Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बिद्री कारखान्यासाठी५२४ अर्ज दाखल

$
0
0

कागल

बिद्री (ता.कागल) येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवार(ता.८) पासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. त्यानंतर दोन दिवस सरकारी कार्यालयांना सुट्ट्या होत्या. तसेच मंगळवार(ता.१२) हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सोमवारी (ता.११) अर्ज भरण्यास मोठी गर्दी झाली. आजअखेर अनेक मातब्बर नेत्यांसह कार्यकर्त्याचे ५२४ अर्ज दाखल झाले आहेत.

यामध्ये बिद्री कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव, के.जी.नांदेकर,विठ्ठलराव खोराटे, प्रविणसिंह पाटील, धनाजी देसाई, भरत पाटील, जीवन पाटील,राजेंद्र पाटील,नंदकिशोर सुर्यवंशी, बाबूराव देसाई, बालाजी फराकटे, विकास पाटील व आर.डी.पाटील (कुरुकली )यांच्यासह कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले.

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचे रणांगण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राजकीय मंडळी मेळावे घेत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवत असून जो गट आपल्याला मानसन्मान दिला जाईल त्या गटालाच आपला पाठिंबा राहिल असे नेतेमंडळी आपल्या मेळावा व बैठकामध्ये बोलू लागले आहेत. त्यामुळे बिद्री कारखान्यावर नेते , कार्यकर्ते व सभासदांची यांची गर्दी दिसू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील आणि राजेश क्षीरसागर हे सहाही आमदार मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले.

खानविलकर बंगला येथून शिवसेना संपर्क नेते अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली. ‘शिवसेनेचा एकच नारा, सातबारा कोरा’, ‘दसऱ्यापूर्वी कर्जमाफी झालीच पाहिजे’, अशा घोषणा मोर्चात देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यावर आमदार नरके म्हणाले, ‘राज्य सरकार कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा करत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे. नोटाबंदीच्या काळात रांगेत उभारून अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला होता तशी वेळ सरकारने आणू नये. कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी सातत्याने सभागृहात आवाज उठवला आहे. सरकारने दिवाळीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी दसऱ्यापूर्वी कर्जमाफी द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यांवर उतरावे लागेल.’

दुधवडकर म्हणाले, ‘कर्जमाफीची घोषणा होऊन तीन महिने झाले तरी सरकारने पावले उचललेली नाहीत. शिवसेनेने मोर्चाचा इशारा दिल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल, अशी घोषणा केली. पण मुख्यमंत्र्यांनी दिवाळीची वाट न पाहता दसऱ्यापर्यंत कर्जमाफी करावी.’

मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी कर्जमुक्ती घोषणा झाल्यानंतर किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला? असा प्रश्न निवेदनात केला आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याने दसऱ्यापूर्वी कर्जमुक्ती झाली पाहिजे.

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, संग्राम कुपेकर, शशिकांत बिडकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, एस.आर. पाटील, रवी चौगुले, शुभांगी पोवार, मनीषा कुरणे, रिया पाटील, मंगल चव्हाण, मेघना पेडणेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगणार ‘कोल्हापूर सुपर स्टार २०१७’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रुप डान्स, गायन, एकपात्री अभिनय यांसह कोणतीही कला सादरीकरणासाठी ‘कोल्हापूर सुपर स्टार २०१७’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सनशाइन इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेच्यावतीने व ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या कल्चर क्लबच्या सहयोगाने २४ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा रंगणार आहे. तीनपासून ३० वयापर्यंतच्या हौशी कलाकारांच्या कला सादरीकरणासाठी जणू हे खुले व्यासपीठच उपलब्ध करुन दिले आहे.

या स्पर्धेची निवड फेरी १७ सप्टेंबर रोजी विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही निवड फेरी चालणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची उपांत्य फेरी २० सप्टेंबर रोजी देवल क्लब येथे तर अंतिम फेरी २४ सप्टेंबर रोजी देवल क्लबमध्येच होणार आहे.

कोल्हापूर म्हणजे कलाकारांची पंढरी तसेच कला प्रकारांची खाण अशी ओळख आहे. कलाकार अंगभूत कलांचे ​ विविध व्यासपीठावर सादरीकरण करत असतात. अशा कला प्रकार व कलाकारांची मांदीयाळी असलेल्या कोल्हापुरातून सुपरस्टार कोण हे ठरवण्यासाठी गेल्यावर्षीही अशाच प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदाही सनशाइन इव्हेंट मॅनेजमेंट संस्था व ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या कल्चर क्लबच्या सहयोगाने कोल्हापूरचा सुपरस्टार २०१७ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा कोल्हापूरच्या कलाविष्कारांना झळाळी मिळणार आहे. एकपात्री अभिनय, गायन, ग्रुप डान्स, नृत्य अशा कोणत्याही कला या स्पर्धेमध्ये सादर करता येणार आहेत. त्यासाठी वैयक्तिक अथवा समूह अशा कोणत्याही माध्यमातून सहभागी होता येणार आहे.

स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठीचा अर्ज झूम राजारामपुरी २ री गल्लीमधील मेन रोडवरील किडस अँड लेडीज वेअर या शॉपमध्ये उलपब्ध आहेत. या फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची उपांत्य फेरी २० सप्टेंबर रोजी देवल क्लब येथे सकाळी दहा ते पाच वेळेत होईल. अंतिम फेरी २४ सप्टेंबर रोजी देवल क्लबमध्ये दुपारी ४ ते ९ वेळेत होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५० रुपये लहान गटासाठी (३ ते १६ वर्षापर्यंत) आणि २०० रुपये मोठ्या गटांसाठी प्रवेशमूल्य आहे. तर ग्रुपसाठी ५०० रुपये प्रवेशमूल्य आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी स्नेहल चौगले (७७४४०६१९३३ किंवा ७५०७५५५०२५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

$
0
0

कागल

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून निर्घूणपणे खून केल्याची घटना कसबा सांगाव (ता.कागल) येथील आण्णाभाऊ साठे नगर परिसरात सोमवारी (ता. ११) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. वर्षा प्रल्हाद आवळे (वय ३८) असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपी पती प्रल्हाद रामचंद्र आवळे (वय ४५) याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलगी ऋुतूजा हिने पोलिसांत फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, कसबा सांगाव येथील छोट्याशा घरात प्रल्हाद हा पत्नी वर्षासह तीन मुली, एक मुलगा व आई वडीलांसोबत राहत होता. उदरनिर्वाहासाठी तो सेंट्रींगचे काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते. चारित्र्याच्या संशयावरुन वारंवार तो पत्नीशी भांडत करुन मारहाण करीत होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी सततच्या मारहाणीस कंटाळून वर्षा ही चारही मुलांसह नांदणी(ता.शिरोळ) या आपल्या माहेरी गेली होती. कुरुंदवाड पोलिसांत वर्षाने पतीविरुध्द मारहाणीची तक्रारही दिली होती. पोलिसांनी प्रल्हादला समज देवून त्यांच्यात समझोता केल्याने सुमारे एक वर्षापासून ती पतीसोबत कसबा सांगाव येथे पुन्हा राहण्यास आली होती.

रविवारी रात्री जेवण आटोपून सर्वजण झोपले होते. त्यांची मोठी मुलगी ऋुतुजा दहावीचा अभ्यास करीत होती. रात्री एकच्या सुमारास ती आजी आजोबांशेजारी बाहेरच्या खोलीत झोपी गेली. पहाटे तीनच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरुन पती-पत्नीत भांडण झाले. संतप्त झालेल्या प्रल्हादने वर्षाच्या गळ्यावर, मानेवर आणि हनुवटीवर विळ्याने वार करुन तिचा निर्घूण खून केला. आवाज ऐकून मुलगी ऋुतुजा हिने आतील खोलीत प्रवेश केला असता वर्षा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. तिने आरडाओरडा करताच प्रल्हादने ’कोणीही बाहेर जायचे नाही, गेल्यास तुम्हालाही संपवतो’ अशी धमकी दिली. मोठा गोंधळ झाल्याने परिसरातील लोक जागे झाले. घटनेची माहिती मिळताच कागल पोलिस ठाण्याचे निरिक्षक औदूंबर पाटील, उपनिरिक्षक श्रीगणेश कवितके, बीट अंमलदार परशराम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयित प्रल्हाद याला ताब्यात घेतले.

चौकट

घटनास्थळी मोठी गर्दी

खुनाची घटना कळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृत वर्षाचे नातेवाईकही घटनास्थळी पोहचले. कु. रेश्मा, श्रेया, पवन या लहान बहिण-भावाला दहावीत शिकणारी ऋुतुजा धीर देत होती. खुनाच्या घटनेने हळहळ व्यक्त करीत परिसरातील महिला, नातेवाईकांनी या निरागस मुलांना आधार देत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाभाऱ्यात सीसीटीव्ही लावणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गाभाऱ्यात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत अशी मागणी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. यासंदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याशी चर्चा करून सीसीटीव्ही बसवण्यात येतील असे पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी संघर्ष समितीशी बोलताना स्पष्ट केले. त्यामळे आता गाभाऱ्यावर पोलिस निरीक्षकांचा ‘वॉच’ राहणार आहे. दरम्यान, मंदिराच्या गाभाऱ्यातील उत्पन्नाचा हिस्सा व टक्केवारी ही पद्धत न अवलंबता जादा पगार देऊन पगारी पुजाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने केली. पालकमंत्री पाटील व समितीच्या सदस्यांमध्ये अयोध्या हॉटेल येथे बैठकीत चर्चा झाली.

पालकमंत्री पाटील यांनी संघर्ष समितीपुढे भू्मिका मांडली. मंत्री पाटील म्हणाले, ‘अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी राज्य व देशातील मंदिरांच्या व्यवस्थापनाबाबतची माहिती घेतली जात आहे. राज्यातील सिद्धीविनायक मंदिर, पंढरपूर, शिर्डी, शेगाव, तुळजापूर या मंदिरांतील पुजारी ​नियुक्तीच्या प्रक्रियांची माहिती घेतली जात आहे. देशातील तिरुपती, मदुराई, उज्जेन या मंदिरांबाबतची माहिती घेण्यात येत आहे. तुळजापूर वगळता सर्व मंदिरांत पगारावर पुजाऱ्यांची नियुक्ती केली आहे. फक्त तुळजापूरमध्ये देवस्थान समिती व पुजाऱ्यांमध्ये हिस्सा पद्धत आहे. पुजाऱ्यांच्या नियुक्तीचे निकष, त्यांची पात्रता, निवड यांविषयी अभ्यास करावा लागणार आहे. पगारी पुजारी नेमायचे की तुळजापूरची हिस्सेदारी पद्धत अवलंबायची याचा निर्णय सरकार घेईल.’

यावेळी संघर्ष समितीच्या सदस्यांनी पगारी पुजारी नियुक्तीसाठी सरकार अनुकूल आहे. हिस्सेदारी पद्धत न वापरता जादा पगार देऊन पुजारी नेमावेत अशी मागणी केली. पंढरपुरात पगारी पुजारी नियुक्ती केली याची माहिती घेतली जात आहे असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘कोल्हापुरातील मंदिर व इतिहास संशोधकांनी राज्यातील मंदिरांना भेट देऊन सरकारला अहवाल द्यावा’ अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी सूचना केली. हिवाळी अधिवेशनात पगारी पुजारी नियुक्ती कायदा मंजूर करण्यासाठी कार्यवाही करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.


नवरात्र, दिवाळीत आंदोलन नको

‘पगारी पुजारी नियुक्तीसाठी सरकार पावले उचलत आहे. त्यामुळे संघर्ष समितीने नवरात्र उत्सव काळात आणि दिवाळीत आंदोलन करू नये अशी विनंती पालकमंत्र्यांनी केली. ‘दोन सणांच्या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात येतात. आंदोलनामुळे भाविक बिथरण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम इथल्या पर्यटनावर होऊ शकतो याकडे लक्ष वेधले. समितीच्या सदस्यांनी दोन सणांमध्ये आंदोलन केले जाणार नाही’ अशी ग्वाही समितीच्या सदस्यांनी दिली.

ठाणेकरांचा वार

अंबाबाई घागरा-चोळी परिधान केल्याबद्दल श्रीपूजक अजित ठाणेकर यांना मंदिर परिसरात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. पण २९ व ३० सप्टेंबर रोजी ठाणेकर यांचा पुजेचा ‘वार’ आहे. खंडेनवमी व दसऱ्याला ठाणेकर पूजा बांधणार की अन्य श्रीपूजक बांधणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत शॉर्टसर्किटनेकारखान्याला आग

$
0
0

इचलकरंजी

शहापूर येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या वायडिंग कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत अंदाजे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याची माहीती प्रत्यक्षदर्शींनी दिली. रात्री उशिरापर्यंत याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये अशोक बोहरा यांच्या मालकीचा शेड आहे. या शेडमध्ये एम. रमेश यांनी वायडिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. वायडिंगवर सूत बिमे तयार करून ते कारखानदारांना देतात. त्यातून कापड तयार करून घेण्याचे काम रमेश करतात. सोमवारी शॉर्टसर्किटने वायडिंग मशीनला अचानकपणे आग लागली. त्यावेळी दैनंदिन काम सुरू होते. ही बाब कामगारांच्या लक्षात येण्याच्या आगोदरच आगीने रौद्र रूप धारण केले. वायडिंग मशीन शेजारी असणाऱ्या कापड गोडाऊनला देखील आगीने वेढा दिला. या गोडाऊनमध्ये २०० ते २५० कापड गाठी असल्याची माहीती कामगारांनी दिली.

आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान, कामगार आणि भागातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या आगीत वायडिंग कारखान्याला लागणारे सूत, कापडाचे तागे भस्मसात झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली जिल्ह्यात वाळू तस्करांवर बडगा

$
0
0




आठ दिवसांपासून सुरू केलेल्या वाळू तस्करीविरोधातील मोहिमेला आणखी गती आली आहे. आठ दिवसांत ५०९ वाळू साठे आढळले असून, ४७८० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. संबंधितांना १३१ कोटी दंडाची नोटीस धाडण्यात आली आहे. दंड वसुलीची मोहीम सुरू झाली असून, एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक आठवड्यात तहसीलदारांनी वाळू माफियांवर ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे. त्या करिता तहसीलदारांनी, सर्वेक्षण करणे, संबंधित प्रकरणे रजिस्टर करणे, आलेल्या तक्रारींची दखल घेणे, शहानिशा करून ठिकाणे निश्चित करुन कारवाई करणे अशा प्रकारे काम करण्याचे निर्देश जारी केले आहेत. तसेच प्रत्येक आठवड्यात याचा आढावा घेण्यात येत आहे. परिणामी त्याचे परिणाम देखील सकारात्मक दिसत आहेत. ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाळूचे पंचनामे करण्यात आले. यामध्ये मिरजेत ३३ वाळू साठे आढळून आले. तेथून १३३८ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. संबंधितांना १४ लाख ९१ हजार रूपयांचा दंड करण्यात आला. त्याचप्रमाणे तासगावला २५२ वाळू साठ्यातून ७५७ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. २ कोटी १४ लाख रुपये दंड करण्यात आला. एमपीडीए कायद्याअंतर्गत जिल्ह्यात पहिल्यांदाच दोघा वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा सोमवारी उचलण्यात आला. धनाजी निवृत्ती पाटील (रा. कवलापूर) आणि अविनाश गोरख शिंदे (रा. बुधगाव) या दोघांना अटक करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.


केवळ वाळू तस्करच नव्हे तर त्यांच्या पाठीराख्यांच्याही मुसक्या आवळण्यात येणार आहेत. वाळू तस्करांवर महाराष्ट्र धोकादाय व्यक्ती, अंमल पदार्थ, गौण खनिज तस्करीस प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्याचा श्रीगणेशा सोमवारी केला आहे. तस्करांच्या अंगात दम असेल तर त्यांनी मैदानात यावे.

विजयकुमार काळम-पाटील,
जिल्हाधिकारी, सांगली

----------

महसूल अधिकाऱ्यांची चौकशी

विजयकुमार काळम म्हणाले, जिल्ह्यातील वाळू तस्करांचा बंदोबस्त करणे याला प्राथमिकता असणार आहे. माझ्याकडे महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबतच्या काही निनावी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेवून संबंधितांची गुप्त पद्धतीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निश्चित कारवाई करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​कृष्णामाईला ७५० मीटरची साडी

$
0
0



कराड : येथे गेले वर्षभर सुरू असलेल्या कन्यागत महापर्वाची सांगता मंगळवारी झाली. त्या निमित्त कृष्णामाईला ७५० मीटर लांबीच्या १२५ साड्या नेसविण्यात आल्या. त्यानंतर कृष्णामाईची महाआरती करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी कराड शहरासह परिसरातील भाविकांनी येथील प्रीतिसंगम घाटावर मोठी गर्दी केली होती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते.
मंगळवारी सकाळी कृष्णा नदीला दक्षिण तीरापासून उत्तर तीरापर्यत ७५० मीटर लांबीची साडी नेसवण्यात आली. गुरू ग्रहाच्या राशी बदलामुळे तो मूळ राशीत प्रवेश करणार असून, गंगा बेल्लारी या तीर्थक्षेत्री तुंगभद्रा नदीमध्ये वास्तव्य करणार आहे. तिची पाठवणी करण्याच्या निमित्ताने हा सोहळा साजरा करण्यात आला. वाराणसी व प्रयागमध्ये गंगा नदीला साडी नेसवली जाते, त्याप्रमाणे यावेळी कृष्णा नदीलाही साडी नेसवण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहिष्कार घालणाऱ्या जात पंचायत सदस्यांवर गुन्हा

$
0
0

सांगली : आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास पाठिंबा दिल्याच्या कारणावरून नंदीवाले समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबावर गेल्या दहा वर्षांपासून बहिष्कार टाकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मिरज तालुक्यातील तुंग गावातील ही घटना असून, पीडित पांडूरंग तमण्णा चौगुले (नंदीवाले) यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर आपली कैफीयत मांडल्यानंतर संबधित जात पंचायतीमधील तेरा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर सांगलीत पहिल्यांदाच या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
मिरज तालुक्यातील तुंग गावात नंदीवाले समाज राहात असून, दहा वर्षांपूर्वी या समाजातील जात पंचायतीने पांडुरंग चौगुले यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले होते. त्यांना समाजाच्या धार्मिक, लग्न, मयत अशा कोणत्याही कार्यक्रमास बोलावले जात नव्हते. कोणीही नातेवाईक, समाज बहिष्कृत कुटुंबाशी संबंध ठेवत नव्हते. तब्बल दहा वर्षे सतत अपमानित होऊन जगावे लागत असल्याने कुटुंबावर गाव सोडायची वेळ आली होती. अखेर पांडूरंग चौगुले यांनी सांगलीच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितिकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर अंनिसचे राहुल थोरात, संजय बनसोडे, प्रा. सतीश चौगुले, अवधूत कांबळे, अजय भालकर, प्रा. अनंतकुमार पोळ यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांची भेट घेऊन सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी तुंग गावाला प्रत्यक्ष भेट देऊन सखोल चौकशी केली. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी शंकर यल्लाप्पा चौगुले, रावसाहेब शंकर चौगुले, पांडुरंग लक्ष्मण चौगुले, गजानन राजाराम चौगुले, शिवाजी राजाराम चौगुले, दिलीप श्रीपती चौगुले, सोपान लक्ष्मण चौगुले, ज्ञानदेव लक्ष्मण चौगुले, अशोक ज्ञानदेव चौगुले, विलास शिन्नाप्पा चौगुले, आप्पासो शिन्नाप्पा चौगुले, महेश तुकाराम चौगुले, नितीन तुकाराम चौगुले (सर्व रा. तुंग, नंदीवाले वसाहत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​उत्तरा केळकर यांना राम कदम पुरस्कार

$
0
0



मिरज : शहरातील श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा संगीतकार कै. राम कदम पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर (मुंबई) यांना तर, तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार उदयोन्मुख तबलावादक धनश्री नागेशकर (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे. अंबाबाई नवरात्र संगीत उत्सवास २१ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. या महोत्सवात पहिल्यांदाच अमेरिकेच्या नॅश न्यूबर्ट यांचे बासरी वादन होणार असल्याची माहिती अध्यक्ष मधुकर पाटील-मळणगांवकर यांनी दिली. या वेळी सचिव विनायक गुरव, खजिनदार संभाजी भोसले, ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब मिरजकर उपस्थित होते.
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचे यंदाचे ६३ वे वर्ष आहे. दरवर्षी संगीत क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या कलाकारांना ज्येष्ठ संगीतकार कै. राम कदम पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा पुरस्कार उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्ष अनिता सगरे यांच्या हस्ते प्रसिद्ध संगीतकार विजय राम कदम यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. तर, अबन मेस्त्री पुरस्कार उदयोन्मुख तबलावादक धनश्री नागेशकर यांना २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सांगली धर्मादाय उपायुक्त महावीर जोगी यांच्या हस्ते जितेनभाई झव्हेरी (मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

संगीत सेवा पुरस्कार
श्री अंबाबाई संगीत महोत्सवात सेवा अर्पण करणाऱ्या व्यक्तींना यंदापासून श्री अंबाबाई संगीत सेवा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचा पहिला मान सुभाष सव्वाशे यांना मिळाला आहे. ते अनेक वर्षापासून संगीत महोत्सव काळात दहा दिवस अगदी अल्पमोबदल्यात मंडपसह अन्य डेकोरेशन सेवा पुरवितात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिरो पेंडन्सीत कोल्हापूर प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल अभियानात कोल्हापूर विभागाने प्रथम स्थान मिळवले आहे. कोल्हापूर विभागाने ८६.४१ टक्के झिरो पेंडन्सी करण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या कल्पनेतून झिरो पेंडन्सी अभियानाची सुरुवात एक मे २०१७ पासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसीय कार्यालयातील सर्व दप्तरे सहा गठ्ठा पद्धतीने लावण्यात आली आहेत. हा उपक्रम गेली साडेतीन महिने सुरू असून, महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त रोज दोन तास जादा वेळ देऊन झिरो पेंडन्सी उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. सुट्टीदिवशीही कर्मचारी कामावर येत होते.

कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कागदपत्राची काटेकोर तपासणी केली. कागदपत्रांचे अ, ब, क, ड, असे वर्गीकरण करून विशिष्ट रंगाच्या कापडात दप्तर बांधण्यात आले. प्रलंबित प्रकरणे, प्रकरणाची अधिक माहिती घेणे, आदेश नियम, रेकॉर्ड रूम पाठवायची कागदपत्रे व नाश करायची कागदपत्रे अशी विभागणी करण्यात आली.

‘अ’ प्रकारात कायम जतन करावयाची कागदपत्रे व फाइल्स ठेवण्यात आल्या आहेत. ‘ब’ प्रकारात तीस वर्षे जतन करून ठेवायची कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. ‘क’ १ मध्ये १० वर्षाची तर ‘क’ २ मध्ये एक ते पाच वर्षांची कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. ‘ड’ प्रकारातील सर्व कागदपत्रे व फायल्स नष्ट करण्यात आली आहे. ‘अ’ प्रकारातील सर्व फाइल्स व कागदपत्रे अभिलेख कक्ष म्हणजे रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्यात आली आहेत.

सव्वातीन महिन्यांच्या कालावधीत १३ लाख २७ हजार १८३ फाइल्स तपासण्यात आल्या. पाच लाख ४५ हजार फाइल्स जमा करण्यात आल्या, तर सात लाख ८१ हजार ५३६ फाइल्स अद्ययावत करण्यात आल्या आहेत. ३० वर्षांच्यावरील आठ लाख २२ हजार २६४ फाइल्स नष्ट करण्यात आल्या आहेत. नष्ट केलेल्या कागदपत्राचे वजन ३१ टन ३२४ किलो भरले. ही कागदपत्रे नष्ट करण्यात आली आहे. ई टेंडरिंगद्वारे रद्दी विकण्यात आली आहे.

एक मे ते ३१ मेअखेर ४५ हजार ५०९ प्रकरणे प्रलंबित होती. आठ सप्टेंबरअखेर ३९ हजार ३२६ प्रकरणे निर्गत करण्यात आली. ६१८३ प्रकरणे शिल्लक आहेत. त्यामध्ये विविध संस्थांनी जमिनीच्या मागणीची १४९६ प्रकरणे आहेत. झिरो पेंडन्सीमुळे सर्व कार्यालयांना शिस्त लागली असून, यापुढे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकरणाची फाइल्स ताबडतोब मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

संस्थानकाळात झिरो पेंडन्सीचा आदेश

जुनी कागदपत्रे तपासताना संस्थानकालातील अनेक दुर्मिळ कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. ९ फेब्रुवारी १९०१ रोजी झिरो पेंडन्सीबाबत राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून सर्व कागदपत्रांची मांडणी कशी करावी, याबाबतची सूचना आदेशात दिली आहे. तसेच १९१९ च्या आदेशात सर्व कर्मचाऱ्यांना याद्या तयार करण्याचा आदेश दिला होता. याद्या अपडेट न करणाऱ्यांच्या पगारातून पाच रुपये व एक रुपये पगारातून कापून घेण्याचे आदेश दिले होते.


फाइल्सवर यापुढे चेक लिस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात यापुढे कोणत्याची प्रकरणाची फाइल चेकलिस्ट तपासून स्वीकारली जाणार आहे. कामे मंजूर करण्यासाठी कागदपत्रे आणा, अशी मागणी यापुढे होणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. चेक लिस्ट तपासूनच फाइल्स स्वीकारली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑटो एक्स्पो’ शुक्रवारपासून सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
रेडिओ मिर्ची ९८.३ आणि कोल्हापूर ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनच्या वतीने ‘ऑटो एक्स्पो २०१७’चे आयोजन केले आहे. प्रदर्शन नागाळा पार्क येथील एस्तेर पॅटन ग्राउंडवर १५ ते १८ सप्टेंबरअखेर सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी पाच वाजता महापौर हसीना फरास यांच्या होणार आहे. उद्घाटन समारंभास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, आदी उपस्थित राहणार असून, प्रदर्शनाला महाराष्ट्र टाइम्स मीडिया पाटर्नर असल्याची माहिती रेडिओ मिर्चीचे स्टेशन डायरेक्टर तेजोमय खर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खर्डेकर म्हणाले, ‘कोल्हापूरकरांचे मोटार प्रेम जगात भारी आहे. जगभरातील उत्तमोत्तम आणि लेटेस्ट मॉडेल्सच्या मोटारी कोल्हापूरच्या रस्त्यावरून धावताना नेहमीच दिसतात. मात्र, काहींची स्वप्ने सत्यात उतरतात, तर काहींची तशीच राहून जातात. अशा व्यक्तींसाठी ऑटो एक्स्पोचे आयोजन केले आहे. ऑटो एक्स्पोमध्ये ऑडी, डुकाटी, जग्वार लँडरोव्हर, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, मोटारॅड ते सुपर बाइक्स ड्रीम कार्स पाहण्याची संधी मिळणार आहे. केवळ चारचाकी व मोटारसायकल पाहण्याची संधी मिळणार नसून विविध विक्रेत्यांकडून आकर्षक सवलती आणि योजनांसह त्यांच्या बुकिंगची सुविधा देण्यात येणार आहे.’

खर्डेकर पुढे म्हणाले, ‘यावर्षीच्या कोल्हापूर ऑटो एक्स्पोमध्ये मोपेडपासून सुपर बाइक्सपर्यंत आणि बेसिक कारपासून प्रीमियर कार मॉडेल्सपर्यंत सर्वांच्या पसंतीच्या गाड्या एकाच छताखाली पाहण्याची संधी मिळणार आहे. यासाठी ६४ स्टॉलची मांडणी करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि परिसरातील मोटारसायकल व चारचाकी विक्रेते एक्स्पोमध्ये लेटेस्ट मॉडेल्स आणि ऑफर्ससह सहभागी होणार आहेत. याशिवाय इंजिनीअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ऑटोमोबाइल्स क्षेत्रात तयार केलेल्या संशोधनाला ऑटो एक्स्पोमध्ये स्थान देण्यात येणार आहे. एक्स्पोमध्ये म्युझिकल मनोरंजन आणि खास खवय्यांसाठी फूड स्टॉलही उभारण्यात येणार आहेत.’

कोल्हापूर आणि परिसरातील सर्व टू आणि फोर व्हिलर डीलर्स आपापल्या लेटेस्ट मॉडेल्स आणि ऑफर्ससह यात सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांच्या ऑटो कलाविष्कारालाही प्रदर्शनामध्ये प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. याशिवाय ऑटो फायनान्स पुरवणाऱ्या विविध बँक्स आणि संस्थांचे प्रतिनिधीही उपलब्ध असतील. आपल्या आवडत्या गाड्यांना प्रत्यक्ष आणि एकत्र पाहून त्यातून सर्वोत्तम गाडी बुक करण्याची संधी यावेळी सर्वांना मिळणार आहे. मिर्ची ९८.३ चे सर्व आरजे काही आवडते सेलिब्रिटीही प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार आहेत. पत्रकार बैठकीस मनीष आपटे, अनया जमदग्नी, अमृता जगदाळे, अक्षय रोटे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेजारणीनेच चोरले पावणेदोन लाखांचे दागिने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनावट चावीच्या साहायाने शेजारच्या घरात शिरून १ लाख ८० हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या महिलेस लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केले. आसमा शाहरुख मुल्ला (वय २२, रा. साई गल्ली, लक्षतीर्थ वसाहत) असे संशयित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिला अटक करून चोरीतील सर्व दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली. इब्राहिम हुसेन शेख (रा. साई गल्ली, लक्षतीर्थ वसाहत) यांनी ३ सप्टेंबरला फिर्याद दिली होती.

फिर्यादी इब्राहीम हे पत्नी आणि दोन मुलांसह लक्षतीर्थ वसाहतीत साई गल्लीत राहतात. त्यांच्या घराशेजारी आसमा मुल्ला यांचे घर आहे. दोन्ही कुटुंबांचे परस्परांच्या घरी येणे-जाणे होते. २ सप्टेंबर रोजी आसमा मुल्ला यांनी त्यांच्या घरातील कुलूप बिघडल्याचा बहाणा कुलूप इब्राहीम शेख यांच्या पत्नीकडून त्यांच्या घराचे कुलूप आणले. त्याचदिवशी आसमा हिने त्या कुलुपाची बनावट चावी तयार करून घेतली. रात्री शेख यांचे कुलूप परत केले.

दुसऱ्या दिवशी दुपारी शेख हे पत्नी, मुलांसह बाहेर गेले. शेख यांचे घर बंद असल्याचे पाहून आसमा हिने बनावट चावीने त्यांच्या घराचे कुलूप काढले. कपाटातील डब्यात ठेवलेले सोने, चांदीचे दागिने, रोख एक हजार रुपये लंपास केले. कपाटातील इतर वस्तू जिथल्या तिथे ठेवून पुन्हा घराला कुलूप लावून आसमा स्वतःच्या घरी गेली. सायंकाळी घरी परतल्यानंतर इब्राहीम शेख यांच्या पत्नीला दागिन्यांचा डबा रिकामा असल्याचे दिसले. त्यांनी पती ईब्राहीम यांना याची माहिती दिली.

शेख यांनी तातडीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर घराचे कुलूप, खिडक्या सुस्थितीत असल्याचे दिसले. दागिन्यांच्या डब्याशिवाय अन्य वस्तू जैसे थे असल्याने माहितगार व्यक्तीनेच चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. शेख यांनी शेजारच्या आसमा यांच्यावर संशय व्यक्त करताच पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली. आसमा यांच्या हाताचे ठसे घरातील कपाटावर आणि दागिन्यांच्या डब्यावर जुळताच चोरीचा उलगडा झाला. तपासात संशयित आसमा हिने चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी तिच्याकडून सोन्याचा २० ग्रॅमचा नेकलेस, १५ ग्रॅमची कर्णफुले, १२ ग्रॅमच्या बांगड्या, ९ ग्रॅमची चेन, तीन अंगठ्या, लहान मुलांच्या सहा अंगठ्या, चांदीचा करदोडा, चांदीचे कडे, छल्ला, बिंदल्या यांसह रोख १ हजार रुपये असा १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी पाच दिवसात या चोरीचा छडा लावला.

डीबी पथकाची पाळत

फिर्यादी इब्राहीम शेख यांनी शेजारील महिलेवर संशय व्यक्त केल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सलग चार दिवस आसमा मुल्ला हिच्यार पाळत ठेवली. तिच्या संशयास्पद हालचाली पाहून चौकशी सुरू केली. हातांचे ठसे घेतल्यानंतर आपले बिंग फुटणार या भीतीने तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्या घरातून चोरीतील मुद्देमाल जप्त केला.

गोड बोलून विश्वासघात

आसमा हिचे नेहमीच शेख यांच्या घरात येणे-जाणे होते. घरात दागिने कुठे ठेवले जातात याची माहिती तिला होती. शेजारी असल्याने शेख कुटुंबीयांचा तिच्यावर विश्वास होता. कुलूप बिघडल्याचे सांगितल्याने शेख यांच्या पत्नीने विश्वासाने कुलूप दिले. मात्र त्याचा गैरफायदा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्विनी रामाणेंचे पद कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसच्या माजी महापौर अश्विनी रामाणे यांचे नगरसेवकपद अवैध ठरवणाऱ्या विभागीय जात पडताळणी समितीच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने मंगळवारी स्थगिती दिली. त्यामुळे रामाणे यांचे नगरसेवकपद कायम राहिले असून शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागात सुरू करण्यात आलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली आहे. पोटनिवडणूक लागलेली असताना रामाणे यांना हायकोर्टाने दिलासा देण्याचा महापालिकेच्या इतिहासातील पहिलाच प्रकार आहे. जानेवारीमध्ये रामाणे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते.

शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागातून रामाणे या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. काँग्रेस पक्षाच्या असलेल्या रामाणे यांना पहिल्याच टप्प्यात महापौर बनण्याची संधी मिळाली होती. महापौरपदासाठी प्रचंड प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. मात्र सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते. त्यामुळे दाखला अवैध ठरवल्याने अपात्र ठरवण्यात आले. त्याला हायकोर्टात आव्हान दिल्यानंतर स्थगिती देत जातीच्या दाखल्याच्या वैधतेबाबत विभागीय जातपडताळणी समितीने फेरपडताळणी करावी असा आदेश दिला होता. त्यामध्ये समितीने त्यांचा दाखला अवैध ठरवून नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई केली होती. त्यानुसार रामाणे यांचे नगरसेवक पद तत्कालिन आयुक्त पी. शिवशंकर यांनी २८ जानेवारीला रद्द केले होते. त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. जात पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात रामाणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. समितीच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा म्हणून याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती बी. आर. गवई व एम. एस. कर्णिक यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत रामाणे यांचे वकील अॅड. तानाजी मातुगडे यांनी युक्तीवाद केला. पोलिस द​क्षता पथकाने दिलेल्या अहवालाचा विचार न करता फेरपडताळणीनंतर विभागीय समितीने निकाल दिला. या पथकाचा अहवाल अमान्य असेल तर निकालात कारणे द्यावी लागतात. पण ती नमूद केलेली नाही, असे अॅड. मातुगडे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन कोर्टाने रामाणे यांचे पद अवैध ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे वकील उपस्थित होते. त्यांच्याकडून या प्रभागात पोटनिवडणूक जाहीर केली असल्याचे सांगितले. त्यावेळी कोर्टाने याबाबतचे मत पुढील तारखेला सादर करण्यास सांगितले. तसेच निवडणूक प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

फटाके वाजवून आनंद

नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्याने आता साहजिकच पोटनिवडणूकही रद्द करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला आदेश काढावा लागणार आहे. कोर्टाचा आदेश मिळाल्यानंतरच महापालिका निर्णय घेणार आहे. रामाणे यांच्या बाजूने अ‍ॅड. तानाजी मातुगडे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर रामाणे यांच्या समर्थकांनी रायगड कॉलनी, कळंबा परिसरात फटाके वाजवून आनंद साजरा केला.


रामाणेंचा प्रवास

शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागामध्ये ओबीसी महिला आरक्षण आहे. त्यामधून अश्विनी रामाणे या निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना ९ मे २०१६ रोजी अपात्र ठरवण्यात आले होते. त्या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितली होती. याबाबतची सुनावणी होऊन रामाणे यांच्या जातीच्या दाखल्याबाबतची फेरपडताळणी करण्याचे आदेश जात पडताळणी समितीला दिले होते. या समितीने पडताळणी करुन त्यांचा दाखला अवैध ठरवला होता. यानुसार २७ जानेवारी २०१७ रोजी आयुक्तांनी पद रद्द केले. या निर्णयाला रामाणे यांनी पुन्हा हायकोर्टात आव्हान दिले होते. त्याबाबतच्या सुनावणी सुरू होती. त्या याचिकेवर कोर्टाने मंगळवारी निर्णय दिला. या निर्णयामुळे त्यांचे पद अबाधित राहिले व निवडणुकीला स्थगितीही देण्यात आली.


राज्य निवडणूक आयोगाकडे लक्ष

रामाणे यांच्याबाबत दिलेल्या आदेशामुळे महापालिका प्रशासन तो आदेश मिळण्याची प्रतिक्षा करत आहे. रामाणे यांच्या प्रभागातील पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानंतर आयोग काय आदेश काढते यावर महापालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्यांच्या आदेशावर महापालिका पुढील प्रक्रिया करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत निवडणूक ऐन दिवाळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचातीच्या निवडणुकीसाठी १६ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतमोजणी दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे, १७ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे यंदा निवडणुका असणाऱ्या गावात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने निवडणुकीत मोठी चुरस दिसणार आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी निवडणुकीसंदर्भात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आचारसंहितेचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

या आधी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका १४ ऑक्टोबरला होणार होत्या. मात्र निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख बदलून ती १६ ऑक्टोबर अशी केली. निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. बैठकीत त्यांनी निवडणूक कार्यक्रम आणि आचा​रसंहितेच्या संदर्भात सूचना व आदेश दिले.

मतदारांना प्रलोभन ठरतील अशा संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेशही त्यांनी दिले. अर्ज ऑनलाईनव्दारे भरण्यात येणार असल्याने सर्व यंत्रणा व्यवस्थित उपलब्ध करुन देण्याची सूचना केली. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचातीसाठी १६४८ प्रभाग असून ४४३९ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

०००००००००००००

निवडणूक कार्यक्रम

अर्ज भरणे २२ ते २९ सप्टेंबर

छाननी ३ ऑक्टोबर

अर्ज माघारी ५ ऑक्टो. दुपारी ३ पर्यंत.

चिन्हे वाटप व उमेदवार यादी ५ ऑक्टोबर

मतदान १६ व मतमोजणी १७ ऑक्टोबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुस्लिम बोर्डिंगमध्ये सत्तारुढ विरुद्ध परिवर्तन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या (मुस्लिम बोर्डिंग) त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये चांगली चुरस निर्माण झाली आहे. मंगळवारी सत्तारुढ ‘फताह-उल-आभिमन’ जुने पॅनेल व राजर्षी शाहू मुस्लिम बोर्डिंग परिवर्तन पॅनेल यांची घोषणा करण्यात आली. बुधवारी (ता. १३) चिन्ह वाटप झाल्यानंतर आणखी एका पॅनेलची भर पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुस्लिम बोर्डिंगच्या १३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी दोन पॅनेलची अधिकृत घोषणा करण्यात आली. बुधवारी चिन्ह वाटप झाल्यानंतर आणखी एका पॅनेलची भर पडणार आहे. कादर मलबारी, गणी आजरेकर व आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली सत्तारुढ आघाडीने पॅनेल जाहीर केले. सत्तारुढ जुन्या पॅनेलमधून चेअरमनपदासाठी गणी आजरेकर, उपाध्यक्षपदाकरीता आदिल फरास व सुपरिटेंडंट पदासाठी साजिद गुलाबखान निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. याच पॅनेलमधून संचालक म्हणून पापाभाई बागवान, जहाँगीर हुसेन, लियाकत कादर, झांजी बाळू, आमिर चाँदसाहेब, रफीक खुबद्दीन मुल्ला, मलिक बागवान, रफिक हारुणसो शेख, फारुक पटवेगार निवडणूक लढवत आहेत.

तर राजर्षी शाहू मुस्लिम बोर्डिंग परिवर्तन पॅनेलमधून चेअरमनपदासाठी यासीन बागवान, उपाध्यक्षपदासाठी हिदायत मणेर, सुपरिटेंडंट पदासाठी अॅड. मुनाफ मणेर निवडणूक लढवणार आहेत. तर संचालकपदासाठी परिवर्तन पॅनेलमधून आय. जी. शेख, के. एम. बागवान, मुस्ताक पठाण, रहीम बागवान, माजीद सनदी, आदम बागवान, मुस्ताक मकानदार, सलीम पटवेगार व यासिन मुल्लाणी निवडणूक लढवणार आहेत. परिविर्तन पॅनेलचे नेतृत्व झाकीर कुरणे, इक्बाल देसाई आदी करीत आहेत.

दरम्यान डॉ. नमाजी, सी.ए. गौस सौदागार यांच्या नेतृत्वाखालीही तिसऱ्या पॅनेलची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्तारुढ जुन्या पॅनेलचा प्रचार शुभारंभ बुधवारी (ता. १३) बिंदू चौक येथील कसबेकर कोलड्रिंक हाऊस शेजारी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. मंगळवारी दोन पॅनेलची घोषणा झाली असून बुधवारी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फखरुद्दीन मुजावर काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराला पावसाने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग चौथ्या दिवशी शहराला पावसाने झोडपले. विजांच्या प्रचंड कडकडाटांसह रात्री साडेनऊच्या सुमारास आलेल्या पावसाने शहराच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. गेल्या तीन दिवसांप्रमाणेच मंगळवारीही दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता.

संध्याकाळच्या सुमारात पाऊस येईल, असे वाटत होते. मात्र, वातावरण पूर्णपणे निवळले होते. मात्र, रात्री आठनंतर उकाड्यात प्रचंड वाढ झाली. अंगाची काहिली होऊ लागली. अशा वातावरणातच रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. किमान तासभर तरी पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. लागोपाठ विजांचा कडकडाट होऊ लागल्याने काही ठिकाणी वीजही गायब झाली. शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. शहराच्या अनेक भागांत पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसाने काही रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते.

सुमारे दीड तास झालेल्या दमदार पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. रात्री अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची प्रचंड त्रेधातिरपीट उडाली. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी यासह मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, तसेच उचगाव, पाचगाव, कळंबा या परिसरातील उपनगराला पावसाने चांगलाच दणका दिला. कळंबा तलावाचे पाणी या पावसाने वाढत आहे. या पावसाळ्यात प्रथमच कळंबा भरण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान, हा पाऊस पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अनेक ठिकाणी पिके पोसवली आहेत. या परिस्थितीत पावसाची आवश्यकता आहे. तथापि, काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासाठी मात्र पाऊस नुकसानकारक ठरणार आहे.

ऑक्टोबर हिटचा अनुभव

गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा आणि सायंकाळनंतर गडगडाटासह पाऊस येतो. मंगळवारी अकरानंतर उन्हाचे चटके बसत होते. दुपारी तर ऑक्टोबर ‌हिटसारखीच स्थिती होती. उन्हाच्या चटक्याने अंगाची काहिली होत होती, पण सायंकाळी पावसाची चिन्हे होती. मात्र रात्री उशीरा पावसाने हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिटिंग पॉइंट रडारवर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील तरुणाईची गर्दी हल्ली मिटिंग पॉइंटवर वाढत आहे. विशेषतः कॉलेज तरुण-तरुणी मिटिंग पॉइंटवर टाइमपास करीत आहेत. कॅफे, आईस्क्रीम पार्लर, कोल्ड्रिंक्स सेंटर यासह नामांकित हॉटेल्समध्ये पॉँज ही नवी व्यवस्था उदयाला आली आहे. मिटिंग पॉइंटवर नशाखोरीसह रासलीलाही राजरोस घडत आहेत. त्यामुळे तरुणाईला वाममार्गावर घेऊन जाणारे मिटिंग पॉइंट पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी जुना राजवाडा पोलिसांनी सलग दोन दिवस आईस्क्रीम पार्लर आणि कॅफेवर कारवाई केली. हॉकी स्टेडियम आणि बिनखांबी गणेश मंदिराजवळ मिटिंग पॉइंटमध्ये कॉलेजचे तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना पोलिसांना सापडले. कॅफे आणि आईस्क्रीम पार्लरच्या नावाने सुरू असलेल्या या ठिकाणांवर तरुणांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. १०० ते ५०० रुपये अधिकचे मोजल्यास तरुणांना एकांताची जागा दिली जाते. सीसीटीव्हीच्या नजरेतून बाजूला हवा तितका वेळ बसण्याची मुभा, सोबतीला मंद सुरावट आणि सुरक्षित एकांताची हमी मिळत असल्याने शहरातील कॅफेसह आईस्क्रीम पार्लरमध्ये दिवसभर तरुणाईची गर्दी असते. ही गर्दी केवळ कॉफी किंवा आईस्क्रीमचा आस्वाद घेण्यासाठी नाही, तर त्यापुढे जाऊन येथे रासलीलाही चालतात. पोलिसांना याची माहिती मिळताच संशयास्पद मिटिंग पाइंटवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी हॉकी स्टेडियम परिसरातील एका आईस्क्रीम पार्लरवर कारवाई करून चौदा जोडप्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर बिनखांबी गणेश मंदिरातील एका कॅफेत कारवाई करून अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना समज दिली. असे प्रकार शहरात ताराबाई पार्क, सायबर, राजारामपुरी, मिरजकर तिकटी परिसरात सुरू आहेत. काही कॅफे आणि पार्लरमध्ये पडद्यांसह स्वतंत्र कक्षही तयार केले आहेत. या एकांतात अनेक गैरप्रकार चालतात. विशेष म्हणजे यासाठी कॅफे मालकांकडून १०० ते ५०० रुपये उकळले जातात. केवळ जागेच्या भांडवलावर रोज हजारो रुपये मिळत असल्याने कॅफे मालक मालामाल होत आहेत. बंद दाराआड सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराला कॅफे आणि आईस्क्रीम पार्लरच्या गोंडस नावाखाली झाकण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकार तरुणाईला वाममार्गाला लावणारा असल्याने पोलिसांनी यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व कॅफे, आईस्क्रीम पार्लर आणि संशयास्पद कोल्ड्रिंक्स सेंटर्सना पोलिसांनी दक्षता घेण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. कॉलेज परिसरातील मिटिंग पॉइंटवर पोलिसांनी करडी नजर आहे. याशिवाय गैरप्रकार चालणाऱ्या मिटिंग पॉइंटबाबत परिसरातील नागरिकांनीही तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

=====

पालक अनभिज्ञ

कॉलेजमध्ये जाण्यासाठी सकाळी घराबाहेर पडणारी मुले संध्याकाळपर्यंत बाहेरच भटकतात. यांचा पत्ता कॉलेजमध्ये नसतोच. उद्याने आणि मिटिंग पॉइंटवर तासन्‍तास वेळ वाया घालवतात. याबाबत पालक मात्र पूर्णतः अनभिज्ञ असतात. हॉकी स्टेडियम परिसरात कारवाई केल्यानंतर पोलिस ठाण्यात आलेल्या पालकांनी मुलांच्या कारनाम्यांबाबत काहीच माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे बहुतांश पालकांना धक्का बसला.

=========

उद्यानांतही तरुणांची गर्दी

शहरातील उद्यानांमध्ये दुपारपर्यंत तरुणांची गर्दी असते. हुतात्मा पार्क, महावीर गार्डन, सासने ग्राउंडसमोरील ताराबाई गार्डन, नागाळा पार्कातील नागोबा मंदिर येथे दुपारपर्यंत तरुणांचीच गर्दी असते. वाढदिवस साजरे करणे यासह दंगामस्तीचे प्रकार रोजचेच असतात. तरुणांच्या हुल्लडबाजीने ज्येष्ठ नागरिकांना उद्यानांमध्ये थांबणे कठीण होत आहे.

===========

शहरातील कॅफे सेंटर्स, आईस्क्रीम पार्लर किंवा कोल्ड्रिंक्स सेंटर्समधील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. जास्तीचे पैसे उकळून कोणी तरुणांना एकांत उपलब्ध करून देत असतील तर असे प्रकार चालणार नाहीत. संबंधित सेंटर चालकावरही कारवाई केली जाईल.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ताराबाई पार्का’त काँग्रेसही लढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताराबाई पार्क प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी ताराराणी आघाडीविरोधात काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी इच्छुकांकडून भेटीगाठी सुरू असून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत रविवारनंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचाही उमेदवार रिंगणात राहणार असल्याने

या प्रभागात तिरंगी लढत होणार आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे मतदारांनी ज्यांना जादा कौल दिला आहे, त्यांच्याकडे ती जागा जाईल, असे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील प्राथमिक बैठकीत ठरवण्यात आले होते. त्यानुसार दोन्ही प्रभाग काँग्रेससाठी सोडण्याचे जवळजवळ निश्चित झाले होते. दरम्यान, शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागाची निवडणूक स्थगित झाली. त्यामुळे तेथील काँग्रेस उमेदवाराचा प्रश्न निकाली निघला आहे. पण ताराबाई पार्क प्रभागाच्या निवडणुकीच्या हालचाली वेगावल्या आहेत. ताराराणी आघाडीकडून रत्नेश शिरोळकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवसेना तेथील शिवसैनिकाला उमेदवारी देण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळे इतर इच्छुकांना काँग्रेसशिवाय पर्याय राहिलेला नाही.

यासाठी इच्छुकांनी काँग्रेसच्या कारभाऱ्यांकडे भेटीगाठी चालवल्या आहेत. आमदार सतेज पाटील रविवारनंतर उमेदवार निश्चित करणार आहेत. काँग्रेसच्या पातळीवर यापेक्षा फार मोठ्या हालचाली नाहीत. या प्रभागातील माजी नगरसेवक निलेश देसाई यांच्याकडून ताराराणी आघाडीला बळ देण्यात येणार आहे. शिवसेनेचेही या प्रभागात मतदान असल्याने तिरंगी लढतीत उमेदवारांचा कस लागणार आहे. भाजप, ताराराणी आघाडीकडून महापालिकेतील संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर हा नगरसेवक निवडून आल्यास काँग्रेसचे संख्याबळ वाढल्यास स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी इतर पक्षांवर अवलंबून रहावे लागणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून ही लढत प्रतिष्ठेची बनवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रमिक पतसंस्थेची चौकशी करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘देशात पुरोगामी विचार मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडे बोट दाखवले जाते, मात्र पुरोगामी आणि साम्यवादी विचार मांडणारे कार्यकर्ते, त्यांच्या अधिपत्याखालील संस्थांकडे दुर्लक्ष केले जाते. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या नेतृत्त्वाखालील श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थेत ४५ लाख ५१ हजार रुपयांच्या बेहिशोबी ठेवी आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालातही ठेवींचा उल्लेख दडवला आहे. त्यामुळे आर्थिक कारणातून पानसरे यांची हत्या झाली होती काय? याचा पोलिसांनी शोध घ्यावा,’ अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने मंगळवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, पानसरे कुटंबीयांनी हे आरोप फेटाळले आहेत.

अंनिसचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि भाकपचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे आर्थिक कारणे असावित, असा संशय हिंदू जनजागृती समितीने व्यक्त केला. याबाबत पत्रकार परिषदेत अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘कॉम्रेड पानसरे हे भाकपचे राज्य सचिव होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली श्रमिक प्रतिष्ठान, श्रमिक नागरी सहकारी पतसंस्था यांचे कामकाज चालत होते. पतसंस्थेत आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या नावे ठेवी आहेत. खाते क्रमांक १०१०५ ते १०१३१ यातील १३ खात्यांवर ४५ लाख ५१ हजार ३५२ रुपयांच्या ठेवी आहेत. भाकपने या ठेवींची माहिती निवडणूक आयोग, प्राप्तीकर विभागापासून दडवली आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीने याची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. हा काळा पैसा असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याचा तपास करावा. याशिवाय गौरी लंकेश यांच्या हत्येतही आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी.’

श्रमिक नागरी पतसंस्थेतील ठेवींबाबत हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर यांनी ३० ऑगस्टला सहकार उपनिबंधकांकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाकडे १७ नोव्हेंबर २०१६ रोजी तक्रार केली आहे. मात्र याची दखल घेतली नसल्याचे अॅड. इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मनोज खाड्ये, बंडा साळुंखे, महेश उरसाल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘आरोपांना बगल देण्याचा
सनातनी संस्थांचा प्रयत्न’

कोल्हापूर : हिंदू जनजागृती समितीच्या आरोपांना मेधा पानसरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘सनातनी संस्थांवर होत असलेल्या आरोपांना बगल देण्याचा हा प्रयत्न आहे. गोविंद पानसरे यांच्याशी संबंधित कोणत्याही संस्थेने काळा पैसा जमवलेला नाही. पोलिसांनी सुरुवातीलाच सर्व संस्थांमधील कागदपत्रे, ताळेबंद यांची तपासणी केली आहे. कॉम्रेड पानसरे यांना बदनाम करण्याचाच हा प्रकार आहे. याविरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहे.’ दरम्यान, ‘उजळाईवाडी येथील विमानतळ परिसरातील पक्षाची एक जागा विकली आहे. याशिवाय सदस्यांची वार्षिक वर्गणीची रक्कमही जमा केली जाते. यातून ४५ लाख रुपये जमा झाले आहेत’ असा खुलासा दिलीप पवार यांनी केला. पत्रकार परिषदेवेळी भाकपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images