Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मानवाधिकार आयोगालासाक्षी पाठविल्या

$
0
0

बेळगाव
येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितलेल्या याचिकाकर्त्यांपैकी दोघांच्या साक्षी प्रतिज्ञापत्रांद्वारे पोस्टाने आयोगाला पाठविण्यात आल्या आहेत. प्रकाश लक्ष्मण पाटील आणि मनोहर ईश्वर पाटील, अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत.
येळ्ळूर गावच्या प्रवेशद्वारात असलेला महाराष्ट्र राज्य फलक कर्नाटक सरकारने पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्यावर येळ्ळूर मराठी भाषिकांनी पुन्हा महाराष्ट्र राज्य येळ्ळूर असा फलक उभारला होता. फलक पुन्हा उभारण्यात आल्यामुळे शेकडो पोलिस येळ्ळूरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी येळ्ळूरच्या जनतेवर अमानुष अत्याचार केले होते. वृद्ध, महिला, तरुण, लहान मुले यांना पोलिसांनी लक्ष्य करून अमानुष मारहाण केली. काही जणांची डोकी फुटली, अनेकांचे हातपाय मोडले होते. पोलिसांच्या या क्रौर्याची तक्रार महाराष्ट्राचे मंत्री विनोद तावडे यांच्यासह एकूण चौसष्ट जणांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन कर्नाटक पोलिस महासंचालकांना येळ्ळूर घटनेसंबंधी अहवाल सादर करण्यास सांगितला होता. पोलिस महासंचालकांनी केवळ कन्नड वृत्तपत्रे, कार्यकर्ते, कन्नड वृत्तवाहिन्या यांचा आधार घेऊन सत्य दडपून पाचशे पानाचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालाला याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याचिकाकर्त्यांच्या साक्षी मांडण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे प्रकाश लक्ष्मण पाटील आणि मनोहर ईश्वर पाटील या दोन याचिकाकर्त्यांचे वकील महेश बिर्जे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे साक्षी पाठविल्या आहेत.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने येळ्ळूर घटनेची दखल गांभीर्याने घेतली आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. महेश बिर्जे यांनी दिली. साक्षी नोंदविण्याच्या कामात बिर्जे यांना अॅड. विष्णू झांजरी यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुमश्चक्री प्रकरणीसहा जणांना अटक

$
0
0

सातारा

आमदार शिवेंद्रराजेच्या सुरुचि बंगल्यावर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. शेखर उर्फ संतोष बबन चव्हाण (रा. शनिवार पेठ, सातारा) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे.
सुरुचि बंगल्यावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार धुमश्चक्री उडाली होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही राजे गटांच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.
शनिवारपर्यंत पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाच्या चौघांना तर खासदार उदयनराजे भोसले गटाच्या एका कार्यकर्त्याचा समावेश होता. तसेच आता सातारा शहर पोलिसांनी उदयनराजे गटाचा शेखर उर्फ संतोष चव्हाण याला पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा पावसाने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि परिसराला रविवारी दुपारनंतर जोरदार पावसाने झोडपून काढले. आठवडी बाजार आणि अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारासाठी आलेल्या नागरिकांची आणि विक्रेत्यांची जोरदार पावसाने त्रेधातिरपीट उडाली. लक्ष्मीपुरी बाजारात पाणी तुंबल्याने विक्रेत्यांना बाजार गुंडाळावा लागला. दोन तासांहून अधिक काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

शनिवारी दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह सुमारे दोन तास पाऊस झाला. अचानक झालेल्या जोरदार पावसाने रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते लागले. पावसाने कसबा बावडा, लक्ष्मीपुरी येथील आठवडा बाजारांतील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. लक्ष्मीपुरीतील बाजारातील सखल भागांत विक्रेत्यांनी मांडलेला भाजीपाला पाण्यासोबतच वाहून गेला. त्यामुळे विक्रेत्यांनी आपला व्यवसाय गुंडाळून घरी जाणे पसंत केले. चौकाचौकातील फेरीवाले मिळेल तिथे आसरा घेताना दिसत होते.

राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड आणि गांधीनगर येथे दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. मात्र, पावसाने या खरेदीतही अडथळे आले. हातातील पिशव्या सांभाळत पावसापासून बचाव करणारे ग्राहक दिसून येत होते. महाद्वार रोड, लक्ष्मी रोडवर रस्त्याकडेच्या विक्रेत्यांना आपले साहित्य झाकून ठेवण्यासाठी धावपळ करावी लागली. विक्रीस आणलेले साहित्य भिजल्याने अनेकांचे नुकसान झाले. टायटन शोरूम परिसर, कसबा बावडा रस्त्यावरील न्यायसंकूल, लक्ष्मीपुरीतील बाजार येथे पाणी साठले. त्यातूनच दुचाकी, चारचाकी, रिक्षांची ये-जा सुरू होती. काही विक्रेत्यांकडून पाण्यात थांबून वस्तुंची विक्री सुरू होती.

घरांमध्ये घुसले पाणी

शहरातील फुलेवाडी, विक्रमनगर, रमणमळा, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, जाधववाडी, भोसलेवाडी, बापट कॅम्प या सखल भागातील काही घरांमध्ये पाणी घुसले. पावसानंतर उशिरार्यंत संबंधित कुटुंबांतील सदस्य पाणी घराबाहेर काढताना दिसत होते. डांबरीकरण नसलेल्या उपनगरांतील रस्त्यांवर दलदलीचे साम्राज्य होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेस‌िडेन्सी क्लबमध्ये प्रोग्रेस‌िव्ह ग्रुपची बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
दोन पॅनेल व त्यांच्यामध्ये झडलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे गेल्या आठवड्यात चर्चेत आलेल्या रेसिडन्सी क्लबच्या हाय प्रोफाइल निवडणुकीत अखेर सतिश घाटगे यांच्या नेतृत्वाखालील प्रोग्रेसिव्ह ग्रुपने पंधरा पैकी १३ जागांवर विजय मिळवत बाजी मारली. तर दिलीप मोहिते यांच्या प्रोग्रेसिव्ह ग्रुप ओरिजनला केवळ दोन जागा मिळाल्या. प्रचारापासून सुरू झालेली इर्षा मतदानामध्येही दिसून आली. व्यवसाय, नोकरीनिमित्त अनेक परजिल्ह्यात असलेल्या सभासदांनाही खास मतदानासाठी पाचारण करण्यात आले होते. या प्रचंड इर्षेमुळे १७१२ पैकी तब्बल १४५३ सभासदांनी मतदान केले.
प्रोग्रेसिव्ह ग्रुप १९९२ व प्रोग्रेसिव्ह ग्रुप ओरिजनल अशा दोन पॅनेलमध्ये क्लबच्या १५ संचालकाच्या जागेसाठी निवडणूक झाली. प्रोग्रेसिव्ह ग्रुपमधून सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी व खजानिस यांच्यासह सात विद्यमान संचालक तर ओरिजनल पॅनेलमधून आठ विद्यमान संचालक निवडणूक लढवत होते. दोन्ही पॅनेलकडून दोन आठवड्यापासून प्रचारासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. एकमेकांवर करण्यात आलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे तसेच प्रत्येक सभासदापर्यंत जाऊन करण्यात आलेल्या प्रचारामुळे मतदानासाठी प्रचंड उत्सुकता होती. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मतदानासाठी सभासद मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. प्रोग्रेसिव्ह ग्रुप ओरिजनलच्या समर्थकांनी व उमेदवारांनीही पांढरा शर्ट परिधान केला होता. त्यावर निवडणूक चिन्ह असलेल्या विमानाचा बॅच लावला होता. तर प्रोग्रेसिव्ह ग्रुपच्या समर्थक व उमेदवारांनी ग्रे रंगाचे टी शर्ट परिधान केले होते. सभासदांची वाहने पितळी गणपती ते पोस्ट ऑफिसपर्यंतच्या रस्त्यावर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारात लावण्यात आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. दुपारी बारा वाजेपर्यंतच एकूण मतदानाच्या निम्मे मतदान झाले होते. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदिप नरके, आमदार अमल महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनी मतदान केले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर रात्री अकरा वाजता मतमोजणी पुर्ण होऊन निकाल जाहीर केला. निकालानंतर प्रोग्रेसिव्ह ग्रुपच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांनी काम पाहिले.
सातव्या फेरीनंतर ओरिजनला दुसरी जागा
चौथ्या फेरीअखेर प्रोग्रेसिव्ह ग्रुप ओरिजनलचे अभिजीत मगदूम पंधराव्या स्थानावर आले होते. त्यानंतर सहाव्या फेरीअखेर मगदूम अकराव्या स्थानावर पोहचले तर चौदाव्या स्थानावर प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे समीर काळे व ओरिजनलचे दिलीप मोहिते या दोघांनाही ६०३ मते तर पंधराव्या स्थानासाठी मनोज वाधवानी यांना ६०१ मते पडली होती. सातव्या व आठव्या फेरीअखेर दिलीप मोहिते यांना ७४२, समीर काळे यांना ७२६ मते पडली. शेवटच्या फेरीपर्यंत पंधराव्या स्थानासाठी चुरस निर्माण झाली होती. यामुळे ओरिजनल ग्रुपला केवळ या दोन जागा मिळाल्या.
विजयी उमेदवार व मते
सतिश घाटगे ९६०, अमर गांधी ८६१, नीलकांत पंडीत ८४१,बसवराज खोबरे, ८२२, सचिन झंवर ८०८,केदार हसबनीस ८०१,रवी संघवी ७८२, शीतल भोसले ७७७, मानसिंग जाधव ७६७, अभिजीत मगदूम ७६१, नरेश चंदवाणी ७४७,विक्रांत कदम ७४७, डॉ. दिपक आंबर्डेकर ७४३, समीर काळे ७२६ (सर्व प्रोग्रेसिव्ह ग्रुप), अभिजीत मगदूम ७६१, दिलीप मोहिते ७४२ (प्रोग्रेसिव्ह ग्रुप ओरिजनल)
...
हा सभासदांचा विजय
हा विजय सभासदांचा असून त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच बहूमत मिळाले. त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून आलो. विरोधकांनीही जोरदार प्रयत्न केले, त्यांचेही अभिनंदन.
सतिश घाटगे



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला करूया फराळाची तयारी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दिवाळी म्हणजे विविध चवींच्या फराळाची मेजवानीच असते. तिखट, गोड तसेच वेगवेगळ्या भागातील फराळ चाखण्याची जणू पर्वणीच असते. वेगवेगळ्या फराळांच्या पदार्थांची रेसिपी व प्रात्यक्षिके ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कल्चर क्लब आणि ‘हॉटेल केट्री’च्यावतीने आयोजित केली आहेत. यामध्ये फराळाचे विविध पदार्थ शिकण्याची संधी मिळणार आहे. शेफ नॉलेज बँक या नाविन्यपूर्ण रेसिपी शोमधून खाद्यसंस्कृतीची माहिती आणि प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत.

गुरुवारी (१२ ऑक्टोबर) दुपारी तीन ते पाच यावेळेत शिवाजी पार्कमधील हॉटेल केट्री येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कल्चर क्लब सभासदांसह सर्वांसाठी ही एक अनोखी संधी आहे. यामध्ये ग्रीन चिवडा, डाळमोथ, नवरंग लाडू, सोयाबेसन चकली, साठे, मिक्स चिवडा विथ कॉर्नफ्लेक्स असे अनेक अनोखे पदार्थ शिकवले जाणार आहेत.

यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या कल्चर क्लब सदस्यांना १०० रुपये तर अन्य इच्छुकांना ३०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कमध्ये कल्चर क्लबचे सदस्यत्वही दिले जाणार आहे. नावनोंदणी करणे आवश्यक असल्याने नोंदणीसाठी ९७६७८९०६२६ या क्रमांकावर मेसेज करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आळते परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

$
0
0

हातकणंगले

दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी चारपासून हातकणंगले तालुक्यांतील काही गावात विजेच्या कडकडासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर आळते परिसरात ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने सुमारे दोन तासात दाणादाण उडवली. पावसाच्या भितीने कापून ठेवलेली सोयाबीन,भूईमूगाचे पिके या जोरदार पावसात वाहून गेली.

तालुक्यातील हातकणंगले, आळते, कुंभोज, पेठ वडगाव, रुकडी, हेरले, शिरोली, हुपरी, रेंदाळ, पट्टणकोडोली, रांगोळी या परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत संततधारपणे बरसत होता. पावसामुळे शेतात पाणी साचून राहील्याने सोयाबीन, भूईमूग या पिकांना कोंब येण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ही पिके भर पावसात कापून बांधावर रचून ठेवली आहेत. मात्र आळते परिसरात अचानक झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने बांधावरील रचलेली पिके वाहून गेली. दररोजच्या पावसाने होणाऱ्या पिकांच्या नुकसानीने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा’त अजूनही गांजाचा धूर

$
0
0

satish.gahtage@timesgroup.com

Twitt:@satishgMT

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात गांजा व मोबाइल आत नेणाऱ्या डंपर चालकाला अटक झाल्यानंतर अजूनही कारागृहात गांजाचा धूर निघत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘सापडला तो चोर’ या उक्तीप्रमाणे ही कारवाई प्रथमदर्शनी दिसत असली तरी छुप्या रॅकेटचा शोध घेण्याचे आव्हान कारागृह प्रशासन आणि पोलिसांसमोर आहे.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट, टोळी युद्धासह गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आहेत. या आरोपींना पैशाची छुपी रसद मिळते. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरले जाते, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये कळंबा कारागृहातील गांजा पार्टी व चिकन पार्टीचा मोबाइलवरील व्हिडिओ व्हायरल झाल्यनांतर एकच खळबळ उडाली. एका कैदानेच हा व्ह‌िड‌ीओ केल्याचे समजते. त्यामुळे कळंबा कारागृहाच्या सुरक्षेची लक्तरे बाहेर पडली. गांजा पार्टी प्रकरणानंतर जेलर उत्तरेश्वर गायकवाड यांची बदली करण्यात आली तर सुरक्षा रक्षक विजय टिपुगडे, मनोज जाधव, युवराज कांबळे यांना निलंबित करण्यात आले. कर्मचाऱ्यांचे निलंबन व अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

कळंबा कारागृहातील गांजापार्टी बंद झाली असे सकृतदर्शनी वाटत असले तरी गेल्या सहा महिन्यांत कारागृहात गांजाचा पुरवठा करणाऱ्या दोघांना अटक केल्याने कारागृहात गांजाची विक्री होत नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. गांजासोबत, मोबाइल, चार्जरही एकूण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.

कारागृहाच्या सुरक्षिततेसाठी ८० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तसेच कंट्रोल रुमही करण्यात आली. त्यामुळे कारागृहाच्या कानाकोपऱ्याची माहिती कळू शकते. सीसीटीव्हीच्या कक्षेत न येता गांजा व मोबाइल पुरवण्याच्या घटना घडू शकतात हे डंपर चालकाच्या अटकेवरुन पुढे आले आहे. २०१५ मध्ये गांजा पार्टीची घटना उघडकीस आल्यानंतर कारागृहाच्या चार भिंतीआड सुरू असलेली कृत्ये ११ वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या कैद्याने आपला चेहरा उघड न करता इलेक्ट्रॉनिक मीडियापुढे उघड केली. कळंबा कारागृहात ३० ते ३५ मोबाइल असल्याचा आरोप त्याने केला होता. कैद्यांना मोबाइल पुरवताना यात अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत का याचा तपास होण्याची गरज आहे. मोबाइल बाळगण्यासाठी अधिकाऱ्यांना ३० ते ३५ हजार रुपये, चार्जिंगसाठी कर्मचाऱ्यांना १५०० रुपये द्यावे लागतात तर ५० रुपयांचा गांजा दोन हजार रुपयाला विकला जातो, असे जन्मठेप भोगून आलेल्या कैदाने मुलाखतीत आरोप केला होता. कैद्यांना गांजा व मोबाइल पुरवठ्यातून मलई गोळा केली जात असल्याची शंका घेण्यास वाव आहे. कारागृहाबाहेरून गांजा व मोबाइल पुरवणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेण्याची गरज आहे.

गांजा विक्रीची केंद्रे पोलिसांना सापडेनात

कोल्हापुरात अनेक ठिकाणी गांजाची विक्री होत आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये राजारामपुरी पोलिसांनी असिब नबीलाल मोमीनला अटक करुन आठ किलो २८८ ग्रॅम जप्त केला होता. या गांजाची किंमत एक लाख ३२ हजार, ५०० रुपये इतकी होती. अटक केलेला असिब हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एक वर्षापूर्वी मेरी वेदर मैदानावर १० किलोचे गांजाचे पॅकेट पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक केली होती. पण दोन्ही गुन्ह्यात गांजाचा प्रवास कोल्हापूरपर्यंत कसा होता याचा तपास करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिद्री’ साठी इर्षेने मतदान

$
0
0

कोल्हापूर

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीने ८०.३२ टक्के मतदान झाले. मंत्री, आमदार, माजी आमदार यांच्या सहभागाने गाजलेल्या आणि चार तालुक्यांचे कायक्षेत्र असणाऱ्या ‘बिद्री’ च्या निवडणुकीत महालक्ष्मी आघाडी आणि राजर्षी शाहू आघाडीमधील इर्षेने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर या तालुक्यातील २१८ गावातील १८७ मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे १५१२ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मंगळवारी (ता.१०) कोल्हापूर येथील रामकृष्ण हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.

................

संस्था गटात ९९ टक्के मतदान

गारगोटी

बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अत्यंत ईर्षेने मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे स्पष्ट झाले. तालुक्यात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता शांततेत साधारणतः ८० ते ८५ टक्के तर संस्था गटात ९८.८५ टक्के मतदान झाले.

रविवारी सकाळी आठ वाजता तालुक्यातील सर्वच केंद्रांवर मतदानास प्रारंभ झाला. सकाळी दहापर्यंत सरासरी ३५ ते ४० टक्के मतदान झाले होते. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या महालक्ष्मी आघाडी व राजर्षि शाहू आघाडीच्या समर्थक कार्यकर्त्यांची मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ सुरू होती. महालक्ष्मी आघाडीचे प्रमुख के.पी.पाटील यांनी मुधाळ येथील केंद्रावर, राजर्षि शाहू आघाडीचे प्रमुख माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांनी तिरवडे येथील केंद्रावर, आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार बजरंग देसाई यांनी गारगोटी येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. आघाडीच्या नेत्यांनी बहुतांश केंद्राना भेटी दिल्या. बुथवर कार्यकर्त्यांची गर्दी होती.

सध्या भातकापणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी सकाळीच मतदान करुन शेतीच्या कामाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने सकाळी मतदानासाठी गर्दी होती. दुपारी पावसाने हजेरी लावल्यामुळे मतदारांची मतदान केंद्रापर्यंत जाताना धावपळ होत होती. केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळी सणासाठी खरेदीची धांदल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अवघ्या आठवडाभरावर आलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी रविवारी बाजारपेठेत खरेदीची धांदल उडाली. महाद्वार रोड, राजारामापुरी, लक्ष्मीपुरी, ताराबाई रोड या परिसरात रांगोळी, पणत्या, रोषणाई व फराळाच्या साहित्यापासून कपड्यांच्या खरेदीसाठी रविवारी सुटी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले. त्यामुळे शहरात मोठी गर्दी झाली. जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यातून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे गांधीनगरची बाजारपेठही फुलली होती. खरेदीच्या मूडमधील नागरिकांमुळे सकाळपासूनच शहरातील अनेक चौकांमध्ये, रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली.

‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीप्रमाणे घराघरात उत्साहाचे वातावरण असते. यंदाही दसरा झाल्यानंतर लगेच दिवाळीच्या तयारीला सुरूवात झाली होती. घरोघरी स्वच्छता, रोषणाईची व्यवस्था केली जात आहे. वाहन, घर, सोने खरेदीसाठीचे नियोजन केले जात आहे. पुढील सोमवारपासून (ता. १६ ऑक्टोबर) दिवाळीला प्रारंभ होणार आहे. तयारीसाठी केवळ आठवडाच शिल्लक राहिल्याने सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. घरांची स्वच्छता तसेच फराळाचे साहित्य बनवण्यास सुरुवात झाली आहे.

शहरातील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीरोड, महाद्वार रोड, गांधीनगर येथील बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. शहरातील मॉल, बझारमध्येही गर्दी आहे. दिवाळीच्या वैविध्यपूर्ण पणत्या, विद्युत माळा, मेणबत्यांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात आले आहेत. ब्रँडेड कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील दसरामधील ऑफर्स कायम आहेत. ऑफर्सची जाहिरातबाजी करून ग्राहकांना खेचण्यासाठी प्रचंड स्पर्धा दिसत आहे. शहराच्या चौकाचौकात फलकांद्वारे आकर्षक जाहिरात केल्या जात आहेत. शिवाय मोबाइलवरही एसएमएसने ऑफर्सची माहिती दिली जात आहे.

रविवारी सुटीचा दिवस असल्याने महाद्वार रोडवर सकाळपासून खरेदीसाठी गर्दी होती. सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने येथे दिवसभर गर्दी होती. सायंकाळनंतर तर त्यामध्ये आणखीनच वाढ झाली. सध्या लक्ष्मीपुरीतील बाजारपेठेत फराळाच्या साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी आहे. लक्ष्मी रोडवर तसेच राजारामपुरीत असलेल्या कपड्यांच्या दुकानांनी विविध योजना जाहीर केल्या असल्याने ही दुकाने दिवाळीसाठी नटल्याचे दिसत होते. या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असल्याने काहींनी दुकानाबाहेरही स्टॉल लावले आहेत.

रेडीमेड कपडे

राजारामपुरी, महाद्वार रोड, गांधीनगर येथे नामवंत ब्रँड्सचे रेडिमेड कपड्यांचे शोरूम्स मोठ्या संख्येने आहेत. येथे तरुणाईची गर्दी अधिक आहे. लहान मुले, महिलांसाठी ड्रेस मटेरियल खरेदीसाठी सहकुटुंब अनेजण बाहेर पडले. ब्रँडेड कपड्यांवर २५ टक्यांपर्यंत सवलत ‌आहे. याशिवाय एकावर एक फ्री, दोनवर तीन फ्री अशा ऑफर्स आहेत. पसंतीनुसार कपडे असल्याने ग्राहक खिळून राहत आहेत.

इलेक्ट्रॉनिक वस्तू

दिवाळीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी केली जाते. टीव्ही, फ्रीज, कम्युटर, मोबाइल, लॅपटॉप, वॉशिंग मशीन्सला मागणी आहे. मूळ किंमतीवर २० टर्क्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. काही शोरूम्सनी जुन्या वस्तू देऊन नव्या वस्तू विक्रीचीही ऑफर दिली आहे. नविन वस्तू खरेदीसाठी सुलभ हफ्त्याने कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे टेंबे रोड, लक्ष्मीरोड, महाद्वार रोड, गांधीनगरातील दुकानात ग्राहक खरेदी करताना दिसत आहे.

वाहनांचे बुकिंग

मुहूर्तावर घेऊन जाण्यासाठी चारचाकी, दुचाकींचे बुकिंग सुरू आहे. ग्राहक विविध कंपन्यांचे वाहनांची माहिती घेत आपल्याला हवे ते वाहन बूक करीत आहेत. शोरूम्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन खरेदीवर विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत. जुने वाहन घेऊन नविन वाहनावरील एक वर्षाचा विमा, अॅसेसेरिज मोफत अशा ऑफर्स आहेत. ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वच शोरूम्स सजवून दुचाकी, चारचाकी आकर्षकपणे पार्क केल्या आहेत.

फराळाचे साहित्य

तेल, मैदा, हरभरा पीठ, रवा, डाळी, डालडा, खोबरे, गूळ, साखर यासह मसाल्याच्या पदार्थांची खरेदी केली जात आहे. याशिवाय तयार फराळ घेऊन जाण्याकडेही कल आहे. दिवाळीच्या दिवशी अंघोळ करण्यासाठी सुंगधी साबण, उटणे, अत्तर, आकाश कंदील असे साहित्यही घेतले जात आहे. त्यासाठी दुकान, मॉलमध्ये मोठी गर्दी होत आहे. ग्राहकांना त्वरित सेवा देण्यासाठी दुकानदारांनी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

भेटवस्तू , ड्रायफ्रूट्सची गर्दी

‌दिवाळीदिवशी नातेवाईक, मित्रमंडळींना मिठाई, ड्रायफूट्सचे बॉक्स व भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. हा ग्राहक मिळवण्यासाठी सर्वच बेकरी चालकांना समोर स्टॉल उभारून आकर्षक मांडणी केली आहे. पाचशेपासून दहा हजारांपर्यंत भेटवस्तूसह ड्रायफुडसचे पॅकेज आहे. ग्राहक आपल्या बजेट नुसार खरेदी करीत आहे.

कमानी, फलक झळकले

जाहिरातीसाठी विक्रेत्यांनी बाजारपेठेत आपल्या दुकानासमोर कमानी उभ्या केल्या आहेत. सवलत, ऑफर्सची माहिती फलक दर्शनी भागात लावले आहेत. त्यामुळे बाजारपेठ गजबजलेली दिसत आहे. वर्दळीच्या रोडवरील दुकानदारांनी समोर उभारलेले मंडप, कमानीमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. वाहनांची कोंडी होत आहे. परिणामी बाजारपेठेचा श्वास कोंडल्याचे चित्र जाणवते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूर परिसरास पावसाने झोडपले

$
0
0

जयसिंगपूर

जयसिंगपूर शहर व परिसरास रविवारी परतीमया पावसाने झोडपून काढले. सलग तीन तास पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. आठवडी बाजारात विक्रेत्यांबरोबरच नागरिकांची तारांबळ उडाली.

सकाळपासून स्वमछ असलेले आकाश दुपारी दोनपासून ढगांनी भरून आले. हवेतही गारवा निर्माण झाला. विजेमया कडकडाटासह दुपारी तीनमया सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. सलग तीन तास झालेल्या पावसाने उदगाव, संभाजीपूर, उमळवाड, चिपरीसह परिसरास चांगलेच झोडपून काढले. जयसिंगपुरात आठवडी बाजाराचा दिवस असल्याने सकाळपासून भाजीपाला विक्रेत्यांनी आपले स्टॉल लावले होते. दिवाळीचा सण जवळ आल्यामुळे दिवाळीसाठी लागणार्या विविध साहित्य विक्री करणार्यांनीही शहरातील विविध भागात आपले स्टॉल लावले होते. मात्र, दुपारी पडलेल्या पावसाने या सर्वांची दाणादाण उडविली. पावसामया धारांसोबतच जोरदार वार्यामुळे आपले स्टॉल सांभाळणे विक्रेत्यांना अवघड बनले होते.

सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील उदगावलगतमया अनेक रोपवाटिकांमध्ये पाणी शिरल्याने तेथे तळ्यांचे स्वरूप आले. जयसिंगपूर बसस्थानकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले. शहरातील अनेक रस्तेही पाण्याखाली गेले होते. अनेक इमारतींमया बेसमेंटमध्येही पाणी साठून राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचार्य मोरे कुशल प्रशासक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांनी ३८ वर्षाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात काम करताना कुशल प्रशासक म्हणून छाप उमटविली. त्यांनी प्राचार्य ते प्रभारी कुलगुरुपर्यंच्या प्रत्येक टप्प्यावर उच्च शिक्षणासह विद्यापीठाच्या शैक्षणिक व्यवस्थेला धोरणात्मक दिशा देण्याचे मोठे काम केले. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पपासून शैक्षणिक धोरणापर्यंत त्यांचा ठसा राहिला’ असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काढले. प्राचार्य डॉ. मोरे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू शिंदे यांच्या हस्ते प्राचार्य मोरे व अनिता शिंदे यांच्या हस्ते गायत्री मोरे यांचा सत्कार झाला. अंबाबाईची मूर्ती, मानपत्र, मानचिन्ह, आ​णि शाल श्रीफळ देऊन हा सत्कार झाला. विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते डॉ. मोरे यांच्या आजवरच्या वाटचालीवर आधारित प्रेरणा गौरव अंकाचे प्रकाशन झाले. शहाजी कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमास शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, सचिव विजय बोंद्रे उपस्थित होते.

कुलगुरू शिंदे म्हणाले, ‘सकारात्मक आक्रमकता, विवेकी विचार, कायद्याचा अभ्यास आ​णि संस्कारशील वर्तणूक ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये मला भावली. मोरे हे सहकारी असले तरी त्यांच्याकडे मी ज्येष्ठ या नात्याने पाहतो. गेल्या दोन वर्षात त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. मोरे यांनी सकारात्मक वृत्तीने प्रत्येक घटकाचे काम कायद्याच्या चौकटीत बसवून केल्यामुळे वादाचे प्रसंग टाळले.’

प्राचार्य मोरे यांनी सत्काराला उत्तर देताना, शहाजी कॉलेज ही माझी संस्था आणि या संस्थेने मला मोठे केले. येथून पुढेही शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.

प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, प्राचार्य मंगलकुमार पाटील, प्राचार्य नागेश नलवडे, प्रा. डी. एन. पंगू, प्रा. बी. बी. पाटील, प्रा. नीता धुमाळ, प्रा. शर्मिला गौरव मोरे, गौरव अंकाचे संपादक डॉ. राजेखान शानेदिवाण यांची भाषणे झाली. शहाजी कॉलेजचे प्राचार्य एकनाथ काटकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य पी. आर. शेवाळे यांनी स्वागत केले.

राजकीय हस्तक्षेप नाही

‘औरंगाबाद विद्यापीठासह पुणे, मुंबई विद्यापीठ येथेही काम केले. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मतप्रवाह असतात. मात्र शिवाजी विद्यापीठात कसलाही राजकीय हस्तक्षेप होत नाही. यामुळे या विद्यापीठाचा कुलगुरू होणे हा जीवनातील मोठा सत्कार आहे’ अशी भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी भाषणात व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागविकास निधी कपात नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यंदाच्या गळीत हंगामातील उसातील प्रतिटन ५० रुपये भाग विकास निधी आणि ४ रुपये मुख्यमंत्री सहायता निधी कापून घेण्याचा निर्णय मंत्री समिती बैठकीत घेतला आहे. कारखान्यांनी ही कपात करून घेऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. माजी आमदार संपतराव पवार-पाटील अध्यक्षस्थानी होते. पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली.

माजी आमदार पवार म्हणाले, ‘शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्याने उत्पादीत केलेल्या मालाला भाव न मिळाल्याने कर्जबाजारी झाला आहे. अशावेळी सरकारने मदत करण्याऐवजी भाग वि‌कासनिधीच्या नावाखाली ५० रुपये कपात करून घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला. सर्वसाधारण सभेच्या ठरावाशिवाय ही रक्कम कपात करून घेता येत नाही. तरीही सरकार कारखान्यांना सांगून जबरदस्तीने प्रतीटन ५० रुपये कपात करून घेतल्यास ‘शेकाप’तर्फे आंदोलन केले जाईल.’

माजी आमदार पवार म्हणाले, ‘यावर्षी उसाचे क्षेत्र कमी आहे. उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या उसाला प्रतिटन् साडेतीन हजार रुपये पहिला हप्ता मिळाला पाहिजे. तुटलेल्या उसाला नियमानुसार १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत. १५ ऑक्टोबरपूर्वी कारखान्यांनी दर जाहीर करावा.’

बैठकीत आधारभूत किंमतीने श‌ेतमालाची खरेदी करण्यासाठी आठवडा बाजाराच्या ठिकाणी केंद्रे सुरू करावीत, शेतीपंपांची प्रस्तावित दरवाढ रद्द करून सध्याचेच दर पुढील तीन वर्षांसाठी ठेवावेत, पाणीपट्टीची २० टक्के सुचवलेली वाढ रद्द करावी, सरसकट कर्जमाफी करावी या मागण्यांचे ठराव करण्यात आले.

केरबा पाटील, बाबासाहेब देवकर, भारत पाटील, बाबुराव कदम, एकनाथ पाटील, अजित देसाई, संभाजी पाटील, शामराव मुळीक यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज तुटवड्याने अडीचशे कोटींचा फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी ०५ मेगावॅट वीजेची गरज आहे. सरकारी पातळीवरुन कोटा मंजूर आहे. परंतु स्थानिक ‘सरकारी बाबू’ आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या उदासिनतेमुळे तीन वर्षांपासून वीजच मिळाली नाही. उपलब्ध वीजही अनियमीत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडीत होते. यामुळे दरमहा २५० कोटी रुपयांचा अर्थात वार्षिक तीन हजार कोटी रुपयांचा फटका उद्योगांना सोसावा लागत आहे’ अशी माहिती गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिली. याबाबत ‘गोशिमा’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशनने उद्योगांच्या समस्यांसंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला. अध्यक्षस्थानी गोशिमा चेअरमन सुरजितसिंग पवार होते.

उद्योजकांनी जमीन, पाणी आणि वीजेबाबतच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर उद्योग भवनच्या दारात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत उद्योजक म्हणाले, ‘वीज मंडळाने औद्योगिक वसाहत स्थापन करताना जी वीजेची व्यवस्था केली होती, तीच व्यवस्था आजही आहे. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एकीकडे वारंवार उपलब्ध वीज खंडीत होत असल्याने सीएनएस आणि व्हीएनसी कार्ड जळत असून लाखो रुपयांचा तोटा होत आहे. तर दुसरीकडे एक मेगॅवॅट वीज पुरवठा झाल्यास महिन्याला ५० कोटींचे उत्पन्न मिळते. त्यामुळे ५ मेगॅवॅटचे सुमारे २५० कोटी रुपयांचे उत्पन्न घटत आहे. येथील एमआयडीसीतील बऱ्याच उद्योजकांचे उद्योग पेंडिंग आहेत. एक्सपान्शनसाठी वीज कमी पडते. एका बाजूला मेक ईन इंडियाचा नारा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणाच कुचकामी ठरत असल्याने ऐन सणासुदीत ऑर्डरी वेळेत पूर्ण होत नाहीत. ही बाब महिन्यापूर्वी वीज मंडळांच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली होती. परंतु त्याकडे या अधिकाऱ्यांनी ढुंकूनही पाहीलेले नाही.

एमआयडीसीतील बऱ्याच मोकळ्या जागापैकी ९० टक्के जागा अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्या आहेत’ असा आरोप माजी चेअरमन उदय दुधाणे यांनी केला. वनीकरण, कचरा आणि पार्किंगच्या जागाही शिल्लक नाहीत. यासाठी एजंटांचा प्रचंड सुळसुळाट झाल्याचेही उद्योजकांनी सांगितले. याचा परिणाम उद्योगानांही आज जागा मिळत नाही. या गलथान कारभारामुळे उद्योजकच पिसला जाऊ लागला आहे. इमारत पूर्ण झाल्याची सही व्हायला ‘वजन’ ठेवावे लागते. अन्यथा सहा-सहा महिने सह्या होत नाहीत. एकाच अधिकाऱ्याकडे पाच जिल्ह्यांचा कारभार आहे. आम्ही करायचे तरी काय? असा उद्विग्न सवाल उद्योजकांनी केला.

पाण्याच्या बाबतीतही तसेच आहे. पाऊस पडला की पाणी मिळत नाही. याठिकाणी पाणी खेचण्यासाठी पाण्यातल्या विद्युत पंप मिळत नाहीत, यासारखे दुर्दैव नाही. सध्याची पाणीयोजना एकाच लाइनवर तीन एमआयडीसींना पाणी पुरवते. त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येत आहे. यासाटी गोकुळ शिरगाव एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाणीयोजना राबवावी अशी मागणी करण्यात आली.

दृष्टिकोन दूषित

‘उद्योजकांकडे बघण्याचा ओद्योगिक विकास महामंडळाचा दृष्टिकोन अजिबात चांगला नाही. छोट्या-छोट्या कारणांसाठी दंड आकारला जातो. त्यामुळे महामंडळ हे उद्योगांच्या विकासासाठी आहे की केवळ महसूळ गोळा करण्यासाठीच आहे असा पश्न पडतो. प्रत्येक कामासाठी विविध मार्गांनी अधिकाऱ्यांना खूष करावे लागते, यासारखे दुर्दैव नाही’ असे माजी गोशिमा अध्यक्ष उदय दुधाणे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक व्यवस्थेला बोजवारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या प्रमुख मार्गावरून धावणाऱ्या ​केएमटी बसचे स्टेअरिंग महिन्याला आठ हजार रुपये मानधन असलेल्या चालकांच्या हाती. बेसुमार वाहनांच्या नियमनासाठी अपेक्षित पोलिसांच्या संख्येऐवजी निम्मेच रस्त्यावर, पोलिसांसमोरच नियम धाब्यावर बसवून सुसाट जाणारे वाहनधारक, एसटीची मध्यवस्तीतील वाहतूक, वडाप, रिक्षांची वाढलेली संख्या आणि या साऱ्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बंद झालेल्या बैठका. शहरात वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे निदर्शक असलेले हे चित्र. मात्र यात बदल घडविण्यासाठी महापालिका, पोलिस, आरटीओ या यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांना राजकीय पातळीवरून पाठबळ मिळायला हवे.

हद्दवाढीअभावी कोंडल्या गेलेल्या शहरात वाहतुकीच्या समस्यांनी गंभीर स्वरुप धारण केले आहे. त्यातूनच जीवघेणे अपघात होत आहेत. यात निष्पाप नागरिक बळी पडत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेत केएमटी, वाहतूक शाखेचे पोलिस, एसटी हे प्रमुख घटक आहेत. या यंत्रणांमध्ये सुसूत्रता नसल्याने शहरातच वाहतूक धोकादायक बनली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरुन दिशादर्शक असे काम झालेले नाही. शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकाच घेतल्या गेलेल्या नाहीत. या प्रकारामुळे सामान्य शहरवासियांना कुणी वालीच उरला नसल्याची स्थिती शहरात ओढवली आहे.

मुळात अरुंद रस्ते मोकळे ठेवण्याऐवजी प्रत्येक रस्त्यावर वाहनांचे दुतर्फा पार्किंग केले जात आहे. या प्रकाराला महापालिकेचा कारभार कारणीभूत ठरत आहे. इमारतींमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी जागा सोडण्याऐवजी त्यांचा वापर अन्य कारणांसाठी वापर होतो. मात्र, याकडे महापालिकेची यंत्रणा डोळ्यावर कातडे ओढून झोपली आहे. शहरवासियांच्या सेवेसाठी धावणाऱ्या केएमटीची स्थिती दिवसेंदिवस खालावतच आहे. नाइलाजाने बसचे स्टेअरिंग मानधनावरील चालकांच्या हाती द्यावे लागले आहे. त्यांना अपुरा व अनियमित मिळणारा पगारातून त्यांची मानसिक स्थिती ठिक असेल याची शाश्वती नसते. अशा चालकांच्या हातात बस देऊन केएमटी संपूर्ण शहरवासियांचा जीव धोक्यात घालत आहे. केएमटीच्या बस धोकादायक पद्धतीने धावत असताना त्यांच्याबरोबर एसटीच्या बसही रस्त्यावर असतात. मध्यवस्तीत धावणाऱ्या बसमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला शहरवासियांना सामोरे जावे लागत आहे.

वाहनांची वाढती संख्या, केएमटीच्या थांब्यांजवळ असलेले वडाप रिक्षांचे स्टॉप, वडापचा रस्त्यांवरील वाढता वावर याला अटकाव करण्याबरोबरच वाहतूक नियमनासाठी कार्यरत असलेली शहर वाहतूक नियंत्रण शाखेची ताकदही अपुरी आहे. शहरासाठी २२२ पोलिसांची गरज असताना सध्या केवळ ११५ पोलिसांवर कामकाज चालवले जाते. अनेक चौकांमध्ये वाहतूक पोलिस नसल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

सहा वर्षांत बैठकच नाही

शहरातील वाहतुकीबाबत सूचना करण्यासाठी १९९६ मध्ये वाहतूक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली. समितीमध्ये विविध क्षेत्रातील घटक, रिक्षा आणि फेरीवाले संघटनांचे पदाधिकारी, वाहतूक तज्ज्ञांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. दरमहा वाहतूक सल्लागार समितीची बैठक पोलिस प्रशासन आयोजित करत असे. वाहतूक सल्लागार समितीचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक व सचिव म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी असतात. महापालिकेचे नगरअभियंता, एसटी व केएमटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज मंडळाचे अधिकारी उपस्थित राहात. पोलिस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, शहर उपअधीक्षक बैठकीचे आयोजन करत होते. गेल्या सहा वर्षांपूर्वी अधून-मधून बैठक झाल्या. त्यानंतर आजतागायत बैठकच झालेली नाही. त्यामुळे रस्त्यावरील अनेक प्रश्न प्रलंबित राहतात. त्याचा फटका शहरवासियांनाच बसत आहे. त्यामुळे शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठक नियमित होण्याची आता गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषींवर आज कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसून झालेल्या अपघातास जबाबदार असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर आज (ता. ९) होणाऱ्या सभेपूर्वी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. तसेच अपघातात ठार झालेल्या हलगीवादक तानाजी साठे, आनंदा राऊत आणि सुजल अवघडे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

केएमटी अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी आयुक्तांना चौकशी अहवाल सादर केला. आयुक्तांनी हा अहवाल तपासला असून चौकशी समितीने केलेल्या शिफारशी, तांत्रिक बाबी या साऱ्या बाबी विचारात घेऊन कारवाई होणार आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी बारा वाजता होणार आहे. सभेपूर्वी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच पोलिस प्रशासनाचा अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रभारी वाहतूक निरीक्षक रवींद्र धुपकर सक्तीच्या रजेवर राहतील असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने प्राथमिक टप्प्यात अपघातास जबाबदार धरून चालक आर.पी. पाटील यांना निलंबीत तर केएमटी वर्कशॉप विभागातील वर्क्स मॅनेजर एम. डी. सावंत व वाहतूक निरीक्षक धूपकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. दरम्यान चौकशी दरम्यान अपघातास तांत्रिक कारणेही जबाबदार असल्याचे सामोरे आल्याचे वृत्त आहे. यामुळे केएमटी विभागातील वर्क्स मॅनेजर एम. डी.सावंत यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.

मदतीचे धनादेश तयार

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केएमटी अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब होणार आहे. त्यानंतर महापौर, पदाधिकारी व अधिकारी राजारामपुरीत जाऊन मृतांच्या कुटुंबींयांना मदतीचा धनादेश देणार आहेत. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना पाच लाख, गंभीररित्या जखमींना एक लाख व किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. मदतीच्या प्रस्तावावर आयुक्तांच्या सह्या झाल्या आहेत. सोमवारी मृतांच्या कुटुंबींयांना तर दुसऱ्या टप्प्यात जखमींना मदत करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उघड्यावर शौचाला गेलेल्या महिलांसोबत फोटो सेशन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

हागणदरी मुक्त गाव करण्याची मोहीम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांनी अक्षरश: मर्यादांचं उल्लंघन करायला सुरूवात केली आहे. सांगोला तालुक्यातील एका गावात उघड्यावर शौचाला गेलेल्या महिलांच्या गळ्यात हार घालून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे सोलापुरात अधिकाऱ्यांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र असा काही प्रकार घडलाच नसल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे.

सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावात ही घटना घडली. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड हे चिकमहुद येथे आले होते. त्यांनी रात्री गावात मुक्कामही केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ग्रामपंचायत कार्यालयात आले आणि गावातील हागणदरीच्या ठिकाणांकडे मोर्चा वळवला. यावेळी शेताच्या मार्गावरील भागात उघड्यावर शौचाला जाणाऱ्या तिघांना तंबी देणेत आली. फुलांचे हार घालून त्यांचे 'स्वागत' करण्यात आले.

गुड मॉर्निंग पथकही त्यांच्यासोबत होते. हलगी आणि शिट्टीचा आवाज ऐकूण उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. याच दरम्यान उघड्यावर शौचाला बसलेल्या काही महिलांच्या गळ्यात हार घालून त्यांचा 'सत्कार' करण्याचा आततायीपणाही भारूड यांनी केला. कहर म्हणजे त्यांनी नंतर या महिलांसोबत फोटो काढून ते सोशल मीडियावर फिरवले. हे फोटो प्रेसनोटसह सोलापूरमधील पत्रकारांच्या व्हाटस्अप ग्रुपवर पाठवण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. उघड्यावर शौचाला बसणे ही या महिलांची चूक असली तरीही त्यांचे फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर टाकणे हे चुकीचे आहे. पोलीसही आरोपींच्या चेहेऱ्यावर काळे कापड घालतात. इथे मात्र ग्रामीण भागातल्या महिलांना सुविधांअभावी उघड्यावर शौचाला बसावे लागते त्याची शिक्षा म्हणून त्यांचे हार घातलेले फोटो सोशल मीडियावर फिरवले जात असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ विजयसिंह पटवर्धन, तत्कालीन आयुक्तांवर फौजदारीसांगलीच्या महापौरांचे आदेश; फसवणूक प्रकरणी कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी माळबंगला येथील जागा खरेदीत फसवणूक झाल्याचा ठपका ठेवत गणपती पंचायतन संस्थानचे विजयसिंह पटवर्धन आणि महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय देगावकर यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश महापौर हारूण शिकलगार यांनी सोमवारी झालेल्या महासभेत दिले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपायुक्त व खासगी स्वतंत्र वकिलांची समिती नियुक्त करून महिन्याभरात अहवाल महासभेसमोर सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सांगली महापालिकेने तत्कालिन विकास महाआघाडीच्या काळात माळबंगला परिसरातील ३.८५ हेक्टर जागा सात कोटी रुपयांना खरेदी केली होती. या जागेची मालकी महापालिकेची असल्याचा दावा करीत काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. तसेच महासभेनेही या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. हा विषय महासभेच्या विषय पटलावर आल्यानंतर दोन सभांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडत एकमेकांना चोर आणि चमच्यांची उपमा देत बराच गाजला. सोमवारी तहकूब सभेचे कामकाज सुरू होताच नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक पेंडसे यांनी माळबंगल्याच्या जागेबाबतच प्राथमिक अहवाल सभागृहासमोर ठेवला. अहवालानुसार महापालिकेने ३.८५ हेक्टर जागा खरेदी केली होती. प्रत्यक्षात सरकारी मोजणीनंतर ३.६० हेक्टरच जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. मोजणी नकाशावर क्षेत्राची नोंद नाही. तरीही आम्ही नकाशावरून क्षेत्र निश्चित केले आहे. जागेच्या मालकी हक्काबाबत महसूल विभागाकडून तपासणी करण्याची शिफारस आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांकडून जागा खरेदीचा अहवाल अंतिम केला जाणार आहे. तसेच माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या मागील जागेवरही अतिक्रमण झाले असून, ही जागा मोजणीत आल्याचे सांगितले. पेंडसे यांच्या स्पष्टीकरणानंतर सभागृहातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले.
संतोष पाटील म्हणाले, ‘महापालिकेचीच जागा पालिकेला विकून फसवणूक करण्यात आली आहे. १९८४ सालापर्यंत या जागेवर तत्कालीन सांगली नगरपालिकेचे नाव होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानाने ही जागा नगरपालिकेला दिली होती. पटवर्धन यांनी ही जागा परस्पर दुसऱ्याला विकली. त्यामुळे महापालिकेची फसवणूक झाली असून, त्यांच्यावर फौजदारी झाली पाहिजे. २५ लाखांवर खर्च करण्याचे अधिकार नसताना तत्कालिन आयुक्तांनी परस्पर सहा कोटींचा धनादेश दिला आहे. या प्रकरणात नगरसेवक शेखर माने यांचेही नाव आहे. तरी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची शिफारस विभागीय आयुक्ताकडे करावी. या प्रकरणातील कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी उपायुक्त व खासगी वकिलांची नियुक्ती करावी. राष्ट्रवादीचे विष्णू माने यांनी पालिकेच्या तिजोरीवर सात कोटींचा दरोडा पडला असताना आयुक्त मात्र गंभीर नसल्याचा आरोप केला. प्रशांत पाटील मजलेकर यांनी प्राथमिक चौकशीच्या आधारे कारवाईचे आदेश द्यावेत, अशी सूचना केली. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी सात कोटीची फसवणूक झाली असताना प्रशासन कशाची वाट पहात आहे? असा सवाल केला. त्यानंतर संपूर्ण सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन महापौरांनी जागा खरेदीत फसवणूक केल्याचा ठपका ठेवत राजे विजयसिंह पटवर्धन व अधिकारांपेक्षा अधिकची रक्कम दिल्या प्रकरणी तत्कालीन आयुक्त संजय देगावकर या दोघांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले. देगावकर हे सध्या मंत्रालयात कक्ष अधिकारी आहेत. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला जाईल, असेही महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मंगला बनसोडेंना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
तमाशारसिकांना आपल्या आदाकरीने घायाळ करणाऱ्या येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत, तमाशासाम्राज्ञी मंगला बनसोडे यांना सोमवारी सायंकाळी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुलगा नितीन बनसोडे उपस्थित होते.
दरम्यान, या अगोदर मंगला बनसोडे यांच्या आई प्रख्यात तमाशा कलावंत कै. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर आणि त्यांचे वडील कै. भाऊ मांग नारायणगावकर यांना याच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होते. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांना राष्ट्रपती पुरस्कारासारखा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यामुळे बनसोडे कुटुंबाने राष्ट्रपती पुरस्कारांची हॅटट्रीक केली आहे.
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आणि फुललेली तमाशा ही कला जगाच्या विविध भागातील रसिकांना भूरळ पाडत आली आहे. वेळोवेळी विविध संकटांशी सामना करीत आज ताठ मानेने समाजात स्थान निर्माण केलेल्या या लोककलेच्या विकासात अनेकांचे योगदान आहे. त्यातीलच एक आदराने घ्यावे असे नाव म्हणजे मंगला बनसोडे. मंगलाताईंनी गेली पाच दशके आपल्या जादुई अदाकारीने अवघ्या महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील मराठी भाषिक तमाशारसिकांना रिझवत त्यांनी तमाशा रसिकांच्या हृदय सिहांसनावर अढळ स्थान प्राप्त केले आहे. अनेक समस्यांना धीराने तोंड देत मंगलाताईनी आपल्या कलेचे कोरीव लेणे तयार करून ठेवले आहे. आपल्या यशाची वाटचाल, प्रेरणा सांगताना त्या अवर्जून आपल्या आईचा, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, वडील भाऊ मांग यांचा व पुत्र रामचंद्र बनसोडे यांचा उल्लेख करतात.
दरम्यान, मंगलाताईना या पूर्वी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रथमत:च अण्णाभाऊ साठे पुरस्काराने गौरविण्यात आले. या शिवाय सरकारने तमाशा कलावंतासाठी सुरू केलेला विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुलींच्या सन्मानासाठी ‘मिशन राजकुंवर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्र येऊन
मुलींच्या उपचारावर मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. अकलूजमध्ये ३६ गर्भपाताची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर
मुलींसाठी काम करणाऱ्या ‘डॉटर्स मॉम’ या संस्थेने एक लोक चळवळ उभी केली, या कृतिशील लोक चळवळीतूनच ‘मिशन राजकुंवर’ने जन्म घेतला. राजकुंवर म्हणजे राजकन्या, छत्रपतींच्या एका कन्येचेही नाव राजकुंवर होते. प्रत्येक बापाला आपली मुलगी राजकन्याच असते, त्या मुलीचे योग्य पद्धतीने पालन पोषण करण्यासाठी हे मिशन सुरू झाले.
अकलूजमध्ये ३६ गर्भपाताची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी एका स्त्री अर्भकाचा मृतदेह कालव्यात सापडला होता, अशा घटनांच्या मालिकांमुळे माळशिरस तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राकडे संशयाने पाहिले जात होते. हे संशयास्पद आणि भितीदायक वातावरण दूर करण्यासाठीच ‘मिशन राजकुंवर’ सुरू करण्यात आले आहे.
आता माळशिरस तालुक्यातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यास आपल्याला एक खास फलक दिसणार आहे. त्या फलकावर मुलींवरील कोणत्याही उपचारांसाठी डॉक्टरांकडून बिलात घसघशीत सवलत मिळणार आहे.
अशी झाली सुरुवात
नवरात्रीच्या काळात डॉटर्स मॉम संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील जवळपास ५२१ डॉक्टरांच्या भेटी घेऊन या संकल्पनेचे महत्व पटवून दिले. पंधरा दिवसांत तालुक्यातील प्रत्येक गावांतील प्रत्येक डॉक्टरांकडे मिशन राजकुंवर पोचवल्यावर त्यांच्या सहमतीने उपचारावरील मदतीबाबत सवलत, संबधित दवाखान्यातील फलकावर नोंदविण्यात आली. विशेष म्हणजे या सवलतीच्या माध्यमातून पहिल्याच टप्प्यात मुलींसाठी तालुक्यातून वर्षभरात सुमारे पाच कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. डॉक्टरांसह समाजातील इतर घटकही मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत.
शंभर टक्क्यांपर्यंत सूट
डॉटर्स मॉम संस्थेच्या वतीने अध्यक्षा शितलादेवी मोहिते पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माळशिरस तालुक्यातील जवळपास ५२१ डॉक्टरांची भेट घेऊन १ ते १८ वयोगटातील मुलींच्या वैद्यकीय खर्चात स्वखुशीने सवलत देण्याची विनंती केली. यात १० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंतची सूट देण्याची तयारी डॉक्टरांनी दाखविल्यानंतर ‘मिशन राजकुंवर’ने आकार घेतला. प्रसूती व इतर शस्त्रक्रियांसाठी देखील डॉक्टरांनी अशाच पद्धतीचे घसघशीत मदत देण्याचे मान्य करून दवाखान्यात तसे फलकही लावून मदत देण्यास सुरूवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर झेडपीच्या सीईओंना महिलांचा घेराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावामध्ये हागणदारी मुक्त चळवळीसाठी गेल्यानंतर शौचास गेलेल्या महिलांच्या गळ्यात हार घालणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना चांगलेच महागात पडले आहे. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी सोमवारी झेडपीत निवेदन देण्यास गेलेल्या शहर व जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भारूड यांनी आवाज बंद, अशा शब्दात पोलिसांसमोरच अरेरावी करीत दम भरला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी भारूड यांच्या कार्यालयात धुडगूस घातला. गोंधळ वाढत गेल्याने निवेदन न स्वीकारता पोलिस बंदोबस्तात भारूड यांनी कार्यालयातून अँटी चेंबरमध्ये पळ काढला.
या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलगिरी व्यक्त करीत निवेदन विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
डॉ. भारूड यांच्याकडून महिलांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा निरीक्षक निर्मला बावीकर, कार्याध्यक्ष मनीषा नलावडे, नगरसेविका सुनीता रोटे, जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भारूड यांनी माफी मागावी, महिलांचा अवमान करनाऱ्या भारूड यांचा निषेध असो, भारूड यांना निलंबित करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
दरम्यान, आक्रमक झालेल्या महिला भारूड यांना निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिसांनी सर्वांना थांबविले. मोजक्याच महिलांना प्रवेश देण्याचे ठरल्यानंतर या महिला कार्यकर्त्या भारूड यांच्या कार्यालयात गेल्या. तेथे भारूड यांच्यासह झेडपी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सभापती मल्लिकार्जुन पाटील आणि सदस्य भारत आबा होते. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी भारूड यांनी माफी मागावी, अशी महिलांनी मागणी केली तेव्हा भारूड यांनी महिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी ऐकत राष्ट्रवादीच्या महिलांनी भारूड यांना अक्षरश भंडावून सोडले. पोलिसांनी मध्यस्ती करूनही महिला ऐकत नव्हत्या. अखेर महिलांचा रुद्रावतार पाहून भारूड अँटी चेंबरमध्ये निघून गेले. त्यावेळी त्याच्यासमोर महिलांनी निषेधाच्या घोषणा दिल्या आणि महिला कार्यालयाबाहेर पडल्या. महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन भारूड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. स्वतः डॉ. भोसले यांनीही भारूड यांच्याकडून झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात हागणदारीमुक्त चळवळ राबविली आहे. अत्यंत चांगले काम जिल्ह्यात सुरू आहे. चिकमहुद येथे मी कोणत्याही महिलेच्या गळ्यात हार घालून फोटो काढलेला किंवा पाठविलेला नाही. ती महिला मला माझ्या आईसारखी असून, आपण स्वतः तिच्या पाय पडलो आहोत. कोणत्याही महिलेचा अवमान केलेला नाही. तसे पुरावे दिल्यास नोकरीचा राजीनामा देऊ, असे डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images