Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सत्तर लाखांचे आयफोन जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोणत्याही बिलांशिवाय आणलेले ७० लाखांचे आयफोन शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (ता. २५) सकाळी जप्त केले. मोबाइल घेऊन आलेला गजानन दगडू थिटे (वय ३२, रा. हिंगोली) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हे मोबाइल कोणी मागवले होते याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खासगी बसने मोठ्या प्रमाणात किमती मोबाइल घेऊन येणारी एक व्यक्ती दाभोळकर कॉर्नर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास पुण्याहून आलेल्या एका खासगी ट्रॅव्हलमधील संशयिताची झडती घेतली. या झडतीत पोलिसांना ७० लाखांचे किमती आयफोन मिळाले, मात्र याच्या खरेदी-विक्रीची पावती मिळाली नाही. हे मोबाइल चोरीचे असल्याच्या संशयावरून जप्त केले असून, मोबाइल घेऊन आलेला गजानन थिटे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे मोबाइल शहरातील एस. एस. कम्युनिकेशन या विक्रेत्याचे असल्याची माहिती थिटे याने दिली आहे, मात्र एस. एस. कम्युनिकेशनने मोबाइल खरेदी केल्याचे कोणतेच पुरावे त्याच्याकडे मिळालेले नाहीत. याबाबत अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनीही शाहूपुरी पोलिस ठाण्यात संशयित थिटे याची चौकशी केली. हे मोबाइल चोरीचे आहेत की, कर चुकवून विक्रीसाठी आणले आहेत याची माहिती घेतली जात आहे, असे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाइन फ्लूचा प्रभाव कायम असून, सोमवारी (ता. २५) आणखी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष तायाप्पा खोत (वय ४०, रा. धुळगणवाडी, जि. बेळगाव) आणि सुमन देवाप्पा ढोले, (६१, रा. यशवंतनगर, ता. मिरज, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. गेल्या नऊ महिन्यात स्वाइन फ्लूने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या ४८ इतकी झाली आहे.

बेळगाव जिल्हयातील संतोष खोत यांना २० सप्टेंबरला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सांगली येथील सुमन ढोले या वृध्देला २२ सप्टेंबरला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. जिल्ह्यातील ५१६ स्वाइन फ्लू बाधीत रुग्णांची तपासाणी करण्यात आली आहे. त्यातील २५७ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सीपीआरमधील वैद्यकीय अधिकारी व जिल्हा आरोग्य विभागाने खबरदारीचे उपाय घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात जनजागृती सुरू केली आहे. आरोग्यसेवक प्रत्येक गावात जाऊन स्वाइनपासून बचावासाठी उपाययोजनांची माहिती देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोहळापंचमी उत्साहात

$
0
0



कोल्हापूर टाइम्स टीम

अंबाबाई आणि त्र्यंबोली भेट आणि ललितापंचमीचा कोहळा फोडण्याचा विधी त्र्यंबोली टेकडीवर सोमवारी उत्साहात झाला. युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबाबाई भेटीनंतर त्र्यंबोलीची आरती झाली व कोहळा फोडण्याचा विधी झाला. मृदुला संतोष गुरव हिला कुमारिकेचा मान होता. दुपारी साडेबारा वाजता अंबाबाईच्या पालखीचे त्र्यंबोली मंदिरात आगमन झाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार यांच्यासह धनाजी जाधव, संगीता खाडे आदी उपस्थित होते.

भाविकांच्या प्रचंड गर्दीत मृदुला गुरव हिने तलवारीने कोहळ्यावर वार करताच कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. दरम्यान, अंबाबाई मंदिरातून निघालेल्या पालखीतील अंबाबाईची उत्सवमूर्ती आणि त्र्यंबोली यांची भेट झाल्यानंतर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला आहे. ‘टेंबलाईच्या नावानं चांगभलं' च्या गजरात झालेल्या त्र्यंबोली यात्रेच्या सोहळ्याला सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत हा आनंदोत्सव सुरूच राहिला. त्र्यंबोली मंदिरात गेल्या दोन दिवसांपासून सोहळ्याची तयारी सुरू होती. मध्यरात्री बारा वाजता देवीला महाभिषेक घालण्यात आला. काकड आरतीनंतर देवीची सिंहासनारूढ सालंकृत पूजा बांधण्यात आली.

सकाळी दहाच्या सुमारास अंबाबाई मंदिरातून तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची पालखी त्र्यंबोली भेटीसाठी बाहेर पडली. सोबत भवानी मंडपातून तुळजा भवानीची व गुरुमहाराज वाड्यातून गुरुमहाराज पालखी सोबत नेण्यात आल्या. तुळजा भवानीची पालखी भवानी मंडप, शिवाजी चौक, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, उमा चित्रमंदिर, बागल चौक, कमला कॉलेजमार्गे टेंबलाई टेकडीवर आली. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत झाले. परंपरेनुसार अंबाबाई व गुरुमहाराज पालखी शाहू मिलमध्ये काहीवेळ थांबली. बाराच्या सुमारास तिन्ही पालख्या त्र्यंबोली मंदिरात आल्या. स्वागतासाठी त्र्यंबोली मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर रांगोळ्या व फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.

पालखी मार्गावर स्वागत कमानी

पालखी मार्गावरील तरूण मंडळे, स्थानिक रहिवासी यांनी पालखीवर फुलांची उधळण करत तसेच रांगोळ्या काढून स्वागत केले. काही मंडळांनी तर भव्य मंडप उभारुन देवीच्या प्रतिमा पूजन करुन पाणी प्रसाद वाटप उपक्रम राबवला. शाहू मिल येथे आल्यानंतर कोटीतीर्थ तलावातीला पाण्याने पालखीला जलाभिषेक करण्यात आला. या पालखीसाठी शाहू मिल परिसरात आकर्षक रांगोळी काढली होती. पालखी येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पाणी, प्रसाद वाटप

पालखी मार्गावरील शहरातील प्रमुख संस्था व संघटनांनी पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. त्यामध्ये विक्रमनगर येथील भगतसिंग तरुण मंडळ, मास्टर स्पोर्टस, बागल चौक मंडळ यासह टेंबलाई टेकडीवरही विविध संस्थांनी पिण्याचे पाणी वाटप केले. काही मंडळांनी भाविकांसाठी प्रसाद, फळांचे वाटप केले होते. त्यात यूके कला-क्रीडा मंडळ, टाकाळा मित्र मंडळ, ए. बॉईज, इंडीयन फ्रेंड सर्कल, जिद्द युवक मंडळ या मंडळांतर्फे केळी, शिरा, लाडू वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतापगड ३५७ मशालींनी उजळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगड ३५७ मशालींनी उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास ३५७ वर्षे पूर्ण झाल्याचे. नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. हा तेजोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांमधून हजारो भाविकांनी प्रतापगडावर हजेरी लावली.

भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या वेळी नगारे, तुतारी, सनई तसेच प्रतापगडावरील प्रसिद्ध स्वराज्य ढोल ताशा पथक व लेझीमच्या गजरात व भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून दीपोत्सव साजरा झाला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला.

प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजराण्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

।। अनादि निर्गुण प्रकटली भवानी।।

$
0
0

प्रा. शिवाजीराव भुकेले

जनता जनार्दनाच्या अंतःकरणामध्ये शक्तीदेवतेचा संचार झाल्याशिवाय परदासीयत्वाची भयानक स्थिती बदलणे शक्य नाही, याचा साक्षात्कार ज्यांना झाला आहे अशा जनी जनार्दन बघणाऱ्या महाभागवत संत एकनाथांनी निर्गुण निराकार आई अंबामातेस सगुण साकार रुपात येण्याची प्रार्थना, जोगवा, तुझा गोंधळ मांडिला, बया दार उघड इत्यादी भारुडातून केली आहे.

‘अनादि निर्गुण प्रकटली भवानी।

मोह महिषासूर मर्दाना लागुनी।

त्रिविध तापाची करावया झाडणी।

भक्ता लागी तू पावसी निर्वाणी।

आईचा जोगवा-जोगवा मागेन।।’

आई भवानी मातेच्या नावाने जोगवा मागणारे संत गोंधळ्याच्या रुपामध्ये म्हणतात. ‘हे निर्गुण निराकार माते, मोहरुपी महिषासुराचा वध करण्यासाठी तू सगुण साकार झाली आहेस. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षड्विकाररुपी राक्षसांचा नाश महिषासूर मातेच्या कृपेनेचे होणार आहे. आदिभौतिक, आदिदैविक व अध्यात्मिक हे त्रिविध तापसुद्धा आई अंबामातेच्या कृपेने नष्ट झाले आहेत. जो सर्वसंग परित्याग करून आणि निसंग होऊन आईच्या नावे भक्तीचा जोगवा मागतो तो द्वैत नष्ट करुन अद्वैताच्या पातळीवर पोहेचतो.

ज्या साधकांच्या हातात आत्मबोधाचा झेंडा आहे व जो भेदभावरहित आत्मस्वरुपाची वारी करतो तोच मातेच्या वात्सल्यमय करुणा रुपापर्यंत पोहचू शकतो. अंतःकरणात सद्भावाची दिवटी पेटवून दंभाचा त्याग करुन पूर्ण बोधाची परडी ज्याने भरुन घेतली आहे व जो आशा-निराशेच्या पार पलिकडे गेला आहे, तोच खरा मातेचा आवडता सद्भक्त आहे. नाथांचे हे प्रतिकात्मक नवरात्र हेच खरे नवरात्र आहे.

आपले नवरात्र मात्र कर्मकांड व प्रदर्शन भावनेमध्ये गुंतून पडले आहे. नवरात्रामधील प्रतिपदा ते दशमी म्हणजे नामस्मरण, कीर्तन, श्रवण, पादसेवन, सख्य, अर्चन, वंदन इत्यादी भक्ती प्रकारातील एकेक रात्र व शेवटी भक्ताला मुक्तीचा आनंद देणारी विजयादशमी येते. कोणे एकेकाळी नानाशस्त्र धारिणी सिंहवाहिनी देवीने महिषासूराचा वध केला, पण आज नाक्यानाक्यावर दबा धरुन बसलेला मोहरुपी महिषासूर नवरात्र उत्सवाच्या काळातच आमचाच वध करीत आहे. द्वैत सारुन अद्वैताची माळ घालण्याऐवजी आम्हीच खंडण करून द्वैतभावाची दरी निर्माण करीत आहोत. भेदरहीत वारीस विसरुन भेदभावाच्या गर्तेत आम्ही ढकललो जात आहोत. अशावेळी गरज आहे अंतरीचा सद्भाव निर्माण करणाऱ्या अंबामातेच्या गोंधळाची.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डोकलाममध्येजतचा जवान शहीद

$
0
0

सांगली :
जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील जवान अजित नारायण काशीद डोकलम सेक्टरमधील कुपुक लष्काराच्या वाहनाच्या अपघातात शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव बागडोगरा येथून विमानाने २६ सप्टेंबर रोजी निघणार असून, २७ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुळगावी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सुनील गोडबोले यांनी मंगळवारी दिली.
शहीद जवान अजित काशीद युनिट १२१ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना १७ सप्टेंबर रोजी लष्कराच्या वाहनाच्या अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना २५ सप्टेंबर रोजी ते शहीद झाले. हा अपघात हा फिल्ड अ‍ॅक्सिडंट असल्याने अजित काशीद यांना शहीद घोषित करण्यात आले असल्याचेही गोडबोले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जिल्हाधिकाऱ्यांचा पेट्रोलपंपावर छापाभेसळ, दर्जा आणि नोंदीत तफावत आढळल्याने गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली-माधवनगररोडवर बायपासनजीक असणाऱ्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या मातोश्री पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी अचानक छापा टाकला. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरभ वाघुले, अन्न औषध भेसळ, वजनमापन नियंत्रण अधिकारी, पोलिस खात्याचा फौजफाटा घेऊनच कारवाई करताना भेसळ, दर्जा आणि नोंदीत तफावत आढळल्याने संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
निनावी तकारीद्वारे बायपास रोडवरील पेट्रोलपंपावर गडबड असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन कारवाईचे पाऊल उचलले. सध्या हा पंप महेंद्र भालेराव (जळगाव) हे चालवत आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित पंप गाठला. तक्रार असलेला हा पंप आहे का, याची खात्री करून घेऊन त्यांनी कारवाईला सुरुवात केली. जिल्हा पोलिस अधीक्षक शिंदे सहकारी अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या दाखल झाले. जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, वजनमापे तपासणी अधिकारी यांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणी तपासणीत पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांनी पेट्रोल भरण्याचे यंत्र उघडल्यानंतर त्यामध्ये असलेले सील तोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पेट्रोलची घनता तपासली असता तीही नियमापेक्षा अधिक असल्याचे समोर आले.
भेसळ केली तर कारवाई होणारच
मातोश्री पेट्रोलपंपाबाबत तकारी आल्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली. अशा पद्धतीने पेट्रोल भेसळ होत असेल तर कोणाचीही गय केला जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महिन्याभरात भेसळ सुरू
मातोश्री पेट्रोल पंप हा मुळचा सांगलीतील प्रतिष्ठित नेत्यांच्या नातेवार्इंकाचा होता. काही वर्षांपूर्वी तो कंपनीने ताब्यात घेतला. त्यानंतर काही दिवस हा पंप वाळवा तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्यांच्या मुलाने चालविला. त्यानंतर १५ ऑगस्ट २०१७पासून हा पंप जळगाव येथील महेंद्र भालेराव यांच्याकडे आहे. त्यांनी पंप चालवण्यास घेतल्यानंतर सव्वा महिन्यातच भेसळगिरी या कारवाईने चव्हाट्यावर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कर्जमाफीसाठी सांगलीत साडेतीन लाख अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेर्तंगत कर्जमाफीसाठी सांगली जिल्ह्यातून ३ लाख ४७ हजार अर्जाची नोंदणी झाली आहे. तर १ लाख ८८ कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत. सहकार विभागाकडून सोसायटीकडील कर्जखात्यांची लेखा परीक्षकांमार्फत पडताळणी सुरू केली. जिल्ह्यातील ७६३ पैकी ११८सोसायटीतील कर्जदारांची पडताळणी पूर्ण झाली असल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत, त्या अर्जदारांची माहिती २ ऑक्टोंबरपासून चावडी वाचन करून जनतेसमोर आणली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी २८ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. कर्जमाफी योजनेसाठी सातत्याने अनेकवेळा निकष बदलण्यात आले, त्यामुळे बँकासह शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. सेतू केंद्रातून आपले सरकार, या पोर्टलवर संपूर्ण राज्यातून कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले होते. शेतकऱ्यांना अर्ज भरताना सर्व्हर डाऊन, अंगठा मॅच न होणे, बोटांच्या ठशाचा प्रश्न आणि केंद्रावर असलेल्या गर्दीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधेच्या अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे १५ सप्टेंबरनंतर कर्जमाफी अर्जासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. जिल्ह्यात कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ५७ हजार पात्र आहेत. जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार वैयक्तिक शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये १ लाख ८८ हजार कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत.
सहकार विभागाकडून सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात ७६३ सोसायट्या आहेत. लेखा परीक्षकांमार्फत ११८ सोसायट्यांमधील कर्जखात्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सरकारने तीन समितींची नेमणूक केली आहे. २ ऑक्टोंबरपासून चावडी वाचन सुरू होणार आहे. ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. तेथे चावडी वाचन घ्यायचे की नाही, याबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या समितीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या अर्जदारांची माहिती पडताळण्याचे, चौकशी करण्याचे काम या समितीतील सदस्य करणार आहेत. तसेच एखादा अर्जदार कर्जमाफीस पात्र आहे की अपात्र आहे, याचा निर्णय ही समिती घेणार आहे. यासाठी संबंधित अर्जदाराच्या स्थानिक चौकशीचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. या कर्जदारांचे माहितीचे चावडी वाचन होणार असल्याने खरे कर्जदार शेतकरी व बनावट कर्जदार यांची माहिती उघड होणार आहे. कर्जमाफीसाठी गावातील आलेल्या अर्जांची आवश्यक ती पडताळणी करण्यात येणार आहे. ही पडताळणी झाल्यानंतर त्या यादीचे वाचन व पडताळणी गावात करण्यात आली आहे. याबद्दल यादीच्या शेवटच्या पानावर पंचनामा करण्यात येणार आहे. त्यावर गावातील सरपंच, व प्रतिष्ठित व्यक्तींच्या सह्या घेण्यात येणार आहेत. यानुसार गावात याद्या अंतिम झाल्यानंतर अशा याद्या सहायक निबंधकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. प्राथमिक पडताळणीच्या आधारे पोर्टलद्वारे केलेल्या प्रक्रियेच्या माध्यमातून उपलब्ध याद्यांचे तीन गटात वर्गीकरण करण्यात येणार आहे. अर्जदाराचा कर्जाचा तपशील, बँकेकडून मिळणारी कर्जाची यादी याद्वारे तात्पुरते मंजूर अर्ज, तात्पुरते नामंजूर अर्ज व नामंजूर अर्ज अशा स्वरूपात तीन याद्या पोर्टलद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफाळावाढीविरोधातीलउपोषण आश्वासनानंतर स्थगित

$
0
0

इचलकरंजी

घरफाळा वाढी संदर्भात लवकरात लवकर बैठक घेण्याच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर घरफाळा वाढ रद्द करण्यासाठी मंगळवारपासून सुरु केलेले आमरण उपोषण स्थगित ठेवण्यात आले.

अपिल समितीच्या बैठकीत २० टक्के घरफाळा वाढीचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पक्ष, कामगार संघटना रस्त्यावर उतरल्या असून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले जात आहे. त्या अंतर्गत घरफाळा वाढ विरोधी कृती समितीमयावतीने मंगळवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अमृत भोसले, राजू बोंद्रे, मोहन कुंभार, अनिस म्हालदार व उमेश खांडेकर हे पाचजण उपोषणास बसले होते.

इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असून याठिकाणी कामगारांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय जीएसटी करामुळे शहराचा मुख्य कणा असलेल्या यंत्रमागासह सर्वच व्यवसायात मोठ्या प्रमाणात मंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशातच नगरपरिषदेने घरफाळ्यात केलेली २० टक्क्यांची वाढ अवाजवी व न परवडणारी आहे. नगरपालिका कोणत्याही प्रकारच मुलभूत नागरी सुविधा पुरवू शकत नसताना ही वाढ करणे अन्यायकारक असल्याने ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनास सकाळपासून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसह नागरिकांनीही उत्स्फूतपणे आपला पाठींबा दर्शविला.

नागरिकांचा वाढता रोष आणि आंदोलनाची दखल घेत सायंकाळी प्रांताधिकारी समीर शिंगटे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याशी चर्चा होऊन त्यांनी लेखी आश्वासन देत उपोषण मागे घेण्यास सांगितले. घरफाळा वाढी संदर्भात तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व अन्य पदाधिकाऱ्यांची लवकरात लवकर बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी मान्यवरांचे हस्ते लिंबू सरबत घेत उपोषण मागे घेतले. दरम्यान, या प्रश्नी योग्य असा तोडगा अथवा निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी प्रकाश मोरे, अशोकराव आरगे, मदन कारंडे, सुनिल पाटील, महादेव गौड, सयाजी चव्हाण, प्रकाश पाटील, विजय भोसले, सदा मलाबादे, आनंदराव चव्हाण, इम्रान मकानदार, रमेश पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरुग्णाकडून साधूचा खून

$
0
0

जयसिंगपूर

भिक्षुकी करणाऱ्या साधूच डोक्यात सिमेंटच्या पोलचे घाव घालून निर्घृण खून झाला. शिरोळ येथील कल्लेश्वर मंदिराच्या आवारात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास खुनाची ही घटना घडली. गुरुनाथ आप्पासाहेब लकरने (वय ६५, रा. कराड, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. संशयित महादेव ऊर्फ नामदेव बाबूराव पाटील (वय २५, रा. शिनाल, ता. अथणी, जि. बेळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले. खुनानंतर त्याने केलेल्या दुसऱ्या हल्ल्यात नृसिंहवाडी येथील दीपक चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, की गुरुनाथ लकरने मूळचे सातारा जिल्ह्यातील कराडचे आहेत. शिरोळ येथे दिवसभर भिक्षा मागून ते रात्री कल्लेश्वर मंदिराच्या आवारात मुक्काम करीत असत. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कल्लेश्वर मंदिर परिसरात झोपले होते. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी महादेव ऊर्फ नामदेव पाटील याने सिमेंटच्या पोलने गुरुनाथ यांच्या डोक्यात घाव घातले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यानंतर संशयित आरोपी महादेव पाटील हा सिमेंटच्या पोलसह नृसिंहवाडीच्या दिशेने जात होता. याचवेळी नृसिंहवाडी येथील दीपक चव्हाण हे फिरण्यासाठी शिरोळच्या दिशेने येत होते. आरोपीच्या हातातील पोल पाहून ते स्वसंरक्षणासाठी बाजूला होत असतानाच त्यांच्यावरही संशयिताने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हातास गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, याबाबत माहिती मिळताच शिरोळचे पोलिस निरीक्षक उदय डुबल, सहायक पोलिस निरीक्षक समीर गायकवाड यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. खून आणि खुनी हल्ल्यानंतर उसाच शेतात पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला नागरिकांनी व पोलिसांनी पकडले. संशयित महादेव पाटील हा शिरोळ येथील आपल्या नातेवाईकांकडे सोमवारी सायंकाळी आला होता. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो मनोरुग्ण असून गेली नऊ वर्षे रत्नागिरी, सांगली, बेळगाव, हुबळी या ठिकाणी उपचार केल्याचे समजले. यापूर्वी संशयिताने अथणी येथील पोलिस ठाण्याच्या एका कर्मचार्यावर तसेच वडील बाबूराव पाटील यांच्यावरही त्याने खुनी हल्ला केल्याची चर्चा होती.

...........

चौकट

नातेवाईकांच्या शोधाचे आव्हान

शिरोळ येथील खुनाच्या घटनेनंतर पोलिसांना मृताजवळ ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारे तहसिलदारांचे ओळखपत्र आढळले. यावर मृताचे नाव गुरूनाथ आप्पासो लकरने ता.कराड, जि.सातारा असा पत्ताही आहे. यावरून पोलिसांनी कराड येथे मृताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे ओळखपत्रच बोगस असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आता मृताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाई गेली गाळात

$
0
0

Udaysing.patil@timesgroup.com

udaysingpatilMT

कोल्हापूर : महापालिकेच्या सफाई विभागाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांनी भरलेले नाले व गटारी दिसत आहेत. केवळ या दुर्लक्षामुळे छोट्या गटारींपासून मोठ्या नाल्यांपर्यंतचा प्लास्टिक तसेच अन्य कचऱ्याचा प्रवास विनाअडथळा होत असून हाच कचरा शहरात ठिकठिकाणी पाणी साठण्यास कारणीभूत ठरत आहे. गटार, नाले तसेच विविध ठिकाणी फुटपाथखाली असलेल्या गटारींची सफाई कुणी तक्रार केली अथवा पावसाचे पाणी साठले तरच करायची हा महापालिकेच्या कारभाराचा फंडा ठरला आहे.

महापालिका हद्दीत विविध भागातून छोटे मोठे नाले कुठे जयंती नाल्याला तर कुठे दुधाळी नाल्याला मिळतात. तर काही नाले परस्पर शहराबाहेरून पंचगंगा नदीच्या दिशेने वाहतात. या नाल्यांना भागातील छोट्या गटारींमधूनच पाणी येते. त्यामुळे गटारी स्वच्छ राहिल्या तर नाल्यांमधील कचऱ्याचे प्रमाणही आपोआपच कमी होईल, हे सोपे समीकरण आहे. पण गेल्या काही वर्षांपासून अनेक भागात रस्त्यावरील सफाईसाठी कर्मचारी पाठवले जात नाहीत. रस्त्याची सफाई होत नसताना गटारीतील कचरा काढण्याचे काम तर दूरचेच झाले आहे. परिणामी अनेक भागात नागरिक गटारीतील कचरा आपापल्या घरासमोरुन पुढे ढकलतात. त्यातूनच नाल्यांमध्ये येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नुकत्याच झालेल्या पावसांमध्ये पाहिल्यास नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याची वस्तुस्थिती पहायला मिळते. पहिल्या पावसामुळे काही भागातील नाल्यातील कचरा साफ झाला. पण अन्य ठिकाणच्या नाल्यांमधील कचरा थोडे अंतर पुढे जाऊन साठून राहिला.

नाल्यांकडे जसे दुर्लक्ष होत आहे तशीच फुटपाथखाली असलेल्या तसेच अनेक भूमिगत गटारींची अवस्थाही आहे. आयआरबीने केलेल्या तसेच नगरोत्थान योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा गटारी आहेत. त्यांची सफाई आजतागायत महापालिकेने केलेली नाही. जवळपास दीड ते दोन फूट खोल असलेल्या गटारींची नीट स्वच्छता झाली असती तर त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले असते. तसेच रस्त्यावर पाणी येण्याचा प्रश्नच राहिला नसता. पण त्या गटारीतील कचरा काढण्याबाबत सातत्याने तक्रारी करुनही काही हालचाल केलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, हॉकी स्टेडियम रस्ता, जयंती नाला, बसंत बहार रोड, फोर्ड कॉर्नर, राजारामपुरी चौक या परिसरात कायम पाणी साठत आहे. अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून या परिसरातील गटारींच्या तोंडावर साठणारा कचरा काढत असतात. पण पावसात मोठ्या प्रमाणावर कचरा वाहून येत असल्यामुळे गटारी तुंबतातच. अनेक गटारींमध्ये रस्त्यावरुन वाहून येणारे पाणी जाण्यासाठीचे मार्ग अपुरे आहेत. त्यामुळे ट्रेझरी ऑफिस, राजारामपुरी पहिली गल्ली, कोंडा ओळ, व्हीनस कॉर्नर या भागात पाणी साठून राहते.

नाल्यांची स्वच्छता नाहीच

महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापुर्वी नाल्यांची, गटारींची स्वच्छता केली जात होती. त्यासाठी भागातील कर्मचाऱ्यांना नेमले जायचे. त्यासाठी स्वतंत्र असा निधी दिला जात नाही. पण सध्या नियमितपणे कुठे तरीच ही स्वच्छता केल्याचे पहायला मिळाले. तसेच भागातील नागरिकांकडूनही नाल्यांच्या स्वच्छतेसाठी कुणी आले नसल्याचेच उत्तर मिळाले. त्यामुळे ज्या दाटवस्तीच्या भागातून नाला वाहतो, तिथे नाल्यात कचरा होता. मध्यंतरीच्या जोरदार पावसामुळे तो कचरा पुढे गेला. पण गटारी, छोट्या नाल्यांमधील कचरा काढण्यात आला नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार झाले आहेत.

रस्त्यावरील पाणी गटारीत जाण्यासाठी

रस्त्यावरून वाहून येणारे पाणी गटारीमध्ये जाण्यासाठी एकतर मोठी इनलेट ठेवायला हवीत. अन्यथा ठिकठिकाणचे पाणी त्या त्या गटारींमध्ये जाण्यासाठी जाळ्या टाकण्याचे प्रकार झालेले नाहीत. मुळात अनेक रस्त्यांवर गटारीच नाहीत ही बाबही गंभीर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५०० फ्लॅटस् तयार

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

कोल्हापूर : नोटाबंदीचा निर्णय, महारेरा कायद्याची अंमलबजावणी आणि त्यानंतर जीएसटीची अंमलबजावण यामुळे गेल्या काही महिन्यांत बांधकाम क्षेत्रात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्याचा परिणाम प्लॉटसह फ्लॅटच्या खरेदी विक्रीवर जाणवत होता. कोल्हापुरातील बांधकाम क्षेत्राचा कानोसा घेतला असता या व्यवसायातील मरगळ दूर होत असल्याचे स्पष्ट झाले. येत्या दोन ते अडीच महिन्यात सुमारे २५०० फ्लॅटस पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यापैकी रेडीपझेशन फ्लॅटची संख्या ३०० हून अधिक आहे. ग्राहकांमध्ये वन आणि टूबीएचके फ्लॅट खरेदीसाठी कल वाढला असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. उत्तम लोकेशन्ससह जीम, चिल्ड्रन पार्क, क्लब हाऊसची संकल्पना कोल्हापुरात रुजत आहे.

मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद पाठोपाठ विस्तारणारे क्षेत्र म्हणून कोल्हापूर आहे. उद्योग व्यवसाय, शिक्षण आणि कृषीपूरक उद्योगामुळे कोल्हापुरात स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कोल्हापुरात गेल्या काही वर्षात रिअल इस्टेटचा व्यवसायही विस्तारला. कोल्हापूरसह, पुण्यातील व्यावसायिकांनी कुठे स्वतंत्रपणे तर कुठे स्थानिक व्यावसायिकांच्या सोबतीने बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. मार्केट यार्ड परिसर, उचगाव, कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहत, कसबा बावडा, रमणमळा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठ परिसर, संभाजीनगर परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, आयटीआय, साळोखेनगर, रामानंदनगर, जरगनगर, सानेगुरुजी वसाहत, फुलेवाडी रिंगरोड अशा विविध परिसरात लहान मोठ्या गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. वन बीएचकेसह दीड बीएचके नवीन गृह पध्दत आकाराला येत आहे. दीड बीएचकेमध्ये मुलांसाठी स्वतंत्र अभ्यास खोलीचा समावेश आहे.

जीएसटीतून काही टक्के सवलत

घर खरेदीवर बारा टक्के जीएसटी लागू आहे. घराच्या किंमतीवर यापूर्वी सर्व्हिस टॅक्स व व्हॅट असा एकूण सहा टक्के कर भरावा लागत होता. जीएसटी लागू झाल्यापासून घर खरेदी करताना किंमतीवर बारा टक्के कर भरावा लागत आहे. नव्या गृहप्रकल्पाचा जीएसटीचा संपूर्ण भार ग्राहकांवर पडू नये यासाठी काही बांधकाम व्यावसायिकांनी त्यामध्ये काहीं टक्के कराचा भरणा करत ग्राहकांना सवलत दिली आहे. पाच ते सहा टक्के परतावा देण्याचा प्रस्ताव बांधकाम व्यावसायिकांच्या विचाराधीन आहे.

बांधकाम क्षेत्रासाठी पुन्हा पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रेरा कायद्याचे व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. कोल्हापुरात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम, उत्तम लोकेशन्स आणि सर्व प्रकारच्या सुविधायुक्त गृह प्रकल्प साकारत असल्याने गुंतवणूक वाढत आहे.

महेश यादव, अध्यक्ष क्रेडाई कोल्हापूर


क्रेडाई कोल्हापूरचे सभासद १४२

संघटना व्यतिरिक्त स्वतंत्र असलेल्या बांधकाम व्यावसायिकांची संख्या ७५ हून अधिक

येत्या अडीच महिन्यात पूर्ण होणाऱ्या फ्लॅटसची संख्या अंदाजित २५००


घर खरेदी करताना ग्राहक आवडत्या लोकेशन्ससह जीम, जलतरण तलाव, मंदिर, ध्यानधारणा केंद्र, वॉ​किंग ट्रॅक, क्लब हाऊस, टेबल टेनिस कोर्ट आणि चिल्ड्रन पार्क या बाबी विचारात घेतात. बांधकाम व्यावसायिकांचा, ग्राहकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन त्यांची पूर्तता करण्यावर भर आहे.

विवेकानंद पाटील, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीतील पेट्रोल पंप भेसळप्रकरणी सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली-माधवनगररोडवर बायपासजवळील मातोश्री पेट्रोल पंपावर मंगळवारी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी छापा टाकला. तेथील पेट्रोलची तपासणी केली असता त्यात भेसळ असल्याचे दिसून आले तसेच दर्जातही फरक जाणवल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा पंप सील करण्याचे आदेश दिले. तसेच या पंपचालकावर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले. भारत पेट्रोलियम कंपनी हा पंप महेंद्र भालेराव (जळगाव) हे चालवत आहेत.

निनावी तक्रारीद्वारे या पंपावर गडबड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन कारवाईचे पाऊल उचलले. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी या पंपावर आले. जिल्हा पोलिस अधीक्षक शिंदे हेही सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दाखल झाले. जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, वजनमापे तपासणी अधिकारी यांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणी तपासणीत पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांनी पेट्रोल भरण्याचे यंत्र उघडल्यानंतर त्यातील सील तोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

भेसळ केली तर कारवाई होणारच

मातोश्री पेट्रोलपंपाबाबत तकारी आल्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली. अशा पद्धतीने पेट्रोल भेसळ होत असेल तर कोणाचीही गय केला जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन दरोड्यातील दोन खाती बोगस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नेटबँकिंगव्दारे युनिक ऑटोमोबाइल कंपनीला एक कोटी २४ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुंबई व पुण्यात गेलेल्या तपास पथकांनी पोलिस अधिक्षकांना अहवाल सादर केला आहे. गुन्ह्यातील रक्कम जमा झालेल्या सात खातेदारांची माहिती पोलिसांनी काढली असून मुंबईतील दोन खातेदारांची खाती बोगस असल्याचे तपासात पुढे आले आहे. या गुन्ह्यात कोणता आयपी अड्रेस वापरला याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

युनिकचे मॅनेजर शक्ती जयसिंगराव घाटगे यांनी ऑनलाइन फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. सायबर शाखा व शाहूपुरी पोलिस संयुक्तपणे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. युनिक कंपनीचा बँक खात्याचा यूजर आयडी, पासवर्ड मिळवून रक्कम लंपास केली आहे. हा तपास अतिशय गुंतागुंतीचा असल्याने सायबर शाखेची मदत घेतली जात आहे. मुंबई व पुण्यातील खात्यात जमा झालेल्या सात खातेदारांची माहिती काढण्यात आली आहे. खातेदार खरे आहेत का बनावट याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबईतील दोन बँकांतील खाती बोगस असल्याचे तपासात पुढे आहे. खाते काढत असताना बँक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची खातरजमा केली आहे का याचाही तपास केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराबाई पार्कात मैदानाची दुरवस्था, ड्रेनेजची समस्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ताराबाई पार्क प्रभागाची ओळख आहे. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रभागात पुन्हा धूमशान सुरू झाले आहे. मात्र या प्रभागातील मैदानाची दुरवस्था, काही भागातील ड्रेनेजची समस्या कायम आहेत. सासने मैदान प्रभागातील एकमेव मैदान आहे. मैदान अद्ययावत केले तर ते नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. जुन्या काळातील ड्रेनेज लाइन बदलून नवी पाइपलाइन टाकावी, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.

प्रभागात किरण बंगला परिसर, ताराबाई गार्डन परिसर, मेथाराम अपार्टमेंट परिसर, हॉटेल वृषालीसमोरील भाग, न्यू शाहूपुरी परिसर, कृपलानी हॉस्पिटल परिसर, फ्रेंडस कॉलनी झोपडपट्टी परिसर, न्यू शाहूपुरी दाभोळकर कॉर्नर परिसर, पर्ल हॉटेल पिछाडीस परिसर, बेकर गल्ली, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय परिसर, कमला विनायक अपार्टमेंट, धैर्यप्रसाद हॉल परिसर, पाटणकर कॉलनी, कल्याणी अपार्टमेंट या भागाचा समावेश आहे. या भागात १९७२ मध्ये ड्रेनेज लाइन टाकली आहे. गीता मंदिर, पर्ल हॉटेल तेथून रसिका ट्रॅव्हल्स, कनाननगर ते जयंती नाला अशी ही ड्रेनेज लाइन आहे.

१९८२ च्या दरम्यान सहा इंची ड्रेनेज पाइप नव्याने टाकून कनेक्शन जोडले. काही ठिकाणी सहा तर काही ठिकाणी नऊ इंची पाइप टाकली. आता लोकसंख्या वाढली. हॉस्पिटल, हॉटेल्सची भर पडली. हॉटेलमधील सांडपाणी ड्रेनेज लाइनला जोडले आहेत. यामुळे ड्रेनेज लाइन तुंबून मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरते. ते टाळण्यासाठी पर्ल हॉटेल ते रसिका ट्रॅव्हल्स चौकपर्यंत पाइपलाइन बदलण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी याकडे लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सासने मैदानाची योग्य निगा राखली नाही, मैदानावर गवत काढले आहे, परिसरात अतिक्रमण, वाहनांचे पार्किंगकडे याकडे नागरिक लक्ष वेधतात. हॉटेल वृषालीसमोरील मार्गावरुन सासने मैदानाकडे येणाऱ्या मार्गावर काहींनी अतिक्रमण केले आहे. रस्त्यावर कुंड्या ठेवल्या आहेत. यामुळे वीस फुटाचा रस्ता पंधरा फुटाचा बनला आहे. प्रभागातील विविध भागातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर, सांगली जिल्हा स्वच्छतेत पहिला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आयोजित स्वच्छता दर्पण पुरस्कार स्पर्धेत कोल्हापूरला पहिला पुरस्कार मिळाला. समान गुण मिळाल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि वर्धा या पाच जिल्ह्यांना पहिला बहुमान मिळाला. २ ऑक्टोबरला, महात्मा गांधी जयंतीनिमित्त दिल्लीतील सोहळ्यात पुरस्कार वितरण होणार आहे. गतवर्षी कोल्हापूर जिल्हा स्वच्छतेत पाचव्या क्रमांकावर होता. यंदा नियोजनबद्ध प्रयत्न केल्याने पहिला क्रमांक मिळाला.

स्पर्धेसाठी आवश्यक नव्वद टक्यांपेक्षा अधिक कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयाचा निकष पूर्ण झाल्याने गेल्यावर्षीच जिल्हा हागणदारीमुक्त झाला. स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी शाश्वत आणि पारदर्शकता अशा दोन मुद्यांवर गुणांकन देण्यात आले. पारदर्शक विभागातून गुण मिळवण्यासाठी वापरातील सर्व शौचालयांचे फोटो स्वच्छ भारत मिशनच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले. शाश्वत विभागातून गुण मिळवण्यासाठी शौचालय वापरण्यातील सातत्य, त्यासाठी प्रचार, प्रसिध्दीचे राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये सरासरी जिल्ह्याला ९० टक्के गुण मिळाले.

‘शाश्वत’मधून २५ पैकी १५ आणि ‘पारदर्शक’साठी २५ पैकी २५ गुण मिळाले. २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामांवर गुणांकन देण्यात आले. स्वच्छतेत जिल्हा अव्वल ठरावा, यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पंचायत समिती पातळीवरील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

......................

जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. शौचालयाचे फोटो ऑनलाइन अपलोड करण्याचे कामही चांगले झाले. नियमित शौचालयांचा वापर करण्यासाठी प्रभावी जागृती करण्यात आली. त्यामुळे स्वच्छता दर्पण पुरस्कार स्पर्धेत देशात पहिला क्रमांक मिळवता आला. २ ऑक्टोबरच्या गावसभेत स्वच्छता समितीची स्थापना करण्याची सूचनाही दिली आहे.

डॉ. कुणाल खेमनार, सीइओ, जि.प.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्राचे मार्केट तेजीत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापुरात धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक उत्सव आणि भाविकांची मांदियाळी असे वातावरण शिगेला पोहोचले आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरात नवरात्रकाळात अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. कोल्हापूरला धार्मिक पर्यटनासाठी येणारा पर्यटक कोल्हापूरचे ऐतिहासिक पर्यटन करण्याबरोबच इथली खाद्ययात्रा आणि खास वस्तूंची खरेदीही करतो. यंदाही नवरात्राच्या पहिल्यादिवसापासून कोल्हापुरात पर्यटकांची उच्चांकी गर्दी आहे. परिणामी नवरात्रकाळात कोल्हापुरातील बाजारपेठेलाही आर्थिक तेज आले आहे. तर नवरात्रातील धार्मिक विधी, पूजा, व्रतवैकल्ये यामुळे फळे, फुले, पूजा साहित्य आणि उपवासाचे पदार्थ यांना वाढलेल्या मागणीमुळे आर्थिक उलाढालीलाही चालना मिळत आहे.

पूजा साहित्यासह फळेफुलांचा बाजार फुलला

नवरात्रकाळात घटस्थापना, ललितापंचमी, अष्टमी, खंडेनवमी आणि दसरा या महत्त्वाच्या दिवशी विविध पूजाविधी घरोघरी तसेच मंदिरांमध्ये असतात. त्यासाठी पूजेच्या साहित्याला मागणी आहे. विड्याची पाने, सुपारी, नारळ, नाडापुडी, कापूर, धूप या पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत रोज स्थानिक भाविकांची गर्दी होत आहे. शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, कपिलतीर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी, शिवाजी मार्केट, महापालिका परिसरातील बाजारगेट, गंगावेश या परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीची मोठी उलाढाल सुरू आहे. तसेच झेंडूच्या फुलांची आवकही वाढली आहे. सध्या झेंडूंच्या फुलांचा दर ६० ते ८० रूपये किलो असून दसऱ्यासाठी झेंडूची तयार तोरणेही बाजारात आली आहेत. नवरात्रकाळात प्रसादासाठी आणि उपवासासाठी फळांना मागणी आहे. लक्ष्मीपुरी फळ मार्केटमध्ये रोज फळांची मोठी विक्री होत आहे. सध्या सफरचंद, चिकू, केळी, संत्री आणि मोसंबी या फळांची आवक वाढली आहे. तर, रताळी, बटाटा, खजूर, खारीक यासह सुकामेवाही मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. नवरात्रौत्सवासाठी गेल्या आठ दिवसात पूजासाहित्यासह फळ, फुले, व सुकामेवा बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली असून दसऱ्यापर्यंत ती वाढण्याचीच शक्यता आहे अशी माहिती व्यापारी राहुल वेंगुर्लेकर यांनी दिली.

नारळांची उलाढाल लाखात

नवरात्रकाळात नारळांची उलाढाल सहा लाखांपर्यंत गेली असल्याचे नारळ व्यापारी वर्गातून सांगण्यात आले. कोकण आणि केरळ येथून नवरात्रोत्सवासाठी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात नारळ मागवण्यात आले आहेत. देवीला ओटी भरण्यासाठी भाविकांमधून नारळांना मागणी आहे. तसेच स्थानिकांकडून नवरात्रातील पूजाविधीसाठी नारळ खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मागवलेल्या नारळांची वर्गवारी करून त्यानुसार नारळविक्री तेजीत सुरू आहे.

उपवासाच्या पदार्थांची आवक वाढली

नवरात्रकाळात उपवासाच्या पदार्थांना वाढणारी मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी तयारी ठेवली आहे. खजूरमध्ये बिनबियांच्या खजुरीला विशेष मागणी आहे. ८० रूपयांपासून दीडशे रूपयांपर्यंत खजूरच्या दर्जानुसार उपलब्ध आहे. तर खारीक, बदाम, काजू या सुकामेव्याच्या बाजारपेठेत नवरात्रीनिमित्त मोठी उलाढाल सुरू आहे.

पर्यटकांची खाद्ययात्रा फायद्याची

अंबाबाई दर्शनासोबत रंकाळा, पन्हाळा, नृसिंहवाडी, जोतिबा अशी वन डे ट्रीप करण्यासाठी येणाऱ्या पर्यटक भाविकांच्या खाद्ययात्रेमुळे कोल्हापुरात खाद्यपदार्थांमध्ये रोज हजारोंची आर्थिक उलाढाल होत आहे. रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या गाडीपासून ते मोठमोठ्या हॉटेलपर्यंत पर्यटक खवय्येगिरी करत असल्यामुळे गेल्या आठ दिवसांत कोल्हापूरच्या चवीने आर्थिक गणिते जुळवून आणली आहेत. यामध्ये कोल्हापुरी मिसळ, वडापाव खाणाऱ्या पर्यटकांमुळे छोट्या विक्रेत्यांपासून ते हॉटेलचालकांना आर्थिक फायदा होत आहे.

कोल्हापुरी खासियतीला खरेदीची पावती

कोल्हापूर म्हटले की गूळ, चप्पल, दागिने, मसाले या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची भुरळ पर्यटकांना पडते. नवरात्रकाळात कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक भाविकांकडून कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची खरेदी होत असल्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होते. यामध्ये कोल्हापुरी चप्पल खरेदी नवरात्रकाळात तिपटीने वाढत असल्याचे चप्पल व्यावसायिक कुमार महाजन यांनी सांगितले. तर कोल्हापुरी गुळामध्ये सेंद्रिय गुळाला पर्यटक भाविकांकडून मागणी वाढत असल्यामुळे गुळ खरेदीतूनही आर्थिक फायदा होत आहे. पर्यटकांना कोल्हापुरी पदार्थांची चव आवडत असल्यामुळे सध्या कोल्हापुरी पदार्थांचे तयार मसाले बाजारपेठेत उपलब्ध आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक भाविकांच्या वाढत्या मागणीमुळे तयार मसाल्यांच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. यामध्ये कोल्हापुरी कांदालसूण चटणी, तांबडापांढरा रस्सा मसाला, मिसळ मसाला मोठ्या प्रमाणात तयार करून नवरात्रकाळात विक्री केला जातो. पारंपरिक दागिन्यांच्या बाजारपेठेतही सध्या लाखोंची उलाढाल होत आहे. यामध्ये इमिटेशनसोबत अस्सल सोन्याचे दा​गिने नवरात्रकाळात खरेदी केले जात असल्यामुळे महाद्वार रोड, जोतिबा रोड परिसरात दागिने विक्रीला तेजीचे दिवस आहेत.

दांडियासाठी खास खरेदी

नवरात्रीनिमित्त कोल्हापुरात विविध संस्था, संघटना, ग्रुप यांच्यावतीने दांडिया व गरबानृत्याचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. दांडियाच्या निमित्तानेही पारंपरिक ड्रेस, दागिन्यांच्या बाजारपेठेत हजारो रूपयांची उलाढाल सुरू आहे. दांडियासाठी खास पारंपरिक ड्रेस व ज्वेलरी भाडेतत्वावर मिळत आहे. अशाप्रकारच्या व्यवहारानेही गेल्या सहा दिवसात आर्थिक रोजगार निर्माण झाला आहे. दांडियासाठी लागणाऱ्या गाण्यांची सीडी खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

====
नवरात्रकाळात स्थानिक नागरिकांसह पर्यटक भाविकांकडूनही अनेकविध वस्तूंच्या खरेदीला उधाण येते. पर्यटकांची वाढती संख्या कोल्हापुरात नवरात्रकाळातील वाढत्या आर्थिक उलाढालीचा महत्त्वाचा स्रोत बनला आहे. कोल्हापूरच्या वस्तू, पदार्थ यांनाही ऑनलाइन मार्केट मिळत आहे. कोल्हापूरचे पर्यटन आणि त्यातून आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी कोल्हापुरात साजरे होणारे सण उत्सव यांचा नियोजनबद्ध वापर केल्यास भविष्यात उत्पन्न वाढेल. त्यासाठी पर्यटकांची फसवणूक टाळून दर्जेदार खरेदीचा आनंद देण्याची जबाबदारी कोल्हापुरात व्यावसायिकांची आहे.

हर्षवर्धन भुर्के, ऑनलाइन मार्केट सल्लागार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६९ लाखांच्या आयफोनप्रकरणी पोलिस कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तावडे हॉटेल येथे सोमवारी पहाटे खासगी प्रवासी बसमधून एका प्रवाशाकडूनप जप्त केलेल्या ६९ लाख रुपयांच्या आयफोनवर हक्क सांगण्यासाठी ३६ तास उलटूनही अद्याप कोणीच पुढे आलेले नाही. ताब्यात घेतलेल्या संशयिताने हे आयफोन एस एस कम्युनिकेशनचे असल्याचे सांगितले आहे. मात्र, हा गुंता न सुटल्याने तपास करण्याची परवानगरी मिळावी यासाठी पोलिसांनी जिल्हा कोर्टात अर्ज केला आहे.

खासगी बसने एक व्यक्ती महागडे मोबाइल घेऊन येणार आहे, अशी माहिती कंट्रोल रुममधून रविवारी पहाटे शाहूपुरी पोलिसांना दिली होती. शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास तावडे हॉटेल येथे पिंपरी चिंचडवडहून आलेल्या खासगी प्रवासी बस अडवली. पोलिसांनी गजानन दगडू थिटे (वय ३२,रा. हिंगोली) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन बॉक्समध्ये ६९ लाख रुपये किंमतीचे १६४ आयफोन मिळाले. पोलिसांनी आयफोन खरेदी विक्रीची पावती मागितली असताना थिटे यांनी पावती नसल्याचे सांगितले. हे आयफोन एसएस कम्युनिकेशनला देण्यासाठी आलो असल्याचे थिटे याने पोलिसांना सांगितले. सोमवारी व मंगळवारी ताब्यात घेतलेल्या आयफोनवर मालकी सांगण्यास कोणी पुढे आले नाही. त्यामुळे पोलिसांनी जिल्हा कोर्टात गुन्ह्याचा तपास करण्यासाठी परवानगी मागितली आहे. या संदर्भात शहर पोलिस उप अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर म्हणाले, पोलिसांनी आयफोन जप्त केले आहेत. पण खरेदी विक्रीच्या पावत्या घेऊन पोलिसांच्याकडे कोणीच आलेले नाहीत. त्यामुळे अजून गुन्हा दाखल केलेला नाही. जप्त केलेल्या आयफोनचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेने हसं करून घेतलंय, सत्ता कशी सोडणार?

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करून स्वत:चच हसं करून घेतलंय. त्यामुळे ते सत्तेतून बाहेर पडूच शकत नाही, अशी बोचरी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली.

कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेची जोरदार खिल्ली उडवली. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने स्वत:चे हसे करून घेतले आहे. घरातील भांडणं रस्त्यावर काढण्याची वृत्तीच मुळात चुकीची असून शिवसेना सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेत स्वत:चे नुकसान करत असल्याची टीका पाटील यांनी केलीय.

शिवसेना कोणत्याही परिस्थितीत सरकारचा पाठिंबा काढूच शकत नाही. ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनेने महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरत मुंबईभर जोरदार आंदोलने केली होती. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्यात आली होती. 'मातोश्री'वर झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत सत्तेतून बाहेर पडण्यावरही चर्चा झाली होती. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका निर्णयाप्रत आल्याचं सांगून सत्तेतून बाहेर पडण्याचा भाजपला अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. तर मराठवाड्यातील काही आमदारांनी मंगळवारी उद्धव यांची भेट घेऊन सत्तेतून बाहेर पडू नका, अशी मागणी केली होती. त्यावर सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला नसल्याची ग्वाही उद्धव यांनी आमदारांना दिली होती. शिवसेनेच्या या धरसोडवृत्तीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील यांनी हे विधान केलं. विशेष म्हणजे काल दिवसभर दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणाऱ्या पाटील यांनी आज शिवसेनेवर बोचरी टीका केल्याने भाजपला शिवसेनेची चिंता नसल्याचंच अधोरेखित होत असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेडफोन्समुळे बहिरेपणा? छे!

$
0
0

डॉ. अविनाश भोंडवे
कानामध्ये सदोदित हेडफोन्स लावून हिंडणं, हे आजच्या तरुणाईचं एक वैशिष्ट्य आहे. रस्त्यानं जाता येता, दुकानात, बसमध्ये, रेल्वेत, एवढंच काय घरी आणि कॉलेजमध्येसुद्धा असे हेडफोन्स कानाला लावलेले तरुण घडोघडी नजरेस पडतात. या सर्व मुलांना त्यांचे आईवडील नेहमी सांगत असतात, ‘कानाला सारख्या त्या वायरी लावून बसू नकोस. बहिरा होशील.’ मग अचानक थोडीशी आरोग्यजागृती झाल्यासारखं ही मुलं ते हेडफोन्स काहीवेळ काढूनही ठेवतात.

या युवावर्गासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. कानांना हेडफोन्स लावून संगीत किंवा संभाषण ऐकत राहिल्यानं बहिरेपणा येत नाही. ‘जामा ऑटोलॅरिंगॉलॉजी- हेड-नेक सर्जरी’ या जागतिक दर्जाच्या वैद्यकीय मासिकाच्या जुलै २०१७च्या अंकात डॉ. ब्रुक आणि डॉ. डायलन यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधनामध्ये हे दाखवून देण्यात आलं आहे. १२ ते १९ वर्षांच्या सुमारे सात हजारांपेक्षा जास्त मुला-मुलींचं दोन दशकांपेक्षा जास्त काळ सर्वेक्षण आणि बारकाईनं तपासणी करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ही तपासणी अतिशय अत्याधुनिक शास्त्रीय यंत्रं आणि उपकरणांच्या योगे करण्यात आली.

या संशोधनामध्ये, हेडफोन्स वापरण्याची टूम येण्याआधी म्हणजे १९८८-९४ या कालावधीत या वयातील मुलांत बहिरेपणाचं प्रमाण १७ टक्के होतं. २००७-०८ मध्ये हे प्रमाण २२.५ टक्क्यांपर्यंत वाढलं होते. २००९-२०१७ या काळात, म्हणजे जेव्हा युवकांमध्ये हे हेडफोन्स लावून बसण्याची फॅशन आली, त्याकाळात बहिरेपणाचं हे प्रमाण १५.५ टक्क्यापर्यंत खाली आलं आहे.

या संशोधनाच्या निष्कर्षामुळे बरीच खळबळ उडाली. या संशोधनामधील एक प्रमुख तज्ज्ञ आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील प्राध्यापक डॉ. डायलन चान यांच्या मते, बहिरेपणाच्या प्रमाणामध्ये घट होण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे सध्याची तरुणाई हेडफोन्सद्वारे अति तीव्र आवाजातलं, फार गोंगाटपूर्ण संगीत ऐकायचं टाळते. आणि दुसरं म्हणजे आज उपलब्ध असलेल्या हेडफोन्समध्ये आवाजाची तीव्रता, आवाजाचा व्हॉल्यूम कमी जास्त करण्याची क्षमता जास्त चांगल्या पद्धतीनं वापरली गेली आहे. विशेषतः लहान मुलं आणि युवकांसाठी बनवली जाणारी ही साधनं या बाबतीत जास्त सॉफिस्टिकेटेड असतात.

डॉ. डायलन यांच्या मते, या संशोधनामुळे युवकांनी फार हुरळून जाण्याची गरज नाही. ‘हेडफोन्समुळे बहिरेपणा येत नाही, मग आता बिनधास्तपणे कर्कश्श आवाजातले तीव्र ध्वनी असलेले संगीत ऐका,’ असा या निष्कर्षांचा अर्थ काढणं पूर्णपणे चुकीचं ठरेल.

७५ डेसिबल्सपर्यंत ध्वनी तीव्रता असलेले आवाज ऐकल्यानं कानांना इजा होत नाही. ८५ डेसिबल्सपेक्षा जितकी ती तीव्रता जास्त असेल, तितक्या जास्त प्रमाणात आणि कमी वेळात बहिरेपणा येतो, हे शास्त्रीय सत्य आजही अबाधित आहे. आता येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व जागरूक भक्तगणांनी याकडे विशेष लक्ष दिल्यास सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं तो एक महत्त्वाचा पायंडा पडेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images