Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एनए जमिनवापराच्या दंडात कपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महसूल प्राधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय जमिनीचा अनधिकृत अकृषिक वापर केल्यामुळे सरसकट ४० पट दंड आकारणीऐवजी त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यात आली असेल तर २० पट दंड आकारण्यात सांगण्यात आला आहे.

विविध अकृषिक कारणाकरीता जमिनींच्या वापरात अनाधिकृतरित्या करण्यात आलेल्या बदलांप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनाधिकृत अकृषिक वापरापोटी दंड व रुपांतरीत कर आकारणीसाठी नागरिकांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकरणी जास्तीत जास्त ४० पटीपर्यंत दंड आकारता येतो. हा दंड फक्त अकृषिक वापर अथवा जमिनीच्या वापरात विना परवानगी बदल केल्याच्या प्रथम वर्षासाठी आकारण्यात येतो. अनेक प्रकरणात या तरतुदींचा वापर करताना, प्रकरणांची गुणवत्ता न तपासता महाराष्ट्र जमिन महसूल संहितामधील कलम ४५ खाली अनधिकृत अकृषिक वापरापोटी सरसकट ४० पट दंड आकारण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक प्रकरणी दंडाची रक्कम कमी करण्याकरीता अपील दाखल करण्यात येतात. त्यामुळे सरकारने काही बदल केले आहेत.

शेत जमिनीचा अकृषिक वापर करण्याकरीता महसूल प्राधिकाऱ्याची तसेच बांधकाम नियोजन प्राधिकाऱ्याची मंजूरी नसेल तर दंडाची रक्कम ही अकृषिक आकारणीच्या ४० पट इतकी आकारण्यात यावी. ज्या प्रकरणात अकृषिक वापराची महसूल प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आलेली नाही परंतु बांधकामास नियोजन प्राधिकाऱ्यांची मंजूरी घेण्यात आलेली आहे अशा प्रकरणी अकृषिक आकारणीच्या २० पट इतकी दंडाची आकारणी करण्यात यावी. विशिष्ट प्रयोजनासाठी अकृषिक वापराकरीता महसूल प्राधिकाऱ्याकडून मंजूरी देण्यात आलेल्या वापराव्यतिरिक्त इतर अकृषिक प्रयोजनाकरीता जमिनीचा अनाधिकृतरित्या वापर करण्यात येत असेल तर बांधकामास प्राधिकाऱ्याची किंवा नियोजन प्राधिकरणाची मंजूरी नसेल तर दंडाची रक्कम ही अकृषिक आकारणीच्या ४० पट इतकी आकारण्यात यावी.

विशिष्ट प्रयोजनासाठी अकृषिक वापराची मंजूरी देण्यात आली असल्यास व तिचा वापर इतर प्रयोजनासाठी अनाधिकृतरित्या करण्यात आलेला असेल परंतु बांधकामास प्राधिकाऱ्याची किंवा नियोजन प्राधिकरणाची मंजूरी घेण्यात आलेली आहे, अशा प्रकरणी अकृषिक आकारणीच्या २० पट इतकी दंडाची आकारणी करण्यात यावी. महसूल प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय अनधिकृत वापर केल्याबद्दल किंवा अकृषिक वापरात अनाधिकृतरित्या बदल केल्याबद्दल दंड आकाराण्याचे धोरण फक्त ३१ मार्च २०१८ पर्यंत अवलंबण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.

अॅम्नेस्टी स्कीलची सुविधा

जिल्ह्यातील सर्व जमीनधारकांनी महसूल प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय अनधिकृत वापर केला असेल किंवा अकृषिक वापरात अनाधिकृतरित्या बदल केला आहे त्यांनी या तारखेपर्यंत तालुक्याचे तहसिलदार यांच्याकडे अर्ज करुन Amnesty Scheme अंतर्गत अकृषिक कराची २० पट दंडाची रक्कम भरुन जमिनीचा अनधिकृत अकृषिक वापर नियमित करुन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत दंडाची रक्कम भरणा न केल्यास कालावधी संपल्यानंतर संबंधितांना अकृषिक आकारणीच्या सरसकट ४० पट इतक्या दराने दंडाची रक्कम भरणा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वरिष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्यावर भ्याड हल्ला करून केलेल्या हत्येचा निषेध विविध संस्था आणि संघटनांनी केला. कोल्हापूर प्रेस क्लब, बळीराजा पार्टी, जिल्हा सर्वोदय मंडळ, रिपब्लीकन पक्षाच्यावतीने याचा निषेध करण्यात आला.

कोल्हापूर प्रेस क्लबने शुक्रवारी दसरा चौकात निदर्शने करून निषेध केला. हल्लेखोरांच्या तत्काळ अटकेची मागणी केली. लंकेश यांची हत्या म्हणजे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर झालेला हल्ला आहे. त्यामुळे पत्रकार संरक्षण कायदा तत्काळ करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, दोषींवर कडक कारवाई व्हावी, पत्रकार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. गौरी लंकेश यांना कोल्हापूर प्रेस क्लबने आदरांजली वाहिली. प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तानाजी पोवार, सुनंदा मोरे, भारत चव्हाण, विश्वास पाटील, रवी कुलकर्णी, अभिजित पाटील, समीर देशपांडे, संजीव खाडे, विकास कांबळे आदींसह पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन उपस्थित होते.

बळीराजा पार्टीच्यावतीने आयोजित बैठकीत हत्येचा निषेध करण्यात आला. पुरोगामी विचारवंतावर हल्ले करून लोकशाही संपविण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप अध्यक्षा शोभा खेडकर, महासचिव दिगंबर लोहार यांनी केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर मुंडे, संपर्कप्रमुख शिवाजी माळकर, बळवंत सुतार, पी. ए. कुंभार, रघुनाथ भालकर, भिकाजी कुंभार, किरण दिवटे, राधा मेस्त्री आदी उपस्थित होते.

जिल्हा सर्वोदय मंडळ, जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि स्वाभिमानी बाल हक्क संघटनेच्या बैठकीतही निषेध व्यक्त करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक व्ही. डी. माने, बाबुराव हसुरे, लहू कांबळे, कलगोंडा पाटील, दत्तात्रय कारदगे, सुंदर देसाई, दादासाहेब जगताप, एस. एस. तुपद, सखाराम सुतार, प्रा. सुजय देसाई आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) बैठकीत लंकेश यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे होते. यावेळी राज्य सहसचिव बी. के. कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ. अनिल माने, जिल्हा सरचिटणीस विलास भामटेकर, शहराध्यक्ष दत्ता मिसाळ, उपाध्यक्ष राजू वसगडेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश शिंदे आदी उपस्थित होते.

००

रविवारी निदर्शने

निर्मिती विचारमंच, जाती तोडो आंदोलन, आंबेडकरी पक्ष संघटना, जन आंदोलन, महाराष्ट्र विकास आघाडीच्यावतीने गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी (ता. १०) निदर्शने केली जाणार आहेत. दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पुतळ्याजवळ दुपारी चार वाजता निदर्शने होतील. निदर्शनात डॉ. ज. रा. दाभोळे, प्रा. शहाजी कांबळे, प्रा. विश्वास देशमुख आदी सहभागी होणार आहेत. निदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन निर्मिती विचारमंचने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिमान तंत्रज्ञानाशी होणार विद्यार्थ्यांची मैत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोशल मीडियाच्या युगातील विद्यार्थ्यांशी मैत्री तंत्रज्ञानासोबत अधिक वेगाने व्हावी यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि रिलायन्स जिओ यांच्यामध्ये झालेल्या करारामुळे तंत्रज्ञानासोबत संशोधन या संकल्पनेला वेग येणार आहे. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनाही ही वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ऑनलाइन कार्यप्रणालीलाही चालना मिळणार आहे. विद्यापीठाच्या परिसरात ही सेवा नाममात्र शुल्कात उपलब्ध होणार आहे. यातून अभ्यास व संशोधनासाठी आवश्यक असलेली माहिती मिळवणे, त्यासाठीच्या माहितीपटांची निर्मिती करणे शक्य होईल. विद्यापीठातील कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्याच्या उपक्रमालाही तंत्रज्ञानाची जोड मिळेल.

शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांना वाय-फाय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने रिलायन्स जिओ या कंपनीशी नुकताच सामंजस्य करार केला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या करारप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले व इंटरनेट विभाग समन्वयक डॉ. मिलिंद जोशी उपस्थित होते. रिलायन्स जिओतर्फे बालसुब्रमह्मण्यम अय्यर व किशोर पाटील उपस्थित होते. सामंजस्य करारावर विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी तर रिलायन्सतर्फे अय्यर यांनी स्वाक्षरी केल्या. या कराराच्या औपचारिकतेनंतर वायफाय सुविधा कार्यान्वित करण्याबाबत विद्यापीठ आणि रिलायन्सचे अधिकारी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टिने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

या सामंजज्य करारानुसार रिलायन्स जिओतर्फे विद्यापीठाच्या प्रांगणात वाय-फाय सुविधा माफक दरात उपलब्ध होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना १५३ रुपयांचे रिचार्ज मारल्यानंतर दररोज एक जीबी डेटा वापरण्यासाठी मिळणार आहे. या सेवेचा वेग जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन, नवी माहिती मिळवणे, अभ्यासू व्हिडिओंमधून नोंदी करणे या गोष्टी सोप्या होणार आहेत. यासाठी लागणारी उपकरणे व देखभालीचा खर्च रिलायन्स जिओ करणार आहे.

कोट

सध्या विद्यापीठाशी संलग्नित १६२ महाविद्यालयांत रिलायन्स जिओतर्फे वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व महाविद्यालये विद्यापीठास जोडली जातील. विविध विद्यापीठांच्या संलग्नतेमुळे संशोधन व प्रक्षेपणाच्या पातळीवरही संवाद साधण्याची संधी या करारामुळे निर्माण होणार आहे. विद्यापीठासह महाविद्यालयांत होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे प्रक्षेपण जिओ सेवेद्वारे करता येणे शक्य होणार आहे. तसेच, जिओ चॅट सेवेद्वारे दृश्य (व्हिडिओ) संपर्क साधणे सुलभ होणार आहे.

डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयातीचा फटका कारखानदारीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सणासुदीच्या तोंडावर बाजारपेठेत साखरेचे दर स्थिर राहण्यासाठी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने गुरुवारी कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला. निर्णयामुळे देशातंर्गत उत्पाद‌ित झालेल्या साखरेच्या दरावर परिणाम होणार असून त्याचा फटका साखर उद्योगाला बसणार आहे. एफआरपीपेक्षा साखरेच्या दर कमी राहिल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेणार आहेत.

२०१६-१७ च्या हंगमात साखरेचे जम्बो उत्पादन झाल्यानंतर साखरेच्या दरात प्रचंड घसरण झाली होती. घसरलेल्या दरांमुळे ऊस उत्पादकांना एफआरपी देणे मुश्कील झाल्याने राष्ट्रीयस्तरावर साखरेच्या आयात शुल्कामध्ये वाढ करण्याच्या मागणीने जोर धरला होता. शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री पासवान यांची भेट घेतली होती. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी याबाबत पंतप्रधान यांची भेट घेऊन याबाबत मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने १० जुलै रोजी कच्चा साखरेवरील आयात शुल्क ४० टक्क्यावरुन ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा साखर उद्योगाला झाला. त्यामुळे ३१०० ते ३२०० रुपये क्विंटल वरून हाच दर ३५०० ते ३७०० रुपये क्विंटल झाला होता. होलसेल बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्याने किरकोळ दरात किलोमागे चार ते पाच रुपयांची वाढ झाली होती.

कच्च्या साखरेवरील आयात शुल्क वाढवल्याने साखर उद्योगाला फायदा होण्यास सुरुवात झाली. मात्र त्यानंतर ऑगस्टमध्ये साखर साठ्यावर नियंत्रण आणण्यात आले. गळीत हंगाम दीड ते दोन महिन्यावर आलेला असताना पुन्हा कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. आयात साखरेचा कोटा प्रामुख्याने तामिळनाडू, आंध्रप्रेदश, कर्नाटक राज्यांसाठी असला, तरी त्यामुळे साखरेच्या दरावर त्याचा परिणाम होणार आहे. आयात केलेली साखर प्रक्रिया करून बाजारपेठेत येण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्याचवेळी नवीन हंगामातील साखर उत्पादनाला सुरुवात होणार आहे. एकाचवेळी बाजारपेठेत साखर येणार असल्याने दरांमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरात घसरण झाल्यास त्याचा परिणाम ऊस दरावर होणार आहे. त्यामुळे कारखानदारांसह ऊस उत्पादकांमध्ये या निर्णयाविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कच्ची साखर आयात केल्याचा परिणाम ऊसदरावर होणार असल्याने या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी खासदार शेट्टी लवकरच मंत्री पासवान यांची भेट घेणार आहेत.

चौकट

नवी बाजारपेठेला संधी गेली

जिल्ह्यात उत्पादित होणारी साखर प्रामुख्याने कोलकात्ता, ओडिशा व आसाम राज्यात पाठवली जाते. मात्र गेल्या हंगामात तामिळनाडू, कर्नाटक व आंध्रप्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन कमी झाल्याने येथील कारखानादारांना त्यानिमित्ताने नवी बाजारपेठ उपलब्ध झाली असती. त्यामुळे साखरेला दरही चांगला मिळाला असता, पण या तिन राज्यातील साखरेचे उत्पादन लक्षात घेऊन कच्ची साखर आयात केली जाणार असल्याने एक नवी बाजारपेठ तयार करण्याची संधी गेल्याची प्रतिक्रिया कारखानदारांकडून व्यक्त केल्या.

देशातील साखरेचा साठा पाहता कच्ची साखर आयात करण्याची आवश्यकता नव्हती. आयात केलेली साखर तयार होऊन बाजारपेठेत येण्यास दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्याचवेळी येथील साखर उत्पादनाला सुरुवात होणार आहे. एकाचवेळी बाजारात साखर आल्याने दर कोसळण्याची शक्यता असून त्याचा फटका कारखानदारीपेक्षा शेतकऱ्यांना जास्त बसणार आहे.

खासदार राजू शेट्टी


दोन महिन्यांपूर्वी आयात शुल्क वाढवून दिलासा मिळाला असताना काही दिवसांपूर्वी साखर साठ्यावर नियंत्रण आणले होते. त्यानंतर आता पुन्हा कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर उद्योगात अस्थिरता निर्माण होत असून सरकारची व्यापाऱ्यांशी मिलीभगत असल्याचा संशय येत आहे.

आमदार हसन मुश्रीफ

एक कोटी ९० लाख क्विंटल

२०१६-१७ हंगामातील उत्पादित साखर

६३ लाख ८१ हजार क्विंटल

हंगामातील शिल्लक साखर

दोन कोटी सात लाख क्विंटल

२०१७-१८ हंगामातील अपेक्षीत साखरेचे उत्पादन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम बोर्डिंगसाठीचे ९६ अर्ज छाननीत वैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दी मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या (मुस्लिम बोर्डिग) निवडणुकीसाठी दाखल झालेले सर्व ९६ अर्ज शुक्रवारी झालेल्या छाननीच्या प्रक्रियेत वैध ठरले. या निवडणुकीत १३ जागांसाठी हे अर्ज दाखल झाले होते.

मोहामेडन सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी १४ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (ता. ११ सप्टेंबर) अर्ज माघारीची मुदत आहे. तर २४ सप्टेंबरला मतदान आणि त्यानंतर लगेच मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी २००७ पूर्वीच्या वैध सभासदांना मतदान करता येणार असल्याचा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. निवडणूक रिंगणात गणी आजरेकर, आदिल फरास, हिदायत मणेर, अॅड. मुनाफ मणेर, ताजुद्दीन मुजावर, कादर मलबारी आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सध्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गणी आजरेकर, उपाध्यक्षपदी आदिल फरास, अधीक्षकपदी शौकत मुजावर, प्रशासकपदी कादर मलबारी आहेत. मतदारांची संख्या सुमारे २३०० आहे. काहींनी हरकत घेतल्यास मतदारांची संख्या कमी होऊ शकते. या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी नऊ, अध्यक्षपदासाठी १४, प्रशासक पदासाठी ६, अधीक्षक पदासाठी १२, संचालकाच्या ९ जागांसाठी ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे निवडणूक अधिकारी नूरमहमंद मुजावर यांनी सांगितले.



११ सप्टेंबर : उमेदवारी अर्ज माघार

१३ सप्टेंबर : उमेदवारांना चिन्हे वाटप

२४ सप्टेंबर : सकाळी ८ ते दुपारी ४ मतदान, ५ वाजता मतमोजणी आणि निकाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांना रोजंदारीवर घ्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना मित्रपक्षाने भोगावती सहकारी साखर कारखान्यात नोव्हेंबर २०१४मध्ये नव्याने केलेल्या ५८० नोकरांच्या १९९३ च्या स्टापिंग पॅटर्नप्रमाणे दिलेल्या ऑर्डरना स्थगिती देत मूळ दाव्याचा निकाल होईपर्यंत या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी न करता रोजंदारी म्हणून कामावर घ्यावे, असा आदेश औद्योगिक न्यायालयाच्या न्यायमूर्ती समीना खान यांनी दिला. नोकरभरतीबाबतचा मूळ दावा आठ महिन्यांत निकाली काढण्याचे दोन्ही पक्षकारांना आदेश दिले. त्यामुळे राष्ट्रवादी, शेकापच्या तत्कालीन संचालक मंडळास जोरदार झटका बसला आहे. जंबो नोकर भरतीतील कामगारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

भोगावती साखर कारखान्यावर राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना मित्रपक्षांची सत्ता असताना २६ नोव्हेंबर २०१४ रोजी नवीन ५७९ जणांची नोकरभरती केली. ही भरती करताना १९९३च्या स्टापिंग पॅटर्नचा आधार घेतला होता. त्यानंतर या नव्या भरतीतील कर्मचाऱ्यांनी कामावरून कमी करू नये म्हणून २०१५ मध्ये औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली त्यानुसार न्यायालयाने या नोकरांना कामावरून कमी करू नये असा तात्पुरता आदेश दिला. तर २७ मार्च २०१७ रोजी या नोकरांचा पगार देण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिला. त्यानुसार तत्कालीन प्रशासक मंडळाने एक महिन्याचा प्राव्हिडंड फंड व विमा रक्कम दिली. मार्च २०१७ मध्ये कारखान्याची निवडणूक झाली व सताधारी राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना मित्रपक्षांच्या आघाडीचा पराभव करत काँग्रेसने एकतर्फी सता मिळविली. जून २०१७ मध्ये कारखान्याच्या वतीने नोकरभरतीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने झालेली नोकरभरती रद्द करण्याची मागणी केली होती.

आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय होणे गरजेचे आहे. आमचा कोणावर व्यक्तिगत रोष नाही. कारखान्याच्या आर्थिक हितसंबधाला बाधा येऊ नये हीच अपेक्षा.

- उदयसिंह पाटील-कौलवकर, उपाध्यक्ष, भोगावती कारखाना

न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. कोणत्याही कामगाराच्या पोटावर, नोकरीवर पाय ठेवू नये ही अपेक्षा. त्यामुळे न्यायालयाने दिलेला निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

- धैर्यशील पाटील-कौलवकर, माजी अध्यक्ष,

भोगावती कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांच्या निर्णयावर भिस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन प्रभागांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्राऐवजी पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत ग्राह्य धरली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारीमध्ये दिलेल्या स्पष्टीकरणाचा दाखला दिला जात असला तरी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. शासकीय मध्यवर्ती कारागृह व ताराबाई पार्क प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी १६ सप्टेंबरपासून अर्ज सादर करावे लागणार आहेत. तर २३ सप्टेंबर रोजी छाननी होणार आहे.

पोटनिवडणूक लागलेले दोन्ही प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. या प्रभागातून निवडून आलेल्या माजी महापौर अश्विनी रामाणे आणि ताराबाई पार्क प्रभागातून निवडून आलेल्या नीलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्या प्रभागांमध्ये आता निवडणूक लागली असल्याने इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. ​राखीव जागांसाठी अर्ज सादर केला जात असताना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक केले आहे. त्यामुळे जे इच्छूक आहेत, त्यातील कोणाकडे वैधता प्रमाणपत्र आहे याचा शोध घेण्यात येत आहे. पण अर्जांच्या छाननीवेळी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येत असलेल्या अडचणीबाबत काहींनी राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार फेब्रवारीमध्ये आयोगाने ज्यांचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर, २०१७ किंवा त्यापुर्वीचा असेल तर सवलत दिली आहे.

ज्यांनी अर्ज भरण्याच्या दिवसांपुर्वी जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल, पण अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत वैधता प्रमाणपत्र मिळाले नसेल. त्यांना पडताळणी समितीकडे पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करता येणार आहे, असे आयोगाचे स्पष्टीकरण आहे. याबाबत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यांनी याबाबतचे नवीन स्पष्टीकरण घेतल्यास त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.’ त्यामुळे सध्या तरी आयोगाच्या फेब्रुवारीतील स्पष्टीकरणामुळे वैधता प्रमाणपत्राऐवजी केवळ पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची प्रत किंवा अन्य पुरावा अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा ठरणार आहे.

वैधता प्रमाणपत्र नसल्याचाच परिणाम

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय अर्ज दाखल करता येणार नाही, अशी चर्चा होती. पण शेवटच्या क्षणी त्यामध्ये सवलत देऊन ज्यांनी पडताळणीसाठी अर्ज केल्याचे पुरावे सादर केले, त्यांचे अर्ज सादर करून घेतले. यामुळे या सभागृहातील माजी महापौरांसह २० नगरसेवकांचे जातीचे दाखले संशयाच्या फेऱ्यात सापडले. त्यातून पडताळणी समितीने काहींचे दाखले अवैध ठरवले. परिणामी त्यांच्या नगरसेवकपदावर गंडांतर आले. कोर्टामधूनही दिलासा न मिळाल्याने या दोन प्रभागातील दोन नगरसेवकांना आयुक्तांनी अपात्र ठरले. त्यामुळे नवीन निवडणूक होत असताना वैधता प्रमाणपत्राशिवाय अर्ज घेऊ नये, अशी मते नागरिकांमधून व्यक्त केली जात होती. तरीही या पोटनिवडणुकीतही जुनाच कित्ता गिरवला जाईल, असे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हसन-किसनच्या अपप्रप्रवृत्तीला विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

शेतकऱ्यांची तारणहार जिल्हा बँक, भूविकास बँकेसह दहा वर्षांच्या काळात बिद्री साखर कारखान्यालाही आर्थिक अडचणीत आणणाऱ्या आमदार मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांच्या अपप्रवृत्तीला विरोध करण्यासाठीच आपण सत्य, चारित्र्यसंपन्न आणि पारदर्शी कारभार करणाऱ्या दिनकरराव जाधव यांच्या आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार संजय घाटगे यांनी स्पष्ट केले.

व्हनाळी (ता. कागल) येथे बिद्री साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गटाची भूमिका जाहीर करण्यासाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, विजयसिंह मोरे, के. जी. नांदेकर, दत्ता उगले, नंदकुमार सूर्यवंशी आदी प्रमुख उपस्थित होते.

घाटगे म्हणाले, ‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याला फार मोठी संधी मिळाली आहे. त्या माध्यमातून पाटील यांनी चांगले कार्य केले आहे. म्हणूनच त्यांच्यासोबत राहण्याची आमची इच्छा आहे. आमदार सुरेश हाळवणकर आणि पाटील यांच्याशी आमच्या आजही चर्चा सुरू आहेत. त्यांना आमच्यासोबत घेण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यत प्रयत्न करू. परंतु जाईल तिथे गुण उधळणाऱ्या हसन-किसन प्रवृत्तीला विरोध करण्यासाठीच आम्ही दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.’

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि दहशत एका बाजूला असताना आम्ही केवळ सभासदांच्या विश्वासार्हतेच्या जोरावर ‘मिशन बिद्री’ यशस्वी करू. यामध्ये संजय घाटगेंची भूमिका लाखमोलाची असून, त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन आमच्या विजयाची मुहूर्तमेडच रोवली आहे.’

माजी आमदार दिनकरराव जाधव म्हणाले, ‘के. पी. पाटील यांनी केवळ बिद्रीची सत्ता राखण्यासाठी सभासदवाढीचा एककलमी कार्यक्रम राबवला. देशात कुठल्या कारखान्यात नाहीत एवढे कारखान्याशी दुरान्वये संबंध नसणारे सभासद करून ठेवले. यावरूनच त्यांच्या भोंगळ कारभाराची कल्पना येते. केवळ पै-पाहुण्यांचे हित जोपासून बिद्रीला राजकीय अड्डा बनवणाऱ्या आणि खोटे बोल, पण रेटून बोल अशी प्रवृत्ती जोपासणाऱ्यांना या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करूया.’

के. जी. नांदेकर, दत्ता उगले, विजयसिंह मोरे, दिलीप पाटील (यमगे), आनंदा साठे (बोरवडे) आदींनी बिद्रीच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला. यावेळी ए. वाय. पाटील (म्हाकवे), अन्नपूर्णाचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सत्यजित जाधव, सिद्राम गंगाधरे, धनाजी गोधडे, संतोष ढवण, बालाजी फराकटे, विश्वजित जाधव, अन्नपूर्णा सचिव आकाराम बचाटे, राजू भराडे आदी प्रमुख उपस्थित होते. धनराज घाटगे यांनी स्वागत केले. दत्तोपंत वालावलकर यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------

चौकट-

भूमिका सांगण्यासाठीच दादांकडे

के. जी. नांदेकर आणि विजयसिंह मोरे यांनी आपल्या भाषणात के.पीं.च्या बाजूला कदापि जाणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही राष्ट्रवादी-भाजप आघाडीसोबत गेल्याच्या वावड्या उठल्या; परंतु के.पीं.चा पराभव हेच आमचे ध्येय आहे. म्हणूनच चंद्रकांतदादानी निरोप दिल्यानंतर हसन-किसनच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचण्यासाठी आणि आमची त्यांच्या विरोधातील भूमिका स्पष्ट करण्यासाठीच आम्ही गेलो होतो. आपणही आमच्या आघाडीसोबत यावे, अशी विनंतीही त्यांना करून आल्याचे ते म्हणाले.


माणसं लाचार करणारी प्रवृत्ती घातक....

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘ज्या आमदार मुश्रीफांनी बँक संपवली, त्यांनाच चेअरमन केले गेले यासारखी जिल्ह्याची शोकांतिका नाही. दोन वर्षानंतर मुश्रीफांचा राजीनामा घेऊन माजी आमदार पी. एन. पाटील यांना चेअरमन करण्याचे ठरले असतानाही सत्तेची हाव असणारे मुश्रीफ खुर्ची सोडत नाही. याला विरोध होईल म्हणूनच त्यांनी संचालकांना परदेश वारी घडवून आणली. माणसांना लाचार बनवणारी ही प्रवृत्ती भविष्यातही घातकच आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाइन विक्री ५३ टक्के घटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सुप्रीम कोर्टाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे गेल्या पाच महिन्यांत मद्यविक्रीत सुमारे ३५ टक्के घट झाली. सर्वाधिक फटका वाइनला बसला असून, वाइन विक्री ५३ टक्क्यांनी कमी झाली आहे. देशी मद्याच्या विक्रीत मात्र केवळ ११ टक्क्यांची घट झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर सहज उपलब्ध होणाऱ्या मद्यामुळे अनेक वाहनधारक मद्यप्राशन करून वाहन चालवतात. नशेत वाहन चालवल्याने अपघात होऊन मोठी जीवितहानी होते. असे अपघात टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्च २०१६ मध्ये सर्व राज्यमार्ग आणि महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे १ एप्रिलपासून ग्रामीण भागासह नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या हद्दीतून जाणाऱ्या दारू दुकानांना कुलूप लागले होते. यातून पळवाट काढण्यासाठी काही दुकान मालकांनी दुकाने स्थलांतरित केली, तर काही महापालिकांनी रस्ते हस्तांतरण करून दुकाने सुरू ठेवली. मद्यनिर्मिती आणि विक्री हा राज्याच्या महसुलातील महत्त्वाचा घटक असल्याने दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडूनही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. या निर्णयाने मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती.

अखेर राज्य सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांवरील दारू दुकाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने राज्यातील सुमारे १६ हजार दारू दुकानांना दिलासा मिळाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुकाने पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून, आठवड्याभरात सर्व दुकाने पूर्ववत सुरू होणार आहेत. गेल्या पाच महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ८८७ दुकानांना टाळे लागले होते. यातील ५० दुकानांच्या स्थलांतराला परवानगी मिळाली. जिल्ह्यातील १३५५ दुकानांपैकी ८८७ दुकाने पाच महिने बंद राहिल्याने मद्यविक्रीत लक्षणीय घट झाली. याचा सर्वाधिक फटका वाइन विक्रीला बसला आहे. गतवर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या तुलनेत यंदा ५३ टक्के वाइन विक्रीत घट झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्टमध्ये ३९ हजार २७१ लिटर वाइन विक्री झाली होती. यंदा केवळ १८ हजार ३६४ लिटर वाइन विक्री झाली आहे. एप्रिल महिन्यात ही तफावत ७६ टक्के होती. वासन प्रमाणेच बिअर विक्रीतही ३६ टक्क्यांनी घट झाली आहे. देशी दारूच्या विक्रीत मात्र केवळ ११ टक्के घट झाली. काही देशी दारू दाकानांच्या स्थलांतरामुळे विक्रीत फारसा फरक पडला नाही, असे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

जिल्ह्यातील बंद दारू दुकाने पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आठवड्याभरात तीनशेहून अधिक दुकाने सुरू होणार आहेत. यातून विक्रीसह महसुलातही वाढ होण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज दिल्यानंतर दुकानांची पाहणी करून पुन्हा दुकाने सुरू केली जात आहेत.

देशी बार

देशी दारू दुकानांना २५ चौरस मीटर जागेची अट घातली आहे. या जागेत मद्यपींसाठी बसण्याची सुविधाही उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. याशिवाय दुकानाच्या बाहेर वाहनांच्या पार्किंगसाठी जागेचीही व्यवस्था करण्याची अट विक्रेत्यांना घातली आहे. या नव्या नियमामुळे देशी दारू दुकानेही आता देशी बार बनणार आहेत.

महामार्गांवरील दारू दुकाने बंद असल्याने गेल्या पाच महिन्यात विक्रीत घट झाली. याचा परिणाम महसुलावरही झाला आहे. नगरपालिका आणि महानगरपालिका हद्दीतील दारू दुकाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश आले आहेत. आठवड्याभरात तीनशेहून अधिक दारू दुकाने पुन्हा सुरू होत आहेत. यातून पुन्हा विक्री पूर्ववत होणार आहे.

गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

विक्रीतील घट

देशी मद्य: ११ टक्के घट

विदेशी मद्य: २२ टक्के घट

बिअर: ३६ टक्के घट

वाईन विक्री : ५३ टक्के घट

१३५५

एकूण दुकाने

८८७

५०० मीटरच्या आतील दुकाने

३००

पुन्हा सुरू होणारी दुकाने

१६१

शहारातील बाधित दुकाने

२१०

शहरातील एकूण दुकाने

५०

स्थलांतराला परवानगी मिळालेली दुकाने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मे ग्राहक कर्नाटकने पळविले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारने पेट्रोलवर लावलेल्या ११ रुपयांच्या सरजार्चमुळे महाराष्ट्रात कर्नाटकपेक्षा पेट्रोल, डिझेल महागले आहे. व्हॅट सोडून अन्य प्रकारचे कर कमी केल्यास ग्राहकांना स्वस्त इंधन मिळू शकेल. १६ जून २०१७ पासून आजअखेर पेट्रोलमध्ये ३ रुपये ६५ पैसे आणि डिझेल प्रति लिटरला १ रुपये ७० पैसे वाढ झाली आहे. त्या तुलनेत कर्नाटकात पेट्रोल नऊ रुपये आणि डिझेल साडे तीन रुपयांनी स्वस्त आहे. दरातील या तफावतीमुळे सीमाभागातील निम्मे ग्राहक कर्नाटकने पळविले आहे. महाराष्ट्राच्या हद्दीतील ७० पंपचालक आणि परिसरातील ग्राहक इंधन स्वस्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्रात पेट्रोलचा दर ७९ रुपये ४ पैसे आणि डिझेलचा दर ६० रुपये ५९ पैसे आहे. राज्य सरकारने जुलैमध्ये पेट्रोलवरील व्हॅट तीन रुपयांनी वाढविला. कोर्टाच्या आदेशानंतर महामार्गावरील दारू दुकाने आणि बार बंद झाल्याने महसुलातील होणारी घट भरून काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलण्याची चर्चा झाली. मात्र आता दारु आणि बार सुरु झाले आहेत. तरीही तीन रुपयांनी वाढविलेला व्हॅट अद्याप कमी केलेला नाही. यापू्र्वी पेट्रोलवर सहा रुपये व्हॅट आकारला जात होता. हा कर नऊ रुपये करण्यात आला. या करात सरकारने पुन्हा २ रुपये वाढवून पेट्रोलवरील कर ११ रुपये केला. त्यामुळे महाराष्ट्रात कर्नाटक आणि गोवा राज्याच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेल महाग झाले. केंद्र आणि राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर विविध प्रकारचे कर लावले जातात. यात व्हॅट, रिफायनरी, वाहूतक, उत्पादन शुल्क, डिलरचे कमिशन आणि राज्याचा कर असे मिळून पेट्रोलची किंमत ७९ रुपयांपर्यत पोहोचली आहे. मूळ पेट्रोलची किंमत ४० रुपयांदरम्यान आहे. उर्वरित ४० रूपये विविध करांच्या रुपाने ग्राहकांकडूनच वसूल केले जातात.

मुंबई-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्ग हा बेळगांवमधून जातो. त्यासह सांगलीतून कोकणाकडे जाणारी वाहतूकही कर्नाटकमार्गे केली जाते. मालाची वाहतूक करणारी मोठी वाहनेही या मार्गेच धावतात. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकांत पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळत असल्याने या वाहनचालकांची कर्नाटक हद्दीतील पंपांवरच इंधन भरायला पसंती असते. त्यासह म्हैशाळ, चंदगड, गडहिंग्लज, निपाणी, कोगनोळी या सीमाभागातील ग्राहकही कर्नाटककडे वळले आहेत. कर्नाटक आणि गोवा राज्याने प्रवेश कर रद्द करुन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत दिली आहे. त्याचा फटका महाराष्ट्राच्या सीमाभागातील पंपचालकांना आणि पर्यायाने ग्राहकांना बसत आहे.

०००

दुकाने आणि व्हॅटही सुरुच

राज्य सरकारने पेट्रोल स्वस्त करण्यासाठी कर कमी करण्याचे धोरण राबविण्याचा विचार सुरु झाला होता. मात्र व्हॅटसह अन्य प्रकारचे कर वाढत गेल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढच होत आहे. कोर्टाने महामार्गालगतची दारू विक्री आणि बारवर निर्बंध लादल्याने सरकारला मोठा महसूल मिळवून देणारी मद्यविक्री घटली. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे साडेआठशे दुकाने बंद झाल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. मात्र आता ही दुकाने पुन्हा सुरु झाली आहेत. या दुकानांतून कोट्यावधींचा महसूल राज्य सरकारला मिळणार आहे. पेट्रोलवर आकारला जाणारा अधिभार रद्द केल्यास पेट्रोल स्वस्त होईल.

०००

राज्याने वाढवलेले इंधन दर

तारीख पेट्रोल डिझेल

१ सप्टेंबर १९ पैसे ९ पैसे

२ सप्टेंबर १२ पैसे ६ पैसे

३ सप्टेंबर ११ पैसे ११ पैसे

४ सप्टेंबर ५ पैसे ८ पैसे

५ सप्टेंबर १० पैसे ६ पैसे

६ सप्टेंबर ९ पैसे १४ पैसे

७ सप्टेंबर ८ पैसे २० पैसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीमुळे फेरटेंडर नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जीएसटीमुळे केवळ वर्कऑर्डर झालेली नाही अशा कामांचेच फेरटेंडर होणार असून महापालिका इतर कामांचे फेरटेंडर काढणार नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांवर परिणाम होण्याची सदस्यांनी भीती व्यक्त केल्यानंतर प्रशासनाकडून हे स्पष्टीकरण करण्यात आले. यामुळे विकासकामे रखडण्याचा धोका टळला आहे. दरम्यान, स्पॉट बिलिंगसाठी पाच ते सहा रुपयांना मिळणाऱ्या रोलसाठी १६ रुपये देत असल्याबद्दलच्या कारभाराबाबत टिकेची झोड उठवण्यात आली.

दोन महिन्यापासून जीएसटी लागू झाला आहे. त्याबाबत महापालिकेचे काय धोरण ठरले आहे, बजेटवर काय परिणाम होत आहे याबाबत अफजल पिरजादे यांनी प्रश्न उपस्थित केले. बजेट सादर होऊन सहा महिने झाले तरी त्याची पाच टक्केही अंमलबजावणी झालेली नाही. जीएसटीमुळे विकास कामांसाठी १२ कोटी रुपये जादा द्यावे लागणार आहेत. त्यामुळे सर्व कामे फेरटेंडर करावी लागणार आहेत का?अशी विचारणा केली. त्यावर प्रशासनाच्यावतीने खुलासा करताना ज्या कामांची वर्कऑर्डर झालेली नाही, केवळ त्याच कामांचे फेरटेंडर करावे लागणार आहे. इतर कामांचे फेरटेंडर निघणार नाही. महापालिका फक्त गाळे भाडे व नाट्यगृह यावर १८ टक्के जीएसटी भरते. ठेकेदाराने निविदा भरताना जीएसटीसहित माल घेण्याची गरज आहे. फक्त जादा दराची निविदा आल्यास त्याच्याशी चर्चा करुन दराचे विश्लेषण केले जाणार आहे.

अनुकंपा नोकर भरती करताना त्यावेळीच शिक्षणाप्रमाणे नेमणूक दिल्या नाहीत, अशी विचारणा करण्यात आली. सरकारच्या निर्णयानुसार धोरण अंमलात आणले पाहिजे. अंमलबजावणीबाबत कमिटीने वेळोवेळी ताशेरे ओढले असल्याचे प्रशासनाने सांगितले. महापौर व सर्व पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे निधी मागणी करायला हवी. त्यासाठी प्रलंबित प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला पाहिजे, असे सत्यज‌ित कदम यांनी सांगितले. सरकारी कार्यालयाची पाणी पुरवठ्याची १२ कोटी थकबाकी आहे. सुनावणी घेऊन थकबाकी वसुलीची कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

ई वॉर्डातील पाण्याचा प्रश्न पंप बंद झाल्याने निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले. फुलेवाडी रिंगरोडचे काम सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. नगरोत्थानच्या कामासाठी कन्स्लटंटने फेरटेंडरसाठी कागदपत्रे दिली आहेत. त्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. लक्ष्मीपुरीत रस्ते मोठे आहेत. भाजी मार्केट आहे. बजेट कमी आहे. डांबरी रस्ते, चॅनेल बांधण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले. गणपती विसर्जनावेळी राजाराम तलावामध्ये बुडणाऱ्या व्यक्तीस वाचवल्याबद्दल अग्निशमन विभागाचे फायरमन गणेश लकडे यांचा अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिजिओथेरपी उपचारांकडे वाढला कल

$
0
0

राहुल मगदूम, कसबा बावडा

महापालिकेच्यावतीने शहरात चालवण्यात येणाऱ्या फिजिओथेरपी सेंटरमधून वर्षभरात नवीन, जुने असे वीस हजार रुग्ण उपचार घेतात. महापालिकेच्या न्यू शाहूपरीतील एम. आर. देसाई फिजीओथेरपी सेंटर आणि अर्ध शिवाजी पुतळ्याजवळील डी. एन. शिर्के फिजोओथेरपी सेंटर या दोन्ही दवाखान्यांनी इतका चांगला विश्वास कमावला आहे की येथे नेहमी रुग्णांचा ओढा असतो.

भौतिकोपचार म्हणजेच फिजोओथेरपी म्हटल्या जाणाऱ्या या महत्वाच्या उपचार पद्धतीचे कोणतेही दूःष्परिणाम शरीरावर होत नाहीत. पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, मणक्याचे विकार, मज्जातंतूंचे आजार, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचे फिजोओथेरपीचे व्यायाम स्त्रियांना दिले जातात. खेळाडूंना होणाऱ्या प्रत्येक दुखापतीवर, वृद्धपकाळात होणारे आजार अशा निरनिराळ्या दुखण्यांमध्ये फिजिओथेरपी उपयुक्त ठरते. शॉर्ट व्हेव डायथर्मी, ट्रॅक्शन, आय. एफ. टी, अल्ट्रासाऊंडद्वारे उपचार करून रुग्णांना वेदनेपासून कायमची मुक्तता मिळवता येते. फिजीओथेरपिस्ट डॉ. अनघा धर्मे या त्यांच्याकडील अपुऱ्या सहकाऱ्यांनिशी फिजिओथेरपी विभागाची धुरा सांभाळत आहेत.

अर्धांगवायू, पक्षाघात, चेहऱ्याच्या अर्ध्या भागाचा पॅरेलिसीस आदींबाबतचे उपचार या केंद्रांमधून केले जातात. सेंटरमध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन, पॅराफीन वॅक्स बाथ, इलेक्ट्रिकल स्टीम्युलेटर, इंटरफिरशनल करंट थेरपी, अल्ट्रासाऊंड या मशिन्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रोप एक्सरसायझर, शोल्डर व्हील, रिशत रोलर, प्रोनेटर खुपानेटर, ग्रीप एक्सरसायझर, सायकल, दोरीचक्र आदी व्यायामाची उपकरणे आहे. यांद्वारेही व्यायाम करून घेतले जातात. या सेंटरमधून वर्षाला सरासरी दहा लाख उत्पन्न मिळते.


महापालिकेचे हवे लक्ष

महापालिकेच्यावतीने नागरिकांची चांगली सोय होत असताना एम. आर. देसाई आणि डी. एन. शिर्के या दोन्ही फिजिओथेरपी सेंटरना आणखी अत्याधुनिक सुविधा देणे अत्यावश्यक आहे. अत्याधुनिक यंत्रणेसह जादा कर्मचाऱ्यांची येथे आवश्यकता आहे. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अपुऱ्या सुविधा
डी. एन. शिर्के फिजिओथेरपी सेंटरमध्ये सानेगुरुजी वसाहत, पाचगाव, तारळे, राधानगरी, भोगावती, कळे, बाजारभोगाव, पन्हाळा तालुक्यातील नागरिक उपचार घेतात. येते अपुऱ्या सुविधा आहेत. दोन्ही सेंटरला अपुरे कर्मचारी असल्यामुळे रुग्णांची अडचण होते. आहे. महापालिकेने याकडे लक्ष द्यायला हवे.

फिजीओथेरपी व्यायामाच्या उपचाराने कोणत्याही अपघातानंतर आलेल्या अपंगत्वावर मात करता येते तसेच कोणत्याही पक्षघाताचा रुग्ण चांगला बरा होतो. त्याला अंथरुणाला खिळून राहण्याची आवश्यकता नसते. फिजोओथेरपीमुळे वेदनेपासून मुक्ती मिळवता येते. पण तंदुरुस्तीसाठी कायमस्वरूपी व्यायाम करणेही आवश्यक आहे. महापालिकेच्या फिजोओथेरपी सेंटरमध्ये नाममात्र दरात विविध सेवा उपलब्ध आहेत.

- डॉ. अनघा संदीप धर्मे, फिजीओथेरपिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयिताने दिली गुन्ह्याची कबुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शास्त्रीनगर येथील दि पॅराडाइज अपार्टमेंटमध्ये बुधवारी (ता. ६) दुपारी झालेल्या महिलेच्या खुनाची संशयित अल्पवयीन हल्लेखोराने कबुली दिली. चाकूने महिलेच्या शरीरावर वर्मी घाव केल्याची माहिती त्याने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली. फोटो काढल्यानंतर झालेल्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे. दरम्यान, पोलिसांनी १३ जणांचे जबाब नोंदवले असून, संशयिताची बालनिरीक्षण गृहात रवानगी केली आहे.

बुधवारी दुपारी शास्त्रीनगर येथील दी पॅराडाइज अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ५०३ मध्ये पूजा रुपेश महाडिक यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. घटनास्थळावर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या शेजारच्या फ्लॅटमधील तरुणानेच हा जीवघेणा हल्ला केल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत अल्पवयीन संशयिताने हल्ल्याची कबुली दिली आहे. महिलेचे फोटो काढताना त्यांनी केलेल्या विरोधामुळे या दोघांमध्ये वाद झाला होता. याच रागातून अल्पवयीन हल्लेखोरांनी पूजा महाडिक यांच्यावर चाकूचे गंभीर वार केले. पोलिसांनी शुक्रवारी संशयिताचा कबुली जबाब नोंदवला असून, त्याची बालनिरीक्षण गृहात रवानगी केली. पोलिस अन्य कारणांचाही शोध घेत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत १३ जणांचे दबाब नोंदवले आहेत. मृत पूजा महाडिक यांची मुलगी स्वरा, पती रुपेश, समोरच्या अपार्टमेंटमध्ये काम करणारा गवंडी, अपार्टमेंटमधील रहिवाशी सोबरन कुशवाहा, गीता कुशवाहा. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करणारे डॉक्टर, आदींचे जबाब नोंदवले आहेत. यातील साडेचार वर्षांची स्वरा ही प्रत्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारणा’चा म्हैस दुधास अडीच रुपये फरक

$
0
0

म. टा. वृतसेवा, पन्हाळा

वारणा दूध संघाने दूध उत्पादक शेतकरी सभासदांची सातत्याने प्रगती साधली आहे. संघ यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करत असून, यानिमित्ताने उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २ रुपये ५० पैसे म्हैस दुधासाठी, तर १ रुपये ५० पैसे गाय दुधासाठी विक्रमी असा फरक बिल दिवाळीपूर्वी देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी केली. तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर संघाची शुक्रवारी ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते

कोरे म्हणाले, ‘संघाने वारणा दुधाबरोबरच वारणा श्रीखंडाचा ब्रँड मुंबईसह राज्यातील कानाकोपऱ्यात तसेच देशभरात पोहोचवला. या वर्षात संकलन वाढीसाठी संघाचा प्रयत्न राहणार आहे. नेरूळ नवी मुंबई व गडहिंग्लज येथे ३५ कोटींचा सॅटेलाइट डेअरी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. गडहिंग्लज येथील प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. लवकरच नेरुळ येथीलही प्रोजेक्ट डिसेंबरअखेर पूर्णत्वास येईल.’

यावेळी संघाच्या वतीने बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर के राजारामन, कोल्हापूर विभागाचे झोनल मॅनेजर नितीन देशपांडे, अमृतनगर शाखेचे प्रबंधक विमलकुमार, संघाचे ऑडिटर रणजित शिंदे यांचा सत्कार कोरे यांच्या हस्ते झाला, तर संघाचे मृत कर्मचारी भालजी पांढरबळे यांच्या विमा रकमेचा धनादेशही प्रदान करण्यात आला सभेस संघाचे उपाध्यक्ष डॉ भाऊसाहेब गुळवणी, कार्यकारी संचालक मोहन येडुरकर, संघाचे सचिव के. एम. वाले, वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील आदींसह दूध उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी पी. व्ही. कुलकर्णी व शीतल बसरे यानी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्टेंबरअखेर विमानतळाची पाहणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारकडून कोल्हापूरची विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विमान उड्डाणाचा परवाना आणि मुंबईत सकाळचा स्लॉट मिळविण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत बैठक होत आहे. त्यानंतर सप्टेंबरअखेर कोल्हापूर विमानतळावर भौतिक सुविधांची अंतिम पाहणी करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची समिती दाखल होणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘उडान’ या किफायतशीर प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीच्या योजनेतून कोल्हापूरची विमानसेवा सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सरकार विमानउड्डाणाचा परवाना मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. परवाना आणि मुंबई विमानतळावर सकाळच्या वेळेतील स्लॉट मिळविण्यासाठी मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीनंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय विमानतळ प्राधिकरण समिती कोल्हापूर विमानतळावरील भौतिक सुविधांची पाहणी करणार आहे. डे ऑपरेशन सुरू करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट उपलब्ध नाही. त्यासाठी सांताक्रुझ ( डोमॅस्टिक) विमानतळावर स्लॅाट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र हा स्लॉट सकाळच्या वेळेत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सकाळी साडेसात, आठ,साडेआठदरम्यान टेक ऑफची मागणी केली जाणार आहे. परतीच्या प्रवासासाठी अद्याप नियोजन नाही. राज्य सरकारने नागरी हवाई वाहतूक संचलनालयाकडे परवान्यासाठी लागणाऱ्या अटींची पूर्तता केली आहे. मात्र कोल्हापूरचे विमानतळावर शंभर टक्के भौतिक सुविधा पूर्ण असल्याशिवाय विमानाचा परवाना दिला जाणार नाही. त्यानंतर प्रत्यक्ष विमानसेवा सुरु होईल.

राज्यांतर्गत विमानसेवा सुरू करण्यासाठी रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिसेस पथकाने कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली होती. त्याचा अहवालही मुंबई विभागीय कार्यालयाकडून नागरी हवाई वाहतूक संचालनालयाला (डीजीसीए) पाठविला आहे. डीजीसीएच्या पथकाकडून विमानतळाची पाहणी झाली होती. सर्वच ऋतूंत या विमानतळावरून नियमित सेवा देता येणे शक्य असल्याची शिफारसही केली होती. आता सप्टेंबरअखेर विमानतळाची अंतिम पाहणी केली जाईल.

डेक्कन चार्टर्स एव्हीएशन कंपनीकडून विमानसेवा सुरू होणार आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावरील विमानसेवेसाठी ५० टक्के आसनाचे प्रवासभाडे २५०० हजार रुपये आकारले जाणार आहेत. पहिल्या नऊ प्रवाशांना अडीच हजार आणि उर्वरित प्रवाशांना सात हजार रुपये भाडे असेल. उर्वरित तिकिटे बाजारभावाप्रमाणे विक्री केली जाणार आहेत. राज्य सरकारकडून भाड्यात सवलत दिली जाणार आहे. एक तासांचा हा विमानप्रवास असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन हुल्लडबाज पोलिस निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गगनबावडा येथे फिरण्यासाठी गेल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत एका खासगी रुग्णालयात धिंगाणा घालणाऱ्या तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलिस हवालदार इजाज गुलाब शेख (वय ५२, रा. पोलिस लाइन, कसबा बावडा), पोलिस नाईक प्रवीण बाळासाहेब काळे (३५) आणि पोलिस कॉन्स्टेबल अमर अनिल पाटील (२५) अशी कारवाई केलेल्या पोलिसांनी नावे आहेत. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शनिवारी कारवाईचे आदेश दिले.

अधिक माहिती अशी की, आठ दिवसांपूर्वी पोलिस क्रीडा दलातील दहा ते बारा पोलिस गगनबावडा येथे फिरण्यासाठी गेले होते. मद्यधुंद अवस्थेतील एका पोलिसाच्या पायाला काच लागल्यानंतर ते गगनबावड्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले. उपचारानंतर डॉक्टरांनी पैशांची मागणी केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली. शिवीगाळ करीत डॉक्टरांनाच धक्काबुक्की करून रुग्णालयातील साहित्य विस्कटले. यातील प्रवीण काळे या पोलिसाने रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर समोर लघुशंका केली. प्रवीण काळे, इजाज शेख आणि अमर पाटील हे तिघेही मद्याच्या नशेत होते. संबंधित डॉक्टरांनी सीसीटीव्ही फुटेज संकलित करून विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. नांगरे-पाटील यांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक मोहिते यांना चौकशीनंतर कारवाई करण्याचे आदेश दिले. अधीक्षक मोहिते यांनी चौकशी करून काळे, शेख आणि पाटील या तिघांना निलंबित केले. शनिवारी निलंबनाचे आदेश काढले.

इजाज शेख हा गगनबावडा पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहे. मात्र सध्या पोलिस मुख्यालयात तो प्रतिनियुक्तीवर होता. शेख हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात होता तेव्हा अवैध धंदेवाल्यांकडून तोडपाणी केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई झाली होती. काळे सध्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाकडे कार्यरत होता, तर अमर पाटील करवीर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. फिरण्यासाठी गेल्यानंतर मद्याच्या नशेत घातलेला धिंगाणा या पोलिसांना भोवला. एकाच वेळी तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांचा विमा दोन लाखांवर

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांना अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते. त्यामध्ये बदल करून बांधकाम कामगाराचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू कल्याणकारी मंडळांकडून दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य वारसांना देण्यात येणार आहे. तसेच वर्षाला २४ हजार रुपये प्रमाणे पाच वर्षे पेन्शन देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्याबाबतचे आदेश कल्याणकारी मंडळाने राज्यातील सर्व जिल्हा कामगार आयुक्त कार्यालयाने सोमवारी (ता.४) दिले आहेत. राज्य सरकारच्या नव्या मंजुरीमुळे राज्यातील नोंदणीकृत पाच लाख तर जिल्ह्यातील ६२ हजार पात्र कामगारांच्या वारसांना होणार आहे.

गवंडी, सेंट्रिंग, सुतार, फरशी पॉलिश, वायरमन, वेल्डर आदी १८ प्रकारच्या कामगारांचा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये समावेश आहे. अत्यंत जोखमीच्या ठिकाणी काम करावे लागत असल्याने अनेकवेळा त्यांचे जीव धोक्यात येतात. काही कामगारांचा अशा जोखमीच्या कामावर मृत्यूही झाला आहे. कामगारांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबणा होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने १३ कलमी योजना आणली होती. कामगारांच्या कल्याणकारी योजनामध्ये कामावर असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास एक लाख रुपये त्यांच्या वारसांना देण्याची तरतूद होती. सदरची रक्कम फारच तुटपुंजी असल्याने यामध्ये वाढ करण्याची मागणी राज्यातील कामगार संघटनांकडून होत होती. नैसर्गिक व अपघातील मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य वारसांना देण्याची मागणी केली होती.

संघटनांच्या मागणीनंतर कल्याणकारी मंडळाच्या सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही प्रकारच्या मृत्यूसाठी कामगारांच्या वारसांना दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा ठराव करून २१ ऑक्टोबर, २०१६ रोजी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यानंतर सातत्याने पाठपुरवा करूनही या प्रस्तावावर कोणताही सकारात्मक निर्णय झाला नव्हता. मात्र नुकत्याच्या झालेल्या राज्य मंत्र‌िमंडळाच्या बैठकीत कल्याणकारी मंडळाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर राज्य कामगार आयुक्त वाय. ई. केरुरे यांनी प्रस्तावावर त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व कामगार आयुक्तांना दिले आहेत.

असा होणार लाभ

कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व नोंदणीकृत कामगारांचा नैसर्गिक अथ‍वा अपघातील मृत्यू झाल्यास मंडळाच्यावतीने त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. तसेच वर्षाला २४ हजार रुपयेप्रमाणे पाच वर्षे वारसांना सानुग्राह अनुदान म्हणून पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच कामगाराच्या अंत्यसंस्कारासाठी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.


पाच लाख

राज्यातील नोंदणीकृत कामगार

६२ हजार

जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगार

५६ हजार

कोल्हापूर जिल्हा

सहा हजार

इचलकरंजी शहर

कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना केवळ एक लाखांचे अर्थसहाय्य दिले जाते होते. संघटनांनी गेल्या अनेकवर्षांपासून नैसर्गिक व अपघाती मृत्यूसाठी वारसांना पाच लाख रुपये देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कल्याणकारी मंडळाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. संघटनांच्या मागणीचा विचार करुन दोन्ही प्रकारच्या मृत्यूसाठी दोन लाख रुपये देण्यास राज्य सरकराने मंजुरी दिली.

शिवाजी मगदूम

जिल्हा सचिव, लाल बावटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेघगर्जनेसह धुवाँधार पाऊस

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रचंड मेघगर्जनेसह शनिवारी दुपारी कोल्हापूर शहर आणि परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची प्रचंड त्रेधातिरपीट उडाली. फेरीवाले व रस्त्यांवरील विक्रेत्यांची साहित्य सुरक्षितस्थळी नेताना चांगलीच पळापळ झाली. रस्त्यांना अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरुप आले.

गेल्या काही वर्षांतील पावसाची नियमितता यावर्षीही अनुभवास येत आहे. गेल्या चार-पाच दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी वळवासारखा पाऊस पडत आहे. शुक्रवारीही दुपारी शहराच्या काही भागात पाऊस झाला होता. शनिवारी सकाळपासून उष्मा वाढला होता. कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रचंड उष्म्यामुळे अंगाची काहिली होत होती. दुपारी अडीचच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली.

विजांचा कडकडाट आणि टपोऱ्या थेंबांसह आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे वाहनधाकरकक व पादचाऱ्यांना मिळेल तेथे आसरा घ्यावा लागत होता. अनेक ठिकाणी मोटारसायकल अस्ताव्यस्त्य लावल्याने वाहतूक कोंडीही झाली. पावसाचा जोर होता की, काही क्षणातच गटारीचे भरून पाणी रस्त्यावरुन वाहू लागले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले. वीस मिनिटांच्या पावसानंतर वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा कडकडीत ऊन पडले..


खरीप पिकांना दिलासा

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने माळरानासह इतर ठिकाणच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. सोयबीन, भुईमूग आणि भात परिपक्वतेच्या अवस्थेत आले असून त्यांना पावसाची अत्यंत गरज आहे. पक्व होण्याच्या अवस्थेत पिकांना पाणी मिळत नसल्याने उत्पादन घटन्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शनिवारी झालेल्या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरुड फाट्यावर अपघातात तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील सरूड फाट्यावर भरधाव मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ८) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून समीर शिवाजी पाटील (वय ३२, रा. शिंपे, ता. शाहूवाडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पाटील हे मलकापूर येथील एका कॉलेजमध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

समीर शिवाजी पाटील व त्याचा मित्र प्रवीण नामदेव पाटील ( रा. शिंपे, ता. शाहूवाडी) हे दोघे हिरोहोंडा स्प्लेंडर (क्रमांक एम. एच. ०९, डीएस ९६०४) मोटरसायकलवरून शुक्रवारी रात्री बांबवडे येथील एका हॉटेलमध्ये जेवणाकरिता निघाले होते. यावेळी प्रवीण मोटारसायकल चालवित होता तर समीर पाठीमागे बसला होता. सरूडकडून बांबवडेकडे येत असताना बांबवडे येथील सरूड फाट्यावर समोरच्या वाहनाचा प्रखर दिवा प्रकाश डोळ्यावर पडल्याने प्रवीणचा ताबा सुटून भरधाव मोटारसायकल घसरून रस्त्यावर फरफटत गेली. यावेळी पाठीमागे बसलेल्या समीरच्या छाती-पोटासह डोक्यास गंभीर दुखापत झाली. यावेळी जखमी समीर यास उपचारासाठी जवळच्या बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वीच समीरचा गावातील मुलीशी प्रेमविवाह झाला आहे. सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग नोंदविणाऱ्या हरहुन्नरी व मनमिळाऊ स्वभावाच्या समीरचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजताच शिंपे गावावर शोककळा पसरली. शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर शिंपे (ता.शाहूवाडी) येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत समीरच्या पश्चात पत्नी, वडील व भाऊ असा परिवार आहे.

कुटुंबावर अपघाताची छाया

बांबवडे येथील सरूड फाट्यावर मोटरसायकल अपघातात शुक्रवारी रात्री दुर्दैवी अंत झालेल्या समीर या तरुणाचा यापुर्वीही दोनवेळा अपघात झाला होता. एकदा सरूड (ता.शाहूवाडी) येथील मोटरसायकलस्वाराने उडविल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तर नातेवाइकांकडून शेतीच्या मशागतीसाठी आणलेल्या ट्रॅक्टर रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून तो दुसऱ्यांदा गंभीर जखमी झाला होता. यावेळी त्याच्या टाचेचा काही भाग तुटल्याने जीवावर बेतणाऱ्या या अपघातातून समीर दुसऱ्यांदा बचावला होता. काही वर्षांपूर्वी खुटाळवाडी नजीक झालेल्या वऱ्हाडाच्या टेंपो अपघातात नऊ जणांना प्राणास मुकावे लागले होते. या अपघातात गंभीर जखमी झालेले समीरचे वडील शिवाजी पाटील दवाखान्यातील अनेक दिवसांच्या उपचारानंतर घरी परतले होते. तर समीरच्या आईचाही अपघातात मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच शेतकऱ्यांचा तारणहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

साठ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनांतून स्वत:चे आर्थिक हित जोपासले. त्यामुळे शेतकऱ्याला रक्त सांडल्याशिवाय काहीच मिळाले नाही. मात्र भाजप सरकारने कर्जमाफी देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय दिला आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजी विधानसभा मतदार संघात विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा ‘लेखा-जोखा’ या कार्यअहवालाचे प्रकाशन खोत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

खोत म्हणाले, ‘आमदारांना केवळ दोन कोटी रुपयांचा विकास निधी मिळत असतो. मात्र हाळवणकर यांनी विविध योजनांच्या फंडातून मतदार संघाचा विकास केला. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया किचकट असल्याचा आरोप केला जात आहे. पण यामुळे आजवरच्या सरकारने दिले नाही त्यापेक्षा दहापट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. गतवेळच्या कर्जमाफीमध्ये झालेला घोटाळा पुन्हा होऊ नये यासाठी ऑनलाइन पद्धत अवलंबली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून शेतकऱ्याला संघर्ष केल्याशिवाय आणि रक्त सांडल्याशिवाय हक्क मिळत नव्हता. पण भाजप सरकारने सात हजार कोटी रुपयांचा ऊस खरेदी कर माफ केल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र एफआरपीमुळे कायद्याच्या माध्यमातून ऊस दराचा लाभ पदरात पडला आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन खऱ्या अर्थाने त्यांना जगण्याची उमेद दिल्याचे सांगितले.

भाजपचे शहराध्यक्ष शहाजी भोसले यांनी स्वागत केले. यावेळी आमदार अमल महाहिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक, नगराध्यक्षा अलका स्वामी, बाबा देसाई, हिंदुराव शेळके, अशोक स्वामी, तानाजी पोवार, प्रसाद खोबरे, अरुण इंगवले, विजय भोजे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, वैशाली नाईकवडे, प्रकाश पुजारी, विलास रानडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संवादातून संघर्षाकडे...

विजयादशमी दिवशी इचलकरंजीत शेतकऱ्यांच्या नव्या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. ‘संवादातून संघर्षा’कडे हे ब्रीद घेवून संघटना कार्यरत राहणार आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांनी कधीच सोने लुटले नाही. मात्र आमच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना ही संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्या शहरातून आंदोलनाची मशाल पेटली, त्याच शहरात नव्या संघटनेचा जन्म होणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

विकासासाठी कटिबद्ध

मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून आमदार सुरेश हाळवणकर यांनी, केंद्र आणि राज्य सरकार व्यापक विचार करून वस्त्रोद्योग धोरण निश्चित करत आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगात सध्या मंदी असली तरी आगामी काळात वस्त्रोद्योगासाठी सुवर्णयुग पाहायला मिळणार आहे. शेतकरी, विणकर जगला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. तोच धागा पकडून आम्ही कार्यरत आहोत.

‘अच्छे दिन’ला वेळ...

राज्य सरकारने शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मोठ्या प्रमाणात निधी आपल्याकडे खेचल्यामुळे बाकीच्या विकासकामांना रोख लागला आहे. याचा संदर्भ देत आमदार हाळवणकर यांनी, वस्त्रोद्योगाला अच्छे दिन येण्यासाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवे वस्त्रोद्योग धोरण फायदेशीर ठरणार असून निधीची तरतूद झाल्यानंतरच वस्त्रोद्योग निश्चितपणे संकटातून बाहेर पडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images