Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अख्खे शहरच डेंजर झोन !

$
0
0


कोल्हापूर ःशहरातील रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत चाललेली अतिक्रमणे, त्याला मिळणारे राजकीय पाठबळ, भर रस्त्यांवर होणारे वाहनांचे पार्किंग, अतिक्रमणांनी गायब केलेले फुटपाथ, वर्षभर विविध उत्सवांसाठी रस्त्यांवरच घालण्यात येणारे मंडप अशातच बेदरकारपणे सुरू असलेली वाहतूक यांमुळे जीव मुठीत धरूनच जावे लागते. अवजड वाहनेही दिवसभर फिरत असतात. शहराच्या सर्व भागात हीच स्थिती आहे. त्यामुळे अख्खे शहरच डेंजर झोन बनले आहे. केएमटी आणि एसटी बसेसच्या अपघातानंतरही संबंधित यंत्रणांना जाग आलेली नाही.
रहदारीच्या प्रमुख रस्त्यांवर फेरीवाले, हातगाड्या, केबिन्सचे बेसुमार अतिक्रमण आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांचे बेकायदेशीर थांबे यामुळे वाहतूक नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. वाहतूक नियोजनात पायाभूत सुविधा आणि रस्ते मोकळे करुन देण्याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने शहरातील वाहतूक नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत.
शहरातील अनेक भागात १०० वर्षांपूर्वीचे अरुंद रस्ते आहेत. १९७२ मध्ये तत्कालीन प्रशासक व्दारकानाथ कपूर यांनी काही रस्त्यांचे रुंदीकरण केले. २००० ते २००५ या कालावधीत तत्कालीन आयुक्त राजगोपाल देवरा आणि श्रीनिवास यांनीही रस्ते रुंदीकरणाचे प्रयत्न केले. रस्ते विकास प्रकल्पात २००८ मध्ये तत्कालीन आयुक्त विजय सिंघल यांनी रस्ते रुंदीकरणाची मोहीम राबवली. त्यामुळे काही रस्ते रुंद झाले, पण शहरातील मोक्याचे रस्ते आणि चौकांत बेकायदेशीर अतिक्रमण बसवण्याचा धंदा शहरात जोरात सुरू आहे. या अतिक्रमणांना खासदार, आमदार, महापालिका पदाधिकारी, नगरसेवक आणि काही अधिकाऱ्यांकडूनही खतपाणी घातले जात आहे. महाव्दार, लक्ष्मीपुरी, राजारामपुरीसह अन्य व्यापारी पेठांमध्ये व्यापारीच दुकानाबाहेर माल मांडून फेरीवाले बनत आहेत. आईसाहेब महाराज पुतळा ते विल्सन पूल, महाव्दार रोड, पापाची तिकटी, पानलाइन, गंगावेश, रंकाळा वेश, भवानी मंडप, बिंदू चौक, भाऊसिंगजी रोड, राजारामपुरी मुख्य रस्ता, मध्यवर्ती बस स्थानक, परिख पूल, पाच बंगला, न्यू शाहूपुरी येथे पार्किंगच्या जागेवर फेरीवाल्यांनी दुकाने थाटली असल्याने नागरिकांना रस्त्यांवर जीव ​मुठीत घेऊन चालावे लागत आहे. महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग मात्र सुस्त आहे. गेली अनेक वर्षे या विभागात धडाकेबाज अधिकारी नेमलेला नाही. कारवाई करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना नेते आणि नगरसेवकांच्या धमक्या मिळतात. अतिक्रमणावर धडक कारवाई करणार, अशी घोषणा आयुक्त व अधिकारी करतात. मात्र अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम लुटुपुटूचीच ठरते. शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढताना मात्र सण, उत्सव, अधिवेशन आहे किंवा पोलिस बंदोबस्त मिळत नाही, अशी कारणे सांगून टोलवली जातात.

प्रमुख चौकात रिक्षा आणि वडापचे अनधिकृत थांबे वाढतच आहेत. वडाप व्यावसायिक केएमटीच्या उत्पन्नावर डल्ला मारत असताना महापालिकेने डोळ्यावर झापडे ओढली आहेत. फेरीवाले व वडाप वाहनामुळे शहरातील प्रमुख चौकांत दर दहा ते पंधरा ​मिनिटाला वाहतूक कोंडी होत असते. या वाहनांवर केवळ दंडात्मक कारवाई करुन महसूल जमा करण्याचे काम शहर वाहतूक नियंत्रण शाखा व आरटीओ विभाग करत आहे. वाहतूक नियोजनाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी तीन महिन्यांतून एकदा बैठक बोलावतात, पण ही बैठक म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात,’ अशी असल्याने दिवसें​दिवश रस्त्यांवर अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आक्रोश अन् हंबरडा

$
0
0

Anuradha.kadam
@timesgroup.com

Tweet : @anuradhakadamMT

कोल्हापूर : पंजा बसवण्याचे दिवस जवळ आले की उत्साहाचे भरतं येणाऱ्या तानाजी साठे या पट्टीच्या हलगीवादकाच्या तयारीलाही वेग यायचा. वयाची पन्नाशी उलटली तरी तानाजी हे पंजा प्रतिष्ठापनेसाठी घराच्या दारात जातीनं लक्ष घालून मांडव उभारायचे. सगळी गल्ली इथल्या पंजासमोर नतमस्तक व्हायची. पंजाभेटीचा सोहळा असायचा. गेल्या अनेक वर्षांचा हा शिरस्ता. आईच्या निवृत्तीनंतर ते महापालिकेत झाडू कामगार म्हणून नोकरीस लागले. कामाचा व्याप वाढला. हलगीची साथ कमी झाली. पण त्यांच पंजाशी असलेलं नातं तुटलं नाही. अलविदा... अलविदा... म्हणत पंजा विसर्जन करण्याऐवजी शोकाकूल वातावरणात तानाजी यांच्यावरच अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ कुटुंबियांवर आली.

गेल्या दहा दिवसांपासून ज्या मांडवात ताना​जींच्या पंजाचे विधी उत्साहात सुरू होते, त्याच मांडवात आज तानाजी यांचा मुलगा सागर वडीलांच्या आठवणीने टाहो फोडून रडतो आहे. तानाजीच्या आई आणि पत्नीच्या हंबरड्याने अख्खी गल्ली सुन्न झाली आहे.

रविवारी रात्री ताबूत मिरवणुकीत बस घुसल्याने झालेल्या अपघातात पोटचा मुलगा आणि आयुष्याचा जोडीदार कायमचा गेल्याची आठवण जरी झाली तरी तानाजी यांच्या आई आणि पत्नीला भोवळ येत आहे. शाहू मिलसमोरील वसाहतीत एका अरुंद गल्लीत त्यांच छोटं घर आहे. गेले दहा दिवस या घरात पंजा प्रतिष्ठापनेमुळे मंगलमय वातावरण होतं. तानाजी यांचे कुटुंब पंजाच्या मांडवात येणाऱ्या भाविकांना प्रसाद देत होते. रविवारी दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुकीची तयारी गल्लीतील मुलांनी केली. मात्र पंजा विसर्जनासाठी गेलेले तानाजी घरी परतलेच नाहीत.

सोमवारी सकाळपासून गल्लीत फक्त हंबरडा आ​णि आक्रोश होता. तानाजी यांच्या आईला आणि पत्नीला भेटायला येणाऱ्या महिला त्यांचा आक्रोश पाहून भोवळ येऊन पडत होत्या. त्यांना पाणी पाजण्यासाठी गल्लीतली मुलं सरसावली की घडलेल्या घटनेचा राग करणारी तरूण मुलं क्षणात संवेदनशीही होत होती.

तोंडचा घास
ओरबाडून नेला

दुपारी चार वाजता मिरवणुकीसाठी बाहेर पडलेला पंजा पाण्यात पडायला रात्रीचे आठ वाजणार असे गृहित धरून तानाजी साठे यांनी स्वत: घरात मुलांना खाण्यासाठी ५० किलो मसाले भात तयार केला. भाताचे भांडे, पत्रावळ्या, द्रोण असे साहित्य एका टेम्पोत ठेवून ती गाडी मिरवणुकीमागे आणण्यास कार्यकर्त्यांना सांगितले. पंजा विसर्जन झाले की मुलांना नदीकाठावर भात खायला घालण्याचा तानाजी यांचा बेत होता. सोमवारी ते भाताचे भांडे त्यांच्या घराच्या दारात तसेच पडून होते. ‘गल्लीतल्या मुलांच्या पोटाची काळजी करणारा आणि त्यांच्या तोंडी घास घालण्यासाठी धडपडणारा माझा लेक गेला, आमच्या तोंडचा घासच ​ओरबाडला’ असे म्हणून तानाजी यांच्या आईने फोडलेला हंबरडा काळीज चिरून टाकणारा होता.


जखमींवर उपचार सुरू

अपघातातील सोमवारी मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रिघ लागली होती. जखमींपैकी दोघांवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये सात जणांवर अस्टर अधार येथे तर गंभीर जखमींवर सीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आनंदा राऊत (वय ५५) व अनुराग भंडारे (वय १५) यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. वैद्यकीय अधिकारी व इतर नातेवाईकांकडून त्यांच्या प्रकृतीची वारंवार चौकशी केली जात होती. नगरसेवक संदीप कवाळे, माजी नगरसेवक शिवाजी कवाळे नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.


सुजलच्या आईचा आवाजही फुटेना

तानाची यांच्या घरापासून दहा पावलांवर सुजल अवघडे याचे घर आहे. तवनाप्पा पाटणे हायस्कूलमध्ये शिकणारा सुजल अवघ्या १४ वर्षांचा. वडील भानुदास मोलमजुरी करून घर चालवतात. एका छोट्या खोलीत दोन लहान भाऊ आणि आई-बाबांसोबत राहणारा सुजल शाळा-अभ्यास सांभाळून वडिलांना मदत करायचा. तीन भावंडांमध्ये तो मोठा. ‘आठवडाभर पंजाच्या मांडवात उत्साहात नाचणारं माझं लेकरू असं कसं ओ पंजानं नेलं’ असं म्हणत रडणाऱ्या सुजलच्या आईचा आवाजही काहीवेळानंतर क्षीण होत होता. ‘माझ्या पोराची काय चूक झाली’ हा प्रश्न विचारून त्या हंबरडा फोडत आहेत. ‘शाहू मिल चौकापर्यंत मी मिरवणुकीत सगळ्या महिलांसोबत गेले. हर्षद आणि रुद्र या त्याच्या धाकट्या भावंडांना घेऊन चौकातून मागे फिरले, तेव्हा सुजलला

हाक मारून घरी येतोस का असे विचारले होते. पण, आता मी मोठा आहे. नदीपर्यंत जाणार असा हट्ट करत सुजल गेला. नदीपर्यंत जातो म्हणणारा सुजल कधीही परत न येण्यासाठी गेला’ असं म्हणत सुजलच्या आई मनीषा यांनी आक्रोश केला. गेल्याच आठवड्यात तो आईला म्हणाला होता की, दोन वर्षात माझी दहावी झाली की मी काहीतरी काम करत कॉलेज शिकेन. आपली परि​स्थिती नक्की बदलेल असं म्हणाला होता. सोमवारी सुजलचे गल्लीतील मित्र त्याच्या आईजवळ यायचे. दारात खुर्चीवर सुन्न होऊन बसलेल्या वडिलांजवळ यायचे. छोट्या भावांच्या पाठीवरून हात फिरवायचे. न बोलताही त्या अल्लड वयाच्या मुलांतील अस्वस्थता खूप काही बोलत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराला सोसेना वाहनांचा भार

$
0
0


Sachin.Yadav@timesgroup.com

@sachinyadavMT

कोल्हापूर ः दैनंदिन कामासाठी सायकल, शेतकामासाठी बैलगाडी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य आणि भाजी मंडई, दुकानापर्यंत चालत जाणाऱ्या नागरिकांचा ट्रेंड कधीच बदलून गेला आहे. त्यातही ऊठसूट वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अल्प कागदपत्रांवर अवघ्या चार दिवसांत दुचाकी वाहन मिळत असल्याने वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम साहजिकच वाहतूक सुरक्षेवर झाला आहे. शहराचे आकारमान तेवढेच मात्र वाहनांची वाढती संख्या हे प्रमाण व्यस्त होत असल्याने शहर वाहतुकीवर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळेच अपघातांची संख्या वाढण्याबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे.

वाहन खरेदीतील सुलभता आणि कर्जाच्या तत्काळ सोय यांमुळे जिल्ह्यात खासगी वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सरासरी तीन कुटुंबात दुचाकी आणि चारचाकी वाहन आहेच. त्यात वर्षागणिक दहा ते पंधरा हजारांची भर पडत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येने जिल्ह्यात अपघाताला मोठे निमंत्रण मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहन नोंदीनुसार ३१ जुलै २०१७ अखेर ६ लाख १४ हजार ७५५ वाहने आहेत. सात वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात नऊपटीने वाहनांची संख्या वाढली आहे. २०१० मध्ये ७० हजार ८८६ असलेली वाहनसंख्या ६ लाख १४ हजार ७५५ वर पोहोचली आहे. सप्टेंबरअखेर जिल्ह्यात ही संख्या ६ लाख ६८ हजार ४२२ पर्यंत पोहोचली आहे.

१९७० च्या दशकात दुचाकी खरेदी करायची म्हटले तरी किमान चार ते पाच महिने प्रतीक्षा करावी लागत असे. त्यानंतर ग्राहकांची आर्थिक परिस्थिती पाहून दुचाकी वितरकांकडून वाहनांची विक्री केली जात असे. मात्र हे चित्र झपाट्याने बदलत गेले. आता तर सर्व प्रकारची वाहने घेण्यासाठी बँका, वित्तीय संस्थांकडून तातडीने कर्ज देतात. अनेक वाहन कंपन्यांची आकर्षक मॉडेल्स उपलब्ध झाली आहेत. कॉलेज युवकांत नवीन वाहनांचा ट्रेंड कायम आहे. महिलाही नोकरी, व्यवसायासाठी घराबाहेर पडल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून प्रत्येक कुटुंबात एकतरी दुचाकी वाहन आहे. पर्यायाने जिल्ह्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. २०१०-११ मध्ये दुचाकीची संख्या ४९४६ संख्या होती. ही वाहनसंख्या मार्च २०१७ मध्ये ६६ हजार २२६ इतकी झाली आहे. याचवर्षी मोटारसायकलची संख्या ५२ हजार ५७ होती. ती आता ४ लाख १५ हजार ८५४ झाली आहे. २०१०-११ मध्ये मोटारसायकल, स्कूटर आणि मोपेडची संख्या ५७ हजार ५७८ होती. ही संख्या आता दहापट वाढली आहे. जुलै २०१७ मध्ये ही संख्या ४ लाख ९० हजार ९०४ इतकी झाली आहे. मोटारीची संख्या २०१० मध्ये ६३९२ वरुन सध्या ५८ हजार २४२ झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग असलेल्या ऑटो रिक्षांची संख्याही २०१० च्या तुलनेत दहापटीने वाढली आहे. २०१० मध्ये ऑटो रिक्षा २२९ होत्या. ही संख्या सध्या २९९० झाली आहे.

त्याचा परिणाम अर्थातच कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ‌त्यातच बेदरकारपणे वाहने चालवण्यामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक प्रमाण दुचाकींचे आहे. एकूण वाहन संख्येच्या ८० टक्के दुचाकी आहेत. त्यावरून ही संख्या लक्षात येईल. शहराची लोकसंख्या सुमारे सहा लाखांपर्यंत आहे. वाहन चालविण्यासाठी योग्य असलेल्या अठरा वयोगटापेक्षा अधिक पुरुष आणि महिलांची संख्या लक्षात घेतल्यास ही वाहनसंख्या निश्चितच जास्त आहे.

वेगमर्यादेचे उल्लंघन

शहरातील अरुंद रस्ते आणि दुचाकींची वाढती संख्या यांमुळे शहरात दिवसभरात वाहतुकीची कोंडी होत आहे. दुचाकी वाहनांच्या अपघातात वाढ होत आहे. दुचाकीची वाहनांच्या पार्किगचा प्रश्नही भेडसावत आहे. शहरात दुचाकी वाहनांची संख्या उदंड झाली आहे. सिग्नलवरुन आणि सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेपाच नंतर वाहनांची कोंडी आणि अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. अरुंद रस्ते, खड्डे आणि वेगमर्यादा ओलांडून वाहने चालवण्याच्या प्रकारामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

०००००००००००

पर्यटकांसाठी हवे स्वतंत्र पार्किंग

श्री अंबाबाई, रंकाळ्यासह जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या वाहनांच्या पार्किंगची नीट व्यवस्था नसल्याने जागा मिळेल तेथे ही वाहने लावली जातात. त्याचा फटका वाहतूक शिस्तीला बसतो. उपनगरातून शहरात प्रवेश करण्यासाठी अर्धा तासाचा कालावधी लागत आहे. तर शहराच्या मुख्य मार्गावरुन शहराबाहेर पडण्यासाठी चाळीस मिनिटांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांची स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा’ संघटनेचा शुक्रवारी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने ‘एमसीआयसीएसएम बील २०१७’चे कायद्यामध्ये रुपातंर करताना बीएएमएस डॉक्टरांचे अॅलोपथी प्रॅक्टिसचे अधिकार कायम ठेवावेत, या मागणीसाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी (ता. ६) मूक मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देणार आहे. मोर्चाला सकाळी दहा वाजता दसरा चौक येथून सुरुवात होईल. डॉ. सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डॉ. पाटील म्हणाले, ‘केंद्र सरकारने नीती आयोगाची स्थापना केली आहे. त्यामध्ये एमसीआयसीएसएम बील २०१७ प्रस्तावित आहे. बिलाचे कायद्यात रुपांतर झाल्यास विद्यमान तरतुदींपैकी केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद कायदा १९७० आणि महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१नुसार भारतीय चिकित्सा पद्धतीच्या बीएएमएस डॉक्टरांच्या अॅलोपथीची औषधे वापरण्याच्या कायदेशीर अधिकारावर गदा येण्याची भीती आहे. त्यामुळे बिलांमध्ये योग्य दुरुस्त्या करून बीएचएमएस डॉक्टरांचे अधिकार अबाधित राहावेत यासाठी नीती आयोगाला अनेक इ-मेल पाठवले आहेत. देशातील अनेक खासदारांना निवेदने दिली आहेत. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाला दसरा चौक येथून सकाळी दहा वाजता सुरुवात होईल. मोर्चा व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल.’

पत्रकार परिषदेस जिल्हा संघटनेचे विभागीय सचिव डॉ. यशपाल हुलस्वार, डॉ. आदित्य काशीद, डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. शिवानंद पाटील, डॉ. हरीष नांगरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमींच्या मृत्यूनंतर तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गंगावेस परिसरात रविवारी (ता.१) झालेल्या केएमटी बस अपघातातील जखमी आनंदा बापू राऊत (वय ५५, रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. राऊत यांच्या मृत्यूने अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे. या घटनेनंतर दुपारी काही काळ राजारामपुरी परिसरात तणाव होता. दरम्यान, पोलिसांनी बसचालकाकडे अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसून झालेल्या दुर्घटनेत प्रसिद्ध हालगीवादक तानाजी भाऊसाहेब साठे (वय ५०) आणि सुजल भानुदास अवघडे (वय १५) या दोघांचा मृत्यू झाला होता. अपघातात मिरवणुकीतील १८ जण जखमी झाले होते. यातील जखमींवर सीपीआर रुग्णालयासह राजारामपुरी आणि शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जखमींपैकी आनंदा राऊत यांना डोके आणि छातीला गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.

यावेळी नातेवाईकांनी सीपीआर परिसरात गर्दी केली होती. राऊत हे मजुरी आणि जागरण, गोंधळ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. दुपारी तीनच्या सुमारास पंचगंगा स्मशान घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजारामपुरीत तणाव

राऊत यांच्या मृत्यूची माहिती मिळताच राजारामपुरीच्या मातंग वसाहतीमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. ३० ते ३५ तरुणांनी दुचाकींवरून फिरत राजारामपुरीत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यानंतर दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली. संतप्त जमावामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी राजारामपुरीत मोठा फौजफाटा तैनात केला होता. राजारामपुरी परिसरातील केएमटी बसच्या फेऱ्याही रद्द केल्या. याशिवाय सीपीआर रुग्णालय आणि शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्येही बंदोबस्त वाढवला होता. दुपारी दोन ते चार या वेळेत राजारामपुरीतील व्यवहार बंद राहिले. यानंतर पुन्हा नागरिकांनी स्वतःहून व्यवहार सुरळीत सुरू ठेवले. दैनंदिन व्यवहार सुरू राहण्यासाठी पोलिसांनीही नागरिकांना आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिवाळीत शेतकऱ्यांचा शिमगा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना दिवाळीपूर्वी रक्कम जमा होणार असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. भाजप सरकारमुळे शेतकऱ्यांवर दिवाळीऐवजी शिमगा करण्याची वेळ आली आहे,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केली. ही शेतकरी सन्मान योजना नसून शेतकरी ‘अपमान’ योजना असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘शेतकरी संपानंतर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, पण त्यानंतर अनेक जटील अटींचा समावेश करुन जास्तीत-जास्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, अशी तजवीज केली. ऑनलाइन अर्ज दाखल करतानाच शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करत आहेत. चुकीचे धोरणामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना शिमगा करण्याची वेळ येणार आहे. ’

‘भाजपवाल्यांच्या ‘कामापुरते मामा’ वृत्तीचा आम्हाला चांगला अनुभव आला. त्यांना गरज होती तेव्हा त्यांनी सगळ्या पक्षांची मदत घेतली. आता मात्र दिवस बदलले असून त्यांची मित्रपक्षांशी असलेली वागणूक बदलली. मित्राला मित्रासारखे वागवले तर त्याला मैत्री म्हणतात, भाजपवाले मित्राला गुलामासारखे वागवतात, अशी वागणूक मिळत असताना नारायण राणे यांनी आम्हाला आलेला अनुभव पाहून निर्णय घ्यावा, असा सल्लाही खासदार शेट्टी यांनी दिला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्यातील निम्मा पैसा सॅटेलाईटसाठी वापरला असता तर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज येऊन चांगले पीकपाणी पिकले असते, अशी बोचरी टीकाही शेट्टी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिनीविरोधात स्वदेशी अभियान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये असलेल्या तणावपूर्ण ​परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चिनी बनावटीच्या वस्तूंच्या बाजारपेठेने भारतीय ग्राहकांवर आर्थिक आक्रमण केले आहे. या आक्रमणास तोंड देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र स्वदेशी जागरण मंचतर्फे राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती स्वदेशी संघटनेचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अग्निहोत्री म्हणाले, चिनी बनावटीच्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. दर्जाहिन आणि स्वस्त यामुळे या वस्तू ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यामुळे स्वदेशी वस्तूंना दर्जा असूनही त्यांची विक्री घटली आहे. देशाला होणाऱ्या एकूण विदेशी तोट्याच्या ४४ टक्के तोटा हा चीनच्या व्यापारामुळे होतो. स्वस्त मालाचे उत्पादन करून तो माल भारतात पाठवते. परिणामी भारतातील अनेक उद्योग बंद पडले आहेत. रोजगाराचे स्रोत कमी झाले आहेत. हा धोका वेळीच ओळखण्याची गरज आहे. सणांवेळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीच्या वस्तू बाजारात दाखल होतात. भारतीय सणांच्या बाजारपेठेवरील चिनी वस्तूंचे आक्रमण रोखून त्यावर बहिष्कार घालण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागृती अभियानाला प्रतिसाद मिळत असून जागृती होत आहे. मात्र नागरिकांना योग्य पर्याय देण्याचीही गरज आहे. त्यादृष्टिने उपक्रम असतील.

अग्निहोत्री म्हणाले, चीनच्या वस्तू न वापरण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटण्यात येणार आहेत. तसेच महिला, युवक यांच्यासाठी प्रबोधन मेळाव्यांचे आयोजनही या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यापाऱ्यांना चिनी बनावटीच्या वस्तू विक्रीसाठी न ठेवण्याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. महिला बचत गटाद्वारे तयार करण्यात येणाऱ्या पणत्या, आकाशदिवे, लाइटच्या माळा, रंगीत रांगोळी असा स्वदेशी पर्याय देण्यात येईल. बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहिम राबवण्यात येणार आहे. महाग वाटले तरी स्वदेशी माल घ्या हा संदेश जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी कार्यशाळा, संवादयात्रा होल.

पत्रकार परिषदेला जिल्हा संयोजक अनिरूद्ध कोल्हापुरे, जिल्हा कार्यवाह केदार जोशी, स्वदेशी जागरण मंचचे संयोजक केशव गोवेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र आराखड्याबाबत आठवड्यात बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याच्या कामाबाबत चर्चा करण्यासाठी येत्या आठवड्यात निर्णायक बैठक होणार आहे. सध्या हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीच्या प्रतिक्षेत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शहरात दोन भक्तनिवास, भाविकांच्या वाहनांसाठी सुरक्षित पार्किंग व्यवस्था, भक्तनिवासपासून मंदिरापर्यंत मोफत बससुविधा, दर्शन मंडपात स्वच्छतागृह, स्तनदा मातांसाठी स्तनपान कक्ष, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, छोटेखानी रेस्तराँ अशा सुविधांचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी होताच या आराखड्यानुसार काम सुरू होणार आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा मिळाव्यात यावर भर देण्यात आला आहे. गेल्या काही वर्षापासून केवळ नवरात्रउत्सव, श्रावण आणि उन्हाळी व हिवाळी सुटीचा कालावधी यासह वर्षभर सलग सुट्ट्यांच्या काळातही कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. नवरात्रकाळात बारा ते सोळा लाख पर्यटकांची गर्दी होते. तर इतरवेळी दररोज सरासरी साठ हजार ते दीड लाख पर्यटक अंबाबाई मंदिरात येतात. मंदिर सुरक्षा आणि सुशोभिकरणाबरोबरच भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात काही रचनात्मक मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये पर्यटक भाविकांच्या वाहनांचा ताण मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर येऊ नये यासाठी या आराखड्यात विशेष दक्षता घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुक्काम करणाऱ्या भाविकांना भक्तनिवासाची सुविधा देण्यासोबत भक्तनिवास ते अंबाबाई मंदिर या मार्गावर मोफत बससुविधा देण्याचा प्रस्तावही ७८ कोटींच्या एकूण आराखड्यातंर्गत देण्यात आला आहे. सध्या मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेर विद्यापीठ हायस्कूल समोर असलेल्या जागेचा वापर दर्शनमंडपासाठी करण्यात येणार आहे. या दर्शनमंडपामध्ये थांबणाऱ्या भाविकांमधील महिला, लहान मुले, ज्येष्ठ भाविक यांच्या मुलभूत गरजा ओळखून दर्शनमंडपातच त्या सुविधा देण्यात येणार आहेत.

हात दाखवा बस थांबवा

शहरातील व्हिनस कॉर्नर परिसर आणि टेंबलाई मंदिर परिसर येथे दोन भक्तनिवासांची उभारणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पर्यटक भाविकांनी आपली वाहने या भक्तनिवास परिसरात थांबवायची. सामान भक्तनिवासातील कक्षात ठेवायचे. तेथून मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या बसमधून मंदिरापर्यंत यायचे. दर्शन झाल्यानंतर याच बसमधून भक्तनिवासापर्यंत प्रवास करायचा. जर भाविकांना खरेदीसाठी मंदिर परिसरात फिरायचे असेल तर खरेदी झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी दर्शनबस दिसताच तिला हात दाखवून थांबवण्याची सुविधाही भाविकांना देण्यात येणार आहे. यामुळे मंदिर परिसरातील पर्यटक भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सुटावा यासाठी आराखड्यात हा प्रस्ताव देण्यात आला आहे.

कोट

भक्तनिवास, पार्किंग व्यवस्था आणि दर्शनमंडपात थांबणाऱ्या महिला भाविकांच्या विशेष गरजांची पूर्तता अशा धर्तीवर एकत्रितरित्या ७८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मंजुरीचा अंतिम टप्पा ओलांडून हा प्रस्ताव सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वाक्षरीसाठी गेला आहे. या आराखड्यामुळे भाविकांना सुविधा मिळण्यासोबत मंदिर परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्नही मिटणार आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीत सात पिस्तुले जप्त

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सांगलीत दोघांकडून देशी बनावटीची सात पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे हस्तगत केली. शंभर फुटी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. सनीदेव प्रभाकर खरात (वय २०, सिंधू बुद्रुक, दहिवडी, माण) आणि संतोष शिवाजी कुंभार (वय २७, नागझरी, कोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खरात आणि कुंभार हे पिशवीत पिस्तुले घेऊन उभे होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे ही पिस्तुले सापडल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे यांनी दिली.

सणासुदीचे दिवस असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेत असलेल्या पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. हवालदार अशोक डगळे यांना खबऱ्याकडून संबंधित दोघांबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, हवालदार जितेंद्र जाधव, अझहर पिरजादे, शशिकांत जाधव यांच्या पथकाने शंभर फुटीवरील हॉटेल जय मल्हारसमोर उभ्या असलेल्या खरात आणि कुंभार या दोघांना पकडले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडील पिशवीत सात पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे सापडली. याची किंमत सुमारे ३ लाख ५५ हजार इतकी आहे. या दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या दोघांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांनी कुठून पिस्तुले आणली आणि ती घेऊन ते सांगली परिसरात कशासाठी आले होते, याबाबत तपास सुरू असल्याचेही अधीक्षक शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापशी, बहिरेवाडीत ढगफुटीसदृश पाऊस

$
0
0


म. टा. प्रति​निधी, कोल्हापूर

कागल तालुक्यातील माद्याळ,तमनाकवाडा,हणबरवाडी आणि सेनापती कापशी परिसरासह आजरा तालुक्यातील बहिरेवाडी यथे ढगफुटीसदृश पावसाने मंगळवारी अक्षरशः झोडपून काढले. सुमारे अडीच ते तीन तास झालेल्या या पावसाने गावांसह शेतांमध्ये पाणीच पाणी झाले. दरम्यान, हणबरवाडी येथील प्रकल्प या एकाच पावसात भरून ओसंडू लागला. पावसाने हणबरवाडी व बाळेघोल परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

माद्याळ, तमनाकवाडा परिसरात ढगफुटीसदृश पावसाने नदी व ओढ्याच्या काठावर असलेले विद्युत पंप वाहून गेले. तर पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे ओढ्याचे पाणी शेतीत घुसले. परिणामी अनेक ठिकाणी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर काही ठिकाणी शेतीच वाहून गेली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

दरम्यान, बहिरेवाडी येथे सकाळी अकराच्या सुमारास अचानकपणे पावसाला जोरदार सुरवात झाली. या प्रचंड पावसाने गटारी व गल्लीमध्येही पाणीच पाणी तुंबले. अडीच-तीन तासांच्या वृष्टीने गावासह शेतीवाडीत पाणीच पाणी झाले. परिसरातील ओढे व नालेही दुथडी वाहू लागले. गावच्या तळ्यातील पाणी शेतात शिरले, यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धूळवाफेच्या भात पिकाची काढणी व मळणी सुरू असताना झालेला हा पाऊस शेतकऱ्यांना संकटात टाकणारा ठरला आहे. यामुळे हातातोंडाला आलेले पीक जाण्याची मोठी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरप्रदेश मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनासर हिंदू विद्यापीठामध्ये घडलेल्या प्रकारानंतर विद्यार्थी व माध्यम प्रतिनिधींवर अमानुष लाठीमार करून हिटलरशाहीचे दर्शन घडवणाऱ्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन एनएसयूआयच्या शहर शाखेच्याने केले. महात्मा गांधी जयंतीनिमित्त मिरजकर तिकटी आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री अदित्यनाथ यांच्या सरकारचा निषेध केला.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘बनारस विद्यापीठामध्ये मुलींची छेड काढण्याचा प्रकार झाला. घडलेल्या छेडछाडीच्या प्रकाराला विरोध करण्यासाठी विद्यार्थिनी कुलगुरूंच्या निवासस्थानी जात असताना सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी विद्यार्थिनींवर लाठीमार करताना वृत्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही मारहाण केली. यातून हिटलरशाहीचे दर्शन होत आहे. सर्वच ठिकाणी गळचेपी केली जात आहे. पंतप्रधान मोदी ‘बेटी बचाव’चा नारा देत असताना त्यांच्या मतदारसंघात विद्यार्थिनींवर बेछुट लाठीमार केला गेला. लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही योगी अदित्यनाथ सरकारने लाठीमार करून त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.’

या घटनांचा निषेध करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनात शहराध्यक्ष पार्थ मुंडे, दीपक थोरात, सौरभ नाईक, सुशांत चव्हाण, अजिंक्य पाटील, निखिल जाधव, अक्षय साळोखे, प्रवीण सुतार, योगेश साळोखे, अक्षय शेळके, संकेत जोशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राणेंच्या पक्षासाठी इच्छुकांची वानवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्षात कोल्हापूरातील दिग्गज नेत्यांची एन्ट्री होण्याची शक्यता फारच कमी आहे. दोन्ही काँग्रेसवर नाराज असलेल्या नेत्यांनी कमळ हातात घेतल्याने सध्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात जाण्यासाठी कुणी फारसे इच्छूक दिसत नाही. तरीही माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश साळोखे यांच्यासह काहींना पक्षात घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

राणे यांच्या भाजप प्रवेशाची अनेक महिने चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर आपल्या सोबत कोण कोण येऊ शकतील याचा अंदाज घेण्यासाठी राणे यांनी कोल्हापूर दौराही केला होता. एका लग्नाच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या राणेंनी काहींशी चर्चा केली होती. प्रकाश आवाडे यांनी मुंबईत त्यांची भेट घेतली होती. भाजप प्रवेशाऐवजी त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. हा पक्ष एनडीए मध्ये सहभागी होणार असून राणेंना मंत्रीपदही मिळणार आहे. कोकणाच्या पलिकडे आपली ताकद आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी काही दिवसापासून फिल्डींग लावण्यास सुरूवात केली होती. पुढील आठवड्यात त्यांनी मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते कोल्हापुरात येणार आहेत. तसे नियोजन सुरू झाले आहे.

राणे यांचे कोल्हापुरात काही समर्थक आहेत. सुरेश साळोखे, अशोक पाटील यांच्यासह अनेकांशी त्यांनी संपर्क साधला आहे. काही माजी आमदार, नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आवाडे पक्षात आल्यास पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे. इचलकरंजी व कोल्हापुरातील तीन नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचे कळते. मु​स्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, सुधाकर साळोखे यांच्यासह काहींचा प्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कळते. कोल्हापुरात दिवाळीनंतर भव्य मेळावा घेवून पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन सुरू आहे. पण सध्या तरी या पक्षाच्या हाती ताकदीचा कोणताच नेता लागला नाही. कारण जे जे दोन्ही काँग्रेसवर नाराज होते, त्यातील बहूसंख्य नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राणे यांचे लक्ष्य शिवसेना असण्याची शक्यता आहे. पण तेथेही त्यांच्या गळाला कुणी लागण्याची चिन्हे दिसत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळच्या सभेचा अहवाल पाठवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ५५ व्या वार्षिक सभेचा वस्तूनिष्ठ अहवाल पाठवण्याचे आदेश मंगळवारी विभागीय दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी सहायक निबंधक अरुण चौगले यांना दिले. आमदार सतेज पाटील यांनी, गोकुळची सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी विभागीय उपनिबंधकांकडे केली होती. त्यानंतर अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

गोकुळची सभा १५ सप्टेंबर रोजी झाली होती. सभेमध्ये अहवाल वाचनाचे कोणतेही अधिकार नसताना गोकुळेचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अहवालातील सर्व विषयांना मंजुरी दिली होती. त्यानंतर समांतर सभा घेऊन महाडिक यांच्या कृतीचा निषेध केला होता. सभेनंतर आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहकार कायद्याचे उल्लंघन झाल्याने सभा बेकायदेशीर ठरवण्याची मागणी करत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी ‘पदूम’चे सहाय्यक निबंधक चौगुले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. दहा दिवसांत याबाबत कार्यवाही न झाल्यास कोर्टात पार्टी करण्याचा इशारा दिला होता. शिष्टमंडळाच्या मागणीनंतर सहाय्यक निबंधक चौगुले यांनी विभागीय उपनिबंधक शिरापुरकर निवेदन सादर केले होते. निवेदनास अनुसरुन शिरापूरकर यांनी तक्रारातील एक ते आठ क्रमांकाच्या तक्रारींवरील वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्पादक संस्थांचा पाठपुरावा

दरम्यान, मंगळवारी दूध उत्पादक संस्थांच्यावतीने सहाय्यक निबंधकांना निवेदन दिले. गोकुळी सभा बेकायदेशीर ठरवून संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती, त्याबाबत कार्यालयाकडून कोणती कार्यवाही केली. याबाबतचा खुलास विचारण्यात आला. शिष्टमंडळामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, बाबासाहेब चौगले, एकनाथ पाटील, पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, संदीप पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान दुपारी निवेदन दिल्यानंतर सायंकाळी विभागीय उपनिबंधक शिरापुरकर यांनी अहवाल पाठवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० हजार प्रवाशांचा जीव धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पापाची तिकटी येथे घडलेल्या अपघातास केएमटी प्रशासनाचा भोंगळ कारभारच जबाबदार असल्याचे टीकास्त्र सोडत परिवहन समिती स्वीकृत सदस्य सुहास देशपांडे यांनी समितीच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला. केएमटीच्या ताफ्यातील निम्म्याहून अधिक बसचे आयुर्मान संपल्याने रोज पन्नास हजारांहून अधिक प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आणत त्यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दुसरीकडे आयुक्त ​अभिजित चौधरी यांनी अपघाताच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने मंगळवारी कागदपत्रे, वर्कशॉपमधील लॉगबुकची तपासणी तसेच कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. बुधवारीही ​चौकशी चालू राहणार असून, अंतिम अहवाल दोन दिवसात आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.

चौकशी समितीप्रमुख व अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, समिती सदस्य व केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी मंगळवारी तपासाच्या अनुषंगाने केएमटी कर्मचारी, वाहक चालकाकडे चौकशी केली. वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांकडून बसची स्थिती, देखभालविषयी विचारणा केली. बसच्या देखभाली संदर्भातील नोंदवही, लॉगबुकची तपासणी केली. अपघात घडण्यामागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. बसमध्ये बिघाड झाल्यामुळे अपघात घडला की, अन्य काही कारणामुळे या दिशेने तपास होत असून तांत्रिक बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. रबिवारच्या बस अपघातामुळे तिघांचा मृत्यू आणि १८ जण जखमी झाले. बसखाली नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी चिरडल्याने जमावाचा उद्रेक होऊन महापालिकेच्या वाहनांची तोडफोड झाली होती.

दरम्यान, सुहास देशपांडे यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच अपघात घडल्याचा आक्षेप नोंदवित समिती सदस्यत्वपदाचा राजीनामा ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्याकडे सादर केला. देशपांडे यांची जानेवारी २०१६ मध्ये ताराराणी आघाडीकडून परिवहन समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली होती. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी प्रशासनाचा निषेधही नोंदविला. केएमटीला ऊर्जितावस्था मिळावी, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात या संदर्भात प्रशासनाला विविध सूचना केल्या होत्या. मात्र, प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुल्लाणींकडून १० हजारांची मदत

स्वीकृत नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या हलगीवादक तानाजी साठे व शाळकरी विद्यार्थी सुजल अवघडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हातभार लावला. मुल्लाणी यांनी साठे व अवघडे कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची रोख मदत केली. नगरसेवक संदीप कवाळे यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द केली.

प्रशासनाविषयी नोंदविलेले आक्षेप

अपघाताची जबाबदारी ​अधिकाऱ्यांवर निश्चित न करता रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारवाई

नवीन बसेस खरेदी करूनही अधिकाऱ्यांना केएमटी फायद्यात आणण्यात अपयश

जुन्या बसच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्च व घोळ मिटेना

वडापवाल्यांची समांतर यंत्रणा मोडीत काढण्यास प्रशासनाला अपयश

अधिकाऱ्यांचे पगार वेळेवर, रोजंदारी कर्मचारी तिष्ठत

सेवानिवृत्त पीएफ रकमेच्या प्रतीक्षेत, अनेक कुटुंबींयांची उपासमार

केएमटीच्या बस

ताफ्यातील एकूण बस ः १२९

रोज धावणाऱ्या बस ः ११७

आयुर्मान संपलेल्या बस ः ३९

पुढील वर्षी आयुर्मान संपणाऱ्या बस ः १५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळात क्षीरसागर, नरके की मिणचेकर?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला स्थान देण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये शिवसेनेलाही संधी मिळण्याची शक्यता असल्याने कोल्हापुरातील सेनेच्या कोणत्या आमदाराची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. आमदार राजेश क्षीरसागर व डॉ. सुजित मिणचेकर यांची नावे आघाडीवर असून, चंद्रदीप नरके देखील यासाठी प्रयत्न करत आहेत.

नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. त्यांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळण्याची शक्यता आहे. याचवेळी शिवसेनेच्या काही आमदारांना राज्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. मुंबईनंतर सेनेला सर्वाधिक यश कोल्हापुरात मिळाले आहे. दहापैकी सहा आमदार सेनेचे निवडून आल्याने कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिपदासाठी तीन आमदार गेली तीन वर्षे प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेत क्षीरसागर, मिणचेकर व नरके आहेत. तिघेही दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

क्षीरसागर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सतत आव्हान देत आहेत. त्यांच्या आक्रमकतेला ताकद देण्यासाठी शिवसेना मंत्रिपदासाठी त्यांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे. नरके हे सहकारात असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी उद्धव ठाकरे ऐनवेळी नरकेंना संधी देऊ शकतात. दलित नेत्यास संधी देण्याचा निर्णय झाल्यास डॉ. मिणचेकर यांचे नाव पुढे येऊ शकते. हे तिघेही सेना नेत्यांच्या संपर्कात आहेत. यामुळे नेमकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोषी पोलिसांचे निलंबन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उदगाव दरोड्यातील आरोपी विशाल उर्फ मुक्या भीमराव पवार (वय २३, रा. बहाद्दूरवाडी, जि. सांगली) याने सीपीआर रुग्णालयातून पलायन केल्याप्रकरणी मंगळवारी (ता. ३) दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सहायक फौजदार दिनकर एस. कवाळे आणि पोलिस कॉन्स्टेबल सचिन परसू वायदंडे (दोघेही नेमणूक, जयसिंगपूर पोलिस ठाणे) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ही कारवाई केली. होमगार्ड अमोल एस. सूर्यवंशी याच्या चौकशीचा अहवाल प्राप्त होताच कारवाई केली जाणार असल्याचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी सांगितले.

निवृत्त प्राध्यापक बाबूराव निकम यांच्या उदगाव येथील बंगल्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील अटकेत असलेला आरोपी मुक्या पवारला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. रविवारी (ता. १) पहाटे चार ते सहा या वेळेत आरोपीने पलायन केले. यावेळी बंदोबस्तासाठी जयसिंगपूर पोलिस ठाण्याकडील सहायक फौजदार दिनकर कवाळे, कॉन्स्टेबल सचिन वायदंडे आणि होमगार्ड अमोल सूर्यवंशी तैनात होते. पहाटे तीननंतर सहायक फौजदार कवाळे हे रुग्णालयातून निघून गेले, तर कॉन्स्टेबल वायदंडे रुग्ण कक्षाच्या बाहेरील हॉलमध्ये झोपला. होमगार्ड सूर्यवंशी याचाही डोळा लागल्याचे पाहून आरोपीने पळ काढला. बंदोबस्तावरील पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच आरोपी मुक्या पवार पळून गेल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे यांनी प्राथमिक चौकशी अहवाल अधीक्षक मोहिते यांच्याकडे सादर करताच मोहिते यांनी दोघांचे निलंबन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दावा प्रभाग विकासाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील उच्चभ्रू लोकवस्तीचा आणि नियोजनबद्धरित्या विकसित केलेला प्रभाग अशी ताराबाई पार्कची ओळख आहे. मात्र प्रभागातील जुनी ड्रेनेज लाइन, एकमेव असलेल्या सासने मैदानाची दुरवस्था, ताराबाई गार्डनमध्ये आवश्यक सुविधांची वानवा, मुख्य रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. पोटनिवडणुकीमुळे रिंगणातील चारही उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. थेट उमेदवारांशी संवाद साधून प्रभागाविषयीचा त्यांचा अजेंडा महाराष्ट्र टाइम्सने जाणून घेतला.

ताराबाई पार्क प्रभागातील ड्रेने​ज लाइनच्या पाइप खराब झाल्या आहेत. अमृत योजनेतून ही ड्रेनेज व्यवस्था सक्षम करणार आहे. प्रभागात वाहतुकीची समस्या आहे. पार्किंगची कोंडी होत आहे. त्याला शिस्त लावण्याचे प्रयत्न असतील. प्रभागातील रस्ते सुस्थितीत करणार आहे. सेफ ताराबाई पार्क करण्यासाठी प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. सासने मैदान परिसरात कोणतेही अतिक्रमण होऊ देणार नाही. प्रभागातील नागरिक सर्वाधिक कर भरतात. त्यांना त्या प्रमाणात सुविधा मिळवून देणार आहे.

- राजेश लाटकर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार

प्रभागात ड्रेनेजलाइन जुनी आहे. भागात लोकवस्ती, व्यापारी संकुल, हॉटेल्सची संख्या वाढल्याने ड्रेनेज लाइन कमकुवत झाली आहे. जुनी ड्रेनेज लाइन बदलण्याचा अग्रक्रम राहील. ताराराणी गार्डनचे सुशोभिकरण आणि नागरिकांना अत्यावश्यक सुविधा निर्माण केल्या जातील. सासने मैदान हे प्रभागातील एकमेव मैदान असून त्याचे सपाटीकरण, सुरक्षा आणि देखभाल दुरुस्ती केली जाईल. स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अद्ययावत मैदान तयार होईल. चांगले रस्ते तयार केले जातील. शांतताप्रिय व सुस्थितीत हा भाग असून स्मार्ट प्रभाग, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संकल्पना आहे.

- रत्नेश शिरोळकर, भाजप, ताराराणी आघाडी उमेदवार

संपूर्ण ताराबाई पार्क प्रभागात ड्रेनेज लाइनची समस्या असल्याने भागाभागात ड्रेनेज लाइनची सुविधा केली जाईल. संपूर्ण प्रभागात महिलासाठी स्वच्छतागृह नसल्याने त्यांची कुचबंणा होते. ही गैरसोय टाळण्यासाठी प्रभागात महिलासाठी स्वच्छतागृह उभारणीला प्राधान्य राहील. प्रभागातील मुख्य रस्त्यावर पार्किंगची समस्या आहे. ठि​कठिकाणी खोकी वाढत असून त्याला चाप, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रभागात पार्किंगचे नियोजन अग्रक्रमाने केले जाईल. सासने मैदानात लाइट नसल्याने गैरप्रकार वाढत असून मैदानाची देखभाल,अन्य सुविधा केल्या उपलब्ध केल्या जातील. ताराबाई गार्डनचा विकास, परिसरात​ विरंगुळा केंद्र उभारण्यात येईल.

- राज जाधव, शिवसेना उमेदवार

सासने मैदानाची दुरवस्था झाली असून मैदान अद्ययावत करण्याला अग्रक्रम राहील. बास्केटबॉल मैदान तयार करणार आहे. प्रभागातील अनेक भागात ड्रेनेज लाइनची व्यवस्था निर्माण करुन प्रलंबित प्रश्न सोडविला जाईल. देखभालीअभावी ताराबाई गार्डन खराब होत आहे. या ठिकाण ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करु. डी मार्ट, दामिनी रोडवर पार्किंगची समस्या उदभवत आहे. अनधिकृत केबीन हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करणार. प्रभागातील​ विविध भागात स्ट्रीट लाइटची सुविधा निर्माण करु. प्रभागाचा लौकिक वाढविण्यावर भर राहील.

- पवन माळी, अपक्ष उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वै​यक्तिक भेटीगाठींनी प्रचारात रंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकाळी कामानिमित्त बाहेर पडण्याच्या आत कुणाच्या घरात, कुणाच्या कार्यालयात जाऊन तर कुणाच्या विविध ठिकाणी असलेल्या साइटवर जाऊन वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर दोन्ही पॅनेलनी भर दिल्याने रेसिडेन्सी क्लबच्या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली आहे. यापूर्वी पॅनेल नसल्याने प्रत्येक मतदारांशी वैयक्तिक भेटीगाठी होत नव्हत्या. पण आता ​दोन पॅनेल असल्याने प्रतिष्ठेमुळे प्रत्येक मतदाराशी संपर्क साधला जात आहे. तसेच विविध संघटनांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर ‘रेसिडन्सी’ क्लबचे सभासद आहेत. आतापर्यंत निवडणुका झाल्या तरी विरोधी पॅनेल उभे करून निवडणूक झालेली नाही. त्यामुळे यापूर्वी निवडणुकीच्या रिंगणात राहणारा इच्छुक उमेदवार स्वतःच्या पातळीवर प्रचार करून मतदारांना विश्वास देत असे. अनेकजण आपापल्या क्षेत्रात असणाऱ्या मतदारांशी संपर्क साधत असत. त्यासाठी प्रत्येक मतदाराशी भेट घ्यायलाच पाहिजे, असे होत नव्हते. पण यंदा दोन पॅनेल आमनेसामने ठाकल्याने चुरस वाढली आहे.

पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांमधील दोन गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने प्रत्येक पॅनेलकडून मतदारांशी संपर्क साधला जात आहे. पॅनेलमधील उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी करत आहेत. त्यासाठी ज्यांना घरी वेळ असल्यास घरी अन्यथा कार्यालयात, व्यवसायाच्या ठिकाणी जिथे वेळ मिळेल, त्यावेळी भेटी घेतल्या जात आहेत. जे उमेदवार आहेत, तेही आपला व्यवसाय, उद्योग सांभाळून प्रचारासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत भेटीगाठीसाठी बाहेर पडत आहेत.

वैयक्तिक भेटीगाठी केल्या जात असतानाच काही व्यावसायिकांच्या असलेल्या संघटनांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून एकगठ्ठा मतदान घेण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी या संघटनांच्या पदाधिकारी व सभासदांशी बैठका होत आहेत. याबरोबरच सातशेच्या आसपास मतदार ३५ वयाच्या आतील आहेत. या तरुण पिढीचे मतदान घेण्यासाठीही प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजेंनी केले शरद पवारांच्या गाडीचे सारथ्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षापासून दूर गेलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी चक्क शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. पुण्याहून ते दोघे एकत्र साताऱ्यात आले. तेव्हा अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे अक्षरश: विस्फारले गेले.
विजयादशमीचा शाही दसरा सोहळा साताऱ्यात साजरा झाल्यानंतर उदयनराजे पुण्यात होते. बुधवारी शरद पवारांचा सातारा जिल्हा दौरा नियोजित होता. राष्ट्रवादीचे खासदार असलेले उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील बहुतांश नेते यांच्यातील वाद प्रचंड उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दोघांचे मोबाइलवर बोलणे झाले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी ते एकत्र भेटले. चर्चा करीत साताऱ्याला जाऊ, असे ठरल्यानंतर शरद पवारांनी उदयनराजेंना आपल्या गाडीत बोलाविले. उदयनराजे पवारांच्या गाडीत बसले आणि आपल्या नेहमीमया स्टाईलने थेट गाडीची चावीच आपल्या हातात घेतली. ड्रायव्हिंग सीटवर उदयनराजे बसले तर शेजारी शरद पवार. पुण्याहून साताऱ्यापर्यंत त्या दोघांमध्ये बरीच राजकीय चर्चा झाली. साताऱ्यांच्या सरकारी विश्रामगृहात ही गाडी आल्यानंतर उपस्थितांना धक्का बसला.
शिवेंद्रराजेही पवारांच्या गाडीत
शरद पवार यांनी साताऱ्याहून कराडला जाताना आमदार शिवेंद्रराजेंना आपल्या गाडीत घेऊन चर्चा केली. त्यामुळे पुण्यातून साताऱ्यापर्यंत उदयनराजे आणि साताऱ्यातून कराडपर्यंत शिवेंद्रराजे यांच्या पवारांनी ‘गुफ्तगू’ केले.
दरम्यान, सातारा नगरपालिकेतील घंटागाडी आंदोलनावरून राजमाता कल्पनाराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात पत्रकबाजीचा प्रचंड धुरळा उडाला आहे. शिवाय उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातही राजकीय आरोप-प्रत्यारोप झाल्याने दुरावा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी दोन्ही राजांना काय कानमंत्र दिला, याची चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्य विकासाचेज्ञान देणे गरजेचे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

‘कर्मवीर अण्णांनी काळाची गरज म्हणून २०व्या शतकात महाराष्ट्रात शिक्षणाच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्न केला. कर्मवीरांचा हा विचार मध्यवर्ती ठेऊन गेल्या ९८ वर्षांत संस्थेने विस्ताराबरोबर गुणवत्तेला प्राधान्य देऊन शैक्षणिक कार्य केले आहे. तथापि आज जगात जे झपाट्याने बदल सुरू आहेत. त्या दिशेने आपण बदलले पाहिजे. नव्या पिढीला स्वत:च्या पायावर आत्मविश्वासाने उभा राहण्यासाठी कौशल्य विकासाचे ज्ञान उपलब्ध करून दिले पाहिजे,’ आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या ९८व्या वर्धापन दिन समारंभात पवार बोलत होते. कार्यक्रमामया अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलपती व संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य पतंगराव कदम होते.
पवार पुढे म्हणाले, ‘नव्या पिढीला स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण गरजेचे असून, ही गरज लक्षात घेऊन संस्थेने संशोधन, क्रीडा, शेती, प्रशासन, औद्योगिक क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असलेल्या व्यक्तींना संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, प्रभाकर देशमुख यांच्या सहकार्यातून संस्थेमधून कौशल्य विकासाने परिपूर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम निश्चितपणे केले जाईल. सिम्बॉयसिस स्किल डेव्हल्पमेंट विद्यापीठाबरोबर यासाठीच सहकार्य करार केला आहे. नव्या पिढीची जिज्ञासा वाढविण्याची जबाबदारी आपली आहे.’
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी संस्थेने घेतली असून, त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य संस्थेचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि सेवक यांच्याकडून मिळत आहे. समाजातील उपेक्षित मुलांना सक्षमपणे उभा करण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत ते संस्थेमार्फत निश्चितपणाने केले जातील, असेही पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images