Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जनता बझारवर सत्तारूढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्सच्या (जनता बझार) पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारुढ रत्नाप्पाण्णा कुंभार विकास आघाडीने १९ पैकी १५ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. चार अपक्ष विजयी उमेदवारांपैकी तीन उमेदवार विद्यमान चेअरमन उदय पोवार गटाचे समर्थक असल्याने पोवार यांनी जनता बझारवर एकतर्फी वर्चस्व मिळवले आहे. निवडणुकीत विद्यमान संचालक प्रल्हाद चव्हाण व बाळासाहेब कुंभार यांच्या पराभव झाला असून एकप्रकारे आमदार सतेज पाटील यांच्या गटाला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी जबदरस्त धक्का दिला आहे. निवडणुकीत नऊ विद्यमान संचालकांसह दहा उमेदवारांना प्रथमच संधी मिळाली आहे.
जनता बझारच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी सकाळी ८ ते ४ वेळेत मतदान झाले. एकूण २३७३ मतदारांपैकी केवळ ८७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. केवळ ३७ टक्के मतदान झाल्याने निवडणुकीतील केवळ औपचारिकता बाकी होती. तरीही विकास पॅनेलमधील उमेदवारांचे भिन्न-भिन्न चिन्हे असल्याचे निकालाबाबत उत्सुकता लागली होती. केवळ तासाभरात मतमोजणी पूर्ण होऊन पोवार यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले.
निवडणुकीमध्ये दोन पॅनेल होणार असल्याने पोवार यांना कपबशी तर चव्हाण यांना विमान चिन्ह मिळाले होते. चिन्हवाटप झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सर्व जुने संचालक एकत्र येऊन विकास आघाडी आकाराला आली होती. त्यामध्ये दोन जागा कर्मचारी प्रतिनिधींनाही देण्यात आल्या होत्या. मात्र प्रचारांदरम्यान पोवार यांनी चिन्हांचा खुबीने वापर करुन राजकीय खेळीद्वारे चव्हाण व कुंभार यांना शह दिला. अपक्ष निवडून आलेले वैभव पोवार, आकाराम पाटील, बिपिन जाजू यांचेही चिन्ह कपबशी असल्याचा फायदा घेत चव्हाण, कुंभार यांच्यासह कर्मचारी प्रतिनिधी मधुकर चित्रुक यांचा पत्ता कापला. ‘क’ वर्ग गटातून पोवार समर्थक प्रकाश खुडे यांना केवळ एक मताने पराभव पत्करावा लागाला. या गटात आमदार पाटील समर्थक रमेश उलपे यांनी बाजी मारत गटाचे अस्तित्व राखले.
सर्व कर्मचारी व चव्हाण यांना सोबत घेऊन आमदार पाटील यांनी पॅनेल करण्याचा निर्धार केला होता. पण चव्हाण यांनी ऐनवेळी महाडिक यांची भेट घेऊन गोंधळ निर्माण केला. सचिन चव्हाण यांच्या उमेदवारी जोरदार विरोध करत महाडिक यांनी पोवार यांच्यामागे सर्व ताकद लावली होती. अखेर चव्हाणही महाडिक यांच्याकडे गेल्यानंतर आमदार पाटील गटाची हवा गेली होती. त्याचाच फायदा घेत पोवार यांनी पॅनेलमध्ये तब्बल १४ समर्थकांनी संधी दिली होती. त्यातील खुडे वगळता सर्व उमेदवार विजयी झाले असून चार अपक्षांपैकी तीन विजयी उमेदवार पोवार समर्थक असल्याने त्यांनी जनता बझारवर एकतर्फी वर्चस्व मिळवले आहे. निवडणुकीच्या माध्यमातून मात्र महाडिक यांनी आमदार पाटील गटाला जबरदस्त शह दिला आहे.

पॅनेलच्या विजयामध्ये महादेवराव महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार विनय कोरे यांची मदत मिळाली. निकालातून आम्ही ‘अजिंक्यतारा’ला ताकद दाखवून दिली आहे. पुढील काळात सर्व संचालकांना सोबत घेऊन जनता बझारला गतवैभव मिळवून देऊ.

उदय पोवार, पॅनेल प्रमुख

महाडिकांची खेळी यशस्वी

पॅनेल रचनेमध्ये आमदार सतेज पाटील यांचे समर्थक असलेल्या प्रल्हाद व सचिन चव्हाण पितापुत्रांना घेण्यास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोध केला होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या मध्यस्थीने प्रल्हाद चव्हाण यांची पॅनेलमध्ये वर्णी लागली होती. चव्हाण व बाळासाहेब कुंभार यांना पॅनेलमध्ये घेताना वैभव पोवार व बिपिन जाजू यांचा पत्ता कट केला होता. पोवार व जाजू पॅनेलमध्ये नसले, तरी चिन्ह कपबशी असल्याने त्यांचा मार्ग सोपा झाला होता. या चिन्हांमुळेच चव्हाण व कुंभार यांचा पराभव झाला असला, तरी महाडिकांची ही खेळी यशस्वी झाल्याचे दुपारी त्यांनी मतदान केंद्रावर लावलेल्या उपस्थितीने स्पष्ट झाले होते.

पिता-पुत्र व पती-पत्नीला संधी

जनता बझारच्या निवडणुकीत प्रथम पिता-पुत्र व पती-पत्नीला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये विद्यमान चेअरमन उदय पोवार यांच्या बरोबर त्यांचा मुलगा वैभव याला संधी मिळाली आहे. तर विद्यमान संचालक प्रकाशराव बोंद्रे यांच्यासह सुहास बोंद्रे यांनी विजय मिळवला आहे. संचालक मधुकर शिंदे यांच्या पत्नी तृप्ती या देखील विकास आघाडीतून निवडणूक आल्या आहेत.

कर्मचारी ते संचालक

किणी येथील विद्या माळी यांनी जनता बझारमध्ये अकाउंट विभागात २० वर्षे काम केले आहे. जनता बझारमधील कर्मचारी कमी केल्यानंतर माळी यांनी निवृत्ती घेतली. पॅनेल रचनेमध्ये कर्मचाऱ्यांना प्रतिनिधीत्व दिल्यानंतर माळी यांची वर्णी लागली होती. त्यामध्ये माळी यांनी विजय मिळवला असून कर्मचारी चित्रुक यांना मात्र पराभव पत्करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चंदनशिवेचे ३८ कॉल संशयाच्या भोवऱ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील आठ कोटी १८ लाख रुपयांची लूट करणाऱ्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवेने लुटीच्या काळात कोल्हापूरसह अनेक ठिकाणी विशिष्ट लोकांशी कॉल केल्याचे उघड झाले. सीआयडीच्या तपासात ३८ कॉल संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चंदनशिवेने कॉल केलेल्या व्यक्तींचे पत्ते शोधण्याचे काम सीआयडीने सुरू केले आहे. संबंधितांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

पन्हाळा येथील कोर्टात या गुन्ह्यातील संशयित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे शरण आले. कोर्टाने त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिसांनी घनवट, चंदनशिवे यांची कसून चौकशी सुरू केली आहे. साक्षीदार आणि पुरावे शोधण्याचे काम गतीमान केले आहे. घनवट, चंदनशिवे यांनी १३ मार्च २०१६ रोजी वारणेतून सहा कोटी रुपये तर १५ मार्च रोजी ३ कोटी १८ लाख रुपयांची लूट केली होती. १३ मार्च ते २० मार्च या कालावधीत चंदनशिवे याने अनेकांशी संभाषण केले. त्यातील ३८ व्यक्तींशी तो बराच वेळ बोलत असल्याचे निदर्शनास आले. ३८ कॉल्सपैकी काही कॉल कोल्हापुरात केले आहेत. यातून चंदनशिवेचे कोल्हापूर कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे. लूट करताना चार वाहनांचा वापर केला होता. त्यात दोन सरकारी तर दोन खासगी वाहनांचा वापर केला होता. खासगी वाहने जप्त करून त्यांच्या चालकांची चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, सीआयडीने पोलिस निरीक्षक घनवट याला सांगली येथे रविवारी चौकशी नेले होते. सीआयडीने सांगली येथे घनवट याच्याशी संबधित दोन ठिकाणी धाडी टाकल्या. या ठिकाणी काही गोपनिय कागदपत्रे सापडली आहेत. घनवट, चंदनशिवेने खबऱ्यांना रोख रक्कम बक्षिस म्हणून दिली असे तपासात पुढे आले आहे.

००००

जबाबाचे व्हिडिओ शू​टिंग

सीआयडीने घनवट, चंदनशिवेचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घनवटचा जबाब सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी घेतला. हे जबाब घेताना व्हिडिओ शूटिंग घेण्यात आले. व्हिडिओ शूटिंगसाठी कोल्हापूरच्या सायबर शाखेची मदत घेण्यात आली.

चंदनशिवेचे तीन जिल्ह्यात वास्तव्य

वारणा लूट प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी सांगली पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केले. सात संशयित पोलिस गायब झाले होते. चंदनशिवे हा अहमदनगर, पुणे, सोलापूर येथे वास्तव्यास होता. त्याने मोबाइल स्वीच ऑफ केला होता. या कालावधीत त्याने कोणता मोबाइल वापरला याचा शोध पोलिस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल-डिझेलच्या लुटीचे रॅकेट

$
0
0

प्रकाश कारंडे, कोल्हापूर

आजघडीला पेट्रोल-डिझेल ही जीवनावश्यक बाब बनली आहे. ‘मापात पाप’ करून ग्राहकांना लुबाडणारे पेट्रोल पंपचालक-अत्याधुनिक चीप बसवून केली जाणारी लूट या साखळीचा नुकताच पर्दाफाश झाला. त्यानंतर राज्यभर पेट्रोल पंपांची तपासणी सुरू झाली. प्रत्यक्षात डेपोपासून ग्राहकाला वितरीत होईपर्यंत अनेक ठिकाणी पेट्रोल चोरणाऱ्या टोळ्याच कार्यरत आहेत. गेली पाच दशके चोरी-छुपे या टोळ्यांनी पेट्रोल चोरून त्याचा भार ग्राहकांच्या माथी मारला.

भारतात सद्यस्थितीत पेट्रोल-डिझेलच्या व्यवसायात सरकारी एच. पी.सी.एल, बी. पी. सी. एल. आणि आय. ओ. सी.एल. अशा तीन कंपन्या तर रिलायन्स, इस्सार आणि शेल अशा तीन खासगी कंपन्या कार्यरत आहेत. सरकारी कंपन्यांची भारतभर वितरण केंद्रे आहेत, तर काही कंपन्यांनी स्वत: पाइपलाइनद्वारे हजारो किलोमीटर पेट्रोल वाहतुकीची व्यवस्था केली आहे. एच. पी. सी. एल.ने मुंबई, पुणे, हजारवाडी (तासगाव), तेथून सोलापूर अशी पेट्रोल-डिझेल-रॉकेल वाहतुकीसाठी पाइपलाइनची व्यवस्था केली आहे. तर रेल्वेनेही त्याची वाहतूक होते. या सर्वच ठिकाणी कार्यरत असलेल्या टोळ्यांकडून वाहतुकीतच डल्ला मारला जात असल्याचे वास्तव आहे.

यापूर्वी पेट्रोल-डिझेलची वाहतूक रेल्वेने केली जात होते. आयओसीएल, बीपीसीएल या दोन्ही कंपन्यांची सध्या पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक रेल्वेमधून होत असताना मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे मध्यंतरी उघडकीस आले होते. तर जमिखाली आठ ते दहा फुटांवर असणाऱ्या पाइपलाइनलाही आडमार्गानेच निर्जन आणि जंगलांच्या ठिकाणी छिद्रे पाडून त्याला पाइप जोडून चोऱ्या केल्या जातात. पनवेल ते पुणेदरम्यान अलिकडेच पोलिसांनीच अशा पद्धतीच्या चोऱ्या उघड केल्या आहेत.

पाइपलाइनमधून पेट्रोल-डिझेल मिरज आणि हजारवाडी येथील डेपोत आणल्यानंतर येथून कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगली आणि साताऱ्याच्या काही भागात ५०० ते ६०० टँकरद्वारे वितरीत होते. डेपोतील ५ ते १० लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलच्या सुरक्षेसाठी खासगी व्यवस्था स्वरुपाची आहे. हाही यातील गंभीर प्रकार आहे. डेपोमध्ये अत्याधुनिक वितरण व्यवस्था पूर्णपणे बसवण्यात आली आहे. ऑटोमायझेशन पद्धत वापरली गेली आहे. येथे मुख्य वितरण अधिकाऱ्याकडे तांत्रिक, मॅकेनिकल, सॉफ्टवेअर, पोल्युशन, इंजिनीअर आणि अग्निशमन दल अशा विविध विभागांचा ५० जणांचा स्टाफ कार्यरत आहे. सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कामकाज चालते. यापूर्वी सुरू असलेले मॅन्यूअलऐवजी ऑटोमायझेशन वितरण केले जाते. येथे पाइप अथवा यंत्रात छेडछाड केल्यास कंट्रोल रुमला त्याची त्वरीत माहिती कळते. तरीही येथे पाइपलाइनमधून चोऱ्या केल्या जातात. स्वयंचलित यंत्रांना सरकारच्या वैधमापन विभागाकडून स्टँम्पिंग केले जाते. तरीही या यंत्रणेत बिघाड होतो की केला जातो याचे उत्तर आजपर्यंत कोणालाही कळलेले नाही.

पेट्रोलपंप मालकांच्या चोऱ्या तपासणारे आजपर्यंत कधीच याठिकाणी पोहचलेले नाहीत. याबाबत काही पंपमालकांनी तक्रारी करूनही त्याची दखल कंपनी आणि वितरण केंद्रांनी घेतलेली नाही. विशेष म्हणजे माल भरणारी यंत्रणाही खासगीच आहे. एकाचवेळी पाच ते सहा टँकर भरता येतात. टँकर भरतानाही घोळ केला जातो. प्रत्येक बारा आणि २० हजार लिटरच्या टँकरमध्ये डिझेल आणि पेट्रोलचे चार समान कप्पे असतात. त्यात वितरण केल्यानंतर ‘डिप’ टाकून तपासले जाते. यावेळी तफावत आढळतेच. त्यामुळे अॅटोमटयझेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते. पेट्रोल पाच ते दहा लिटर कमी असल्यास ते दिले जात नसल्याच्या तक्रारी वाहतूकधारकांच्या आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी होऊनही त्याची दखल घेतली गेलेली नाही.

टेंडरमधील हुकूमशाही

टँकरमधून पेट्रोल व डिझेल वितरणाच्या दोन व्यवस्था आहेत. एक म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांचे टँकर आणि दुसरीकडे पेट्रोल पंपमालकांचेच टँकर. ते आपल्याबरोबर इतरानांही वितरण करतात. त्याचे टेंडर दर ३ अथवा ५ वर्षांनी निघते. या यंत्रणेवर कंपन्यांनीच पूर्णपणे ताबा घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे सांगतील त्याच दरात टेंडर भरावे लागते. कमी दराने वितरण व्यवस्था करावी लागते. यातूनच चोरीचा उगम होतो असे सांगण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणेकर यांना पुन्हा मंदिराबाहेर काढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात धार्मिक विधी, वारासाठी आलेल्या पुजारी बाबूराव ठाणेकर यांना जिजाऊ ब्रिगेडच्या महिला रविवारी गाभाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी आक्रमक झाल्या. देवीला घागरा-चोली पेहराव नेसवल्याप्रकरणी पुजारी अजित ठाणेकर यांना मंदिरात प्रवेश बंदी असली तरी त्यांचे वडील बाबूराव यांनाही मंदिरात प्रवेश देऊ नये या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यासाठी आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसून ठाणेकर यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

रविवारी दुपारी साडेबारा वाजता भाविकांची गर्दी असताना मंदिरातील पेटी चौकात झालेल्या या गोंधळामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी पोलिसांनी बाबूराव ठाणेकर यांना पोलिसांनी बाहेर काढत घरी नेले.

जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना बाबूराव ठाणेकर हे मंदिराच्या गाभाऱ्यात असल्याची माहिती दुपारी मिळाली. पोलिसांना घेऊनच ते मंदिरात आले असल्याचे समजताच महिला ठिय्या आंदोलनातून बाजूला येऊन थेट मंदिरात गेल्या. पेटी चौकात एकत्र येत महिलांनी ठाणेकर यांना मंदिराबाहेर येण्यासाठी घोषणाबाजी सुरू केली. उपस्थित असलेल्या अन्य पुजाऱ्यांनी ठाणेकर गाभाऱ्यात नसल्याचे सांगितले. मात्र, ठाणेकर गाभाऱ्यातील देवीच्या स्नानगृहाजवळ असल्याच्या माहितीवर महिला कार्यकर्त्या ठाम राहिल्या. ठाणेकर यांना गाभाऱ्यातून बाहेर काढले नाही, तर पेटीचौकातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महिला कार्यकर्त्यांनी दिला. गेल्या दोन दिवसांपासून ठाणेकर मंदिरात येत आहेत. त्यामुळे शांतता भंग होत आहे. मूर्तीला घागरा-चोली पेहराव नेसवल्याप्रकरणी ठाणेकर पितापुत्रांवर भाविकांचा रोष असून त्यांना मंदिरात प्रवेश न देण्याची मागणी करण्यात आली. अखेर पोलिसांनी ठाणेकर यांना मंदिरातून बाहेर आणल्यानंतर महिला अधिकच संतप्त झाल्या आणि त्यांनी पोलिसांना धारेवर धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा विकासासाठी पुढाकार घेऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापुरातील तालीम संस्था सामाजिक एकतेचे प्रतीक समजल्या जातात. समाजात एकसंध वृत्ती टिकवतानाच मर्दानी खेळाची परंपरा जपण्यास तालीम संस्थांनी पुढाकार घ्यावा, सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश क्षीरसागर होते. आमदार क्षीरसागर यांनी खंडोबा तालीम मंडळाच्या व्यायामशाळेसाठी दहा लाख रुपयांच्या ​निधीची घोषणा केली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापुरातील खेळाडूमध्ये प्रचंड टँलेंट असून आगामी ऑलम्पिकमध्ये शहरातील आठ खेळाडूंचा प्रवेश होईल इतकी क्षमता आहे. अशा खेळाडू आणि खेळाच्या विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही. शहरातील सर्वच तालीम संस्थांनी अंतर्गत सुधारणेबरोबरच इमारती दर्शनी भागातही आकर्षक आणि देखण्या कराव्यात. त्यासाठी निधीची देऊ. शिवकालीन मर्दानी खेळाचे जतन करणाऱ्या तालीम संस्थांनी करावे. गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय, खेळाडूंच्या विकासाला प्राधान्यक्रम द्यावे. उपनगरात मोकळया जागेत बागा, मंदिराची उभारणी करुन सामाजिक सुखासाठी सुविधा निर्माण कराव्यात.’
खासदार धनंजय महाडिक म्हणाले,‘ खंडोबा तालीम मंडळाने क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविला आहे. मंडळाने शिवाजी पेठेला साजेशी इमारत साकारली आहे. मंडळाने व्यायामशाळा, ग्रंथालय सुरू करून नवीन पिढी सदृढ व संस्कारक्षम बनवावी.’
आमदार चंद्रदीप नरके यांनी भाषणात तालीम संस्थाचा गौरवोल्लेख केला. आपली राज्य सरकारच्या क्रीडा समितीच्या सदस्यपदी निवड झाली असून सर्व संघटनांना एकत्र आणून खेळाचा विकास साधू अशी ग्वाही दिली. यावेळी चारही लोकप्रतिनिधीसह शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक, नगरसेवक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, भाजपाचे महेश जाधव, अॅड. धनंजय पठाडे, संभाजीराव पाटील (चंदूरकर), बबन कोराणे, सुजित चव्हाण आदींचा सत्कार झाला. मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश पोवार, राजेंद्र चव्हाण, अरुण दळवी, अरुण पोवार, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रल्हाद पोवार, सुरेश जरग, अनिल करवते, पंडीत पोवार आदींच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार झाला. प्रारंभ शाहीर संभाजी गुरव, दिलीप सावंत, पोपट वाघे यांनी शाहिरी व स्वागत गीतातून मंडळाची परंपरा व पावित्र्य जपण्याविषयीची साद घातली.

वस्तादांना दहा हजार पेन्शन मिळावे

आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाषणात रंकाळा तलाव सौंदर्यीकरण व गांधी मैदानाच्या सुसज्जतेसाठी सरकारने निधी उपलब्ध करावा. मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक शिकवणाऱ्या वस्तादांना सध्या कुठल्याही स्वरुपात आर्थिक मदत मिळत नाही. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अशा वस्तांदासाठी दरमहा दहा हजार रुपये पेन्शन सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली.

तालमीत व्यायामशाळा, अभ्यासिका

तालीम मंडळाचे अध्यक्ष विक्रम जरग यांनी लोकसहभागातून तालमीच्या इमारतीचे नूतनीकरण केले आहे. लोकप्र​तिनिधीपासून समाजातील प्रत्येक घटकाने इमारतीच्या नूतनीकरणासाठी आर्थिक सहकार्य केले. मंडळाला फुटबॉल, लाठीकाठी या खेळाची परंपरा आहे. तालमीच्या नव्या इमारतीत अद्ययावत व्यायामशाळा, दुसऱ्या मजल्यावर वाचनालय सुरू करण्यात येईल, असे जरग यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० हजारहून अधिक लोक जाणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई येथे ९ ऑगस्टला निघणाऱ्या सकल मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातून सुमारे ५० हजारांहून अधिक लोक जाणार आहेत. मोर्चाचे नियोजन करण्यासाठी कोल्हापुरातील एक पथक जाईल. पश्चिम महाराष्ट्रातून वाहनांतून जाणारे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गाचा वापर करतील. त्यामुळे ८ ऑगस्टला दिवसभर आणि रात्रभर महामार्गावर वाहतुकीची कोंडी होणार आहे. चारचाकी वाहने पनवेल, वाशीपर्यंतच सोडली जाणार आहेत. यामुळे अधिकाधिक लोकांनी रेल्वेने जाण्याला प्राधान्य द्यावे. रेल्वेने गेल्यास आझाद मैदानात मोर्चाच्या ठिकाणी सहज पोहोचता येईल, अशी माहिती प्रा. जयंत पाटील, दिलीप देसाई, राजू ‌‌लिंग्रज यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘रेल्वेने गेल्यास शेवटचा स्टॉप छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे. आझाद मैदानाजवळ हे ठिकाण आहे. त्यामुळे रेल्वेने जाणे सोयीचे होईल. रेल्वेला होणारी गर्दी विचारात घेऊन जादा डबे जोडण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. मोर्चाचे स्टिकर्स‌ ‌किंवा झेंडा लावलेल्या कोणत्याही वाहनांना टोल आकारला जाणार नाही आणि देऊही नये. नादुरूस्त वाहन बाजूला काढण्यासाठी पुणे ते मुंबईपर्यंत वाहतूक पोलिसांनी क्रेनची सोय केली आहे. दुरुस्तीसाठी मेकॅनिकही असतील. कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या कार, बस व अन्य चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय एपीएमसी मार्केट (वाशी) येथे केली आहे.

दर अर्धा तासाला लोकल ट्रेन आहे. त्या स्थानिक सुट्टी जाहीर केल्याने लोकलला मुंबईकरांची गर्दी नसेल. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी लोकल रेल्वेतून मोर्चास्थळी पोहोचावे. स्वतंत्र वाहनाने जाणाऱ्यांनी ९ ऑगस्टला सकाळी सहापूर्वी पोहोचावे. प्रत्येक कार्यकर्त्याने सोबत पाणी बाटली, दोन दिवस पुरेल इतके जेवण, छत्री, भगवा झेंडा, चादर घेऊन जावे. मुंबई हॉटेल असोसिएशनने शक्य तितक्या उशिरा हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस प्रशासनही सहकार्य करणार आहे. एकत्रित गेलेल्यांनी एकमेकांना आपला मोबाइल क्रमांक द्यावा. मुंबईत राहण्याची सुविधा असलेल्यांनी आदल्या दिवशीच पोहोचावे. परतीच्यावेळी लवकर बाहेर पडणे शक्य होणार नसल्याने चारचाकी मुंबईत नेणे टाळावे.

काळजी घेण्याची विनंती

लोकलमधून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. चढताना, उतरताना सतर्क राहावे, असे आवाहन देसाई यांनी केले. गर्दीमध्ये हरवल्यास संबंधित पोलिस ठाण्यात जावे. तेथून कोल्हापूरपर्यंत आणण्याची सोय केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

चर्चा नाही, मोर्चाच

सरकारशी कोणत्याही प्रकारची आता चर्चा नाही. थेट मोर्चाच निघेल. मुंबईच्या इतिहासात हा सर्वांत मोठा मोर्चा असेल. मोर्चाच्या ठिकाणीच सरकारच्या प्रतिनिधींनी मागण्यांसंबंधी चर्चा करावी, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.

मोठ्या संख्येने जाण्याचा निर्णय

मोर्चाला करवीर तालुक्यातून मोठ्या संख्येने स्वखर्चाने जाण्याचा निर्णय मेळाव्यात झाला. शाहू स्मारक भवनमध्ये बैठक झाली. यावेळी तालुका पातळीवर समिती स्थापन करण्यासंबंधी सर्वच वक्त्यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या टप्यात १२ जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. यावेळी बाजीराव खाडे, विजय भोसले, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, बाळासाहेब देवकर, हिंदुराव तोडकर, सर्जेराव पाटील, अमर पाटील आदी उपस्थित होते.

आर. के. नगरातून रॅली

मोर्चाच्या जनजागृतीसाठी आर. के. नगर प‌रिसरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. प्रा. जयंत पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, आर. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली मोरेवाडी, रूमाले माळ, सहजीवन सोसायटी, पाचगाव या मार्गावरून काढली. रणवीर चव्हाण, अमोल गायकवाड, संदीप गाडगीळ, संग्राम पोवाळकर, गजानन मनगुतकर, जयवंत शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हीतून सामान्य प्रशासन ‘गायब’

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषदेतील कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येण्यासाठी पहिल्या टप्यात चार विभागात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. मात्र मुख्यालयातील सर्व विभाग, बारा पंचायत समिती प्रशासनाला शिस्त, पारदर्शक कामकाज करून घेण्याची जबाबदारी असलेला सामान्य प्रशासन विभाग सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या यादीतून गायब झाला आहे. विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागानेच ही यादी तयार केली आहे.

बदली, कालबद्ध पदोन्नती, निलंबित कर्मचाऱ्यांना सहा महिन्यानंतर कामावर हजर करून घेणे, नियुक्तीचे ठिकाण देणे, रिक्त जागा भरून घेण्याची प्रक्रिया राबवणे, तक्रार असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई प्रस्तावित करणे यासह सर्व विभागात गतिमान, पारदर्शक कारभार करून घेण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागची आहे. बदली, बढती, भरती, निलंबित कर्मचाऱ्यांची फेरनियुक्तीमुळे हा विभाग चर्चेत असतो. या विभागावर अर्थपूर्ण व्यवहाराचे आरोप झाले आहेत. या विभागाच्या कारभारावर सर्वसाधारण सभेत चर्चा होते.

करवीर पंचायत समिती लिपिक बाळकृष्ण गुरव यांच्या आत्महत्याप्रकरणात सामान्य प्रशासन विभाग टीकेचा लक्ष्य बनला. या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यावर कर्मचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले. कर्मचाऱ्यांमधील सामान्य प्रशासनमधील कामकाजाविरोधात सार्वत्रिक असंतोष बाहेर पडला. या पार्श्वभूमीवर प्रथम सामान्य प्रशासन विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अप‌ेक्षित होते. मात्र ही यादीच या विभागाने तयार केल्याने आपला विभाग टाळून अन्य विभागांत कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव तयार केला. यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, वित्त आणि समाज कल्याण अशा चार विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत झाला. त्यासाठी स्व-निधीतून दहा लाखांच्या निधी खर्चाला मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमघून निधी मिळाल्यानंतर सर्व विभागात कॅमेरे बसवण्यात येणार आहे.

‘सामान्य प्रशासन’चा प्रभाव

सामान्य प्रशासन सुधारल्यास त्याचा चांगला परिणाम सर्वच विभागात दिसतो. तोच बिघडल्यास ‌इतर विभाग मनमानी कारभार करतात. परिणामी प्रशासन विस्कळीत होते. त्यामुळे ‘सामान्य प्रशासन’ सीसीटीव्हीच्या कक्षेत आल्यास प्रशासनाला शिस्त लागेल असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा जनक्षोभास प्रशासन जबाबदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अंबाबाई मूर्तीला घागरा चोरी पेहराव नेसवून भाविकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी शिक्षा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुजारी अजित ठाणेकर यांना मंदिरात प्रवेशबंदी केली आहे. तसेच बाबूराव ठाणेकर यांनीही मंदिरात जाऊ नयेत अशा सूचना दिल्या आहेत. तरीही गेल्या तीन दिवसांपासून बाबूराव ठाणेकर वारासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात येत आहेत. मनमानी कारभार आणि वस्त्रपरिधानाची परंपरा मोडणाऱ्या ठाणेकर पितापुत्रांना मंदिरात बंदी केली पाहिजे. जर पोलिसांकडून ठाणेकरांना संरक्षण दिले जात असेल तर संघर्ष समिती मंदिराचे सर्व दरवाचे बंद करून भाविकांनाच प्रवेशबंदी आंदोलन करेल. त्यातून जनक्षोभ उसळून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीने रविवारी पोलिसांना दिला. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या दारात ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजीही केली.
पुजारी अजित ठाणेकर, बाबूराव ठाणेकर यांनी मूर्तीला घागरा-चोलीचा पोषाख परिधान केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर तोडग्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात आलेल्या बैठकीत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप करत संघर्ष समितीतील काही सदस्य आणि महिलांनी अजित ठाणेकर यांना बेदम मारहाण केली होती. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठाणेकर पिता-पुत्र मंदिरात येणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र शुक्रवारपासून सलग तीन दिवस बाबूराव ठाणेकर धार्मिक विधींसाठी गाभाऱ्यात जात आहेत. त्यांना पोलिसांनी का रोखले नाही असा सवाल करत अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीने रविवारी सकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी भक्तांच्या धार्मिक भावनांना आव्हान देऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्याप्रकरणी ठाणेकर पितापुत्रांना अटक करावी, अशी तक्रार यावेळी संघर्षसमितीतर्फे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
शुक्रवारी बाबूराव ठाणेकर मंदिरात गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. शनिवारी पुन्हा ते पोलिस बंदोबस्तात मंदिरात जाऊन पूजाविधीत सहभागी झाले. या मुद्द्यावरून संजय पवार, विजय देवणे, दिलीप देसाई, डॉ. सुभाष देसाई, माजी आमदार सुरेश साळोखे यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित करीत पोलिस ठाणेकर पितापुत्रास पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. याबाबतचा तक्रार अर्ज व निवेदन जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भुजबळ यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पो‌लिस निरीक्षक तानाजी सावंत, विठ्ठल दराडे, तहसीलदार उत्तम दिघे आदी उपस्थित होते.
दिलीप देसाई म्हणाले, ‘ठाणेकर यांना पोलिस संरक्षण कोणत्या निकषावर दिले याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. संघर्ष समितीला संयम ठेवा, असे सांगण्यात येते आणि ठाणेकर यांच्या जीवाला धोका आहे, असे मानून त्यांना बंदूकधारी संरक्षक दिले जात आहे. पोलिस प्रशासनाला कारवाई करण्यामध्ये​ नियम व कायद्याची चौकट असू शकते, मात्र याचा अर्थ राजकीय दबावाला बळी पडून पोलिसांनी नरमाईची भूमिका घेणे योग्य नाही.’
विजय देवणे म्हणाले, ‘गेल्या दोन महिन्यांपासून ठाणेकर यांच्याविरोधात पुजारी हटाओ संघर्ष समितीने केलेल्या मागण्यांबाबत पोलिस व जिल्हा प्रशासन आश्वासन देत आहेत. दोन महिन्यातील पोलिस तपासाची दिशा पोलिसांनीच तपासून पाहण्याची गरज आहे. ठाणेकर यांना मंदिरात प्रवेशबंदीची सूचना असताना त्यांना पोलिस संरक्षणाची काय गरज आहे? समितीतील कोणीही त्यांच्यावर हल्ला करणार नाही की ते काही कुणी अशी महान व्यक्ती नाहीत की त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना संरक्षण देऊन त्यांचे महत्त्व वाढविण्याचा प्रकार त्वरित थांबवावा. समितीचे सचिन तोडकर रितसर पावती करून सोवळे नेसून मंदिरात जाण्याची परवानगी मागतात तेव्हा त्यांना पोलिसांकडून अडवले जाते. मात्र ठाणेकर यांच्या मंदिरात येण्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची शक्यता असूनही पोलिसांकडून कारवाई होत नाही, याचा अर्थ ठाणेकर यांना पोलिसांचे अभय आहे.’
प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘हा वाद मराठा ​आणि ब्राह्मण यांच्यातील नाही, तर हक्कदार असल्याचे सांगून मंदिरातील देणगीची लूट करणाऱ्या पुजाऱ्यांच्या प्रवृत्तीविरोधातील हा लढा आहे.’
माजी आमदार सुरेश साळोखे म्हणाले, ‘गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर वाद वाढवायचा की मिटवायचा हे कायदा व सुव्यवस्था प्रशासनाने ठरवायचे आहे.’
यावेळी कृती समितीचे आर. के. पोवार, विजय देवणे, संजय पवार, माजी आमदार सुरेश साळुंखे, वसंतराव मुळीक, डॉ. सुभाष देसाई, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, सचिन तोडकर, आनंद माने, बाबा पार्टे, राजू जाधव, जयश्री चव्हाण, सुनीता पाटील, सुनंदा चव्हाण, लता जगताप, सुशीला लाड आदी उपस्थित होते.

संयम सुटला तर...
पुजारी हटाओ संघर्ष समितीने सुरुवातीपासूनच लोकशाही मार्गाने आणि संयमीवृत्तीने आंदोलन केले आहे. गुन्हा करणाऱ्या पुजाऱ्यांनी मंदिरात प्रवेश करू नये, हा जिल्हा प्रशासनाचाच आदेश असतानाही तो पाळला जात नाही. याउलट पालकमंत्री चंद्रकांत पाटील समितीलाच संयम ठेवण्याची सूचना करतात. ठाणेकर यांना अभय देऊन समितीला संयम ठेवण्याची भाषा केली जात असेल तर हा संयम सुटेल आणि त्यातून कोल्हापुरात तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

पुजारी हटाओ संघर्ष समितीने ठाणेकर यांना अटक करण्याची तसेच त्यांच्यावर मंदिरातील देणगी व देणगीदाखल येणाऱ्या अलंकारांचा अपहार केल्याचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी तक्रारअर्जाद्वारे केली आहे. हा अर्ज व निवेदन स्वीकारण्यात येत असून याबाबत वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल.
निशिकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ माझ्या काळजावर घाव झालाशेतकऱ्यांसाठी लढत राहू- खोत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली. या बातमीने काळजावरच वार झाला आहे. मंत्रिपद येतील जातील मी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही. सामान्य माणसाचे प्रश्न घेवून ३० वर्ष लढलो. तसेच उर्वरित आयुष्यातही लढत राहीन, असा निर्धार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. स्वाभिनानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर इस्लामपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेते खोत बोलत होते.
खोत म्हणाले, ‘अविरतपणे ३० वर्षे काम केले. या ३० वर्षांत मागे वळून पहिले नाही. तळहातावर चटणी भाकर घेऊन, वाड्या-वस्त्यांवर फिरलो. राज्याचा कानाकोपरा पिंजून काढत एक एक कार्यकर्ता जोडला. अनेक प्रस्थापितांना अंगावर घेतले. आमच्या संघटनेच्या नेतृत्वाची ढाल बनून अनेक घाव झेलले. कधीही फिकीर केली नाही. परंतु, ही हकालपट्टीची बातमी ऐकल्यावर हा जणू काळजावरच घाव झालेला आहे, असे वाटले. आपलीच माणसं आपल्याशी कसा व्यवहार करतात, हे भावी पिढीला शिकायला मिळेल, असाच हा निर्णय आहे. त्यांना माझ्या हकालपट्टीत किंवा माझी मानहानी करण्यात आनंद मिळत असेल, तर तो त्यांनी जरूर मिळवावा, त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा राहतील. मी सामान्य कुटुंबात जन्मलो, वाढलो, मी सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. सामान्य माणसाचे प्रश्न घेवून ३० वर्ष लढलो, तसेच उर्वरित आयुष्य सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन लढण्यासाठी खर्ची घालणार. माझ्या पडत्या काळात चळवळीतले अनेक कार्यकर्ते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील या सर्वांनी कुटुंबाप्रमाणे मला आणि माझ्या कुटुंबाला साथ दिली. त्यांचा मी सदैव ऋणी राहीन.’
मंत्रि‍पदाचा निर्णय मुख्यमंत्र्‍यांनी घ्यावा
माझ्या मंत्रिपदाबाबतचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. माझी संघटनेवर निष्ठा नाही, म्हणून मला काढून टाकले. निष्ठा नसती तर ३० वर्ष छातीवर बिल्ला लावला नसता. गेल्या ३० वर्षांत कोणत्याही पक्षात जाता आले असते. मी इतर पक्षात गेलो असतो तर निष्ठेचा प्रश्न आला असता. मी शेतकऱ्यांची बाजू घेतली आणि या पुढेही घेत राहणार. आमचे नेतृत्व कोल्हापुरात कॉँग्रेस बरोबर, इतर ठिकाणी भाजप बरोबर आहे, असा निर्णय नेतृत्वाने घेतल्यावर इतरांनी काही बोलायचे नाही. त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांना कदाचित योग्य वाटत असेल. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारबरोबर संवाद साधायला हवा, तरच प्रश्न निकाली निघतील. सरकार जर संवेदनशील असेल तर सकारात्मक प्रतिसाद मिळतो आणि प्रश्न निकाली निघतात.
चिंतन करून निर्णय घेणार
पुढील वाटचाली बाबत बोलताना खोत म्हणाले, ‘राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे, मत ऐकून घेऊन निर्णय घेणार आहे. कार्यकर्त्यांशी बैठका घेऊन चिंतन करू. यासाठी काहीकाळ जावा लागेल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘लोकमंगल’चा कारभार 'अ’मंगलशेतकऱ्यांच्या नावावर उचलली कोट्यवधींची कर्जे; 'इडी’मार्फत चौकशीची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सहकारमंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे अध्यक्ष सुभाष देशमुख सर्वेसर्वा असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकमंगल साखर कारखान्याने शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांच्या नावावर परस्पर कोट्यवधींची कर्जे उचलल्याप्रकरणी अडचणीत सापडले आहेत. सोमवारी दक्षिणमधील शेतकरी देशमुख यांच्या विरोधात एकवटले आणि त्यांनी मंद्रुप येथील राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्याचा कारभार चव्हाट्यावर आणला. शेतकऱ्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची इडीमार्फत चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. शिवाय फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या प्रकाराने सहकारमंत्री देशमुख यांचे मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सहरमंत्री देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात भंडारकवठे येथे लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या नावाने साखर कारखाना उभारला आहे. त्याचे चेअरमन त्यांचे सख्खे पुतणे महेश देशमुख असले तरी सर्व कारभार सहकारमंत्री देशमुख हेच पाहतात. याच तालुक्यातील शेतकरी गजानन बिराजदार यांच्या नावावर लोकमंगल साखर कारखान्याने शेतकऱ्यांने कारखान्याला खतासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून पुण्यातील कासारवाडी येथील युनियन बॅँकेतून तीन लाखांचे परस्पर कर्ज उचलले होते. तशी तक्रार बिराजदार यांनी केली आहे. मुलीच्या लग्नासाठी दुसऱ्या बॅँकेतून कर्ज काढण्यासाठी गेल्यानंतर बिराजदार यांना हा प्रकार समजला. त्यांनी त्यावेळी कारखाना आणि बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच येळेगावाचा शेतकरी कल्याणराव मेंडगुदले यांच्या नावावरही कॅनरा बँक सोलापूर शाखेतून १५ लाखांचे कर्ज लोकमंगलचे उचलल्याचे उघडकीस आले. मेंडगुदले या शेतकऱ्यांने पोलिसात तक्रार करूनही कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष व संचालक यांच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही.
दरम्यान, ही दोन्ही प्रकरणे ताजी असताना लोकमंगलने देना बँकेच्या सोलापूर शाखेतून बार्शी तालुक्यातील एका शेतमजुराच्या नावाने १५ लाख रुपयांचे कर्ज उचलले तर बीबीदारफळ येथील देशमुखांच्याच लोकमंगल कारखान्यानेही भीमानगर इंदापूर येथील शेतमजूर महादेव बापू मस्के यांच्या नावाने देना बँकेतून १५ लाख रुपयांचे ऊसतोडणी वाहतूक कर्ज काढले, ज्याचे व्याजासह १९ लाख १४ हजार २५७ रुपये दहा दिवसांत भरण्याबाबतचे पत्र बँकेने २३ जुलै रोजी मस्के यांना धाडल्यानंतर शेतकरी चक्रावून गेला.
दरम्यान दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल कारखान्याने कॅनरा, युनियन, देना तसेच अॅक्सिस बँकेतून शेतकऱ्यांच्या नावाने पीक, वाहन, ऊस तोडणी वाहतूक या नावाने २००९ ते २०१७ या कालावधीत सुमारे ५० कोटींपेक्षा जास्त रकम शेतकऱ्यांच्या नावावर उचलून अपहार केल्याचा आरोप करीत माजी कृषी सभापती आप्पाराव कोरे, दक्षिण सोलापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसवराज बगले, विजयकुमार हत्तुरे यांच्यासह फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी गावागावांत दौंडी पेटवून आणि हलग्या लावून देशमुख यांच्या कारभाराचा भांडाफोड करीत रास्ता रोको आंदोलन करून प्रकार चव्हाट्यावर आणला आहे.
पुराव्यासह देशमुखांची तक्रार फडणवीसांकडे
ज्यांच्या नावावर कर्जे काढण्यात आली तेच शेतकरी तक्रार कारण्यासाठी पुढे येऊ लागल्याने देशमुख हैराण झाले आहेत. काही जणांनी तक्रार करताच कारखान्याने संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर काढलेले कर्ज कोणालाही न सांगता भरून टाकले. मात्र, आणखी शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीसा येऊ लागल्यानंतर प्रकरणे वाढत गेली आणि त्याचा अखेर स्फोट झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी तक्रार गैरव्यवहाराच्या पुराव्यानिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आल्याचे आप्पाराव कोरे यांनी सांगितले.
देशमुख यांच्यावरही कारवाई करावी
बीड जिह्यातील गेवराई येथील गंगाखेड कारखाना तक्रारीबाबत रत्नाकर गुट्टे यांच्यावर भाजप सरकारने जशी कारवाई केली तशीच कारवाई सरकारने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही करावी. एकाला एक आणि दुसऱ्याला एक न्याय, असे सरकारने न करता देशमुख यांच्यावरही कारवाई करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रासपचे प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, लोकमंगल साखर कारखान्याने गेल्या वीस वर्षांत कोणालाही फसविले नाही आणि फसविणारही नाही. कोणत्याही शेतकऱ्यावर लोकमंगलने अन्याय केलेला नाही. कोणाचेही आम्ही शोषण केले नाही. ज्या शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाली असे वाटते त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेटावे. शेतकऱ्यांच्या नावावर लोकमंगलने कर्जे उचलून गैरव्यवहार केल्याचा होत असलेला आरोप चुकीचा असून, यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोमदार पावसाची प्रतीक्षा

$
0
0

कोल्हापूर

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे जोरदार आणि दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. गेल्या दहा बारा दिवसांपासून निम्म्या तालुक्यांत पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी पिकांची वाढ थांबली आहे. पावसाने उसंत दिल्यामुळे आंतरमशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. खतांचा डोसही दिला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस बरसला तर सर्वच पिके तरारणार आहेत.

प्रत्येक वर्षी पावसाळ्यात सरासरी १८९९ मिलीमीटर पाऊस पडतो. त्यापैकी जुलै महिन्यात ५११ मिलीमीटर पाऊस झाला. जूनपासून आतापर्यंत ७४९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मात्र अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यंदा दोन लाख ६१ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सर्वच पिकांना पावसाची गरज आहे. भात पिकाची रोप लागण पूर्ण झाली असून कोळपणीच्या कामांना गती आली आहे. भात पीक वाढीच्या अवस्थेत आहे. नागली, मका, ज्वारी, कडधान्ये, सोयाबीन, भुईमूग पिकांची परिस्थिती चांगली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेली प‌ीके पोसवण्याच्या टप्प्यात आहे. या टप्प्यात समाधानकारक पाऊस झाल्यास उत्पादन वाढणार आहे. हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा, कागल तालुक्यातील चार हजार ४२४ हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागण झाली. एकूण १ लाख ४३ हजार ९०५ हेक्टरवर ऊस आहे. सर्वच क्षेत्रातील उसाची वाढ जोमात आहे. पाण्याखाली न गेल्याने नदी काठावरील ऊस पीक सुरक्षित आहे. या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यात सलग आठ दिवस जोरदार पाऊस पडल्यास पिकांची वाढ अधिक जोमाने होऊन उत्पादन वाढणार आहे. म्हणूनच बळिराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

.....................

कोट

‘सर्व पिकांची परिस्थि‌ती चांगली आहे. आंतरमशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. खतांचा डोसही दिला. पीक वाढीच्या टप्प्यात आहेत‌. त्यांना जोरदार पावसाची गरज आहे. पाऊस झाल्यास पिकांसह बांध आणि डोंगरावरील वैरणीची वाढ चांगली होईल.

चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी विकास अधिकारी

.........................

चौकट

केवळ आठ दिवस पाऊस

जुलै महिन्यात तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)असा – करवीर ः २०, कागल ः २१, पन्हाळा ः २६, शाहूवाडी – ३१, हातकणंगले ः १७, शिरोळ ः ८, राधानगरी ः २९, गगनबावडा ः ३१, भुदरगड ः २८, गडहिंग्लज ः १८, आजरा ः २८, चंदगड ः २७.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसंवादानेच तुटला ‘स्वाभिमानी’ कासरा

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

Tweet:@gurubalmaliMT

कोल्हापूर: आम्ही दोघे ‘राम लक्ष्मण’ आहोत म्हणत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या नेत्यांची जोडी फुटली ती विसंवादाने. खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वादाचे मुद्दे प्रथम किरकोळ होते, पण ते मिटवण्यासाठी प्रयत्न होण्याऐवजी दाबून ठेवल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघाला फुटीची उकळी आली. पंचवीस वर्षे मशागत करून राजकीय जमीन कसदार असताना पीक काढण्याऐवजी वादात ती पडीक ठेवू नये, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मंत्र्याचा कासरा तोडल्याने ते दुसऱ्याच्या दावणीला जातील पण नुकसान होणार आहे ते शेतकरी चळवळीचेच.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका होईपर्यंत संघटनेत सारे काही आलबेल होते. निवडणुकीनंतर संघटनेला सत्तेत सहभागी करून घेण्यास भाजपने टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे ‘स्वाभिमानी’त धुसफूस सुरू झाली. सत्तेतील सहभागाचा एक भाग म्हणून रवीकांत तुपकरांना महामंडळ आणि सदाभाऊना मंत्र‌िपद असा प्रस्ताव खासदारांनी दिला. तुपकरांची नियुक्ती केली पण मंत्र‌िपदाची टोलवाटोलवी झाली. मंत्र‌िपदासाठी सदाभाऊनी अतिउत्साह दाखवला, हे शेट्टी यांना आवडले नाही. पहिली ठिणगी येथेच पडली. मंत्र‌िपद मिळाल्यानंतर सदाभाऊ हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले, त्याचे बक्षीस म्हणून त्यांना जादा खाती मिळाली. हेदेखील खासदारांना आवडले नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत मुलाला रिंगणात उतरवल्यानंतर या सर्व रागाचा स्फोट झाला. तेथूनच सदाभाऊना संघटनेतून डावलण्यास सुरुवात झाली.

मंत्री झाल्यानंतर सदाभाऊ संघटनेचे नेते राहिले नाहीत. संघटनेकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले. वेगळ्या माध्यमातून संघटनेला ताकद देण्याची त्यांच्याकडून अपेक्षा होती. पण ते न करता काही ठिकाणी त्यांनी अतिउत्साह दाखवला. कॅबीनेट मंत्री शांत असताना आपण राज्यमंत्री आहोत हे विसरून धडका लावला. त्यामुळे देखील ते संघटनेपासून ते दुरावले. गेल्या सहा महिन्यापासून हळूहळू दोन्ही नेत्यांमधील विसंवादाला सुरूवात झाली होती. वादात भर पाडणाऱ्या काही गोष्टी घडत होत्या. आत्मक्लेष यात्रा, पदयात्रा, मोर्चा, संघटनेचे अधिवेशन यानिमित्ताने सदाभाऊना संघटनेपासून दूर ठेवण्यात येत होते. घरचा माणूस असूनही बाहेर काढल्याची त्यांची अवस्था केली होती. खासदारांशी संवादच बंद झाला होता. एकीकडे सरकार आणि दुसरीकडे संघटना या कोडिंत मंत्री अडकले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना टार्गेट केले जात होते. बदनामी करणारे खासदारांचे बगलबच्चे आहेत, असा आरोप मंत्र्यांनी केला. यातून बदनामी कमी होण्याऐवजी वाढत गेली. संघटना आणि बाहेरचे एकाचवेळी त्यांच्यावर तुटुन पडू लागल्याने मंत्र्यांचा पाय आणखी खोलात जाऊ लागला. वातावरण आपल्या विरोधात आहे याची जाणीव होऊनही एक पाऊल मागे घेवून खासदारांशी मिळते जुळते न घेतल्याने अखेर व्हायचे तेच झाले.

हकालपट्टीने कोंडी

खासदारांनी गेल्या दोन महिन्यापासून राज्य आणि केंद्र सरकार विरोधात तोफा सुरूच केल्या होत्या. सरकारमध्ये राहून सरकारवर तोंड सुख घेत आहेत. अपेक्षेप्रमाणे सदाभाऊना संघटनेतून हकालपट्टी झाली आहे. ही कारवाई होणार हे दोन महिन्यापूर्वीच ठरले होते. पण प्रक्रिया करून कारवाई केली हे दाखवण्यात दोन महिने गेले. त्यांची कोंडी झाली आहे. या हकालप​ट्टीने संघटनेच्या कोट्यातील सदाभाऊंचे मंत्र‌िपद जाईल. पण मंत्र‌िपद टिकवण्यासाठी ते भाजपमध्ये जातील अथवा स्वतंत्र संघटना काढून भाजपशी युती करतील. सध्या तरी त्यांची तयारी स्वतंत्र संघटना काढण्याचीच आहे. हकालपट्टी होणार हे गृहित धरून मंत्र्यांनी दोन महिन्यापासूनच पुढील तयारी सुरू केली होती. राज्यात अनेकांशी बोलून कल अनुभवला. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना फारसा ​प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. पण सांगलीत व इतर ठिकाणी ते पाय रोवू शकतात. पण ते शिवधनुष्य फार मोठे आहे.

खासदारांचा मार्ग सुकर

हातकणंगले लोकसभा मतदार संघात सध्या तरी खासदारांना प्रबळ स्पर्धक नाही. आवाडे गटाशी त्यांनी जुळवून घेतल्याने त्यांचा रस्ता बराच सुकर झाला आहे. यामुळे त्यांच्या राजकारणात त्यांना भीती नाही. यामुळे सदाभाऊंचे मंत्र‌िपद आणि शेट्टीची खासदारकी टिकेल, त्यांचे राजकारण सुरू राहील. नुकसान होणार आहे ते शेतकरी चळवळीचे. दोघे आक्रमक असल्यानेच महाराष्ट्रात ‘स्वाभिमानी’ची हवा निर्माण झाली होती. आता त्यावर मर्यादा येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा प्रेक्षणिय स्थळांचा विकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गंत २०१६-१७ या वर्षासाठी सरकारकडून ३२६ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ३१९ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यंदा जिल्हा वार्षिक योजनेंतर्गंत ३६४ कोटी आराखडा मंजूर झाला असून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गंत ११ कोटीचा निधी मिळाला आहे. या निधीचा वापर जिल्ह्यात उत्कृष्ट संकल्पना राबवण्यासाठी करण्यात येणार आहे. निधीतून जिल्ह्यातील दहा प्रेक्षणिय स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. तसेच डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान फुल महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे. महोत्सवाला २५ हजार पर्यटक भेट देतील असा आशावाद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी काही निकष बदलण्यात आले आहेत. यापूर्वी एक ते दोन किलोमीटर नवीन रस्ता अथवा दुरुस्ती केली जात होती. त्यामध्ये बदल करुन दहा कि.मी रस्ता प्रमाणे दहा हजार कि.मीचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती करताना दहा किमीच्या आतील रस्त्यांची निविदा काढण्यात येणार नाही. तसेच कामाची दोन वर्षाची वॉरंटी निविदाधारकांकडून घेतली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ८६ हजार किलोमीटरचे रस्ते असून दोन लाख ५६ हजार किलोमीटरचे रस्ते जिल्हा परिषदेकडे आहेत. जिल्हा परिषदेकडील ५० हजार किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहेत. याला मुख्यमंत्र्यांकडून समंती मिळाल्यास सर्व ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न निकालात निघणार आहे.’

‘नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यात उत्कृष्ट काम करण्यासाठी जिल्ह्यातील दहा प्रेक्षणीय स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळेल. त्याचबरोबर २५ डिसेंबर ते एक जानेवारी २०१८ अखेर फुल महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवाला राज्यभरातून २५ हजार पर्यटक भेट देतील. त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. जत तालुक्यात ४०० एकरावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातील पेयजल योजनेसाठी अशी यंत्रणा कार्यन्वित करण्यात येईल. त्यामुळे थकीत विजबिलापोटी खंडीत होणारा विजपुरवठा सुरळीत राहिल. वार्षिक योजनेतील पाच टक्के निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी राखून ठेवण्यात आला आहे. नियोजन मंडळाची बैठक नवीन सदस्यांसह होणार असून यात विविध कामांचे आराखडा सादर करावेत.’

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, अमल महाडिक, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव उपस्थित होते. यावेळी सदस्यांनी काही विशेष सूचना केल्या.

कॅन्सरसाठी मदत करा

‘शिरोळ तालुक्यात एकूण लोकसंख्येचा आठ टक्के नागरिकांना कॅन्सर झाला आहे. पंचगंगा प्रदूषणामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत असून या रुग्णांसाठी मदत करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेत समावेश करुन विशेष निधी द्यावा’ अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. देशातील पंजाबनंतर सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण शिरोळ तालुक्यात असल्याने याचे गांभीर्य वाढले आहे’ असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगावे लागेल

जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नावरुन अनेक लोकप्रतिनिधींनी आपल्या मागण्या मांडल्या. पालकमंत्री पाटील यांनी, आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असे सांगितले. त्याचा संदर्भ घेत आमदार सतेज पाटील यांनी, ‘मुख्यमंत्र्यांना कानात सांगावे लागेल’ अशी टिप्पणी केली. यावर पालकमंत्री पाटील यांनी, ‘यापूर्वी जिल्ह्यातील एक आमदार मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगत होते. ते काम आता मला करावे लागत आहे. दोन्ही वेळा मंत्री कोल्हापूरचेच असल्याने जिल्ह्याचा फायदा होतोय’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

२०१७-१८ वर्षासाठी मंजूर रक्कम

२४९ कोटी ५२ लाख

वार्षिक आराखडा

११३ कोटी ४१ लाख

अनुसूचित जाती उपयोजनेसाठी

एक कोटी ९० लाख

ओटीएसपीसाठी

११ कोटी

नावीन्यपूर्ण योजना

२०१६-१७ मध्ये खर्च झालेला निधी

२२६ कोटी ५० लाख

सर्वसाधारण योजना

९७ कोटी ९४ लाख

विशेष घटक योजना

एक कोटी ८० लाख

ओटीएसपी

३१९ कोटी ८५ लाख

एकूण खर्च

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर परिक्षेत्रातील आणखी शंभरजणांना तडीपार करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील आणखी १०० सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी २०० जणांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे. मंडळांनी महिला व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी परिसरात सीसीटीव्ही लावून पोलिसांना सहकार्य करावे. त्याचा पाठपुरावा परिक्षेत्रातील १४६ पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी घ्यावा, अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिल्या. सोमवारी परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची बैठक झाली.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्हयात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार पोलिस प्रशासनाने केला आहे. या पार्श्वभूमीवर नांगरे-पाटील यांनी पोलिस अधीक्षकांची सोमवारी बैठक घेतली. यापुढे कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांत डॉल्बी लावल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

‘एक खिडकी योजने’च्या माध्यमातून गणेशमंडळांना एकाच छताखाली सर्व परवाने मिळणार आहेत. त्यांना कोणतीही अडचणी येऊ नये, याची दक्षता घ्यावी, देखावे व विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी सीसीटीव्ही लावावेत जेणेकरुन येणाऱ्या महिला, लहान मुले सुरक्षित राहतील. मंडळांना सीसीटीव्ही यंत्रणा सक्तीची असून त्यांनी कायद्याचे पालन करावे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी परिक्षेत्रातील २०० सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. उर्वरित गुन्हेगारांची लवकर हकालपट्टी होणार आहे,’ अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैयक्तिक थर्ड पार्टी अर्ज नाकारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या वादावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेली सुनावणी स्थगित करावी, या गजानन मुनीश्वर यांच्या दिवाणी कोर्टतील दाव्यावर दाखल केलेला संजय पवार आणि प्रताप नाईक-वरुटे यांचे वैयक्तिक थर्डपार्टी अर्ज कोर्टाने नाकारले. देवस्थान समितीच्यावतीने दाखल केलेला अर्ज वैध मानला असून, यावर १० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. सोमवारी (ता. ७) वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांच्यासमोर सुनावणी झाली.

श्री अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांनी देवीच्या मूर्तीला घागरा-चोलीचा पोषाख परिधान केल्यानंतर सुरू झालेल्या वादावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी बेकायदा असून, याला स्थगिती मिळावी, अशी मागणी पुजारी गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दाव्याद्वारे केली आहे. या दाव्यात थर्डपार्टी महणून म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, असे अर्ज पुजारी हटाव संघर्ष समितीचे सदस्य संजय पवार आणि प्रताप नाईक-वरुटे यांनी केले होते. सोमवारी झालेल्या सुनावणीत दिवाणी न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी संजय पवार आणि नाईक-वरुटे यांचे अर्ज नाकारले. देवस्थान समितीच्यावतीने सदस्य शिवाजी जाधव आणि संगीता खाडे यांनी दाखल केलेले अर्ज मात्र वैध मानन्यात आले आहेत. या अर्जावर १० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

देवस्थान समितीचा अर्ज वैध ठरल्याने आता कोर्टात पुजारी विरुद्ध देवस्थान समिती असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे. पुजाऱ्यांविरोधातील सर्व पुरावे कोर्टात सादर करू, अशी माहिती समितीच्या सदस्यांनी दिली आहे. संजय पवार आणि प्रताप नाईक-वरुटे यांच्या वतीने अॅड. अजित मोहिते यांनी काम पाहिले, तर देवस्थान समितीच्या वतीने अॅड. ए. पी. पवार यांनी काम पाहिले. वादी गजानन मुनीश्वर यांच्यावतीने अॅड. नरेंद्र गांधी यांनी काम पहिले. यावेळी संजय पवार, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, आनंद माने, शिवाजी जाधव, संगीता खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी सल्लागार अड. वैभव इनामदार उपसस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यात चार हजारतलाठी पदे भरणार

$
0
0

गारगोटी

‘राज्यात १६ हजार नवीन चावडी कार्यालये बांधण्यात येणार असून चार हजार तलाठी व ५०० मंडल अधिकाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. गंगापूर (ता.भुदरगड) येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या चावडी इमारत व ऑनलाइन सातबारा प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी महसूलमंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते.

पाटील म्हणाले, ‘हस्तलिखित आणि संगणकीकृत सातबारे उतारे शेतकऱ्यांना मिळावेत, सातबाराच्या उताऱ्यांचे चावडीतच वाचन होण्यासाठी चावडीची प्रशस्त इमारत असावी या हेतूने चावडीच्या इमारती उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तलाठ्यांच्या वरील कामाचा ताण कमी करण्यासाठी तलाठी भरती करण्यात येणार आहे. तलाठ्यांकडे कामासाठी मोजकीच गावे दिली जाणार असल्याने तलाठी जनतेला उपलब्ध होवू शकतील. यासाठी तलाठी कार्यालय लवकरात लवकर उभारणी करण्याचा मानस आहे.’

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘भुदरगड आजरा, राधानगरी या तीन तालुक्यातील अनेक गावांमध्ये तलाठी कार्यालये असून देखील इमारती जीर्ण झालेल्या आहेत. तर काही ठिकाणी तलाठी कार्यालये भाड्याच्या खोलीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, त्याचबरोबर भुदरगड तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची समस्या आणि त्यांची स्थिती फारच चिंताजनक आहे. त्यामुळे महसूलमंत्री पाटील यांनी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.’

स्वागत प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंता एन.एम.पाठक, गटविकास अधिकारी माधुरी परीट, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई, सभापती सरिता वरंडेकर, गोकुळचे संचालक बाबा देसाई, पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई, सरपंच संगीता केणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, पंडितराव केणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई आदी उपस्थित होते. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा लुटीतील कॉन्स्टेबल दीपक पाटील शरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथे चोरीचा तपास करताना ९ कोटी १८ लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या पोलिसांच्या टोळीतील कॉन्स्टेबल दीपक उत्तमराव पाटील (वय ४२, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) हा सोमवारी (ता. ७) सीआयडीकडे शरण आला. सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला कोठडीत पाठवले. दरम्यान, अटकेतील चंदनशिवे आणि घनवट यांचे जबाब घेतले असून, सीआयडीने संशयितांच्या मालमत्तेची माहिती घेण्यासाठी आयकर खात्याशी पत्रव्यवहार केला आहे.

वारणानगर येथील लुटीतील रक्कम संगनमताने परस्पर हडप केल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, एपीआय सूरज चंदनशिवे यांच्यासह नऊ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला झाला आहे. या गुन्हयातील निलंबित संशयित हवालदार दीपक पाटील याला उच्च न्यायालयाने सीआयडीच्या कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. घनवट व चंदनशिवे हजर झाले मात्र पाटील हजर झाला नव्हता, त्यामुळे तपास अधिकारी त्याचा शोध घेत होते.

सोमवारी सायंकाळी सहा वाजता दीपक पाटील त्याच्या वकिलासह शनिवारपेठ येथील सीआयडीच्या कार्यालयात हजर झाला. त्याने प्रभारी पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांची भेट घेऊन हजर होत असल्याचे सांगितले. सीआयडीच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर अटक करून त्याची करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केले. मंगळवारी त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अटकेतील संशयित विश्वनाथ घनवट व सूरज चंदनशिवे यांचे जबाब घेण्याचे काम सुरू असून जबाब देतानाही त्यांच्याकडून तपास अधिकाऱ्यांना सहकार्य होत नाही. रविवारी रात्री सांगली येथील त्यांच्या निवासस्थानाची दुसऱ्यांदा झडती घेतली आहे. लुटीतील पैसे संशयितांनी कुठे गुंतवले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

प्राप्त‌िकर विभागाशी पत्रव्यवहार

संशयितांच्या मालमत्तेची माहिती मिळवण्यासाठी सीआयडीने प्राप्त‌िकर विभागाला पत्र पाठविले आहे. आयकर विभागाकडूनही याबाबत चौकशी केली जाणार आहे. घनवट व चंदनशिवेचे तपासात असहकार्य आहे. संशयित दीपक पाटील याच्या तपासातूनही काही महत्त्वाची माहिती बाहेर पडण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

नोटांची बदली कुठे केली?

वारणानगर लुटीतील कोटयवधी रुपये हडप केल्यानंतर काही महिन्यातच नोटाबंदीचा निर्णय झाला, त्यामुळे संशयितांनी जुन्या नोटा कोणाकडून बदलून घेतल्या? त्यांनी ही रक्कम कोणाच्या नावावर बँकेत किंवा पतसंस्थेत ठेवली? याचा तपास सीआयडीची पथके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन चंदनचोर अटकेत, ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चिखली (ता. करवीर) येथील वनविभागाच्या नर्सरीतून झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने टोळीच्या सूत्रधारासह तिघांना अटक केली. मच्छिंद्र विलास बनसोडे (वय ३०, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड), संतोष सुग्रीव खुर्द (३५, रा. देगाव, ता. पंढरपूर) आणि इरफान अजीज बेग (४१, रा. वसदुर्गा, कर्नाटक) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. १० ते १२ चोरटे अद्याप फरार आहेत. टोळीकडून चंदन चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी वर्तवली.

त्यांनी सांगितले की, चोरट्यांनी १८ जुलैला चंदन तेलाचे ६० लाख किमतीचे चार डबे आणि १० लाख किमतीचे चंदनाचे लाकूड लंपास केले होते. कर्मचाऱ्यांना बांधून घालून केलेल्या या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून टोळीचा रेठरे बुद्रुक येथील म्होरक्या बनसोडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. हे चंदन पंढरपूरमार्गे थेट मुंबईत पाठवल्याची माहिती मिळाल्यानंतर संतोष खुर्द आणि कर्नाटकातील इरफान बेगला अटक केले. ७० लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. टोळीचे लागेबांधे परराज्यातील तस्करांशी असल्याने एक पथक शिमोगा येथे तपास करीत आहे. अटकेतील तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

पत्रकार परिषदेसाठी अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, एपीआय संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक युवराज आठरे, अमोल माळी, राजेद्र सानप, आधी उपस्थित होते. उपअधीक्षक सूरज गुरव आणि करवीरचे निरीक्षक दिलीप जाधव यांनी तपासात महत्त्वाची कामगिरी बजावली.

चीनला पाठवण्यासाठी तस्करी

चंदनाला चीनमध्ये मोठी किंमत मिळते. त्यामुळे भारतातून छुप्या पद्धतीने चंदन चीनला पाठवणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. कराड परिसरातील टोळी तस्करांशी संबंध असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार केलेल्या तपासातून चोरीचा उलगडा झाला. चोरलेले चंदन चीनला पाठवण्याची तयारी सुरू होती. चंदन निर्यात करणाऱ्या संशयितांवर वॉच ठेवून ही कारवाई केली, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

चोरीत स्थानिकांचा सहभाग

नर्सरीत कोट्यवधींचे चंदन असल्याची माहिती चोरट्यांनी कुणाकडून मिळाली याचा शोध पोलिस घेतला आहे. चोरट्यांनी अवघ्या दीड ते दोन तासात नेमका किमती माल लांबवला. त्यामुळे दोन ते तीन दिवस थेट नर्सरीत जाऊन रेकी करून ही चोरी केली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही नर्सरीतील जी माहिती नव्हती ती माहिती चोरट्यांकडे होती. त्यामुळे स्थानिकांनीच चोरट्यांना मदत केल्याचा संशय पोलिसांना होता. स्थानिक संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली असून, लवकर त्यांनाही अटक होणार असल्याचे सांगण्यात आले.

कराडमधून ट्रक चोरला

चंदन घेऊन जाण्यासाठी चोरट्यांनी कराडमधून ट्रकची चोरी केली. १७ जुलैला शाहू मार्केट यार्डमध्ये कांदे आणि कोबीची पोती खरेदी केली. टेम्पोत चंदन ठेवून त्यावर कोबी आणि कांद्याची पोती ठेवून भाजी वाहतुकीचा टेम्पो असल्याचे भासवले. या युक्तीमुळे महामार्गावर पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली नाही. संशयितांच्या अटकेनंतर चोरीचा टेम्पो जप्त केला आहे. चोरट्यांनी चोरी करताना मोबाइलचा वापर केला नाही. चोरीच्या घटनेनंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील सीमकार्डही बदलल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हकालपट्टीचा निर्णय योग्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीने नियुक्ती केलेल्या समितीने कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय योग्य असून त्याचा परिणाम संघटनेच्या चळवळीवर होणार नाही, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांना कोल्हापुरात दिली.

सरकारमधून संघटना कधीही बाहेर पडू शकते, असे संकेत देत लवकरच राज्य कार्यकारणीची बैठक घेणार असून समितीच्या निर्णयानंतर मंत्री खोत कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

शेतकरी संपामध्ये शेतकरीविरोधी घेतलेली भूमिका यामुळे संघटनेचे होणारे नुकसान लक्षात घेऊन राज्यमंत्री खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय समितीने सोमवारी पुण्यात जाहीर केला. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी खासदार शेट्टी आले असता, संघटनेची पुढील वाटचाल व मंत्री खोत यांच्यावरील कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘खोत यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक तक्रारी आला होत्या. विशेषत: शेतकरी संपामध्ये शेतकऱ्यांची बाजू न मांडता त्यांनी थेट सरकारची बाजू लावून धरली होती. त्यामुळे संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर २६ जून रोजी झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत मंत्री खोत यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. समितीचे अध्यक्ष सावंत यांनी तक्रारींची चौकशी करुन त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला असल्याचे आत्ताच समजले.’

मंत्री खोत यांच्याऐवजी दुसरा संघटनेचा प्रतिनिधी देणार का? याविषयी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, ‘मंत्री खोत संघटनेशी प्रामाणिक राहिले नाहीत. त्यामुळे त्यांची संघटनेतून हकालपट्टी केली आहे. सरकारमध्ये संघटनेचा प्रतिनिधी राहिलेला नाही. नवीन प्रतिनिधी द्यायचा किंवा नाही याबाबत लवकरच राज्य कार्यकारणीची बैठक बोलवण्यात येणार आहे. बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल. मात्र एकूण घटनाक्रम पाहता राज्य कार्यकारणीचा निर्णय काय आहे, हे लपून राहिलेले नाही, असेही त्यांनी सूचकपणे सांगितले. संघटनेने नेमलेल्या चौकशी समितीने घेतलेल्या निर्णयावर मंत्री खोत यांची कोणती प्रतिक्रिया येते त्यावरच पुढील निर्णय अवलंबून आहे. सरकारमध्ये शेतकऱ्यांचे व संघटनेचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत, त्यामुळे पुढील निर्णय त्यांनाच घ्यावा लागणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा दुरुस्तीसाठी १८ कोटींचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘जिल्ह्यातील शाळांमध्ये ५१३ नवीन खोल्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी ३७ कोटी ८९ लाख रुपयांची गरज आहे. तर ९८१ शाळांच्या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी ८१ लाख व १६१ शाळांच्या संरक्षक भिंतीसाठी नऊ कोटी रुपये लागणार आहेत. खोल्या दुरुस्ती व संरक्षक भिंतीसाठी लागणार १८ कोटी रुपयांचा निधी त्वरीत देऊन वर्षाखेरीस सर्व कामे पूर्ण होतील’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत सांगितले.

जिल्हा परिषदेच्यावतीने शाळांची पाहणी केली होती. पाहणीमध्ये जिल्ह्यातील ५१३ शाळांना नवीन खोल्यांची आवश्यकता आहे. तर ९८१ शाळांच्या खोल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. तर १६१ शाळांना संरक्षक भिंती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन खोल्या, दुरुस्ती किंवा संरक्षक भिंतीसाठी सर्व शिक्षा अभियानातंर्गत निधीची उपलब्धता होत नसल्याने अनेक ठिकाणी उघड्यावर वर्ग भरत आहेत. त्यामुळे सक्तीचे व मोफत शिक्षणाच्या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे खासदार शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.

‘नवीन खोल्यांसाठी ३७ कोटी ८९ लाखांचा निधी लागणार असून हा निधी सर्व शिक्षा अभियानातून आणण्यासाठी प्रयत्न करुन. शाळा दुरुस्ती व संरक्षक भिंतीसाठी लागणारा १८ कोटीचा निधी त्वरीत उपलब्ध करुन वर्षाखेरीस कामे पूर्ण होतील. तसेच जिल्ह्यात १६० तलाठी कार्यालयांची आवश्यकता असून त्यातील ५० तलाठी कार्यालये अद्ययावत उभारण्यात येणार आहेत’ असे पालकमंत्री पाटील म्हणाले.


कामांना आचारसंहिता नको

जिल्ह्यातील ४१२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकी दरम्यान अचारसंहितेमध्ये सरकारी कामे अडकली जात नव्हती. मात्र सद्या नव्याने घेतलेली काम अचारसंहितेमध्ये अडकणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना सर्वच लोकप्रतिनिधिंनी केली.


‘महाराष्ट्र टाइम्स’चा पाठपुरावा

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील पडझड झालेल्या शाळांची अवस्था व व्हरांड्यामध्ये भरणाऱ्या वर्गांसंबंधी ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध करुन प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेने शाळांची पाहणी करून नवीन खोल्या, दुरुस्ती व संरक्षक भिंतीसाठी लागणाऱ्या निधीचा आराखडा तयार केला. तयार आराखड्यानुसारच सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजम मंडळाच्या बैठकीत तब्बल १८ कोटींचा निधी देऊन वर्षाखेरीस कामे पूर्ण करण्याच्या सूचना स्वत: पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images