Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दंगलीची अफवा भोवली; व्यावसायिक कोठडीत

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

सांगलीत हिंदू आणि मुस्ल‌िम समाजात दंगल झाल्याची अफवा पेठवडगावमधील ‘गमजा ग्रुप’ ने पोस्ट केली. ही केलेली ‘गमजा’ बांधकाम व्यावसायिकांच्या चांगलीच अंगलट आली असून अफवेची पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक शरद रामचंद्र दिंडे (वय ४२, रा. चौगुले गल्ली, कसबा बावडा) याला एक दिवस पोलिस कोठडीची हवा खावी लागली. गमजा ग्रुपचा अॅडमिन व ग्रुपमधील २७ सदस्यांकडे शाहूपुरी पोलिस चौकशी करत आहेत.

सांगली येथे हिंदू मुस्ल‌िमांची दंगल झाली आहे, अशी पोस्ट व व्हिडिओ बांधकाम व्यावसायिक दिंडे यांना शनिवारी सकाळी त्यांच्या मोबाइलवर आली. त्यांनी ती पोस्ट फॉरवर्ड केली. पोलिसांनी दिंडे यांना ताब्यात घेऊन जाती धर्मात तेढ माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. दिंडे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असताना कोर्टाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. एका पोस्टमुळे दिंडे यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागत आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिंडे यांच्याकडे चौकशी केली असता, २००८ मधील दंगलीचा व्हिडिओ यापुर्वी कधीही पाहिला नव्हता. त्यामुळे व्हिडिओ पाहून संतापाची लाट उसळल्याने तो व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केला, असा जबाब दिला आहे. दिंडे हे जरी कसबा बावडा येथे रहात असले तरी पेठवडगावच्या ‘गमजा’ ग्रुपमध्ये त्यांना अडीच वर्षापूर्वी अॅड केले होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या ग्रुपच्या अॅडमिनशी पोलिसांनी संपर्क साधला असून अॅडमिनला पोलिसांनी चौकशीस बोलावले आहे. गमजा ग्रुपवर दंगलीच्या अफवेचा व्हिडिओ कुणी पाठवला हे स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन वकिलांसह तिघांचा अपघातात मृत्यू

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

न्यायालयाचे काम आटोपून आजऱ्याहून कोल्हापूरला येत असताना स्तवनिधी (टवंडी) घाटात हिटणी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर येथील वकील जावेद मुल्ला (वय.४७, रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर), देवानंद वाघमारे (रा. कोल्हापूर) आणि त्यांचे अशील चंद्रकांत श्रीपती पाटील (पन्हाळा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जावेद मुल्ला, वाघमारे आणि पाटील असे तिघे आजरा येथे कोर्ट कामासाठी गेले होते. तिथून कोल्हापूरकडे येत असताना संकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील हिटनी गावाजवळ त्यांच्या मोटारीचा अपघात होऊन मुल्ला, वाघमारे आणि पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मुल्ला हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात फौजदारी वकील म्हणून काम करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदोबस्तासाठी साडेतीन हजार पोलिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी आठ वाजता खासबाग मैदान येथून सुरुवात होत आहे. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात १३०० पोलिस मिरवणुकीवर नजर ठेवणार आहेत. सोमवारी सायंकाळपासूनच येथे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डॉल्बी रोखण्यासाठी मंडळांवर पोलिसांच्या विशेष स्कॉडची नजर राहणार आहे. याशिवाय वेळेत विसर्जन मिरवणूक संपवण्यासाठी चार पर्यायी मार्गही तयार केले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीवर साडेतीन हजार पोलिसांची नजर राहणार आहे. शहरासह इचलकरंजी, जयसिंगूर, पेठवडगाव, कागल, गडहिंग्लज आदी शहरांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. सोमवारी सकाळी पोलिस मुख्यालयात बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. ‘विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजू नये, यासाठी संशयित मंडळांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मिरवणुकीत हुल्लडबाजी करणारे तरुण, खिशेकापू, मिरवणुकीची अडवणूक करणारी मंडळे यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करा,’ अशा सूचना अधीक्षक मोहिते यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

शहरातील विसर्जन मार्गावरील अतिक्रमणे हटवली असून, पोलिसांनी दहा ठिकाणी वॉच टॉवर तयार केले आहेत. या सर्वच टॉवरवरून पोलिस दुर्बिणीतून मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. याशिवाय टॉवरवरील पोलिसांकडे वॉकीटॉकीही पुरवण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये कॅमेऱ्यांचे चित्रीकरण दिसत असल्याने पोलिसांचे एक पथक कंट्रोल रुममधून मिरवणुकीवर नजर ठेवणार आहे. मिरवणुकीतील हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्यासाठी कंट्रोल रुममधील पथक बंदोबस्तावरील पोलिसांना सूचना देणार आहे. याशिवाय पंचगंगा घाट, राजाराम बंधारा, बापट कॅम्प आणि इराणी खाणीवरही पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे.

स्पेशल स्कॉड तैनात

पोलिसांनी डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांचे प्रबोधन केले आहे. बहुतांश मंडळांनी डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे हमीपत्रही पोलिसांना दिले आहे. ऐनवेळी काही मंडळांकडून डॉल्बीचा दणदणाट होऊ नये, यासाठी संशयित मंडळांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. सोमवारी रात्रभर मंडळांच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. मंगळवारी दिवसभरात कोणी डॉल्बी जोडण्याचा प्रयत्न केल्यास डॉल्बी यंत्रणा जप्त करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई करण्यासाठी पोलिसांचे विशेष स्कॉड कार्यरत आहे.

पारंपरिक विसर्जन मार्ग

उमा टॉकीज चौक, सावित्रीबाई हॉस्पिटल चौक, दिलबहार चौक, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, बाजारगेट परिसर ते पंचगंगा घाट हा विसर्जन मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग आहे.

चार पर्यायी मार्ग

मुख्य मिरवणूक मार्गातून जाणाऱ्या मंडळांना पंचगंगा घाटावर पोहोचण्यास विलंब होतो, त्यामुळे चार पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.

१) उमा टॉकीज चौक, आझाद चौक, कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, शिवाजी चौकमार्गे पापाची तिकटी, गंगावेश, नदीघाट.

२) फोर्ड कॉर्नर चौक, आईसाहेब पुतळा चौक, बिंदू चौकमार्गे शिवाजी पुतळा, पापाची तिकटी, गंगावेश, नदीघाट.

३) अकरा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींसाठी गंगावेश येथून रंकाळा एसटी स्टँड, जाऊळाचा गणपती, खराडे महाविद्यालय, जुना वाशी नाकामार्गे इराणी खणीकडे विसर्जनासाठी जातील.

४) पापाची तिकटी येथून काही मंडळे कुंभार गल्ली, बुधवार पेठ, तोरस्कर चौकमार्गे पंचगंगा घाट या मार्गाचा वापर करतील.

जिल्ह्यातील बंदोबस्त

अधीक्षक १

अप्पर अधीक्षक २

उपअधीक्षक ८

निरीक्षक २९

सहायक निरीक्षक १०४

कॉन्स्टेबल २२००

होमगार्ड १२००

शीघ्रकृती दल ३ तुकड्या

चौकट –

शहरातील बंदोबस्त

अप्पर अधीक्षक १

उपअधीक्षक ६

निरीक्षक १९

सहायक निरीक्षक ७१

कॉन्स्टेबल ६९७

होमगार्ड ३०५

शीघ्रकृती दल ३ तुकड्या

राखीव दल ३ तुकड्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधीचा घरफाळा थकीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील तब्बल एक हजार मिळकतधारकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून एका- ए‌का मिळकतधारांकडे एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचा घरफाळा थकीत आहे. या मिळकतधारकांना वारंवार नोटिसा देऊनही त्यांच्याकडून घरफाळा जमा झाला नसल्याने महापालिका प्रशासन कारवाईच्या पावित्र्यात आहे. दरम्यान एक एप्रिल ते चार सप्टेंबर या कालावधीत २६ कोटी ६९ लाख रुपयांचा घरफाळा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २१ कोटी, ३२ लाख रुपये जमा होते.

घरफाळा विभागाने एप्रिल ते जून या कालावधीत घरफाळा भरण्यास चालू बिलात सहा टक्के सवलत दिली होती. या कालावधीत ६२ हजार ५३८ मिळकतधारकांनी घरफाळा जमा केला. मिळकतधारकांना सवलत योजनेंर्गत ९३ लाख २६ हजार २५८ रुपयांची सवलत मिळाली आहे. दरम्यान मिळकतधारकांनी सप्टेंबर महिना अखेरीस घरफाळा भरल्यास चालू बिलात चार टक्के सवलत मिळणार असल्याचे कर निर्धारक दिवाकर कारंडे यांनी सांगितले.

घरफाळा विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपासून मिळकतधारकांना पोस्टाने घरफाळा बिले पाठविली जातात. आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच पोस्टाव्दारे बिले पाठविण्यात आली. यामुळे घरफाळा बिले गहाळ झाल्याच्या तक्रारी संपुष्टात आल्या. शिवाय वेळेत बिले घरपोच झाली. त्याचे फलित म्हणजे घरफाळा बिल जमा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोल्हापूर शहरातील मिळकतधारकांची सर्वसाधारण संख्या १ लाख ३५ हजार आहे. आहे. घरफाळा विभागाने थकीत घरफाळाधारकांची यादी तयार केली आहे. शहराच्या विविध भागातील मिळून एक हजार मिळकतधारकांनी प्रत्येकी एक लाखापेक्षा जास्त रक्कम थकवली आहे. प्रशासन, या मिळकतधारकांकडून घरफाळा वसुलीसाठी प्रयत्नशील आहे. वारंवार नोटिसा देऊनही थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मिळकतधारकांवर कारवाईच्या विचारात प्रशासन आहे.

शहरात विविध ठिकाणी फलक

घरफाळा विभागाने मुदतीत कराचा भरणा करणाऱ्या मिळकतधारकांसाठी सवलत योजना जाहीर केल्या आहेत. सप्टेंबर महिना अखेर घरफाळा भरल्यास चालू बिलामध्ये चार टक्के तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत घरफाळा भरल्यास चालू बिलात दोन टक्के सवलत मिळणार आहे. घरफाळा विभागाने या सवलत योजनेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी राजारामपुरी चौक, कोटीतीर्थ तलाव, ताराराणी चौक, बिनखांबी गणेश मंदिर, क्रशर चौक, पंचगंगा नदी, पापाची तिकटी रोड, महापालिका चौक येथे फ्लेक्स उभारले आहेत.

अन्य सवलत योजना

मिळकतधारकांनी रेन वॉटर हार्वेस्ट‌िंग सिस्टीमचा अवलंब केला असल्यास चालू बिलाच्या रकमेतील सर्वसाधारण करामध्ये एक टक्का सवलत आहे. सौरउर्जेचा वापर, सांडपाण्याचे पुनश्च‌िकरण आणि पुनर्वापर, बायोगॅस अथवा कंपोस्ट‌िग प्रक्रिया शंभर टक्के असल्यास चालू बिलाच्या रकमेमध्ये सर्वसाधारण करामध्ये एक टक्क सवलत आहे. पर्यावरणपूरक गृहनिर्माणला चालना तसेच महापालिका व राज्य सरकारने निश्चित केलेल्य लाभदायक योजनेची अंमलबजावणी केली असल्यास करामध्ये एक टक्का सवलत आहे. महापालिकेची नागरी सुविधा केंद्रे, अॅक्सीस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक येथे घरफाळा जमा करण्याची सुविधा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ क्लस्टरप्रश्नी उद्या मुंबईत बैठक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या सूक्ष्म आणि लघू मंत्रालयाच्यावतीने मंजूर असलेल्या कोल्हापूरच्या गूळ क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बुध‍वारी (ता. ७) सायंकाळी सात वाजता मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवली आहे. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव, पुणे विभागीय आयुक्त, साखर आयुक्त, विकास आयुक्त (उद्योग) व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या गूळ क्लस्टर योजनेला ‘बूस्ट’ मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा कॉन्क्लेव’मध्ये शहर आणि जिल्ह्यातील जिव्हाळ्याच्या तेरा प्रश्नांची मांडणी केली होती. विकासाला चालना देण्यासाठी मंत्री मुनगंटीवार यांनीही त्यावेळी सकारात्मक भूमिका घेतली होती. याच कार्यक्रमात त्यांनी गूळ क्लस्टर योजनेसाठी शंभर टक्के निधी देण्याची ग्वाही दिली होती. केवळ ग्वाही न देता ‘मटा कान्क्लेव’नंतर मुंबईत गेल्यानंतर याबाबतचा संपूर्ण आढावा घेतला होता. यासाठी बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या होत्या.

प्रशासकीयस्तरावर गूळ क्लस्टरप्रश्नी बैठका होत असल्याने हा प्रश्न मार्गी निघण्याचा आशा निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर स्वत: मुनंगटीवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उत्पादन आणि विक्रीबाबतचा आढावा घेतला. त्यानंतर या योजनेला गती देण्यासाठी त्यांनी चार सप्टेंबरला बैठकीबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे संबंधितांची बैठक बोलावली आहे. बुध‍वारी (ता. ७) सायंकाळी सात वाजता मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

बैठकीस महसूल मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव, पुणे विभागीय आयुक्त, साखर आयुक्त, उद्योग विभागाचे विकास आयुक्त आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निमंत्रित केले आहे. त्यानुसार ही बैठक होऊन क्लस्टर मार्गी लागण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेबल लॅडर मंजुरीच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आपत्तकालीन परिस्थितीत ५५ मीटरपर्यंतच्या उंच इमारतीमध्ये पोहचण्यासाठी अग्निशमन विभागाला आवश्यक असलेल्या टर्न टेबल लॅडर वाहनाची प्रक्रिया सरकारकडून निधीच्या मंजुरीअभावी प्रलंबित आहे. जवळपास वर्ष होत आले तरी महापालिकेकडून पाठवलेल्या प्रस्तावाबाबत सरकारकडून हालचाल होत नाही. सध्या केवळ ५० फुटापर्यंतच्या इमारतीत पोहचण्याची व्यवस्था अग्निशमन विभागाकडे आहे.

शहरात यापुर्वी चार व नंतर सातमजली इमारती बांधण्यात आल्या होत्या. त्यामधील आग असो वा इतर आपत्ती ओढवल्यास जिन्यांऐवजी थेट त्या मजल्यावर पोहचण्यासाठी ​अग्निशमन विभागाकडे सक्षम वाहन असावे लागते. त्यासाठी महापालिका वाहनांवर असलेल्या शिडीद्वारे पोहचण्याचा प्रयत्न करत असे. पण सरकारने कोल्हापूरसाठी ११ मजली इमारती बांधण्यास परवानगी दिली. त्यानंतर ड वर्ग महापालिकांसाठीच्या बांधकाम नियमावलीत बदल करण्यात आले. त्यामुळे शहरात ११ मजली इमारतीपेक्षाही उंच इमारती भविष्यात बांधल्या जातील. बांधकाम परवानगी देत असतानाच या इमारतींमध्ये आवश्यक त्या सुविधा करून घेतल्या जातात. पण आपत्तीकाळात इमारतींमधून न जाता वाहनाद्वारे योग्य त्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी टेबल लॅडरसारख्या वाहनांची खूप मदत होते.

त्यामुळे अग्निशमन विभागासाठी आवश्यक असलेल्या टर्न टेबल लॅडर वाहनाचा १२ कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने गेल्या वर्षी सरकारला सादर केला. त्यावेळी निम्मा वाटा महापालिकेने उचलावा असा नगरविकास विभागाच्या पातळीवरुन सुचवण्यात आले. महापालिकेला या वाहनाची गरज असल्याने ही सूचना मान्य करत या बजेटमध्ये निम्मा म्हणजे साडेपाच कोटी रुपयांची तरतूद या वाहनासाठी करुन ठेवली. तसेच उर्वरित ५० टक्के निधी मिळावा याचा ठराव करुन तो नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. उंच इमारतींमध्ये पोहचण्याची आवश्यक साधने अग्निशमन विभागाकडे नाहीत. त्यामुळे काही आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अकराव्या मजल्यापर्यंत पोहचण्यासाठी जवानांना जीव धोक्यात घालण्याशिवाय पर्याय नाही. तसेच तेथील रहिवाशांच्या जिविताचाही प्रश्न आहेच. यासाठी महापालिकेने गेल्या वर्षीपासून तयारी चालवली असली तरी सरकारकडून मात्र त्याला पाठबळ दिले जात नसल्याचे ​चित्र आहे.

दुर्घटना झाल्यावर जाग येणार का?

केवळ आगीसाठी अथवा पूर आल्यानंतरच आपत्तकालीन परिस्थिती निर्माण होईल, असे नाही. अगदी सात मजल्याच्या इमारतीतही काही दुर्घटना झाल्यास तिथेपर्यंत वाहनाच्या यंत्रणेतून पोहचायचे असल्यास केवळ ​शिडी हाच पर्याय आहे. अनेक ठिकाणी उंच इमारती बांधल्या जात आहेत. तेथील रहिवाशांना सुविधा दिल्या जात आहेत.पण आपत्तकालीन व्यवस्थेत त्यांची सुटका करु शकणारी यंत्रणा महापालिकेकडे नाही, याचे भय मात्र नागरिकांना कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्य पथके, लेझिम अन् ढोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी करवीरनगरी सज्ज झाली आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. मिरवणुकीत ढोल, हलगी ताशा, झांज पथक या पारंपरिक वाद्यांच्या गजराबरोबर परराज्यातील नृत्य पथके, बँड, लेझिम पथके पहायला मिळणार आहेत. तालीम मंडळांच्या मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रात्री मिरवणूक लेसर शोच्या झोताने उजळून निघणार आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजता मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या पूजनानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ होईल. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या गजराबरोबर वैभववाडी रेल्वेचा देखावा मिरवणुकीत आणला जाणार आहे. डॉल्बीमुक्त मिरवणुकीसाठी अनेक मंडळांनी ढोल, झांज, लेझिम पथक बुक केले आहेत. काही मंडळे ऑर्केस्ट्रा मिरवणुकीत आणणार आहेत. डॉल्बीला पर्याय म्हणून लेसर शो व ऑर्केस्ट्रा असून गायकांच्या उडत्या चालीच्या गाण्यांवर नृत्य करण्याची संधी तरुणाईला मिळणार आहे. दिलबहार तालमीच्या मिरवणुकीत ऑर्केस्ट्रा, झुंझार क्लबचा इन्स्ट्रूमेंट बँड असेल.

दरवर्षी मिरवणुकीचे आकर्षण असलेल्या तटाकडील तालमीच्या मिरवणुकीत हरियाणातील कलाकारांचा नृत्याविष्कार पहायला मिळणार आहे. लेटेस्ट तरुण मंडळाचा ‘जय जवान, जय किसान’ या विषयावर आधारित चित्ररथ आकर्षण ठरेल. या चित्ररथावर ११ पुतळे, १०० झेंडे लावण्यात येतील. १०० कार्यकर्ते पांढरा शर्ट, पँट, टोपी, कोल्हापूर चप्पल या पेहरावात सहभागी होणार आहेत. शाहूपुरी युवक मंडळाच्या मिरवणुकीत ‘अमर ज्योत’ची प्रतिकृती असेल. बजापराव माने तालीम मंडळाचा ‘भक्त प्रल्हाद’ हा देखावा असून हिंदवी स्पोर्टसने डॉल्बीला सुट्टी देऊन शंभर कलाकारांचे ढोलपथक सहभागी करून घेतले आहे. खंडोबा तालीम मंडळ, फिरंगाई तालीम मंडळ आणि नंगीवली तालमीच्या मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग राहिल. प्रत्येक मंडळ महिलांना एकाच रंगाच्या साड्या देणार आहे. नंगीवली तालीमीच्या मिरवणुकीत महिला फेटा बांधून सहभागी होतली. कार्यकर्ते ले​झिम खेळणार आहेत.

बालगोपालही सहभागी

डॉल्बीमुक्त उत्सवात बालगोपाल तालीम मंडळ सहभागी होणार आहे. मंगळवारी मिरवणुकीत डॉल्बी लावणार नाही असे निवेदन तालीम मंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. कायदा व सुव्यवस्था राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन देण्यात आले. बालगोपाल तालमीचे अध्यक्ष निवासराव साळोखे, निवास शिंदे, अदिल फरास यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कापसाच्या बोळे वाटणार

डॉ. डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी ध्वनी प्रदूषणाबाबत गांधीगिरी पद्धतीने जनजागृती करणार आहेत. कॉलेजचे ३०० विद्यार्थी कापसाचे बोळे वाटणार आहेत. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांना मदत करणार आहेत. प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव, जिमखाना प्रमुख राजेंद्र रायकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. पी. डी. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

मिरवणुकीत वैशिष्टे अशी

तुकाराम माळी तालीम : वैभववाडी रेल्वे

लेटेस्ट तरुण मंडळ : जय जवान, जय किसान चित्ररथ

तटाकडील तालीम : हरियाणा कलाकारांचे नृत्य

दिलबहार तालीम : लेसर शो आणि ऑर्केस्ट्रा

हिंदवी स्पोर्टस् : १०० कलाकारांचे ढोल पथक

नंगीवली तालीम : लेझिम पथक

मित्र प्रेम तरुण मंडळ : ढोल पथक

बजापराव माने तालीम : भक्त प्रल्हाद देखावा

शाहूपुरी युवक मंडळ : अमर जवान ज्योती प्रतिकृती

झुंझार क्लब : इन्स्ट्रूमेंट बँड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्टून्ससह बाहुबलीही मैदानात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत विविध वेशभूषांमध्ये येणाऱ्या हौशी कलाकारांकडून ड्रेपरी बाजारपेठेत ड्रेसना मागणी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरातील ड्रेपरी व्यवसाय तेजीत आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महाराणी ताराराणी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई या व्यक्तीरेखांच्या वेशभूषांसाठी नोंदणी करण्यात आली आहे. डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीला अनेक मंडळांनी पाठिंबा दिल्याने मंडळातर्फे मिरवणुकीत वेगळेपण जपण्यासाठी विविध वेशभूषांमधील कार्यकर्ते लक्ष वेधून घेणार आहेत. त्यासाठी ड्रेपरीला ऑर्डर देण्यात आल्याने व्यावसायिकांनी हजारो ड्रेस नव्याने बनवले आहेत.

समाजप्रबोधनाचा जागर करण्यासाठी मंडळातर्फे अनेक कल्पना राबवण्यात येणार आहेत. त्याचे दर्शन मिरवणुकीत होणार आहे. त्यासाठी काही सजीव देखावेही मंडळांनी सादर करण्यावर भर दिला आहे. यासाठी आवश्यक असणारी ड्रेपरी भाड्याने देणाऱ्या व्यावसायिकांच्या वर्तुळात मागणी वाढली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ड्रेपरी व्यावसायिकांकडे वाढलेल्या मागणीमुळे त्यांनी नवे ड्रेस बनवले आहेत. ​शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये लहान मुलांपासून मोठ्यापर्यंतच्या ड्रेसला मागणी आहे. तर मुलींमध्ये सावित्रीबाई फुले, झाशीची राणी आणि ताराराणी या व्यक्तिरेखांमधून मिरवणुकीत लेक वाचवा, मुलींची सुरक्षितता, मुलींना शिकवा असे संदेश दिले जाणार आहेत. त्यासाठी तयार नऊवारी साड्यांसह कपडेपट बनवण्याची लगबग वाढली आहे. शाहू महाराजांनी केलेले कायदे, सुधारणा याविषयावरही मिरवणुकीत प्रबोधनाचा जागर करण्यासाठी काही मंडळांनी तयारी केली आहे. त्यासाठी शाहू महाराजांच्या वेशभूषेलाही मागणी वाढली आहे.

यंदा डॉल्बीला फाटा देणाऱ्या मंडळांनी भागातील महिलांना मिरवणुकीत सहभागी करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी महिलांना एकसारख्या रंगाच्या साड्या परिधान करून पारंपरिक खेळ करत मिरवणुकीत सहभागी होण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ड्रेपरी विक्रेत्यांशी संपर्क साधला जात आहे.

कार्टुन ड्रेपरीलाही मागणी ​

मिरवणुकीत बच्चेकंपनीचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्या आवडत्या कार्टुन कॅरेक्टरची ड्रेपरीही तयार केली जात आहे. यामध्ये डोरेमॉन, मिकी, सिंचन, नोबिता, चुटकी, छोटा भीम, मिमियन्स या कार्टुनचे ड्रेस तयार झाले आहेत. असे ड्रेस घालून मिरवणुकीत लहान मुलांचे मनोरंजन करण्याचे नियोजन केलेल्या मंडळांनी खास ऑर्डर देऊन वेशभूषा तयार करून घेतली आहे.


एक दिवसासाठी भाड्याने ड्रेस नेण्याकडे कल वाढतो आहे. यावर्षी राष्ट्रपुरूषांच्या ड्रेपरीला मागणी आहे. एकाचवेळी ५० ते १०० ड्रेसची ऑर्डर येत असल्यामुळे काही ड्रेस नव्याने तयार केले आहेत. ड्रेपरीसोबत त्याच्या अॅक्सेसरीजही उपलब्ध आहेत. यावर्षी बाहुबली या सिनेमातील व्यक्तीरेखांच्या ड्रेपरीही काही मंडळांनी मागितल्या आहेत. महिलांच्या ड्रेपरीलाही यंदा मागणी आहे.

​चिंतामणी कुसाळकर, ड्रेपरी व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातात वकिलासह तिघे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल
पुणे-बेंगलोर माहामार्गावर हिटणी मसोबा (ता.चिकोडी) फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात वकिलासह तिघेजण जागीच ठार झाले. यात पन्हाळा तालुक्यातील पडळ येथील दोन शेतकरी आणि टेंबलाईवाडीतील (कोल्हापूर) वकिलाचा समावेश आहे. पंडीत बापू सुतार (वय-५२), चंद्रकांत श्रीपती पाटील आणि अॅड. जावेदअली अब्बास मुल्ला (५०) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेजण कोल्हापूरहून संकेश्वरकडे कोर्ट कामानिमीत्त जात होते. हायवेवरील दिशादर्शकाच्या खांबाला त्यांच्या कार (एम.एच.०९ डी.एक्स ९६८८)ची जोरदार धडक झाली. घटनास्थळी मोटारीचा चक्काचूर झाला होता. रक्ताचा सडा पडला होता. तिन्ही मृतदेह ओळखण्यापलीकडे होते. उत्तरीय तपासणीनंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत चंद्रकांत यांचे भाऊ श्रीपती यांनी संकेश्वर पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास संकेश्वरचे पीएसआय एस. पी. मुल्ला करीत आहेत.
अपघाताची माहिती समजताच मुल्ला यांच्या कुटंबीयांना धक्का बसला. मुल्ला हे पत्नी, मुलगा आणि मुलीसह मणेर मळ्यातील कुलकर्णी कॉलनीत राहत होते. मुल्ला यांचे भाऊ आणि आई, वडील टेंबलाईवाडी येथील भाई माधवराव बागल हास्कूलमागील घरात राहत होते. त्यांची मुलगी १२ वीच्या वर्गात शिक्षण घेते, तर मुलगा १० वीच्या वर्गात शिकत आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व २ मुले असा परिवार आहे. तर पंडित सुतार यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली व मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेरच्या दिवशी जनसागर लोटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी मंडळांनी तयार केलेले देखावे आणि गणेश दर्शनासाठी जनसाजर रस्त्यावर लोटला. शहरातील सर्वच रस्ते नागरिकांनी फुलून गेले. ऐतिहासिक देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास, पर्यावरणाचा संदेश, पौराणिक आणि धार्मिक विषयावर केलेली मांडणी व विनोदी नाटकांतून सामाजिक आणि राजकीय स्थितीवर केलेली कोट्यांनी वातावरण भारले होते. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, राजारामपुरी व कसबा बावडा परिसरात देखावे पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. गर्दीच्या महापुरात गणेश दर्शन व देखावे पाहण्यात दंग होते.

शिवाजी चौक येथील २१ फुटी गणेशमूर्ती, संभाजीनगर आदी प्रमुख मंडळांच्या मूर्ती दर्शनानंतर देखाव्यांसाठी प्रसिद्ध ठिकाणांकडे भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. बहुतांशी मंडळांनी गर्दी खेचण्यासाठी अनोख्या संकल्पना राबवल्या. ऐतिहासिक व्यक्तिरेखा, स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या विनोदी नाटकांमुळे गर्दी एकाच ठिकाणी थांबत होती. गर्दी अटकाव करण्यासाठी कार्यकर्ते भाविकांना मार्गदर्शन करताना दिसत होते. अनेक भाविक चारचाकी वाहनांसह मोटारसायकवर बसूनच देखावे पाहत असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती.

गणेश मंडळांनी केलेल्या सजावटी, हलते देखावे सहकुटुंब पाहत होते. देखाव्यानंतर खाऊ गल्लीत व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी झाली होती. आकर्षक लाइट इफेक्ट, डेकोरेश पाहण्यासाठी राजारामपुरीतील गल्लीबोळात तोबा गर्दी झाली होती. त्यामुळे रस्त्यावर अक्षरश: गर्दीचा महापूर होता.

हॉटेल्स हाऊसफुल्ल

सजीव व तांत्रिक देखावा पाहण्यासाठी अखेर दिवस असल्याने भाविकांची तुफान गर्दी केली होती. देखाव्यांची पाहणी करत अनेकजण खाऊगल्ली व हॉटेल्समध्ये यथेच्छ ताव मारत होते. त्यामुळे राजारामपुरी व खासबाग मैदान येथील खाऊ गल्लीमध्ये तोबा गर्दी झाली होती. तर शहरातील अलिशान हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले होते. अनेकठिकाणी भाविकांना जेवणासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. देखावे पाहण्यासाठी गर्दी लक्षात घेऊन हॉटेल व्यावसयिकांनी पूर्वतयारी करुन ठेवली होती. तरीही अनेक ठिकाणी गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली होती.

भाविकांना मेजवाणी

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. गेल्या तीन दिवसांपासून देखावे पाहण्यास खुले झाल्याने मोठ्या मंडळासह छोट्या मंडळांनीही महाप्रसादाचे वाटप केले. पुलाव, मसाले भात, गव्हाची खीर, बुंदी, सोजी, मसाले दूध, मोदक केळी वाटपांमुळे भाविक तृप्त झाले. भाविकांनी प्रसादाबरोबरच भाविकांनी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी केली होती.

देखाव्यातून अवतरली शिवशाही

यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये ऐतिहासिक देखाव्यांची मांडणी मोठ्या प्रमाणात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या लढाया, तह, निजामशाही व कुतुबशाहीतील मातब्बर सरदारांवर केलेली मात आशा ऐतिहासिक मांडणीतून इतिहासाला उजाळा देण्यात आला. मित्रप्रेम मंडळ, कै. उमेश कांदेकर युवा मंच यांच्यासह शिवाजी पेठ, जुना बुध‍वार पेठ, कसबा बावडा परिसरात अशा देखाव्यांना भाविकांनी चांगलीच पसंती दिली. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवाजी महाराज की जय’ आदी देखाव्यानंतर दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून जात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजला विधानसभेचा डॉल्बी !

$
0
0

gurubal.mali@timesgroup.com

tweet @gurubalmaliMT

कोल्हापूर : गणेशाच्या आगमनात डॉल्बी लावू न देण्यात पोलिस यशस्वी झाले. आता विसर्जनवेळी तो वाजणार की नाही हे मिरवणुकीत कळेलच. पण डॉल्बीच्या आडून १५ दिवसांत विधासभेच्या तयारीचा डॉल्बी मात्र चांगलाच वाजला आहे. गणेशोत्सवकाळात मंडळांना हजार आणि लाखात देणगी देतानाच आरतीला उपस्थित राहून दरवेळी निवडणूक प्रचाराची संधी साधली जाते. यंदा ‘उत्तरे’ला लक्ष्य करत भाजप आणि शिवसेनेने विधानसभेची पेरणी केली. शिवाय देवस्थान समितीतील नियुक्तीनंतर झालेल्या समझोत्याला गणेशाच्या साक्षीने तडे गेल्याचे स्पष्ट झाले. उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकारणातून आमदार क्षीरसागर आक्रमक झाले आहेत तर पालकमंत्री चंद्रकात पाटील हेही भाजपची जमीन तयार करण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दहापैकी केवळ दोनच मतदारसंघात यश आले. यातील इचलकरंजीचे यश अपेक्षित असले तरी दक्षिणेतील यशासाठी महाडिक गटाला बरेच झुंजावे लागले. शहरात आपला उमेदवार येणारच नाही, मग उगाच कशाला फार लक्ष घालायचे म्हणत भाजपने सारी ताकद दक्षिणेतच लावली. पण शहरात महेश जाधव यांनी आश्चर्यकारकरित्या ४२ ह​जारावर मते मिळवली. या मतामुळे भाजपला शहरात आपली ताकद असल्याची जाणीव झाली. यामुळेच त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये कोल्हापूर उत्तर हे तर त्यांचे प्रमुख लक्ष्य आहे. कारण या मतदारसंघात भाजपची ताकद असल्याचा पुरावा तर मिळाला आहेच, शिवाय त्यांनी वैयक्त‌िक लक्ष घालून गेल्या दोन वर्षात चांगली हवा निर्माण केली आहे.

गेल्या दोन महिन्यांत पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यात डॉल्बी वाजू नये, यासाठी अगदी मनापासून प्रयत्न सुरू केले आहेत. काहीही होवो, डॉल्बी वाजू देणार नाही, अशी कडक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक मार्गाने प्रबोधन तर सुरू केले आहेच, शिवाय काही ठिकाणी मदतीचा हात पुढे करत मंडळांच्या कार्यकर्त्यांची मने जिंकत आहेत. ‘काय हवे सांगा, पण डॉल्बी नको’ असे म्हणत मागेल ती मदत पोहोच करत आहेत. डॉल्बी लावा म्हणणाऱ्यापेक्षा नको म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळेच पाटील यांनी यात अधिक लक्ष घातले आहे. भाजपचा डोळा मतावर आहे, त्यांना चांगला पाठिंबा मिळतोय हे लक्षात येताच शिवसेनेने अचानक आपला पवित्रा बदलला. सेनेचे दोन्ही गट आता डॉल्बी लावण्यास परवानगी मिळावी म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. यामुळे डॉल्बीच्या मुद्यावर भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

गणेशआगमन मिरवणुकीत भाजपने डॉल्बी वाजू दिला नाही. प्रयत्न करूनही यश न आल्याने सेना नेते हतबल झाले. त्यातूनच गेले काही दिवस विविध मार्गाने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. हा वाद दोन पक्षातीलच आहे, पण तो काही प्रमाणात दोन नेत्यांत सुरू झाला आहे. चंद्रकांत पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील आरोप प्रत्यारोप पाहता डॉल्बीमागे कशाचे राजकारण दडले आहे हे लक्षात येण्यास फार वेळ लागणार नाही. क्षीरसागर यांनी यापुर्वी अनेकदा पालकमंत्री पाटील यांच्यावर उघड टीका केली होती. या दोघातील वाद मध्यतंरी पश्चिम महराष्ट्र देवस्थान समिती व प्राधिकरणाच्या हालचालीदरम्यान मिटले. पण गणेशोत्सवातील डॉल्बीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा वाद समोर आला आहे. आमदार क्षीरसागर यांनी पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. पालकमंत्र्यांनीदेखील त्यांचे नाव घेता खोडा घालण्यात कोण पुढे आहे हे स्पष्ट केले.

फुटले प्रचाराचे नारळ

गणेशआगमनावेळी डॉल्बी वाजला नाही, विसर्जनात देखील तो वाजण्याची शक्यता दिसत नाही. पण या निमित्ताने विधानसभेच्या तयारीचा मात्र डॉल्बी चांगलाच वाजला. सेना भाजप वगळता इतर कोणत्याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी यामध्ये फारसा भाग घेतला नाही. डॉल्बीमुक्तीचा आधार घेत पाटील यांच्याबरोबरच महेश जाधव, नगरसेवक सत्यज‌ित कदम यांनी प्रचाराचा नारळ फोडला. तर त्याला विरोध करत आमदार क्षीरसागर यांनी आपली मते फिक्स करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकील अद्याप दीड वर्षांचा कालावधी असला तरी त्यासाठी आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. दक्षिणेत महाडिक व सतेज पाटील गटातच लढाई होणार आहे. उत्तरेत काँग्रेस, भाजप आणि सेनेत तिरंगी लढत होणार यामध्ये शंका नाही. या तिरंगी लढतीचा फायदा घेण्यासाठीच भाजपने डॉल्बीच्या माध्यमातून सकारात्मक प्रचाराची संधी साधली. हवे ते देत मंडळे कॅच करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केल्यानेच सेनेचे धाबे दणाणले. यातूनच डॉल्बीचा आग्रह वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभार्थ्यांच्या पेन्शनवर डल्ला

$
0
0

प्रकाश कारंडे,कागल
कागल तालुक्यात लाभार्थ्यांना दिल्या जात असलेल्या पेन्शनमधून सुमारे ३०० लाभार्थ्यांची तीन महिन्यांची रक्कम गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ६०० रुपयांप्रमाणे तीन महिन्यांची ही रक्कम आहे. ‘झिरो बॅलन्स’ खात्यातून कुठेही थम्ब न देता आपली पेन्शन मिळाली नसल्याची तक्रार दीडशे लाभार्थ्यांनी तहसीलदार किशोर घाडगे यांच्याकडे दाखल केली आहे. तर असे ३०० लाभार्थी असल्याचा दावा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनराज घाटगे यांनी केला आहे. या सर्वांना घेऊन या प्रकरणाची चौकशी होण्याच्यादृष्टीने कागल पोलिसांत तक्रार देणार असल्याचे अध्यक्ष घाटगे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
कागल तालुक्यात सुमारे १३ हजार लाभार्थी आहेत. त्यांना पेन्शन वाटप करण्यासाठी १७ जणांची आयसीआय बँकेशी टायअप असणाऱ्या ‘फिनो’ कंपनीने अडीच हजाराच्या पगारावर नेमणूक केली आहे .त्यांच्यामार्फतच पेन्शनधारकांना ठिकठिकाणी पेन्शन वाटप होते. यावरुन कागलमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप होत असतात. दोन महिन्यांपूर्वी सरकारने आयसीआय बँक वगळता जिल्हा बँकेसह इतर कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडा आणि पेन्शन घ्या, असा फतवा काढण्यात आला. त्यामुळे राजकीय फायदा उठवण्यासाठी काहीजणांनी आपणच सोयीनुसार खाती उघडली. झिरो बॅलन्स खाती असल्याने यासाठी विशिष्ट यंत्रणा रात्रंदिवस झटली.
आता जुलैअखेरपर्यंत तीन महिन्यांची पेन्शन वाटप केली जात आहे. याची कुणकुण लागलेले लाभार्थी थेट बँकेशी अथवा वाटप करणऱ्या कर्मचाऱ्यांना विचारत आहेत. आतापर्यंत तीनशे लाभार्थ्यांनी योजनेच्या अध्यक्षांची भेट घेतली. तर दीडशेजणांनी कागल तहसिलदारांकडे तक्रार केली आहे.यात ध्ये त्यांनी कर्जमाफीचा अर्ज वगळता कुठेही अंगठा दिलेला नाही, तरीही झिरो बॅलन्स खात्यामधून पैसे गायब झाल्याचे म्हटले आहे. तर आयसीआयसीआय बँकेत सुमारे साडेतीनशेजणांची पेन्शन कशा पध्दतीने वित‌रित करण्यात आली, याची माहिती काढण्यासाठी मुख्य कार्यालयाला कळवले असल्याचेही समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींच्या बालेकिल्यात सदाभाऊंची एंट्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवाच्यानिमित्ताने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ​हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील विविध मंडळांना भेटी देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यातच शिरकाव करुन खासदार राजू शेट्टी यांना एकप्रकारे सूचक इशारा देण्याचे काम केले आहे. गणेशोत्सव मंडळांच्या आरतींना उपस्थिती लावण्याबरोबरच तेथील राजकीय तसेच सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांशी चर्चा केल्याने शेट्टी यांची येथील वाटचाल सुकर होऊ नये असेच खोत यांचे टार्गेट असेल असे दिसते. यामुळे आगामी निवडणुकांपर्यंत शेट्टी व खोत यांच्यातील राजकीय युद्ध चांगलेच रंगणार आहे.

राज्य सरकारमध्ये मंत्र‌िपद मिळाल्यानंतर खासदार शेट्टी व खोत यांच्यातील वातावरण बिघडत गेले. त्यांच्या या शीतयुद्धाचा भडका जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये उडाला. त्यानंतर खोत यांची स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी करण्यापर्यंतच्या कालावधीत शेट्टी व खोत यांच्यात प्रचंड दरी निर्माण झाली. अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करण्यात आल्याने या दोघांमध्ये समझोता होण्याची आशा पार मावळून गेली होती. त्यामुळे दोघांच्या नात्यात प्रचंड कडवटपणा आला आहे. यातूनच खोत यांनी खासदार शेट्टी यांना इतर मतदार संघातून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे. यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांना कडवा विरोध करण्याचा खोत यांचा मनसुबा असेल हे वेळोवेळी जाणवत होते.

गणेशोत्सवाच्यानिमित्ताने शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना अस्वस्थ करण्याचा डाव खोत यांनी साधला आहे. शनिवारी हुपरी, रांगोळी, इंगळी या परिसरातील मंडळांच्या आरतींना खोत यांनी उपस्थिती लावली. केवळ मंडळांमध्ये उपस्थिती लावली नाही तर त्या गावातील नेते मंडळींची भेट घेत भविष्यातील राजकारणाची जणू पेरणीच केली. या भागात शेट्टी यांच्याविरोधात ताकद एकवटण्यासाठीचा हा खोत यांचा पहिला टप्पा मानला जात आहे. स्वाभिमानी संघटनेची या परिसरात ताकद असली तरी खोत यांनी शेट्टी, वाद, नवीन पक्षाची वाटचाल याबाबत संयमाचे धोरण अवलंबले. शांत राहून विरोधकांच्या गोटात खळबळ उडवून देण्याची रणनीती खोत यांनी अवलंबली असावी, असा अर्थ या परिसरातील भेटीगाठीतून निघत आहे. संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर नवीन संघटना काढण्याबाबत खोत यांनी काहीही थेट वक्तव्य केलेले नाही. मात्र खासदार राजू शेट्टी यांना अटकाव करण्याच्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असल्याचे जाणवत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवात वाढला राजकीय वावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवातील मंगळवारची विसर्जन मिरवणूक राजकीय नेत्यांना संपर्काची पर्वणी ठरली. अनेक पक्षांचे नेते, मंडळाच्या अध्यक्षांचे स्वागत करत, त्यांना मानाचा विडा देताना दिसून येत होते. मिरवणुकीत ते कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी नाचलेही. विसर्जन मार्गावरील बूथवर मंडळांना मानाचा विडा देण्यासाठी रात्री उशीरापर्यंत नेते थांबून राहिले. बिनखांबी गणेश मंदिर ते पंचगंगा नदीघाटावरील विसर्जन मार्गापर्यंत नेत्यांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेतला. गंगावेश येथील बूथवर भेट दिली. खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, संयोगिताराजे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत आणि मानाचा विडा दिला. पापाची तिकटी येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथतर्फे मंडळाचे स्वागत केले. या ठिकाणी राजकारणात एकमेंकांच्या विरोधात असलेले खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील आमने-सामने बूथवर बसले. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली. खासदार महाडिक हे प्रॅक्टिस क्लब मंडळाच्या मिरवणुकीत लेझीम खेळले. आमदार राजेश क्षीरसागर हे गंगावेश येथील अर्बन बँकेजवळील बूथवर थांबून होते. पहाटे चार वाजता विसर्जन मार्गावरील मंडळाच्या मिरवणुकीत आमदार क्षीरसागरही नाचले. यावेळी लाऊडस्पीकरचा आवाज मोठा झाल्याने पोलिस तेथे आले. त्यावेळी लाउडस्पीकरचा आवाज बंद करण्यात आला. मात्र क्षीरसागर यांनी, कार्यकर्त्यांना पुन्हा लाऊडस्पीकर लावण्यास सांगून उपस्थितांसोबत नृत्य केले. माजी आमदार मालोजीराजे यांनी विविध मंडळाच्या बूथवर जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. देवल क्लब येथे मधुरिमाराजे यांनी महिलांसोबत फुगडीचा फेर धरला. गंगावेश येथील शिवसेनेच्या बूथवर श्रीमंत शाहू महाराज, पालकमंत्री पाटील, खासदार महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, आमदार वैभव नाईक यांचा सत्कार झाला.

चार तास आधी मिरवणूक संपली

गेल्यावर्षी विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजेपर्यंत सुरु होती. सुमारे ३० तास मिरवणुकीचा कालावधी होता. डॉल्बी नसल्याने मिरवणुकीला गती होती. महाद्वार रोडवर सकाळी दुपारपर्यंत मंडळाची गर्दी नव्हती. त्यामुळे विसर्जन मार्गावर दोन मंडळाच्या मिरवणुकीत अंतर होते. काही मंडळांनी लोककला नृत्ये, पांरपारिक वाद्यांचा गजर, लाठीकाठीची प्रात्याक्षिके सादर केली. त्यामुळे मिरवणूक नेहमीपेक्षा चार तास अगोदर संपली.


कसबा बावडा येथे ४८ मूर्तिदान

ढोल ताशे, लेझीम, झांज पथकासह पारंपारिक वाद्यांच्या गजरात राजाराम बंधारा येथे मूर्तीचे विसर्जन झाले. ४८ सार्वजनिक तरुण मंडळांनी मूर्ती दान केल्या. डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा, सांस्कृतिक ट्रस्टतर्फे डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पाटील गल्ली येथे आणि शिवसेना कसबा बावडा विभागीय कार्यालयातर्फे धनगर गल्लीजवळ उप शहरप्रमुख सुनील जाधव, सचिन वावरे, संजय लाड यांच्या हस्ते मंडळाना मानाचा फेटा आणि श्रीफळ देण्यात आले. राजाराम बंधारा येथे पहाटे अडीच वाजता आंबेडकर नगरातील सतेज युवा मंचचा शेवटचा गणपती विसर्जित झाला. राजाराम बंधारा येथे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते खिचडीचे वाटप झाले. दरम्यान आमदार पाटील फाउंडेशनने शहरात महिलांसाठी तात्पुरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था केली होती.


लेसर शोचा दणदणाट

गणेशोत्सव मिरवणुकीत लेसर शोचा वापर अनेक मंडळांनी केला. डॉल्बीला फाटा देत अत्याधुनिक लेसर शोच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली. मुख्य मिरवणूक मार्गावर शिवाजी पेठ, मंगळवार पेठांतील मंडळांनी लेसर शो आणले. अवचितपीर, दयावान, हिंदवी स्पोटर्स, बीजीएम, श्रीराम तरुण मंडळासह अनेक मंडळांनी लेसर शो आणले होते. यासाठी लाखोंची उलाढाल झाली. रात्री खरी कॉर्नर ते पंचगंगा नदी पर्यंतचा मार्ग लेसर शोने उजळून निघाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुरिमाराजे छत्रपती भाजपच्या वाटेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती घराण्याचा सन्मान करताना युवराज संभाजीराजे यांना खासदार केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मधुरिमाराजे यांच्या भाजप प्रवेशासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. खासदार संभाजीराजेंनी सहयोगी सदस्यत्व घेऊन भाजपसाठी मार्ग प्रशस्त केल्याने या दोघांनाही पक्षात घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, मधुरिमाराजेंना पक्षात घेऊन कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधून विधानसभेची उमेदवारीदेखील जाहीर करण्यात येणार आहे.

पालकमंत्री पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना आठ दिवसात कोल्हापुरात राजकीय बाँब फोडणार अशी टिप्पणी केली. या पार्श्वभूमीवर अनेकांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला वेग आला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, विनय कोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याबरोबरच अन्य काही नावांची चर्चा सुरू झाली आहे.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डॉल्बीच्या विषयावरून भाजप आणि सेनेत गेल्या आठ-दहा दिवसांत थेट मतभेद झाले. विशेषतः पालकमंत्री पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात थेट-आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकारण तापले आहे. यातूनच मधुरिमाराजे यांच्या प्रवेशाबद्दल आठ दिवस जोरदार चर्चा आहे.

क्षीरसागर यांना उघड आव्हान देण्यासाठी उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. आमदार क्षीरसागर यांना सध्याच्या वातावरणात केवळ मधुरिमाराजेच आव्हान देवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यामुळे पालकमंत्री पाटील यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रयत्न सुरू केल्याचे समजते. गणेशोत्सवात विशेषता विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह चौघेही सक्रीय होते. प्रत्येक स्वागत कक्षाबरोबरच मंडळांच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. यातून विधानसभेची तयारीच छत्रपती कुटुंबाच्यावतीने सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर उत्तर मतदारसंघात वेगवेगळी समिरकरणे दिसतील अशी चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ध्‍व‌नी प्रदूषण्‍ाात यंदा घ्‍ाट !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रशासन आणि पोलिसांनी दिलेल्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सव मिरवणूक आवाहनाला मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाची पातळी यंदा १५ टक्क्यांनी कमी झाली. शांतता, रहिवासी, औद्योगिक आणि व्यापारी अशा चार क्षेत्रातील ध्वनीप्रदूषणाचे मोजमाप शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी केले. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या ध्वनीपातळी मर्यादेच्या निकषानुसार रात्रीच्यावेळी मिरवणूक मार्गावर केलेल्या या मोजमापासाठी शास्त्रीय पद्धत व नॉइज मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंटचा वापर करण्यात आला.

मिरवणुकीत रात्री आठपासून मध्यरात्री एक वाजेपर्यंत ध्वनीप्रदूषण टीपेला पोहोचलेले असते. त्यामुळे या पाहणीसाठी पर्यावरणशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रात्री दहा ते बारा या वेळेतील ध्वनीप्रदूषणाची मोजणी केली. दरवर्षी डॉल्बीमुळे सर्वाधिक ध्वनीप्रदूषण होत असते. गेल्या दोन वर्षांत करण्यात आलेल्या पाहणीत मुख्य मिरवणूक मार्गातील ध्वनीमर्यादे​चे उल्लंघन होणाऱ्या स्थळांवर कानठळ्या बनवणारे प्रदूषण होत होते. यंदा हे प्रमाण १५ टक्क्यांनी खाली आल्याचे नोंद झाले.

शांतता क्षेत्र असलेल्या सीपीआर रूग्णालय परिसरात २०१५च्या मिरवणुकीत ७१ डेसिबल आवाज होता तर गेल्यावर्षी हे प्रमाण ६७ डेसिबलवर आले होते. यंदा या भागातील आवाज ५५ .६३ डेसिबलवर स्थिर होता. मिरजकर तिकटी ते पापाची तिकटी या मुख्य मिरवणूक मार्गावर गेल्या दोन वर्षाच्या ध्वनीप्रदूषणाच्या तुलनेत यावर्षी सरासरी १४ टक्क्यांनी घट झाली आहे. दोन वर्षांपूर्वी महाद्वार रोडवर रात्री दहा ते बारादरम्यान १०३ डेसिबल असणारा आवाज यंदा ७१.६३ डेसिबलपर्यंत खाली आला होता. तर गुजरी कॉर्नरला गेल्यावर्षी ९७ डेसिबलइतका घुमणारा आवाज यावर्षी ७४ डेसिबल इतका नोंदवला गेला. बिनखांबी गणेश मंदिर परिसरात मंगळवारी रात्रीच्यावेळी ८४ डेसिबल आवाज असल्याची नोंद झाली. गेल्या वर्षी हे प्रमाण ९६ डेसिबल होते. पापाची तिकटी येथे यावर्षी ८२ डेसिबल आवाज घुमला तर गेल्यावर्षी याठिकाणी ध्वनीने ९८ डेसिबलपर्यंत पातळी गाठली होती. दरम्यान राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, गंगावेश आणि बिंदू चौक या महत्त्वाच्या स्पॉटवर यावर्षी ७७ ते ८५ डेसिबलपर्यंत होती.

मिरवणूक मार्गालगतच्या मंगळवार पेठ, शिवाजी पेठ आणि शुक्रवार पेठ आणि उत्तरेश्वर पेठ या रहिवाशीक्षेत्रातही ५० ते ६६ डेसिबलपर्यंतच ध्वनीपातळी होती.

०००००००००००००००००००००००

डॉल्बीमुक्त आवाहनाला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ध्वनीप्रदूषणात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठाच्यावतीने तीन उपकरणांच्या सहाय्याने रात्रीच्यावेळी ही ध्वनीप्रदूषण पाहणी करण्यात आली. गेल्या दोन वर्षातील आकडेवारी पाहता यावर्षी १५ टक्क्यांनी ध्वनीप्रदूषण कमी झाले आहे.

पी. डी. राऊत, प्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ

०००००००००००००००००००००००

प्रमुख ठिकाणे आणि डेसिबल


सीपीआर ः ५५.६३

महाद्वार ते पापाची तिकटी ः ७१.६३

गुजरी कॉर्नर ः ७४

‌‌‌बिनखांबी गणेश मंदिर ः ८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोडण्यापूर्वीच डॉल्बी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट होऊ नये, यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच खबरदारी घेतली. सोमवारी मध्यरात्री डॉल्बी व्यावसायिकांच्या गोडावूनवर छापे टाकून २२ डॉल्बी आणि मिक्सर जप्त केले. रात्रभर मंडळांवर करडी नजर ठेवल्यानंतर मंगळवारी दिवसभरातही मंडळांना डॉल्बीची मुभा दिली नाही. ८ मंडळांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने विसर्जन मिरवणुकीत आवाज मर्यादित राहिला.

गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा करण्याचा चंग पोलिस प्रशासनासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधला होता. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांकडून मंडळांचे प्रबोधन सुरू होते. ऐनवेळी काही मंडळे डॉल्बी यंत्रणा जोडून मोहिमेला हरताळ फासण्याचा प्रयत्न करतात. असा प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येलाच व्यावसायिकांवर कारवाईला सुरुवात केली. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सोमवारी मध्यरात्री लाड चौकातील एका डॉल्बी व्यावसायिकाच्या गोडावूनवर छापा टाकला. कमदवाडी येथील दोन गोदामे आणि विचारे माळ येथील भागवा चौकातील गोदामावर छापा टाकून २२ डॉल्बीसह मिक्सर जप्त केले. जप्त साहित्य पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा करण्यात आले.

डॉल्बी लावण्यासाठी आग्रही मंडळांवर पोलिसांची सोमवारपासूनच करडी नजर होती. संशयित मंडळे मिरवणूक मार्गावर येईपर्यंत पोलिसांकडून त्यांचा पाठलाग सुरू ठेवला. उद्यमनगर येथे जयशिवराय तरुण मंडळाचे कार्यकर्ते डॉल्बी जोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र ते केवळ दोन बॉक्स जोडत असल्याने पोलिसांनी त्यांना डॉल्बी न जोडण्याची समज दिली. जुना बुधवार तालीम मंडळाने मोठे स्पीकर जोडले. मात्र आवाजाची मर्यादा पाळण्याचे आश्वासन त्यांनी पोलिसांना दिले. दयावान, गोल सर्कल, मित्रप्रेम, बालगोपाल, यू. के. बॉईज, दिलबहार, अवचितपिर मंडळ यांना पोलिसांनी आधी सूचना दिल्या होत्या.


डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करून मंडळांनी राज्याला आदर्श घालून दिला आहे. मंडळांनी स्वतःहून पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले. मंडळे, लोकप्रतिनिधी, नागरिकांमुळे डॉल्बीमुक्त उत्सव साजरा झाला.

- विश्वास नांगरे-पाटील,
विशेष पोलिस महानिरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लबमार्फत ‘फन फॉर योगा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘महाराष्ट्र टाइम्स’ ‘कल्चर क्लब’मार्फत ‘फन फॉर योगा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. १०) मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील, शिवाजी पार्कमध्ये मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सायंकाळी चार ते पाच या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका डॉ. अणिमा दहीभाते मार्गदर्शन करणार आहेत. ‘कल्चर क्लब’च्या महिला सदस्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.

सध्या धावपळीच्या युगात शारीरिक आणि मनसिक स्वास्थ्यासाठी योगा, प्राणायाम अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग प्रशिक्षिका डॉ. अनिमा दहीभाते मार्गदर्शन करीत आहेत. नोकरदार, गृहिणी, तरुणी यांच्यासाठी योगाचे शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यासाठी ‘महाराष्ट टाइम्स’च्या क्लचर क्लबने ‘फन फॉर योगा’ या कार्क्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात डॉ. दहीभाते मार्गदर्शन करणार आहेत. योगा, संगीत, विविध व्यायामाचे प्रकार, योगा डान्स, आरोग्याच्या टिप्स, मनाची जागृती, प्राणायामची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहे.
कल्चर क्लबच्या महिला सदस्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी

(मोबा. ९७६७८९०६२६) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



सभासद होण्यासाठी

‘कल्चर क्लब’ सभासद होण्यासाठी बीसीसीएलच्या नावे २९९ रुपयांचा चेक घेऊन आमच्या कार्यालयात किंवा शहरातील विविध भागात असलेल्या नोंदणी केंद्रांना भेट द्या. अधिक माहितीसाठी ९७६७८९०६२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजेंडा क्षीरसागरांविरोधात नव्हता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘तालीम बांधून देण्याला, डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्य वाजवण्याचा पर्याय निवडण्यासाठी पैसे देण्यात चुकीचे काय आहे? आतापर्यंत ज्यांना मदत केली त्यांची यादी काढली तर ती भली मोठी होईल. मदत करतो असे सांगण्याची मला सवय नाही. मात्र ज्यांना खिशातील पैसा देण्याची सवय नाही, त्यांना मात्र हे प्रश्न पडू शकतात’, असा टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार राजेश क्षी​रसागर यांचे नाव न घेता लगावला. ‘डॉल्बीविरोधी भूमिका ही व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हती. तसेच तरुण मंडळे व आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात लढणे हाही त्याचा अजेंडा नव्हता. नागरिकांच्या आरोग्यासाठी, सत्यासाठी लढलो. डॉल्बीबाबत हीच भूमिका सदासर्वकाळ राहणार आहे’, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व शांततामय वातावरणात साजरा झाल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व मंडळांचे आभार मानले. मंत्री पाटील म्हणाले, ‘परवानगी मिळो अथवा न मिळो, पण नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी डॉल्बीमुक्तीसाठी मी ठाम होतो. याकरिता मंडळांच्या भेटीगाठी घेऊन प्रबोधन केले. १२२ मंडळांच्या आरती केल्या तर ३०० घरात जाऊन भेटी घेतल्या. मंडळे, तरुण कार्यकर्ते, राजेश क्षीरसागर हे काही माझे शत्रू नाहीत. ते व्यापक अर्थाने नातेवाईकच आहेत. महाभारतात अर्जुनाला जसे कृष्णाने सत्यासाठी लढ असे सांगितले, तसा मी सत्यासाठी लढलो. अंमलबजावणीत थोडा कठोरपणा व्यक्त झाला असला तरी तो व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हता. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. दिलगिरी जरी व्यक्त केली असली तरी डॉल्बीमुक्तीसाठीची भूमिका सदासर्वकाळ असेल. केवळ शंभर मंडळांसाठी संपुर्ण शहराचे स्वास्थ डावाला लावणे योग्य नाही. काम करत असताना राजकीय फायदा, तोटा असा विचार मी करत नाही. लोकप्रतिनिधींनी खऱ्याला खरे व खोट्याला खोटे मांडायला शिकले पाहिजे.’

पैसे देऊन मंडळे विकत घेत असल्याच्या आरोपाबाबत मंत्री पाटील म्हणाले, ‘तालमीसाठी, पर्यायी वाद्यांसाठी पैसे देण्यात चूक काय आहे. मी अडचणीच्या काळातही मदत केली आहे. पण मदत करतो असे सांगण्याची सवय मला नाही. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला समजू नये अशी माझी वृत्ती आहे. ज्यांना मदत केली, त्यांची यादी काढली तर ती भली मोठी होईल. दहा रुपये कमवत असलो तरी त्यातून आपले गरजेपुरते सोडून बाकीचे इतरांच्या मदतीसाठी वापरण्याची माझी सवय आहे. ज्यांना स्वतःच्या खिशातील पैसे देण्याची सवय नाही, त्यांना पैसे कशासाठी दिले जात आहेत याचे प्रश्न पडू शकतात. मदत केलेल्या तालमी जर भविष्यात माझ्यासोबत गेल्या तर ही ​त्यांची भीती समजू शकतो. गणेशोत्सव संपला.

त्यामध्ये जे काही झाले ते विसरुन जाऊन, मतभेद विसरुन शहरातील विकास कामाचे काम सुरू करुया’, असे सांगत पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘येथील सातत्याने विघ्न येत असलेली विमानसेवा, शिवाजी पुलाचे लटकलेले काम, प्राधिकरण अशा अनेक बाबींसाठी काम करावे लागणार आहे.’

मोठ्या इंडस्ट्रीसाठी प्रयत्न

‘पाच ते सहा हजार तरुणांना थेट रोजगार देणारी मोठी इंडस्ट्री आणण्यासाठी काम सुरू आहे. त्याच्या जागेबाबतचे प्रयत्न सुरू आहेत’ असे सांगत मंत्री पाटील म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या वसंतराव घाटगे यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी येथे कौशल्य विकासाचे विद्यापीठ यायला हवे असे मांडले होते. त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यास ते तयार आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणूक ११ ऑक्टोबरला

$
0
0

पोटनिवडणूक ११ ऑक्टोबरला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या ताराबाई पार्क आणि मध्यवर्ती शासकीय कारागृह प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी ११ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांतच ही लढत होणार आहे. ही पोटनिवडणूक पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. माजी नगरसेवक रमेश पुरेकर, इंद्रजित सलगर यांची नावे ताराबाई पार्क प्रभागातून चर्चेत आहेत.

पक्षीय पातळीवर आणि नेत्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असली तरी शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागात माजी नगरसेवक मधुकर रामाणे व ताराबाई पार्क प्रभागात माजी नगरसेवक निलेश देसाई यांच्या भूमिकेला महत्त्व राहणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या दोन्ही प्रभागासाठी आचारसंहिता लागू झाल्याची व निवडणूक कार्यक्रमाची माहिती आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिली.

ताराबाई पार्क प्रभाग हा नागरिकांचा इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित असून सुमारे पाच हजार मतदार आहेत. सिंधी आ​णि मुस्लिम समाजातील मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या प्रभागातून माजी नगरसेवक रमेश पुरेकर, इंद्रजित सलगर यांची नावे चर्चेत आहे. भाजप, ताराराणी आघाडीच्या तिकिटासाठी प्रयत्न सुरु आहेत. ​​शिवाय रोहित कस्तुरे, वासीम मुजावर योगेंद्र माने, शादाब अत्तार आणि रत्नेश​ शिरोळकर यांच्या हालचाली सुरू आहेत. गेल्या निवडणुकीत कस्तुरे, मुजावर यांनी अनुक्रमे शिवसेना आणि काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत राऊत तिसऱ्या क्रमांकावर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images