Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साखर कामगारांसाठी पुढाकार घेणारकराड येथील मेळाव्यात शरद पवारांची ग्वाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
‘सहकारात शेतकरी जसा महत्त्वाचा घटक आहे, तसाच कामगारही आहे. शेतकरी टिकला पाहिजे तसा कामगारही टिकला पाहिजे. यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाचा भाव ३५०० रुपये प्रतीटन होईल. पण, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या पगाराचा आकडा अजून वाढला नाही. मात्र, आता प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारची मान्यता मिळाली तर हा प्रश्न लवकर मार्गी लागेल. राज्यातील सहकारी कारखान्यातील कामगारांनी समन्वय समिती तयार करा. त्या समितीच्या माध्यमातून कामगारांच्या बोनस व पगारवाढी प्रश्नांबाबत कामगारांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी करण्यास तुमच्याबरोबर मी ही पुढाकार घेईन,’ अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावर बुधवारी आयोजित महाराष्ट्र राज्य साखर कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे माजी अध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार जयंत पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थिती होते.
पवार म्हणाले, शेतकऱ्यांनी सदन होण्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे केले पाहिजेत. शेतकरी कारखानदार झाला पाहिजे. परंतु तो टाटा-बिर्लांसारखा नको तर शेतात घाम गाळणार कारखानदार झाला पाहिजे. यासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकारी कारखानदारी उभारण्यावर भर दिला. त्यानंतर वसंतदादा पाटील यांनीही तिच भूमिका घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांची अर्थिक उन्नती होण्यास मदत झाली. कामगारांच्या हिताचा विचार झाला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ८० टक्के शेतकरी दोन एकराच्या आतील अल्पभूधारक आहेत. त्यांच्यासाठी साखर धंदा हा अतिशय महत्त्वाचा आहे. साखरेपासून वीज, अल्कोहोल, इथेनॉल यासह इतर अनेक उपपदार्थ तयार होत असल्याने साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था सहकारामुळे मजबूत ठेवण्यामागे साखर कामगारांचे मोठे योगदान आहे. या योगदानात कामगारांची भूमिकाही महत्वाची ठरली आहे. आता मी साखर कामगाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करणार आहे. या वेळी हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, तात्यासाहेब काळे यांचेही भाषण झाले.
राज्यातील साखर कामगारांच्या वतीने शरद पवार यांना चांदीचा मंगलकलश, शाल, श्रीफळ आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचा दुर्गामातेची मुर्ती देवून गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


७३ विद्यार्थ्यांचा जेवणावर बहिष्कारदोन दिवसांपासून आंदोलन; प्रशासनाकडून दखल नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर येथील आंबेडकर वसतिगृहातील निकृष्ट भोजन, निकृष्ट नाष्टा आणि सोयी-सुविधांचा अभावाला त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून जेवणावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून या आंदोलनाची अद्याप दखल घेतली गेली नाही.
वसतिगृहातील दुरावस्थेबाबत अनेक वेळा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही कोणताही दखल न घेतल्याने अखेर मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले आहे. पंढरपूर येथे कोट्यवधी रुपये खर्चून अद्ययावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची सरकारने उभारणी केली आहे. मुलांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी फिल्टर, संगणक प्रशिक्षण देण्यासाठी संगणक, गरम पाण्यासाठी सोलर यंत्रणा बसविली आहे. पण, सोलर बंद पडले आहेत. केवळ चार संगणक सुरू आहेत. सीसीटीव्ही बंद पडलेत, वेळेवर नाष्टा मिळत नसल्याने उपाशीपोटी शाळा, कॉलेजला जावे लागते. अत्यंत निकृष्ट जेवण खावे लागत आहे. वसतिगृह अधीक्षक समस्या सोडविण्यास असमर्थ बनल्याने आणि वरिष्ठ अधिकारी दाखल घेत नसल्याने ७३ मुलांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी दकल घेऊन वसतिगृहाच्या कारभारात सुधारणांबाबत लेखी हमी देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आंदोलन करीत असलेले विद्यार्थी मागील दोन दिवसांपासून उपाशी असल्याने परिस्थिती चिघळत चालली आहे. अजूनही समाजकल्याण आयुक्तांनी यांची दाखल घेतलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेजारील राज्यांप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ द्यावी या मागणीसाठी सुरू असलेले अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. बुधवारी अंगणवाडी कर्मचारी संघाने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. दरम्यान, गुरुवारी (ता. ५ ऑक्टोबर) रेल्वे स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन आणि जेलभरो आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल दिघे यांनी केली.

मानधनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे ९ सप्टेंबरपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ केली. भाऊबीज म्हणून मिळणाऱ्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. पण संघटनेने ही वाढ अमान्य करत शेजारील अन्य राज्यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार मानधन द्यावे, अशी मागणी करत आंदोलन सुरू ठेवले आहे. राज्यात विविध प्रकारे आंदोलने सुरू आहेत.

आज जिल्हा परिषद आवारात झालेल्या बैठकीत महिलांनी गुरुवारी रेल्वे स्थानकासमोर रास्तारोको करण्यात येणार असून चक्का जाम करण्याचा इरादा स्पष्ट केला. सरकारने आपल्या मागणीवर भूमिका बदलली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा तळेकर, गायत्री कुराडे, लता कदम, कांचन पाटील, उमा बनगे, विद्या पाटील, मालती कांबळे, राजश्री पडवळ, संगीता पोवार आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

आहार पुरवठा धोकादायक पद्धतीने

बेमुदत संपामुळे अंगणवाडीतील आहार वाटप पर्यवेक्षिकांना अधिकाराखाली महिला बचतगट, ग्रामपंचायत स्तरावर समितीमार्फत केला जात आहे. पण ही पद्धत चुकीची आहे. कोणाला किती व कसला आहार द्यायचा, त्यावर देखरेख कोण ठेवणार आणि त्याचा दर्जा कोण तपासणार? असे प्रश्न उपस्थिती करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अध्यक्षा शौमिका महाडिक यांना निवेदन दिले. ही वाटप पद्धत बंद करण्याची मागणी केली. अध्यक्षा महाडिक यांनी सकारात्मकता दर्शवत सरकारकडे याबाबत अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुरुत्वाकर्षण लहरी’ संशोधनात कोल्हापूरकरही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधासाठी नोबेल जाहीर झाले आणि जगातील विविध ८० विद्यापीठांमधील जवळपास एक हजार शास्त्रज्ञांनी त्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे चीज झाले. या शास्त्रज्ञांमध्ये चिन्मय कलघटगी हाही एक तरुण गणित तज्ज्ञ होता. मूळचा कोल्हापूरचा असलेला व सध्या इंग्लंडमध्ये पीएचडी करणाऱ्या या तरुणामुळे या संशोधनाला व नोबेलसाठी कोल्हापूरचेही योगदान लाभल्याने कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

१४ सप्टेंबर २०१५ला गुरुत्व लहरींचा संशोधकांना शोध लागला. त्यासाठी अमेरिकेच्या तीन खगोलशास्त्रज्ञांना नोबेल जाहीर झाले. मात्र या तीन खगोलशास्त्रज्ञांच्या कामामध्ये जगभरातील एक हजार शास्त्रज्ञांनी दिलेल्या सहकार्यामुळे या संशोधनापर्यंत पोहचता आले. चिन्मय कार्डिफ विद्यापीठात पीएचडी करत आहे. तो चेन्नई मॅथॅमॅटिकल स्कूलमध्ये पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेत असताना या प्रकल्पाशी जोडला गेला होता. त्यावेळी तिथे गाइड असलेले डॉ. पी. अजित व डॉ. के. जी. अरुण या प्रकल्पात पूर्वीपासून काम केले होते. त्यांच्या प्रेरणेमुळे व या क्षेत्राच्या असलेल्या आवडीमुळे चिन्मय संशोधनात सहभागी झाला.

या संशोधन प्रक्रियेत त्याने गणितज्ज्ञ म्हणून काम केले होते. विविध गट वेगवेगळ्या कंगोऱ्यांवर काम करत होते. लहरींचे अस्तित्व सैद्धांतिकदृष्ट्या मांडण्याची जबाबदारी असलेल्या टीममध्ये चिन्मय होता. जगभरातील संशोधकांचे लक्ष लागलेल्या या महत्वाच्या प्रकल्पात कोल्हापूरचा तरुण सहभागी झाल्याने कोल्हापूरच्या तरुणांची वाटचाल संशोधनाच्या क्षेत्रातही सुरू असल्याचे दिसून आले. रुक्मिणीनगरमधील कलघटगी कुटुंबातील चिन्मय हा छत्रपती शाहू विद्यालयाचा विद्यार्थी. त्याचे गणित आणि विज्ञान विषय आवडीचे असल्याने तो कधीही मागे पडला नाही. गणितात ९० च्या खाली कधी गुण मिळवले नाहीत. त्याला आयआयटी करून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये (आयसर) जायचे होते. आयआयटीला जाता आले नसले तरी त्याने चेन्नई मॅथॅमॅटिकल इन्स्टिट्यूटच्या परीक्षेत यश​ मिळवले. तिथूनच त्याने शास्त्रज्ञ होण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू केली.


नोबेल जाहीर झाल्याचे आमच्या ग्रुपमध्ये समजताच खूप आनंद व्यक्त झाला. या कामासाठी जगभरातील विविध ग्रुप कार्यरत होते. यापैकी माझे काम डिटेक्टरमधील माहितीचे विश्लेषण करण्याचे होते. या क्षेत्रात काम करण्याची तीव्र इच्छा असल्यानेच मी सहभागी झालो. नोबेलच्या घोषणेमुळे अशा प्रकारच्या संशोधनामध्ये करिअर करण्याचे स्वप्न तरुण बाळगतील अशी आशा आहे.

- चिन्मय कलघटगी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीशी वाद; पतीने स्वतःचा गळा चिरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पत्नीशी झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पतीने धारदार चाकूने स्वतःचाच गळा चिरला. या घटनेत पती राजू श्रीकांत शिंदे (वय ४७, रा. बापूरामनगर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी (ता. ४) सकाळी हा प्रकार घडला.

शिंदे हे बापूरामनगर येथील घरात पत्नी, दोन मुली, मुलगा आणि वडिलांसह राहतात. शिरोली एमआयडीसीतील एका कारखान्यात ते कामाला होते. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून ते कामावर गेले नाहीत. कामावर जाणे बंद केल्याने त्यांचा पत्नीशी वारंवार वाद व्हायचा. बुधवारी सकाळी यावरूनच वाद झाला. यानंतर पत्नीने माहेरी जाण्याचा आग्रह धरला. पत्नी घराबाहेर गेल्यानंतर राजू यांनी स्वयंपाकघरातील चाकूने स्वतःचा गळा चिरला. त्यानंतर ते स्वयंपाकघरात निपचित पडले. काही वेळाने मिटर रिडिंग घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती शेजाऱ्यांना दिली. शिंदे यांना गंभीर जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरीत व्यवहार पूर्ववत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गंगावेस परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसून झालेल्या अपघातात राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील तिघांना प्राण गमवावे लागले, तर पंधरा जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताच्या धक्क्याने मृतांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यामुळे अद्याप राजारामपुरीतील मातंग वसाहत दुःखातून सावरलेली नाही. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला आहे. परिणामी काही अपवाद वगळता दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.

रविवारी संध्याकाळी राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील हालगीवादक तानाजी साठे यांच्या ताबूतचे विसर्जन सुरू होते. गंगावेस परिसरात पोहोचल्यानंतर मिरवणुकीत केएमटी बस घुसली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले तानाजी साठे, सुजल अवघडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आनंदा राऊत यांचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. याशिवाय मिरवणुकीतील १५ हून अधिक लोक जखमी झाले. सर्व जखमी आणि मृत राजारामपुरीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गल्लीतील असल्याने या परिसरावर अक्षरशः शोककळा पसरली. या दुर्घटनेनंतर राजारामपुरीतील सर्व व्यवहार ठप्प झाले. दुकाने बंद झाली. केएमटी बसच्या फेऱ्याही रद्द केल्या. रस्ते ओस पडले. संतप्त तरुणांकडून दुकानांची तोडफोड होऊ नये, यासाठी सोमवारी दिवसभर राजारामपुरीतील दुकाने बंद राहिली. मंगळवारी मात्र सकाळपासूनच दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येत होते. त्यावेळी काही तरुणांनी राजारामपुरीत फिरून दुकाने बंद ठेवण्यासाठी आग्रह केला. घाबरलेल्या दुकानदारांनी पुन्हा काही काळ दुकाने बंद ठेवली. मात्र, दुपारनंतर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ करून दुकानांसह दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन केले. स्वतः वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुकानदारांना सुरक्षेचे आश्वासन दिल्याने मंगळवारी संध्याकाळी काही दुकाने सुरू राहिली आणि राजारामपुरीतील वर्दळ वाढली.

अपघातात दगावलेले तानाजी साठे आणि सुजल अवघडे यांचा रक्षाविसर्जन विधी बुधवारी सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत पार पडला. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. राजारामपुरी मातंग वसाहतीत पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकडीसह शीघ्र कृती दलाची तुकडीही तैनात केली होती. याशिवाय शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर राजारामपुरीत ठाण मांडून होते. बुधवारी राजारामपुरी पूर्वपदावर आली. मात्र, व्यवहारांना अद्याप गती आलेली नाही. तणाव निवळला असला तरी अजूनही काही दुकानदार, व्यावसायिक भीतीच्या छायेत आहेत. स्थानिकांनी बाळगलेला संयम आणि पोलिसांच्या खबरदारीमुळे राजारामपुरीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम व्यावसायिकाचा बंगला फोडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशी चोरीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सानेगुरुजी वसाहत येथील बांधकाम व्यावसायिक अजित शामराव पाटगावकर (वय ७५) यांचा तीन मजली बंगला फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. पाटगावकर बाहेरगावी असल्याने चोरीस गेलेल्या ऐवजाची नेमकी माहिती मिळू शकली नाही, मात्र सलग तीन दिवस चोरीच्या घटना घडल्याने शहरात पुन्हा चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

चोरट्यांनी शहरात पुन्हा बंद घरांना लक्ष्य करून घरफोड्यांचे सत्र सुरू ठेवले आहे. गेल्या तीन दिवसात पाचगाव, नागाळा पार्क आणि सानेगुरूजी वसाहत परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी मंगळवारी रात्री सानेगुरुजी वसाहतीत बांधकाम व्यावसायिक अजित पाटगावकर यांचा तीन मजली बंगला फोडला. पाटगावकर दाम्पत्य बेंगळुरू येथील मुलाकडे गेले आहेत. बंगल्यातील स्वच्छतेचे काम करणारी मोलकरीण बुधवारी सकाळी स्वच्छतेसाठी गेल्यानंतर मुख्य दरवाजावरील लोखंडी रेलिंग आणि मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले. तिने पाटगावकर यांच्या हॉकी स्टेडियम परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांना फोन केला. नातेवाईकांनी येऊन पाहणी केल्यानंतर बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटल्याचे दिसले. जुना राजवाडा पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच पाटगावकर यांच्या घरी जाऊन पंचनामा केला, मात्र पाटगावकर घरी नसल्याने चोरीस गेलेल्या मुद्देमालाची नेमकी माहिती मिळू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजाची फसवणूकच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मुंबईत सुमारे ३५ लाखांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मूक मोर्चा काढूनही राज्य सरकारने मराठ्यांना काहीही दिलेले नाही. या मोर्चाला एक वर्षे पूर्ण होत आहे. मात्र मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली आहे’ अशी टिका अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केली. १५ ऑक्टोबर रोजी ‘मराठा क्रांती मोर्चाचे फलित काय?’ या विषयावर खुला मराठा जागृती मेळावा होईल असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्तर्फे राजर्षी शाहू स्मारक भवनात जिल्हा कार्यकारिणी बैठक आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी १५ ऑक्टोबरला राजर्षी शाहू स्मारक भवनात दुपारी तीन वाजता मेळावा घेण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासह अन्य प्रश्नांसाठी राज्य सरकारवर एक दबावगट निर्माण केला जाईल असे मुळीक यांनी स्पष्ट केले.

जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ‘लाखोंचा मोर्चा काढला म्हणून कोणीही भावनिक होऊ नये. काही लोक मराठा समाजाचा जाणीवपूर्वक वापर करुन घेत आहेत. या स्वार्थी लोकांना वेळीच ओळखण्याचे कौशल्य प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. ओन्ली चर्चा, नो मोर्चा यांसह अनेक प्रकारचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हॉट्सअॅप युद्धापेक्षा समाजाने संघटन करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. राज्य सरकारकडून समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही देण्यात आली. प्रत्यक्षात अद्याप काहीही मिळाले नाही. यापुढे लाखांचे मोर्चे काढण्यापेक्षा केवळ चर्चेतून मार्ग काढावा लागणार आहे. सरकारवर दबावगट निर्माण केला जाणार आहे. मराठा समाज भवनाची कामेही गतीने करावे लागणार आहे. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जागेची फाइल अंतिम टप्प्यात आहे. भवनाचे काम पारदर्शीपणे केले जाणार आहे. यात कोणत्याही घराणेशाहीला थारा दिला जाणार नाही. सामान्य कार्यकर्त्यांच्याकडे या भवनाची धुरा दिली जाणार आहे. जागृती मेळाव्यासाठी सर्व समाजाच्या संघटना आणि सर्व राजकीय पक्ष, सर्व जातीधर्मातील नागरिकांना निमंत्रण दिले जाणार आहे.’

बैठकीच्या सुरुवातीला मुंबई रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरीत चेमृत्यमुखी पडलेले आणि पंजा विसर्जन मिरवणुकीत केएमटी घुसून झालेल्या अपघातातातील मृतांना आदरांजली वाहण्यात आली. जातीयवाद पसविणाऱ्या पुणे येथील डॉ. मेघा खोले यांचा जाहीर निषेध करण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीत नवीन सरपंचानी मराठा आरक्षणाचा ठराव करण्याची मागणी करण्यात आली. कवी नारायण वरुटे यांनी मराठा समाजाच्या सद्यस्थितीवर कविता सादर केली. रवींद्र पाटील यांनी समाजाच्या दिनदर्शिकेच्या मागे महापुरुषांच्या कार्याचा इतिहास द्यावा. समाजाचे संस्थापक अध्यक्ष प्रेरणास्थान अण्णासाहेब पाटील यांचे तैलचित्र प्रसिद्ध करण्याची मागणी केली. धनाजी भोपळे यांनी शाळांतील रोस्टरची फेरतपासणी करावी अशी मागणी केली. विजय पाटील यांनी शैक्षणिक कर्जाचे व्याज माफ केले जाते. त्यासह सर्वच शैक्षणिक कर्जमाफी मिळावी अशी मागणी केली.

महिला आघाडी प्रमुख शैलजा भोसले यांनी खेडोपाडी महिला ब्रिगेड स्थापन करणार असल्याचे सांगितले. सचिन पाटील यांनी रेसिडन्सी क्लबमध्ये मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन केले. डॉ. संदीप पाटील, आजरा तालुका प्रमुख मारुती मोरे, संजय जाधव, प्रकाश पाटील, सुरेंद्र घोरपडे, प्रा. सुनील शिंत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. शंकरराव शेळके, व्ही. के. पाटील, वंदना जाधव, सुनील पाटील, संतोष सावंत, उत्तम जाधव, डॉ. शिवाजीराव हिलगे, सुहास निंबाळकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आवाडेंनी काढला भाजपचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘सत्तेत राहूनही जर सदस्यांची कामे होत नसतील तर सत्तेचा उपयोग काय?’ असा सवाल करत जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी बुधवारी सत्ताधारी भाजप आघाडीचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली. आवाडे हे कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीचे सदस्य आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा करत सभेवर बहिष्कार टाकला.

हातकणंले तालुक्यातील रेंदाळ येथे काही लोकांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर उपचार न करता हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी रुग्णांना सीपीआरला पाठवले. याबाबत आवाडे यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तेथील दप्तर सील केले. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, सीइओ व आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली.

दप्तर ताब्यात घेण्याचा अथवा कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार सदस्यांना नसल्याचे अध्यक्षा महाडिक यांनी सांगितले. याबाबतचा सरकारचा आदेश त्यांनी वाचून दाखविल्याने आवाडे संतप्त झाले. ‘सरकारी आदेशाच्या नावाखाली जनतेच्या सेवेपासून सदस्यांना वंचित ठेवणार असाल तर सत्तेत राहून उपयोग काय?’ असा सवाल त्यांनी केला. ‘सत्तेत राहून जनतेची कामे करता येत नसतील तर आपण भाजपचा पाठिंबा काढून घेत आहोत’ अशी घोषणा त्यांनी केली. यानंतर त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने बैठकीत धोरणात्मक निर्णय झाले नाहीत. सभेला उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण सभापती अमरिश घाटगे, महिला बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे आदी उपस्थित नसल्याने बैठक गुंडाळण्यात आली.

दरम्यान, ‘पाठिंबा काढून घेण्याबाबत आवाडे यांनी केलेली घोषणा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पाठिंब्याचा निर्णय हा वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आवाडेंनी असे वक्तव्ये करणे योग्य नाही’, अशी प्रतिक्रिया अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीप्रश्नी शिवसेनेची निदर्शने, भाजपवर टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. दिवाळीपर्यंत कर्जमाफी मिळणे मुश्कील असताना भाजप सरकार दररोज वेगवेगळ्या घोषणा करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारी मंत्री सुभाष देशमुख बोलबच्चन आहेत’ अशी बोचरी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी बुधवारी केली. शिवसेनेने सरकार आणि जिल्हा प्रशासनाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी, निदर्शने केली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी केला. कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत सरकारी धोरणांचा निषेध केला. मुख्यमंत्री फडणवीस आणि सहकारमंत्री देशमुख यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. निदर्शनानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, ‘सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर अनेक जाचक अटींचा समावेश केला आहे. प्रोत्साहनपर २५ टक्के अनुदानासाठी शेतकऱ्यांनी २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये घेतलेले पिककर्ज जुलै २०१७ पर्यंत भरावे लागणार होते. २०१५-१६मधील कर्जांबाबत वस्तूस्थिती असली, तरी एप्रिल २०१६पासून मार्च २०१७ पर्यंत घेतलेल्या कर्जाची परतफेड जुलै २०१७ पर्यंत होऊ शकत नाही. या कर्जपरतफेडीची मुदत जुलै २०१८ असताना केवळ शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवण्यासाठी या अटीचा त्यात समावेश केला आहे. सरकारच्या तांत्रिक बाबींमुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.’

आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, सुजित चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, प्रा. शिवाजीराव पाटील, सुनील शिंत्रे, अवधूत साळोखे, नामदेव शिंपी, संभाजी भोकरे, राजू यादव, विराज पाटील, शशिकांत बिडकर, भिमराव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांमध्ये वाद, शिवीगाळ

शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर सुमारे दीड तास शंखध्वनी आंदोलन केले. प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केल्यानंतर निवाजी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना निवेदन देण्यात आले. तेथून पदाधिकारी बाहेर आहे. त्यावेळी अचानक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जिल्हाप्रमुख पवार यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण शिवीगाळ सुरुच राहिली. अखेर कमलाकर जगदाळे व सुजित चव्हाण यांनी त्या पदाधिकाऱ्यांना माध्यम प्रतिनिनी उपस्थित असल्याचे सांगत सुबरीने घेण्याचा सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते प्रकल्पप्रकरणी बडे अधिकारी गोत्यात ?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत दाभोळकर कॉर्नर ते व्हीनस कॉर्नर चौक मार्गावरील खासगी मिळकतींचे बेकायदेशीररीत्या हस्तांत​रण करून रस्ता रुंदीकरण केले. रस्ता रुंदीकरणासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांनी संगनमत व खोटी कागदपत्रे सादर करून सक्तीने खासगी मिळकती ताब्यात घेतल्याप्रकरणी तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख व आयुक्त विजय सिंघल यांच्यासह सहा जणांविरोधात राज्याच्या लोकायुक्तांकडे सुरेश रमणलाल मणियार यांनी तक्रार केली. लोकायुक्तांकडे तक्रार केल्याप्रकरणी राज्यातील आजी-माजी बडे अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे.
तक्रारीत या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त गणेश देशमुख, तत्कालीन भूसंपादन अधिकारी विनायक हरी पेंडसे आणि करवीरचे तत्कालीन तहसीलदार बाबासाहेब तथा बी. बी. वाघमोडे यांचा समावेश आहे. या सहा अधिकाऱ्यांपैकी बंड आणि देशमुख हे सरकारी सेवेतून निवृत्त झाले आहेत, तर अन्य चार अधिकारी अन्यत्र सेवेत आहेत. विजय सिंघल सध्या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी आहेत, तर गणेश देशमुख नांदेड, वाघाळा महापालिकेत आयुक्त आहेत. विनायक पेंडसे यांची सध्या सांगली, मिरज कुपवाड महापालिकेच्या नगररचना विभाग सहायक संचालकपदी नियुती आहे. वाघमोडे हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन, शाखा क्रमांक ९) म्हणून कार्यरत आहेत.
मणियार यांनी दिलेल्या तक्रारीत, माळ गल्ली कसबा बावडा ते शिये नाका, जाऊळाचा गणपती ते लक्षतीर्थ वसाहत आणि कावळा नाका ते रेल्वे फाटक या तीन रस्त्यांचे रुंदरीकरणही बेकायदेशीरपणे केल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मणियार यांनी २५ सप्टेंबर २०१७ रोजी लोकायुक्त, मुंबई यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, ‘एक एप्रिल २०१० रोजी दाभोळकर कॉर्नर ते व्हीनस कॉर्नर चौक या रस्त्यावरील खासगी मिळकती या प्रचंड पोलिस बंदोबस्तात, बेकायदेशीरपणे सक्तीने ताब्यात घेऊन रस्ता रुंदीकरण केले. त्यासंदर्भात कोल्हापूर महापालिकेचा कोणताही प्रस्ताव व ठराव नसताना तत्कालीन विभागीय आयुक्त बंड यांनी बेकायदेशीररीत्या २९ जून २००९ रोजी अधिसूचना काढली होती. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी देशमुख यांचे कोणतेही लेखी आदेश नसताना तत्कालीन भूमी संपादन (क्रमांक ११) विशेष अ​धिकारी पेंडसे आणि तत्कालीन तहसीलदार वाघमोडे यांनी खासगी मिळकतींचा सक्तीने कब्जा घेत भूसंपादन केले. आजी-माजी सरकारी अधिकाऱ्यांनी संगनमत व खोटी कागदपत्रे सादर करून बेकायदेशीरपणे रस्ता रुंदीकरण केले आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी चौकशी अहवाल आज सादर होणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पापाची तिकटी येथे केएमटी बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसून झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सलग दुसऱ्या दिवशीही चौकशी केली. केएमटी वर्कशॉपमध्ये जाऊन कागदपत्रांची तपासणी केली. लॉगबुक पाहणी करताना कर्मचाऱ्यांकडे बसच्या सद्यःस्थितीबाबत विचारणा केली. चौकशी समितीकडून गुरुवारी (ता.५) आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे अहवाल सादर होणार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, अपघातास कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवरील कारवाईसाठी महापालिका प्रशासनावर दबाव वाढत आहे. रविवारी रात्री झालेल्या अपघातामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर १८ जण जखमी आहेत. या अपघाताची चौकशी करण्यासाठी आयुक्त चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांची त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

चौकशी समिती सोमवारपासून या घटनेची तपासणी करत आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात अपघातास कारणीभूत धरून चालक रंगराव पाटील यांना निलंबित, तर केएमटीच्या वर्कशॉप विभागाचे वर्क्स मॅनेजर एम. डी. सावंत व प्रभारी वाहतूक निरीक्षक रवींद्र धूपकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. दुसरीकडे चौकशी समितीने तीन दिवसांत लॉगबुक, कागदपत्रांची तपासणी केली. अपघात नेमका कशामुळे घडला, त्या मागील कारणे, या अनुषंगाने तपास केल्याचे वृत्त आहे. बुधवारी सायंकाळीही समितीने वर्कशॉप विभागात जाऊन तपासाच्या अनुषंगाने माहिती घेतली. बुधवारी दिवसभर हे तिघेही अधिकारी तपासकामात व्यग्र होते. त्यांच्याकडून गुरुवारी सायंकाळपर्यंत आयुक्तांना चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे.

========

९९ बस रस्त्यावर

अपघाताच्या घटनेनंतर केएमटी बस व अन्य वाहनांची मोडतोड झाली होती. सोमवारी दिवसभर केएमटीची बससेवा बंद राहिली, तर मंगळवारी प्रशासनाने ८७ बसमार्फत प्रवासी वाहतूक केली. अपघाताच्या घटनेनंतर झालेल्या मोडतोडीच्या प्रकाराचाही बससेवेवर परिणाम झाल्याचे उत्पन्नाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहराच्या विविध भागांतील बससेवा बंद राहिल्यामुळे मंगळवारी केएमटीचे उत्पन्न सहा लाख ६५ हजार रुपयापर्यंत घटले. केएमटीने बुधवारी ९९ बस सेवेसाठी उपलब्ध केल्या. दरम्यान, राजारामपुरी बस रोड, आईचा पुतळा मार्गावरील फेऱ्या बंद होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलेवाडी, रिंगरोडसह कोपार्डेत मटक्यावर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर आणि जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (ता. ४) फुलेवाडी, फुलेवाडी रिंगरोड आणि कोपार्डेनजीक सांगरुळ फाटा येथे मटका अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत मटका बुकी आणि एजंट अशा आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी संशयितांकडून मटक्याच्या चिठ्ठ्या, मोबाइलसह सुमारे १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. यानुसार बुधवारी जुना राजवाडा पोलिसांनी फुलेवाडी परिसरातील फायर स्टेशनच्या पिछाडीस मोकळ्या जागेत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मोहन अरुण शिंदे (वय ४३, रा. फुलेवाडी) आणि राजू उर्फ शिवाजी तुकाराम बसुगडे (रा. वेताळमाळ तालीम, शिवाजीपेठ, कोल्हापूर) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल राजाराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला. संशयितांकडे मटक्याच्या चिठ्ठ्या, मोबाइल असा ३५०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. तर करवीर पोलिसांनी फुलेवाडी रिंगरोड येथील भगवा चौकात बंद दुकानाच्या पाठीमागे छापा टाकून सुहास शंकर परीट (२७, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) आणि कुमार सुळेकर (रा. सुळेवाडी) या दोघांना ताब्यात घेतले.

कोपार्डे (ता. करवीर) गावच्या हद्दीत सांगरुळ फाटा येथे बंडोपंत खाडे यांच्या घाराच्या पाठीमागे छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. युवराज बापू संकपाळ (४०, रा. माळवाडी, शिंगणापूर), बाबासो म्हामुलाल पठाण (५५, वडणगे), अभिजित शंकरराव मोरे (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) आणि अतुल दत्तात्रय कांबळे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) या चौघांकडून पोलिसांनी रोख रकमेसह ८१४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांचे ‘राज’कारण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षापासून दूर गेलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी चक्क शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. पुण्याहून ते दोघे एकत्र साताऱ्यात आले. तेव्हा अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे अक्षरश: विस्फारले गेले.

विजयादशमीचा शाही दसरा सोहळा साताऱ्यात साजरा झाल्यानंतर उदयनराजे पुण्यात होते. बुधवारी शरद पवारांचा सातारा जिल्हा दौरा नियोजित होता. राष्ट्रवादीचे खासदार असलेले उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील बहुतांश नेते यांच्यातील वाद प्रचंड उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दोघांचे मोबाइलवर बोलणे झाले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी ते एकत्र भेटले. चर्चा करीत साताऱ्याला जाऊ, असे ठरल्यानंतर शरद पवारांनी उदयनराजेंना आपल्या गाडीत बोलाविले. उदयनराजे पवारांच्या गाडीत बसले आणि आपल्या नेहमीच्या स्टाईलने थेट गाडीची चावीच आपल्या हातात घेतली. ड्रायव्हिंग सीटवर उदयनराजे बसले तर शेजारी शरद पवार. पुण्याहून साताऱ्यापर्यंत त्या दोघांमध्ये बरीच राजकीय चर्चा झाली. साताऱ्यांच्या सरकारी विश्रामगृहात ही गाडी आल्यानंतर उपस्थितांना धक्का बसला.

शिवेंद्रराजेही पवारांच्या गाडीत

शरद पवार यांनी साताऱ्याहून कराडला जाताना आमदार शिवेंद्रराजेंना आपल्या गाडीत घेऊन चर्चा केली. त्यामुळे पुण्यातून साताऱ्यापर्यंत उदयनराजे आणि साताऱ्यातून कराडपर्यंत शिवेंद्रराजे यांच्या पवारांनी ‘गुफ्तगू’ केले. दरम्यान, सातारा नगरपालिकेतील घंटागाडी आंदोलनावरून राजमाता कल्पनाराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात पत्रकबाजीचा प्रचंड धुरळा उडाला आहे. शिवाय उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातही राजकीय आरोप-प्रत्यारोप झाल्याने दुरावा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी दोन्ही राजांना काय कानमंत्र दिला, याची चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्याय द्या, अन्यथा हिशोब मोजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी प्रशासनाचा गलथानपणा आणि काही अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे रविवारी केएमटी बसचा अपघात घडला. अपघातास जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा. अपघातग्रस्त कुटुंबियांना मदत करून न्याय द्या. अन्यथा हिशोब मोजावा लागेल असा इशारा राजारामपुरीतील शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित चौधरी यांना दिला. आयुक्त चौधरी यांनी, अपघातग्रस्तांना येत्या आठ दिवसात आर्थिक मदत आणि तानाजी साठे यांच्या वारसाना सात दिवसांत महापालिका सेवेत सामावून घेतले जाईल अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, नगरसेवक ​संदीप कवाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी सायंकाळी आयुक्तांची भेट घेतली. कवाळे पितापुत्रांनी मांडली अपघातग्रस्तांची व्यथा मांडली. शिवाजी कवाळे म्हणाले, ‘अपघातात तिघांचा बळी गेला आहे. ११ जखमींवर आजही उपचार सुरू आहेत. अपघातामुळे काहींना कायमचे अपंगत्व येईल का अशी भीती आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मोठी कसरत सुरू आहे. काय होईल या विवंचनेने गेले चार दिवस झोप नाही. महापालिकेने मृत नागरिकांच्या कुटुंबियांना पाच लाख तर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बारा दिवसांत प्रशासनाने अपघातग्रस्तांना मदत करावी, अन्यथा नागरिक गप्प बसणार नाहीत. वाईट परिणाम दिसतील.’

‘स्क्रॅपमधील बस रस्त्यावर धावत असून प्रवाशांचा जीव टांगणीला अशी स्थिती आहे. स्क्रॅप बस म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. प्रशासन, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की आणखी लोकांचा बळी घेणार? नागरिकांच्या संयमांचा अंत पाहू नका. काही ड्रायव्हर गॉगल घालून बेदरकारपणे बस चालवितात. त्यांना प्रशासनाने शिस्तीचे धडे देण्याची गरज आहे’ असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक संदीप कवाळे यांनी, अपघातानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांची मदत झाली. मात्र प्रशासनाने, नागरिकांचा संयम सुटण्याअगोदर मदतीचा हात द्यावा. अपघातातील मृत नागरिकांच्या वारसांना महापालिका सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली. शिष्टमंडळात एन. बी. कवाळे, वसंत घाटगे, अॅड. दत्ता कवाळे, सचिन कवाळे, रणजित कवाळे, कुमार दाभाडे, प्रमोद घाटगे, संतोष भंडारे, सुरेश अवघडे, विजय हेगडे आदींचा समावेश होता.

निश्चितच मदत करू

‘अपघाताची घटना दुर्दैवी आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना एक लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घटनेदिवशी रात्रीच घेतला. यासंदर्भात माझी महापौरांशी चर्चा झाली आहे. महापालिकेने मदतीचा शब्द दिला आहे. खास बाब म्हणून हा निर्णय झाला आहे. संबंधितांना मदत निश्चितच करू. येत्या आठ-दहा दिवसांत मदतीचा धनादेश दिला जाईल’ असे आयुक्त चौधरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

साठेच्या वारसांना सात दिवसांत नोकरीत

‘अपघातातील मृत हलगीवादक तानाजी साठे हे महापालिकेत आरोग्य विभागात नोकरी करत होते. त्यांच्या वारसांना महापालिका सेवेत सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. सात दिवसांत त्यांच्या वारसाला नोकरी दिली जाईल’ अशी ग्वाही आयुक्तांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीआधीच प्रवाशांचे दिवाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी आणि उन्हाळी सुटीत एरवी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या भाड्यात भरमसाठ भाडेवाढ केली जात होती. मात्र, दिवाळी सुरू होण्याआधीच खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी भरमसाठ भाडेवाढ करून दिवाळी आधीच ‌प्रवाशांचे दिवाळे काढले आहे. आमची सेवा पाहा, आमचे फिक्स दर आहेत, प्रवासी हाच आमचा देव आहे, असे ठामपणे सांगणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यानी प्रवाशांवर दराची टांगती तलवार ठेवली आहे. कोल्हापूर ते मुंबईसाठी २५०० रुपये तर पुण्यासाठी २०००च्या जवळपास तिकीट दर केले आहे. एरवी २०० ते २५० रुपये दर असलेल्या कोल्हापूर ते पुणे साठी ८०० रुपयांपर्यंत तिकिटाचा दर गेला आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या ऑनलाइन बुकिंगवर तिप्पट दर वाढले आहेत. पुशबँक, एसी, मल्टी एक्सल व्होल्वो, स्पीलरसाठी वेगवेगळे दर नेहमीच असतात. पण या सुविधा देणाऱ्या बसेसमध्ये सीटनिहाय दर ठरविले गेले आहेत.

पर्यटनासह आणि दिवाळी सणात चाकरमानी कुटुंबाकडे परततात. कोल्हापूरहून मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, गोव्यासह अन्य ठिकाणी खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे परवडत नसलेले दर आणि वेळेत गाड्या नसल्याने खासगी बसकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. सणांच्या काळात रेल्वे आणि एसटी बसेस फुल्ल असल्याने खासगी बसेसना प्राधान्य दिले जाते. रात्री अकरानंतर एसटी आणि रेल्वेची सुविधा मुंबई आणि पुणे मार्गावर नाही. त्याचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी घेतला आहे. सध्या तिकिटाचे दर भरमसाठ वाढविल्याने प्रवाशीही हतबल झाले आहेत. दिवाळीत १६ ते २२ ऑक्टोबर या कालावधीतील काही प्रवाशांनी ऑनलाइन बुकिंग केले आहे. दिवाळीचा कालावधी सोडून अन्य दिवशी या मार्गावर कोल्हापूर ते पुणे मार्गासाठी ३०० रुपये आणि मुंबईसाठी ७०० रुपये आकारले जातात. मात्र सध्या हे दर वाढले आहेत. दिवाळीच्या काळात तर कोल्हापूर ते मुंबई मार्गावर २५००, २४७७ हा एक वेळेच्या प्रवासासाठी दर आकारला जात आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर ५७१, ७६२ ते १००० रुपयांपर्यंत दर आकारला जात आहे. यातही ऑनलाइन बुकिंग करताना संबधित वेबसाइटवर गेले असता प्रत्येक सीटनिहाय दर ठरविले आहेत. नियमानुसार असे दर ठरविता येत नाहीत, परंतु नियमांकडे डोळेझाक करून प्रवाशांची लूट केली जात आहे.

शहरात दाभोळकर कॉर्नर ते ताराराणी चौकापर्यंत खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभा केल्या जातात. याच परिसरात कंपन्यांचे ऑफिस आहे. यांची संख्या २५० आहे. पैकी २० मल्ट‌िएक्सल होल्वोही सेवेत आहे. शनिवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशीही अचानक दर वाढविले जातात. मात्र, सध्या सर्वच दिवशी वाढीव दराने तिकिट विक्री होत आहे.


आरटीओचे दुर्लक्ष

विविध मार्गावरील तिकीटाचे दर ठरविण्यासाठी कोणाचेही बंधन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याना नाही. काही ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांना तिकीटही देत नाही. परमीटसह आसनव्यवस्थेच्या आकड्यात ट्रॅव्हल चालक गोलमाल करतात. ४० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असतानाही ५० हून अधिक प्रवासी नेले जातात. प्रवाशांच्या नावाची यादीही बोगस दाखविली जाते. आरटीओकडून मंजुरी घेताना यादीवरील प्रवाशी वेगळा आणि प्रत्यक्षात प्रवास करणारा प्रवाशी वेगळाच असतो. कागदावर नियमानुसार वीस प्रवाशांचा परवाना घेतला जातो. प्रत्यक्षात मात्र क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी ट्रॅव्हल्समधून नेले जातात. प्रवाशांची नावे वेगळी असल्याने बसचा अपघात झाल्यास विमाही दिला जात नाही. आरटीओ कार्यालयातील जाणकार असलेले मोटार वाहन निरीक्षक या कामात पंटर आहेत.

ऑनलाइन बुकिंगचे विविध मार्गावरील दर

कोल्हापूर ते मुंबई: २४७७ ते २५००

कोल्हापूर ते पुणे: ७६२ ते १०००

कोल्हापूर ते बेंगळुरू : १२३८

कोल्हापूर ते गोवा : १९०५

कोल्हापूर ते शिर्डी : ७६२

कोल्हापूर ते नाशिक : ७१४

ड्रॉपिंग स्टॉपलाही वेगळा दर

ज्या ठिकाणी एसटी आणि रेल्वेसाठी सोयीचे थांबे नाहीत. मात्र प्रवाशांसाठी सोयीचे असलेल्या थांब्यावर प्रवाशांच्याकडून तिकीट दरात दहा ते वीस रुपयांचा जादा आकार घेतला आहे. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर पनवेल, खारघर, वाशी, चेंबूर, दादर, सायन, ब्रांदा, सांताक्रुझ, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड आणि बोरिवली स्टॉपवर थांबण्यासाठी वेगळे दर आहेत. प्रवासात काहींनी ब्लॅकेट, शुद्ध पाणी, जीपीएस, वायफाय सुविधा, स्लीपर एसीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. उशीर झाल्यास प्रवाशांसाठी पाच ते दहा मिनिटे थांबण्याची तयारीही ट्रॅव्हल्सच्या चालकांनी दर्शविली आहे. मात्र त्यासाठी भरमसाठ तिकीट दर पाहून प्रवासी हतबल झाले आहेत.


भाडे पाहून फुटला घाम

मुंबई-कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या व्होल्वो स्लीपर एसी साठी १६ ऑक्टोबरचा दर २८०० रुपये आकारला गेला आहे. स्लिपरचा बैठक क्रमांक एक ते पाचसाठी २५०० हजार रुपयांचा दर तर पाच ते दहा आसन व्यवस्थेसाठी २८०० रुपये दर आकारला गेला आहे. १६ ऑक्टोबरपासून ते परतीच्या प्रवासासाठी मुंबईहून कोल्हापूरकडे धावणाऱ्या बसेसची नोंदणी हाउसफुल्ल होत आहेत. त्यासाठी आणखी काही दिवसांत मुंबई-कोल्हापूरसाठी ३५०० हजारांपर्यंत दर आकारला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाध्यक्षपदाची निवडणूकच नको

$
0
0

gurubal.mali@timesgroup.com

tweet :@gurubalmaliMT

कोल्हापूर: गटबाजीचा दणका बसल्याने काही तालुक्यात पक्ष शोधण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. या संघर्षाचा आणखी फटका नको म्हणून जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणूकच न घेण्याचा गुप्त अहवाल पक्षाच्यावतीने पाठविण्यात आला आहे. यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच अध्यक्ष ठरवणार असल्याने निवडणुकीची उत्सुकता संपली आहे. पुन्हा पी. एन. पाटील अथवा ते आणि आमदार सतेज पाटील सूचवतील त्या उमेदवाराच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे निश्च‌ित आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बारा पैकी आठ ते दहा आमदार काँग्रेसचे असायचे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षात उभी फूट पडली. तेथून पक्षाची ताकद कमी होत गेली. विधानसभा, लोकसभा याबरोबरच जिल्हा परिषद, जिल्हा बँक, नगरपालिका, काही साखर कारखाने काँग्रेसकडून विरोधकांच्या ताब्यात गेल्या. गत निवडणुकीत पक्षाचा एक आमदार निवडून आला. यावेळी एकही आमदार निवडून आला नाही. केवळ महापालिका सोडली तर सध्या पक्षाच्या ताब्यात काहीही नाही. पक्षाचे काही नेते पक्षात असले तरी सक्रीय नाहीत. काही जण भाजपच्या वाटेवर आहेत. तर काही नेते भाजपमध्ये असल्यासारखेच वागतात.

या पार्श्वभूमीवर गेले दोन तीन महिने जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली वेगावल्या आहेत. पी. एन. पाटील गेले १९ वर्षे अध्यक्ष आहेत. सतेज पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे व बजरंग देसाई, सुरेश कुराडे हे जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. यातील आमदार पाटील यांची ताकद चांगली आहे. तेच पी. एन. पाटील यांना तगडे आव्हान देऊ शकतात. आवाडे पक्षापासून दूर आहेत. तर बजरंग देसाई यांचा मुलगा राहुल देसाई भाजपमध्ये आहे. इतर नेत्यांची ताकद मर्यादित आहे. यामुळे यावेळी जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार पाटील व पी. एन. पाटील यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता होती. तशी तयारी गेले काही दिवस दोघांनी केली होती. पी. एन. पाटील यांना पुन्हा अध्यक्ष होण्यास विरोध झाल्यास त्यांनी बाळासाहेब खाडे व उदय पाटील-कौलवकर यांची नावे पुढे केली होती. मतदान झाल्यास आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी मतदारांची नावे निश्च‌ित करताना काळजी घेण्यात आली होती. प्रत्येक तालुक्यातील आठ व इचलकरंजीतील आठ सदस्य यासाठी मतदान करणार आहेत.

मुळात गटबाजीमुळे पक्षाची ताकद कमी झाली आहे. सध्या पक्षात नेते कमी आणि गट जास्त अशी परिस्थिती आहे. पी. एन. पाटील यांच्यासह आमदार पाटील, आवळे, आवाडे, महाडिक गटात पक्षाची विभागणी झाली आहे. निवडणूक झाल्यास पक्षातील संघर्ष वाढून त्याचा फटका बसणार हे निश्च‌ित होते. अनेक नेते पक्ष सोडून निघाल्याच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पक्षाला परवडणारा नाही, त्यामुळे निवडणुकाच घेऊ नये, असा गुप्त अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आला आहे. हा अहवाल प्रदेशकडून नुकताच केंद्रीय समितीकडे गेला आहे. यामुळे पक्षाच्या कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाही हे निश्च‌ित झाले आहे.

प्रत्येक तालुका व जिल्हा कमिटीची निवड करण्यात आली आहे. १०४ सदस्यांची निवड करून त्याचा अहवाल प्रदेश काँग्र्रेस कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय प्रदेश कमिटी घेणार आहे. पक्षात संघर्ष होवू नये ही माझी भूमिका आहे.

पी.एन. पाटील, जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकार्य पदवीधारकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

आदिवासी विभागाच्या भरतीमध्ये समाजकार्य पदवीचा समावेश कायम ठेवावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी समाजकार्य पदवीधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. समाजकार्य विदयार्थी लढा हक्कासाठी समन्वय समितीने मोर्चाचे आयोजन केलेहोते. मोर्चाने निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

अदिवासी विभागातील उपसंचालक​ किंवा प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्पाधिकारी या पदांची भरती करताना समाजकार्य पदवीची अट होती. अदिवासी विभागाने ३१ जुलै २०१७ रोजी अध्यादेश काढून पदे भरताना समाजकार्य पदवीधराबरोबर कोणत्याही शाखेतील पदवी घेणाऱ्यांना अर्ज करता येईल, असे स्पष्ट केले आहे. समाजकार्य पदवीचे शिक्षण घेताना अदिवासी व इतर समुदायासोबत काम करत विद्यार्थ्यांना ज्ञान, तंत्र कौशल्ये, अभिवृत्ती, मूल्ये, संवेदनशीलता ही कौशल्ये विकसित केली जातात. पण प्रशिक्षित समाजकार्य पदवीधारकांना डावलून त्याऐवजी कोणत्याही शाखेचा पदवीधर नियुक्त करण्याची अदिवासी विकास विभागाची कृती चुकीची आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. अदिवासी विभागात पदे भरताना समाजकार्य पदवीधर हीच अट कायम करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रा. दीपक भोसले यांनी समाजकार्य विषयाची अनिवार्यता मांडली.

संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये महिला व बाल विकास, कामगार विभागात पदांकरिता समाजकार्य विषयाची पदवी कायम ठेवावी, विविध सरकारी विभाग, प्रकल्प, योजनेमध्ये समाजकार्य पदवीधारकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली आहे, या पदवीधारांना तीन वर्षानंतर सरकारी सेवेत नियमित करावे, प्रत्येक पोलिस ठाण्यात आणि तुरुंग अधिकारी पदे भरताना समाजकार्य पदवीधर नियुक्त करावा अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्व प्रा. अमोल मिणचेकर, संजय देशपांडे, उमेश गडेकर, शरद आजरेकर, मकरंद चौधरी, महेश कांबळे, सुनील पाटील, विकास शेळके, अमृता जोशी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरिष्ठांना पूर्वकल्पना न देताच मुक्यावर उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उदगाव दरोड्यातील आरोपी विशाल उर्फ मुक्या भीमराव पवार याने सीपीआरमधून पलायन केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांची चौकशी सुरू केली आहे. कदम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देताच आरोपीला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करून जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील बंदोबस्त तैनात केला होता. जयसिंगपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे याप्रकरणाची चौकशी करीत आहेत.

मुक्या पवार याच्यासह सात ते आठ साथीदारांनी उदगाव येथील निवृत्त प्राध्यापक बाबूराव निकम यांच्या बंगल्यावर दरोडा टाकला होता. या घटनेत निकम यांच्या पत्नी अरुणा यांचा मृत्यू झाला होता, तर बाबूराव निकम हे गंभीर झाले होते. पोलिसांनी सोलापूर, सांगली, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यात शोध घेऊन मुक्या पवार याच्यासह चौघांना अटक करून दरोड्याचा उलगडा केला. आरोपी मुक्या पवार याची न्यायालयीन कोठडीत प्रकृती बिघडल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले होते. एक ऑक्टोबरला पहाटे मुक्या पवार याने बेडीतून हात काढून पोलिसांची नजर चुकवून पळ काढला. या घटनेला जबाबदार धरून पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी बंदोबस्तावरील सहायक फौजदार दिनकर कवाळे आणि कॉन्स्टेबल सचिन वायदंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

न्यायालयीन कोठडीतील आरोपीच्या उपचाराची माहिती वरिष्ठांना देऊन मुख्यालयातील पोलिस बंदोबस्त घेणे गरजेचे होते. जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील एपीआय बाळकृष्ण कदम यांनी मात्र चुकीच्या पद्धतीने जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील बंदोबस्त तैनात केला. प्रथमदर्शनी कदम यांनीही कामात कसूर केल्याचे निदर्शनास येत आहे, त्यामुळे घटनेच्या चौकशीसह एपीआय कदम यांचीही चौकशी सुरू झाली आहे. जयसिंगपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे हे चौकशी करीत आहेत. लवकरच या चौकशीचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. दरम्यान, सीपीआरमधून पळालेला आरोपी मुक्या पवार याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक बीड येथे पोहोचले आहे. आसपासच्या जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेतला असून, अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ महिन्यात ३५ पोलिस निलंबित

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर: ‘सद‍्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या पोलिस दलातील अपप्रवृत्ती वाढत आहेत. पोलिसांना लाचखोरीसह गैरवर्तनाचे ग्रहण लागले आहे. गेल्या २१ महिन्यात ३५ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय चोरट्यांशीच संगनमत करून गुन्हे करणारे पोलिसही कारवाईच्या फेऱ्यात सापडले आहेत. काही पोलिसांच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण पोलिस खात्याला बदनामीचा डाग लागत आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलिसांची आहे, मात्र अंगावर खाकी वर्दी आल्यानंतर काही पोलिसांना गैरवर्तन करण्याची खुमखुमी चढते. अवैध व्यावसायिकांशी हातमिळवणी करणे, खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती घालून पैसे उकळणे, गुन्हे दाखल करून घेण्यास चालढकल करणे, मटका आणि जुगारींना अप्रत्यक्षरित्या संरक्षण पुरवणे असे अनेक प्रकार काही पोलिसांकडून सुरू असतात. प्रत्येक पोलिस ठाण्यात अशा उचापती करणारे काही कर्मचारी आहेत. वरिष्ठांच्या नजरेत आल्यानंतरच त्यांचे कुकर्म समोर येते. काही ठिकाणी वरिष्ठच दुर्लक्ष करतात. काही लाचखोरांना वरकमाई करण्याची अपप्रवृत्तीच विनाशाकडे घेऊन जाते. लाचलुचपत प्रतंबिधक विभागाच्या कारवाईत रंगेहात सापडल्यानंतरही काही पोलिसांमध्ये सुधारणा होत नाहीत. गेल्या दोन वर्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडक भूमिकेमुळे गैरवर्तन करणारे आणि लाचखोर पोलिसांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

२०१६ मध्ये जिल्ह्यातील २३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली. यातील ११ पोलिस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले, तर १२ पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली आहे. यंदा सप्टेंबरअखेर १२ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यातील पाच पोलिस लाच घेताना सापडले, तर ७ पोलिसांनी कामचुकारपणा केला आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या पोलिसांची सहा महिन्यात विभागीय चौकशी केली जाते. या चौकशीदरम्यान संबंधितांवर आरोपांची सखोल तपासणी करून त्याच्यावर कारवाई होते. सक्तीची रजा, पगारवाढ रोखणे, आर्थिक दंड अशी शिक्षा दिली जाते. लाचखोरीच्या घटनांमध्ये थेट कोर्टात आरोपपत्र दाखल होते.

सीपीआरमध्ये दरोड्यातील आरोपी विशाल उर्फ भीमराव पवार याला उपचारासाठी दाखल केले असता, तो पोलिसांची नजर चुकवून बेडीतून हात काढून पळाला. यावेळी बंदोबस्तावर असलेले सहायक फौजदार दिनकर कवाळे आणि कॉन्स्टेबल सचिन वायदंडे या दोघांनाही पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले. दीड महिन्यांपूर्वी गगनबावडा येथे मद्यप्राशन करून एका रुग्णालयात धिंगाणा घालणारे इजाज शेख, प्रवीण काळे आणि अमर पाटील यांच्यावरही कारवाई झाली. याशिवाय लाच घेणारे आजरा पोलिस ठाण्यातील जे. डी. जाधव, राजारामपुरीतील किरण गवळी आणि जुना राजवाड्यातील पंडित पोवार यांचेही निलंबन झाले. या कारवायांमुळे पोलिसांमधील लाचखोरी आणि गैरप्रकार वाढल्याचे स्पष्ट होत आहे. कारवाई करण्याची वेळ येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे अशा स्पष्ट सूचना वरिष्ठांनी दिल्यानंतरही पोलिसांकडून चुकीची कृत्ये होतात ही गंभीर बाब आहे.

सहा महिन्यात विभागीय चौकशी

गैरकृत्यांमध्ये सापडलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर निलंबनाच्या काळात त्याला अर्धाच पगार मिळतो. चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्ह्याच्या स्वरुपानुसार आर्थिक दंड, वेतन रोखणे, वेतनवाढ रोखणे किंवा यापुढील कारवाईसाठी शिफारस केली जाते. यावर आक्षेप घेण्याची संधीही संबंधितांना मिळते.

अधिकारीही गंभीर गुन्ह्यात

वारणानगर येथे शिक्षण संस्थेच्या इमारतीतील कोट्यवधींची रक्कम लुटण्यात सांगलीतील पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. यातील पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट सध्या सीआयडीच्या अटकेत आहे. याशिवाय पेठवडगाव पोलिस ठाण्याच्या कोठडीत संशयित आरोपीच्या मृत्यूप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक संजीव पाटील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. कराड येथील अशाच गुन्ह्यातील पोलिस निरीक्षक विकास धस अद्याप फरार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images