Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘झेडपी’ त रंगणार ‘टी ट्वेंटी’

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com

Tweet: gurubalmaliMT

कोल्हापूर ः कोणत्याही देशाचा खेळाडू घेऊन त्याच्यावर फ्रँचाइजचा शिक्का मारत ज्या पद्ध्तीने क्रिकेटमध्ये ‘ट्वेंटी ट्वेंटी’ सामने होतात किंवा प्रो कब्बडी रंगते असेच सामाने यंदा कोल्हापूर जिल्हा परिषदेतही रंगण्याची चिन्हे आहेत. दोन्ही काँग्रेस, भाजप-शिवसेनेससह सर्वच पक्षांकडे ​प्रबळ उमेदवार नसल्याने मिळेल त्या उमेदवारावर सध्या पक्षाचा शिक्का मारण्याची स्पर्धा सुरू आहे.

जिल्हा परिषदेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अजून उमेदवार निश्चित झालेले नाहीत. तरीही जिथे चुरस आहे तेथे उमेदवारी मिळाल्याच्या थाटात काहींनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. पण काही मतदारसंघात पक्षांना उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. प्रबळ उमेदवार मिळावा यासाठी सर्वच पक्षानी मुलाखतीचा फार्स सुरू ठेवला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा फार्स सुरू ठेवत उमेदवारीचा घोळ सुरू ठेवण्यात येणार आहे. इतर पक्षाचा चांगला उमेदवार आपल्याला मिळावा यासाठीच हा टाइमपासचा खेळ सुरू राहील.

ग्रामीण भागात काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद आहे. पण यावेळी अनेकांनी भाजपची वाट धरल्याने व शिवसेनेचे सहा आमदार निवडून आल्याने दोन्ही काँग्रेसची अडचण झाली आहे. भाजपची मदार ‘इनकमिंग’वर आहे. शिवाय ताराराणी आघाडी, शिवसेना, जनसुराज्य आणि स्वाभिमानीच्या जीवावर भाजप जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याचे स्वप्न पाहत आहे. सेनेचे पाच आमदार असले तरी निश्चित निवडून येण्यासारखे मतदारसंघ त्यांच्याकडे कमी आहेत. शिरोळ तालुक्यात अचानक भाजपची ताकद वाढल्याने स्वाभिमानीची अडचण होणार आहे. जनसुराज्यविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येणार असल्याने पन्हाळा तालुक्यात विनय कोरेंची कोंडी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर कोणत्याच पक्षाला प्रबळ उमेदवार मिळण्याची व एकहाती सत्ता येण्याची अजिबात शक्यता नाही. यामुळे सध्या सर्वच पक्षांनी ‘ट्वेंटी ट्वेंटी’ खेळण्याची तयारी केली आहे. जो प्रबळ उमेदवार असेल त्याला घेऊन त्याच्यावर पक्षाचा शिक्का मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपने तर आमचा शिक्का नको असेल तर ‘ताराराणी’चा बिल्ला घ्या. पण, आमच्या बाजूने लढा, असा प्रस्तावच अनेकांना दिला आहे.



जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस ताकदीने उतरणार आहे. जेथे प्रबळ उमेदवार नसतील तेथे स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून आघाडी करण्यात येईल. ही आघाडी भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी होण्याची शक्यता आहे. जिंकणाऱ्या उमेदवाराचा सध्या शोध सुरू आहे.

सतेज पाटील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भाजपच्या स्थापनेत दीनदयाळांचे योगदान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या राजवटीत भारतीय जनसंघ सामान्यांमध्ये रुजविण्यासाठी प्रचारक म्हणून दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रभावीपणे काम केले. भाजपच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान होते,’ असे मत रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.

करवीर नगर वाचन मंदिरातर्फे गुरुवारी आयोजित पद्मभूषण कै. वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘दीनदयाळ उपाध्याय ः व्यक्ती आणि कार्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. करवीर नगर वाचन मंदिरात व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी ‘कनवा’चे अध्यक्ष राजाभाऊ जोशी होते.

पतंगे म्हणाले, ‘उपाध्याय यांचा जन्म उत्तरप्रदेशातील एका खेड्यात झाला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतीय जनसंघाच्या प्रचारात घालवले. प्रभावी भाषणामुळे त्यांनी संघाचा प्रचार व्यापक केला. राजकारणात समाजवादाच्या विरोधातील प्रवाह रुजविण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांना राजकारणात रस नव्हता. राजकारणात पावित्र्य असावे, असे ते नेहमी आपल्या भाषणात सांगत. त्यांनी अतिशय साधेपणाने राहून संघाचे विचार आचरणात आणून मांडले. सामान्यांविषयी त्यांच्यात आपुलकी ओतप्रत भरली होती. प्रत्येक मनुष्याने परस्परपूरक भूमिका घेणे गरजेचे आहे. सुखी समाजजीवनाची व्यवस्था ‌निर्माण झाली पाहिजे, असे उपाध्याय यांचे मत होते.’

उदय सांगवडेकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी प्रशांत वेल्हाळ, डॉ. रमेश जाधव यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ते – नीलांबरी कुलकर्णी

विषय – भा. रा. तांबे ः एक मनस्वी कवी

वेळ – सायंकाळी ६ वा.

स्थळ – करवीर नगर वाचन मंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाडे गटाकडून पुन्हा दबावतंत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

जिल्हा काँग्रेसकडून मिळणाऱ्या सापत्नपणाच्या वागणुकीमुळे नाराज झालेल्या माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे गटाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दबावतंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्या दृष्टीने ही निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी नव्या आघाडीची नोंदणीही करुन घेतली आहे. कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा विडा उचलला आहे. त्याला काँग्रेस भवन येथील युवक मेळावा निमित्तमात्र ठरला. परंतु, आवाडे यांची ही भूमिका कितपत खरी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीने लढणार आहे. यामध्ये आवाडे गट जिद्दीने उतरणार आहे. पक्षाकडून सन्मानाची वागणूक न मिळाल्यास अन्य पर्यायांचा विचार खुला असल्याचे मत युवक मेळाव्यात ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रखरपणे मांडले.

रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून राहुल आवाडे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूकीचे नियोजन, प्रचाराची व्यूहरचना या संदर्भात इचलकरंजी युवक काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवन येथे युवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते.

युवा नेते राहुल आवाडे यांनी, आपला विजय निश्चित असला तरी ही अस्तित्वाची लढाई असल्याने कोणतीही कसूर ठेवून चालणार नाही. त्यासाठी नियोजनबध्दरित्या व्यूहरचना आखून प्रचार यंत्रणा राबवत उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन केले. आवाडे परिवाराने सातत्याने काँग्रेस पक्षासाठी योगदान दिले आहे. पण आता आवाडे गटाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असून झाले गेले विसरुन भविष्यासाठी सर्वजण एकजुट होण्याची गरज आहे. त्यासाठी गट-तट न मानता एकसंघपणे प्रचार यंत्रणा राबवूया, असे आवाहन केले.

मागील काही वर्षापासून आवाडे गटाला जिल्हा काँग्रेसकडून अलिप्त ठेवले जात आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे यांच्यातील उभी फूट त्याला कारणीभूत ठरत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आवाडे यांना नेहमीच डावलले गेले आहे. ही सल भरुन काढण्यासाठी आवाडे गटाने आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आवाडे गटाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाही ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. यापूर्वीही पक्षाकडून मिळालेली वागणूक पाहता आवाडे यांनी बंडखोरीचे निशाण उभारले होते. परंतु निर्णयाच्या क्षणी बंडखोरीची तलवार म्यान होत गेली. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी आवाडे गटाने स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून अस्तित्व दाखविण्याचा उचललेला विडा कितपत खरा ठरणार याचीही चर्चा रंगू लागली आहे.

स्वागत अमृत भोसले यांनी केले. सूत्रसंचालन नगरसेवक राजू बोंद्रे यांनी केले. यावेळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास गाताडे, बंडोपंत लाड, सुभाष गोटखिंडे, वसंत शिंदे, बापूसो मुल्लाणी, प्रविण शेटे, अविनाश घोडेस्वार, वामन कांबळे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूरमयी सायंकाळ झंकारली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दीर्घ आलापांच्या ताना घेत टिपेला पोहोचणारा सूर आणि तितक्याच सहजपणे समेवर येण्याची हातोटी असलेल्या सूरमयी स्वरांची उधळण करत हुबळी येथील ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित गणपती भट यांनी गुरुवारची सायंकाळ श्रवणीय केली. ब्राह्मणसभा करवीर मंगलधाम यांच्यावतीने पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाला गुरुवारी राम गणेश गडकरी सभागृहात प्रारंभ झाला.

श्याम कल्याण रागातील स्वरांनी भट यांनी मैफलीला सुरुवात केली. ‘निंद न आवत’ या विलंबित एकतालातील सुश्राव्य बंदिशीला स्वरसाज देत भट यांनी मैफलीची पकड घेतली. स्वरांच्या प्रत्येक आवर्तनाला अलगद स्पर्श करणाऱ्या त्यांच्या गायनावर रसिकांनीही ताल धरला. याच रागातील मध्यलय आणि द्रुतत्रितालबद्ध ‘मोरा मन हर लियो’ ही चीज पेश करत मैफल खुलवली. दोन तास रंगलेल्या या मैफलीत रागदारी संगीताची अनुभूती रसिकांनी घेतली.

तबलासाथ श्रीधर मांडरे यांनी केली, तर किरण हनगल आणि नीतेश जोशी यांनी तानपुरा साथ दिली. नितीन वाडीकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ब्राह्मणसभेचे अध्यक्ष उदय कुलकर्णी यांनी स्वागत केले. श्रीकांत लिमये यांनी भट यांचा परिचय करून दिला. करवीर नगर वाचन मंदिरचे कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी श्रीराम धर्माधिकारी, डॉ. दीपक आंबर्डेकर , संतोष कोडोलीकर, सुधीर पोटे, उमा नामजोशी, श्रीकांत डिग्रजकर, विनोद डिग्रजकर यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर रसिक उपस्थित होते.

आजची मैफल

मंजिरी कर्वे आलेगावकर यांचे शास्त्रीय गायन

स्थळ ः राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा

वेळ ः सायंकाळी ६ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भोगावती’ साठी १२ फेब्रुवारीला मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची बहुचर्चित निवडणूक अखेर १२ फेब्रुवारीला होणार असल्याचे सहकार प्राधिकरणाने जाहीर केले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची धांदल उडाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवार (ता.१३) पासून प्रारंभ होणार आहे . भोगावती साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या काळातच वाजणार असल्याने नेत्यांसह उमेदवारांची तारांबळ उडणार आहे.

भोगावती साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम गुरुवारी सहकार प्राधिकरणाने जाहीर केला. यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १३ जानेवारी ते १७ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे . १८ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार असून दोन फेब्रुवारी रोजी अर्ज माघारीची तारीख आहे . तीन फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. मतदानाची तारीख १२ फेब्रुवारी आहे असून मतमोजणी १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एन. माळी हे काम पाहणार आहेत .

भोगावती साखर कारखान्यावर गेली सहा वर्षे राष्ट्रवादी, शेकाप आणि जनता दलाची सत्ता होती . सभासदवाढीच्या मुद्द्यावरून कारखान्यावर प्रशासक नियुक्त करण्यात आले. या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या सांचालकांना पायउतार व्हावे लागले. प्रशासक नियुक्तीचा फटका राष्ट्रवादीला बसला . २३ मार्च २०१६ पासून कारखान्यावर प्रशासक मंडळ कार्यरत आहे . प्रशासकांचा सहा महिने कालखंड झाल्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून वारंवार होत होती. यावर सहकार प्राधिकरणाने साखर सहसंचालक सचिन रावळ यांना निवडणुकीसाठीची पक्की मतदार यादी आणि इतर बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व बाबी साखर सहसंचालक आणि कारखाना प्रशासक संभाजीराव निकम यांनी पूर्ण केल्या.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कालावधीतच भोगावतीची निवडणूक घोषित करण्यात आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींच्या तोंडचे पाणी पळाले आहे .नेमके कोणत्या निवडणुकीला तोंड द्यावयाचे अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. भोगावती साखर कारखान्याची ऊस उत्पादक सभासद संख्या ३०५२१ असून संस्था प्रतिनिधी सभासद ४६६ आहेत.

......

चौकट

भोगावती कारखान्याची निवडणूक नेमकी केंव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रथम सचिन इथापे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी काही कारणास्तव नकार दिल्याने दुसऱ्यांदा धनंजय डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनाही नकार दिल्याने भोगावतीची निवडणूक लांबणीवर पडणार आहे असे चित्र निर्माण झाले असतानाच अचानक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यामुळे भोगावती परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे .

....

चौकट

२१ जागांसाठी होणार लढत

भोगावती कारखान्याची निवडणूक २१ जागांसाठी होत आहे .यामध्ये ऊस उत्पादक सभासदांमधून पंधरा उमेदवार ,संस्था प्रतिनिधी एक , अनुसूचित जाती व जमाती एक ,महिला दोन, इतर मागासवर्गीय एक आणि भटक्या विमुक्त जाती एक अशा २१ जागांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. कारखाना निवडणूक यावेळी प्रथमच गटवार पद्धतीने होणार आहे .कौलव ,राशिवडे ,कसबा तारळे, कुरुकली, सडोली खालसा , हासूर दुमाला अशा सहा गटांतून उमेदवार निवडले जाणार आहेत .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयजीएम हस्तांतरणाचा पुन्हा घोळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

नगरपालिकेच्या मालकीचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) चालविणे व नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे. जर ते चालविण्यास सक्षम नसेल तर नगरपालिका बरखास्त करुन तेथे प्रशासक नेमू, असा सज्जड दम उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने भरताच नगरपा​लिकेने घूमजाव करीत हॉस्पिटल आम्हीच चालवू असा पवित्रा घेतला. त्यामुळे आयजीएम हस्तांतरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि इचलकरंजी नगरपालिकेने चार आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्यास खंडपीठाने सांगितले आहे.

सर्वसामान्यांसाठी अत्यल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयजीएम हॉस्पिटलची उभारणी केली. पण काही वर्षांपासून हे हॉस्पिटल चालविणे नगरपालिकेला अशक्य बनल्याने आयजीएम हॉस्पिटल राज्य सरकारकडे हस्तांतर करावे अथवा नगरपालिकेने ते सक्षमपणे चालवावे या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने वकील धैर्यशील सुतार यांनी, आयजीएम हस्तांतर करण्याचा निर्णय जुलै २०१६ मध्ये राज्य सरकारने घेऊनसुद्धा अद्यापही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनाला आणून दिले. त्यावर बोलताना सरकारी वकिल अभिनंदन वग्याणी यांनी जानेवारीअखेर हॉस्पिटलची इमारत हस्तांतरीत होईल.त्यानंतर लगेचच चार आठवड्यात हॉस्पिटलचा बाह्यरुग्ण विभाग शासनातर्फे सुरु करण्यात येईल, असे सांगितले.

मात्र यावर समाधान न झाल्याने खंडपीठाने आयजीएम हे नगरपालिकेचे हॉस्पिटल असून ते सक्षमपणे चालविणे व नागरिकांना आरोग्य सुविधा देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करत ती जबाबदारी विनाकारण राज्य सरकारने का घ्यावी. हे एक हॉस्पिटल घेतल्यास राज्यातील अन्य नगरपालिकासुध्दा राज्य सरकारने आपले हॉस्पिटल चालविण्यास घ्यावे अशी मागणी करू शकतात. अशा परिस्थितीत जर इचलकरंजी नगरपालिका हॉस्पिटल चालविण्यास सक्षम नसेल तर आम्ही नगरपालिकाच बरखास्त करू व तेथे प्रशासक नेमण्याचा आदेश देऊ असे सांगितले. त्यावर इचलकरंजी नगरपरिषदेचे वकिल तेजपाल इंगळे यांनी, जर राज्य सरकार पद भरतीला मंजुरी देत असेल तर हॉस्पिटल आम्ही चालवू असा नवा पवित्रा घेतला. त्यामुळे त्यांची भूमिका हॉस्पिटल हस्तांतरण ठरावाच्या विरोधातील ठरली.

अखेर खंडपीठाने हॉस्पिटल तुम्हाला चालवायचे असेल तर चालवा. पण आम्ही फक्त आवश्यक पदे मंजूर करण्याचा आदेश देऊ. पण त्यावरील खर्च नगरपालिकेलाच करावा लागेल याचा विचार करा. राज्य सरकारकडून पैसे मागू नका, असे सुनावले. राज्य सरकारने तसेच नगरपालिकेने या संदर्भात चार आठवड्यात नव्याने भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बस पार्किंग’ जागेचा तिढा सुटेना

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेवर दिवसेंदिवस ताण पडत आहे. खासगी बस पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासगी बस पार्किंगसाठी सासने मैदानाची जागा वापरण्याचा अजब प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. रहिवासी भागातील हे एकमेव मैदान असल्यामुळे तेथे बस पार्किंगला स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला आहे. खासगी बसवाहतूक व्यावसायिकांना कावळा नाका येथे जागा देऊनही त्यांनी तिकडे पाठ फिरवली आहे. परिणामी सीबीएस परिसरात वाहतूक योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. रोज संध्याकाळी ते रात्री उशिरापर्यंत खासगी बस वाहतुकीमुळे येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.

मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, अंबरनाथ, शिर्डी, बेंगळुरू, हैदराबाद, आदी मोठ्या शहरांसाठी कोल्हापुरातून खासगी बसवाहतूक केली जाते. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, दाभोळकर कॉर्नर चौक, राजीव गांधी पुतळा, पर्ल हॉटेल, ट्रेड सेंटरसमोरील स्टेशन रोड परिसर येथून प्रवासी उठाव केला जातो. हा परिसर सदैव गजबजलेला असतो. खासगी बसवाहतूक व्यावसायिकांना मध्यवर्ती बसस्थानक परिसर ते दाभोळकर कॉर्नर चौक परिसरात सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत थांबण्यास मनाई आहे. मात्र, या नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेकदा खासगी बस या ठिकाणी बिनदिक्कतपणे लावलेल्या असतात.

वाहतूक कोंडी नित्याचीच

सायंकाळनंतर हा संपूर्ण परिसर खासगी बसेसनी व्यापलेला असतो. त्यामध्ये व्होल्वो, एसी, स्लीपर कोच, नॉन एसी बसेसचा समावेश असतो. प्रवासी उठाव करण्यासाठी खासगी बस व्यावसायिकांत प्रचंड स्पर्धा आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसची संख्या दोनशेच्या आसपास आहे. प्रवासी उठाव करण्यासाठी या सर्व बसेस मध्यवर्ती बसस्थानक परिसर ते दाभोळकर कॉर्नर या भागात थांबलेल्या असतात. यामुळे येथील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडते. मुळातच हा परिसर गर्दीचा आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, हॉटेल्स, लॉजिंग, पेट्रोल पंप यामुळे रस्त्यावरून रहदारी मोठी असते. खासगी बसेसचा ताफा लागत असल्यामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी होते. यामुळे या भागातील खासगी बस पार्किंग अन्यत्र हलवावी अशी मागणी आहे.


नगरसेवकपद गेले तरी बेहत्तर...

सासने मैदानाची जागा खासगी बस पार्किंगसाठी देणे अत्यंत चुकीचे आहे. ताराबाई पार्क, नागाळा पार्क, शिवाजी पार्क, न्यू शाहूपुरी, कावळा नाका परिसर या ठिकाणी एकही खेळासाठी मैदान नाही. पाच, सहा प्रभागांसाठी सासने मैदान हे एकमेव मैदान आहे. मैदान जर खेळासाठी उपलब्ध राहणार नसेल तर लहान मुलांनी कुठे जायचे ? सासने मैदान व्यवस्थित राहिले पाहिजे या​करिता चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. सासने मैदान जागेवर खासगी बस पार्किंग होऊ देणार नाही. नगरसेवक पद गेले तरी बेहत्तर, पण सासने मैदानाची जागा मैदानासाठीच राखीव ठेवली जाईल. या ठिकाणी बस पार्किंगचा प्रयत्न झाल्यास तो सहन करणार नाही. मैदानाच्या चारही बाजूला रहिवासी क्षेत्र असल्यामुळे मैदान कायमस्वरूपी टिकले पाहिजे.

नीलेश देसाई, नगरसेवक, ताराबाई पार्क प्रभाग


तीन जागांचा पर्याय

शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खासगी बसेस पार्किंगसाठी महापालिका प्रशासन विविध पर्याय शोधत आहे. कावळा नाका परिसरातील जागेसह शिरोली नाका येथील जागा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्याचबरोबर मैल खड्डा येथील जागेचा विचार पुढे आला आहे. मैल खड्डा येथील जागा खासगी बस पार्किंगसाठी झाल्यास शहरांतर्गत वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराला केवळ चार दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. २१ फेब्रुवारीला मतदान असून १५ फेब्रुवारीला अर्ज माघारीचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रचाराला केवळ चारच दिवस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे उमेदवार चिंताग्रस्त बनले असून मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहचणे आव्हानात्मक झाले आहे. परिणामी प्रचार करताना ऐन थंडीत सर्वच उमदेवारांना घाम फुटणार आहे. कमी वेळेत प्रचंड धावपळ करावी लागणार असल्याने सर्व उमेदवार त्याच्या नियोजनाला आतापासूनच लागले आहेत.

निवडणुकीची प्रक्रिया सप्टेंबर २०१६ पासून आयोगाने सुरू केली. २०११ च्या जनगणनेनुसार निवडणूक होणार असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्वच मतदारसंघाची पुनर्रचना झाली आहे. गेल्यावेळेपेक्षा एक मतदारसंघ दुप्पट मतसंख्येचा झाला आहे. पंचायत समितीचा एक मतदारसंघ सुमारे २५ हजार तर जिल्हा परिषदेचा ४० हजारपर्यंत मतदार संख्येचा झाला आहे. गावांची संख्या वाढली आहे. यामुळे प्रचारास अधिक दिवस मिळतील अशी सर्वच इच्छुकांची अपेक्षा होती. पण निवडणूक कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

१५ फेब्रुवारी रोजी माघारीचा शेवटचा दिवस आहे, तर २१ रोजी मतदान आहे. मतदानांच्या आधी २४ तास जाहीर प्रचाराची सांगता आयोगाच्या आदेशानुसार करावी लागणार आहे. त्यामुळे १९ रोजीच्या सायंकाळी सातपर्यंतच प्रचाराची मुभा आहे. परिणामी उमेदवारांना प्रचारास अतिशय कमी दिवस मिळणार आहेत. केवळ मतदारांपर्यंतच नव्हे मतदारसंघातील सर्व गावांत जाणेही अशक्य होणार आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक मतदारांपर्यत जाऊन पोहचण्यासाठी काय केले पाहिजे, याच्या चिंतेने इच्छुकांना ग्रासले आहे. नातेवाईक, मित्रमंडळींना आतापासून प्रचारासाठी निमंत्रण दिले जात आहे.

कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, असा निर्धार केलेल्या इच्छुकांनी अर्ज भरण्यापूर्वीच प्रचाराला सुरूवात केली आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात जावून कार्यकर्त्यांची भेट घेतली जात आहे. चिन्ह नंतर सांगतो, पण ‌रिंगणात राहणार आहे, लक्ष राहू दे असा संदेश पोहचवला जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवार गावागावांत जात असल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कॉग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह स्थानिक आघाडीच्या नेत्यांचा संपर्क वाढला आहे.आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेवून प्रचार यंत्रणेची माहि‌ती देत आहेत. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरत असल्याने कॉग्रेस, राष्ट्रवादीचे नेते सावध होत सक्रिय झाले आहेत. गावा- गावातील जुन्या कार्यकर्त्यांना बोलावून यावेळी मदत केली पाहिजे, असे सांगत आहेत.

…………

चौकट

‘ताराराणी, जनसुराज्य’ची मोट

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या होत आहेत. पक्षापेक्षा आघाड्या आणि उमेदवारांचा प्रभाव जिंकण्यासाठी महत्वाचा ठरतो. हेच गणित जुळवत सर्वच तालुक्यात ताराराणी आघाडी, जनसुराज्य अशा आघाडीच मोट बांधण्यासाठी नेते कामाला लागले आहेत. त्यास भाजप रसद पुरवत आहे. ‘गोकुळ’ च्या संचालकांचे पाठबळ मिळवले जात आहे.

……….

स्पर्धक कोण ?

खुल्या प्रवर्गातील मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढली आहे. कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच नेत्यांसमोर आहे. म्हणून इच्छुकांनी आपल्या नेत्यांनी उमेदवारी दिली नाही तर ऑफर असलेल्या दुसऱ्या पक्षाची उमेदवारी स्वीकारण्याची मानसिकता केली आहे. यामुळे आता कोणाचा कोण विरोधक आणि कोण मित्र अजून अस्पष्ट आहे. माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोर्चाची तारीख पुढे ढकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठा मुंबई क्रांती मोर्चाची तारीख पुढे ढकलावी, असा ठराव राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई येथे १५ मार्च रोजी मोर्चाच्या आयोजनासंदर्भात होणाऱ्या बैठकीत कोल्हापुरातील ठरावाची माहिती देण्यात येणार आहे. उपमहापौर अर्जुन माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

बैठकीच्या प्रारंभी वसंतराव मुळीक यांनी मोर्चासंबधी माहिती दिली. राज्यात, देशात व परदेशात मराठा समाजाने ५७ मोर्चे शांततेत काढले आहेत. तीन कोटी मराठा बांधव रस्त्यांवर उतरले होते. मराठा क्रांती मोर्चाद्वारे केलेल्या मागणीची पुर्तता राज्य सरकारने सुरु केली आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे मुंबईत पुर्ण ताकदीने मोर्चा काढावा, अशी सूचना केली. महानगरपालिका पक्षप्रतोद प्रवीण केसरकर म्हणाले, ‘कोल्हापुरातील मराठा मोर्चाला मुस्ल‌िम धर्मियांसह सर्व जाती धर्मांनी पाठिंबा दिला होता. मुंबईतील मोर्चासाठी आमदार सतेज पाटील यांनी पूर्ण मदत केली जाईल, असे सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

हर्षल सुर्वे म्हणाले, ‘मराठा मोर्चाचा यशस्वी होऊ नये म्हणून काही मंडळी फितूर होऊन सरकारचे समर्थन करत असल्याने त्यांच्यापासून सावध रहावे. गडकोट संवर्धनाचा प्रश्न मराठा मोर्चाच्या अजेंड्यावर अग्रक्रमाने घेण्यात यावा. मुंबईत फक्त एकच दिवस मोर्चा न काढता प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत चार ते पाच दिवस मुंबईत ठिय्या मांडावा,’ अशी सूचना केली.

उद्योगपती चंद्रकांत जाधव म्हणाले, ‘मुंबई ही देशाची राजधानी असल्याने या ठिकाणचा मोर्चा हा विराट निघाला पाहिजे. मोर्चाच्या नियोजनासाठी १५ दिवस कमी पडणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे मोर्चाची तारीख पुढे ढकलावी. मुंबईत अधिवेशनाच्या काळात मोर्चा काढून विधानभवनाच्या दारात तीन ते चार दिवस ठिय्या मारण्याचे नियोजन केले पाहिजे. मराठा समाजाची उद्रेकांची जाणीव देशालाच नव्हे तर जगाला कळायला हवी.’

दिलीप देसाई म्हणाले, ‘३१ तारखेच्या मोर्चा काढला तर मुख्यमंत्री आचारसंहितेचे कारण सांगून कोणतीही घोषणा करणार नाहीत. मुंबईतील विराट मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, शहरातील तालमी, संस्था यांची पुन्हा बैठक घेण्याची सूचना केली.

मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे म्हणाले, ‘मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नांवर गेली २० वर्षे सरकारी दरबारी व कोर्टात लढा सुरू आहे. मुंबईतील मोर्चा आयोजित करण्याबरोबर मराठा समाजातील शेतकरी, विद्यार्थी, अॅट्रासिटी या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मराठा समाजातील तरुणांची फळी तयार केली पाहिजे. मराठा समाजाचे मोर्चे शांततेच्या मार्गाने सुरु आहेत. ‘जाळून टाका, पेटवून टाका’ या मार्गानी प्रश्न सुटत नाहीत. आंदोलनाद्वारे आपण सरकार बदलू शकतो. पण प्रश्न सुटू शकत नाहीत. त्यामुळे भविष्यात मराठा समाजाच्या संघटनाकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, शिवाजी खोत, दीपा पाटील, वैशाली महाडिक, संदीप पाटील, राजू लिंग्रस आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोरेंच्या पराभवाचा ठप्पा पुसा: पवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

‘सातारा - सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक असूनही शेखर गोरे यांचा झालेला पराभव धक्कादायक आहे. आमचेच लोक गंमत करतील असे वाटले नव्हते. या निवडणुकीत प्रसाद घेणाऱ्यांना घरी बसवून गोरेंच्या पराभवाचा ठप्पा पुसा,’ असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.

शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना डिस्टिलरी व इथेनॉल प्लॅन्टचे आधुनिकीकरण व अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, माजी खा. लक्ष्मणराव पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.

‘सकाळी - सायंकाळ आमच्यासोबत असणाऱ्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत दोन्हीकडून प्रसाद घेऊन उलट काम केल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सभासद असतानाही पराभव झाल्याने धक्का बसला. ही गोष्ट अशोभनीय आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून पराभवाचा ठप्पा पुसा,’ असे आवाहन पवार यांनी केले.

रामराजे म्हणाले, ‘राष्ट्रवादीची ताकद असतानाही आपल्या लोकांनी ‘भीम पराक्रम’ केल्याने गोरेंना पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्हा माझा गुलाम आहे, अशी भावना राजाची आहे. मला विरोधकांची नाही, तर पक्षाच्या जिवावर निवडून आलेल्या पण पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांची भीती वाटते. त्यांना आता नारळ देण्याची वेळ आली आहे.’

‘शिवेंद्रराजेंच्या हाती तलवार द्या. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा अबाधित राहील. सातारा शहराच्या निवडणुकीत एक अपघात झाला. त्याची जिल्हा परिषदेत पुनरावृत्ती होणार नाही. याची दक्षता घेतली जाईल,’ असे शशिकांत शिंदे म्हणाले. तर, ‘सातारा तालुक्याने शांत व संयमाने राजकारण करण्याचे सोडून जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. पालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने राजकारण संपत नाही. पुढे अनेक मैदानांचे निकाल बाकी आहेत. त्यात दाखवून देतो,’ असे आव्हान शिवेंद्रराजे यांनी दिले.

अर्थव्यवस्था कोलमडली

‘नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करून सामान्यांना अडचणी आणले. त्यामुळे शेतमालाच्या किमती ढासळल्या असून, शेतकरी संकटात आहे. उद्योगधंदे बंद पडू लागल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. देशाच्या एकूण चलनातील ८६ टक्के नोटांवर बंदी आणल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे,’ असेही पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी धावणार पर्यटनाची गाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर पर्यटन महोत्सव रविवारपासून सुरू होत आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराजवळून सकाळी नऊ वाजता पर्यटकांच्या बसला हिरवा झेंडा दाखवून सुरूवात होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. शहाजीराव देशमुख यांच्या हस्ते महोत्सवाची सुरूवात होईल. शंभराहून अधिक पर्यटक निश्चित झाले आहे. तर एक हजारांहून अधिक पर्यटकांनी महोत्सवाची चौकशी केली आहे.

‘संक्रातीला या आणि गोडवा घेऊन जा’, ‘अनुभवा कोल्हापूरचे आदरातिथ्य’, ‘भेट द्या रोमांचकारी स्थळांना आणि पाहुणचार घ्या, अस्सल कोल्हापुरी पदार्थाचा’ असे निमंत्रण कोल्हापूर हॉटेल मालक संघ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) महाराष्ट्रातील आणि बाहेरील पर्यटकांना दिले आहे. १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत महोत्सव होत आहे. कोल्हापूरचे पर्यटन वाढण्यासाठी निवास, प्रवास आणि भोजन व्यवस्थेत पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. त्याला पर्यटकांनी प्रतिसाद दिली आहे. दहा ग्रुप्सनी नोंदणी केली आहे. या ग्रुप्सना शहरासाठी सिटी बसची व्यवस्था केली आहे. शाहू स्मारक भवन, टाऊन हॉल, पंचगंगा घाट, न्यू पॅलेस, पिकनिक पाँइट, खासबाग मैदान आदी ठिकाणे दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील २१ पर्यटन स्थळांना भेट दिली जाणार आहे. जोतिबा, पन्हाळा, न्यू पॅलेस म्युझियम, किल्ले पन्हाळगड, पावनखिंड, दाजीपूर, राधानगरी, खिद्रापूर, नृसिंहवाडी, सिद्धगिरी म्युझियम पाहण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था आहे. शहरातील यंग सीनिअर्सही सिटी टूर बससेवेचा लाभ घेऊ शकतात, असे हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्जवल नागेशकर यांनी सांगितले.

पर्यटनाचे पॅकेज दोन ते तीन दिवसांचे आहे. काहींनी केवळ कोल्हापूर शहर पाहण्यासाठी पसंती दर्शविली आहे. या पर्यटकांसाठी सिटी टूरच्या बसची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील हॉटेल मालक संघाचे सभासद असलेल्या हॉटेल्समध्ये निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. सोळा दिवसांच्या पर्यटन महोत्सवात सुमारे दहा हजारांहून अधिक पर्यटक लाभ घेतील, असा विश्वास हॉटेल मालक संघाने व्यक्त केला आहे.

सोळा दिवसांच्या पर्यटन महोत्सवात सुमारे दहा हजारांहून अधिक पर्यटक लाभ घेतील अशी अपेक्षा आहे. शहरातील यंग सीनिअर्सही सिटी टूर बससेवेचा लाभ घेऊ शकतात.

उज्जवल नागेशकर, अध्यक्ष, हॉटेल मालक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडमुडशिंगीला सीसीटीव्हीचे कवच

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com

Tweet :@ MarutipatilMT

कोल्हापूर : गावाला सुरक्षाकवच प्राप्त व्हावे आणि डीजिटल इंडियाच्या धर्तीवर कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावामध्ये ४० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मोबाइलधारकांना मोफत वायफाय आणि इंटरनेट सुविधा पुरवली जात आहे. गावात बसवलेल्या सीसीटीव्हीचे नियंत्रण ग्रामपंचायत कार्यालयातून होणार आहे. मोफत वायपाय आणि इंटरनेट तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसव‌िणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचा दावा सरपंच तानाजी पाटील यांनी केला आहे.

शहराच्या सुरेक्षाच्या दृष्टीने अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचा उकल होण्यास मदत होत आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही अनेकवेळा चोरीच्या छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. भौगौलिक सलगता नसल्याने पोलिसांना गस्त घालताना मर्यादा येतात. अशावेळी सीसीटीव्हीद्वारे अशा घटनांवर नजर ठेवता येऊ शकते. त्यासाठी दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून गडमुडशिंगी गावात ४० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. इ-क्लाउड कंपनीने ही सुविधा दिली त्याचे नियंत्रण ग्रामपंचायत कार्यालयातून करण्यात येणार आहे.

सीसीटीव्हीबरोबरच नोटाबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी गावात मोफत वायफाय व इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी ५०० मीटर अंतराचे कव्हरेज प्राप्त होणारे तीन अॅक्सेस पॉइंट दिले आहेत. त्याद्वारे गावातील ६० टक्के मोबाइलधारकांना ही सुविधा मोफत मिळत आहे. प्रत्येकी अर्ध्या तासाच्या अंतरांने ही सुविधा देण्यात येत आहे. दक्षिण मतदारसंघातील या सुविधा देणारे गडमुडशिंगी हे पहिलेच गाव असून या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर पंचक्रोशीतील चिंचवाड, वसगडे, उचगाव, गांधीनगर आदी भागात ही सुविधा देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सीसीटीव्ही व मोफत वायफाय सुविधा देणारे गडमुडशिंगी गाव जिल्ह्यातील पहिलेच गाव असल्याचा दावा सरपंच तानाजी पाटील यांनी केला आहे.


कृषी औजर बँकेतून शेतकऱ्यांना मदत

गडमुडशिंगीतील शेतकरी प्रामुख्याने ऊस, केळी व फुलशेती करतात. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे. तरीही शेतकऱ्यांना अल्प मोबदल्यात मशागतीचे कामे करुन घेण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून कृषी औजार बँकेची स्थापना केली आहे. ‘ना नफा ना तोटा’ धर्तीवर चालवलेल्या औजार बँकेतून मशागतीची कामे करुन दिली जातात. जिल्ह्याती बचत गटाच्या माध्यामातून सुरू केलेल्या मोजक्या कृषी औजार बँकेमध्ये गडमुडशिंगीचा समावेश आहे.

सुरक्षेच्यादृष्टीने गावात ४० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. कॅमेऱ्यांचे नियंत्रण ग्रामपंचायत कार्यालयातून होत आहे. संपूर्ण गावाला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आणणारे गडमुडशिंगी गाव जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.

तानाजी पाटील, सरपंच

डीजिटल इंडियाच्या माध्यमातून गडमुडशिंगी गाव कॅशलेस करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मोफत वायफाय व इंटरनेट सुविधा दिली जात आहे. प्रत्येकी अर्धातास अतंराने ही सुविधा सुरू आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर गडमुडशिंगी पंचक्रोशीतील इतर गावांमध्ये ही सुविधा देवून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन दिले जाईल.

आमदार अमल महाडिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळी गेल्यावर खड्डे भरणार का?

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्याची वारंवार सूचना करुनही खड्डे बुजविले जात नाहीत. वॉर्डातील कनिष्ठ अभियंता, उपशहर ​अभियंता काय करतात? नागरिकांचे बळी गेल्यावर खड्डे भरणार का? आतापर्यंत पॅचवर्क का केले नाही? अशा शब्दांत स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाच्या कामाचे वाभाडे काढले. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी चारही विभागीय कार्यालयांना येत्या दहा दिवसांत शहरातील खड्ड्यांचे पॅचवर्क करण्याचे आदेश दिले. प्रत्येक प्रभागासाठी पॅचवर्क कामाकरिता अडीच लाख रुपयांची तरतूद केल्याचा खुलासा प्रशासनाने केला.

व्हीनस कॉर्नर येथे गुरुवारी खड्डे चुकविताना झालेल्या अपघातात एकातरुणाचा मृत्यू झाला. सदस्या सूरमंजिरी लाटकर, महेजबीन सुभेदार यांनी नगरसेवकांनी रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करुनही प्रशासन कार्यवाही करत नाही. नगरसेवक बदनाम होतात. नागरिकांचे बळी गेल्यावर खड्डे भरणार का? अशी विचारणा केली. यावेळी प्रशासनाने, प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली आहे. खड्ड्यामुळे अपघात झाला नाही असा दावा करत पुढील आठवड्यापासून शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती केली जाईल. दहा दिवसात धोकादायक खड्डे बुजवणार.’असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

साडेचार एकर जागा परत जाणार?

एमआयडीसी येथील चार एकर जागा केएमटीला मिळणार आहे. त्यासाठी एक कोटी ३० लाख रुपये केएमटीने भरले आहेत. या ठिकाणी ३० टक्के बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र बांधकाम केले नसल्याने संबंधित जागा एमआयडीसीने परत घेण्याबाबत केएमटीला पत्र दिले आहे हे खरे आहे का? अशी विचारणा सदस्य सत्यजित कदम यांनी केली. तीस टक्के बांधकामासाठी सहा ते सात कोटी खर्च अपेक्षित आहे. केएमटीची आर्थिक परिस्थिती नाही. मग एक कोटी का भरले. त्याची जबाबदारी कोणावर निश्चित करायची असा प्रश्न केला. अधिकाऱ्यांनी पुढील बैठकीला माहिती देऊ असे सांगितले.


बागेतील पाणी खासगी बस धुण्यासाठी

रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यालगतच्या बागेतील पाणी खासगी बसेस धुण्यासाठी वापरले जाते. महापालिकेच्या वॉचमनला दमदाटी करतात. त्यांच्यावर कारवाई करा अशी सूचना उमा इंगळे यांनी केली. सदस्य निलेश देसाई यांनी बिल्ड‌िंगसाठी अग्निरोधक साधने बसविणे आवश्यक आहे. मात्र याचा फायदा घेऊन परवान्यापुरते साधने बसवतात व नंतर काढून घेतात त्यावर कारवाई करण्याची सूचना केली. सदस्या दीपा मगदूम यांनी फूटपाथवरील अतिक्रमण, तावडे हॉटेल परिसरातील बांधकामाचा मुद्दा मांडला. यावर प्रशासनाने, तावडे हॉटेल परिसरातील बांधकामाबाबत सुनावणी सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नकाशा सादर केला आहे. २० दिवसात हद्दीबाबत निर्णय होईल असे उत्तर दिले. जयश्री चव्हाण यांनी न्यू महाद्वार रोडवरील अतिक्रमणाकडे लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या मल्लांचे स्थलांतर

$
0
0

Raviraj.gaikwad@timesgroup.com

Twitter – @rg_ravirajMT

कोल्हापूर : एकेकाळी कुस्तीपंढरी ही बिरुदावली मिरविणाऱ्या कोल्हापुरातील पैलवानांना दुसऱ्या शहरात जाऊन कुस्तीचे धडे गिरवावे लागत आहते. काही तालमींच्या वादात पिचत बसण्यापेक्षा पुण्यात जाऊन सराव केलेला बरा, असा विचार करून मल्ल पुण्याचा रस्ता धरत आहेत. मात्र, या परिस्थितीचे गांभीर्य कोल्हापुरातील कुस्ती क्षेत्रातील जाणकाराना आहे असे वाटत नाही. कोल्हापूर तालीम संघ आणि वस्तादसुद्धा ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढे येत नाहीत. भविष्यात अशी स्थिती राहिली, तर कोल्हापूरची कुस्ती केवळ छायाचित्रांत पाहण्यापुरती राहील आणि कोल्हापूरच्या तालमी केवळ पर्यटकांना ‘इथे पैलवान सराव करायचे’, हे दाखवण्यापुरत्या उरतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोल्हापूरच्या मातीत कुस्ती केवळ रुजली नाही, तर राजर्षी शाहू महाराजांनी खेळाला राजाश्रय दिल्याने ती जगभरात पोहोचली. एकेकाळी उत्तर भारत, पाकिस्तानातील पैलवान कोल्हापुरात धडे गिरवण्यासाठी, तब्येत कमावण्यासाठी कोल्हापुरात यायचे. पण, त्या कोल्हापुरात आज परिस्थिती वेगळी आहे. कोल्हापूरच्या कुस्तीगिरांनी काळाची पावले ओळखली नसल्याचे जाणकार म्हणतात. त्याचबरोबर वर्चस्ववादाचा फटका उदयोन्मुख पैलवानांना बसत आहे. जगभरात असलेल्या मॅट कुस्तीचा ट्रेंड येथील वस्तादांनी स्वीकारला नाही. त्यामुळं टँलेंट असूनही कोल्हापुरचे मल्ल राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मागे पडू लागली आहेत. काही मोजक्या ठिकाणी आधुनिक कुस्तीचे धडे गिरवले जात असले, तरी त्याचा कोल्हापूरच्या एकूण कुस्ती क्षेत्रावर फारसा परिणाम होईल, असे जाणकारांना वाटत नाही.

सध्या कोल्हापुरातून पुण्यात काका पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल आणि सह्याद्री कुस्ती संकुलात मोठ्या प्रमाणावर मुले जात आहेत. यात काका पवार यांच्याकडे २०० पैकी सुमारे २५ पैलवान कोल्हापूरचे आहेत. सह्याद्री कुस्तीसंकुलातही जवळपास २० पैलवान कोल्हापूरचे आहेत. या दोन्ही ठिकाणी निवासी संकुले असल्यामुळे केवळ खाण्याची व्यवस्था आपण करायची आणि दिवसभर कुस्तीचे धडे गिरवायचे, असा पैलवानांचा नित्यक्रम आहे.

काका पवारांकडे पाच राष्ट्रीय पातळीवरचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन मोठ्या मॅटवर मुले सराव करतात. कोल्हापुरातील नंदगावचा विक्रम कुऱ्हाडे सध्या काका पवार यांच्याकडेच ग्रीको रोमन कुस्तीचे धडे गिरवत आहेत. याच प्रकारात त्याने राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. काका पवार रेल्वेमध्ये असल्यामुळे तेथे नोकरीची संधी मिळेल, अशी अपेक्षा कोल्हापूरच्या पैलवानांना असते. सह्याद्री संकुल विजय बराटे चालवतात. त्यांच्याकडेही कोल्हापूरच्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. केवळ मामासाहेब मोहेळ यांच्याकडे कोल्हापूरची मोजकेच मल्ल आहेत. पण, पवार आणि सह्याद्री संकुलात संख्या जास्त झाल्यास भविष्यात कोल्हापूरचे पैलवान मोहळ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

जसे, शेतात पेरण्यासाठी बी चागले लागतं. तसे दर्जेदार मल्ल कोल्हापूरच्या कुस्तीगिरांच्या माध्यमातून मी पाहतो. कोल्हापुरात त्या बियाण्याला पाणी घालणारे कोणी नाही. त्यामुळे जिथे जास्त सराव मिळतो तिथे, मुलं शिकायला जातात. कोल्हापुरात चांगली सेंटर नाहीत. त्यामुळं मुलं आमच्याकडे येतात. या मुलांच्या रक्तातच कुस्ती असते, त्यामुळे आम्हाला त्यांना शिकवण्यासाठी सोपे जाते.

- काका पवार, प्रमुख, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, पुणे

निवड चाचणीत पक्षःपातीपणा?

महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणीत सलग दोन वर्षे त्याच चार खेळाडूंची निवड झाली हा योगायोग नाही. कारण, निवड चाचणी पक्षपातीपणाचा आरोप एका ज्येष्ठ वस्तादाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर केला आहे. यात ‘हा माझ्या तालमीचा, तो तुझ्या तालमीचा’ असा दुजाभाव केला जात असून, मर्जीतल्या पैलवानांना पुढे संधी दिली जाते. निवड चाचणी नावालाच असल्याचे त्या वस्तादाने ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठासाठी लोकप्रतिनिधींचा मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) सुरू व्हावे, यासाठी सुरू असलेले आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला आहे. आंदोलनाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. १ फेब्रुवारीला सहा जिल्ह्यातील ६३ तालुक्यांमध्ये मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे निवेदन दिले जाणार आहे. शुक्रवारी (ता. १३) न्यायसंकुलात झालेल्या खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

खंडपीठ कृती समितीने १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू आहे. ४५ दिवस उलटल्यानंतरही राज्य सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्याने पुढील दिशा ठरवण्यासाठी कृती समितीने शुक्रवारी न्यायसंकुलात बैठक आयोजित केली होती. बैठकीत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ३ खासदार, ११ आमदार आणि पालकमंत्र्यांनाही निमंत्रित केले जाणार आहे. शिवाय महापालिकेतील लोकप्रतिनिधींचाही समावेश या मेळाव्यात असेल.

खंडपीठ आंदोलनात सहा जिल्ह्यातील वकील संघटना, पक्षकार संघटना, सामाजिक संस्थांसह नागरिकही सहभागी आहेत. गेली २८ वर्षे एकाच प्रश्नावर सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू असूनही राज्य सरकार आणि न्याय यंत्रणेकडून हा प्रश्न प्रलंबित आहे, त्यामुळे १ फेब्रुवारीला कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसह ६३ तालुक्यांमध्ये मोटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या रॅलीमध्ये वकील, पक्षकार यांच्यासह सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचाही सहभागी होणार आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना, तर तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देऊन याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रकाश मोरे यांनी दिली. सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. हरिष प्रताप, साताराचे उपाध्यक्ष गजानन घाडगे, इस्लामपूरचे एस. डी. पाटील, भाऊसाहेब पवार, प्रताप हारुगडे, आर. आर. पाटील, आदी उपस्थित होते..


वकील लढणार अवमान याचिका

खंडपीठाचा निर्णय प्रलंबित ठेवल्याने संतप्त झालेल्या खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहीत शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. शिवाय सुमारे दोन महिने कोर्ट कामकाजावर बहिष्कार टाकून कामबंद ठेवले होते. कोर्ट कामकाजात सहभाग न घेतल्याने संबंधित वकिलांवर उच्च न्यायालयाने अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेत खंडपीठ कृती समितीची बाजू जोरकसपणे मांडण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. यासाठी २२ जानेवारीला कृती समितीचे पदाधिकारी उच्च न्यायालयातील वरिष्ठ विधिज्ञ अनिल साखरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुल्कवाढ तातडीने मागे घ्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्र सरकारने केलेली विविध १५ प्रकारची शुल्कवाढ येत्या १ फेब्रुवारीपर्यंत मागे न घेतल्यास एक फेब्रुवारीला कार्यालय बंद पाडण्यात येईल, असा शुक्रवारी देण्यात आला. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या रिक्षा संघटनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर स्वतंत्र मोर्चे काढण्यात आले.. त्यावेळी हा इशारा देण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या मोर्चाचे नेतृत्व केले. याबाबतचे निवेदन परिवहन आयुक्त कार्यालयला पाठविण्याचे आश्वासन आरटीओ डॉ. डी. टी. पवार यांनी दिले.

आमदार क्षीरसागर म्हणाले, येत्या मंगळवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेणार आहे. नागपुरात एकही ऑटोरिक्षाला मीटर नाही. प्रवाशांकडून दीडशे ते दोनशे रुपये आकारले जातात. मात्र कोल्हापुरात नवे प्रयोग राबविले जात आहेत. कोल्हापुरात दहा हजार कुटुंबे रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहेत. रिक्षा पासिंगसाठी पूर्वी आकारण्यात येणारे दोनशे रूपये शुल्क एकूण ६०० रूपये झाले आहे. त्यासह दिवसाला ५० रूपये दंड करण्यात येणार आहे. आरसीवर कर्जाचा बोजा लावण्यासाठी १०० रूपयांचे शुल्क १५०० रूपये केले आहे. त्याचा फटका रिक्षाव्यवसाला बसणार आहे.

आरटीओ पवार म्हणाले, ‘केंद्र सरकारने शुल्कवाढीबाबत हरकती मागविल्या होत्या. मात्र त्यासाठी कुणीही हरकती घेतल्या नाहीत. मागण्यांचे निवेदन वरिष्ठांपर्यंत पाठविले जाईल.’ त्यावर क्षीरसागर म्हणाले की, रिक्षाचालक मोबाइल, इंटरनेट वापरत नाहीत. बहुतांशी रिक्षाचालकांकडे नेटपॅकसाठी पैसे नसतात. त्यामुळे हरकतीची माहिती देण्यासाठी रिक्षा संघटनांची बैठक घेणे अपेक्षित होते.’

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा उपस्थित होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळात रमेश पोवार, जाफर मुजावर, अमोल पांढरे, अभि बांद्रे, महेश मस्के, अतुल झोरे, बाबू गावडे, निवास चौगुले, सुनील पाटील आदींचा समावेश होता.

शिवसेनेचे शिष्टमडंळ प्रवेशद्वारात असताना भारतीय जनता पक्षाच्या रिक्षा संघटनांच्या शिष्टमंडळ दाखल झाले. त्यांनी संघटनेचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय आप्पासाहेब गायकवाड, जिल्हा सरचिटणीस विजय रघुनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ डॉ. डी. टी. पवार यांची भेट घेतली. येत्या आठवडाभरात रिक्षा व्यवसायाशी संबधित असलेल्या सर्व मागण्यांबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, अशा इशारा जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी दिला.

मोर्चात सहभागी रिक्षाचालकांनी भाजप रिक्षा संघटनाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अवैध वाहतूक रोखावी, अन्यायी शुल्कवाढ रद्द करा, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. शिष्टमंडळात संजय केसरकर, अतुल माळकर, विजय सातपुते, अशोक जाधव, विनोद जाधव, अनिकेत साकवेकर आदींचा समावेश होता.

०००

स्वच्छतेचे तीन तेरा

आरटीओच्या शिष्टमंडळासोबत आरटीओने कार्यालयाच्या सभागृहात चर्चा केली. त्यावेळी सभागृहातील खुर्च्या धुळीने माखलेल्या होत्या. यावर रिक्षाचालकांनी संताप व्यक्त केला. या खुर्च्यावर बसण्यापेक्षा रिक्षाचालकांनी उभे राहणेच पसंत केले.

०००००००

गटबाजी उघड

शिवसेनेचा मोर्चा सुरू असताना शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांना मानणारे पाच ते दहा रिक्षाचालक आरटीओ केबिन्ससमोर बसले होते. मोर्चा सुरू झाला. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग घेतला नाही. त्यामुळे शिवसेनेतील गटबाजीची चर्चा रिक्षाचालकांत सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक खिडकीसाठी सॉफ्टवेअरची गरज’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

बांधकाम परवान्यासाठी ‘एक ​खिडकी योजना’ करताना तांत्रिक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन करावा. तसेच येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी लिफ्टची सोय करावी, अशी सूचना आर्किटेक्टस अँड इंजीनिअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन ‘एक खिडकी’ योजनेचे स्वागत केले. तसेच ड वर्ग विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

एकाच छताखाली परवानगी प्रक्रिया आल्यामुळे प्रत्येक अधिकारी स्तरावर वेळेचे नियोजन करावे आणि परवाना देण्याचा कालावधी निश्चित करण्याची सूचना ही असोसिएशनमार्फत करण्यात आली. शिष्टमंडळात माणिक पाटील, संदीप घाटगे, अंजली जाधव यांचा समावेश होता. विशिष्ट कालावधीतच ग्राहकांना परवाना मिळण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी असेही सुचविण्यात आले. ‘एक ​खिडकी’ योजनेमुळे बांधकाम परवान्याची प्रक्रियेत एकसूत्रीपणा येईल. ही योजना लागू केल्याने कामकाज गतिमान होणार आहे. परवानगीची प्रक्रिया गतिमान झाल्याने बांधकाम क्षेत्र हे महापालिकेच्या उत्पन्नाचे दुसऱ्या क्रमांकांचे साधन बनेल.

‘एक खिडकी’मुळे आर्किटेक्टस, इंजीनिअर्स, बांधकाम व्यावसायिक व नागरिकांना यापूर्वी वेगवेगळ्या विभागीय कार्यालयांत जाण्यासाठी होणारा त्रास व वेळ वाचणार असल्याने पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. चार विभागीय कार्यालये एकत्र आणत असताना प्रशासनाने सक्षम व पुरेशी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. सर्व प्रकरणाची छाननी करुन बांधकाम परवानगी प्रक्रिया पार पाडण्यासाठी कालावधी निश्चित करावा. योजनेच्या अंमलबजावणीमुळे एकाच इमारतीत नगरिक व कन्सल्टंटची संख्या वाढणार आहे. कामकाज व तां​​त्रिक बाबी संदर्भात चर्चा करण्यासाठी कन्सल्टंटकरिता वेगळा कक्ष स्थापन करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा गणेश मंडळांकडून माफीनामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या १२ सार्वजनिक मंडळांनी माफीमाने लिहून दिले आहेत. अद्याप चार मंडळाचे खुलासे अद्याप प्राप्त झालेले नाहीत. १६ मंडळाचे खुलासे मिळाल्यानंतर सर्व मंडळांविरोधात कोर्टात खटले दाखल करण्यात येणार आहेत.

गेल्यावर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानुसार डॉल्बीमुक्त गणेशोत्सव उपक्रमाला बहुतांशी मंडळांनी प्रतिसाद दिला. विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या मंडळांविरोधात कारवाईचा इशारा दिला होता. पण, काही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मध्यरात्रीनंतर १६ मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट करून डॉल्बीमुक्त उत्सवाला हरताळ फासला होता. आवाजाची मर्यादा पाळण्याचे आश्वासन देऊनही ती ओलांडल्याबद्दल पोलिसांनी १६ मंडळांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ध्वनीप्रदूषण कायद्याखाली गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी मंडळांची मुख्य कार्यकारिणी आणि उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यामुळे १६ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेत कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना थेट अटक न करता मंडळांना डिसेंबरमध्ये कारणे दाखवा नोटीस बजावली. मंडळाचे अध्यक्ष, उत्सव समितीचे अध्यक्ष, डॉल्बीमालक, ट्रॅक्टरमालकांनी नोटीशीला उत्तर दिले आहे. १२ मंडळांनी डॉल्बी लावून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी माफीनामे लिहून दिले आहेत. तसेच यापुढे डॉल्बी लावणार नाही, असे लिहून दिले आहे. माफीनाम्यामुळे मंडळांवरील कारवाई टाळली जाण्याची शक्यता वर्तवली असली तरी नियमाप्रमाणे पोलिस १६ मंडळांविरूद्ध खटले दाखल करणार आहेत. त्यासाठी विशेष सरकारी वकीलही नियुक्त करण्यात येणार आहे. ध्वनीप्रदूषण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यास संबंधित मंडळाला एक लाख रुपये दंड आणि पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते.

माफीनामे लिहून दिलेली मंडळे

फिरंगाई तालीम मंडळ, बागल चौक मित्र मंडळ, राजे संभाजी तरुण मंडळ, पिंटू मिसाळ बॉईज, पाटाकडील तालीम मंडळ, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, आझाद हिंद तरुण मंडळ, दयावान ग्रुप, उमेश कांदेकर युवा मंच, क्रांती बॉईज, रंकाळावेस तालीम मंडळ, गणेश तरुण मंडळ, नंगीवली तालीम मंडळ

माफीनामा लिहून न दिलेली मंडळे

हिंदवी स्पोर्टस्, सुबराव गवळी तालीम मंडळ प्रॅक्टीस, बीजीएम स्पोर्टस, बाबूजमाल तालीम मंडळ


१६ मंडळांवर ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. १२ मंडळांनी नोटिशीला उत्तर दिले आहे. १६ मंडळांचे खुलासे आल्यानंतर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन खटले दाखल केले जाणार आहेत.

भारतकुमार राणे, शहर पोलिस उप अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिशां हॉटेल परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0

लिशां हॉटेल परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडली. चोरट्यांनी चार किराणामालाची दुकाने आणि एक औषधाचे अशा पाच दुकानांतून अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये चोरुन नेले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली.

लिशां हॉटेल परिसरात एकूण सहा दुकान गाळे असून चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री पाचही दुकानाची शटरची दोन्ही बाजूची कुलूपे व सेंट्रल लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. नानासो पाटील यांच्या देवेंद्र जनरल स्टोअर्समधील ४०० रुपयांची चिल्लर चोरुन नेली. दीपक नागदेव यांच्या शीतल किराणा स्टोअर्समधील रोख एक हजार रुपये चोरले. मुकेश वाधवानी यांचे आनंद किराणा स्टोअर्स गेले काही दिवस बंद आहे. या दुकानात चोरट्यांना काही मिळाले नाही. कन्हैय्या वाधवानी यांच्या गुरुकृपा स्टोअर्समधील रोख एक हजार रुपये आणि अन्य माल चोरुन नेला तर पाचव्या गाळ्यातील मुक्ताई आयुर्वेदिक होमिओपॅथी औषधालयातील रोख वीस हजार आणि १५ साबणही चोरुन नेले. डॉ. प्रभू खलचे यांचे हे दुकान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकांना भाजपचे निमंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘तीळगूळ घ्या, भाजपमध्ये लवकर,’ या असे म्हणत संक्रांतीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. महाडिक पक्षात नसले तरी ते पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी त्यांच्या शिरोलीतील निवासस्थानी जाऊन संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाच आमंत्रणही दिले. दरम्यान, काँग्रेसमधील मतभेद मिटवण्यासाठी रविवारी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांची बैठक होणार आहे.

महापालिका निवडणुकीत महाडिक यांनी भाजपला मदत केल्याने काही ठिकाणी कमळ फुलण्यास मदत झाली. ताराराणी आघाडी सध्या भाजपसोबत आहे. या आघाडीला महाडिक यांची ताकद आहे. त्याचे नेतृत्व त्यांचे चिरंजीव स्वरूप महाडिक करत आहेत. या पार्श्वभूमीवर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री पाटील यांनी महाडिक यांचे निवासस्थान गाठले. त्यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. महाडिक यांचा सल्ला घेत अनेकांनी भाजप प्रवेश सुरू केला आहे. त्यात गोकुळचे संचालक रणजित पाटील व प्रविण पाटील यांचा समावेश आहे. या प्रवेशाबरोबरच अनेकांच्या भाजप प्रवेशाबाबत या दोन्ही नेत्यांची बराच वेळ चर्चा झाली.

जिल्ह्यात कुठे कुणाशी आघाडी करायची याबाबत चर्चा करतानाच जागावाटपाबत काही पर्याय सुचवण्यात आले. शिवसेना, स्वाभिमानी हे दोन्ही पक्ष भाजपबरोबर रहावेत यासाठी महाडिक यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती पाटील यांनी केली. स्वाभिमानीने काही ठिकाणी स्वतंत्र तर काही ​जागेवर युतीची भूमिका घेतली आहे. यामुळे या पक्षाचे खासदार राजू शेट्टी व जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांच्याशी रविवारी मंत्री पाटील चर्चा करणार आहेत.

धैर्यशील माने भाजपमध्ये ?

जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांच्या प्रवेशासाठी खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या मंगळवारी माने गटाचा मेळावा बोलवण्यात आला आहे. यावेळी धैर्यशील माने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. शेट्टी यांनी शह देण्यासाठी भाजपतर्फे ही खेळी सुरू असल्याचे समजते.


काँग्रेस कमिटीत आज बैठक

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्यातील दुरावा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांची अजून एकही बैठक झाली नाही. या दुराव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यात नाराजी आहे. यामुळे मतभेद मिटवून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रविवारी या दोन्ही नेत्यांची काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक होणार आहे. यावेळी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images