वाढीसाठी काम करीत असलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ते संपर्कात असल्याचेही येथे बोलले जाते. त्यामुळे आगामी काळात ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही येथील काँग्रेसच्या वर्तुळात आहे. त्यामुळेच काँग्रेसने गोरेंप्रती दुर्लक्षाची भूमिका घेतलेली असू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांनी आठ घरे फोडली

$
0
0

सांगली :
माधवनगर रस्त्यावरील शिवोदय नगर, लक्ष्मीनगर आणि माधवनगरमध्ये शनिवारी पहाटेपर्यंत चोरट्यांनी धुमाकूळ घालून आठ ठिकाणी चोरीचे प्रयत्न केले. पत्रकार दिलीप भिसे यांच्या घराचा पाठीमागचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ५२ हजार रुपयांचा ऐवज पळविला तर माधवनगरमधील बंद घरातून मोठा ऐवज लुटला गेल्याची शक्यता आहे. त्या घराचे मालक परगावी असल्याने नेमका किती रकमेचा ऐवज चोरीस गेला आहे, याची अधिक माहिती मिळू शकली नाही.
सांगलीत पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दिलीप भिसे यांच्या घरात चोरी केली. त्याच परिसरात अरुण गायकवाड, पत्रकार अविनाश कोळी यांच्या घरांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. काही घरांना बाहेरुन कड्या लावल्या. माधवनगरमधील भगत गल्लीत बापू गायकवाड, उल्हास गायकवाड, प्रदीप गायकवाड यांच्या घरात चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चोरट्यांनी गणपती पाटील यांचे गोदाम फोडले. जालिंदर पाटील यांच्या घराला बाहेरुन कड्या लावल्या. काही ठिकाणी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी अंगावरील पावसाने भिजलेली कपडे त्याच ठिकाणी टाकल्याचेही समोर आले आहे. संजयनगर पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणी श्वान पथकाच्या आणि ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केल्याचे पोलिस निरीक्षक भिंगारदेवे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओपन टॉयलेट अखेर पाडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने शिवाजी पेठेतील सरनाईक कॉलनीत उभारलेले ओपन टॉयलेट शनिवारी पाडून टाकले. भर वस्तीत ओपन टॉयलेट उभारून महापालिकेकडून नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड सुरू असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने गुरुवारी (ता.१२) प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शुक्रवारी महापालिकेत तातडीची बैठक होऊन शनिवारी हे टॉयलेट पाडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे ही कारवाई केली.

गेली दहा वर्षे दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरिकांनी हे टॉयलेट पाडल्यामुळे समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या प्रश्नाला वाचा फोडल्याच्या भावनाही नागरिकांनी बोलून दाखवल्या. शिवाजी पेठेत महापालिकेने भर वस्तीत ओपन टॉयलेट उभारले होते. ‘स्वच्छ भारत योजनेला महापालिकेचा हरताळ !’ या मथळ्याखाली प्रसिद्ध् झालेल्या बातमीने महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली. हागणदारीमुक्त शहर केल्याबद्दल महापालिकेला नुकताच देशपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. असे असतानाही भरवस्तीतील या टॉयलेटकडे दुर्लक्ष असल्याचा विरोधाभास निदर्शनास आणून दिला होता. या प्रश्नावर महापालिकेच्या स्थायी सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत तत्काळ ओपन टॉयलेट हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, अमर कांबळे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी दुपारी जेसीबीसह सरनाईक कॉलनीत दाखल झाले. काही वेळातच टॉयलेट पाडून टाकण्यात आले.

………..

स्वच्छतेत देशात सन्मान मिळवणाऱ्या कोल्हापुरात ओपन टॉयलेट असणे ही लाजिरवाणी बाब होती. त्यामुळे ‘मटा’ मध्ये बातमी वाचल्यानंतर धक्काच बसला. कोल्हापूरची अब्रू वेशीवर टांगण्याचा हा प्रकार असल्याने ते तातडीने पाडण्याचा आदेश दिले.

हसीना फरास, महापौर

..............

टॉयलेट पाडण्यासाठी दहा वर्षे वारवांर पाठपुरावा करत होतो. पण त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते. ‘मटा’ने वृत्त देताच प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली. त्यामुळे भागातील नागरिकांचा मोठा प्रश्न सुटला आहे. यामुळे ‘मटा’ला धन्यवाद!

महेश सावंत, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

परतीचा पाऊस, नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, मंदीच्या लाटेच्या चर्चेतही दिवाळी सण दणक्यात साजरी करण्यासाठी बाजारपेठेत शनिवारी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. महाद्वार रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी या बाजारपेठेत ग्राहकांच्या उंदड प्रतिसादामुळे व्यापारीपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवाळीला अवघे दोन दिवस बाकी असताना गेल्या आठवड्यात ग्राहकांच्या प्रतीक्षेत बाजारपेठ दिसून आली. फराळ तयार करण्यासाठी किराणा माल दुकानात गर्दी दिसत होती. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार, बोनस, अॅडव्हान्स दिल्याने बाजारपेठेत गर्दी दिसू लागली आहे. शनिवारी महाद्वार रोडवरील दुकानदार सुट्टी घेतात, पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने उघडी होती. सकाळपासूनच तयार कपडे, शूज, किराणा माल दुकानात ग्राहकांची गर्दी होती. सलग दोन दिवस शनिवारी व रविवारी सुट्टी आल्याने शहरातील नागरिकांनी गांधीनगर बाजारपेठेकडे मोर्चा वळवला.

संध्याकाळपर्यंत पावसाने विश्रांती घेतल्याने महाद्वार रोड सायंकाळी गर्दीने ओसंडून वाहत होता. छोट्या विक्रेत्यांनी गेले चार दिवस रस्त्याच्या कडेने दुकाने थाटली आहेत. पापाची तिकटी व पानलाइन आकाशकंदिलाच्या प्रकाशात उजळून गेली होती. पापाची तिकटी परिसरात पणत्या, रांगोळी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. पापाची तिकटी ते महाद्वार रोडवरील कपड्यांची शोरुम हाउसफुल होती. तसेच रस्त्यांवर मांडलेल्या मालाचाही चांगला उठाव झाला. ताराबाई रोडही हाउसफुल्ल होता.

राजारामपुरी मुख्य रस्त्यावरही ग्राहकांची गर्दी होती. ब्रॅँडेड शोरुममध्ये नवीन फॅन्सी कपडे खरेदीसाठी तरुणाईची गर्दी होती. जनता बाजार चौकात आकर्षक राजस्थानी पणत्या खरेदीला चांगला प्रतिसाद होता. खरेदीनंतर राजारामपुरी पहिल्या गल्लीतील खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थांचा घमघमाट ग्राहकांना खेचत होता. शाहूपुरी पाच बंगला परिसरातही तयार कपड्यांच्या शोरुममध्ये गर्दी होती. ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद चौक ते वृषाली हॉटेल रस्त्यावरील कपडे, शूजच्या दुकानात खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

००००००००००

पावसाने विरजण

संध्याकाळपर्यंत शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी दिसत होती. मात्र साडेआठच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने उत्साहावर विरजण घातले. अचानक सुरू झालेल्या पावसाने ग्राहकांसह विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर मांडलेले साहित्य प्लास्टिक कागदाने सुरक्षित करेपर्यंत आलेल्या पावसाने बऱ्याचजणांचे साहित्य भिजून गेले. संध्याकाळी उशीरा खरेदीसाठी आलेल्यांनी खरेदीचा बेत रद्द करून घरी जाणे पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतींसाठी आज मतदानसाडेदहा लाख मतदार बजावणार हक्क

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ५८ ग्रामपंचायतींची, २९ सरपंचांची आणि ३८९ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज, सोमवारी उर्वरीत एकूण ३९५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५ लाख ५५ हजार ८ पुरूष तर ५ लाख ११ हजार ११ स्त्री, असे एकूण १० लाख ६६ हजार २८ मतदार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून, जादाचा बंदोबस्तही तयार ठेवण्यात आला आहे. एकूण १ हजार ९२६ मतदान केंद्रे असून, २ हजार १४८ केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १, २ व ३ प्रत्येकी १ हजार २४८ व शिपाई २ हजार १४८, अशा एकूण १० हजार ७५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथके, व्हिडिओ चित्रीकरण पथके, स्थिर निरीक्षण आणि व्हिडिओ निरीक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
वाळव्यात अतिसंवेदनशील मतदान केंद्रे
३४४ मतदान केंद्रे संवेदनशील तर १६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. अतिसंवेदनशील केंद्रापैकी १६ मतदान केंद्रे ही वाळवा तालुक्यातील आहेत. मतदान व मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मेमरी चिप, अशी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. मतमोजणी मंगळवारी, १७ रोजी मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ओढ्याच्या पुरातमाजी सैनिकाचा बुडून मृत्यू

$
0
0

कराड :
पाटण तालुक्यात झालेल्या तुफानी पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात मारुल हवेली विभागातील कोरीवळे येथील माजी सैनिकाचा बुडून मृत्यू झाला. पांडुरंग भाऊ पाटील (वय ७५) असे वाहून गेलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.
पाटण तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून दररोज दुपारी किंवा सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान तालुक्यातील बहुतांशी भागात तुफानी पाऊस कोसळला. तब्बल एक ते दीड तास कोसळणाऱ्या या पावसामुळे कोरीवळे येथील पांडुरंग भाऊ पाटील (वय ७५) ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाहून गेले. पाटील जनावरे घेऊन रानात गेले होते. अचानक दुपारच्या दरम्यान पावसाने तुफान सुरुवात केल्यामुळे या परिसरातील ओढे, नाले भरून वाहू लागले. घराकडे परतताना वाटेत असलेल्या ओढ्याला पूर आला होता. या पुराच्या पाण्यातून पलीकडे जाताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पांडुरंग पाटील वाहून गेले.
त्यांचा मृतदेह सुमारे दीड किलोमीटर अंतरावर ओढ्याकाठी सापडला. रात्री उशीरा त्यांच्यावर कोरीवळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
काढणीला आलेली पिके वाया
पावसाने कराडसह पाटण तालुक्यांतील अनेक गावांना जोरदार झोडपून काढले आहे. या पावसाने हाताशी आलेली पिके वाया केली आहेत. भात, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग यासारखी पिके पूर्ण तयार झाली असल्याने त्यांची काढणी करण्याच्या वेळेतच परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजीत बुधवारपासून राष्ट्रीय खो-खो स्पर्धा

$
0
0

इचलकरंजी -

इचलकरंजी रोटरी क्लब व कोल्हापूर खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व महेश क्लबच्या सहकार्याने इचलकरंजी येथे २५ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत ५१ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३३ राज्यातील पुरुष व महिलांचे मिळून ६६ संघ सहभागी होणार असल्याची माहिती मनीष मुनोत व कोल्हापूर जिल्हा खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तब्बल ३६ वर्षानंतर प्रथमच वस्त्रनगरीत सिनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा होणाऱ्या जिम्नॅशियम मैदानाला ‘छत्रपती राजर्षि शाहू महाराज क्रीडानगरी’ असे नाव देण्यात आले असून पुरूष व महिला अशा दोन गटांसाठी देशभरातून सुमारे १३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. तर सामन्यासाठी पंच व पदाधिकारी मिळून १५० सदस्य असणार आहेत. स्पर्धेसाठी एकूण चार मैदाने तयार करण्यात आली असून पैकी एक मॅटचे व तीन मातीची असतील. सकाळी ७ ते १० आणि दुपारी ४.३० ते ९.३० या दोन सत्रात स्पर्धा होत असून ११६ साखळी सामने होणार असून त्यानंतर बाद फेरीचे ३० सामने होतील.

२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. तर २९ रोजी सायंकाळी अंतिम सामना संपल्यानंतर स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ शिक्षण मंत्री विनोद तावडे व विजय गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. स्पर्धेच्या स्वागत कमिटी अध्यक्षपदी आमदार सुरेश हाळवणकर यांची तर कार्यकारी समिती अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी सायंकाळी प्रारंभी सर्व सहभागी संघातील खेळाडूंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिम्नॅशियम मैदानापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये इचलकरंजीतील सर्व आजी-माजी खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

स्पर्धेत दररोज प्लेअर ऑफ डे, उत्कृष्ठ खेळाडू अशी बक्षीसे वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. जवळपास २० हजार प्रेक्षक बसतील अशी गॅलरी उभारण्यात आली आहे. पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंची रहाण्याची व्यवस्था तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे, असे शेवटी मुनोत व उरूणकर यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा. एस. एस. नलवडे, श्यामसुंदर मर्दा, ओमप्रकाश छापरवाल, प्रकाश रावळ, महेंद्र मुथा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काच्या घरात दिवाळी

$
0
0

Appasaheb.Mali@timesgroup.com
Tweet : @Appasaheb_MT

कोल्हापूर : बँकांनी जाहीर केलेल्या आकर्षक कर्ज योजना, पूर्णत्वास येत चाललेले बांधकाम प्रकल्प, ग्राहकांसाठी उपयुक्त ठरलेली केंद्र सरकारची योजना, ‘रेसा’मधील तरतुदी आदींतून रिअल इस्टेट क्षेत्राला बुस्ट मिळाल्याचे चित्र आहे. तर हक्काच्या घरकुलाच्या शोधात असलेल्या आणि गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्यांना कोल्हापूर हे उत्तम डेस्टीनेशन असल्याचे एका सर्व्हेतून स्पष्ट झाले आहेत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या शहरांत एकूण २०९ गृहप्रकल्पांची उभारणी सध्या सुरू आहे. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘रेरा’ प्रा​धिकरणकडील नोंदीनुसार जिल्ह्यात तब्बल ७४५५ फ्लॅट्सचे (युनिट) बांधकाम सध्या सुरू आहे. त्यातील पूर्णत्वास पोहोचलेल्या फ्लॅट्सची संख्या पाहता दिवाळीत अनेकांची दिवाळी फ्लॅट-रो-हाउसच्या माध्यमातून हक्काच्या घरात साजरी होणार आहे.

बांधकाम क्षेत्राला आर्थिक शिस्त लावताना आणि व्यवसायात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी एक मेपासून ‘रेरा’ कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. राज्य सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ‘महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण’ची स्थापना केली. प्राधिकरणकडील नोंदीत जिल्ह्यातील २०९ गृहप्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरातील सुमारे १६० बांधकाम व्यावसायिकांनी आपआपल्या गृहप्रकल्पांची प्राधिकरणकडे नोंदणी केली आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिकांची प्रमुख संस्था असलेल्या ‘क्रेडाई’ संस्थेचे १४२ सभासद आहेत. रिअल इस्टेटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल, रोजगार निर्मिती होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बांधकाम परवाना व इतर शुल्क मिळून नगररचना विभागाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडली. या व्यतिरिक्त व्यक्तिगत पातळीवर प्रकल्प उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संख्या ७०हून अधिक आहे.

दुसरीकडे राज्य सरकारने, कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीऐवजी कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ४२ गावांसाठी कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्रा​धिकरणची स्थापना केली. नागरी विकास प्राधिकरणात समाविष्ठ असलेल्या विविध गावांत सुमारे ४५ गृहप्रकल्प सुरू आहेत. हे बांधकाम व्यावसायिक संघटना स्थापण्याच्या विचारात आहेत. सद्यस्थितीत पाचगाव, कळंबा, वडणगे, उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, उजळाईवाडी येथे बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

‘क्रेडाई’ करणार कोल्हापूरचा सर्व्हे

बांधकाम व्यावसायिकांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रेडाईतर्फे ३० ऑक्टोबरपासून शहर आणि उपनगरातील गृहप्रकल्पांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. खासगी एजन्सीतर्फे महिनाभरात हा सर्व्हे होईल. सुरू असलेले बांधकाम प्रकल्प, वन-टू-थ्री बीएचके तयार फ्लॅट्स,, बंगलोची तपशीलवर माहिती संकलित करण्यात येणार आहे. शहराच्या कुठल्या भागात आणि कोणत्या प्रकारच्या युनिटला जास्त मागणी आहे याची माहिती क्रेडाईकडे उपलब्ध होईल. त्याचा फायदा व्यावसायिकासह ग्राहकांना करून दिला जाणार असल्याचे क्रेडाईच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षभरात शहर-जिल्ह्यात २९९६ फ्लॅट्सची विक्री झाली आहे.

बांधकाम व्यवसायासाठी सध्या पोषक वातावरण आहे. ‘रेरा’ कायद्यामुळे ग्राहकांत या क्षेत्राविषयीचा विश्वास आणखी वाढला. नोंदणीकृत प्रकल्प, मुदतीत ताबा मिळण्याची शंभर टक्के खात्री यामुळे ग्राहक गुंतवणूक करत आहेत. कोल्हापूरसह पुण्यातही गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

- महेश यादव, अध्यक्ष क्रेडाई कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जानेवारीत मराठा मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबई येथे निघालेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळाला राज्य सरकारने सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. दोन महिन्यांनंतरही मराठा समाजाची एकही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पुढील दोन महिन्यांत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा जानेवारी महिन्यात गांधी मैदान येथे मेळावा घेण्याचा निर्णय मराठा जागृती व आत्मचिंतन मेळाव्यात घेतला.

रविवारी शाहू स्मारक भवन येथे सकल मराठा मूक मोर्चाच्या वर्षपूर्तीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ व स्वराज मराठा भवन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा जागृती व आत्मचिंतन मेळावा पार पडला. मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी ‘मूक आंदोलन की ठोक आंदोलन’ अशी विचारणा करताच संपूर्ण सभागृहाने ‘ठोक आंदोलना’ची आक्रमक भूमिका मांडली. यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, ‘समाजाने मोर्चाच्या माध्यमातून शांतता आणि राष्ट्रवाद दाखवून दिला आहे. देशाची साधनसंपत्तीचा नाश करायचा नाही, म्हणून शांततेने मोर्चे काढले. मात्र आता काहीजण समाजात फूट पडली आहे, अशी आवई उठवून मागण्या पूर्ण होणार नाहीत, असे सांगत आहेत. वास्तविक मुंबई मोर्चातील शिष्टमंडळाला कोणतेही आश्वासन दिले नाही, पण व्यासपीठावर येवून काहींनी मागण्या पूर्ण झाल्याची घोषणा केली. ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक होती. मराठा समाजाच्या मागण्यांसह शिवाजी महाराजांचे स्मारक, शेतकरी कर्जमाफी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह आदी मागण्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत.’

आमदार सतेज पाटील म्हणाले,‘२०१४ मध्ये राज्य सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर या निर्णयाला ११ महिन्यांची स्थगिती मिळाली. आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थगिती मिळण्याचा देशातील एकमेव निर्णय असून रस्त्यावरील लढाइबरोबर न्यायालयीन लढाइसाठी स्वतंत्र टीमची आवश्यकता आहे. स्थगिती घेणारा व्यक्तींचे कोणाशी लागबांदे आहेत, स्थगिती संपताच हा व्यक्ती पुन्हा स्थगिती कशी मिळवतो? समाजाचा मोर्चा मूक असल्याने सरकारपर्यंत आवाज पोहोचला नाही. आवाज पोहोचवण्यासाठी संघर्ष हा एकमेव मार्ग आहे. मराठ्यांच्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढवण्याचे काम सध्या सुरू आहे.’

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘मागासवर्ग आयोग व कोर्ट सरकारच्या इशाऱ्यावर चालत असताना, सरकारने मागण्यासंदर्भात समाजाचा फुटबॉल केला आहे. सरकारला आरक्षण द्यायचे नसल्यास जाट, गुर्जर, रजपूत समाजासारखी भूमिका घ्यावी लागेल. दिल्लीच्या तख्ताला हादरा देण्यासाठी रेल्वे रोको सारखे आंदोलन हाती घेण्याची आवश्यकता आहे.’

यावेळी रेहना नदाफ, सई पाटील, प्राचार्य शिवाजीराव भुकेले, मारुती मोरे (आजरा), दत्ता पाटील, उत्तम चव्हाण (राधानगरी), चंद्रकांत पाटील, रविराज निंबाळकर (भुदरगड) यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास शैलजा भोसले, प्रा. विद्या साळोखे, डॉ. संदीप पाटील, अॅड. गुलाबराव घोरपडे, व्ही. के. पाटील, उत्तम जाधव, डॉ. प्रदीप पाटील, सुनील पाटील, इंद्रजित सावंत यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रंगराव पाटील यांनी शाहिरी पोवाड्यातून मराठा समाजाच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक इंद्रजीत माने यांनी तर सूत्रसंचालन शिरीष जाधव यांनी केले. उत्तम जाधव यांनी आभार मानले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

मराठा मोर्चाला सुरुवात झाल्यापासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील रोज नवनवीन घोषणा करत आहेत. त्यांच्या सर्व घोषणा फसव्या असून मराठा आमदार असून ते समाजाची फसवणूक करत आहेत. त्यामुळे त्यांनी पाटील नाव लावण्याचे बंद करुन कोल्हापूरच्या जनतेने त्यांना ‘दादा’ नावाने बोलवू नये, अशी संतप्त भावना प्रा. सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. प्रा. देसाई यांच्या वक्तव्याला सभागृहांने टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला.


कार्यकर्त्यांची जोरदार एंट्री

समाजाच्या मागण्यांसाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्यानंतरही मागण्यांची पूर्तता झालेली नाही. त्याचे पडसाद जागृती मेळाव्यात उमटले. सर्वच कार्यकर्ते आक्रमक आंदोलनाची भूमिका मांडत असताना इंद्रजित शिरगावकर यांनी तलवार घेऊनच कार्यकर्त्यासह व्यासपीठावर प्रवेश केला. त्यामुळे संयोजकांसह उपस्थितांनाही काय होत आहे, याची कल्पना नव्हती. शिरगावक यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत तलवार मुळीक यांच्याकडे सुपूर्द करत आक्रमक आंदोलन हाती घेण्याची विनंती केली. अचानक झालेल्या या घोषणामुळे अनेकजण अचंबित झाले.

१५ ऑक्टोबर क्रांतीदिन साजरा करावा

कालबाह्य अभ्यासक्रमांना सरकारच्या सवलती

अडीच वर्षात समितीची बैठक नाही

दिल्लीच्या तख्ताला हादरा देऊ

आंदोलनात फूट पाडण्याचे षडयंत्र

एकाही जिल्ह्यात वसतीगृहाचे भूमिपूजन नाही

शांततामय भूमिका अंगलट

आक्रमक आंदोलनाची अपेक्षा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतातील खोपीवरटस्करचा हल्ला

$
0
0

आजरा

आजरा तालुक्यातील टस्करच्या नुकसानीचे सत्र आता पेरणोली विभागात सुरू झाले आहे. शनिवारी रात्रीपासून येथे पिकांचे नुकसान सुरू आहे. रात्री येथील परिसरातील नावलकरवाडी येथे तानाजी नावलकर यांच्या शेतात पिकांची राखण करण्यासाठी बांधलेल्या खोपीवर टस्करने हल्ला केला. यामध्ये संपूर्ण खोप उध्वस्त झाली. नावलकर कुटुंबातील कोणी नेहमीप्रमाणे राखणीला न गेल्याने मोठा अनर्थ टळला. जीवितहानी झाली नसली तरी, यामुळे पेरणोली परिसरात शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे.

गेल्या काही महिन्यात वेळवट्टी व हाळोली परिसरात नुकसान सत्र अवलंबलेला टस्कर पेरणोली परिसरात सरकला आहे. तेथेही आता ऊस, भात, भुईमूग, नाचना आदी पिकांसह काजुच्या झाडांचे नुकसान त्याने आरंभले आहे. शनिवारी त्याने तानाजी नावलकर व शिवाजी नावलकर यांच्या शेतातील भात व नाचना पिकांची मोठी नासाधूस केली आहे. यामुळे या दोघांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. यानंतर टस्करने इतरत्र मोर्चा वळवून आनंदा सासुलकर, अशोक सासुलकर, पांडुरंग सासुलकर यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. वन विभागाचे नुकसानीचे पंचनामे करण्या व्यतिरिक्त आता कसलेही नियंत्रण राहिलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय अंगलट आल्यानेच रद्द

$
0
0

इचलकरंजी-

संस्थानकालीन इतिहास असलेली शाळेची वास्तू पाडून त्याजागी व्यापारी संकुल उभारण्याचा घाट सत्ताधारी भाजप आघाडीच्या चांगलाच अंगलट आला आहे. जनतेतून तीव्र विरोध होणार ही शक्यता गृहीत धरून तूर्तास या विषयाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप आघाडीच्या सदस्यांनी देखील याला विरोध दर्शविल्याने सोमवारी होणाऱ्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर कोणतीही चर्चा केली जाणार नाही.

सोमवारी(ता.१६) नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. त्यामध्ये मेन रोडवरील ऐतिहासिक वास्तू असलेल्या सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन विद्या मंदिर क्रमांक दोन या शाळेची इमारत पाडून त्याजागी व्यापारी संकुल उभारण्याचा विषय घेण्यात आला आहे. त्याला कॉग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी विरोध केला होता.

शाळेची वास्तू जमीनदोस्त करून त्या जागी व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय अंगलट येणार म्हटल्यावर सत्तारूढ भाजप आघाडीने या विषयावर सभागृहात चर्चा न करण्याचा निर्णय घेतला. या विषयाला भाजपाचाही विरोध असल्याचा बचावात्मक पवित्रा घेत जनतेसोबत भाजप राहील असे सांगण्यात आले.

भाजप आघाडीकडून असा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव सभेसमोर आणला आहे. पण भाजपच्या पार्टी बैठकीमध्ये सर्वच सदस्यांनी त्याला विरोध दर्शविला. इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत गोविंदराव घोरपडे यांनी ही शाळा उभारली असून त्याला ऐतिहासिक वारसा आहे. शिवाय शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. त्यामुळे ही वास्तू पाडून त्याजागी व्यापारी संकुल उभारण्याचा प्रश्नच येत नाही. ही वास्तू पाडण्याचा भाजपचा कोणाताही हेतू नसून या शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असा पवित्रा घेत भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी या विषयावर सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला. सभेमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचे सांगत यावर पूर्णविराम दिला.

...........

कोट

‘नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस ही सर्व विचाराअंती आणि नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या स्वाक्षरीने काढली जाते. त्यामुळे नगराध्यक्षांना अंधारात ठेवून प्रशासनाने हा विषय सभागृहापुढे आणला असे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी केलेला खुलासा हा बालिशपणा म्हणावा लागेल. केवळ अर्थ शोधण्याकडेच यांचे लक्ष असते. संस्थानकालीन इमारत असताना त्याचा विसर व्हावा हे दुर्दैव म्हणावे लागेल. जनतेचा तीव्र विरोध झाल्यानेच सत्तारूढ आघाडीवर हा विषय रद्द करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली. हा एका व्यक्तीचा नव्हे इचलकरंजीच्या जनतेचा विजय आहे.

शशांक बावचकर, नगरसेवक, काँग्रेस

................

चौकट

विषय रद्दची हॅटट्रीक

एखाद्या विषयावर जनतेतून रोष व्यक्त होऊ लागल्यावर त्यातून माघार घेण्याची परंपरा यावेळीही कायम राहीली. यापूर्वी शहरातील बंद दारू दुकाने सुरू करण्यासाठी बोलविलेली विशेष सभा जनतेमया रेट्यामुळे रद्द करावी लागली. त्यानंतर बाजार कर वसूली ठेक्याला फेरीवाला व छोट्या व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने तो देखील विषय दोन वेळा रद्द करावा लागला. त्यानंतर वाढीव घरफाळा प्रश्नी बोलविलेली सभादेखील अचानकपणे रद्द केली होती. आता ऐतिहासिक शाळेची वास्तू पाडण्याचा विषय रद्द करून सत्तारूढ आघाडीने विषय चर्चेला आणून त्यातून माघार घेण्याची हॅटट्रीक कायम ठेवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरी चप्पल होणार कोटिंगयुक्त

$
0
0

कोल्हापूर : बारमाही कोल्हापुरी चप्पल वापरण्यासाठी कोटिंगयुक्त कोल्हापूर चप्पलसाठी सुपर हाड्रोफोबिक लेदर फुटवेअरसाठी पेटंट फाइल केले आहे. पेटंट मिळविण्यासाठी लागणारा जीआय क्रमांक मिळाला असून अन्य प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत या संशोधनाला पेटंट मिळेल असा दावा शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी दिग्विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

पाटील म्हणाले, ‘गेली दीड वर्षे कोल्हापुरी चप्पल संदर्भात संशोधन सुरु होते. कोल्हापुरी चप्पलवर बेस आणि टॉप कोट करुन एक तासांची प्रक्रिया केली. रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर चांगल्या दर्जाची कोल्हापुरी चप्पल

तयार झाली. कोल्हापुरी चप्पलला पावसाळ्यात बुरशी होते. अनेकदा मऊ होऊन खराब होते. नव्या संशोधनानुसार तयार झालेल्या चप्पलवर पावसाळ्यात काहीही परिणाम होणार नाही. या चप्पलवर पाणी, चिखल, आम्ल आणि तेलाचा परिणाम होऊ शकत नाही. पेटंटच्या कायद्यानुसार शहराच्या नावावरुन पेटंट मिळू शकत नाही. नव्या संशोधनाच्या नावात लेदर फूटवेअरचा उल्लेख केल्याने लेदर बूट, लेदर चप्पल आदी प्रकारचे फुटवेअर येतात. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलचा समावेश आहे.’

यावेळी डॉ. उर्मिला पाटील, आर. आर. पाटील, रंगराव पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत सात जणांना मोक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संघटित गुन्हेगारी करून खून, मारामारी, खंडणी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या इचलकरंजीतील पीआर बॉईज व जिंदाल टोळीतील सात जणांना कोल्हापूर पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९) लावला आहे. रविवारी सायंकाळी मोक्का लावल्याची घोषणा पोलिसांनी केली. प्रवीण दत्तात्रय रावळ, अजित आप्पासो नाईक, श्रीधर विद्याधर गस्ती, किशोर सुरेश जैद उर्फ जिंदाल, शाहरूख अरिफ सुतार, सूरज अब्दुल शेख, केशव संजय कदम अशी मोक्का लावलेल्या गुंडाची नावे आहेत. या कारवाईने इचलकरंजी शहर व हातकणंगले तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्हेगारांची कुंडली काढून त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही वर्षात इचलकरंजीत गुंड टोळ्यांच्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी गुंडांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. इचलकरंजी परिसरात हप्ता वसूल करणे, सुपारी घेऊन खून करणे, अपहरण, अंमली पदार्थांची विक्री, दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मोक्का लावण्याची सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी आरखडा तयार केला. त्यानुसार इचलकरंजी शहापूर, हातकणंगले परिसरात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या पीआर बॉईज व जिंदाल टोळीच्या विरोधात इचलकरंजीचे पोलिस उप अधीक्षक विनायक नरळे, शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. एल. डुबल यांनी मोक्का लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे- पाटील यांच्याकडे पाठवला होता. माणगांववाडी (ता. हातकणंगले) येथील विनायक राजेंद्र माने याचा जिंदाळ टोळीने खून केला होता. जिंदाल व पीआर बॉईज टोळीच्या वाढत्या कारवाईला पायबंद घालण्यासाठी मोक्का कारवाई करण्यास नांगरे-पाटील यांनी परवानगी दिली. त्यानंतर पीआर बॉईज टोळीच तपास जयसिंगपूरचे पोलिस उप अधीक्षक रमेश सरवदे व गडहिंग्लज विभागाचे आर. आर. पाटील यांनी तपास करत आहेत. दोन्ही टोळ्यांच्या विरोधात नागरिकांनी तक्रारी कराव्यात अथवा तपासी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

पोलिसांकडे तक्रार करा

संघटित गुन्हेगारी टोळ्या, लॅन्ड माफिया, खासगी सावकर, फाळकूटदादा यांच्याविरोधात नागरिकांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केली. नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रार करावी अथवा पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिट आयलंडमुळे पावसाची बरसात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाची तीव्रता वाढत असली, तरी सिमेंटचे रस्ते आणि घरांमुळे हिट आयलंड तयार होत आहे. कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे तयार होणार हिट आयलंडच प्रचंड पावसाला कारणीभूत आहे. कार्बन उत्सर्जनासाठी सध्या जोरात सुरू असलेली वृक्षामोहिमेचे फायदे मिळण्यास आणखीन दहा वर्षांच्या कालावधी लागणार आहे. त्यामुळे किमान दहा वर्षे तरी अवकाळी पडणाऱ्या पावसाचे फटके सहन करावे लागणार आहेत.

बेसुमार वृक्षतोडीबरोबरच विकासाच्या गोंडस नावाखाली सिमेंट रस्ते, बहुमजली इमारती, शोरुमसाठी वापरण्यात येणाऱ्या काचेच्या तावदानामुळे उष्णतेमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात हिट आयलंड तयार होत असून त्याचा परिणाम वातावरणावर होत आहे. उष्णतेचे शोषण होऊन हवा तापली जावून पोकळी तयार होते. हवेमध्ये तयार झालेल्या पोकळीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन आर्द्रतेमध्ये वाढ झाल्यानंतर पावसाला सुरुवात होते. मानवनिर्मित कारणामुळे अशी स्थिती निर्माण झाल्यांमुळेच कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली.

वृक्षारोपण मोहिमेवेळी यामध्येही स्थानिक पातळीवरील किंवा ज्या-त्या परिसरातील वृक्षांचे रोपण, संवर्धन करमे आवश्यकता असतानाही परदेशी वृक्षांची लागवड केली जात असल्याने २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन रोखण्याचे हाती घेतलेले ध्येय सफल होईल, अशी शक्यता कमीच दिसते. ‘प्रबोधनाच्या माध्यमातून स्थानिकपातळीवरील वृक्षांची लागवड केल्यास कार्बन उत्सर्जन रोखणे शक्य आहे. या वृक्षांपासून फायदे होण्यास सुरुवात होण्यापूर्वी पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे पर्यावरणशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सांगितले.’

हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरांमध्ये कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे इशान्यकडून नैऋत्य दिशेला वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. त्याचवेळी दक्षिण गोलार्धामध्ये तापमान कमी झाले आहे. त्यामुळे परतीचा पाऊस अडकून पडला आहे. ऋतुचक्रातील बदल असला, तरी या परिस्थितीला जागतिक तापमान वाढ कारणीभूत आहे. त्यामुळेच पडणारा पाऊसही असमान आणि कोठेही पडत आहे. ‘ऋतुचक्रातील बदलामुळे नेहमीच्या पर्जन्यमानाच्या दिवसांतही पावसांमध्ये असमतोलपणा निर्माण झाला आहे. असमतोलपणा कमी करण्यासाठी जंगलाखालील क्षेत्रामध्ये वाढ करण्याची आवश्यकता भूगोल विषयाचे प्रा. सुनील भोसले यांनी व्यक्त केली.’

गेल्या काहीवर्षात बेसुमार वृक्षतोड झाली. कमी झालेल्या जंगलक्षेत्राचा केवळ घरेबांधणीसाठी वापर होत नसून शेतीसाठी वापर वाढला आहे. या कारणांमुळे असमतोलपणा निर्माण झाला असून पाऊसमानामध्ये अनियमितता निर्माण झाली आहे. त्याबरोबर हिंदी व बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टाही सध्याच्या पावसाला कारणीभूत आहे.

प्रा. सुनील भोसले, विवेकानंद कॉलेज

जागतिक वातावरणातील बदलाप्रमाणे स्थानिक वातावरणामध्येही बदल होत आहेत. दिवसभर उष्णतेमध्ये वाढ झाल्यानंतर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वारे अडवले जातात. त्यामुळे हिट आयलँड तयार होऊन कोठेही पाऊस पडतो. पाऊसमानातील बदल रोखण्यासाठी जीवनशैलीबरोबरच त्या-त्या परिसरातील पोषक वृक्षांचे रोपण करण्याची आवश्यकता आहे.

प्रा. डॉ. पी. डी. राऊत, विभागप्रमुख पर्यावरणशास्त्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदपत्राअभावी लटकली चौकशी

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

कोल्हापूर : महापालिकेने, कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची प्राथमिक टप्प्यात चौकशी केली, कुणावर सक्तीच्या रजेवर पाठविले तर कुणाच्या वेतनवाढी रोखल्या. अफरातफर आणि दफ्तर दिरंगाईवरुन निलंबनाची करत खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले. प्रशासनाने गेल्या वर्ष, दीड वर्षाच्या कालावधीत सुमारे वीस जणांच्या चौकशीचे आदेश दिले पण चौकशी अधिकाऱ्यांकडे संबंधित कर्मचाऱ्यांवरील दोषारोपत्र, कागदपत्रे, ऑफ‌िसमधील सहकाऱ्यांच्या साक्षी यासाठी कुठल्याही हालचाली केल्या नाहीत. खातेनिहाय चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली, पण कागदपत्राअभावी चौकशीच लटकली आहे.

प्रशासनातील काही अधिकारी मुद्दामहून वेळकाढूपणा करत दोषींना पाठीशी घालण्यासाठी खटाटोप करत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. केएमटी वर्कशॉप, आरोग्य विभाग, अस्थापना विभाग अशा विविध विभागातील अधिकारी, लिपिक, कनिष्ठ लिपीक आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. दोन कर्मचारी नोकरी संपवून सेवानिवृत्त झाले पण प्रशासनाकडून मुदतीत कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने त्यांची खातेनिहाय चौकशीच झाली नाही. प्रशासनाने गेल्याच आठवड्यात, केएमटी वर्कशॉप अधीक्षक एम. डी. सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर आजवर दोषी ठरलेल्या प्रकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशीत अडथळे का निर्माण केले जात आहेत? अशी विचारणा नगरसेवक व कर्मचाऱ्यांतून होत आहे. महापालिका प्रशासनाने, खातेनिहाय चौकशीसाठी दोघा वकिलांची नियुक्ती केली आहे. पण त्यांच्याकडे प्रशासनाकडून मुदतीत कागदपत्रे उपलब्ध केली जात नाहीत, माहिती सादर केली जात नसल्याचे सामोरे आले आहे. दोषारोपपत्र आणि चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता मुदतीत झाली असती तर दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना अंतिम कारवाई निश्चित झाली असती, याकडे काही जण लक्ष वेधत आहेत.


अधीक्षकापासून झाडू कामगारापर्यंत...

महापालिकेत अफरातफर, सातत्याने गैरहर राहणे, वरिष्ठांचा आदेश डावलणे अशा कारणाखाली सध्या अधीक्षकापासून झाडू कामगारापर्यंत जवळपास २० जण खातेनिहाय चौकशीच्या टप्प्यात आहेत. यामध्ये केएमटी वर्कशॉप एम. डी. सावंत, सातत्याने गैरहजर राहणारे वाहक तुकाराम खेचरे, अल्लाउद्दीन सनदी, आरोग्य विभागातील लिपिक सुरेश सूर्यवंशी, कर्मचारी गीता चव्हाण, अंजना हेगडे, संदीप कांबळे, रंजना सावनूर, दीपक कांबळे अशोक लोंढे, अमर होलार, उदय कांबळे, दत्तात्रय कांबळे, दीपक जाधव, संतोष इंगवले यांच्या चौकशीचे आदेश आहेत. विभागाकडून त्यांच्यापैकी अनेकांचे अजून दोषारोप पत्र तयार झाले नाही, चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे पुरविली नाहीत. यामुळे अंतिम कारवाई होऊ शकली नाही. प्रशासकीय पातळीवलर चौकशीचा फार्स सुरु असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

शिक्षा संपवून कामावर हजर

महापालिकेने, प्राथमिक टप्प्यात दोषी आढळल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना निलंबित केले. काहींना सक्तीच्या रजेवर पाठविले. या कालावधीत संबंधित विभागाकडून चौकशीसाठी कागदपत्रे सादर न झाल्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी होऊ शकली नाही. मात्र​ प्रशासनाने सुनावलेला शिक्षेचा कालावधी संपल्यामुळे कुणी नगररचना विभागात, कुणी अस्थापना विभागात तर कोण रचना व कार्य विभागात पुन्हा रुजू झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीला उधाण

$
0
0

कोल्हापूर : लहान मुलांच्या कपड्यांच्या विविध व्हरायटी, तयार फराळापासून सजावटीच्या साहित्यांची रेलचेल, फेरीवाल्यांच्या स्टॉलवर मिळणाऱ्या हरेक प्रकारच्या वस्तू आणि अख्ख्या परिवारासह दिवाळी खरेदीचा आनंद लुटणारे नागरिक असे आनंददायी चित्र कोल्हापूरच्या बाजारपेठेत रविवारी दिसले. बाजारपेठेत रविवार खरेदीचा वार ठरला. महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, पापाची तिकटी, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बिंदू चौक परिसरात खरेदीला अक्षरश: उधाण आले होते. ग्राहकांची गर्दी, फेरीवाल्यांनी मोठ्या संख्येने थाटलेले स्टॉल यामुळे महाद्वार रोड हाऊसफुल्ल झाला होता. दुपारी बारानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

सोमवारपासून दीपावली सणाला प्रारंभ होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या. शनिवारी रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांचा हिरेमोड झाला. खरेदीसाठी एकच दिवस उरल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत रेलेचेल होती. महाद्वार रोड, गुजरी, लक्ष्मीरोड, ताराबाई रोड, राजारामपुरी या

शहरातील प्रमुख बाजारपेठा. दुपारी तीननंतर बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली. महाद्वार रोड, ताराबाई रोडवर सायंकाळी पाय ठेवायलाही जागा नव्हती. सजावटीचे साहित्य, तयार फराळ, पणत्या, लहान मुलांचे कपडे, सुगंधी उटणे, साबण, परफ्युमस अशा साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. या रस्त्यावर हजारो फेरीवाल्यांनी थाटलेले विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल आणि खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.

सजली साड्यांची दालने

ब्रँन्डेड कपड्यांची बाजारपेठ म्हणून राजारामपुरीची ओळख तयार झाली आहे. राजारामपुरीत नामाकिंत कंपन्यांची शोरुम्स उभारली असून ग्राहकांच्या आवडीचे केंद्र बनले आहे. तर लक्ष्मी रोडवर तयार कपडे आणि साड्यांचे शोरुम्स हे आकर्षण आहे. लक्ष्मी रोडच्या दोन्ही बाजूच्या दुकानातील प्रशस्त दालन, साड्यांच्या असंख्य व्हरायटीज यामुळे महिलांची गर्दी वाढत आहे. महाव्दार रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, शिवाजी रोड, स्टेशन रोडवरील दुकानांनी साड्यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध केल्या आहेत. पारंपरिक काठापदराच्या साड्या, पेशवाई, पैठणी, धर्मावरम, कांचीवरम या साड्यांना महिलाकडून मोठी मागणी असते. महिला वर्गाची आवडनिवड ओळखून फॅशनेबल साड्याही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

दिवाळीला दिव्यांची रोषणाई, आकाश कंदिलाच्या लखलखाटांनी सारा परिसर उजळतो. घरोघरी सजावट केली जाते. पणत्या, आकाश कंदिल, रंगीबेरंगी लाइट माळा, पणत्या या सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ उजळली आहे. फेरीवाल्यांनी प्रमुख चौक, सजावट साहित्यांचे स्टॉल थाटून धुमधडाक्यात विक्री केली. पापाची तिकटी ते महापालिका चौकापर्यंतच्या मार्गावरील दोन्ही बाजूची दुकाने कंदिल सजावटीने सजली होती. १५० ते २०० रुपयांपासून आकाश कंदिल विक्रीसाठी होते.​


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूर परिसरास पावसाने झोडपले

$
0
0

जयसिंगपूर

जयसिंगपूर शहर व परिसरास रविवारी सायंकाळी ढगफुटीसदृश पावसाने झोडपले. सुमारे सव्वातास पडलेल्या पावसामुळे शहरातील गटारी तुंबल्या. रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले. रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहक व विक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. अनेक घरात पाणी शिरले तर अनेक इमारतींच्या तळघरास तलावाचे स्वरूप आले.

सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आकाशात काळे ढग जमल्याने काळोख निर्माण झाला. विजांच्या कडकडाटासह पावसास सुरूवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे रविवारच्या आठवडी बाजारात भाजी विक्रेते व ग्राहकांची तारांबळ उडाली. ढगफुटीसदृश पावसाने सव्वातास झोडपून काढले. पावसामुळे शहरातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. लक्ष्मीरोड लगतच्या घरांबरोबरच, शाहूनगर, प्रियदर्शनी कॉलनी मधील घरामध्ये पाणी शिरले. काडगे मळ्यातील धन्वंतरीनगरमध्ये आवळेकर हॉस्पिटलपरिसरास रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली.

शहरातील पोस्ट कार्यालयाजवळ कोल्हापूर, सांगली महामार्गावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. हॉटेल अजिंक्यजवळ विद्युत वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. शहरामया पश्चिमेस मनीषा अॅटोमोबाईलजवळ रस्त्यावर तब्बल तीन फूट पाणी आल्याने परिसरास तळ्याचे स्वरूप आले. शाहूनगरमधील महाराष्ट्र चौक परिसरातही पाणी साचले. बसस्थानक परिसरासह लक्ष्मीरोडवर महावितरण कार्यालयामया पिछाडीस परिसर जलमय झाला. लक्ष्मीरोड लगतच्या अनेक अपार्टमेंटमध्ये तळघरात पाणी शिरले. सुमारे सव्वातास झालेल्या पावसाने जयसिंगपूर, दानोळी, कोथळी, उमळवाड, चिपरी, जैनापूर, संभाजीपूर, उदगाव, शिरोळ परिसरास झोडपले. पावसामुळे काहीकाळ जनजीवन ठप्प झाले. तर विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठा’प्रश्नी आंदोलनाचा निर्धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यभरात गेल्या दीड वर्षांपासून काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चानंतर राज्य सरकारकडून आश्वासनांचे गाजरच दाखवले जात असल्याबाबत मराठा समाजाच्या संतप्त भावना आहेत. शांततेने मोर्चा काढूनही सरकार जर मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत नसेल तर तीव्र आंदोलन करावे लागेल, असे इशारा देत मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाचा विराट मेळावा घेण्यात येणार आहे. कोल्हापुरातील मूक मोर्चाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रविवारी आत्मचिंतन आणि जागृती मेळाव्यानिमित्त एकत्र आलेल्या मराठा समाजाने पुढील दिशा स्पष्ट केली.

दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर जेथे एक वर्षापूर्वी मूक मोर्चाची सांगता झाली, तेथेच उभे राहून रविवारी मराठा समाजाने ‘आत्मचिंतन’ केले. यामध्ये आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्याबरोबरच समाजातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. वर्ष झाले तरी आरक्षण व अन्य मागण्यांबाबत काहीच पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आता भविष्यात एकजुटीने तीव्र आंदोलन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सरकार सकारात्मक नाही, त्यामुळे समाजाने एकजूटीने सरकारकडून मागण्या मान्य करुन घ्याव्या लागणार आहेत. यासाठी संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरुन लढाई करावी लागेल, असे सांगून आता आंदोलनानेच हक्क मिळवावे लागतील, असा इशाराच दिला आहे. कोल्हापुरातील व मुंबईतील मोर्चात कोल्हापुरातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. त्यामुळे या मोर्चानंतर पुढे काय? असाच सवाल समाजातील सारेजण उपस्थित करत होते. त्यामुळे पुढील भूमिका ठरविण्यात आली.

सायंकाळी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने जागृती मेळावा झाला. यात सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. आमदार पाटील, आमदार क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात शांततेचा मार्ग अंगलट आल्याच्या भावना व्यक्त करत समाजातील खदखद बाहेर पडली. ‘जी आश्वासने दिली, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. हा प्रकार पाहता सरकार काही देण्याच्या मनस्थितीत आहे, असे दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकत्र येऊन समाजाची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे’ असे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यासाठी जानेवारीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विराट मेळावा घेऊन आंदोलनाच्या मार्गावर वाटचाल करण्याचे सूतोवाच यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images