Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

घुमले नाट्यगीतांचे अखंड सूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
संगीत रंगभूमीला अजरामर करणाऱ्या संगीत नाटकांमधील पदे आणि शास्त्रीय सुरांची मोहिनी आजही रसिकांच्या मनात रूंजी घालते. संगीत नाट्यपदांचा आनंद रसिकांना मिळावा या हेतूने कोल्हापुरात रविवारी नाट्यगीतांची विक्रमी मैफल रंगली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी अखंड बारा तास नाट्यगीताचे सूर रंगले आणि यानिमित्ताने कोल्हापूरच्या कलाकारांनी विक्रम रचला. रविराज इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेतर्फे या विक्रमी मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा रंगमंच ऐतिहासिक रंगमंच म्हणून ओळखला जातो. रविवारी या रंगमंचावर अखंड नाट्यगीताचे सूर घुमत होते. एकाहून एक सरस नाट्यगीतांतील पदांनी रसिकांना मुग्ध केले. आलापांच्या तानांमध्ये गुंफण्यात आलेल्या कथानुरूप भावनांचे एकेक पदर उलगडत होते. पारंपरिक वाद्यांच्या सुरावर सुमधुर नाट्यगीतांनी सजलेल्या मैफलीचा आनंद रसिकांनी घेतला. सलग १२ तास १२५ नाट्यगीतांचे सादरीकरण करून कोल्हापूरच्या कलाकारांनी एक विक्रम रचला.
स्वर्गीय संगीत स्वयंवर, पुण्यप्रभाव व संशयकल्लोळ या नाटकांना शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच एक ऑक्टोबर हा संगीत रंगभूमीदिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्हींचे औचित्य साधून सलग १२ तासात अखंड १२५ नाट्यपद गायनाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. रविवारी (दि.१) सकाळी ९ वाजता या विक्रमी मैफलीला प्रारंभ झाला. यावेळी महापौर हसीना फरास, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, उपमहापौर अर्जुन माने, ‘गोकुळ’चे चेअरमन विश्वास पाटील, शिरीष देशपांडे, राजन जोशी, भारत खराटे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. संयोजिका सीमा जोशी यांनी स्वागत केले. मनीष आपटे यांनी आभार मानले.
‘श्री गजवदना दे मतिहिना’ या पदाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सौख्य सुधा, शंभो शिवहर, अजूनी खुळा हा नाद, उजळीत जग मंगलमय अशी नाट्यपदे सादर केली जात होती. गायक मधुसूदन शिखरे, प्रकाश सप्रे, गायिका नीला नागावकर, वीणा जोशी हे एकापाठोपाठ एक जोडून गायन करत होते, तर या गीतांना सलगता देण्यासाठी वादक सज्ज होते. ऑर्गन पंडित विश्वनाथ कान्हेरे, ज. ल. नागावकर, लक्ष्मण पाटील, तबलावादक डॉ. नंदकुमार जोशी, शंतनू कुलकर्णी, मयूरेश शिखरे, व्हायोलिन वादक मृणालिनी परुळेकर यांनी साथसंगत केली. अखंड रंगलेल्या या मैफलीची नोंद ग्लोबल रेकॉर्डस, एशिया पॅसिफिक रेकॉर्डस, नॅशनल रेकॉर्डस, रेकॉर्ड होल्डर्स रिपब्लिक यामध्ये करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोडफोड, तणाव आणि आक्रोश

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावर केएमटी बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसल्याने जमावाच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी केएमटी बस, ​अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि सीपीआर चौकात एसटी बसला लक्ष्य करत मोडतोड केली. घटनास्थळ आणि सीपीआरमध्ये जखमींचा आक्रोश आणि नातेवाईकांनी हृदय पिळवटून टाकणारा फोडलेला टाहो यामुळे वातावरण सुन्न झाले होते. जखमी आणि मृतांचा नेमका समजत नसल्याने अफवांमध्ये भर पडत होती. त्यामुळे जमाव आणखी आक्रमक झाला.

गंगावेस येथे अपघात झाल्यानंतर मिळेल त्या वाहनाने जखमींना सीपीआरमध्ये आणले. जखमींच्या आक्रोशाने परिसर हेलावून गेला. नातेवाईक सीपीआरमध्ये येताच हंबरडा फोडला. जखमींची अवस्था पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. एकीकडे दु:ख आणि दुसरीकडे संतापाचा कडेलोट झाल्याने सीपीआरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाखाली रहावी यासाठी जलद कृतीदलाच्या तुकडीला तैनात केले.

अपघाताचे वृत्त समजताच राजरामपुरीतील मातंग वसाहतीतील तरुण मोठ्या संख्येने गंगावेस आणि सीपीआरकडे धावले. सीपीआरमध्ये जखमींची नेमकी माहिती मिळत नसल्याने संभ्रमात भर पडली. मृतांच्या आकड्यावरून अफवा पसरल्याने नातेवाईकांचा आक्रोश वाढला. अपघातात कुणाच्या डोक्याला, कुणाच्या छातीला, हाताला, पोटाला, पायाला मार बसला होता. जखमीत शाळकरी मुलांचा समावेश होता. एकाचवेळी मोठ्या संख्येने जखमी सीपीआरमध्ये दाखल झाल्यामुळे सीपीआरच्या यंत्रणेने उपचारासाठी शर्थ केली. सर्जन, आर्थोपेडीक, न्यूरो सर्जन यांच्यासह ५० हून अधिक जणांचे वैद्यकीय पथक तैनात करून त्यांना वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे यांनी सूचना दिल्या.

अपघातात १८ जण जखमी आणि दोघे मृत्यूमुखी पडल्याचे समजताच जमावाच्या संताप आणखी वाढला. जमावातील एक गट सीपीआरमधून बाहेर पडत रस्त्यावर पोहचला. जमावाने सीपीआर चौकातील बसला लक्ष्य केले. बसवर मोठे दगड फेकून काचांची तोडफोड केली. त्यानंतर बसमधील प्रवाशी उतरून गेले. ड्रायव्हर केबिनचे मोठे नुकसान केले. प्रचंड आरडाओरड सुरू झाल्याने नागरिक भयभीत झाले. बसमधील चालक आणि वाहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला मात्र, पोलिसांनी त्यांची सुटका केली.
त्यानंतर पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिव्यांची लाखोली वाहत संतप्त जमाव दगडफेक करत होता.

पोलिसांचे दुर्लक्ष

पापाची तिकटी ते गंगावेश हा मार्ग दररोजच्या वाहनांमुळेच प्रचंड वर्दळीचा असतो. अशा वर्दळीच्या मार्गावर ताबूत विसर्जनाच्या मिरवणूक निघाल्या असताना तेथील वाहतूक थांबवण्याची आवश्यकता होती. किमान अवजड वाहने तरी अन्य मार्गाने वळवणे आवश्यक होते. जर केएमटीला त्या मार्गावरुन पुढे सोडले नसते तर कदाचित हा अपघात टाळता आला असता.

प्रचंड तणाव

प्रक्षुब्ध झालेल्या जमावाकडून केएमटीवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या परिसरात मोठा गोंधळ उडाला. बस जमावावर जाताच, बसचालकाने उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला. जमाव संतप्त झाल्याने प्रवाशी घाबरले. जमावाने दगडफेक सुरू करताच प्रवाशी तातडीने उतरून सुरक्षित स्थळी गेले. जमावाने दगडफेक करून बस फोडली आणि बस उलटण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कार्यकर्त्यांनी आवरले. बस पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गंगावेशीकडून अग्निशमन दलाची गाडी येत असताना तिथे जमावाने अडवली व त्यावरही दगडफेक केली.


अपघाताचे वृत्त समजताच आमदार राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. आमदार क्षीरसागर यांनी सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरंगुडे यांच्याशी उपचारासंदर्भात चर्चा केली. जखमींना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केली. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सीपीआरला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. नगरसेवक संदीप कवाळे, माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, नेताजी कवाळे, गणी आजरेकर यांनी सीपीआरमध्ये धाव घेत जखमींच्या उपचारासाठी धावपळ केली. उपमहापौर अर्जुन माने, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक ईश्वर परमार, किरण नकाते यांनी गंगावेश येथे दाखल येऊन नागरिकांची विचारपूस केली.

बस हलविण्यास विरोध

अपघातानंतर संतप्त जमावाने बस जागेवरून हलविण्यास विरोध केला. संतप्त जमाव पांगल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी कर्मचाऱ्याला बस हलविण्याची सूचना केली. त्यावेळी उपस्थित तरुणांनी त्याला विरोध करत पंचनामा केल्याशिवाय बस हलवू देणार नाही अशी भूम‌िका घेतली. त्यामुळे पोलिसांनी शांत राहणे पसंत केले. तर तोडफोड केलेल्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पोलिसांनी बाजूला केल्या.

अमृतकर यांचे आवाहन

तोडफोड सुरू असताना शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर घटनास्थळी दाखल झाले. ते आपल्या पथकासह येत असताना चाळीस ते पन्नास जणांचा जमाव त्यांच्या दिशेने धावून जात होता. मात्र, त्यावेळी अमृतकर यांनी जमावासमोर जात त्यांना विनंती केली. पोलिसांना सहकार्य करा, पोलिस तुम्हाला सहकार्य करतील असे सांगितल्यावर जमाव शांत झाला.

अपघातस्थळाचे दृश्य विदारक

ताबूत विसर्जन मिरवणूक सुरू असताना अचानक केएमटी बस घुसली. अपघातस्थळावरील प्रत्यक्षदर्शी असलेल्या विजय सावंत यांनी ही घटना पाहिली आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. बस मिरवणुकीत घुसल्यानंतर जवळपास नागरिकांना ५० ते ६० फूट फरफटत गेले. प्रचंड आरडाओरड आणि आक्रोश सुरू झाला. बसच्या चाकाखाली व्यक्ती अडकले. कोणाचा हात तर कोणाचा पाय त्याखाली होता. रक्ताचा सडाच पडला होता. त्यामुळे अनेकांना भोवळ आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांचे तोंड गोड होणारकर्जमाफीची अंमलबजावणी दिवाळीपूर्वी होणार; सहकारमंत्र्यांची माहिती

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली. सुमारे ८९ लाख शेतकऱ्यांपैकी ७७ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. आणखी बारा लाख अर्ज भरणारे शिल्लक आहेत. ऑनलाइन प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही. आठवडाभरात राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती आल्यानंतर कामकाजाला आणखी गती येईल, असेही सहकारमंत्री देशमुख म्हणाले.
कर्जमाफीच्या अमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर विविध यंत्रणा कार्यरत असून, या सर्व यंत्रणेत समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार नियंत्रण कक्षाची स्थापना मंत्रालयीन स्तरावर करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सहकार विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, राज्यातील सर्व बँका आणि आपले सरकार पोर्टलद्वारे आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अर्जाची माहिती या सर्वांचे समन्वयाचे कामकाज करण्यात येत आहे, असेही देशमुख म्हणाले. या विशेष नियंत्रण कक्ष प्रमुखपदी सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक मुंबईचे मोहम्मद आरिफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उडीद, मुगाला ५५७५ रुपये हमीभाव
उडीदासाठी ५४००, तर मुगासाठी ५५७५ रुपये हमीभाव ठरविण्यात आला आहे. याचे चांगले उत्पन्न झाले असून, यामुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळणे गरजेचे आहे. उडीद व मूग खरेदी केंद्रे सुरू करणार आहोत, असेही देशमुख म्हणाले. हमी भाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार आहोत. शेतकऱ्यांनीही आपल्या तक्रारी बिनधास्तपणे कराव्यात. बाजार समिती व्यापाऱ्यांवर कारवाई करू शकते, असे देशमुख म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीपूर्वी वेगळ्याविदर्भाची निर्मितीरामदास फुटाणे यांचे प्रतिपादन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
‘राज्याच्या अर्थसंकल्पातील बहुतांश निधी विदर्भातील विकास कामांसाठीच वळविण्यात आला आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणूक होण्यापूर्वी सहा महिने अगोदरच विदर्भ स्वतंत्र राज्य झाल्याचे सर्वांना पाहावयास मिळेल. आपण अत्यंत जबाबदारीने हे सांगत आहोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वात्रटिकाकार माजी आमदार रामदास फुटाणे यांनी सोलापुरात रविवारी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हुतात्मा सभागृहात अमृतसिद्धी सोहळा पार पडला. या वेळी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत फुटाणे बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते कवी. ना. धो. महानोर व कवी रामदास फुटाणे यांचा सन्मान करण्यात आला.
कवी फुटाणे म्हणाले, ‘स्वतंत्र विदर्भाची तयारी, साहित्यिक आणि पत्रकारांची मुस्कटदाबी आदींविषयी विधिमंडळात विरोधी पक्षांसह कोणीही बोलत नाही. या बाबत आपल्याला नवल वाटते. नीट बोला अन्यथा तुमचा भुजबळ करू, अशी दमबाजी बहुदा सरकारकडून दिली जात असावी. त्यामुळे कोणीही काहीही बोलत नसावे. आम्ही यापूर्वी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर वात्रटिका केल्या आहेत. मात्र, त्यावेळी कधीच आणि कोणा साहित्यिकांवर कधीच बंधने आले नाहीत. मात्र, आज जे सर्व ऐकावयास मिळत आहे ते अत्यंत विदारक आणि मन सुन्न करणारे आहे.’
भारतात गेल्या पाच हजार वर्षांपासून गरिबांना मूर्ख बनविण्याचे काम सुरू आहे. अगदी श्रीकृष्णाने सुदाम्याचे पोहे खाल्ले, पण सुदाम्याची गरिबी दूर झाली नाही. तशीच परिस्थिती भारतात कायम राहिली. गरिबांसाठी प्रत्येक सरकारने वेगवेगळ्या योजना काढल्या. फुकट घरे, फुकट उपचार, अशा हजारो योजना केल्या. मात्र, यामुळे गरिबी दूर होत नाही. हाताला काम दिले पाहिजे. आणि हे काम देण्यातच सरकार अपयशी ठरले आहे, असेही फुटाणे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कासकडे जाणारा रस्ता खचला

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
सातारा शहरातून कास पुष्प पठाराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील यवतेश्वर घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. अरुद घाट रस्त्यातील मोठ्या दरीकडील बाजूच्या रस्त्याचा भाग दरड स्वरुपात दरीत कोसळला आहे. चार चाकी वाहन जाण्या इतकाही डांबरी रस्ता शिल्लक राहिलेला नाही.
सुमारे ५० मीटरचा हा भाग दरीत ढासळला आहे. स्थानिक नगरसेवक धनंजय जांभळे , मॅरेथॉन संघटनेचे धावपटूंनी येथे तातडीने मोठे दगड लावून रस्ता पोलिसांच्या मदतीने बंद केला. सतत पडणाऱ्या पावसाने आणि येथून ये-जा करणाऱ्या हजारो वाहनांच्या दाबामुळे रस्त्यावर मोठा ताण येत आहे. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच आज, सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असल्याने पठारावर हजारो पर्यंटकांची उपस्थिती रहाणार होती. पहाटे लवकर आलेल्या पर्यटकांना आता अडचण निर्माण झाली आहे. यामुळे कास पठाराकडे जाणारे पर्यटक अडकले आहेत. घाट खचल्याने घटनास्थळी प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी भेट दिली असून, पर्यायी मार्गावरून जुन्या राजमार्गाने म्हणजेच (महाबळेश्वर मार्गे) वाहतूक वळविली आहे. यवतेश्वर घाटातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर लवकरात लवकर करून वाहतूक सुरळीत करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू
यवतेश्वर घाटात दरड कोसळल्यामुळे काहीकाळ वाहतूक बंद करण्यात आली होती. कास पठाराकडे जाण्यासाठी लहान वाहनांसाठी एका साईडने या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.
दरड कोसळल्यापासून एका तासाच्या आत एका साईडने लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सिंघल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माशांचे सीमोलंघन अन् खव्वयांचा ताव

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
टेंभू योजनेचे पाणी ओढ्यातून तलावात सोडताच तलवातील मासे ओढा पात्रात आले आणि ते मासे पकडण्यासाठी एकच झुंबड उडाली. ओढ्यावर धावलेल्यांनी साड्या, धोतरं, लुंग्या याचेच जाळे करून ओढा पात्रात उतरुन सोमवारी दिवसभर मासे पकडून त्यावर मनमुराद ताव मारला. ओढा पात्रातील पाण्यात मोठ्या आकाराचे मासे दिसू लागल्यानंतर काहींनी माशांचा पाऊस पडल्याची अफवा पसरवून स्वतःची करमणूक करून घेतली. हा संपूर्ण प्रकार विटा येथील विवेकानंदनगर परिसरात सोमवारी घडला.
विटा येथील ढवळेश्वर तलाव भरण्यासाठी टेंभू योजनेचा कालवा जेसीबीने फोडून रविवारी पाणी सोडण्यात आले. कालव्याचे गढूळ पाणी तलावाला जावून भिडताच माशांच्या प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा गुणधर्मामुळे तलावातील मासे ओढा पात्रात दिसू लागले. रविवारीही काहींनी त्या ओढ्यात मासेमारी केली. परंतु, सोमवारी ओढ्यातील निवळू लागल्यानंतर मोठ्या आकाराचे मासे थव्याने फिरताना दिसू लागले. त्यामुळे अनेकांनी ओढ्याकडे धाव घेतली. एखाद्या खानदानी मच्छीमाराप्रमाणे प्रत्येकजण आपण मासे पकडण्यात किती पटाईत आहोत, याचे दर्शन देऊ लागला. यात महिला, लहानगी मंडळीही मागे नव्हती. भरपूर मासे हाताला लागल्याने अनेकांनी शंभर रुपयांचा दर काढून मासे विक्रीचा व्यवसाय करून पैसेही कमावले. सहजपणे मासे हाताला लागू लागल्याने अनेकांनी ओढ्यावर गर्दी करून मासे पकडण्याचा मनमुराद आनंद लुटला. एकाप्रकारे माशांनी केलेले सीमोलंघन मासे खव्वयांना वेगळाच आनंद देवून गेले.
विटा शहरानजीकच्या सुळकाई डोंगर पायथ्यापासून टेंभू योजनेचा खानापूर-तासगाव कालवा गेला आहे. वसंतनगर येथील तलाव भरल्यानंतर विवेकानंदनगर येथील तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले. या ठिकाणी पाणी सोडण्यासाठी गेट नसल्याने कालवा फोडूनच ढवळेश्वर तलावा भरावा लागतो. उन्हाळ्यातही याच पद्धतीने तो टेंभूच्या पाण्याने भरण्यात आला होता. उन्हाळ्यात तलाव भरल्यानंतर त्यात मत्स्य बीज टाकण्यात आले असल्याने माशांचे प्रमाण वाढलेले होते. सोमवारी तासगाव नाक्यातून फुले नगरकडे जाणाऱ्या ओढापात्रात, तासगाव रस्त्यावरील ओढापात्र तसेच पारे रस्त्यावरील ओढापात्र या ठिकाणी मासेमारीला उधान आल्याचे चित्र समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहापुरातील तिघागुंडावर मोकाची कारवाई

0
0

इचलकरंजी,



शहापूर येथील पीआर बॉईज या टोळीचा प्रमुख प्रविण दत्तात्रय रावळ याच्यासह दोघांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. श्रीधर विद्याधर गस्ती व अजित आप्पासो नाईक अशी त्यांची नावे आहेत.

यातील रावळ व गस्ती या दोघांना अटक करण्यात आले असून अजित नाईक याचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी दिली.

शहापूर पोलिस ठाणे हद्दीतील पीआर बॉईज टोळीतील प्रविण रावळ, श्रीधर गस्ती व अजित नाईक या गणेशनगरमधील तिघांवरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रविण रावळ आणि त्याच्या साथीदारांना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून हद्दपारही करण्यात आले आहे. तरीही त्यांनी शहरात गुन्हेगारी सुरूच ठेवली होती. त्यामुळे या टोळीवर मोका अंतर्गत कारवाईसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे शहापूर पोलिसांनी प्रस्ताव पाठवला होता. त्याला मान्यता मिळाल्याची माहिती बारी यांनी दिली. या मोका अंतर्गत कारवाईच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक रमेश सरवदे यांच्याकडे सोपवला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक शहाजी निकम उपस्थित होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बिअरबार, परमिट रूममध्ये भरदिवसा एका गुंडाने गावठी कट्ठा रोखत दुसऱ्या एका गुंडाला धमकावले होते. ही घटना सिसीटिव्हीत कैद झाल्यानंतरही गावभाग पोलिसांनी या गुंडावर जुजबी कारवाई करून सोडून दिले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा घटनांमध्ये लक्ष घालून गुंडाच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस अपघातप्रकरणी दोघे अधिकारी सक्तीच्या रजेवर

0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी केएमटी बसचा चालक रंगराव पांडुरंग पाटील (रा. म्हाळुंगे, ता. करवीर) याला सोमवारी निलंबीत करण्यात आले. तसेच केएमटी वर्कशॉप विभागाचे वर्क्स मॅनेजर एम. डी. सावंत आणि प्रभारी वाहतूक निरीक्षक रवींद्र धुपकर या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. रविवारी झालेल्या या अपघाताने जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी दिवसभर बैठका घेतल्या. घटनेच्या तपासासाठी करण्यासाठी तिघा अधिकाऱ्यांची चौकशी ​समितीही नेमण्यात आल्याचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, अपघताचे पडसाद दिवसभर उमटले. केएमटी वर्कशॉपमध्ये झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याबरोबरच प्रसंगी अधिकाऱ्यांच्या घरासमोर ठिय्या मारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

रविवारी सायंकाळी पापाची तिकटी येथे ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसून दोघेजण ठार तर अठराजण जखमी झाले आहेत. या घटनेचे पडसाद सोमवारी दिवसभर उमटले. राजारामपुरी परिसर दिवसभर बंद ठेवण्यात आला. त्याचवेळी घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, यासाठी महापालिका पदा​धिकारीही आक्रमक झाले. केएमटीच्या वर्कशॉप येथे महापौर हसीना फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त बैठक झाली.

यावेळी घटनेच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन केल्याचे सांगून आयुक्त चौधरी यांनी सांगितले की, चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. तसेच कारवाईदरम्यान कुणाचा दबावही घेणार नाही. चौकशी अहवाल येईपर्यंत चालक पाटील याला निलंबीत करण्याबरोबरच वर्क्स मॅनेजर सावंत आणि वाहतूक निरीक्षक रवींद्र धुपकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

केएमटी वाहतूक दिवसभर बंद

रविवारी अपघातानंतर केएमटी बस व अग्निशमनच्या वाहनांची मोडतोड करण्यात आली. घटनेची तीव्रता पाहून केएमटी प्रशासनाने सोमवारी सकाळी दहापर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सकाळच्या सत्रात वर्कशॉपमधून एकही बस बाहेर पडली नाही. पदाधिकारी-अधिकारी बैठकीनंतर बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवासी, नागरिकांच्या सुविधेसाठी बससेवा सुरु करण्यात येत असून सर्वांनी शांतता राखून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. दुपारी दोनच्या सुमारास वर्कशॉपमधून पाच बसेस मार्गस्थ झाल्या. मात्र काही ठिकाणी नागरिकांनी बस अडवल्या. राजारामपुरी, मातंग वसाहत येथील काही कार्यकर्त्यांनी वर्कशॉपमध्ये येऊन केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांची भेट घेतली. लोकांच्या भावना तीव्र आहेत, बस फेऱ्या सुरु झाल्यास मोडतोडीचा इशाराही दिला. त्यानंतर बससेवा बंद ठेवण्यात आली. मंगळवारपासून बससेवा नियमित सुरु राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

चौकशी अहवाल आज

आयुक्त चौधरी यांनी अपघाताच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली केएमटी व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांची ​त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. समितीने सोमवारी चौकशी सुरू केली. लॉगबुक तपासणी, बस मेंटेनन्स आणि शेड्यूलची माहिती घेतली. कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. ही समिती मंगळवारी (ता.३) अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले. केएमटी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करू, असे ते म्हणाले. पाटील यांनी राजारामपुरीतील मृतांच्या घरी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन पोलिसांचे आज निलंबन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उदगाव (ता. शिरोळ) दरोड्यातील आरोपी विशाल उर्फ मुक्या भीमराव पवार (वय २३, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) याने सीपीआरमधून पलायन केल्यानंतर पोलिसांची तीन पथके त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगली, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात सात ठिकाणी छापे टाकून आरोपीचा शोध घेतला. याशिवाय मुक्या पवार याच्या काही नातेवाईकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, मात्र अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. याप्रकरणी बंदोबस्तासाठी असलेल्या तीन पोलिसांचे आज निलंबन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

उदगाव (ता. शिरोळ) येथे निवृत्त प्राध्यापक बाबूराव निकम यांच्या घरावर १३ ऑगस्टच्या रात्री दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला होता. त्या घटनेत दरोडेखोरांच्या हल्ल्यात निकम यांच्या पत्नी अरुणा यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर बाबूराव निकम हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी १५ सप्टेंबरला विशाल उर्फ मुक्या पवार याच्यासह चौघांना अटक केली होती. सात दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर बिंदू चौक कारागृहात रवानगी झाल्यानंतर २८ सप्टेंबरपासून पवार याच्यावर सीपीआरच्या दूधगंगा वॉर्डमधील तिसऱ्या मजल्यावर उपचार सुरू होते. रविवारी पहाटे त्याने बेडीतून सुटका करून घेऊन पळ काढला. मूळव्याधीने त्रस्त असलेला मुक्या पवार याला चालतानाही त्रास होतो, त्यामुळे अन्य साथीदारांच्या मदतीने त्याने पळ काढला असावा असा पोलिसांना संशय आहे. यानुसार लक्ष्मीपुरी, जयसिंगपूर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन पथके मुक्या पवार याचा शोध घेत आहेत. पथकांनी सोमवारी बहाद्दूरवाडी, इस्लामपूर (जि. सांगली), करमाळा (सोलापूर), कर्जत, श्रीगोंदा (जि. अहमदनगर), इंदापूर (जि. पुणे) आदी सात ठिकाणी छापे टाकून शोध घेतला. पोलिसांनी पवार याच्या काही नातेवाईकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, मात्र अद्यापही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

आरोपी मुक्या पवार याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्या बंदोबस्तासाठी सहायक फौजदार दिनकर एस. कवाळे, सचिन परसू वायदंडे आणि होमगार्ड अमोल एस. सूर्यवंशी हे तिघे तैनात होते. यातील कवाळे पहाटे रुग्ण कक्षातून बाहेर गेले, तर वायदंडे आणि सूर्यवंशी हे दोघे रुग्ण कक्षाच्या बाहेरील हॉलमध्ये झोपले होते. पोलिसांची नजर चुकवून आरोपीने पळ काडला. सोमवारी दिवसभर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बंदोबस्तावरील तिघांचीही चौकशी केली. चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठवला असून, मंगळवारी अधीक्षक मोहिते निलंबनाची कारवाई करणार आहेत. याशिवाय बंदोबस्तावरील पोलिसांची खातेअंतर्गत चौकशीही होणार आहे.

बेडी काढली कशी?

दूधगंगा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सर्जिकल वॉर्डमध्ये रुग्णांची गर्दी असल्याने बंदोबस्तावरील पोलिसांनी आरोपी मुक्या पवार याच्या हातातील बेडी कॉटला लावली. बेडीची किल्ली पोलिसांकडे होती, तरीही आरोपीने पळ काढला, त्यामुळे बेडीतून आरोपीचा हात निघाला कसा? याची चर्चा पोलिसांच्या वर्तुळात सुरू आहे. आरोपीच्या हाताच्या आकारापेक्षा बेडी मोठी असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस झोपले, आरोपी पळाला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल असलेला खून व दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित विशाल उर्फ मुक्या भिमराव पवार (वय २३, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) हा बंदोबस्तास असलेला पोलिस झोपलेला असताना बेडीतून हात काढून पळून गेला. रविवारी सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. उदगाव (ता. शिरोळ) येथील प्राध्यापकाच्या घरावरील दरोडा व खूनाच्या गुन्ह्यात पवार हा मुख्य संशयित होता.

संशयित पवार याच्यावर सीपीआर हॉस्पिटलच्या दूधगंगा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मेल सर्जिकल वॉर्डमध्ये तीन क्रमांकाच्या कॉटवर उपचार सुरु होते. जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार दिनकर कवाळे, पोलिस शिपाई सचिन वायदंडे आणि होमगार्ड सूर्यवंशी असे तिघेजण बंदोबस्तास होते. शनिवारी (ता. ३० सप्टेंबर) सहायक फौजदार कवाळे हे रात्री ड्युटीनंतर घरी गेले. त्यानंतर पोलिस कर्मचारी सचिन वायदंडे आणि होमगार्ड सूर्यवंशी हे दोघे बंदोबस्तास होते. संशयित पवार याच्या हातात बेडी होती. रात्री साडेतीन वाजता सचिन वायदंडे याने होमगार्ड सूर्यवंशी याला पवारकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यानंतर वायदंडे हे झोपले. वायदंडे झोपल्याचे लक्षात आल्यावर पवार हा पळून गेला. रविवारी सकाळी सहा वाजता होमगार्ड सूर्यवंशीने पोलिस वायदंडे याला उठवले. त्यानंतर मुक्या याचा शोध सुरू झाला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव घरफाळा न भरू नका

0
0

इचलकरंजी

जोपर्यंत वाढीव घरफाळा रद्द होत नाही तोपर्यंत कोणीही घरफाळा भरु नये, असा निर्णय सोमवारी झालेल्या घरफाळा वाढ विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच बुधवारी (ता.४) प्रांताधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन देऊन याबाबत जाब विचारण्यात येणार आहे.

इचलकरंजी नगरपरिषदेने नुकताच ५३ हजार मिळकतधारकांवर २० टक्के घरफाळा वाढीचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसताना ही वाढ म्हणजे अन्याय असून या विरोधात भाजप वगळता राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सर्व श्रमिक संघ, शेकाप, भारिप बहुजन महासंघ, जनता दल (से), आझाद हिंद मंडळ, इचलकरंजी नागरिक मंच, कोल्हापूर जिल्हा जॉबर संघटना, समता संघर्ष समिती आदी पक्ष व सामाजिक संघटनांनी मिळून घरफाळा वाढ विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या समितीमयावतीने वाढीव घरफाळा रद्द व्हावा यासाठी आंदोलन छेडले आहे.

समितीमयावतीने नगरपालिकेमया प्रवेशद्वारात निदर्शने, वाढीव घरफाळा बिलांची होळी, प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि आमरण उपोषण केले. या आंदोलनाची दखल घेऊन नगराध्यक्षांनी या प्रश्नी नगरपालिकेत सर्वपक्षीय बैठक घेण्यासह सभा घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तर प्रांताधिकाऱ्यांनी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन देऊन उपोषण स्थगित केले. पण आठवडा लोटला तरी आश्वासनांबाबत काहीच हालचाली झालेल्या नाहीत.

या प्रश्नी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी समितीची सोमवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. यावेळी सत्ताधारी पक्षाकडून घरफाळा वाढ विरोधी कृती समितीला नागरिकांतून पाठींबा मिळत नसून हे आंदोलन केवळ पुढाऱ्यांचे आंदोलन असल्याची टीका करत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या संदर्भात चर्चा करण्यात आली. शेवटी सर्वानुमते जोपर्यंत वाढ रद्द केली जात नाही तोपर्यंत एकाही मिळकतधारकाने घरफाळा भरुन नये असा निर्णय घेण्यात आला. तसेच या संदर्भात आंदोलन तीव्र करण्यासह नागरिकांत जनजागृती करण्यासाठी भागाभागात सभा, बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस प्रकाश मोरे, शशांक बावचकर, कॉ. दत्ता माने, ए. बी. पाटील, सदा मलाबादे, जनसेवा पक्षाचे आबा जावळे, मदन कारंडे, विठ्ठल चोपडे, महादेव गौड, सयाजी चव्हाण, बशीर जमादार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्तीवेळीच पीएफ खात्यावर

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनेक वर्षे एखाद्या कंपनीत घालवल्यानंतर निवृत्तीची रक्कम त्वरित मिळून वेळेत पेन्शन मिळावी, अशी सामान्य अपेक्षा असते, पण काहीवेळा व्यवस्थापनाची उदासीनता, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून (पीएफ) होणारी दिरंगाई किंवा अपुऱ्या कागदपत्रांमुळे अनेकांना हे लाभ वेळेवर मिळत नाहीत. पण गेला शुक्रवार अपवाद ठरला. पीएफ कार्यालय आणि व्यवस्थापनातील समन्वयामुळे निवृत्ती दिवशीच संबंधीतांच्या बँक खात्यावर पीएफ व पेन्शनची रक्कम जमा झाली. या अनोख्या सेवेमुळे अनेकवर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना वेगळेच समाधान लाभले. विभागीय आयुक्त सौरभ प्रसाद यांच्याहस्ते संबंधित कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे लाभ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

सरकारी, निमसरकारी असो अथवा खासगी कार्यलय. कितीही वर्षे सेवा बजावली तरी कर्मचाऱ्यांना वेळेत पीएफ किंवा पेन्शन सुरू होईल, याची खात्री नसते. कधी व्यवस्थापनाकडून अपुऱ्या कागदपत्रांचा पुरवठा तर कधी पीएफ कार्यालयाकडून दिरंगाई होते. यामुळे निवृत्तधारक अक्षरश: वैतागून जातात. काही सरकारी कार्यालयात तर फाइलवर ‘वजन’ ठेवल्याशिवाय ती हलतच नाही, अशी स्थिती, पण शुक्रवारचा दिवस अपवाद ठरला.

निवृत्तधारकांना निवृत्तीदिवशीच सर्व लाभ मिळण्यासाठी पीएफ कार्यालयाने संबंधीत व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला. व्यवस्थापनानेही अत्यंत समयसूचकता दाखवत या उपक्रमाला साह्य करण्याचे निश्चित केले. त्यानुसार सर्व कागदपत्रे दाखल केल्यानंतर पीएफ कार्यालयानेही सर्व ऑनलाइन प्रक्रिया राबवली. त्यामुळे अर्ज दाखल केलेल्या सर्व लाभार्थ्यांना त्याच दिवशी समारंभपूर्वक सर्व रक्कम खात्यावर जमा करण्यात आली.

यावेळी बोलताना विभागीय आयुक्त सौरभ प्रसाद म्हणाले, ‘कार्यालयाच्यावतीने सर्व सुविधा देण्यास सदैव कटीबद्ध असून व्यवस्थापनांनीही अशा योजनांचा लाभ घ्यावा. यापुढेही निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवसी सर्व लाभ देण्यात येणार आहेत. यासाठी २३० कर्मचाऱ्यांची यादी तयार असून ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे.’

कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त एम. डी. पाटगावकर, एन. बी. मुल्या, लेखाधिकारी डी. एस. तिरवणकर, पर्ववेक्षक पी. जी. कुलकर्णी, सुनील पाध्ये, नामदेव चौगुले, राजारामबापू साखर कराखान्याचे विजय पाटील यांच्यासह कुंभी कासारी, शाहू कारखाना, वाई येथील गरवारे ब्रेस्टटेज कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. मोहिमेत सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीएस लांबणीवर, करदात्यांची प्रतीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एक महिन्यात जमा होणारा आयकर परतावा (इनकमटॅक्स रिटर्न ) चार महिन्यानंतरही करदात्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. आयकर विभागाची सुधारित कामकाज प्रणाली, आधारकार्डचे पॅनकार्ड सोबत लिकिंग आणि बँक अकाउंटला लिंक केलेला मोबाइल नंबर, प्राप्त‌िकर विभागाची संथ ऑनलाइन प्रणाली यामुळे करदात्यांचे रिफंड क्रेडिट अद्याप बँक खात्यावर जमा झालेले नाही. ऑनलाइन यंत्रणेवर ‘सक्सेसफुली’ असा रिमार्क दिसत असला तरी जिल्ह्यातील सुमारे तीन लाखांहून अधिक करदाते रिफंड क्रेडीटच्या प्रतीक्षेत आहेत.

प्राप्त‌िकर परतावा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. मात्र करदात्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ही मुदत पाच ऑगस्टपर्यंत वाढविली. करदात्यांनी इनकमटॅक्स रिटर्न फाइल केली. वार्षिक उत्पन्नावर प्राप्त‌िकर शिल्लक आणि १ एप्रिल, २०१७ पासूनचा करभरणा करदात्यानी भरला. मात्र अद्याप आयकर विभागाने करदात्यांना रिफंड खात्यावर जमा झालेला नाही. वेळेत आयकर न भरल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही प्राप्त‌िकर विभागाने दिला होता. या इशाऱ्यामुळे करदात्यांनी प्राप्त‌िकर परताव्याच्या फाइल्स भरल्या. तरीही एक महिन्यात जमा होणारे रिफंड अद्याप मिळालेले नाही. प्राप्त‌िकर विभागाची ‘इनकमटॅक्स इंडिया गर्व्हमेंट डॉट इन’ या संकेतस्थळाची प्रणाली संथ आहे. नवीन टीडीएस प्रणालीमुळे प्राप्त‌िकर परताव्याची फाइल करण्यासाठी कालावधी लागला. अजूनही टीडीएस जमा झाला नसल्याने करदात्यांत संभ्रमावस्था आहे.


टीडीएसचा तपशील..

आर्थिक वर्षात भरलेला कर तुमच्याच नावावर जमा झाल्याची खात्री करून घेण्यासाठी 'टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट' पाहावे लागते. ‘२६ ए एस’ फॉर्म मधून भरलेल्या कराची माहिती मिळते. नोकरदारांना ‘फॉर्म १६’मधील माहिती आणि ‘२६ ए एस’ जुळणे गरजेचे आहे. बँक वा रोखेदाराने व्याजातून मिळालेल्या उत्पन्नावरील कर कापून घेतला असल्यास ‘२६ ए एस’मध्ये त्याची माहिती असावी लागते. ‘२६ ए एस’ फॉर्म इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरील (http://incometaxindiaefiling.gov.in) ’ चेक टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट'वर क्लिक केल्यास मिळू शकते.


गेले चार महिने प्राप्त‌िकर विभागाकडून ऑनलाइन सिस्टीम सुधारित करण्याचे काम सुरू आहे. आधार क्रमांकासोबत पॅन कार्डचे लिंक करण्यासाठी काही कालावधी गेला. मोबाइल क्रमांकही अपग्रेडेशन करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे रिफंड अद्याप क्रेडिट झालेले नाहीत.

नीलेश भालकर, सदस्य, सी. ए. असोसिएशन


करदात्यांकडून सातत्याने क्रेडीट जमा झाले नसल्याची विचारणा होत नाही. शुक्रवारी करदात्यांनी बँकेकडे दिलेला मोबाइल क्रमांक लिंक करण्याच्या सूचना आल्या आहेत. दर १५ दिवसांत येत असलेल्या नव्या सूचनांमुळे रिटर्न जमा होण्यास वेळ लागत आहे.

मंदार वागवेकर, कर सल्लागार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी किती बळी घेणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पापाची तिकटी येथील केएमटी बसच्या अपघातावरून महापालिकेचे पदाधिकारी-नगरसेवकांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह केएमटी प्रशासनाला धारेवर धरत, दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आक्रमक भूमिका घेतली. सोमवारी केएमटीच्या वर्कशॉप विभागात पदाधिकारी, अधिकारी आणि वाहक-चालक अशी संयुक्त बैठक झाली. या बैठकीत केएमटी वर्कशॉप विभागातील वर्क्स मॅनेंजर एम.डी. सावंत, प्रभारी वाहतूक निरीक्षक रवींद्र धुपकर यांच्याविषयीचा तक्रारीचा पाढा कर्मचाऱ्यांनी वाचला.

दरम्यान, केएमटी प्रशासनाच्या व काही अधिकाऱ्यांच्या बेपवाईने अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी सामोरे येताच बैठकीत महापौर हसिना फरास यांनी वर्क्स मॅनेजर सावंत यांना ‘तुम्हाला काळीज आहे की नाही? किती भावनाशून्य बनला आहेत. आणखी किती लोकांच्या जीवाशी खेळणार?’ अशा शब्दांत फैलावर घेतले. उत्सवाच्या कालावधीत वाहतूक मार्गात बदल केला असता तर काही बिघडले नसते. लोकांना मारायची कसली इमर्जन्सी आली? असे म्हणत त्यांनी प्रशासनावरील त्रागा व्यक्त केला.

काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी ‘नागरिकांचे बळी घेऊन वाहतूक सुधारणेचे निर्णय घेणार आहात का?’ अशी विचारणा करत, दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे केली. ‘वर्क्स मॅनेजर सावंत भ्रष्ट आहेत. गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. मग त्यांची केएमटीत वर्णी कशी लागली ? केएमटीतील अनेकजण संघटनेच्या राजकारणात गुंतल्याने

त्यांचे दुर्लक्ष झाले आहे’ असा आरोप त्यांनी केला.

रविवारच्या घटनेने हादरुन गेलेल्या वाहक-चालकांनी बैठकीच्या सुरुवातीला आमच्या सुरक्षिततेविषयी प्रशासन काय भूमिका घेणार? अशी विचारणा केली. वाहक-चालकांनी बसमधील समस्या, काही अधिकाऱ्यांचे अडवणुकीचे धोरण याविषयी भावना व्यक्त केल्या. स्थायी सभापती संदीप नेजदार, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेविका सुनंदा मोहिते, परिवहन समिती सदस्य चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक आयुक्त मंगेश शिंदे आदींसह माजी नगरसेवक मधुकर रामाणे, आश्पाक आजरेकर, सुयोग मगदूम उपस्थित होते.

बैठकीत संतप्त सदस्यांनी खुर्चीवर बसलेल्या वर्क्स मॅनेजर एम. डी. सावंत यांच्या कारभारावर टिकेची झोड उठवत त्यांना उभे राहण्यास भाग पाडले. कर्मचाऱ्यांनी वाहतूक निरीक्षक रवींद्र धुपकर यांना घरी घालवा अशा घोषणा दिल्या.

महापौरांना अश्रू अनावर

पदाधिकारी, नगरसेवकांची वर्कशॉपमध्ये बैठक सुरू असताना आयुक्त चौधरी हे कार्यालयीन कामानिमित्त बाहेर होते. त्यांनी अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांना, आयुक्तांना बैठकीला जाण्यास सांगितले. परिवहन सभापती खान, उपमहापौर अर्जुन माने यांनी, मोबाइलवरून संपर्क साधून आयुक्तांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर महापौर फरास यांनी ‘अधिकाऱ्यांच्या हलगर्जीनेे अपघात झाला. अपघातात ज्यांचा मुलगा, वडील ठार झाले, त्या कुटुंबीयांची काय अवस्था असेल? हे रोखण्यासाठी प्रशासन काय करणार?’ अशी विचारणा आयुक्तांना केली. आयुक्तांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. नंतर थोड्या वेळाने आयुक्त बैठकीस आले.

आरोप-प्रत्यारोपांनी तणाव

आयुक्तांनी अपघातास कारणीभूत धरुन ड्रायव्हरला निलंबित व अन्य दोघा अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार असल्याची माहिती बैठकीत दिली. आयुक्तांचा हा ​निर्णय वाहक व चालकांना मान्य नसल्याचे बैठकीतच स्पष्ट झाले. कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी, ‘ही कारवाई म्हणजे, चोर सोडून संन्याशाला फाशीचा प्रकार आहे. वर्कशॉप विभागाने बसची देखभाल, दुरुस्ती केली नसल्याने अपघात घडला. अपघाताला ड्रायव्हरला दोषी धरता येणार नाही. विभागाकडून निकामी बस पुरविल्या जातात. तिथल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा’ अशी भूमिका घेतली. पाटील यांच्या या वक्तव्याला वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांनी विरोध केला. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोपांमुळे केएमटी कर्मचाऱ्यांतील राजकारणही चव्हाट्यावर आले. ‘बस खराब होती हे सिद्ध करा. ड्रायव्हरला समोर आणा,’ असे आव्हान वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यांनी पाटील यांना दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. कर्मचाऱ्यांतील वादावादीने संतप्त झालेल्या महापौर फरास यांनी, संबंधितांना समज दिली. वादावादीला कर्मचाऱ्यांच्या संघटनेतील राजकारणाची​ किनार असल्याची चर्चा बैठकस्थळी होती.

तर केएमटी बंद करा

‘गेली अनेक वर्षे केएमटीला पूर्णवेळ अधिकारी नाही. सध्याचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांच्याकडे महापालिकेतील अन्य विभागाची जबाबदारी आहे. ते तास, दोन तास वेळच केएमटीसाठी देतात. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कामकाज प्रभावीपणे होत नाही. वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. केएमटीसाठी पूर्णवेळ अधिकारी द्या. नसेल तर केएमटीची बस सेवा बंद करा, नागरिकांना किती त्रास द्यायचा?’ अशा शब्दांत परिवहन सभापती नियाज खान, सदस्य शेखर कुसाळे, सयाजी आळवेकर यांनी भावना व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरेवाडी मिणचे खुर्द दरम्यानचा पूल कोसळला

0
0

गारगोटी



भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द ते मोरेवाडी दरम्यानचा मोरओहोळवरील पूल शनिवारी कोसळला. पहाटेच्या दरम्यान घटना घडल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. जिवीतहानी झाली नसली तरी या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूल कोसळल्याची मोठी घटना घडूनही घटनास्थळी एकही सरकारी अधिकारी दुपारपर्यंत फिरकला नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. या पुलाच्या मालकी व व्यवस्थापनाबाबत संभ्रमावस्था आहे.

मिणचे खुर्द ते मोरेवाडी दरम्यानचा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे. मिणचे खुर्द - मोरेवाडी मार्गे गारगोटीला येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग म्हणून मोरेवाडी येथील मोरओहोळवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सन १९९१ साली पूल बांधला होता. पुलाची लांबी ३० मीटर असून रुंदी १६ फूट आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुलाचे हस्तांतरण जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे करणे आवश्यक होते. पण हस्तांतरण झाल्याचे दिसत नाही. यामुळे पूल कोसळल्यानंतरही पुलाच्या मालकी व व्यवस्थापनाबाबत माहिती मिळू शकली नाही. शनिवारी रात्री उशीरा हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मिणचे खोरीतील गावे, वाड्यावस्त्यावरील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशी वर्गास हा जवळचा व सोयीचा मार्ग आहे. या पुलावरून दैनंदिन कामासाठी म्हसवे, मिणचे खुर्द, कोळवण, दारवाड, बसरेवाडी, भाटीवडे या गावातील नागरिक तसेच वाहनधारकांची नेहमी वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी पुलाच्या सरंक्षण पाईप गायब झाल्या होत्या. या पुलाचे दगडी पिलर कमकुवत झाले होते. पात्रातील दोन पिलरपैकी मध्यभागी असलेला पिलर अचानक पडल्याने पुलाचा स्लॅब पात्रात कोसळला. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्त्याचे पायवाटेत रूपांतर केले आहे. याबाबत प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून असल्याची स्थिती आहे. पूल कोसळल्याने नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहा किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे.

पुल कोसळल्याची घटना पहाटे घडूनही भुदरगडचे तहसीलदार अमरदीप वाकडे दुपारनंतर घटनास्थळी दाखल झाले, पण त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल बांधला असताना देखील या विभागाचा वरिष्ठ अधिकारी या घटनेकडे फिरकला देखील नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, उपअभियंता एल.एस.जाधव, शाखा अभियंता डी.व्ही.कुंभार, श्री.जमादार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी करून पुढील उपाययोजना केल्या. पुलावरून अनावधानाने वाहन नेण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा तयार करून वाहतूक बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटाबंदीचे परिणाम भाजप भोगेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘जी कारणे सांगून नोटांबदी लादली ती साध्य झाली नसल्याचे स्पष्ट झाले असून सर्वच क्षेत्रात मंदी वाढली आहे. बँकिंग क्षेत्र उद्‍ध्वस्त झाले तर पंधरा लाख जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. परिणामी समाजमन केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात तयार झाले. असेच वातावरण राहिल्यास २०१८मधील गुजरातच्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील.’ असे प्रतिपादन बँ‌किंग तज्ज्ञ देवीदास तुळजापूरकर यांनी सोमवारी केले.

श्रमिक प्रतिष्ठान, प्रोग्रेसिव्ह लॉयर्स असोसिएशनतर्फे शाहूस्मारक भवनात अवी पानसरे स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘नोटाबंदीचे अर्थकारण व राजकारण’ हा त्यांचा विषय होता.

तुळजापूरकर म्हणाले,‌‘रियल इस्टेट, सोने, बँ‌क लॉकर्समध्ये काळा पैशांकडे दुर्लक्ष करून चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या. काळा पैसा शोधण्याचा केलेला हा प्रयोग फसला. जुन्या नोटा जमा करण्यासाठी रांगेत थांबलेल्या १०० वर लोकांना प्राण गमवावे लागले. नोटाबंदीच्या काळात कर्ज उचल झाले नाही. त्यामुळे बँकांना मोठा फटका बसला. नोटाबंदीमुळे बाजारातील रोकड नाहीशी झाली, परिणामी उत्पादित मालाचा उठाव झाला नाही. नोटाबंदीमुळे प्रचंड मंदी तयार झाली, ती आजही कायम आहे. नोटाबंदीच्या असफल उद्देशांवर शिक्कामोर्तब झाले. देशातील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांनीही नोटाबंदीच्या निर्णयावर गंभीर ‌टीका केल्या आहेत. २०१४ ची निवडणूक ज्या सोशल मीडियावरील प्रचाराच्या जोरावर ‌जिंकल्या त्यावर नोटाबंदीच्या परिणामाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधी राजकीय पक्ष नोटाबंदीमुळे कोसळलेल्या अर्थकारणाचे राजकारण करण्यासाठी सरसावले आहेत. समाजमनातील सत्ताधाऱ्यांतील असंतोष बाहेर येत आहे. भविष्यातील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या मंदीची राजकीय किंमत मोजावी लागेल.

यावेळी जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, नगरसेवक अशोक जाधव, मेघा पानसरे, आनंदराव परुळेकर आदी उपस्थित होते. प्रा. विलास रणसुभे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. उमेश सूर्यवंशी यांनी ओळख करून दिली. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.

बांधकाम व्यास‌ायिक अडचणीत

मुंबई, पुणे येथे बांधकाम व्यावसायिकांनी कोट्यांवधींची गुंतवणूक करून घरे, फ्लॅटस बांधले. मात्र लोकांकडे पैसे नसल्याने ते विकत घेतले जात नसल्याचे ‌चित्र आहे. बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांवरही आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे मत तुळजापूरकर यांनी व्यक्त केले.

मंदीची संधी हेरून

विकासाचा दर घसरला असून मंदी आ वासून उभी आहे. सरकार मंदीचा संधी हेरून सरकार राष्ट्रीयीकृत बँ‌कांचे खासगीकरण करीत आहे. तोट्यातील शाखा बंद करून जवळच्या सक्षम बँ‌कांत विलीनीकरण करण्याची प्र‌क्रिया सुरू आहे असल्याने नवीन नोकरभरतीवर निर्बंध आले. राष्ट्रीयकृत बँ‌कांना ३० हजार कोटींचे नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी ग्राहकांच्या सर्वच सेवांना शुल्क आकारले जाऊ लागले, असे तुळजापूरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आमदार आदर्श’चा फज्जा

0
0

कोल्हापूर

राज्य सरकारने मे २०१५ मध्ये सुरू केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. प्रत्यक्षात योजना सुरू होऊन ‌तीन वर्षे झाले तरी अजून दत्तक गावात सर्वांगिण विकासाची पाटी कोरीच आहे. प्रत्येक विधानसभा, विधान परिषद आमदारांनी २०१९ पर्यंत मतदारसंघातील तीन गावे आदर्श करणे अपेक्षित आहे. मात्र अजून एकही गाव आदर्श झाल्याचे जाहीर झाले नाही. योजनेसाठी स्वतंत्र भरीव निधी नसल्याने योजनाच फसवी असल्याचा आरोप अनेक आमदारांचा आहे. परिणामी आमदारांनीही दत्तक गावात लक्ष केंद्रीत केले नसल्याचे ‌‌‌चित्र आहे.

केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्रामच्या धर्तीवर राज्य सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना २० मे २०१५ रोजी कार्यान्वित केली. त्या योजनेंतर्गंत विधानसभा, विधानपरिषद आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील एक हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तीन गावांत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गाव आदर्श करणे आवश्यक आहे. ग्रामस्थांचे चांगले आरोग्य राहण्यासाठी सेवा, सुविधा निर्माण करणे, नियमित स्वच्छतेची सवय लावणे, बालके, महिलांमध्ये कुपोषणासंबंधी जाणीव, जागृती करणे, गावकऱ्यांना व्यसनाधिनतेपासून परावृत्त करणे, गावात किमान दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देणे, गुन्हेगारी, लिंगभेदभाव, बेकारी दूर करणे, ग्रामस्थांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय सुरू करणे, जलसंधारणाची कामे करणे, पशुसंवर्धनाच्या योजना राबवणे, बेरोजगार युवकांना कौशल्याभिमूक प्रशिक्षण देऊन उद्योग उभारणीला प्रोत्साहन देणे, सुसज्ज ग्रामपंचायत भवन उभारणे, घनकचरा व्यवस्थापन अशी विकासकामे लोकसहभागातून करून गाव आदर्श करावे लागणार आहे.

सरकारकडून भरीव निधी नसल्याने सुरूवातीपासून या योजनेच्या अंमलबजावणीबाबत उदासीनता दिसून येते. वृत्तपत्रातील बातम्यांतून होणारी टीका आणि प्रशासनाचा पाठपुराव्याने गाव दत्तक घेतले गेले. त्या गावचा विकास आराखडा तयार केला. गावात किरकोळ विकासकामांचे नारळ फोडले गेले. मात्र ज्या गतीने गाव आदर्श होण्यासाठी कामे होणे गरजेचे होते, त्या गतीने कामे झाली नाहीत. निम्म्याहून अधिक आमदारांनी आपल्या दत्तक गावांना साधी भेटही दिलेली नाही. यामुळे योजनेतील नियमावलीनुसार २०१५-१६ मध्ये एक गाव आदर्श करण्याचा मूहूर्त टळला. वेळेत एकही गाव आदर्श न झाल्याने पुढील दोन दत्तक गावांचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

………………………….

आमदारांनी निवडलेली गावे व कंसात मतदारसंघ

पालकमंत्री चंद्रकांत पाटील (पदवीधर मतदारसंघ)ः कसबा वाळवे (राधानगरी), दारवाड (भुदरगड), हनिमनाळ (गडहिंग्लज).

उल्हास पाटील (शिरोळ)ः निमशिरगाव, घालवाड, बुबनाळ (ता. शिरोळ).

सुरेश हाळवणकर (इचलकरंजी)ः चंदूर, खोतवाडी, तारदाळ (ता. हातकणगंले).

डॉ. सुजित मिणचेकर ः किणी, लक्ष्मीवाडी, माणगाव (ता. हातकणंगले).

संध्यादेवी कुपेकर (चंदगड)ः तेरणी (ता. गडहिंग्लज), कुरणी (ता. चंदगड), हत्तीवडे (ता. आजरा).

अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण)ः मुडशिंगी, दिंडनेर्ली, कणेरी (ता. करवीर).

हसन मुश्रीफ (कागल)ः मडिलगे (ता. आजरा).

प्रकाश आबिटकर (राधानगरी-भुदरगड-आजरा)ः धामोड (ता. राधानगरी).

राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर)ः मौजे तासगाव (ता. हातकणंगले).

सतेज पाटील (विधान परिषद)ः वाडी रत्नागिरी (पन्हाळा).

सत्यजित पाटील (शाहूवाडी)ः सातवे, वाघवे (ता. पन्हाळा), गजापूर (शाहूवाडी).

……………………………………….

चौकट

पालकमंत्र्यांचीही उदासीनता

विरोधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार उघडपणे योजनेतील त्रुटींवर टीका करीत आहेत. सत्ताधारी आमदार खासगीत बोलताना योजनेची अंमलबजाणी करताना येणाऱ्या अडचणींचा पाढाच वाचतात. पालकमंत्री पाटील यांनी राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येकी गाव दत्तक घेतले आहे. मात्र त्यांनीही अजून एकही गाव आदर्श झाल्याचे जाहीर केलेले नाही. त्यावरून त्यांनी दत्तक घेतलेल्या गावचाही सर्वांगिण विकास झाला नसल्याचे स्पष्ट होते.

……………….

कोट

‘गाव आदर्श करण्यासाठी कोटींचा घरात निधीची गरज असते. प्रत्यक्षात आमदार आदर्श ग्राममधून गाव आदर्श करण्यासाठी स्वतंत्र निधी मिळालेला नाही. त्यामुळे विकासकामे करताना अडचणी येत आहेत. गाव आदर्श करण्यासाठी एकाच गावात निधी दिल्यास शेजारील गावे नाराज होतात, हे देखील एक कारण आहे.

डॉ. सुजीत मिणचेकर, आमदार

…………………………….

‘आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी सरकारने वेगळा निधी दिलेला नाही. त्यामुळे गाव आदर्श करणे शक्य झाले नाही. निधी नसणे आणि स्थानिक राजकीय गटबाजीने लोकसहभाग न मिळाल्याने विकासाची कामे करता आलेली नाहीत. अशा विविध कारणांनी दत्तक गाव आदर्श करणे अवघड बनले आहे.

उल्हास पाटील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गंगवेस परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसून झालेल्या अपघातप्रकरणी केएमटीचा बसचालक राजाराम पांडुरंग पाटील (वय ४७, रा. म्हाळुंगे, ता. करवीर) याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल चंद्रकांत पाटील (वय २५, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी, २ री गल्ली) यांनी रविवारी मध्यरात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी बसचालक राजाराम पाटील याला कोर्टात हजर केले असता त्याला गुरुवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी मिळाली.

रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास गंगावेस परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटीची बस (एम. एच. ०९ बी. सी. २१६६) घुसून भीषण अपघात झाला. या अपघातात राजारामपुरीतील प्रसिद्ध हालगीवादक तानाजी भाऊ साठे (वय ५०) आणि सुजल भानुदास अवघडे (वय १५, दोघेही रा. राजारामपुरी ३ री गल्ली) यांचा मृत्यू झाला, तर मिरवणुकीतील १८ जण जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने बसचालक पाटील याला मारहाण सुरू केली. माजी नगरसेवक आदिल फरास यांनी जमावाची आक्रमकता लक्षात घेऊन बसचालकाचा बचाव केला. पोलिसांनी बसचालकाला अटक करून विपुल पाटील यांच्या फिर्यादीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मध्यरात्री दीडच्या सुमारास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. सोमवारी सकाळी कोर्टात हजर केले असता कोर्टाने बसचालक पाटील याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र दराडे अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, गंभीर जखमींमधील आनंदा राऊत (५०) आणि अनुराग भंडारे (१४) या दोघांवर राजारामपुरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उचपार सुरू आहेत. पृथ्वीराज सहारे (१४), विनोद ज्ञानू पाटील (२३), स्वप्नील साठे (२२), आकाश तानाजी साठे (२५), साहिल घाडगे (१४), संदीप तानाजी साठे (२५), प्रथमेश भंडारे (१९), करण साठे (२३), योगेश कवाळे (२६), कुणाल साठे (१७), सनी घारदे (२४), सुमित फाळके (१०), अमर कवाळे (२६), दत्ता केरबा साठे (२५) या जखमींवर सीपीआरसह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी पोलिस, जवानांची प्रकृती सुधारली

जमावाच्या हल्ल्यात जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी चव्हाण जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले असून त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, तर पोलिस उपनिरीक्षक भूतकर यांच्यासह अग्निशामक दलाचे जवान संजय पांडुरंग पाटील आणि संदीप हरी पवार यांच्यावरही उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ ऑक्टोबरलाजयसिंगपुरात ऊसपरिषद

0
0

शाहूवाडी

‘केंद्र आणि राज्य सरकारच्या कचखाऊ धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. म्हणून सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची जबाबदारी आता सरकारचीच आहे. स्वामिनाथन आयोग शिफारशींच्या अंमलबजावणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांची फौज घेऊन येत्या २० नोव्हेंबरला दिल्लीच्या तख्तावर धडक देणार असल्याचे प्र्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. तर ऊसदरासाठी २८ ऑक्टोबर रोजी जयसिंगपुरात ऊस परिषद घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिसऱ्या भात परिषदेला उपस्थित शेतकऱ्यांसमोर ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, प्रा. जालिंदर पाटील, सभापती शुभांगी शिंदे, सावकर मादनाईक, भगवान काटे, राजेंद्र गड्ड्यानवर, सागर संभुशेटे आदी प्रमुख उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘सरकारने बाजारात हस्तक्षेप केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पिकाला वाढीव दर मिळत नाही. सरकारला जागे करण्यासाठी संघटनेला आंदोलनाचे शस्त्र बाहेर काढावे लागते. यापूर्वी घेतलेल्या भात परिषदांमुळे भात पिकाचा दर प्रती क्विंटल ९०० वरून १५४० रुपयांवर पोहचला. चालूवर्षी सरकारने भाताची आधारभूत किंमत १५५० रूपये बांधून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी घाई करू नये.’ प्रसंगी संघटनेच्या माध्यमातून शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्याचा मनोदय असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी आजरा, चंदगड तालुक्यात असा प्रयोग राबवून तेथील भात उत्पादक शेतकऱ्यांना २००० रूपये दर मिळवून दिला असल्याचा दावाही त्यांनी केला.

प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ‘जागतिकस्तरावरील भात उत्पादनात भारत देश तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर देशांतर्गत उत्पादनाचा विचार करता अग्रेसर तालुक्यांमध्ये शाहूवाडी विभाग वरच्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत देशात असणाऱ्या भाताच्या एक लाख जातींपैकी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच भात बियाण्यांच्या जाती शिल्लक राहिल्या आहेत.’ दरम्यान, आक्रमक भाषाशैलीच्या रविकांत तुपकर यांचा भाषण करताना वारंवार तोल ढळत होता. अनेकदा त्यांच्याकडून अश्लील शब्दप्रयोग झाल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिंत कोसळून केखलेतएकजण ठार

0
0

पन्हाळा

केखले (ता.पन्हाळा ) येथे रविवारी रात्री घराची भिंत कोसळून बाजीराव बापू संकटे (वय ५८) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी बाळाबाई संकटे या गंभीर जखमी झाल्या.

याबाबत अधिक माहिती अशी, केखले येथील मातंग वसाहत येथे रविवार रात्री दोनच्या सुमारास संकटे पती-पत्नी झोपेत असताना शेजारील घराची भिंत अचानक संकटे यांच्या घराच्या भिंतीवर कोसळली. बाजीराव संकटे यांच्या घराची भिंत मातीपासून बांधली होती. ही भिंत झोपेत असलेल्या संकटे यांच्या अंगावर कोसळली. शेजारीच राहणाऱ्या त्यांच्या मुलाने शेजाऱ्यांच्या मदतीने बाजीराव आणि बाळाबाई संकटे यांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले व उपचारासाठी कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी बाजीराव यांना मृत घोषित केले, तर बाळाबाई या गंभीर जखमी असल्याने त्यांना कोल्हापुरात सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images