Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘टाइम्स प्रापर्टी शो’ सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निसर्गाच्या सान्निध्यात आणि सर्व सुविधांनीयुक्त घरकुल हे प्रत्येकाचे स्वप्नं असते. नागरिकांच्या नेमक्या याच स्वप्नांची परिपूर्ती करणाऱ्या, वैविध्यपूर्ण साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गृहप्रकल्पांचे सचित्र दालनच ‘टाइम्स प्रॉपर्टी शो’च्या निमित्ताने एकाच छताखाली एकवटले आहे. हॉटेल सयाजी येथे ‘टाइम्स प्रॉपर्टी शो’ भरविण्यात आला असून रविवारी सकाळी शानदार सोहळ्यात त्याचा उदघाटन समारंभ झाला. ‘टाइम्स प्रॉपर्टी शो’मुळे कोल्हापूरच्या गृहप्रकल्पाचे वैभवच नागरिकांसमोर खुले झाल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.

‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि टाइम्स ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रदर्शनात कोल्हापूरसह, सांगली, पुणे येथील बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला आहे. हॉटेल सयाजी येथील मेघमल्हार हॉलमध्ये घरकुलविषयक प्रदर्शन भरले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि क्रिडाईचे राज्य उपाध्यक्ष राजीव परिख, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रॉपर्टी शोचे उदघाटन झाले. ‘टाइम्स प्रॉपर्टी शो’ नि​मित्त बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना ​विविध सवलती आणि योजना जाहीर केल्या आहेत. या प्रॉपर्टी शोमध्ये ग्राहकांच्या फायद्यासाठी विविध वित्तीय संस्था आणि बँकाही सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे प्रॉपर्टी शो ला पहिल्याच दिवशी नागरिकांनी गर्दी केली होती. बांधकाम व्यावसायिक दिगंबर इंगवले, अक्षय पोवार, अमित शहा, निखिल गावडे, कृष्णा दिवटे, विवेकानंद पाटील, प्रतिक ओसवाल, रुद्रप्रसाद शर्मा, आनंद शहा, कुलदीप जाधव, आनंद पराडकर, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे, परेश हटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. हे प्रदर्शन २६ सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहे.

मानव ग्रुप गेली पंधरा वर्षे पुण्यातील बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. पुण्यात बाराहून अधिक गृहप्रकल्पांच्या माध्यमातून १५०० कुटुंबांना घरे उपलब्ध करून दिली. ग्रुपतर्फे कोल्हापुरात रंकाळा तलाव नजीक हरिओमनगर येथे अद्वितीय रहिवासी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. टू बीएचकेचा हा गृहप्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तिसऱ्या मजल्यावर इनडोअर गेम्सची सुविधा आहे. ध्यानधारणा केंद्र, वॉकिंग ट्रॅक, अॅक्युप्रेशर पथचा समावेश आहे. स्पॉट बुकिंगसाठी सवलत योजना आहे.

- रुद्रप्रसाद शर्मा, मानव ग्रुप

रामसिन्हा ग्रुपतर्फे सर्किट हाऊसच्या पिछाडीस पुण्यपर्व या निवासी, व्यापारी संकुल साकारले आहे. या प्रकल्पात १५२ फ्लॅट्स आहेत. नागाळा पार्कात पुण्यप्रवाह हा रहिवासी प्रकल्प आहे. यात टू बीएचके, थ्री बीएचके व फोर बीएचकेचा समावेश आहे. उच्च दर्जा, सर्व प्रकारच्या सुविधा येथे आहेत. राजारामपुरी व महाद्वार रोड येथे व्यापारी संकुलची उभारणी सुरू आहे.

- अमित शहा, रामसिना ग्रुप

सर्वांसाठी घर या संकल्पनेला अनुसरुन पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने स्वगृह योजना सुरु केली आहे. योजनेचे ‘सहभागाचे धोरण, घराचे तोरण’ हे ब्रीद आहे. बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांच्या संयुक्त विद्यमाने स्वगृह योजना साकारली जाईल. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. ग्राहकांचा रहिवासासाठी असणाऱ्या परिसराकडील कल आणि परवडणाऱ्या दराची सांगड घालून योजना साकारायची आहे.

- प्रतीक ओसवाल, पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स


गार्डियन डेव्हलपर्सतर्फे पुण्यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. लेकशायर, हिलशायर, पलाडियम हे गृहप्रकल्प पूर्ण आहेत. ग्राहकांच्या दृष्टीने फायद्याचे म्हणजे या ठिकाणी फ्लॅट खरेदीवेळी जीएसटी लागणार नाही. शिवाय गार्डियन डेव्हलपर्सने ग्राहकांसाठी सवलत योजना जाहीर केली आहे. फ्लॅट खरेदीसाठी ग्राहकांना कर्जासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ग्राहकांनी सात वर्षात हफ्त्याने फ्लॅटची किंमत कंपनीकडे भरावयाची आहे. परिणामी व्याज वाचणार आहे.

- कृष्णा दिवटे, गार्डियन डेव्हलपर्स

जाधव-कसबेकर ब्रदर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ग्राहकांच्या स्वप्नानील घरकुलाला मूर्त रुप देण्याच्या उद्देशाने गृहप्रकल्पाची उभारणी केली आहे. न्यू पॅलेस मेन गेटनजीक साकारत असलेला ग्रॅन्ड्यूअर रेसिडेन्सी हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. येथे टू बीएचके, थ्री बीएचके, फोरबीएचके फ्लॅट्स उपलब्ध आहेत. दर्जेदारपणा, आकर्षक लूक व ग्राहकांच्या आवडीनिवडी जाणून बांधकाम यामुळे हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण असा आहे.

- काशीनाथ जाधव, जाधव-कसबेकर ब्रदर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुस्लिम बोर्डिंग सत्तारुढांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुस्लिम समाजाच्या दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या (मुस्लिम बोर्डिंग) त्रैवार्षिक निवडणुकीत सत्तारुढ फताह उल आमिन पॅनेलने दणदणीत विजय मिळविला. साडेचार तासांच्या मतमोजणीनंतर रात्री साडेनऊ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. पाचही फेऱ्यांत सत्तारुढ पॅनेल आघाडीवर राहिले. चार पॅनेल आणि दोन अपक्षांमुळे निवडणूक चुरशीने झाली. सत्तारुढ पॅनेलनेच्या सभासदांनी भर पावसातही जल्लोष केला.

दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. सकाळी आठ वाजल्यापासून मुस्लिम बोर्डिंग येथे मतदान सुरू झाले. दुपारी चार वाजेपर्यंत १४१३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजाविला. १३ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात होते. जी. डी. इनामदार या उमेदवाराने माघार घेऊन सत्तारुढ पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. मात्र त्यांचे नाव मतपत्र‌िकेत राहिले. त्यांना केवळ एक मत मिळाले. ३७ जागांसाठी चुरशीने मतदान झाले. ३८ उमेदवारांत २५ संचालक, २ उपाध्यक्ष, अध्यक्षपदासाठी ४, प्रशासकपदासाठी ३ आणि अधीक्षकपदासाठी ४ उमेदवार रिगंणात होते. सत्तारुढ फताह उल आमिन पॅनेल आणि राजर्षी छत्रपती शाहू मुस्लिम बोर्डिंग परिवर्तन पॅनेल यांच्यात खरी लढत झाली. इकरा आघाडी आणि चाँदतारा पॅनेलच्या उमेदवारांनी मते घेण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसे यश आले नाही. बोगस मतदान रोखण्यासाठी सभासदांना ओळखपत्रासह आधार कार्डाची सक्ती करण्यात आली. काही सभासदांच्याकडे आधार कार्ड नव्हते. त्या सभासदांना ओळखपत्रावरील सभासद क्रमांकाची खात्री करुनच मतदान करण्यास परवानगी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी नूरमहमंद मुजावर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मियाँलाल नाईक, धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचे निरीक्षक ए. एन. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.


संचालकपदासाठी सत्तारुढ पॅनेलला मिळालेली मते, जहाँगीर अत्तार ( ७७२) अल्ताफ झांजी ( ७६२), फारुक पटवेगार (७२३), पापाभाई बागवान (९५), मलिक बागवान (६३५), लियाकत मुजावर (७४८), रफिक मुल्ला (६९४), अमीरहजमेखान शिंदी ( ७४९), रफिक शेख ( ७६५)


विरोधी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली मते: सलीम पटवेगार ( ४९१), मुश्ताक पठाण (५४९), आदम बागवान (४६०), खुतबुद्दीन बागवान (५०६), रहिम बागनाव ( ५७५), मुश्ताक मकानदार (५३७), यासीन मुल्लाणी ( ५४१), इमदादअली शेख (४८१), माजिद सनदी (५२९).


चाँदतारा आघाडी : इलाही नदाफ (९५), जमीर बागवान (९५), फिरोज बागवान ( ५०), खलील मुजावर (६५)


इकरा आघाडी (किटली चिन्ह)- मुश्ताक मुल्ला ( ६१), शरीफ सेख ( १५४), गौसअहमद सौदागर ( २९)


कार्याध्यक्ष पदासाठी पडलेली मते:

गणी आजरेकर (८३०), यासीन बागवान (५००), नौशाद मोमीन (५४), गुलाब इनामदार (१)- अवैध मते (२८), एकूण मतदान १४१३


प्रशासकपदासाठी मिळालेली मते : कादर मलबारी (७५८), मुनाफ मणेर (५७२), दिलावर खान (४४) - अवैध मते : ३९, एकूण १४१३


अधीक्षक पदासाठी मिळालेली मते: साजिद खान (७३२), सनाउल्ला थोडगे ( ५०३), डॉ. इस्माइल नमाजी ( ८७), रियाज रुकडीकर ( ५६)- अवैध मते: ३५, एकूण १४१३


उपाध्यक्ष पदासाठी मिळालेली मते- आदिल फरास (८८१), हिदायत मणेर ५००, अवैध मते : १२ , एकूण १४१३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औैरनाळमध्ये वीजपडून महिलेचा मृत्यू

$
0
0

औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथे शेतात पिकाची मळणी करीत असताना वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. संगीता अजित नाईक (वय ३६) असे महिलेचे नाव आहे. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, औरनाळ येथे रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली. संगीता या शेतामध्ये भाताची मळणी करीत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये त्या गंभीररित्या भाजल्या. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सासू असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन दरोडा प्रकरणी सहा अकाउंटंटची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नेटबँकिंगद्वारे युनिक ऑटोमोबाइल कंपनीला एक कोटी २४ लाख, ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी कंपनीच्या सहा अकाउंटंटकडे ‘पासवर्ड लिक कसा झाला?’ याची कसून चौकशी केली. या गुन्ह्यातील रक्कम देशभरातील १२ खात्यामध्ये वर्ग झाली आहे.

युनिकचे मॅनेजर शक्ती जयसिंगराव घाटगे (वय ३६,रा. राजोपाध्येनगर) यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युनिक कंपनीचा बँक खात्याचा युजर आयडी व पासवर्ड मिळवून रक्कम लंपास केली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता मुंबईसह, दिल्ली, चंदीगड, मिझोराम येथील १२ बँक खात्यांत ही रक्कम जमा करण्यात आली आहे. पोलिसांनी या बँकाशी संपर्क साधून खाती बंद करण्यास सांगितले आहे. संशयितांनी जमा झालेल्या खात्यावरुन काही रक्कम उचलली असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

शाहूपुरी पोलिसांनी रविवारी युनिकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी केली त्यामध्ये अकाऊंट विभागातील सहा अकाउंटंटची चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. पोलिसांनी पासवर्ड कसा लिक झाला याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. खात्याचा पासवर्ड दर तीन महिन्यांनी बदलला जातो. पासवर्ड बदलताना त्याचा अलर्ट मेल कंपनीला येतो. यापुर्वी जून महिन्यात अकाउंटचा पासवर्ड बदलण्यात आला होता. १८ व १९ सप्टेंबर रोजी पासवर्ड बदलण्यासंदर्भात घाटगे यांना दोन मेल आले होते. पण अन्य कामात गुंतल्याने त्यांनी ते मेल बघितले नव्हते. घाटगे यांना पाठवलेले मेल हॅक करून संशयिताने खात्यावरील रक्कम काढली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

शक्ती घाटगे यांचा मोबाइल संशयिताने रिइश्यू केला होता. त्यासाठी कंपनीच्या बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. सुशांत तुरंबेकर या संशयिताने घाटगे यांच्या मोबाइलनंबरवरून बँक खात्याचे तपशील मिळवले होते. या गुन्ह्याच्या कटात कोल्हापुरातील एकादी व्यक्ती सहभागी आहे का याचाही पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डोळस’पणासाठीच मांडला प्रपंच

$
0
0

Anuradha.Kadam@timesgroup.com
Tweet : @anuradhakadamMT

कोल्हापूर : समाजाच्या प्रगतीमध्ये जसे तांत्रिक अडथळ येतात, त्याहून जास्त अडथळे मानसिकतेच्या साचलेपणामुळेही येतात. शिक्षणाच्या कक्षा रूंदावत असताना आणि राहणीमानाची कूस बदलत असतानाही आजघडीला समाजात अंधश्रद्धेच्या विळख्यामुळे वैचारीक अधोगती होत आहे. विशेषत: अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे आणि जर महिला या विळख्यातून बाहेर पडल्या तर त्यांच्या डोळसपणामुळे एक कुटुंब अंधश्रद्धेच्या जंजाळातून मुक्त होऊ शकते. एक महिला शिकली तर सारे कुटुंब शिकते या उक्तीप्रमाणे आता एक महिला जर अंधश्रद्धेपासून अलिप्त राहिली कुटुंबाची प्रगती होईल या विचाराने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात झोकून घेतलेल्या सुजाता म्हेत्रे यांनी गेल्या २० वर्षापासून अंधश्रद्धामुक्त समाज घडवण्याचा विडा उचलला आहे.

पेशाने शिक्षिका असलेल्या सुजाता या मूळच्या सांगलीच्या. वडणगे-निगवे येथील जोतिर्लिंग विद्यामंदिर येथे त्या सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक केवळ पिढी घडवण्याचे काम करत नाही तर समाजातील चुकीच्या रूढीपरंपरांमध्ये अडकलेल्यांचे मानसिक प्रबोधन करण्यामध्येही सकिय योगदान देऊ शकतो याची प्रचिती सुजाता यांच्या कामाच्या पद्धतीचा आढावा घेतल्यानंतर निश्चितच येते.

मुळात सुजाता यांनी ज्या कामाचे व्रत घेतले आहे ते काम आज सुरू केले आणि उद्या त्याचे अपेक्षित परिणाम दिसले इतके सोपे नाही. वर्षानुवर्षे रुजलेल्या अंधश्रद्धांची पाळंमुळं इतकी घट्ट आहेत की प्रबोधन करताना संवाद साधण्यापासून सुरूवात करावी लागत असल्याचे सुजाता सांगतात. शिक्षक म्हणून नोकरी व्यवस्थित सुरू असताना सुजाता यांना एका प्रसंगाने अस्वस्थ केले आणि तेव्हापासून अध्यापनासोबत त्यांनी समाजाचा लोकशिक्षक होण्याचे व्रत जपले. नोकरीच्या निमित्ताने कोकणातील रत्नागिरीच्या एका शाळेत असताना विद्यार्थ्यांच्या हातावर काहीतरी व्रण दिसले. कुणाच्या हातावर डाग दिसले. सुजाता अधिक खोलात शिरल्यावर त्यांना कळाले की मुलांना कावीळ झाली की अंगावर चटके दिले जातात. परड्यात साप दिसला तरी अघोरी उपाय केले जातात. ​वैज्ञानिक उपाय किंवा वैदकीय उपचार करायचे सोडून या मुलांच्या घरात पाळणाऱ्या अंधश्रद्धांविरोधान सुजाता यांनी त्यांच्या समाजकार्याचे पहिले पाऊल टाकले. मुलांच्या आईची भेट घेऊन त्यांना नेमकी कारणं सांगितली. अवघड होतं हा बदल करणं, पण सुजातांना महिला असल्याचा फायदा गावातील महिलांना मोकळेपणाने बोलतं करण्यासाठी झाला.

त्यानंतर बदलीच्या निमित्ताने सुजाता कोल्हापुरात आल्या आणि तेव्हाही त्यांना कोल्हापूरसारख्या पुरोगामी म्हणवणाऱ्या जिल्ह्यातही अंधश्रद्धेने किती विळखा घातला आहे हे दिसून आले. दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी त्यांची भेट झाली. शिक्षकातील लोकशिक्षकाला प्रोत्साहित करण्यासाठी आयो​जित केलेल्या शिबिरांमध्ये सुजाता सहभागी झाल्या आणि समाजात अंधश्रद्धेच्या अधीन झालेल्यांशी संवाद साधण्याची, त्यांचे मतपरिवर्तन करण्याची नसच त्यांना सापडली.

मुळात अंधश्रद्धेसारखी रूजलेली मनोवृत्ती बदलण्यासाठी सुजाता यांना खूप नियोजन करावे लागते. वर्गातील मुलांना अभ्यासक्रमाबरोबरच त्या अंधश्रद्धा निर्मूलनाचही मंत्र देतात. या मोहिमेतील अर्धे काम त्यांचे विद्यार्थीच करत असल्याचे त्या आवर्जुन सांगतात. अंधश्रद्धाळू म्हणून निदर्शनास येणाऱ्या कुटुंबातील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा सुजाता यांना त्यांच्यातील शिक्षिकेची मदत होते. बहुतांशीवेळा महिलांना ती गोष्ट पटत नसते, मात्र कुटुंबीयांच्या दबावापोटी त्या बळी पडतात. याची जाणीव करून देण्यासाठी सुजाता संवादाचेच पाऊल उचलतात. जेव्हा महिलांच्या मनावरील जळमटं दूर होतात किंवा शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धेबाबत प्रश्न निर्माण होतात तेव्हा सुजाता यांचे मिशन फत्ते झालेले असते.

महिलांना सजग करताना...

सुजाता यांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षात सुजाता यांनी कोल्हापुरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने कित्येक महिलांना सजग केले आहे. गेल्या तीन वर्षात त्यांनी महिला सहकाऱ्यांसोबत जवळपास दोनशेहून अधिक महिलांचे जटा निर्मूलन केले आहे. भोंदूबाबांचा पर्दाफाश केला आहे. मुलगा होण्यासाठी औषध देणाऱ्या बोगस पुजाऱ्यांचे पितळ उघडे पाडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुक्यात हरवली सांगलीकरांची पहाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली आणि जिल्ह्याच्या इतर भागात सोमवारी पावसाने दिवसभराची विश्रांती घेतली. रविवारी दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत पावसाने जोरदार तडाखा दिल्यानंतर सोमवारची सकाळी दाट धुक्याने व्यापली होती. समोरचे काहीच दिसत नव्हते, इतके दाट धुके असल्याने सकाळची धांदलही ठप्प झाली होती.
काही भागातील नागरिकांनी सोमवारचा दिवस घरातील पाणी काढण्यात घालवला. महापालिका प्रशासनाने रस्त्यावर आडव्या झालेल्या झाडांचा अडसर हलविण्यात घालवला. रस्ता केला पण, गटारींचा पत्ता नसल्याने काही भागातील घरामध्ये पावसाचे पाणी घुसले होते. तर सह्याद्रीनगरमध्ये सरकारी निवासास्थानासमोर रस्त्यावर आडव्या झालेल्या झाडांमुळे कित्येक वाहतूक खोळंबली होती.
सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, तासगाव, कडेगाव, खानापूर विटा आणि शिराळा तालुक्यात रविवारी जोरदार पावसाने शेत शिवारातून पाणी पाणी केले होते. सर्वाधिक पाऊस कडेगाव तालुक्यात ३९ मिलीमीटर इतका नोंदला गेला. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मिरज ३७.२, जत ०.९, खानापूर-विटा १४, वाळवा-इस्लामपूर ३५.१, तासगाव २४.९, शिराळा १३.८, आटपाडी १.३, कवठेमहांकाळ १०, पलूस ११.३ आणि कडेगाव तालुक्यात ३९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ स्वाइन फ्लूचेसाताऱ्यात २६ बळी

$
0
0

सातारा
सातारा जिल्ह्यात स्वाइन फ्लूने डोकेवर काढले असून, स्वाइन फ्लूमुळे एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा सरकारी रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
आजअखेर दगावलेल्या २६ पैकी १८ जणांचा मृत्यू जिल्ह्यात विविध ठिकाणी झाला आहे, तर जिल्हाबाहेर ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यामध्ये ६७४ रुग्ण स्वाइन फ्लू संशयित म्हणून आढळून आले आहेत. त्यातील १०५ रुग्णांना स्वाइन फ्लू झाला असल्याचे समोर आले आहे. सध्या विविध रुग्णालयात २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी १८ रुग्ण संशयित असून, ७ रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालयात स्वाइन फ्लूचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कासवर ऑनलाइन पर्यटकांबरोबरच ऑफलाइन पर्यटकांनाही प्रवेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराचा पुष्प हंगाम ऐन बहरात आहे. रंगीबेरंगी दुनियेचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक हजारोंच्या संख्येने कासला गर्दी करीत आहेत. शनिवार व रविवारी विकेंडला तर गर्दी ओव्हरप्लो होत असल्याने वनविभाग व कार्यकारी समितीने फक्त ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या पर्यटकांनाच प्रवेश देण्याचे धोरण मागील आठवड्यापासून अमलात आणायला सुरूवात केली होती. मात्र, लांबून येणारे पर्यटक व बामणोली भागात जानारे पर्यटक यांची होणारी गैरसोय बघता फक्त ऑनलाइन बुकींग वाल्यांनाच कासवर प्रवेश ही घोषणा पोकळ ठरली असून, कासवर ऑनलाइन पर्यटकांबरोबरच ऑफलाइन पर्यटकांनाही प्रवेश मिळत असल्याने मर्यादित पर्यटन ही संकल्पना फोल ठरली आहे.
कासचा अधिकृत हंगाम एक सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. सुरूवातीला सरसकट पर्यटकांना कासवर प्रवेश देण्यात आला. विकेंडला होणारी पर्यटक व गाड्यांची प्रचंड गर्दीने कासवरील नियोजन ढासळू लागले. लगेचच विकेंडला ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश हे धोरण राबविण्यास सुरूवात झाली. पहिल्या शनिवार बोगद्यात वनविभाग व पोलिस कर्मचारी यांनी तिकीट पाहूनच पर्यटकांना कास रस्त्याला सोडले. बुकिंग करून न येणारे तसेच बामणोली व वरती इतर भागात जाण्यारे पर्यटक यांची गैरसोय झाली. त्यातून पर्यटक व व्यवस्थापन यांच्यात वादविवाद होऊ लागले. बामणोली भागातील सर्व बोट चालकांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे धाव घेत कासमुळे बामणोली भागातील व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याचे निवेदन दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ माजी आमदाराच्यापुतण्यावर खुनी हल्लासोलापुरात भर दिवसा तलवारी तळपल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
पूर्व वैमनस्यातून तलवार आणि हॉकी स्टिकने केलेल्या हल्ल्यात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आणि गुरुनाथ पाटील यांचा नातू संदीप सुरेश पाटील गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारहाणीत तलवार मांडीवर बसल्याने सुरेश बचावला. भर दिवसा मौलाली चौक परिसरात हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मुलाला संगमेश्वर महाविद्यालय येथील एका ठिकाणी काहीजणांनी हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली होती. ज्यामध्ये गायकवाड हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर गायकवाड यांच्याकडील लोक मारहाण करणाऱ्यांना शोधत होते. मात्र, या सर्वांचा संदीप हा बचाव करीत असल्याचा राग मनात धरून सोमवारी दुपारी गजबजलेल्या मौलाली चौकातून संदीप हा एम. एच. १३ सी. के. ६७६८ या गाडीतून निघाला असताना अचानक संदीपच्या गाडीवर गायकवाड यांच्याकडील मुलांनी तलवार आणि हॉकी स्टिकने हल्ला चढविला. यामध्ये गाडीच्या समोरच्या काचेवर तलवारीचे घाव बसले. एकाने तलवार संदीपच्या दिशेने चालवली असता ती सटकली आणि त्याच्या मांडीवर वार बसला. डोक्याला हॉकी स्टिक जोरात बसल्याने संदीप बेशुद्ध होऊन खाली कोसळला.
दरम्यान, हा सर्व प्रकार सुरू असताना गोंधळ उडाला. गाडीच्या चालकाने या हल्ल्याची माहिती पाटील यांना सांगितली. तेव्हा जखमी संदीपला तत्काळ अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सदर बझार पोलिसात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
जखमी संदीप हा महापौर शोभा बनशेट्टी यांचा भाचा, झेडपीचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांचा जावई आहे. पाटील-गायकवाड दोनही गट तुल्यबळ असल्याने पुन्हा मोठी दुर्घटना घडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतापगड ३५७ मशालींनी उजळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगड ३५७ मशालींनी उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास ३५७ वर्षे पूर्ण झाल्याचे. नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. हा तेजोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांमधून हजारो भाविकांनी प्रतापगडावर हजेरी लावली.

भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या वेळी नगारे, तुतारी, सनई तसेच प्रतापगडावरील प्रसिद्ध स्वराज्य ढोल ताशा पथक व लेझीमच्या गजरात व भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून दीपोत्सव साजरा झाला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला.

प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजराण्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे रस्त्यांचे नाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‌विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा शहर आणि परिसराला झोडपून काढले. सुमारे तासभर झालेल्या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. पावसाच्या जोर प्रचंड असल्याने काही क्षणातच रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले. पावसाचा मारा आणि पाणी यामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. शाळा सुटण्याच्या वेळेसच पाऊस आल्याने विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडाली. हुपरी परिसरातही संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे महालक्ष्मीनगरात मोठे झाड उमळून पडले.

रविवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसांमुळे अनेक अपार्टमेंट आणि सकल घरामध्ये पाणी शिरले होते. दिवसभर या भागातील पाणी काढण्याचे काम सुरू होते. सकाळपासून पावसाचे वातावरण नसल्याने महापालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करताना ठिकठिकाणी दिसत होते. दुपारी १२ वाजल्यापासून मात्र वातावरणात कमालीचा बदल झाला. उष्मा वाढल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती. दुपारी तीन वाजता तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पाच वाजता मात्र मेघगर्जनेसह धुवाँधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर प्रचंड असल्याने काही क्षणात गटारीतील पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले.

शाळा सुटण्याच्यावेळेस पावसाला सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ उडाली. रस्त्यावरील पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. पावसाचा जोर वाढत गेल्यानंतर नागरिक मिळेत तेथे आसरा शोधत होते. तर अंबाबाई दर्शन व नवऊर्जा उत्सवासाठी आलेल्या भाविकांची अचानक आलेल्या पावसाने त्रेधातिरपीट उडाली. किरकोळ विक्रेत्यांची मालाची आवराआवर करताना चांगलीच दमछाक झाली. राजारामपुरी जनता बजार चौक, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, टायटन शोरुम, परिख पूल, सासने मैदान आणि गांधी मैदान परिसर आदी शहरातील सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तासाभरानंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरातील वाहतूक पूर्ववत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंग्रसवरील गुन्ह्यांची माहिती मागवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कल्याण जनता सहकारी बँकेचे कोल्हापूर शाखेतील अधिकारी राजेंद्र आनंदराव मोहिते (वय ४५, रा. कोरिवळे, जि. सातारा) यांच्या आत्महत्याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी संशयित आरोपी दुर्गेश लिंग्रस याच्यावरील गुन्ह्यांची माहिती कोल्हापूर पोलिसांकडून मागवली आहे. याशिवाय लिंग्रस याच्यासह बँकेतील कर्मचारी दीपाली लगारे आणि तिच्या कुटुंबीयांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याने त्यांची अधिक चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, मोहिते यांची सुसाइट नोट पोलिसांना मिळाली आहे.

कल्याण जनता सहकारी बँकेच्या कोल्हापुरातील शाखेत राजारामपुरीत दीपाली लगारे ही महिला कार्यरत आहे. या महिलेने सोमवारी (ता. १८) ४०६० रुपयांची रक्कम बँकेत जमा करण्याऐवजी स्वतःच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवली. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून ही बाब शाखाधिकारी मोहिते यांच्या लक्षात आली. यानंतर मोहिते यांनी लगारे याना बोलवून घेऊन ताकीत दिली, त्याचबरोबर माफीनामाही लिहून घेतला. शुक्रवारी (ता. २२) दिपाली लगारे हिच्यासह तिचा पती स्वरुप, सासू राजश्री, सासरा मोहन यांनी बँकेत जाऊन मोहिते यांना माफीनाम्याबद्दल शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यानेही मोहिते यांना मारहाण केली. बँकेत मारहाण केल्यानंतर पुन्हा बँकेच्या बाहेर बोलवून रस्त्यातही मारहाण केली. अपमानास्पद वागणूक दिल्याने मोहिते यांना धक्का बसला होता. यानंतर शनिवारी रात्री मोहिते यांचा मृतदेह उंब्रज येथील शुभम पेट्रोल पंपालगत सापडला होता. याबाबत मोहिते यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलिसांनी रविवारी दुर्गेश लिंग्रस याच्यासह इतर चौघांना अटक केले. सोमवारी कोर्टात हजर केले असता, या पाच जणांना कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

दरम्यान, उंब्रज पोलिसांना राजेंद्र मोहिते यांची सुसाइड नोट मिळाली आहे. दुर्गेश लिंग्रस आणि लगारे कुटंबीयांनी मारहाण केल्याचा उल्लेख चिठ्ठीत केला आहे, अशी माहिती उंब्रज पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रवींद्र शिंदे यांनी दिली. कोठडीदरम्यान पोलिसांनी लिंग्रस याची अधिक चौकशी सुरू केली आहे. लिंग्रस याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे. याशिवाय लगारे कुटंबीयांचीही चौकशी सुरू आहे

एक दिवसाची पोलिस कोठडी

मोहिते यांच्या आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश उदयराव लिंग्रस (वय ४०, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) याच्यासह पाच जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. उंब्रज पोलिसांनी रविवारी (ता. २४) लिंग्रस याला अटक केली होती, तर या गुन्ह्यातील कर्मचारी दीपाली स्वरूप लगारे (वय ३०), पती स्वरूप मोहन लगारे(३५), सासू राजश्री मोहन लगारे (६०) आणि सासरा मोहन गुंडू लगारे (६४ या चौघांनाही रविवारी रात्री उशिरा अटक करून सोमवारी कोर्टात हजर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बावडेकरांच्या स्मारकास मदत

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

‘राज्याच्या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचा मंत्री आहे. त्यामुळे मंत्री हाताखालील अधिकारी कितीवेळा बदलतात हे चांगले माहीत आहे. मात्र त्याकाळी हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी पाच छत्रपतींची सेवा केली. अशा कर्तृत्त्ववान अमात्यांचे स्मारक पन्हाळा येथे उभारण्यासाठी सरकार मदत करेल,’ असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार संपादित हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर स्मृतिग्रंथांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती अध्यक्षस्थानी होते. खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. बावडेकर स्मारक समितीतर्फे व्ही. टी. पाटील स्मृती भवनात हा कार्यक्रम झाला.

पाटील म्हणाले की, सलग ४६ वर्षे अमात्य बावडेकर यांनी पाच छत्रपतींची सेवा केली. त्यांचे कर्तृत्व ग्रंथरूपाने उशिरा का होईना उजेडात आणण्याचे महत्त्वाचे काम डॉ. जयस‌िंगराव पवार यांनी केले. बावडेकर कुटुंबांतील १३ वे वंशज नील पंडित-बावडेकर यांनी पन्हाळा येथे स्मारक उभारण्यासाठी ट्रस्टची स्थापना करावी. ‌हे स्मारक झाल्यास इतिहासाला उजाळा मिळणार आहे. त्यांच्यावर लिहिलेला ग्रंथ अधिकाधिक ग्रंथालय, शाळा, महाविद्यालयात पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत.’

खासदार संभाजीराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, जहागिरदारांच्या कामगिरीचा इतिहास तरूण पिढीला आणि पर्यटकांना एकाच छताखाली दाखवण्यासाठी रायगड येथे म्युझियम तयार करण्याचा संकल्प आहे. रामंचद्रपंत अमात्य बावडेकर यांचे स्मारक होण्यासाठी पालकमंत्री पाटील व मी निधी देईन. त्यासाठी नील पंडीत- बावडेकर यांनी सार्वजनिक ट्रस्टची स्थापना करावी.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी, संभाजी, राजाराम, ताराराणी, शाहू या पाच महाराजांची सेवा रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी केली. त्यांची काम‌गिरी ग्रंथातून डॉ. पवार यांनी पुढे आणली. तो ग्रंथ अधिकाधिक लोकांनी वाचला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, शाहीर अमर अडके, राजू राऊत आदी उपस्थित होते. नील पंडित- बावडेकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅट्स बुकिंगसाठी गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील विविध भागातील वैशिष्ट्यपूर्ण गृहप्रकल्प, त्यामध्ये इनडोअर गेम, वायफाय, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा, काही प्रकल्प परिसरात विकसित केलेली बाग, सोबत जीम व अॅक्युप्रेशर ट्रॅक अशा स्वप्नातील घरांची परिपूर्ती करणाऱ्या ‘टाइम्स प्रॉपर्टी शो’ला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी प्रदर्शनस्थळी भेट देत फ्लॅटस व रो बंगलोजची माहिती घेतली. हॉटेल सयाजी येथे आयोजित ‘टाइम्स प्रॉपर्टी शो’मध्ये कोल्हापूर, सांगली आणि पुणे येथील बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग आहे. मंगळवार (ता.२६) प्रदर्शनासाचा समारोप होणार आहे.

शहराच्या विविध भागात सध्या लहान मोठ्या गृहप्रकल्पांची उभारणी सुरु आहे. मार्केट यार्डसमोरील परिसर, कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहत, राजारामपुरी, कसबा बावडा, रमणमळा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, प्रतिभानगर, राजारामपुरी, संभाजीनगर, रामानंदनगर, रंकाळा तलाव परिसर अशा विविध भागात गृहप्रकल्प आणि टाऊनशीप संकल्पनेला मूर्तरुप मिळत आहे्. वन बीएचके, टूबीएचके, थ्रीबीएचके, रो बंगलोजचे प्रकल्प उभे राहात आहेत. शहरातील या अनेकविध गृहप्रकल्पांची नागरिकांना एकाच छताखाली माहिती मिळावी या उद्देशाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘टाइम्स ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टाइम्स प्रॉपर्टी शो’ चे आयोजन केले आहे. याशिवाय बँका आणि वित्तीय संस्थांचेही स्टॉल आहेत. प्रदर्शनात पुण्यातील गृहप्रकल्पांचे माहितीयुक्त स्टॉल आहेत.

‘टाइम्स प्रॉपर्टी शो‘मुळे नागरिकांना आपल्या आवडीनुसार घर खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. पूजा बिल्डर्सतर्फे ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेनुसार मोठ्या प्रमाणात घर बांधणीचे नियोजन आहे. या प्रकल्पात नागरिकांच्या आवडीचे लोकेशन, परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करण्याचा मानस आहे. या संदर्भात संस्थेमार्फत झालेल्या सर्व्हेत ३०० लोकांनी सहभाग नोंदविला.

पारस ओसवाल, पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स

‘व्हीटीपी’ने पुण्यामध्ये मोठ मोठे गृहप्रकल्प व व्यापारी संकुलची उभारणी केली. सध्या वाघोली येथे ११ जागेत भव्य प्रकल्पाचे काम सुरू असून तो सर्व सुविधांनीयुक्त आहे. पुण्यातील एनआयबीएम रोड येथे अत्याधुनिक असा गृहप्रकल्प साकारत आहे. कंपनीने यापूर्वी कात्रज, मगरपट्टा रोड, वाघोली, बाणेर, तळेगाव, खराडी येथे प्रकल्प साकारलेत.

स्वप्नील थोरात,व्हीटीपी रिअॅलटी


‘अनंत इस्टेट’तर्फे सध्या हॉकी स्टेडियमलगत अनंत प्राइड हा प्रकल्प असून त्यामध्ये वनबीएचके, टूबीएचके, व थ्रीबीएचके समावेश आहे. यामध्ये स्विमिंग पूल, बेबी पूल, मंदिर, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क आदी सुविधा आहेत. २७ वर्षांपासून बांधकाम व्यवसायात आहे. शहरातील विविध भागात रहिवासी व व्यापारी संकुलची निर्मिती केली आहे.

विवेकानंद पाटील, कार्यकारी संचालक, अनंत इस्टेट डेव्हलपर्स


गेल्या सात वर्षांत चार मोठ्या गृहप्रकल्पांची उभारणी केली आहे. दर्जेदार बांधकामामुळे अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. नागाळा पार्कात गुरुप्रसाद हाइटस या ९५ फ्लॅटसच्या प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. प्रदर्शनात दोन फ्लॅटसचे बुकिंग झाले.

दिगंबर इंगवले, गुरुप्रसाद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स


प्रदर्शनामुळे शहरातील विविध गृहप्रकल्पांची एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होत आहे. गृहप्रकल्पासंबंधीच्या विविध योजना, सवलती, रेरा कायद्यातील तरतुदींची विविध स्टॉलवरुन माहिती मिळाली. शहरातील वन बीचएफे, टूबीएचके, थ्रीबीएचकेसह रो बंगेलाजची सध्या स्थिती समजल्याने घर घेण्यासाठी नागरिकांना नियोजन करण्यास प्रदर्शन पूरक ठरेल.

दत्तात्रय माने, शिवाजी पेठ


शहरात विविध ठिकाणी गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी नागरिक पोहचू शकत नाहीत. ‘टाइम्स प्रॉपर्टी शो’च्या माध्यमातून सर्व गृहप्रकल्पांची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते. प्रॉपर्टी शोमुळे नागरिकांना हक्काच्या घराचा शोध घेणे सुलभ बनत आहे. नागरिकांसमोर तयार फ्लॅटसह, स्वतंत्र युनिटचे पर्याय उपलब्ध आहेत.

फिरोज सय्यद, राजारामपुरी


गृहप्रकल्प क्षेत्रासंबंधी माहितीयुक्त असे प्रॉपर्टी शो आहे. प्रॉपर्टी शोची व्यापकता जितकी वाढेल तितके ते ग्राहक हिताचे ठरेल. कारण एकाच छताखाली विविध प्रकल्पांचे सचित्र दर्शन घडते, त्याठिकाणच्या सुविधा, सोयी काय आहेत हे समजतात. अशा प्रॉपर्टी शोमध्ये शहरातील अधिकाधिक बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदवावा, जेणेकरुन सगळेच प्रकल्प एकत्र दिसतील.

नंदकुमार कोपर्डे, संभाजीनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचा तिरडी मोर्चा

$
0
0

गडहिंग्लज

राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथे अंगणवाडी कर्मचारी सभेमार्फत आंदोलन सुरु आहे. सोमवारी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिकात्मक तिरडी काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोदी सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंडे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत आंदोलनकर्त्यानी तिरडीला खांदा दिला. ‘पंकजा मुंडे हाय हाय’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

प्रलंबित मागण्यांसाठी ११ सप्टेंबरपासून राज्यभर अंगणवाडी सेविकांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. तर गडहिंग्लज येथे सोमवार (ता.१८) पासून प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढवत सभेच्यावतीने थाळी नाद मोर्चासह रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी सोमवारी सभेच्यावतीने पंकजा मुंडे यांची प्रतिकात्मक तिरडी मोर्चा काढण्यात आला.

दुपारी दीडच्या सुमारास प्रांत कार्यालयासमोरून प्रतिकात्मक तिरडी यात्रेला सुरवात झाली. यावेळी अंगणवाडी सेविकांनी तिरडीला स्वतः खांदा देत तिरडी यात्रेला सुरवात केली. तर संघटक बाळेश नाईक यांनी डोक्याला काळी ओढणी बांधून हातात मडके घेत यात्रेत सहभाग घेतला. शहराच्या मुख्य मार्गावरून पुढे वीरशैव चौक, नेहरु चौक, शिवाजी चौकातून नदीघाटावर स्मशानभूमीत मोर्चाची सांगता करण्यात आली.

दरम्यान, शहरातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संघटनांनी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. पोलिस पाटील संघटना, सरपंच संघटना यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठींबा दिला. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष अंजना शारबिद्रे, तालुकाध्यक्षा राजश्री बाबाण्णावर, सुरेखा गायकवाड, शांता कोरवी, मंजुळा कोरवी, माधवी देसाई, कल्पना शिंत्रे, वंदना साबळे, रंजना गोइलकर, रेखा कांबळे, सुवर्णा राऊत आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँक खात्यावरूनएक लाख लंपास

$
0
0

जयसिंगपूर

एटीएम कार्ड ब्लॉक झाले असल्याचे सांगून चोरट्याने रफिक दस्तगीर गवंडी (वय ३७) या तरूणाच्या बँक खात्यावरील ९९ हजार ९९९ रूपये लंपास केले. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. गवंडी यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जयसिंगपूर शाखेत खाते आहे. चोरट्याने १२ सप्टेंबर रोजी मोबाइलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. आपण बँकेतून बोलत असून एटीएम कार्ड ब्लॉक झाले असल्याचे सांगितले व पासवर्ड मागितला. यानंतर अज्ञात चोरट्याने १२ व १३ सप्टेंबर रोजी ९ वेळा गवंडी यांच्या बँक खात्यावरून ९९ हजार ९९९ इतकी रक्कम काढली. आपली फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास येताच गवंडी यांनी जयसिंगपूर पोलिसांत धाव घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक के.के.दीडवाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आलासमध्ये स्वाईनफ्ल्यूचे दोन रूग्ण

$
0
0

जयसिंगपूर

आलास (ता. शिरोळ) येथे स्वाईन फ्ल्यूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. दिपाली विजय बोरगावे (वय २५) व अर्णव विजय बोरगावे (वय ४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सरकारी आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामया पथकाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, दिपाली बोरगावे या माहेरी मिरज येथे गेल्या होत्या. त्या सासरी आलास येथे परतल्यानंतर त्यांना व मुलगा अर्णव यास सर्दी, खोकला ताप जाणवू लागला. यामुळे त्यांनी गावातील रूग्णालयात उपचार घेतले. मात्र यानंतरही आजार बळावल्याने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी तपासणीमध्ये स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळून आल्याने त्यांना सांगली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान, आलास येथे एकाच कुटुंबातील दोघांमध्ये स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत आलासमध्ये सर्व्हेक्षणाचे काम युध्दपातळीवर करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी पी.एस. दातार यांनी आलास येथे भेट देऊन आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एस. लांब यांच्या आरोग्य पथकाने घरोघरी सर्व्हेक्षण केले. ९६४ कुटुंबांची तपासणी करण्यात आली यामध्ये १५ तापाचे रुग्ण आढळून आले. त्यांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीखोरांना मोक्का लागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह जिल्ह्यात खंडणीखोरांच्या टोळ्यांची दहशत निर्माण झाली असून, फेरीवाल्यांपासून ते बांधकाम व्यावसायिकांपर्यंत अनेकांना रोजच खंडणीखोरांचा सामना करावा लागतो. थेट पोलिस अधीक्षकांकडे काही तक्रारी पोहोचल्यानंतर पोलिसांनी खंडणीखोरांविरोधात मोहीम सुरू केली आहे. खंडणीखोरांविरोधात तक्रारी करण्याचे आवाहन पोलिसांनी करताच तक्रारी दाखल होत आहेत. गेल्या दहा दिवसात खंडणीचे आठ गुन्हे दाखल झाले असून, २५ संशयितांवर कारवाई सुरू झाली आहे. यातील काही खंडणीखोरांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली पोलिस प्रशासनाकडून सुरू आहेत.

रस्त्यावरील फेरीवाले, फळविक्रेते, दुकानदार, चहा आणि वडापावचे गाडीवाले, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, आणि बांधकाम व्यावसायिकांना धमकावून स्वतःचे खिसे भरण्याचा उद्योग सध्या जोरात सुरू आहे. झोडपट्ट्यांमधील फाळकूटदादापासून ते व्हाइटकॉलर गुन्हेगारांपर्यंत अनेक खंडणीखोर यातून महिन्याला लोखो रुपये उकळतात. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि काही राजकीय लोकांच्या आश्रयामुळे आत्मविश्वास दुणावलेले खंडणीखोर शिरजोर बनले आहेत. दर महिन्याची खंडणी उकळल्यांतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम अशी कारणे शोधून हजारो रुपये जबरदस्तीने उकळले जातात. रोज उठून गुंडांचा त्रास नको या भावनेतून लोक पैसे देतात, मात्र यातून निर्माण झालेली दहशत गुन्हेगारी घटना वाढवण्यासही कारणीभूत ठरत आहे. कोल्हापूर शहरासह इचलकरंजीत खंडणीखोरांच्या टोळ्याच सक्रीय आहेत.

बदनामीची भीती घालणे, कुटंबीयांच्या जिवाला धोका निर्माण करणे, विरोधात आंदोलने करण्याचा धाक दाखवून खंडणी वसूल केली जाते. सहज उपलब्ध होणाऱ्या पैशातून खंडणीखोरांच्या टोळ्याही आमने –सामने येत आहेत. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून जाणे, कापड दुकानांमध्ये फुकटात खरेदी करणे, वाइन शॉपी, बिअर बारमध्येही यांची दादागिरी सुरू आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी खंडणीखोरांविरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत असून, गेल्या दहा दिवसात जिल्ह्यात खंडणीचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमधील २५ गुन्हेगारांवर सध्या पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.

खंडणीखोरांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने खंडणीचे गुन्हे पोलिस ठाण्याबाहेर मिटवण्याचे प्रकार थांबले आहेत. पोलिस ठाण्याबाहेर परस्पर गुन्हा मिटवण्याचा प्रकार घडल्याचे लक्षात येताच संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे.

पोलिस अधीक्षकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिस ठाण्यांमध्येही खंडणीच्या गुन्ह्यांबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे. गेल्या दहा दिवसात शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यात खंडणीचे प्रत्येकी दोन गुन्हे दाखल झाले आहेत, तर करवीर, चंदगड, शिवाजीनगर आणि शहापूर या पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. या आठ गुन्ह्यातील २५ संशयितांना अटक करून त्यांच्यावर पुढील कारवाई सध्या सुरू आहे. यात गेल्या दोन ते तीन महिन्यातील घटनांचाही समावेश आहे. पोलिसांच्या आवाहनानुसार नागरिक गुन्हे दाखल करण्यास पुढे येत असल्याने येणाऱ्या काही दिवसात खंडणीखोरांविरोधात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

बांधकाम व्यावसायिक टार्गेट

शहराची वाढ सुरू असून अनेक ठिकणी बांधकामे सुरू आहेत. बांधकामास परवानगी घेण्यापासून ते प्रकल्प पूर्ण होईपर्यंत बांधकाम व्यावसायिकांना खंडणीखोरांचा त्रास सहन करावा लागतो. यात काही स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेतील अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. खंडणीखोरांना टिप देऊन टक्केवारीवर पैसे घेतले जातात. या प्रकाराला वैतागून काही बांधकाम व्यावसायिकांनी शहरात काम करणेच थांबवले आहे. खंडणीखोरांचे काही पोलिसांशीही साटेलोटे असल्याचा आरोप केला जातो.

खंडणीखोरांवर मोकाची कारवाई

खंडणीखोरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. वारंवार अशा गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयितांवर मोका अंतर्गत कारवाई होणार आहे. यासाठी पोलिस अधीक्षकांनी सर्व पोलिस ठाण्यांकडून रेकॉर्डवरील खंडणीखोरांची माहिती मागवली आहे. खंडणीखोरांची दहशत मोडून काढण्यासाठी ही कारवाई केली जाणार आहे. यातून अनेक खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी व्यक्त केला आहे.

खंडणीचे गुन्हे

शाहूपुरी – २

राजारामपुरी - २

करवीर - १

चंदगड – १

शिवाजीनगर – १

शहापूर – १

कोट – काही खंडणीखोरांवर मोकाअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी खंडणीविरोधात जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा १०० नंबरवर तक्रारी द्याव्यात. तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल. निनावी पत्र पाठवले तरीही याची दखल घेतली जाईल. खातरजमा करून खंडणीखोरांविरोधात कारवाई होणारच.

संजय मोहिते – पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ कोटींचा नफा, चार टक्के लाभांश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यंदा नोटाबंदीसारखा निर्णय होऊनही एका वर्षात बँकेकडे २६७ कोटी, ७१ लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. बँकेला ढोबळ नफा ८७ कोटी, ८७ लाखांचा झाला आहे. तर निव्वळ नफा १२ कोटी, ४५ लाखांपर्यंत पोहोचला आहे. नावीन्यपूर्ण कर्जयोजना, कर्जवसुली आणि काटकसरीच्या कारभारांमुळे बँकेची स्थिती भक्कम असल्याने यावर्षी संस्था सभासदांना चार टक्के लाभांश देण्याबरोबर पुढील वर्षी १२ टक्क्यापेक्षा जास्त लाभांश आणि कर्मचाऱ्यांना बोनस देणार असल्याची घोषणा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७९ व्या सभेत चेअरमन हसन मुश्रीफ यांनी केली. सुमारे दीड तास चाललेल्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे देत सर्व विषय मंजूर करत सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दरम्यान, कर्जमाफीच्या जाहीर चावडी वाचनाला विरोध करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुश्रीफ म्हणाले, ‘जाहीर चावडी वाचनामुळे गावागावात वादाचे प्रसंग उद्भवणार आहेत. तसेच यामुळे शेतकऱ्यांची बदनामी होणार असून एखादी तक्रार झाल्यास संबंध‌ित शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारने चावडी वाचन रद्द करावे. कर्जमाफीच्या बदलणाऱ्या आध्यादेशांमुळे सरकारी अधिकारीच गोंधळून गेले आहेत. सोशल मीडियाद्वारे त्यांना आध्यादेशाची माहिती दिली जात आहे. मार्च २०१७ मध्ये घेतलेले कर्ज ३० जुलैपर्यंत फेडले तरच प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याची अट घातली आहे. प्रत्यक्षात पीककर्ज परतफेड करण्याची मुदत जुलै २०१८ पर्यंत आहे. या जाचक अटींमुळे जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत.

३१ मार्च, २०१७ पर्यंत घेतलेले पीककर्ज जुलैपर्यंत भरले तरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. प्रत्यक्षात कर्जपरतफेड मुदत ३० जुलै, २०१८ असताना चार महिन्यात शेतकरी कसे कर्जपरतफेड करतील, असा प्रश्न बाबासाहेब देवकर यांनी उपस्थित केला. किसन कुराडे यांनी ओटीएसमध्ये सहभाग घेतलेल्या संस्थांना पुन्हा कर्जपुरवठा करण्याची मागणी केली. रमेश कामिरकर यांनी कर्मचाऱ्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच कमीतकमी व्याजदरात गृहकर्ज देण्याची मागणी केली. जगदीश पाटील, एम. आर. चौगुले, एकनाथ चव्हाण, भीमराव चिमणे, रघुनाथ पाटील यांनी प्रश्न विचारले.

बँकेचे सीईओ पी. बी. चव्हाण यांनी स्क्रीनवर विषयांचे वाचन केले. सभेला संचालक पी. एन. पाटील, संजयसिंह मंडलिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर, पी. जी. शिंदे, अनिल पाटील, आर. के. पोवार, संतोष पाटील, सर्जेराव पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजू आवळे, निवेदिता माने, उदयानी साळुंखे, प्रताप माने, असिफ फरास आदी उपस्थित होते. व्हाइस चेअरमन विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी आभार मानले.

न्युट्रियन्सबाबत संचालकांचे मौन

चंदगड येथील दौलत कारखाना न्युट्रियन्स अॅग्रो फूड्स कंपनीला चालवण्यास दिला. पण कंपनीने अद्याप उत्पादकांना एफआरपीची रक्कम दिलेली नाही. कर्मचाऱ्यांचा पगारही थकीत आहे. जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी अंतिम बिलाची आकडेमोड करत असताना आम्ही अद्याप पहिल्या बिलाच्या प्रतीक्षेत असून कारखाना चालवण्यास कंपनी अपयशी ठरल्याने कंपनीबरोबरचा करार रद्द करुन फेरटेंडर काढण्याची मागणी राजेश नरसिंगराव पाटील यांनी केली. याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला. पण संचालकांनी यावर मौन धरणे पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहिती अधिकाराचा भंग

$
0
0

कोल्हापूर

येथील जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात माहिती अधिकार अंमलबजावणीत कोलदांडा घातला जात आहे. माहिती अर्जासोबत रोख पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर अर्ज न स्वीकारता ‌थातूरमातूर कारणे सांगत संबंधितास परत पाठवले जाते. पावती देण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नाही, असे माहिती अधिकारीच सांगत असल्याने ग्रामपंचायत विभाग माहिती अधिकारच गुंडाळून ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती लपवण्यासाठी अर्ज देण्यासाठी येणाऱ्यांची विविध प्रकारे अडवणूक करीत राजरोसपणे माहिती अधिकार कायद्याचा भंग केला जात आहे.

जिल्ह्यात १०३० ग्रामपंचायती आहेत. केंद्र, राज्य सरकारचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जात आहे. ‌गावच्या तिजोरीत लाखांत आणि कोटींत निधी जमा होत आहे. परिणामी तिजोरीत पैसे पाहून डल्ला मारण्याची प्रवृत्ती वाढते आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती ते जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागापर्यंत लाचखोरीची साखळी फोफावली आहे. दलित वसती सुधार, स्मशानशेड दुरूस्ती, नव्याने बांधकाम, समाज मंदिर बांधकाम, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, रस्ते, गटारच्या कामात लाचेचा टक्का वाढला आहे. कामे निकृष्ट झाली असून अनेक ठिकाणी स्मशानशेडचे बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आले. त्या गैरकारभार, खाबुगिरीची साखळी विरोधात जागरूक ग्रामस्थ तक्रार करीत आहेत.

दरम्यान, गैरकारभार, भ्रष्टाचार झाला आहे, चौकशी करून दोषी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवकांवर कारवाई करा, असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले तरी वेळेत चौकशी होत नाही, कारवाई होत नाही. उलट तक्रारदारास हेलपाटे मारायला लावले जाते. बार, चहाच्या टपरीचे बिल भागविण्याच्या बदल्यात दोषी ग्रामसेवक, पदाधिकाऱ्यांना क्लिन चीट मिळते. अशा कारभाराची माहिती माहिती अधिकाराखाली तक्रारदार, अर्जदार मागतात. त्यावेळी प्रथम म‌ाहिती अधिकारी अर्जासोबत तिकिट लावून आणण्याची सक्ती करतो. प्रत्यक्षात माहिती अधिकारातील तरतुदीत तिकिट न लावता दहा रूपये रोख घेऊन पावती देणे बंधनकारक आहे. मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.

...............................

चौकट

आदेश बेदखल

चार महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सामान्य प्रशासन विभागातील माहिती अधिकाराच्या पैशावरील डल्ल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य मा‌हिती अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी माहिती अधिकाराखाली पैसे भरून घेतल्यानंतर पावती देण्याचा आदेश सर्व विभागाला दिला. ग्रामपंचायत विभागान हा आदेश बेदखल करून मनमानी सुरू केली आहे.

...............................

कारभार ‘गोलगोल’

पारदर्शक कारभारासाठी माहि‌ती अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र आपला ‘गोलगोल’ कारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून ग्रामपंचायत विभाग माहिती अधिकाराचा फज्जा उडवत आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या वादग्रस्त तक्रारी दाबून ठेवल्याचा आरोप होत आहे. वर्षानुवर्षे कारवाई न करता दोषींबरोबर अर्थपूर्ण वाटाघाटी करीत काही कर्मचारी, अधिकारी मालामाल होत आहेत.

.........................

कोट

‘माहिती अधिकारामधील तरतुदींनुसार अर्जासोबत दहा रूपये घेऊन पावती देणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेमधील जे माहिती अधिकारी त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. त्यांना जाब विचारण्यात येईल. कारभार स्वच्छ, गतिमान असेल तर माहिती लपवण्याचा खटाटोप कशासाठी ?

धनाजी चुडमुंगे, अध्यक्ष, अकुंश संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images