Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अतिक्रमण काढताना वादावादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टिंबर मार्केट भाजी मंडईत नियमापेक्षा जादा जागा बळकावत त्यावर विनापरवाना कट्टे आणि पत्र्याचा शेड महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथाकेन गुरुवारी काढून टाकले. यावेळी भाजी विक्रेत्यांनी कारवाईला विरोध करत जेसीबी व इतर मशिनरी अडवली. काही महिला विक्रेत्या मशिनरीच्या आडव्या उभ्या राहिल्याने तणाव निर्माण झाला. अधिकाऱ्यांशी हुज्जत, आरडाओरड यामुळे जवळपास तीन तास या भागात तणावाचे वातावरण होते. यावेळी विरोध करणाऱ्या मनसेचे पदाधिकारी राजू जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजीविक्रेतेही नरमले. त्यानंतर पुन्हा कारवई सुरू केली. क्रशर चौकातील विनापरवाना चायनीज स्टॉलही पथकाने काढले.

या कारवाईत ५० हून अधिक शेड व टपऱ्या हटविल्या. परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर शंभरहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले. महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, अतिक्रमण विभाग व इस्टेट विभागामार्फत कारवाई झाली. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महापालिकेचा फौजफाटा टिंबर मार्केट भाजी मंडई परिसरात दाखल झाला. उपशहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुनील भाईक, सागर शिंदे, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडित पोवार यांच्या सूचनेप्रमाणे पवडी, इस्टेट, विद्युत व अतिक्रमण विभागाकडील कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू केली. कारवाईला भाजी विक्रेत्यांनी विरोध केला. त्यावेळी उपशहर अभियंता रमेश मस्कर यांनी भाजी विक्री करण्यास कोणताही विरोध नाही. महापालिकेने भा​जी विक्रेत्यांना जागा निश्चित करुन दिली आहे. मात्र अनेक विक्रेत्यांनी जादा जागा व्यापली आहे, त्यावर विना परवाना शेड, कट्टे बांधले आहेत. विक्रेत्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा काढल्या होत्या, असे सांगितले.

वादावादीमुळे मोहिमेत अडथळे

महापालिकेने नोटिसा देऊनही विक्रेत्यांनी अतिक्रमण काढून घेतले नसल्यामुळे कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या जेसीबी व इतर यंत्रणेच्या मदतीने पत्र्याचा शेड, व कट्टे काढावयास सुरुवात झाल्यानंतर विक्रेत्यांकडून विरोध वाढला. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. कारवाई सुरु असताना मनसेचे पदाधिकारी जाधव कारवाईस्थळी येऊन विरोध करण्यास सुरुवात झाली. यावेळी भाजी विक्रेते व अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. ​अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रकार, आरडाओरड, गोंधळामुळे तणाव निर्माण झाला. यामुळे दोन वेळा अतिक्रमण विरोधी मोहिम थांबवावी लागली. जाधव व भाजी विक्रेत्यांनी कारवाईला विरोध करत महापालिकेची मशिनरी रोखली. काही जण मशिनरीच्या आडवे उभे राहिले. तणाव निर्माण झाल्याने अधिकाऱ्यांनी आयुक्त चौधरी यांना माहिती दिली. त्यानंतर जादा पोलिस बंदोबस्त मागविला. मोठ्या संख्येने पोलिस आल्यानंतर पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. नियमबाह्यपणे जागा व्यापणाऱ्या आणि कारवाईवेळी आडमुठी भूमिका घेणाऱ्या जाधव व काही भाजी विक्रेत्यांच्या भूमिकेविषयी नागरिकांतून उलटसुटल मते उमटली. दरम्यान नागरिकांकडून अतिक्रमण विरोधी कारवाईचे स्वागत होत आहे.


५० शेड, टपऱ्या हटविल्या

विद्युत पोलवरील ७५ बॅनर्स काढले

जुना वाशी नाका, राज कपूर पुतळा, सानेगुरुजी वसाहत रोडवरही कारवाई

देवकर पाणंद परिसरातील विना परवाना होर्डिग्जवर कारवाई

जुना राजवाडा पोलिस स्टेशनकडून मोठा बंदोबस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घनवट, चंदनशिवे शरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगरच्या लुटीतील सात संशयित पोलिसांपैकी दोन संशयित पोलिस अखेर सीआयडीसमोर शरण आले. निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे हे दोघे गुरूवारी (ता. ३) दुपारी सीआयडीच्या कार्यालयात हजर झाले, तर पोलिस कॉन्स्टेबल कुलदीप कांबळे याला हायकोर्टाने जामीन मंजूर करून सीआयडीकडे तीन दिवस हजेरी लावण्याचे आदेश दिल्याने कांबळे यानेही हजेरी लावली. घनवट आणि चंदनशिवेंना शुक्रवारी (ता. ४) पन्हाळा कोर्टात हजर केले जाणार आहे.

मार्च २०१६ मध्ये वारणानगर येथील शिक्षण संस्थेच्या इमारतीतून मैनुद्दीन मुल्ला या चोरट्याने सव्वातीन कोटींची रक्कम लंपास केली होती. प्रकरणाचा तपास करताना सांगली गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह सात पोलिसांनी मुल्लाशी संगनमत साधून ‘त्या’ इमारतीमधील ९ कोटी १३ लाख रुपयांवर डल्ला मारला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निरीक्षक घनवट, चंदनशिवे, शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळेसह मुल्ला आणि प्रवीण सावंत या नऊ संशयितांवर कोडोली पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यातील पोलिसांनी अटकपूर्व जामीनासाठी पन्हाळा आणि जिल्हा व सत्र कोर्टात धाव घेतली, मात्र कोर्टाने जामीन फेटाळले. यानंतर हायकोर्टात गेलेले घनवट, चंदनशिवे, दीपक पाटील यांना हायकोर्टाने पोलिसांत शरण येण्याचे आदेश दिले होते. यानुसार गुरूवारी घनवट आणि चंदनशिवे हे कोल्हापुरात सीआयडी कार्यालयात शरण आले.

दुपारी दोनच्या सुमारास घनवट आणि चंदनशिवे हे दोघे वकिलांसह सीआयडीच्या कार्यालयात पोहोचले. वारणा लुटीतील पोलिस शरण आल्याची माहिती मिळताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी सीआयडीच्या कार्यालयासमोर गर्दी केल्याने संशयित घनवट आणि चंदनशिवे यांनी तोंड दडवण्यास सुरुवात केली. प्रभारी अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी दोघांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर चारच्या सुमारास वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना सीपीआरमध्ये पाठवले. ‘या दोघांना शुक्रवारी पन्हाळा येथील कोर्टात हजर केले जाणार असून, चौकशीसाठी अधिकाधिक पोलिस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न आहे. अटकेतील संशयितांची सखोल चौकशी करून अद्याप अटक नसलेल्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरूच ठेवले जातील. संशयित दीपक पाटील याने मात्र शरण टेण्यास टाळाटाळ करून हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे,’ अशी माहिती सीआयडीचे प्रभारी अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी दिली. यावेळी संशयितांचे वकील धाराशिवकर आणि योगेश निकम यांच्यासह संशयितांचे नातेवाईकही उपस्थित होते. वैद्यकीय तपासणीनंतर घनवट आणि चंदनशिवे यांची करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचेअपहरण करुन छळ

$
0
0

इचलकरंजी

तारदाळ (ता. हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा सात महिने छळ केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी गुरुवारी पाचजणांना अटक केली. आबा हिंदुराव साळुंखे (वय ६४, रा. बांदा जि. सिंधुदुर्ग), सागर आबा साळुंखे (वय २६, रा. आजरा), सुभाष हिंदुराव गोसावी (वय ३४, रा. लिंगनूर), गुलाब धोंडीराम गोसावी (वय २७, रा. सुळकूड) व विलास पाटलू गोसावी (वय ४५, रा. मुडशिंगी) अशी त्यांची नावे आहेत

तारदाळ येथील आझादनगर परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी २९ सप्टेंबर २०१६ रोजी शौचास जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती. त्यावेळी तिच्या वडीलांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार शहापूर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांबरोबर नातेवाईक मागील सात महिन्यांपासून तिचा शोध घेत होते. २६ जुलै २०१७ रोजी कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील बसस्थानकावर पिडीत मुलगी रडताना मिळून आली होती. त्यावेळी तेथील प्रवाशांनी मदत केल्याने तिचा इचलकरंजीतील नातेवाईकांशी संपर्क झाला. त्यानंतर संबंधित मुलीस कुडाळ पोलिसांकडून शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन इचलकरंजीत आणले. मुलीकडे चौकशी करता सात महिन्यात तिचा अनन्वित छळ करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. एका बंद खोलीत तिला ठेवून तिच्याकडून खवल्या मांजराचे खवले काढण्याचे काम करुन घेण्यात येत होते. उपाशी ठेवून तिला मारहाण करण्याबरोबरच तिच्याशी अश्लिल चाळे केले गेल्याचेही तपासात समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्याच्या धुंदीतच त्यांनी मृत्यूला कवटाळले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

वर्षा पर्यटनासाठी आंबोलीजवळील कावळेसाद येथे गेलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील दोन तरुणांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. सर्वाधिक चर्चा सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा जीव गेल्याची होत होती. अपघातात मरण पावलेल्या या तरुणांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. मात्र गुरूवारी सकाळी अचानक प्रत्यक्ष घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या तरुणांनी दारूच्या नशेत स्टंट करताना जीव गमावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्याविषयी वाटणाऱ्या सहानभुतीची जागा चिडीने घेतली.

आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या सात मित्रांच्या टोळक्यातील दोघांचा कावळेसाद दरीत कोसळून मृत्यू झाला. प्रताप राठोड आणि इम्रान गारदी अशी या तरुणांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर गुरुवारपर्यंत या तरुणांचा मृतदेह जवळपास ८०० फूट खोल दरीतून काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी बाबल आल्मेडा, अॅडव्हेंचर संस्थांचे स्वयंसेवक तसेच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मदतीसाठी दाखल झाले आहेत. ऐन तरुणाईत केवळ काहीतरी वेगळे करून दाखविण्याच्या हट्टापायी दारूच्या आहारी जाऊन या तरुणांनी आपला जीव गमावल्याचे बुधवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओने स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये हे दोन्ही तरूण दरीच्या काठावरील संरक्षक कठडा धरून स्टंट करताना दिसत आहेत. याहीपेक्षा भयानक म्हणजे या दोन्ही तरुणांच्या हातात दारूच्या बाटल्या आहेत. स्वतःचा तोल सावरता येऊ नये, इतके मद्यप्राशन केल्याचे या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. संरक्षण कठड्यापासून लांब राहून आनंद लुटा, या असे आवाहन करणारे फलक स्थानिक प्रशासनाने येथे लावले आहेत. मात्र या आवाहनाला तिलांजली देऊन हे दोघेही थेट रेलिंग पार करून दरीच्या बाजूला गेल्याचेही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू मद्यधुंद अवस्थेतील त्यांच्याच बेपर्वाईमुळे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून आंबोली येथे लाखो पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. मात्र येथे वाढलेली हुल्लडबाजी पाहून कुटुंबांसमवेत येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. परिणामी निसर्गाने नटलेल्या आंबोली परिसराला गालबोट लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिये ते बावडा रस्त्यावर जाताहेत जीव

$
0
0

राहुल मगदूम, कसबा बावडा

शहर रस्ते विकास प्रकल्पातील स्ट्रीट लाइटकडे महानगरपालिकेने केलेल्या दुर्लक्षाचा फटका शहरवासियांना बसत आहे. त्यातही सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य असल्याने कसबा बावडा ते शिये हा रस्ता दिवसेंदिवस धोदाकायक बनत आहे. बुधवारी रात्री अंधारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कसबा बावड्यातील बिरंजे पाणंद येथील तरुण उदय कळंत्रे यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावरील ७२ स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पात आयआरबी कंपनीने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता म्हणून कसबा बावडा ते शिये रस्ता विकसित केला. महामार्गापासून शहरात येण्यास जवळचा मार्ग आणि कोल्हापूरचे प्रवेशद्वार या हेतून रस्त्याचे रुंदीकरण केले. कसबा बावड्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करून रस्ता शंभर फूट रुंद करण्यात आला. शिये गावच्या हद्दीपासून तीन किलोमीटरपर्यंत रस्ता शंभर फुटांचा आहे. या रस्त्यावर ७२ स्ट्रीट लाइट बसविण्यात आल्या आहेत. सुरुवातीला हे पथदिवे सुरू होते. मात्र नंतर त्यातील एक आड एक दिवे सुरू ठेवण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच स्ट्रीटलाइट बंद आहेत.

त्यामुळे अंधारात वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना अंधारात एकाबाजूने जाणारे पादचारी दिसत नसल्याने अपघात वाढले आहेत. असा अपघातात गेल्या दोन वर्षांत स्थानिक नागरिकांचे बळी गेले आहेत. याशिवाय अन्य छोट्या अपघातांची संख्याही वाढली आहे. चार महिन्यांपूर्वी बंद असलेल्या शिये टोलनाक्यावर एका वाहनधारकाने धडक दिली होती. खांबाला धकडल्याने मोटार पलिकडील लेनमध्ये जाऊन अपघात घडला होता. या वाढत्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी बंद स्ट्रीटलाइटबाबत महापालिकेला कळविले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

बुधवारी रात्री उदय कळंत्रे या पस्तीस वर्षीय पेंटर तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. जेमतेम आर्थिक उत्पन्न परिस्थिती असलेल्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत उदय याची आई एका खाजगी दवाखान्यात काम करतात. उदय आणि त्याचा भाऊ कुटुंबाला आधार आहेत. या अपघातानंतर त्याची आई आणि भाऊ विमनस्क अवस्थेत आहेत. शाहूपुरी पोलिसांनी बुधवारच्या अपघातातील वाहनधारकाचा शोध घ्यावा आणि महापालिकेने तातडीने स्ट्रीट लाइट सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूच्या लसीचा तुटवडा

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा फैलाव वाढला आहे. जिल्ह्यात या आजारामुळे १६ जणांना बळी गेला आहे. स्वाइन फ्लूवर तातडीने उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली इन्फ्ल्यूव्हॅक ही लसच जिल्ह्यात उपलब्ध नाही. या प्रतिबंधात्मक लसीची खरेदी राज्य सरकारने केलेली नाही. काही दिवसांवर आलेला दहहंडी आणि गणोशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर या आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. सीपीआरमध्ये ही लस उपलब्ध नसली तरी खासगी रुग्णालयांत लहान मुलांसाठी ५५० आणि मोठ्या व्यक्तिंसाठी ८५० रुपयांना ही लस दिली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फ्ल्यूने १६ जणांचा बळी घेतला आहे. सरकारी रुग्णालयांत यावर प्रभावी उपचार होत नसल्याचे समोर आल्यानंतर नातेवाईक रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करत आहेत. मात्र, लाखो रुपयांचे बिल आल्यानंतर नातेवाईक हवालदील होत आहेत. स्वाइन फ्ल्यूच्या लसीचे उत्पादन कोलकत्ता, कसोली या ठिकाणी होत असून खासगी वितरकांकडून लस उपलब्ध करून दिली जाते. मात्र अद्याप राज्य सरकारने या लसीची खरेदी केलेली नाहीत. तीव्र स्वरूपाच्या आजारात ही लस दिली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढत असतानाही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सीपीआरमध्ये स्वाइन फ्ल्यूसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापला आहे. याठिकाणी संशयित रुग्णांची तपासणी केली जाते. लहान मुलांना सिरप दिला जात आहे. तर मोठ्या व्यक्तिंना टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या दिल्या जात आहेत. आजाराची शक्यता अधिक असेल तर पुणे प्रयोगशाळेकडे नमुने दिले जात आहेत. या नमुन्याचा अहवाल येण्यास चार दिवसांचा कालावधी उलटतो. तोपर्यंत रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झालेला असतो.

खासगी रुग्णालयांत लूट

गरोदर माता, शुगर, कॅन्सरग्रस्त, स्थूल व्यक्तिंना प्राधान्याने ही लस दिली जाते. मात्र या रुग्णांची संख्या सीपीआरमध्ये वाढत आहे. काहींना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला मिळाल्याने खासगी दवाखाना प्रशासनाकडून रुग्णांची लूट सुरू झाली आहे. खासगी रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात या लसीचा साठा केला आहे. स्वाइन फ्लूच्या भीतीमुळे कुटुंबात लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फायदा घेत मनमानी पद्धतीने रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे.

दहा हजारहून अधिक रुग्णांची तपासणी

शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या दहा हजारांहून अधिक रूग्णांची सीपीआरमध्ये तपासणी केली आहे. जानेवारी २०१७ पासून १८८ जणांवर उपचार केले असून ते बरे झाले आहेत. सध्या सीपीआरमध्ये १४ आणि अन्य ठिकाणी ९ जणांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण तपासणीसाठी गेल्यानंतर खासगी डॉक्टरांकडून इन्फ्ल्यूव्हॅक लस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. गेल्या आठवड्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होती. नागरिकांकडून लसीची मागणी वाढल्याने काही खासगी डॉक्टर लसीचा साठा संपल्याचे सांगतात. या लसीची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने सीपीआर आणि २१ ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. या लसीच्या विक्रीसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून इन्डेक्स एस हे प्रमाणपत्र आणि आरोग्य प्रशासनाकडून मेडिकल्सला घ्यावे लागते.

स्वाईन फ्ल्यूवर प्रतिबंधक करणारे औषधोपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७५० लोकांना लस दिली आहे. या लसीसाठी आरोग्य विभागाकडे मागणी केलेली आहे. मात्र अद्याप साठा आलेला नाही. तीव्र स्वरूपाच्या आजारात ही लस वापरली जाते.

डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक

खासगी दवाखान्यात उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष लक्ष देऊन स्वाइन फ्लूची लस मागवावी. सरकारी दवाखान्यात किंवा खासगी रुग्णालयांत नाममात्र शुल्कात रुग्णांसाठी उपलब्ध करून द्यावी.

संदीप पाटील, संशयित रुग्ण


स्वाइन फ्लूवर इन्फ्ल्यूव्हॅक लसीच्या खासगी वितरणाला परवानगी दिली आहे. राज्य सरकारने ही लस उपलब्ध करून दिल्यास उपाययोजनांवरील खर्च कमी होऊ शकतो. लसीच्या वितरणाला परवानगी दिल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे.

निखिल धर्माधिकारी, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हव्यासाने तोंड लपविण्याची वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच चोरट्याशी संगनमत केले. चोरीच्या घटनेचा तपास करण्याऐवजी घटना दडपण्याचा प्रयत्न करून तब्बल ९ कोटी १३ लाख रुपयांवर डल्ला मारला. हव्यासाच्या काही क्षणांनी सांगलीतील सात पोलिसांवर पोलिस दलातून निलंबित होण्यासह तोंड लपवण्याची वेळ आली. इतरवेळी सराईत गुन्हेगारांना पलिस कोठडीत धाडणाऱ्या पोलिसांवरच आता कोठडीत जाण्याची वेळ आल्याने याची चर्चा कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील पोलिसांमध्ये सुरू आहे.

सांगली क्राइम ब्रॅचचे निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट याच्या पथकाने मैनुद्दीन मुल्ला याला पकडून त्याच्याकडून सव्वातीन कोटी रुपये जप्त केले होते. हे पैसे त्याने वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतून चोरून आणल्याचे समजल्यावर तेथे तपासाच्या नावाखाली छापा टाकून ९ कोटी, १३ लाख रुपये जप्त केले. संगनमताने ही रक्कम हडप केली. वरिष्ठांच्या तपासात हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर कोडोली पोलिसांत घनवटसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला. घनवट यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत काम करताना सांगलीतील गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. अवैध धंदे रोखण्यातही त्यांचा पुढाकार होता, मात्र पैशांचा मोहापायी स्वतःच कोठडीत जाऊ याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. पाच महिने जामिनासाठी धावाधाव केल्यनंतर अखेर ते सहकारी सूरज चंदनशिवे याच्यासह सीआयडीकडे शरण आले.

वादग्रस्त सूरज चंदनशिवे

सांगली एलसीबीकडे २०१६ मध्ये नेमणूक झालेले सहायक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे हा वादग्रस्त अधिकारी म्हणून सांगलीत परिचित आहे. मार्च २०१६ मध्ये वारणानगर येथे पहिला छापा चंदनशिवे याच्याच पथकाने टाकला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा संयुक्त छापा टाकून मोठी रक्कम ताब्यात घेतली. सव्वा नऊ कोटीची चोरी केल्याचे दोन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. एप्रिल २०१७ पासून तो फरारी होता. अखेर गुरूवारी तो सीआयडीकडे शरण आला.

इतर संशयितांना होणार अटक

कोडोली पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या ८ पोलिसांपैकी रवींद्र पाटील व शंकर पाटील यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न केले नाहीत. जिल्हा न्यायालयातून त्यांचा जामीन फेटाळला आहे, त्यामुळे सीआयडी त्यांच्या अटकेसाठी प्रयत्नशील आहे. तसेच इतर संशयितांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती सीआयडीचे प्रभारी अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

मालमत्तेची होणार चौकशी

अटकेतील विश्वनाथ घनवट व सूरज चंदनशिवे यांची पोलिस कोठडी घेतल्यानंतर त्यांच्या मालमत्तेची सीआयडीकडून चौकशी होणार आहे. ९ कोटी १३ लाख रुपये त्यांनी कुठे गुंतवले? त्यातून स्थावर व जंगम मालमत्ता घेतली आहे का? पाहुणे, मित्र यांच्या नावाने काही जमीन, दागिने खरेदी केले आहेत काय? याची चौकशी होणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

वकिलांचा कोर्टात अर्ज

विश्वनाथ घनवट आणि सूरज चंदनशिवे यांच्या वकिलांनी गुरुवारी दुपारी पन्हाळा कोर्टात अर्ज सादर केला. घनवट आणि चंदनशिवे यांनी सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले असून, शुक्रवारी हे दोघे कोर्टात हजर राहणार आहेत. असा अर्ज वकील धाराशिवकर आणि योगेश निकम यांनी न्यायाधीश विजय अवघडे यांच्याकडे सादर केला.

कुलदीप कांबळेची हजेरी

संशयित पोलिस नाईक कुलदीप कांबळे याला हायकोर्टाने अंतरीम जामीन मंजूर केला असून, ३ ते ५ ऑगस्टला सीआयडीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. हजेरीदरम्यान कांबळे याची चौकशी करून जामिनासाठी अहवाल पाठवण्याची सूचना हायकर्टाने सीआयडीला केली आहे. यानुसार कांबळे याचा अहवाल पाठवल्यानंतर त्याच्या जामिनावर अंतिम निर्णय होणार आहे.

घटनाक्रम

८ मार्च २०१६ : वारणानगर येथे मैनुद्दीन मुल्लाकडून ३ कोटी १५ लाखाची चोरी

१२ मार्च : मैन्नुद्दीनला अटक

१३ मार्च : सांगली पोलिसांकडून वारणेत तपास

१५ मार्च : तपासाच्या नावाखाली ९ कोटी १८ लाखांवर डल्ला

जानेवारी २०१७ : झुजारराव सरनोबत यांची आयजींकडे तक्रार

जानेवारी : चौकशीला प्रारंभ

फेब्रुवारी : चौकशी अहवाल विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे

१६ एप्रिल : सांगलीच्या ८ पोलिसांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा

१७ एप्रिल : संशयित ८ पोलीस फरारी

जून : चौघा संशयितांचे जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज

जून : जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळले

जुलै : घनवट चंदनशिवे यांने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल

जामीन फेटाळ्याने पोलिसात हजर होण्यासाठी ४ ऑगस्टपर्यंत मुदत

३ फेब्रुवारी : घनवट, चंदनशिवे सीआयडीला शरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथ्या दिवशीही मृतदेह दरीतच

$
0
0

आजरा

आंबोलीमधील कावळेसाद दरीमध्ये पडलेल्या गडहिंग्लजच्या दोन्ही तरूणांचे मृतदेह अद्याप दरीतच चौथ्या दिवशीही जैसे थे च राहिले. सांगेली, आंबोली आणि कोल्हापूरच्या तीन शोधपथकांच्या अथक प्रयत्नांनंतरही मृतदेह दरीतून वरती काढण्यात आतापर्यंत अपयश आले. यामुळे मृतांच्या नातलगांची गुरूवारीही घोर निराशा झाली. दरम्यान, दरीत पडलेल्या प्रताप उजगरे (राठोड नव्हे, नातलगांकडून समजलेले मूळ आडनाव, रा. बीड) याचा मृतदेह अद्याप दरीच्या कठड्यावरून दिसत असून इम्रान गारदी (रा. हुनगीनहाळ, ता. गडहिंग्लज) याचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहाने दरीच्या खाली वाहून गेल्याचे सांगण्यात आले.

सोमवारी (ता.३१) सायंकाळच्या सुमारास येथील कावळेसाद दरीमध्ये इम्रान व प्रताप हे दोन तरूण पडले. त्यानंतर सुरू झालेल्या शोधकार्यास गुरूवारी चार दिवस उलटले. तेव्हापासून अथकपणे दोन्ही मृतदेह काढण्यासाठी कोल्हापूरच्या तीन, सांगेली (ता. सावंतवाडी) व स्थानिक आंबोलीकरांचे प्रत्येकी एक अशा पाच कथकांचे प्रयत्न राहिले. पण मृतदेह वरती काढणे जमलेले नाही. यामुळे शोधपथकांच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यासाठी अर्थातच येथील पर्यावरणीय स्थितीही कारणीभूत ठरली आहे. कावळेसाद दरीची शेकडो फूट खोली, घोंघावणारे वारे, मुसळधार पाऊस, गडद धुके आणि दरीत सातत्याने कोसळणा-या पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळेही शोधकार्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होत असल्याची वस्तुस्थिती आहे. बुधवारी शोधासाठी दरीत उतरलेले सांगेली पथक दरीतून वर आले, पण कोल्हापूरचे दोघे साहसवीर रात्रभर दरीतच अडकून राहिले होते. तरीही सलग चौथ्या दिवशीच्या पथकांच्या प्रयत्नांतील अपयशामुळे विशेषत: मृतांच्या नातेवाईकांची निराशा लपून राहिलेली नाही.

या परिस्थितीत जोरदार पावसामुळे मृतदेह वाहून खाली सरकले आहेत. इम्रानचा मृतदेह तर पाण्याच्या प्रवाहात दूरवर वाहून गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. सांगेलीचे पथक गुरूवारी शिरसंगेहून कावळेसाद दरीच्या पायथ्याकडे कूच करीत होते. त्यांना वाटेमध्ये हा मृतदेह आढळल्यास तेथून ते माघारी फिरतील आणि शुक्रवारी दरीतील मृतदेह वरती आणतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र याबाबत त पथकाशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहाजणांवर हद्दपारीची कारवाई

$
0
0

इचलकरंजी

विविध प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद असलेल्या सहाजणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. येथील उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी हा आदेश दिला आहे. दहापैकी सहाजणांवर कारवाईचे आदेश दिले असून चारजणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. येत्या काही दिवसात त्यांच्यावरही हद्दपारीची कारवाई अटळ आहे.

मारामारी, मटका, जुगार यासह विविध गुन्हे दाखल असलेल्या इचलकरंजी, शहापूर, कुरुंदवाड व पेठवडगांव येथील सहाजणांवर ही कारवाई करण्यात आली आहेत. सागर नामदेव शिंदे व प्रतिक अशोक शिंदे (दोघे रा. पेठवडगांव) याला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. इचलकरंजीतील सराईत गुन्हेगार द्वारकाधिश जयनारायण खंडेलवाल (रा. भोनेमाळ) याला जिल्ह्यातून दीड वर्षासाठी तर गजानन बजरंग नेमिष्टे (रा. शेळके गल्ली) याला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील ३३ प्रस्ताव दाखल होते. त्यातील दहा प्रस्तावांची चौकशी पूर्ण झाली असून उर्वरीत २३ प्रस्ताव प्रलंबित आहेत. सहा प्रस्ताव निकाली काढले असून चार प्रस्तावावर सुनावणी होणे बाकी आहे.

दरम्यान, गणेशोत्सवामया पार्श्वभूमीवर शिवाजीनगर, गावभाग व शहापूर हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई येत्या काही दिवसात केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीत खेळाडूंवर अन्याय

$
0
0


Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : राज्यात मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या खेळाडूंना पाच टक्के आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. क्रीडा उपसंचालक कार्यालयाने खेळाडूंचे पडताळणी प्रमाणपत्र वेळेत न पाठविल्याने खेळाडूंना पोलिस भरतीत अपात्र ठरवले आहे. क्रीडा उपसंचालकांच्या दिरंगाईचा फटका राज्यातील सुमारे ३०० खेळाडूंना बसला असून, हे खेळाडू न्यायासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात खेटे घालत आहेत. या प्रकाराने खेळाडूंबद्दल असलेली सरकारी यंत्रणांची उदासिनता स्पष्ट झाली आहे.

गृह विभागाने मार्च २०१७ मध्ये ६२३९ पदांसाठी पोलिस भरतीची प्रक्रिया राबविली. पाच टक्के आरक्षणानुसार यातील ३१२ जागा खेळाडूंसाठी आरक्षित होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील ६६ जागांपैकी दोन जागा खेळाडूंसाठी आरक्षित होत्या. जिल्ह्यातील भरती प्रक्रियेत शंभरहून अधिक खेळाडूंनी हजेरी लावली. यातून दोन खेळाडूंची निवड झाली. पात्र ठरलेल्या खेळाडूंनी २० मार्चपूर्वीच पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. बहुतांश खेळाडूंना विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडून पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळालेले नाही, त्यामुळे भरती प्रक्रियेत पात्र ठरल्यानंतरही वेळेत प्रमाणपत्र सादर न केल्याने खेळाडूंना पात्रता यादीतून वगळले आहे.

विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाने खेळाडूंचा अर्ज मिळाल्यानंतर २० दिवसांत पडताळणी प्रमाणपत्र त्यांच्या पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे. सेवा हमी कायद्यातही याचा समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र क्रीडा उपसंचालक कार्यालयातील दप्तर दिरंगाईने खेळाडूंवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. कोल्हापुरातील एका खेळाडूने पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ३ डिसेंबर २०१६ मध्येच पुणे येथील विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज कला होता. मार्च २०१७ पर्यंत संबंधित खेळाडूने वारंवार उपसंचालक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नोकरीचा प्रश्न असल्याने तातडीने प्रमाणपत्र पाठविण्याच्या विनवण्या केल्या. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर २१ एप्रिल २०१७ रोजी प्रमाणपत्र घरी पाठवले. २३ डिसेंबर २०१६ रोजी मिळणारे प्रमाणपत्र २१ एप्रिल २०१७ मध्ये मिळाले. परिणामी मुदतीत पडताळणी प्रमाणपत्र न पोहोचल्याने खेळाडूला पोलिस भरतीत अपात्र ठरवण्यात आले आहे.

क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या दिरंगाईमुळे नोकरी गमावण्यची वेळ आल्याने एका खेळाडूने नातेवाइकांसह पुण्याला जाऊन अधिकाऱ्यांचे पाय धरले. दिरंगाईचे पत्र मिळवले. मात्र, आता पोलिस अधीक्षक कार्यालयातील कारकूनशाही त्रास देत आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही उपसंचालक कार्यालयाची दिरंगाई मान्य करून नैसर्गिक तत्त्वाने खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजे असे कबूल केले. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याने खेळाडू हतबल झाला आहे. शाळा, कॉलेजमध्ये स्वतःला सिद्ध करीत खेळात स्थान मिळवले. राज्यस्तरावर खेळून कॉलेजसाठी पदके जिंकली. मात्र, सरकारी अनास्थेमुळे नोकरी गमावण्याची वेळ आल्याने खेळाडू हतबल झाले आहेत. पोलिस अधीक्षकांनी न्याय द्यावा, अशी मागणी खेळाडूंसह त्यांच्या नातेवाइकांनी केली आहे.

राज्यात ३०० खेळाडूंना फटका

६२३९ पदांसाठी राबविलेल्या भरतीप्रक्रियेत खेळाडूंना नियमानुसार पाच टक्के आरक्षण होते. आरक्षणानुसार त्यांच्या वाट्याला ३१२ जागा होत्या. काही मोजक्याच खेळाडूंकडे मुदतपूर्व पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध होते, त्यामुळे त्यांची निवड होऊ शकली. उर्वरित सुमारे ३०० खेळाडूंची नावे पडताळणी प्रमाणपत्राअभावी यादीतून वगळण्यात आली आहेत. ही पदे अद्यापही रिक्त ठेवली आहे.

पडताळणीला विलंब

राज्यभरातील खेळाडूंनी याबाबत तक्रारी केल्यानंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ४ जुलै २०१७ रोजी राज्यातील सर्व जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. ‘खेळाडूंची पडताळणी करण्यासाठी स्पर्धा ज्या ठिकाणी झाली, तिथे चौकशी केल्यानंतरच पडताळणी प्रमाणपत्र तयार होते. अनेकदा स्पर्धांचा कालावधी पाच ते सहा वर्षांपूर्वीचा असतो, त्यामुळे जुने रेकॉर्ड मिळवण्यास वेळ लागतो, त्यामुळे पोलिस भरतीत पात्र ठरलेल्या खेळाडूंचे उशिरा मिळालेले पडताळणी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे,’ अशी विनंती प्रभारी आयुक्त नरेंद्र सोपल यांनी पत्राद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिंबर मार्केटमधील भाजी विक्रेत्यांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टिंबर मार्केट येथील भाजी मंडई अधिकृत असल्याने तेथे अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा येथील भाजी विक्रेत्यांनी दिला. महापालिकेवर मोर्चा काढत विक्रेते बंद प्रवेशद्वाराची साखळी तोडून आत घुसले. यामुळे महापालिकेत तणाव निर्माण झाला होता. स्थानिक नगरसेवकांनी ही मंडई हटवण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

टिंबर मार्केट येथे दीडशे भाजी विक्रेते व शेतकरी रोज भाजी विक्री करतात. काही विक्रेत्यांनी तेथे मंडप मारले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिका अतिक्रमण हटाव विभागाने येथील सर्व अतिक्रमण हटवले. तेव्हा विक्रेत्यांनी जोरदार विरोध केला. या विक्रेत्यांनी मनसेच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला. हा मोर्चा प्रवेशद्वारावर अडविण्यात आला. विक्रत्यांनी दरवाज्याची साखळी तोडत महापालिका चौकात प्रवेश केला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपमहापौर अर्जुन माने यांनी त्यांच्याशी ​चर्चा केली. दुपारी चार वाजता शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. पंधरा वर्षांपूर्वी महापालिकेनेच ही जागा विक्रत्यांना दिली आहे. त्यामुळे तेथील अतिक्रमण हटवू नये अशी मागणी त्यांनी केली. याबाबत चार दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

मोर्चात राजू जाधव, बबन सावरे, राज मकानदार, सुरय्या बागवान, जयश्री जाधव, शेवंता कांबळे, विनायक पाटील यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर गटाला दणका

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली
बहुचर्चित मिरज पाणीपुरवठा योजनेच्या निविदेबाबत स्थायी समितीने केलेल्या ठरावाला स्थगिती मिळावी म्हणून महापौर गटाने दाखल केलेली याचिका गुरुवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयाने महापौर गटाला धक्का बसला असून, अपील करण्यासाठी १९ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, या बाबत योग्य त्या न्यायालयात अपील करणार असल्याचे महापौर हारुण शिकलगार यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून मिरज शहरासाठी १०३ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यापैकी ८७ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रशासनाने काढली होती. या निविदेवरून गेल्या महिन्याभरापासून महापालिकेत महासभा आणि स्थायी समितींमध्ये वाद सुरू आहे. जादा दराच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर महापौर गटाने त्याला विरोध केला. महापौर गटाच्या वतीने बाळासाहेब गोंधळी, पुष्पलता पाटील, प्रदीप पाटील, जरीना बागवान या सर्वपक्षीय नगरसेवकांसह आनंदा देवमाने व हेमंत खंडागळे व राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांच्या वतीने दोन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश बी. एस. गारे यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली होती. तसेच आयुक्त, स्थायी समिती सभापती, ठेकेदार, जीवन प्राधिकरणाला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. दाखल याचिकेवर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला होता. महापौर गटाच्यावतीने अ‍ॅड सुहास सेठ यांनी तर सभापतींच्या वतीने अ‍ॅड. प्रशांत नरवाडकर यांनी बाजू मांडली होती. आयुक्तांच्या वतीने अ‍ॅड. सुशील मेहता उपस्थित होते. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर गुरुवारी न्यायाधीश गारे यांनी याचिका नामंजूर केली. या बाबत अ‍ॅड. नरवाडकर म्हणाले की, पाणी योजनेसाठी राज्य सरकारने निधी दिला आहे. तसेच ठेकेदारांशी वाटाघाटी करून निविदा दरही सरकारी स्तरावरच कमी करण्यात आला आहे. निविदेला मंजुरी, वर्कऑडर देण्याचे अधिकार स्थायी समितीला आहे. महासभेने कोणतेही विषयपत्र नसताना फेरनिविदेचा ठराव केला होता. या बाबी आम्ही न्यायालयाला पटवून देण्यात यशस्वी ठरलो. या निकालामुळे मिरजेच्या पाणी योजनेचा मार्ग खुला होईल.
अपील करणार : महापौर
महापौर हारुण शिकलगार म्हणाले, ‘जिल्हा न्यायालयाने पाणी योजनेच्या निविदेबाबत दाखल याचिका नामंजूर केल्याचे समजले. पण, अद्याप सविस्तर निकालपत्र हाती आलेले नाही. न्यायालयाने १९पर्यंत निविदा प्रक्रियेच्या अंमलबजावणीला स्थगिती देत अपील करण्यासाठी मुदत दिली आहे. निकालपत्र येताच त्याचा अभ्यास करून योग्य त्या न्यायालयात अपील दाखल करणार आहे.’
मिरजेला पाणीपुरवठा महत्वाचा-हारगे
स्थायी समितीच्या सभापती हारगे म्हणाल्या, ‘मिरज शहरासाठी पाणी पुरवठा योजना महत्वाचा आहे. नागरी हितासाठी स्थायी समितीने निर्णय घेतला आहे. मुळात ठराव मंजूर करताना महापालिकेवर योजनेचा कसलाही वाढीव बोजा पडणार नाही, असा ठरावच केला असताना महापौर हारूण शिकलगार व इतर नगरसेवकांनी राजकीय हेतूने याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टॅब’अभावी रखडली पशुगणना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली :
सांगली जिल्ह्यासह राज्यात टॅबवरच पशूगनणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारे टॅबच अद्याप उपलब्ध करून दिले नसल्याने जिल्ह्यातील पशूगणना रखडली आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत पशूगणना करण्यात येणार होती. यंदा प्रथमच टॅबसारखे हायटेक तंत्रज्ञान वापरून केली जाणार असली तरी यंत्राअभावी पशूगणना रखडली असल्याचे समोर येत आहे.
पशूगणनेसाठी सरकारकडून टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टॅब मिळेपर्यंत पशूगणना करण्यात येऊ नयेत, असे आदेश सरकारने दिले आहेत. प्रगणक व पर्यवेक्षक नेमणुकीचे काम पूर्ण करून जिल्हा परिषद सज्ज होऊन बसली आहे. परंतु उर्वरित गणनेचे मुख्य नियोजन राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडे असल्याने सरकारी यंत्रणा हलल्याशिवाय पशूगणनेला प्रत्यक्षात सुरुवात होणे अशक्य आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक पाच वर्षांनी पशूगणना केली जाते. जिल्ह्यात २०१२मध्ये पशुगणना झाली होती. गायी, म्हैशी, कुत्री, कोंबड्यांपर्यंत जवळपास १९ लाखांवर पशूधन असल्याचे समोर आले होते. यामध्ये गायी २ लाख ७५ हजार, म्हैशी ६ लाख १२ हजार, मेंढ्या १ लाख ४ हजार, शेळ्या १ लाख ६२ हजार, घोडे दोन हजार असे पशूधन होते. आता २०वी पशूगणना येत्या १७ जुलैपासून करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी नियोजन राज्याचा पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे केले आहे. गणनेसाठी लागणारे प्रगणक व पर्यवेक्षक जिल्हा परिषद देणार असून, उर्वरित सर्व नियंत्रण राज्याच्या पशूसंवर्धन विभागाचे राहणार आहे. प्रगणक घरोघरी जाऊन पशूधनाची माहिती घेणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात एकाच वेळी गणना होणार आहे. ही गणना करण्यासाठी प्रत्येक प्रगणकाला टॅब दिले जाणार आहे. टॅबवरच सर्व माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात माहितीचे पृथक्करण करणे सोपे होणार आहे. तसेच सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने पशूधनाच्या संदर्भात विविध योजना व उपक्रम राबवण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडे टॅब नसल्याने सरकारकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. केंद्र सरकारकडूनही टॅब दिले जाणार असल्याने ते मिळेपर्यंत पशुगणनेचे काम थांबविण्यात यावे, असे आदेश सरकारने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सोलापूर झेडपीतराष्ट्रवादीचा गजरजिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजप आघाडीचे पुरते वस्त्रहरण झाले. पुरेसे संख्याबळ असूनही जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांचे पुतणे आणि माढाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आणि झेडपी सदस्य रणजितसिंह पाटील यांचा दारुण पराभव झाला. भाजप आघाडीच्या मतात मोठी फूट पडल्याने शिंदे यांची खेळी यशस्वी झाली.
दरम्यान, भाजप आघाडीने फोडाफोडी करून जिल्हा परिषदेची सत्ता काही महिन्यांपूर्वी हस्तगत केली होती. मात्र अवघ्या काही महिन्यांतच घड्याळाचे काटे उलटे फिरल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना धक्का बसला आहे. या निकालाचे ग्रामीण भागातील विशेषतः संजय शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढविलेल्या करमाळा मतदारसंघाच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या आठ जागांसाठी झालेल्या मतमोजणीत अखेर नगर पालिका गटातून मंगळवेढा नगर पालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक पक्षनेते अजित जगताप विजयी झाले. तर, जिल्हा परिषद गटातून सत्ताधारी गटाचे उमेदवार रणजितसिंग पाटील यांचा अनपेक्षित पराभव झाला.
सकाळी छत्रपती रंगभवनमधील राजस्व सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी नगरपालिका गटाची मतमोजणी करण्यात आली. नगरपालिका प्रवर्गासाठी असलेल्या २२७ मतदारांपैकी २०७ सदस्यांनी मतदान केले. त्यातील १० मतपत्रिका बाद झाल्याने १९५ वैध मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. मंगळवेढाचे नगरसेवक अजित जगताप यांनी ९८ मते मिळवून विजय संपादन केला. येथीलच शिवसेनेचे नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी यांना ९४ मते मिळाली आणि ते पराभूत झाले. तर, मैदर्गीचे नगरसेवक हणमंत आलुरे यांना फक्त तीन मते मिळाली.
जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागले. सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. ६८ पैकी ६७ सदस्यांनी मतदान केले. तर, पहिल्याच फेरीत एक मत बाद झाल्याने ६६ मतांची मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत विजयासाठी ८२६ असा कोटा ठरविण्यात आला. निमगाव येथील रणजितसिंह शिंदे यांना सहाव्या फेरीअखेर सर्वात कमी म्हणजे ७८५ मते मिळाल्याने त्यांना पराभूत घोषित करण्यात आले. मतमोजणीच्या एकून सात फेऱ्या झाल्या. पहिल्याच फेरीत सचिन देशमुख (कोळे), अतुल पवार (मेथवडे), उमेश पाटील (तोरणागड) आणि भारत शिंदे (अरण) यांनी कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. सचिन देशमुख यांना सर्वाधिक एक हजार ३०० मते मिळाली. तर, अतुल पवार, उमेश पाटील आणि भारत शिंदे यांना प्रत्येकी ९०० मते मिळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कास पुष्प पठारावर फुले उमलण्यास सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेल्या कास पुष्प पठाराला बहरण्याचे वेध लागले आहेत. पठारावर सध्या तृण, कंद, वेली, आर्किड या फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच मार्गात ठिकठिकाणी लहानमोठे धबधबे कोसळत असल्याने हौसी पर्यटकांना निसर्गाचा नजराणा अनुभवास मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता तसेच दुर्मीळ फुलांमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सर्वसाधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये असतो. परंतु, आतापासून काही फुले दिसू लागली आहे. कास पठार, तलाव परिसरात अल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटक निसगार्चा मनसोक्त आनंद घेत आहेत. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी कास पठार परिसरात पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होताना दिसत आहे. पठारावर चवर, टूथब्रश, कापरू, कंद, पाचगणी आमरी, भुईचक्र आदी फुले तुरळक प्रमाणात उमलण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्यासह परराज्यातून फुलांचा हंगाम सुरू झाल्यावर पर्यटकांची गर्दी होते.
पंधरा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. पठारावरील सुंदर विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो. सध्या पांढऱ्या रंगाची फुले तुरळक स्वरूपात येण्यास सुरुवात झाली असल्याने तसेच हिरवागार निसर्ग, पावसाची संततधार, गुलाबी थंडी यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत दाट धुक्यांसह पावसाचा आनंद घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी पूल धोकादायक

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

कोल्हापुरातील शिवाजी पूल वाहतुकीसाठी अद्याप चांगला असल्याचा निर्वाळा स्ट्रकचरल ऑडीटमध्ये दिलेला असला तरी तो धोकादायक असल्याचे राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत म्हटले आहे. शिवाय सांगली जिल्ह्यातील चार पूलही धोकादायक असल्याचे याबाबतच्या अहवालात म्हटले आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील १४७ अत्यंत जीर्ण झालेल्या आणि कधीही कोसळू शकणाऱ्या पुलांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, शिवाजी पुलाला पर्यायी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असतानाही ते रखडले आहे. धोकादायकच्या यादीत हा पूल गेल्याने नव्या पुलाचे काम तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे.

राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील अत्यंत जीर्ण झालेल्या आणि कधीही कोसळू शकणाऱ्या पुलांची यादी प्रसिद्ध केली. त्यात कोल्हापूरमधील १ सांगली जिल्ह्यातील ४, सोलापूरमधील ३, पुणे आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी २ तसेच औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रत्येकी एका पुलाचा समावेश आहे. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवरील १४ पूल कधीही कोसळू शकतील, अशा धोकादायक अवस्थेत असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी पावसाळ्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील ८८ वर्षे जुना आणि वाहतुकीस अत्यंत धोकादायक झालेला पूल नदीच्या पुरात वाहून गेला. या दुर्घटनेत सात ते आठ वाहने वाहून गेल्याने ४२ जण मृत्युमुखी पडले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशातील राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या पुलांची गणना करताना वाहतुकीस धोकादायक ठरणाऱ्या १४७ पुलांची ओळख पटविली. यामध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील १४ पुलांचा समावेश आहे. या पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने निदर्शनाला आणून दिले आहे. पंचगंगा नदीवरील पूल, पुणे येथील मुळा नदीवरील पूल, नांदेडच्या आसना नदीवरील पूल, उस्मानाबादमधील अलियाबादच्या पुलाची अजून पाहणी झालेली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्यातील १४ पैकी ७ पुलांची पाहणी झाली आहे.

सांगलीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १० वरील चार पुलांची स्थिती वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक आहे. सांगलीच्या पेठ भागातील, भोसे, लांडगेवाडी, मिरज गावातील पुलांचा समावेश आहे. सोलापुरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१३ वरील बोरामणी येथील, कळसेनगर शेजारचा तसेच भीमा नदीवरील अशा तीन पुलांचा समावेश आहे. पुण्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१२ वरील मुळा नदीवरील आणि वारवे खुर्द या दोन पुलांची अवस्था वाहतुकीसाठी उपयुक्त नाही. नांदेडमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२६ वरील पांगरी तसेच आसना नदीवरील पुलांचीही जीर्णावस्था झाली आहे. औरंगाबादमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२० वर शिवना नदीवरील पुलाची दुरावस्था झाली आहे. उस्मानाबादमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२५ वरील आलियाबाद येथील पूलही दुरवस्थेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी ठाणेकरांना मंदिरातून बाहेर काढले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील पुजारी बाबूराव ठाणेकर यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी मंदिरातून बाहेर काढले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण झाले. अंबाबाई मूर्तीला घागरा चोली पेहराव नेसवल्याप्रकरणी ​सुरू असलेल्या वादामुळे कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पुजारी अजित ठाणेकर यांना अनिश्चित काळासाठी मंदिरात न येण्याचे सुचवले आहे. मात्र, शुक्रवारी ठाणेकर यांचा मंदिरात पूजेचा वार सुरू झाल्यामुळे बाबुराव ठाणेकर मंदिरात आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मंदिरात प्रवेशास मनाई केली.

शुक्रवारी दुपारी दोन वाजता ठाणेकर सोवळे नेसून मंदिरात आले. मात्र पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. याबाबत पोलिसांना स्पष्टीकरण देताना बाबुराव ठाणेकर म्हणाले की, मंदिर बंदी अजित ठाणेकर यांना असून मला बंदी करण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी ठाणेकर यांना मंदिरातील गाभाऱ्यात जाण्याला मनाई करत बाहेर जायला सांगितले.

अजित ठाणेकर यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात भाविकाने दिलेला घागरा चोली पेहराव अंबाबाई मूर्तीला नेसवला होता. देवीचा पारंपरिक पेहराव साडी असताना मनमानीपणे घागराचोली नेसवल्यामुळे ठाणेकर यांच्या विरोधात तीव्र संताप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबंदीचा अपेक्षित परिणाम अद्याप अस्पष्ट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘देशभरातील ८६ टक्के चलन अचानक रद्द होण्यामुळे भारतातील अनौपचारिक क्षेत्रास झळ पोहोचली आहे. चलन पुरवठा कमी झाल्याने अर्थव्यवस्थेचा प्रवास स्थिरतेकडे जात आहे. मात्र अद्याप अपेक्षित परिणाम अस्पष्टच आहेत,’ असे प्रतिपादन लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठाचे प्रा. डॉ. सुशांत मलिक यांनी केले. छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर) येथे निर्मूल्यीकरण व पुनर्मूल्यीकरण...जागतिक व्यवसायांचे प्रश्न व आव्हाने या​ विषयावर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक परिषदेत ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते या परिषदेचे उद्‍घाटन झाले. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे होते. तेलंगणा येथील सातवाहन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मेहमद इकबाल अली उपस्थित होते.

अर्थसांख्यिकी पद्धतीने वैश्विकस्तरावरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातील उलाढालीविषयी बोलताना डॉ. मलिक म्हणाले, ‘यावर्षी गुंतवणूकदारांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच देय रकमेचा परतावा सुधारला आहे. यामुळेच औपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक समावेशकतेच्या माध्यमातून पारदर्शकता आणि औपचारिक अर्थव्यवहार सुधारल्यानंतरच सकारात्मक चित्र दिसेल. नोटबंदीमुळे रद्द झालेल्या चलनाचा परिणाम झाला असला तरी अर्थव्यवस्थेला शिस्त येण्याची ही सुरूवात आहे. याचा दूरगामी परिणाम विचारात घेता, हे परिणाम दाहक किंवा त्रासदायक ठरणार नाहीत. आर्थिक समावेशन करण्याच्या धोरणातून ही परिस्थिती सुधारेल, असे वातावरण तयार होत आहे. आर्थिक व्यवहारात आलेली पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहाराकडे वाढलेला कल हे योग्य संकेत आहे, असेही डॉ. मलिक यांनी स्पष्ट केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे, विश्वस्त व सचिव डॉ. रणजित शिंदे, विश्वस्त ऋषिकेश शिंदे, डॉ. टी. ए. शिवारे, अमृतसर येथील इंडियन कॉमर्स असोसिएशनचे सचिव डॉ. बलविंदर सिंग. डॉ. व्ही. बी. काकडे आदी उपस्थित होते. परिषदेच्या व्यासपीठावर तीन सत्रांमध्ये विविध संशोधकांचे प्रबंध वाचन व पॅनल चर्चा झाली.

डॉ. एम. एम. अली यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेंद्र पारिजात, डॉ. ए. आर. कुलकर्णी, डॉ. ​बिंदू मेनन यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. डॉ. उमेश देशमुख यांनी आभार मानले. परिषदेच्यानिमित्ताने शंभरहून अधिक संशोधक कोल्हापुरात आले असून शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी अर्थतज्ज् डॉ. जे. एफ. पाटील यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजीराजे लोकसभेचे उमेदवार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा हक्क कायम ठेवत भाजपच्या उमेदवारीवर नजर असलेल्या धनंजय महाडिक यांना पर्याय म्हणून सध्या खासदार संभाजीराजे हेच लोकसभेचे उमेदवार म्हणून पुढे येण्याची दाट शक्यता आहे. भाजपने त्यादृष्टीनेच तयारी केली आहे. संभाजीराजेनी सहयोगी सदस्यत्व स्वीकारून प्रवेशाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. महाराष्ट्रात मराठा मोर्चाला जोर आल्यानंतर भाजप सरकार चिंतेत होते. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी खासदार संभाजीराजे आक्रमक झाले होते. महाराष्ट्रात विविध भागात फिरून वातावरण निर्मिती करत होते. याचाच लाभ घेण्यासाठी त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले.

संभाजीराजे यांची नियुक्ती करताना शिवाजी आणि शाहू महाराजांचा सन्मान असे लेबल लावत भाजपने मोठे राजकारण साधले होते. एवढे मोठे बक्षीस दिल्यानंतर संभाजीराजे भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असे म्हणणे धाडसाचे होते. त्यामुळे ते कधी हातात कमळ घेणार एवढीच अपेक्षा होती. त्यानुसार सहा ​महिन्यापूर्वी भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेत त्यांनी भाजपला जवळ केले. त्यांचा हा निर्णय सहा महिने गुपित ठेवण्यात ते यशस्वी ठरले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या भाजप खासदारांच्या बैठकीला राहिलेल्या उपस्थितीने गुपित फुटले.

जिल्ह्यात भाजपच्या व्यासपीठावर थेट न येता त्यांनी भाजप वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणातही त्यांनी भाजपला चांगलीच मदत केली. खासदार महाडिक हेदेखील गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या राजकारणापासून अलिप्त राहत आहेत. त्यांचे आणि आमदार हसन मुश्रीफ यांचे पटत नसल्याने राष्ट्रवादीत गटबाजी वाढली आहे. विद्यमान आणि कार्यक्षम खासदार म्हणून लोकसभेची उमेदवारी त्यांच्याशिवाय कुणाला मिळणार नाही याची खात्री महाडिक यांना आहे. पण सत्तेचे वारे फिरले तर ते ऐनवेळी भाजपची उमेदवारी मागू शकतात. भाजपला असा ताकदीचा उमेदवार हवाच आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक यांचे पाय सध्या दोन्ही डगरीवर आहेत.

महाडिक यांनी राष्ट्रवादीचीच उमेदवारी पसंत केली तर भाजपला उमेदवार शोधावा लागणार आहे. या शोधाचाच एक भाग म्हणून खासदार संभाजीराजे यांचे नाव त्यांच्यासमोर आहे. त्यासाठीच त्यांनी राज्यसभेवर संधी दिली आहे. सहयोगी सदस्य झाल्याने त्यांची पुढील वाटचाल स्पष्ट झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी ते भाजपचे अधिकृत खासदार होण्याची चिन्हे आहेत. तत्पूर्वी त्यांना मंत्रीपद दिल्यास पक्ष प्रवेशाला गती येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात चांगले यश मिळवले आहे. अनेकांना पक्षात प्रवेश देवून ग्रामीण भागात ताकद निर्माण केली आहे. लोकसभा निवडणुकीला याचा फायदा होणार आहे. ताकदीचा उमेदवार मिळाल्यास लोकसभेचा मार्ग सुकर होणार असल्यानेच सध्या महाडिक आणि संभाजीराजे यांच्याभोवती भाजपने जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे.

मंत्रिपदाचीही शक्यता

मराठा मोर्चाच्या निमित्ताने सध्या राज्यात जोरदार वातावरण निर्मिती होत आहे. मराठा समाज आक्रमक होत असताना संभाजीराजे यांना मंत्र‌िपद देवून वातावरण निवळण्याचा प्रयत्न भाजपमध्ये सुरू असल्याचे कळते. मराठा मोर्चात संभाजीराजे अग्रभागी आहेत. त्यांनी पाच सहा वर्षे या मागणीसाठी राज्याचा दौरा केला आहे. यामुळे खासदारकीनंतर त्यांच्या मंत्र‌िपदाची चर्चा सुरू असली तरी त्यांनी मात्र ही केवळ चर्चाच असल्याचे सांगत हालचालीचा इन्कार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनवट, चंदनशिवेचे तपासात असहकार्य

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा लुटीतील संशयित आरोपी, निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे सीआयडीकडे शरण आले असले तरी तपासात त्यांचे सहकार्य नाही. या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. दोन्ही संशयित महत्त्वाचे प्रश्न टाळत आहेत, त्यामुळे तपासाला अपेक्षित गती मिळालेली नाही. दरम्यान, वारणा लूटप्रकरणी सीआयडीने ३० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याने भक्कम पुरावे हाती असल्याची माहिती सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक जय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

घनवट आणि चंदनशिवे हे गुरुवारी सीआयडीसमोर शरण आले आहेत. शुक्रवारी जय जाधव यांनी संशयितांची चौकशी करून तपासाचा आढावा घेतला. ‘तपास अधिकारी नरेंद्र गायकवाड यांनी गुरूवारी दिवसभर आणि शुक्रवारी दुपारपर्यंत अटकेतील दोघांवर प्रश्नांची सरबत्ती केली. गुन्ह्यातील सहभाग, चोरटा मैनुद्दीन मुल्ला याच्याशी आलेला संबंध, लुटीतील रक्कम याबाबत प्रश्न विचारले, हे दोघेही महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देत आहेत. तपासाअंती प्रकरणाची व्याप्ती वाढू शकते.’

दरम्यान, ‘या गुन्ह्याचा तपास करताना आजवर ३० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. फिर्यादीचाही जबाब नोंदवला आहे. तपासात भक्कम पुरावे मिळाले आहेत. संशयितांच्या विरोधातील पुराव्यांची माहिती दिल्यानेच हायकोर्टाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. फरार संशयितांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अधिकाऱ्यांचे १५ हेलपाटे हायकोर्टात झाले आहेत. दीपक पाटील याने हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे.’

कोठडीची रात्री अचानक पाहणी

जाधव गुरूवारी रात्री कोल्हापुरात आले. प्रभारी अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांच्याकडून तपासाची आढावा घेतल्यानंतर ते थेट करवीर पोलिस ठाण्यात गेले. साडेअकरा वाजता त्यांनी कोठडीची पाहणी केली. संशयितांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी करवीर पोलिसांना दिल्या. शिवाय सीआयडीचे साध्या वेशातील दोन पोलिसही ठाण्याच्या आवारात तैनात केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images