Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आंदोलन तीव्र करण्याची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील मराठा क्रांती मूक मोर्चास एक वर्षे पूर्ण झाले. तरीही अनेक आश्वासनांची पुर्तता झालेली नाही. त्यामुळे भविष्यात एकजुटीने मराठा समाजाने आंदोलन तीव्रपणे करण्याची गरज आहे, असा सूर रविवारी आत्मचिंतन कार्यक्रमात उमटला. येथील दसरा चौकात मराठा क्रांती मूक मोर्चास एक वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित आत्मचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘कोल्हापुरातील मोर्चास एक वर्षे पूर्ण झाले. मात्र आरक्षण द्यायचे नसल्याने सरकार न्यायालयाकडे बोट दाखवत आहे. त्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळे भविष्यात रस्त्यावरील लढाई करून आरक्षण मिळवावे लागणार आहे. तीव्र आंदोलन करून ज्याप्रमाणे टोलचे भूत घालवले तसे आंदोलन करून आरक्षण मिळवावे लागेल. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व्यापक बैठक घ्यावी. त्यामध्ये एकसंघपणे लढ्याची दिशा स्पष्ट करावी.’

आमदार सतेज पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी शांततेत मोर्चा काढला. मात्र आरक्षणासाठी सरकार सकारात्मकतेने प्रयत्न करताना दिसत नाही. यामुळे पुढील लढ्यात विविध राजकीय विचार बाजून ठेऊन सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.’

सुरेश पाटील, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई यांनीही आंदोलन आणि मागण्यासंबंधीच्या पाठपुराव्याची माहिती दिली.

बाबा पार्टे, जयेश कदम, फत्तेसिंह सावंत, जयेश चव्हाण, चंद्रकांत पाटील, राजवर्धन यादव, जयदीप शेळके, महेश जाधव, संपत पाटील, गणी आजरेकर, अवधूत अपराध, अभिजित राऊत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विठुरायाच्या दर्शन रांगेत इंटरनेट सुविधा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

दर्शनाच्या रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना येथे बीएसएनएल कंपनीचा अँटिना उभारून हॉट स्पॉट उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय भाविकांसाठी शहरात ५ ठिकाणी शुद्ध पाण्याचे एटीएम उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेले मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.

कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदा कार्तिकी यात्रा २५ ऑकटोबर ते ४ नोव्हेंबर या काळात भरणार असून त्यामध्ये दर्शन रांगेसाठी बॅरीकेटिंग करणे व लोखंडी उड्डाणपूल उभारणे, तात्पुरते पत्राशेड उभे करणे, खाजगी सुरक्षा व्यवस्थेसाठी कमांडो तैनात करणे, दर्शन मंडपापासून ते पत्राशेडपर्यंत जादा सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, दर्शन रांगेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरची व्यवस्था करणे, दर्शन मंडपामध्ये दशमी, एकादशी व द्वादशीला मोफत चहाची व्यवस्था करणे, पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसादाची व्यवस्था करणे, देणगी जमा करून घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे, स्वच्छता व्यवस्थेचे चांगले नियोजन करणे हे निर्णय घेण्यात आले. कार्तिकी यात्रेला येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी २१ ऑक्टोबरपासून ऑनलाइन दर्शन व्यवस्था बंद केली जाणार असून २५ ऑक्टोबरपासून विठुरायाचे २४ तास दर्शन व्यवस्था सुरु केली जाणार आहे. आजच्या बैठकीला अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, मंदिर समिती सदस्य नगराध्यक्षा साधना भोसले, गहिनीनाथ महाराज औसेकर, भास्करगिरी महाराज, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरी, सचिन आधटराव, प्रांताधिकारी विजय देशमुख उपस्थित होते. मंदिर समिती सदस्य आमदार राम कदम बैठकीला गैरहजर होते. मंदिर समिती स्थापन झाल्यापासून त्यांनी एकाही बैठकीला हजेरी लावलेली नाही.

दरम्यान, मुंबईचे भाविक डॉ. नोझेर शेरियार यांनी मंदिराला नोटामोजणी यंत्र भेट म्हणून दिले आहे. हे नोटामोजणी यंत्र समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सांगली ८५ टक्के मतदान; आज ठरणार गावचे कारभारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या ४५३ ग्रामपंचायतींपैकी ४२५ ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी मतदान झाले. कुठेही फेरमतदानाची मागणी पुढे आलेली नसल्याचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी सांगितले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी सुमारे ८५ टक्के मतदान झाले. बहुतेक मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावून मतदानात भाग घेतला. थेट सरपंचपदाची निवडणूक प्रथमच होत असल्याने सदस्यांचे बहुमत एकाकडे तर सरपंचपद दुसऱ्या गटाकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मिरज तालुक्यातील ३८, तासगाव २६, कवठेमहांकाळ २७, जत ७८, आटपाडी २१, खानापूर ४५, कडेगाव ४२, पलूस १५, वाळवा ८३ आणि शिराळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी प्रत्यक्षात मतदान झाले. बहुतेक ठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याने दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५७.९३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाची आकडेवारी ७२ टक्क्यांच्या आसपास गेली. अखेरच्या टप्प्यात उरला-सुरला, शेतामळ्यात दूरवर असलेल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धांदल उडाली होती. एकूण १९२६ पैकी ३४४ मतदान केंद्रे संवेदनशील होती. त्यापैकी अतिसंवेदनशील १६ मतदान केंद्रे एका वाळवा तालुक्यातील होती. चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तासगाव तालुक्यात खासदार संजय पाटील आणि दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या दोन गटात जोरदार चुरस आहे. त्या ठिकाणी आबा-काका असा सामना असल्याचे बोलले जाते. सोमवारी मतदान सुरू असताना मणेराजुरी, आरवडे गावात दोन गटांत शाब्दिक चकमकी उडाल्या. चिंचणीत बोगस मतदान करण्यासाठी आल्याच्या संशयावरुन पाय काढण्याची भाषा वापरल्याने दोन गट आमने-सामने भिडले. तणाव निर्माण झाला होता, परंतु मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला. मणेराजुरीत दगड फेकून मारल्याने एक जण जखमी झाला. परंतु या बाबत तक्रार घेऊन कोणीही पोलिसांपर्यंत गेले नाही.
आज मतमोजणी
आज, मंगळवारी मतमोजणी होणार आहे. त्यासाठीही सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मिरज तालुक्यातील ग्रामपंचायतींची मोजणी शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार मिरज, तासगाव- बहुउद्देशीय हॉल तहसीलदार कार्यालय तासगाव, कवठेमहांकाळ- एस. एम. ज्युनिअर कॉलेज कवठेमहांकाळ, वाळवा- सरकारी धान्य गोदाम (जुने तहसीलदार कार्यालय आवार) इस्लामपूर, शिराळा- औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिराळा, खानापूर- बळवंत कॉलेज विटा, आटपाडी- नवीन प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय आटपाडी, कडेगाव- महात्मा गांधी विद्यालय कडेगाव, पलूस - लक्ष्मणराव किर्स्लोस्कर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पलूस, जत- तहसीलदार कार्यालयासमोरील सरकारी धान्य गोदाम या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

मतदान रांगेत
महिलेचा मृत्यू
मिरज
मिरज तालुक्यात तालुक्यातील खटाव येथे मतदानासाठी रांगेत उभा असताना चक्कर येऊन महिलेचा मृत्यू झाला. सोनाबाई जीवाप्पा जत्ती (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. मतदान करण्यासाठी सोनाबाई जत्ते रांगेत उभ्या असताना त्यांना चक्कर आली. ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी त्यांना वाहनातून घरी पाठवले. मात्र, घरी जात असताना त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैलगाडी शर्यतींसाठीसाताऱ्यात आंदोलन

$
0
0

सातारा
सातारा येथे सोमवारी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पेटा या प्राणीमित्र संघटनेने राज्य सरकारच्या कायद्याला आव्हान दिले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात बैलांसह चालक-मालक, शेतकरीही सहभागी झाले. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
धनाजी शिंदे म्हणाले, मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे सुरूच ठेवण्यात येणार आहे. अगदी दिवाळी आंदोलनस्थळी करावी लागली तरी चालेल. सरकारकडून मागण्या मान्य करण्यासंदर्भात पुढाकार घेतला जात आहे. मात्र, प्राणीमित्र याला विरोध करण्याचे काम करीत आहेत. तालुक्यातील दोनशेहून अधिक बैलगाड्या चालक-मालक आपल्या बैलांसह यामध्ये सहभागी झाले आहेत. चार वर्षे शर्यतींसाठी लढत आहोत. आता कोणत्याही परिस्थिती मागे हटणार नाही. प्राणीमित्र संघटनेवर बंदी घालावी आणि शर्यती सुरू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरातला पावसाने नुकसान

$
0
0


सोलापूर
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याला या पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, बळीराजावर आभाळ कोसळले आहे. रब्बीच्या पेरण्यांना मोठ्या प्रमाणावर ब्रेक लागला आहे. वीज पडून जनावरेही दगावली आहेत. अक्कलकोट तालुक्यात एका मुलाचा वीज पडून बळी गेला आहे. एकूणच परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे.
मोहोळ पोलिस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे एक गाय, बार्शी तालुक्यात एक म्हैस, करमाळा तालुक्यातील सावडी गावात तीन गाई आणि भांबुर्डी गावात एक खिलार जातीची गाय मरण पावली. या तालुक्यात तूर आणि उडीद पिकांचे मोठे नुकसान झले आहे. बार्शी तालुक्यात सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. भीमा नदीला पूर आल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील १२ गावांचा कर्नाटकाशी असलेला संपर्क तुटला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथे अंगावर वीज कोसळून सविता बाळासाहेब शिंदे आणि त्याची कन्या पूजा शिंदे या मायलेकी जखमी झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापूसखेडमध्ये जमावबंदीवाळव्यात हाणामारी, दगडफेक अन् पोलिसांचा लाठीमार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील वाटेगाव, ऐतवडे खुर्द, कापूसखेड या गावांत दोन गटात वादावादी, काही ठिकाण हाणामारीचे प्रसंग घडले. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी वाटेगाव, ऐतवडे खुर्द, कापूसखेड येथे सौम्य लाठीमार केला. दुपारी घडलेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर कापूसखेडमध्ये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे माजी सभापती रवींद्र बर्डे यांच्या गटाशी विरोधी गटातील काही युवकांनी वादावादी केली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर चाल करून दगडफेक केली. दगडफेकीत दोन्ही गटांतील युवक जखमी झाले आहेत. राजू पाटील या युवकाच्या कानाच्या मागील बाजूला दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. कापूसखेड येथे दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. जमाव पांगवण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकडीने लाठीमार केला. या लाठीमारात काही नेते आणि कार्यकर्त्यांना प्रसाद मिळाला. ऐतवडे खुर्द येथेही जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. माणिकवाडी येथे मतदान केंद्रात दोन गटांच्या कार्यकर्त्यांच्या जोरदार वादावादी झाली. पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करून वाद मिटवला. तालुक्यातील वारणा पट्ट्यातील कणेगाव, शिगाव, कोरेगाव, बहादुरवादी, बागणी या गावांत किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत घडल्या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात एकही तक्रार दाखल झालेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात चरणचेतीन मतदार ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ आराम बस आणि ट्रकच्या अपघातात ग्रामपंचायत मतदानासाठी येणाऱ्या शिराळा तालुक्यातील चरण गावातील तिघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत.
संदीप पवार, उमेश बाबा नायकवडे आणि तानाजी पांडुरंग नायकवडी, अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. आराम बस चालक दिनेश कोळसे गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
शिराळा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी येत असलेले मतदार बसच्या मागे उभे होते. त्या वेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. बसच्या मागे उभ्या असलेल्या प्रवाशांपैकी तिघांचा दोन्ही वाहनांमध्ये चिरडून मृत्यू झाला. श्रीपती गणपती पवार (वय ६०) प्रवीण काशिनाथ नायकवडी (वय २४) हिंदुराव दगडू नायकवडी (वय ४८) प्रथमेश सुभाष शिंदे (वय १४) बाबाजी पांडुरंग नायकवडी (वय ४२ सर्व रा. चरण) अहुब बाबू (ट्रक चालक वय ३८ रा. चेन्नई) दिनेश किसन कोळसे (वय २३ रा. चरण) हे सात जण जखमी झाले. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना निगडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराभोवती ग्रा. पं. साठी इर्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादावादीमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या पोलिसांवरच धावून जाण्याचा प्रकार झाल्याने जमावाला पांगवण्यासाठी वडणगे येथे पोलिसांचा सौम्य लाठीमार करावा लागला. ही घटना वगळता टोप, पुलाची शिरोली, गांधीनगर,उचगाव,उजळाईवाडी ,सरनोबतवाडी, वसगडे आदी गावांमध्ये शांततेत मतदान झाले. ​दक्षिण विधानसभा मतदार संघातील अतिसंवेदनशील असलेल्या पाचगावमध्ये प्रचंड चुरशीने मतदान झाले असून दिवसभर मतदान केंद्राजवळ समर्थकांची गर्दी होती. त्यामुळे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पाचगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपप्रणित आघाड्यांबरोबर शिवसेना तसेच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे सरपंचपदापासून सदस्यपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. सोमवारी दिवसभर ही चुरस मतदान केंद्रावर दिसत होती. सकाळपासून मतदान केंद्राजवळ मतदारांची तसेच समर्थकांची गर्दी झाली होती. केंद्राच्या आवारात कोणतेही वाहन तसेच नागरिकांना थांबण्यास मज्जाव केला जात होता. विविध आघाड्यांचे कार्यकर्ते लॅप​टॉप, मोबाइल अॅपद्वारे कोणत्या केंद्रावर तसेच कोणत्या खोलीमध्ये मतदान आहे हे सांगण्यासाठी कार्यरत होते. अनेक मतदारांची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर गेल्याने त्यांना नाव शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. अनेकांना तर एकाच केंद्रावर नेमक्या कोणत्या खोलीमध्ये मतदान आहे हे समजत नव्हते. यामुळे निवडणूक यंत्रणेबाबत संताप व्यक्त केला जात होता. सायंकाळपर्यंत केंद्रावर गर्दी होती. मात्र दिवसभर कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. १६,२२८ मतदानापैकी १० हजार २६८ मतदान झाले.

त्याबरोबर उचगाव सारख्या संवेदनशील गावातही शांततेत मतदान झाले. येथील लढत ही दोन आमदारांमधील प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे. वडणगे येथे दुपारी दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरात वादावादी झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्न झाल्याने पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीमार करून राखीव दलास पाचारण केले.त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. टोप येथे चौरंगी लढत असून मोठी चुरस पहायला मिळाली. येथील केंद्रावर महिलाची लक्षणीय उपस्थिती होती. किरकोळ वाद वगळता येथे शांततेत मतदान झाले. उजळाईवाडी येथे गावठाण भागातील फक्त १२०० मतदान असून बाकी उपनगर भागातील ४ हजार, ३०० मतदान असल्याने येथे गावातील प्रमुख गट तसेच उपनगर यांच्यात सामना होणार आहे.उच्चभृ वस्ती असल्याने येथे उपनगर वगळता गावात चुरस पाहण्यास मिळाली. गांधीनगर या व्यापारपेठ भागात महिलांनी मतदानासाठी मोठा सहभाग घेतल्यामुळे ५३ टक्के मतदान झाले. बहुतांश व्यापाऱ्यांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली होती. वसगडे गावात सरपंच पदासाठी एकूण नऊ उमेदवार उभा राहिल्याने याठिकाणी बहुरंगी लढत पाहायला मिळाली.

शिरोलीत तणाव

पुलाची शिरोली येथे मतदान पेट्या घेऊन जाण्यासाठी एक खासगी शिक्षण संस्थेच्या आलेल्या गाड्यांना सरपंच पदाचे उमेदवार शशिकांत खवरे यांनी याच संस्थेच्या गाड्या का म्हणून तीव्र विरोध केल्यामुळे येथे काही काळ तणाव पसरला होता. त्यामुळे एक तासभर पेट्या हलवल्या नव्हत्या. शेवटी खवरे यांच्या कार्यकर्त्यानी या पेट्या घेऊन जाणाऱ्या बसच्या मागे आपल्या वाहनांचा ताफा ठेवून पेट्या सुरक्षितपणे मतमोजणी केंद्रापर्यंत जातील याची दक्षता घेतली.

मतदानाची टक्केवारी

पाचगाव ६५

वडणगे ८४.५

भुये ९३.८६

टोप ८९.२१

पुलाची शिरोली ८१.७

उजळाईवाडी ७७.९७

उचगाव ७१.६१

गांधीनगर ५३.०७

वसगडे ८६.१२

चिखली ८९.९६

आंबेवाडी ९१.१८

सादळेमादळे ९३.६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने ८५ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी चुरशीने, ईर्ष्येने ८४.९१ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान गगनबावडा तालुक्यात झाले. दरम्यान, शिरोळ तालुक्यातील काही गावांत निवडणुकीदरम्यान परस्परविरोधी गटांत मारामारीचे प्रकार घडले. परिणामी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अन्य तालुक्यांत अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. मंगळवारी (ता. १७ ऑक्टोबर) मतमोजणी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.

सोमवारी स‌काळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत चुरशीने मतदान झाले. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने यंदा उत्सुकताही होती. एकेका मतासाठी टोकाची स्पर्धा लागल्याचे चित्र होते. ज्येष्ठ मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्था केली होती. केंद्रापर्यंत मतदारांना पोहचवण्यासाठी रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहनांचा मोठा वापर झाला. सुगीचे दिवस असल्याने सकाळच्या टप्यात मतदानासाठी गर्दी झाल्याने रांगा लागल्या होत्या.

तालुकानिहाय मतदान

शाहूवाडी : ८७.०७, पन्हाळा : ९१.७८, हातकणंगले : ८२. ५७, शिरोळ : ८६. ७८, कागल : ९१.१७, करवीर : ७७.९०, गगनबावडा : ९१.८९, राधानगरी : ९१.९, भुदरगड : ८९.२९, आजरा : ८५.७, गडहिंग्लज : ८१.८, चंदगड :८४.१४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजाराला आली झळाळी

$
0
0

कोल्हापूर : कंदील, झगमगत्या दिव्यांनी उजळलेली बाजारपेठ आणि पावसाच्या शक्यतेने छत्री, रेनकोटची सोबत घेऊन सुरू असलेली खरेदी अशा चित्राने दिवाळीच्या आगमनाची चाहूल दिली. दिवाळी निमित्त बाजारपेठांमधील उलाढालीला चांगलीच चालना मिळाली दोन आठवड्यांपासून तेजीत असलेल्या धान्य बाजारपेठेनंतर आता कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, सोन्याच्या बाजारातील उलाढालीला वेग आला आहे. नवीन कपडे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे रेडीमेड कपड्यांबरोबर साड्यांची दुकाने दिवसभर गर्दीने ओसंडून वाहत आहेत. पाडव्याच्या मुहुर्तावर गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच वाहन व सोने खरेदीची तयारी आतापासूनच चालवली असल्याने या आठवड्यामध्ये दिवाळी निमित्ताने होणाऱ्या कोट्यवधींच्या उलाढालीला प्रारंभ झाला आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी मोठ्या डिलर्सपासून छोट्या दुकानामध्ये विविध ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.

दिवाळीसाठी फराळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्यासाठी धान्य बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. किरकोळ व्यापाऱ्यांकडूनही खरेदीसाठी गर्दी झाल्याने दोन आठवडे लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार फुलून गेल्याचे चित्र होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हरभरा डाळ, खोबरे यांचे दर वाढलेले असतानाही त्याची अपेक्षित खरेदी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. दिवाळीनिमित्त रेडीमेड कपडे खरेदी करण्याचा कल वाढत चालला असल्याने राजारामपुरी, महाद्वार रोड, लक्ष्मी रोड यासारख्या कपड्यांच्या बाजारपेठांमध्ये गेल्या आठवड्यापासून वर्दळ वाढली आहे. सायंकाळी पडणाऱ्या पावसामुळे अनेकजणांनी दिवसभरात खरेदी करण्याचा मार्ग अवलंबल्याने कपड्यांच्या दुकानांमध्ये दिवसभर गर्दी दिसत आहे. रेडीमेड कपड्यांबरोबरच साड्यांच्या दुकानांमध्येही गर्दी हटत नसल्याचे ​चित्र आहे. यामुळे दुकानदारांनीही जादा कर्मचारी नेमण्याबरोबरच रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा मार्ग अवलंबला आहे. आकाशकंदील, रांगोळी, विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या माळा, विविध प्रकारची फुले अशा किरकोळ बाजारातही तेजी असून गेल्यावर्षीच्या तुलनेत दरांमध्ये थोडी वाढ झाली आहे. छोट्या आकाशकंदीलांची मागणीही कायम असल्याने चाळीस रुपयांपासून ८० रुपयांपर्यंत डझन मिळत असलेले आकाशकंदील नागरिकांच्या पसंतीस पडत आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ सज्ज

कपड्यांच्या बाजारपेठेबरोबरच सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठही नवनवीन वस्तूंनी सजली आहे. फ्रीज, वॉशिंग मशिन, टीव्ही, एसीसारख्या वस्तूंबरोबर मोबाइल, लॅपटॉप, साउंड सिस्टिमलाही मोठी मागणी आहे. या साऱ्या वस्तूंच्या कंपन्यांनी विविध ऑफर्स आधीच जाहीर केल्याने त्यादृष्टीने नागरिकांनी यंदा पाडव्याच्या मुहुर्तावर नवीन वस्तू घरी नेण्याचे ठरवले आहे. तीन दिवसच हातात असल्याने व बँकांना सुटी असल्याने त्यासाठीचे डाउनपेमेंट, कागदपत्रांची पुर्तता व वस्तू निवडून ठेवल्या जात आहेत. सध्या दुकानांमध्ये त्याचीच धावपळ सुरू असून बुकींग जोरात सुरू आहे. तर ऑफर्समध्ये काही वस्तूंचे पॅकेज दिली आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आपल्याला आवश्यक आहे हे पाहून सवलतीत वस्तू खरेदी करण्याचा कल अनेकांचा दिसून येत आहे. मोबाइल, लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी ठिकठिकाणची शोरुम पाहिली जात आहेत. यामध्ये मोठमोठ्या ऑफर्स सुरू आहेत.

सराफ कट्ट्यावर

तयारी पाडव्याची

पाडव्याच्या मुहुर्तावर छोटा दागिना खरेदी करण्याची मानसिकता अनेकांची असते. त्यामुळे ज्वेलरी दुकानांमध्ये नवनवीन दागिन्यांचे प्रकार पाहण्यास मिळत आहेत. दर स्थिर आहेत. त्यामुळे दसऱ्यानंतर पाडव्यासाठी खरेदी होण्याच्या अपेक्षेने सराफ व्यावसायिकांनी तयारी केली आहे. यापूर्वी दसरा सण आणि त्याआधाचीही मार्केटमध्ये फारशी हालचाल नव्हती असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधण्याची लगबग सुरू आहे.

वाहन खरेदीसाठी बंपर ऑफर्स

वाहन खरेदीच्या क्षेत्रातही मोठी उलाढाल होणार असून कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या विविध ऑफर्सबरोबर डिलर्सही काही ऑफर्स देत आहेत. त्यामुळे दुचाकी खरेदी केली जात असताना कंपनीबरोबरच ऑफर्सचाही विचार केला जात आहे. पाडव्यासाठी नवीन दुचाकी व चारचाकी घरी घेऊन जाण्यासाठी बहुतांश ठिकाणी वाहने यापूर्वीच बु​कींग करुन ठेवण्यात आली आहेत. काही कंपन्यांनी दिवाळीच्या सणासाठी विशेष व्याज दर जाहीर केला आहे तर रोख रकमेच्या सवलतीबरोबर काही अॅक्सेसरीजमधून ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे या क्षेत्रात चांगली उलाढाल होईल, अशी अपेक्षा आहे.


सणानिमित्ताने मोबाइल मार्केटमध्ये मोठी उलाढाल होत असते. त्याप्रमाणे रविवारपासूनच खरेदी सुरू झालेली आहे. सध्या होत असलेली खरेदी पाहता पाडव्याच्यानिमित्ताने मोठी उलाढाल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे विविध व्हरायटी बाजारात आली आहे. त्याला ग्राहकांचा, जास्तीत जास्त तरुणाईचा प्रतिसाद मिळत आहे.

प्रभू मखिजा, डायरेक्टर, हिरापन्ना


गेल्या काही महिन्यांपासून सोने बाजारातील उलाढाल अपेक्षेप्रमाणे नाही. दसऱ्यामध्येही तशी मोठी उलाढाल जाणवली नाही. दिवाळीच्यानिमित्ताने पाडव्याला मात्र सोन्याची खरेदी होईल व बाजाराला झळाळी येईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ग्राहकांना आवडतील अशा व्हरायटी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

प्रसाद कामत, तनिष्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाके थांबली, प्रवाशांचे हाल सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी एस. टी. कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्याने सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. निर्णयामुळे मध्यरात्रीनंतर जिल्ह्यातील एसटीचे चाके थांबली. संपात सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रात्री ११ नंतर आपल्या बसेस जमा केल्या. मात्र, तत्पुर्वीच सोमवारी दुपारपासून एसटीची सेवा विस्कळित झाली. मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात झाल्याने अनेक मार्गावरील परिवहन विभागाची वाहतूक बंद झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना फलाटावर रात्र काढावी लागली.

महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, वेतन निश्चिती, विविध भत्ते, सेवा-सवलती मिळाव्यात. तसेच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी बेमुदत संप करण्याचा इशारा दिला होता. महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक), विदर्भवादी कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार संघटनांनी कृती समिती स्थापन करुन संपाचा इशारा दिला होता.

दोन महिन्यामध्ये सरकारच्यावतीने चर्चेसाठी कोणतीही भूमिका घेतली नाही, मात्र सोमवारी कृती समितीबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली. पण चर्चेत कोणताही निर्णय न झाल्याने संपाचा निर्णय घेण्यात आला. कोर्टाने संपाला स्थगिती दिली असली, तरी संप होणार हे दुपारीच कृती समितीने निश्चित केल्याने कर्मचाऱ्यांनी आपली वाहने आगारांमध्ये जमा करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याने ऐन दिवाळीच्या सणात प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. मध्यरात्रीपासून लांबपल्यावरील प्रवाशांची मोठी अडचण झाली. अनेक प्रवाशांनी इतर खासगी वाहनांचा आधार घेतला, पण त्याचेही दर वाढवल्याने त्यांची अधिक आर्थिक कोंडी झाली. तर अनेकांना फलाटांवर रात्र काढावी लागली. पर जिल्ह्यातून रात्री कोल्हापुरात दाखल झालेल्या प्रवाशांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

ऐन दिवाळीच्या सणामध्ये कर्मचारी संपावर गेल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असल्याने रात्री उशिरापर्यंत राज्यपातळीवर संप स्थगित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण यावर तोडगा निघालेला नव्हता. दरम्यान कास्ट्राइब कर्मचारी महासंघ, काँग्रेस प्रणीत महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी संघाने संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले. संपाबाबत संघटनांमध्ये मतभिन्नता असल्याने संपाची तीव्रता मंगळवारनंतरच स्प्ष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर डॉक्टरांवर कारवाई

$
0
0

टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महापालिकेत कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी नाही. कोण अधिकाऱ्यांची मर्जीतील तर कोण पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या वशिल्याच्या बळावर रुबाब मारत असतात. ऑफिस कामकाजाच्या वेळेत कार्यालयाबाहेर थांबण्याची लागण आरोग्य विभागाला झाली आहे. नागरी आरोग्य केंद्रे आणि वॉर्ड दवाखान्यामध्ये नियुक्ती असताना कामाच्या वेळेत चौदा वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) जाग्यावर नसल्याचा आक्षेप असून त्यांच्यावर कारवाईचा प्रस्तावित आहे. एका वैद्यकीय अ​धिकाऱ्याने क्षयरोग केंद्र तीन दिवस बंद ठेवल्याचे सामोर आले आहे. पहिल्या टप्प्यात संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई म्हणून एक दिवसाचा पगार कपातीचा डोस दिला जाणार आहे.यामध्ये चार कायमस्वरुपी आणि दहा ठोक मानधनावरील डॉक्टरांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. अमरसिंह पवार, डॉ. शंकुतला शिंदे, डॉ. सुनील नाळे, डॉ. सुशीला पावरा, डॉ. पी. पी. शहा, डॉ. रती अभिवंत, डॉ. रुपाली यादव, डॉ. मनाली मिठारी, डॉ. वसंत जाधव, डॉ. मोहनदास बायकेरीकर, डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. योगिता भिसे, डॉ. राजाराम सूर्यवंशी आणि डॉ. अरुण परितेकर यांचा समावेश आहे. प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजाविल्यानंतर प्रत्येकाकडून खुलासा सादर केला आहे. कुणी वाहन बिघडल्याचे, कुणी घरगुती कारणे पुढे केली आहेत.आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरवड्यात महापालिकेच्या मालकीची वॉर्ड दवाखाने व नागरी आरोग्य केंद्राना अचानक भेटी दिल्या होत्या. यावेळी चौदा डॉक्टर, नियुक्तीच्या ठिकाणी कामावर नसल्याचे सामोरे आले आहे. त्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती, अशी माहिती आरोग्य अधिकारी अरुण वाडेकर यांनी दिली. आरोग्य विभागाकडून कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आयुक्तांच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव या आठवड्यात सादर होणार आहे.संख्या कमी आहे. पालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व पंचगंगा हॉस्पिटलमध्ये मिळून तीन भूलतज्ज्ञ आहेत. महापालिकेत १९९१ पासून सेवेत असलेल्या डॉ. वसुधा वाळके यांनी व्यक्त‌िगत कारणासाठी ऐच्छिक सेवानिवृत्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. राजीनाम्याचा प्रस्ताव सादर करुन त्या रजेवर गेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कल्चर क्लबच्यावतीने सोमवारी भक्तीरसाची मेजवानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीनंतरही मंगलमय वातावरणाची अनुभूती ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या मटा कल्चर क्लबच्यावतीने आयोजित केलेल्या ‘अभंगरंग’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलारसिकांना मिळणार आहे. सोमवारी (ता. २३) आयोजित केलेल्या या भक्तीरसाच्या मैफलीची मेजवानीच मिळणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता मैफलीला सुरुवात होणार आहे.

कोल्हापूरवासियांसाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने सातत्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सादर केली आहे. कल्चर क्लबच्यावतीने या कार्यक्रमांबरोबर विविध वयोगटांसाठी सातत्याने विविध उपक्रमही आयोजित केले जातात. आठवडा दिवाळीच्या वातावरणाने भारुन टाकणारा असल्याने त्याचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर ‘अभंगरंग’ सारख्या मैफलीचे आयोजन केले आहे. राजा परांजपे प्रॉडक्शनच्या ‘अभंगरंग’ या कार्यक्रमातून अभंग, भक्तीगीतांची मेजवाणीच कोल्हापुरातील दर्दी ​रसिकांना मिळणार आहे. संजीव मेहंदळे, ऋषिकेश बडवे, संपदा थिटे यांच्या सुरांमधून आनंदाची अनुभूती मिळणार असून प्रशांत पांडव, दीप्ती कुलकर्णी,प्रसाद भांडवलकर, नंदकुमार भांडवलकर यांचा वाद्यवृंद तल्लीन करून टाकणार आहे. या साऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रेयस बडवे यांच्याकडे असून त्यांच्या निवेदनातून दिल्या जाणाऱ्या पूरक माहितीच्या आधारे ही मैफल उत्तरोत्तर रंगण्याची मजा मिळणार आहे.

या मैफलीसाठी ‘मटा कल्चर क्लब’ सदस्यांनी महाराष्ट्र टाइम्स, गुलमोहर रेसिडन्सी, नागाळा पार्क येथून तिकीट घेऊन जायचे आहेत. खास दिवाळीनिमित्त कोल्हापूरकरांसाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ‘कल्चर क्लब’चे सभासदत्व अवघ्या १९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. याच सोबत ‘अभंगरंग’ या कार्यक्रमाची दोन तिकिटे मोफत मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी ९७६७८९०६२६ या क्रमांकावर संपर्क साधावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेजारीच खरा पहारेकरी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुटीचे वेध लागताच आपण गावाकडे किंवा पर्याटनाला जाण्याचे नियोजन करतो. छोट्याशा कुलुपावर विश्वास ठेवून आपण घर सोडतो, मात्र नेमके याचवेळी चोरटे संधी साधतात. घरातील रोख रकमेसह किमती ऐवज लंपास झाल्याने सुटी चांगलीच महागात पडते, त्यामुळे पुन्हा पश्चातापाची वेळ येऊ नये, यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांची गस्त आहेच. मात्र, घर बंद राहणार असेल तर शेजाऱ्यांना कल्पना द्या. शेजारी हाच खरा पहारेकरी असल्याचा सुरक्षामंत्र पोलिसांनी दिला आहे.

सुट्ट्या सुरू होताच शहरासह उपनगरांमध्ये अनेक घरे चार-सहा दिवसांसाठी बंद असतात. काहीजण मुलाबाळांसह गावाकडे जातात. काही पर्यटनासाठी बाहेर पडतात. अशावेळी बंद घरांना लक्ष करून चोरटे सक्रीय होतात. दिवसा रेकी करून रात्रीच्या अंधारात घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला जातो. एप्रिल आणि मे महिन्यात चोरट्यांनी शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रोज होणाऱ्या घरफोड्या आणि चेन स्नॅचिंगमुळे पोलिसही हतबल झाले होते. अखेर पोलिसांनी चड्डी-बनियन गँगला पकडून चोऱ्यांचा उलगडा केला. आता पुन्हा दिवाळीच्या सुट्टीत चोरटे सक्रीय होऊ नयेत, यासाठी पोलिस दक्षता घेत आहेत.

दरम्यान, नागरिकांनी घरे बंद करून शहराबाहेर जाण्यापूर्वी जवळच्या पोलिस ठाण्यास माहिती द्यावी. यामुळे गस्तीच्या पोलिसांना बंद घरांवर लक्ष ठेवता येईल असे आवाहन पोलिसांचे आहे. नागरिकांनी किंमती ऐवज घरात ठेवण्याऐवजी बँकेतील लॉकरमध्ये ठेवावा. शक्य असल्यास सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असावी. अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय अपार्टमेंट परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचीही सक्ती केली आहे.

‘बाहेरगावी जाण्यापूर्वी नागरिकांनी शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. मोबाइल नंबरही शेजाऱ्यांकडे देऊन ठेवावेत. रोज किमान एकदा तरी शेजाऱ्यांनी घरात फेरी मारल्यास घरात माणसांचा वावर जाणवेल. शेजारी हाच खरा पहारेकरी आहे, त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी घराच्या सुरक्षेसाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी,’ असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ‘सणाच्या निमित्ताने महिला दागिने परिधान करून बाहेर पडतात. अशावेळी चेनस्नॅचिंगच्या घटना घडतात. गरजेपुरतेच दागिने परिधान करावेत. शिवाय तीन-चार महिलांनी एकत्रित बाहेर पडल्यास चोरीच्या घटना टाळता येतील. यातूनही चेन स्नॅचिंगची घटना घडल्यास तातडीने १०० नंबरवरून पोलिसांना घटनेची माहिती द्यावी’, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले आहे.

रेकॉर्डवरील चोरट्यांवर लक्ष

रेकॉर्डवरील चोरट्यांकडून चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी अशा चोरट्यांना समज दिली आहे. त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. याशिवाय शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेवरही पोलिसांचे लक्ष आहे. पोलिस मुख्यालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात २४ तास पोलिस तैनात आहेत. संशयास्पद हालचाली टिपून तातडीने कारवाया करण्याच्या सूचना दिल्या जातील.

सुटीच्या काळात चोरटे सक्रीय होतात. चोरट्यांना पकडण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे, मात्र यासाठी नागरिकांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे. आठवडाभर घर बंद राहणार असेल तर शेजाऱ्यांसह पोलिसांनाही कल्पना द्यावी.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

अशी घ्या दक्षता

किंमती ऐवज घरात ठेवू नका

दागिने परिधान करून बाहेर पडू नका

जवळच्या पोलिस ठाण्यास कळवा

बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्या

अपार्टमेंट, दुकानांमधील सीसीटीव्ही तपासून घ्या

चोरीची घटना घडल्यास तत्काळ पोलिसांना कळवा

अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षकांना सतर्कतेच्या सूचना द्या

बाहेर जाताना दारे, खिडक्या कुलूपबंद असल्याची खात्री करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पूलप्रकरणी उपअभियंता धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पुलाच्या बांधकामास अडथळा आणणाऱ्या सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांवर आरोप करून पुन्हा खुलासा करून घुमजाव केल्याप्रकरणी समिती सदस्यांनी उपअभियंता संपत आबदार यांना धारेवर धरले. आबदार यांनी राजीनामा देण्याची धमकी दिल्यावर कार्यकर्तेत आक्रमक झाले. अखेर आबदार यांनी आपण सामाजिक कार्यकर्त्यांची नावे घेतलीच नव्हती, असे सांगून माफी मागितली. पर्यायी शिवाजी पुलाबाबत बांधकामाला गती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग व कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीमध्ये २३ ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे.

पर्यायी पुलाच्या बांधकाम करण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी बाबत प्रजासत्ताक सेवा संस्थाचे दिलीप देसाई यांनी अर्ज केला होता, अशी माहिती उपअभियंता आबदार यांनी १२ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीशी चर्चा करताना केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आबदार यांनीच देसाई यांचा तक्रारी अर्ज नव्हता असा लेखी खुलासा केला. आबदार यांनी देसाई यांच्याबाबत चुकीची माहिती दिल्याप्रकरणी समितीने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक देत आबदार यांना जाब विचारला. काही कार्यकर्ते चर्चेदरम्यान आबदार यांच्या अंगावर धाऊन गेले, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी त्यांनी ‘राजीनामा देतो’, ‘खुर्ची सोडतो’ अशी धमकी दिली. पर्यायी पूल व्हावा यासाठी म‌ी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. ड्राईंगमधील चूक शोधून काढली आहे. पुलाच्या बांधकामासाठी १३ कोटी रुपयांचा खर्च धरला होता. पण पुन्हा नव्याने अंदाजपत्रक करुन पुलाचा खर्च नऊकोटींवर आणला. त्यामुळे खर्च वाचवला’ असा खुलासा करण्याचा प्रयत्नही आबदार यांनी केला.

हेरिटेज व वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य उदय गायकवाड यांनी ‘मी अर्ज केला असल्याचा व पुलाला विरोध केल्याचा पुरावा दाखवा’ असा जाब आमदार यांना विचारला. पुलाचे बांधकाम करताना १० झाडे आडवी येत होती. दहा झाडे तोडताना मूळ मालकाची परवानगी आवश्यक असते असे तत्कालिन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत स्पष्ट केले होते. तसेच दहा झाडे तोडल्यास ३३०० नवीन झाडे लावल्यास परवानगी मिळते. अथवा रोख रक्कम भरल्यावर पुलाचे बांधकाम होऊ शकते. असे असताना सरकारी अधिकारी स्वतःची चूक लपवण्यासाठी सामाजिक व पर्यावरण कार्यकर्त्यांच्या नावे घेऊन बदनाम करतात, असा आरोपही गायकवाड यांनी यावेळी केला. गायकवाड व निसर्ग मित्रचे अनिल चौगुले यांनी अर्ज केले नव्हते, असा खुलासाही आबदार यांनी केला. यावेळी बाबा पार्टे, रमेश मोरे, अशोक पोवार, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, फिरोजखान उस्ताद, तानाजी पाटील, दिलीप माने अदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिट आयलंडमुळे अवेळी बरसतोय पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाची तीव्रता वाढत असली, तरी सिमेंटचे रस्ते आणि घरांमुळे हिट आयलंड तयार होत आहे. कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे तयार होणार हिट आयलंडच प्रचंड पावसाला कारणीभूत आहे.

कार्बन उत्सर्जनासाठी सध्या जोरात सुरू असलेली वृक्षामोहिमेचे फायदे मिळण्यास आणखीन दहा वर्षांच्या कालावधी लागणार आहे. त्यामुळे किमान दहा वर्षे तरी अवकाळी पडणाऱ्या पावसाचे फटके सहन करावे लागणार आहेत.

बेसुमार वृक्षतोडीबरोबरच विकासाच्या गोंडस नावाखाली सिमेंट रस्ते, बहुमजली इमारती, शोरुमसाठी वापरण्यात येणाऱ्या काचेच्या तावदानामुळे उष्णतेमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात हिट आयलंड तयार होत असून त्याचा परिणाम वातावरणावर होत आहे. उष्णतेचे शोषण होऊन हवा तापली जावून पोकळी तयार होते.

हवेमध्ये तयार झालेल्या पोकळीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन आर्द्रतेमध्ये वाढ झाल्यानंतर पावसाला सुरुवात होते. मानवनिर्मित कारणामुळे अशी स्थिती निर्माण झाल्यांमुळेच कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली.

वृक्षारोपण मोहिमेवेळी यामध्येही स्थानिक पातळीवरील किंवा ज्या-त्या परिसरातील वृक्षांचे रोपण, संवर्धन करमे आवश्यकता असतानाही परदेशी वृक्षांची लागवड केली जात असल्याने २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन रोखण्याचे हाती घेतलेले ध्येय सफल होईल, अशी शक्यता कमीच दिसते. ‘प्रबोधनाच्या माध्यमातून स्थानिकपातळीवरील वृक्षांची लागवड केल्यास कार्बन उत्सर्जन रोखणे शक्य आहे.

या वृक्षांपासून फायदे होण्यास सुरुवात होण्यापूर्वी पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे पर्यावरणशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सांगितले.’

हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरांमध्ये कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे इशान्यकडून नैऋत्य दिशेला वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. त्याचवेळी दक्षिण गोलार्धामध्ये तापमान कमी झाले आहे. त्यामुळे परतीचा पाऊस अडकून पडला आहे.

ऋतुचक्रातील बदल असला, तरी या परिस्थितीला जागतिक तापमान वाढ कारणीभूत आहे. त्यामुळेच पडणारा पाऊसही असमान आणि कोठेही पडत आहे.

‘ऋतुचक्रातील बदलामुळे नेहमीच्या पर्जन्यमानाच्या दिवसांतही पावसांमध्ये असमतोलपणा निर्माण झाला आहे. असमतोलपणा कमी करण्यासाठी जंगलाखालील क्षेत्रामध्ये वाढ करण्याची आवश्यकता भूगोल विषयाचे प्रा. सुनील भोसले यांनी व्यक्त केली.’

गेल्या काहीवर्षात बेसुमार वृक्षतोड झाली. कमी झालेल्या जंगलक्षेत्राचा केवळ घरेबांधणीसाठी वापर होत नसून शेतीसाठी वापर वाढला आहे. या कारणांमुळे असमतोलपणा निर्माण झाला असून पाऊसमानामध्ये अनियमितता निर्माण झाली आहे. त्याबरोबर हिंदी व बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टाही सध्याच्या पावसाला कारणीभूत आहे.
- प्रा. सुनील भोसले, विवेकानंद कॉलेज

जागतिक वातावरणातील बदलाप्रमाणे स्थानिक वातावरणामध्येही बदल होत आहेत. दिवसभर उष्णतेमध्ये वाढ झाल्यानंतर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वारे अडवले जातात. त्यामुळे हिट आयलँड तयार होऊन कोठेही पाऊस पडतो. पाऊसमानातील बदल रोखण्यासाठी जीवनशैलीबरोबरच त्या-त्या परिसरातील पोषक वृक्षांचे रोपण करण्याची आवश्यकता आहे.
- प्रा. डॉ. पी. डी. राऊत, विभागप्रमुख पर्यावरणशास्त्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीची प्रक्रिया सांगलीत रखडली

$
0
0

सांगली :
दिवाळीच्या पहिल्या दिवशी राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, सांगली जिल्ह्याच्या बाबतीत मात्र मुख्यमंत्र्यांची घोषणा फार्सच ठरणार आहे. सरकारकडून या संदर्भातील यादीच आली नाही. पात्र-अपात्रतेची प्रक्रियाच अद्यापही प्रलंबित असल्याने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिक्षायादी वरील नोंदीपुरतेच मर्यादित रहावे लागणार आहे.
सांगली जिल्ह्यात कर्जमाफीसाठी १ लाख ८६ हजार कुटुंबांचे अर्ज दाखल झाले आहेत. यातील १ लाख ७१ हजार कर्जदारांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा बँकेला, तर ५१ हजार कर्जदारांची माहिती देण्याचे आदेश अन्य बँकांना दिले आहेत. छाननीमध्ये यातील अनेक जण एकाच कुटुंबातील असल्यामुळे ही संख्या आणखी कमी होईल. एकूण २ लाख ३० हजार कर्जदारांची माहिती पाठविली आहे. पात्र-अपात्रतेबाबतची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे. २५४ गावांमधील चावडीवाचन आचारसंहितेच्या कात्रीत सापडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सांगलीत कॉँग्रेसची मुसंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली जिल्ह्यात निवडणूक झालेल्या एकूण ४५३ ग्रामपंचायतींच्या निकालाने मंगळवारी संपूर्ण जिल्हा गुलालमय झाला. काँग्रेसने जोरदार मुसुंडी मारली असून, प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १३७ ग्रामपंचायतींवर काँग्रस समर्थकांनी कब्जा केला आहे. भाजप समर्थकांनी जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर येत १०५ ठिकाणी सत्ता आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ९८ गावांवरील कारभारावर समाधान मानावे लागले. ७७ ठिकांणी पक्षभेद बाजूला ठेवून स्थानिक आघाड्यांनी सत्ता हातात घेतली आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर झाली नसली तरी निकालानंतर मात्र आपल्या पक्षाचे लेबल लावून नेत्यांनी आपापल्या पक्षाचे नाव घेऊन वर्चस्वाचे दावे केले आहेत.
निकाल जाहीर होऊ लागल्यानंतर भाजप समर्थक पिछाडीवर जाऊ लागले. सायंकाळपर्यंत समोर आलेल्या निकालाच्या आकडेवारीवरुन काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. कडेगाव आणि पलूस तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पारंपरिक विरोधक पतंगराव कदम यांना अनपेक्षित धक्का दिला होता. कडेगाव तालुक्यातील ३४ पैकी ३१ गावात काँग्रेसने बाजी मारली. भाजपला अवघ्या १२ गावातील सत्तेवर समाधान मानावे लागले. पलूस तालुक्यातील १६ पैकी ११ ठिकाणी काँग्रेस तर ४ ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आली. जत तालुक्यातही कदम गटाच्या काँग्रेसने भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना मागे टाकले आहे. ७८ पैकी काँग्रेसने ३३ तर भाजपने २७ गावातील सत्ता काबिज केली आहे. १८ ग्रामपंचायती स्थानिक आघाड्यांकडे गेल्या आहेत.
खासदार पाटलांनी गड राखला
भाजपचे खासदार संजय पाटील यांनी तासगाव तालुक्यातील २६ पैकी १६ गावांत भाजपची सत्ता आणून तालुक्यात आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांना १० ग्रामपंचायतीमधील सत्तेवर समाधान मानावे लागले. कवठे महांकाळमध्ये खासदार पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार पाटील आणि काँग्रेस असा चौरंगी सामना झाला. यामध्ये २७ पैकी घोरपडे गटाने ११, भाजपने ८, राष्ट्रवादी ४ तर काँग्रेसच्या वाट्याला ३ ग्रामपंचायती आल्या आहेत.
खानापूर तालुक्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या समोर काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे खासदार पाटील, गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादीचे बाबासाहेब मुळीक यांच्या सर्वपक्षीय आघाडीचे आव्हान उभे ठाकले होते. या अनोख्या काँग्रेस प्रणीत आघाडीने ४५ पैकी २३ गावात बाजी मारली. शिवसेनेला २१ गावात सत्ता कायम ठेवण्यात यश आले. काही ठिकाणी सदस्य सेनेचे आणि सरपंच आघाडीचा अशी स्थिती झाली आहे. आटपाडी तालुक्याचे भाजपनेते माजी आमदार राजेंद्र देशमुख, पडळकर यांच्या आघाडीला तोंड देत आमदार बाबर यांच्या सेनेने तालुक्यातील मोठे गाव असलेल्या दिघंचीची सत्ता काबीज केली आहे. २१ पैकी ११ गावांची सत्ता राखण्यात देशमुख यशस्वी झाले असले तरी ८ गावाची सत्ता घेऊन बाबर यांनी आटपाडी तालुक्यातही आपण दखलपात्र असल्याचे सिद्ध केले.
मिरज तालुक्यात नेमके कोण पुढे याचा घोळ कायम होता. या तालुक्यातील ३८ पैकी १९ गावांत काँग्रेस-राष्ट्रवादी तर १६ गावांत भाजप समर्थकांची सत्ता आली. मिरज तालुक्यात आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील, असे दिग्गज नेते भाजपकडे असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीने मुसुंडी मारल्याने भाजपला दणका बसला.
हुल्लडबाजीत तरुणाचा मृत्यू
ग्रामपंचायतींच्या निकाला नंतर जल्लोषाला पारावार उरला नव्हता. अति उत्साहात हुल्लडबाजी करणाऱ्या बिसूर येथील उदय गणपती साळुंखे (वय ३५) या तरुणाला आपल्या प्राणाला मुकावे लागले. पश्चिम महाराष्ट्र पत्र डेपोनजीक त्याचा अपघाती मृत्यू झाला. मणेराजुरीतील धुमश्चक्रीत काहींची डोकी फुटल्याने त्यांना सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बोलवाडातील दगडफेकीत दोन जखमी झाले. सोनीतही धुमश्चक्री झाली. अनेक गावांत जोरदार हाणामाऱ्या झाल्या असल्याचे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल

$
0
0

सातारा :
जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागले. अनेक ठिकाणी परिवर्तन झाले आहे. माण तालुक्यातील मलवडीत दोन्ही गोरे बंधुंना धक्का देत अपक्ष उमेदवाराने सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिरवळमध्येही भाजपच्या लक्ष्मी पानसरे विजयी झाल्या. भुईंजमध्ये काँग्रेसने गड राखला आहे.
माण तालुक्यात महिमानगडमध्ये राष्ट्रवादीच्या संगिता मदने सरपंच म्हणून विजयी झाल्या. पाचवड, मनकर्णवाडी, पांढरवाडी या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. वावरहिरे, परकंदी, कासारवाडी, खुटबाव, महाबळेश्वरवाडी, नरवणे आदी गावांत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. आंधळीत काँग्रेसच्या मिनाक्षी काळे विजयी झाल्या आहेत. पांगरीत काँग्रेसचे दिलीप आवळे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले आहेत.
शिरवळमध्ये राष्ट्रवादीची अवस्था गड आला पण सिंह गेला, अशी झाली. भाजपच्या लक्ष्मी पानसरे सरपंच म्हणून निवडून आल्या. आसवलीमध्येही सत्तांतर झाले आहे.
खटाव तालुक्यात खातवळ येथे शिवसेनेच्या रेखा फडतरे सरपंच झाल्या. राजाचे कुर्लेमध्ये समरजित राजे भोसले विजयी झाले आहेत. ललगुणमध्ये काँग्रेस-भाजपचे जयवंत गोसावी यांना गुलाला लागला आहे. फलटण तालुक्यात पिंपरद, ताथवडा आणि चव्हाणवाडीत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
आदर्की खुर्दमध्ये सौरभ निंबाळकर सरपंच झाले.
शिवेंद्रराजे गटाची मुसंडी
सातारा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाने जोरदार मुसंडी मारली. मायणीसह अनेक गावांमध्ये भाजपने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. सातारा तालुक्यातील सोनगाव, जकातवाडी आणि कोपर्डेसह काही गावांमध्ये खासदार उदयनराजे भोसले गटाचा झेंडा फडकला. वडूथमध्ये जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता गोरे यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला.
क्षेत्र माहुली, अपशिंगेत शिवेंद्रराजे गटाला सत्ता मिळाली.
कोरेगाव तालुक्यातील बनवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळू नलगे सरपंचपदासाठी विजयी झाले. खंडाळा तालुक्यातील असवलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांना धक्का बसला. वाई तालुक्यात किकली, काळंगवाडी व गोवेदिगर ही गावे भाजपकडे गेली. भुईंज, कवठे, पांडे काँग्रेसकडे तर बोपर्डी राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली. फलटण तालुक्यात दुधेबावी, सुरवडीचे सरपंच काँग्रेसचे बनले. चौधरवाडी, वडले, वाठार निंबाळकर राष्ट्रवादीकडे तर गिरवी भाजपकडे गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटणकर-देसाई गट बरोबरीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
पाटण तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये २८ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. यामध्ये १४ ग्रामपंचायती देसाई गटाकडून पाटणकर गटाकडे व १४ ग्रामपंचायती पाटणकर गटाकडून देसाई गटाकडे आल्या. यापूर्वी १६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरीत ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये पाटणकर गटाने ३५ ग्रामपंचायतींवर विजय संपादन करून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला. देसाई गटाला ३०, राष्ट्रीय काँग्रेसला २, अपक्ष १ व आघाडीला २ ग्रामपंचायती मिळाल्या. दरम्यान, यापूर्वी १६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यातील पाटणकर गटाला ११ व देसाई गटाला ५ ग्रामपंचायतीत यश मिळाले होते. त्यामुळे ८६ ग्रामपंचातींपैकी ४६ ग्रामपंचायतींवर पाटणकर गटाचा झेंडा फडकला तर देसाई गटाला ३५ ग्रामपंचायती मिळाल्या.
पहिल्या फेरीमध्ये येराड ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र. एकमध्ये देसाई गटाचे दिनकर पोतदार व पाटणकर गटाचे नारायण परीट यांना समान मते पडल्याने त्यांचा निकाल चिठ्ठीवर काढण्यात आला. यामध्ये देसाई गटाचे दिनकर पोतदार यांना विजयी घोषीत करण्यात आले.
कराडमध्ये कॉँग्रेस आघाडीचे वर्चस्व
कराड
कराड तालुक्यात ४० ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. कराड दक्षिणेतील वडगाव हवेली, तारूख, कासारशिरंबे. कराड उत्तरमधील किवळ, पाडळी हेळगाव, अंतवडी, हिंगनोळे व डेळेवाडी येथे सत्तांतर झाले. रेठरे खुर्द, कोरेगावात सरपंचपद विरोधकांकडे गेल्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी परिस्थिती झाली. तालुक्यात स्थानिक पातळीवरील गावनिहाय प्रस्थापितांविरोधात एकत्र आलेल्या विविध राजकीय गटांच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले. त्यामुळे दिग्जज मान्यवरांना पराभवाचा सामना करावा लागला. डॉ. अतुल भोसले यांच्या गटाने जुळेवाडी, आटके, दुशेरे, गोंदी. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाने पश्चिम सुपने, येळगाव, वानरवाडी, मनव, आरेवाडी. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाने अविनाश मोहिते यांच्या गटाच्या मदतीने विजयनगर, ओंडोशी, कुसूर आणि आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाने कालगाव, जुने कवठे येथे सत्ता कायम ठेवली. कराड उत्तर आणि दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण गट, अतुल भोसले गट, विलासराव उंडाळकर गट आणि बाळासाहेब पाटील गटाने सोयीच्या आघाड्या स्थानिक करून निवडणूक लढविल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images