Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापुरात चार लाखांवर मूर्ती दान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी झटणाऱ्या चळवळीला गुरूवारी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने मूर्तिदानातून ‘लाख’मोलाचे बळ मिळाले. रंकाळा, पंचगंगा नदी, राजाराम बंधारा, कळंबा, कोटीतीर्थ येथे भाविकांनी उत्स्फूर्तपणे मूर्तिदान केल्यामुळे पर्यावरणपूरक उत्सवाचे बीज रूजल्याचे चित्र दिसून आले. विसर्जन कुंड, काहिलीमध्ये मूर्ती प्रतिकात्मक बुडवून त्यानंतर दान करण्यासाठी दिली जात होती. दान केलेल्या मूर्तींच्या संकलनासाठी महापालिकेने सर्व विसर्जनस्थळी ट्रॉलीची सोय केली होती. शहरासह जिल्ह्यात मिळून जवळपास चार लाखांवर मूर्ती दान करण्यात आल्या.

गेल्या सात दिवसांपासून घराघरात चैतन्याचे रूप घेऊन विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी भाविक सहकुटुंब सहपरिवार सहभागी झाल्याने शहरातील नदी, तलाव येथे उत्साहाला भरते आले. गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसानेही बाप्पांच्या विसर्जनादिवशी विश्रांती घेतली. लहान मुलांसह महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या जात होत्या. तसेच अपार्टमेंट, कॉलनी, गल्ली, सोसायटी येथील सर्वांनी एकत्रितपणे मूर्ती आणण्यासाठी सजवलेल्या हातगाडीचा वापर केला. गणपती बाप्पा मोरयाचा अखंड गजर आणि चुरमुऱ्याची उधळण यामुळे विसर्जन सोहळ्याला मांगल्याचे रूप आले. नदी, रंकाळा, कळंबा, खण याकडे जाणारे रस्ते गणरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

पर्यावरणपूरक उत्सवाला प्रतिसाद देत गुरूवारी घरगुती मूर्ती आणि गौरी विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना अबालवृद्धांनी मूर्तिदानाची संकल्पपूर्ती करीत प्रदूषणमुक्तीच्यादृष्टीने भक्कम पाऊल टाकले. पंचगंगा घाट, रंकाळा, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, कोटीतीर्थ, कळंबा तलाव आणि जिल्ह्यात सुमारे चार लाखांवर मूर्ती दान करण्यात आल्या.

==
प्रशासनाची योग्य व्यवस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांकडून केले जाणारे आवाहन यामुळे भाविकांमधून ​जिल्ह्यातून जवळपास चार लाखांवर मूर्ती दान झाल्या. जिल्हा परिषद प्रशासनाने यंदा चांगले नियोजन केल्याने मूर्तिदान व निर्माल्यदान चळवळीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ​जिल्ह्यात दोन लाख २४ हजार ९६८ मूर्ती तर १४६ घंटा गाडी व १०८८ ट्रॅक्टर निर्माल्य दान झाले.

कळंब्यावर शंभर टक्के प्रतिसाद

कळंबा येथे मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या एकाही भाविकाने मूर्तीचे विसर्जन तलावात केले नाही. त्यामुळे या भागात ठेवलेल्या काहिलींत मूर्ती प्रतिकात्मक विसर्जित करून त्यानंतर दान करण्यात आली. कळंब्यात शंभर टक्के मूर्तिदान चळवळ यशस्वी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहूपुरीत चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दाभोळकर कॉर्नर येथील अयोध्या टॉवरमध्ये बुधवारी (ता. ३०) रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी पाच बंद फ्लॅट आणि एका वृत्तवाहिनीचे कार्यालय फोडले. दोन फ्लॅटमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व टीव्ही असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

शहरात पुन्हा एकदा घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे. गणेशोत्सवासाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची बंद घरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात आहेत. बुधवारी रात्री वर्दळीच्या दाभोळकर कॉर्नर परिसरातील फ्लॅट फोडून चोरट्यांनी यंत्रणेला आव्हान दिले आहे. पोलिसांनी जिल्ह्यातील चोरट्यांना तडीपार केल्यानंतरही चोरीच्या घटना सुरूच आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा चोरट्यांचा वावर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अयोध्या टॉवरमधील निवृत्त शिक्षक बी. एम. घाटगे हे जनवाड (ता. चिकोडी) येथे पाहुण्यांकडे गेले होते. त्यांच्या बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम व टीव्ही लंपास केला. शेजारील ए-१०१ मध्ये राहणारे सन्याक कुबरे हे कामानिमित्त सांगलीला गेले होते. त्याच्या घरातही चोरट्यांनी विस्कटले. जाताना चोरट्यांनी महागड्या बुटाचे जोड पळवले. बी-२०३ या फ्लॅटमध्ये एका वृत्तवाहिनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी साहित्य विस्कटले. बी-२०४ मध्ये एम. के. देसिंगकर हे राहतात. चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटमधीलही साहित्य विस्कटले. बिल्डिंग नंबर ३, ए-४ पहिल्या मजल्यावर राजू इनामदार हे कॉन्ट्रॅक्टर राहतात. त्यांच्या फ्लॅटमधील कपाटातील साहित्य चोरट्यांनी विस्कटले. चोरीचा नेमका तपशील पोलिसांना मिळालेला नाही.

या सहा ठिकाणी झालेल्या चोरीत १ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा अंदाज पलिसांनी वर्तवला. घरमालक बाहेरगावी असल्याने नेमकी माहिती उपलब्ध नाही. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला.

महाडिक कॉलनीतही चोरीचा प्रयत्न

अयोध्या टॉवरमध्ये चोरीनंतर याच चोरट्यांनी महाडिक कॉलनीत दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र बंद घरात ही चोरी झाली. त्यामुळे चोरीस गेलेल्या मुद्देमालाची माहिती मिळाली नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घटनास्थळी पहाणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत चोरट्याकडून चार घरफोड्या उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरटा राजू प्रकाश नागरगोजे उर्फ रविराज सुभाष देसाई (वय २९, मूळ रा. सावंत गल्ली, उचगाव, सध्या रा. एकतानगर, निपाणी, जि. बेळगाव) यास सापळा रचून अटक केले. त्याच्याकडून चोरीतील ४६७ ग्रॅम वजनाचे साडेतेरा लाख रुपये किंमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले असून, चार घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.

राजू नागरगोजे हा सराईत चोरटा असून, त्याच्यावर शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी पोलिस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. नागरगोजेने शहरात काही ठिकाणी घरफोड्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिस नागरगोजेच्या मागावर होते. बुधवारी (ता. ३०) तो मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा रचला. बुधवारी दुपारी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सोन्याच्या ११ अंगठ्या, सोन्याचा लप्फा आणि चेन मिळाली. हे दागिने चोरीतील असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता चार घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. त्याने शाहूपुरी परिसरात २ आणि राजारामपुरी, जुना राजवाडा परिसरात प्रत्येकी १ चोरी केल्याची कबुली दिली आहे. या चोऱ्यांमधील साडेतेरा लाख रुपये किंमतीचे सोने पोलिसांनी हस्तगत केले. त्याच्याकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी वर्तवली आहे.

पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, एपीआय संजीव झाडे, अमोल माळी, राजेंद्र सानप, युवराज आठरे, विजय कोळी, संदीप जाधव आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील रस्ते गर्दीने फुलले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
गणरायाच्या भव्यदिव्य आणि आकर्षक मूर्ती, तांत्रिक देखाव्यांची कमाल, विद्युत रोषणाईने झळाळलेल्या मंदिरांच्या प्रतिकृती असलेले देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शुक्रवारी रात्री बाहेर पडले. राजारामपुरी, शाहूपुरी, उद्यमनगर, जुना बुधवार पेठेतील रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलले होते. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी नागरिकांची वर्दळ सुरू होती.
राजारामपुरीत युवक मित्र मंडळाचे टेक ऑफ करणारे विमान, राजारामपुरी तालीम मंडळाचा सेल्फी पॉइंट हे देखावे गर्दी खेचणारे ठरले. सेल्फी पॉइंटवरील छत्र्यांची मांडणी व त्यावर सोडलेल्या रंगीबेंरंगी प्रकाशझोतांमुळे तरुणाई आकर्षित झाली होती. राजारामपुरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असललेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या व खेळण्याच्या दुकानांमुळे या परिसरात जत्रा अवतरल्याचे चित्र होते. उद्यमनगरातील मॅजिक बॉल, मिनियन्स आणि सर्जिकल्स स्ट्राईक हे देखावे पाहण्यासाठी लहानमुलांचा गराडा पडला होता. शिवाजी चौकातील भव्यदिव्य २१ फुटी गणेश मूर्तीसमोर भाविक नतमस्तक होत होते.
जुना बुधवार पेठ, शनिवार पेठेतील गल्लीबोळांतील देखाव्यांनी सर्वांत जास्त गर्दी खेचली होती. अष्टविनायक ग्रुपचा सूर्यरथ, म्हसोबा देवालय बिरोबा ट्रस्टचा अंबाबाई एक्सप्रेस या देखाव्यांना सर्वांत जास्त पसंती होती. शिवाजी पेठ व मंगळवार पेठेतील जिवंत देखावे वेळाने सुरु होऊनही तेथे गर्दी होती. मध्यरात्री उशिरापर्यंत ताराबाई रोडवरील मित्र प्रेम तरुण मंडळ, रंकाळा टॉवर उमेश कांदेकर ग्रुप येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित देखाव्यातील संवादांना प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखापालकडून साडेसात लाखांचा घोटाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांच्या नावे बोगस बिले तयार करून साडेसात लाखांची रक्कम परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तत्कालीन लेखापाल संतोष अण्णा कांबळे (मूळ रा. भादवण, ता. आजरा, सध्या रा. शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कोल्हापूर) याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक संजय पाटील यांनी फिर्याद दिली. या प्रकाराने राज्य उत्पादन शुल्क विभागातील सावळा गोंधळ स्पष्ट झाला आहे.
कांबळे याने २०११ ते २०१४ या काळात कर्मचाऱ्यांची बोगस बिले तयार करून साडेसात लाखांचा घोटाळा केला आहे. कर्मचाऱ्यांची मागणी नसतानाही प्रवास भत्ते, वैद्यकीय बिले, वेतन भत्ते मंजूर करून घेतले आहेत. शिवाय काही कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या बिलांची रक्कमही परस्पर हडप केली आहे. चार वर्षांच्या काळात ५८३ बिलांचे ७ लाख ४५ हजार ४७२ रुपये कांबळेने हडप केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले आहे.
लेखाधिकारी एस. आर. पाटील आणि सहायक लेखाधिकारी आर. ए. पाटील यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये केलेल्या परीक्षणात हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान जुलै २०१४ मध्ये कांबळेची पुणे येथे बदली झाली. कोल्हापुरातील कार्यालयीन प्रमुखांनी याबाबत कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. समक्ष कार्यालयात हजर राहून खुलासा करण्याचेही कळवले, मात्र अद्याप कांबळे कार्यालयीन चौकशीसाठी हजर राहिलेला नाही. कांबळेने यातील ६ लाख १२ हजार ८३९ रुपये ट्रेझरीत जमा केले आहेत. उर्वरित १ लाख ३२ हजार ६३३ रुपयांची रक्कम अद्याप जमा केलेली नाही. पदाचा गैरवापर करून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी उपअधीक्षक पाटील यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार संतोष कांबळे याच्यावर फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
निलंबनाची शिफारस
लेखापाल कांबळे याच्या कार्यकालात साडेसात लाखांचा अपहार झाल्याने कार्यालयीन प्रमुखांनी वेळोवेळी वरिष्ठ कर्यालयाकडे त्याच्या निलंबनाची शिफारस केली आहे. अपहार उघडकीस आला तेव्हापासून कांबळे हा पुण्यातील कार्यालयात कार्यरत आहे. त्याच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. अपहाराबद्दल लेखी खुलासाही त्याने केलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांना मध्यरात्रीपर्यंत जाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरगुती गणपती उत्सवानंतर मिळालेली मोकळी, पावसाने घेतलेली विश्रांती व सलग दोन दिवस सुट्ट्यांच्या पर्वणीमुळे शुक्रवारी सायंकाळी करवीरकर नागरिक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले. राजारामपुरी, शाहूपुरी उद्यमनगर, जुन्या कोल्हापुरातील शुक्रवार, शनिवार आणि जुना बुधवार पेठेतील देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी होती. लहान मुलांना आवडणाऱ्या देखाव्यांनी चांगलीच गर्दी खेचली होती.

तांत्रिक व सेट असलेल्या देखाव्यांचे माहेरघर असलेल्या राजारामपुरी व शाहूपुरीत देखावे लवकर सुरु झाल्याने नागरिकांनी मोर्चा राजारामपुरीकडे वळवला होता. देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन राजारामपुरी मुख्य रस्त्यांवर डिव्हाएडर लावले आहेत. पण पोलिसांनी दुचाकी वाहनांना वाहतुकीस परवानगी दिली होती. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला खाद्य पदार्थ, खेळण्याच्या दुकानांनी राजारामपुरीत जत्रा अवतरली होती. शॉपिंग करत देखावा पाहण्याऱ्यांची संख्या मोठी होती. पहिल्या गल्लीतील खाऊ गल्लीत सर्व खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर गर्दी होती. प्रत्येक गल्लीतील स्वागत कमानी व विद्युत रोषणाईने राजारामपुरी परिसर उजळून निघाला होता. युवक मित्र मंडळाच्या विमानात बसण्यासाठी गर्दी झाली होती. तर राजारामपुरी तालीम मंडळाच्या छत्र्यांच्या सेल्फी पॉईंटला तरुणाईने गर्दी केली होती. उद्यमनगरातील हवेतील भुते, मिनिअम, गणरायांचे सर्जिकल स्ट्राईक या देखाव्याजवळ बच्चे कंपनीचा गराडा होता.

शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळ, युवक क्रांती मित्र मंडळाच्या देखाव्यांना चांगली पसंती मिळाली. शिवाजी चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळ, संयुक्त शिवाजी तरुण मंडळाच्या २१ फुटी मूर्तीपुढे भाविक नतमस्तक होत होते. सी वॉर्ड संयुक्त सेवा मंडळाचा ‘भारतीय संस्कृती, इतिहास वाचवा’ हा देखावा खुला झाला. शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, जुना बुधवार पेठेतील गल्लीबोळातील देखावे पाहण्यासाठी गर्दी झाल्याने वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत होते. अष्टविनायक ग्रुपच्या सूर्यरथ व पांढरे घोडे अशी मांडणी असलेल्या गणरायाचे रुप मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी भाविकांचे हात उंचावत होते. म्हसोबा बिरोबा ट्रस्टच्या ‘अंबाबाई एक्सप्रेस’ या रेल्वेत बसण्यासाठी बच्चे कंपनीची झुंबड उडाली होती. शिपुगडे तालमीचा ‘वसुंधरा वाचवा’, डांगे गल्लीतील ‘कचरा व्यवस्थापन’ या सामाजिक विषयावरील तांत्रिक देखाव्यापुढे रांगा लागल्या होत्या. हायकमांडो फ्रेंडस सर्कलच्या ‘तुझ्यात जीव गुंतला’ मालिकेतील नायक राणासमवेत गणराय कुस्ती खेळणाऱ्या देखाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.


जिवंत देखाव्यांचे आकर्षण

शिवाजी पेठ, मंगळवार पेठेतील आकर्षक मूर्ती पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. लेटेस्ट तरुण मंडळाचा ‘राणी येसूबाई’ हा जिंवत देखावा शुक्रवारी खुला झाला. त्याचबरोबर ताराबाई रोडवरील मित्र प्रेम तरुण मंडळाचा ‘कुळवाडीभूषण राजा शिवाजी महाराज’ व रंकाळा टॉवर येथील उमेश कांदेकर ग्रुपचा ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ या जिवंत देखाव्यांना चांगला प्रतिसाद लाभत होता. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होती. शनिवारी बहुतांश सर्व जिवंत देखावे खुले असल्याने शिवाजी व मंगळवार पेठेत गर्दी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७८ ग्रामपंचायतींसाठी १४ ऑक्टोबरला मतदान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हयातील मुदत संपलेल्या ४७८ ग्रामपंचायतींच्या ४ हजार ३९० सदस्य जागांसाठी १४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यावेळी प्रथमच निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवड थेट मतदारांतून होणार आहे. त्यामुळे लढती रंगतदार होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी सायंकाळी ४ पासून लागू झाली. ती निकाल लागेपर्यंत असेल. परिणामी ग्रामीण भागातील नविन विकास कामांना ब्रेक लागला.

राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ४७८ ग्रामपंचायतींची निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सदस्यांसोबतच सरपंच पदासाठीचीही मतदान होणार आहे. तालुका पातळीवर तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. निवडणुकीची नोटीस १४ सप्टेंबर प्रसिध्द केली जाईल. नामनिर्देशन पत्र २२ ते २९ सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जाईल. नामनिर्देशन पत्राची छाननी ३ ऑक्टोबरला होईल. ५ रोजी दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर रिंगणातील उमेदवारांची नावे प्रसिध्द केली जातील. १४ ऑक्टोबरला सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच वेळेत मतदान होईल. १६ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर होईल.


सर्वाधिक करवीर तालुक्यातील

निवडणूक लागलेल्या गावांची तालुकानिहाय गावांची व कंसात सदस्य संख्या अशी – करवीर – ५३ (५८७), कागल – २६ (२४०), हातकणंगले – ४० (५३२), चंदगड – ४१ (३२१), भुदरगड – ४४ (३५८), शिरोळ – १७ (१९३), गगनबावडा – २१ (१५५), राधानगरी – ६६ (५६६), गडहिंग्लज – ३४ (३००), आजरा – ३७ (३०९), पन्हाळा – ५० (४२६), शाहूवाडी – ४९ (४०३).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बीवाल्या मंडळांविरोधात जमावबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
डॉल्बीवाल्या मंडळांविरोधात जमावबंदी लागू शुक्रवारी संध्याकाळी हा आदेश जारी केला असून, सोमवारी (ता. ४) सकाळी सात वाजल्यापासून ते बुधवारी (ता. ६) संध्याकाळपर्यंत याची अंमलबजावणी होणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिला आहे.
आवाज मर्यादेचे उल्लंघन होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश कोर्टाने पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. गणेशोत्सवात अनेक मंडळे डॉल्बीचा दणदणाट करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देतात. डॉल्बीच्या अतिवापराने आरोग्याचेही प्रश्न उद्भवतात. कोल्हापुरात यापूर्वी डॉल्बीची भिंत कोसळून संदीप टिळे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉल्बीच्या दणदणाटाने महाद्वार रोड परिसरात एक इमारत कोसळून दुर्घटना घडली होती. याशिवाय डॉल्बीमुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळते. मंडळांमध्ये वादाचे प्रसंग घडतात. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा धोका असल्याने डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉल्बी मशिन पोलिसांकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. डॉल्बी यंत्रणा घरी ठेवल्यास तिचा वापर न करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचा आदेशही डॉल्बी व्यावसायिकांना दिला आहे. यात टाळाटाळ करणाऱ्या व्यावसायिकांची डॉल्बी यंत्रणा त्यांच्या घरात जाऊन जप्त केली जाईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे. गरज पडल्यास डॉल्बीवाल्या मंडळांना १४४ कलम लागू करण्यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही त्यांनी केली होती.
गणेश आगमन मिरवणुकीत काही मंडळांनी डॉल्बीसाठी आग्रह धरला होता. यानंतर काही पक्ष आणि संघटनांनी डॉल्बीला परवानगी मिळावी यासाठी मोर्चे, निदर्शने केली आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी डॉल्बीवाली मंडळे आणि डॉल्बी मालकांसाठी विसर्जन मिरवणूक मार्गावर संचारबंदी लागू करण्याची विनंती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी संचारबंदीचा आदेश जारी केला. सोमवारी सकाळपासून ते बुधवारी संध्याकाळपर्यंत याची अंमलबजाणी होणार आहे. डॉल्बी मालकांनी डॉल्बी यंत्रणा स्वतःच्या ताब्यात सीलबंद ठेवावी. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
====
तीन दिवस बारापर्यंत सवलत
ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमानुसार सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतच आवाज मर्यादेत ध्वनीक्षेपकांचा वापर करता येतो. वर्षातील सण-उत्सवांचे ९ दिवस यात सवलत दिली जाते. गणेशोत्सावातील अखेरचे तीन दिवस म्हणजे ३ ते ५ तारखेपर्यंत रात्री बारापर्यंत आवाज मर्यादेचे पालन करून ध्वनीक्षेपकांचा वापर करता येणार आहे. याशिवाय नवरात्रीतील अष्टमी व नवमी हे दोन दिवस, दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि ख्रिसमस या सणांसाठी रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक सुरू ठेवण्यास सवलत दिली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

मलकापूर (ता. शाहुवाडी) शहरातील मनोज त्रब्यंक लाड (वय २४) या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी शिरगांव-सांबू गावाजवळ कडवी नदीवरील बंधाऱ्यात आढळून आला. स्थानिक युवकांच्या मदतीने शाहूवाडी पोलिसांनी हा मृतदेह बंधाऱ्यातील पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी मलकापूर येथे पाठविला. नैराश्यातूनच मनोज याने आत्महत्या केल्याची चर्चा घटनेनंतर शहर परिसरात सुरू होती.

पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मलकापूर (ता. शाहुवाडी) येथील मनोज त्र्यंबक लाड हा युवक गुरुवार (ता. ३१) पासून बेपत्ता झाल्याची फिर्याद चुलते महादेव रामचंद्र लाड यांनी शाहूवाडी पोलिसांत दिली होती. बेपत्ता झाल्यापासून नातेवाईकांसह मित्रांनी मनोजचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो कोठेही आढळून आला नव्हता.

शनिवारी (ता. २) सकाळी सातच्या सुमारास कडवी नदीवरील शिरगाव-सांबू बंधाऱ्यात अज्ञात इसमाचा मृतदेह तरगंत असल्याचे या परिसरातील नागरिकांच्या निर्दशनास आल्यानंतर काही नागरिकांनी शाहूवाडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शाहूवाडीचे पोलीस निरिक्षक अनिल गाडे यांनी अभिजित ऊरूणकर, एम. वाय. पाटील, कुलदीप सूर्यवंशी, राहुल मस्के, सुरेश ढवळे आदी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन बंधाऱ्यात अडकून पाण्यात तरंगणारा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढला. बाबू कोलते, बंडू बेंडके, पिंन्टू लागले आदी युवकांनी पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले.

गोठलेली संवेदनशीलता

बंधाऱ्यात अज्ञात ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृतदेह कुणाचा आहे हे माहीत होण्याआधीच मोबाइलवर या घटनेचे फोटो व चित्रिकरण करून ते व्हायरल केले जात होते.

अॅक्टिव्हा गाडी रस्त्यावरच..

गणेश उत्सव सुरू असल्यामुळे मनोज हा दुर्वा आणण्यासाठी म्हणून गुरुवारी सकाळी लवकर घरातून गेला होता. यावेळी तो आपल्या अॅक्टिव्हा मोटर सायकलवरून गेल्याचे अनेकांनी पाहिले होते. मात्र त्याच दिवशी मनोजची ही दुचाकी गाडी मलकापूर हद्दीतील स्मशानभूमीनजीक कडवी नदी पुलावर किल्ली लावलेल्या स्थितीत उभी आसल्याचे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आढळून आले होते.

आरोग्य केंद्राच्या हद्दीचा वाद

मनोजचा मृतदेह हा शिरगाव सांबू या ठिकाणी सापडल्याने व हे ठिकाण माण (ता.शाहूवाडी) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने मृताचे शवविच्छेदन माण येथेच करण्यात यावे, अशी भूमिका मलकापूर ग्रामीणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली असता काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पो. नि. अनिल गाडे, मलकापूरचे नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक प्रविण प्रभावळकर, किसन चांदणे यांनी पुढाकार घेऊन मलकापूर ग्रामीण रुग्णालयात हे शवविच्छेदन करण्यास संबंधितांना राजी केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

कुटुंबीयांवर दुसरा आघात

तीन महिन्यापूर्वी मनोजच्या चुलत बहिणीचाही मृत्यू झाला असून आज मनोजचाही असा मृत्यू झाल्याचे पाहुन लाड परिवार व नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा ह्रदय पिळवटून टाकत होता. मनोजने नैराश्यातूनच आत्महत्या केली असावी अशी चर्चा शहर परिसरात सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडमुडशिंगीत विहिरीत बुडून दोघा मुलांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय मुलांचा बुडून मृत्यू झाला. गडमुडशिंगी येथे शनिवारी (ता. २) दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रणव राजेंद्र जाधव (वय १३) आणि विवेक विश्वास माणदेशी (१४, दोघेही रा. नरसिंह गल्ली, गडमुडशिंगी, ता. करवीर) अशी मृत मुलांची नावे आहेत. एकाच गल्लीतील दोन मुलांचा मृत्यू झाल्याने गडमुडशिंगीवर शोककळा पसरली. गांधीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रणव आणि विवेक हे दोघेही गडमुडशिंगीच्या नरसिंह गल्लीत राहत होते. प्रणवचे वडील सेंट्रिंग काम करतात, तर विवेकचे वडील चांदी कारागीर आहेत. प्रणव हा गावातील प्राथमिक शाळेत सातवीत शिकत होता. विवेक न्यू हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. सुटी असल्याने हे दोघे शनिवारी दुपारी इतर तीन मित्रांसह दिनकर तिबले यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. विवेकला पोहता येत होते, मात्र प्रणवला पोहता येत नव्हते. काठावर बसलेला प्रणव तोल जाऊन पाण्यात पडल्यानंतर तो गटांगळ्या खाऊ लागला. प्रणव बुडत असल्याचे पाहून विवेक त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र दोघेही पाण्यात बुडू लागले. काठावरील इतर मित्रांनी आरडाओरडा करीत धावत जाऊन चौकातील तरुणांना याची माहिती दिली. दहा ते बारा तरुण तातडीने विहिरीकडे गेले, मात्र तोपर्यंत प्रणव आणि विवेक हे दोघेही बुडाले होते. गावातील राम जाधव, दिलीप शिरगावे, समाधान पाटील, पिंटू जाधव, रामा दांगट या तरुणांनी पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ३० ते ३५ फूट खोल पाणी असल्याने शोध मोहिमेत अडचणी आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट निवडीकडे लागले लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

तालुक्यात मुदत संपलेल्या ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. १४ आक्टोंबर रोजी मतदान तर १६ ला मतमोजणी होणार असून सदस्य निवडीपेक्षा खुल्या गटातील सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे. इच्छुकांनी आत्तापासूनच जनसंपर्क मोहीम सुरू केली असून वातावरण तापत चालले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीबाबतची सूचना तहसीलदारांमार्फत १४ सप्टेंबरला निघेल. त्यानंतरचा तब्बल एक महिना निवडणुकांची रणधुमाळी असेल. यानिमित्ताने गावागावातील राजकीय पक्षांसह विविध प्रकारचे गट-तट सक्रीय झाले आहेत. यावेळी पहिल्यांदाच सरपंच निवड प्रत्यक्ष मतदारच करणार असल्याने अनेकांनी जोरदार तयारी केली आह.

आजरा तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरात साखर कारखाना निवडणुकीनंतर कोणतीही मोठी निवडणूक झाली नाही. त्यामुळे राजकारणातील सार्वजनिक निवडणुकांमधील पहिली पायरी असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक राजकीय नेत्यांनी बाह्या सरसावल्या आहेत. याबरोबरच प्रस्थापितांनीही सर्व प्रकारच्या नितींचा वापर करीत आपापली सत्ता राखण्याचा तसेच सत्तांतर करण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू केला आहे. त्यानुसार तालुक्यातील सोयीच्या राजकीय व्यूहरचना करण्यामध्ये गावागावातील कार्यकर्ते मग्न आहेत. त्यादृष्टीने सध्या जिल्हा स्तरावरून विविध राजकीय पक्षांच्या घडामोडी वेग घेत आहेत. ग्रामस्तरावरील कार्यकर्त्यांच्या तालुकास्तरावरील नेत्यांशी होणाऱ्या बैठका व चर्चांना वेग आला आहे. येत्या दीड महिनाभर तरी हे वातावरण असेच तापत राहणार आहे.

राजकीय पातळीवर सू‌त्रे हलण्यास वेग आल्यानंतर प्रशासनानेही कंबर कसली आहे. छाननीनंतर पाच ऑक्टोंबरला माघार आणि उमेदवार यादीची घोषणा होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी नऊ दिवसांचा अवधी मिळणार आहे. यादरम्यान प्रत्यक्ष निवडणुकांची कार्यालयीन तयारी करण्याचे आव्हान पेलण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभागात कामाला वेग आला आहे.

आजऱ्याचे त्रांगडे कायम

आजरा ग्रांमपंचायतीची नगरपंचायत करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. येत्या आठवडाभरात याबाबतचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याने मंत्रालय व लोकप्रतिनिधी स्तरावर जोरदार पाठपुरावा सुरू आहे. परंतु आजरा ग्रामपंचायतीचीही निवडणूक जाहीर झाली आहे, त्यामुळे इच्छुकांची द्व‌िधा मनस्थ‌िती निर्माण झाली आहे. नगरपंचायतीसाठी प्रसंगी बहिष्कार टाकू असा पवित्राही घेतला जाण्याची शक्यता आहे.

निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायती

आजरा, उत्तूर, भादवण, मडिलगे, धामणे, कोळिंद्रे, बहिरेवाडी, होन्याळी व चाफवडे या मोठ्या गावांवरोबर लाटगाव, दाभील, खेडे, खानापूर, चितळे, शेळप, हाजगोळी बुद्रुक, पारपोली, साळगाव, हाजगोळी खुर्द, मासेवाडी, सरंबळवाडी, कानोली, हारूर, सुळेरान, किटवडे, भादवणवाडी, पेंढारवाडी, पोळगाव, वझरे, वडकशिवाले, गजरगाव, सोहाळे, लाकूडवाडी, श्रृंगारवाडी, झुलपेवाडी, कोरीवडे, आवंडी येथील निवडणुका होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्यविकास विद्यापीठ व्हावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उद्योगक्षेत्रात वाहनांच्या पार्टपासून गुळाच्या गोडव्यापर्यंत आणि दागिन्यांतील मण्यांपासून खाद्यपदार्थाच्या मसाल्यापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या उत्पादनामुंळे कोल्हापूरचे नाव परिचित आहे. सध्या देशपातळीवर चर्चेत असलेल्या कौशल्याधिष्ठीत विकासाचे मूळ कोल्हापूरच्या निर्मिती कौशल्यात आहे. मात्र केवळ कौशल्याला प्रतिष्ठा नसून त्यासाठी पदवी देणारे शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे कोल्हापुरात कौ​शल्यविकास विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे, अशी अपेक्षा सिम्बॉयसिस कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. बं. मुजूमदार यांनी व्यक्त केली. ज्यांनी औद्योगिक क्षेत्रात कौशल्याने नाव कोरले त्या वसंतराव घाटगे यांच्या नावानेच या कौशल्यविकास विद्यापीठाची उभारणी करण्यासाठी कोल्हापूरच्या नेतृत्वाने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राचे स्फूर्तिस्थान कै. वसंतराव घाटगे यांचे संघर्षमय जीवन शब्दबद्ध झालेल्या ‘वसंतवैभव’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ​चरित्रकार भानू काळे होते. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रविवारी सकाळी केशवराव भोसले नाट्यगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास कोल्हापुरातील औद्योगिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. मुजूमदार म्हणाले, ‘सध्याची ​शिक्षणपद्धती काळानुरूप बदलण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षणाचे स्वरूपच बदलले पा​हिजे. त्यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची रचना तयार केली पाहिजे. ती विकसित केली पाहिजे. संपूर्णपणे कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महाविद्यालयांची उभारणी करणे ही काळाची गरज आहे. आपल्या देशात कौशल्य असलेल्या लोकांना दुर्दैवाने त्यांच्याकडे पदवी आहे की नाही या प्रश्नाचे लेबल लावले जाते. पदवीला महत्त्व असल्यामुळे केवळ कौशल्य असलेल्या कारागिरांना सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही. त्यामुळे कौशल्य आणि त्यासंदर्भातील अभ्यासक्रमाची पदवी या दोन गोष्टी जुळून आल्या तर उद्योगक्षेत्रातील निर्मितीच्या कक्षा रूंदावतील. भारत देश हा सर्वाधिक लोकसंख्येच्या पंक्तीतील देश आहे. या लोकसंख्येतील सर्वाधिक संख्या ही तरुणांची आहे. या तरुणाईतील उत्साहाचा सदुपयोग करण्यासाठी कौशल्यविकासावर आधारित शिक्षण देणाऱ्या संस्था उपयुक्त ठरतील. अमेरिकेतील तरुणांच्या तुलनेत भारतात तिप्पट तरुण आहेत. मात्र भारतातील तरुण जगभर विखुरला आहे. त्यांना एकसंध ठेवण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट या संकल्पनेचे जाळे देशभर पसरले पाहिजे. लोकसंख्येचा उपयोग जर लोकसंपत्तीमध्ये रूपांतरित करायचा असेल तर कौशल्य विकसित करणारे शिक्षण देणारी महाविद्यालये, विद्यापीठे उभारली गेली पाहिजेत. जर्मनीमध्ये १६२ तर चीनमध्ये ६२ कौशल्यविकास विद्यापीठे आहेत. विकसित देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जाते. सुदैवाने भारतात सर्वाधिक संख्येने तरुणपिढी आहे. त्यांना केवळ पारंपरिक शिक्षणात गुंतवून न ठेवता कौशल्यविकासावर बेतलेल्या अभ्यासक्रमांकडे वळवले पाहिजे. त्यातूनच करिअरच्या नव्या वाटा तयार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘विद्वत्ता आणि नम्रता या दोन गोष्टी एकाच व्यक्तीच्या स्वभावात असणे दुर्मिळ झाले आहे. विद्वानांना गर्व असेल तर त्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग होत नाही. समाजात क्रायसेस ऑफ कॅरेक्टर हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांचा आदर्श ही समाजाला दिशादर्शक गोष्ट आहे. वसंतराव घाटगे यांच्या आयुष्याचा प्रवास हा आदर्शवतच नव्हे तर मार्गदर्शकही आहे.’

चरित्रकार भानू काळे यांनी ‘वसंतवैभव’ या पुस्तकातील वसंतरावांच्या आयुष्यातील प्रसंग आणि त्यातून यशाकडे जाण्याची त्यांची कसोटी म्हणजे अनुभवांचे विद्यापीठ आहे, अशा शब्दात मनोगत व्यक्त केले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. अनंत खासबारदार यांनी पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे अभिवाचन केले. स्वागत मोहन घाटगे यांनी केले. निवेदन शुभदा हिरेमठ यांनी केले.

धिटाई, कसोटी, सचोटी आणि हातोटी

आयुष्यात कितीही संघर्ष आला तरी चार गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. वसंतराव घाटगे यांनी या चार गोष्टींच्या आधारेच आयुष्यात यशस्वी वाटचाल केली. धिटाई, कसोटी, सचोटी आणि हातोटी या चार मूल्यांचे महत्त्व आजच्या पिढीला समजले पाहिजे. वसंत या नावाप्रमाणे ते नेहमी सकारात्मक विचाराने फुललेले असायचे. घाटगे आणि पाटील कुटुंबीयांच्या आयुष्यात हा ‘वसंत’ फुलला म्हणूनच त्यांची प्रगती झाली. वसंतरावांसारखी माणसं त्यांच्या जाण्यानंतरही प्रेरणास्रोत बनून राहतात. वसंतवैभव या पुस्तकाच्या निमित्ताने हा अनुभव प्रत्येक वाचकाला येईल, अशा शब्दात डॉ. मुजूमदार यांनी विश्वास व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बी रोखण्यासाठी स्पेशल स्कॉड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठीच्या मोहिमेला सार्वजनिक मंडळांकडून प्रतिसाद मिळत असला तरी काही मंडळे छुप्या पद्धतीने मिरवणुकीत डॉल्बी आणण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. या मंडळांना रोखण्यासाठी पोलिसांनी स्पेशल स्कॉडची नियुक्ती केली आहे. हे पथक डॉल्बी जोडण्यापूर्वीच सर्व यंत्रणा जप्त करून गुन्हे दाखल करणार आहे. गुन्हे दाखल झाल्यावर तातडीने कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा कामाला लागली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्यावर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची घोषणा केली. कोल्हापूर परिक्षेत्रात सांगली, सातारा, सोलापूर ग्रामिण, पुणे ग्रामिण या भागात डॉल्बीमुक्तीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र कोल्हापुरात १६ मंडळांनी या मोहिमेला खोडा घातला. या मंडळांविरोधात पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्यावर्षी झालेल्या चुका लक्षात घेऊन यंदा उत्सवात सुरवातीपासूनच पोलिसांनी दक्षता घेतली आहे. राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत पोलिसांनी डॉल्बी रोखला. त्यामुळे अनेक मंडळे डॉल्बीपासून अलिप्त राहिली आहेत.

पोलिस डॉल्बी लावणाऱ्या मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रबोधन करीत आहेत. तरीही अनेक मंडळांनी डॉल्बीचे बुकिंग केले होते. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावून देणार नाही असे स्पष्ट केल्यावर शहरातील नंगीवली तालीम मंडळ, उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम, सुबराव गवळी तालीम मंडळ, क्रांती बॉईज, हिंदवी स्पोर्टस या मंडळांनी डॉल्बी लावणार नसल्याचे जाहीर केले. तरीही काही मंडळे डॉल्बी सिस्टीम आणणार या भूमिकेवर ठाम होती. तर डॉल्बी जोडण्यापूर्वी जप्त करण्याची घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केल्याने अनेक मंडळांनी बुकिंग रद्द केले. त्यानंतर फिरंगाई तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळाने मिरवणुकीत डॉल्बी लावणार नसल्याचे जाहीर केले आहे. अद्याप संयुक्त जुना बुधवार पेठ, दयावान ग्रुप या मंडळांनी भूमिका जाहीर केलेली नाही. काही बडी मंडळे, छोट्या मंडळांना डॉल्बी लावण्यास प्रवृत्त करून छुप्या पद्धतीने मिरवणुकीत डॉल्बी आणतील अशी शक्यता असल्याने विशेष स्कॉड अशा मंडळांवर लक्ष ठेवणार आहे.

पोलिस खबऱ्यांकडून माहिती घेत असून डॉल्बी जोडण्याच्या ठिकाणांवर पोलिसांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. डॉल्बी जोडणारा ट्रॅक्टर, साउंड सिस्टीम जप्त करण्यासाठी पोलिसांची एक टीम कार्यरत झाली आहे. विरोध झाल्यावर कोणती कारवाई करायची याचे आदेशही स्पेशल स्कॉडला दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मिरवणुकीत डॉल्बी येऊन द्यायचा नाही यावर पोलिस लक्ष ठेऊन आहेत. पारंपरिक वाद्ये घेऊन मिरवणुकीत सहभागी होऊन जमावाच्या मदतीने डॉल्बी जोडण्याचा प्रकार यापूर्वीही काही मंडळाने केले. ही शक्यता लक्षात घेऊन एक पथक लक्ष ठेवणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

डॉल्बी लावू नये यासाठी मंडळांचे अखेरपर्यंत प्रबोधन केले जाईल. मिरवणुकीत डॉल्बी येण्यापूर्वीच कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यासाठी आम्ही विशेष पोलिस पथक तयार केले आहे. हे पथक डॉल्बी लावणाऱ्या मंडळांची माहिती घेत आहे.

डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उपअधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखाव्यांनी जागविली रात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रविवारच्या सुटीचा दिवस आणि पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे सायंकाळी सात वाजल्यापासूनच कोल्हापुरातील रस्ते देखावे पाहण्यासाठी गर्दीने फुलून गेले. शेवटचे दोन दिवसच उरले असल्यामुळे देखावे पाहण्यासाठी रविवारी रात्र जागली. पावसानेही उसंत दिल्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही उत्साह आला. राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, लक्ष्मपुरीसह शहरातील सर्वच भागात देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली.

शहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी ऐतिहासिक विषयांसह सामाजिक विषयांवरील सजीव देखाव्यांसमोर टाळ्यांचा गजर, कार्टुन्सच्या देखाव्यांनी बच्चेकंपनीना आक​र्षित केले.

सायंकाळी सहा वाजल्यापासून देखावे पाहण्यासाठी परगावचे नागरिकही दुचाकीवरून येत होते. कसबा बावडा येथून आलेली वाहने दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम परिसरात पार्क करण्यात आली होती. राजारामपुरी, शाहुपूरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, लक्ष्मीपुरी, कसबा बावडा, शनिवार पेठ, रंकाळा परिसरातील हॉटेल्सही फुल्ल झाली. रात्री नऊ नंतर लोंढेच्या लोंढे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले. पार्वती टॉकिज ते राजारामपुरी जनता बझार या मार्गावरील नागरिकांची दुतर्फा गर्दी झाली. राजारामपुरी पहिली गल्लीपासून ते सायबर चौकापर्यंत नागरिकांची गर्दी राहिली. गर्दीमुळे पोलिसांनी सायबर चौक परिसरात वाहनांचे पार्किंग करण्याच्या सूचना केल्या. राजारामपुरीत रात्री एक वाजेपर्यंत ही गर्दी कायम होती. तेथून काही नागरिकांनी कसबा बावडा परिसरातील सजीव देखावे पाहण्यासाठी गर्दी केली. कसबा बावड्यातील देखावेही मध्यरात्रीनंतरही खुले होते. शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठेत मुख्य आकर्षण असलेल्या सजीव देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, साकोली कॉर्नर, रंकाळावेश, गंगावेश मार्गावर अलोट गर्दी झाली. खरी कॉर्नर पासून ते नंगीवली चौकापर्यंत गर्दी राहिली. खासबाग येथील प्रिन्स क्लबचा देखावा, लेटेस्ट तरुण मंडळ, संभाजीनगर मित्र मंडळाच्या श्रीं च्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी केली. हे देखावे पाहण्यासाठी मंगळवार पेठेतील रस्ते गर्दीने फुलून गेले. पावसाने उसंत दिल्याने सहकुटुंब बाहेर पडले. रात्री गर्दीच्या ठिकाणाहून वाहन पार्किंग केलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नागरिकांचा तासभर लागला. ठिकठिकाणी लावलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी झाली.


प्रसाद वाटप

शहरातील प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून प्रसादाची सोय केली होती. मंडळाशेजारीच भव्य मंडप उभे केले होते. या मंडपात प्रसाद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. परगावरून आलेल्या भाविकांना या प्रसादाची सोय झाली. काही मोठ्या मंडळांनी महाप्रसादाचे वाटप केले. उघड्यावरील पदार्थाची विक्री करताना अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने काही खाद्यदार्थांचे स्टॉलची तपासणी केली.

रात्री उश‌िरापर्यंत सिग्नल सुरू

वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत सिग्नल सुरू ठेवण्यात आले. दरवर्षी व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, उमा टॉकिजसह काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने या ठिकाणी रात्री उश‌िरापर्यंत सिग्नल सुरू राहिले. उमा टॉकिज चौकात रात्री साडेनऊ वाजता सिग्नल असूनही वाहतुकीची कोंडी काही वेळ सुरू राहिली. त्याचा फटका वाहनधारकांना बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलले पेठांतील देखावे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह परिसरात सादर होत असलेल्या सजीव देखाव्यांतून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहत आहे. कलाकारांनी सजीव देखाव्यांत ऐतिहासिक पात्रांचे हुबेहूब उभे केलेले प्रसंग पाहताना उपस्थित भारावून गेले आहेत. शिवाजी पेठेत मित्र प्रेम तरुण मंडळाचा कुळवाडी भूषण राजा शिवाजी, उमेश कांदेकर युवा मंचचा छत्रपती चौक, अवचित पीर तालीम मंडळाचा तानाजी मालुसरे, गोल्डस्टार स्पोटर्स असोसिएशनचा व्हिएतनाम, मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाचा महाराणी येसूबाई आदी देखावे प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. पेठांतील सजीव देखाव्यांनी अवघी शिवशाहीच अवतरली आहे. दहा मिनिटे ते अर्ध्या तासांच्या कालावधीचे सजीव देखावे पाहण्यासाठी नागरिक सहकुटुंब आवर्जून थांबत आहेत.

कुळवाडी भूषण राजा शिवाजी

ताराबाई रोडवरील कपिलतीर्थ मार्केट येथील मित्र प्रेम तरुण मंडळाचा कुळवाडी भूषणः राजा शिवाजी हा सजीव देखावा गर्दी खेचत आहेत. स्वराज्य विरोधक खंडोजी खोपडे याचे हात-पाय कलम करण्याचे आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा प्रभावीपणे साकारला आहे. शिवरायांच्या काळातील कायदे आणि त्याची कडक अंमलबजावणी यामुळे स्वराज्याविरोधात जाण्याचे कोणीही धाडस करीत नव्हते. स्वकीय खंडोजी खोपडे यांनी हे धाडस केल्याने त्याचे हात-पाय कलम करण्याचे आदेश शिवरायांनी दिले. हा अंगावर रोमांच उभा करणारा प्रसंगी कलाकरांनी साकारला आहे. देखाव्यात तीन कलाकारांचा सहभाग आहे. तत्कालिन निर्णय आणि कठोर शिक्षा आणि सध्याच्या काळातील राजकारण, भ्रष्टाचारावर परखड टीका केली आहे. शिवरायांच्या काळात शेतकरी राजा होता. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक योजना तयार केल्या. मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची गळचेपी केली जात आहे. शेतकऱ्यांविषयीच्या अनास्थेचे वास्तव प्रेक्षकांसमोर उभे केले आहे. पंचवीस मिनिटांचा सजीव देखावा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देखावा सुरू आहे.

गोल्डस्टारचा व्हिएतनाम आदर्श शिवछत्रपती

शिवाजी पेठेतील गोल्डस्टार स्पोटर्स असोसिएशनने व्हिएतनामचा आदर्श शिवछत्रपती हा सजीव देखावा साकारला आहे. अमेरिकेशी वीस वर्षे युद्ध करुन त्यांना पराभूत करणाऱ्या व्हिएतनाम या छोट्या देशाचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवछत्रपती सातासमुद्रापार पोहोचले. मात्र पाठ्यपुस्तक मंडळाच्या क्रमिक पुस्तकातून त्यांचा इतिहास हळूहळू कमी होत चालला आहे. महाराजांच्या गनिमी काव्याची महती जगभर पसरली. त्यांच्या युद्धतंत्राचा वापर आजही सैन्यदलात केला जातो. शत्रूंपासून बचाव करण्यासाठी गनिमा काव्याचे तंत्र परदेशातही अवलंबिले. हा कार्याचा जागर या देखाव्यातून मांडला आहे. पंधरा मिनिटांचा देखावा आहे. यामध्ये सात कलाकारांचा सहभाग आहे. अवघी शिवशाही शिवाजी पेठेत अवतरल्याचा अनुभव येत आहे. मंडळाचे अध्यक्ष शिवाजी घाटगे, सुनील मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली देखावा सुरू आहे.

महाराणी येसूबाईंच्या

कर्तबगारीचा इतिहास

ऐतिहासिक आणि सामाजिक देखाव्यांतून प्रबोधन हे सूत्र लेटेस्ट तरुण मंडळाने यंदाही जपले आहे. मंडळाने यंदा, महाराणी येसूबाई यांच्या कर्तबगारीचा इतिहास देखाव्यातून मांडला आहे. येसूबाईंचा करारीपणा, सेनापती धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांची राज्यनिष्ठा, स्वराज्यासाठी दिलेला लढा याचे प्रभावी सादरीकरण देखाव्यातून केले आहे. देखाव्यात एकूण ११ पात्रे आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग उठावदार बनले आहेत. विशेष म्हणजे, लेखन, दिग्दर्शक आणि सादरीकरण या सर्वच बाजू मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांभाळल्या आहेत. २२ मिनिटांचा सजीव देखावा प्रेक्षकांना जाग्यावर खिळवून ठेवणारा आहे. उत्सवाला शिस्तबध्दपणा आणि प्रबोधनाची जोड या दोन्ही गोष्टी जोड घालत मंडळाने आपले वेगळेपण कायम ठेवले आहे. हा देखावा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे.


छत्रपती शिवाजी चौक

शिवाजी पेठ रंकाळा टॉवर येथील उमेश कांदेकर युवा मंचचा छत्रपती शिवाजी चौक या सजीव देखावा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. रंकाळा तलाव, पाऊस आणि शिवाजी महाराजांचा अखंड जयघोष अशा वातावरणात छत्रपती शिवाजी चौक हा सजीव देखावा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. मला दगडात कोरलय, तुम्ही दगडासारखे राहू नको, असा संदेश देत छत्रपती शिवाजी महाराज देत आहे. शिवरायांची भूमिका कलाकार हर्षल सुर्वे यांनी साकारली आहे. शिवाजी चौकातील बोलकी दृश्ये साकारणारा सजीव देखावा आहे. अपेक्षित विधायक तत्वे, अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा मावळा आणि भ्रष्टाचार यावर भाष्य करणारा देखावा सादर केला. अध्यक्ष इंद्रनील पाटील, उपाध्यक्ष योगेश साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली देखावा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गायिका रजनी करकरे- देशपांडे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हेल्पर्स ऑफ हॅन्ड‌िकॅप्ड संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ सुगम संगीत गायिका रजनी करकरे-देशपांडे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. श्वसन यंत्रणेतील बिघाडामुळे त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यापासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती पी. डी. देशपांडे आहेत.

करकरे यांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला होता. या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीतक्षेत्रात नाव कमावले. कलांजली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शिष्यांना घडवले. त्यांनी १९८४ मध्ये नसीमा हुरजूक यांच्याबरोबर हेल्पर्स ऑफ दि हॅन्ड‌िकॅप्ड या संस्थेची स्थापना केली. तीस वर्षे या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच आकाशवाणी पुणे, औरंगाबाद, सांगली अशा केंद्रावरून त्यांनी गायनाचे कार्यक्रम सादर केले. तसेच विविध संस्थांच्या निमंत्रणावरून त्यांनी गाण्याच्या मैफिलीही सादर केल्या. त्यांच्या ‘आनंदाचे डोही’ या कार्यक्रमाचे एक हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत. ‘वरात’, ‘हे दान कुंकवाचे’, ‘दैवत’ या सिनेमांसाठी पार्श्वगायनही केले. सुचित्रा मोर्डेकर यांच्याबरोबर कलांजली या संस्थेची स्थापना करून सुगम संगीत मार्गदर्शनाचे वर्ग चालविले. अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी, शर्वरी जाधव अशा शिष्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले.

करकरे यांचे डॉ. सुनीलकुमार लवटे, सुरेश शिपूरकर, नसीमा हुर​जूक, विनोद डिग्रजकर, अरुण जोशी, पवन खेबुडकर सुधीर पोटे, प्रकाश धोपेश्वरकर, चित्रकार सुनील कुलकर्णी, डॉ. मोहन गुणे, उदय कुलकर्णी, डॉ. सुनील पाटील, सुधांशू नाईक यांच्यासह सामाजिक व संगीत क्षेत्रातील अनेकजणांनी अंत्यदर्शन घेतले. अंत्यसंस्कारावेळी संगीत तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

१५ ऑगस्ट आणि स्वातंत्र्यदिन

रजनीतार्इंना वयाच्या पाचव्या वर्षी १५ ऑगस्टलाच पोलिओ झाला होता. अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीतक्षेत्रात नाव मिळविले. पी. डी. देशपांडे यांच्याबरोबर १५ ऑगस्ट या दिवशी त्या विवाहबद्ध झाल्या. हा दिवस माझ्यासाठी नवा स्वातंत्र्यदिन असल्याचे त्या नेहमी सांगायच्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बीमुक्तीसाठी मंडळांना पैशांचे आमिष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘डॉल्बी लावू नये, यासाठी काही मंडळी तालमी व मंडळांना पैसे, विकासकामांची आमिषे दाखविली जात आहेत. तालमी व मंडळाचे स्वाभिमानी कार्यकर्ते ही आमिषे धुडकावून लावतील. कार्यकर्त्यांना कोणीही विकत घेण्याचा प्रयत्न करू नये,’ असा इशारा देत आमदार राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी, यासाठी आमदार क्षीरसागर यांनी शिवाजी चौकात रविवारी सकाळी अकरा ते पाच वेळेत क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांसह लाक्षणिक उपोषण केले. यावेळी केलेल्या भाषणात पालकमंत्र्यांवर त्यांनी टीका केली.

डॉल्बीमुक्त गणेश उत्सवासाठी पोलिस प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा यंदाही जोरदार पुनरुच्चार केला आहे. मिरवणुकीत कोणत्याही परिस्थिती डॉल्बी लावू देणार नाही, घरात जाऊन डॉल्बी जप्त केला जाईल, असा इशाराही पालकमंत्री पाटील यांनी दिला आहे. तर गणेशोत्सवात डॉल्बी नको पण दोन बेस दोन टॉप लावण्यासाठी मंडळांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी आमदार क्षीरसागर यांनी रविवारी सकाळी उपोषणात प्रारंभ केला.

शिवाजी चौकात उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालमी व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भर उन्हात कार्यकर्ते उपोषणास बसले होते. ‘कोण म्हणतोय लावून देणार नाही, लावल्याशिवाय राहणार नाही’,‘गणपती बाप्पा मोरया’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. कार्यकर्त्यांसमोर बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूरची मंडळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार साऊंड सिस्टीम लावण्याची मागणी करत आहेत. पण प्रशासन हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. पण आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही उपोषणाच्या मार्गाने शांततेत आंदोलन करत आहे. डॉल्बीच्या भिंतीना आमचा विरोध आहे, पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दोन बेस, दोन टॉप या साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी, अशी मागणी करत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. वृद्धांना तसेच महिलांना साऊंड सिस्टीमचा त्रास होणार नाही याची मंडळे काळजी घेतील. पण सरसकट डॉल्बीला परवानगी देणार नाही, असे सांगून मंडळांवर अन्याय केला जात आहे. कोल्हापुरची स्वाभिमानी जनता प्रशासनाची दडपशाही कदापही सहन करुन घेणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला

उपोषणात परिवहन समिती सभापती नियाज खान, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, नंदकुमार मोरे, दिगंबर फराकटे, जनता बाजाराचे अध्यक्ष उदय पोवार, दयावान ग्रुपचे अध्यक्ष प्रताप देसाई, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, महेश उत्तुरे यांच्यासह मंडळे व तालमींचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आज घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मिरवणुकीत दोन टॉप दोन बेसला परवानगी द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. सोमवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवाचा आनंदसोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रविवारची, सुटीच्या दिवसाची पर्वणी साधत गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी रात्री उशीरापर्यंत लोटलेल्या गर्दीमुळे शहरातील रस्ते फुलून गेले. पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिक सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले. सजीव देखाव्यांतील गमंत, त्याला होणारी वन्समोअरची मागणी, कलाकारांना दाद देताना होणारा टाळ्यांचा कडकडाट, तांत्रिक देखाव्यांतील कौशल्याची मिळणारी वाहव्वा असे वातावरणात रात्री उशीरापर्यंत होते. राजारामपुरी, शाहुपूरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, लक्ष्मीपुरी, शिवाजी पुतळा, शनिवार पेठेसह कसबा बावडा आणि उपनगरांमध्येही देखावे, मूर्ती पाहण्यासाठी गर्दी लोटली.

रात्री उशिरापर्यंत देखावे सुरू असल्याने विविध ठिकाणी खाद्यपदार्थ्यांसाठी झुंबड उडाली. खाऊ गल्लीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठीही गर्दी दिसत होती. दुचाकी, चारचाकी वाहनांमधून बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. ती सुरळीत होण्यास बराच कालावधी लागत होता. शनिवारच्या पावसामुळे नागरिक छत्र्या घेऊनच देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडले. रविवारी देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. राजारामपुरी पहिली ते तेराव्या गल्लीत हाऊसफुल्ल होती. दररोज रात्री बारा वाजता बंद केले जाणारे देखावे मध्यरात्रीनंतरही सुरू राहिले. त्यामुळे परिसरात यात्रेचा माहौल होता. मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स आणि मार्गावरील चार वॉच टॉवरच्या माध्यमातून पोलिसांची देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर होती. शाहुपूरीत तांत्रिक देखावे पाहण्यासाठी रांगच लागली. उद्यमनगरात काटूर्नमधील पात्रे पाहण्यासाठी बालचमूंची गर्दी झाली. शिवाजी पेठ, मंगळवार पेठेत सादर केलेल्या सजीव देखाव्यांनी रस्ते व्यापले. ताराबाई रोड, रंकाळा टॉवर, अर्धा शिवाजी पुतळा, खरी कॉर्नर येथील देखावे पाहण्यासाठी शेकडो नागरिकांची गर्दी झाली. शिवाजी पेठ, मंगळवार पेठेत सजीव देखाव्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष पेठांत झाला. कसबा बावडा परिसरात सजीव देखावे पाहण्यासाठी गर्दीचा महापूर लोटला. विद्युत रोषणाईने राजारामपुरीत मंडळांनी उभालेले मंदिरांचे सेट्स उजळून निघाले. अनेकांनी येथे सेल्फी काढल्या. राजारामपुरी तालीम मंडळाचा सेल्फी पॉइंट तरुणाईचे मुख्य आकर्षण ठरले. उद्यमनगरातील मॅजिक बॉलभोवती फिरणारी भुते पाहून बच्चे कंपनीचे डोळे विस्फारत होते. रिमोटव्दारे रस्त्यांवर चालणाऱ्या ‘मिनियन्स’भोवती बालचमूंची गर्दी झाली. राजारामपुरी, शाहूपुरी पहिली गल्ली, मिरजकर तिकटी येथील खाऊगल्ली, महापालिकेजवळील खाऊ गल्लीत खवय्यांनी गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्जातच शेतकऱ्याची लूट

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर: कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून १०० ते ३०० रुपयांपर्यंत आकारणी करून अर्ज भरतानाच लूट सुरू आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांचे २ लाख, ७० हजार अर्ज दाखल झाले असून ३ लाख, १० हजार अर्ज भरले आहेत. मोफत अर्ज भरून देणे बंधनकारक असताना पैसे उकळून अडीच ते दोन कोटींचा दरोडाच केंद्रचालकांनी टाकला आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट झाल्यानंतर महसूल प्रशासनास जाग आली असून दोन दिवसांपूर्वी पैसे घेणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाईसाठी प्रत्येक तालुक्यात एका भरारी पथकाची स्थापना केली आहे.

कर्जमाफीसाठी अर्ज ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. त्यासाठी गेले महिनाभर शेतकरी अर्ज भरत आहेत. ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार, महा- ईसेवा केंद्र यांच्यासह १११० ठिकाणी अर्ज भरून घेतले जात आहेत. याशिवाय थम्ब मशीन असलेले खासगी इंटरनेट कॅफेचालकही अर्ज भरून घेत आहेत. सरकारी केंद्र चालकांना प्रत्येक अर्जास सरकार दहा रुपये देणार आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना मोफत अर्ज भरून देणे सक्तीचे आहे. मात्र अपवाद वगळता सर्वच ठिकाणी खुलेआम पैसे घेतले जात आहेत. १०० ते ३०० रुपये आकारले जात आहेत. खासगी इंटरनेट कॅफे चालकांनी बाहेर शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरून दिले जातील, असा मोठा फलक लावले आहेत.

ऑनलाइन अर्ज भरताना शेतकरी पती, पत्नीचे आधार क्रमांक व बोटांचे ठसे आवश्यक आहे. त्यामुळे घरातील प्रापंचिक कामे सोडून पत्नीसह शेतकरी कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी केंद्रावर जातो. तेथे अर्ज भरण्याची सुरुवात करण्यापूर्वीच केंद्र चालक पैसे किती घेणार ते स्पष्टपणे सांगतो. मोफत आहे, पैसे का असे सांगितल्यानंतर अर्ज भरण्यास नकार मिळतो. पुन्हा घरी जाऊन दुसरे केंद्र शोधण्यात वेळ आणि पैसे खर्च होतात. परिणामी मागेल तितके पैसे देण्याची मानसिकता शेतकऱ्यांची होत आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून अशाप्रकारे मनमानी लूट सुरू आहे. पैसे घेऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेली महसूल यंत्रणा सोयीस्करपणे बघ्याच्या भूमिकेत राहिली. केंद्र चालक मालामाल झाले. त्यातील काही वाटा सरकारी यंत्रणेला मिळत आहे. याउलट शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसली.

चोरीनंतर जाग

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. जिल्ह्यातील केवळ २० ते २५ हजार शेतकरी अर्ज भरण्याचे शिल्लक राहिले आहे. अशा टप्यात पैसे घेणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केली आहे. पैसे घेताना आढळल्यास जाग्यावर परवाना रद्द करण्याचा आदेश पथकास देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात पावनेतीन लाख शेतकऱ्यांची लूट झाल्यानंतर भरारी पथकाची स्थापना करणे म्हणजे चोरी झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी गेल्याचा प्रकार महसूल यंत्रणेकडून झाल्याचा आरोप होत आहे.

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कमीत कमी १०० रुपये घेतले जात आहे. न दिल्यास अडवून होत आहे. नाईलाजास्तव शेतकरी पैसे देत आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. कर्जमाफी मिळण्याआधीच शेतकऱ्यांची होत असलेली लूट संतापजनक आहे.

बंडू पाटील, शेतकरी

कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज मोफत भरून देणे आवश्यक आहे. पैसे घेत असल्याच्या तोंडी तक्रारी आल्या आहेत. लेखी तक्रार आल्यास कारवाई करणे सोपे होणार आहे. पैसे घेणाऱ्या केंद्रावर कारवाई करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केली आहे.

पवन पाटील, व्यवस्थापक, आपले सरकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणूक मार्गावर पोलिस संचलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी मिरवणूक मार्गावर संचलन केले. संचालनात एसआरपीची‌ दोन पथके सहभागी झाली होती. मिरजकर तिकटी येथून विसर्जन मार्गावर संचलनास प्रारंभ झाला. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दल आणि सीआरपीएफची पथके एकत्र आल्यानंतर संचलन सुरू झाले.

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाला मंडळे व तालमींचा प्रतिसाद मिळू लागला आहे. मिरवणुकीला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, यासाठी पोलिस प्रशासन दक्ष आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मिरजकर तिकटी येथून पोलिस संचलनास प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी पोलिस बँड होता. पोलिस बँडवर देशभक्तीपर गीते वाजवण्यात आली. स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी, एसआरपीची दोन पथके होती. त्याचबरोबर तीन स्ट्रायकिंग फोर्स सहभागी झाली होत्या. संचलनात जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भुजबळ, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय साळोखे, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिस कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड,पापाची तिकटी मार्गे गंगावेश येथे संचलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images