Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विठ्ठल दर्शनासाठी 'कार्तिकी'पासून टोकन!

0
0

म.टा. प्रतिनिधी, पंढरपूर

विठुरायाच्या दर्शनासाठी उन-पाऊस याची तमा न बाळगता ३०-३० तास दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीने एक गोड निर्णय घेतला असून आता यापुढे विठुरायाचे दर्शन तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने दिले जाणार. या टोकनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून येत्या कार्तिकी यात्रेपासून याची सुरुवात करण्याची तयारी मंदिर समितीने सुरु केल्याचे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी सांगितले. विठ्ठलाचे दर्शन म्हटले की डोळ्यासमोर येते ८-१० किलोमीटर लांबच लांब दर्शन रांग आणि त्यात दर्शनाच्या ओढीने उभे असलेले हजारो विठ्ठल भक्त. विठ्ठलाचे दर्शन सुलभ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती मात्र याबाबत यापूर्वीच्या कोणत्याच समितीने गांभीर्याने लक्ष न दिल्याने विठ्ठल दर्शन अनेक यातना सोसून भाविकांना घ्यावे लागत होते. मात्र आजच्या निर्णयाने दर्शन अधिक सुलभ होणार आहे. भाविकांना टोकन दिले जाईल व त्यावर दर्शनाची वेळ दिली जाईल. त्यामुळे दोन दोन दिवस दर्शन रांगेत तिष्ठत थांबावे लागणार नाही.

विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षातून सव्वा ते दीड कोटी भाविक पंढरपूरला येत असल्याने त्यांना सुलभ दर्शन देण्यासाठी सुरु होणाऱ्या या टोकन दर्शन व्यवस्थेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असल्याने यासाठी समिती अथवा भाविकांना आर्थिक झळ बसणार नाही. याशिवाय भाविकाला पंढरपुरात आल्यावर आपल्या दर्शनाची नक्की वेळ समजणार असल्याने उरलेल्या वेळेत तो खरेदी व इतर भागाचे पर्यटन करण्यास मोकळा राहणार आहे. एका मिनिटाला सर्वसाधारणपणे ५० भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात, त्यानुसार तासाला ३ हजार भाविक गृहित धरून रोज तेवढेच टोकन भाविकांना दिले जाणार आहेत. बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन आणि मंदिर परिसरात टोकन देणारे स्टोल समिती उभारणार असून आलेल्या दर्शनासाठी भाविकाला प्रथम आपल्या दर्शनाचे टोकन घ्यावे लागणार आहे. या व्यवस्थेनंतर आता ऑनलाईन दर्शन व्यवस्था आणि मुखदर्शन व्यवस्थेचा देखील विचार केला जाणार असल्याचे मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर याच्या सफाईची जबाबदारी समितीने घेण्याचा निर्णय घेतला असून यासाठी लवकरच निविदा प्रकाशित केल्या जाणार आहेत. याशिवाय प्रसाद व्यवस्था देखील खाजगी पद्धतीने निविदा काढून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीला आमदार राम कदम यांनी गैरहजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आशुतोष पोतदारांची नाटके बदलत्या काळाचे भान देणारी

0
0

कागल

‘खेडी बदलत चालली आहेत, समाज बदलत आहे. अशा वेळेला बदलत्या समाजाचे आणि संस्कृतीचे भान देणारे अस्सल मराठी नाटक म्हणून आशुतोष पोतदार यांच्या नाटकांचा गौरव करावा वाटतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ राजन गवस यांनी कसबा सांगाव (ता. कागल) येथे बोलताना केले. युवा नाटककार आशुतोष पोतदार यांनी लिहिलेल्या चार नाटकांच्या पुस्तकाचे प्रकाशन कसबा सांगावमधील जैन बस्ती येथे झाले, यावेळी डॉ. गवस प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

पोतदार यांच्या चार नाटकांचा संग्रह असलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी मुश्रीफ़ म्हणाले,‘ सांगाव ही कलाकारांची आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे. अशा भूमीत आशुतोष आपल्या लेखन कर्तॄत्वाने मोठी भर घालत आहे. ’

डॉ. गवस पुढे म्हणाले ,‘ या पुस्तकांचे प्रकाशन कोल्हापूर वा पुण्यासारख्या शहरात सहज करता आले असते. कारण पोतदार आज मराठीतले आघाडाचे नाट्यलेखक आहेत. पण, या पुस्तकाचे प्रकाशन सांगावसारख्या गावात होत आहे ही नक्कीच महत्वाची बाब आहे. यामुळे, गावातल्या लोकांना प्रेरणा मिळून डॉक्टर, इंजिनिअर वा प्रशासकिय आधिकारी होण्याबरोबरच यशस्वी नाटककार होण्याची महत्वाकांक्षा गावोगावचे तरुण आपल्या मनात बाळगू शकतात.”

आशुतोष पोतदार म्हणाले,‘ गाव माझ्यासाठी भूतकाळ नाही वा स्मरणरंजनही नाही. इथली माणसे, इथली घरे, गल्ल्या माझ्याशी संवाद करत आले आहेत. ज्यांच्याकडे पाहत मी वाढलो, शिकलो त्यांच्यात माझ्या प्रेरणा आहेत. या गावाने मला प्रश्न विचारायला शिकविले.’

यावेळी दादासाहेब रामचंद्र मगदूम स्मारक समितीच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ शिवराम भोजे, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, राजेंद्र माने, डॉ. श्याम पोतदार आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक उमेश माळी यांनी केले. आभार संजय जगताप यांनी मानले. यावेळी राजश्री माने, देवाप्पा नायकवडी, डॉ कुबेर मगदूम, एस आर पाटील, लेखक रफ़िक सुरज, जयंत देशपांडे, कला समिक्षक नूपुर देसाई, चित्रकार प्रभाकर पाचपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी पुजारी अधिवेशनापूर्वी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अंबाबाई मंदिर देवस्थानच्या अखत्यारित असलेल्या जमिनीपैकी आर्थिक घोटाळा असलेल्या जमिनीचा ताबा रेडीरेकनरप्रमाणे शुल्क आकारून देण्यात येईल, असे विधी व न्याय राज्यमंत्री रणजित पाटील यांनी गुरूवारी मुंबईत जाहीर केले. तसेच अंबाबाई मंदिरात येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पगारी पुजारी नेमण्याचा कायदा येणार असल्याचे सांगितले.
बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.
अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटवून शासनाने पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात आमदार क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी १५ दिवसांत बैठक घेण्याची ग्वाही पाटील यांनी दिली होती. त्यानुसार गुरूवारी मंत्रालयात रणजीत पाटील यांच्या दालनात बैठक पार पडली.
ते म्हणाले, ‘देवस्थानच्या लेखापरीक्षणातील अहवालानुसार सुमारे २६ एकर जमीन असल्याचे निदर्शनास आली आहे. एक विधीमत घेऊन सद्यस्थितीत जमीन ज्यांच्या ताब्यात असून, त्यांच्याकडून ती कसली जाते किंवा त्या जमिनीवर त्यांची उपजीविका चालते अशा वारसदारांना प्राधान्याने रेडीरेकनप्रमाणे जमीन द्यावी. ही रक्कम देवस्थान समितीला देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे.’
यावेळी क्षीरसागर म्हणाले, मंदिराचे पावित्र्य भंग करणारे आणि भाविकांची लूट करणारे पुजारी हटवून सरकारी पगारी व प्रशिक्षित पुजारी नेमावेत, यासाठी जनआंदोलन उभारण्यात आले आहे. जनतेच्या भावना तीव्र असून आगामी नवरात्र उत्सव काळात कोणतेही गालबोट लागू नये या दृष्टीने पंढरपूरच्या धर्तीवर पगारी पुजारी नेमण्याचा कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, विविध देवस्थान मधील समित्यांमध्ये कोणत्या पद्धतीने काम केले जाते, हे पडताळणे गरजेचे आहे. पगारी पुजारी नेमण्यासाठी कायदा करणे गरजेचे आहे. कायदा करतानाही या कायद्यास कोणीही न्यायालयामध्ये आव्हान दिल्यास तो कायदा न्यायप्रक्रियेत टिकायला हवा. यापूर्वी राज्य सरकारने पंढरपूर देवस्थानबाबत तसा कायदा करून मंजूर केला होता. त्याच पद्धतीने नवीन कायदा न करता पंढरपूरच्या धर्तीवरच जुन्या कायद्यानुसार पगारी पुजारी नेमता येतील काय? याचीही माहिती घेणे गरजेचे आहे.

३७ कोटींबाबत निर्णय घेण्याची मागणी
अंबाबाई मंदिरात जमा होणारी उंबऱ्याच्या आतील देणगी पुजाऱ्यांनी तर उंबऱ्याबाहेरील देवस्थान समितीने घ्यायची रीत सुरु आहे. उंबऱ्याच्या आतील देणगी पुजारी घेतात, परंतु उंबऱ्याबाहेरील दानपेटीमधील समितीच्या हक्काच्या देणगीवरही पूजाऱ्यानी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे समितीच्या हक्काचे सुमारे ३७ कोटी न्यायालयात अडकून पडले आहेत. ही रक्कम तातडीने देवस्थानला मिळण्याबाबत कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण रक्षणाची मिळाली सुबुद्धी

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : दरवर्षी मूर्तीदान करणाऱ्यांची संख्या वाढत गेल्याने गेल्या तीन वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची सुबुद्धी भक्तांना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी भाविक स्वतःहून शाडूची मूर्ती प्रतिष्ठापनेचा आग्रह धरत आहेत. शहर वगळता यंदा जिल्ह्यात तब्बल २ लाख ४६ हजार ९४२ मूर्ती दान झाल्या. शहरासह एकूण चार लाखांहून अधिक मूर्ती दान झाल्या. त्यामुळे मूर्तीदान चळवळीलाही बळ मिळाले. राज्यात या चळवळीने आदर्श घालून दिले आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालयात त्यासंबंधी जनहितयाचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुनावण्याही सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प‌रिषद, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका यांसह नदीकाठावरील गावे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र गणेशोत्सव काळात मूर्ती, निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण हा भावनेशी संबंधीत असल्याने तो रोखणे आव्हानात्मक होते. मात्र सातत्याने प्रबोधन करीत राहिल्याने भाविकांचे मन परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे. मूर्ती, निर्माल्य दानला होणारा कडवा विरोधही मावळला. परिणामी २०१५पासून मूर्तीदान चळवळीला गती आली आल्याचे दिसून येत आहे.

शहर-जिल्ह्यात घरगुती गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीदिवशीच्या सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती विसर्जनावेळी मनुष्यबळ तैनात करण्यात आले. आवश्यक यंत्रणा पुरवण्यात आली. जिल्हा परिषद, महसूल, पोलिस प्रशासन संयुक्तपणे नेटके नियोजन केले. त्यामुळे मूर्ती, निर्माल्यदानला प्रत्येक वर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे सदस्यही यासाठी सक्रिय झाले. शहरापासून खेडोपाड्यापर्यंत मूर्ती, निर्माल्य दान चळवळ विस्तारली. त्यामुळे चार लाखांहून अधिक मूर्ती पाण्यात विसर्जित करण्यापासून रोखण्यात यश आले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात होणारे पाणी प्रदूषण टळले. नागरिकांनी ११४८ ट्रॉली निर्माल्य पाण्यात टाकले नाही. प्लास्टर ऑप पॅरीसच्या मूर्त्यांमुळे प्रदूषण अधिक होते. त्यामुळे ६४ हजार ३० नागरिकांनी शाडूची मूर्ती प्रतिष्ठापना करून पाणीप्रदूषण टाळले. दान ‌केलेल्या मूर्ती, निर्माल्याची विल्हेवाटही भाविकांच्या भावना दुखावणार नाहीत, अशा पद्धतीने केले गेले. मूर्तीदानला भरघोस प्रतिसाद मिळण्याचेही हेही एक महत्वाचे कारण ठरले.

मूर्तींचा पुन्हा वापर

सार्वजनिक गणेश मंडळातील कार्यकर्ते लाखो रुपये देऊन मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. भव्य मूर्ती असल्याने विसर्जनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच यंदा अनेक मंडळांनी मूर्तीचा पुन्हा वापर करण्यासाठी दुसऱ्या गावातील मंडळांना मूर्ती दिली. काही मंडळांनी मूर्तीकारांनाच मूर्ती दिल्या. त्यामुळेही प्रदूषण थांबले आहे.

‌करवीर तालुका नंबर वन

करवीर तालुक्यात शहरातील उपनगराचा मोठा भाग येतो. या तालुक्यातील गावांतील सांडपाणी व इतर अपायकारक घटकांमुळे पंचगंगा नदी प्रदूषीत होत असल्याचे यापूर्वीच्या सर्व्हेंमधून पुढे आले आहे. गेल्या तीन वर्षांत याच तालुक्यातून सर्वाधिक मूर्ती, निर्माल्य दान झाले आहे. यंदाही विक्रमी ५६ हजार ६८८ म‌ूर्तीदान या तालुक्यांतून झाले.

आकडे बोलतात

वर्ष मूर्तीदान

२०१५ - १ लाख ८२ ह‌जार ४४२

२०१६ - २ लाख ३५ हजार ८८९

२०१७ - २ लाख ४६ हजार ९४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महिला रस्त्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बाजारगेट प्रभागातील विविध भागात सातत्याने कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ परिसरातील महिला गुरुवारी रस्त्यावर उतरल्या. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नगरसेविका उमा बनछोडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पापाची तिकटी येथे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. महापौर हसीना फरास यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीप्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या आंदोलनामुळे पापाची तिकटी परिसरातील ट्रॅफिक जॅम झाले.

प्रभागातील सम्राट चौक, पोस्ट गल्ली, नागराज गल्ली, म्हसोबा गल्ली, कुंभार गल्ली, गवळी गल्ली या भागाला गेल्या काही महिन्यापासून अपुरा पाणी पुरवठा होत आहे. अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठ्यामुळे परिसरातील नागरिक विशेषत: महिला त्रस्त बनल्या आहेत. मुबलक पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी नगरसेविका उमा बनछोडे, शिवानंद बनछोडे यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिक आणि महिलांनी दुपारी एकच्या सुमारास पापाची तिकटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. महिलांनी साखळी करत गंगावेश, मह़ाद्वार रोड व शिवाजी मार्केटकडून येणारी वाहतूक रोखली.

‘मुबलक पाणी मिळाले पाहिजे, स्वच्छ पाण्याचा पुरवठा करा’ अशा घोषणा देत काही महिलांनी रस्त्यावर ठिय्या मारला. आंदोलनात उज्ज्वला ब्रह्मपुरे, मालूताई माजगांवकर, मंगला कातवरे, सुनीता झगडे, भारती गवळी, पुष्पा भोगांवकर, रेखा माजगांवकर, नर्मदा कुंभार आदींचा सहभाग होता. पापाची तिकटी येथे रास्ता रोको केल्यामुळे परिसरातील वाहतूक खोळंबली. तीनही मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जलअ​भियंता सुरेश कुलकर्णी आंदोलनस्थळी आल्यानंतर महिलांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यांनी शाखा अभियंत्यांशी चर्चा करुन पाणी पुरवठा सुरळीत करू, असे सांगितले. मात्र त्यावर महिलांचे समाधान झाले नाही. महापौर हसीना फरास, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकरही आंदोलनस्थळी दाखल झाले. महापौरांनी, सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी प्रश्नाची सोडवणूक केली जाईल, अशी ग्वाही दिली.


प्रभागातील विविध भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. प्रशासनाचे याकडे सातत्याने लक्ष वेधले. सर्वसाधारण सभेतही भागातील पाण्याचा प्रश्न मांडला. मात्र प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांनी चालढकल केली. प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील आहे. पाणी प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

उमा बनछोडे, नगरसेविका बाजारगेट प्रभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या हालचाली गतिमान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसच्या तालुका तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी पक्षपातळीवर तालुक्यांसाठी निवडणूक निरीक्षक नेमले नसल्याने प्रक्रिया सुरू झालेली नाही. तालुकास्तरावरील कार्यकारिणीची प्रथम निवड होणार आहे. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीबरोबर जिल्हाध्यक्षही निवडण्यात येणार आहे. नवीन जिल्हाध्यक्ष होणार की विद्यमान अध्यक्षांनाच संधी मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारिणी व अध्यक्ष निवडीसाठी पक्षांतर्गत कार्यक्रम जाहीर केला जातो. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांसाठी निवडणूक निरीक्षक नेमून त्यांच्या निरीक्षणाखाली कार्यकारिणी व पदाधिकारी निवडी केल्या जातात. आतापर्यंतची वाटचाल पाहता मतदानाने ही प्रकिया झालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीवेळीही मतदानाऐवजी राजकीय वजन असलेल्याचीच निवड होण्याची शक्यता आहे. सध्या तालुक्याची २५ सदस्यांची कार्यकारिणी आहे. तर जिल्हा कार्यकारिणी ४० ते ४५ सदस्यांची आहे. यामध्ये अद्याप बदल झालेला नाही. त्यामुळे तालुकास्तरावरील कार्यकारिणी निवडल्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे.

तालुक्यांच्या कार्यकारिणीसाठी फार मोठी चढाओढ होण्याची शक्यता नाही. इच्छुकांमधील कार्यकर्त्यांची नावे कार्यकारिणीवर पाठवली जातात. त्यातून संभाव्य तालुका अध्यक्षांची निवड केली जाते. ​जिल्हास्तराच्या कार्यकारिणीमध्ये जाण्यासाठी मात्र अनेकजण इच्छुक असतात. त्यामुळे त्यांची निवड करताना नेत्यांची कसरत होणार आहे. जिल्हाध्यक्षांचीही निवडणूक होणार असल्याने साऱ्यांचे लक्ष या पदाकडे लागले आहे. माजी आमदार पी. एन. पाटील यांनी प्रदीर्घ काळ जिल्हाध्यक्षपद भुषवले आहे. मध्यंतरी प्रकाश आवाडे आणि संजय घाटगे यांच्यात अध्यक्षपदावरून चुरस होती. आवाडे यांनी दावेदारी केली होती, मात्र, पी. एन. पाटील यांनी त्याला विरोध केल्याने पक्षानेही पाटील यांच्याकडेच पदभार दिला. विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी आवाडे यांची मनधरणी करताना आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाबाबत शब्द दिला होता. मात्र, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने आवाडे यांनी पक्षच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या कमी असली तरी पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान जिल्हाध्यक्षपदाबाबत कायम आहे.

नवा नेता कोण?

जिल्हाध्यक्षपदावरुन पी. एन. पाटील व आवाडे गटातील कटुता आजतागायत कायम आहे. त्यामुळे आवाडे यांनी पक्ष बदलण्यापर्यंतचा विचार चालवला आहे. अजून त्यावर निर्णय घेतलेला नसला तरी पक्षातील निष्ठावंत नेते दूर जाण्याबाबतचा विचार काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील नवीन पदाधिकाऱ्यांबाबत चर्चा होऊ लागली आहे. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी असलेल्या पी. एन. पाटील यांच्याबरोबर आमदार सतेज पाटील पक्षाच्या कामात असले तरी दोघांत फारसा समन्वय दिसत नाही. ​​जिल्ह्यात अन्य काँग्रेसचे नेते असले तरी त्यांचा काँग्रेस कमिटीशी येणारा संपर्क पाहता जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांचा विचार होण्याची शक्यता कमी आहे. पी​​. एन. पाटील यांनीही आता सलगपणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असल्याने आता नवीन चेहऱ्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यासाठी ​इच्छुकांकडून तालुका पातळीपासूनच योग्य पद्धतीने पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी निवडी लक्षात घेता प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांच्या उत्सवात जिल्ह्यात ५०० कोटींची उलाढाल

0
0

कोल्हापूर ः चौसष्ट कला आणि चौदा विद्यांचा ​अधिपती असलेल्या गणपतीच्या आगमनापासून सुरू झालेल्या उत्सवाचे विसर्जन मिरवणुकीतील शेवटचा गणपती पाण्यात पडल्यानंतर सूप वाजले. हजारो हातांना रोजगार देणाऱ्या आणि असंख्य कलाकारांच्या कलेला वाव देणाऱ्या गणेशोत्सवकाळात बाजारपेठेत झालेल्या आर्थिक व्यवहाराने कोटींची उलाढाल केली. गेल्या अकरा दिवसांच्या या चैतन्याच्या उत्सवात सार्वजनिक मंडळांच्या मंडपापासून वाद्यप्रकार, वाहने, सजावट, तांत्रिक देखाव्यांची उभारणी, मिरवणुकीचा डामडौल, देखाव्यांसाठी स्किटच्या सीडी, खाद्यपदार्थांची ऑर्डर यामुळे बाजारपेठेतील अनेक उद्योगाला चालना मिळाली. तर घरगुती उत्सवासाठी मूर्ती, मखराचे साहित्य, प्रसादाचे पदार्थ, नैवेद्याचे साहित्य, पूजेसाठी फुले आणि फळांची खरेदी यावरही करण्यात आलेल्या खर्चामुळे बाजारातील आर्थिक उलाढाल तेजीत राहिली. गणेशोत्सवकाळातील हा उत्साह पाहता जिह्यात गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांत सुमारे पाचशे कोटींची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

गणेशोत्सव काळातील पंधरा दिवस बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. शिवाय घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर देखावे आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर लोटलेल्या जनसमुदायामुळे अगदी पॉपकॉर्न विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांपासून हॉटेल व्यावसायिकांचीही मोठी उलाढाल झाली. हजारोंच्या संख्येने असलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी जमवलेली वर्गणी, त्यामधून आकर्षक मंडपांबरोबर वाद्यप्रकार, सजावटीचे प्रकार, देखावे, मिरवणूक आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी केल्या गेलेल्या खर्चामुळे गेल्या पंधरा दिवसांत गणेशोत्सवासाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. घराघरांमध्ये साजऱ्या करण्यात येत असलेल्या गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत गणेशोत्सवापूर्वी पंधरा दिवसांपासून लगबग वाढली होती. गणेशमूर्ती निवडण्यापासून ते सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने बाजारपेठेत आलेल्या नागरीकांच्या मागणीमुळे सजावटीच्या बाजारपेठेला झळाळी आली. शहरातील पापाची तिकटी, बाजारगेट या परिसरात सजावटीच्या साहित्याचीच उलाढाल लाखांच्या घरात झाली.

घरगुती गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक मंडळांनीही मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. त्यासाठी मंडप उभारणीपासून मिरवणुकीपर्यंतचे सारे नियोजन केले होते. त्यामुळे मंडपवाल्यांबरोबर मिरवणुकीसाठीचा वाद्य प्रकार, देखावे तयार करण्याची लगबग तर सजावटीसाठी वेगवेगळ्या साकारलेल्या संकल्पना यासाठी नियोजन करून ठेवले होते. प्रत्येक मंडळाकडून या सर्व प्रकारासाठी खर्च केला जात असला तरी मोठ्या मंडळांचा खर्च मोठ्या प्रमाणातच केला जातो. विसर्जन मिरवणुकीसाठीच अशा काही मंडळांचे बजेट किमान एक लाख रूपयांचे असते. त्यामध्ये वाद्यांसाठी, लाईट इफेक्टससाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. काही मंडळांनी केवळ स्पेशल लाइट इफेक्टसाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. फार मोठी तालीम, मंडळे सोडल्यास इतर मध्यम स्वरुपाच्या मंडळांकडून किमान एक लाखाहून अधिक रक्कम या अकरा दिवसांसाठी खर्च केली जाते. शहरामधील मंडळांकडून हा खर्च होत असला तरी जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही किमान पन्नास ते ८० हजाराहून अधिक खर्च केला जातो. ज्या मंडळांकडून गणेशोत्सवादरम्यान काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जात असेल तर हा खर्च दीड लाखापर्यंत जातो. गणेशोत्सवाच्या आगमनापासून बहरलेल्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल लाखमोलाची झाली आहे.

नारळ, फुले, फळे, प्रसादाचे साहित्य, पूजेचे तयार पुडे, खारीक, खजूर, विड्याची पाने, सुगडी, कुकडी, कापूस वस्त्रमाळ, अष्टगंध, कापूर या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाल्याने उत्सवाकाळातील अकरा दिवस पूजेच्या साहित्याने छोट्या विक्रेत्यांना आर्थिक लाभ मिळवून दिला. गौरी आवाहन आणि वसापूजन या दोन दिवसांत गौरीच्या सजावट साहित्यापासून ते नैवेद्य, ओटी, साडी, दागिने यांच्या बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली.

नारळ बाजारात लाखोंची मागणी

गणेशोत्सवकाळात पूजेच्या साहित्य बाजारपेठेत नारळाच्या खरेदीविक्रीने मोठी उलाढाल केली. गेल्या अकरा दिवसांत नारळ बाजारपेठेत जिल्ह्यात जवळपास आठ लाखांवर नारळांची विक्री झाली. घरगुती गणेशमूर्ती असो किंवा सार्वजनिक मंडळाची मूर्ती, भाविकांकडून पाच नारळांपासून, अकरा, एकवीस, एक्कावन्न नारळाचे तोरण बांधण्याची प्रथा आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नारळाच्या बाजारपेठेत लाखो नारळ मागवण्यात आले होते. दक्षिण भारतातील तमिळनाडूसह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात नारळ आणण्यात आले.

देखाव्यांतून कारा​गिरीला मिळाले मानधन

कोल्हापुरात देखाव्यांना मोठी परंपरा आहे. यामध्ये सजीव व तांत्रिक देखाव्यासह प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती, आकर्षक मंडपही उभारले जातात. काही मंडळांचे तंत्रकुशल कार्यकर्तेच देखाव्यांची तयारी करतात. मात्र काही मंडळांकडून कारागिरांना काम दिले जाते. राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना बुधवार, सोमवार पेठ या भागात देखाव्यांसाठी सेट उभारणीवर झालेल्या आर्थिक खर्चामुळे कारागिरांना चांगले मानधन मिळाले. हुबेहूब प्रतिकृतींसह कोल्हापुरातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू, स्थळे कारागिरांनी साकारली. सजीव देखाव्यांसाठी विविध सामाजिक विषयांवरील संहिता लेखन आणि ध्वनीमुद्रण या क्षेत्रात लाखो रूपयांची उलाढाल झाली. शहरातील स्टुडियो उत्सवापूर्वी पंधरादिवसांपासूनच गजबजले होते. दहा ते पंधरा मिनिटांच्या देखाव्यासाठी संवादलेखनापासून ते ध्वनीमुद्रण अशी तयार सीडी करून देण्याचे काम कोल्हापुरातील जवळपास शंभर कलाकार करत होते. यामध्ये अभिनेते, लेखक, ध्वनीमुद्रक यांची टीम कार्यरत होती. लाखो रूपयांची उलाढाल या वर्तुळात झाली.

==========
मंडळाच्या कार्यकर्त्यांना एखाद्या सामाजिक, किंवा ऐतिहासिक विषयावर देखावा करायचा असतो. त्यासाठी संवाद, सादरीकरणाच्या टिप्स आणि ध्वनीमुद्रण यासाठी स्टुडिओची गरज लागते. गणेशोत्सवकाळात अशा प्रकारचे काम करणाऱ्या हौशी कलाकारांपासून ते व्यावसायिक कलाकारांपर्यंत सर्वांना मागणी असते. संवाद लेखन आणि त्यासाठी आवाज देणे अशा दोन टप्प्यात हा व्यवसाय गणेशोत्सव काळात अनेक छोट्या कलाकारांसाठी आर्थिक स्रोत ठरतो. यंदाही यामध्ये लाखो रूपयांची उलाढाल झाली.

उमेश नेरकर, लेखक, संगीतकार
============
घरगुती गणेशोत्सव ते सार्वजनिक गणेशोत्सव असो, प्रत्येक ठिकाणी नारळाला मागणी असते. नारळ आ​णि नारळाचे तयार तोरण यामध्ये यंदा मोठी उलाढाल झाली. काही महत्त्वाच्या मंडळाच्या गणपतींना भाविकांकडून नारळाचे तोरण अर्पण केले जाते. त्यासाठी यंदा रेडीमेड नारळाच्या तोरणांमुळे नारळाच्या मागणीत वाढ झाली. उत्सवकाळात जिल्ह्यात विक्री झालेल्या नारळांची संख्या आठ लाखांच्या घरात आहे.

शिवाजी बोडके, नारळ व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी होणार सुजाण

0
0

Anuradha.kadam@timesgroup.com
Tweet@:anuradhakadamMT

कोल्हापूर : पुस्तकातील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांना समाजातील वि​विध समस्यांबाबत जाणीव व्हावी आणि त्यातून भविष्यातील संवेदनशील नागरीक घडावा या हेतूने जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील तीन लाख शालेय विद्यार्थ्यांसाठी सुजाण विद्यार्थी अभियान राबवण्यात येणार आहे. ​जिल्ह्यातील १६५० शाळांमध्ये २१ सप्टेंबरपासून या अभियानाचा श्रीगणेशा होणार असून यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने दहा लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

विद्यार्थी हा भविष्यातील सुजाण नागरीक व्हावा हे शिक्षणाचे मूळ उदिष्ट आहे. मात्र पुस्तकी अभ्यासक्रम हा केवळ परीक्षेतील गुणांपुरता सिमीत राहतो आणि व्यावहारिक आयुष्यात समाजाचा घटक म्हणून वावरताना नव्या पिढीतील मुले अलिप्त राहण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर समाजातील अनेक प्रश्नांबाबत विचार करणारी, त्यांच्या सोडवणुकीसाठी योगदान देणारी पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी दशेतच सामाजिक संस्कार व्हावेत यासाठी सुजाण विद्यार्थी अभियानाची संकल्पना मांडण्यात आली आहे.

या ​अभियानातंर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान स्नेहासोबत सामाजिक संवेदनशीलता यावी यासाठी ३० माहितीपटांची निर्मिती करण्यात आली आहे. अंधश्रद्धा, स्त्री भ्रूण हत्या, महिलांवरील अत्याचार, महिलांची छेडछाड, शेतकऱ्यांच्या व्यथा, पर्यावरणावरील आक्रमण, निसर्गाची हानी, आरोग्यविषयक समस्या, प्रदूषणाचा विळखा, पाण्याची नासाडी, वाहतुकीची कोंडी, अल्पवयातील चुकीच्या गोष्टींचे आकर्षण, नैतिक मूल्ये अशा विविध विषयांबाबत जागृती करणाऱ्या माहितीपटाचे प्रदर्शन विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार आहे. परीक्षेतील गुणांसोबत विद्यार्थीदशेत समाजातील अनेक गोष्टी जाणून घेण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सजगता यावी यासाठी या अभियानाची रचना करण्यात आली आहे.

सध्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल स्कूल करण्याची मोहिम सुरू आहे. नवतंत्रज्ञानाची साधने जिल्ह्यातील १६५० शाळांपर्यंत पोहोचवली जात आहेत. २० पटावरील सर्व शाळा डिजिटल होत असताना विद्यार्थी समाजाभिमुख झाले पाहिजेत यादृष्टिने सुजाण विद्यार्थी अभियानाला महत्त्व देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही असलेल्या चुकीच्या समजुती, अंधश्रद्धा समूळ नष्ट करायच्या असतील तर त्यासाठी सध्याच्या शालेय विद्यार्थ्यांच्या पिढीमध्ये जाणीवजागृती होण्याची गरज आहे. त्यातून भविष्यातील वैचारिक बांधणी होऊ शकते. याच विचारातून सुजाण विद्यार्थी अभियानामध्ये दाखवण्यात येणाऱ्या ३० माहितीपटांच्या विषयाची निवड करण्यात आली आहे.

कोट

आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरीक आहे. असा नागरीक समाजाचा विचार करणारा आणि संवेदनशील असेल तर समाजाला दिशा मिळेल. हाच विचार सुजाण विद्यार्थी अभियानाचा पाया आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठ, केआयटी कॉलेज, सायबर कॉलेज, अशोकराव माने कॉलेज या संस्थेतील विद्यार्थ्यांनी माहितीपटाच्या निर्मितीसाठी मदत झाली आहे. विद्यार्थ्यांना माहितीपटाच्या माध्यमातून समाजातील समस्यांबाबत जागृत करण्याचे काम या अभियानातून करण्यात येणार आहे.

अंबरीश घाटगे, जि. प. सभापती, ​शिक्षण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंडपांचे रस्त्यावरच ठाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विघ्नहर्ता श्री गणरायाची विसर्जनाची जल्लोषी मिरवणूक संपून दोन दिवस उलटले असले तरी सार्वजनिक तरुण मंडळांचे मंडप अजूनही रस्त्यावरच आहेत. शहराच्या प्रमुख मार्गावर मंडपांनी ठाण मांडले आहेत. शहराला सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असताना काही तरुण मंडळांनी गणेशोत्सवात उभारलेले मंडप दुर्गामाता स्थापनेसाठी २१ सप्टेंबरपर्यंत ठेवण्याचे नियोजन केले आहे. मात्र, मंडपांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत आहे. गुरुवारीही नागरिकांना चारचाकी आणि अवजड वाहने चालविताना कसरत करावी लागली. प्रमुख मार्गावर वाहतुकीला शिस्त लावताना पोलिसांसमोरही अडचणी येत आहेत. विसर्जन मंडप, कमानी तातडीने हटवाव्यात अशी मागणी होत आहे.

श्रीं च्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष बुधवारी सकाळी संपला. सलग २६ तासांच्या मिरवणुकीनंतर तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विश्रांती घेतली. त्यामुळे गुरुवारी मंडप उतरविण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र अपवाद वगळता तसे झालेले नाही. त्यामुळे शहरातील उमा टॉकीज, शिवाजी चौक, नंगीवली, उमा टॉकीज चौक, क्रशर चौक, शिवाजी पेठ साकोली कॉर्नर, गंगावेश, मिरजकर तिकटी ते संभाजीनगर, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी परिसरात सार्वजनिक तरुण मंडळांचे मंडप रस्त्यावरच आहेत.

आता २१ सप्टेंबरला दुर्गामाता आगमन होत आहे. त्यामुळे दोनदा मंडप उभारायचा कशाला असे काही मंडळांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहेत. त्यामुळे या मंडळांचे मंडप रस्त्यावरच राहणार आहे. त्याचा मोठा फटका वाहतुकीच्या कोंडीला बसणार आहे. मुख्य मिरवणूक मार्गातील काही मंडप उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. महाद्वार रोडवरील काही मंडप, पंचगंगा नदी घाटावरील मंडप उतरविण्यात आले. मात्र नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मंडळाच्या अध्यक्षांनी रस्त्यावर लावलेल्या स्वागत कमानी तशाच आहेत. रस्त्यावरील डिव्हायडरमधल्या खांबांवर लावलेले शुभेच्छा फलकही हटलेले नाहीत.

शाहूपुरीतील बड्या मंडळांचे देखावे, लक्ष्मापुरीतील काही मंडळांचे मंडप रस्त्यावरच आहेत. उमा टॉकीज परिसरातील मित्र मंडळांचे मंडप रस्त्यावरच आहेत. राजारामपुरी परिसरात मुख्य रस्त्यावर काही मंडप आणि स्वागत कमानी तशाच आहेत. त्याचा अंतर्गत वाहतुकीला अडथळा होत आहेत. राजारामपुरीत वन-वे असल्याने आणि मंडप काढले नसल्याने वाहनधारकांची तारांबळ उडात आहे. राजारामपुरी परिसरात रुग्णांलयात जाणाऱ्या नातेवाईकांना लांबचा वळसा घ्यावा लागत आहे. गावठाण भागात बुरुड गल्ली, गंगावेश परिसर येथील स्वागत कक्ष आणि कमानी काढलेल्या नाहीत.

कमानींची जाहिरातबाजी तशीच

सानेगुरूजी वसाहत परिसर, क्रशर चौकातील कमानी काढलेल्या नाहीत. वाढदिवसांच्या शुभेच्छा देणारे फलक तसेच आहेत. शिवाजी पेठेतील अंतर्गत गल्ल्यांतील कमानी कायम आहेत. मंगळवार पेठेसह लक्ष्मापुरी ते गोखले कॉलेज रोडवरील मंडप उतरविलेले नाहीत. मंडप रस्त्यावर असूनही महापालिकेने अतिक्रमण केल्याबद्दल काहीही कारवाई केलेली नाही. कसबा बावड्यातही कमी-अधिक प्रमाणत हीच स्थिती आहे. मोफत जाहिरात होत असल्यान कमानी तशाच ठेवण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसते. महानगरपालिकेने यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुंधरा चित्रपट महोत्सव १४ पासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. या महोत्सवाअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा वसुंधरा मित्र पुरस्कार राधानगरी येथील अनिल बडदारे, पत्रकार रणजित माजगावकर आणि एन्वहायरो लिगल फोरम या संस्थेला देण्यात येणार आहे. तसेच वसुंधरा गौरव पुरस्कार विश्वास बालिघाटे, बाळगोंडा पाटील आणि लहू मोरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती किर्लोस्कर कंपनीचे रमेश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार (ता. १५) रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार प्रदान सोहळा शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. देशातील ३६ ठिकाणी गेली १० वर्षे हा महोत्सव आयोजित केला जात असून कोल्हापूरातील हे आठवे वर्ष आहे. यंदाचा महोत्सव ‘नदी वाचवा जीवन वाचवा’ या संकल्पनेवर आधारी असून पर्यावरण विषयाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध सन्मानाने गौरवलेले ३५ सिनेमे या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. पत्रकार परिषदेला राहुर पवार, पर्यावरणतज्ञ उदय गायकवाड निसर्गमित्रचे अनिल चौगुले आदी उपस्थित होते.

कृतीशीलतेचा सन्मान

वसुंधरा ​मित्र पुरस्कार प्राप्त अनिल बडदारे राधानगरी येथे गेली २५ वर्षे पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे काम करत आहेत. इदरगंज येथे अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्रात सुरू होणाऱ्या बॉक्साईट खाणकामाला विरोध केला होता. नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ते सातत्याने काम करत आहेत. पत्रकार व कॅमेरामन रण​जित माजगावकर यांनी बातमीच्या माध्यमातून पंचगंगा, भोगावती, कृष्णा या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न मांडला आहे. तसेच गडकिल्ले, वारसास्थळे, प्लास्टिक, कचरा, वन्यप्राणी या अनुषंगाने चित्रफीत तयार करून ती प्रदर्शित केली आहे. पर्यावरणबाबत जनजागृती केली आहे. एन्व्हायरो लिगल फोरम या संस्थेतर्फे कोल्हापुरातील काही वकील आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या समविचारी तरुणांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धनाचे काम केले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी कायद्याची बाजू मांडण्याचे काम या संस्थेमार्फत केले जात आहे. पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्राबाबत केंद्र सरकारला दिलेल्या अहवालासाठी कायदेशीर सहकार्य या संस्थेने दिले आहे. पर्यावरणवादी संस्थांना कायद्याबाबत माहिती व सल्ला देण्यामध्ये या संस्थेचे योगदान आहे.

प्रदूषण‌ाविरोधात लढा

वसुंधरा गौरव पुरस्कारप्राप्त विश्वास बालिघाटे हे शिरोळ तालुक्यातील आहेत. नदीकाठावरील शिरढोण या गावाला प्रदूषणामुळे होणाऱ्या धोक्याबाबत जनआंदोलन उभारण्यात बालिघाटे यांचा वाटा आहे. त्यांनी सातत्याने केलेल्या संघर्षामुळे प्रशासनाने दखल घेतली. आंदोलनात बालिघाटे यांनी तुरुंगवासही भोगला आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील बाळगोंडा पाटील यांनी हेरवाड गावातील नदीप्रदूषणाच्या फटक्याविरोधात आंदोलन केले. गावकऱ्यांना एकत्र करून नदी प्रदूषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. कृष्णा व पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी सातत्याने लढा दिला आहे. करवीर तालुक्यातील कोगे येथील लहू मोरे यांचे १९ लोकांचे कुटुंब आहे. केवळ साबण, मीठ आणि चहापावडर या तीन वस्तू ते विकत आणतात. उर्वरित सर्व जीवनावश्यक वस्तू स्वत:च्या शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकवतात. धान्ये कडधान्ये, पालेभाज्या, औषधी वनस्पती, दूध, अंडी यासह मासेही स्वत:च्या विहिरीत पैदास करून आहारात खाण्यासाठी वापरतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकांसाठी कोल्हापुरात राज्यभरती

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

१३६ इन्फन्ट्री बटालियन (टी.ए.) महारच्यावतीने पर्यावरणीय दलासाठी कृषी महाविद्यालयाच्या मैदानात १४ ते १९ सप्टेंबर या कालावधीत राज्यस्तरीय भरती होणार आहे. या भरतीसाठी केवळ सैन्यदलातून निवृत्त झालेल्यांनाच अर्ज करता येणार असून संपूर्ण महाराष्ट्र राज्याची भरती कोल्हापुरात होणार आहे.

भरती प्रक्रिया झाल्यानंतर १३६ टी.एस.बटालियनचा तळ औरंगाबादमध्ये असेल. भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार निवृत्त सैनिक असणे आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. ही भरती १४ आणि १५, १६ आणि १७, १८ आणि १९ सप्टेंबर अशी तीन टप्प्यात होणार असून प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी होणार आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ५ वर्षाच्या आतील सर्व जवान आणि जे सी ओ यांना अर्ज करता येणार आहे. माजी सुभेदार ४८, माजी नायब सुभेदार, हवालदार ४५ वर्ष, माजी सैनिक ४२ वर्ष अशी वयोमर्यादा आहे. त्यांना ५० वर्षापर्यंत सेवा बजावता येणार आहे. उमेदवाराला शिपाई म्हणूचन भरती केली जाईल तर ज्युनिअर कमिशंड ऑफिसर यांना नायब सुभेदार म्हणून भरती केली जाणार आहे. सैन्य दलातून सेवानिवृत्ती झालेल्यांना पहिल्यांदा दोन वर्षासाठी रुजू करुन घेण्यात येईल. त्यानंतर त्या व्यक्तीचे कार्य तपासून एक वर्षासाठी त्यात वाढ करण्यात येईल.

अर्जदार माजी सैनिक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अपेक्षित आहे तसेच त्याचे चारित्र्य स्वच्छ असावे. अर्जदाराविरोधात एफ.आय.आर, पो​लिस तक्रार झालेली असू नये. त्याला कोणत्याही न्यायालयाने शिक्षा दिलेली असू नये. एकापेक्षा अधिक विवाह केलेल्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या ठिकाणी झालेली सेवा कोणत्याही पेन्शनसाठी पात्र होणार नाही. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी होणार असून सर्व जिल्ह्यांची भरती प्रक्रिया कोल्हापुरात राबवली जाणार आहे.

प्रक्रिया अशी

१४ आणि १५ सप्टेंबर

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यासाठी भरती पक्रिया.

१६ व १७ सप्टेंबर

औरंगाबद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी कोल्हापुरातच भरती प्रक्रिया.

१८ आणि १९ सप्टेंबर

अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीप्रकरणी एकाला अटक

0
0

इचलकरंजी



बांधकाम ठेकेदाराला एक लाखाच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. यापैकी मुख्य संशयित प्रविण दत्तात्रय रावळ (वय ३१, रा. गणेशनगर, इचलकरंजी) याला अटक करण्यात आली. उर्वरित दोघे जण अद्याप फरार आहेत.

शहापूर डेक्कन प्रोसेसजवळ राहणारे दिपक नथुराम पवार हे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहेत. गेल्या वर्षभरापासून प्रविण रावळ व त्याचे साथीदार हे पवार यांना खंडणीसाठी त्रास देत होते. रावळ व त्याच्या साथीदारांनी पवार याच्याकडून महिन्याला २० हजार रुपये वेळोवेळी खंडणी उकळली आहे. पुन्हा ते २५ हजार रुपयांची मागणी करत होते. तसेच दोन सप्टेंबर रोजी पुन्हा आणखीन एक लाख रुपयांची मागणी केली. प्रविण रावळ याच्या भितीमुळे पवार हे जयसिंगपूर येथे राहण्यासाठी गेले होते. मात्र तरीही रावळ याच्या खंडणीसाठी धमक्या सुरूच होत्या. कर्नाटक येथे नेऊन मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. यामुळे पवार यांनी मंगळवारी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रविण रावळ याच्यासह त्याचे साथीदार गस्ते आणि अजित नाईक याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. सायंकाळी रावळ याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघे अद्याप फरार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओ, कार्यालयची प्रतीक्षा

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet :@Appasaheb_MT

कोल्हापूर: नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना होऊन तीन आठवडे उलटले, मात्र या कालावधीत नगरविकास विभागाकडून प्राधिकरणसाठी ‘सीईओ’ची नियुक्ती झाली नाही. प्राधिकरणाच्या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या नाहीत. ‘सीईओ’ आणि ऑफिस कामकाजासाठी नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधिकरण ऑफिसची सुरुवात झाली नाही. नगरविकास विभागाकडून अद्याप कोणत्याच सूचना प्राप्त झाल्या नसल्याने प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत अधिकारी वर्गही संभ्रमावस्थेत आहे.

कोल्हापूरच्या हद्दवाढीला विरोध झाल्यानंतर प्राधिकरणाचा पर्याय पुढे आला. कोल्हापूर शहरासह आसपासच्या ४२ गावांचा प्राधिकरणात समाविष्ठ केल्याची घोषणा १६ ऑगस्ट रोजी करण्यात आली. प्राधिकरणसाठी सीईओ दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येणार आहे.‘ पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्राधिकरणचे अध्यक्ष असून समितीत बारा सदस्यांचा समावेश आहे. ‘ड’वर्ग महापालिकेसाठी पहिल्यांदाच प्राधिकरणची स्थापना झाली आहे. कोल्हापूर शहर आणि आसपासच्या गावांचा नियोजित आणि संतुलित विकास साधण्यासाठी प्राधिकरणची स्थापना झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या.

प्राधिकरण स्थापण करुन तीन महिन्याचा कालावधी उलटला पण अद्याप सीईओची रितसर नेमणूक नाही. कार्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध केले नाही. नगररचना कार्यालयातील अधिकारीही सरकारच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका नसल्यामुळे प्राधिकरणाच्या कामकाजाला सुरुवात झाली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात अद्याप प्राधिकरण ऑफिस होणे अपेक्षित होते. सरकारकडून अध्यादेश काढला आहे, पण प्रा​धिकरणच्या कामाला सुरुवात करण्यासंदर्भात कोणतेही आदेश नगर विकास विभागाकडून प्राप्त झाले नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे अधिकारी सांगतात.

समितीत समावेश, पण कामकाजाबाबत अनभिज्ञ

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्राधिकरणचे अध्यक्ष आहेत. समिती सदस्य म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, करवीर व हातकणंगले पंचायत समिती सभापती, महापालिका आयुक्त, झेडपीचे सीईओ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे (पुणे) मुख्य अभियंता, जमाबंदी आयुक्त किंवा त्यांनी नामानिर्देशित केलेले उपसंचालक भूमि अभिलेख यांचा समावेश आहे. उपसंचालक नगररचना हे प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी व समितीचे सचिव असतील. प्राधिकरणसाठी अद्याप सीईओची नियुक्ती झाली नाही. समितीतील अन्य सदस्यांनाही प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत काहीच आदेश नाहीत. कोल्हापूरसाठी पहिल्यांदाच प्राधिकरणची स्थापना झाल्याने कामकाजाबाबत सारेच अ​नभिज्ञ आहेत. समितीत समाविष्ठ लोकप्रतिनिधींशी संपर्क साधले असता नगर विकास विभागाकडून अधिकृत काहीच कळवले नसल्याचे सांगितले.


प्राधिकरणच्या कार्यकक्षा....

प्रादेशिक नियोजनाचा आराखडा तयार करणे

महत्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी, त्यासाठी अर्थसहाय

शहर व संबंधित गावांत शाश्वत विकासाची दिशा निश्चित

समाविष्ठ ४२ गावांत पायाभूत सुविधांची निर्मिती

रस्त्यांचा विकास, सांडपाण्याचे व्यवस्थापन

वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय


प्राधिकरणची घोषणा करुन तीन आठवडे उलटले. मात्र प्राधिकरण म्हणजे काय, नेमका कसा विकास साधणार या संदर्भात कसलीही माहिती दिली नाही. प्राधिकरण कामासंदर्भात कसल्याही हालचाली दिसत नाहीत. सोळा ऑगस्ट ते आज अखेर समिती सदस्यांची बैठक झाली नाही. यामुळे प्राधिकरणची नेमकी संकल्पना, विकास प्रकल्प, भविष्यातील प्रकल्प याबाबत सारेच अनभिज्ञ आहेत.

प्रदीप झांबरे, सभापती, करवीर पंचायत समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार

0
0

कोल्हापूर

जिल्ह्यात गुरूवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड ते दोन तास झालेल्या या पावसाने अनेक भागात पाणीच पाणी करून टाकले. हा पाऊस पिकांना उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

...........

इचलकरंजीला पावसाने झोडपले

इचलकरंजी

इचलकरंजी शहर व परिसरात गुरुवारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दुपारनंतर विजांचा गडगडाट सुरू झाला, त्यानंतर आलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली होती. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने दुकानांसह घरात पाणी घुसले होते. वादळामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.

गुरुवारी दुपारी शहर व परिसरात अचानक वादळी वारे वाहू लागले, ढगांचा कडकडाट, वीजांचा गडगडाट होऊन पावसाने अक्षरशः झोडपून काढले. एक तास हा पाऊस बरसत होता. अचानक आलेल्या पावसाने फेरीवाल्यांसह विक्रेत्यांची तारांबळ उडवली. मुख्य रस्त्यावरील शॉपिंग सेंटर परिसरा अनेक भागात सारण गटारी तुंबल्याने रत्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. मोठे तळे, आवळे मैदान, दाते मळा, राजवाडा चौक आदी सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. तासाभरानंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरुच होती.

...............

शिरोळ तालुक्यात मुसळधार

जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यात गुरूवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे जयसिंगपुरात काहीकाळ जनजीवन व वाहतूक विस्कळीत झाली. त्याचबरोबर सखल भागात पाणी साठल्याने तेथे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटासह सुमारे एक तास जोराचा पाऊस पडला. जय​सिंगपूर शहरातील वाहतूक पावसामुळे ठप्प झाली. मर्चंट्स असोसिएशन, लक्ष्मी रोड, नांदणी रोड, बसस्थानक परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने तेथे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली, तरी ढगाळ वातावरण कायम होते.

............

गडहिंग्लजमध्ये दमदार

गडहिंग्लज

गडहिंग्लजमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने या मौसमात पहिल्यांदाच हजेरी लावली. सकाळी साडे अकराच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. अचानक आलेल्या पावसाने शहरातील बहुतांश गटारी ओसंडून वाहिल्या व सखल भागात पाणी साचले. त्यामुळे फुटपाथ विक्रेत्यांसह नागरिकांची भंबेरी उडाली.

यावर्षी गडहिंग्लज तालुक्यात अपेक्षित पाउस झालाच नव्हता. राज्यात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना गडहिंग्लज तालुका मात्र उपेक्षित राहिला होता. दरम्यान, गुरूवारी सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल तासभर झालेल्या पावसामुळे काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले.

.............

गारगोटीत बाजारावर परिणाम

गारगोटी



गुरूवारी दुपारी गारगोटीसह तालुक्यास मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने झोडपले. अचानक झालेल्या पावसाने आठवडा बाजारावर मोठा परिणाम झाला. बाजारात विक्रेते व ग्राहकांची अक्षरशः धांदल उडाली होती. हा पाऊस भातासह अन्य पिकास उपयुक्त असल्याने बळीराजा सुखावला आहे.

तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या कडगाव - पाटगांव परिसरात पावसाचा जोर अधिक होता. या परिसरात दाट धुक्याची झालर निर्माण झाली होती. तालुक्यात पावसाअभावी पिकावर तांबेरा, करपा सारखे व्हायरल रोग पडत होते, पण या पावसाने दिलासा मिळाला आहे.

................

हातकणंगलेत पाणीच पाणी

हातकणंगले

तालुक्यात सर्वच ठिकाणी गुरुवारी दुपारी पावसाने अचानकपणे दोन ते तीन तास जोरदारपणे हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी करुन टाकले. तालुक्याच्या पश्चिमेला वारणा पट्ट्यातील घुणकी,वाठार,पेठ वडगाव परिसरात विजेच्या कडकडाटात पावसाने आगमन केले. तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती. किणी- घुणकी,पारगाव,वाठार,अंबप,पेठ वडगाव,कुंभोज, हेरले परिसरात दुपारी विजेच्या कडकडाड होऊन पावसाने सुमारे तासभर जोरदार हजेरी लावली तर दुपारी चार वाजल्यापासून आळते, हातकणंगले, हुपरी,पट्टणकोडोली, रांगोळी, रेंदाळ,इंगळी परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला.

..............

शेतकरी सुखावला

पन्हाळा

तालुक्यात दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी सुखावला आहे .दुपारपर्यंत वातावरणात उष्मा जाणवत होता, अचानक पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरूच होता. तालुक्यातील कोडोली, सातवे, माले, वारणानगर, बहिरेवाडी, कोतोली, माजगाव, जोतिबा डोंगर या ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

..................

चंदगड तालुक्यात दीड तास पाऊस

चंदगड

तालुक्यात गुरूवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी अडीचच्या दरम्यान तब्बल दीड तास मुसळधार पाऊस कोसळत होता. गेले आठवडाभर उष्म्याने त्रस्त झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला. सातवणे येथे झालेल्या वादळामुळे विद्युत खांब कोसळून तारा तुटल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सातवणे परिसरातील ऊस पडून जमीनदोस्त झाला आहे. तर आंबोलीनजीक झाड पडून अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.

चंदगड, अडकूर, हेरे, नांदवडे, नागनवाडी, माणगांव, डुक्करवाडी, कोवाड, यासह परिसराला पावसाने झोडपले. मका, भुईमुग, नाचना, भात, सोयाबीन आदि पिकांना हा पाऊस लाभदायक ठरला आहे. दरम्यान, चंदगड-गडहिंग्लज मार्गावर आमरोळी नजीक वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी याच मार्गावरुन नागेश चौगुलेंसह प्रभात साबळे, प्रफुल्ल आठले, सत्वशील पाटील, जितेंद्र कांबळे, अमित चौगुले आदी कार्यकर्त्यानी हे झाड बाजूला करुन रस्ता वाहतुकीला खुला केला.

.............

आजऱ्यात जोरदार बरसला

आजरा

गेले काही दिवस पावसाच्या तुरळक सरींनी अस्तित्व दाखवणारा पाऊस गुरूवारी जोरदार बरसला. यामुळे विशेषतः आजरा शहर व परिसरात पावसाचे पाणी साचून राहिले. काही काळ वीजही खंडित झाली. दरम्यान, हा पाऊस तालुक्यातील ऊस व पोटरीला आलेल्या पिकांना लाभदायक ठरणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अगोदर मोर्चेबांधणी, नंतर झेंडा

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभाग आणि ताराबाई पार्क प्रभागातील पोटनिवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मतदारांच्या गाठीभेटी, प्रभागातील संपर्क ​आणि विविध समारंभाच्या निमित्ताने फलकबाजी करत इच्छुक मैदानात उतरले आहेत. पहिल्यांदा मतदारांशी संपर्क, झेंडा नंतर ठरवू, अशी भूमिका काहींनी घेतल्याने आगामी निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे.

ताराबाई पार्क प्रभाग हा साधारणपणे पाच हजार मतदार संख्येचा आहे. येथे संमिश्र लोकवस्ती आहे. सिंधी ​आणि मुस्लिम समाजाची मतदार संख्या लक्षणीय आहे. या प्रभागातून गेल्या चार निवडणुकीत देसाई कुटुंबीयांचा वरचष्मा रा​हिला आहे. माजी नगसेवक निलेश देसाई यांनी तीनदा तर त्यांच्या पत्नी पल्लवी देसाई यांनी एकदा प्रतिनिधीत्व केले आहे. आगामी निवडणुकीत देसाई प्रत्यक्ष उमेदवार नसले तरी ते कुणाला पाठिंबा देतात, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहील.

देसाई यांनी २०१५ च्या महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढविली होती. भाजप, ताराराणी आघाडी या मित्रपक्षांत ताराबाई पार्क येथील जागा ताराराणी आघाडीला मिळणार आहे. येथून माजी नगरसेवक रमेश पुरेकर, इंद्रजित सलगर, रत्नेश शिरोळकर, रोहित कस्तुरे, योगेंद्र माने, वासीम मुजावर, शादाब आत्तार यांची नावे चर्चेत आहेत. भाजप, ताराराणी आघाडीच्या तिकिटासाठी पुरेकर, सलगर, शिरोळकर, नईम मुजावर प्रयत्नशील आहेत. गेल्या निवडणुकीत रोहित कस्तुरे यांनी सेनेकडून तर वासीम मुजावर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. यंदा सेनेकडून कस्तुरे आ​णि माने यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. या ​प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार यासंदर्भात अद्याप चित्र स्पष्ट नाही. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून चंद्रकांत राऊत यांनी निवडणूक लढविली होती. सिंधी समाजाची एक हजार मतदार आहेत. तर मुस्लिम समाजातील मतदारांची संख्याही मोठी आहे.


भाजपच्या तिकिटासाठी चुरस, काँग्रेसचा उमेदवार कोण?

शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभाग महिला ओबीसीसाठी आरक्षित आहे. प्रभागातून माजी नगरसेवक सतीश लोळगे यांच्या पत्नी अश्विनी लोळगे, सुवर्णराधा रणजित साळोखे, रंजना प्रकाश सासने, शालन शामराव खोत हे भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. येत्या दोन दिवसांत आमदार अमल महाडिक इच्छुकांशी चर्चा करणार असल्याचे समजते. गेल्या निवडणुकीत लोळगे यांनी राष्ट्रवादीकडून तर छाया म्हस्के यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. हनुमानगर, गणेश कॉलनी, गुरुप्रसादनगर, अर्जुननगर, कात्यायनी कॉम्प्लेक्स, नरके कॉलनी प्रभागातील मतदान निर्णायक ठरते. या प्रभागात भाजप विरुध्द काँग्रेस अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. काँग्रेसकडून वैभवी जरग यांच्या नावाची चर्चा आहे. माजी नगरसेवक मधुकर रामाणे, त्यांच्या स्नुषा अश्विनी रामाणे यांनी या प्रभागातून यापूर्वी प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबाही महत्त्वाचा ठरणार आहे. सद्यस्थितीत रामाणे यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महालक्ष्मी, सह्याद्री एक्सप्रेस रद्द

0
0

कोल्हापूर ः लोणावळा रेल्वेट्रॅकवर मालगाडी घसरल्याने कोल्हापूरहून गुरूवारी मुंबईकडे धावणाऱ्या महालक्ष्मी आणि सह्याद्री या दोन्ही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच मुंबईहून शुक्रवारी सकाळी कोल्हापूरकडे येणारी कोयना एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरुन मुंबईला रात्री साडेआठ वाजता महालक्ष्मी आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी सह्याद्री एक्सप्रेस धावते. या दोन्ही गाड्या रद्द झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकिटाचे सर्व पैसे परत केले. त्यासाठी रेल्वेस्थानकावर जादा पाच काउंटरची व्यवस्था केली होती. काही प्रवाशांना मुंबईला जाण्याचा बेत रद्द केला. तर काहींनी एसटीने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने रात्री दहा वाजेपर्यंत सात ते आठ एसटी बसेसची व्यवस्था केली. काहींनी खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेतला. रेल्वे रद्द झाल्याचा गैरफायदा घेत काही खासगी बसचालकांनी मनमानी पद्धतीने दर आकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिद्री’ साठी आठ ऑक्टोबरला मतदान

0
0

कागल

बिद्री (ता.कागल) येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून आठ ऑक्टोबरला मतदान तर दहा ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. गेली दोन वर्षे बिद्री कारखान्याची निवडणूक वाढीव सभासदामुळे रखडली होती. अखेर गुरूवारी या कारखान्याच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. प्रशासक असलेल्या या कारखान्यावर कोणाची सत्ता येणार हे १० ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.

मागील दोन वर्षांपासून बिद्री कारखान्याची निवडणूक वाढीव सभासदांमुळे पुढे गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने वाढीव सभासदांची छाननी पूर्ण करून १५ ऑक्टोबरपूर्वी कारखान्याची निवडणूक घेण्यात यावी, असा आदेश दिल्यामुळे साखर आयुक्त कार्यालयाने हालचाली गतिमान करत सभासदांची कच्ची व पक्की यादी प्रसिद्ध करत ३१ ऑगष्ट रोजी ५७,८०३ सभासदांची अंतिम यादी प्रसिद्ध केली. कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम घेण्याच्या दुष्टीने हालचाली सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे पुन्हा बिद्रीच्या निवडणुकीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयाने १५ ऑक्टोबर पूर्वी बिद्री कारखान्याची निवडणूक घ्यावी, असा आदेश दिल्यामुळे त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांची नियुक्त केल्यानंतर निवडणूक कार्यक्रम वेळेत घेण्यासाठी कार्यवाही सुरू झाली. त्यांना सहाय्यक निबंधक संभाजी पाटील व कागलचे तहसीलदार किशोर घाडगे सहकार्य करीत आहेत. त्यानुसार साखर संचालक सचिन रावळ यांनी निवडणूक कार्यक्रम तयार करून पुणे येथील निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी दिला होता. यानुसार निवडणूक कार्यक्रमाला गुरूवारी मंजुरी मिळाली. यामुळे बिद्रीच्या माळावर आता प्रचाराच्या तोफा धडाडणार असून राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.

................

चौकट

निवडणूक कार्यक्रम

अर्ज सादर ः ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर

अर्ज छाननी ः१३ सप्टेंबर

पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्धी ः १४ सप्टेंबर

अर्ज माघार ः १४ ते २८ सप्टेंबर

चिन्हे वाटप ः २९ सप्टेंबर

मतदान ः ८ ऑक्टोबर

निकाल ः १० ऑक्टोब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५०० कोटींचा बगॅस घोटाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप सरकारने केलेल्या कायद्यातील दुरुस्तीचा आधार घेत राज्यातील १६६ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात १५०० कोटींचा बगॅस घोटाळा केला. सरासरी एक टन उसापासून २८० किलो बगॅस निघतो. कारखानदार फक्त ४० किलो बगॅसचा हिशोब दाखवले आहेत. उर्वरित २४० किलो बॅगसच्या पैशावर डल्ला मारला आहे. अशा प्रकारे बगॅसमध्ये घोटाळा करून शेतकऱ्यांचे पैसे लुटत आहेत, असा आरोप अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि उत्पादकांना बगॅसचे ६०० रुपये जादा भाव मिळण्याच्या मागणीसाठी ११ सप्टेंबरपासून साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे. या उपोषण आंदोलनात शेतकरी नेते रघुनाथ पाटील संघटनेचे व बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले.

चुडमुंगे म्हणाले, ‘रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार सरकारने २०१३ मध्ये ऊस नियंत्रण कायदा केला. त्यानंतर उसाचा अंतिम दर ठरवण्यासाठी ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना केली. दरम्यान, भाजप सरकारने एकतर्फी कायद्यात बदल करून निर्माण होणाऱ्या संपुर्ण बॅगसचा दर न धरता वीज प्रकल्प असल्यास चार टक्के धरावे, वीज प्रकल्प नसल्यास बगॅसचे मू्ल्य धरू नये, अशी तरतूद केली. त्याचा आधार घेत कारखानदार मनमानी पद्धतीने बगॅसचा दर लावला आहे. त्यामुळे एकूण नफ्यातील ७० टक्के वाट्यातील शेतकऱ्यांना मिळणारे ५०० ते ६०० रुपये मिळत नाहीत. याउलट कारखानदार बगॅस विकून मालामाल होत आहेत.

‘शेट्टी, पाटील यांनी बोलावे’

पुढच्या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची बैठक होणार आहे. त्या समितीचे सदस्य म्हणून शेतकरी प्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, राजू कोले सदस्य आहेत. या सदस्यांनी बैठकीत मूग गिळून गप्प न बसता बगॅसमध्ये झालेल्या घोटाळ्यावर बोलावे. गेल्या हंगामातील बगॅसचे टनाला ५०० ते ६०० रूपयांची मागणी करावी. राष्ट्रवादी, काँग्र्रेसप्रमाणेच भाजप, शिवसेना सरकारही ऊस उत्पादकांची होणाऱ्या लूटीकडे बघ्याच्या भूमिकेत राहू नये. अन्यथा सरकार, कारखानदारांना न्यायालयात खेचू.

मेव्हणाचा व्यापारी...

करवीर भागातील एका साखर कारखानदाराचा मेव्हणाच बगॅसचा मोठा व्यापारी आहे. तोच बगॅसचे दर ठरवतो. अशाप्रकारे सर्वच कारखानदार चढ्या दराने साखर विकून कमी भाव दाखवला जातो, असा आरोप शेतकरी संघटनेचे पी. जी. पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीपिंग मशिन्स करणार रस्ते चकाचक

0
0



कोल्हापूर टाइम्स टीम

शहराचा होत असलेला विस्तार व रस्ते सफाईसाठी अपुरे पडणारे मनुष्यबळ यामुळे अस्वच्छ असणाऱ्या रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने चौदाव्या वित्त आयोगातून खरेदी केलेली दोन स्विपिंग मशिन्स या महिनाअखेर दाखल होणार आहेत. त्यामुळे आयआरबीचे, नगरोत्थान योजना तसेच लिंक रोड असे १५० किलोमीटरचे रस्ते पुढील महिन्यापासून चकाचक होणार आहेत.

उपनगरांमध्ये वाढत चाललेले शहर व त्यामुळे रस्त्यांची साफसफाई आणि स्वच्छता हे काम महापालिकेसाठी जिकिरीचे बनले आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सर्वच रस्त्यांची सफाई होत नाही. त्यावर उपाय शोधण्यासाठी महापालिकेने 'स्विपींग मशिन' घेण्याचा निर्णय घेतला. चौदाव्या वित्त आयोगातून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला होता. त्यातून दोन स्विपींग मशिन खरेदीची प्रक्रिया राबवण्यात आली. या वर्षाच्या प्रारंभी सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेतून एका कंपनीला दोन मशिन्स तयार करण्याचे टेंडर देण्यात आले. या मशिन्स ट्रकवर बांधण्यात आल्याने त्याचा वापर मोठ्या रस्त्यांवरच करणे शक्य होणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे केवळ पावसामुळे स्वच्छ होणारे आयआरबी, नगरोत्थान व लिंक रोड या मशिन्समुळे स्वच्छ करता येणार आहेत.

ट्रकवर या मशिन बांधण्यात आल्या असून यातून कचरा झाडण्याऐवजी तो ओढून घेण्याची यंत्रणा आहे. त्यामुळे रस्ते स्वच्छतेवेळी धूळ उडण्याचा प्रश्नच राहणार नाही. परिणामी शहरातील किमान या मोठ्या रस्त्यावरील धूळ कमी होण्यास मदत होणार आहे. हा ओढून घेण्यात येणारा कचरा ट्रकमध्येच असलेल्या टाकीमध्ये राहणार आहे. त्या टाकीमध्ये जवळपास साडेपाच टन कचरा ठेवता येणार आहे. ही टाकी भरल्यानंतर तो डंपिंग ग्राउंडवर टाकण्यात येऊन पुन्हा नवीन ठिकाणी काम करता येणार आहे. टेंडर दिलेल्या कंपनीकडून मशिनची बांधणी सुरू असून २५ सप्टेंबरपर्यंत या मशिन्स महापालिकेकडे सुपुर्द करण्यात येतील, असे कळवले आहे. त्यानंतर महापालिकेकडून या मशिनरीची चाचणी घेऊन त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्यात येणार आहे.

...

आयआरबी, नगरोत्थान, लिंक रोडची लांबी

१५० किलोमीटर

...

एका मशिनकडून दिवसभरात काम

७० किलोमीटर

....

ए, बी, सी, डी व ई वॉर्डमध्ये होणार वापर

...

रस्त्यांवरील कायम राहणारी धूळ होणार कमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊ खोत यांचे हातकणंगलेवर लक्ष

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता आपला मोर्चा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे वळविला आहे. शाहूवाडी विभागातील दौऱ्यानंतर त्यांनी हातकणंगले तालुक्यातील दौऱ्याला प्रारंभ केला असून, शनिवारी (ता.९) हुपरी परिसरातील अनेक नेतेमंडळींच्या भेटी घेणार असून, ते दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या संघटनेची घोषणा करणार आहेत.

गेल्या महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. यातून खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करत भाजपचा पाठिंबा काढून घेत खासदार शेट्टींनी विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपमधून त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याची व्यूहरचना चालवली असताना खोत यांनी शाहूवाडी तालुक्यात झंझावाती दौरा करून शनिवारी ते हातकणंगले तालुक्यात जोरदार एंट्री करणार आहेत.

हुपरी, रांगोळी, इंगळी परिसरातील गावांतील अनेक मंडळांच्या आरती, महाप्रसाद वाटप व जुन्या माने गटाचे ज्येष्ठ नेते बाळ ऊर्फ दिनकरराव घोरपडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नानासाहेब गाट, गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे, राजू चौगूले (किणी), प्रकाश पाटील (रांगोळी) यांच्यासह भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या स्मिता शेंडुरे, अण्णासाहेब शेंडुरे, महावीर गाट, वीरकुमार शेंडुरे, शीतल घोरपडे, लालासाहेब देसाई, राजेश होगाडे, पांडुरंग मुळीक, नेताजी निकम, शिवाजीराव शिंदे तसेच हुपरी नगरपरिषद कृती समितीचे पदाधिकारी, अनेक तरुण कार्यकर्त्यांची भेट घेऊन गुप्तूगू करत भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.

खोत यांनी नवी संघटना स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हुपरीत ४० हजार मतदार असून, शिरोळ तालुक्याच्या जोडीला हुपरीकरांची साथ लाभणार असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन येऊ देत आणि हुपरीतील चांदी व्यवसायाला सोन्याचे दिवस येऊ देत, असे साकडे गणरायाला घालून त्यांनी हुपरी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images