Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सुवर्णपालखीतून नगरप्रद​क्षिणा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांच्या सुविधांसह सुरक्षा व उत्सवादरम्यान होणाऱ्या सर्व पूजाविधींसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाबाहेर भाविकांसाठी दर्शनमंडप उभारण्यात आला आहे. तर पावसाची शक्यता गृहित धरून त्यानुसार व्यवस्था करण्यात आली आहे.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देवस्थान समिती, पुजारी यांची सोमवारी समन्वय बैठक झाली. यावेळी देवीच्या विविध रूपातील पूजा बांधण्याचा​ आणि नवरात्र काळात अंबाबाईची मिरवणूक सुवर्णपालखीतून काढण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, समिती सदस्य सुभाष वोरा, शिवाजीराव जाधव, संगिता खाडे, प्रमोद पाटील, सचिव विजय पोवार, शिवाजीराव साळवी, सुदेश देशपांडे, धनाजी जाधव, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समिती व प्रशासन, सामाजिक संस्था आणि पुजारी यांच्या विविध बैठका सोमवारी दिवसभर घेण्यात आल्या. अंबाबाईला परिधान करण्यात आलेल्या घागरा -चोळी प्रकरणामुळे देवीच्या विविध रुपातील पूजा यंदाच्या नवरात्रात बांधल्या जाणार का? याबाबत भाविकांमध्ये संभ्रम होता. परंतु देवस्थान समिती व श्रीपूजक यांच्यातील समन्वय बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होऊन पारंपरिक पूजा बांधण्याबाबत सहमती देण्यात आली.

दरम्यान, देवस्थान समिती, महापालिका प्रशासन, विद्युत मंडळ, वाहतूक पोलिस, सेवाभावी संस्था या सर्वांची संयुक्त बैठक देवस्थान समितीच्या कार्यालयामध्ये झाली. यावेळी उत्सवामधील कामाचे स्वरुप, नियम व अन्य गोष्टींबाबत सूचना देण्यात आल्या. महापालिका व्यवस्थापनातर्फे मंदिराच्या आवारातील स्वच्छतागृहे, अन्य ठिकाणांची स्वच्छता व औषध फवारणी करण्याची सूचना करण्यात आली. तर वाहतूक पोलिसांकडून मंदिराच्या चारही दिशेला बॅरीकेट्स लावण्याची तयारी करण्याचे नियोजन केले.

नवरात्र काळात शहरातील मुख्य मार्गावर तसेच शहरात येणाऱ्या रस्त्यावर ७० दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत. अग्निशमन दलाकडूनही उत्सव काळात घाटी दरवाजा येथे २४ तास अग्निशमन बंब तैनात केला जाणार आहे. तर विद्युत विभागाकडून मंदिरामध्ये दोन फेज विद्युततारा कायमस्वरुपी सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे उत्सवादरम्यान विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी ही सोय करण्यात येणार आहे. तर दोन विद्युत कर्मचारी मंदीरात व दोन आवारात कायमस्वरुपी सेवा देणार आहेत.

सुवर्णालंकाराची स्वच्छता

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपामध्ये सुवर्णालंकाराची स्वच्छता करण्यात आली. नवरात्रोत्सवात देवीला दररोज विविध अलंकारांची सालंकृत पूजा बांधली जाते. त्यामुळे उत्सवापूर्वी मंदिर व्यवस्थापनाकडून ही स्वच्छता करण्यात आली. सोमवारी दुपारी अंबाबाईच्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये किरीट, मंगळसूत्र, ठुशी, मोरपक्षी, मोहनमाळ, चंद्रहार, म्हाळुंग, तन्मणी यासारख्या सोन्याच्या आभूषणांची स्वच्छता दिवसभर करण्यात आली. या स्वच्छतेबरोबरच मंदिराच्या आवारातील वास्तू, भिंती व अन्य छोट्या मंदिरांची स्वच्छता दिवसभर सुरू होती. घटस्थापनेच्या पूर्वदिनापर्यंत म्हणजे बुधवारपर्यंत मंदिरातील साफसफाई तसेच स्वच्छतेची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

सेवाभावी संस्थांना ओळखपत्र

नवरात्रोत्सवामध्ये मंदिरातील भाविकांच्या मदतीसाठी व गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना व स्वयंसेवकांना देवस्थान समितीच्यावतीने ओळखपत्रांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक तेवढेच स्वयंसेवक मंदिरामध्ये तैनात करण्याचे आवाहन केले आहे. असा निर्णय देवस्थान समिती व सेवाभावी संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला व्हाईट आर्मी, अनिरुद्ध बापू संस्था, जीवनज्योती, अॅस्टर आधार, अॅपल हॉस्पिटल, महालक्ष्मी भक्त मंडळ यासह विविध संस्था उपस्थित होत्या.

दर्शनमंडप होणार सुरक्षित

नवरात्र काळात येणाऱ्या पावसाची शक्यता गृहित धरून दर्शन मंडप भाविकांसाठी सुरक्षित करण्यात आला आहे. मंडपावर पत्र्याचे छत करण्यात आले आहे. तसेच दर्शनरांगेतून भाविकांना व्यवस्थित पुढे जाता यावे यासाठी बॅरिकेटस लावण्याचे काम सुरू आहे. दर्शनरांगेत प्रतीक्षा करणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान व्यवस्थापनातर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्याचीही तयारी सुरू आहे. दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ भाविक, गर्भवती यांच्यासाठी दर्शनरांगेत काही अंतरावर बसण्यासाठी टेबल व्यवस्था करण्याचेही नियोजन देवस्थान व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोंडिग्रेत नवविवाहितेची आत्महत्या

$
0
0

जयसिंगपूर

कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील नवविवाहितेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. प्रज्ञा रोहित बोरगांवे (वय २४) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, रविवारी रात्री मंगलनगरमधील बोरगावे कुटूंबिय जेवण आटोपून झोपले. यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पती रोहित झोपल्याचे पाहून प्रज्ञाने घराजवळ असणाऱ्या मादनाईक यांच्या विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रज्ञा ही मूळची इचलकरंजी येथील असून तिचा अवघ्या चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. हा विवाह रक्तदान, वृक्षारोपण यासह विविध सामाजिक उपक्रमांनी करण्यात आला होता. मात्र अवघ्या चार महिन्यात प्रज्ञाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणीय प्रकल्पांचा विसर

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

कोल्हापूर : महापालिकेमार्फत पर्यावरण संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्यावर होणारी प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडतात. मात्र पर्यावरण विषयक अहवाल तयार करणाऱ्या कंपनीला महापालिकेच्या पर्यावरण विषयक प्रकल्प आणि उपक्रमांचा विसर पडला. महापालिकेच्या प्रकल्पाशिवाय पर्यावरण विषयक अहवाल तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर संबंधित कंपनीला नव्याने अहवाल तयार करावा लागला. यामुळे यंदाचा शहर पर्यावरण विषयक अहवाल मुंबई प्रांतिक अधिनियमातील कलम ६७ (अ) नुसार ३१ जुलैपर्यत मुदतीत तयार होऊ शकला नाही. कालावधी संपून दीड महिने उलटले तरी पर्यावरणविषयक अहवालाला अंतिम स्वरुप मिळाले नाही. मसुदा अहवालातील त्रुटी दुरुस्त करुन नाशिक येथील मंत्राज ग्रीन सोर्सेस कंपनीने नव्याने अंतिम अहवाल महापालिकेला सादर केला आहे.

महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार शहरातील घनकचरा व्यवस्थपनापासून पर्यावरण विषयक उपक्रम, भविष्यातील प्रकल्पांचा लेखाजोखा मांडण्यात येणारा हा अहवाल ३१ जुलैपूर्वी महासभेची मान्यता घेऊन सरकारकडे सादर करावा लागतो. महापालिकेकडून दरवर्षी शहराचा पर्यावरण विषयक अहवाल तयार केला जातो. महापालिकेने यंदाचा आणि पुढील वर्षाचा (२०१७-१८) अशा दोन वर्षाचा शहर पर्यावरण विषयक अहवाल तयार करण्याचे काम नाशिकच्या कंपनीला दिले आहे. दोन वर्षाच्या अहवालासाठी महापालिका १७ लाख रुपये मोजणार आहे. राज्य सरकारने, स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण उत्पन्नाच्या २५ टक्के रक्कम पर्यावरण विषयक प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण अशा पर्यावरणपूरक उपक्रमासाठी खर्च करणे बंधनकारक केले आहे.

नाशिक येथील मंत्राज ग्रीन रिसोर्सेसमार्फत २०१६-१७ या वर्षासाठी पर्यावरण विषयक अहवालाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला होता. हा मसुदा अंतिम करण्यापूर्वी प्रशासन आणि शहरस्तरीय मॉनिटरिंग कमिटीपुढे सादर करावा लागतो. कंपनीमार्फत २१ ऑगस्ट रोजी सादरीकरण झाले. अहवालामध्ये ​अनेक प्रकारच्या त्रुटी होत्या. पर्यावरण संवर्धन विषयक कृती आराखडा निश्चित नाही. शहरातील हरित पट्ट्यांचा समावेश केला नव्हता. पर्यावरण विषयक प्रकल्प, शहरातील सद्यस्थिती याविषयी ठोस माहिती नसल्याचे आक्षेत मॉनिटरिंग कंपनीने नोंदविले होते. शिवाय अहवालातील अशुद्ध लेखनाकडेही सदस्यांनी लक्ष वेधले होते. काही अनावश्यक गोष्टींचा समावेश, नकाशांचा अभाव, नदी, नाल्यांचे नमुने घेताना मोघम माहितीच्या आधारे अहवाल तयार करण्यात आल्याचा आक्षेपच समिती सदस्यांनी केला होता. महापालिका प्रशासानने, संबंधित कंपनीला त्यामध्ये दुरुस्त करुन नव्याने अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. मंत्राज ग्रीन रिसोर्सेस कंपनीने मसुदा अहवालातील त्रुटी दुरुस्त करून अंतिम अहवाल महापालिकेला सादर केल्याचे वृत्त आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन पर्यावरण विषयक सरकारला सादर करावा लागतो. या अहवालातील माहिती ऑनलाइन उपलब्ध करावी लागते.

पर्यावरणीय प्रकल्पांचाच विसर

महापालिकेतर्फे सध्या शहरात घनकचऱ्याचे वर्गीकरण, कचऱ्यापासून कंपोष्ट खत निर्मिती प्रकल्प सुरू आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी कार्यान्वित आहे. सरकारच्या आदेशानुसार एकूण उत्पन्नाच्या २५ टकके रक्कम पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व आरोग्यावर खर्च होते या साऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांचा समावेश अहवालात केला नसल्याचेही निदर्शनास आले होते. कंपनीकडून समाधानकारक व योग्य अहवाल तयार झाल्या नसल्याचा आक्षेपही अधिकारी व पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांकडून नोंदविले होते. नव्या अहवालात या बाबी समाविष्ठ कराव्यात अशा सूचना केल्या होत्या.

अहवालातील त्रुटी दुरुस्त करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. कंपनीकडून महापालिका प्रशासनाकडे नव्याने अहवाल सादर झाला आहे. येत्या आठ दिवसात आयुक्त व पर्यावरणाशी निगडीत समितीसमोर सादर केला जाईल. त्यानंतर महासभेच्या मान्यतेसाठी सादर होईल.

समीर व्याघ्रांबरे, पर्यावरण अभियंता महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी सुविधेसाठीइचलकरंजीत मोर्चा

$
0
0

इचलकरंजी

शहापूर पूरग्रस्त वसाहतीतील अपुऱ्या घरांचे बांधकाम पुनर्विकास योजनेंतर्गत पूर्ण करून द्यावे, या मागणीसाठी भागातील नागरिकांनी सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला.

नगरसेवर किसन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील वॉर्ड नं.२३ या भागात पूरग्रस्त वसाहतीतील नागरिकांसाठी सन २०१५ साली पुनर्वसन योजना मंजूर झाली होती. त्यावेळी त्याठिकाणी असलेले पत्र्याचे शेड पाडून घरांच्या बांधकामास सुरुवात केली होती. मात्र अद्याप हे बांधकाम पूर्णत्वास गेलेले नाही. नगरपालिकेच्या या गलथान कारभारामुळे भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे बांधकाम तातडीने पूर्ण करुन घरे बांधून मिळावीत यासाठी भागातील नागरिकांनी नगरसेवक किसन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांना निवेदन दिले. या भागाचे पुनर्वसनाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही तर नगरपालिकेसमोर नागरिक आमरण उपोषणास बसतील, असा इशारा दिला आहे. यावेळी मनोज कांबळे, मंगल कदम, सुजाता कांबळे, फातिमा शेख, ताजुद्दीन मकानदार, सचिन सूर्यवंशी, आनंदा मोहिते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षित जागा संपादनात पाच कोटींचा घोटाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने रमणमळा परिसरात प्राथमिक शाळेसाठी आरक्षण टाकलेल्या जागेचे संपादन करण्याच्या नावाखाली ५,७९,३४,००० रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप महापालिकेत्तील सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. महापालिकेतील अधिकारी, भूसंपादन कार्यालय, जिल्हाधिकारी आणि भूमि अभिलेखांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा आरोप शेटे यांनी केला.

या जागेचे ले आउट करताना महापालिकेला ही जागा मोफत मिळाली असती, पण अधिकाऱ्यांनी त्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महापालिकेला जागा संपादनासाठी कोट्यवधींचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे सांगून याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेटे यांनी केली.

ते म्हणाले, ‘जागामालक रमेश बाजीराव पाटील व इतरांच्यावतीने राहुल बाळासाहेब कारदगे यांनी महापालिकेला कलम १२७ नुसार १८ मे २०१५ रोजी पर्चेस नोटीस (खरेदी सूचना पत्र) दिले. जागेवर महसूल विभागाचा ९,२२,५७,००० रुपयांचा इनाम रकमेचा बोजा आहे. त्याकडे दुर्लक्ष करत सहायक संचालक धनंजय खोत व सहायक अभियंता पद्मल पाटील यांनी जागेचे चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करत ५,१९,३४,००० रुपये किंमत निश्चित केली.’

शेटे म्हणाले, ‘संबंधित जागा २७०९.४२ चौरस मीटर असताना ३४३३.६७ चौरस मीटर क्षेत्र दाखविले. तत्कालीन आयुक्त विजय खोराटे यांनी कसलीही चौकशी न करता प्रस्तावावर सही केली. आरक्षित जागा संपादनाचा ठराव सर्वसाधारण सभेकडे सादर झाल्यावर यातील त्रुटी दाखविल्या. सदस्यांनी उपसूचना दिली. मात्र त्याचा विचार न करता अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी संगनमताने जागेचे वटमुखत्यार करून कारदगे यांना पैसे देण्यासाठी पहिल्या हप्त्यात १,९५,३७,००० रुपयांच्या रकमेचा धनादेश काढून भूमी संपादन अधिकाऱ्यांकडे रक्कमही जमा केली.

०००००००००००००००

​भूसंपादन कायदेशीर

दरम्यान, ही प‌्रक्रिया कायदेशीरच असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. ‘आरक्षित जागा भूसंपादन करण्याचा प्रस्ताव १४ ए​प्रिल २०१६च्या सभेत मान्य झाला. त्या मान्यतेप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भूसंपादनाचा प्रस्ताव सादर केला. भूसंपादनाची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरु आहे. जमिनीचे इनाम व सरकारी भार, थकबाकी असल्यास त्या संबंधाने पूर्तता झाल्यानंतर बोजाविरहीत जमीन महापालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. संबंधित मिळकतधारकांनी बँकेचे सर्व कर्ज भागविल्याबाबत बँकेचा ना हरकत दाखलाही सादर केला आहे. आरक्षणबाधीत क्षेत्र नवीन भूसंपादन कायद्यातील मुदतीत संपादन करण्यासाठी महापालिकेने सुरु केलेली कार्यवाही कायदेशीर आहे,’ असा खुलासा नगररचना सहायक संचालक धनंजय खोत यांनी केला आहे. त्यांनी आयुक्तांना ही माहिती सादर केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटो एक्स्पोला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संततधार पावसातही सोमवारी, ऑटो एक्स्पो प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी ग्राहकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. आपल्या बजेटमधील ब्रँडेड व अत्याधुनिक सुविधा असलेल्या कारची निवडही अनेकांनी पक्की केल्याने स्टॉल्सवर बुकिंग सुरू झाल्याचे पहायला मिळाले. चार दिवस सुरू असलेल्या प्रदर्शनाला ७५ हजारांहून अधिक कार शौकिनांनी भेट दिली. त्यामुळे आगामी दसरा-दिवाळी सणाच्या कालावधीत कार उद्योगाला पुन्हा सुगीचे दिवस येतील अशी चाहूल प्रदर्शनात पहायला मिळाली. रेडिओ मिर्ची ९८.३ आणि कोल्हापूर ऑटोमोबाइल्स डीलर्स असोसिएशनच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र टाइम्स या प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर होते.

नागाळा पार्क येथील एस्तेर पॅटन संस्थेच्या मैदानावर गेले चार दिवस ऑटो एक्स्पो प्रदर्शनाला उदंड प्रति​साद मिळाला. ६४ स्टॉल्सवर मोपेड, सुपर बाइक्स, बेसिक कार, प्रिमियर मॉडेल्स कार एका छताखाली पाहण्याची संधी मिळाल्याने पहिल्या दिवसापासून कार शौकिनांकडून प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला. ​शनिवारी व रविवारी हाऊसफुल्ल गर्दी पहायला मिळाली. सोमवारी शेवटच्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळपासून गर्दी होती. इंजिनी​अरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ऑटोमोबाइल क्रिएशनची संधी दिल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. प्रत्येक स्टॉलजवळ जाऊन कारची वैशिष्ट्ये, नवीन तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक दिसत होते.

दुपारनंतर संततधार पावसास सुरुवात होऊन प्रदर्शनाला भेट देणाऱ्याच्या उत्साहात किंचितही फरक पडले नव्हता. ऑडी, डुकाटी, जॅग्वार, लँडरोव्हर, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू या कारच्या स्टॉलजवळ सर्वांची पावले थबकत होती. महागड्या कारबरोबर सुपर बाइक्ससोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली होती. औद्योगिक वसाहतींना सोमवारी सुट्टी असल्याने उद्योजक, कारखानदार, इंजिनीअर आदी क्षेत्रातील मंडळींनी एक्स्पोला भेट देणे पसंत केले. पितृ पंधरवड्यामुळे खरेदी थोडी मंदावली असली तरी असली तरी बुकिंगसाठी स्टॉलजवळ विचारणा होत होती. बँका व वित्तीय संस्थांच्या स्टॉलजवळ कर्ज सुविधेची माहिती घेतली जात होती. नवीन ऑफर्सची विचारणाही सुरू होती. सायंकाळी सातच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी असूनही प्रकाशझोतात प्रदर्शनस्थळ उजळून निघाले. दसरा व दिवाळी या सणांच्या कालावधीत वाहन विक्रीला गती येईल असे चित्र दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजसेवेचा वारसा जपा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोल्हापुरामध्ये असताना केलेल्या कष्टाच्या जोरावरच यश मिळवले. येथे प्रचंड उर्जा आहे. या उर्जेचा वापर करून तरूणाईने कष्टांच्या जोरावर यश साध्य करावे’, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन यांनी केले. शिवाजी विद्यापीठामध्ये एनजीओ ‘कम्पॅशन २४’द्वारेरे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अभिनेते आर. माधवन कार्यक्रमाला उपस्थित असल्याने तरुणाईची प्रचंड गर्दी होती. यावेळी संस्थेच्यावतीने दोन हजार मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले.

आर. माधवन म्हणाले, ‘कॉलेज शिकत असताना कोल्हापूरमध्ये मी मोठ्या प्रमाणात कष्ट केले. त्यामुळेच भविष्यात मला यश मिळाले कोल्हापूरसारखी उर्जा इतर कोणत्याही शहरात नाही. त्यामुळे येथील लोकांनी जगभर नाव केले आहे. येथ समाजसेवेचा, मदतीचा वारसा आहे. हाच वारसा जपत ही संस्था काम करीत आहे. दोन हजार मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणे ही कौतुकास्पद बाब आहे. शिक्षणाचा उपयोग समाजासाठी केला पाहीजे. छोट्या छोट्या बदलातूनच प्रत्येक व्यक्तीचे चांगले व्यक्तीमत्व घडत जाते. त्यातूनच यशाकडे वाटचाल होते. राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना अनेक गोष्टी शिकता आल्या. त्या काळात भेटलेल्या लोकांना मी आयुष्यभर विसरू शकलो नाही.’

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील म्हणाले, ‘कॉलेज शिक्षण घेत असताना माझा सोबती आर. माधवन हा माझा आदर्श होता. त्याच्यामध्ये जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी होती. तुम्ही विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्याची ब्ल्यू प्रिंट आताच बनवावी. स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःच्या आत्मविश्वासावर पुढील वाटचाल करावी. मोबाइलवर किती वेळ घालवायचा हे तुम्हीच ठरवा. त्यामध्ये आयुष्यातील किमती वेळ वाया घालवू नका. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची कायम जाणीव ठेवा.’

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘दोन हजार मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा उपक्रम खूप चांगला आहे. मिलींद धोंड हे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या कार्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल.’

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ‘समाजातील वंचित घटकांसाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहीजे. मुलींच्या शिक्षणासाठी घेण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.’

यावेळी तुळशीच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. ‘वुई केअर’ कोल्हापूर संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या निर्भया पथकाचा सत्कार करण्यात आला. तर ज्या मुलींना ‘कम्पॅशन २४’कडून मदत करण्यात येत आहे, त्यापैकी काही मुलींनी मनोगत सादर केले. महिला छेडछाडीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणारे पथनाटय सादर करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलस​चिव व्ही. डी. नांदवडेकर, कौस्तूभ मराठे, डॉ. डी. आर. मोरे, प्रवीण घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुशील रॉयगांधी यांनी आभार मानले.

आर. माधवनची मराठीत सुरवात.....

‘कसं काय कोल्हापूर? विद्यापीठात ओळखीचे चेहरे पाहून बरे वाटले’, असे म्हणत आर. माधवन यांनी भाषणाला सुरवात केली. त्यावेळी उपस्थित तरुणाईने जल्लोष केला. तो सुरवातीची काही वाक्ये मराठीत बोलला. यात कोल्हापूर आणि राजाराम महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. तसेच या काळातले आपले दिवस हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहे’ असे त्यांनी सांगितले.


विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे पाटील यांनी त्या काळातील राजाराम कॉलेजच्या आर. माधवन सोबतच्या आठवणी सांगताना, ‘आर. माधवन हे सर्वांना इंग्रजी शिकवत असत’ असे सांगून ते मितभाषी, संयमी, शांत असल्याचे सांगून त्यावेळी मी त्यांना गुरू मानतो’ असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक नोव्हेंबरपासून साखर हंगाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या बैठकीत एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्नाटकात जाणारा ऊस रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे भेट घेणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कर्ज घेणाऱ्या साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली. राज्य उसदर नियंत्रण समितीची बैठक होण्यापूर्वीच साखर कारखाने सुरू करण्याची घोषणा केल्याने उसदरांवरुन संघर्ष होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेत सोमवारी कर्जदार साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीचा वृत्तांत सांगितला. इस्टिट्यूटमध्ये झालेल्या बैठकीत माजी कृषी मंत्री पवार यांनी एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी राज्यातील सर्व कारखान्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बैठकीत साखर संघाकडून सरकारला एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास मान्यता घेण्याची मागणी केली आहे. तसेच कर्नाटककडे जाणाऱ्या उसास निर्बंध लावण्यासाठी सरकारीपातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी कारखान्यांनी गळीत हंगामाचे नियोजयन करण्याच्या सुचना दिल्या. केंद्र सरकारने २१ टक्के सप्टेंबरअखरे तर ऑक्टोबरअखरे आठ टक्के साखर साठा ठेवण्याचे काढलेल्या आदेशावर नाराजी व्यक्त करत केंद्र सरकार व व्यापाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप चेअरमन मुश्रीफ यांनी केला.

राज्याच्या उसदर नियंत्रण समितीची बैठक १५ सप्टेंबर रोजी होणार होती. पण काही कारणाने समितीची बैठक अनिश्चित काळासाठी पुढे घेण्याचे नियोजन केले आहे. राज्यस्तरावरुन एफआरपीबाबत अद्याप निर्णय झालेला नसताना, एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे नियोजन केल्याने उसदरांवरून पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी सध्या दक्षिण भारतात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर जनजागृती सभा घेत आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील सभा दिल्ली येथे २३ रोजी होणार आहे. त्यानंतर राज्यात परतल्यानंतर उसदराचा प्रश्न निर्माण होणार आहे. गेल्या काही दिवसांत खासदार शेट्टी यांनी भाजपविरोधात जोरदार टिका करण्यास सुरुवात केली आहे. उसदरांवरुन पुन्हा खासदार शेट्टी यांना टिका करण्याची संधी निर्माण होणार आहे. दरम्यान जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांनी एफआरपीसाठी घेतलेले सॉफ्टलोनचे हप्ते, कारखान्यांना प्रती पोती बसणारे टॅगिंग आदी बाबतची माहिती कारखाना प्रतिनिधींना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निर्भया पथके बरखास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बहुतांश निर्भया पथकांच्या कागदोपत्री कारवाया वाढत असल्याने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सोमवारी (ता. १८) शहरातील चारही पोलिस ठाण्यांमधील निर्भया पथके बरखास्त केली. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सई भोरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरासाठी स्वतंत्र निर्भया पथक स्थापन केले असून, या पथकाने तातडीने कायवाया सुरू केल्या. सोमवारी सकाळी महावीर कॉलेज ते महावीर उद्यान परिसरात सहा तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

निर्भया पथकांकडून कागदोपत्री कारवाया रंगवल्या जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. प्रत्येक पोलिस ठाण्याकडून कारवायांची माहिती सादर केली जात होती, मात्र प्रत्यक्षात छेडछाडीच्या घटना वाढत असल्याने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील निर्भया पथके बरखास्त केली.

प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सई भोरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक तयार केले असून या पथकात महिला तक्रार निवारण कक्षातील एपीआय सुनंदा शेळके, पीएसआय एम. एम. माळी, नम्रता गुरव, राधिका कार्वेकर यांच्यासह दोन पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. या पथकाला इतर कोणतेही काम दिले जाणार नाही. परिणामकारक कारवाया होण्यासाठी पथकाला स्वतंत्र वाहनही दिले आहे. अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पथकाची बैठक घेऊन विशेष सूचना दिल्या.

पथकाने सोमवारी सकाळी महावीर कॉलेज ते महावीर उद्यान परिसरात सहा संशयितांना ताब्यात घेतले. या तरुणांच्या पालकांनाही माहिती दिली असून, तरुणांचे समुपदेशन केले जाणार आहे. यातील चार तरुणांकडे दुचाकी चालवण्याचे परवाने आणि आवश्यक कागदपत्रे नसल्याने प्रत्येकी २०० रुपयांची दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली.

अल्पवयीनांच्या पालकांना बोलवणार

छेडछाडीच्या घटनांमध्ये अनेकदा अल्पवयीनांचाही समावेश असतो. अल्पवयीनांवर गुन्हे दाखल करता येत नाहीत, त्यामुळे त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलवून घेतले जाणार आहे. पालकांसमोर संबंधित तरुणांची कनउघडणी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चांदोली’ प्रकरणात मिटवामिटवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सांगली पोलिसांकडून चांदोली जंगलात पर्यटन करण्याचा प्रयत्न वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उधळल्यानंतर या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांचे संबंध ताणले आहेत. सांगली पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांची भेट घेऊन उपसंचालक विनीता व्यास यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत, तर व्यास यांनी सांगली पोलिसांविरोधातील अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. दरम्यान, या दोन्ही खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शनिवारी (ता. ९) चांदोली येथे मासिक गुन्हे आढावा बैठक घेतल्यानंतर चांदोली जंगलात वन्यजीव तस्करांच्या शोधासाठी जाण्याचा प्रयत्न सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केला होता. चांदोली येथील व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक विनीता व्यास यांनी मात्र पोलिसांना जंगलात जाण्यापासून रोखल्याने वन विभाग आणि पोलिस दलातील अधिकारी आमने-सामने उभे ठाकले होते. वन्यजीव तस्करांवरील कारवाईसाठी जंगलात जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर कारवाईच्या नावाखाली पोलिसांचा फौजफाटा जंगलात पर्यटनासाठी जात असल्याचा आक्षेप वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. हे प्रकरण गेली आठवडाभर चांगलेच चर्चेत राहिल्याने दोन्ही खात्यातील अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे. यातूनच अधिकाऱ्यांचे संबंध ताणले आहेत. सांगलीचे अधीक्षक शिंदे यांनी चार दिवसांपूर्वीच कोल्हापुरातील मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांची भेट घेऊन चांदोली येथील उपवनसंरक्षक विनीता व्यास यांच्याविरोधात तोंडी तक्रारी केल्या आहेत. व्यास यांनीही सांगली पोलिसांच्या कृतीचा अहवाल तयार केला असून, तो बेन यांच्याकडे सादर केला आहे.

चांदोलीतील कारवाईचा मुद्दा व्यास आणि शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला असला तरी, वरिष्ठ पातळीवरून मात्र या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्य वनसंरक्षक बेन आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी चांदोलीतील प्रकार आपसात मिटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वन विभाग आणि पोलिस दलाला नेहमीच एकमेकांची मदत घ्यावी लागते. तक्रारी आणि गुन्हे दाखल करून दोन विभागांमध्ये संघर्ष निर्माण करण्यापेक्षा प्रकरण आपसात मिटवण्याचे काम सुरू आहेत. दोषींना क्लीनचीट मिळाली तर असे प्रकार वारंवार घडण्याचा धोका नाकारता येत नाही, याकडे सोयिस्कर पद्धतीने दुर्लक्ष होत आहे.

कारवाईबाबत पोलिसांचे मौन

वन्यजीव तस्करांचा शोध घेण्यासाठी ५० अधिकारी आणि १०० पोलिस असा सुमारे १५० पोलिसांचा फौजफाटा जंगलात घेऊन जाण्यास परवानगी मिळावी असे पत्र इस्लामपूर येथील पोलिस उपअधीक्षकांनी कराडमधील उप वनसंरक्षकांना पाठवले होते. प्रत्यक्षात मात्र तस्करांविषयी माहिती मागितली असता पोलिस अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या कारणास्तव माहिती देणे टाळले.

स्वतःच्या कार्यक्षमेतवर वनविभाग ठाम

चांदोली परिसरात वन विभागाचे ८० कर्मचारी कार्यरत आहेत. व्याघ्र प्रकल्पामुळे हा परिसर संवेदनशील असल्याने सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेतली जाते. सुरक्षा चौक्या, सीसीटीव्ही कॅमेरे असूनही तस्कर जंगलात घुसले असतील तर वन विभागाच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी पारदर्शकपणे चर्चा केली असती तर, संयुक्त कारवाई कली असती, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

चांदोली जंगलात जाण्यासाठी सांगली पोलिसांनी आग्रह केला होता, मात्र १५ ऑक्टोबरपर्यंत जंगलात जाण्यासाठी कोणालाच परवानगी मिळत नाही. तस्करीचे कारण आमच्या अधिकाऱ्यांना पटले नाही. पोलिसांनीही तसे पुरावे दिले नाहीत, त्यामुळे परवानगी नाकारली. याच अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे.

केल्मेंट बेन,मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदाराने गुंडाळली सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) शुक्रवारी (ता. १५) झालेली सभा नियोजितपणे ठेकेदार असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गुंडाळली. ज्यांचे गोकुळमध्ये दूध वाहतुकीचे टँकर आहेत, अशा नेत्यांनी नव्हे तर ठेकेदार महाडिकांनी सर्वसामान्य सभासदांच्या हक्कांवर गदा आणत संघाच्या उज्जल परंपरा मातीत मिळवली. ज्यांनी गोकुळचा वर्षानुवर्षे खासगी कंपनीसारखा वापर लूट केली, त्या लुटारुंनी सभेत हातात माइक घेतल्याचा घणाघती आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. शुक्रवारी झालेली सभा अवैध ठरवण्यासाठी मंगळवारी (ता.१९) पशू, दूग्ध व मत्स विभागाचे उपनिबंधक व सहकार विभागाचे आयुक्तांना दुपारी १२ वाजता निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले, ‘यापुर्वी महाडिक नियमितपणे सकाळी दहा वाजता गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात बसत होते. गेल्यावर्षीच्या सभेपूर्वी व त्यानंतर केलेल्या आरोपानंतर त्यांची कार्यालयातील उठबस थांबली होती. पण ज्यांचे सर्व व्यवसायच गोकुळवर अवलंबून आहेत, ते फार काळ ‘आंब्या’पासून दूर राहू शकत नाहीत. हे सभेला उपस्थित राहून दाखवले. दरवर्षी गोकुळची सभा दुपारी एक ते तीन वेळेत होते. यावेळेला मात्र सभेची वेळ ११ वाजता ठेवली. त्यामुळे दीडशे किमी अंतरावरील सभासद सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. सहकारी संस्थेच्या सभेच्या अहवालाचे वाचन करण्याचा अधिकार अध्यक्ष, सचिव किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या संचालकांना असताना महाडिक यांनी अहवालवाचन केले. एका मिनिटात सभा गुंडाळतांना राष्ट्रगीत त्वरित लावण्याच्या सूचना दिला होत्या. यावरून सभा गुंडाळण्याचे अगोदरच नियोजन केले होते,’ असाही आरोप त्यांनी केला.

‘सभेपुर्वी सभासद संस्थामार्फत ३४ प्रश्न उपस्थित केले. आरोपाना उत्तरे किंवा फेटाळून लावयाचा अधिकार संचालक मंडळाचा होता, पण अशी कोणतीही कार्यवाही न करता एक मिनिटात ११ विषयांनी मंजुरी दिली. गावातील संस्थांच्या सभा दोन-दोन तास चालत असताना, जिल्ह्याची मातृसंस्था आणि लाखो उत्पादकांचे संसार अवलंबून असलेल्या संघाच्या सभेत उत्तरे देण्यास कोणी अडवले होते का? ज्यावेळी विषय मंजूर करुन राष्ट्रगीत लावले, त्यावेळी कार्यकारी संचालकांसह अनेक संचालक जागेवर बसून होते, त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान झाला आहे. त्यामुळे गोकुळची झालेली सभा अवैध ठरवण्यासाठी मंगळवारी (ता.१९) ‘पदूम’चे उपनिबंधक यांना निवेदन देऊन सहकार आयुक्तांनाही लेखी निवेदन पाठवणार आहे. निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.

पत्रकार परिषदेस भोगावतीचे माजी चेअमरन सदाशिव चरापले, कुंभी-कासारी कारखान्याचे व्हाइस चेअरमन किशोर पाटील, बाळासाहेब कुपेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, करणसिंह गायकवाड, विश्वास नेजदार, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, विद्याधर गोरंबे, श्रीनिवास पाटील, किरण पाटील आदी उपस्थित होते.

‘कच्चा आंबा पाडावा लागतो’

शेकापचे माजी आमदार संपतबापू पाटील यांनीही महाडिक यांच्यावर टीका केली. ‘गोकुळची सभा ही सहकाराला मूठमाती देणारी ठरली. राजर्षी शाहूंच्या नगरीने राज्य सरकारविरोधात लढाई केली असताना जिल्ह्यात चुकीच्या माणसांनी येऊन चुकीचा पायंडा पाडला. जो आंबा खरा असतो तो स्वतः पिकून पडतो, पण जो चुकीचा आंबा असतो, त्याचा देठ घट्ट असतो तो तोडवा लागतो. गोकुळमध्ये लुटीचा आंबा तोडण्याचे काम महाडिक करत आहेत.’

तर १८ स्कॉर्पिओ बंद होतील

कायदेशीररित्या महाडिक यांना अहवाल वाचनाचा कोणताही अधिकार नाही, मात्र जर संचालकांनी त्यांना अधिकार दिले असल्यास संघाचे सर्वच अधिकार द्यावेत. त्यामुळे किमान संचालकांच्या १८ स्कॉर्पिओ बंद होऊन दूध उत्पादकांचे तरी भले होईल. सभेसाठी दूग्ध विभागाचा प्रतिनिधी उपस्थित होता, याची माहिती घेऊन प्रोसीडिंग कोणाच्या नावे लिहिणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र यासाठी कायदेशीर लढाई करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाच्या प्रयत्नाबद्दल सहाजणांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील महावितरणच्या डीपीमध्ये विजेचा धक्का लागून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्या होता. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आठ जणांनी महावितरणचे तत्कालीन ज्युनिअर इंजिनीअर संदीप भानुदास गावडे (वय ३७, रा. येळावी, ता. तासगाव, जि. सांगली) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. अंगावर रॉकेल आणि ऑईल टाकून पेटवण्याचाही प्रयत्न हल्लेखोरांनी केला होता. सोमवारी (ता. १८) जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याचा निकाल लागला असून, सहा हल्लेखोरांना पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी हा निर्णय दिला.

शिवाजीराव महादेव आवळे (वय ३५, रा. इंदिरा कॉलनी, पेठवडगाव), तय्यब बशीर खाटीक (३३, रा. भोदेले रोड, पेठवडगाव), गजानन शामराव धनवडे (४३, रा. भादोले, ता. हातकणंगले), योगेश सुरेश सूर्यवंशी (३२, रा. यादव कॉलनी, पेठवडगाव), अमोल शिवाजी जाधव (२७, रा. आंबेडकर कॉलेजजवळ, पेठवडगाव) आणि सुरेश महादेव आवळे (३१, रा. इंदिरा कॉलनी, पेठवडगाव) अशी शिक्षा झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. सुनील सदाशिव जमानावर (३१, रा. म्हैशाळ, जि. सांगली) याला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, ९ एप्रिल, २००९ रोजी दुपारी दीडच्या सुमारास पेठवडगाव येथील गोसावी गल्लीत महावितरणच्या डीपीला स्पर्श होऊन सूर्याक्ष संजय माळी (वय २) या बालकाचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेबद्दल जाब विचारण्यासाठी दुपारी चारच्या सुमारास शिवाजीराव आवळे याच्यासह आठजण पेठवडगाव येथील महावितरणच्या कर्यालयात गेले होते. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतानाही हल्लेखोरांनी काठ्या, रॉकेलचा कॅन, इंजिन ऑईल आणि काडीपेटी घेऊन महावितरणच्या कार्यालयावर चाल केली. कार्यालयात घुसून साहित्याची मोडतोड करीत सुमारे दीड लाखाचे नुकसान केले. कर्मचाऱ्यांना दमदाटी करून एका खोलीत डांबून घातले. यानंतर ज्युनिअर अभियंता संदीप गावडे यांच्या तोंडाला काळे फासून त्यांना बेदम मारहाण केली. काही हल्लेखोरांनी गावडे यांच्या अंगावर रॉकेल आणि इंजिन ऑईल टाकले. हल्लेखोर शिवाजीराव आवळे याने काडी पेटवून गावडे यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र गावडे यांनी काडी विझवल्याने अनर्थ टळला. यानंतर हल्लेखोरांनी गावडे यांना कार्यालयाबाहेर ओढून नेऊन मारहाण केली. यावेळी पेठवडगाव पोलिस ठाण्यातून आलेल्या पोलिसांनी गावडे यांची सुटका केली, मात्र हल्लेखोरांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केली.

संदीप गावडे यांनी याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दखल केल्यानंतर पोलिसांनी शिवाजीराव आवळेसह आठ संशयितांवर गुन्हे दाखल केले होते. न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू होती. यातील मोहन सदाशिव आवळे (वय २७) मयत झाला, तर सुनील जमानावर याला पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. उर्वरित सहा जण गुन्ह्यात दोषी ठरल्याने कोर्टाने त्यांना पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दहा साक्षीदार फितूर

या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १३ साक्षीदार तपासले. यातील १० साक्षीदार फितूर झाले, मात्र पोलिसांनी केलेला पंचनामा, साक्षीदार योगेश पाडळे आणि पंच गायकवाड यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील मंजुषा पाटील यांचा युक्त‌िवाद ग्राह्य धरून कोर्टाने शिक्षा सुनावली.

धमकावणाऱ्या आंदोलकांना चाप

पेठवडगावसह कोल्हापूर शहरातही काही आंदोलक जणीवपूर्वक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावतात. आंदोलनांची भीती घालून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. खंडणीखोर आंदोकांसाठी कोर्टाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण असून, यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटारुंच्या हाती ‘गोकुळ’चा माईक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) शुक्रवारची सभा नियोजितपणे गुंडाळण्यात आली. गोकुळमध्ये ज्यांचे दूध वाहतुकीचे टँकर आहेत अशा नेत्यांनी नव्हे तर ठेकेदार माजी आमदार महादेवराव महाडिकांनी सामान्य सभासदांच्या हक्कांवर गदा आणत संघाची उज्ज्वल परंपराच मातीत मिळवली. ज्यांनी संघ वर्षानुवर्षे खासगी कंपनीसारखा लुटला, त्याच लुटारुंनी सभेत हातात माइक घेतला,’ असा घणाघती आरोप आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केला. झालेली सभा अवैध ठरवावी, अशी मागणी मंगळवारी (ता. १९) पशू, दुग्ध व मत्स्य विभागाचे उपनिबंधक व सहकार आयुक्तांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले की, गेल्यावर्षीच्या सभेपूर्वी व त्यानंतर केलेल्या आरोपानंतर महाडिकांची ताराबाई पार्क कार्यालयातील ऊठबस थांबली होती, पण ज्यांचे सर्व व्यवसायच गोकुळवर अवलंबून आहेत ते फार काळ ‘आंब्या’पासून दूर राहू शकत नाहीत. सभेला उपस्थित राहून त्यांनी ते दाखवले. कोणत्याही सहकारी संस्थेच्या सभेच्या अहवालाचे वाचन करण्याचा अधिकार अध्यक्ष, सचिव किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या संचालकांना असताना महाडिक यांनी स्वतः माइक हातात घेऊन संघाची परंपरा मातीत मिळवली. केवळ एका मिनिटात सभा गुंडाळताना राष्ट्रगीतही लगेच लावण्याच्या सूचना दिला होत्या का? यावरुन सभा गुंडाळण्याचे अगोदरच नियोजन केले होते, असाही पाटील यांनी केला.

ते म्हणाले, ‘गेल्यावर्षीचा सभेचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षीच्या सभेपूर्वी सभासद संस्थांमार्फत ३४ प्रश्न उपस्थित केले. सभेत आरोपांना उत्तरे देणे अपेक्षित होते, पण अशी कोणतीही कार्यवाही न करता एका मिनिटांत ११ विषयांनी मंजुरी दिली. ज्यावेळी विषय मंजूर करुन राष्ट्रगीत लावले त्यावेळी कार्यकारी संचालकांसह अनेक संचालक जागेवरच बसून होते. त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान झाला आहे. गोकुळची झालेली सभा अवैध ठरवावी, अशी मागणी उपनिबंधक आणि सहकार आयुक्तांकडे लेखी निवेदनद्वारे करणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात तावडेंवर फेकली निषेधाची पत्रके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून सोमवारी धनगर समाजाच्या पाच कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मृती मंदिरातील राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात भाषण सुरू असताना व्यासपीठावर जाऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर निषेधाची पत्रके फेकली. कार्यकर्त्यांनी भंडारा उधळून ‘जय मल्हार’च्या घोषणा दिल्याने गोंधळ माजला. मात्र, तावडे यांनी त्यांना न रोखता त्यांचा कोणीतरी गैरसमज केल्याचे सांगत नामकरणाच्या विषयावर तात्पुरता पडदा टाकत शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम आटोपला.

शिक्षणमंत्री तावडे सोमवारी राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी येथे आले होते. सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचे नाव देण्यासाठी सोमवारी लिंगायत समाजाने शहरात मोर्चा काढला. दुसरीकडे पुरस्कार कार्यक्रम सुरू असताना उमेश काळे, शेखर बंगाळे, शरनू हांडे, म्हाळप्पा नवले आणि अनिल घोडके हे पाच कार्यकर्ते थेट हुतात्मा मंदिराच्या व्यासपीठावर चढले. त्यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्या अंगावर निषेधाची पत्रके फेकली आणि भंडारा उधळला. अचानक सुरू झालेल्या या गोंधळाने राज्यभरातून आलेल्या शिक्षकांना काहीच कळेनासे झाले. ‘शिक्षणमंत्री मुर्दाबाद, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सरकारचा निषेध असो, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिलेच पाहिजे,’ आशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले. तावडे यांच्या अंगावर भंडारा पडला. तेवढ्यात बंदोबस्तासाठी असलेल्या सदर बझार पोलिसांनी कार्यकर्त्यांना व्यासपीठावरून सभागृहाबाहेर नेऊन ताब्यात घेतले.

पोलिस त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना शिक्षणमंत्री तावडे मात्र, त्या कार्यकर्त्यांना काहीही बोलू नका, असे पोलिसांना सांगत होते. अंगावरील जॅकेट झटकत तावडे म्हणाले, ‘सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर, बसवेश्वर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे; परंतु, सिनेटमध्ये ठराव मंजूर झाल्यानंतरच सरकार त्यावर निर्णय घेईल. काही लोकांना फारच घाई झालेली असते. आपण अहिल्यादेवी यांच्या नावाला विरोध केला आहे, अशी चुकीची माहिती कार्यकर्त्यांना कोणीतरी सांगितली असावी म्हणून त्यांनी असे केले असावे.’ त्यानंतर तावडे यांनीच ‘येळकोट येळकोट जय मल्हार,’ असा जयघोष करून यावर पडदा टाकत पुरस्काराचा कार्यक्रम पुढे सुरू केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नरबळी देण्याचा प्रयत्न फसलाबेळगावात पाच मुलांचे जीव वाचले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
महालय अमावास्येच्या (मंगळवारी) रात्री पाच मुलांचा बळी देऊन गुप्तधन मिळविण्याचे कारस्थान भडकल गल्लीत उघडकीस आले. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून, अन्य चारजण पळून गेले आहेत.
शिरीना जमादार असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून, मसाबी मुल्ला, जावेद मुल्ला, फारूक मुल्ला आणि सोना मुल्ला अशी कटातील अन्य सहभागींची नावे आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
गौस पिरजादे यांच्या घरात मुल्ला कुटुंबीय भाड्याने राहत होते. पिरजादे यांची चौदा महिन्यांची बालिका खतिजा सकाळपासून गायब होती. म्हणून तिचा शोध घेण्यात येत होता. दुपारी दीड वाजता खतिजाच्या रडण्या-ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी बंद घराचा दरवाजा काढून आजूबाजूचे लोक घरात गेले असता नरबळीचा प्रकार उघडकीस आला.
कटातील सहभागींनी बालिकेसह पाच मुलांचा बळी देऊन गुप्तधन मिळविण्याचा कट रचला होता. नरबळी दिल्यास मोठ्या प्रमाणावर गुप्तधन मिळते, असे मांत्रिकाने सांगितले होते. बळी देण्यासाठी घरातच आठ फूट खोल आणि आठ फूट रुंद खड्डा खोदला होता. एका घागरीत लिंबू, कुंकू, उदबत्ती, फळे आदी साहित्य ठेवले होते. बळी देताना मुलांना घालण्यासाठी काळे मुखवटेही आणले होते. पण, खड्डा खोदताना आवाज आल्यामुळे आणि लहान मुलीच्या ओरडण्याच्या आवाजामुळे शेजारचे लोक जमा झाले आणि हा कट फसला. वेळीच लोक गेल्याने पाचजणांचे जीव वाचले.
गेल्या तीन वर्षांपासून मुल्ला कुटुंबीय त्या घरात भाड्याने राहत होते. अमावास्येच्या दिवशी घर रिकामे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या गुन्ह्याची नोंद मार्केट पोलिस स्थानकात नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ घनकचरा व्यवस्थापनप्रकल्प राबवावाच लागेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
हरीत न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच मुदतीतच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवावा लागेल. येत्या महासभेपुढे घनकचरा प्रकल्प आराखड्यास मंजुरी घ्या. प्रकल्प आराखड्यात किरकोळ बदल वगळता काहीही बदल करता येणार नाहीत. घनकचरा व्यवस्थापन आराखड्याची प्रभावी अमंलबजावणी करण्याबाबत आपण स्वतः लक्ष घालणार आहोत, या बाबत आपण स्वतः महापौरांना लेखी पत्र देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी काळम-पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी सुकाणू समितीची बैठक झाली. बैठकीस आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. कवठेकर, त्याचबरोबर वालचंदचे तज्ज्ञ डॉ. सोनवणे आदी उपस्थित होते. या बैठकीत महापालिकेच्या वतीने हरित न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासदंर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत हरित न्यायालयाचे आदेश, हरित न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफराशीनुसार तयार केलेला घनकचरा प्रकल्प आराखडा. यातील तरतुदी, शिफारशी या बाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, प्रकल्प आराखड्याप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे. यासाठी दोन्ही कचरा डेपोची जागा निश्चित करणे, सरकारी मोजणी करून घेणे, ही सर्व कामे सप्टेंबरपर्यत होणे बंधनकारक आहे. मोजणीनंतर सिमेंट पोल उभारण्यात येणार आहे. मिरज कचरा डेपोवर सॅग्रीकेशन मशिन बसवण्यात येईल. हॉटेलमधील वेस्ट कचरा उचलण्यासाठी पूर्वी निविदा प्रक्रिया राबवली होती. ही प्रक्रिया १५ ऑक्टोंबर पूर्वी पूर्ण करावी. नाविन्यपुर्ण योजनेतून कंपोस्टिंग मशिन दिली जातील. घरोघरी जावून कचऱ्यांचे वर्गीकरण करण्यासदंर्भात जनजागृती करावी, सूचना देऊनही नागरीक ऐकत नसतील तर प्रसंगी दंडात्मक कारवाई करावी लागेल. अपार्टमेंटचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्या-त्या भागातच कचरा कसा डिस्पोजबल करायचे याचे नियोजन करण्यात येईल. दोन्ही कचरा डेपोवर पाण्याची टाकी उभारणे, वृक्षारोपन करणे. पाण्याचा टँकर खरेदी करणे, सीसीटीव्ही बसवणे आदी सर्व उपाययोजना ही करण्यात येतील. या प्रकल्पाची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी पर्यावरण अभियंता नियुक्त करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा धोक्याच्या पातळीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
चांदोली धरणक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत धरण परिसरात ६८ मिमी तर आजअखेर २०८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात १२०६० क्युसेक तर वीजगृहातून १५०७ क्युसेक असे एकूण १३५६७ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.
वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वारणा नदीवरील आरळा-शित्तुर व चरण-सोंडोली या दोन्ही पुलावर पाणी आले. कोकरूड रेठरे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. वारणा पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिराळा तालुक्यात इतरत्रही दिवसभर पावसाचा जोर होता. चांदोली धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात डोंगर माथ्यावरील ओढे ओहळांच्या पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झापाट्याने वाढ होत असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाने सोमवारी रात्री धरणाच्या दोन सांडव्यातून विसर्ग सुरू केला होता. मात्र धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या चारीही सांडव्यातून आज पाणी सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोनवडे, मणदूर, आरळा, करुंगली, मराठेवाडी, पणुंब्रे, चरण, मोहरे या गावातील नदीकाठची ऊस व भात शेती पाण्याखाली गेली आहे. याचबरोबर वारणा नदीचे पाणी सोनवडे, आरळा, चरण येथील स्मशानभूमीला लागले आहे.

सोनवडे, आरळा, काळुंद्रे चरण आदी परिसरातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी भात पिके कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. अवेळी पडलेल्या या पावसामुळे तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागातील भुईमुग, सोयाबीन काढणीच्या सुगीत व्यत्यय आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सुधीर गाडगीळअंदाज समितीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
आमदार सुधीर गाडगीळ यांची विधिमंडळाच्या अंदाज समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. दर वर्षी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या किंवा नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीनंतर शक्य तितक्या लवकर अर्थसंकल्पीय अंदाज आणि पूरक अनुदानासाठीच्या मागण्याची छाननी करणे, असे अंदाज व मागण्या ज्या धोरणावर असतील त्या धोरणाशी सुसंगत काटकसरीचे उपाय सुचविणे, अर्थसंकल्पाचा नमुना सुचविण्याचे काम, या समितीकडे असते.
खर्चाच्या अंदाजांची तपशीलवार छाननी केल्यानंतर सरकारची उद्दिष्टे अत्यंत काटकसरीने व कार्यक्षम पद्धतीने पार पाडली जाण्यासाठीची तरतूद करण्यासाठी सल्लाही अंदाज समितीकडून घेतला जातो. अर्थसंकल्पीय अंदाज किंवा पूरक अनुदानांसाठीच्या मागण्यांची छाननी करण्याचा आणि विधानसभेने अनुदान अगोदरच मंजूर केले असली तरी त्यामध्येही नेमका सल्ला देण्याचा समितीला हक्क असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोपर्डी’प्रकरणीजनआंदोलन उभारणारखासदार सुप्रिया सुळेंचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
कोपर्डी खटल्याच्या निकालात होत असलेल्या दिरंगाईमुळे राज्यातील जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. आगामी तीन महिन्यांत आरोपीना फाशीची शिक्षा न झाल्यास पंढरपूर-मुंबई जनआंदोलन उभे करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील युवा संवाद यात्रेत त्यांनी तरुणाईशी संवाद साधला. भाजप सरकारचे अपयश, महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, अशा विविध विषयांवर सुप्रिया सुळे यांना तरुण तरुणींनी प्रश्न केल्याने संवाद यात्रा उत्स्फूर्त झाली. या वेळी तरुण वर्गाचा सरकारविरुद्ध असंतोष दिसून आला.
पत्रकारांशी बोलताना नारायण राणेंचे नाव न घेता सुळे म्हणाल्या, प्रस्थापित नेते पक्ष सोडून गेल्याने काहीच बिघडत नाही, उलट नवीन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळते. भाजप खासदार नाना पटोले यांचे भाषण सध्या रोज ऐकत आहे. आमच्याकडून तिकडे गेलेले खासदार त्यांची कामगिरी दाखवू शकत नसल्यानेच पंतप्रधान ७० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे सांगत आहेत. आमच्याकडे असताना त्यांचा परफॉर्मन्स चांगला होता पण तिकडे गेल्यावर यांनी काय बाळकडू पाजले त्यांनाच माहिती. पक्ष बदलून भाजपत गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षाची दारे खुली आहेत. सरपंचापासून राष्ट्रपतीपर्यंत सगळी सत्ता भाजपकडे असूनही कोणतेच प्रश्न सुटत नसल्याने जनतेत प्रक्षोभ आहे. गेली १५ वर्षे आम्ही कोणतीच निवडणूक हरली नव्हतो, हे आमचे ट्रॅक रेकॉर्ड विसरू नका. काही चुका झाल्याने ही वेळ आली आहे मात्र, शून्यातून उभे राहायची आमची तयारी आहे.
शिवसेनेचा काडीमोड मोठा विनोद
शिवसेना भाजपपासून काडीमोड घेण्याच्या बातम्या हा मोठा विनोद आहे. दर वेळेला असल्या धमक्या देतात, रुसतात आणि परत येतात त्यामुळे आता त्यांचा लांडगा आला रे, सारखी परिस्थिती झाली आहे, अशा शब्दात सुळे यांनी सेनेची खिल्ली उडवली. भाजप सरकार अपयशी ठरले आहे, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव पाहून सध्या मी भाजपच्या जाहिरातीमधील मावशीचा शोध घेत आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव घरफाळ्यावरून गोंधळ

$
0
0

चलकरंजी

जनतेचा वाढता रोष व होणारा विरोध पाहता वाढीव घरफाळ्यासंदर्भात लवकरच विशेष सभा बोलविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सभेत घेण्यात आला. तर बिव्हीजी कंपनीला दिलेल्या कचरा उठावाचा ठेका, ऐरणीवरील मोकाट जनावरांचा प्रश्न यावरुन सत्तारुढ व विरोधी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. घोषणाबाजी, गोंधळ अशा वातावरणात विषयपत्रिकेवरील ८१ व ऐनवेळच्या पाच अशा तब्बल ८६ विषयांवर सहा तास चर्चा करुन निर्णय घेणारी ही मॅरेथॉन सभा ठरली.

घरफाळ्यात २० टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने त्याला मालमत्ताधारकांसह सर्वच स्तरातून विरोध होऊ लागला आहे. सभेला सुरुवात होताच विरोधी काँग्रेस व शाहू विकास आघाडीने घरफाळा वाढीला विरोध दर्शवला. त्याचबरोबर बिव्हीजी व पालिका कर्मचाऱ्यांतील असमन्वयामुळे कचरा उठावाचा निर्माण झालेला प्रश्न आणि शहरातील मोकाट जनावरांचा होत असलेला त्रास अन् यावर पालिकेकडून होणारी कार्यवाही याबाबत खुलासा करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी केली. घरफाळा वाढी खुलासा करताना मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी, आजमितीला पालिकेवर विविध विभागाचे ७५ कोटी रुपयांचे दायित्व आहे. तर उत्पन्न अवघे २६ कोटीपर्यंतचे आहे. उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट असल्याने घरफाळा वाढ करणे अनिवार्य होते. नियमानुसारच ही वाढ केली असून या उत्पन्नातून विकासकामे होतील. २० टक्क्यांची वाढ ही चार वर्षासाठी असून ती वार्षिक पाच टक्क्यांची वाढ केली असल्याचे सांगितले. पण हा खुलासा अमान्य करत विठ्ठल चोपडे यांनी, पालिकेवरील दायित्व हे आजचे नसून कित्येक वर्षांपासूनचे आहे. ढोबळ उत्पन्नाची आकडेवारी चुकीची दाखविली जाते. दायित्व पाहूनच निविदा काढता का असा सवाल उपस्थित करत भाडे मूल्यांकन चुकीच्या पध्दतीने झाले आहे. सभागृहाने याबाबत एकमताने ठराव करुन प्रादेशिक संचालकांकडे तक्रार केल्यास निश्चितपणे घरफाळा कमी होईल. त्यासाठी पालिकेने विशेष सभा घेण्याची मागणी केली. यावर काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, शशांक बावचकर, मदन कारंडे यांनीही घरफाळावाढीला विरोध दर्शवून प्रशासनाने नगरसेवकांची दिशाभूल करत १० टक्क्यांऐवजी २० टक्क्यांची वाढ लादल्याचा आरोप केला. तर सत्तारुढ गटामया तानाजी पोवार, सागर चाळके, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, अजितमामा जाधव, अशोकराव जांभळे यांनीही विशेष सभा बोलविण्याची मागणी केली. अखेर दोन तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर सभाध्यक्षांनी लवकरच घरफाळा वाढ संदर्भात विशेष सभा बोलविण्याचा निर्णय जाहीर केला.

आरक्षित केलेल्या जागेवरील आरक्षण उठविण्याबाबतचे २७ विषय मंजूर केल्यानंतर मदन कारंडे यांनी, आरक्षित जागांसाठी पैसे दिले जातात. मात्र त्या जागा वर्षानुवर्षे ताब्यात घेतल्या जात नसल्याचे सांगत शहरात अशा ४० जागा असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे भूसंपादन करू शकत नाही. पण रस्त्यासाठी आवश्यक जागा आरक्षित केल्या जातील आणि जागा आरक्षणासाठी कोणताही निधी वर्ग केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

मागासवर्गीय कल्याण समिती गठीत करण्याच्या ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. या विषयाच्या प्रस्तावावरुन गोंधळ उडाला. मागासवर्गीय समिती पाच सदस्यीय असताना केवळ तीन सदस्य का असा सवाल करीत संजय केंगार, अब्राहम आवळे, मंगेश कांबुरे व अनिता कांबळे यांनी नगराध्यक्षांच्या टेबलासमोर ठिय्या मारला. या गोंधळातच तीन सदस्य निवडीचा ठराव सत्तारुढ गटाने बहुमताने मंजूर करण्यात आला. त्याचा निषेध नोंदवत चारही सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर या समितीत कांबुरे यांना वगळून अनिता कांबळे यांचा समावेश करण्यात आला. भाजपा युवती मोर्चा आघाडीमयावतीने नेहरुनगर येथील रिकामी जागा ग्रंथालयासाठी मागणी केल्यामया विषयावरुनही जोरदार खडाजंगी उडाली. हा विषय सत्तारुढ गटाने बहुमताने मंजूर केला. याला विरोध करत नेहरुनगर झोपडपट्टी लाभार्थ्यांनी सभागृहाबाहेर ठिय्या मारत घोषणाबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images